* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

5/25/26

निष्क्रिय कालावधी (हायबरनेशन) / Inactive period (hibernation)

उन्हाळा संपत आला आहे आणि जंगलाचा रागरंग जरा अजब आहे.झाडांचा गर्द हिरवा डेरा आता फिकट पिवळा होत चालला आहे.झाड दमलेलं जाणवतं.ते थकलेलं झाड हा तणावपूर्ण मोसम संपण्याची वाट पाहात आहे.खूप दमछाक झालेल्या दिवशी आपण जसे आराम करायची संधी शोधतो,तीच अवस्था आता झाडांची असते.

ग्रिझ्ली अस्वल आणि डोरमाऊस हे दोन्ही प्राणी निष्क्रिय अवस्थेत झोपून राहतात. रात्रभर पार्टी करून घरी आल्यावर आपली जी अवस्था होते, तसं तर त्यांचं होत नसेल? याची तुलना ग्रिझ्ली अस्वलाशी करता येईल.हा प्राणी झाडांप्रमाणेच आपले धोरण ठेवतो. उन्हाळाभर भरपूर खाऊन तो शरीरावर चरबीचा जाड थर चढवतो,

यामुळे हिवाळा सुसह्य होऊ शकतो.झाडे पण अगदी असंच करतात.अर्थात त्यासाठी त्यांना ब्लूबेरी फळ किंवा सालमन मासा खावा लागत नाही.त्यासाठी त्यांना फक्त सूर्याकडून ऊर्जा घ्यावी लागते आणि त्यापासून साखर व इतर गोष्टी बनवून ठेवाव्या लागतात.

अस्वलासारखेच ते आपल्या सालाखाली याचा साठा करतात.पण ते लठ्ठ होत नाहीत,मात्र त्यांच्या हाडांची,म्हणजे लाकडाची वाढ होते.तयार झालेले अन्न आपल्या ऊतींमध्ये साठवलं जातं.अस्वल जे मिळेल ते खात सुटतं,पण झाडांना मात्र एका मर्यादेपर्यंतच अन्न घेता येतं.

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

पी ट र वो ह्ल ले बे न

अनुवाद - गुरुदास नूलकर

अरविंद घनश्याम पाटकर

 मनोविकास प्रकाशन

ऑगस्ट महिन्यानंतर रानटी चेरी,बर्ड चेरी किंवा रानटी सेवा देणाऱ्या झाडांकडे बघून तुम्हाला हे स्पष्ट दिसेल. ऑक्टोबरपूर्वी अनेक दिवस भरपूर ऊन असले तरीही ते आता लाल होण्यास सुरुवात होते.याचा अर्थ आता त्यांचे दुकान वर्षाअखेरीपर्यंत बंद राहणार. सालाखालची जागा आणि मुळं आता अन्नसाठ्याने भरून गेलेली असतात.

अधिक साखर बनवली तर ती साठवण्यासाठी आता जागा नाही.यानंतरच्या काळात अस्वलं जरी खात राहिली तरी झाडांना आता निद्राअवस्थेत नेण्यासाठी सँडमॅन आलेला असतो.

या झाडांव्यतिरिक्त इतर बहुतांश झाडांना अन्नसाठा करण्यासाठी अधिक जागा उपलब्ध असते.त्यामुळे ते प्रकाश संश्लेषण चालू ठेवून बर्फ सुरू होईपर्यंत अन्नसाठा करत राहतात.त्यानंतर मात्र त्यांना सर्व काम बंद ठेवावे लागते.याचं एक कारण म्हणजे पाणी. झाडाचे 'रक्त'च गोठले तर काहीच करता येत नाही आणि परिस्थिती बिकट होऊ लागते.हिमवृष्टी सुरू झाल्यावर जर लाकडात खूप पाणी शिल्लक असेल तर गोठलेल्या नळासारखं ते फुटू शकतं.आणि म्हणूनच अनेक प्रजाती स्वतःच्या लाकडातून आर्द्रता कमी करू लागतात.हे साधारण जुलै महिन्यात सुरू होतं.

पण असं करूनही झाडं हिवाळ्यासाठी तयार झालेली नसतात,त्याला दोन कारणे आहेत.पहिलं कारण म्हणजे,चेरीच्या कुळातली झाडं सोडून इतर प्रजाती उन्हाळ्याचे शेवटचे दिवस ऊर्जा साठवण्यासाठी वापरतात.आणि दुसरं कारण म्हणजे अनेक प्रजातींचं एक काम बाकी असतं,ते म्हणजे ऊर्जेचा साठा पानाकडून खोड आणि मुळांकडे नेऊन ठेवणं.आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांना अजून आपल्या हिरव्या रंगाच्या क्लोरोफिलचे विभाजन करून ठेवणं बाकी असतं.असं केलं तरच त्यांना येत्या वसंत ऋतूमध्ये नवीन पालवीला क्लोरोफिल वाटप करता येणार असतं. पानातून हिरवा रंगद्रव्य गेला की आधीपासून असलेले पिवळे आणि तपकिरी रंग पानावर चढतात.कॅरोटीनने बनलेले हे रंग बहुतेक संकटात असल्याची घोषणा जाहीर करत असावेत.आता याच सुमारास अफिड आणि इतर कीटक खोडांमध्ये भेगा शोधू लागतात. येणाऱ्या थंडीपासून तिथेच त्यांना सुरक्षा मिळणार असते.सशक्त झाड आपल्या उत्तम तब्येतीची जाहिरात करण्यासाठी उजळ रंगाची पानगळीची पालवी धरतात. अफिड आणि इतर कीटकांना हा संदेश बरोबर समजतो.सशक्त झाडे अधिक विषारी द्रव्य बनवू शकतात ज्यामुळे त्यांच्या पिल्लांना धोका निर्माण होतो. आणि म्हणून हे कीटक आकर्षक न दिसणाऱ्या झाडांच्या शोधात असतात.

पण एवढी उधळपट्टी कशाला करायची? हीच गोष्ट वेगळ्या रितीने हाताळता येते,हे काही सूचीपर्णी झाडे दाखवून देतात.दरवर्षी नवीन पालवी धरण्यापेक्षा ते आपली हिरवी पालवी तशीच ठेवतात.आणि ही सूचीपर्णी पानं थंडीमध्ये गोठू नये यासाठी एक विशिष्ट द्रव्य त्यात सोडलं जातं.तसेच पानातून बाष्पोत्सर्जन रोखण्यासाठी त्यांच्यावर मेणाचा थर चढवला जातो. अधिक सुरक्षा म्हणून पानाची कातडी टणक असते व श्वासोच्छ्वास करणारी छिद्रं खोल खालच्या बाजूला असतात.या सर्व सावधगिरीमुळे झाडातून फार पाणी बाहेर जात नाही.कारण पाण्याचा साठा संपला तर गोठलेल्या जमिनीवरून झाडाला पाणी घेणे शक्य नसते.झाड सुकून जाण्याची भीती असते.

पण सूचीपर्णी पानांपेक्षा रुंदपर्णी झाडाची पानं मऊ आणि नाजूक असतात,म्हणजेच त्यांना स्वसुरक्षा करण्याचं साधन नसतं.म्हणूनच बर्फाची चाहूल लागताच बीच आणि ओक वृक्ष लगेच पानझड करतात. मग या झाडांनी स्वतःच्या उत्क्रांतीत जाड कातडी आणि न गोठण्याची द्रव्यं का बरं तयार केली नसतील? वर्षानुवर्ष लाखो नवीन पानं तयार करून काही महिन्यातच ती झाडून टाकायची,यात फारसा शहाणपणा नाही.परंतु उत्क्रांतीच्या स्पर्धेत हा शहाणपणाच आहे,कारण दहा कोटी वर्षांपूर्वी पानझड वृक्ष पृथ्वीतलावर आले.पण सतरा कोटी वर्षांपासून सूचीपर्णी झाडं इथे आहेत. म्हणजे पानझडी वृक्ष तसे नवीनच. पानं झडून टाकणं हा खरोखरी शहाणपणा आहे कारण यामुळे हिवाळी वादळाच्या तडाख्यात हाडे वाचू शकतात.

ऑक्टोबर महिन्यात मध्य युरोपमध्ये येणाऱ्या या हिमवादळात झाडांना जिवंत राहण्याची कसरतच करावी लागते.ताशी साठ मैल वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामध्ये मोठी मोठी झाडे उखडून पडतात.आणि काही वर्षे या वेगाचा वारा तर दर आठवड्यालाही येतो. पानझडीच्या काळात होणाऱ्या पावसामुळे जंगलाची जमीन चिखलमय होते आणि झाडांना पुरेसा आधार मिळत नाही.या वाऱ्यामुळे झाडाला सुमारे दोनशेवीस टन वजनाइतका जोरदार धक्का बसतो. ज्या झाडांना स्वतःचा बचाव करता येत नाही, ती वादळात उन्मळून पडून जातात. पण पानझडी वृक्ष मात्र बचाव करू शकतात. त्यासाठी ते आपली सौर ऊर्जा प्रक्रियेची साधनं झडून टाकतात. यामुळे सुमारे बाराशे चौरस यार्ड इतके क्षेत्रफळ झाडवरून नाहीसे होते आणि जंगलाच्या जमिनीवर पडते. हे एखाद्या शिडाच्या जहाजाचे एकशे तीस फूट उंचीचे शीड काढून टाकण्यासारखे आहे.पण इतकंच नव्हे,झाडांचं खोड आणि फांद्या अशा प्रकाराने वाढलेल्या असतात की त्यांच्यामुळे वाऱ्याला कमीत कमी अडथळा होतो.त्यांची रचना एखाद्या आधुनिक मोटार गाडीसारखीच असते. 

त्याउपर,पूर्ण झाड इतकं लवचीक असतं की वाऱ्याचा जोरदार तडाखासुद्धा त्यांना आपल्या शरीरात एकसारखा विभागून सहन करता येतो.अशा सर्व बचावयुक्तींमुळे झाडांना हिवाळ्यामध्ये तग धरता येते.पाच-दहा वर्षांमध्ये एकदा येणाऱ्या प्रचंड मोठ्या चक्रीवादळाला तोंड देताना जंगलातली सर्व झाडे एकमेकांच्या मदतीस उभी राहतात.प्रत्येक झाडाचा बांधा वेगळा असतो.प्रत्येकाच्या लाकडातील तंतू वेगळ्या पद्धतीचे असतात.म्हणजे वाऱ्याचा पहिली झोत आल्यावर प्रत्येक झाड एकाच दिशेला वाकणार असते पण पुन्हा सरळ होण्याचा प्रत्येकाचा वेग वेगळा असतो.पहिला झोत धोक्याचा नसतो.पण वाकडं झालेल्या झाडाला दुसऱ्या झोताचा धोका असतो. सशक्त जंगलामध्ये एका झाडाची दुसऱ्याला मदत होते. एक झाड वाकलेले राहिले तरी त्याच्यामागचे झाड पुन्हा सरळ होण्याच्या मार्गावर असते.यामुळे दोन्ही झाडांचे हलणे कमी होते.वाऱ्याचा पुढचा झोत यायच्या आत जंगलाची हालचाल अगदी संथ झालेली असते आणि पुन्हा वारं आणि झाडं यांच्यातील द्वंद्व चालू होते. झाडांचे डेरे मागेपुढे होताना पाहात बसावसं वाटतं. जंगल एकत्रितपणे मागेपुढे होताना दिसतेच,पण प्रत्येक झाडही हलत असल्याची जाणीव होते.वादळात जंगलामध्ये जाणे धोक्याचे आहे,हे मात्र लक्षात ठेवा.

आपण पुन्हा पानझडी कडे वळू.प्रचंड ऊर्जा खर्च करून दर वर्षी नवीन पालवी बनविण्यातच शहाणपणा आहे, याचा पुरावा म्हणजे प्रत्येक हिवाळ्यानंतर झाड जिवंत दिसते.पण याचे काही वेगळे धोकेही आहेत.हिमवृष्टी हा त्यातला एक धोका.बर्फापासून बचाव करण्यासाठी झाडे आपली पानं झडून टाकतात.मगाशी म्हटल्याप्रमाणे बाराशे चौरस यार्ड पाण्याचा पृष्ठभाग नाहीसा झाला की बहुतांश हिमवृष्टी जमिनीवर पडून जाते,थोडीशीच फांद्यांवर साचून राहते.याचा बर्फ झाला की वजन वाढते.

काही वर्षांपूर्वी पारा शून्य अंशाच्या खाली गेला आणि बर्फाची थोडीशी भुरभुर चालू झाली.असे हवामान तीन दिवस राहिले आणि प्रत्येक तासाला माझी जंगलाबद्दल चिंता वाढत गेली.पावसाची भुरभुर फांद्यांवर पडून त्याचा लगेच बर्फ होतो आणि फांद्यांना काही वेळातच ते वजनदार वाटू लागतं.मात्र हे दृश्य विलोभनीय असतं. सर्व झाडे स्फटिकाने सजवल्यासारखी दिसतात.बर्च वृक्षाची काही तरुण झाडे या वजनाने पार वाकून गेली होती.त्यांची मी आशाच सोडून दिली.आणि प्रौढ वृक्षांमध्ये डग्लस फर आणि पाईन या सूचीपर्णी वृक्षांच्या दोन तृतीयांश फांद्या बर्फाच्या वजनाने मोडून गेल्या होत्या.यामुळे ती झाडं अतिशय.अशक्त झाली होती.त्यांना आपला डेरा पुन्हा वाढविण्यासाठी काही दशकं लागणार होती.पण त्या तरुण वाकलेल्या बर्च झाडांचं मला जरा आश्चर्य वाटतं.

त्यांच्यावरचा बर्फ वितळून गेल्यावर सुमारे ९५ टक्के खोडं परत सरळसोट उभी राहिली.काही अर्थातच पुन्हा जागेवर आले नाहीआणि कालांतराने त्यांचं कुजलेलं खोड मोडून गेलं.आता जंगलाच्या मातीसाठी त्यांचा सेंद्रिय माल होत चालला आहे.

तर मग मध्य युरोपच्या अक्षांशांवर तग धरण्यासाठी पानझड हे एक प्रभावी तंत्र आहे असं म्हटलं पाहिजे. आणि यामुळे झाडांना आपला कचराही झडून टाकता येतो.झोपायच्या आधी आपण जसे स्वच्छतागृहात एक चक्कर मारून येतो,तसेच झाडांनाही झोपण्यापूर्वी नको असलेला कचरा टाकून द्यायचा असतो.

आणि हा कचरा पानझडीमधून जमिनीवर पडतो. पानझड करण्यासाठी ऊर्जा लागते,त्यामुळे ते संपल्याशिवाय झाडाला झोपी जाता येत नाही.एकदा का उपयुक्त द्रव्याचा सगळा साठा पानातून खोडाकडे वळवला की मग जाड ऊतींचा थर बनवून झाड त्या पानाचा फांदीशी असलेला संपर्क बंद करून टाकते. आता वाऱ्याची एक झुळूक जरी आली तरी पान गळून पडतं.सर्व पाने गळून गेली की मगच झाडाला विश्रांती मिळते.त्यांना विश्रांतीची नितांत गरज असते कारण आधीच्या मौसमात त्यांची दमछाक झालेली असते. झोप मिळाली नाही की जसा माणसांना त्रास होतो तसाच झाडांनाही होतो.निद्रानाशापासून जीवाला धोका उद्भवतो.आणि म्हणूनच जर आपण ओक किंवा बीचच्या झाडाला खोलीत वाढवायचा प्रयत्न केला तर ते मरून जातात.इथे त्यांना विश्रांती मिळत नाही आणि वर्षभरातच ते मरू शकतात.

मात्र आपल्या पालकांच्या सावलीत वाढणाऱ्या रोपट्यांची पानझड वेगळ्या प्रकारची असते.त्यांचे पालक जेव्हा पानझड करतात तेव्हा एकदम त्यांच्यापर्यंत भरपूर सूर्यप्रकाश पोचू लागतो.याचा फायदा घेऊन रोपटी ऊर्जा उत्पादनात गुंतून जातात. आणि मग पहिली हिमवृष्टी झाली की चकितच होतात. रात्रीचे तापमान २३ अंश फॅरनहाईटपेक्षा खाली गेले तर मात्र त्यांना जांभया देत निष्क्रिय पडून राहण्याशिवाय इलाज नसतो.आता पानझड करण्यासाठी ऊतींचे थर बनवून त्यांना बिलगून ठेवण्याची वेळ निघून गेलेली असते.आणि असं नाही केल तर पानझड शक्य नसते.ही रोपटी लहान असल्यामुळे त्यांना वाऱ्यापासून आणि बर्फापासून फारसा धोका संभवत नाही.

वसंत ऋतूमध्ये ही रोपटी अशीच अजून एक संधी साधतात.मोठ्या वृक्षांना पालवी फुटायच्या दोन आठवडे आधी त्यांची पालवी फुटते.यामुळेत्यांना भरपूर सूर्यप्रकाश घेता येतो.त्या रोपट्यांना हे कळतं कसं? आपल्या पालकांना पानफुटी कधी होणार याची तारीख काही त्यांना माहीत नसते.त्यांच्या आसपासची जमीन ऊबदार होऊ लागली की ही चाहूल त्यांना लागते. जंगलांतल्या जमिनीवर वसंतातली ऊब आधी पोहोचते. झाडांच्या डेरेदार वरच्या भागापेक्षा दोन आठवडे आधी! त्या उंचीवर दिवसा जोराचे वारे असतात आणि रात्री गारठते. त्यामुळे तिथे ऊब धरायला उशीर होतो.विशाल वृक्षांच्या डेरेदार सुरक्षाकवचामुळे जंगलातल्या जमिनीवर बर्फ कमीच पोहोचतो.त्याच बरोबर जमिनीवर पानगळीचा जाड थर विघटन होत असतो,

 त्यामुळेही जमीन उबदार राहते आणि जमिनीचा पारा वर चढायला मदत मिळते.शरद ऋतूमध्ये रोपट्यांना सूर्यप्रकाशाचा फायदा मिळालेले दिवस बघता,त्या तुलनेत यांना वसंत ऋतू सुरू होण्यावेळी एक पूर्ण महिना मुक्त वाढीसाठी मिळतो.म्हणजे त्यांच्या वाढीच्या काळात २० टक्क्यांची भर पडते.हे काही वाईट नाही ! पानझडी वृक्षांमध्ये काटकसरीने राहण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.पानझडीच्या आधी बहुतांश प्रजाती पानांमधून ऊर्जा परत फांद्यांत आणून ठेवतात.पण काही प्रजाती याकडे दुर्लक्ष करतात.उदाहरणार्थ, अल्डर वृक्ष उद्याची चिंता न करता स्वतःची हिरवीगर्द पानं झडून टाकतात.पण ही प्रजाती जास्त करून पोषणयुक्त दलदलीच्या प्रदेशात वाढते,त्यामुळे त्यांना दरवर्षी नवीन क्लोरोफिल बनवणे जड नसते.त्यांच्या पायाशी वाढणारी बुरशी आणि सूक्ष्मजीव त्यांच्या पडलेल्या पानांचे विघटन करून झाडाला पोषणद्रव्य उपलब्ध करून देतात.

झाडाला फक्त हे मुळातून घेऊन पुन्हा नवीन क्लोरोफिल बनवायचे असते.नत्रच्या पुनरुज्जीवनाचीही त्यांना काळजी नसते,कारण मुळांवर असलेल्या गुठळ्यांत असणारे सूक्ष्मजीव सतत याचा पुरवठा करीत असतात.दर वर्षी एक चौरस मैलाच्या अल्डर वृक्षाच्या जंगलातून सुमारे ८७ टन नत्र हवेतून घेऊन त्याचा पुरवठा मित्र वृक्षांना केला जातो.बहुतांश शेतकरी जितके नत्र शेतात वापरतात त्यापेक्षा हे जास्त आहे.म्हणजे अनेक प्रजाती काटकसरीने राहतात त्याउलट अल्डर वृक्ष आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करतात.अ‍ॅश आणि प्रौढ वृक्षही असेच वागतात.हे उधळे आपली हिरवी पानं झडू देतात आणि शरद ऋतूत विविध रंगाने नटणाऱ्या झाडांच्यात त्यांचा नंबर लागत नाही.तर मग स्वभावाने कंजुष असलेली झाडेच रंगबिरंगी असतात,असं दिसतंय.पण हे अर्धसत्य आहे. क्लोरोफिल काढून घेतल्यावर पानांवर पिवळा,केशरी आणि लाल रंग दिसू लागतो.पण हे रंग ज्यामुळे येतात ते कॅरोटिन आणि अ‍ॅन्थोसायनिन सुद्धा काही वेळातच विघटन होऊन बदलणार असतात.ओकचे वृक्ष मात्र अत्यंत सावधपणे सर्व द्रव्य काढून घेतात आणि फक्त तपकिरी पानं झडू देतात.म्हणजेच प्रत्येक झाड वेगळ्या पटीने खर्चीक असते.बीचची पाने तपकिरी आणि पिवळी झाली की झडतात पण आनंदी चेरी झाडांची पानं मात्र लाल असतानाच झडून जातात.

आता शेवटी सूचीपर्णी झाडांकडे वळू.त्यांच्याबद्दल मी फार बोललो नाही पण या गटात पानझडी वृक्षांसारखे पानगळ करणाऱ्या तीन प्रजाती आहेत लार्च,बाल्ड सायप्रस आणि डॉन रेडवूड.हे तिघे पानझडी वृक्षासारखे का वागतात, याची मला खरंच कल्पना नाही.कदाचित असंही असेल की उत्क्रांतीच्या शर्यतीत हिवाळ्यावर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग किती सावधगिरीने बाळगावी हे अजून निश्चित झालं नसावं.वसंत ऋतूमध्ये सूचीपर्णी पानं टिकवून ठेवणं हे नक्कीच फायद्याचं असतं.कारण नवीन पान उगवण्याची वाट न पाहता झाडाला आपली अन्नउत्पादनाची क्रिया लगेच चालू करता येते.पण वसंतातल्या उन्हाने अनेक नवीन कोवळे कोंब सुकून जातात जेव्हा मोठ्या झाडांचे वरचे डेरे वसंतातल्या उन्हाने छान गरम झालेले असतात.पण जमीन अजूनही थोडी गारठलेली असते.नवीन कोंब अशा वेळेस प्रकाश संश्लेषण सुरू करण्याची घाई करतात आणि सुकून जातात.त्यांना बाष्पोत्सर्जन थांबविता येत नसल्यामुळे धोक्याची चाहूल लागताच सूचीपर्णी पानं लुळी पडतात. विशेषतःगेल्या वर्षीच्या पानांचे असे होते,कारण त्यांच्यावर मेणाचा जाड थर नसतो.

या तिघांच्या व्यतिरिक्त स्प्रूस,पाईन,फर आणि डग्लस फर ही झाडंसुद्धा आपल्या सुया बदलतात, कारण त्यांना कचरा साफ करायचा असतो.सर्वांत जुन्या सुया ते प्रथम बदलतात कारण इजा होऊन त्यांची कार्यक्षमता कमी झालेली असते. जोपर्यंत ही झाडं सशक्त असतात तोपर्यंत फर दहा वर्षांसाठी, स्प्रूस सहा आणि पाईन तीन वर्षांसाठी आपल्या सूचीपर्णी पानांचा साठा करून ठेवतात.दोन फांद्यामधील वाढ होण्याच्या अंतराकडे पाहून हे लक्षात येते.पण पाईनची झाडं थंडीमध्ये विरळ दिसू लागतात, कारण ते एक चतुर्थांश पानं झडून टाकतात.वसंतात पुन्हा वर्षभर पुरतील इतक्या सुया वाढतात आणि झाडाची वाढ होते.आता मात्र झाड पुन्हा सशक्त दिसू लागते.

●●● समाप्त ●●●




5/23/26

काजवे : अंधारातील प्रकाश / Kajave: Light in the Darkness

नवेगावबांध सरोवराकाठी मी राहात असताना तिथल्या पावसाळी अंधाऱ्या रात्री काजव्यांनी सुशोभित झालेल्या असत.आभाळ सरोवरावर टेकल्यासारखं वाटे. कित्येकदा मी काळोख्या रात्री सरोवरावर काजवे बघायला जाई.नवेगावबांध परिसरात लोक काजव्यांना 'मिलमिले' म्हणतात. काजवा हा शब्द त्यांना माहीत नाही. 'मिलमिले' या शब्दातच काजव्यांचा अर्थ आहे.जिकडं तिकडं किर्र अंधार असे.तो अंधार आकाशातील ढगांमुळं शतपटीनं वाढे.सरोवराकाठच्या झिलाणीतून अनेक कृमि-कीटकांचे आवाज येत.एका सुरात थांबून थांबून बेडकांच्या समूहाचा आवाज येई. बेडकांच्या या सुराला नादमधुर म्हणता येणार नाही; परंतु काळोखाची भीती कमी करणाऱ्या या आवाजाचं मला मोठं आकर्षण वाटे.क्षणभर जरी त्यांचा हा नाद बंद झाला तरी मन अस्वस्थ होई.त्या वेळी माझ्या ध्यानी आलं,की संगीताच्या सप्तसुरांत बेडकांच्या आवाजाला 'धैवत' का म्हटलं आहे. अशा या वातावरणातच बेडकांचा आवाज ( काजवे : अंधारातील सुंदर प्रकाश, पाखरमाया,मारुती चितमपल्ली,प्रकाशक - साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर )ऐकायला हवा.तो अद्भुत नाद असतो.तो अशा अंधारातील मोकळया अवकाशासाठीच असतो.तिथून त्याचा अंतरिक्षात लय होतो.दाटीवाटीनं इमारती असलेल्या शहरात हा अनुभव कधीच येणार नाही.

मधूनच झिंग्यांच्या कळपाचा आवाज येई.एखादा मासा पाण्यातून उंच उडी घेताना त्याची रुपेरी पाठ चमकताना दिसे.नंतर डुबकन आवाज होऊन ती झलक अंधारात गडप होई.सरोवराच्या बांधावर मोहा,बेल,हिरडा,बेहडा आणि आवळ्याची जुनी मोठी झाडं उभी होती.तशीच सरोवराकाठी चिंचेची राई होती.आकाशात सुरुवातीला काही चमकणारे तारे दिसावे,नंतर ते वाढत वाढत साऱ्या नभी दिसू लागावे,तसेच चिंचेच्या घुमटाकार झाडावर किंवा इतर काही वृक्षांवर पहिल्यांदा चार-पाच हिरव्या-पिवळ्या रंगांच्या प्रकाशाचे ठिपके दिसायचे. एखाद्या चांदणीसारखे ते चमकत.

हळूहळू त्या झाडांच्या हिरव्या-काळ्या छतावर प्रकाशाचे अधिक अधिक बिंदू दिसू लागत.थोड्या वेळात ती राई त्या हिरव्या असंख्य बिंदूंनी जणू गोंदवली जायची.

इतके अगणित काजवे एकत्र चमकताना मी यापूर्वी कधी कुठं पाहिले नव्हते.अशा अंधारातदेखील झाडांच्या छताचा मूळ आकार दृगोचर होऊ लागे.सरोवराकाठचं हे गूढ सुंदर रूप मोठं अभूतपूर्व वाटे.दूरवरून पाण्याच्या लहरी किनाऱ्यांवर आंदुळताना कर्णमधुर आवाज करीत,तोही ऐकू येई.

काजव्यांचा एखादा थवा लुकलुकत झिलाणीत स्थिर होई.काही काजवे पाण्यातील पृष्ठावर डोकावणाऱ्या वनस्पतीवर स्वार होत.अशा वेळी प्रकाशाच्या ठिपक्यांचं सुंदर प्रतिबिंब साऱ्या सरोवराकाठच्या जलाशयात दिसू लागे.पुणे-मुंबई शहरांतील विजेच्या दिव्यांची रोशणाई पाहणाऱ्यांना निसर्गसुंदर अशा काजव्यांच्या प्रकाशाच्या शोभेची कल्पना प्रत्यक्षात ती अनुभवल्याशिवाय येणार नाही.

अशा काळोखातील काजव्यांच्या प्रकाशात पाहायला माझे डोळे सरावलेले होते.पाच-सात हुदाळ्यांचं कुटुंब पाण्यात अवतीर्ण झालं,की ते गोल गोल पोहू लागत. मध्येच वळणदार उड्या घेत.त्यांच्या अंगावरही काही काजवे चमकत.झिलाणीत डोकावणाऱ्या पाण्यात काजव्यांच्या प्रकाशाचं प्रतिबिंब पडलेलं दिसे.वर काजवे खाली काजवे असे एक अलौकिक सुंदर दृश्य तिथं जन्माला येई.हुदाळे पाण्यात उड्या घेत,तसे पाण्याच्या तुषारांचा प्रकाश दिसे.मोत्यांसारख्या तुषारांत हिरव्या प्रकाशाचे बिंदू दिसत.मी हे सारं देहभान हरपून तासन् तास अंधारात बसून पाहात शांततेचा एक अवर्णनीय अनुभव घेतला आहे.

आम्ही भारतीय लोक तसे कीटकांच्या जगाविषयी खूप उदासीन वृत्तीचे आहोत.जपानी लोक मात्र या बाबतीत मोठे रसिक आहेत.त्यांची मुलं फुलपाखरं आणि चतुर यांच्याबरोबर खेळतात.रानात टोळ पकडायला एकमेकांना साहाय्य करतात.हिरव्या-जांभळ्या रंगाच्या सोनेरी कीटकांच्या शोधात भटकतात.कीटकांचं संगीत ऐकण्यासाठी जपानी लोक विविध प्रकारचे गाणारे कीटक आपल्या बागेत पाळतात.घरासमोरच्या हौदातील पाणनिवळ्या आणि पाणकीटक न्याहाळण्यासाठी त्यांना वेळ असतो.बागेतील गोगलगाईकडं ते कौतुकानं बघतात,फुलपाखरं,चतुर, रातकिडे,

गाणारे कीटक आणि गोगलगाई यांच्यावर जपानी कवींनी अतिशय आशयघन 'हायकू' रचल्या आहेत.अशा या जपानी देशात एक सुंदर परंपरा आहे. नोबेल पुरस्कार-विजेते याशुनारी कावाबाता यांच्या 'दि लेक' या लघुकांदबरीत काजव्यांच्या उत्सवाविषयी आख्खं एक प्रकरण आहे.ते इतकं भावस्पर्शी आहे,की तुम्ही ते मुळातून वाचल्याशिवाय त्यातील सौंदर्याचा अनुभव घेता येणार नाही.कादंबरीत कीटकांविषयी एक प्रकरण असू शकतं,याचंच मला आश्चर्य वाटतं. कावाबाताच्या सर्वच कथा-कादंबऱ्यांतून जुन्या परंपरेचं जतन करताना जसा त्याआधारे आनंद व्यक्त केला आहे,तशीच त्या आनंदाला दुःखाची भरजरी किनार जोडली आहे.असा हा जीवनाचा सारीपाट कावाबातासारखा समर्थ लेखकच विणू जाणे.इतरत्र मला ते कुठं आढळून आलं नाही.

कादंबरीत तळ्याकाठच्या उंच मनोऱ्यावरून रात्रीच्या अंधारात काजवे हवेत सोडण्याचा आनंद उत्सव आहे. नाना प्रकारचे काजवे छोट्याशा पिंजऱ्यातून विकण्यासाठी तळ्याभोवती दुकानं लागली आहेत. शोभेच्या दारूगोळ्यांची आतशबाजी पाहण्यासाठी जसे जत्रेत आबालवृद्ध जमा होतात,तसेच काजवे हवेत सोडणार,या वार्तेनं पुष्कळ जपानी रसिकांनी त्या तळ्याभोवती जमून गर्दी केली आहे.ते पाहण्यासाठी ते नावेत बसून जलविहार करीत प्रतीक्षा करीत आहेत. बऱ्याच लोकांच्या हातात काजवे धरण्यासाठी जाळी लावलेल्या लांब काठ्या आहेत.

मनोऱ्यावरून काजवे सोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात होताच प्रेक्षकांचा आनंद गगनात मावेनासा होतो. कादंबरीचा नायक गिमपी ते सुंदर दृश्य पाहात आपली प्रेयसी माची हिला शोधीत असतो. ती सुंदर पोशाख करून,तळ्याकाठच्या पुलावर उभी राहून,तो सारा देखावा पाहात त्याची प्रतीक्षा करीत असते.

एकमेकांना हा आनंदानुभव सांगण्यासाठी दोघंही आतुर असतात.हे दृश्य पाहता-पाहता तो हलकेच बालपणीच्या आठवणींच्या जगात पदार्पण करतो.त्याच्या गावतळ्याची त्याला आठवण होते.तिथं अनेक वेळा आईबरोबर काजवे उडताना त्यानं पाहिले होते.इतक्यात प्रेयसी समोर दिसते.तिच्या हातात एक पिंजरा असतो.त्यात काजवे चमकत असतात.युद्धात जखमी झालेल्या आपल्या मित्राला भेट देण्याकरिता तिनं तो घेतलेला असतो.या साऱ्या प्रसंगाची आठवण मनात घोळवीत असताना काजव्यांवर जपानी कवींनी रचलेल्या 'हायकू' मनश्चक्षूपुढं साकार होऊ लागतात.जपानी मुलं काजव्यांविषयीचं प्रेम जन्मतःच घेऊन येत असावीत. वाट चुकलेलं बालक रडत अडखळत अंधाऱ्या रानातून जातं आहे,पण त्याला वाट चुकल्याचं भानदेखील राहिलेलं नाही.त्याही अवस्थेत ते चालताना काजवे पकडू लागतं :

A lost child crying Stumbling over The dark fields.... Catching fireflies

Ryusi

पावसाच्या सुरुवातीला दिसू लागणाऱ्या काजव्यांना पकडण्याचा मोह कोणाला आवरेल? त्यानं बोटाच्या चिमटीत पहिलाच काजवा धरताच तो निसटून गेला. अरे दैवा ! त्याच्या चिमटीत हवा तेवढी राहिली :

The first firefly... But he got away And I... Air in my fingers

Issa

मी त्याला पिंजऱ्यात ठेवण्यासाठी सहज पकडलं,तर त्या काजव्यानं माझी चिमूटच प्रकाशित केली.

As I picked it up To cage it The firefly Lit my finger-tips

निसर्गातील ते अभूतपूर्व दृश्य । खोल नदीच्या अंधाऱ्या प्रवाहात काजवेदेखील मंद गतीनं जात आहेत.पाणी वाहतंय की प्रकाश ?...

Over the deepest Darkest river The fireflies Are flowing slowly

Shiyo

मी त्यांना बोलावतोय. परंतु ते काजवे क्षणभर चमकून अंधारात नाहीसे होतात.

Come come! I Call But the fireflies Flash away Into the darkness

Onitsura

गवताच्या पात्यावर अडखळलेला काजवा पुन्हा उंच उडू लागतो,तेव्हा-

Having tumbled off His grass-blade.. The firefly Buzzes up again

-Basho

काळोखात चमकत असलेला काजवा क्षणभर निघून गेला.तेव्हा जाणवलं,की अंधारातले एकटेपण कसं असतं :

For that brief moment When the firefly Went out... 0 The lonely darkness

-Hokushi

अशीच ही एक अप्रतिम काव्यरचना आहे.तिन्हीसांजा ती तांदूळ धूत होती.तिचं सुहास्य वदन काजव्याच्या प्रकाशात क्षणभर उजळलं (तिला प्रियकराची आठवण झाली होती,की ती तिची सवयच होती?)

As she washes rice, Her smiling face Is briefly Lit by firefly

सोनेरी काजवा,लहान विव्याची ज्योत आणि माणसाचा थंड स्पर्श यांविषयी पहा :

Yellow firefly... Little lamp flame That to the Human touch is chill

-Shiki

शिकाऱ्यापासून दूर उडत जाणाऱ्या काजव्यानं सायंकाळच्या चंद्रप्रकाशात आसरा घेतला :

Fleeing the hunter The firefly Took cover... The evening moon

-Ryota

खाली दिलेली दोन मृत्युगीतं पहा.जीवन किती क्षणभंगुर आहे,आता ते प्रकाशत होतं आणि क्षणातच विझून गेलं काजव्यासारखं :

Suddenly you light And as suddenly Go dark... Fellow-firefly

-Chine-jo

बहिणीच्या हातावर लहान भावाचं तिन्हीसांजा प्राणोत्क्रमण झालं एखाद्या काजव्याप्रमाणं :

Pitiful... on my Outstreched palm At dust dies The tittle firefly

-Kyorai

काजव्यांचं काव्यमय वर्णन करण्यात जपानी कवींनी जी गरुडभरारी मारली आहे,तिथपर्यंत जगातील इतर साहित्यिकांना झेप घेता आलेली नाही.

अगोदर मी काजव्यांच्या काव्यप्रकाशाचा आनंदानुभव घेतला.नंतर त्यांच्या वास्तविक जीवनाकडं जिज्ञासेमुळं वळलो.परंतु असं करताना त्यांच्या जीवनक्रमाबद्दल कौतुकमिश्रित आश्चर्यच वाटलं,काजव्यांना स्वतःचा प्रकाश आहे.मादीच्याशरीररचनेत प्रकाशाच्या ग्रंथी असतात.त्या ग्रंथींचा प्रकाश त्यांच्या विविध जातींप्रमाणं वेगवेगळा असतो.या चमकीमुळं मादीला आपल्या नराची ओळख पटते.वर्षभर क्वचितच दिसणारे काजवे पहिला पाऊस पडताच गवतातून बाहेर पडून लुकलुकू लागतात,तेव्हा नर-मादीचा समागम होतो.काजव्याच्या प्रकाश देणाऱ्या अवयवांच्या पेशींत ल्युसिफेरिन नावाचं द्रव्य असतं. दिव्याच्या ज्योतीचा जसा चटका लागतो,तसं काजव्याच्या प्रकाशाचं होत नाही.कारण त्यात उष्णता नसते.त्याचा प्रकाश थंड असतो.

★★★ समाप्त ★★★

5/21/26

लाटांची टक्कर / Collision of waves

इतिहासातील घटनांचा क्रम महत्त्वाचाच आहे.परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हा दृष्टिकोण घटनांच्या जुन्या क्रमातील खंडांकडे लाणि नव्या उपक्रमांकडेच जास्त लक्ष देतील.त्यामुळे बदल घडवून आणू शकणाऱ्या घटता घडत असतानाच,त्यांची पुरी ओळख पटून,त्यांच्यावर प्रभुत्व मिळविणे आपल्याला शक्य होईल.अगदी साथी सरळ कल्पना अशी,की शेतीचा उदय हा मानवाच्या सामाजिक घडणीतला पहिला,नवे वळण घेणारा असा क्षण होता,आणि नौद्योगिक क्रांती हाही फळी फोडण्याचाच प्रकार होता.यातली कोणतीही घटना ही एकदमच घडलेली दूरवर परिणाम करणारी घटना नव्हती,तर एका विवक्षित वेगाने येणारी बदलाची एकेक लाट होती,अशा तन्हेने त्यांचा विचार होईल.

बदलाच्या पहिल्या लाटेपूर्वी माणसे छोटे छोटे गट करून रहात होती.हे गट स्थानान्तर करीत रहाणारे होते. अन्नाच्या शोधात भटकत,मच्छिमारी करत,शिकारी करत आणि गुरे राखून पोट भरणारे होते.अशा स्थितीत कोणत्यातरी वेळी,सुमारे दहा हजार वर्षापूर्वी शेतीची क्रांतिकारी सुरूवात झाली.गावोगाव,

वस्त्यावस्त्यांत ती हळूहळू पसरत गेली.जमिनी नांगराखाली आल्या. मशागती झाल्या.जीवनाचा नवीनच मार्ग सुरू झाला.

सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही पहिली लाट राहिलीच होती.त्यानंतर युरोपात औद्योगिक क्रांतीचा उद्रेक झाला आणि बदलाच्या या दुसऱ्या भल्या थोरल्या लाटेने पृथ्वीवर आक्रमण केले.औद्योगिकीकरणाची ही प्रक्रिया फार मोठ्या वेगाने निरनिराळ्या दिशांमधून, खंडाखंडांमधून पसरत गेली.अशा त-हेने पृथ्वीवर एकाचवेळी पण भिन्न वेगात दोन स्वतंत्र आणि वेगळ्या अशा बदलाच्या प्रक्रिया संचरत होत्या.

आज पहिली लाट पूर्णपणे निमाली आहे.फार थोडया आदिवासी जमाती,उदाः दक्षिण आफ्रिकेतील किंवा न्यू गियानात पापुआतील,केवळ शेतीच्या आधारे जगत आहेत.पण या पहिल्या लाटेचा भर संपूर्णतया ओसरलेला आहे.

युरोप आणि उत्तर अमेरिकेतील,तसेच पृथ्वीच्या इतर काही भागात फार थोड्या शतकांच्या कालावधीत या दुसऱ्या लाटेने जीवनक्रांती घडवून आंणली.अजून तिचा वेग तसाच आहे.पुष्कळ शेतीप्रधान देश पोलाद कारखाने,कापड गिरण्या,वाहन उत्पादक कारखाने, रेल्वे,अन्नावर प्रक्रिया करणारे कारखाने उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत.औद्योगिकीकरणाचा वेग अजूनही जाणवेल इतका प्रचंड आहे.या दुसऱ्या लाटेचा भर अजूनही संपलेला नाही.पुष्कळ शिल्लक आहे.परंतु अजून ही प्रक्रिया चालू आहे तोवरच याहीपेक्षा खूप महत्त्वाची प्रक्रिया चालू झाली आहे. 

औद्योगिकीकरणाच्या लाटेने दुसन्या महायद्धानंतरच्या काळात सर्वोच्च उंची गाठलेली असतानाच न कळतच तिसरी लाट पृथ्वीनर पसरायला सुरूवात झाली असून जिला तिचा स्पर्श होईल ती प्रत्येक वस्तू बदलत चालली आहे.त्यामुळे पुष्कळ देशातून एकाच वेळी दोन,तीन सुद्धा संपूर्ण वेगळेचा लाटा वेगवेगळ्या वेगात, वेगवेगळ्या ताकदीनिशी आपले अस्तित्य जाणवून देत राहिल्या आहेत.या पुस्तकांत आपण ख्रिस्तपूर्व ८००० वर्ष या काळात पृथ्वीवर सुरु झालेल्या आणि इ. स. १६५०-१७५० पर्यंत अनिर्बंध अधिसत्ता गाजविणाऱ्या पहिल्या लाटेच्या युगाचाही जाता जाता विचार करणार आहोत.या वेळेनंतर पहिल्या लाटेची चलती कमी झाली;आणि दुसऱ्या लाटेचे अपत्य असणाऱ्या औद्योगिक संस्कृतीने पृथ्वीवर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने गती घेतली;लवकरच तिने कळसही गाठला.

१९५५ च्या सुमाराला सुरू झालेल्या दशकाने ऐतिहासिक महत्त्वाचा ठरणारा परिवर्तन क्षण आलेला पाहिला.या वेळी अमेरिकन संयुक्त संस्थानात पांढरपेशे व नोकरदार यांना प्रथमच श्रमिकांनी मागे टाकलेले.याच दशकात फार मोठ्या प्रमाणात गणकयंत्रे,व्यापारी जेट प्रवास,कुटुंब नियोजनाच्या गोळया आणि अशाच अनेक प्रभावशाली गोष्ठी वापरात आल्या आणि याच दशकात तिसऱ्या लाटेने आपली ताकद एकवटायला सुरूवात केली.त्यानंतर थोडे मागे पुढे असे करत ती इंग्लंड,

फ्रान्स,स्वीडन,जर्मनी,रशिया, जपान,यासह इतरही उद्योगप्रधान देशांमध्ये येऊन पोचला.आणि सध्या तंत्राधष्ठित असे हे सर्व देश तिसऱ्या लाटेच्या आणि दुसऱ्या लाटेच्या कालबाह्य अशा कठीण पण सुस्थित अर्थव्यवस्थेच्या संघर्षांत भरडून निघत आहेत.आणि आपल्या भोवताली जे राजकीय आणि सामाजिक संघर्ष उठत राहिलेले आपण बघतो आहोत,त्याचे खरे मूळ हेच आहे.

आगामी लाटा…

ज्यावेळी एखादी लाट एखाद्या समाजावर प्रभुत्व गाजवताना आढळते त्यावेळी त्या समाजाच्या भविष्यकालीन घडणीच्या धोरणाचा अंदाज करणे तसे सोपेच असते.लेखक,कलाकार,वृत्तपत्रकार आणि इतरांनाही भविष्यकालीन लाटेचा शोध लागतो.अशाच प्रकारे एकोणीसाव्या शतकातील युरोपीय विचारवंत, उद्योगातील अग्रणी,राजकारणी आणि सर्वसामान्य लोक यांना भविष्यकाळाचे मूलतःअचूक अशा चित्राचे आकलन झाले होते.त्यांना यंत्राधिष्ठित शेतीवर उद्योग निर्विवाद असा विजय मिळवणार असल्याची जाणीव झाली होती.आाणि दुसरी लाट भविष्य काळात स्वतःबरोबर आणत असलेले बदलही त्यांना आधीच विलक्षण अचूकतेने उमजले होते.अधिक प्रभावी तंत्रज्ञान,अधिक मोठी शहरे,अधिक गतीची वाहतूक सामुदायिक स्वरूपाचे शिक्षण या व अशाच इतर काही गोष्टींची त्यांना चाहूल लागली होती.

आणि अतिशय स्पष्टपणे झालेल्या भविष्याच्या या दर्शनाचे राजकारणावर प्रत्यक्षच परिणाम झाले.पक्ष आणि राजकीय चळवळी आगामी घटनांची व्यवस्थित चाहूल घेतच आपले कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करू लागले.

औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या शेतीप्रधान, संस्कृतीच्या हितसंबंधींनी सर्वदूर जाळे पसरणाऱ्या 'उद्योगा' विरुद्ध,मोठ्या,उद्योगाविरूद्ध,'संघटनांच्या दादा' विरूद्ध आणि,'पापी शहराविरूद्ध पिछाडीकडून' हल्ला होईल अशी व्यवस्था केली.उदयोन्मुख उद्योगप्रधान समाजाच्या मुख्य कळांवर ताबा ठेवण्यासाठी मजूर व व्यवस्थापन झटत राहिले जातीय किंवा वशीय अल्पसंख्यांक औद्योगिक जगाच्या संदर्भात बदललेल्या भूमिकेनुसार आपल्या हक्कांच्या व्याख्या करीत नोकरीतील सवलती,सामुदायिक दर्जा,शहरी निवास, सुधारित वेतन,सामुदायिक लोकशिक्षण इत्यादींबाबत अधिक संधी मागू लागले.या भविष्यकालीन औद्योगिक चित्राचे महत्त्वाचे मानसिक परिणामही आहेतच लोकांचे मतभेद होऊन त्यातून तीव्र आणि काही वेळा तर रक्तपाती संघर्ष देखील निर्माण होत राहिले. 

तेजी,मंदीमुळे लोकांची जीवने उध्वस्त होणेही अशक्य नव्हते.या औद्योगिक भविष्याच्या चित्रामुळे विरोधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.प्रत्येक व्यक्तीला आपण स्वतः कोण आहोत,कसे आहोत आणि पुढे आपले काय होण्याची शक्यता आहे याची देखील समज त्या चित्राने दिली.त्यामुळे समाजात प्रचंड बदल घडत असतानाच व्यक्तीला काही प्रमाणात स्थैर्य आणि अस्मिता मिळत गेली.उलट,ज्या वेळी एखादा समाज दोन किंवा अधिक अशा बदलाच्या भल्या मोठ्या लाटांच्या तडाख्यात सापडतो,आणि त्यातली कोणतीही एक त्यावेळी खास प्रभुत्वही मिळवू शकत नसते,अशा वेळी भविष्याचे चित्र भंग पावते.घडत रहाणारे बदल आणि भडकत रहाणारे संघर्ष यांचे अर्थ लावणेही अतिशय कठीण होत रहाते. ज्यावेळी दोन लाटांची टक्कर होते,तेव्हा सागरात वादळ उठते.प्रवाहांचे संघर्ष होतात,छोटे मोठे भोवरे निर्माण होऊन खळबळ माजते आणि खोलवर असलेल्या खऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या लाटा त्यामुळे लपूनच रहातात.

इतर देशांप्रमाणेच अमेरिकेतही दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची घडणारी टक्कर सामाजिक तणाव,भयानक संघर्ष आणि नवीन काही विचित्रच अशा राजकीय प्रणाली निर्माण करते की ती वर्ग,वंश,लिंग किवा पक्ष यामुळे निर्माण होणारे भेद मानीत नाही;नाहीसेच करते. ही टक्कर नेहमीच्या राजकीय शब्दसमूहात गोंधळ माजवते आणि प्रागतिक व प्रतिगामी,शत्रू व मित्र यांच्यातला भेद जाणणे अशक्य करून टाकते.सर्व जुने मतभेद,विसंगत्या आणि युत्या भंग करून टाकते; संघटना आणि नोकर यांच्यात काही मतभेद असले तरी परिस्थितीशी झुंज देण्यासाठी ते एकी करतात. कृष्णवर्णीय आणि ज्यू एकदा आपल्याला मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीविरुद्ध झगडण्यासाठी एकत्र आले आणि नंतर परस्पर विरोधीही झाले.

अनेक देशांमध्ये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या फेरवाटणीसारख्या पुरोगामी धोरणांना पाठिंबा असे. परंतु ते आता अनेकदा स्त्रियांचे हक्क,कुटुंबविषयक नियम,देशाच्या बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांबाबतचे नियम,आयातीवरील कर,प्रादेशिकता इत्यादी बाबींचा प्रतिगामी दृष्टिकोणातून विचार करतात.परंपरागत 'डावे' सहसा कडवे देशभक्त व केंद्रसत्तावादी असतात.आपल्या भोवतीच्या सद्यःपरिस्थितीशी त्यांना कर्तव्य असे नसते.आपल्या भोवतीच्या सद्य:परिस्थितीशी त्यांना कर्तव्य असे नसते.त्याच वेळी आपणास जिमी कार्टर किवा जेरी ब्राऊन,व्हॅलेरी जी.ड्इस्टींग यांच्या सारखे राजकारणी लोक आढळतात.त्यांच्या आर्थिक प्रश्नाबाबतचा दृष्टिकोण अगदी 'सनातन' असतो.हेच लोक कला,लैंगिक नीतिमत्ता,स्रियांचे हक्क,निराळया समाजगटांचे ऐहिक किंवा सामाजिक,सांस्कृतिक रचनांच्या संदर्भातले एकमेकांशी असणारे संबंध,अशा गोष्टींबाबत उदार दृष्टिकोण धारण करतात.

त्यामुळेच गोंधळून जाऊन आपल्या जगांचा अर्थ लावू शकत नाहीत.अशातच निरनिराळी वृत्तमाध्यमे निरनिराळे शोध, वेगळया बाबतीतले विरोध,विचित्र घटना,खून, जबरदस्तीने किंवा फसवून कोणाला पळवूनच नेणे, अंतराळातील विक्रम,राजकीय उलथापालथी,गटांनी केलेले हल्ले,अफवा,अशा कित्येक असंबद्ध घटनांबद्दल आपल्याला सांगत असतात.

राजकीय जीवनात स्पष्टपणे दिसून येणाऱ्या विसंगतीचे प्रतिबिंब विस्कळित किंवा खंडित व्यक्तिमत्वातून आपल्याला आढळते.मनोवैज्ञानिक आणि निरनिराळे 'गुरू' या गोष्टीचा चांगलाच फायदा उठवतात.लोक सर्व प्रकारच्या उपचार-पद्धतींकडे धाव घेत,इकडून तिकडे जात रहातात.निरनिराळे पंथ धुंडाळत रहातात किवा गुप्तपणे निरनिराळया तपासण्या करून घेत रहातात. त्यांना सत्य हे हास्यास्पद,विवेकशून्य आणि निरर्थक असल्याचे कळून चुकलेले असते.परंतु यामुळे असे म्हणता येणार नाही,की सध्या घडणाऱ्या घटनांना काही पद्धत किंवा रीतच नाही.खरे पहाता,आपल्याला जर विरत चालल्या दुसऱ्या लाटेशी संबंधित असणाऱ्या बदलांहून वेगळे असे तिसऱ्या लाटेशी संबधित असलेले बदल ओळखता येऊ लागले तर ह्या सर्व घटनांमाग लपून असलेले परंतु स्पष्टपणे अस्तित्वात असलेले सूत्र असल्याचे आपल्या ध्यानात येईल.

या दोन लाटांच्या टकरीतून निर्माण झालेल्या संघर्षाचे आकलन आपल्याला या बदलत्या स्वरूपाचे अधिक स्पष्टचित्र तर दाखवतेच,शिवाय राजकीय आणि सामाजिक शक्ती आपल्यावर करीत असलेल्या 'कार्या’च्या देखील क्षकिरण सदृश सखोल व स्वच्छ प्रतिमा आपल्यापुढे सादर करते.शिवाय ते इतिहासात असणाऱ्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक भूमिकेबाबतच्या अंतरंगाचे यथार्थ ज्ञानही देते.कारण आपण प्रत्येकजण वरवर जरी कमी महत्त्वाचे भासलो, तरी प्रत्यक्षात इतिहासाचे जिते जागते अंश,घटक आहोत ! लाटांच्या बदलातून निर्माण झालेले अंतःप्रवाह आपल्याला आपल्या कामां-मधून आपल्या,कौटुंबिक जीवनातून,

आपल्या लैंगिक बाबींबद्दलच्या दृष्टिकोणांतून,आपल्या स्वतःच्या नीतिमत्तेतून प्रतिबिंबित होत असतात.आपल्या जीवन पध्दतीतून आणि राजकीय कृतींमध्ये श्रीमंत राष्ट्रातील आपल्यापैकी बहुतेकजण मरू घातलेल्या दुसऱ्या लाटेचे पाईक तरी असतात;आमूलाग्र भिन्न असणाऱ्या 'उद्याच्या' तिसऱ्या लाटेला वाहून घेणारे तरी असतात, किंवा स्वत्व नाहीसे करुन टाकणाऱ्या,या दोन्हींच्या मिश्रणाची निर्मिती तरी असतात !

सोनेरी किडे आणि छुपे मारेकरी..

दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या गटांमधील संघर्ष,खरे पहाता मध्यवर्ती राजकीय तणाव आपल्या समाजाचे तुकडे करत आहेत.आजचे राजकीय पक्ष किवा त्यांचे उमेदवार आपल्याला काहीही पढवत असले,तरी आपल्या कोसळत्या औद्योगिक प्रणालीतील जे काही शिल्लक आहे,त्याचे जास्तीत जास्त फायदे उठविण्याच्या वादाहूनही थोड्या अधिकच,त्यांच्यातील अंतर्गत झुंजी चितनीय आहेत.हेच दुसऱ्या तऱ्हेने म्हणावयाचे झाले तर असे म्हणता येईल,की बुडत्या टिटॅनिकच्या प्रसिध्द डेक खुर्ध्या पटकावण्यासाठी ते हमरीतुमरीवर आलेले आहेत.

आपल्याला असे आढळून येईल,की औद्योगिक समाजाचे अखेरचे दिवस कोणाच्या सत्तेखाली जाणार आहेत या गोष्टीपेक्षा,रिकामी होणारी जागा घेऊ पहाणाऱ्या झपाट्याने उभारणाऱ्या नव्या संस्कृतीला कोण आकार देणार हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपली सारी शक्ती आणि लक्ष अल्पकालीन राजकीय चकमकींवरच खचून जात असतानाच,एक फार गंभीर स्वरुपाची लढाई या सर्व पृष्ठभागाखाली चालू आहे. तीत एका बाजूला औद्योगिक गतकालाचे पाठीराखे असून,दुसऱ्या बाजूला ज्यांना जगाचे तातडीने सोडवण्याजोगे प्रश्न,अन्न,ऊर्जा,

शस्त्रांचे नियंत्रण, लोकसंख्या,गरीबी,भौगोलिक नैसर्गिक संपत्ती,वर्गभेद, हवामान,वृध्दांचे प्रश्न,नागरी समाजाचे विदारण, उत्पादक व फलदायी कार्याची गरज औद्योगिक रचनेच्या चौकटीत सोडवता येणे आता शक्य नाही हे समजते,असे लोक आहेत.हा संघर्ष उद्याचा महान संघर्ष असणार आहे.प्रत्येक देशांच्या राजकीय जीवनातून दुसऱ्या लाटेच्या फुसक्या हितसंबंधीयात आणि तिसऱ्या लाटेच्या अनुयायात घडणाऱ्या या टक्करीच्या लहरी एखाद्या विद्युत् प्रवाहाप्रमाणे संचारत आहेत.

जगात जे देश औद्योगिक म्हणून गणले जात नाहीत त्या देशांतून या तिसऱ्या लाटेच्या आगमनानिशी पूर्वीच्या जुन्या झगड्यांचा बळेबळेच पुनर्जन्म घडलेला आहे.सहसा सरंजामशाहीशी संबंधित असलेला शेतीविषयक पुरातन लढा,'उद्योगा' च्या बळावर श्रेष्ठ ठरलेल्या 'उच्च' लोकांविरुध्द असणारे विचार-प्रवाह व ते धारण करणारे लोक-भांडवलदार किंवा समाजवादी,

औद्योगिकीकरणाच्या आगामी विलयाच्या संदर्भात एक वेगळाच आकार धारण करत आहे.आता तिस-या लाटेची संस्कृती अस्तित्वात येते आहे अशावेळी झपाट्याचे औद्योगिकीकरण नववसाहत - वादापासून किंवा गरीबीपासून सुटका करु शकणार आहे का ? किंवा त्याच्यावर कायम अवलंबून रहाता यावे अशी हमी देऊ शकणार आहे का ?

केवळ यांच विस्तृत पार्श्वभूमीवर आपणास मथळयांचा अर्थ लागू शकणार आहे.आपल्या जीवनात घडून येणाऱ्या बदलाच्या संयोजनाबाबतची उचित धोरणे आखणे आता शक्य होणार आहे.

हे मी लिहीत आहे अशावेळी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर इराणमधील उद्रेक व ओलीस प्रकरणे,दक्षिण कोरियातील कत्तली,

सोन्याचे वेगवान सट्टे,काळे लोक व ज्यू यांच्यात अमेरिकेत उडत असलेल्या चकमकी, पश्चिम जर्मनीने संरक्षण खर्चात केलेली मोठी वाढ लाँग आयलंडमधील जळिते,मेक्सिकोच्या आखातातील तेलाचा प्रचंड भडका,इतिहासात सर्वात मोठी ठरणारा अण्वस्त्रविरोधी मेळावा,रेडिओलहरीच्या ताब्याविषयी श्रीमंत व गरीब राष्ट्रात चालू असलेला लढा,अशा गोष्टींचे वृत्तांत आलेले आहेत,लिबिया,सीरिया आणि अमेरिका या देशांमध्ये धार्मिक पुनरुज्जीवनाच्या लाटा धडाक्याने उठत आहेत.नवफॅसिस्ट कल्पना पॅरिसच्या राजकीय 'कत्तली' चे 'श्रेय' स्वतःकडे घेत आहेत.आणि विजेवर चालणाऱ्या स्वयंप्रेरकांना आवश्यक असणाऱ्या तंत्रात मारलेल्या मुसंडीचा अहवाल 'जनरल मोटर्स' ने दिलेला आहेच.अशा तऱ्हेच्या तऱ्हतऱ्हेने विसंगत असणाऱ्या बातम्यांचे तुकडे एकात्मतेसाठी आणि संयोगासाठी टाहो फोडत आहेत.औद्योगिकीकरणाच्या रक्षणास सिध्द असलेले आणि त्याच्या जागी दुसन्या कशाची तरी स्थापना करण्यास उत्सुक असलेले यांच्यामध्ये भडकलेल्या तीव्र लढ्याची आपल्याला कल्पना आली म्हणजे जग जाणण्याची नवी गुरुकिल्लीच आपल्याला प्राप्त झाली,असे म्हणावे लागेल.याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखाद्या राष्ट्राची धोरणे आखत असू,किंवा मोठ्या संस्थांची धोरणे ठरवत असू,किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाची ध्येये पक्की करत असू;आपल्याला जुने जग बदलून टाकणारे नवे साधन मिळाले आहे.या हत्याराचा वापर करण्यासाठी,आपल्याला जुन्या औद्योगिक संस्कृतीकडे झुकणारे बदल,आणि नव्या संस्कृतीच्या आगमनाचा गौरव ठरणारे बदल यांच्यात असणारा फरक ओळखता यायला हवा.

थोडक्यात,आपल्याला दोन्ही जुनी व नवी-जिच्यात आपण जन्म घेतला ती औद्योगिक रचना असणारी दुसरी व आपण व आपली मुले जिच्यात वास करणार आहोत ती तिसरी संस्कृतीही समजायला हवी.

या पुढील प्रकरणात तिसरीच्या उद्भवाची पूर्वतयारी म्हणून आपण बदलाच्या पहिल्या दोन लाटांचे सूक्ष्म अवलोकन करणार आहोत.आपल्याला असे आढळून येईल की,दुसरी लाट संस्कृती ही अनेक घटकांची आपाततःघडून आलेली मिसळ नसून एकमेकांबर,एका अर्थी सूचक,परिणाम करणाऱ्या विभागांची ती एक निश्चित प्रणाली होती आणि औद्योगिक जीवनाचे मूलभूत नमुने देशादेशांतूत तेच एकसारखेच होते;मग या देशांचे सांस्कृतिक वारसे कोणते का असेनात,आणि त्यातील राजकीय मतभेद कसे का असेनात.आणि आजचे 'डावे' व 'उजवे' दोन्ही प्रकारचे 'प्रतिगामी' ह्याच संस्कृतीच्या रक्षणासाठी झगडून राहिले आहेत.आणि याच वेळी सांस्कृतिक बदलाच्या इतिहासातील तिसऱ्या लाटेने हेच जग बदलून टाकण्याचा इशारा दिलेला आहे. 

पहिले प्रकरण संपले…!!




5/19/26

लाटांची टक्कर / Collision of waves

तिसरी लाट अलविन टॉफलेर यांच्या Third Wave या पुस्तकाचा अनुवाद शरदिनी मोहिते यांनी केला आहे तर,प्रकाशक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ पुणे नोव्हेंबर १९९१ हे आहेत.याच पुस्तकातील लेख तीन भागामध्ये एप्रिल.२०२५.  मध्ये प्रकाशित झालेले आहेत. इथून पुढे क्रमशःहे संपूर्ण पुस्तक प्रकाशित केले जाईल.आपणा सर्वांचे पुनश्च धन्यवाद.विजय गायकवाड

निवेदन Request…

मानवजातीचे भवितव्य काय असेल हे जाणण्याच्या जिज्ञासेतून फ्युचरॉलॉजी किंवा फ्युचर स्टडीज् म्हणजेच भवितव्यशास्त्र या नव्या ज्ञानशाखेची तीसचाळीस वर्षांपूर्वी वाढ होऊ लागली.भारतात मात्र १९७० नंतर या नव्या ज्ञानशाखेचा विकास करण्याचे प्रयत्न सुरु झाले.एकविसाव्या शतकातील भारत कसा असेल याबद्दलची चित्रे तर अगदी अलीकडे रेखाटण्यात येऊ लागली भवितव्यशास्त्राच्या वाटचालीकडे सामान्य माणसांचेही लक्ष वेधण्यास कारणीभूत ठरलेल्या लेखकांमध्ये अल्विन टॉफलर या अमेरिकन लेखकास अग्रस्थान द्यावयास हवे.जुलै,१९७० मध्ये त्यांचे " फ्युचर शॉक " हे पुस्तक प्रसिद्ध झाले आणि ते इतके लोकप्रिय झाले की त्या पुस्तकाच्या लाखो प्रती खपल्या.१९२८ साली न्यूयॉर्कमध्ये जन्मलेल्या टॉफलरनी अनेक वर्षे वार्ताहर म्हणून काम केले आहे.१९८० साली त्याचे " द थर्ड वेव्ह" हे पुस्तक प्रकाशित झाले आणि त्याच्याही लाखो प्रती खपल्या.अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद करण्यात आले.जपानमध्ये या पुस्तकाने विक्रीचे उच्चांक मोडून विक्रम केला.भांडवलशाही तसेच समाजवादी देशांतील उद्योगप्रधान समाज ज्या पेचप्रसंगांना तोंड देत आहे त्याची कारणमीमांसा करण्याचा टॉफलरनी या पुस्तकात प्रयत्न केला असल्यामुळे आणि तो करताना जडजंबाल भाषेचा अवलंब न करता सोप्या भाषेत विश्लेषण केल्यामुळे त्यांचे पुस्तक जगभरच्या वाचकांना आवडल्याशिवाय राहिले नाही.

तंत्रविद्या,अर्थव्यवस्था,राजकारण,कौटुंबिक जीवन, ऊर्जेचा वापर यासारख्या क्षेत्रातील बदलामुळे " तिसरी लाट" आली असून तिची परिणती नव्या संस्कृतीच्या उदयात होण्याची चिन्हे दिसत आहेत असे टॉफलरना वाटते.शेतीचा उदय ही मानवी संस्कृतीच्या इतिहासातील पहिली लाट होती.सतराव्या शतकाच्या अखेरीस ती ओसरली आणि त्यानंतरच्या काळात औद्योगिक क्रांतीच्या रूपाने दुसरी लाट आली.तिचाही भर १९५० नंतर ओसरु लागला असून औद्योगिक दृष्टया प्रगत देशांनी आता तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची तयारी केली पाहिजे असे टॉफलरचे म्हणणे आहे. 

तिसऱ्या लाटेमुळे उदयाला येणाऱ्या युगात इलेक्ट्रॉनिक उद्योग,

अवकाश उद्योग,समुद्राच्या पोटात दडलेल्या खनिजांच्या आधारे विकसित झालेले उद्योग तसेच जीवोद्योग वगैरे नवनवोन उद्योगांना महत्व येणार आहे असे टॉफलरना वाटते.प्रसार माध्यमांचे विघटन व विकेंद्रीकरण होईल असे त्यांनी भाकित केले आहे. तिसऱ्या लाटेमुळे निर्माण होणाऱ्या नव्या युगात कुटुंबसंस्थेत कोणते बदल होतील,माहिती व ज्ञान यांना फार मोठे महत्व प्राप्त होणार असल्याने शिक्षण व्यवस्थेत कोणते फेरफार करावे लागतील वगैरे विषयांचाही टॉफलरने वेध घेतलेला आहे.जगभर वाचल्या गेलेल्या या पुस्तकाचे भाषांतर करण्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने श्रीमती शरदिनी मोहिते यांच्यावर सोपवली होती. त्यांनी केलेले भाषांतर वाचून टॉफलरच्या विचारांची मराठी वाचकांना तोंडओळख होईल असे वाटते.

य. दि. फडके,अध्यक्ष महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,मुंबई : ८ जानेवारी,१९९१

प्रास्ताविक

आजच्या काळात आपल्या नजरेसमोर नाचणाऱ्या मथळ्यांकडे आपण भयचकित होऊन पहात रहातो, कारण हाच तो काळ ज्यात दहशतवादी ओलिसांबरोबर जीवघेणा खेळ खेळत आहेत,तिसऱ्या महायुद्धाच्या वावड्या उठत असतानाच ठिकठिकाणची चलने कोसळू लागलेली आहेत,वकिलाती जळत आहेत,कित्येक देशांतून बंडखोर टोळ्यांतील सैनिक आपल्या बुटांच्या नाड्या बांधत उठावाला सज्ज होत आहेत.सोन्याची किंमत सर्व भीतींचे संवेदनशील भारमापक-सर्व विक्रम मोडत आहे.बँका हादरताहेत.महागाई आवाक्याबाहेर भडकते आहे.

आणि जगातील सरकारे हतबल होऊन गेलेली आहेत.आणि या पार्श्वभूमीवर धोक्याचा,दुर्देवांचा इशारा देणान्यांचे समूहगान स्मशान-गीतांनी वातावरण भरून टाकत आहे तथाकथित रस्त्यावरचा माणूग म्हणू लागला आहे. की जग वेडे झाले आहे. आणि तज्ञांच्या मते हे सर्व प्रवाह सर्वविनाशाकडेच जगाला घेऊन चाललेले आहेत.परंतु या पुस्तकात एकदम वेगळा दृष्टिकोण सादर करण्यात आलेला आहे.

पुस्तकात म्हटले आहे,की जग वेडे होत चाललेले नाही. आणि तसे पाहू जाता वरवर निरर्थक दिसणान्या या घटनांच्या,गोंगाटाच्या आणि खणखणाटाच्या खालच्या घरात आश्चर्यकारक आणि अव्यक्त अशी आशादायक घाटणी काम करते आहे ! हे पुस्तक त्या घाटणीबद्दल आणि त्या आशेबद्दलच आहे.

तिसरी लाट' हे पुस्तक ज्या लोकांना मानवीकहाणी संपुष्टात येणे तर राहू द्याच नुकतीच सुरू झाली आहे असे वाटते,

अशांकरिता लिहिलेले आहे.तिसरी लाट' हया पुस्तकात दृष्टिकोण आहे,की काही घटनांचा,

प्रक्रिर्याचा आणि तत्त्वांचा वापर एखादी संस्कृती करून घेत असते.आणि स्वतःचे एक पायाभूत उत्पत्ति-शास्त्र तयार करत असते;आणि त्याच्या आधाराने ती वास्तवाचे स्पष्टीकरण करत असते.

शिवाय स्वतःच्या अस्तित्वालाही न्याय देत असते.ह्या पुस्तकात एकमेकांशी टक्कर घेणाऱ्या लाटांचे रूपक योजण्यात आलेले आहे.अतिशय विसंवादी अशा माहितीचे सुसूत्रीकरण हा एकच या रूपकामागचा हेतु नाही;तर त्यायोगे विचारांचा गोंधळ नाहीसा होऊन स्वच्छ,प्रखर प्रकाशामध्ये आपल्याला माहीत असलेल्या गोष्टींचेच परंतु नितळ स्पष्ट चित्र आपल्याला दिसून येते. 

शरदिनी मोहिते…!!!

लाटांची टक्कर / Collision of waves

एक | महान संघर्ष ■■■

एक नवीच संस्कृती आपल्या जीवनात उदयाला येते आहे,आणि सर्वत्रच आढळणारे अविचारी लोक तिला दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.या नव्या संस्कृतीने आपल्या बरोबर नवीन प्रकारच्या कुटुंबरचना आणल्या आहेत;कामे करण्याच्या,

प्रेमाच्या,जगण्याच्या नव्या रीती आणल्या आहेत;नवेच अर्थशास्त्र आणले आहे,नवे राजकीय संघर्ष आणले आहेत;आणि या सर्वांहूनही विशेष म्हणजे नव्या स्वरुपाची जाण आणली आहे! या नव्या संस्कृतीचे काही अंश सध्या, आजमितीला अस्तित्वात आलेले आहेत.आणि लाखो लोकांनी आपले जीवन उद्याच्या तालाशो जुळवून घेण्यास सुरुवातही केलेली आहे.

इतर मात्र भविष्यकाळाला भ्यालेले आहेत,आणि निराशेच्या भरात जिवावर उदार होत,भूतकाळात निष्फळ झेपा घेत आपल्याला जन्म देणाऱ्या आणि आता मरु घातलेल्या जुन्याच जगाचे जतन करण्यात गढलेले आहेत.आपल्या जीवनकाळी या नव्या संस्कृतीचा उदय हीच एक सर्वात स्फोटक ठरेल अशी घटना होऊन राहिली आहे.

नजीकच्या भविष्यकाळाची समज आपल्याला देऊ शकणारी गुरुकिल्ली ठरेल अशी ही फार महत्त्वाची घटना आहे.अतिशय गहन अर्थ असलेली ही घटना दहा हजार वर्षापूर्वी शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी जीवनात उफाळलेल्या बदलाच्या पहिल्या लाटेच्या, किंवा औद्योगिक क्रांतीमुळे सर्व जग हादरवून टाकणाऱ्या,जीवनच जणू पालटून टाकणाऱ्या बदलाच्या दुसऱ्या लाटेच्या तोडीची आहे! आपण या तिसऱ्या लाटेची म्हणजेच पुढच्या मोठ्या बदलाची बाळे आहोत.

या अभूतपूर्व बदलाची पूर्ण ताकद किंवा त्याचा आवाका वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.काही जण प्रचंड अशा अंतराळ युगाबद्दल बोलतात,माहिती युग, इलेक्ट्रॉनिक युग,किंवा व्योमस्थ ग्रामाबद्दल बोलतात. 

झिबिग्न्यू ब्रेझिन्स्कीने ( हा शब्द पुस्तकात अस्पष्ट असल्याकारणाने खात्री करण्यासाठी गुगलचा वापर केला आहे.) म्हटले आहे,की आपण तंत्राधिष्ठित आणि इलेक्ट्रॉनाधिष्ठित युगाच्या उंबरठ्यावर आहोत.डॅनियल वेल या समाजशास्त्र्याने 'उद्योगोत्तर समाजाच्या अस्तित्वात येण्याबाबतचे वर्णन केले आहे. रशियाच्या भविष्यवाद्यांनी 'तंत्रशास्त्रीय क्रांती'ची भाषा केली आहे.मी स्वतः 'अति उद्योगशील समाज' या विषयावर आजवर खूप लिहिले आहे.परंतु माझ्या स्वतःच्या व्याख्येसह यातील कोणतीही व्याख्या अभिव्यक्तीला पुरेशी वाटत नाही.

एकाच तत्थ्यावर भर दिला जात असल्याने यापैकी काही शब्दसमूह आपली जाण विकसित करण्याऐवजी मर्यादितच करतात,काही जण ठामपणे प्रतिपादन करतात, की आपल्या जीवनात एक नवाच समाज कुठल्याही तणावाशिवाय किंवा झगड्याशिवायच अगदी सहजपणे अस्तित्वात येऊ शकेल.यातली कोणतीही व्याख्या आपल्यात वेगाने घडू पहाणाऱ्या बदलाच्या ताकदीबाबत,आवाक्याबाबत,चैतन्याबाबत किवा ते निर्माण करीत असलेल्या दबावाबाबत अगर संघर्षाबाबत काही सांगण्याच्या दृष्टीने केवळ सुरूवात करते आहे असे देखील वाटत नाही.

लवकरच मानवता प्रगतीच्या दिशेने प्रचंड झेप घेणार आहे.आजपर्यंत कधीही घडली नसेल एवढी प्रचंड सामाजिक उलथापालथ आणि सर्जनशील पुनर्रचना आता घडणार आहे तिची पूर्णपणे ओळख पटण्यापूर्वीच आपण लक्षणीय अशी नवीन संस्कृती उभारण्याच्या उद्योगाला लागलो आहोत.तिसच्या लाटेचा अर्थ हा आहे.

आतापर्यंत मानववंशाने बदलांच्या दोन लाटांचा अनुभव घेतलेला आहेच.या दोन्ही लाटांनी आपल्यापूर्वी अस्तित्वात असलेली संस्कृती मोठ्या प्रमाणात नाहीशी केली,पुसून टाकली आणि तिच्या जागी जीवनाचे असे नवे क्रम आणून बसवले की जे त्या पूर्वीच्या लोकांच्या कधी ध्यानीमनीही आले नसतील ! शेतीचा क्रांतिकारक शोध ही बदलाची पहिली लाट हजारो वर्षे उधाणत होती;तर औद्योगिक कांतीची दुसरी लाट केवळ तीनशे वर्षात काम करुन गेली.आता इतिहासाने म्हणजेच काळाने खूपच मोठ्या प्रमाणात वेग धारण केलेला आहे.आता येऊ पहाणारी बदलाची तिसरी लाट पूर्वीचा इतिहास पुसून टाकीत येत्या काही दशकातच पूर्ण होण्याची शक्यता आहे.त्यामुळेच अशा या स्फोटक काळात भूतलावर वास्तव्य असलेल्या आपणा सर्वांनाच या तिसऱ्या लाटेच्या आघाताचा जोर जाणवत आहे.

या तिसऱ्या लाटेचा परिणाम प्रत्येकावर होतो आहे. कारण ती आपली कुटुंबे उध्वस्त करते आहे;तिने आपल्या अर्थव्यवस्थेला भेलकांडून सोडले आहे,ती आपल्या राज्यसंस्था दुर्बल कंरुन सोडत आहे, तिच्यामुळे आपल्या मूल्यांच्या ठिकऱ्या ठिकऱ्या होत आहेत.मनुष्यांच्या एकमेकांशी असलेल्या निरनिराळया संबंधातील ताकदीला तिने जणू आव्हान देऊन ठेवले आहे.आज धोक्यात असलेल्या उच्च वर्गातील लोकांच्या अधिकारांना आणि खास हक्कांना ती हटकते आहे. उद्या उठणाऱ्या निरनिराळया ठळक संघर्षाना तिने जणू पार्श्वभूमी तयार करुन ठेवली आहे.

जुन्या पारंपरिक औद्योगिक संस्कृतीशी या नव्याने येऊ घातलेल्या संस्कृतीचा अनेक बाबतीत विसंवाद आहे. एकाचवेळी ती अतिशय प्रगत औद्योगिक कलाशास्त्राभिमुख आहे आणि तशीच औद्योगिकीकरणाला विरोध करणारीही आहे.ही तिसरी लाट आपल्याबरोबर खराखुरा जीवनमार्ग आणत आहे.नवीन असे विविध ऊर्जा उगम,ज्यांच्या भागांची जुळणी आगळी ठरेल अशा यंत्रांनी युक्त अशा कारखान्यांतून वापरल्या जाणाऱ्या उत्पादन पद्धती, विकेंद्रित कुटुंबे,जिला 'इलेक्ट्रॉनिक कुटीर' म्हणावे अशी नवीच एखादी प्रथा,स्वरुपात आमूलाग्र बदललेल्या भविष्यकालीन शाळा आणि संस्था अशा गोष्टी तिच्या पायाभूत गोष्टी ठरतील.उगम पावत असलेली ही नवीच संस्कृती आपल्यासाठी वर्तणुकीची, जीवनक्रमाची नवीच संथा उलगडेल आणि आपल्याला आदर्शवादाच्या,केंद्रीकरणाच्या पार नेईल.शक्ती,पैसा आणि ताकद यांच्या केंद्रीभवनाच्या देखील पार नेईल.

जुन्याला आव्हान देत ही नवीन संस्कृती नोकरशाह्या उलथून टाकेल,राज्याचे कामच कमी करुन टाकेल आणि साम्राज्यवादाच्या पलिकडे गेलेल्या या जगात अर्धस्वायत्त अर्थव्यवस्थेचा उदय घडवून आणेल. यासाठी आज आपल्याला माहीत आहेत त्यापेक्षा अधिक लोकशाहीयुक्त,अधिक परिणामकारक,अधिक साधीसुधी सरकारे आवश्यक आहेत.ह्या संस्कृतीचा जगाकडे पहाण्याचा स्वतःचा असा खास दृष्टिकोण आहे.काळाबाबत तसेच अवकाश,तर्क आणि कार्यकारणभाव यांच्या संबंधातही तिची स्वतःची अशी रीत आहे.आपल्या असेही ध्यानात येईल,की संस्कृतीच्या ह्या तिसऱ्या लाटेने उत्पादक आणि ग्राहक यांच्यामधली ऐतिहासिक दरी बुजवण्याच्या कामाला सुरूवात केलेली आहे.आणि ती उद्याच्या नव्या अर्थकारणाचा उदय घडवून आणत आहे.इतर कारणांप्रमाणेच याही एका कारणामुळे आपल्याकडून मिळणाऱ्या अक्कलहुषारीच्या मदतीने ती आपल्याला ज्ञात असलेल्या इतिहासातील पहिली खरीत्री 'मानवी' संस्कृती ठरेल.

क्रांतिकारी पूर्वपक्ष

वरवर विरोधाभास दर्शविणाऱ्या भविष्याच्या दोन प्रतिमांनी लोकांच्या मनावर पकड बसविलेली आहे. बऱ्याच लोकांची अशी समजूत आहे,की जे जग त्यांना परिचित आहे,ते आहे तसेच कायम राहणार आहे. त्यामुळे आता आपल्या पुढ्यात ठाकलेल्या अगदी नव्याच जीवनमार्गाची त्यांना कल्पनाच येत नाही;संपूर्ण नव्या संस्कृतीची तर गोष्टच सोडा.एक मात्र खरे की काहीतरी बदल घडतोय हे त्यांना समजते आहे,पण त्यांना वाटते,की हे बदल नाहीसे होऊन जातील, आपल्याला परिचित आलेल्या आर्थिक चौकटीत किंवा राजकीय प्रणालीत काही बदल होणार नाही.त्यांना असा विश्वास वाटतो,की भविष्यातही आपल्याला वर्तमानच आढळत राहील.साधी सरळ अशी ही विचारसरणी वेगवेगळ्या प्रकारांनी प्रकट होते.एका पातळीवर ती गोष्ट उद्योजक,शिक्षक, पालक राजकारणी यांनी घेतलेल्या निर्णयामागच्या, विशेष परीक्षण न केलेल्या कल्पनेच्या स्वरूपात दिसते. त्यापेक्षा वरच्या दिखाऊ किंवा कृत्रिम सफाई प्राप्त झालेल्या पातळीवर ती संख्याशास्त्र कॉम्प्युटरने पुरवलेला पूर्वपक्ष आणि भविष्यवेत्त्याच्या निरर्थक बोलण्याचा वेष घालून येते.यातल्या कुठल्याही प्रकाराने पाहिले तरी भविष्यकालीन जग प्रामुख्याने,'आहे तसेच दिसते.ओद्योगिकीकरणाची दुसरी लाट जगाला अक्षरशः पुरून उरली आहे

अलिकडे घडलेल्या काही घटनांनी मात्र भविष्यकालीन जगाची ही ठाम प्रतिमा मोठ्या प्रमाणात हादरवून टाकलेली आहे.एकामागून एक संकटे येत राहिली, मथळे ठळकपणे कडाडत राहिले,इराण भडकला, माओला उघड विरोध करण्यात आला,तेल किमती आकाशाला भिडल्या,महागाई वेड्यासारखी भडकली, दहशत-वाद पसरला,सरकारे अशा गोष्टींवर काबू ठेवण्यात अयशस्वी झाली आणि अशी निराशाजनक उदासवाणी दृश्ये उत्तरोत्तर लोकप्रिय होत गेली.जाणि अशा प्रकारे सतत मिळत रहाणाऱ्या अशा वाईट बातम्यांवर विनाश चित्रित करणारे चित्रपट,बायबल कथांवर आणि प्रतिष्ठित विचारवंतांनी प्रकाशित केलेल्या दुःस्वप्नवत् पटकथा,अशा सर्व मसाल्यावर पोसले गेलेले बहुसंख्य लोक अशा निर्णयाप्रत येतात की भविष्यच संभवत नसल्यामुळे आजचा समाज पुढे भविष्यात कसा असेल याची कल्पना करणेच शक्य नाही.त्यांच्या दृष्टीने महाप्रलयंकारी युद्ध काही मिनिटांच्या अवकाशावर येऊन ठेपले आहे.पृथ्वी तिच्या घोर विनाशाप्रत येऊन ठेपली आहे.

भविष्यकाळाच्या हया दोन कल्पना वरवर पाहताना एकदम वेगळ्या वाटतात परंतु त्यांचे दोषीचे समान असे मानसिक आणि राजकीय परिणाम संभवतात.दोन्ही कल्पनांच्या प्रभावामुळे कल्पनाशक्ती व इच्छाशक्ती पांगळी होऊन जाते.

उद्याचा समाज म्हणजे आज जे काही आहे त्याचीच खूप वाढवलेली अशी आवृत्ती असेल तर मग त्याच्यासाठी फार थोडे असे काही आपल्याला करावे लागेल.उलट,आपल्या डोळयादेखतच समाज विनाश पावणार असेल तर आपण काहीच करू शकत नाही. थोडक्यात,भविष्याकडे पहाण्याच्या या दोन्ही विचारसरणी आपल्याला अलिप्त आणि अकर्तृत्ववान करतात.दोन्हीही आपल्याला अकर्मात भिजवून टाकतात.तरी देखील आपले काय घडते आहे,याचा विचार करीत असताना साधे सरळ 'पानिपत' किवा तसलाच दुसरा एखादा पर्याय एवढीच मर्यादा श्रापल्याला असणार नाही.'उद्या' चा विचार करण्याचे आणखी कितीतरी स्वच्छ आणि विधायक मार्ग आहेत. हे मार्ग आपल्याला भविष्यासाठी तयार करतील आणि मुख्य म्हणजे वर्तमान बदलण्याच्या दृष्टीने मदत करतील

मी ज्याला' क्रांतिकारी पूर्वपक्ष' म्हणतो,त्याच्यावर हे पुस्तक आधारलेले आहे.त्याची कल्पना अशी आहे की, आगामी दशकामध्ये जरी खूप चढउतार होणार असले, वादळे उठणार असली,कदाचित् सर्वदूर पसरणारी हिंसाही अस्तित्वात येणार असली तरी देखील आपण स्वतःचा पूर्णपणे नाश होऊ देणार नाही,करून घेणार नाही.त्याची अशीही कल्पना आहे,की आपण जे धक्कादायक बदल सध्या अनुभवतो आहोत,ते गोंधळाचे किंवा निरुद्देश्य नाहीत,तर ते उत्तम,स्वच्छ आणि सरळ कित्ता तयार करणारे आहेत शिवाय त्याची अशी कल्पना आहे की,हे बदल आपल्या जीवनाच्या, कामाच्या,

खेळण्याच्या,विचाराच्या धाटणीत जो प्रचंड बदल होतो आहे,त्यात भर घालत आहेत;आणि त्यामुळे हवासा वाटणारा शहाणा,आणि समजदार भविष्यकाळ शक्य आहे.तेव्हा थोडक्यात,जे घडणार आहे ते या प्रस्तावानंतरच.आणि आता जे घडत आहे ते म्हणजे इतिहासातील मोठीच झेप ठरणारी जागतिक स्वरूपाची एक क्रांतीच होय.

हेच थोडे वेगळया भाषेत सांगावयाचे तर असे म्हणता येईल की,हे पुस्तक या कल्पनेतून झरत गेले आहे,की आपण एका जुन्या संस्कृतीतील शेवटच्या पिढीपैकी आहोत,आणि नव्या संस्कृतीच्या पहिल्या पिढीपैकी ठरणार आहोत.आपल्याला व्यक्तिशःजो गोंधळ,ज्या यातना,परिस्थितीच्या पूर्ण जाणिवेचा जो अभाव अनुभवावा लागत आहे,त्याचे मूळ आपल्यातल्या झगड्यात आहे,आपल्या राजकीय संस्थांत आहे मरू घातलेल्या संस्कृतीच्या दुस-या आणि जन्माला येत असलेल्या व धडाक्यात आपली जागा घेऊ पहाणाऱ्या तिसच्या संस्कृतीच्या लाटेतील संघर्षात आहे.

आणि ज्या वेळी आपल्याला हे समजेल,त्या वेळी आपल्याला एरव्ही निरर्थक वाटणाऱ्या कितीतरी घटना अनाकलनीयही वाटू लागतील.बदलाची एक विस्तृत घडण आपल्यापुढे स्पष्ट होईल.

अस्तित्वासाठीची धडपड पुनः शक्य होईल,आणि अर्थपूर्ण वाटू लागेल.थोडक्यात हा क्रांतिकारी पूर्वपक्ष आपली बुद्धी आणि इच्छाशक्ती मुक्त करून टाकतो.

आघाडीची धार

आपल्या पुढघात असलेले हे बदल क्रांतिकारी आहेत. एवढेच म्हणून मात्र भागणार नाही.कारण त्यांच्यावर ताबा मिळवून त्यांना दिशा दाखविण्यापूर्वी आपणास त्यांची ओळख करून घेऊन त्यांचे योग्यप्रकारे पृथःवकरण करण्यासाठी नवा दृष्टिकोण बाळगणे आवश्यक आहे.त्याच्याशिवाय आपल्याला यश येणार नाही.याचा एक परिणामकारक नवा मार्ग लाटेच्या आघाडीचे सामाजिक पृथःक्करण हा असेल.या रीतीने आपण सतत उलगडत जाणाऱ्या बदलाच्या लाटांच्या रूपाने इतिहासाकडे पाहू शकू.आणि प्रत्येक लाटेची आघाडीची धार आपल्याला कुठे नेत आहे,याचा विचार करु शकू….अपुर्ण हा शिल्लक बाग पुढील लेखात…!



5/17/26

पावसाचं झाड : एक सुंदर संधिप्रकाश / Rain tree: a beautiful twilight

मी कोइमतूर फॉरेस्ट कॉलेजमध्ये शिकत असताना १९५८ साली पावसाच्या झाडाचा पहिला परिचय झाला.दर आठवड्याला आम्हा वनाधिकाऱ्यांना वृक्षांच्या ओळखणीचे पाठ देण्यासाठी कोइमतूर शहराच्या परिसरात असणाऱ्या बागा,उद्यानं आणि कृषी महाविद्यालयं यांच्या आसमंतात नेलं जाई.

कोइमतूर तसं हरित शहर होतं.नारळींच्या झाडीतून डोकावणारी लाल कौलारू घरं,घरांपुढं फणसांची आणि आंब्यांची सावली,

बागेत लावलेली नाना त-हेची फुलझाडं,तसंच शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी प्रत्येक ऋतूत फुलणाऱ्या वृक्षांच्या रांगा आणि आल्हाददायक हवामान यामुळं माझं तेथील दोन वर्षांचं वास्तव्य मोठं आनंददायी झालं होतं.कोइमतूरमधील एका उद्यानात या पर्जन्य वृक्षाचं पहिलं दर्शन झालं.आमच्या वनाधिकारी शिक्षकानं या झाडाकडे बोट दाखवून त्याचं लॅटिन भाषेतील नाव सांगितलं : 'Pithecolobium saman.' यातील पहिल्या शब्दाचा अर्थ या झाडाला येणाऱ्या शेंगांशी संबंधित आहे.त्या माकडाच्या कानांसारख्या दिसतात. स्पॅनिश भाषेत त्याचं नाव आहे Zaman.त्याचा अपभ्रंश 'Saman.' त्या झाडाचं इंग्रजी नाव आहे 'रेन ट्री' म्हणजे पावसाचं झाड पर्जन्य वृक्ष.आमचे वनाधिकारी शिक्षक हरिसिंगानी सर वृक्षांची अशी काव्यमय ओळख करून द्यायचे.

त्यामुळं वृक्षांची शास्त्रीय नावं लक्षात ठेवायला अवघड असूनही ती सहज आठवणीत राहात.

मी त्या उंच भव्य झाडाकडं पाहात होतो.सारं झाड हिरव्यागार दाट पानांनी भरून गेलेलं.

तेवढ्यात सर म्हणाले,

'इतक्या दुरून पाहू नका.पुढं जा.त्या झाडाला स्पर्श करा.त्याची साल पहा.पानं हातात घेऊन त्यांची रचना पहा.फुलांचा रंग-आकार बघा.छताचं निरीक्षण करा.फांद्यांचे आकार पहा.एवढं जवळून निरीक्षण केल्यावर ते झाड तुमच्या कायमचं स्मरणात राहील.'

इथल्या रस्त्याच्या कडेनं लावलेली ही झाडं वाऱ्या वादळाला तोंड देत या झाडांनी आपला आकार कायम ठेवला होता.

हरिसिंगांनी सर पुढं सांगत होते,

'हे झाड वाढतंही जलद.मूळचं अमेरिकेतील.सिलोनी लोकांनी इकडं आणलं.तिथून ते भारतात आलं.त्याचं कारण वेगळं होतं.रेल्वेच्या इंजिनासाठी मंद गतीनं जळणारं इंधन लागतं,ते त्या झाडापासून उपलब्ध होतं.'माझ्यासमोरच्या झाडाची उंची आम्ही 'अ‍ॅबनी लेव्हल'नं मोजली,तर ती सत्तर फूट भरली. त्या झाडाचा आकार छत्रीसारखा,बुंध्यापासून निघालेल्या फांद्या छत्रीच्या काड्यांसारख्या उंच जाऊन त्यांनी वृक्षाच्या छताचा डोलारा तोलून धरला होता.पानोठ्याकडं पाहिलं,की हिरव्या मोरपिसाऱ्याची आठवण येई,पानं लांब असून देठाचा अभाव,शेवटी शेवटी ती अधिक मोठी आणि बाकदार होतात.

हवामानाप्रमाणं पानांची स्थिती बदलते.सूर्याच्या पूर्ण प्रकाशात ती जमिनीशी समांतर आडवी होऊन घनदाट छत उभं करतात.त्यातून क्वचितच एखादा उन्हाचा कवडसा पाझरतो.पावसाळी ढगाळ हवामानात आणि रात्री त्यांची पानं लाजाळूच्या पानांसारखी मिटलेली असतात.अशा रीतीनं पानं मिटली,की मला या देशात ते पावसाच्या आगमनाचं सूचक मानतात.म्हणून त्याचं नाव ‘रेन ट्री' किंवा पावसाचं झाडं.उन्हाळ्यात फांद्यांच्या अग्रावरील पुष्पदंडावर फिक्या गुलाबी मंजिऱ्यांचे गुच्छ दिसू लागतात.ते रेशमी गोंड्यासारखे वाटतात.या ऋतूत वृक्षाखालून येता-जाता फुलांचा मंद गंध दरवळू लागतो झाडाला येणाऱ्या शेंगांत मऊ,गोड गर असतो.म्हणून खारी या शेंगांबर फार लड्डू असतात.

महाराष्ट्रातील वनविभागाची वनात असणारी जुनी विश्रामगृहं पाहिली,तर आपल्या ध्यानात एक गोष्ट येईल की,ती मुख्य रस्त्यापासून आत एक-दोन किलोमीटर अंतरावर आहेत.ती उंचावर बसली आहेत.आत वनविश्रामगृहाकडं जाणारा रस्ता (अप्रोच) ही एक सुंदर कल्पना आहे.या वाटेनं चालू लागलात,की रस्त्याच्या दुतर्फा पावसाची जुनी झाडं उभी असतात.त्यात मधूनच शिरीष वृक्षांचं मिश्रण असलं,तरी तीही त्यात सहज विरून गेलेली असतात.ती दोन्ही झाडं दिसायला सारखी म्हणून पावसाचं झाड 'विलायती शिरीष' म्हणूनही ओळखलं जातं.पावसाच्या झाडाप्रमाणंच शिरीष वृक्षांवर नाजूक फुलांचा बहर आलेला असतो. झाडावरील गतवर्षाच्या शिरीषाच्या शेंगांच्या पापडीमधील बी हवेमुळं रुणुझुणु वाजत असतं. पुष्पांचा सुगंध आसमंतात दरवळलेला असतो.त्या वृक्षांच्या दाट सावलीतून मी हळूहळू विश्रामगृहाकडं जाऊ लागतो.दूर पावसाच्या झाडांच्या हिरव्यागार राईतून तांबड्या कौलांचं छप्पर डोकावू लागतं.

तिथं पोहोचल्यावर विश्रामगृहापुढील हिरवळीवर उभं राहून सुंदर हिरवळ पाहता पाहता डोळे निवू लागतात. अशी गालिच्यासारखी मुलायम हिरवळ फक्त पर्जन्यवृक्षाखालीच येऊ शकते.झाडाची ही उपयुक्तता आणि सौंदर्य ज्या वनाधिकाऱ्यानं जाणलं,तो सौंदर्यदृष्टीचाच असणार !

'हिरवळीवर वेताच्या खुर्चा ठेवलेल्या.प्रवासामुळं थकल्यानं मी खुर्चीत बसून समोर पाहतो,तर घनदाट जंगल असलेल्या पर्वतांच्या रांगा निळ्या होत होत क्षितिजावर विलीन झालेल्या,रानपाखरांची सुस्वर गाणी ऐकतच मी चहा घेत घेत समोरच्या दृश्याकडं पाहात असे.पावसाच्या वृक्षांनी सुशोभित असलेली राई बघत राहणं हा एक विलक्षण सौंदर्यानुभव आहे. 

हिवाळ्यातील एका सायंकाळी मी हिरवळीवर बसून या दृश्याकडं पाहात होतो.हिवाळ्यात सायंकाळी लवकर अंधारू लागतं,

संधिप्रकाश अल्पकाळ टिकतो.दिसतो, न दिसतो.तोच काळोखात विलीन होतो,परंतु मला समोर एक अभूतपूर्व देखावा दिसत होता.संधिप्रकाशाची वेळ निघून गेल्यावर पुन्हा तिथं जिकडे तिकडं सुंदर संधिप्रकाश दिसत होता.

मला कबीराच्या दोह्याची आठवण झाली.

सब अंधेरा हट गया। दीपक देखा माही।

हा अनुभव मी माझ्या रसिक मित्र-मैत्रिणींबरोबर घेतला आहे.परंतु त्यांना त्यातील गूढ सांगितल्याशिवाय सृष्टीतील ही किमया त्यांच्या लक्षात येत नसे.एकदा त्यांच्या ध्यानात आलं,की मग शब्दांची गरज नसे.सूर्य आकाशात प्रकाशत असताना एकाएकी आभाळ येऊन सूर्य दिसेनासा व्हावा,काही वेळानं विरळ ढगांआडून प्रकाश पाझरावा,पावसाचा नुसताच शिडकावा व्हावा,असा अलौकिक सुंदर परिणाम सभोवताली दृगोचर होत होता.त्यामुळंच पावसाच्या झाडाभोवतालचा सारा परिसर सदा हिरवागार दिसतो.

एकदा असाच मी सायंकाळी हिरवळीवर बसून समोरच्या दृश्याकडं पाहात होतो.इतक्यात माझ्या अंगावर पाण्याचे तुषार पडावे,तसा भास झाला.मी आजूबाजूला,वर आणि खाली आश्चर्यानं पाहू लागलो. खरं म्हणजे,ते पाण्याचे तुषार झाडावरूनच पडत होते. फांद्यांतून येणाऱ्या तिरप्या किरणांत ते जलतुषार आणखी सुंदर दिसत होते.

मी चौकीदाराला हाक मारली.तो अदबशीरपणे पुढं येऊन उभा राहिला.पाण्याचे तुषार त्याच्याही अंगावर पडत होते.तो देखील आश्चर्यानं आजूबाजूला पाहात होता.मी त्याला म्हणालो,

'झाडावर चढून पहा तरी,काय बरसतंय ते.'

तो झरझर वरच्या फांदीपर्यंत पोहोचला.आश्चर्यचकीत होऊन म्हणाला,

'अबब ! साहेब बघा तरी !'

त्यानं फांदी एका हातानं हलविली.तोच पंख असलेल्या कीटकांचा थवाच्या थवा भर्रकन वर उडाला.काही झाडाच्या खोडावर बसले.

मी जवळून पाहिलं,तर ते रातकिडे होते.आता ते रातकिडे उडून दुसऱ्या झाडाकडं गेले,तसा वरून येणारा पाऊस थांबला. चौकीदारानं एक फांदी खाली टाकली.

खाली पडलेल्या फांदीची साल मी काढली.त्या फांदीचं 'पॉकेट लेन्स'मधून निरीक्षण केलं.तेव्हा असं आढळून आलं की,त्या फांदीवर रातकिड्यांनी सूक्ष्म छिद्रं आपल्या सोंडांनी पाडली होती.ते कीटक झाडांतून वाहणाऱ्या जीवनरसाचं शोषण करीत होते.शोषणक्रिया इतक्या वेगानं चालली होती,की सोंडेकडं येणारा रसाचा प्रवाह वेगानं वाहात येऊन पावसाच्या रूपात खाली पडत होता.तेव्हा माझ्या लक्षात आलं,की याला पावसाचं झाड का म्हणतात.(पाखरमाया,मारुती चितमपल्ली, प्रकाशक- साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी,नागपूर)

पावसाची ही झाडं कधी जंगलात आढळून येत नाहीत. विस्तृत अशा हिरवळीच्या वा मैदानाच्या कडेनं वाढणारं तसेच,शोभेचं आणि सावलीचं झाड असल्यामुळं उद्यानातून आणि बागांतून ते दिसून येतं रातकिड्यांचा हा खाद्यरस फक्त पावसाच्या झाडातच असतो,असं नव्हे.नवेगावबांध,नागझिरा आणि मेळघाट इकडील वनांतून भटकत असताना साग,धावडा,कुसुंब इत्यादी वृक्षांवरूनही असेच पाण्याचे तुषार अंगावर पडण्याचा अनुभव मी अनेक वेळा घेतला आहे.परंतु रातकिड्यांना पावसाचं झाड अधिक आवडत असावं.या कीटकांना आकर्षित करायचं,तर पावसाची झाडं लावायला हवीत. त्यामुळं आजूबाजूचा परिसर हिरवा राहीलच,परंतु रातकिड्यांच्या संगीताचाही लाभ घेता येईल.

◆◆◆ समाप्त ◆◆◆