* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

9/15/26

भाग 3 — डीएनए, माहिती आणि जीवनाचे रहस्य Part 3 — DNA, Information and the Mystery of Life 

भाग ३ — आरएनए जग आणि लुकाचा प्रवास

Part 3 — The RNA World and the Journey to LUCA

१९४३मध्ये बेलचले, ब्रिटनमध्ये एक हुशार गणितज्ञ अ‍ॅलन ट्युरिंग त्याच्या अत्यंत भेदक अंतर्दृष्टीचे प्रत्यक्ष वास्तवात अवतरणे अनुभवत होता.

त्याचे म्हणणे असे होते की, अंकांनी अंकाची गणना होते. त्याच्या या तत्त्वावर आधारित कोलोसस नावाचा एक संगणक जर्मन सैन्याच्या लॉरेनट्झ विसंकेती यंत्राचे संदेश उलगडण्यासाठी बनविला होता.

रूपभेदयोग्य वा परिवर्तनीय क्रमादेश (प्रोग्राम) असलेले 'कोलोसस' एक जागतिक यंत्र होते. त्या वेळी जीवनाचं रहस्य आणि हे यंत्र यांच्या संबंधाबद्दल कोणालाही कल्पना नव्हती. मात्र ट्युरिंग त्यातल्या त्यात जीवन रहस्याच्या जवळ पोहोचला असावा.

आनुवंशिकता ही रूपभेदयोग्य असा संग्रहित क्रमादेश आहे, आणि चयापचय हे सार्वत्रिक यंत्र आहे. यांना जोडणारा दुवा म्हणजे संकेत (कोड), एक अमूर्त संदेश आहे. हा संदेश एका रासायनिक, भौतिक वा अपदार्थिक रूपातही समाविष्ट होऊन अवतीर्ण होतो. त्याचे रहस्य म्हणजे तो स्वतःची प्रत स्वतःच तयार करू शकतो.

या जगातील संसाधने वापरून स्वतःचे पुनरुत्पादन करू शकणारे काहीही 'जिवंत' मानले जाते. या काहीही जिवंत असलेल्यांचे स्वरूप म्हणजे अंकात्मक संदेश, एक अंक, एक लिपी, एक शब्द असे असू शकते.

क्लाइड शेनॉन नावाची एक शांत, एकांतप्रिय हुशार व्यक्ती न्यूजर्सीमधील प्रिंसटनमध्ये, याच वेळी काही काळापूर्वी मनात आलेल्या एका कल्पनेवर विचार करीत होती.

ही कल्पना काय होती बरे? ती अशी होती की, माहिती आणि अपक्षय या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि दोन्हींचा संबंध हा ऊर्जेशी आहे.

कमी अपक्षय असलेल्या यंत्रणेत जास्त माहिती साठवलेली असते. वाफेच्या इंजिनामध्ये भरपूर माहिती सामग्री असल्यामुळे ते ज्वलन होणाऱ्या कोळशापासून मिळणाऱ्या ऊर्जेला जुंपून तिचे रूपांतर परिभ्रमण गतीमध्ये करू शकते.

त्याचप्रमाणे मानवी शरीरही कार्य करते. शेनॉनच्या मेंदूमध्ये अॅरिस्टॉटलची माहिती आणि न्यूटनचे भौतिकशास्त्र यांची गळाभेट झाली होती.

ट्युरिंगप्रमाणेच शेनॉननेही जीवशास्त्राबद्दल विचार केला नव्हता. परंतु जीवन वा जिवंतपणा, म्हणजे काय? या प्रश्नासंबंधीची त्याची अंतर्दृष्टी जास्त सयुक्तिक होती. जीवन म्हणजे डीएनएमध्ये लिहिलेली अंकात्मक माहितीच आहे.

जीवनाच्या उत्पत्तीच्या अगदी सुरुवातीला जो आदि शब्द अवतरला होता, तो डीएनए नव्हता. जीवन थोडे स्थिरस्थावर झाल्यावर श्रमाची विभागणी दोन विभिन्न कार्यामध्ये झाली.

एक म्हणजे रासायनिक कार्य (चयापचय) आणि दुसरे म्हणजे माहिती संग्रहविषयक कार्य (पुनरुत्पादन). या टप्प्यानंतरच डीएनएचे आगमन झाले.

मात्र डीएनएमध्ये जी शब्दांची नोंद असते, ती तंतोतंतपणे अनेक युगांमधून वर्तमानात संक्रमित झाली.

सूक्ष्मदर्शक यंत्राच्या खाली मानवाच्या डिंबामधील केंद्रक ठेवला आहे, अशी कल्पना करा. तुम्हाला शक्य असल्यास सर्वांत मोठे डाव्या बाजूला व सर्वांत लहान उजव्या बाजूला अशा आकारमानाप्रमाणे तेवीस गुणसूत्रांची मांडणी करा; सर्वांत मोठ्या गुणसूत्राला गुणसूत्र १, हे नाव पूर्णतः सहजपणे व अहेतुकपणे दिले गेले आहे.

ही गुणसूत्रे भिंगाच्या साह्याने जवळ आणल्यास प्रत्येक गुणसूत्राला एक लांबट व एक छोटी भुजा असल्याचे दिसून येईल. एक चिमूटभर आकाराच्या बिंदूने ते एकमेकांपासून अलग होतात. या बिंदूला सेंट्रोमियर असे म्हणतात.

त्याच्या नजीक १२० अक्षरांचा अनुक्रम दिसेल, As, Cs, Gs व Ts यांचा! पुन्हा पुन्हा पुनरावृत्तीत होणारा. दोन पुनरावृत्तींमध्ये यादृच्छिक मजकुराचा भाग असतो.

परंतु १२० अक्षरांचा परिच्छेद मात्र ओळखीच्या संगीतातल्या धुनीसारखा पुन्हा पुन्हा येत राहतो, शंभरपेक्षा जास्त वेळा. हा छोटा परिच्छेद इतक्या निकट असतो की आपल्याला मूळ शब्दाचे पडसाद ऐकू येऊ शकतात.

हा परिच्छेद म्हणजे एक छोटे जनुकच. हे जनुक बहुदा मानवी शरीरातील सर्वांत क्रियाशील जनुक असावे. याची एकशेवीस अक्षरे अव्याहतपणे छोट्या आरएनएच्या तंतूमध्ये छायाप्रतीत होतात. या प्रतीला 5S आरएनए म्हणतात.

प्रथिनाच्या गुच्छाबरोबर आणि इतर आरएनएच्या बरोबर या आरएनएचा संयोग होऊन एक निगुतीने विणलेले, एकत्र गुंफलेले रायबोसोम नावाचे यंत्र तयार होते.

त्याचे कार्य म्हणजे डीएनएमधील पाककृतीचे भाषांतर प्रथिनामध्ये करणे. (आणि प्रथिने डीएनएला स्वतःची प्रतिकृती करण्याची क्षमता प्रदान करतात).

सॅम्युल बटलरच्या शब्दांत सांगायचे तर, एक प्रथिन म्हणजे एका जनुकाचा दुसरे जनुक तयार करण्याचा मार्ग, तर एक जनुक म्हणजे एका प्रथिनाचे दुसरे प्रथिन तयार करण्याचा मार्ग होय.

स्वयंपाकाला पाककृतीची गरज असते, आणि पाककृतीला स्वयंपाकी लागतो! जीवनामध्ये प्रथिन आणि डीएनए या दोन प्रकारच्या रसायनांच्या परस्परक्रियेचा खेळ चालू असतो.

रसायनत्व, जिवंतपणा, श्वासोच्छ्वास, चयापचय आणि वर्तन या सर्वांचे प्रतिनिधित्व प्रथिने करतात. जीवशास्त्रीय भाषेत यालाच दृश्यरूप (फिनोटाइप) म्हणतात.

तर माहिती, पुनरुत्पादन, प्रजनन व समागम यांचे प्रतिनिधित्व डीएनए रेणू करतो. जीवशास्त्रज्ञ याला वंशप्रकृती (जिनोटाइप) म्हणतात.

यातील कोणी एक दुसऱ्याशिवाय अस्तित्वात असू शकत नाही. हे आधी कोंबडी का आधी अंडे? (डिंब) या प्रसिद्ध कोड्यासारखे आहे. आधी डीएनए का आधी प्रथिन?

डीएनए हा एक हतबल, निष्क्रिय असा, एकही रासायनिक क्रिया उत्प्रेरित करीत नसणारा गणिती तुकडा असल्याने, तो सर्वप्रथम अस्तित्वात येणारा रेणू नसणार.

पण प्रथिन रेणूही तसा नसणार, कारण तो तर एक निखळ रसायन असून स्वतःची हुबेहूब प्रत तयार करण्यास असमर्थ आहे.

डीएनएने प्रथिनांचा किंवा प्रथिनांनी डीएनएचा शोध लावला असणे अशक्य वाटते. जर शब्दांनी जीवनाच्या धाग्यावर त्यांच्या पुसटशा खुणा मागे ठेवल्या नसत्या, तर हे गोंधळात टाकणारे कोडे सुटलेच नसते.

आज आपल्याला माहीत आहे की अंड्याचे आगमन कोंबडीच्या फार आधी झालेले आहे. (सर्व पक्ष्यांच्या आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे पूर्वज अंडी घालत होते.) आरएनए प्रथिनांच्या पूर्वी आल्याचे जास्तीत जास्त पुरावे मिळत आहेत.

डीएनए व प्रथिने या दोन जीवरेणू जगताला जोडणारा दुवा आहे, आरएनए जीवरेणू!

डीएनएच्या मुळाक्षरातील संदेशाचे भाषांतर प्रथिनांच्या मुळाक्षरांमध्ये करण्यासाठी आरएनएचे प्रामुख्याने उपयोजन केले जाते.

परंतु ज्या पद्धतीने त्यांचे वर्तन घडते, त्यावरून प्रथिने व डीएनए या दोन्ही रेणूंचाही पूर्वज आरएनए असावा यात तिळमात्र शंका उरत नाही.

डीएनए म्हणजे दिल्ली (राजधानी) असेल तर आरएनए म्हणजे भारत (देश) आहे.

सुरुवातीला ज्या आदि शब्दाबद्दल आपण बोलत होतो तो शब्द आरएनए आहे.

आरएनएच्या (प्रथिन व डीएनएपेक्षाच्या) प्राधान्यक्रमामुळे आणि प्राथमिकतेमुळे या रेणूने काही छोट्या खुणा मागे ठेवल्या आहेत.

आजही अप्रत्यक्षपणे डीएनएमधील घटक आरएनएमधल्या घटकांमध्ये फेरबदल करून तयार केले जातात. शिवाय डीएनएमधील T अक्षरे आरएनएमधील U अक्षरांपासून बनलेली आहेत.

बरीचशी आधुनिक विकरे जरी प्रथिनांची बनलेली असली, तरी त्यांच्या कार्यप्रवणतेसाठी ती आरएनएवर अवलंबून असतात.

याशिवाय कुणाच्याही साहाय्याशिवाय आरएनए स्वतःची प्रत तयार करू शकतात. (जे की डीएनए व प्रथिने करण्यास असमर्थ आहेत.)

त्यांच्यासाठी योग्य घटकांचा पुरवठा केल्यास ते घटकांना एकत्रित बांधून त्यापासून एक संदेश तयार करतील.

जर आपण पेशीच्या अंतरंगात नजर टाकली, तर आपल्याला दिसेल की सर्वप्रथम मूलभूत कार्यांसाठी आरएनए असणं गरजेचं आहे.

जनुकापासून आरएनएच्या स्वरूपात असलेला संदेश कोण घेते? तर त्यावर अवलंबित असलेले विकर!

संदेशवाहक (मेसेंजर) आरएनए तो संदेश घेऊन आरएनए व प्रथिनांनी बनलेल्या रायबोसोम या यंत्राजवळ जातो. येथे संदेशाचे प्रथिनांच्या भाषेत भाषांतर होते.

यासाठी संक्रमक (ट्रान्सफर) आरएनए हा दुभाषी लागतो. तो प्रथिनांच्या भाषेतील मुळाक्षरे म्हणजे अमिनो आम्ल हेरून त्यांना रायबोसोम या प्रथिने बनवणाऱ्या जागेवर आणतो.

या सर्व घटकांच्या जनुकातील संदेशाचा (ज्याची मुळाक्षरे A, G, C वा आहेत) प्रथिनांच्या (ज्याची मुळाक्षरे बावीस प्रकारची अमिनो आम्ल आहेत) भाषेत भाषांतर होते.

यापलीकडे आरएनए एक उत्प्रेरक म्हणूनही कार्य करू शकतो (जे डीएनए करू शकत नाही); जसे की दुसऱ्या आरएनएसहित इतर रेणूंना दुभंगणे, तसेच त्यांना जोडणे.

आरएनए या रेणूंचे विभाजन करू शकतो, त्यांची टोके एकत्र बांधू शकतो, स्वतःचे काही बांधणी ठोकळे वा ठसे बनवू शकतो आणि आरएनएची साखळी वाढवू शकतो.

तो तर स्वतःवरच कृती करून काही मजकुरांचा तुकडा तोडून पुन्हा दोन टोके सांधूही शकतो.

१९८०च्या सुरुवातीला आरएनएच्या या लक्षणीय गुणधर्माचा शोध (थॉमस सेच व सिडने ऑल्टमन) लागल्यामुळे जीवनाच्या उत्पत्तीसंबंधीच्या आकलनाची आपली दृष्टीच बदलली.

आता अशी शक्यता वाटत आहे की प्रारंभिक जनुक (Ur जनुक) म्हणजे एक हुबेहूब प्रतिनिर्मीक उत्प्रेरक (रेप्लिकेटर कॅटलीस्ट) असा संयुक्त रेणू असावा.

हा रेणू म्हणजे आदि शब्द, जो भोवतालची रसायने वापरून स्वतःच्या प्रती निर्माण करीत होता. हे आदि जनुक आरएनएचे बनले असावे!

आरएनएच्या रेणूच्या क्रिया उत्प्रेरित करण्याच्या क्षमतेवर आधारित यादृच्छिकरीत्या पुन्हा पुन्हा निवड करून (परीक्षानळीमध्ये) आरंभापासून उदय व विकास घडवून आणणे शक्य होईल! म्हणजेच जवळजवळ जिवाच्या उत्पत्तीचे पुन्हा केलेले सादरीकरणच!

सर्वांत आश्चर्यकारक परिणाम म्हणजे या कृत्रिम आरएनए रेणूमध्ये असलेल्या मजकुराच्या एका पसरलेल्या भागात आणि रायबोसोममधील आरएनएवरील मजकुरात, या दोन्हींमध्ये विलक्षण साम्य आहे (जसे की गुणसूत्र एकवरील ५ जनुक)!

चार अब्ज वर्षांपूर्वी (जेव्हा या विश्वाचे वय फक्त १० अब्ज वर्ष होते) पृथ्वीचा नुकताच जन्म झाला होता; तेव्हा आदि डायनासोर, आदि मासे, आदि कीटक, आदि वनस्पती, आदि कवक, आदि जिवाणू या कुणाच्याही पूर्वी आरएनएचे जग असावे.

आपल्याला हे रायबो जीव (आरएनएचे) कसे दिसत असावेत हे माहीत नाही. आपण जीवरासायनिक दृष्ट्या ते जिवंत राहण्यासाठी काय करत असावेत, याचा फक्त अंदाज बांधू शकतो.

त्यांच्याही आधी काय व कोण सजीव असावेत हे आपल्याला ज्ञात नाही. आजच्या सजीवांमध्ये असणाऱ्या आरएनएच्या कार्याच्या हाती असलेल्या धाग्यादोऱ्यावरून आपण त्यांच्या एकेकाळच्या अस्तित्वाची खात्री मात्र जरूर देऊ शकतो.

भाग समाप्त — आदि शब्दापासून आरएनए जगापर्यंत


भाग ४ — आरएनए जग आणि लुकाचा प्रवास.Part —4 The RNA World and the Journey to LUCA

भाग ४ — जीनोममध्ये जतन झालेली जीवनाची कहाणी

Part 4 — The Story of Life Preserved in the Genome

या रायबो जिवांना एक मोठी अडचण होती. ती म्हणजे आरएनए हा एक अत्यंत अस्थायी रेणू आहे, जो काही तासांमध्येच निखळून जाऊन लयास जातो.

जर हे जीव कधी उष्णतेच्या संपर्कात आले किंवा त्यांची वाढ होऊन फार मोठे झाले, तर त्यांना त्यांच्या जनुकातील संदेशाच्या वेगाने होणाऱ्या नाशाला (जनुकशास्त्रज्ञांच्या भाषेत 'प्रमाद व आपत्ती') तोंड द्यावे लागले असते.

पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत, चुका दुरुस्त करीत, चाचणी व अनुभव पद्धतीने (प्रयत्न प्रमाद पद्धती) त्यातल्या एक आरएनए जिवाने एका बळकट स्वरूपाच्या आरएनएची नवनिर्मिती केली, ज्याला डीएनए म्हणता येईल.

तसेच त्याने प्रोटो रायबोसोम हे यंत्र अंतर्भूत असलेली एक यंत्रणा निर्माण केली, जी या डीएनएपासून आरएनएच्या प्रती तयार करू शकत होती.

या यंत्रणेला जलद गतीने काम करावे लागणार होते. तसेच तिला अत्यंत काटेकोरपणे व अचूकतेने कार्य करणे आवश्यक होते.

एका वेळी तीन अक्षरे एकत्रित जोडून (त्रिकूट, ट्रिपलेट कोड) जनुकीय प्रती करण्याने हे साध्य करणे शक्य होते.

प्रोटो रायबोसोमला हे त्रिकूट सुलभ रीतीने सापडावे म्हणून यातील प्रत्येक त्रिकुटाला एक विशिष्ट लेबल 'चिट्ठी' लावण्यात आली. ही रासायनिक चिठ्ठी म्हणजे विशिष्ट अमिनो आम्लाचा रेणू मणी होत.

खूप नंतर या ओळख चिठ्ठ्यांचे मणी एका विशिष्ट अनुक्रमाने एकत्रित जुळून, विशिष्ट प्रथिनांच्या माळा तयार झाल्या.

हा तीन अक्षरांचा शब्द प्रथिनांसाठीचा एक प्रकारचा संकेत बनला, आणि म्हणूनच आज प्रथिनांच्या संश्लेषण पाककृतीमध्ये जनुकीय संकेत हा तीन अक्षरांचा शब्द आहे. प्रत्येक शब्द अमिनो आम्लामधील एकासाठी उच्चारला जातो.

यातूनच जास्त सफाईदार व अत्याधुनिक असा जीव तयार झाला. हा सजीव त्याची जनुकीय पाककृती डीएनएमध्ये साठवतो.

त्याचे कार्ययंत्र प्रथिनांमध्ये असते आणि तो डीएनए व प्रथिनामधले अवकाश (अंतर) जोडण्यासाठी आरएनएच्या सेतूचा उपयोग करतो.

आपल्या शेवटच्या वैश्विक सामाईक पूर्वजास लुका (LUCA) म्हणून संबोधले जाते. ती एका जिवाणूसारखी दिसत असावी.

जमिनीखाली व समुद्राच्या तळाशी असलेले खडक हे लाखो रासायनिक इंधन वापरणाऱ्या जिवाणूंनी संपृक्त झाले आहेत, हे स्पष्ट झाल्यामुळे लुका खोल भूगर्भामध्ये तप्त अशा अग्निज खडकांच्या भेगांखाली वसत असावी असे मानले जाते.

येथे सल्फर, लोह, हायड्रोजन व कार्बन यांवर तिचे पोषण होत होते.

आजचे भूपृष्ठावरील जीवन म्हणजे वरवरचा देखावा आहे. खोलवर उष्णतेवर जगणाऱ्या उष्णतास्नेही अशा तापरागी (थर्मोफिलिक) जिवाणूंमध्ये जैवगोलात असलेल्या कार्बनपेक्षा जवळजवळ दहापट जास्त कार्बन असतो.

हे जिवाणू आपण ज्याला नैसर्गिक वायू म्हणतो त्याचे उत्पादन करीत असावेत.

मात्र आरंभीच्या जीवनाचे स्वरूप ओळखण्याच्या प्रयत्नांमध्ये एक संकल्पनात्मक अडचण आहे.

आज आपल्या जीवनदात्यांव्यतिरिक्त दुसरीकडून जनुक संपादित होणे, कुठल्याही प्राणिमात्रात संभवत नाही. परंतु यापूर्वी नेहमीच असे होत आले असेल, अशी शक्यता नाही.

आजही केवळ एक जिवाणू दुसऱ्याला गिळंकृत करून त्याची जनुके आपलीशी करू शकतो. कधीतरी ही एक पद्धत असेलही. त्या वेळी जनुकांची चोरी होत असावी!

खूप वर्षांपूर्वी भूतकाळामध्ये गुणसूत्रे ही छोट्या आकारांची व संख्येने भरपूर असावीत. त्यामध्ये केवळ एकच जनुक असे असावे, जे सहजपणे हरवले वा गवसले जाऊ शकत होते.

कार्ल वोएज निदर्शनास आणून देतो की, जर असे असले तर सजीव अजून (त्यावेळेस) एक टिकाऊ स्वतंत्र अस्तित्व असणारी वस्तू नव्हती. तर तो जनुकाचा एक तात्पुरता चमू होता आणि म्हणूनच आपल्यामध्ये आज असलेली जनुके ही प्राणिमात्रांच्या अनेकविध जाती-प्रजातीपासून आलेली असणार.

आणि म्हणूनच त्यांचे वेगवेगळ्या वंशावळीमध्ये विभाजन करण्याचा प्रयत्न करणे निरर्थक ठरेल.

आपण एकाच अशा पूर्वज लुकापासून उत्क्रांतीत झालेले नसून जनुकीय प्राणिमात्रांच्या संपूर्ण समूहापासून उदित होत आलेलो आहोत.

वोएज म्हणतो त्याप्रमाणे, जीवनाला, सजीवाला वंशावळीचा इतिहास नसून भौतिक इतिहास आहे.

तुम्ही एक आनंददायी, एकात्मिक आणि समुदायवादिक तत्त्वज्ञानाचा एक भाग म्हणून पुढील निष्कर्षाकडे पाहू शकता.

तो असा की आपण सर्व एका व्यक्तिविशिष्ट व्यष्टीजातीचे वंशज नसून एका समूहापासून आपली निर्मिती झाली आहे.

किंवा तुम्ही या निष्कर्षाकडे एक आत्मकेंद्री जनुकाच्या सिद्धांताचा पुरावा म्हणून पाहू शकता.

त्या काळात आणि आजही बऱ्याच प्रमाणात जनुकांमध्ये युद्धे झाली आहेत. प्राण्यांना तात्पुरते रथ म्हणून वापरून आणि केवळ थोड्या काळासाठी हातमिळवणी करून, एक आघाडी बनवून!

त्या काळात जरी भरपूर लुका होत्या असे गृहीत धरले, तरी आपण त्या कुठे राहत असाव्यात व जगण्यासाठी काय करत असाव्यात, याबद्दल अनुमान बांधू शकतो.

इथेच तापरागी जिवाणूंबद्दलचा प्रश्न निर्माण होतो.

याचे उत्तर मिळवणाऱ्या न्यूझीलंडच्या तीन व्यक्तींनी १९९८मध्ये प्रसिद्ध केलेल्या प्रतिभासंपन्न कार्यास धन्यवाद द्यावे लागतील.

त्यामुळे आपण जवळजवळ सर्व पाठ्यपुस्तकांत दाखवीत आलेल्या जीवन वृक्षाकडे वरून खाली बघू शकतो.

काही पुस्तकांमध्ये आदि जिवाचे वर्णन 'ते जिवाणूसम गोलाकार, वर्तुळाकार व गुणसूत्राची एकच प्रत असलेल्या साध्या पेशी होते' असे केले जाते.

त्या पुस्तकांतून 'जेव्हा जिवाणूंचे गट एकत्रित येऊन जटिल पेशी झाल्या तेव्हा इतर सर्व सजीव अस्तित्वात आले' असे लिहिले जाते.

याच्या अगदी उलट घडले असण्याची शक्यता आहे.

अगदी पहिले आधुनिक सजीव हे काही जिवाणूसारखे नसावेत. ते उष्ण झऱ्यांमध्ये वा सागराच्या ज्वालामुखीच्या बाहेरील मार्गांमध्ये राहत नसावेत.

ते जास्त करून प्रजीव संघासारखे (प्रोटोझुआ) होते; ज्यामध्ये जनुकीय संचय 'जीनोम' हा वर्तुळाकार गुणसूत्र नसून अनेक छोट्या, सरळ तुकड्यांमध्ये विभाजित झाला होता.

प्रत्येक जनुकाच्या अक्षरमांडणीच्या चुकांच्या दुरुस्तीला मदत करण्यासाठी ते बहुगुणित (पोलीप्लाइड अतिरिक्त प्रती) होते.

शिवाय त्यांना थंड हवा आवडत होती.

पेट्रीक फोटररने फार पूर्वी सांगितल्याप्रमाणे जिवाणूंचे आगमन फार नंतर झाले असावे; डीएनए-प्रथिन यांच्या जगाच्या फार नंतर!

हे जिवाणू लुकाचे उच्च कोटीचे वैशिष्ट्यपूर्ण पण साधे वारसदार होते.

आरएनए जगाची उपकरणे (विशेषतः उष्ण जागेमध्ये जिवाणूंना सक्षम करणारी) हळूहळू सोडून देणे, ही या जिवाणूंनी साध्य केलेली क्लृप्ती होती.

आपण मात्र लुकाची प्राथमिक रेणवीय वैशिष्ट्ये आपल्या पेशींमध्ये जपून ठेवली आहेत.

या अर्थाने जिवाणू आपल्यापेक्षा बरेच विकसित झाले आहेत, असे म्हणावे लागेल.

या विचित्र कथेला रेणवीय जिवाच्या अस्तित्वाचा आधार आहे. हे रेणवीय जीवाश्म म्हणजे आपल्या पेशींच्या केंद्रकामध्ये अधांतरी तरंगणारे आरएनएचे छोटे तुकडे!

स्वतःला जनुकापासून तोडून हे तुकडे अनेक प्रकारचे आरएनए (मार्गदर्शक, वाल्ट, छोटा केंद्रक, छोटे केंद्रकांग) व स्वविभाजन करणारे इनट्रान्स तयार करणे यासारखी अनावश्यक कार्ये करतात.

जिवाणूंकडे यातील काहीच नाही आणि आपण या तुकड्यांना शोधले, असे म्हणण्यापेक्षा जिवाणूंनी त्यांना टाकून दिले असावे.

उष्ण झरे वा जमिनीखालचा खडक जेथे तापमान १७० सेल्सिअस असते, अशा उष्ण ठिकाणी जेव्हा जिवाणूंनी वस्ती केली तेव्हा त्यांनी जुन्या आरएनएचा त्याग केला.

उष्णतेमुळे होणाऱ्या चुकांचे प्रमाण किमान पातळीवर येण्यासाठी जिवाणूंनी ही यंत्रणा सोपी करण्याची किंमत मोजली असे म्हणता येईल.

आरएनएचा त्याग केल्यानंतर जिवाणूंना त्यांची नवीन सुव्यवस्थित यंत्रणा गवसली.

या यंत्रणेने त्यांना पुनरुत्पादनाचा वेग लाभदायक ठरणाऱ्या परोपजीवी आणि अपमार्जित (स्कावेनजिंग) सारख्या खाचांमध्ये स्पर्धायोग्य बनविले.

आपण काही पुरातन आरएनए जपले आहेत. हे आरएनए म्हणजे आपल्या जागी पोहोचलेल्या यंत्राचे पूर्णपणे न टाकून दिलेले अवशेष!

जिवाणूंच्या प्रच्छन्न स्पर्धात्मक जगाप्रमाणे आपल्याला (म्हणजे सर्व प्राणी, वनस्पती, कवक) कधी तितक्या जोरकस व दांडग्या स्पर्धेच्या दबावाला तोंड द्यावे लागले नाही.

आणि म्हणूनच की काय, आपल्याला जिवाणूसारखे चपळ व साधे राहण्याची गरज निर्माण झाली नसावी. आपण जनुके वापरणाऱ्या सुव्यवस्थित यंत्रापेक्षा जास्तीत जास्त जनुके असणाऱ्या क्लिष्टतेला प्राधान्य दिले.

प्रत्येक सजीवात जनुकीय संकेतचा तीन अक्षरी शब्द एकसारखाच असतो.

GCA म्हणजे अरजीनीन हे अमिनो आम्ल, तर GCG म्हणजे अलनीन; मग तो सजीव वटवाघूळ असो वा भुंगा वा बीच वृक्ष किंवा जिवाणू!

अटलांटिक सागरातील हजारो फूट खाली असलेल्या सल्फरच्या झऱ्यातील उकळत्या तापमानामधल्या आर्च जिवाणूंमध्ये व सूक्ष्म कॅप्सूलमधल्या कुटिल विषाणूंमध्ये सारखेच जनुकीय संकेत असतात.

त्यामध्ये वेगळेपणा नसतो.

जगामध्ये कुठल्याही ठिकाणी, कुठलाही प्राणी, कुठलीही वनस्पती, कवके वा कीटक असोत, सर्व सजीव एकसारखाच संकेत शब्दकोश वापरतात.

त्यांना समान जनुकीय संकेत माहीत असतो. सर्व जीवांत एकत्व, समरूपता आहे.

जनुकीय संकेतामध्ये अगदीच थोडे स्थानिक विकृती-विचलन होते. हे बहुतांशी काही अनाकलनीय कारणाने लोमेश (Ciliated) प्रजीवामध्ये दिसतात.

मात्र सर्व प्राण्यांमध्ये ते समान असतात.

आपण सर्व जण नेमकेपणाने एकसमान जैविक भाषा वापरतो.

आदि जीव जन्मला तेव्हा एकच निर्मिती होती, एकच घटना घडली होती.

हे प्रतिपादन त्यांच्या उपयोगी पडेल असे धार्मिक लोकांना वाटू शकते. अर्थात जीवनाची उत्पत्ती दुसऱ्या एका वेगळ्या ग्रहावर होऊन अंतराळयानातून पृथ्वीवर बीजारोपण झाले असावे; किंवा आदिकाळात हजारो प्रकारचे सजीव असावेत, असेही काही कयास असू शकतात.

परंतु सर्वांसाठी खुले असलेल्या, उपलब्ध असलेल्या पण निर्मम अशा आदि रासायनिक मिश्रणामध्ये केवळ लुका तगली असावी.

जनुकीय संकेताचे स्वरूप व कार्यपद्धती उलगडेपर्यंत (१९६०) आपल्याला माहीत नव्हते की सर्व जीवन मुळात एकच आहे, समुद्रतणसुद्धा आपले दूरचे नातेवाईक आहेत आणि एंथ्रेक्स जिवाणू आपले प्रगत नातेवाईक आहेत.

सजीवांचे ऐक्य व जीवनाची एकता हे प्रायोगिक व अनुभवाधिष्ठित तथ्य आहे.

सर्व सेंद्रिय जीवनाचे कारण एक आणि एकाच प्रकारचे जीवित धागे आहेत, असे जाणणारा एरामस डार्विन या तथ्याच्या अत्यंत जवळ पोहोचला होता की!

जीनोम या जैविक ग्रंथातून साधे निखळ सत्य लिहिले गेले आहे; ते म्हणजे 'जीवनातील एकात्मता, त्याचे सामायिकत्व, आरएनएचे प्राधान्य, या ग्रहावरील आदि जिवांचे रसायनत्व, जिवाणूंचे पूर्वज असलेले एकपेशीय जीव' हे वास्तव!

चार अब्ज वर्षांपूर्वी जीवन कशा पद्धतीने अस्तित्वात आले, प्रकटले, याबद्दल आपल्याकडे जीवाश्म नोंद नाही.

मात्र आपल्याकडे आहे महान जैविक ग्रंथ जीनोम!

तुमच्या छोट्या बोटांच्या पेशींमधली जनुके पहिल्यावहिल्या प्रतिकृती निर्मिक रेणूचे थेट वारस आहेत.

लाखो प्रतींच्या सलग साखळ्यांमधून ते आपल्यापर्यंत आले आहेत.

या प्रतीमधील अंकात्मक संदेश आजही जीवनाच्या प्रारंभी असलेले संघर्षाचे अवशेष धारण करतात.

जर मानवी जीनोम आदि मिश्रणात काय झाले याबद्दल सांगू शकतो, तर त्यानंतरच्या चार अब्ज वर्षांमध्ये अजून काय काय झाले याबद्दल कितीतरी जास्त माहिती त्याच्याकडून मिळेल!

आपल्या शरीरातला जीनोम हा सांकेतिक लिपीमध्ये लिहिलेल्या आपल्या जैविक इतिहासाचा लेखाजोखा आहे.

भाग समाप्त — जीनोममध्ये जतन झालेली जीवनाची कहाणी


संपादकीय तथ्यपडताळणी

खालील पडताळणी मूळ लेखापासून स्वतंत्र आहे. मूळ लेखातील शैली किंवा रूपक बदललेले नाहीत.

१. पृथ्वीचे वय आणि जीवनाची प्राचीनता

स्थिती : अंशतः बरोबर

पृथ्वीचे वय सुमारे ४.५४ अब्ज वर्षे आहे. पृथ्वीवरील सर्वांत प्राचीन जीवनाच्या पुराव्यांबाबत अंदाज साधारण ३.५ अब्ज वर्षे किंवा त्याहून जुना असू शकतो. त्यामुळे “चार अब्ज वर्षे” ही साधारण मांडणी आहे; अचूक वय नाही.

२. Erasmus Darwin आणि “जीवित धागा”

स्थिती : अंशतः बरोबर

Erasmus Darwin यांनी सर्व सजीवांना एका प्राचीन जीवित स्रोताशी जोडणारे विचार व्यक्त केले होते. मात्र उद्धरणाचे अचूक वर्ष, शब्दरचना आणि संदर्भ स्वतंत्रपणे तपासणे आवश्यक आहे.

३. जीवन आणि उष्मागतिकीचा दुसरा नियम

स्थिती : अंशतः बरोबर

सजीव बंदिस्त प्रणाली नसतात. ते ऊर्जा व पदार्थाची देवाणघेवाण करतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीरात सुव्यवस्था निर्माण व टिकवू शकतात. याचा अर्थ असा नाही की सजीव उष्मागतिकीचा दुसरा नियम “पाळत नाहीत”; उलट ते त्या नियमाच्या चौकटीतच कार्य करतात.

४. Schrödinger आणि “What Is Life?”

स्थिती : निश्चित

Erwin Schrödinger यांनी १९४३मध्ये Dublin येथील Trinity College मध्ये What Is Life? या विषयावर व्याख्याने दिली. त्यांचे पुस्तक १९४४मध्ये प्रसिद्ध झाले. आनुवंशिक माहिती एका “aperiodic crystal” मध्ये साठलेली असू शकते, ही त्यांची महत्त्वाची संकल्पना होती.

५. “Mengeleचा आश्रित व समानधर्मी Schrödinger”

स्थिती : चुकीचे / पुरावा अपुरा

Schrödinger आणि Josef Mengele यांच्यात असा आश्रित-समानधर्मी संबंध असल्याचा विश्वसनीय ऐतिहासिक पुरावा नाही. ही मांडणी तथ्य म्हणून स्वीकारता येत नाही.

६. Oswald Avery आणि DNA

स्थिती : निश्चित, पण कालक्रमात सूक्ष्म दुरुस्ती आवश्यक

Avery, Colin MacLeod आणि Maclyn McCarty यांच्या संशोधनाने DNA हा bacterial transformation करणारा पदार्थ असल्याचे मजबूत पुरावे दिले. त्यांचे प्रसिद्ध संशोधन १९४४मध्ये प्रकाशित झाले. त्यामुळे १९४३चा संदर्भ त्यांच्या प्रयोगांच्या त्या काळातील प्रगतीसाठी असू शकतो; पण निर्णायक प्रकाशन १९४४चे आहे.

७. Wöhler आणि urea

स्थिती : अंशतः बरोबर

Friedrich Wöhler यांनी १८२८मध्ये inorganic starting materials पासून urea तयार केली. मात्र मूळ लेखातील “silver cyanide” हा रासायनिक तपशील चुकीचा आहे; संबंधित अभिक्रियेत silver cyanateचा संदर्भ आहे.

८. Alan Turing आणि Colossus

स्थिती : अंशतः बरोबर

Colossus हे Lorenz cipher-संबंधित जर्मन संदेशांचे विश्लेषण करण्यासाठी वापरले गेले. परंतु Colossusचा मुख्य विकास Tommy Flowers आणि Bletchley Park मधील सहकाऱ्यांनी केला. त्यामुळे “Colossus = Turingचे यंत्र” अशी सरळ मांडणी अचूक नाही.

९. Claude Shannon आणि information–entropy

स्थिती : अंशतः बरोबर

Shannon यांनी information theory मध्ये entropy ही गणितीय संकल्पना विकसित केली. Information entropy आणि thermodynamic entropy यांच्यात खोल संबंध आहेत; मात्र त्या दोन्ही संकल्पना अक्षरशः एकच नाहीत.

१०. RNA World

स्थिती : वादग्रस्त / प्रभावी वैज्ञानिक परिकल्पना

RNA ने DNA आणि protein या दोन्हींपूर्वी महत्त्वाची भूमिका बजावली असावी, ही RNA World hypothesis मधील मध्यवर्ती कल्पना आहे. RNA catalytic कार्य करू शकते याचे प्रयोगात्मक पुरावे आहेत. पण RNA हेच पृथ्वीवरील जीवनाचे निश्चित पहिले स्वयंप्रतिकृती करणारे स्वरूप होते, हे अद्याप सिद्ध झालेले नाही.

११. Thomas Cech आणि Sidney Altman

स्थिती : निश्चित

Thomas Cech आणि Sidney Altman यांनी RNA catalytic activity म्हणजेच ribozymeचे अस्तित्व दाखवले. त्यांच्या कामासाठी १९८९चा रसायनशास्त्रातील Nobel Prize देण्यात आला.

१२. “RNA स्वतःची पूर्ण प्रत स्वतःच बनवते”

स्थिती : अंशतः बरोबर / अतिशयोक्त

काही RNA molecules आणि ribozymes catalytic कार्य करू शकतात. परंतु आजपर्यंत नैसर्गिक परिस्थितीत पूर्णपणे स्वतंत्र, स्वतःची संपूर्ण प्रतिकृती बनवणारे आणि उत्क्रांतीक्षम असे RNA system प्रयोगशाळेत निर्णायकपणे दाखवलेले नाही.

१३. 5S rRNA आणि chromosome 1

स्थिती : अंशतः बरोबर

मानवी genome मध्ये 5S rRNA genes chromosome 1 वर tandem repeatsमध्ये आढळतात. मात्र “मानवी शरीरातील सर्वांत क्रियाशील जनुक” ही मांडणी निश्चित वैज्ञानिक निष्कर्ष म्हणून स्वीकारता येत नाही.

१४. Ribosome DNAचे थेट proteinमध्ये भाषांतर करते

स्थिती : अंशतः बरोबर

Ribosome थेट DNA वाचत नाही. DNAमधील माहिती प्रथम RNA, विशेषतः messenger RNA, मध्ये प्रतिलिखित होते आणि ribosome mRNAचे proteinमध्ये translation करते.

१५. “२२ amino acids”

स्थिती : अंशतः बरोबर

सामान्य genetic code २० प्रमुख amino acids साठी आहे. Selenocysteineला २१वे genetically encoded amino acid मानले जाते; pyrrolysine काही जीवांमध्ये आढळते. त्यामुळे “सर्व प्रथिनांची २२ amino acidsची भाषा” ही सरसकट मांडणी अचूक नाही.

१६. LUCA

स्थिती : निश्चित संकल्पना; तपशील वादग्रस्त

LUCA म्हणजे Last Universal Common Ancestor. आधुनिक जीवनाच्या सार्वत्रिक पूर्वजासाठी ही संकल्पना स्वीकारली जाते. मात्र LUCA एकच व्यक्ती होती की मोठ्या ancestral populationचा भाग होती, ती कुठे राहत होती आणि तिचे स्वरूप कसे होते याबाबत संशोधन सुरू आहे.

१७. LUCA खोल, उष्ण भूगर्भात राहत होती

स्थिती : वादग्रस्त

LUCAच्या संभाव्य वातावरणाबाबत hydrothermal systems आणि इतर वातावरणांची चर्चा होते. मात्र ती निश्चितपणे खोल, अत्यंत उष्ण भूगर्भात राहत होती असे सांगता येत नाही.

१८. १७०°C तापमानातील जिवाणू

स्थिती : चुकीचे/पुरावा अपुरा

ज्ञात सक्रिय जीवनाची कमाल तापमानमर्यादा यापेक्षा बरीच कमी आहे. काही hyperthermophiles अत्यंत उच्च तापमान सहन करतात, परंतु १७०°C वर सक्रियपणे वाढणारे जिवाणू असल्याचा दावा सध्याच्या पुराव्यांनी समर्थित नाही.

१९. Methanogenic organisms आणि natural gas

स्थिती : अंशतः बरोबर

जैविक methane निर्मिती करणारे प्रमुख जीव methanogenic archaea आहेत. त्यांना सरसकट “जिवाणू” म्हणणे तांत्रिकदृष्ट्या अचूक नाही.

२०. Carl Woese आणि communal evolution

स्थिती : अंशतः बरोबर / वादग्रस्त

प्रारंभिक जीवनात horizontal gene transfer मोठ्या प्रमाणावर झाला असावा आणि सुरुवातीचा gene pool आजच्या स्पष्ट species treeपेक्षा अधिक जाळ्यासारखा असावा, ही कल्पना Woese यांच्या विचारांशी संबंधित आहे. मात्र त्यामुळे संपूर्ण जीवसृष्टीला कोणतीही वंशावळ नाही असे म्हणणे अतिशयोक्त ठरते.

२१. “Bacteria आपल्यापेक्षा अधिक विकसित”

स्थिती : वैज्ञानिक अर्थाने चुकीचे / रूपक

Evolutionमध्ये “अधिक विकसित” किंवा “कमी विकसित” अशी सार्वत्रिक शिडी नसते. जिवाणू अत्यंत यशस्वी आणि उत्क्रांतीच्या दृष्टीने प्राचीन आहेत; पण ते मानवांपेक्षा “जास्त विकसित” आहेत असे वैज्ञानिक भाषेत म्हणता येत नाही.

२२. Genetic code

स्थिती : अंशतः बरोबर

Genetic code जवळजवळ सर्व सजीवांमध्ये अत्यंत समान आहे. मात्र तो पूर्णपणे universal नाही. Mitochondrial genomes आणि काही जीवांमध्ये genetic codeचे अपवाद आढळतात.

२३. “GCA = Arginine, GCG = Alanine”

स्थिती : चुकीचे

GCA आणि GCG दोन्ही Alanine साठीचे codons आहेत. Arginineचे standard codons CGU, CGC, CGA, CGG, AGA आणि AGG आहेत.

२४. Genetic codeचा उलगडा १९६०मध्ये

स्थिती : अंशतः बरोबर

Genetic code उलगडण्याची निर्णायक प्रयोगशाळीय प्रगती १९६०च्या दशकात झाली. १९६१मध्ये Nirenberg आणि Matthaei यांनी महत्त्वाचा प्रारंभिक प्रयोग केला; पूर्ण codeच्या उलगड्यात पुढील काही वर्षांत अनेक संशोधकांचे योगदान होते.

२५. सर्व सजीव एकाच जैविक भाषेचा वापर करतात

स्थिती : मुख्यतः निश्चित

Genetic codeची जवळजवळ सार्वत्रिक समानता common ancestryसाठी अत्यंत महत्त्वाचा पुरावा आहे. मात्र “अगदीच एकसारखा” म्हणण्याऐवजी “अत्यंत मोठ्या प्रमाणावर समान, काही अपवादांसह” हे अधिक अचूक आहे.

२६. “Anthrax bacteria आपले प्रगत नातेवाईक”

स्थिती : वैज्ञानिक अर्थाने चुकीचे

Bacillus anthracis आणि मानव दोघेही दूरच्या समान पूर्वजापासून उत्क्रांत झाले आहेत. मात्र कोणताही आधुनिक जीव दुसऱ्यापेक्षा “प्रगत” असा evolutionary ladderवर ठेवता येत नाही.

२७. Genome हा जैविक इतिहासाचा लेखाजोखा

स्थिती : अंशतः बरोबर

Genomeमध्ये उत्क्रांतीच्या इतिहासाच्या अनेक खुणा साठलेल्या आहेत. मात्र तो पूर्ण आणि थेट इतिहासग्रंथ नाही. Mutation, gene loss, duplication, horizontal gene transfer आणि इतर प्रक्रियांमुळे इतिहास गुंतागुंतीचा होतो.


संदर्भ व स्रोत

ऑनलाइन मूळ स्रोत:

१. Charles Darwin Online — The Voyage of the Beagle

२. Charles Darwin Online — On the Origin of Species

३. Erwin Schrödinger — What Is Life?

४. Avery, MacLeod & McCarty — Studies on the chemical nature of the substance inducing transformation of pneumococcal types

५. Nobel Prize — Thomas Cech आणि Sidney Altman

६. National Center for Biotechnology Information (NCBI) — Genetic Code

७. National Center for Biotechnology Information (NCBI) — Human Genome / Chromosome 1

८. Bletchley Park — Colossus आणि wartime codebreaking

९. Claude Shannon — A Mathematical Theory of Communication

१०. Carl Woese — evolutionary history आणि horizontal gene transfer संबंधी संशोधन


ऐतिहासिक संदर्भभूमी

जीवनाच्या उत्पत्तीचा प्रश्न हा जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भूविज्ञान आणि उत्क्रांतीशास्त्र यांच्या सीमेवर उभा असलेला प्रश्न आहे.

आजच्या विज्ञानानुसार DNA, RNA आणि proteins हे परस्परांशी अत्यंत गुंतागुंतीने जोडलेले आहेत. DNAमध्ये माहिती साठते; RNA अनेक प्रकारच्या संदेशवहन व catalytic कार्यांमध्ये सहभागी होते; आणि proteins पेशीतील असंख्य रासायनिक प्रक्रिया पार पाडतात.

RNA World ही कल्पना या “आधी काय?” या प्रश्नाचे एक प्रभावी उत्तर देते. RNAमध्ये माहिती साठवण्याची आणि catalytic कार्य करण्याची दोन्ही क्षमता असू शकते. त्यामुळे सुरुवातीच्या जीवनात RNAने मध्यवर्ती भूमिका बजावली असावी, अशी शक्यता मांडली जाते.

परंतु जीवनाची पहिली सुरुवात नेमकी कोणत्या रेणूपासून झाली, त्या वेळी वातावरण कसे होते आणि पहिली स्वयंप्रतिकृती निर्माण करणारी प्रणाली कशी तयार झाली, याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत.

LUCA ही संकल्पना त्याहून पुढची पायरी आहे. LUCA ही “पहिली सजीव पेशी” असणे आवश्यक नाही; ती आजच्या सर्व ज्ञात जीवनाच्या सार्वत्रिक पूर्वजाशी संबंधित संकल्पना आहे.

जीनोममधील समान genetic code, समान मूलभूत जैवरासायनिक प्रक्रिया आणि DNA/RNA/protein यंत्रणेतील समानता या सर्व गोष्टी जीवनाच्या खोल सामायिक इतिहासाकडे निर्देश करतात.


काय निश्चित? काय वादग्रस्त?

निश्चित

  • DNA आनुवंशिक माहिती साठवते.

  • RNAचे अनेक जैविक आणि catalytic कार्यांमध्ये महत्त्व आहे.

  • Ribosome हे RNA आणि proteinsचे अत्यंत महत्त्वाचे molecular machine आहे.

  • Genetic code जवळजवळ सर्व जीवनात मोठ्या प्रमाणावर समान आहे.

  • सर्व आधुनिक जीवांमध्ये खोल evolutionary संबंध आहेत.

  • LUCA ही आधुनिक जीवसृष्टीच्या सार्वत्रिक पूर्वजाची वैज्ञानिक संकल्पना आहे.

  • Genomeमध्ये उत्क्रांतीच्या इतिहासाच्या महत्त्वपूर्ण खुणा आढळतात.

अंशतः बरोबर

  • जीवनाला “माहिती” म्हणून पाहणे.

  • DNA–RNA–protein यांना माहितीच्या प्रवाहाच्या रूपात पाहणे.

  • LUCAला अत्यंत प्राचीन पूर्वज म्हणून पाहणे.

  • Genomeला जैविक इतिहासाचा लेखाजोखा म्हणणे.

वादग्रस्त

  • RNA हेच पृथ्वीवरील जीवनाचे पहिले स्वरूप होते.

  • LUCA नेमकी कुठे राहत होती.

  • प्रारंभिक जीवन अत्यंत उष्ण वातावरणातच होते.

  • प्रारंभिक जीवनात horizontal gene transfer किती व्यापक होता.

  • LUCA एकच स्वतंत्र जीव होती की मोठ्या ancestral populationचा भाग होती.

चुकीचे किंवा गंभीर दुरुस्ती आवश्यक

  • GCAला Arginine म्हणणे चुकीचे आहे.

  • Schrödingerला Mengeleचा आश्रित/समानधर्मी म्हणण्यास ऐतिहासिक आधार नाही.

  • Colossusचे श्रेय थेट Turingला देणे अचूक नाही.

  • Wöhlerच्या प्रयोगातील “silver cyanide” हा रासायनिक तपशील चुकीचा आहे.

  • १७०°C वर सक्रिय जिवाणू असल्याचा दावा सध्याच्या पुराव्यांशी जुळत नाही.

  • Anthrax bacteriaना मानवाचे “प्रगत नातेवाईक” म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या अयोग्य आहे.


9/13/26

भाग २ — डीएनए, माहिती आणि जीवनाचे रहस्य Part 2 — DNA, Information and the Mystery of Life

डीएनएचा द्विसर्पिल धागा म्हणजे एक माहिती संचय आहे. यामधील संदेश हा रसायनांच्या सांकेतिक लिपीत लिहिलेला असतो. एक रसायन रेणू म्हणजे एक अक्षर समजा. आपण इंग्रजीमध्ये लिहितो तशाच प्रकारे ही आनुवंशिक सांकेतिक लिपी एकरेषीय भाषा आहे.

इंग्रजी भाषेमध्ये असते तसेच या भाषेतही प्रत्येक अक्षर तेवढेच महत्त्वाचे आहे आणि या अर्थाने ही भाषा इंग्रजीसारखीच अंकात्मक (डिजिटल) आहे. विशेष म्हणजे ही डीएनएची भाषा इंग्रजीपेक्षा खूपच सुलभ आहे, कारण या भाषेत केवळ चारच मुळाक्षरे आहेत; ती म्हणजे A, C, G, T.

आज आपल्याला ज्ञात झाले आहे की जनुके म्हणजे एक प्रकारच्या सांकेतिक पाककृती आहेत. परंतु फार कमी जणांनी असे अनुमान केले होते. विसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकात जनुके म्हणजे काय, हा गाजलेला प्रश्न अनुत्तरित राहिला होता.

आपण आता जरा मागे जाऊ या. डीएनएच्या सममित (सीमेट्रिकल) रचनेचा शोध लागलेल्या वर्षात म्हणजे १९५३मध्ये, नाहीतर त्यामागे दहा वर्षे म्हणजे १९४३ पर्यंत जाऊ या.

दहा वर्षानंतर जे काही जण हा रहस्यभेद करण्यासाठी झटले ते १९४३मध्ये वेगळ्या प्रकारच्या कामात गुंतले होते.

डीएनएचा शोध लावणारा एक जण फ्रेन्सीस क्रिक गुंतला होता, 'पोर्ट माऊथ' येथील खाणींच्या आकृतिबंधावर काम करण्यात. तर दुसरा 'जेम्स वॅटसन' वयाच्या पंधराव्या वर्षात पदवीपूर्व अभ्यासक्रमासाठी शिकागो विद्यापीठात नाव नोंदवित होता. त्याने स्वतःचे आयुष्य पक्षिशास्त्रासाठी समर्पित करायचा निश्चय केला होता.

तर तिसरा 'माऊरीस विलकीन्स' अमेरिकेमध्ये अणुबॉम्बची रचना करण्यासाठी सहाय्य करीत होता. चौथी 'रोझलिंड फ्रैंकलिन' ब्रिटिश सरकारसाठी कोळशाच्या संरचनेचा अभ्यास करीत होती.

१९४३मध्ये 'ऑशवित्झ' येथे 'जोसेफे मेंगल' एका जुळ्यावर प्रयोग करीत होता. तो अनुवंशशास्त्र समजून घेण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु त्याचे सुप्रजननशास्त्र विषयक (युजेनिक्स) प्रयोग मात्र खऱ्या ज्ञानप्रकाशाचा मार्ग नाही, असे लक्षात येते. मेंगलचे निष्कर्ष भविष्यातील वैज्ञानिकांसाठी कुचकामी ठरतील.

डब्लिनमध्ये याच सुमारास मेंगलचा आश्रित व समानधर्मी इरविन श्रोडिंजर हा ट्रिनिटी महाविद्यालयात जीवन म्हणजे काय? यावरील व्याख्यान मालिकेचा प्रारंभ करीत होता.

त्याला ज्ञात होते की, गुणसूत्रात जीवनाचे रहस्य दडलेले आहे. परंतु ते कशा प्रकारे, कोणत्या स्वरूपात अस्तित्वात आहे, ते मात्र त्याला समजून येत नव्हते.

त्याच्या मते गुणसूत्रांमध्ये एक प्रकारची सांकेतिक लिपी आहे, जिच्यामध्ये एका व्यक्तीचा संपूर्ण वाढीची आणि तिच्या परिपक्व अवस्थेमधील कार्याची संपूर्ण पद्धती साठवलेली आहे.

तो म्हणतो की डीएनए हा एक मोठा रेणू असू शकतो; परंतु आनुवंशिकतेचा संदेश व माहिती साठवण्यासाठी तो फारच छोटा ठरेल.

क्रिक, वॉटसन, विलकीन्स व फ्रैंक्लिन यासारख्या वैज्ञानिकांच्या पिढीला गुणसूत्राच्या अंतरंगाचे हे यथार्थ सूचन प्रेरणादायी ठरले. या प्रेरणेमुळे अत्यंत कठीण समस्येचे धागेदोरे हाती लागत होते.

परंतु उत्तराच्या बऱ्याच जवळ येत असताना श्रोडिंजर मात्र हा मार्ग सोडून दुसरीकडे उत्तर शोधताना दिसतो. त्याला वाटत होते की त्याच्या आवडत्या पुंज (क्वांटम) सिद्धांतामध्ये रेणूंची आनुवंशिकता धारण करण्याच्या क्षमतेचे उत्तर दडलेले आहे.

त्याच्या या प्रकारचा पाठपुरावा करण्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. कारण जीवनाच्या रहस्याचा आणि पुंज स्थितीचा अन्योन्य संबंध नाही. या रहस्याचा भेद मुळात पदार्थविज्ञानाकडून होणे शक्य नाही.

त्याच वेळी न्यूयॉर्कमध्ये एक सहासष्ट वर्षांचा कॅनेडियन वैज्ञानिक ओसवाल्ड आयव्हरी कशात गुंतला होता?

डीएनए रेणू हे आनुवंशिकतेचे रासायनिक प्रकटीकरण आहे, हे त्याने ओळखले होते. ते निर्विवादपणे सिद्ध करू शकणाऱ्या प्रयोगांवर तो शेवटचा हात फिरवीत होता.

केवळ साधे रासायनिक द्रव्य शोधून न्यूमोनियाच्या निष्प्रभ, निरुपद्रवी जिवाणूंना रोगकारक जिवाणूंमध्ये रूपांतरित करता येते, हे त्याने अनेक कल्पक प्रयोगांती सिद्ध केलेच होते.

१९४३मध्ये त्याने हा बदल घडविणारा पदार्थ जेव्हा शुद्ध केला, तेव्हा तो डीएनए आहे या निष्कर्षापर्यंत तो आला.

परंतु त्याने हा निष्कर्ष प्रसिद्ध करताना इतक्या सावध भाषेत मांडला की खूप नंतरच्या काळापर्यंतही शास्त्रज्ञांकडून त्याची दखल घेतली नाही.

त्याच्या भावाला, रॉयला त्याने लिहिलेल्या पत्रात (१९४३) तो लिहितो, 'जर आपण बरोबर असू, (अर्थात त्या वेळी सिद्ध झाले नव्हते) तर जीवरासायनिक क्रिया व पेशींची वैशिष्ट्ये ठरवण्यामध्ये केंद्राम्ल (न्यूक्लिक अॅसिड) हे केवळ संरचनात्मक दृष्ट्या महत्त्वाचे नसून, कार्यात्मक दृष्टीनेही सक्रिय पदार्थ ठरतात.'

आणि मग पुढे जाऊन याचा अर्थ असा होतो की एखाद्या ज्ञात रासायनिक पदार्थांद्वारे पेशीमध्ये अपेक्षित व आनुवंशकीय बदल प्रवृत्त करणे शक्य आहे.

आयव्हरी रहस्यभेदापर्यंत जवळजवळ पोहोचला होता. पण अजूनही तो रासायनिक मार्गावरच विचार करीत होता.

१६४८मध्ये जॉन बापटिस्ट वॅन हेलमॉन्टसुद्धा अशाच प्रकारचा अंदाज बांधत म्हणाला होता की, सर्व जीवन एक रसायनतत्त्व आहे.

जेव्हा फेड्रीच व्होलरने अमोनियम क्लोराईड व सिल्वर साईनाइड यापासून कृत्रिम युरिया बनवली, तेव्हा तो उद्गारला की काही सजीवता तर नक्कीच रसायनतत्त्वांची बनलेली आहे!

यापूर्वी युरिया हा रासायनिक पदार्थ फक्त सजीवांमधील तयार होत होता. या प्रयोगाने रासायनिक व जैविक जगांना विभागणाऱ्या आत्तापर्यंतच्या पवित्र समजुतीला धक्का दिला.

फुटबॉल म्हणजे पदार्थविज्ञान तसेच जीवन म्हणजे रसायनशास्त्र असे म्हणणे जरी खरे असले, तरी त्यात एक रुक्षपणा जाणवतो.

जीवन खरंतर ढोबळ अनुमानाने तीन अणूंचे रसायन आहे. हे अणू म्हणजे हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजन (प्राणवायू), जे एकमेकांशी जोडून सजीवांतील ९८% अणू रेणू बनवितात.

डीएनएमध्ये असे काय आहे की ज्यामुळे या जीवरेणू आनुवंशिक गुणधर्म धारण करू शकेल, याची कल्पना आयव्हरी करू शकला नाही. अर्थात याचे उत्तर रसायनशास्त्र देऊ शकणार नव्हतेच.

भाग समाप्त — डीएनएच्या माहितीचा शोध


9/11/26

जीवसृष्टीचा पहिला हुंकार ! English Title: Chromosome 1 — The First Stirring of Life

गुणसूत्र - १

मूळ लेखक : मॅट रिडले

पुस्तक : जीनोम — २३ गुणसूत्रांची चित्तवेधक आत्मकथा
अनुवाद : डॉ. सुनीती धारवाडकर
प्रकाशक : मधुश्री पब्लिकेशन


भाग १

समुद्राच्या पाण्यात बुडबुड्यांचं स्फुरणं, फुटणं, विरणं असं सतत चालू असतं; तद्वतच एक जीवरूप विरताना त्यातून दुसरं जीवरूप आकारास येतं! (जीवो जीवस्य जीवनम्!)

Alexander Pope, An Essay On Man

जीवनाच्या प्रारंभी एक जीवरासायनिक 'शब्द' होता, जो सदैव स्वतःच्या प्रती काढण्यात मग्न होता. ऊर्जेच्या अपक्षयाच्या (एनट्रॉपी) स्वरूपातील प्रवाहामधले चिमुकले भोवरे पकडून त्यांना जिवंत करण्यासाठी रसायनांची रचना कशी असावी, याचा शोध या आदि शब्दानेच लावला. हा शब्द म्हणजे पृथ्वीवरील जीवाचा पहिला हुंकार होता.

याच शब्दाने धुळकट अवस्थेत असलेल्या आपल्या अचेतन पृथ्वीच्या भूपृष्ठाचे परिवर्तन एका हिरव्यागार चैतन्यमय स्वर्गात केले. अंतिमतः हा शब्द बहरून आला, फुलून आला. आणि त्याच्या कल्पकतेतून त्याने स्वतःचाच शोध घेऊ शकणाऱ्या आणि स्वजाणीव असणाऱ्या अशा मेंदू नावाच्या, असामान्य साधनाची निर्मिती केली.

पृथ्वीच्या चार अब्ज (बिलियन) वर्षांच्या इतिहासात मी खरोखरच आज जिवंत आहे, हे माझे भाग्यच म्हणावे लागेल. मी एवढा नशीबवान आहे की सजीवांच्या या पन्नास लक्ष प्रजातींमध्ये मी एक सजग मानवप्राणी म्हणून जन्माला आलो.

मी पृथ्वीवरील एका अशा देशात जन्मलो की जिथे जीवनाचा हा पहिलावहिला शब्द शोधला गेला. डीएनएच्या संरचनेचा शोध म्हणजे जगातील एक महान आणि आश्चर्यकारक अशा गुपिताचे उलगडणे!

मागे वळून माझ्याबरोबर जीवनाच्या उत्पत्तीच्या प्रवासाकडे चला; मला आशा आहे की, मी आदि शब्दाच्या मोहिनीचा तुम्हाला प्रत्यय आणून देऊ शकतो.

इ. स. १७९४मध्ये बहुश्रुत कवी व काया चिकित्सक इरासमस डार्विनच्या मनात आले होते, की 'प्राणी अस्तित्वात येण्यापूर्वी जमीन व समुद्र यांना वनस्पतीने व्यापले होते. तसेच या प्राण्यांची कुटुंबेही इतर प्राण्यांच्या कुटुंबांच्या फार पूर्वीपासून अस्तित्वात होती. यावरून आपण असे अनुमान काढू शकतो का की, हा एकाच प्रकारचा जैविक धागा आहे आणि हा धागा सेंद्रिय जीवनाचे कारण आहे, मूळ आहे?'

त्या काळात हे खरोखरच एक विस्मयकारक अनुमान होते. केवळ 'तमाम सेंद्रिय जीवन एकमात्र सेंद्रिय उत्पत्ती वाटून घेते' या ध्वनित होणाऱ्या विधानासाठी ते विस्मयकारक ठरत नाही; ना की त्याच्या नातवाने चार्ल्स डार्विनने या विषयावर पुस्तक लिहिण्याच्या पासष्ट वर्षे आधीचे हे विधान होते म्हणून; तर यासाठीही की 'धागा' यासारखा आगळावेगळा शब्द वापरल्यामुळे!

खरोखरीच जीवनाचे रहस्य एका धाग्यात दडलेले आहे, एका धाग्यात जीवन गुंफले गेले आहे!

पण तरीही एक धागा 'जिवंत' असे काही, कसे काय बनवू शकतो?

जीवनाची व्याख्या तशी पटकन शब्दांमध्ये पकडता येण्यासारखी नाही. मात्र जीवन हे दोन विभिन्न अशा कौशल्याने बनले आहे, हे नक्की सांगता येते. एक म्हणजे पुनरुत्पादन क्षमता आणि दुसरे म्हणजे सूत्रबद्धता निर्माण करण्याची क्षमता.

सजीव आपल्या स्वतःची हुबेहूब प्रत बनवीत असतो. ससे दुसऱ्या सशांनाच जन्म देतात. डॅडेलियॉन वनस्पती दुसऱ्या डॅडेलियॉनलाच जन्माला घालतात.

पण ससे या व्यतिरिक्तही काही करतात. ते गवत खातात, त्याचे रूपांतर त्यांच्यातील मांसामध्ये करतात. जगातल्या निर्हेतुक अस्ताव्यस्ततेमधून (केऑस्) ते स्वतःच सुसंघटित व संमिश्र शरीर बनवितात.

ते उष्मागतिकी शास्त्राच्या (थर्मोडायनॅमिक्स) दुसऱ्या नियमाचे पालन करीत नाहीत; कारण ते बंदिस्त प्रणाली नाहीत. या शास्त्राचा दुसरा नियम सांगतो की एका बंदिस्त प्रणालीमध्ये प्रत्येक गोष्टीचा कल हा सुसंघटितपणाकडून अस्ताव्यस्ततेकडे जाण्याचा असतो.

अर्थात ससे सुसंघटित अशा छोट्या 'मोळ्या', छोटे 'गडे' बनवितात. ते संमिश्रता घडवितात, ती ऊर्जेच्या विनियोगाची किंमत मोजून! (तसे तर काहीच फुकट नसते.)

इरविन श्रोडिंजरच्या भाषेत सजीव प्राणी त्यांच्या पर्यावरणातील सुसंघटितपणा पितात.

सजीवांकडे असलेली कळीची गोष्ट म्हणजे माहिती साठवण्याची आणि ती वापरण्याची क्षमता. सजीवांकडे प्रजोत्पादनाची क्षमता कशामुळे येते, तर त्याच्याकडे असलेल्या अस्तित्वाच्या पाककृतीमुळे; आणि ही पाककृती म्हणजे नवीन शरीर, नवीन जीव तयार करण्यासाठी लागणारी माहिती.

सशाच्या डिंबामध्येच (Egg) नवीन सशांच्या शरीराची जुळणी करण्यासाठी लागणाऱ्या सूचना असतात. परंतु चयापचयाच्या द्वारे होणारी सुसंघटितपणाची निर्मिती, ही माहितीवरसुद्धा अवलंबून असते. ही माहिती म्हणजे सुसंघटितपणा निर्माण करणाऱ्या साधनाची निर्मिती व त्याची देखभाल करण्यासाठीच्या सूचना!

ज्या प्रकारे एक केक बनवण्याची पाककृती पूर्वचिन्हांकित आणि पूर्वसूचित केलेली असते, त्याचप्रमाणे एका परिपक्व सशाच्या सजीव धाग्यामध्ये त्याच्या प्रजोत्पादन व चयापचय करण्याच्या क्षमतांसकट, नवीन ससा बनवण्याची कृती साठवलेली असते.

आपल्याला ही कल्पना अ‍ॅरिस्टॉटलपर्यंत मागे गेल्यासही दृष्टीस पडते. त्याच्या म्हणण्यानुसार अंड्यामध्ये (डिंबामध्ये) कोंबडीची संकल्पना अध्याहृत आहे.

रसायनशास्त्र व पदार्थविज्ञान यांच्या अनेक पिढ्यांखाली गाडल्या गेलेल्या माहिती तत्त्वाचे अरिस्टॉटलचे अंधुक आकलन, आता आधुनिक अनुवंशशास्त्राच्या संशोधनाच्या प्रभावाखाली पुन्हा वर आले आहे.

मॅक्स डेलब्रक गमतीत म्हणाला होता की, या ग्रीक संताला डीएनएच्या शोधासाठी मरणोत्तर नोबेल पुरस्कार द्यायला पाहिजे.

भाग समाप्त — जीवनाचे रहस्य एका धाग्यात दडलेले आहे






9/9/26

विद्येविना विकासाचा 'अर्थ'बोध Development Has No Meaning Without Education

मूळ लेखक / स्रोत / संदर्भ

संदर्भग्रंथ : Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
प्रकाशक : Oxford University Press
लेख/संदर्भ : ग्रंथांचिया द्वारी — अतुल देऊळगावकर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे
अनुवादक : उल्लेख नाही


विकासाचा खरा अर्थ

गेली तीन दशके जगातील निवडक विचारवंतांमध्ये डॉ. अमर्त्य सेन यांचे नाव अग्रभागी आहे. जागतिक समस्यांवरील त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी अवघे जग सदैव सज्ज असते. अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय, सेन यांचे मत अनिवार्य असते. जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन, अॅग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अॅटकिन्सन हे जगातील आघाडीचे अर्थवेत्ते, ‘आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ’ हे आज कळीचे ठरलेले मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात.

आज विकासाच्या भाषेचा बोलबाला आहे. The Country of First Boys या पुस्तकातून सेन यांनी भूक, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, जागतिकीकरण, परस्परावलंबी जग अशा अनेक अंगांनी विकास तपासून पाहिला आहे.

श्रीमंत राष्ट्रांमधील सर्व नागरिक सुखी आहेत का? जगातील प्रबळ लष्करी राष्ट्र शांत व सुरक्षित आहेत का?

समाजातील अशांततेच्या आणि असुरक्षिततेच्या कारणांचा नायनाट केला नाही, तर शांतता कशी प्रस्थापित होईल? मग अर्थशास्त्राचा अर्थ तरी काय? सेन यांनी ‘दारिद्र्य, युद्ध आणि शांतता’ या निबंधातून हिंसेचा अन्वय लावला आहे.

विकास ही संकल्पना केवळ आर्थिक नसून, त्यामध्ये संपूर्ण समाजाचा विकास अभिप्रेत आहे.

निर्जीव वस्तूंच्या उत्पादनाचे मोजमाप हे विकासाचे निर्देशक होऊ शकत नाही. त्यावरून सामान्य माणसाच्या परिस्थितीचा यत्किंचितही अदमास लागत नाही. जर मानवी समूहाच्या जीवनात गुणात्मक बदल झाला, तरच तो विकास अर्थपूर्ण असेल, या विषयावर अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वाद-संवादाला नव्वदच्या दशकात टोक आले.

त्या दशकात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी मोकाट अर्थकारणाचा जाहीरनामा घोषित केला होता. ‘सरकारने कल्याणकारी कार्य थांबवावे. पाणी, शिक्षण, आरोग्य यांची हमी घेऊ नये. बाजारपेठेमधील हस्तक्षेप थांबवावा. ते काम खाजगी संस्थांवर सोपवावे.’ थॅचर-रेगन आणि मंडळींनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले.

‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते.’

अशीच स्थिती सुरू ठेवल्यास जगाची वाटचाल विध्वंसाच्या खाईकडे असेल, असा या मोकाट अर्थकारणावर घणाघाती हल्ला पाकिस्तानमधील अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी चढवला. त्यांनी अमर्त्य सेन, सुधीर आनंद, कीथ ग्रिफिन, फ्रान्सिस स्ट्युअर्ट यांच्या सहकार्याने विकासाची मीमांसा करणारा अभ्यासगट स्थापन केला.

डॉ. हक यांनी ‘शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण, यांचा विचार करून माणसांची अवस्था ठरवली पाहिजे,’ हा सिद्धांत १९९०मध्ये मांडला आणि जगाच्या अर्थविचारांना कलाटणी दिली. पुढे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकरिता मनुष्यविकास निर्देशांक तयार केला. प्रो. अमर्त्य सेन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र डॉ. हक यांच्या विचारांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले.

तेव्हापासून अवघे जग मनुष्यविकास निर्देशांकांच्या घोषणेची दरवर्षी वाट पाहत असते. ‘प्रत्येक देशाचे प्रगती पुस्तक’ अशी ख्याती मनुष्यविकास निर्देशांकाला प्राप्त झाली आहे.

(या दोन अर्थतत्त्वज्ञांना जन्माला घालणारे भारत व पाकिस्तान हे सख्खे शेजारी, लष्करी सामर्थ्यामध्ये जगात आघाडीवर आणि मनुष्यविकासाच्या यादीमध्ये जगाच्या तळाशी आहेत.)

भाग समाप्त — विकासाचा खरा अर्थ माणसाच्या जीवनमानात आहे


शिक्षणातून विकासाची वाट

१. राष्ट्राची प्रगती केवळ आर्थिक निकषांवर नाही, तर मानवी जीवनात झालेल्या सुधारणांवरही मोजली गेली पाहिजे, या विचारातून डॉ. हक यांनी ‘मनुष्य विकास निर्देशांक’ विकसित केला व तो १९९० पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाचा भाग बनला.

पहिला नंबर! सर्व जातिधर्मातील आबालवृद्धांना या पहिल्या नंबरची विलक्षण भुरळ आहे. त्यामुळे पहिल्या नंबरला भारतभूमीवर सदासर्वदा कमालीचा आदर आहे. हा ‘नंबरी भाव’ सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे अनेक भेदभाव जपले गेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., आय.टी. पदवीधर यांना घर व शाळेपासूनच विशेषत्व बहाल केले जाते.

The Country of First Boys या पुस्तकात अर्थतत्त्वज्ञ प्रा. अमर्त्यकुमार सेन म्हणतात, ‘समस्त भारतीयांना प्रदीर्घ काळापासून ‘पहिला क्रमांक’ या लक्षण समूहाने (सिंड्रोम) पछाडलेले आहे.’ ५० वर्षांपूर्वी विंदा करंदीकर यांनी याच भावनेतून ‘एटू लोकांचा देश’ ही कविता लिहिली होती.

राष्ट्रीय पातळीवर अतिशय उच्च पदे उपभोगलेल्या व्यक्तींना शाळेतील नंबरचा आणि गुणांचा विसर कधीही पडू शकत नाही. प्रगत देशांत असे फाजील लाड होत नाहीत.

भारताच्या संदर्भात सेन म्हणतात, ‘वैयक्तिक पातळीवर न थांबता या ‘लाडांनी’ संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली आहे. केवळ अभिजनांच्या शिक्षणांची काळजी वाहणारी व्यवस्था प्राथमिक शिक्षणाची पुरेपूर उपेक्षा करते. आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षणयंत्रणेमुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यातील हा मोठा अडसर आहे. मनुष्यबळाची अशी परवड करणारी अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकत नाही.’

जपानमध्ये १८७२ साली ‘शिक्षणाविना कुठल्याही समूहातील एकही कुटुंब वा कुटुंबातील सदस्य अशिक्षित राहणार नाही,’ असा शिक्षणविषयक महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसृत केला गेला. त्यातून शिक्षणामधील त्रुटींकडे बारकाईने लक्ष दिले गेले. परिणामी, १९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर होऊन आर्थिक झेप घेण्यासाठी सक्षम झाला.

या जपानच्या अनुभवापासून दक्षिण कोरिया, चीन, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या देशांनी स्फूर्ती घेऊन तोच कित्ता गिरवला. आर्थिक जागतिकीकरणाच्या काळात पूर्व आशियायी देशांचा चमत्कार जगासमोर आला, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीची ती परिणती होती. त्यामुळे या देशांत नवीन रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध झाल्या. निर्यात वाढली. आरोग्याच्या समस्या कमी झाल्या.

व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जीवनात विद्येमुळे कसा ‘अर्थ’ प्राप्त होतो, हे सेन उलगडून दाखवतात.

वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची किमया शिक्षणच करू शकते.

शिक्षण हा अग्रक्रम नसणारे देश विकास घडवू शकत नाहीत; परंतु मोकाट अर्थव्यवस्थेचे पाठीराखे तथाकथित ‘इंटरनॅशनल स्कूल’चा सुळसुळाट पाहून थरारतात. त्यांना शिक्षणदेखील पूर्णपणे बाजारपेठेच्याच हातात सोपवायचे आहे. शिक्षणप्रसार हा दारिद्र्य निर्मूलनातील कळीचा व अटळ भाग आहे, याची जाण असणाऱ्या अॅडम स्मिथलासुद्धा अशी भांडवलशाही अभिप्रेत नव्हती.

भारतात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यातील मोठा अडसर, पायाभूत रचना हाच आहे. अजूनही शिक्षणाच्या महामार्गावर कित्येक जाती-जमातींमधील पहिली पिढी येऊ शकत नाही. भटके व आदिवासींना शिक्षणात सामावून घेण्यासाठी उदार व लवचीक धोरण आवश्यक आहे; परंतु ती प्राथमिकता नसल्यामुळे शिक्षणातील दरी वाढतच आहे.

याची खंत बाळगणाऱ्या प्रा. सेन यांनी प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता रुजविण्यासाठी नोबेल पुरस्काराची पूर्ण रक्कम घालून १९९८मध्ये ‘प्रतिची’ या संस्थेची स्थापना केली. (१९१३ साली रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल पुरस्काराची रक्कम ‘शांतीनिकेतन’ स्थापण्यासाठी दिली होती.)

बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांत, ‘अतिशय हलाखीतील पालक कमालीच्या हालअपेष्टा सहन करत मुलांना शिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात. प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी भरमसाठ देणग्या मागितल्यामुळे शाळेपासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे,’ असे या संस्थेचे सर्वेक्षण सांगते.

शिक्षक आणि आरोग्य सेवकांना अर्पण केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, दिल्लीतील वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अंगाचे मुटकुळे करून हाताच्या आधारावर डोके टेकवत गृहपाठ करणाऱ्या चिमुकलीचे छायाचित्र आहे.

पाचव्या शतकात साहित्य, भाषाशास्त्र, वास्तुकला, शिल्पकला, खगोलशास्त्र, औषधी विज्ञान, सार्वजनिक आरोग्य ह्या विषयांमधील जगभरातील अभ्यासकांना उच्च शिक्षण मिळवण्याकरिता नालंदा हे एकमेव विद्यापीठ उपलब्ध होते. चीन, जपान व इतर आशियाई देशांमधील विद्यार्थी तेथे अध्ययनासाठी येत असत.

११९०पासून झालेल्या हल्ल्यांमुळे, सुमारे ७०० वर्षे चाललेली अध्ययन व अध्यापन यात्रा खंडित झाली. (ऑक्सफर्डची स्थापना ११६७, केंब्रिज स्थापना — १२०९) अशा या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना सेन अनेक वर्षांपासून मांडत होते.

२००७मध्ये आशियाई राष्ट्रांच्या परिषदेमध्ये फिलिपाइन्स, चीन, जपान, कोरिया, सिंगापूर या देशांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला. पुढे जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची निवड करून कार्यकारी समिती तयार केली आणि त्याचे नेतृत्व प्रा. सेन यांच्याकडे चालून आले.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदीसुद्धा) यांनी सदैव व सर्व प्रकारचे पाठबळ दिले. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो हे उत्साहाने सहभागी झाले.

केवळ व्यापारच नाही, तर ज्ञानसाधनासुद्धा विविध देशांना एकत्र आणू शकते, हे दाखवून देण्यासाठी अनेक नवनवीन कल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्था निर्माण करण्याचे अथक प्रयत्न चालू होते. मोदी सरकार आल्यानंतर अनेक हस्तक्षेपांमुळे त्याला कशी खीळ बसली, याची सविस्तर कैफियत सेन यांनी मांडली आहे.

सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी प्रा. सेन, डॉ. अनिल काकोडकर व रघुराम राजन, ही प्रभावळ राष्ट्राचे भूषण असते. त्यांना नाकारून त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच होत नाही. राष्ट्राची मात्र अपरिमित हानी होते.

‘रागमाला’ या आत्मचरित्रात रविशंकर यांनी ‘टागोर यांचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला असता, तर त्यांना शेक्सपियर व गटे यांच्या मालिकेत स्थान लाभले असते,’ असे म्हटले आहे.

सेन म्हणतात, ‘हा दावा अतिशयोक्त असला, तरी त्यातून टागोरांच्या विचारांची महती आजही टिकून असल्याकडे रविशंकर लक्ष वेधू इच्छितात. केवळ भारत व बांगला देशच नाही, तर जपान व चीनमध्ये सुद्धा आजदेखील टागोर यांच्या लघुकथा, कविता, निबंध व पत्रव्यवहारांना वाचकवर्ग लाभत आहे.’

खुल्या मनाने प्रत्येक बाबीची कसून चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य हे रवींद्रनाथांचे विलक्षण वैशिष्ट्य होते. याबाबत ते काळाच्या खूपच पुढे होते.

१९३४मध्ये ‘बिहारचा भूकंप म्हणजे जातिभेद पाळण्याची परमेश्वराने दिलेली शिक्षा आहे,’ असे गांधीजी म्हणाले होते. याला जाहीर उत्तर देताना ‘जातिप्रथा ही वाईटच आहे; परंतु भूकंप हा नैसर्गिक आहे, दोन्हींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही,’ असे रवींद्रनाथांनी स्पष्टपणे सांगितले होते.

गांधीजींविषयी असलेल्या अतीव आदरामुळे त्यांना ‘महात्मा’ या उपाधीने गौरवणाऱ्या रवींद्रनाथांनी त्यांच्याशी असणारे मतभेद वेळोवेळी निःसंकोचपणे व्यक्त केले. व्यक्ती वा सत्ता यांच्यामुळे दबून न जाता सुसंस्कृतपणे मतभिन्नता जपण्याच्या स्वातंत्र्याला रवींद्रनाथांनी मूलभूत हक्क मानले.

सेन यांनी ‘टागोर यांनी कोणता बदल घडवला?’ या निबंधात रवींद्रनाथांच्या विचारांमधील अभिजाततेची महती उलगडून दाखविली आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधत भारताला त्यांनी आधुनिक व उदार विचार दिला.

‘क्षुद्र भिंतीविना अखंड जग, मुक्त ज्ञान आणि भयशून्य मन’ ही रवींद्रनाथांची आकांक्षा पसायदानासारखी त्रिकालाबाधित राहणार आहे.

‘कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा, शास्त्रज्ञ, पंडित नाही मी एक वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही.’

संत तुकाराम यांनी सांगितलेली अशी अवस्था, आपल्यासाठी अनेक वेळा होते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील घटना व प्रसंग साधारणपणे सारखेच असतात. सर्वसाधारण व्यक्ती घटनांच्या खोलात जात नाहीत. एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ झाल्यास वैयक्तिक निष्कर्ष काढत व्यक्तीला अथवा नशिबाला जबाबदार धरून हा प्रवास थबकतो.

असामान्य व्यक्ती खोलवर बुडी मारून त्या प्रसंगामागील कारणांचा शोध घेतात. त्यांच्यामुळे महाकाय व्यवस्थेचे आकलन होते. जटिलता, गुंतागुंत, अव्यवस्था ध्यानात येते. प्रश्नाचे स्वरूप आणि उत्तरांची दिशा समजते.

समाजाला विचारांचा आणि विवेकाचा आधार देऊ शकणारे विचारवंत अतिशय दुर्मीळ असतात. वाणी आणि लेखणी यांतून वर्तमानाचा अन्वय घेऊन भविष्यासाठी कृतिआराखडा देणारे प्रा. सेन यांच्यासारखे तत्त्वज्ञ दुर्लभ असतात.

महान कलावंत प्रदीर्घ कालखंडभर एखाद्या संकल्पनेचा विस्तार करीत जातात, निरनिराळ्या पद्धतींनी ती समजावून सांगतात. यातून रागमालिका, चित्रमालिका व वास्तुसंकुलं निर्माण होतात.

गेल्या ४४ वर्षांपासून प्रा. सेन, दारिद्र्यामागील अनेक कारणांचा सखोल मागोवा घेत नवीन पद्धतीने विश्लेषण करीत आहेत. एकाच वेळी तज्ज्ञ व सामान्यांशी संवाद साधताना तशीच मालिका सादर करीत आहेत.

विलंबित, द्रुत, टप्पा, तराणा, या सर्व रीतींनी एकच राग ऐकण्याचा अवर्णनीय आनंद शब्दातीत आहे. त्या दर्जाचा आनंद प्राप्त करायचा असेल, तर सुज्ञांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

भाग समाप्त — विद्येमुळे व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या जीवनाला प्राप्त होणारा ‘अर्थ’


संपादकीय तथ्यपडताळणी

१. अमर्त्य सेन यांचे अर्थशास्त्रातील योगदान

स्थिती : निश्चित

अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी देण्यात आला. त्यांच्या संशोधनात दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि दुष्काळ यांचा विशेष अभ्यास होता. कल्याण मोजताना केवळ उत्पन्न न पाहता व्यक्तीच्या प्रत्यक्ष संधी व क्षमतांचा विचार करावा, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग आहे.


२. मनुष्यविकास निर्देशांक आणि महबूब उल हक

स्थिती : निश्चित

१९९०च्या पहिल्या Human Development Report मध्ये विकासाकडे केवळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने न पाहता मानवी जीवनातील संधी, आरोग्य, शिक्षण आणि योग्य जीवनमान यांचा विचार करण्याची भूमिका मांडण्यात आली. महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली हा दृष्टिकोन UNDPच्या विकासविचारात केंद्रस्थानी आला. अमर्त्य सेन यांच्या capability approach चा त्यावर महत्त्वाचा बौद्धिक प्रभाव होता.

म्हणून लेखातील “हक यांनी निर्देशांक विकसित केला आणि सेन यांनी त्याला तात्त्विक अधिष्ठान दिले” हा मुख्य आशय मोठ्या प्रमाणात बरोबर आहे.


३. थॅचर–रेगन आणि ‘मोकाट अर्थकारण’

स्थिती : अंशतः बरोबर / लेखकाचे विश्लेषण

मार्गरेट थॅचर आणि रोनाल्ड रेगन यांच्या काळात बाजाराभिमुख आर्थिक धोरणांना मोठे महत्त्व मिळाले, हे ऐतिहासिकदृष्ट्या मान्य आहे. मात्र “त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले” हा शब्दशः कारण-परिणामाचा दावा अधिक गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे तो लेखकाचा राजकीय-आर्थिक विश्लेषणात्मक निष्कर्ष म्हणून वाचणे योग्य आहे.


४. १९८०चे दशक आणि रोजगार

स्थिती : संदर्भाधारित / पुरावा अपुरा

‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते’ हे एक व्यापक मूल्यांकन आहे. याला सार्वत्रिक, निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून मांडण्यासाठी देशनिहाय रोजगाराच्या आकडेवारीची आवश्यकता आहे. त्यामुळे हे वाक्य लेखकाच्या संदर्भातील आर्थिक मूल्यांकन म्हणून ठेवणे योग्य.


५. जपानची १८७२ची शिक्षणव्यवस्था

स्थिती : अंशतः बरोबर

जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी करणारा Gakusei अर्थात Education System Order जारी केला. त्यातून देशभर शाळांची रचना उभारण्याचा प्रयत्न झाला. १८८६मध्ये प्राथमिक शिक्षणव्यवस्था अधिक व्यवस्थित करण्यात आली आणि सक्तीच्या शिक्षणाचा विस्तार झाला.

मात्र “१९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक दावा स्वतंत्र स्रोतांमधून येथे निश्चित करता आला नाही. त्यामुळे तो पुरावा अपुरा म्हणून नोंदवणे योग्य.


६. प्रतिची संस्था आणि नोबेल पुरस्काराची रक्कम

स्थिती : अंशतः बरोबर

अमर्त्य सेन यांनी १९९८च्या नोबेल पुरस्कारानंतर मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतील काही भाग वापरून Pratichi Trustशी संबंधित काम सुरू केले. त्यांच्या स्वतःच्या नोबेल चरित्रात साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानतेसाठी पुरस्काराच्या रकमेचा उपयोग केल्याचे स्पष्ट आहे.

मात्र प्रतिचीच्या अधिकृत संकेतस्थळानुसार Pratichi (India) Trust ची स्थापना १९९९मध्ये झाली, त्यामुळे लेखातील “१९९८मध्ये संस्थेची स्थापना” या तारखेला दुरुस्तीची आवश्यकता आहे.


७. नालंदा विद्यापीठ

स्थिती : मुख्य आशय निश्चित; काही तपशील वादग्रस्त/अतिशयोक्त

नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे बौद्ध शिक्षणकेंद्र होते. UNESCOनुसार नालंदा महाविहाराचा शैक्षणिक इतिहास साधारण पाचव्या ते तेराव्या शतकापर्यंतच्या दीर्घ कालखंडाशी संबंधित आहे आणि चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका व आग्नेय आशियातून विद्वान तेथे येत होते.

आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या अधिकृत इतिहासानुसार पुनरुज्जीवनाची कल्पना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६मध्ये मांडली; २००७च्या East Asia Summit प्रक्रियेत त्याला पाठबळ मिळाले. भारताच्या सरकारने २००७मध्ये Amartya Sen यांच्या अध्यक्षतेखाली Nalanda Mentor Group स्थापन केला.

त्यामुळे लेखातील सेन यांच्या भूमिकेचा मुख्य भाग निश्चित आहे.

मात्र “नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते”, “११९०पासून हल्ले सुरू झाले” आणि “सुमारे ७०० वर्षांची यात्रा एका विशिष्ट घटनेमुळे खंडित झाली” हे तपशील अधिक सावधपणे मांडणे आवश्यक आहे. UNESCOचा अधिकृत इतिहास नालंदेच्या ऱ्हासाला तेराव्या शतकातील विध्वंस व त्यानंतरच्या त्यागाशी जोडतो.


८. आधुनिक नालंदा विद्यापीठ

स्थिती : निश्चित

भारतीय संसदेने Nalanda University Act, 2010 मंजूर केला आणि आधुनिक नालंदा विद्यापीठाची स्थापना संस्थात्मक स्वरूपात झाली. अधिकृत माहितीनुसार पहिले विद्यार्थी सप्टेंबर २०१४मध्ये दाखल झाले.


९. अमर्त्य सेन आणि ‘The Country of First Boys’

स्थिती : निश्चित

The Country of First Boys and Other Essays हे अमर्त्य सेन यांचे पुस्तक Oxford University Pressने २०१५मध्ये प्रकाशित केले. पुस्तकात दारिद्र्य, विषमता, भूक, निरक्षरता, जागतिकीकरण, माध्यमे, स्वातंत्र्य, अन्याय आणि सामाजिक वगळणे यांसारख्या विषयांवरील निबंधांचा समावेश आहे.


संदर्भ व स्रोत

ऑनलाइन मूळ स्रोत:

१. Amartya Sen — Nobel Prize, 1998 — अधिकृत माहिती
Nobel Prize — Amartya Sen, 1998

२. UNDP — Human Development Report 1990
UNDP — Human Development Report 1990

३. UNDP — Human Development: Mahbub ul Haq आणि मानवी विकास दृष्टिकोन
UNDP — Human Development Reports

४. Pratichi — संस्थेची अधिकृत माहिती
Pratichi — About Us

५. Nalanda University — History and Revival
Nalanda University — History and Revival

६. UNESCO — Archaeological Site of Nalanda Mahavihara
UNESCO — Nalanda Mahavihara

७. Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
Oxford University Press — The Country of First Boys

८. Japan National Archives — 1872 Education System
Japan National Archives — Gakusei, 1872


ऐतिहासिक संदर्भभूमी

अमर्त्य सेन यांच्या विकासविचाराचा केंद्रबिंदू “माणसाचे जीवन किती समृद्ध झाले?” हा प्रश्न आहे. केवळ राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन किंवा संपत्ती वाढली म्हणून विकास झाला असे मानता येत नाही. आरोग्य, शिक्षण, सामाजिक संधी, स्वातंत्र्य आणि व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याची वास्तविक क्षमता यांनाही विकासाच्या मोजमापात स्थान मिळाले पाहिजे. UNDPच्या १९९०च्या पहिल्या मानव विकास अहवालातही विकास म्हणजे लोकांच्या निवडी व संधींचा विस्तार अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली.

याच व्यापक विचारपरंपरेत महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. सेन यांना १९९८मध्ये कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समानता या विषयांकडे सेन यांनी केवळ कल्याणकारी खर्च म्हणून नव्हे, तर मानवी क्षमतांच्या निर्मितीचा भाग म्हणून पाहिले. त्यांच्या नोबेल पुरस्कारानंतरच्या कार्यातही साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता यांना महत्त्व दिले गेले.


काय निश्चित? काय वादग्रस्त?

निश्चित

  • अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

  • त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू कल्याण, दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि मानवी क्षमता हा आहे.

  • महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली मानवी विकासाचा दृष्टिकोन UNDPमध्ये १९९०पासून प्रभावी झाला.

  • १९९०चा Human Development Report हा या नव्या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा टप्पा होता.

  • जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी केली.

  • नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणकेंद्र होते.

  • आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत अमर्त्य सेन यांची महत्त्वाची भूमिका होती.

अंशतः बरोबर

  • प्रतिचीची स्थापना १९९८मध्ये झाली — नोबेल पुरस्कार १९९८चा असला तरी Pratichi (India) Trustची स्थापना १९९९ची असल्याचे संस्थेच्या अधिकृत माहितीत आहे.

  • जपान १९१०मध्ये पूर्णपणे साक्षर झाला — हा अचूक दावा अधिक स्वतंत्र पुराव्याने तपासणे आवश्यक आहे.

  • नालंदाच्या विध्वंसाची एकरेषीय तारीख व कारण सांगणे इतिहासाच्या अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सोपे करते.

वादग्रस्त / लेखकाचे विश्लेषण

  • थॅचर–रेगन धोरणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडली गेली, हा दावा.

  • “नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते” हा शब्दशः दावा.

  • “भारत आणि पाकिस्तान मनुष्यविकासाच्या यादीत जगाच्या तळाशी आहेत” हे कोणत्या वर्षाच्या निर्देशांकाचा संदर्भ आहे यावर अवलंबून बदलणारे विधान आहे.

  • अमर्त्य सेन यांच्या विचारांना विशिष्ट राजकीय निर्णयांमुळे “खीळ” बसली, हा लेखातील राजकीय निष्कर्ष स्वतंत्र पुराव्याने तपासण्यासारखा आहे.

पुरावा अपुरा

  • “१९१०मध्ये जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक वर्षाधारित दावा.

  • लेखातील काही व्यक्तींच्या उद्धरणांचे शब्दशः मूळ इंग्रजी संदर्भाशी जुळणारे स्वतंत्र प्रमाणीकरण.



आदरणीय विजयजी, 


अतिशय विचारप्रवर्तक, अस्वस्थ करणारा आणि पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.


तुमच्या लेखाचे मला सर्वाधिक कौतुक यासाठी वाटते की तुम्ही अवघड विषयाला अवघड भाषेत मांडलेले नाही. ससाणा, डोळा, भक्ष्य, पिल्ले, जनुके, डार्विन आणि निसर्गातील क्रौर्य या साध्या प्रतिमांमधून तुम्ही एक मोठा तात्त्विक प्रश्न वाचकासमोर ठेवला आहे.


सहेतुकता आहे की नाही, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे; त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जगात दिसणाऱ्या ‘हेतू’चा अर्थ आपण कसा लावतो, हा प्रश्न आहे.


लेख वाचून एकच जाणवते...


निसर्गाची गूढता कमी करण्यासाठी विज्ञान जन्मलेले नाही; ती गूढता समजून घेण्याची आपली नजर अधिक प्रगल्भ करण्यासाठी ते आहे.


निसर्गाच्या अद्भुत रचनेमागे ईश्वरी हेतू आहे की उत्क्रांतीची अनाकलनीय किमया—हा प्रश्नच या लेखाला विलक्षण खोली देतो. वाचून संपणारा नव्हे, तर वाचल्यानंतरही मनात दीर्घकाळ घुमत राहणारा हा विचारप्रवर्तक लेख आहे.


आणि


निसर्ग आपल्याला उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक देतो आणि कदाचित त्या प्रश्नांना प्रामाणिकपणे सामोरे जाणे, हाच खरा विवेक आहे.

सुनील घायाळ (होशिंग)