* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

9/9/26

विद्येविना विकासाचा 'अर्थ'बोध Development Has No Meaning Without Education

मूळ लेखक / स्रोत / संदर्भ

संदर्भग्रंथ : Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
प्रकाशक : Oxford University Press
लेख/संदर्भ : ग्रंथांचिया द्वारी — अतुल देऊळगावकर
प्रकाशक : विश्वकर्मा पब्लिकेशन, पुणे
अनुवादक : उल्लेख नाही


विकासाचा खरा अर्थ

गेली तीन दशके जगातील निवडक विचारवंतांमध्ये डॉ. अमर्त्य सेन यांचे नाव अग्रभागी आहे. जागतिक समस्यांवरील त्यांचे भाष्य ऐकण्यासाठी अवघे जग सदैव सज्ज असते. अर्थशास्त्रातील कूट समस्या असो वा मंदीतून बाहेर पडण्याचे उपाय, सेन यांचे मत अनिवार्य असते. जोसेफ स्टिगलिट्झ, पॉल क्रुगमन, अॅग्नेस डीटन, थॉमस पिकेटी, अँथनी अॅटकिन्सन हे जगातील आघाडीचे अर्थवेत्ते, ‘आर्थिक विषमता, गरिबी, जागतिकीकरणाचे लाभ’ हे आज कळीचे ठरलेले मुद्दे जागतिक विषयपत्रिकेवर आणण्याचे श्रेय अर्थतत्त्वज्ञ डॉ. अमर्त्य सेन यांनाच देतात.

आज विकासाच्या भाषेचा बोलबाला आहे. The Country of First Boys या पुस्तकातून सेन यांनी भूक, शिक्षण, आरोग्य, प्रसारमाध्यमे, जागतिकीकरण, परस्परावलंबी जग अशा अनेक अंगांनी विकास तपासून पाहिला आहे.

श्रीमंत राष्ट्रांमधील सर्व नागरिक सुखी आहेत का? जगातील प्रबळ लष्करी राष्ट्र शांत व सुरक्षित आहेत का?

समाजातील अशांततेच्या आणि असुरक्षिततेच्या कारणांचा नायनाट केला नाही, तर शांतता कशी प्रस्थापित होईल? मग अर्थशास्त्राचा अर्थ तरी काय? सेन यांनी ‘दारिद्र्य, युद्ध आणि शांतता’ या निबंधातून हिंसेचा अन्वय लावला आहे.

विकास ही संकल्पना केवळ आर्थिक नसून, त्यामध्ये संपूर्ण समाजाचा विकास अभिप्रेत आहे.

निर्जीव वस्तूंच्या उत्पादनाचे मोजमाप हे विकासाचे निर्देशक होऊ शकत नाही. त्यावरून सामान्य माणसाच्या परिस्थितीचा यत्किंचितही अदमास लागत नाही. जर मानवी समूहाच्या जीवनात गुणात्मक बदल झाला, तरच तो विकास अर्थपूर्ण असेल, या विषयावर अनेक वर्षांपासून सुरू असणाऱ्या वाद-संवादाला नव्वदच्या दशकात टोक आले.

त्या दशकात ब्रिटनच्या पंतप्रधान मार्गरेट थॅचर व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांनी मोकाट अर्थकारणाचा जाहीरनामा घोषित केला होता. ‘सरकारने कल्याणकारी कार्य थांबवावे. पाणी, शिक्षण, आरोग्य यांची हमी घेऊ नये. बाजारपेठेमधील हस्तक्षेप थांबवावा. ते काम खाजगी संस्थांवर सोपवावे.’ थॅचर-रेगन आणि मंडळींनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले.

‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते.’

अशीच स्थिती सुरू ठेवल्यास जगाची वाटचाल विध्वंसाच्या खाईकडे असेल, असा या मोकाट अर्थकारणावर घणाघाती हल्ला पाकिस्तानमधील अर्थवेत्ते डॉ. मेहबूब उल हक यांनी चढवला. त्यांनी अमर्त्य सेन, सुधीर आनंद, कीथ ग्रिफिन, फ्रान्सिस स्ट्युअर्ट यांच्या सहकार्याने विकासाची मीमांसा करणारा अभ्यासगट स्थापन केला.

डॉ. हक यांनी ‘शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, जळण, पर्यावरण, यांचा विचार करून माणसांची अवस्था ठरवली पाहिजे,’ हा सिद्धांत १९९०मध्ये मांडला आणि जगाच्या अर्थविचारांना कलाटणी दिली. पुढे त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाकरिता मनुष्यविकास निर्देशांक तयार केला. प्रो. अमर्त्य सेन यांनी त्यांचे घनिष्ठ मित्र डॉ. हक यांच्या विचारांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिले.

तेव्हापासून अवघे जग मनुष्यविकास निर्देशांकांच्या घोषणेची दरवर्षी वाट पाहत असते. ‘प्रत्येक देशाचे प्रगती पुस्तक’ अशी ख्याती मनुष्यविकास निर्देशांकाला प्राप्त झाली आहे.

(या दोन अर्थतत्त्वज्ञांना जन्माला घालणारे भारत व पाकिस्तान हे सख्खे शेजारी, लष्करी सामर्थ्यामध्ये जगात आघाडीवर आणि मनुष्यविकासाच्या यादीमध्ये जगाच्या तळाशी आहेत.)

भाग समाप्त — विकासाचा खरा अर्थ माणसाच्या जीवनमानात आहे


शिक्षणातून विकासाची वाट

१. राष्ट्राची प्रगती केवळ आर्थिक निकषांवर नाही, तर मानवी जीवनात झालेल्या सुधारणांवरही मोजली गेली पाहिजे, या विचारातून डॉ. हक यांनी ‘मनुष्य विकास निर्देशांक’ विकसित केला व तो १९९० पासून संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकास कार्यक्रमाचा भाग बनला.

पहिला नंबर! सर्व जातिधर्मातील आबालवृद्धांना या पहिल्या नंबरची विलक्षण भुरळ आहे. त्यामुळे पहिल्या नंबरला भारतभूमीवर सदासर्वदा कमालीचा आदर आहे. हा ‘नंबरी भाव’ सर्वांच्या अंगवळणी पडला आहे. त्यामुळे अनेक भेदभाव जपले गेले आहेत. डॉक्टर, इंजिनियर, सी.ए., आय.टी. पदवीधर यांना घर व शाळेपासूनच विशेषत्व बहाल केले जाते.

The Country of First Boys या पुस्तकात अर्थतत्त्वज्ञ प्रा. अमर्त्यकुमार सेन म्हणतात, ‘समस्त भारतीयांना प्रदीर्घ काळापासून ‘पहिला क्रमांक’ या लक्षण समूहाने (सिंड्रोम) पछाडलेले आहे.’ ५० वर्षांपूर्वी विंदा करंदीकर यांनी याच भावनेतून ‘एटू लोकांचा देश’ ही कविता लिहिली होती.

राष्ट्रीय पातळीवर अतिशय उच्च पदे उपभोगलेल्या व्यक्तींना शाळेतील नंबरचा आणि गुणांचा विसर कधीही पडू शकत नाही. प्रगत देशांत असे फाजील लाड होत नाहीत.

भारताच्या संदर्भात सेन म्हणतात, ‘वैयक्तिक पातळीवर न थांबता या ‘लाडांनी’ संपूर्ण शिक्षण व्यवस्था बिघडवून टाकली आहे. केवळ अभिजनांच्या शिक्षणांची काळजी वाहणारी व्यवस्था प्राथमिक शिक्षणाची पुरेपूर उपेक्षा करते. आपल्या देशातील अकार्यक्षम व अतिशय सुमार प्राथमिक शिक्षणयंत्रणेमुळे कोट्यवधी मुले शिक्षणापासून दुरावतात. कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यातील हा मोठा अडसर आहे. मनुष्यबळाची अशी परवड करणारी अर्थव्यवस्था भक्कम होऊ शकत नाही.’

जपानमध्ये १८७२ साली ‘शिक्षणाविना कुठल्याही समूहातील एकही कुटुंब वा कुटुंबातील सदस्य अशिक्षित राहणार नाही,’ असा शिक्षणविषयक महत्त्वाकांक्षी जाहीरनामा प्रसृत केला गेला. त्यातून शिक्षणामधील त्रुटींकडे बारकाईने लक्ष दिले गेले. परिणामी, १९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर होऊन आर्थिक झेप घेण्यासाठी सक्षम झाला.

या जपानच्या अनुभवापासून दक्षिण कोरिया, चीन, तैवान, हाँगकाँग, सिंगापूर, थायलंड या देशांनी स्फूर्ती घेऊन तोच कित्ता गिरवला. आर्थिक जागतिकीकरणाच्या काळात पूर्व आशियायी देशांचा चमत्कार जगासमोर आला, विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात शिक्षणात केलेल्या गुंतवणुकीची ती परिणती होती. त्यामुळे या देशांत नवीन रोजगाराच्या संधी सहज उपलब्ध झाल्या. निर्यात वाढली. आरोग्याच्या समस्या कमी झाल्या.

व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जीवनात विद्येमुळे कसा ‘अर्थ’ प्राप्त होतो, हे सेन उलगडून दाखवतात.

वैयक्तिक व सामाजिक जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडविण्याची किमया शिक्षणच करू शकते.

शिक्षण हा अग्रक्रम नसणारे देश विकास घडवू शकत नाहीत; परंतु मोकाट अर्थव्यवस्थेचे पाठीराखे तथाकथित ‘इंटरनॅशनल स्कूल’चा सुळसुळाट पाहून थरारतात. त्यांना शिक्षणदेखील पूर्णपणे बाजारपेठेच्याच हातात सोपवायचे आहे. शिक्षणप्रसार हा दारिद्र्य निर्मूलनातील कळीचा व अटळ भाग आहे, याची जाण असणाऱ्या अॅडम स्मिथलासुद्धा अशी भांडवलशाही अभिप्रेत नव्हती.

भारतात प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करण्यातील मोठा अडसर, पायाभूत रचना हाच आहे. अजूनही शिक्षणाच्या महामार्गावर कित्येक जाती-जमातींमधील पहिली पिढी येऊ शकत नाही. भटके व आदिवासींना शिक्षणात सामावून घेण्यासाठी उदार व लवचीक धोरण आवश्यक आहे; परंतु ती प्राथमिकता नसल्यामुळे शिक्षणातील दरी वाढतच आहे.

याची खंत बाळगणाऱ्या प्रा. सेन यांनी प्राथमिक शिक्षण, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता रुजविण्यासाठी नोबेल पुरस्काराची पूर्ण रक्कम घालून १९९८मध्ये ‘प्रतिची’ या संस्थेची स्थापना केली. (१९१३ साली रवींद्रनाथ टागोर यांनी नोबेल पुरस्काराची रक्कम ‘शांतीनिकेतन’ स्थापण्यासाठी दिली होती.)

बिहार, झारखंड, ओरिसा, पश्चिम बंगाल या राज्यांत, ‘अतिशय हलाखीतील पालक कमालीच्या हालअपेष्टा सहन करत मुलांना शिकवण्यासाठी जीवाचा आटापिटा करीत असतात. प्राथमिक शाळेत दाखल करण्यासाठी भरमसाठ देणग्या मागितल्यामुळे शाळेपासून वंचित राहणाऱ्यांची संख्या वाढत आहे,’ असे या संस्थेचे सर्वेक्षण सांगते.

शिक्षक आणि आरोग्य सेवकांना अर्पण केलेल्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर, दिल्लीतील वाहतुकीच्या रस्त्याच्या कडेला अंगाचे मुटकुळे करून हाताच्या आधारावर डोके टेकवत गृहपाठ करणाऱ्या चिमुकलीचे छायाचित्र आहे.

पाचव्या शतकात साहित्य, भाषाशास्त्र, वास्तुकला, शिल्पकला, खगोलशास्त्र, औषधी विज्ञान, सार्वजनिक आरोग्य ह्या विषयांमधील जगभरातील अभ्यासकांना उच्च शिक्षण मिळवण्याकरिता नालंदा हे एकमेव विद्यापीठ उपलब्ध होते. चीन, जपान व इतर आशियाई देशांमधील विद्यार्थी तेथे अध्ययनासाठी येत असत.

११९०पासून झालेल्या हल्ल्यांमुळे, सुमारे ७०० वर्षे चाललेली अध्ययन व अध्यापन यात्रा खंडित झाली. (ऑक्सफर्डची स्थापना ११६७, केंब्रिज स्थापना — १२०९) अशा या ऐतिहासिक नालंदा विद्यापीठाचे पुनरुज्जीवन करण्याची कल्पना सेन अनेक वर्षांपासून मांडत होते.

२००७मध्ये आशियाई राष्ट्रांच्या परिषदेमध्ये फिलिपाइन्स, चीन, जपान, कोरिया, सिंगापूर या देशांनी नालंदा विद्यापीठाच्या पुनर्स्थापनेचा ठराव मंजूर केला. पुढे जागतिक पातळीवरील तज्ज्ञांची निवड करून कार्यकारी समिती तयार केली आणि त्याचे नेतृत्व प्रा. सेन यांच्याकडे चालून आले.

तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, तसेच बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार (आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदीसुद्धा) यांनी सदैव व सर्व प्रकारचे पाठबळ दिले. सिंगापूरचे परराष्ट्रमंत्री जॉर्ज यो हे उत्साहाने सहभागी झाले.

केवळ व्यापारच नाही, तर ज्ञानसाधनासुद्धा विविध देशांना एकत्र आणू शकते, हे दाखवून देण्यासाठी अनेक नवनवीन कल्पना घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावरील शिक्षणसंस्था निर्माण करण्याचे अथक प्रयत्न चालू होते. मोदी सरकार आल्यानंतर अनेक हस्तक्षेपांमुळे त्याला कशी खीळ बसली, याची सविस्तर कैफियत सेन यांनी मांडली आहे.

सर्व सीमांच्या पलीकडे जाऊन विचार करणारी प्रा. सेन, डॉ. अनिल काकोडकर व रघुराम राजन, ही प्रभावळ राष्ट्राचे भूषण असते. त्यांना नाकारून त्यांचे वैयक्तिक नुकसान काहीच होत नाही. राष्ट्राची मात्र अपरिमित हानी होते.

‘रागमाला’ या आत्मचरित्रात रविशंकर यांनी ‘टागोर यांचा जन्म पाश्चिमात्य देशात झाला असता, तर त्यांना शेक्सपियर व गटे यांच्या मालिकेत स्थान लाभले असते,’ असे म्हटले आहे.

सेन म्हणतात, ‘हा दावा अतिशयोक्त असला, तरी त्यातून टागोरांच्या विचारांची महती आजही टिकून असल्याकडे रविशंकर लक्ष वेधू इच्छितात. केवळ भारत व बांगला देशच नाही, तर जपान व चीनमध्ये सुद्धा आजदेखील टागोर यांच्या लघुकथा, कविता, निबंध व पत्रव्यवहारांना वाचकवर्ग लाभत आहे.’

खुल्या मनाने प्रत्येक बाबीची कसून चिकित्सा करण्याचे स्वातंत्र्य हे रवींद्रनाथांचे विलक्षण वैशिष्ट्य होते. याबाबत ते काळाच्या खूपच पुढे होते.

१९३४मध्ये ‘बिहारचा भूकंप म्हणजे जातिभेद पाळण्याची परमेश्वराने दिलेली शिक्षा आहे,’ असे गांधीजी म्हणाले होते. याला जाहीर उत्तर देताना ‘जातिप्रथा ही वाईटच आहे; परंतु भूकंप हा नैसर्गिक आहे, दोन्हींचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही,’ असे रवींद्रनाथांनी स्पष्टपणे सांगितले होते.

गांधीजींविषयी असलेल्या अतीव आदरामुळे त्यांना ‘महात्मा’ या उपाधीने गौरवणाऱ्या रवींद्रनाथांनी त्यांच्याशी असणारे मतभेद वेळोवेळी निःसंकोचपणे व्यक्त केले. व्यक्ती वा सत्ता यांच्यामुळे दबून न जाता सुसंस्कृतपणे मतभिन्नता जपण्याच्या स्वातंत्र्याला रवींद्रनाथांनी मूलभूत हक्क मानले.

सेन यांनी ‘टागोर यांनी कोणता बदल घडवला?’ या निबंधात रवींद्रनाथांच्या विचारांमधील अभिजाततेची महती उलगडून दाखविली आहे. पौर्वात्य व पाश्चात्त्य विचार, नवता व परंपरा, निसर्ग व मानव, व्यक्ती व समाज, बुद्धी व भावना ही सारी द्वैते मिटवून त्यांच्यात अद्वैत साधत भारताला त्यांनी आधुनिक व उदार विचार दिला.

‘क्षुद्र भिंतीविना अखंड जग, मुक्त ज्ञान आणि भयशून्य मन’ ही रवींद्रनाथांची आकांक्षा पसायदानासारखी त्रिकालाबाधित राहणार आहे.

‘कोणाच्या आधारे करू मी विचार, कोण देईल धीर माझ्या जीवा, शास्त्रज्ञ, पंडित नाही मी एक वाचक, याती शुद्ध एक ठाव नाही.’

संत तुकाराम यांनी सांगितलेली अशी अवस्था, आपल्यासाठी अनेक वेळा होते. आपल्या सर्वांच्या आयुष्यातील घटना व प्रसंग साधारणपणे सारखेच असतात. सर्वसाधारण व्यक्ती घटनांच्या खोलात जात नाहीत. एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ झाल्यास वैयक्तिक निष्कर्ष काढत व्यक्तीला अथवा नशिबाला जबाबदार धरून हा प्रवास थबकतो.

असामान्य व्यक्ती खोलवर बुडी मारून त्या प्रसंगामागील कारणांचा शोध घेतात. त्यांच्यामुळे महाकाय व्यवस्थेचे आकलन होते. जटिलता, गुंतागुंत, अव्यवस्था ध्यानात येते. प्रश्नाचे स्वरूप आणि उत्तरांची दिशा समजते.

समाजाला विचारांचा आणि विवेकाचा आधार देऊ शकणारे विचारवंत अतिशय दुर्मीळ असतात. वाणी आणि लेखणी यांतून वर्तमानाचा अन्वय घेऊन भविष्यासाठी कृतिआराखडा देणारे प्रा. सेन यांच्यासारखे तत्त्वज्ञ दुर्लभ असतात.

महान कलावंत प्रदीर्घ कालखंडभर एखाद्या संकल्पनेचा विस्तार करीत जातात, निरनिराळ्या पद्धतींनी ती समजावून सांगतात. यातून रागमालिका, चित्रमालिका व वास्तुसंकुलं निर्माण होतात.

गेल्या ४४ वर्षांपासून प्रा. सेन, दारिद्र्यामागील अनेक कारणांचा सखोल मागोवा घेत नवीन पद्धतीने विश्लेषण करीत आहेत. एकाच वेळी तज्ज्ञ व सामान्यांशी संवाद साधताना तशीच मालिका सादर करीत आहेत.

विलंबित, द्रुत, टप्पा, तराणा, या सर्व रीतींनी एकच राग ऐकण्याचा अवर्णनीय आनंद शब्दातीत आहे. त्या दर्जाचा आनंद प्राप्त करायचा असेल, तर सुज्ञांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.

भाग समाप्त — विद्येमुळे व्यक्ती, समाज आणि राष्ट्राच्या जीवनाला प्राप्त होणारा ‘अर्थ’


संपादकीय तथ्यपडताळणी

१. अमर्त्य सेन यांचे अर्थशास्त्रातील योगदान

स्थिती : निश्चित

अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी देण्यात आला. त्यांच्या संशोधनात दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि दुष्काळ यांचा विशेष अभ्यास होता. कल्याण मोजताना केवळ उत्पन्न न पाहता व्यक्तीच्या प्रत्यक्ष संधी व क्षमतांचा विचार करावा, हा त्यांच्या विचारांचा महत्त्वाचा भाग आहे.


२. मनुष्यविकास निर्देशांक आणि महबूब उल हक

स्थिती : निश्चित

१९९०च्या पहिल्या Human Development Report मध्ये विकासाकडे केवळ राष्ट्रीय उत्पन्नाच्या दृष्टीने न पाहता मानवी जीवनातील संधी, आरोग्य, शिक्षण आणि योग्य जीवनमान यांचा विचार करण्याची भूमिका मांडण्यात आली. महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली हा दृष्टिकोन UNDPच्या विकासविचारात केंद्रस्थानी आला. अमर्त्य सेन यांच्या capability approach चा त्यावर महत्त्वाचा बौद्धिक प्रभाव होता.

म्हणून लेखातील “हक यांनी निर्देशांक विकसित केला आणि सेन यांनी त्याला तात्त्विक अधिष्ठान दिले” हा मुख्य आशय मोठ्या प्रमाणात बरोबर आहे.


३. थॅचर–रेगन आणि ‘मोकाट अर्थकारण’

स्थिती : अंशतः बरोबर / लेखकाचे विश्लेषण

मार्गरेट थॅचर आणि रोनाल्ड रेगन यांच्या काळात बाजाराभिमुख आर्थिक धोरणांना मोठे महत्त्व मिळाले, हे ऐतिहासिकदृष्ट्या मान्य आहे. मात्र “त्यांनी संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडले” हा शब्दशः कारण-परिणामाचा दावा अधिक गुंतागुंतीचा आहे. त्यामुळे तो लेखकाचा राजकीय-आर्थिक विश्लेषणात्मक निष्कर्ष म्हणून वाचणे योग्य आहे.


४. १९८०चे दशक आणि रोजगार

स्थिती : संदर्भाधारित / पुरावा अपुरा

‘१९८०चे दशक हे रोजगारहित विकासाचे दशक होते’ हे एक व्यापक मूल्यांकन आहे. याला सार्वत्रिक, निर्विवाद ऐतिहासिक तथ्य म्हणून मांडण्यासाठी देशनिहाय रोजगाराच्या आकडेवारीची आवश्यकता आहे. त्यामुळे हे वाक्य लेखकाच्या संदर्भातील आर्थिक मूल्यांकन म्हणून ठेवणे योग्य.


५. जपानची १८७२ची शिक्षणव्यवस्था

स्थिती : अंशतः बरोबर

जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी करणारा Gakusei अर्थात Education System Order जारी केला. त्यातून देशभर शाळांची रचना उभारण्याचा प्रयत्न झाला. १८८६मध्ये प्राथमिक शिक्षणव्यवस्था अधिक व्यवस्थित करण्यात आली आणि सक्तीच्या शिक्षणाचा विस्तार झाला.

मात्र “१९१० साली जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक दावा स्वतंत्र स्रोतांमधून येथे निश्चित करता आला नाही. त्यामुळे तो पुरावा अपुरा म्हणून नोंदवणे योग्य.


६. प्रतिची संस्था आणि नोबेल पुरस्काराची रक्कम

स्थिती : अंशतः बरोबर

अमर्त्य सेन यांनी १९९८च्या नोबेल पुरस्कारानंतर मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेतील काही भाग वापरून Pratichi Trustशी संबंधित काम सुरू केले. त्यांच्या स्वतःच्या नोबेल चरित्रात साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानतेसाठी पुरस्काराच्या रकमेचा उपयोग केल्याचे स्पष्ट आहे.

मात्र प्रतिचीच्या अधिकृत संकेतस्थळानुसार Pratichi (India) Trust ची स्थापना १९९९मध्ये झाली, त्यामुळे लेखातील “१९९८मध्ये संस्थेची स्थापना” या तारखेला दुरुस्तीची आवश्यकता आहे.


७. नालंदा विद्यापीठ

स्थिती : मुख्य आशय निश्चित; काही तपशील वादग्रस्त/अतिशयोक्त

नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे बौद्ध शिक्षणकेंद्र होते. UNESCOनुसार नालंदा महाविहाराचा शैक्षणिक इतिहास साधारण पाचव्या ते तेराव्या शतकापर्यंतच्या दीर्घ कालखंडाशी संबंधित आहे आणि चीन, कोरिया, जपान, तिबेट, मंगोलिया, श्रीलंका व आग्नेय आशियातून विद्वान तेथे येत होते.

आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या अधिकृत इतिहासानुसार पुनरुज्जीवनाची कल्पना डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी २००६मध्ये मांडली; २००७च्या East Asia Summit प्रक्रियेत त्याला पाठबळ मिळाले. भारताच्या सरकारने २००७मध्ये Amartya Sen यांच्या अध्यक्षतेखाली Nalanda Mentor Group स्थापन केला.

त्यामुळे लेखातील सेन यांच्या भूमिकेचा मुख्य भाग निश्चित आहे.

मात्र “नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते”, “११९०पासून हल्ले सुरू झाले” आणि “सुमारे ७०० वर्षांची यात्रा एका विशिष्ट घटनेमुळे खंडित झाली” हे तपशील अधिक सावधपणे मांडणे आवश्यक आहे. UNESCOचा अधिकृत इतिहास नालंदेच्या ऱ्हासाला तेराव्या शतकातील विध्वंस व त्यानंतरच्या त्यागाशी जोडतो.


८. आधुनिक नालंदा विद्यापीठ

स्थिती : निश्चित

भारतीय संसदेने Nalanda University Act, 2010 मंजूर केला आणि आधुनिक नालंदा विद्यापीठाची स्थापना संस्थात्मक स्वरूपात झाली. अधिकृत माहितीनुसार पहिले विद्यार्थी सप्टेंबर २०१४मध्ये दाखल झाले.


९. अमर्त्य सेन आणि ‘The Country of First Boys’

स्थिती : निश्चित

The Country of First Boys and Other Essays हे अमर्त्य सेन यांचे पुस्तक Oxford University Pressने २०१५मध्ये प्रकाशित केले. पुस्तकात दारिद्र्य, विषमता, भूक, निरक्षरता, जागतिकीकरण, माध्यमे, स्वातंत्र्य, अन्याय आणि सामाजिक वगळणे यांसारख्या विषयांवरील निबंधांचा समावेश आहे.


संदर्भ व स्रोत

ऑनलाइन मूळ स्रोत:

१. Amartya Sen — Nobel Prize, 1998 — अधिकृत माहिती
Nobel Prize — Amartya Sen, 1998

२. UNDP — Human Development Report 1990
UNDP — Human Development Report 1990

३. UNDP — Human Development: Mahbub ul Haq आणि मानवी विकास दृष्टिकोन
UNDP — Human Development Reports

४. Pratichi — संस्थेची अधिकृत माहिती
Pratichi — About Us

५. Nalanda University — History and Revival
Nalanda University — History and Revival

६. UNESCO — Archaeological Site of Nalanda Mahavihara
UNESCO — Nalanda Mahavihara

७. Amartya Sen — The Country of First Boys and Other Essays
Oxford University Press — The Country of First Boys

८. Japan National Archives — 1872 Education System
Japan National Archives — Gakusei, 1872


ऐतिहासिक संदर्भभूमी

अमर्त्य सेन यांच्या विकासविचाराचा केंद्रबिंदू “माणसाचे जीवन किती समृद्ध झाले?” हा प्रश्न आहे. केवळ राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन किंवा संपत्ती वाढली म्हणून विकास झाला असे मानता येत नाही. आरोग्य, शिक्षण, सामाजिक संधी, स्वातंत्र्य आणि व्यक्तीला आपल्या इच्छेनुसार जीवन जगण्याची वास्तविक क्षमता यांनाही विकासाच्या मोजमापात स्थान मिळाले पाहिजे. UNDPच्या १९९०च्या पहिल्या मानव विकास अहवालातही विकास म्हणजे लोकांच्या निवडी व संधींचा विस्तार अशी भूमिका स्पष्ट करण्यात आली.

याच व्यापक विचारपरंपरेत महबूब उल हक आणि अमर्त्य सेन यांचे कार्य महत्त्वाचे ठरते. सेन यांना १९९८मध्ये कल्याण अर्थशास्त्रातील योगदानासाठी नोबेल पुरस्कार मिळाला.

शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक समानता या विषयांकडे सेन यांनी केवळ कल्याणकारी खर्च म्हणून नव्हे, तर मानवी क्षमतांच्या निर्मितीचा भाग म्हणून पाहिले. त्यांच्या नोबेल पुरस्कारानंतरच्या कार्यातही साक्षरता, प्राथमिक आरोग्यसेवा आणि लिंगसमानता यांना महत्त्व दिले गेले.


काय निश्चित? काय वादग्रस्त?

निश्चित

  • अमर्त्य सेन यांना १९९८चा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला.

  • त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू कल्याण, दारिद्र्य, विषमता, सामाजिक निवड आणि मानवी क्षमता हा आहे.

  • महबूब उल हक यांच्या नेतृत्वाखाली मानवी विकासाचा दृष्टिकोन UNDPमध्ये १९९०पासून प्रभावी झाला.

  • १९९०चा Human Development Report हा या नव्या दृष्टिकोनाचा महत्त्वाचा टप्पा होता.

  • जपानने १८७२मध्ये आधुनिक राष्ट्रीय शिक्षणव्यवस्थेची पायाभरणी केली.

  • नालंदा हे प्राचीन भारतातील अत्यंत महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय शिक्षणकेंद्र होते.

  • आधुनिक नालंदा विद्यापीठाच्या पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियेत अमर्त्य सेन यांची महत्त्वाची भूमिका होती.

अंशतः बरोबर

  • प्रतिचीची स्थापना १९९८मध्ये झाली — नोबेल पुरस्कार १९९८चा असला तरी Pratichi (India) Trustची स्थापना १९९९ची असल्याचे संस्थेच्या अधिकृत माहितीत आहे.

  • जपान १९१०मध्ये पूर्णपणे साक्षर झाला — हा अचूक दावा अधिक स्वतंत्र पुराव्याने तपासणे आवश्यक आहे.

  • नालंदाच्या विध्वंसाची एकरेषीय तारीख व कारण सांगणे इतिहासाच्या अधिक गुंतागुंतीच्या प्रक्रियेला सोपे करते.

वादग्रस्त / लेखकाचे विश्लेषण

  • थॅचर–रेगन धोरणांमुळे संयुक्त राष्ट्रसंघाची गरिबाभिमुख धोरणे बदलण्यास भाग पाडली गेली, हा दावा.

  • “नालंदा हे एकमेव विद्यापीठ होते” हा शब्दशः दावा.

  • “भारत आणि पाकिस्तान मनुष्यविकासाच्या यादीत जगाच्या तळाशी आहेत” हे कोणत्या वर्षाच्या निर्देशांकाचा संदर्भ आहे यावर अवलंबून बदलणारे विधान आहे.

  • अमर्त्य सेन यांच्या विचारांना विशिष्ट राजकीय निर्णयांमुळे “खीळ” बसली, हा लेखातील राजकीय निष्कर्ष स्वतंत्र पुराव्याने तपासण्यासारखा आहे.

पुरावा अपुरा

  • “१९१०मध्ये जपान संपूर्णपणे साक्षर झाला” हा अचूक वर्षाधारित दावा.

  • लेखातील काही व्यक्तींच्या उद्धरणांचे शब्दशः मूळ इंग्रजी संदर्भाशी जुळणारे स्वतंत्र प्रमाणीकरण.



आदरणीय विजयजी, 


अतिशय विचारप्रवर्तक, अस्वस्थ करणारा आणि पुन्हा पुन्हा वाचावा असा लेख.


तुमच्या लेखाचे मला सर्वाधिक कौतुक यासाठी वाटते की तुम्ही अवघड विषयाला अवघड भाषेत मांडलेले नाही. ससाणा, डोळा, भक्ष्य, पिल्ले, जनुके, डार्विन आणि निसर्गातील क्रौर्य या साध्या प्रतिमांमधून तुम्ही एक मोठा तात्त्विक प्रश्न वाचकासमोर ठेवला आहे.


सहेतुकता आहे की नाही, हा प्रश्न जितका महत्त्वाचा आहे; त्याहून महत्त्वाचे म्हणजे आपल्याला जगात दिसणाऱ्या ‘हेतू’चा अर्थ आपण कसा लावतो, हा प्रश्न आहे.


लेख वाचून एकच जाणवते...


निसर्गाची गूढता कमी करण्यासाठी विज्ञान जन्मलेले नाही; ती गूढता समजून घेण्याची आपली नजर अधिक प्रगल्भ करण्यासाठी ते आहे.


निसर्गाच्या अद्भुत रचनेमागे ईश्वरी हेतू आहे की उत्क्रांतीची अनाकलनीय किमया—हा प्रश्नच या लेखाला विलक्षण खोली देतो. वाचून संपणारा नव्हे, तर वाचल्यानंतरही मनात दीर्घकाळ घुमत राहणारा हा विचारप्रवर्तक लेख आहे.


आणि


निसर्ग आपल्याला उत्तरांपेक्षा प्रश्न अधिक देतो आणि कदाचित त्या प्रश्नांना प्रामाणिकपणे सामोरे जाणे, हाच खरा विवेक आहे.

सुनील घायाळ (होशिंग)



9/6/26

सहेतुकता Purposefulness

मूळ स्रोत

सातेरीचा वाडा झाला चिरेबंदी — माधव गाडगीळ
वारूळ पुराण — ई. ओ. विल्सन
संक्षिप्त अनुवाद — नंदा खरे
प्रकाशक — अरविंद घनःश्याम पाटकर


सहेतुकता

निसर्ग निवडीतून उभारल्या गेलेल्या सर्वच पदार्थांची, जीवांची तसेच कल्पसृष्टीतील व कृत्रिम वस्तुसृष्टीतील घटकांची सहेतुक आणि जटिल रचना ही आणखी एक खासियत आहे.

मानवनिर्मित कॅमेऱ्याच्या रचनेचा, व्यवहाराचा हेतू बाहेरच्या जगात जे आहे त्याची प्रतिमा फिल्मद्वारे उमटवणे हे अगदी स्पष्ट आहे. आधुनिक कॅमेऱ्यांच्या कार्यक्षमतेमागे मानवाने कल्पसृष्टीत रचलेल्या विज्ञानाचे जबरदस्त योगदान आहे. ह्या विज्ञानामागच्या प्रेरणाही स्पष्ट आहेत. पण जीवसृष्टीच्या सहेतुकतेच्या मागे काय आहे?

अशी सहेतुकता आहे हे निःसंशय. कॅमेऱ्याप्रमाणे डोळ्यांच्याही रचनेत प्रकाशकिरण वळवून एकत्रित आणणारी भिंगे आहेत, किती प्रकाश आत येतो हे नियंत्रित करणारे झरोके आहेत, प्रतिमा ज्यावर उमटेल असे पडदे आहेत.

ससाण्यासारख्या शिकारी पक्ष्यांचा डोळा जीवसृष्टीची एक अप्रतिम निर्मिती आहे, अन् ह्या डोळ्याच्या रचनेमागे सुस्पष्ट प्रतिमा उमटवण्याचे उद्दिष्ट आहे हे सहजच पटते. ससाणा उंचावरून उंदरावर झेप घालतो, तेव्हा त्या भरारीचे ध्येय भक्ष्य पकडणे हेही दिसते. ह्या वागणुकीत ससाण्याचे स्वहित आहे हेही स्पष्ट दिसते.

पण जेव्हा तो ते भक्ष्य स्वतः न खाता आपल्या पिलाला भरवतो, तेव्हा या आचरणामागचा हेतू काय?

काही आस्तिक म्हणतात, हे तर देवाने सर्व जीवांना करुणेचे वरदान दिले आहे, त्याचा आविष्कार. निरीश्वरवादी उत्क्रांतीशास्त्र म्हणते, नाही, ह्यामागचा हेतू आहे स्वतःचे जनुक पुढच्या पिढीत उतरवणे. हे जनुक स्वतःचा स्वार्थ जपत असतात, आणि ससाणा, एवढेच काय, सगळे मानव आणि इतर सर्व जीव हे केवळ अशा स्वार्थी जनुकांचे वाहन आहेत.

डार्विनच्या निरूपणाला आता दीडशेवर वर्षे लोटली, तरी अजूनही हा वाद चालू आहे. विशेषतः बायबल व कुराण शब्दशः खरे आहे असे मानणाऱ्या अनेक व्यक्ती सारी जीवसृष्टी ही एक ईश्वरी लीला आहे, उत्क्रांती-बित्क्रांती सगळे झूट आहे, असे घट्टपणे मानतात.

२००८ साली विल्सन ज्या रिपब्लिकन पक्षाचा समर्थक आहे त्या पक्षातर्फे अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षपदाची उमेदवार म्हणून उभी केलेली सेरा पेलिन हीही उत्क्रांतिवाद सपशेल नाकारते.

‘अँटहिल’ पुस्तकातील नायक रॅफ ह्याच वादाच्या भोवऱ्यात अडकतो. त्याला कट्टर बायबलवादी रेनी, ‘तू हार्वर्डमध्ये शिकलास का?’ म्हणून विचारतो.

“शिकलो थोडं हार्वर्डमध्ये. का विचारता आहात?”

“अरे, तू मोबीलमध्ये महत्त्वाचा माणूस होतो आहेस. आमच्या काही धार्मिक लोकांना जरा कुतूहल आहे तुझ्याबद्दल,” लेबो म्हणाला.

रॅफचं उत्तर द्यायच्या आधीच रेनीनं विचारलं, “उत्क्रांती शिकवतात, हार्वर्डला?”

रॅफला त्यांचा रोख कळला.

“हो तर. हार्वर्डला उत्क्रांतीबद्दल शिकवतात. चांगलं विज्ञान आहे ते, भरपूर पुरावे असलेलं. मला कल्पना आहे, की इथल्या अनेकांना ते पटत नाही. अमेरिकाभर काही लोकांना ते पटत नाही.”

वाद सोडवायचं पहिलं तत्त्व, ‘निष्कारण विरोधकांना चिडवू नका’.

“बायबलही शिकवतात?” लेबोनं विचारलं.

“हो तर!”

हे कर्मठ उजवे लोक होते, तर! बिल रॉबिन्सनं सांगितलं होतं, यांच्यापासून सांभाळून राहायला.

“एक अख्खं कॉलेज आहे, ‘स्कूल ऑफ डिव्हिनिटी’ नावाचं. गेली पावणेचारशे वर्षे हार्वर्ड धर्मगुरूंचं शिक्षण करतं आहे!”

आपलं चुकलं आहे, हे रॅफला तत्काळ जाणवलं.

वाद सोडवायचं दुसरं तत्त्व, गमजा मारू नका. विरोधकांना कमी लेखत आहात, असं वाटू देऊ नका. नम्र, तटस्थ रहा.


डार्विन

उत्क्रांतीशास्त्राचा उद्गाता डार्विन अतिशय संवेदनशील, हळवा होता. गौतम बुद्ध सांगतो की त्याने बालपणी मैत्री—सगळ्या जीवांच्या, मानवांच्या बाबत स्नेह वाढवणे, मुदिता—नेहमी आनंदी राहणे, करुणा—सर्वांच्या दुःखात सहभागी होणे, व उपेक्षा—वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करणे हे चार गुण जोपासले.

डार्विनचे चरित्र वाचले तर वाटते की तोही ह्या चार गुणांनी संपन्न होता.

डार्विन स्वतः त्याच्या विद्यार्थिदशेत साऱ्या जीवसृष्टीची जडणघडण, तिच्यातली सहेतुकता ही सारी ईश्वरी लीला आहे असेच मानत होता. त्याला माणसावरची शल्यक्रिया पाहवेना, म्हणून त्याने वैद्यकीय अभ्यासक्रम सोडून दिला आणि ख्रिस्ती धर्मगुरू बनावे या विचाराने धर्मशास्त्र शिकू लागला.

पण त्यातही त्याचे मन रमेना. ते सारखे खुल्या वातावरणात, निसर्गाकडे धावे. इतके की त्याच्या बापाने चिडून त्याला एका पत्रात दम भरला होता : तुला कुत्री, शिकार आणि उंदीर पकडण्याखेरीज काही सुचत नाही, तू आपल्या कुटुंबाला काळिमा फासणार आहेस!

तेव्हा केम्ब्रिज विद्यापीठात धर्मशास्त्र सोडून तो भूशास्त्र, जीवशास्त्राकडे वळला.

पदवीनंतर डार्विनला आपल्या आवडत्या विषयांत खोलात जाण्याची अफलातून संधी मिळाली. ही होती १८३१ इसवी.

युरोपीय देशांचे जगावरील वर्चस्व घट्टपणे प्रस्थापित झाले होते. अमेरिका, ऑस्ट्रेलिया खंडांवरील मूलवासियांची हत्याकांडे जोशात चालू होती. आफ्रिकेतील काळ्या गुलामांवर अनन्वित अत्याचार चालू होते.

युरोपीय राष्ट्रांतील अंतस्पर्धेत आरमारांची भूमिका महत्त्वाची होती. ह्या गलबतांना समुद्राचे सुव्यवस्थित नकाशे, बंदरांतील वाटा आणि प्रवाह समजावून घेणे आवश्यक होते.

ह्या संदर्भातील माहिती संकलनासाठी इंग्रजांनी ‘बीगल’ नावाचे जहाज जगभरच्या प्रवासासाठी सज्ज केले होते. त्या जहाजाचे काम होते सगळीकडे नौकानयनासाठी महत्त्वाची सागरी निरीक्षणे करणे, विशेषतः बंदरांजवळच्या भूभागाची, समुद्राच्या खोलीची बारकाव्याने माहिती गोळा करणे.

सहा वर्षे ही सफर चालणार होती. जेव्हा जहाज बंदरांत समुद्राची खोली मोजत खूप दिवस थांबणार होते, तेव्हा त्या त्या खंडांत भरपूर प्रवास करणे शक्य होते.

डार्विनला बीगलवर निसर्गाचा अभ्यासक अशी बिनपगारी नोकरी देऊ केली गेली. डार्विनच्या सुदैवाने त्याचे कुटुंब आर्थिक सुस्थितीत होते, त्याला हे काम पत्करणे शक्य होते.


क्रौर्य

ह्या सफरीत डार्विनने अनेक नावीन्यपूर्ण, महत्त्वाचे अनुभव घेतले; जीवसृष्टीबद्दल आणि मानवी विश्वाबद्दलही.

सुरुवातीला डार्विनच्या मनातही त्या वेळचे प्रचलित समज घट्ट रुजलेले होते. ह्या समजांप्रमाणे साऱ्या जीवजाती देवाने एकाच वेळी, आज जिथे आहेत त्याच ठिकाणी एकदाच निर्माण केल्या आणि त्या तशाच, तिथेच काहीही बदल न होता टिकून आहेत.

असाही समज होता की प्रत्येक जीवजाती निर्माण करताना ईश्वराच्या मनात काहीतरी आदर्श शरीररचना होती, त्याहून जे काही वेगळे दिसते ते सगळे सदोष आहे. एकाच मुशीत ओतल्याप्रमाणे अगदी एकसाच्याचे असणे ही जीवजातींची प्रकृती आहे, जे वैविध्य दिसते ती विकृती आहे.

पण डार्विन जसजसे जगभरचे जीवसृष्टीचे अचाट वैविध्य समजावून घेऊ लागला, त्याचा निरनिराळ्या खंडांत-बेटांत विस्तार पाहू लागला, तसतसे त्याच्या मनात अनेक प्रश्न डोकावू लागले.

जर देवाने स्वतंत्रपणे जिथे आहेत तिथेच सगळ्या जीवजाती निर्माण केल्या, तर मग दक्षिण अमेरिकेजवळच्या बेटांवरच्या जीवजातींत आणि दक्षिण अमेरिका खंडावरच्या जीवजातींत खूप सारखेपणा का?

आणि तसेच आफ्रिका खंडाजवळच्या बेटांवरच्या जीवजातींत आणि आफ्रिका खंडावरच्या जीवजातींत खूप सारखेपणा का?

वर जरी काही आफ्रिकेजवळच्या बेटांची परिस्थिती दक्षिण अमेरिकेजवळच्या बेटांसारखीच आहे, तरी त्यांच्यावरच्या जीवजातींत एवढा फरक का?

भरपूर गोडे पाणी असलेल्या सागरी बेटांवर समुद्रप्रवास सोसू शकतील असे खवलेवाले सरडे दिसतात, पण त्या बेटावरच्या गोड्या पाण्यात खुषीने जगतील पण ज्यांना समुद्रप्रवास सोसत नाही असे पातळ, ओलसर कातडीचे बेडूक दिसत नाहीत हे का?

डार्विनला वाटायला लागले की, छेः, मोठ्या खंडांवर प्रथम जीवजातींची उत्क्रांती झाली, मग त्या अपघाताने, योगायोगाने दूर-दूरच्या बेटांवर पोचल्या, तिथल्या परिस्थिती हळूहळू बदलल्या असेच असावे.

आणि ह्या बदलांचा मूलाधार आहे, सर्व जीवजातींत आढळणारे मुबलक वैविध्याचे भांडार. वैविध्य हीच जीवसृष्टीची प्रकृती आहे, विकृती नव्हे.

ह्या निसर्गनिर्मित वैविध्यातून यथावकाश नवनव्या रूपांच्या, रचनेच्या, निसर्गातील नवनव्या भूमिका बजावू शकणाऱ्या जीवजाती उद्भवल्या.

असे वेगळे विचार करायला लागल्यावर डार्विनच्या मनात आणखीही प्रश्न डोकावू लागले.

प्राणिजगतात त्याला अंगावर काटा आणणारे क्रौर्य दिसू लागले. काही तऱ्हेच्या गांधिलमाशा आपल्या पिल्लांना पोसायला एक अजब प्रकारे जिवंत खाद्य पुरवतात. त्या फुलपाखरे-पतंगांच्या सुरवंटांना पकडून त्यांच्या मज्जासंस्थेत आपल्या नांगीने विष भिनवतात.

ते भिनले की सावजाच्या साऱ्या अंगावर जणू काही अर्धांगवायूचा झटका येतो. पण ते जिवंत राहतात.

मग या असहाय्य सुरवंटांना आपल्या कोठडीत घुसवून आई गांधिलमाशा त्यांच्यावर अंडी घालतात. अंड्यांतून यथावकाश बाहेर आलेल्या अळ्यांना हे मूर्च्छित सुरवंटांचे जिवंत खाद्य मिळते, ते त्या अळ्या सुरवंट जिंदे असतानाच शांतपणे खातात.

कोण्या ईश्वरेच्छेतून असे क्रौर्य निर्माण होईल हे काही डार्विनला रुचेना. त्याने ठरवले की ही तर निसर्गाचीच किमया असली पाहिजे!

डार्विन हाडाचा मानवतावादी होता. वंशद्वेष, दुसऱ्या वंशाच्या लोकांवरील अत्याचार त्याला असह्य वाटे. त्याने त्याच्या सफरीत असे खूपच पाहिले.

त्याने चिले, अर्जेन्टिनातल्या मूलवासी अमेरिन्डियनांची श्वापदासारखी शिकार केली जात असलेली पाहिली, आणि गोऱ्या लोकांकडून ह्या रानटी जमाती नष्ट केल्याच पाहिजेत असे प्रतिपादनही ऐकले.

त्याच्या दैनंदिनीत त्याने ब्राझिलमध्ये पाहिलेल्या काळ्या गुलामांवरील अन्यायाचे हृदयद्रावक वर्णन केले आहे :

“ईश्वरा, मला पुन्हा जेथे गुलामगिरी आहे अशा देशात कधीही जायला लावू नको. जेव्हा लांबून कोठून आर्त किंकाळी ऐकू येते, तेव्हा आजसुद्धा पेर्नाम्बुक्कोजवळच्या एका घराची दारुण स्मृती माझ्या मनात जागी होते. तिथे मला अंगावर शहारे आणणाऱ्या रडण्या-भेकण्याचे आवाज ऐकायला लागले - मला खात्री होती की कोणातरी बिचाऱ्या गुलामाचे हालहाल केले जात होते, पण थांबवा म्हणून मला बोलणेही अशक्य होते.

मला जरा अस्वच्छ पेल्यानं पाणी दिले म्हणून एका सहा वर्षाच्या बिचाऱ्या मुलाच्या डोक्यावर तीनदा जोरात घोड्याच्या चाबकाचे फटकारे दिल्याचे मी माझ्या डोळ्यांनी अवाक् होऊन, हतबलतेने पाहात राहिलो. रीओ डी जानीरोत माझ्या समोरच्या घरात राहणारी बाई गुलामांची बोटे चिरडण्यासाठी एक पक्कड वापरायची.

मी ह्या साऱ्या भयानक, शिसारी आणणाऱ्या गोष्टींचा उल्लेखही केला नसता. पण अनेक गोरे लोक सरळ-सरळ गुलामगिरीचे समर्थन करताना जेव्हा मी ऐकतो, तेव्हा ह्याचा उल्लेख केलाच पाहिजे, असे मला वाटते.”


भाग समाप्त — निसर्गातील वैविध्य, क्रौर्य आणि डार्विनच्या विचारांची बदलती दिशा


मित्रा, हा मजकूर ‘वारूळ पुराण’ — ई. ओ. विल्सन, संक्षिप्त अनुवाद : नंदा खरे या संदर्भातील आहे. तुझ्या कायमच्या संपादकीय पद्धतीनुसार मी मूळ मजकूर वेगळा ठेवून, शुद्धलेखन व मांडणी सुधारली आहे आणि तथ्यपडताळणी स्वतंत्र ठेवली आहे. विशेषतः E.O. Wilson यांचा रिपब्लिकन पक्षाशी संबंध, Sarah Palin यांची उत्क्रांतीविषयक भूमिका, Darwin यांचा गुलामगिरीविरोध आणि Harvard Divinity School या मुद्द्यांची स्वतंत्र पडताळणी केली आहे.

संपादकीय तथ्यपडताळणी

१. “उत्क्रांतीशास्त्राचा उद्गाता डार्विन”

स्थिती : अंशतः बरोबर

चार्ल्स डार्विन उत्क्रांतीच्या आधुनिक वैज्ञानिक सिद्धांताच्या प्रमुख संस्थापकांपैकी एक होते. मात्र उत्क्रांतीची कल्पना डार्विनपूर्वीही अस्तित्वात होती. डार्विनचे वैशिष्ट्य म्हणजे नैसर्गिक निवडीद्वारे उत्क्रांतीचे सुसंगत वैज्ञानिक स्पष्टीकरण.

२. डार्विनचा वैद्यकीय अभ्यास

स्थिती : निश्चित

डार्विनने १८२५–१८२७ दरम्यान एडिनबर्गमध्ये वैद्यकाचा अभ्यास केला. शस्त्रक्रिया आणि शरीरविच्छेदनाबद्दल त्याला तीव्र अस्वस्थता होती. त्यानंतर तो केम्ब्रिजला गेला आणि धर्मगुरू होण्याच्या उद्देशाने शिक्षण घेऊ लागला.

३. ‘बीगल’वरील प्रवास

स्थिती : निश्चित

डार्विनचा HMS Beagle वरील प्रवास १८३१–१८३६ दरम्यान झाला. या प्रवासातील निरीक्षणे आणि नमुना-संकलन त्याच्या पुढील वैज्ञानिक विचारांच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले.

४. गांधिलमाशा आणि जिवंत सुरवंट

स्थिती : अंशतः बरोबर

परजीवी/परजीवी-स्वभावाच्या अनेक गांधिलमाशा आपल्या अळ्यांसाठी इतर कीटकांचा वापर करतात. काही जाती भक्ष्याला विषाने अचल करतात आणि अळ्यांना जिवंत खाद्य उपलब्ध करून देतात. मात्र मजकुरात वर्णन केलेली विशिष्ट प्रजाती आणि तिच्या वर्तनाचे प्रत्येक तपशील स्वतंत्र प्रजाती-स्तरावरील पुराव्याने तपासणे आवश्यक आहे.

५. “जनुक स्वतःचा स्वार्थ जपत असतात”

स्थिती : वादग्रस्त/संकल्पनात्मक

‘स्वार्थी जनुक’ ही उत्क्रांतीविषयक एक प्रभावी संकल्पना आहे; परंतु जनुकांना मानवी अर्थाने ‘स्वार्थ’ किंवा ‘हेतू’ असतो असे अक्षरशः म्हणणे योग्य नाही. E.O. Wilson यांनी स्वतः नंतरच्या कामात ‘kin selection’ विरुद्ध ‘group selection’ याबाबत महत्त्वपूर्ण वाद मांडला. त्यामुळे या विधानाकडे वैज्ञानिक रूपक म्हणून पाहणे अधिक योग्य आहे.

६. “विल्सन ज्या रिपब्लिकन पक्षाचा समर्थक आहे”

स्थिती : पुरावा अपुरा

E.O. Wilson हे प्रसिद्ध जीवशास्त्रज्ञ व उत्क्रांतीविषयक विचारवंत होते. उपलब्ध विश्वसनीय स्रोतांतून त्यांना अमेरिकेच्या रिपब्लिकन पक्षाचा समर्थक म्हणून निश्चित करण्यास पुरेसा आधार मिळत नाही. त्यामुळे मूळ मजकुरातील हा दावा निश्चित तथ्य म्हणून मांडता येत नाही.

७. Sarah Palin आणि उत्क्रांती

स्थिती : अंशतः बरोबर

२००६ मध्ये Sarah Palin यांनी शाळांमध्ये उत्क्रांती आणि creationism दोन्ही शिकवण्यासंबंधी अनुकूल भूमिका व्यक्त केली होती. मात्र “उत्क्रांतिवाद सपशेल नाकारते” हे विधान अतिशयोक्त आहे. २००८ मध्ये त्यांनी उत्क्रांती शाळांमध्ये शिकवली पाहिजे, असेही म्हटले होते; त्याचबरोबर पृथ्वीच्या निर्मितीत देवाचा हात असल्याची वैयक्तिक श्रद्धा त्यांनी व्यक्त केली होती.

८. Harvard Divinity School

स्थिती : अंशतः बरोबर

Harvard येथे धर्मशास्त्रीय शिक्षणाची परंपरा संस्थेच्या सुरुवातीपासून आहे; मात्र स्वतंत्र Harvard Divinity School १८१६ मध्ये स्थापन झाले. त्यामुळे “गेली पावणेचारशे वर्षे School of Divinity धर्मगुरूंचे शिक्षण करत आहे” हे शब्दशः अचूक नाही. Harvard College ची स्थापना १६३६ मध्ये झाली, तर Divinity School १८१६ मध्ये स्थापन झाले.

९. डार्विन आणि गुलामगिरीविरोध

स्थिती : निश्चित

हा भाग मजबूत प्राथमिक पुराव्याने समर्थित आहे. डार्विनच्या Beagle diary आणि प्रकाशित लेखनात ब्राझिलमधील गुलामांवरील अत्याचाराबद्दल त्याने तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्याने गुलामगिरीविरोधी भूमिका स्पष्टपणे नोंदवली होती.

१०. सहा-सात वर्षांच्या मुलाला चाबकाने मारल्याचा प्रसंग

स्थिती : निश्चित

डार्विनच्या प्रकाशित प्रवासवर्णनात सहा-सात वर्षांच्या मुलाला घोड्याच्या चाबकाने मारल्याचा प्रसंग नोंदलेला आहे. मूळ मजकुरातील “सहा वर्षांच्या” ऐवजी डार्विनच्या इंग्रजी नोंदीत “six or seven years old” असा उल्लेख आढळतो.

११. Darwin आणि ‘सहेतुकता’

स्थिती : इतिहासाच्या संदर्भात स्पष्टीकरण आवश्यक

डार्विनच्या तरुणपणीच्या धार्मिक विश्वासांमध्ये बदल झाला आणि नैसर्गिक निवडीच्या सिद्धांताच्या विकासानंतर त्याचा देव, निर्मिती आणि जीवसृष्टीविषयीचा दृष्टिकोन अधिक गुंतागुंतीचा झाला. त्यामुळे “डार्विन सुरुवातीला सहेतुक जीवसृष्टी मानत होता” हे broadly योग्य असले तरी त्याच्या संपूर्ण बौद्धिक प्रवासाला एका वाक्यात बांधणे योग्य नाही.


संदर्भ व स्रोत

ऑनलाइन मूळ स्रोत:

१. Charles Darwin — Beagle Diary

२. Charles Darwin — Beagle Diary, Rio de Janeiro observations

३. Charles Darwin — Voyage / Journal of Researches

४. Darwin Correspondence Project — Darwin’s early education and Beagle

५. Darwin Correspondence Project — Darwin’s medical studies

६. Harvard Divinity School — History and Mission

७. Pew Research Center — Sarah Palin, Religion and Politics 2008

८. Natural History Museum — Parasitic wasps and caterpillars

९. Scientific American — E.O. Wilson, The Social Conquest of Earth


ऐतिहासिक संदर्भभूमी

या उताऱ्याचा केंद्रबिंदू जीवसृष्टीतील रचना, हेतू, उत्क्रांती आणि नैसर्गिक निवड यांमधील संबंध हा आहे.

डार्विनच्या काळात जीवसृष्टीतील गुंतागुंतीची रचना ही ईश्वराच्या नियोजनाचा पुरावा मानणारी विचारसरणी प्रभावी होती. डार्विनने मात्र जीवांमधील वैविध्य, भौगोलिक वितरण, अनुकूलन आणि नैसर्गिक निवड यांच्या आधारे त्या रचनेचे नैसर्गिक स्पष्टीकरण मांडले.

E.O. Wilson यांच्या लेखनात हा प्रश्न पुढे आणखी व्यापक होतो—विशेषतः सामाजिक वर्तन, सहकार्य, परोपकार आणि उत्क्रांती यांचा संबंध काय? Wilson यांच्या नंतरच्या मांडणीत ‘selfish gene’ किंवा kin selection पुरेसे स्पष्टीकरण आहे का, यावर त्यांनी स्वतंत्र भूमिका मांडली. हा उत्क्रांतीशास्त्रातील गंभीर वैज्ञानिक वाद आहे; तो “विज्ञान विरुद्ध धर्म” एवढ्यापुरता मर्यादित नाही.

डार्विनच्या Beagle प्रवासाने या बौद्धिक परिवर्तनाला महत्त्वाची पार्श्वभूमी दिली. त्याच्या नोंदींमध्ये दक्षिण अमेरिकेतील जीवसृष्टीबरोबरच मानवी समाज, गुलामगिरी आणि सामाजिक अन्याय यांचेही निरीक्षण दिसते.


काय निश्चित? काय वादग्रस्त?

निश्चित

  • डार्विनने १८२५–१८२७ दरम्यान एडिनबर्गमध्ये वैद्यकाचा अभ्यास केला.

  • Beagle प्रवास १८३१–१८३६ दरम्यान झाला.

  • डार्विनने दक्षिण अमेरिकेतील गुलामगिरीच्या क्रौर्याची प्रत्यक्ष नोंद केली.

  • परजीवी गांधिलमाशांच्या काही जाती जिवंत भक्ष्याचा आपल्या अळ्यांसाठी उपयोग करतात.

  • Harvard Divinity School ची स्थापना १८१६ मध्ये झाली.

अंशतः बरोबर

  • Sarah Palin यांनी उत्क्रांती पूर्णपणे नाकारली, हा दावा अतिशयोक्त आहे.

  • “School of Divinity” जवळपास चारशे वर्षांपासून अस्तित्वात आहे, हा दावा अचूक नाही; Harvard मधील धार्मिक शिक्षण जुने असले तरी स्वतंत्र Divinity School १८१६ मध्ये स्थापन झाले.

  • ‘स्वार्थी जनुक’ ही संकल्पना वैज्ञानिक चर्चेत महत्त्वाची असली तरी तिला अक्षरशः मानवी हेतू देणे योग्य नाही.

वादग्रस्त / पुरावा अपुरा

  • E.O. Wilson हे रिपब्लिकन पक्षाचे समर्थक होते, हा दावा.

  • जीवसृष्टीतील प्रत्येक गुंतागुंतीच्या रचनेमागे एक निश्चित “हेतू” आहे, ही मांडणी वैज्ञानिक भाषेत सावधपणे वापरावी लागते.

  • नैसर्गिक निवड, जनुकांचा ‘स्वार्थ’, वैयक्तिक निवड आणि समूह-निवड यांतील संबंध हा उत्क्रांतीशास्त्रातील दीर्घकाळ चाललेला वाद आहे.


मनस्वी प्रतिक्रिया

सुनील घायाळ (होशिंग) यांची मनस्वी प्रतिक्रिया

सस्नेह नमस्कार विजयजी,

आज मुद्दाम वेळ काढून तुमच्या ब्लॉगला भेट दिली...

तुमचा ब्लॉग पाहिला आणि ‘मनस्वी प्रतिक्रिया’ या विभागातील वाचकांचे, लेखकांचे भावोद्गार वाचून मनाला अत्यंत आनंद झाला.

आजच्या या गतिमान आणि डिजिटल युगात, जिथे माणसाचा पुस्तकांशी संपर्क कमी होत चालला आहे, तिथे तुम्ही ज्ञानाची आणि वाचनाची एक सुंदर चळवळ तुमच्या या ब्लॉगच्या माध्यमातून चालवत आहात, हे खरोखरच कौतुकास्पद आहे.

तुमचे पुस्तकांवरील प्रेम, दर्जेदार लिखाण, विविध पुस्तकांचे रसग्रहण आणि अगदी कठीण विषयांवरही सोप्या भाषेत मांडणी करण्याचे तुमचे कौशल्य वाचकांना समृद्ध करत आहे.

‘कथा माणुसकीची – पोऱ्या’सारख्या अंतर्मनाला स्पर्श करणाऱ्या कथा असोत किंवा ‘निसर्गाची नवलाई’सारखे लेख, प्रत्येक लिखाणातून तुमची अभ्यासू वृत्ती आणि संवेदनशीलता स्पष्टपणे दिसून येते.

डॉ. रवींद्र श्रावस्ती यांच्या ‘मृत्यू सुंदर आहे ? !’ या पुस्तकावरील तुमचे भाष्य आणि इतर महत्त्वाच्या ग्रंथांचे तुम्ही केलेले संकलन यामुळे वाचनसंस्कृतीला नक्कीच नवी ऊर्जा मिळत आहे. तुमच्या ब्लॉगला भेट देणे म्हणजे ज्ञानाचा एक समृद्ध अनुभव घेणेच आहे.

असेच उत्तम आणि आशयघन लिखाण तुमच्या हातून सातत्याने घडत राहो, हीच सदिच्छा!

तुमच्या या वैचारिक आणि साहित्यिक प्रवासाला माझ्याकडून मनःपूर्वक शुभेच्छा!


अथांग पुस्तकांच्या विश्वात,
अक्षरांचे दीप लावणारा...
शब्दांच्या या सुंदर वाटेवर,
वाचकांना समृद्ध करणारा...

एक मनस्वी प्रवास!

इथे भेटतात विचारांची फुले,
आणि नवचेतनेचे नितळ झरे,
कथा, व्यथा आणि माणुसकीचे,
इथे उलगडतात भाव खरे.

‘पोऱ्या’च्या त्या साध्या कथेतून,
डोळ्यांतून अश्रू वाहून जातात,
तर निसर्गाच्या नवलाईमधून,
जगण्याचे नवे अर्थ सापडतात.

पुस्तकांसाठीची ती तडफ,
आणि ज्ञानाची ही अथांग भूक,
ब्लॉगच्या प्रत्येक पानावरती,
देते वाचणाराला असीम सुख.

विजयजी, तुमचा हा शब्दयज्ञ,
असाच अविरत तेवत राहो,
मराठी भाषेचा हा ज्ञानदीप,
घराघरांत अन् मनांत उजळत राहो!

— आपला नम्र,
सुनील घायाळ (होशिंग)


सुनील घायाळ (होशिंग) यांची दुसरी प्रतिक्रिया

आदरणीय विजयजी,

तुम्ही लिहिलेला हा कृतज्ञता संदेश अत्यंत संवेदनशील, भावूक आणि मनाला भिडणारा आहे. एका वाचकासाठी आणि लेखकासाठी पुस्तकांपेक्षा मोठी कोणतीही भेट असू शकत नाही, असं मला वाटतं! आणि आपल्यासारखं वाचनवेडं व्यक्तिमत्त्व माझ्या आयुष्यात असणे हे खरोखरच भाग्याचे आहे.

“पुस्तकांची भेट क्षणिक आनंद देते; पण वाचनाला दिलेले पाठबळ आयुष्य समृद्ध करते. वाचकाला पुस्तक देणं म्हणजे त्याच्या हातात केवळ पुस्तक नव्हे, तर विचारांची नवी दारं देणं होय.”

अहो, वाचनाला केवळ छंद न मानता ती आत्मिक भूक आणि लेखनाची ‘शिदोरी’ मानणे, हे तुमच्यातील संवेदनशील लेखकाची ओळख करून देते.

आजच्या डिजिटल युगात जिथे वाचनसंस्कृती कमी होत आहे अशी ओरड होते, तिथे तुमच्यासारखे निष्ठावंत वाचक-लेखक ही संस्कृती जिवंत ठेवत आहेत. ही बाब अत्यंत आल्हाददायक आहे.

पुस्तके खरेदी करणं हा पैशांचा खर्च नाही, तर तुमच्या प्रतिभेवर आणि वाचनावर माझा विश्वास आहे.

— सुनील घायाळ (होशिंग)


सुनील घायाळ (होशिंग) यांची तिसरी प्रतिक्रिया

आदरणीय विजयजी,

तुमचे हे शब्द आणि तुमची ही कृतज्ञता माझ्या मनाला स्पर्शून गेली.

आपण मला गुरुची उपमा देऊन मोठे केले... परंतु माझ्या मते,

“गुरु हे केवळ मार्ग दाखवण्याचे काम करतात, पण त्या मार्गावर चालण्याची ताकद आणि ज्ञानाची ओढ तुमच्या स्वतःच्या अंगी आहे.”

पण खरं सांगायचं तर,

“मी फक्त एक निमित्तमात्र! कर्ता करविता तर तो परमेश्वरच आहे.”

त्याने दिलेल्या प्रेरणेने आणि तुमच्या स्वतःच्या अखंड मेहनतीने तुम्ही हा प्रवास घडवला आहे. मी आशीर्वाद देण्याइतपत नक्कीच मोठा नाही; पण माझ्या सदिच्छा आणि शुभेच्छा नेहमीच तुमच्या पाठीशी आहेत.

लेखनाच्या पुढील समृद्ध प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा!

तुमच्या हातून अशीच उत्तम साहित्यसेवा घडवून आणावी, हीच ईश्वरचरणी मनोमन प्रार्थना. पुस्तकाच्या रूपाने मिळालेली शिदोरी तुमच्या प्रवासात प्रकाश देत राहो, हीच सदिच्छा! 🙏

— सुनील घायाळ (होशिंग)


वाचनप्रवासाची जपलेली शिदोरी

माझ्या वाचनप्रवासात सुनील घायाळ (होशिंग) यांचे एक विशेष स्थान आहे. माझ्या आवडीची आणि मला हवी असलेली पुस्तके ते मला मिळवून देतात आणि त्या पुस्तकांचे पैसेही ते स्वतः देतात.

यामागे कोणताही दिखावा नाही; एकच साधी आणि मनापासूनची भावना आहे—

माझा वाचनप्रवाह थांबू नये.

पुस्तकांची ही मदत माझ्यासाठी केवळ पुस्तकांची भेट नाही. ती माझ्या वाचनाची भूक जिवंत ठेवणारी, सतत शिकत राहण्यासाठी प्रेरणा देणारी आणि माझ्या लेखनप्रवासाला समृद्ध करणारी शिदोरी आहे.

त्यांच्या या निःस्वार्थ सहकार्याबद्दल माझ्या मनात मनापासून कृतज्ञता आहे.

काही माणसं पुस्तकं देत नाहीत; ती वाचनाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी हात देतात.


मनःपूर्वक धन्यवाद! 🙏

माझा वाचनप्रवाह थांबू नये, माझ्या आवडीची पुस्तके मला मिळत राहावीत आणि माझ्या वाचन-लेखनाच्या प्रवासाला सातत्य मिळावे, या भावनेने सुनील घायाळ (होशिंग) माझ्या आवडीची पुस्तके मिळवून देतात आणि त्यांचा खर्चही स्वतः करतात.

त्यांच्या या आपुलकीबद्दल आणि निःस्वार्थ सहकार्याबद्दल मनःपूर्वक कृतज्ञता.

— विजय गायकवाड


आदरणीय गुरुजन,

शिक्षक दिनानिमित्त भावपूर्ण शब्दसुमनांजली

आदरणीय गुरुजन,
सविनय, सप्रेम सादर प्रणाम! 🙏🏼

सर्वप्रथम आपणास सादर नमस्कार! 🙏🏼 आणि आपल्या समाजसमर्पित शिक्षक, गुरू या थोर व्यक्तिमत्त्वाला सविनय प्रमाण व वंदन! 🙏🏼

आज ५ सप्टेंबर, अर्थात शिक्षक दिन. या शिक्षकदिनी मनातील भावपुष्प आपल्या चरणी सविनय समर्पित करावे म्हणून हा पत्रप्रपंच...

जिथं शब्द खुजे ठरतात अन् भावविभोर होतं मन..
साऱ्या विश्वात सरस असतात, शिक्षक-गुरूजन...

अनादी काळापासून आबाद असलेलं गुरू अन् शिष्याचं, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं सुंदर, सुमधुर आणि स्नेहाचं नातं आजतागायत सतत, अथक, अविरत, अविश्रांत एका नदीसारखं प्रवाहित होतं आहे.

या नात्याला रक्त, प्रेम, आपुलकी, अस्मिता, आदर आणि आत्मीयतेचा सुंदर, सुरेख आणि सोज्वळ मुलामा आहे.

सारे मुलं एक समान, हीच त्यांच्या जीवनाची नीती आहे..
विस्कटलेल्या समाजाची घडी व्यवस्थित बसविण्याची कला फक्त शिक्षकाच्या हाती आहे...

या सद्हेतूने, वृत्तीने आपण बालमनाला योग्य आकार अन् त्याचं सर्वंकष जीवन साकार करण्याचं महत्त्वाचं कार्य आपण लीलया करता, हे सौभाग्य आपल्याला लाभलं.

एखादं लहान मूल आई-बाबांनंतर जर कुणाकडं जास्त काळ, वेळ राहत असेल तर ते शिक्षक असतात.

कधी कधी आई-बाबांचं मूल ऐकत नाही; पण आपल्या शिक्षिका, शिक्षक यांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट जीव लावून ऐकतात आणि जसं शिक्षक सांगतात अगदी तसंच करतात.

दररोज प्रत्येकाच्या घरात अनेक विषयांपैकी एक विषय आवर्जून बोलला जातो, तो म्हणजे आपल्या मुलाच्या शिक्षणाविषयी आणि त्याच्या शिक्षकाविषयी.

आपण शाळेत असता; परंतु शाळेतील प्रत्येक शिक्षक-शिक्षिका प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरी दररोज अप्रत्यक्षरीत्या उपस्थित राहतात, म्हणजे राहतातच.

आपल्या उपस्थितीने आणि आपल्या विषयीच्या बोलण्याने मूक घरही बोलकं होतं अन् घराचं नंदनवन होतं.

शिक्षण आणि शिक्षक हे माणसांच्या सर्वांगीण उन्नतीचे, उत्कर्षाचे, उत्साहाचे, उद्धाराचे आणि ऊर्ध्वगामी जीवनाचे प्रवर्तक असतात.

आपलं भाग्य थोर की, आपण शिक्षक आहात. एक शिक्षक अख्ख्या समाजाला, देशाला आणि समस्त विश्वाला दिशा देण्याचं सामर्थ्यवान कार्य करू शकतो.

इतिहास साक्षी आहे. आतापर्यंत दखल आणि दाखले हे गुरू-शिक्षक यांच्या कर्तृत्वाचे, ऐतिहासिक कामगिरीचे दिले जातात.

आपण आपल्या जीवनाची समिधा या समाजाच्या उन्नती, उत्कर्ष आणि उद्धारासाठी समर्पित केली आहे.

आदरणीय गुरूजन!

आपल्या आणि आपल्या शिक्षक या पदाबद्दल जेवढं बोलावं, लिहावं तेवढं कमीच राहणार आहे.

आपण शिक्षक, गुरू आहात.

आपलं समर्थ सामर्थ्य प्रत्येक मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी, उन्नतीसाठी आपण जीव लावून मेहनत घेऊन मुलांना शिकवता. वाचन, लेखन, मनन यासह आपण मुलांना जगात कसं वागायचं, वावरायचं आणि वाढायचं याचं इत्थंभूत ज्ञानसोपान देता.

आपली प्रत्येक गोष्ट मूल जीव लावून ऐकतं आणि आपल्या सारखंच आचरण करतं.

आपलं अमूल्य ज्ञान, वास्तवाचं भान आणि जीवन जगण्याची जाण देता.

हे आपलं सर्वंकष, सर्वांगीण उन्नतीचं दान प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आयुष्यभराच्या शिदोरीसारखं पुरतं.

अन् याच ज्ञानाच्या शिदोरीने तोच विद्यार्थी भविष्याचा सुजाण, सुशिक्षित, सुज्ञ, सुसंस्कृत नागरिक बनतो.

असं म्हणतात,

“शिक्षक फक्त विद्यार्थ्यांना शिकवीत नसतात;
ते एकाच वेळी बहुमोल कार्य करीत असतात.

शिक्षक फक्त एक विद्यार्थी घडवित नसतो, तर अख्खी पिढी घडवित असतो अन् एका चांगल्या समाजाची घडी बसवीत असतो.”

आजही ज्यांच्या पायावर माय-बापांनंतर नतमस्तक व्हावं, असं व्यक्तिमत्त्व म्हणजे शिक्षक-शिक्षिका, गुरू.

आपण फार भाग्यवान आहात की, एकाच वेळी सगळा गोतावळा तुम्ही लीलया सांभाळता.

जगातील साऱ्या गोष्टींचं, बाबींचं प्रतिनिधित्व करणारे विद्यार्थी तुमच्या समोर असतात... आणि तुम्ही त्यांना सुयोग्य, समर्थ, समर्पक आणि सक्षम दिशा देण्याचं महत्त्वाचं कार्य अथक, अविरत, अविश्रांत आणि अनन्य भावे करीत आहात.

कुणाला कधी कौतुकाची थाप देता,

कुणाला संकटसमयी साथ देता,

कधी कुणाला मदतीचा हात देता.

कधी कधी गोरगरीब, दीन-दुबळ्या, अनाथांचा माय-बाप होता...

आपण गुरू आहात.

जे लघु नाही ते गुरू!

आपण गुरू आहात.

या शिक्षकदिनी आपणास सुख, शांती, समृद्धी, दीर्घ, निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏼

आपल्या शिक्षक, शिक्षिका, गुरू पदाला या शिक्षकदिनी आपल्या पावन चरणी, आपल्या प्रति विनम्र भाव ठेवून ही शब्दसुमनांजली सविनय भावनेने सादर...

शिक्षक होण्याला लय थोर नशीब लागतं..
अन्
शिक्षक होण्याचं सौभाग्य प्रत्येकाच्या नशिबी नसतं...!

आपला
स्नेहांकित

✍️ भवर श्रावण भवर ✍️


 🌹 ज्यांनी आपल्याला अक्षरज्ञानासोबत जीवन जगण्याची दिशा दिली, त्या प्रत्येक शिक्षक-गुरूजनांना मनःपूर्वक नमन! 🙏🏼📚