* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: गुढरम्य इतिहासाची किलकिली झालेली कवाडं...!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

गुढरम्य इतिहासाची किलकिली झालेली कवाडं...! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
गुढरम्य इतिहासाची किलकिली झालेली कवाडं...! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४/१/२३

गुढरम्य इतिहासाची किलकिली झालेली कवाडं...!

'दा विंची कोड' आणि 'एंजल्स एंड डेमंस' सारख्या जगप्रसिद्ध कादंबऱ्या लिहिणाऱ्या डेन ब्राऊन यांनी 'द लॉस्ट सिंबल' नावाचे एक पुस्तक लिहिलेय.त्यात नायक प्रश्न विचारतो, 


'मानवजात ज्ञानाच्या मागे लागली आहे आणि अत्याधुनिक ज्ञान मिळवत चाललीय.ज्ञान मिळविण्याचा वेग प्रचंड वाढत चालला आहे. हा सर्व प्रवास,पुढील पन्नास-शंभर वर्षांत आपल्याला कुठे घेऊन जाईल..? आणखी कशा प्रकारचं ज्ञान मिळवू आपण ह्या प्रवासात..?'


नायकाला उत्तर मिळते,"हा ज्ञानाचा प्रवास जो पुढे चाललेला दिसतोय,तो मुळी पुढे पुढे जातच नाहीये.तर आपलं मागील ज्ञान शोधून काढण्याचा प्रयत्न आहे हा.आपल्या जवळ जुन्या ज्ञानाचं इतकं प्रचंड भांडार आहे की पुढे जात जात तेच आपल्याला मिळणार आहे..!"


पुढे मात्र डेन ब्राऊन लिहितो, 'हे जे प्राचीन ज्ञान आहे,ते भारत, ्चीन यांसारख्या ठिकाणीच मिळेल. विशेषतः भारतात हा अमूल्य खजिना दडलाय..!'


एखाद्या तत्त्वज्ञ व्यक्तीने असे म्हणणे ही एक बाब,आणि डेन ब्राऊन यासारख्या लोकप्रिय लेखकाने हे म्हणणे ही वेगळी बाब होते.आणि म्हणूनच मग त्या प्राचीन ज्ञानाचा धांडोळा घेत मागे वळून बघितलं की जी काही थोडीफार, शिल्लक राहिलेली,ज्ञानाची किरणं दिसतात,ती बघूनच थक्क व्हायला होतं. असं वाटतं, 'त्या काळात हे असं ज्ञान आपल्या पूर्वजांना होतं ?'


त्या अद्भुत ज्ञानाची कवाडे किलकिली करण्याचा हा लहानसा प्रयत्न. .


- प्रशांत पोळ


बाणस्तंभ…


इतिहास हा फार चकवणारा विषय आहे.आणि इतिहासाचा मागोवा घेता घेता आपण एखाद्या अशा जागी येऊन उभे राहतो की मन अक्षरशः थक्क होऊन जाते.हे असं शक्य आहे का, याविषयी मनात गोंधळ उडतो.दीड हजार वर्षांपूर्वी हे इतकं प्रगत ज्ञान आपल्यापाशी होतं यावर विश्वासच बसत नाही.


गुजराथच्या सोमनाथ मंदिरापाशी आल्यावर आपली अशीच स्थिती होते.मुळात सोमनाथ इतिहासच विलक्षण.बारा ज्योतिर्लिंगांतील हे एक देखणं,वैभवशाली शिवलिंग.इतकं समृद्ध की, उत्तर पश्चिमेतून येणाऱ्या प्रत्येक आक्रमकाचं लक्ष सोमनाथकडे गेलं आणि अनेकवार सोमनाथ लुटल्या गेलं.सोनं,नाणं,चांदी,हिरे, माणकं, रत्नं... सर्व गाडे भरभरून नेलं.आणि इतकी संपत्ती लुटल्या जाऊनही दर वेळी सोमनाथचं शिवालय परत तशाच वैभवानं उभं राहायचं.


मात्र फक्त ह्या वैभवासाठी सोमनाथ महत्त्वाचं नाही.सोमनाथचं मंदिर भारताच्या पश्चिम समुद्र किनाऱ्यावर आहे.विशाल पसरलेला अरबी समुद्र रोज सोमनाथाचे पादप्रक्षालन करत असतो. आणि गेल्या हजारो वर्षांच्या ज्ञात इतिहासात ह्या सागराने कधीही सोमनाथाचा उपमर्द केलेला नाही.कोणत्याही वादळामुळे सोमनाथाचे गौरवशाली मंदिर कधी उद्ध्वस्त झाले नाही.


ह्या सोमनाथच्या मंदिराच्या आवारात एक स्तंभ आहे. हा 'बाणस्तंभ' म्हणून ओळखला जातो. हा केव्हापासून त्या ठिकाणी आहे, हे सांगणं अवघड आहे. इतिहासाचा धांडोळा घेत घेत मागे गेलो की,कुठेतरी सहाव्या शतकापाशी आपण पोहोचतो,जिथे ह्या बाणस्तंभाचा उल्लेख आढळतो.


पण म्हणजे हा सहाव्या शतकात उभारला गेलाय असं सिद्ध होत नाही.हा स्तंभ किती जुना आहे, याबद्दल नक्की सांगणं शक्य नाही. 


"हा बाणस्तंभ म्हणजे दिशादर्शक स्तंभ आहे.यावर एक बाण उभारलाय,आणि खाली लिहिलंय


'आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग' 


याचा अर्थ असा - या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत एकही अडथळा नाही. अर्थात या मार्गात एकही जमिनीचा तुकडा नाही.


ज्या क्षणी सर्वप्रथम मी हा स्तंभ बघितला अन् हा शिलालेख वाचला,तो वाचून डोक्यात त्याचा अर्थ जाता क्षणीच अंगावर काटा उभा राहिला! हे। ज्ञान इतक्या पूर्वी आपल्याला होतं..? कसं शक्य आहे हे? आणि जर हे खरंच असेल तर किती समृद्धशाली ज्ञानाचा वैश्विक वारसा आपण बाळगतोय..!


संस्कृतमधे कोरलेल्या ह्या एका ओळीच्या अर्थामधे अनेक गूढ अर्थ सामावलेले आहेत.ह्या ओळीचा सरळ अर्थ आहे,


सोमनाथ मंदिराच्या त्या बिंदूपासून दक्षिण ध्रुवापर्यंत (म्हणजे अन्टार्क्टिक पर्यंत) एक सरळ रेघ ओढली तर मध्ये एकही भूखंड लागत नाही.


आता हे खरं कशावरून.. ? आजकालच्या ह्या तंत्रज्ञानाच्या युगात हे शोधणं सोपं व्हावं. मात्र हे तितकंसं सोपं नाही.गुगल मॅप वरून बघितलं तर वरवर बघता भूखंड दिसत नाही.मात्र तो मोठा भूखंड.एखादा लहान भूखंड शोधायचा असेल तर त्या पूर्ण मार्गाला 'एन्लार्ज' करत करत पुढे जायचे.हे तसं किचकट काम.मात्र संयम ठेवून, चिकाटीने हळूहळू बघत गेलं की मार्गात एकही मोठा भूखंड,म्हणजे 10 Km X10Km चा, लागत नाही.


त्याखालचा भूखंड हा विशेष तंत्रज्ञानानेच शोधावा लागेल.थोडक्यात,तो संस्कृत श्लोक खरा आहे असं धरून चालू.


पण मूळ प्रश्न तसाच राहतो.अगदी सन ६०० मध्ये हा बाणस्तंभ उभारला असं जरी म्हटलं, तरी त्या काळात पृथ्वीचा दक्षिण गोलार्ध आहे, हे ज्ञान कुठून मिळालं? बरं,दक्षिण गोलार्ध माहीत होता हे गृहीत धरलं तरी सोमनाथ मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत गेलं की मध्ये कोठेही एकही भूखंड येत नाही,हे 'मॅपिंग' कोणी केलं ?सारंच अद्भुत..!


याचाच अर्थ,बाणस्तंभ उभारण्याच्या काळात, भारतीयांना पृथ्वी गोल आहे हे माहीत होतं आणि फक्त तितकंच नाही,तर ह्या पृथ्वीला दक्षिण ध्रुव आहे (म्हणजेच अर्थात उत्तर ध्रुवही आहेच), हे ज्ञानही होतं.हे कसं काय शक्य झालं? त्यासाठी पृथ्वीचा 'एरियल व्ह्यू' घेण्याचं काही साधन होतं का? नसल्यास पृथ्वीचा नकाशा त्या काळी अस्तित्वात होता का?


नकाशाशास्त्र (इंग्रजीत 'कार्टोग्राफी' - मूळ फ्रेंच भाषेतून उचललेला शब्द) हे फार प्राचीन शास्त्र.ख्रिस्तपूर्व सहा ते आठ हजार वर्षांपूर्वी गुहेत कोरलेल्या आकाशस्थ ताऱ्यांचे नकाशे मिळाले आहेत.मात्र पहिल्यांदा पृथ्वीचा नकाशा कोणी काढला,यावर एकमत नाही.भारतीय ज्ञानाचे पुरावें मिळाले नसल्याने 'एनेक्झीमेंडर' ह्या ग्रीक शास्त्रज्ञाकडे हा मान जातो.ख्रिस्तपूर्व ६११ ते ५४६ हा त्याचा कालखंड.मात्र त्याचा नकाशा हा अत्यंत ढोबळ आहे.त्या काळात जिथे जिथे ज्ञात मनुष्यवस्ती आहे,तो भाग या नकाशात दाखविण्यात आलेला आहे.या नकाशात उत्तर आणि दक्षिण ध्रुव दिसण्याचंही काही कारण नाही.


आजच्या वास्तविक जगाच्या जवळ जाणारा पृथ्वीचा नकाशा हेनरीक्स मार्टेलसने साधारण सन १४९० च्या आसपास केलेला आढळतो. असं म्हणतात,कोलंबसने ह्याच नकाशाचा आधार घेतलेला होता.


'पृथ्वी गोल आहे' हे मत युरोपातील काही शास्त्रज्ञांनी ख्रिस्तपूर्व काळा व्यक्त केलेले आढळते.एनेक्झीमेंडरने ख्रिस्तपूर्व ६०० वर्षांपूर्वी पृथ्वीला एका 'सिलेंडर'च्या स्वरूपात बघितले होते.ॲरिस्टॉटलनेही पृथ्वीला गोल म्हटलेले आहे.


मात्र भारताजवळ हे ज्ञान फार आधीपासून होते ह्याच्या अनेक खुणा मिळतात.


याच ज्ञानाच्या आधारावर सन ५०० च्या आसपास आर्यभट्टने फक्त पृथ्वी गोल आहे,हेच सांगितले नाही,तर पृथ्वीचा व्यास ४,९६७ योजने आहे (म्हणजे नवीन मापनाप्रमाणे ३९,९६८ कि. मी.) हे देखील ठासून सांगितले. 


आज सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून पृथ्वीचा काढलेला व्यास ४०,०७५ कि.मी.आहे.अर्थात आर्यभट्टच्या आकलनात चूक होतेय ती फक्त ०.२६%. सोळाशे वर्षांपूर्वी आर्यभट्टजवळ हे ज्ञान आले कोठून..?


सन २००८ मधे जर्मन इतिहासतज्ज्ञ जोसेफ श्वार्टझबर्गने हे सिद्ध केले की, 


ख्रिस्तपूर्व दोन / अडीच हजार वर्षांपूर्वीपासून भारतात नकाशाशास्त्र अत्यंत विकसित होते.नगर रचनेचे नकाशे तर त्या काळात उपलब्ध होतेच,पण नौकानयनासाठी आवश्यक असे नकाशे असल्याचेही पुरावे आढळतात.


भारतात नौकानयन शास्त्र फार पूर्वीपासून विकसित होतं.संपूर्ण दक्षिण आशियात ज्या प्रकारे हिंदू संस्कृतीच्या पाऊलखुणा आढळतात, त्यानुसार भारताची जहाजं पार पूर्व टोकापर्यंत, म्हणजे जावा,सुमात्रा,यवद्वीप ओलांडून जापानपर्यंत समुद्रात विहार करत होती याचे भरभक्कम पुरावे मिळाले आहेत.१९५५ साली शोधण्यात आलेल्या गुजरातच्या लोथलमध्ये अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष सापडले आहेत.यात भारताच्या प्रगत नौकानयनाविषयी अनेक पुरावे दिसतात.


अर्थात सोमनाथ मंदिर उभारण्याच्या काळात दक्षिण ध्रुवापर्यंतचे दिशादर्शन त्या काळातील लोकांना असेल हे निश्चित.दुसरा अजून एक विचार समोर येतो की,दक्षिण ध्रुवापर्यंत सरळ रेषेत जमीन नसलेला समुद्र आहे हे नंतर शोधून काढण्यात आलं,की दक्षिण ध्रुवापासून जमीन नसलेल्या सरळ रेषेची सांगता भारतात जिथे होते,तिथे सोमनाथ हे ज्योतिर्लिंग उभारण्यात आलं..? त्या बाण-स्तंभावर लिहिलेल्या ओळीत उल्लेख केलेला आहे, ('आसमुद्रान्त दक्षिण ध्रुवपर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग) तो ज्योतीमार्ग म्हणजे नेमकं काय..?


सध्या तरी हे गूढच आहे..!


पुढील भागात 'लोहस्तंभ' 

भारतीय ज्ञानाचा खजिना - प्रशांत पोळ