* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

7/5/26

मातृहत्यारा सम्राट नीरो / Matricide Emperor Nero

पूर्वेकडे आपण जरा फिरून आलो.चला पुन्हा रोम शहरी.सीझर मेल्यावर त्याचा एक चुलत नातू गादीवर बसला.त्याचे नाव ऑक्टोव्हियस.त्याने दुसरे त्रिकूट बनविले.अ‍ॅन्टोनी,लॅपिडस व ऑक्टोव्हियस.या त्रिकुटाने सीझर,पॉपे व क्रॅशस यांच्याप्रमाणेच सारी पृथ्वी आपसांत वाटून घेतली.तिघांनाही लूट करण्यास नीट वाव मिळावा म्हणून ही विभागणी करण्यात आली. आपले काम नीट,निर्वेध व सुरळीतपणे चालावे यासाठी काही लोकांना आपल्या मार्गांतून दूर करणे त्यांना भाग होते! त्यांच्या अवकृपेला बळी पडलेल्यांत सुप्रसिद्ध वक्ता सिसरोही होता.सिसरो मारला जावा असे अ‍ॅन्टोनी व लॅपिडस यांना वाटत होते.प्रथमप्रथम त्याला वाचवू इच्छित होता.पण थोड्याशा विचार विनिमयानंतर सिसरोला ठार मारण्याच्या बाबतीत तिघांचेही एकमत झाले.

प्ल्युटार्क लिहितो; "त्या तिघांत झालेल्या कराराच्या अटी पुढीलप्रमाणे होत्या; "सीझर (ऑक्टोव्हियस) याने सिसरोची बाजू सोडावी,लॅपिडसने आपला भाऊ पॉलस याचा त्याग करावा व अ‍ॅन्टोनीने आपला मामा ल्यूसियस सीझर याला सोडावे." अशा रीतीने त्यांच्या मनातल्या क्रोध-द्वेषांनी त्यांची माणुसकी नष्ट केली.कोणताही हिंस्र वन्य पशूसुद्धा माणसाहून अधिक क्रूर व रानटी नसतो, हे त्यांनी जगाच्या निदर्शनास आणून दिले. क्रोधांध माणसाच्या हाती सत्ता आल्यास तो पशूहूनही पशू होतो.

त्या तिघांनी आपापले काटे काढून टाकून शिवाय आणखी शेकडो जणांची कत्तल केली,पण नंतर ते तिघे पुन्हा नेहमीप्रमाणे आपसांत भांडू लागले.त्या तिघांच्या तंट्यांत लॅपिडस केव्हाच मागे पडला व शेवटी मुख्य प्रतिस्पर्धी दोनव उरले.अ‍ॅन्टोनी इजिप्तमध्ये गेला व सीझरप्रमाणे क्लिओपात्रा हिच्या प्रेमपाशात सापडला.

ऑक्टेव्हियसला जिंकण्याचा एक दुबळा प्रयत्न त्याने केला;पण खि.पू. ३१ या वर्षी अ‍ॅक्टियमच्या आरमारी लढाईत त्याचा मोड झाला व ऑक्टोव्हियस रोमचा प्रतिस्पर्धीहीन स्वामी झाला.त्याने "ऑगस्टस" म्हणजे 'मोठा' ही अहंकारी पदवी धारण केली व रिपब्लिकची परंपरा राखण्याच्या ढोंगाआड सर्व सत्ता हळूहळू आपल्या हाती घेतली.तो पहिला रोमन सम्राट झाला.त्याने एक्केचाळीस वर्षे राज्य केले. (ख्रि. पू. २७ ते इ.स. १४). आपण रोमनांचा सम्राट नेता व देव आहोत,अशी घोषणा त्याने केली.त्याचे शरीर म्हणजे जणू देवाचे,त्याचा राहता राजवाडा म्हणजे जणू पवित्र देव मंदिर,अशी त्याची समजूत होती.त्याच्या ठायी उतावीळपणा नव्हता.तो धाडसी व कारस्थानी होता. कोणतेही कपट करायला तो मागेपुढे पाहत नसे.

थॉमस डी क्विन्सी आपल्या 'सीझर्स' नामक पुस्तकात लिहितो, "इतिहासात नमूद असलेल्या कोणत्याही कमालीच्या दुष्टपणाच्या कृत्यांशी तुलनेत कमी पडणार नाहीत,अशी ऑगस्टसची दुष्कृत्ये होती. देवांना खुश करण्यासाठी त्याने एकदा स्वतःच्या हातांनी यज्ञवेदीवर अनेक कैद्यांचा बळी दिला.एकदा एका युद्धानंतर आपल्या सैन्यास पुरेसा पगार देता येत नाही असे पाहून त्याने काही श्रीमंतांस ठार केले व त्यांच्या इस्टेटी सरकारजमा करून सैन्याचा पगार भागविला! मृत्यूशय्येवर असताना आपण आता जगातून जाणार,म्हणून आपली शेवटची स्तुति-स्तोत्रे गावयास त्याने नोकरांना सांगितले.आपण फारच दिव्य व भव्य जीवन जगलो,असे त्याला वाटे.इतकी उदात्त भूमिका केल्यावर पडद्याआड जाण्यास तो तयार होता; पण जाता जाता स्वतःचे पोवाडे ऐकू इच्छित होता.'

ऑगस्टसनंतर टायबेरियस गादीवर आला.त्याने इ.स. १४ ते ३७ पर्यंत राज्य केले.रोमनांच्या मानाने तो काही फार वाईट नव्हता.त्याला 'दारुडा टायबेरियस' म्हणत. जरा अधिक कठोरपणे लिहिणारे इतिहासकार त्याच्या बाबतीत म्हणतात,'तो दारू व रक्त पिऊन मस्त असे.' त्याने काही रक्त सांडले हे खरे.'पण त्या काळाच्या मानाने त्याने सांडलेले रक्त फार होते असे मात्र म्हणता येणार नाही.'इतर सम्राटांप्रमाणेच त्यानेही अनेकांना फाशी दिले.दुसऱ्यांना मारण्यात त्याला आनंद वाटे.पण तुलना केली असता त्याने कमी बळी घेतले,असेच म्हणावे लागेल.आयुष्याचा बराचसा भाग त्याने कॅप्री बेटावर घालविला.हे बेट समुद्रसपाटीपासून एक हजार फूट उंच होते.ज्यांच्यावर त्याची खप्पा मर्जी होई,त्यांना तो तेथील टेकड्यांवरून समुद्रात लोटी व ते दृश्य मजेने पाही.आपला मुख्य प्रधान सेजानस याच्या लहान मुलीला त्याने ठार केले.हीच त्याने केलेल्यांपैकी सर्वांत जास्त दुष्टपणाची व नीचपणाची गोष्ट होय. तो प्रधानही त्या वेळी मारला गेला.त्या लहान मुलीने विचारले, 'एवढ्याशा लहान वयात मी असे काय पाप केले आहे की,त्यासाठी तुम्ही मला ठार मारावे ? पण सम्राटाचा शब्द म्हणजे कायदा होता. अर्थातच तिला उत्तर कोण देणार? तिला तुरुंगात नेऊन गळा दाबून ठार मारण्यात आले!

तरीही टायबेरियस हा प्राचीन सम्राटांतला कमीतकमी दुष्ट सम्राट होता.तो मेल्यावर कॅलिगुला सम्राट झाला. त्याने इ.स. ३७ ते इ.स. ४१पर्यंत, म्हणजे फक्त चार वर्षे राज्य केले; पण या चारच वर्षांत त्याने अनंत क्रूरकर्मे केली. त्याने स्वतःच्या तीन बहिणींवर बलात्कार केला!करमणूक म्हणून तो माणसे ठार करी ! एकदा सर्कशीच्या रिंगणांतील हिंस्र पशूना पुरेसे अन्न नव्हते म्हणून त्याने त्यांच्यासमोर कैद्यांची रांगच्या रांग उभी करून त्यांना पोटभर जेवण दिले!कधीकधी मेजवानीच्या वेळी मेजवानीचाच एक गंमतीचा भाग म्हणून तो आपल्यासमोर लोकांना फाशी देववी ! तलवारीच्या एकाच घावासरशी डोके उडविलेले पाहण्यात त्याला विशेष आनंद होत असे.त्याने एकदा दोघा कॉन्सल्सना घरी जेवणास बोलावले होते.तो एकदम खो खो करून हसू लागला,तेव्हा त्या कॉन्सल्सनी नम्रतेने विचारले,'हसण्याचे कारण काय?' त्यावर त्याने उत्तर दिले, 'डोक्याशिवाय तुम्हा दोघांची धडे कशी दिसतील असा विचार मनात आल्यामुळे मला एकदम हसू आले.'

त्याने खुनाच्या कलेत पारंगत व्हायचे ठरविले व ते शिक्षण पुरे घेतले.लॅटिन इतिहासकार सुएटोनियस लिहितो,"बलिदानार्थ काढलेल्यांच्या वेदना कशा वाढतील,त्या बराच वेळ कशा टिकतील,हे तो नेहमी पाहत असे.तो सांगत असे,असे घाव घाला की,आपण मरत असल्याची जाणीव त्या मरणाच्या मुखी पडणाऱ्यास नीट व्हावी;एक घाव नि दोन तुकडे असे करू नका."

ज्युपीटर देव आपणाशी नेहमी बोलत असतो असे तो म्हणे.रस्त्यातून तो आपला एक कान जरा उंच करून चाले व पुटपुटत चाले.जणू काय देवाशीच आपले संभाषण चालले आहे असे तो भासवी.चंद्राला तो आपली बायको म्हणे.त्याने आपल्या एका घोड्याला चंद्राचा उपाध्याय म्हणून नेमले होते.

थोडक्यात सांगायचे तर तो वेडा होता.त्याच्यात राम नव्हता.त्याच्या या दुष्ट लहरी नष्ट होतील अशी आशा नव्हती.ज्यूलियसपासून नीरोपर्यंत सारेच सीझर वेडे होते,त्यांची वेडेपणाची लहर जणू आनुवंशिक होती! रोमनांनी कॅलिगुलाचे हे वेडेचार चार वर्षे सहन केले.

नंतर मात्र त्यांनी त्याला ठार केले! पुढचा सम्राट कॅलिगुलाचा चुलता क्लॉडियस याने इ.स. ४१ ते इ.स. ५४ पर्यंत राज्य केले.तो रोगट,नेभळट,असंस्कृत व किळसवाणा माणूस होता.हसताना तो तोंडाने एक विशिष्ट आवाज करी,बोलताना अडखळे,रागावला की एखाद्या मूर्खाप्रमाणे वाटेल तसे हातवारे करी.स्वतःच्या मूर्खपणाच्या करमणुकीसाठी त्याने साऱ्या रोमचे जणू सर्कशीत परिवर्तन केले! रोमन लोक त्याच्याकडे सर्कशीतला एक विदूषक या नात्यानेच पाहत.त्याला प्रजेविषयी प्रेम नव्हते व प्रजेलाही त्याच्याबद्दल आदर नव्हता.पूर्वजांप्रमाणे,त्यानेही लोकांस छळण्याचे नाना प्रकार शोधून काढले.जुन्या ग्लॅडिएटर लढाया त्याला फिक्कट वाटत.सम्राटाचे समाधान होण्याइतके मारण-मरण त्यात नसे म्हणून त्या खेळात त्याने अंगावर काटा आणण्यासारख्या आणखी काही प्रकारांची भर घातली.खरोखरच कैद्यांनी भरलेली गलबते टायबर नदीत उभी करण्यात आली व एकोणीस हजार कैदी एकमेकांवर तुटून पडले! ते आपापले प्राण एकमेकांपासून वाचवू लागले.कितीतरी कैदी ठार झाल्यावर ती करमणुकीची लढाई संपली.

तो स्वतःला मोठा खेळाडू समजे.एकदा दोघा ग्लॅडिएटरांनी परस्परांस भोसकून ठार केले तेव्हा त्याने त्यांच्या दोन्ही तलवारींचे नक्षीदार काटे केले;त्या काट्यांनी तो जेवे.जेवताना जणू त्या दोन मृतात्म्यांची तो स्मृतीच करी ! पूर्वीच्या सम्राटांनी आपणाविरुद्ध कट करणाऱ्यांस ठार मारले होते.

क्लॉडियस त्यांच्याही पुढे गेला.त्याच्या मित्रांना पडलेल्या स्वप्नात जे लोक त्याच्याविरुद्ध कट करीत आहेत असे त्यांना दिसे, त्यांनाही तो ठार करी.एखाद्याने जर "माझ्या स्वप्नात अमुक माणूस आला व तो तुमच्याविरुद्ध कट करीत आहे असे मला दिसले" असे सांगितले,तर त्या स्वप्नात दिसलेल्या खऱ्या माणसास लगेच ठार मारण्यात येई. क्लॉडियसच्या मित्रांना आपणास नको असलेले लोक जगातून नाहीसे करण्याला हा फारच सोपा उपाय सापडला होता.

मागील काही पृष्ठांत रोमच्या काही प्राचीन सम्राटांनी केलेल्या अत्याचारांपैकी पाशवी क्रूरतेचे काही प्रकार नमुन्यादाखल दिले आहेत.ते सारे लज्जास्पद आहेतच

पण पुढे नीरोने केलेल्या अनन्वित प्रकारांचा ते प्रकार म्हणजे नुसता प्रारंभच होता.नीरो हा या सर्व तिरस्कारणीय पिशुनांचा अनुकंपनीय मुकुटमणी होता.नीरो हा क्लॉडियसच्या आग्रिप्पिना राणीला तिच्या पहिल्या नवऱ्यापासून झालेला मुलगा. इ.स. ३७मध्ये म्हणजे ख्रिस्ताला क्रॉसवर चढविल्यानंतर चार वर्षांनी तो जन्मला. 

पुढे त्याच्या आईने क्लॉडियसशी लग्न केले व ती रोमची राणी झाली.नीरो तेव्हा अकरा वर्षांचा होता.आग्रिप्पिना ही क्लॉडियसची चौथी पत्नी.त्याने पहिल्या दोघींना सोडचिठ्ठी दिली होती व तिसरीला ठार केले होते.

आपलीही तीच गत होऊ नये म्हणून नीरोच्या आईने या नव्या नवऱ्यालाच विष देऊन ठार केले! क्लॉडियस विषप्रयोगाने मेला तेव्हा नीरो सतरा वर्षांचा होता.तो कायदेशीररीत्या गादीचा मालक नव्हता. कारण,

क्लॉडियसला ब्रिटॅन्निकस नामक औरस मुलगा होता.पण बादशहा कोणास करायचे,हे बादशाही गार्डाच्या हाती असे.ते वाटेल त्याची निवड करीत व सिनेटरांना त्याला मान्यता द्यावी लागे.न दिली तर गार्डाच्या तलवारी तयारच असत! राजा मरताच आग्रिप्पिना आपल्या पुत्राला नीरोला घेऊन बादशाही गार्डाच्या मुख्याकडे बुर्व्हसकडे गेली.ती सुंदर व मोहक होती.तिला पावित्र्याची मुळीच चाड नव्हती.बुर्व्हसला चुंबने देऊन व त्याची चुंबने घेऊन तिने प्रार्थना केली व चुंबनांच्या भरीला प्रत्यक्ष भरपूर लाचही दिली.तिने बुर्व्हसलाया दोन प्रकारांनी पटवून दिले की,गादीवर ब्रिटॅन्निकसपेक्षा नीरोचाच हक्क अधिक आहे.

शेवटी मोठ्या समारंभाने सम्राट म्हणून नीरोच्या नावे द्वाही फिरविण्यात आली.ईश्वराने नेमलेला रोमचा सम्राट म्हणून तो गादीवर बसला.ईश्वराची ही इच्छा रोमनांच्या अनुभवास पूर्णपणे यावी म्हणून त्याने ब्रिटॅन्निकसला विष देऊन ठार केले! आग्रिप्पिनाने क्लॉडियसला नव्हते का ठार केले? सुपात्र मातेचा तो सत्पात्र पुत्र होता.

पाच वर्षेपर्यंत राज्यकारभाराची सूत्रे हाती घेण्याची इच्छा त्याने दाखविली नाही,आई,बुहेस व शिक्षक सिनेका यांना राज्यकारभार चालविण्याची त्याने मुभा दिली.तो आपल्या मित्रांसह भरपूर दारू पित राही,सर्व सुखांचा पेला ओठांना लावून बसे.जवळच्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरील टोप्यांसारख्या टोप्या घालून व वेश बदलून तो व त्याचे मित्र सर्वत्र भटकत,लोकांना ठोकीत,

बदडीत,यथेच्छ दारू पीत व रस्त्यातून जाणाऱ्या येणाऱ्यांस धरून गटारात फेकीत.असल्या बेताल गुंडगिरीच्या एका संचारसमयी नीरोने एका सिनेटराच्या पत्नीवर हल्ला केला तेव्हा त्याने नीरोला मरेमरेतो मारले.

मानवजातीची कथा,हेन्री थॉमस,अनुवाद - साने गुरुजी

तो एखाद्या सामान्य ठगाप्रमाणे खासगी रीतीने व चोरून असा वागत होता,तोपर्यंत रोम जरा सुरक्षित होते.पण त्याच्या आईला त्याचे हे वर्तन पसंत नसे,राज्याचा कारभार आपल्या मुलाने स्वतः सिंहासनावर बसून हाकावा असे तिला वाटत असे.पण नीरो सुखासक्त असल्यामुळे तिच्या म्हणण्याकडे लक्ष देत नसे. क्लॉडियसच्या मृत्यूपूर्वी त्याची मुलगी ऑक्टेव्हिया हिच्याशी नीरोचे लग्न झाले होते.तो रोम शहराची उपेक्षा करी,तद्वतच पत्नीकडेही लक्ष देत नसे.अ‍ॅक्टे नामक ग्रीक दासकन्येसह तो उघडपणे राहू लागला. आग्रिप्पिना पूर्णपणे निराश झाली.तिने मुलाला परोपरीने विनवून पाहिले,अ‍ॅक्टे हिचा नाद सोडून देण्याबद्दल प्राथून सांगितले,धमक्याही दिल्या;पण कशाचाही उपयोग झाला नाही.राजवाडा कौटुंबिक कलहाची युद्धभूमी बनला.नीरोच्या मित्रांनी व खुशामत्यांनी त्याची बाजू घेतली.ते त्याला म्हणत, "तुझी आई म्हातारी आहे,तिचे काय ऐकतोस? तिच्या हातचे बाहुले नको बनू,असा मागे मागे का राहतोस? स्वतःच्या हाती सत्ता घे.आईचे काहीही चालू देऊ नको." तो मित्रांच्या सल्ल्यानुसार वागू लागला,त्यामुळे मायलेकरांना एकत्र राहणे अशक्य झाले.आग्रिप्पिना राजवाडा सोडून दुसरीकडे राहावयास गेली.

अपुर्ण शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..!

7/3/26

पुन्हा बेडूक-बाबा / Frog-dad again

रॅफ नोकोबीला फिरायला गेला होता.त्याची योजना जमिनीवर आकार घ्यायला लागायची होती,पण बिल् रॉबिन्सनं प्रचार भरपूर केला होता."दोनही जगांमधलं सर्वोत्तम",दक्षिणेच्या विकासाचा आणि पर्यावरण रक्षणाचा मानदंड,त्याचा म्हणे पुलित्झर पुरस्कारासाठी विचार होत होता.खुद्द संडरलंड असोसिएट्सला नेचर काँझर्व्हन्सीचा 'हरित-पर्ण' पुरस्कार मिळणं शक्य होतं.रॅफला अनेक जागांकडून भाषणं द्यायची आमंत्रणं येत होती.आणि यातच आईवडिलांना भेटणं,नोकोबीला भेटून येणं,हेही रॅफ जमवत होता.

अशीच एक संध्याकाळ.सावल्या लांबलेल्या.झाडी काळवंडू लागलेली.रॅफ जंगलातून पायवाटेजवळच्या आपल्या कारजवळ आला.तीन माणसं तिथे उभी होती. रेव्हरंड वेन लेबो,बो रेनी आणि तिसरा एक विशीच्या आतला तरुण.बोटभर दाढी.काळा चष्मा. रुंद कडेची हॅट.तिघंही कारची वाट अडवून उभे.

रॅफ मनातून घाबरला.पळावं का जंगलात ? पण एखादे वेळी ते नुसतेच 'झालं गेलं,गंगेला मिळालं' करायला आले असतील.मग पळून जाणं फारच विचित्र ठरेल, किंवा मागच्या भेटीसारखी नुसती तोंडातोंडी करायची असेल.आणि हा काऊबॉय हॅटवाला नवा पोरगा कोण?

शक्य तितक्या तटस्थ आवाजात रॅफनं विचारलं, "रेव्हरंड लेबो,ना? काय करू तुमच्यासाठी?"

तुझ्याशी बोलायचं आहे." लेबो तुटकपणे म्हणाला.

"आवडलं असतं,मला बोलायला.पण जरा घाईत आहे. नंतर कधीतरी भेटू." रॅफ त्यांना वळसा घालून गाडीकडे जात म्हणाला.

"नाही. आत्ता." लेबो पुन्हा म्हणाला.रेनीनं शर्टाची एक घडी बाजूला केली;कमरपट्ट्यात एक आखूड नळीचं पिस्तूल होतं,ते दाखवायला.

"बाप रे!" रॅफ मनात म्हणाला. "बरं,बोला,जर इतकं निकडीचं असेल तर..."

"आधी काहीतरी दाखवायचं आहे,तुला." लेबोनं मानेनं जंगलाकडे खूण केली.रॅफला समजेना,काय असेल ते. पोलिसात रिपोर्ट करायला हवा होता,असं मात्र वाटून गेलं.

"कुठे जायचं आहे?" त्यानं विचारलं.

"नदीकडे." लेबो म्हणाला.म्हणजे त्यांना काय करायचं आहे हेही ते लपवत नाही आहेत, रॅफच्या मनात आलं.मला नाहीसं करणार आहेत !

पण नोकोबी परिसर त्यांच्यापेक्षा रॅफला चांगला माहीत होता.कुठे निसटायचं,कसा आडोसा शोधायचा,सारं त्याच्या डोक्यात रचलं जायला लागलं.दोघांकडे तरी पिस्तुलं होती.मोठा धोका होता.पण वाटेत एकदोन जागी 'डोम्स' होते.खाली लहानसं तळं,आणि त्यातून वर आलेली दाट अशी हार्डवुड वृक्षाची राई.जर असा एखादा डोम त्या तिघांपुढे आला,तर आपण पलीकडे पळून वाट काढू शकू.

जरा वाट चालल्यावर रॅफनं करंगळी दाखवली.लेबो थांबला.म्हणाला, "जरा दूर जा.पण काही शहाणपणा करू नको!" काऊबॉय हॅटवाल्याला म्हणाला, "संकी, त्याच्यामागे जा.काही गडबड केली तर गोळी घाल त्याला!"

रॅफ पायवाट सोडून डोमभोवतीच्या झाडोऱ्यात शिरला. "पुरे! थांब!" संकी म्हणाला.रॅफनं पँटचं झिप खेचल्यासारखं केलं आणि जरा वळून संकीकडे पाहिलं, जवळच होता.पण दोघं लेबो आणि रेनीपासनं थोडे दूर आले होते.पिस्तुलं सगळी अजूनही पट्ट्यांमध्येच होती.

"थांब संकी, साप!" रॅफ म्हणाला,आणि संकीला जोरानं धक्का दिला.तो खाली पडायच्या आतच रॅफ डोमला वळसा घालून जिवाच्या आकांतानं जंगलाकडे पळत सुटला.

मंकी सावरून त्यानं पिस्तुल काढायच्या आत रॅफन जंगल गाठलं होतं.

रेनीनं रेफच्या वेगाचा अंदाज घेत जंगलात जरा पुढे गोळ्या झाडल्या.आडांमधून पळणाऱ्या हरणांवरही ही यक्ती फारशी यशस्वी ठरत नाही,आणि इथे तर अशा युक्त्या जाणणारा माणूस त्या टाळत होता.

लेबो आणि मंडळी डोमला वळसा घालून येईपर्यंत त्यांच्या पन्नासेक पावलं पुढे रॅफ पळत होता.त्याला कुठे जायचं ते माहीत होतं,तर पाठलाग करणारे चाचपडत होते.लवकरच शिकार आणि शिकारी यांच्यातलं अंतर शंभरेक पावलं झालं.

आता पाठलाग करणाऱ्यांनी पसरून जास्त भाग व्यापणारा पाठलाग सुरू केला.ते रॅफला नदीकडे लोटायच्या प्रयत्नात होते.तो थेट नदीकडे गेला.तर लवकरच त्या तिघांच्या जाळ्यात अडकणार होता. त्याला फार चांगलं पोहताही येत नव्हतं !

पण मधल्या काळात रॅफला पाठलाग करणाऱ्यांच्या सवयी आणि कौशल्याची पातळी समजू लागली होती. लेबो वयस्क होता,आणि बहुधा त्याच्याकडे पिस्तूलही नव्हतं.इतर दोघे मात्र अनुभवी शिकारी होते,पण पिस्तूल हे शिकारीचं हत्यार नव्हतं! आता प्रयत्नानं रॅफ बेडूक-बाबाच्या घराकडे पळत होता.इतर माणसांना भेटणं,हा पाठलागापासून वाचायचा सर्वांत भरवशाचा मार्ग होता;भलेही माणूस बेडूक-बाबासारखा घनचक्कर का असेना !

आडवंतिडवं पळत,मधूनच एखाद्या गोळीच्या आवाजानं दचकत रॅफ बेडूक-बाबाच्या घरापुढच्या धक्क्याजवळ पोचला.त्याची चाहूल बेडूक-बाबाला लागली असावी, कारण तो दारातच उभा होता.अगदी नेमका मागे पाहिला होता तेव्हासारखाच दिसत होता.मळकट टीशर्टवर मात्र पाच वर्तुळं चितारलेली होती,आणि 'अटलँटा १९९६' असं लिहिलं होतं.एखादा दगड असावा तसा निश्चल उभा होता बेडूक-बाबा.

"प्लीज मला मदत करा! काही माणसं मागे लागली आहेत,मारणार आहेत मला!" धापा टाकत रॅफ म्हणाला.

बेडूक-बाबानं निर्विकारपणे पाहिलं,आणि बाजूला सरकला.रॅफ आत जाताच बेडूक-बाबानं एका मोठ्या कपाटाकडे हात केला.आत कळकट फडकी,हत्यारं, मासे पकडायचे रॉड्स वगैरे कचरा होता. "आत जा, आणि गप्प बैस." बेडूक-बाबानं आज्ञा केली.

दोनच मिनिटांत धापा टाकत रेनी आणि संकी आत आले.बेडूक-बाबाला म्हणाले, "आम्ही पोलीसचे अधिकारी आहोत.एक गुन्हेगार पळून इकडे आला आहे.आमचे साहेबही मागून येताहेत."

बेडूक-बाबा मख्ख उभा होता. आणखी दोनतीन मिनिटांत लेबो आला,घामानं भिजलेला आणि धापा टाकत असलेला.

"स्टेट पोलीस ! पेट्रोल पंप लुटून आलाय,तो माणूस. पाहिला का ? आम्हाला मदत करा" लेबो म्हणाला.

"ओळखपत्रं?" बेडूक-बाबानं विचारलं.

"कारमध्ये राहिली.लवकर मदत करा." लेबो म्हणाला. रेनी त्याला मानेनं खुणावत होता,की रॅफ घरातच आहे. "करता का मदत?" लेबोनं विचारलं.

"हो!" म्हणत बेडूक-बाबानं स्टँडवर ठेवलेली शॉटगन उचलली.कपाटाकडे पाहात म्हणाला, "ए बारक्या! बाहेर ये!"

रॅफ गप्प राहिला,तसा बेडूक-बाबा ओरडला, "येतोस, की दारातूनच गोळ्या खाणार आहेस?"

हात वर करून रॅफ बाहेर आला.थकवा आणि भीतीनं अर्धमेला झाला होता.पुढ्यात कोण कुठे आहे,तेही समजायला त्याला वेळ लागला.

पुढ्यात होता बेडूक-बाबा,शॉटगन त्याच्यावर रोखून. त्याच्यामागे लेबो आणि साथीदार.पण आता पिस्तुलं हातात नव्हती.ती कमरेला खोचून वर शर्ट सोडले होते, काट्याकुट्यांनी फाटलेले,माती-चिखलाचे डाग पडलेले.

"एक जण जाऊन नदीवर कोणी आहे का ते पाहून या. हाक मारून सांगा मला." बेडूक-बाबा म्हणाला.

रेनीनं अंगठ्यानं संकीला बाहेर जायला सांगितलं. मिनिटभरात हाक आली,"कोणी नाही!"

बेडूक-बाबानं तत्काळ वळून रेनीच्या छातीत गोळी घातली.तो धडपडत मागे पडला,हातपाय बाहेर फेकलेले.रॅफच्या कानठळ्या बसल्या.एक आंचका देऊन रेनी शांत झाला.रक्तामांसाचं धुकं त्याच्यावर बसू लागलं.लेबो बाहेर पळायला लागला,तर बेडूक-बाबानं शॉटगन परत झाडली.लेबोच्या डाव्या बाजूला पाठीत गोळी लागली.तो तोंडावर पडला.

"काय झालं? काय झालं?" असं ओरडत संकी दारातनं आला,आणि बंदूक पुन्हा 'पंप्' करून बेडूक-बाबानं संकीला गोळी घातली.

त्याचं पिस्तूल हवेत उडलं,आणि तो पायऱ्यांवरून मागे पडला.रॅफ जागच्या जागी थिजला होता.हात अजूनही शरणागतीच्या मुद्रेत वर होते. आता आपला नंबर का? त्याच्या मनात आलं.

"हरामखोर ! माझ्या घरात येऊन माझ्याशी खोटं बोलतात ! मला मारून माझी जमीन हडपायची आहे, घाण करायला,सगळीकडे!" पुढ्यातल्या लढाईच्या मैदानाकडे पाहात बेडूक-बाबा बोलत होता.

"तुला नाही मारणार,पोरा.पण पुन्हा कधी इकडे आलास,तर तुलाही खतम करीन.तुला काय वाटलं, विसरलो मी,तू मागे आला होतास ते? खूप वर्ष झाली ना? आणि एक पाहा.हे जे काय झालं इथे,त्याबद्दल कोणालाही,काहीही सांगायचं नाही.एक शब्द जरी कुणापुढे बोललास,तर तू,तुझी खानदान,सारं संपवून टाकीन !"

"बेस्सर! येस्सर!" रॅफ म्हणाला.तो घामानं डबडबला होता.हात कापत होते.घशाला कोरड पडली होती. बेडूक-बाबा मात्र शांतपणे काडीनं दात कोरत होता. रॅफच्या अंगांगात सुटकेचा भाव दाटून आला.आता जायला हवं.पण त्याला आपला जीव वाचवणाऱ्याशी मैत्री करायची इच्छा होत होती.

"कोणी यांना शोधत आलं तर काय कराल?" रॅफनं त्या रक्ताळलेल्या प्रेतांकडे हात करत विचारलं.

"कोऽणी येणार नाही.याच्यांच्या मनात इकडे यायचं नव्हतं.तू आणि मी सोडून कोणाला काही माहीत नाही आहे.आणि यांच्या कोणा यारदोस्ताला ते इकडे आल्याचं माहीतही असेल,तर ते चूप बसतील.ते काही बोललेच,तर त्यांना ते या भानगडीत होते,हे कबूल करावं लागेल." बेडूक-बाबा शांत होता.

"पण नदीत टाकलं यांना,तर कुठेतरी,कोणाला तरी सापडतील ते."

"हे कुठे जात नाही आहेत.म्हणजे जातील नदीतच,पण सापडण्यातले नसतील.तुकडे करून ओल्ड बेन्ला खिलवीन.हजार पौंडात एक औंस कमी नाही आहे,तो. सगळं हजम करेल,अगदी हाडांसकट.इतर कचरा सगळा कॅफिशेस खातील.फक्त मगरीचं शेण जाईल नदीसोबत."

"आणि आता चालता हो,इथून.मी सांगितलं ते लक्षात ठेव.मी तुलाही या इतक्याच सहजपणे मारू शकतो आणि त्यानं माझी झोपही बिघडणार नाही!"

पडत्या फळाची आज्ञा घेऊन रॅफ निघाला.एक संकीची टोपी सोडली,तर संध्याकाळच्या घटनांचा मागमूसही उरला नव्हता.टोपीची विल्हेवाट लावणं कठीण नव्हतं. बेडूक-बाबापर्यंत कोणी पोचू शकणार नव्हतं.

पण रँफ परत आईवडिलांकडे नाही गेला,क्लेव्हिल् पार केलं,एक मोठी 'जॉनी वॉकर गोल्ड लेबल'ची बाटली घेऊन त्यानं मोबीलच्या वाटेवरचं एक मोटेल गाठलं.

कपडे काढून तो खाटेवर पडला,टीव्हीवर माणसं हसताहेत,बोलताहेत असा एक कार्यक्रम लावला,थेट बाटलीतून दारू प्यायला लागला.थकवा,उल्हास,दारू यानं गुंगी येताच बाटली बंद करून रॅफ झोपला.

स्काऊटच्या ट्रिपसोबत रॅफ नोकोबीत आला होता.

वारूळ पुराण,सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी,माधव गाडगीळ, उदंड वारुळे जाहली ! ई.ओ.विल्सन, संक्षिप्त अनुवाद-नंदा खरे,मनोविकास प्रकाशन.

"हे भगवान! पाहा!" एक पोरगा म्हणाला.शेकडो मुंग्या एका लहान सरड्याला ओढून नेत होत्या. शकाही मुंग्या वारुळाकडे जाऊन "या!" असे संदेश देत होत्या. सरड्याला शेपूट नव्हतं.डोकंही धडापासून तुटत आलं होतं.कोणत्या तरी घारीनं मारलं असणार,आणि पडला असणार चोचीतून.

"हे! लाखो मुंग्या असतील।" पोरगा म्हणाला.दहाएक हजार,रॅफ स्वतःशी म्हणाला.

समाप्त



7/1/26

सोन्याचा पिंपळ / Golden Peepal

वटवृक्षाप्रमाणं पिंपळाचं झाडही विशाल असतं.मात्र वडाप्रमाणं या वृक्षाला पारंब्या नसतात.त्यामुळं पिंपळाचा विस्तार कमी असतो.परंतु विस्ताराची भरपाई पिंपळानं उंचीत भरून काढली आहे.वडाखाली असतो,तसा दाटपणा आणि अंधार पिंपळाखाली नसतो.

काक विष्ठेचे झाले पिंपळ ।

म्हणून कावळे उंचावर बसून जिथं जिथं विष्ठा टाकतात, तिथं तिथं पिंपळाची लहान रोपं वाढताना दिसतात.ही रोपं इमारती आणि मंदिरं यांच्या भिंतींच्या फटींतून वाढतात.

जंगलात फिरताना तुम्हाला पिंपळाची रोपं झाडांवर बांध्यांप्रमाणं वाढलेली दिसतील.पुढं या रोपाची वाढ होताना दोरीसारख्या मुळ्या साऱ्या झाडाला घट्ट आवळून टाकतात.

पिंपळाची पानं दिसायला मोठी सुंदर असतात.पानांकडं पाहिल्यावर वाटतं,एखादा बांधेसूद पुरुष साकार होतोय. पानाच्या दोन्ही किनारी बाहेरच्या दोन्ही बाजूंना आडव्या जातात (खांदे).नंतर आतल्या बाजूला घेऊन शेवटीएका टोकापाशी येऊन मिटतात (कंबर).जणू लहान, नाजूक कटीवरचं एखादं रुंद चौकोनी धडच.पानांचे देठ लांब असल्यामुळे ती लोंबताना दिसतात.

थोडीशी जरी वाऱ्याची झुळूक आली,तरी ती सळसळू लागतात. म्हणून संस्कृतात पिंपळाला चलदल म्हटलं आहे.

मार्च महिन्यात त्याची पानगळ सुरू होते.एक-एक पान गळायला लागतं.संत कबीर जिथं मागावर विणायला बसायचा,तिथल्या समोरच्या खिडकीतून एखाद्या राईतील पिंपळाचं झाड दिसत असावं.वर्षानुवर्ष त्यानं त्या झाडाची पानगळ होताना पाहिली असणार ! त्या निरीक्षणातूनच त्याचं काव्य बाहेर आलं असावं.

पान पडत यो कहै सुनि तरुवर ! बणराई! 

अबके बिछुरे ना मिले,दूर पडेंगे जाई 

रुखडा बोले पानसे,सुन पत्ते । मेरी बात

 इस घर की यह रीति है;इक आवत इक जात !!

नंतर पिंपळाला तांबूस कोवळी पानं फुटू लागतात.याच वेळी झाडाच्या डहाळ्या पिकल्या पिंपरांनी लवून जातात.हरोळ्या,तांबट,हरिद्र,धनेश,पोपट,बुलबुल असे किती तरी पक्षी फळं खाण्यासाठी झाडावर येतात. परंतु सर्वाधिक आनंद होत असेल, तर तो पळस मैनांना. त्या थव्याथव्यांनी पिंपळावर उतरतात अन् पिंपरं आवडीनं खातात. 

एक कळप गेला,की दुसरा येतो.हळूहळू कोवळी पानं वाढत वाढत पिवळसर दिसू लागतात.हळूहळू त्यांवर सोनेरी झाक येऊ लागते.

एका चैत्री पुनवेला मी मेळघाटातल्या वनविश्रामगृहात थांबलो होतो.जिकडंतिकडं चंद्राचा रुपेरी प्रकाश पडला होता.मी व्हरांड्यात वेताच्या खुर्चीवर बसून समोरच्या पिंपळाकडं पाहात होतो.पिंपळाच्या पानापानांवर चांदण्यात सुवर्णदीपांची कांती चमकत होती.मी त्या दृश्याकडं ध्यानमग्न होऊन पाहात होतो.

प्रभात समयी पिंपळामागून उगवणाऱ्या सूर्यकिरणांनी त्या पानांना सोन्याच्या रूपात बदलून टाकलं. ्तेव्हा मला संत तुकारामांच्या

'जयाचिये द्वारी सोन्याचा पिंपळ'

या अभंगाचा प्रत्यय आला.

जंगलात पक्षिनिरीक्षण करताना वाऱ्याची झुळूक नसली,तरी पिंपळाची पानं सारखी सळसळत असतात. जणू मी उन्हातून जंगलात फिरत असताना माझं लक्ष वेधून मला सावलीत येण्यासाठी ती पालवीत असत. तिथल्या वातावरणात थंडगार वायुलहरी पसरत. दुपारच्या वेळी झाडाखाली उताणा पडून मी निळ्या आभाळाकडं पाहात राही.त्या वेळी मला आकाशाचं आगळंवेगळं सौंदर्य जाणवे.सळसळत्या पानांचं अंगाईगीत ऐकत-ऐकत मला केव्हा डोळा लागे,हे कळत नसे.पावसाच्या थेंबांच्या आवाजानं मी जागा होऊन वर बघतो,तो पिंपळाच्या लांबसडक,

पातळ डहाळ्या सारख्या एकमेकांवर आदळून हा आवाज निर्माण झालेला असे.

जपान देशात छान प्रथा आहे,नवीन वर्षाच्या सुरुवातीला बुद्ध मंदिरातील घंटेचा आवाज ऐकायला जायचं.प्रत्येक मंदिरातील घंटेचा नाद व लय वेगळी.तसंच मला सर्व ऋतूंत पिंपळपानाची साद ऐकण्याचं आकर्षण आहे.

मंदिरातील सतत वाजणाऱ्या घंटेच्या नादात कधी पुनरावृत्ती नसते.देवळासमोरच्या पिंपळाचा घोषनाद एखाद्या चांदीच्या किणकिणणाऱ्या घंटीच्या नादासारखा वाटतो.पिंपळाची सळसळणारी पानं वातावरणात एक प्रकारची नादमाधुरी ओतीत असतात.नदीकाठच्या पिंपळाची सळसळ नदीच्या संथ प्रवाहाला साथ देते. सागरकिनाऱ्यावरच्या पिंपळाची सळसळ आणि तिला साथ देणारी सागराची गाज यांतला कुठला आवाज गूढ आहे,हे सांगता येत नाही.घरासमोरच्या पिंपळाची सळसळ अंगाई गीताप्रमाणं वाटते.

पिंपळ जसा पाखरांना अन्न देतो,तसा घरट्यासाठी आसराही देतो.पावसाळ्यात पिंपळाच्या झाडावर बगळे, ढोकरी,

पाणकावळे समूहानं घरटी बांधून पिलांना जन्म देतात.या सारंगागारांप्रमाणे काकागारंदेखील गावातल्या पिंपळावरच असतात.नागझिराजवळच्या मंगेझरी गावातील विशाल पिंपळावर मोरकुंचाची दोन-तीन घरटी असायची.ब्रह्मा,विष्णु आणि महेश या तीन देवांचा या वृक्षाशी संबंध,म्हणून हे झाड पूज्य मानलं जातं. भगवद्‌गीतेमध्ये विभूतियोगामध्ये 'वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे,असं श्रीकृष्णानं म्हटलं आहे.

श्रीकृष्ण आयुष्याच्या शेवटच्या कालखंडात याच वृक्षाच्या सावलीत ध्यानाला बसला असता,त्याचे पाय हरणाच्या मुखासारखे वाटल्यामुळं पारध्यानं तिथं बाण मारला.त्यामुळं श्रीकृष्णाचा त्यात अंत झाला.

राजकुमार सिद्धार्थ या वृक्षाखाली बसून साधना करीत असता त्याला साक्षात्कार झाला.तेव्हापासून तो बुद्ध म्हणून ओळखला जाऊ लागला.पिंपळाचं झाड बोधिवृक्ष म्हणून संबोधलं जाऊ लागलं.ही घटना इ.स. पूर्व २८८ मधील आहे.

जातककथा,बुद्धाच्या पूर्वजन्माच्या दंतकथा आणि बौद्धकालीन शिल्पं यांत अनेक बोधिवृक्षांचा उल्लेख असल्याचं पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम यांनी निदर्शनास आणून दिलं आहे.पिंपळ हा शाक्य मुनींचा,वटवृक्ष हा काश्यप मुनींचा,औदुंबर हा कनक मुनींचा,शिरीष वृक्ष हा क्रकुच्छंदांचा,शालवृक्ष हा विश्वबाहूचा,असे बोधिवृक्षांचे उल्लेख आढळून येतात.

राजकुमार सिद्धार्थ याला झालेल्या साक्षात्काराविषयी बरंच संशोधन झालं आहे.लिअल वॅटसन (Lyall Wastson) आपल्या 'द बायॉलॉजी ऑफ डेथ' या ग्रंथात लिहितो :

'Until about fifteen years ago, our pineal was thought to be a useless vestigial appendage, something left over from reptilian times. Then in 1959, Aaron Lerner of Yale University discovered that it produced a harmone which is called melatonin, and the pineal changed its image from degenerate body to renascent gland. Interest in pineal revived and a year later it became clear that melatonin was manufactured from serotonin, a very strange substance that occurs in the most unlikely places. It is found in dates and bananas and plums, but now where it is more common than in a species of wild figs that grow in tropics into huge sprawling trees with hanging roots that prop their branches up in beautiful shady colonnades. In Africa these banyan trees are sacred to many people and are very seldom cut. In India they are known as bo, and it is said that it was beneath one of these trees that the prince Siddharth Gautma sat (eating the figs?) when he suddenly understood the causes of human suffering. It was this enlightenment that led to his being called the Buddha.'

सुमारे पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत,आपली पीनियल ग्रंथी ही सरपटणाऱ्या प्राण्यांच्या काळातील एक निरुपयोगी अवशेष मानली जात होती.मग १९५९ मध्ये,येल विद्यापीठातील ॲरॉन लर्नर यांनी शोध लावला की ही ग्रंथी मेलाटोनिन नावाचा एक हार्मोन तयार करते,

आणि त्यामुळे पीनियल ग्रंथीची प्रतिमा एका क्षीण झालेल्या अवयवावरून बदलून एका पुनरुज्जीवित ग्रंथीमध्ये रूपांतरित झाली.पीनियल ग्रंथीबद्दलची उत्सुकता पुन्हा जागृत झाली आणि एका वर्षानंतर हे स्पष्ट झाले की मेलाटोनिन हे सेरोटोनिनपासून तयार होते,जो एक अत्यंत विचित्र पदार्थ आहे आणि तो अगदी अनपेक्षित ठिकाणी आढळतो.तो खजूर,केळी आणि आलुबुखार यांसारख्या फळांमध्ये आढळतो,पण तो उष्णकटिबंधीय प्रदेशात वाढणाऱ्या जंगली अंजिरांच्या एका प्रजातीपेक्षा अधिक सामान्य कुठे आहे हे सांगता येत नाही.ही झाडे प्रचंड पसरट होतात आणि त्यांची लोंबणारी मुळे त्यांच्या फांद्यांना सुंदर,सावलीच्या स्तंभांप्रमाणे आधार देतात.आफ्रिकेत ही वडाची झाडे अनेक लोकांसाठी पवित्र आहेत आणि ती क्वचितच तोडली जातात. भारतात त्यांना 'बो' या नावाने ओळखले जाते आणि असे म्हटले जाते की राजकुमार सिद्धार्थ गौतम याच झाडांपैकी एकाखाली बसले होते (अंजीर खात असताना?) तेव्हा त्यांना मानवी दुःखाची कारणे अचानक समजली.याच ज्ञानप्राप्तीमुळे त्यांना 'बुद्ध' म्हटले जाऊ लागले.(मुळ पुस्तकात फक्त इंग्रजी उतारा आहे.गुगल भाषांतर वापरुन त्याचा हा अनुवाद आहे.)

हिंदू लोक पिंपळाला विशेष पवित्र मानतात.वैदिक काळात पिंपळाच्या लाकडाच्या घर्षणानं अग्नी तयारी करीत.

बोधिद्रुम,चलदल,पिप्पल,कुञ्जाशन व अश्वत्थ असे पिंपळ वृक्षासाठी अमरकोशात पर्यायी शब्द दिले आहेत.

बोधिद्रुमश चलदलःपिप्पलःकुञ्जराशनः अश्वत्थे ॥

वरील शब्दांचं अनुकरण करून 

'अभिधान चिंतामणी' कोशात श्रीवृक्ष व कृष्णावास अशा पर्यायी शब्दांची नोंद केली आहे.पिंपळाची पानं हे.हत्तीचं अतिशय आवडतं खाद्य आहे.म्हणूनच पिंपळाला कुञ्जराशन म्हटलं आहे.हत्तींचं पालन करणाऱ्या हिंदूंनी मुसलमान अथवा परधर्मीय माहूत ठेवून हत्तींना पिंपळपानाचा चारा देण्याची समस्या सोडवली आहे। 

अश्वत्थ म्हणजे ज्याच्याकडं घोडे आहेत,अशा अर्थाचा पर्यायी शब्द आहे.हत्ती आणि घोडे हे प्राचीन काळात अमूल्य धन समजलं जाई.प्राण्यांचा उपयोग प्रवासासाठी,तसाच युद्धातही केला जाई.हत्तीचं आरोग्य चांगलं राहावं, म्हणून पिंपळपानाचा चारा देत,तर पिंपळ वृक्षाखाली हवा निरोगी राहाते,म्हणून घोडे बांधीत असत. 

विष्णुपुराणात पिंपळ वृक्षाचा मोठा मार्मिक उल्लेख आला आहे ज्याप्रमाणे विशाल पिंपळ वृक्ष एका सूक्ष्म बीजात सामावलेला असतो,त्याप्रमाणे संपूर्ण विश्व एका ब्रह्माच्या ठायी सामावलेलं आहे.

गुरुचरित्रात पिंपळ वृक्षाचा कल्पवृक्ष असा उल्लेख करून 

'कल्पवृक्ष असे अश्वत्थ। कल्पिले फळ त्वरित होय।'

असा त्याचा सविस्तर महिमा सांगितला आहे.

असा पिंपळ वृक्ष लोकसाहित्यात न आला तरच आश्चर्य, श्रीमती दुर्गाबाई भागवतांनी त्यांच्या 'लोकसाहित्याची रूपरेखा' या ग्रंथात सोन्याच्या पिंपळाविषयी सुंदर लोककथा दिली आहे :

'एका राजाला स्वप्नात सोन्याचं झाड दिसतं.त्याला रुप्याचं खोड असतं.सोन्याच्या फांद्या असतात. हिऱ्यामाणकांची फुलं आणि मोत्यांचे घोस असतात. - त्याच्या नावडत्या राणीचा मुलगा ते झाड प्रत्यक्षात शोधायला निघतो.तळ्याखालच्या राक्षसाच्या चार मुली सोनावंती,रूपावंती,हिरावंती,मोतावंती या नायकाला भेटतात.

राक्षसाला तो मारतो आणि मग त्या मुली स्वतःची शिरं त्या नायकाला तोडायला सांगतात.त्या चार मुलींचं मिळून ते झाड होतं.फिरून शिरं धडाला लावली, की झाड अदृश्य होतं व मुली परत जिवंत होतात.'

ही कथा 'सोन्याचा पिंपळ' म्हणून प्रसिद्ध आहे.

'मकुज्जिय कनसुगळु' (मुक्या आजीची स्वप्नं) ही डॉ. शिवराम कारंथांची ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेली कादंबरी.या कादंबरीला कथानक नाही.कथानायक नाही,कथानायिका आहे.मुकज्जी म्हणजे मुकी आजी. तिचा बालपणीच विवाह झाला होता.ती लवकरच विधवा झाली.ऐन तारुण्यात तिच्या मनाला धक्का देणारी एक घटना घडते आणि तिच्या मनाचा तोल जातो.

लोकांना वाटतं,मुकज्जीला भूतबाधा झालेली आहे.अंगातून भूत काढून टाकण्यासाठी तिला खूप मारहाण करतात.मुकज्जीला असं वाटतं,की आपण बोललो,की मार बसणार!अनेक वर्षं ती कुणाशीही एक शब्दही बोलत नाही.तिचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटतो.ती स्वतःशीच चिंतन-मनन करू लागते.अस्वस्थ झालेलं मन शांत होतं.तिला जणू आत्मज्ञान होतं.हे आत्मज्ञान तिला घरासमोरच्या पिंपळ वृक्षाखाली होतं. या ऐंशी वर्षांच्या वृद्धेला अर्तीद्रिय शक्ती प्राप्त झालेली असते.तिचा पुतण्या मानववंशशास्त्रज्ञ आहे. 

मुकज्जीवर त्याची खूप श्रद्धा असते.तो साऱ्या जंगलात भटकंती करून ठिकठिकाणांहून मृत माणसांच्या कवट्या गोळा करून घरी आणतो.त्या कवट्यांची मोजमापं घेऊन तो संशोधन करीत असतो.

या संशोधनात मुकुज्जीचं फार मोठं साहाय्य होतं.प्रथम ती पिंपळ वृक्षाला स्पर्श करून नंतर कवटीला स्पर्श करते. हजारो वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा भूतकालीन इतिहास ती तिच्याजवळ असलेल्या अतींद्रिय ज्ञानाच्या साहाय्यानं सांगते.

मौनव्रत ही एक प्रकारची योगसिद्धी आहे. पिंपळस्पर्शानं तिला अतींद्रिय ज्ञान प्राप्त झालं आहे.पूर्वी प्रत्येक खेड्यात वडा-पिंपळाची झाडं लावीत. त्यांच्यापासून सावली तर मिळेच,परंतु त्या झाडांमुळं पिकांचं पाखरं आणि वानर-माकडं यांपासून होणारं नुकसान टळे.जेव्हा वड-पिंपळ फळांनी बहरून जातात, तेव्हा पाखरं,वानर-माकडं यांना त्यांचं भरपूर खाद्य मिळतं.

श्रीलंका येथील एका पिंपळ वृक्षाचं वय २१४७ वर्षांचं आहे असं म्हणतात.पिंपळाची झाडं लावणं आणि त्यांच्याभोवती पार बांधणं हे धार्मिक कृत्य समजलं जाई.रामदास स्वामींनी म्हटलं आहे:

'वृंदावने पार पिंपळा बांधी तो सत्त्वत्गुण।'

पाखरमाया,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार,केंद्र, सीताबर्डी,नागपूर

पिंपळाच्या झाडाची उपयुक्तता,पर्यावरणाच्या दृष्टीनं त्याचं महत्त्व,धार्मिक भावनेतून पिंपळाला मिळणारं संरक्षण यांचा विचार करून टाटांनी त्यांच्या शिक्षण संस्था,कारखान्यांचे परिसर व लोणावळ्याजवळ शिरवते पक्षी अभयारण्यात पिंपळाची झाडं लावली आहेत. टाटांचं अनुकरण सर्व देशभरात झालं पाहिजे.

समाप्त..



6/29/26

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

हजारी वर्षे शेतीप्रधान संस्कृतीत आपल्या आश्रयदात्यांसाठी काम करण्याची जी रूढी होती तिच्या ऐवजी संगीतकार,कलाकार,

रचनाकार आणि लेखक मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत फेकले गेले.दिवसेंदिवस त्यांनी आपले उत्पादन अनामिक गिऱ्हाईकांना 'पेश करण्याचा धडाका लावला.हाच प्रकार दुसऱ्या लाटेच्या प्रभावाखालील सर्व देशांमध्ये घडल्यामुळे कलात्मक सर्जनतेची संपूर्ण धाटणीच बदलूम गेली.

संगीत हे याचे ठळक उदाहरण ठरेल.दुसरी लाट आल्यानंतर लंडन,व्हिएन्ना पॅरिस आणि इतर अनेक ठिकाणी जलशांसाठी मोठमोठे कॉन्सर्ट हॉल निर्माण झाले.त्यांच्याबरोबरच गल्ला पध्दतीचाही जन्म झाला. निर्मात्याला पैसे पुरवणारा उद्योगपतीही आला; संस्कृतीच्या ग्राहकांना तिकिटे विकणेही आले !

जो जास्त तिकिटे खपवेल त्याला सहाजिकच अधिक पैसा मिळू लागला.त्यामुळे जास्तीजास्त खुर्च्या असलेले अधिक मोठे हॉल बांधण्यात येऊ लागले. सर्वांत मागच्या रांगेतही संगीत ऐकू जावे या हेतूने मोठा ध्वनी आवश्यक ठरला.या सर्वांचा परिणाम म्हणजे संगीत,खोलीत मर्यादित न रहाता 'सिफोनिक्' झाले.

हिस्ट्री ऑफ म्युझिकल इन्स्ट्ररुमेंट्स या पुस्तकात करें साख्स (Sachs) याने म्हटले आहे,की 'अठराव्या शतकातील संगीत उमरावी संस्कृतीतून निघून लोकानुवर्ती झाल्यासळे दिवसे दिवस अधिक मोठे हॉल जलशांसाठी तयार झाले.त्यामुळे आवाज अधिक मोठा असण्याची आवश्यकता निर्माण झाली." त्याकाळी ही गोष्ट शक्य करण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान अवगत झालेले नव्हते, त्यामुळे आवश्यक तितका मोठा आवाज निर्माण करण्यासाठी अधिकाधिक वाद्ये आणि वादक यांची 'भरती' वाद्यवृंदात होऊ लागली.या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणजे आधु‌निक सिंफनी ऑर्केस्ट्रा.आणि या औद्योगिक संस्थेसाठीच बीथोवेन,शूबर्ट,ब्राह्मस् इत्यादींनी अप्रतिम रचना निर्माण केल्या.वाद्यवृंदात देखील कारखाना आणि त्याची अंतर्गत रचना प्रतिंबिबित झाली होतीच.सुरुवातीला वाद्यवृंदाला कोणी नेता असत नव्हता.कधी कधी नेतेपण वादकांमध्येच एकाकडून दुसऱ्याकडे जात असे.परंतु नंतर कंडक्टर'च्या हाती सर्व सूत्रे गेली.निरनिराळ्या वाद्य विभागात वादकांची विभागणी (आणि स्थापना) झाली.

आणि एखाद्या कारखान्यातील कामगारांनी किंवा कचेरीतील नोकरांनी कामे करावीत त्यानुसार वादक वाद्यांवर कामे करू लागले;आणि आपला कामाचा वाटा एकूण निर्मितीला,संगीताला अर्पण करु लागले ! समाजग्राहकाला ही संस्था आपली निर्मिती विकू लागली;फोनोग्राफ रेकॉर्डस् विकल्या जाऊ लागल्या. आणि अशा तन्हेने संगीताचा कारखाना जन्माला आला.

दुसऱ्या लाटेच्या सामाजिक क्षेत्रात निर्माण झालेल्या जीवनपद्धतीचे,वाद्यवृदांचा इतिहाम हे केवळ एक उदाहरण झाले.तीन प्रमुख संस्थांनी,हजारो विविध संघटनांनी सर्वांनीच औद्योगिक तांत्रिक क्षेत्राच्या पद्धतीचा अंगीकार केला;कारण ती एक प्रमुख गरज होतो.परंतु संस्कृती म्हणजे केवळ तांत्रिक क्षेत्र नव्हे, किंवा त्याला अनुरुप असे सामाजिक क्षेत्रही नव्हे.सर्व संस्कृतीमध्ये उत्पादन आणि वितरणविषयक माहिती प्रस्तुत करण्यासाठी जाहिरात क्षेत्राची आवश्यकता असते.त्यात देखील दुसऱ्या लाटेने लक्षणीय असे बदल केले.

कागदी बर्फवादळ

प्राचीन काळापासून आजपर्यंत सर्व मानवी गट प्रत्यक्ष आणि व्यक्तिगत व अशा दळणवळणावर अवलंबून रहात आलेले आहेत.तरीदेखील दूर अंतरावर संदेश पाठविण्यासाठी काही व्यवस्था निर्माण होण्याची निकडही होतीच.प्राचीन पर्शियन लोकांनी ठिकठिकाणी, स्तंभ उभारलेले होते.या 'आरोळी स्तंभा' वर मोठे आणि कर्कश्य आवाज असणाऱ्या लोकांना ठेवण्यात येत असे.एका स्तंभावरील माणूस पुढच्या स्तंभावरील माणसाकडे ओरडून संदेश पाठवित असे.रोमन लोकांनी विस्तृत अशी संदेशवाहक यंत्रणा कार्यान्वित केलेली होती.या यंत्रणेचे नाव होते cursus publicus. इ. स. १३०५ ते १८ व्या शतकाच्या सुरुवातीच्या भागात संपूर्ण युरोपात हाऊस ऑफ टॅक्सीजचा प्रचार होता.ह्यात तट्टूंच्या सेवेचा भाग होता. इ.स. १६२८ च्या सुमारास २०,००० माणसे संदेश वाहक म्हणून कामावर होती.हे जासूद निळे जरतारी गणवेश धारण करून या खंडातील राजपुत्र,सेनापती,व्यापारी आणि सावकार यांच्या संदेशांची ने आण करीत संचरत असत.पहिली लाट-संस्कृती प्रभावशाली असताना या सर्व व्यवस्था फक्त श्रीमंत आणि बलशाली लोकांसाठी राखून ठेवलेल्या असतः सर्वसामान्य लोकांना इथे रिधाव नव्हता.लॉरिअन शिलिक्स या इतिहासात त्याने म्हटले आहे,की " इतर मार्गांनी ते पत्र पाठविण्याचे कोणी प्रयत्न केल्यास संशयाने त्याकडे पाहिले जात असे..आणि अधिकाऱ्यांकडून त्या गोष्टीला प्रतिबंध केला जात असे.थोडक्यात,समक्ष किंवा स्वतः माहितीची देवाण-घेवाण करणे हे सर्वांसाठी खुले होते. परंतु माहिती पाठविण्याचे किवा मिळविण्याचे नवे मार्ग कुटुंब किंवा खेडी यांच्या मर्यादपलीकडील तसे बंदिस्त आणि ठराविक आवाक्याचे होते.आणि त्यांचा वापर सामाजिक किंवा राजकीय हुकुमतीसाठीच होत होता. आणि पुष्कळदा श्रेष्ठ लोकांकडून त्यांचा वापर एखाद्या शस्त्राप्रमाणे होत असे.

दुसरी लाट जेव्हा देशादेशांतून पसरली,तेव्हा तिने संदेश वहनाच्या या मक्तेदारीचा चक्काचूर करून टाकला. श्रीमंत आणि बलशाली सत्ताधारी एकाएकी परहित दक्ष झाले,आणि त्यामुळे हे घडले असे मात्र नाही.झाले काय,की दुसऱ्या लाटेची तंत्राधिष्ठता आणि कारखान्यांतून होणारे प्रचंड उत्पादन या गोष्टीसाठी तितक्याच प्रचंड वेगात संदेशांची देवाण-घेवाण होणे जरुर होते.आणि या जुन्या पद्धतीनाही गरज पूर्ण करणे शक्यच नव्हते.

प्राचीन आणि पहिली लाट-संस्कृतीच्या समाजातील आर्थिक उत्पादन आणि या संदर्भातील दळणवळण तुलनेने साधे होते.आणि सहसा हाताशी असलेल्याकडून ते करून घेता येत असे.ते सहमा तोंडी किंवा हावभावांनी व्यक्त होणारे असे.या उलट दुसऱ्या लाटेच्या अर्थशास्त्राला अनेक ठिकाणी होणाऱ्या कामात अचूक सुसंवाद आवश्यकच होता.केवळ कच्चा मालच नव्हे, तर मोठ्या प्रमाणात माहिती तयार करुन तिचे काळजीपूर्वक वितरण होणे आवश्यकच होते.

ह्यासाठीच दुसरी लाट भरात येत असतानाच प्रत्येक देशाने अहमहमिकेने पोस्ट सेवा उभारली.

खरोखरच पोस्ट ऑफिस हा देखील सरकी दूर करण्याच्या किंवा सूत तयार करण्याच्या यंत्राइतकाच अपूर्व शोध होता आणि आज आपण विसरलो,पण एकेकाळी त्यानेही आनंद व उल्हास निर्माण केला होता.तो मात्र मात्र आता नाहीसा झाला आहे.अमेरिकन वक्ता एडवर्ड एव्हर्ट यांनी म्हटले आहे," मला हे मान्य करावे लागेल,की ख्रिस्ती धर्माखालोखाल, आपल्या आधुनिक संस्कृतीचा पोस्ट ऑफिस हा उजवा हात आहे.'पोस्ट ऑफिसने औद्योगिक युगाच्या दळणवळणाला खूप मोठे क्षेत्र खुले करुन दिले.इ.स.१८३७ च्या सुमाराला ब्रिटिश पोस्ट ऑफिस केवळ श्रेष्ठीचे संदेशवहनच करत नव्हते,तर दरसाल सुमारे ८८ दशलक्ष वस्तूंची वाहतूक करीत होते.त्या काळाच्या मानाने हा वाहतुकीचा अक्षरशः

भडिमारच नव्हे काय? इ.स. १९६० च्या सुमाराला,म्हणजे जेव्हा ओद्योगिक युगाने कळस गाठला होता आणि तिसरी लाट उसळू लागली होती, अशा वेळी हाच आकडा १० महापद्म पर्यंत जाऊन पोचला होता.याच वर्षी अमेरिकेतील पोस्ट खात्याने देशातील प्रत्येक पुरुष,स्त्री व मूल यांना सरासरी ३५५ घरगुती वस्तू पोचवल्या !

दुसऱ्या लाटेच्या संदर्भात,औद्योगिक क्रांतीसह आलेले हे पोस्ट संदेशवहनाचे उधाण,ही तेव्हा होत असलेल्या संदेशवहनाची एक चुणुक म्हणावी लागेल.मोठ्या संस्थांमध्ये यापेक्षाही कितीतरी अधिक प्रमाणात संदेश 'मायक्रो-पोस्टल सिस्टिम्स' द्वारा दिले-घेतले जात होते. मेमो म्हणज सार्वजनिक दळणवळणात कधीही न जाणारी पत्रे होत.इ. स. १९५५ मध्ये,अमेरिकेत,दुसरी लाट उत्तुंग झालेली असताना,तीन मोठ्या कॉर्पोशन्सच्या दप्तरात हूवर कमिशन डोकावत होते तेव्हा त्याला असे आढळून आले,की या तीन कॉर्पोशन्समध्ये अनुक्रमे ३४,०००,५६,०००, व ६४,००० दस्तऐवज व मेमो नोकरीवर असलेल्या प्रत्येकासाठी दप्तरबद्ध होते !औद्योगिक समाजाच्या वाढत्या संदेशवहनविषयक गरजा लेखी स्वरूपात भागवल्या जात होत्या असे नाही.

यामुळे टेलिफोन व तारांचे शोध १९ व्या शतकात वाढत्या संदेशवहन संदर्भातला आपापला भार त्यांनी उचलावा म्हणून लावण्यात आले. इ. स. १९६० च्या सुमाराला अमेरिकन माणसे दररोज २५६ दशलक्ष टेलिफोन कॉल्स करीत होती अतिशय प्रगत अशा टेलिफोन संस्था व त्यांचे जगातले जाळे नेहमीच अतिभारित होत राहिले

ह्या सर्व पद्धती मुख्यतः एक संदेश प्रेषक व तो घेणारा एक संदेश ग्राहक यांच्यासाठी होत्या.परंतु ज्या समाजात प्रचंड उत्पादन होत होते आणि उत्पादित वस्तु प्रचंड प्रमाणात वापरल्या जात होत्या,तिथे संदेशवहनही गठ्याने होणे आवश्यक होते. शिवाय एका संदेश प्रेषकाने दिलेला संदेश एकाच वेळी अनेक ग्राहकांना मिळणे ही गोष्टही आवश्यक झाली.ओद्योगिकपूर्व समाजातील मालक त्याच्या मोजक्याच नोकरांना व्यक्तिशःगरज पडल्यास त्यांच्या घरी जाऊनही,भेटू शकत होता.परंतु औद्योगिक मालकाला त्याच्या हजारो नोकरांच्या संदर्भात ही गोष्ट शक्यच नव्हती;

तो एकेकट्याला भेटू शकत नव्हता.मोठा व्यापारी, किंवा वितरक याला एकेका ग्राहकाशी संबंध ठेवणे हे त्याहूनही अशक्य होते.आणि म्हणून दुसऱ्या लाटेने एकच संदेश एकाच वेळी अनेक लोकांना,कमी खर्चात, आणि विश्वसनीयरीत्या पोचविण्याचे प्रभावी मार्ग शोधले.

पोस्ट सेवा एकच संदेश लाखो जणापर्यन्त पोचवू शकत होती.परंतु अपेक्षित वेगाने नाही.टेलिफोन द्वारे संदेश वेगाने पोचवता येत होते.परंतु त्याद्वारे एकाच वेळी लाखो लोकांना संदेश पोचविता येत नव्हते.ही त्रुटी वृत्तमाध्यमानी भरुन काढली.

अर्थात आजमितीला औद्योगिक राष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वर्तमानपत्रे हा आवश्यक भाग होऊन गेलेला आहे.मोठ्या प्रमाणात त्यांची प्रसिध्दी आणि विक्री होत असते.परंतु राष्ट्रीय पातळीवर या प्रकाशनांची जी उन्नती झाली,त्यात अनेक नव्या औद्योगिक तंत्रांच्या एकाच दिशेने झालेल्या घडणींचे आणि समाज रचनांचे प्रतिबिंब आढळते.

युरोपाच्या आकाराच्या एखाद्या संपूर्ण देशात एका दिवसात प्रकाशने पोचावीत या उद्देशाने आगगाड्यांचा उपयोग करुन घेण्यात आला.काही तासांच्या अवधीत, कोट्यवधी प्रती छापणारे रोटरी छापखाने आले. टेलिफोन आणि तारांचे जाळे उभे राहिले,शिक्षण सक्तीचे झाले आणि त्याद्वारे लोकांना साक्षर करण्यात आले.उद्योगाला आपले उत्पादन जनतेपर्यंत पोचण्याची आवश्यकता होती.

वृत्तमाध्यमातही आपल्याला पुनाःकारखाना तत्त्वाचा अनुभव येतो.वृत्तपत्रे, रेडिओ, सिनेमा, टेलिव्हिजन यांच्या पसाऱ्यातही तत्त्व तेच.कारखान्याचे.लाखो मेंदूवर ह्या सर्व गोष्टी एकाच प्रकारचे संदेश ठसवत रहातात. कारखान्यात उत्पन्न झालेल्या,लाखो घरात वापरल्या जाणाऱ्या एकसारख्या वस्तूंवर नाही का शिक्के किंवा ठसे उमटवण्यात येत ? प्रमाणीभूत,प्रचंड प्रमाणात निर्माण झालेल्या वस्तू ज्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे अशा काही केंद्रीभूत कारखान्यातून निर्माण होतात,आणि लाखो ग्राहकांकडे त्यांचा ओघ वहात रहातो. अशा विस्तृत, शक्तिशाली जाहिरात माध्यमाच्या मदतीखेरीज औद्योगिक संस्कृतीने आकार घेणे अगर ती विश्वसनीयरीत्या कार्यान्वित होणे शक्य नव्हते.

सर्व भांडवलशाही आणि त्याचप्रमाणे समाजवादी समाजातून यानुसार एक गुंतागुंतीचे माहिती क्षेत्र उत्तरले;त्याच्याद्वारां वैयक्तिक आणि सामूहिक संदेशाचे वितरण तयार वस्तूंप्रमाणे किवा कच्च्या मालाप्रमाणे अतिशय कार्यक्षमतेने केले जात असे.हे जाहिरात क्षेत्र तांत्रिक क्षेत्राच्या आणि सामाजिक क्षेत्राच्या बरोबर जणू विणले गेले होते आणि कार्य करत होते;त्याद्वारे त्याने आर्थिक उत्पादन आणि खाजगी वर्तणूक यांच्यात एकतानता आणि एकसूत्रता आणली.या क्षेत्रांनी मोठ्या क्षेत्रात फार महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ही क्षेत्रे आपल्या एकट्याच्या बळावर इतरांशिवाय अस्तित्वात येऊच शकली नसती.तांत्रिक क्षेत्राने उत्पादन केले आणि संपत्ती तयार ठेवली;सामाजिक क्षेत्राने एकमेकांशी संबंधित अशा हजारो संस्थांसह कार्य करीत प्रत्येक व्यक्तिला विहित कार्य दिले.आणि माहिती क्षेत्राने,एकूण प्रणाली कार्यान्वित रहाण्याच्या दृष्टीने नेहमीच माहिती तयार ठेवली.

एकूण,समाजाची मूलभूत बांधणी त्यांनी केली.

थोडक्यात आपल्याला असे आढळून येईल,की दुसऱ्या लाटेखालील देश मुळात कोणत्याही संस्कृतीचे किवा भौगोलिक परिस्थितीतले असले,तरी आणि कोणत्याही मानववंशाचे,धर्माचे असले,तरी समाजवादी असले तरी, वा भांडवलशाही असले तरी त्यांची नवीन बांधणी एकाच धर्तीवर झालेली होती.

ह्या समान रचनांनी रशिया,हंगेरी,पश्चिम जर्मनी,फ्रान्स, कॅनडा- किंवा दुसरा कोणताही दुसऱ्या लाटेखालील देश- या देशात विशिष्ट मर्यादा तयार केल्या,आणि त्या मर्यादा सांभाळतच त्यांच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक भिन्नता प्रकट झाल्या.

प्रत्येक ठिकाणी जुन्या लाटेच्या रक्षणाचे प्रयत्न करणाऱ्यांत आणि नव्या लाटेद्वारां जुने बिकट आणि क्लेशकारक प्रश्न सोडवले जाणार असल्याचे ओळखणाऱ्यांत राजकीय,सामाजिक,आणि आर्थिक झगडे होऊन गेल्यानंतरच त्या समाजरचना उद्भवल्या.

दुसन्या लाटेने आपल्या आगमनाबरोबर मानवी आशा विस्तारल्या.कारण यावेळीच पहिल्यांदा स्त्री पुरुषांना हे ओळखण्याचे धैयं झाले,की दैन्य,भूक,रोगराई आणि अन्याय या उलथून टाकण्याच्या गोष्टी आहेत. आदर्शवादी कल्पनारम्य जगात रमलेल्या कित्येक लेखकांना आणि तत्त्वचितकांना उभरणाऱ्या औद्योगिक संस्कृतीत शांती,एकोपा,सर्वांसाठी नोकरी,संधीची समानता,

जन्मानुसारच्या ज्येष्ठताक्रमाचा शेवट,आणि अक्षरक्ष: हजारो वर्षे शेतीप्रधान संस्कृतीच्या काळात अस्तित्वात असलेल्या व कधीच बदलणार नाहीत आणि शिवाय अमरच आहेत असे दिसणाऱ्या सर्व कष्टप्रद अवस्थांचा शेवटः इतक्या गोष्टी अंतर्भूत असलेल्या दिसल्या ! आज आपल्याला औद्योगिक संस्कृती तितकीशी आदर्शभूत वाटत नाही.असे वाटते,की ती काहीशी दडपशाही वृत्तीची आहे,भयाण आहे.प्राकृतिक दृष्ट्या विभिन्न असणाऱ्या निरनिराळ्या मानवगटांच्या संबंधांबाबत धोकादायक आणि अस्थिर आहे,लढाया करण्यासाठी टपूनच बसलेली आहे,आणि मानसिक दृष्ट्या दडपलेली अशी आहे.परंतु ती तशी का आहे हे आपल्याला समजणे आवश्यक आहे.ही गोष्ट कळण्यासाठी,ह्या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला एका प्रचंड विभाजक तत्त्वाकडे लक्ष द्यावयास हवे.या विभाजक तत्त्वाने पाचरीप्रमाणे कठोर चंचुप्रवेश करुन दुसऱ्या लाटेच्या आत्म्याचे दोन प्रतिस्पर्धी तुकडे केलेले आहेत.

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

हा तीन विभागात प्रकाशित झालेला लेख संपला.तो २४,२६,२८.या तारखांना क्रमशः प्रकाशित झालेला आहे.आपले धन्यवाद व आभार...



6/26/26

संस्कृतीची बांधणी / The construction of culture

दुसऱ्या लाटेच्या संस्कृतीला विशिष्ट मुखवटा देणाऱ्या, तांत्रिक पायावर उभारलेल्या अशा कित्येक कारखान्यांचा उद्भव झाला.कोळसा उद्योग,गिरण्या, लोहमार्ग,

पोलाद,स्वयंचलित यंत्र व वाहने यांची निर्मिती, अ‍ॅल्युमिनियम,रसायने,उपकरणे यांच्या कारखान्यांची उभारणी,त्याबरोबरच मोठ्या औद्योगिक शहरांचाही जन्म झाला उदा.गिरण्यांसाठी मॅचेस्टर,मोटारीसाठी डेट्रॉइट.अशी शेकडो उदाहरणे आहेत.आणि या औद्योगिक केंद्रातून एकसारख्या अशा लाखो उत्पादित वस्तूंचा वर्षाव सुरु झाला ! उदा- शर्ट,बूट,वाहने,घड्याळे,खेळणी ,साबण,शांपू,

कॅमेरा,मशिन गन्स व चलन यंत्रे (मोटर्स) नव्या इंधन पद्धतीचा आधार मिळालेल्या नव्या तंत्रज्ञानाने अतिशय मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उत्पादनाचे द्वार खुले केले.

व्हर्मिल्यन पॅगोडा

तथापि ह्या ढीगभर उत्पादनाला जर वितरणपद्धतीत योग्यवेळी केल्या गेलेल्या योग्य त्या बदलाची साथ मिळाली नसती तर व्यर्थ ठरले असते.पहिली लाट-संस्कृती अस्तित्वात असताना वस्तु हस्तकला पद्धतीने गि-हाइकांच्या आश्रयानुसार उत्पादन केली जात असे.वितरणाची पद्धतही त्यानुसारच होती.

आता ही गोष्ट खरी आहे,की पश्चिमेकडे मोठ्या आणि त्या त्या काळी आधुनिक ठरतील अशा व्यापारी संस्था, जुन्या सरंजामी व्यवस्थांमधील फटी रुंदावत, व्यापा-यांनी उभारलेल्या होत्या.या संस्थांनी जगभर नवे व्यापारी मार्ग सुरु केले,जहाजांच्या काफिल्यांची रचना व व्यवस्था केली,व उंटांच्या तांड्यांचीही योजना केली. त्यांनी काचेच्या वस्तु,कागद,रेशीम,चहा,जायफळे,दारु, लोकर,नीळ,जायपत्री अशा वस्तूंचा वापर केला.

तथापि यातील बहुतेक सर्व वस्तू ग्राहकांना छोट्या दुकानातून किंवा खेडोपाडी भटकत जाणाऱ्या फिरस्त्या व्यापाऱ्याच्या पेटाऱ्यातून मिळत असत.दळणवळण अगदीच 'दरिद्री' होते;आणि दळणवळणाचे मार्ग अगदी प्राचीन व रद्दी होते.

त्यामुळे वस्तूंच्या व्यापारावर खूपच मर्यादा पडल्या होत्या.हे छोटे दुकानदार आणि फिरते फेरीवाले ग्राहकांना हव्या असलेल्या वस्तूंपैकी फारच थोड्या वस्तु पुरवू शकत होते.आणि पुष्कळ वेळा असे व्हावयाचे की ही किंवा ती वस्तू ग्राहकाला हवी असताना देखील महिनोगणती, वर्षानुवर्षे देखील या विक्रेत्यांनाच उपलब्ध झालेली नसायची !

दुसऱ्या लाटेने या ओझ्याने वाकलेल्या,करकरणाऱ्या वितरणपद्धतीत एका अर्थी आमूलाग्र ठरतील असे बदल,उत्पादनात अधिक प्रसिद्ध सुधारणा होत असताना घडवून आणले.लोहमार्ग,हमरस्ते,कालवे ज्या त्या पार्श्वभूमीनुसार तयार करण्यात आले.'व्यापाराचे प्रासाद' औद्योगिकीकरणासहित अस्तित्वात आले-पहिली डिपार्टमेंटल स्टोअर्स ! शेअर दलाल, घाऊक व्यापारी,कमिशन एजंट, उत्पादकांचे प्रतिनिधी यांची अक्षरश जाळी तयार झाली. इ. स. १८७१ मध्ये जॉर्ज हंर्टिग्टन हर्टफोर्ड याचे असले पहिले दुकान न्यूयॉर्कमध्ये उघडले.हे दुकान व्हर्र्मिलन लाल भडक रंगात रंगवलेले होते आणि याच्या रोख पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करणाऱ्या कारकूनाचा कॅशियरचा पिजरा एखाद्या चिनी पॅगोडाच्या आकाराचा होता ह्या हर्टफोर्डनंतर हेन्री फोर्ड याने आपल्या कारखान्याच्या मालाच्या वितरणासाठी जे करणे शक्य होते ते सर्व केले ! त्याने या दुकानाची भरभराट करून त्याला अशा स्थितीत आणले,की ते जगातील पहिले साखळी पद्धतीचे विशाल दुकान ठरले.दि ग्रेट अटलांटिक अ‍ँड पँसिफिक टी कंपनी. 

ह्या प्रकारच्या वितरणाने व्यापार देखील इतक्या मोठ्या प्रमाणात चालला आणि वाढला,की तो यंत्रांप्रमाणेच औद्योगिक समाजाचे केंद्र बनला आणि सुपरिचित होऊन राहिला.

ज्याला आपण तंत्रज्ञानाचे क्षेत्र म्हणतो,त्याच्यात संपूर्ण परिवर्तन ह्या बदलांनी घडवून आणले.समाज मागास आदिवासी असोत की शेतीप्रधान असोत की उद्योगप्रधान असोत,ते ऊर्जा वापरतातच;

वस्तूंची निर्मिती करतात आणि त्यांचे वितरणही करतात.सर्व समाजात ऊर्जा संस्था,उत्पादन संस्था आणि वितरण संस्था ह्या खुद्द त्यांच्याहून काही तरी मोठ्या अशा संकल्पनेचे,एकमेकींशी संबंधित असलेले विभाग असतात.ही त्यांच्याहून मोठी असलेली संस्था म्हणजे समाजाच्या प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर विशिष्ट स्वरुप धारण करत रहाणारे तंत्रज्ञान क्षेत्र होय.

जसजशी दुसरी लाट जगभर पसरत गेली,तसतसे शेतीविषयक तांत्रिक क्षेत्र बाजूला सरत गेले आणि त्याची जागा औद्योगिक तांत्रिक क्षेत्राने घेतली;पुन्हा भरून न येणाऱ्या प्रकारातील ऊर्जा फार मोठ्या प्रमाणावरील उत्पादनाला थेट जोडल्या,आणि त्या जागी,अतिशय प्रगत अशा मोठ्या वितरण व्यवस्थेत वस्तूंचा जणू वर्षांव केला गेला.

अत्याधुनिक कुटुंब

ह्या,दुसन्या लाटेच्या तंत्रविज्ञान क्षेत्राला सामावून घ्यावयाला तितक्या क्रांतीकारक सामाजिक क्षेत्राची आवश्यकता होती;आमूलाग्र नवीन असणाऱ्या समाज संस्थेची आवश्यकता होती.याबाबत उदाहरण देऊन बोलावयाचे म्हटल्यास, औद्योगिक क्रांतीपूर्वी कुटुंबरचना ठिकठिकाणी वेगवेगळया पद्धतीची होती.परंतु शेतीने वर्चस्व राखलेले असल्याने,लोकांचा कल मोठ्या थोरल्या,अनेक पिढ्यांना एकत्र सामावून घेणाऱ्या घरात रहाण्याचा होता.या घरात काका असायचे,काक्या असायच्या,सासू सासरे असायचे,आजी आजोबा,चुलत मालत भावंडे असायची.सगळी एका छपराखाली एकवटलेली असायची.आर्थिक उत्पादन करणाऱ्या एखाद्या गटाप्रमाणे सर्वजण एकत्र काम करीत असत.

या प्रकारात हिंदुस्थानातील एकत्र कुटुंब,बाल्कन्स मधील जाद्रुगा' आणि पश्चिम युरोपातील 'विस्तृत कुटुंब' यांचा समावेश करता येईल.कुटुंब जणू काही जमिनीत पुरल्याप्रमाणे अचल होऊन राही.

ज्यावेळी पहिल्या लाटेला ओलांडत दुसरी लाट पुढेपुढे पसरत निघाली होती.त्यावेळी विविध समाज,कुटुंबे यांच्यावर बदलाचा ताण पडला.प्रत्येक कुटुंबात दोन लाटांच्या पाठीराख्यांचे झगडे उठत राहिले;पितृसत्ताक अधिकार रचनेवरही आघात झाले,मुले व त्यांचे मातापिता यांचे संबंध बदलले.मालमत्तेबद्दलच्या नव्या कल्पना उदयाला आल्या.जेव्हा आर्थिक उत्पादन शेतीकडून कारखान्याकडे गेले,तेव्हा कुटुंबातील सर्वांनी एकत्र,एखाद्या उत्पादक गटाप्रमाणे,काम करणे सोडून दिले.कामे करणाऱ्यांना कारखान्यात काम करण्यासाठी मोकळे रहाता यावे म्हणून कुटुंबाची प्रमुख कामे नव्या तज्ञ संस्थांकडे सोपवण्यात आली.मुलांचे शिक्षण शाळांकडे सोपवण्यात आले.वृद्धांची काळजी घेण्याचे काम आश्रयगृहांवर किंवा शुश्रूषागृहांवर सोपविण्यात आले या सर्वांपेक्षा विशेष गोष्ट म्हणजे नव्या समाजाला इकडून तिकडे हालण्याची आवश्यकता होती त्यासाठी जे आपल्या उद्योगानुसार एक जागा सोडून दुसरीकडे जायला तयार होतील असेच कामगार हवे होते.

वयस्कर नातेवाईकांच्या मुळे,आजाऱ्यांमुळे,अपंगांमुळे आणि पुष्कळ मोठ्या प्रमाणात मुलेबाळे असल्यामु‌ळे व एकूण सर्व जबाबदाऱ्यांमुळे विस्तृत कुटुंबाने जागा सोडणे अशक्यच होते,म्हणून हळूहळू परंतु दुःख सावरत कुटुंबाची रचना बदलायला सुरुवात झाली. शहरांमध्ये जाऊन रहावे लागल्यामुळे,फाटाफूट होऊन, आर्थिक वादळांनी उध्वस्त होऊन,कुटुंबांनी नको असणाऱ्या नातेवाइकांना दूर करून छोटा आकार घेतला.नव्या तांत्रिक क्षेत्राला सुयोग्य ठरतील अशा त-हेने त्यांची रचना झाली.आणि ती हलती रहाण्यास बदलीला अधिक सोयीची ठरली.आई,बाप आणि त्यांचीच व तीही थोडीच मुले याशिवाय इतर कोणत्याही जवळच्या वा लांबच्या नातेवाईकांचा ज्यात समावेश नाही;अशी केंद्र कुटुंबपद्धती रुढ झाली आणि समाजानेही तिला मान्यता दिली.समाजवादी असो की भांडवलशाही असो,सर्व उद्योगप्रधान समाजात आढळणारा हा कुटुंबाचा 'आधुनिक' नमुना ! जेथे आपल्या पूर्वजांची पूजा होत असल्याने वडिलधाऱ्यांना अगदी अपवादात्मक ठरावी अशी महत्त्वपूर्ण भूमिका दिली जाई;मोठी,अगदी जिव्हाळ्याने एकत्र रहाणारी, अनेक पिढ्यांचा अगत्याने समावेश होई,अशी जपानमधील कुटुंबे देखील दुसरी लाट आल्यावर मोडून जाऊ लागली.आणि दिवसेदिवस अधिकाधिक केंद्र-कुटुंबे अस्तित्वात येऊ लागली.

थोडक्यात,दुसऱ्या लाटेच्या समाजांची अशी न्यूक्लिअर,एकेरी कुटुंबे, व्यवच्छेदक लक्षण बनून राहिली.त्यामुळे पहिल्या लाटेच्या समाजाहून तीही भूगर्भ इंधने,पोलाद गिरण्या, किंवा साखळी दुकाने यांच्या प्रमाणेच तिच्या भिन्नतेमुळे वेगळी उठून दिसू लागली.

प्रच्छन्न अभ्यासक्रम

जसजशी कामाची जागा शेत व घर सोडून कारखान्यात एकवटली,तसतसे मुलांनी कारखान्यातील जीवनासाठी सज्ज होणे आवश्यक झाले.

अ‍ॅण्ड्रयू उर याने इ. स. १८३५ मध्ये म्हटल्याप्रमाणे सुरुवातीच्या खाणी,गिरण्या व कारखाने यांच्या मालकांना असे आढळून आले,की "ज्यांनी आपल्या वयाची कोवळीक ओलांडली आहे अशा माणसांना मग ती ग्रामीण जीवनातून आलेली असोत,की हस्तोद्योगाच्या व्यवसायातून आलेली असोत कुशल कारखाना कामगार म्हणून तयार करणे जवळजवळ अशक्यच होते." तरुण वयातच औद्योगिक जीवनपद्धतीनुसार व्यक्तींची घडण घडलेली असेल,तर औद्योगिक शिस्तींचे नंतर निर्माण होणारे प्रश्न अगदी सुलभतेने सुटतील. अशा विचारांतून दुसरी लाट संस्कृतीचे दुसरे एक महत्त्वपूर्ण अंग जन्माला आले-सामुदायिक शिक्षण.कारखान्यांच्या धर्तीवर सामुदायिक शिक्षण योजना पायाभूत वाचन,लेखन,अंकगणित,थोडा इतिहास आणि इतर विषयांचे ज्ञात देऊ लागल्या.हा उघड दिसू शकणारा अभ्यासक्रम होय.परंतु याच्याही मागे याहूनही खूपच अधिक पायाभूत असणारा प्रच्छत किवा अदृश्य अभ्यासक्रम अस्तित्वात होता.पूर्वी आणि आताही बहुतेक सर्व औद्योगिक देशांमध्ये अस्तित्वात असलेल्या या अभ्यासक्रमात तीन क्रम आवश्यकतेने अंतर्भूत असतात.एक म्हणजे वक्तशीरपणा,दुसरी गोष्ट म्हणजे आज्ञाधारकपणा आणि तिसरी गोष्ट पाठांतर किंवा एखादी गोष्ट पुनः पुन्हा करणे कारखान्यातल्या कामात कामगारांनी विशेषतः प्रत्यक्ष यंत्रचालकांनी वेळेवर हजर होणे ही आवश्यक गोष्ट होती.आणि कामगारांनी,

आपल्या वरिष्ठांकडून आज्ञा घेणे आणि कसलाही प्रश्न किवा विचार न करता त्या अंमलात आणीत काम करीत रहाणे आवश्यक होते.कामगार पुरुष असोत की स्त्रिया,त्यांनी यंत्रांशी किवा कचेरीत तेच तेच काम करीत रहाणे व त्यायोगे यंत्रवत् आचरण करणे ही गोष्ठ अपरिहार्य अशी ठरली.

याप्रमाणे एकोणीसाव्या शतकाचे मध्यंतर उलटल्यावर, दुसरी लाट वेगाने देशोदेशी जाऊन तिने तेथील कब्जा घेतल्यानंतर,शिक्षणाचा एकप्रकारे निष्ठुर क्रम अंमलात येऊ लागला.मुले लहान लहान वयातच शाळेत जाऊ लागली.अभ्यासाची वर्ष वाढली,आणि दिवसेदिवस शिक्षणाचा कालावधी मोठा मोठा होऊ लागला.

सार्वजनिक शिक्षण ही सुसंस्कृत होण्याच्या प्रगतीतली प्रमुख पायरी ठरली.न्यूयॉर्क शहरातील तंत्रकुशल व कामगार यांच्या एका गटाने इ. स. १८२९ मध्ये असे जाहीरपणे म्हटले की,"जीवन आणि स्वातंत्र्य यांच्या खालोखाल शिक्षण हे मानवी जीवनाला मिळालेले सर्वात मोठे वरदान आहे,असे आम्ही मानतो." तरीही आपण असे म्हणू शकतो की या दुसऱ्या लाटेतील शाळांनी पिडीमागून पिढी यंत्रवत् केली आणि यंत्रतंत्र ज्ञानाला योग्य असे आणि यंत्राशी यंत्रवत् आचरण करू शकणारे असे सहज वळवता येईल असे,पण कडक शिस्त आचरणारे असे कामगार दल तयार केले.एकूण औद्योगिक समाजाला योग्य असे तरुण तयार करण्याच्या दृष्टीने जी एकसूत्री पद्धत तयार झाली,तिचे न्युक्लीअर कुटुंबे आणि कारखाना पद्धतीचे शिक्षण हे प्रमुख भाग ठरले.या बाबतीत ही दुसरी लाट समाज, मग ते कोणत्याही देशातील असोत,एक सारखे ठरले.

अमर अस्तित्व

दुसऱ्या लादेतील या समाजांमध्ये पहिल्या दोन्हींवर सामाजिक ताबा ठेवू टाकणारी तिसरी संस्था उदयाला आली ती संस्था म्हणजे संघटित संस्था कॉरिशन ह्या काळापर्यंत उद्योग क्षेत्रातील ही विशिष्ट योजना व्यक्ती किंवा कुटुंब किंवा भागीदार यांच्या मालकीची असायची, कॉर्पोरेशन्स होत्या,परंतु त्या क्वचित् कुठेतरी अशा होत्या.औद्योगिक इतिहासाचे अभ्यासक ऑर्थर ज्युडंग यांच्या मते अमेरिकन क्रांतीपर्यंत कोणालाच असे वाटले नव्हते,की भागीदारी किंवा वैयक्तिक मालकी यांच्या ऐवजी प्रशासक अशी प्रमुख संघटना कधी अस्तित्वात येईल.

मोठया प्रमाणात उत्पादन सुरू झाल्यानंतर सर्व बदलले. दुसऱ्या लाटेतील तंत्रज्ञानाचा एखादी व्यक्ती किंवा एखादा छोटा गट पुरवू शकेल यापेक्षा कितीतरी अधिक भांडवलाची-भांडवलाच्या प्रचंड साठ्याची आवश्यकता होती.प्रत्येक वेळी भांडवल गुंतवताना हे मालक किवा भागीदार आपले सर्वस्व पणाला लावीत,परंतु अतिविशाल आणि अनिश्चित भविष्याच्या योजनांमध्ये पैसे गुंतवायला ते का कू करत असत.त्यांना याबाबतीत प्रोत्साहित करण्यासाठी लिमिटेड कंपन्यांची कल्पना पुढे आली.त्या योजनेनुसार जर संस्था कोसळली,तर ज्यांनी त्यांनी गुंतवलेली रक्कमच तेवढी बुडायची. अधिक धोका नव्हता.या नवीन संशोधित कल्पनेमुळे गुंतवणूक अक्षरशः लोंढा फुटून होऊ लागली.

शिवाय कोर्टानी कॉर्पोरेशन हे 'अमर' किंवा चिरंतन अशा प्रकारचे अस्तित्व असल्याचे गृहीत धरल्यानेही असा स्पष्ट अर्थ झाला,की मूळ संस्थापक घटकांपैकी कोणीही गळाले,तरी मूळ संस्था चालूच रहाणार, त्यामुळे एक झाले,की अशी संघटित संस्था अधिक कालावधींच्या,मोठ्या पल्ल्याच्या योजना आखू शकत होती आणि पूर्वी कधी घेतले गेले नसतील इतके प्रचंड मोठे काम हाती घेऊ शकत होती.

कॉर्पोरेशन हा सर्व उद्योगप्रधान देशांच्या आर्थिक जीवनातील अंगभूत भाग बनून राहिला देश समाजवादी असो की.भांडवलशाही तेथे कॉर्पोरेशन्स फार तर बाह्य स्वरुपात थोड्या फार भिन्न असतील,पण मूळ संघटन कल्पना सर्वत्र एकच होती.

दुसऱ्या लाटेचा अंगिकार करणाऱ्या समाजातील सामाजिक संस्थांत न्युक्लिअर कुटुंबे,कारखानावत् शाळा आणि प्रचंड कॉर्पोरेशन्स ह्या तीन गोष्टी प्रमुख लक्षणे ठरून गेल्या.

दुसऱ्या लाटेने व्यापलेल्या संपूर्ण जगात जपान, स्वित्झर्लंड,ब्रिटन,पोलंड,अमेरिका,रशिया- बहुतांश देशांतील लोकांनी एका ठराविक जीवनमार्गाचा अवलंव केला.त्यांची कुटुंबे अतिकेंद्रित झाली,कारखानावत् शाळा चालवून शिक्षण प्रशिक्षण यांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार केला,आणि खाजगी असोत की,सार्वजनिक स्वरुपाच्या असोत,मोठ्या कॉर्पोरेशन्समधील नोकऱ्यांचा स्वीकार केला.आणि संपूर्ण जीवनावर या दुसरी लाट जीवनपद्धतीचा पगडा बसला.

संगीताचा कारखाना

आणि जीवनपध्दतीच्या याच गाभ्याभोवती इतर अनेक संघटना उद्भवल्या.सरकारी मंत्रिमंडळे,क्रीडा संघ,चर्च, व्यापारी संस्था,ट्रेड यूनियन्स,व्यावसायिक संस्था, राजकीय पक्ष,वाचनालये,मनोरंजन करणारे गट,मानव वंशासंबंधीच्या संस्था अशा हजारो संस्था दुसऱ्या लाटेच्या आवेगाबरोबर अस्तित्वात आल्या.आणि यातून असे गुंतागुंतीचे रचनात्मक संबंध निर्माण झाले,की यातला प्रत्येक गठ एकमेकांशी सेवेच्या,सहकार्याच्या एकमेकांच्या तोलाच्या संदर्भात एकमेकांशी संबंधित बनून राहिला.परस्परावलंबन,काही अंशी तरी,निर्माण झाले.वरवर पहाता हे विविध प्रकारचे गट किंवा या संघटना गोंधळ आणि निरूद्देश्यता प्रकट करतात.परंतु नीट पाहिले असताना आपल्याला त्यात एक धाटणी किंवा सुसूत्रता आढळून येते.दुसऱ्या लाटेखाली आलेल्या देशांत समाजसंशोधकांना कारखाने हा सर्वात प्रगत आणि कार्यक्षम प्रतिनिधी वाटला.त्यामुळे कारखान्याच्या कार्यप्रणालीत महत्त्वाची ठरणारी तत्त्वे त्यांनी जीवनातील इतर कार्यसंस्थांनाही लागू करण्याचा प्रयत्न केला.शाळा,इस्पितळे,तुरूंग,राजकीय नोकरशाह्या आणि इतर संस्थांनी त्यामुळे कारखान्याची वैशिष्टये उचलली.तेथील कामाची विभागणी,तेथील ज्येष्ठताक्रम,तेथील कठोर अलिप्तता या व अशा इतर काही गोष्टी.कलेच्या क्षेत्रात देखील आपल्याला कारखान्यातील काही तत्त्वें आढळून येतात.

तीन लेखातील दुसरा भाग…१६.०६.२६ रोजी पहिला भाग प्रकाशित.