* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

6/8/26

गांधीवाद इतिहासजमा झाला ? / Has Gandhism become history?

कित्येक लोक आता म्हणू लागले आहेत की,भारताला स्वराज्य मिळालेच नाही.जागतिक परिस्थिती बदलली, युद्धे अंगाशी आली म्हणून इंग्रजांना येथून जावे लागले. सशस्र क्रांतिकारकांची सरकारला भीती वाटली. म्हणूनही ते येथून गेले.त्यांना लोकांनी विचारले की, "एवढ्या मोठ्या देशातून इंग्रजांना जावे लागेल,तसेच ते इतर लहान मोठ्या प्रदेशांतूनही गेले असते पण तसे झाले नाही.हे का?"

गांधींनी देशात अभूतपूर्व जागृती आणली,राष्ट्रीय जीवनाला नवा पाया दिला,हिंदू संस्कृतीला नवे वळण लावले आणि जगात भारताला मानाचे स्थान मिळवून दिले ही गोष्ट नाकबूल करता येणार नाही.इतर देशांनादेखील गांधींपासून प्रेरणा आज मिळत आहे ही गोष्ट ध्यानात आणली पाहिजे.या गोष्टी ज्यांना मान्य आहेत असे लोकदेखील आता म्हणू लागले आहेत की गांधीजींची लोकोत्तर कामगिरी मान्य,पण आता त्याचे महत्त्व किती? फार तर गांधीजींविषयी कृतज्ञता व्यक्त करू.पण गांधी आता इतिहासजमा झाले आहेत एवढे गांधीवाद्यांनी मान्य केले पाहिजे.

कित्येक लोक गांधीजींचे धार्मिक,आध्यात्मिक आणि सांस्कृतिक क्रांतिकार्य मान्य करतात पण राजकारणात ह्या वस्तूंना महत्त्व देऊ इच्छित नाहीत.अशा लोकांना उत्तर दिले पाहिजे.

सर्वच लोक स्वीकारतात की गांधीजींची हिंदुस्थानाला आणि जगाला सर्वांत मोठी देणगी म्हणजे सत्याग्रह.तो तर गांधीवादी राज्यकर्त्यांनी सोडून दिला.इतकेच नव्हे तर सार्वत्रिक बहुमताने चालणाऱ्या सरकारविरुद्ध सत्याग्रह होऊच शकत नाही,असा प्रचार करून त्यांनी जिकडे तिकडे सत्याग्रहाला विरोध चालविला.याचा परिणाम असा झाला की काही लोक म्हणू लागले, "एरव्ही तेव्ही सत्याग्रहाला नेत्यांचा पाठिंबा मिळणार नाही आणि सत्याग्रहाला चारित्र्याचा भक्कम पाठिंबा असावा लागतो तेव्हा त्या रस्त्याने जाच कशाला? बहुमताच्या जोरावर चालणारे प्रजाराज्य कधीही खंबीर असत नाही.अशा राज्याचा एक डोळा असतो पुढची इलेक्शने जिंकण्यावर,तेव्हा सत्याग्रहापेक्षा हत्याग्रह चांगला." हत्याग्रहाविरुद्ध गोळी चालवण्याची पोलिसांना मुभा असते हे खरे.पण नेत्यांना त्याची भीती बाळगण्याचे कारण नाही.कारण हत्याग्रह सुरू होण्यापूर्वीच नेत्यांना सरकार पकडून ठेवते.आणि थोडी शांतता होताच लोकक्षोभ टाळण्यासाठी नेत्यांना तुरुंगातून सोडून देते.त्यामुळे नेत्यांना भिण्याजोगे काही नसते.

हत्याग्रहात सामान्य लोकांपैकी थोडी लोकं मरतात हे खरे पण तेवढ्या बलिदानाच्या जोरावर पुष्कळ मिळवता येते.

अशा रीतीने विचार करणाऱ्या लोकांनी हाकाटी चालवली आहे की,"आजच्या काळात गांधीविचार कितपत ग्राह्य आहे? कितपत व्यवहार्य आहे?"

गांधी होऊन गेल्या गोष्टीला शंभर दोनशे किंवा हजार वर्षे झाली नाहीत.दहावीस वर्षात काळ बदलत नसतो. तेव्हा त्या प्रश्नाचा अर्थ एवढाच होतो की गांधींच्या काळी लोकांत स्वार्थत्याग करून देशसेवा करण्याची वृत्ती होती.उच्च जीवनाची प्रेरणा झाल्यास तिचा स्वीकार करून लोक बलिदानाला तयार होत.तसे आता आम्ही उरलो नाही.

आम्हाला निवडणुका जिंकून राष्ट्रीय सत्ता आणि संपत्ती वापरण्याची संधी मिळवावयाची आहे.या कामी गांधीवाद काय मदत करणार? एवढाच वरील प्रश्नांचा अर्थ होतो.गांधींनी कोठेही म्हटले नाही की लोकनियुक्त सरकार कधीच चुका करणार नाही आणि त्याच्या विरुद्ध सत्याग्रह होऊच शकत नाही!आणि सत्याग्रह हे काही फक्त सरकारविरुद्ध वापरण्याचे शस्त्र नव्हे. व्यक्तिगत जीवनात,सामाजिक जीवनात,राष्ट्रीय जीवनात आणि आंतरराष्ट्रीय संबंधांत तेजस्वी,सात्त्विक लोकांनी केव्हाही वापरण्याचे ते शस्त्र आहे.ते नेहमी पाजळून तयार ठेवावयाचे असते.सत्याग्रहाचे शेवटचे बळ म्हणजे जगातील सर्व तेजस्वी सज्जनांचा त्याला पाठिंबा मिळत असतो आणि दुर्जनांनादेखील हे शस्त्र वापरणाऱ्या पक्षाची तेजस्विता आणि नैतिक श्रेष्ठता स्वीकारून तिच्यापुढे मान वाकवावी लागते. सत्याची ही शक्ती अपार आहे आणि सार्वभौम आहे. एवढा विश्वास ज्यांच्यात आहे तेच लोक खरे आस्तिक.स्वराज्य होताच आणि नेत्यांच्या हाती अधिकार येताच त्यांनी ठरवून टाकले की आता या देशात आमचे राज्य झाले.त्यामुळे सत्याग्रहाला आधार राहिला नाही.लोकांनीही पाहिले की खरा सत्याग्रह करू जाता,या गांधीवादी नेत्यांचाही पाठिंबा मिळणार नाही. तेव्हा अन्याय दिसला तरी डोळेझाक करून गप्प बसणे हाच मार्ग आहे.Nature shores vacuum. निसर्गामध्ये म्हणजेच जगामध्ये पोकळी फार वेळ टिकू शकत नाही.पोकळी उत्पन्न झाली की ती जागा भरून काढण्यासाठी कसले तरी तत्व धावून येतेच.

सत्याग्रहाला अवकाश राहिला नाही तेव्हा ती जागा हत्याग्रहाने घेतली.आणि हा हत्याग्रह वाटेल तसल्या लोकांनी चातुर्याने हाती घेतला.वर म्हटलेच आहे की,लोकसत्तात्मक राज्यात हत्याग्रह चालविणारे नेते सुरक्षित असतात.लढाईत ज्याप्रमाणे सैनिकांचा बळी द्यावाच लागतो त्याचप्रमाणे भावनेला वश होणाऱ्या सामान्य लोकांना थोडासा वाव दिला अथवा होऊ दिला तर पुष्कळसे काम होते.हे चातुर्य आजच्या लोकनेत्यांमध्ये आहे.

आणि जे सरकार सत्याग्रहाला दाद देत नाही त्या सरकारला हत्याग्रहापुढे नमावेच लागते.

यालाच जर 'आजचा काल' म्हणावयाचा असेल तर लोकांनी खुशाल म्हणावे.अशा कालोचित मार्गाने कोणतेही लोकनियुक्त सरकार सहज पाडता येईल.पण त्याच्या ठिकाणी दुसरे तेजस्वी किंवा समर्थ सरकार स्थापन होणे शक्य नाही.एकामागून एक सरकारे कोलमडून पडू लागली म्हणजे जनता आणि नेतृत्वाचे उमेदवार लोक डिक्टेटरशिपचे आवाहन करतात,"या निवडणुका नकोत,लोकमताचा खेळखंडोबा नको, मारील त्याला तलवार या न्यायाने नादीरशाही स्थापन केली पाहिजे."

आपल्याला एक खूणगाठ बांधून ठेवलीच पाहिजे,की हिंदुस्थानात आपल्याला स्वर्ग उत्पन्न करता येईल. नरकही उत्पन्न करता येईल पण डिक्टेटरशिप या देशात कधीही येऊ शकणार नाही.एखादा मंत्र बोलल्याबरोबर स्थापन होणारा तो राज्यप्रकार नव्हे,

हिंदुस्थानाची जनता एकजिनसी (Homogenous) नाही.

हिंदुस्थानची फौज एकजिनसी नाही (आणि हेही लक्षात ठेवले पाहिजे की ज्याला आपण हिंदुसमाज म्हणतो त्यातही आंतरिक एकजिनसीपणा नाही).किती का असेना,एक मनुष्य डिक्टेटर म्हणून उभा राहताच त्याला प्रतिस्पर्धी दुसरा डिक्टेटर उभा राहणारच.आणि दोघांनाही जनतेचा पाठिंबा मिळणार.फौजेची निष्ठादेखील अशा डिक्टेटरांमध्ये वाटली जाणार.मग यांनी वाटल्यास एकमेकांना मारून क्षीण व्हावे किंवा देशाचे तुकडे पाडून लहान लहान राज्ये स्थापन करावीत.

दहा हजार वर्षांच्या आपल्या इतिहासात राजनैतिक एकता केव्हा व किती वर्षे टिकली याचा हिशोब काढला पाहिजे.'आविक्षित' सारखे वेदकालीन सम्राट केवढ्या मुलखावर राज्य करीत होते.

आणि त्यांचे स्वराज्य अथवा साम्राज्य किती टिकले यांची चर्चा न करणे बरे! आपले सर्व सम्राट राजसूय यज्ञ करून सम्राट झाले. त्यांचे ते साम्राज्य दोन पिढ्या चालले की नाही याची वानवाच आहे.बाकी हिंदू काळात अधिकांश तर लहान लहान राज्येच होती.या राज्यांचे आपापसात हेवेदावे चालत.सामान्य प्रजा शांततावादी,शांतताप्रेमी आणि सांस्कृतिक एकता चालवणारी हाती.प्रजेला स्वदेशी-परदेशी कोणीही राजा असो,चालत असे.

त्याने लोकजीवनात ढवळाढवळ न केली म्हणजे बरे.आणि त्याने ढवळाढवळ केली तर जनता ईश्वराची प्रार्थना करीत असे की,देवा,

आता अवतार घे आणि आम्हाला या जुलमातून वाचीव.

सत्यवानाचा पिता लोकप्रिय राजा होता.त्याला गादीवरून हाकून लावणाऱ्या राजाविरुद्ध प्रजेने काहीच केले नाही.राजा गेला वनवासाला आणि प्रजा मुकाट्याने बसून राहिली.पुढे देवाला दया आली. शत्रूचा नाश झाला.प्रजा आनंदली.

म्हणूनच तर कोट्यवधी जनतेच्या देशात लाखाहून कमी परकीय लोक घुसून राज्य करू शकले.

परकीय लोकांनी या देशातील लहान लहान राजांना पाळीपाळीने परास्त करावे.संबंध देश पादाक्रांत करावा. पण चार क्षत्रिय एकत्र होऊन लढणार नाहीत.पठाणांनी येऊन हिंदुस्थानावर प्रत्येक ठिकाणी आपली राज्ये स्थापन केली.तत्पूर्वी शंभर वर्षे तरी ते या देशात येऊन लोकस्वभाव अजमावू शकले होते.हीच गोष्ट मोगलांची. त्या दोघांना अनुभव आला की येथील लोक विदेशी आक्रमणकारी लोकांचे राज्य मजबूत करायला तटस्थ असतात.

ते खाल्ल्या मिठाला जागतील आणि स्वदेशी रक्ताचा द्रोहदेखील करतील.जो कोणी अन्न देईल त्याच्याशी स्वामिनिष्ठ राहिलेच पाहिजे असे मानणाऱ्या लोकांना परक्याचे अन्न खाऊ नये असा उपदेश कुणीच दिला नव्हता.

आजही परक्याचे अन्न खाऊ नये असा बाणा दिसून येत नाही ! राजनैतिक एकता आपण टिकवू शकू असा आत्मविश्वास आज किती लोकांत आहे?आणि सांस्कृतिक एकता तर भूतकाळाची उपासना करून, जुने हेवेदावे जिवंत ठेवून,

कधीच उत्पन्न करता येत नाही.हा सार्वभौम सिद्धान्त नेत्यांच्या डोक्यात तरी कधी आला आहे का? सांस्कृतिक एकता समाजाच्या जोरावरच उत्पन्न करता येते.सांस्कृतिक एकता जर मजबूत करावयाची तर भूतकाळाचे ध्यान धरून चालणार नाही.त्यांना भविष्यकाळ समजला पाहिजे. समन्वयाच्या जोरावर तो निर्माण करता आला पाहिजे. जे लोक भूतकाळ विसरू शकत नाहीत त्यांना वर्तमानकाळात सुप्त असलेले सामर्थ्य ओळखता येत नाही.गांधींना हे ओळखता येत होते

त्यांनी आत्मघाती चर्चा न करता,राष्ट्राला समन्वयाचा रस्ता दाखवून दिला आणि आंतरिक एकता वाढविण्यासाठी उदारतेचा उपदेश शहाणपणाने कसा करावा हेही दाखवून दिले.खरे म्हणावयाचे म्हणजे, गांधींचा पूर्ण उपयोग आजच आहे.त्यांच्या मार्गाने जाण्याची हिम्मत दीर्घदृष्टी आणि कुशलता जर आपण मिळवू शकलो तर आजचे जटिल प्रश्न सोडविता येतील. जे लोक गांधीमार्गाला कालबाह्य ठरवतात त्यांनी आजचे प्रश्न सोडविण्याचा एकही मार्ग अमलात आणून दाखवला नाही.वादाच्या इरेस पेटलेल्या एकाने जोराने म्हटले,"जीवनात हरलो तरी बेहत्तर पण वादांत आम्ही हार खायला तयार नाही." माणूस सहज बोलून गेला खरा पण त्याने आपल्या लोकांच्या स्वभावावर या एका वाक्याने चांगलाच विदारक प्रकाश पाडला आहे.

आज जगात युद्धाची तयारी सर्वत्र चालत असते.या क्षेत्रात पुढारलेली राष्ट्रे दोन,रशिया आणि अमेरिका.या दोन्ही राष्ट्रांजवळ आज शस्त्रांचा साठा इतका तयार आहे की जगाचा नाश त्यांना तीन वेळा करता येईल.तरीही हे लोक युद्ध छेडू धजत नाहीत. त्यांना कळून चुकले आहे, युद्धाच्या अंती एका पक्षाचा विजय आणि दुसऱ्याचा पराजय ही स्थिती आता उरली नाही. आधुनिक शस्त्रास्त्रे वापरून युद्ध सुरू केले तर दोन्ही पक्षांचा सर्वनाश खात्रीने होणार याविषयी शंका उरली नाही. या दोन्ही राष्ट्रांचे पुढारी म्हणतात,युद्धावर आमचा विश्वास नाही.पण सैन्यावाचून आणि आधुनिक शस्त्रास्त्रांवाचून राष्ट्र सुरक्षित कसे राहील

हे आम्हाला समजत नाही.म्हणून आम्ही युद्धाची तयारी ठेवून आहोत.पण ही तयारी दिवसेंदिवस इतकी महाग होत आहे.युद्धात राष्ट्राचे रक्त सांडेल तेव्हा सांडेल पण तत्पूर्वी युद्धाच्या तयारीतच राष्ट्र- रक्ताचे भयंकर शोषण करावे लागत आहे.

तेव्हा एकीकडे युद्धाला तयारी तर दुसरीकडे आपापल्या बाजूला अनेक राष्ट्रांना खेचून गटबंदीचे राजकारण आणि तिसऱ्या बाजूने सामोपचाराचे प्रयोग अजमावून पाहणे.अशी त्रिविध राजनीती चालू आहे.पहिले दोन प्रकार जुन्या विचाराचे,अप्रतिष्ठित पण जोरावर आणि तिसरा प्रकार हळूहळू विश्वमान्य होण्याच्या मार्गावर.ही आहे जागतिक परिस्थिती.जागतिक नेतृत्व करणाऱ्या लोकांना आता गांधीविचाराकडे ध्यान देण्याचे सुचू लागले आहे.

स्वराज्य आल्यानंतर मी जगाचा प्रवास केला.अमेरिका पाहून घेतली.दोनदा युरोपात आणि आफ्रिकेत थोडे डोकावून पाहिले.एकदा चीन सरकारच्याच मदतीने त्या देशात थोडे फिरून घेतले आणि जपानात तिकडच्या लोकांच्या आमंत्रणामुळे आणि अधिकांश त्यांच्याच खर्चाने पाचदा जपानात जाऊन आलो.सर्वत्र लोक म्हणतात,गांधीजींच्या तेजस्वी सत्याग्रहाने आम्ही आकर्षित झालो.जगावर दरारा चालवणाऱ्या ब्रिटिश साम्राज्याच्या तावडीतून त्यानी देश स्वतंत्र केला. त्यामुळे आम्हाला अंधुक आशा वाटू लागली की त्यांचा मार्ग कदाचित उपयोगी ठरेल.आम्ही गांधींना श्रेय देतो ते त्यांच्या सत्याग्रहाच्या कोऱ्या कल्पनेसाठी नव्हे.कल्पना कुणालाही करता येते.पण या कल्पनेच्या जोरावर त्यांनी राष्ट्राला तयार केले.भारतीय जनतेने त्यांच्या हाकेला ओ दिली.आवश्यक असा त्याग करून दाखवला.या वस्तुस्थितीने आम्ही प्रभावित झालो.आणि म्हणून मोठ्या आशेने स्वराज्य-प्राप्तीनंतरच्या भारताच्या कामगिरीचे आम्ही अत्यंत आस्थेने अध्ययन चालविले आहे.या वीस वर्षांत गांधींच्या मार्गान तुमच्या देशाने एकही पाऊल पुढे टाकले नाही.यामुळे आता आम्हाला वाटू लागले आहे की भारतीय जनतेमध्ये तेजस्विता आहे,गांधीनी ती जागृत केली,पण तसे नेतृत्व त्यांच्या देशात आज उरले नाही.तेव्हा गांधीमार्ग खरा.


जनतेची संस्कृतीदेखील आशास्पद.पण ती शिकवून तिचा उपयोग करणारे नेतृत्व मात्र गांधींना पुढे चालविता आले नाही.किंवा गांधींची प्रेरणा पचवून तुमच्या राष्ट्रनेत्यांना राष्ट्रीय शक्ती प्रगट करून दाखविता आली नाही.आम्हाला गांधीवादाविषयी जी आशा वाटत होती तिच्यावर भारताच्या नेत्यांनी पाणी फिरविले,याचे आम्हाला फार वाईट वाटते.

जपानातील काही विचारवंत मला म्हणालेदेखील गांधी असताना आम्हाला भारताविषयी आदर आणि प्रेम.वाटत होते.या वीस वर्षानंतर आमचे प्रेम कायम आहे,आदर मात्र तुम्ही लोकांनी घालविला,याचे आम्हालाच वाईट वाटते.

जितकी वर्षे गांधीजी जगले त्या ७० / ८० वर्षांना गांधीयुग काय म्हणून म्हणावे? ते तर जगाच्या दृष्टीने युद्धयुग होते.या साठ ते सत्तर वर्षात किती तरी युद्धे झाली आणि तीही जागतिक युद्धे झाली! या युगात गांधीजींनी अहिंसायुगाचे बीज पेरले.त्याला जर गांधीयुग म्हणावयाचे असेल तर ते बीज उगवल्यानंतरच म्हणता येईल.जे गांधीयुग अजून उगवलेच नाही ते संपले असे म्हणणाऱ्यांना ऐतिहासिक दृष्टीच नाही. गांधीयुग या पुढेच उगवणार आहे.विज्ञानाच्या लोकोत्तर विकासामुळे युद्धे सर्वनाशी होणार इतकी खात्री ज्यांना झाली आहे,दोन तीन युद्धांमुळे ज्या लोकांच्या प्रत्येक घरातील तरुणांचे रक्त सांडले आहे,त्या लोकांनाच गांधीविचार,गांधीसाधना आणि गांधीनिष्ठा लवकर पटण्याचा संभव आहे.सत्याग्रहाचा जन्म झाला आफ्रिकेत.त्याचा राष्ट्रव्यापी प्रयोग गांधीनी करून दाखविला भारतात.हे जसे अद्भुत स्थलांतर झाले, त्याचप्रमाणे सत्याग्रहाची आणि गांधीपणाची विशाल प्रयोगभूमी भारत आणि विजयभूमी अन्यत्र असे होणार असेल तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही.

जेव्हा जेव्हा आपण गांधीजींना महात्मा म्हणत असू तेव्हा तेव्हा ते खरोखर दुःखी होत असत.ते म्हणत,"मी जे करतो ते प्रत्येक मनुष्याला साध्य आहे.मला अवतारी पुरुष ठरवून माझ्या कार्याचा नाश करू नका.मी जे करतो ते तुम्हाला शक्य आहे.तुम्ही ते केले पाहिजे.माझे अनुकरण करणे हाच माझी कदर करण्याचा एकमात्र प्रकार आहे.एरव्ही मला अवतारी पुरुष ठरवून देवाची प्रार्थना करत बसला की 'देवा,आम्ही तर तुच्छ माणसे. जर तुला लाज असेल तर दुसरा अवतारी पुरुष पाठवून दे' तर देवाला तुमची दया येणार नाही."

संतवचनांपैकी एकच वचन गांधींनी सिद्ध करून दाखविले-"नर करणी करे तो नरका नारायण हो जाय" गांधींना इतिहासजमा करणे म्हणजे राष्ट्राला दुर्दैवी आणि करंटे बनविणे आहे.गांधीमार्गाचा उज्ज्वल इतिहास बनविण्याचे दिवस समोर असताना गांधींना भूतकाळात जमा करणे म्हणजे राष्ट्राचा घात करून त्याला भूतलोकात पाठवून देणे आहे.खरोखर आपल्याला आपल्या राष्ट्राची दया वाटली पाहिजे की त्याचे नेतृत्व इतके आंधळे आणि निरुत्साही होऊ पहात आहे.

हा लेख संपला.पुढील लेख पुढील लेखमालेत..!!

6/6/26

एक साखळी संपली./A chain ends

घटनाक्रमाची एक साखळी संपली.घुबड तलाव परिसराच्या इतिहासात या टप्प्यात मुंगी-संस्कृतीत काय काय झालं? मूळ पायवाट वारूळ क्षेत्रानं दोन महायुद्धं पाहिली.आणि त्यानंतर एका झाड-देवांचा प्रकोप,एक महामारी पाहिली.अखेर नोकोबी परिसराचा हा तुकडा जसा होता तसाच राहिला.पण हा सगळा इतिहास झाला.आज या क्षेत्रात एक नवं वारूळ उभं आहे. ते महासमाजासारखं नाही,तर मूळ पायवाट वारुळाचं पिल्लू आहे.एकूण परिसरानं ताणतणाव भोगले,पण त्यातून त्याचा टिकाऊपणा नव्यानं दिसला.हजारो वर्षं ही घटनाचक्रं गरगरत आहेत.पण हे बदलू शकतं.आता चहूकडे झाड-देव आहेत.ते आले आणि पसरले.त्यांच्याकडे जबर शक्ती आहेत,एका झटक्यात सर्व काही हिरावून नेऊ शकणाऱ्या. नोकोबीच्या इतिहासात प्रथमच मुंग्या,महाप्राणी,पूर्ण परिसर टिकणं- न टिकणं हा जुगार झाला आहे

हिवाळा आला.पाऊस जमिनीत मुरला आणि थंडीनं जमिनीतच गोठला.वारुळाच्या घुमटावर बर्फाचा टोप चढला.वारुळाची सर्व प्रजा आत शांत,सुस्त गुच्छ बनवून ऊब राखत होती.हिवाळ्यात झोप काढून वसंत येण्याची स्वप्नं पाहात होती.आणि वर झाड-देव त्या क्षेत्रात फिरत होते.मोजमाप करत होते.आपल्या त्या विचित्र भाषेत एकमेकांशी बोलत योजना आखत होते.('वारुळ पुराण',माधव गाडगीळ',ई.ओ.विल्सन,अनुवाद - नंदा खरे,मनोविकास प्रकाशन )

कायदा आणि विकास

पदवी कमावून रॅफ हार्वर्ड विद्यापीठात कायद्याचं शिक्षण घ्यायला गेला.उत्तम मार्कांनी पदवी परीक्षा पास झाला होता.आणि नेमकं काय शिकायचं,त्या शिक्षणाचा काय उपयोग करायचा,हेही ठरत होतं.सर्व सुट्ट्यांमध्ये घरी जाणं,सायरसमामा,फ्रेडकाका यांना भेटणं सुरू होतं.

जेप्सन लोक अजूनही नोकोबी परिसर विकायला तयार नव्हते,पण विकासासाठीचा दबाव वाढत होता.रॅफची पर्यावरणवादी मतं जगजाहीर होती,आणि विशेषतः सायरसमामा त्यांच्यामुळे अस्वस्थ होता.तो पडला पक्का विकासवादी !

"बघ,रॅफ.तुला जेप्सन-नोकोबी परगणे नेहमीच गांवढळ राहून हवेत का? एक पाहा,सगळ्या भागात विकास होणारच.

आपला भाग भरपूर सूर्यप्रकाशाचा,सौम्य हिवाळ्याचा आहे.त्याला 'सूर्यपट्टा' म्हणायला लागले आहेत ! आणि मोबील,पेन्साकोला हे तर सूर्यपट्ट्यातही विकासाच्या वेगासाठी प्रसिद्ध होताहेत. राईट?"

रॅफ दबला हळूच उत्तरला, "येस्सर!" त्याला सायरसमामाचं म्हणणं पटत नव्हतं,पण सभ्य,सौम्य असं उत्तरही नव्हतं त्याच्यापाशी.

"काय होतं पूर्वी,आणि आज काय आहे?" मामानं हल्ला सुरू ठेवला. "तुझे आजोबा लहान असताना मोबीलच्या दक्षिणेला काहीच विकास झाला नव्हता.डॉग नदीपासनं सीडार पॉइंटला गेलात,तर दोनपाच घरं फक्त भेटायची. रस्त्याच्या शेवटच्या भागात तर डांबरीकरणही केलं नव्हतं, हो ना?"

रॅफनं नुसतीच मान होकारार्थी हलवली.

"आणि सीडार पॉइंटला धडपडत पोचलं,की डॉफिन बेट दिसायचं.सुंदर होतं ते ! छान वाळवंटी किनारपट्टी! एका टोकाला यादवीच्या काळातला किल्ला.पण बोट भाड्यानं घेऊन जावं लागायचं.बहुतेक बेट रिकामं होतं. आणि आज पाहा.सगळा इथून तिथला भाग विकसित झाला आहे.उद्योगधंदे बहरताहेत.डॉफिन बेटावर जायला पूल झाला आहे.अ‍ॅलाबामा राज्याच्या अर्थव्यवस्थेतला महत्त्वाचा भाग आहे,तो.याला विकास म्हणतात,रॅफ ! प्रगती आहे ही!"

रॅफ हरला होता.

"अमेरिका बुडावर बसून थोर नाही झाली,रॅफ ! कठोर होऊन,युद्ध खेळून आपण मोठे झालो.इतिहास वाच तू तो शाळांमध्ये शिकवतात तो बायल्यांचा,डाव्यांचा इतिहास नाही.खरा इतिहास ! देवानं जे आपल्याला दिलं,ते घ्यायला रेड इंडियनांना हाकलावं लागलं.

मेक्सिकोशी लढून पॅसिफिक किनारा गाठता आला. देश दुप्पट झाला त्या लढाईनं.चांगलं वाईट ठरवत नाही मी. मी जग कसं चालतं ते सांगतो आहे,तुला.वाढत जा, नाहीतर नष्ट व्हा ! "आपण राष्ट्रीय उद्यानांमध्ये बसून कविता लिहून नाही मोठे झालो.तू सेमीजपैकी आहेस.तुझ्यात ते रक्त आहे ! उगीच काहीतरी उदारमतवादी स्वप्नं पाहत भरकटू नकोस!"

तर पुढे काय करायचं यातल्या अडचणी भोगत रॅफ कायदा शिकत गेला.अगदी ठरवून त्यानं विशेष अभ्यासासाठी पर्यावरणासंबंधीचे कायदे निवडले. त्यातला तज्ज्ञ बनून रॅफ वकील झाला.

परत येऊन त्यानं मोबीलला सायरसमामाला गाठलं. म्हणाला,"मला इथल्या सगळ्यांत मोठ्या बिल्डर-

डेव्हलपरकडे नोकरी करायची आहे,संडरलंड असोसिएट्सकडे."

"खरं सांगतोयस,की हा काही हार्वर्डछाप विनोद आहे?"

"अगदी गंभीरपणे बोलतो आहे मी,मामा."

"हे बघ,ड्रेक संडरलंडला मी खूप वर्षं ओळखतो.त्याची तुझ्या नोकोबीवर पूर्वीपासून नजर आहे.त्यानं घुबड तलावाजवळ काही जमीन घेतलीही आहे.

ज्या क्षणी जेप्सन लोक नोकोबी विकायला काढतील, त्या क्षणी ड्रेक ती घेऊन डेव्हलप करायला लागेल. त्याला मदत करणार आहेस तू?"

"हो.मला त्याच्यासाठी काम करायचं आहे."

"बेइमानी नाही ना करणार आहेस तू?"

"नाही मामा.सगळं इमाने इतबारेच करेन,सर्वांचं समाधान करेन,आणि नोकोबीही वाचवेन !"

असा रॅफ संडरलंड असोसिएट्सचा विधी-सल्लागार झाला.सोबतच मोबील-क्लेव्हिल् भागातल्या पर्यावरणवादी गटांशीही रॅफचा घनिष्ठ संबंध होता.पण दोन्ही पक्षांपासून रॅफची विरुद्ध बाजू कधी लपवली गेली नाही.संडरलंडकडचं खूपसं काम सरळसोट,पर्यावरणाशी संबंध नसलेलं असायचं.रॅफ ते उत्तमपैकी हाताळायचा. यामुळे वाचणाऱ्या वकिलांच्या 'फी'ज किती,हेही तो आडवळणानं ड्रेक संडरलंडपर्यंत पोचवायचा!

दुसरीकडे पर्यावरणी गट,वार्ताहर यांच्याकडून पुढे काय होऊ शकतं याच्या आगाऊ सूचना मिळून बचावाची धोरणं आखणारा,अशी रॅफनं ख्याती मिळवली. कोणत्या पक्षाच्या माहितीचा कोणापासून बचावासाठी वापर होतो,याबद्दल दोन्ही पक्ष जराजरा साशंक असायचे.ही तारेवरची कसरत करत असतानाच रॅफला एक नवा छंद जडला.पूर्वीही तो थोडाफार व्यायाम करतच असे.आता त्यासोबत ०.२२ रायफलची नेमबाजीही तो शिकला !

ही कलेसाठी कला होती.आठवड्यातून दोनतीनदा 'हेन्रीज गन्स अँड शूटिंग गॅलरी'त जाऊन तो नेमबाजी करायचा.शिकार करण्यात मात्र त्याला मुळीच रस नव्हता.त्याच्या काही पर्यावरणवादी मित्रांना हे समजत नसे.अशा एका मित्राला - बिल् रॉबिन्सला रॅफ म्हणाला

"एक बघ,मी बंदुका हाताळणाऱ्या लोकांमध्ये जन्मलो आणि वाढलो.माझा नेम नेहमीच चांगला होता.मी अश्राप प्राणी,पक्षी मारत नाही.तुला माहीत आहे ते.पण अधूनमधून एखादं बाग खंदळणारं हरीण मारावं लागतं. आपण हरणांचे सगळे भक्षक मारले.आता त्यांची संख्या स्फोटासारखी वाढते आहे.बरं,गावांच्या कडेला राहणाऱ्यांना लांडगे आणि कूगर्स चालत नाहीत.त्यांना मारणारे शिकारी चालतात.मग अधूनमधून हरणं मारणंही चालायला हवं."

"पण तीतर-बटेर,बदकं आणि टर्कीजचं काय?" बिल् न विचारलं.

"ए ! भाषणबाजी नको करूस ! तू आणि मी काही तीतर-बटेरांवर नेमबाजी नाही दाखवत. आणि कायदे पाळून शिकार करणारे आपले आणि पर्यावरणाचे मित्रच असतात.तुला हे माहीत आहे.त्यांना त्यांच्या शिकारींचं क्षेत्र टिकून हवं असतं.ते आपल्याइतक्याच हट्टानं जंगलतोडीला विरोध करतात."

"जंगलतोड थांबली की झालं?"

"हो.कूपर्स घारीनं तीतर मारणं आणि एखाद्या शिकाऱ्यानं मारणं सारखंच.पण घारी आणि तीतरांना हवं असलेलं जंगल टिकवण्यात शिकाऱ्यांचीही आपल्याला मदत असते."

"ठीक आहे, रॅफ.पण ते नॅशनल रायफल असोसिएशनचं स्टिकर तरी काढ,तुझ्या गाडीवरचं.'

"असू दे रे ! तो इमानदारीचा प्रकार आहे.मला खरंच नेमबाजी आवडते! "

आणि या छंदानं रॅफला नोकोबीत रस असणाऱ्या एका वेगळ्याच प्रकारच्या माणसाची भेट घडवली.त्याची शूटिंग गॅलरीतली नेमबाजी पाहून दोन माणसं त्याच्याशी बोलायला आली.

एकजण होता चाळिशीचा,नीट दाढी केलेला,पण निळा सूट नीट अंगासरसा न बसणारा.गळ्यातल्या टायवर राष्ट्रध्वजाचं डिझाइन होतं,आणि डाव्या कॉलरवर सोनेरी क्रूस होता.चेहऱ्यावर स्मित होतं,पण नजर सावध, मोजमाप करणारी होती.

याच्यामागे होता निळ्या जीन्स आणि लालपांढरे उभे पट्टे असलेल्या शर्टातला माणूस.टोकं खाली वळवलेली डाकू-छाप मिशी,आणि तीन दिवसांचे दाढीचे खुंट. उजव्या डोळ्याखाली अश्रू गोंदलेला,आणि मानेच्या दोन्ही बाजूंना ज्वाळा गोंदलेल्या.सतत चूइंग्-गम चघळणारा जबडा.

"मी वेन लेबो,आणि हा बो रेनी." पहिला माणूस म्हणाला.रॅफ हस्तांदोलन करीत असताना रेनीनं पुस्ती जोडली, "हे रेव्हरंड वेन लेबो."

दोघांनी रॅफला सोबत एका बियरवर गप्पा मारायला बोलावलं.बऱ्याच उत्तरेच्या मॉन्रोव्हिल्हून आले होते दोघं. त्यांना रॅफची बरीच माहिती होती. रॅफला आश्चर्यच वाटलं याचं. उदाहरणार्थ, रॅफ हार्वर्डला शिकायला का गेला,जवळपासची विद्यापीठं असताना,यात त्यांना रस होता !

"शिकलो थोडं,हार्वर्डमध्ये.का विचारता आहात?"

"वेल्, तू मोबीलमध्ये महत्त्वाचा माणूस होतो आहेस. आमच्या काही धार्मिक लोकांना जरा कुतूहल आहे तुझ्याबद्दल." लेबो म्हणाला. रॅफनं उत्तर द्यायच्या आधीच रेनीनं विचारलं, "उत्क्रांती शिकवतात, हार्वर्डला?"

रॅफला त्यांचा रोख कळला. "हो तर.हार्वर्डला उत्क्रांतीबद्दल शिकवतात.चांगलं विज्ञान आहे ते,भरपूर पुरावे असलेलं.मला कल्पना आहे,की इथल्या अनेकांना ते पटत नाही. अमेरिकाभर काही लोकांना ते पटत नाही." वाद सोडवायचं पहिलं तत्त्व,'निष्कारण विरोधकांना चिडवू नका'.

"बायबलही शिकवतात?" लेबोनं विचारलं.

"हो तर!" हे कर्मठ 'उजवे' लोक होते,तर ! बिल् रॉबिन्सनं सांगितलं होतं,यांच्यापासून सांभाळून राहायला."एक अख्खं कॉलेज आहे,'स्कूल ऑफ डिव्हिनिटी' नावाचं.गेली पावणेचारशे वर्षे हार्वर्ड धर्मगुरूंचं शिक्षण करतं आहे!"

तत्काळ आपलं चुकलं आहे,हे रॅफला जाणवलं.वाद सोडवायचं दुसरं तत्त्व,'गमजा मारू नका.

विरोधकांना कमी लेखता आहात,असं वाटू देऊ नका.नम्र,तटस्थ राहा'.

पण सोपं नव्हतं,हे.

"बायबलमधलं जे वाचतोस,त्याच्यावर विश्वास आहे तुझा?"

रॅफला राग यायला लागला होता.त्याला इतर कामं आहेत,असं सांगून उठून जायची इच्छा होत होती.पण त्यानं लेबोचा अपमान झाला असता.आणि लेबोला नेमकं काय हवं आहे हे समजून घ्यायचं होतं रॅफला.

"असं म्हणू या,की बायबलमधल्या काही गोष्टी खऱ्या आहेत.काही गोष्टी खऱ्या असतील,असं जरा वेगळ्या पद्धतीनं सांगितलं आहे.एकूण बायबल काय म्हणतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे."

"मी बोलतो वेगळ्या पद्धतीचं,जरा दम धर.मी,रेनी तुला भेटायला आलो आहोत.येऊ आम्ही मुख्य मुद्द्यावर. जरा सबुरीनं घे." लेबो म्हणाला. "बोला!" रॅफ म्हणाला.

"एक म्हणजे,'बायबल' म्हणणं थांबवू या.तो देवाचा शब्द आहे,त्याचा मुलगा येशू ख्रिस्त याच्यामार्फत आपल्यापर्यंत आलेला."

"माझी हरकत नाही,तसं म्हणण्याला.पण ज्यूंचे अनेक पंथ,ख्रिश्चनांचे अनेक पंथ बायबलचे वेगवेगळे अर्थ लावतात.म्हणूनच तर आपल्याकडे धर्मस्वातंत्र्य आहे. लोकशाहीत याला महत्त्व नको." "मी सांगतो महत्त्व काय आहे ते.तू देवाचा शब्द हे अखेरचं सत्य मानू शकतोस,किंवा वेगवेगळे अर्थ लावू शकतोस;तुला ज्यानं बरं वाटेल तसं."

रॅफला ना यातलं देवशास्त्र आवडत होतं,ना लेबोचा सूर. पण त्यानं संभाषण चालू ठेवायचं ठरवलं, "ओके ! जरा टोकाचं बोलता आहात तुम्ही,पण त्यातून ठरतं काय? कुठे पोचतो आपण?"

"रॅफेल एक खाजगी प्रश्न विचारू?"

"पहा,तुम्ही " रॅफेलला खाजगी प्रश्न नको होते खरं तर; पण त्यानं बोलण्याआधीच लेबो म्हणाला,"रॅफेल,तुला येशू ख्रिस्तानं वाचवलं आहे?"

"मी एपिस्कोपेलियन आहे,बरेचदा.पुरतं का तुम्हाला हे?" रॅफ म्हणाला.त्यानं मुद्दाम घड्याळही पाहिलं.

"तू त्या चर्चचा सभासद असशीलही रॅफ,पण त्यानं तू तुझा आत्मा येशू ख्रिस्ताच्या हवाली केला आहेस,असं ठरत नाही.त्या चर्चच्या सभासदत्वामुळे तू मेल्यावर स्वर्गाच्या राज्यात जाशील,हे ठरत नाही.तुला हे महत्त्वाचं नाही वाटत?" लेबो म्हणाला.

"मला पटत नाही तुमचं म्हणणं.खरं तर मला समजतही नाही,तुम्ही काय सांगता ते.मला खरं तर फिकीरही नाही या सगळ्याची.का बोलतो आहोत,आपण हे? प्लीज सांगा मला!"

"तू चांगल्या गटात आहेस.तुझा बहुतेक देवावर,त्याचा पुत्र येशू ख्रिस्त याच्यावर विश्वास आहे. शतू पूजापाठ वगैरेही करतोस.पण तू वाचलेला नाही आहेस,दोस्ता; तू स्वतःला येशू ख्रिस्ताला अर्पण केलं नाही आहेस!"

बराच वेळ संभाषण या प्रकारानं चालल्यावर रॅफ उठला.तो बाहेर जाताना लेबो जवळ आला.

"माझं ऐक रॅफेल! वेळ आहे तोपर्यंत स्वतःला बदल!" लेबो म्हणाला.

हा भाग संपला.शिल्लक पुढील भागात…!!

6/4/26

पक्ष्यांकडून हे शिका. / Learn this from the birds. 

उपनिषदात सत्यकाम आणि गौतम ऋषी यांची गोष्ट आहे.सत्यकामाला शिकविण्या अगोदर परीक्षा पाहण्यासाठी गौतमांनी चारशे गाई त्याच्या स्वाधीन केल्या व 'ह्यांना अरण्यात चरण्यासाठी घेऊन जा' असं सांगितलं.असल्या कामात शिष्याची बुद्धी किती आहे,हे दिसून येत असे.अरण्यात जाताना तो म्हणाला की, "ह्या चारशेच्या हजार गाई होतील तेव्हाच मी परत येईन."

चारशे गाईंची संख्या हजार व्हायला अनेक वर्षे लागली. इतकी वर्षे जंगलात राहिल्यावर निसर्गानंच त्याला अनेक गोष्टी शिकविल्या.सत्यकामाला पक्ष्यांपासून पुष्कळ ज्ञान झालं.हंस आणि मम्दु म्हणजे करोता पक्ष्यांनी त्याला ईश्वराविषयी ज्ञान दिलं होतं.

ऋग्वेदात एक सुंदर प्रार्थना आहे :

परमेश्वररूपी सुंदर पक्ष्याचं 

गूढरम्य रूप ज्या कोणाला ठाऊक असेल 

त्यानं ते मला सांगावं


म्हणूनच ऋषिमुनींच्या आश्रमात इतर विद्यांबरोबर पक्ष्यांची भाषा देखील शिकवीत असल्याचा उल्लेख महाभारतात आला आहे.

जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आपण पक्ष्यांपासून शिकत असतो.आज्ञाधारकपणा हा गुण पक्ष्यांपासून घेण्यासारखा आहे.पाखरांची पिलं मोठी आज्ञाधारक असतात.

मातापित्यांच्या आज्ञेचं पालन न करणं म्हणजे त्यांच्या नशिबी मृत्यूच होय. 'आज्ञापालन म्हणजे जीवन' असं त्यांचं सूत्र आहे.शत्रू कोण? मित्र कोण? चांगलं काय? वाईट काय? हे सारं त्यांना लहानपणापासून शिकविलं जातं.( पक्ष्यांपासून माणसाला काय शिकता येईल?निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,नागपूर ) पाखरांत शिस्त आहे,

म्हणूनच ती एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर करतात. स्थलांतर करताना बाणाच्या आकारात व्यूहरचना करतात.टोकाला वृद्ध आणि शहाणा पक्षी असतो.तो साऱ्या थव्याचं संचालन करतो.मार्ग दाखवितो.त्याला आकाशातील ग्रहताऱ्यांविषयीचं ज्ञान असतं.त्याला हवामानाचा अंदाज असतो.त्याच्या सूचनेप्रमाणे इतरांना शिस्तीत वागावं लागतं.जर शिस्तीनं वागलं नाही,तर एवढा दीर्घ प्रवास करणं त्यांना शक्य होणार नाही.

शिस्तीबरोबर एकीचं बळ येतं.पंचतंत्रातील एका कथेप्रमाणे एकदा चित्रग्रीव नावाचा कबुतरांचा राजा आपल्या थव्याबरोबर पारध्याच्या जाळीत सापडला, परंतु त्याच्या सूचनेप्रमाणे साऱ्या कबुतरांनी सर्व शक्तीनं त्या जाळीसह हवेत उडून प्राण वाचविले.

'मैना आणि सात बहिणी यांच्याजवळ ना तीक्ष्ण चोच,ना अणकुचीदार पंजे;पण साप आणि मुंगुसासारखे शत्रू दिसताच त्या एकत्रित जमून मोठा कोल्हाळ करतात. त्यांच्यावर हल्ला करतात आणि शत्रूला पळवून लावतात.

बगळे,ढोकरी आणि पाणकावळे यांची प्रामुख्यानं तळ्याकाठच्या चिंचेवर पावसाळ्यात वीण होते.त्यांची पिलं वाढविण्यासाठी या काळात लहान माशांची गरज असते.दरवर्षी त्यांची संख्या दुप्पट होत असते;परंतु नव्यानं जन्माला आलेले पक्षी,मर्यादित क्षेत्रात अन्नाचं दुर्भिक्ष निर्माण होऊ नये म्हणून आपलं जन्मस्थान सोडून अन्नाच्या शोधात दुसरीकडे स्थलांतर करतात किंवा विणीवर नियंत्रण ठेवतात.पक्षी आपलं कुटुंबनियोजन हजारो वर्षांपासून करीत आले आहेत.

पाखरांइतके बुद्धिमान प्राणी क्वचितच आढळून येतात. पाण्यातील शंखशिंपले चोचीनं फुटत नाहीत म्हणून समुद्रपक्षी ते उंच आकाशात नेऊन तेथून खालच्या दगडावर सोडून फोडतात.गरुडपक्षी विषारी सर्पाची शेपटी धरून उंच आभाळातून त्याला खाली सोडून मारतात.

एकामेका साहाय्य करू अवघे धरू सुपंथ असंही पक्ष्यांचं वर्णन करता येईल.कोतवाल पक्षी ज्या झाडावर घरटी करतो त्याच झाडाच्या आश्रयानं इतर भीरू पाखरं आपली घरटी बांधतात.कोतवाल आपल्या घरट्याबरोबर आश्रयाला आलेल्या इतर पाखरांच्या घरट्यांचंही संरक्षण करतो.बहिरी ससाणा,घार आणि कित्येकदा गरुडालादेखील आपल्या घरट्याच्या जवळपास फिरकू देत नाही.

पक्षी हे सुखी दाम्पत्यप्रेमाचं प्रतीक आहेत.सारस, चक्रवाक आणि हंसाची जोडी एकदा तयार झाली की ते आयुष्यभर एकमेकांना साथ देतात.त्यातील एकाचा मृत्यू ओढवला तर दुसरा पक्षी आपल्या साथीदाराच्या विरहानं झुरून झुरून मृत होतो.पाखरांच्या जगात व्यभिचार नाही. एकपत्नीव्रत किंवा एकपतिव्रत आपण पाखरापासून शिकायला हवं.

जोडी जमली की पाखरं आपलं घरटं स्वतःच बांधतात. घरटं बांधताना गातात,नाचतात,इकडून तिकडे स्वच्छंदपणे उडतात.

मादी त्यात अंडी घालते.दोघं मिळून ती उबवितात.

पिलांचे संगोपन करतात.त्यांना पंख फुटेपर्यंत प्रेमानं वाढवितात.मादी दगावली तर नर त्यांचं संगोपन मातेच्या आत्मीयतेनं करतो.दोघंही दगावली तर शेजारच्या घरट्यातील पक्षी त्या पिलांना चारा भरवितात.पक्षी हे मूर्तिमंत वात्सल्याचं प्रतीक आहे.

स्वच्छता हा गुणदेखील आपण पक्ष्यांपासून घेण्यासारखा आहे.पक्षी घरट्यात कधीही घाण करीत नाहीत.पिलांची शीट बाहेर पडेल अशी व्यवस्था करतात.एवढी दक्षता घेऊनही घाण झाली तर चोचीनं ती बाहेर टाकतात.

निसर्गात तुम्हांला एखादा पक्षी घरट्यात आजारी पडून मेलेला कधीच दिसणार नाही.मृत्यू जवळ आल्याचं त्याला कळताच तो दूर अज्ञातस्थळी जाईल आणि कुणाला न कळता तिथे निष्प्राण होईल.मृत्यूबद्दल शोक नाही.सारं काही शांतपणे घडतं.

पक्षी हे कर्मयोग्याचं मूर्तिमंत प्रतीक आहे.अगदी अनासक्त वृत्तीनं ते पिलांची वाढ करतात.त्यांच्यासाठी जीव द्यायलाही ते कमी करणार नाहीत.मात्र पिलं जाणती झाली की पालक त्यांचा त्याग करतात. मायामोहाच्या बंधनात ते पडत नाहीत.

असंग्रह वृत्ती हा त्यांचा आणखीन एक गुण वाखाणण्याजोगा आहे.माणसाप्रमाणे त्यांना उद्याची चिंता नाही.जगात प्रत्येक जण आपला संसार कसा चालेल या चिंतेत असतो.पाखरं आपल्यापेक्षा चांगली आहेत.ती सकाळी भुकेल्या पोटानं बाहेर जातात आणि सायंकाळी पोट भरून सुखानं परततात.तरीही ती किती आनंदी असतात!यजुर्वेदात 'सोमाय लवानालभते त्वष्ट्रे कौलीकान' असा मंत्र आहे.अर्थ असा : सौम्यभावाकरिता लावा पक्ष्याकडे पाहा,कारागिरीसाठी बाया पक्ष्याकडे बघा.बाया पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील. अतिशय सुबक आणि सुंदर असतात.असंच सुंदर घरटं शिंपी पक्षी पानांनी शिवून तयार करतो.मानवाला आता खूप तंत्रज्ञान अवगत झालं आहे,परंतु बाया पक्ष्यांसारखं घरटं त्याला बांधता येत नाही.पुन्हा इतकं सर्वांगसुंदर घरटं बांधल्यावर पिलांची वीण झाली की ते घरटं सोडून जातात.त्यावर कसला लोभ नाही.पाखरांची घराबद्दलची ही उदासीन वृत्ती संत कबीरानं एका ठिकाणी मार्मिकपणे व्यक्त केली आहे :

ना घर मेरा

ना घर तेरा

दुनिया रैन बसेरा

असं जीवन जगत असताना पाखरं दुसऱ्याकरिता करीत असलेली कर्तव्यंदेखील मोठ्या निष्ठेनं आणि प्रामाणिकपणे पार पाडतात.

कबुतरं आणि पाकोळ्यांचा उपयोग युद्धकाळात टपालाची ने-आण करण्याकरिता केला जातो.हे पक्षी कधी शत्रुपक्षाला फितूर होत नाहीत. एका जर्मन औषध कंपनीनं कबुतरांचा उपयोग औषधी गोळ्यांची निर्मितीविषयक तपासणी करण्याकरिता केला आहे.मशिनमधून औषधी गोळ्या बाहेर येतात. कबुतर हे पाहत असतं.एखाद्या गोळीत जर दोष असेल तर ती चोचीनं बाजूला सारतं.पक्षी हे सौंदर्याचं प्रतीक आहे.पाखराइतकी रंगातील विविधता सृष्टीत इतरत्र तुम्हाला आढळून येणार नाही.एका कवीनं त्यांचं वर्णन केलं आहे :

सुंदर ही झाडे। 

सुंदर पाखरें किती गोड बरे। 

गाणे गाती

पक्ष्यांच्या शरीराची किंवा पंखाची मोडतोड झाल्याचं कधी आढळून येणार नाही.एकाच कुळातील पक्षी कसे एखाद्या साच्यातून काढल्याप्रमाणे एकसारखे दिसतात.

त्यांचं आरोग्य,रूप आणि शरीराचा डौलदारपणा हेवा वाटावा इतका सुंदर असतो.म्हणून पक्ष्याला खरोखरीचा योगी म्हटलं आहे.मयूरासन व क्रौंचासन इत्यादी आसनं आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी मोर आणि क्रौंच पक्ष्यांकडून घेतली आहेत.

भविष्याचं ज्ञान पक्ष्यांना उपजतच प्राप्त होतं.सहावं इंद्रिय प्राप्त झालेले ते अंतर्ज्ञानी आहेत.मानवाला मात्र ते ज्योतिषशास्त्राद्वारे प्राप्त करून घ्यावं लागतं

सृष्टीतील अनेक घडामोडींचं ज्ञान ती घटना घडण्यापूर्वी आपणाला मिळू शकत नाही.भूकंप होण्यापूर्वी त्याचं ज्ञान पाखरांना एक दिवस अगोदर होतं.त्या वेळी पाखरं अस्वस्थ होतात.आपल्या घरट्यांचा त्याग करून आभाळात सैरावैरा उडू लागतात.

समुद्रावरील वादळी पाखरू येणाऱ्या वादळाची पूर्वसूचना देतं.चातक पक्षी पावसाचं आगमन सांगतात.कावळ्यांनी आपली घरटी निष्कंटक झाडावर बांधली तर त्या वर्षी पाऊस चांगला पडतो.परंतु एखाद्या वर्षी सावर-पांगारा-बाभूळ अशा काटेरी झाडांवर किंवा सुकलेल्या वृक्षांवर त्यांची कोटारं दिसू लागली की समजायचं की,त्या वर्षी अवर्षण पडणार.

पक्षी नसतील तर जगाचा विनाश होईल.पक्ष्यांचं कीटकांवर नियंत्रण नसेल तर वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी यांचं जगणं अशक्यप्राय होईल.भारतात कीटकांच्या पन्नास हजार जाती आहेत.त्यापैकी टोळ, भुंगेरा,पतंग,सुरवंट आणि वाळवी या तर शेती आणि वनासाठी मोठ्या पीडक आहेत.वनस्पतिसृष्टी आणि प्राणिसृष्टी ह्या दोन्हींवर आपली सारी राष्ट्रीय अर्थव्यवस्था अवलंबून आहे.बहिरी ससाणे आणि घुबडं हे उंदीर व घुशी यांवर नियंत्रण ठेवतात.त्यामुळे दहा टक्के ते पंचवीस टक्के शेतीचं नुकसान वाचतं.पक्षी फुलांचं परागीकरण व बियांचं विकरण करतात.तुती आणि चंदनाची जंगलं निर्माण होण्यात फळं खाणाऱ्या पक्ष्यांचा मोठा सहभाग आहे.तसंच समुद्रातील तरंगते सुरुंग आणि पाणबुड्या दिसताच गंगाचिल्लीसारखे पक्षी तिथे थव्यानं जमा होतात.त्यामुळे युद्धकाळात ते अत्यंत उपयुक्त ठरले आहेत.

★★★ समाप्त ★★★

6/2/26

प्रेम - एक देणगी / Love is a gift

प्रेम हा असा खजिना आहे की त्यासाठी आपल्याला काही देता येत नाही.तो देत राहण्यानेच खजिना खजिना रहातो.

मी जेसन स्टीव्हन्सच्या येण्याची वा वाट बघत होतो, तेव्हा माझ्या संमिश्र भावना होत्या हे मला कबूल केलंच पाहिजे.वर्षभर चाललेल्या या आमच्या शोधयात्रेत मागच्या महिन्यात जो आमचा सहप्रवास झाला,तो म्हणजे एक सुरूवात होती,हे मला माहीत होतं.जेसननं जी प्रगती केली होती,त्यामुळे मी हर्षभरित झालो होतो,आणि त्याच्या भविष्याबद्दल मला उत्साह आणि खात्री वाटत होती.कठीण पण अर्थपूर्ण प्रवास संपल्यावर येतो तो रितेपणाही मला जाणवू लागला.

मी आपला आयुष्यभराचा जिवलग रेड स्टीव्हन्स गमावून बसतोय की काय अशी एक प्रकारे माझी भावना झाली,कारण आता या दर महिन्याच्या सभेची वाट मला बघायला लागणार नव्हती.दुसऱ्या प्रकारे असंही झालं होती की जेसनबरोबर त्याच्या या रूपांतरातून जातांना असं घडलं की रेड स्टीव्हन्समधला उत्तम भाग कायम माझ्या सोबत असणार होता.

अंतर्गत फोनवरून मिस् हेस्टिंग्जनं,जेसन स्टीव्हन्स आला असल्याचं सांगितलं.त्या दोघांना मी कॉन्फरन्स रूममध्ये भेटलो,आणि माझी खात्री आहे की माझ्यासारख्याच त्याच्याही मनात संमिश्र भावना होत्या.

मिस् हेस्टिंग्जनं रेड स्टीव्हन्सच्या मृत्युपत्रासोबत तळघरात ठेवलेली व्हिडिओ टेप बाहेर काढली.हा खोका आमच्या कपाटात होता.मिस् हेस्टिंग्जचं हे नित्यकर्म आमच्या परिचयाचं झालं होतं.आमच्या कॉन्फरन्स रूमच्या टोकाला असलेल्या व्हिडिओ प्लेअरमध्ये तिनं ती ठेवली.

सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल,स्वाधारित कलासामग्री,डॉन बिलिंग्ज,अनुवाद - दिशा केळकरEMBASSY BOOK DISTRIBUTORS

मोठ्या पडद्यावर रेड स्टीव्हन्सची छबी साकारली.मला तो चांगला माहीत असल्यामुळे मी खात्रीने सांगतो की,आमच्यासारख्याच रेडच्याही भावना झाल्या होत्या.

रेडनं सुरूवात केली."जेसन,मला तुझं अभिनंदन करायचं आहे.तुझ्यासाठी मी योजलेल्या सर्वोत्तम देणगीच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत तू पोचलास.मागच्या महिन्यात एका दिवसाची देणगी हा घडा होता.त्यात जी शिकण्याची क्रिया सामावलेली होती,त्यातून तू खूप छान पार पडलास,मला तुझा अभिमान वाटतो.तू तुझ्या अखेरच्या दिवसासाठी काय योजना केलीस,ते मला माहित नाही.पण ते मिस्टर हॅमिल्टनला पसंत पडलं असावं.मला वाटतं,तू बहुधा माझ्याप्रमाणे साध्या आणि सरळ गोष्टीच त्या दिवसासाठी योजल्या असशील.

"आपण जसं जगायला हवं,तसं जर जगत राहिलो,तर प्रत्येक गोष्ट अशाच क्रमाक्रमाने होत रहाते,की आपल्या आयुष्याचा शेवटचा दिवस हा इतर कोणत्याही दिवसाप्रमाणेच असतो.नेहमी लक्षात ठेव की दीर्घ आयुष्याची ग्वाही आपल्याला कोणालाच नसते, आपल्याला फक्त आजची ग्वाही असते,दुसऱ्या कशाचीही नाही.

"मला असंही वाटतं की,जरा लक्ष दिलंस तर तुला कळेल की आयुष्याच्या शेवटच्या दिवसासाठी काही योजून ठेवण्यासारखं काहीच नसतं,ते आज किंवा उद्यापण करण्यासारखं असतं.कसं कोण जाणे,पण मला वाटतं की आयुष्यातल्या दुःखद गोष्टी या मोठ्या अपयशांमुळे नाही,तर चुकलेले छोटे छोटे आनंद आणि न मिळालेले सहानुभूतिचे आविष्कार यातून बनतात."

रेड स्टीव्हन्स थांबला.त्याच्या आणि आम्हा सर्वांच्या भावना त्या अंधाऱ्या खोलीतही मला जाणवत होत्या.त्यानं बोलण चालू ठेवलं,"जेसन,या शेवटच्या महिन्यात मी तुला जी सर्वोत्तम देणगी देत आहे त्याच्या एका भागाची मी तुला ओळख करून देणार आहे.या भागात इतर सर्व देणग्यांचा समावेश होतोच,पण त्याखेरीज तू आपल्या जीवनात जे जे करशील, मिळवशील किंवा माहीत करून घेशील त्याचाही समावेश होतो.हा भाग म्हणजे प्रेम एक देणगी.

" जीवनात जे जे चांगलं,आदरणीय हवं हवंस वाटणारं असतं,त्याचा पाया प्रेम हा असतो.जे जे वाईट किंवा दुःखदायक असतं,त्याचं कारण प्रेमाचा त्याच्या जगण्यात पूर्ण अभाव हे असतं.”

आपल्या समाजात प्रेम हा शब्द चुकीच्या अर्थाने किंवा अती सढळपणाने वापरला जाणारा शब्द आहे.कित्येक गैरमहत्त्वाच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि छोटे छोटे उपक्रम यांनाही तो लावतात.पण प्रेम-एक देणगी याविषयी मी बोलतो ते प्रेम म्हणजे एक स्वाभाविक चांगुलपणा असतो.गाभ्याशी प्रेम असतं तेव्हा हा चांगुलपणा त्याचा एक भाग असतो.

"या वर्षभरात ज्या ज्या इतर गोष्टींचा तू अनुभव घेतलास,त्या प्रत्येक गोष्टीत प्रेमाचा अंतर्भाव होता. आता येत्या तीस दिवसांत या गोष्टींमध्ये प्रेमाचा अंतर्भाव कसा होता,याचा माग तू घ्यायचा आहेस,मी ही तुझ्याकडून अपेक्षा करतो.तुला जे सापडलं,त्याची यादी करून तू मिस्टर हॅमिल्टनला सादर करायचीस.

"नीट लक्षात ठेव की तुझी वर्तणूक आणि तुझं काम यांची अजूनही तपासणी होते आहे.”

जर अगदी या बाराव्या महिन्यातही कसोटीस उतरला नाहीस तर तुला मी योजलेली सगळीच्या सगळी सर्वोत्तम देणगी मिळणार नाही,माझी सुचना तुला घाबरवण्यासाठी नाही.तुझ्यापुढे व्यक्त करता येईल अशी सर्वोच्च दर्जाची ती माझी प्रेमभावना आहे.त्या दर्जाप्रत मला तुला न्यायचे आहे."

रेड स्टीव्हन्सची प्रतिमा लोप पावली.पुन्हा एकदा पडदा रिक्त झाला.

काही मिनिटं जेसन स्तब्ध बसून होता.मला माहित होतं, की तो गहन विचारांमध्ये बुडलेला होता.शेवटी आम्ही सर्वजण उठलो,आणि शांतपणे कॉन्फरन्स रूममधून बाहेर पडलो.जणू काही रेड स्टीव्हन्सला श्रद्धांजली वहायला आम्ही जमलो होतो.माझ्या खूप जुन्या आणि खूप प्रिय असलेल्या मित्राला ही योग्यच प्रशंसा होती.

महिन्याच्या शेवटच्या दिवशी मिस् हेस्टिंग्ज माझ्या कार्यालयात जेसनला पुढे घालून आली.ती दोघं नेहमीच्या जागी बसली,आणि आम्ही शुभेच्छांची देवघेव केली.मी छातीठोकपणे सांगतो की,जेसन मनात खूपकाही वागवत असला पाहिजे.

जेसननं बोलायला सुरूवात केली,"मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्ज,गेल्या वर्षभराचा उपक्रम माझ्यासाठी काय घेऊन आला हे सांगायला माझ्याजवळ शब्दच नाहीत.एक वर्षापूर्वी मी जो होतो तो माणूस मी अगदी नाही.मी मानतो की,बऱ्याच अर्थी आज माझा वाढदिवस आहे.तुम्ही दोघं त्याचा एक भाग झाल्याबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत."

माझ्या लक्षात आलं की जेसनचे डोळे पाणावले होते, आणि त्याच वेळी मिस् हेस्टिंग्जच्या अ‍ॅलर्जीनं उचल खाल्ली होती.माझाही गळा भरून आला,हे मी कबूल करतो.जेसननं खोल श्वास घेतला आणि त्याचा अहवाल सुरू केला.

"या वर्षाच्या पहिल्या महिन्यात,मला राग आला होता, आणि कुटुंबातल्या प्रत्येकाला जसा वाटा मिळाला तसा वाटा मिळाला नसल्यामुळे मनानं बंड केलं होतं.एका अख्ख्या वर्षाचा तेव्हा मी तो चक्रम बेत समजत होतो. त्याबद्दल मला कळल्यावर तर मी फारच वैतागलो होतो. मग मी टेक्ससला गस् कॉल्डवेलकडे काम एक देणगी कशी असते ते शिकायला गेलो.

"जेव्हा गस् कॉल्डवेलने मला खड्डे खणून कुंपण करायची आज्ञा केली,तेव्हा प्रेम या गोष्टीशी मी अगदी अपरिचित होतो.पण मागे वळून पाहिलं की कळतंय, की गस् कॉल्डवेलच्या मनात रेड आजोबांबद्दल गाढ प्रेम होतं आणि ते त्यांनी माझ्यापर्यंत पोचवलं.रेड आजोबांनी काम-एक देणगी हा जो धडा माझ्यासाठी योजला होता तो मी नीट शिकावा म्हणून त्यांनी भरभरून प्रेम केलं माझ्यावर,काम नीट नेटकं करण्यानं एक प्रकारचं प्रेम मिळतं हे पण मी शिकलो.दिवसभर श्रम केल्यावर तुम्ही थांबता आणि सरळ बळकट कुंपणावरून,जे कुंपण तुम्ही स्वतःबांधलंय त्यावरून सूर्य मावळतांना बघता,तेव्हा तुम्हाला जगाचा व्यवहार सुरळीत चालल्याची जाणीव होते.

" पैसा- एक देणगी हा धडा मी ज्या महिन्यात शिकलो तेव्हा मी शिकलो की,पैशावर प्रेम करण्यानं एका पोकळ,अर्थहीन जीण्याकडे आपण जातो.पण आपण जेव्हा लोकांवर प्रेम करायला शिकतो,आणि पैशाचा साधन म्हणून वापर करतो,तेव्हा सर्व गोष्टी यथार्थ दृष्टीने पाहिल्या आहेत असं वाटतं.

" मित्र-एक देणगी हा धडा मी ज्या महिन्यात शिकलो, तेव्हा आपण इतरांवर कशा रीतीने प्रेम दाखवू शकतो हे मी प्रथमच शिकलो.आपण जेव्हा फक्त स्वतःबद्दलच चिंता करतो तेव्हा आपण नेहमी हिरमुसलेले राहतो. पण जेव्हा आपण इतरांचा आणि त्यांच्या भल्याचा विचार आधी करतो,तेव्हा आपलं आणि त्यांचही भलं होतं.

" शिकणं - एक देणगी असल्याचं शिकतांना मला असा शोध लागला की,ज्या लोकांजवळ पैसे नाहीत,पण शिकण्याची ओढ आणि शिक्षणावर प्रेम आहे ते लोक सधन असतात.हे ज्ञानावरचं प्रेम माझ्या जीवनांत झिरपलं,आणि मी किती स्वकेंद्रित होतो की ज्यामुळे, मी परंपरेने वर्षानुवर्षे आपल्यापर्यंत पोचलेलं शहाणपण दुर्लक्षित ठेवलं,आणि स्वतःला नाशाप्रत ढकलत राहिलो,हे जाणवलं.

" प्रश्न - एक देणगी यातून मी असं शिकलो की, प्रश्न,अडथळे म्हणजे आपल्यासमोर येणारी आव्हानं,याखेरीज दुसरं काहीच नसतं.या वर्षापूर्वी प्रश्नांना मी काहीतरी पूर्णपणे वाईट गोष्ट असं मानायचो.एक ब्याद समजून तिची वासलात लावायचो,किंवा त्याहूनही वरकडी म्हणजे त्याच्याकडे पूर्णतःपाठ फिरवायचो.पण जेव्हा आपण आपल्या प्रश्नांकडे जिव्हाळ्याने बघतो, तेव्हा असं लक्षात येतं की,या दुनियेत एक सुंदर आखणी आहे.प्रश्न तुमच्यासमोर येतो,त्याचा उद्देश, तुम्हाला काही धडा शिकवावा असा असतो,आणि तुम्ही अधिक चांगली व्यक्ती बनावं,असा असतो.

" कुटुंब - एक देणगी या धड्यानं मला असं शिकवलं की जगण्यावर प्रेम करायचं असलं तर तुम्ही जगण्यातली मौज लुटायला हवी.आपण जेव्हा चांगल्याला आणि वाईटालाही हसू लागतो, तेव्हाच जीवन आपल्याला जे प्रेम देतं ते जाणवतं.

" स्वप्न - एक देणगी या विषयात मी जसा जसा खोल उतरायला लागलो,तसं मला समजलं की आपल्या भोवतालचं जे जे असतं,त्यावर प्रेम करावं, म्हणून आपल्याला जीवन दिलं गेलंय.आपल्या अंतर्यामी जे वाटतं,त्याचा बाह्य आविष्कार म्हणजे आपला कल,आपली स्वप्न आणि आपली ध्येयं असतात.

देणं - एक देणगी याचा मी अनुभव घेण्याआधी मला वाटायचं की आपण जर काही देऊन टाकलं तर आता ते दुसऱ्याच्या मालकीचं होतं.आणि पूर्वी तुमच्याजवळ जेवढं होतं त्याच्यापेक्षा आता तुमच्याजवळ कमी असणार.

वास्तविकपणे,तुम्ही प्रेमानं काही देता,तेव्हा देणारा आणि घेणारा यांच्याजवळ जास्तच जमा होत.सुरूवातीपेक्षा.

" कृतज्ञता - एक देणगी या धड्यातून मी हे शिकलो की आपल्याला मिळालेल्या हेवा करण्यासारख्या आणि कौतुकास्पद गोष्टी आठवल्या,आणि त्यांचा आनंद लुटला तर आपल्याला प्रेमाची जाण आणि अनुभव मिळतो.'

" सरतेशेवटी एका दिवसाची देणगी या धड्यानं मला शिकवलं की,जगण्यातले फक्त चोविस तास राहिले आहेत असं समजायचं आणि मला शक्य तितकं प्रेम जाणवून आणि अनुभवून घ्यायचंय,जेणेकरून मी ते सहज हस्तांतरित करीन."

जेसन थांबला,आणि त्यानं घसा साफ केला.त्यानं प्रेम - एक देणगी याच्यात विशेष नैपुण्य मिळवलंय असं मला मनापासून वाटत असल्याचं मी त्याला सांगणार तोच त्यानं बोलणं सुरू केलं.

" प्रेम - एक देणगी याच्या व्याख्येचं शब्दांकन करण्याचा प्रयत्न मला कोणी करायला सांगितला तर मला रेड आजोबांनी माझ्यासाठी जे काही केलं,त्याचं उदाहरण देता येईल.मला या गेल्या वर्षात जे जे त्यांनी दिलं,जे जे माझ्यासाठी केलं,तेच याचं उदाहरण.आपण जेव्हा दुसऱ्या कोणावर खरंखुरं प्रेम करतो,तेव्हा आपण एक वेगळी व्यक्ती बनतो,आणि तशीच ती माणसं पण वेगळी बनतात.

"रेड आजोबांनी मला सर्वोत्तम देणगी देऊन त्यांचं माझ्यावरचं प्रेम उघड केलं,त्यामुळे माझ्यात कायमचं परिवर्तन झालं आणि बघा मी कोण झालो."

जेसननं उठून मिस् हेस्टिंग्जला उराउरी धरलं,वळून लिहिण्याच्या टेबलाच्या माझ्या बाजूस आला,आणि मला त्यानं कडकडून मिठी मारली.आमच्या दोघांचे त्याने,आम्ही जे जे केलं त्यासाठी आभार मानले,आणि भविष्यात तो आमच्या संपर्कात राहणार आहे,याची तो वाट बघत असल्याचं सांगितलं.

जेसननं दरवाजाच्या कडीला हात घातला तेव्हा,त्याला थांबवत मी म्हणालो,"एक मिनीटभरच थांब,जेसन. तुला माहित नाही अशी,सर्वोत्तम देणगीची आणखी एक पायरी आहे."

●●● समाप्त ●●●

5/31/26

सुखदेव / Sukhdev

त्याच्या ह्या बोलण्यावर माईला खरं तर नवल वाटलं. कारण शेत कसायला देताना मजूरपावती करण्याच्या वेळी बोलण्याच्या ओघात बापूंनी विश्वनाथ अन् राधू दोघंही सज्जन माणसं आहेत,त्यांच्याकडेही शेती भरपूर आहे,आपली जमीन लागूनच आहे,पुढेमागे आपण विकायला काढली तर आपल्याला प्राधान्य मिळावं म्हणून ते आपली जमीन कसायला मागताहेत.पण मी जमीन सुखदेवला देणार आहे कारण त्याला जरी पोटापुरतं मिळत असलं तरी त्याचा बारदाना काही फार मोठा नाही.त्यामुळे आपली जमीन कसायला जास्त वेळ तो देऊ शकेल,असं म्हटलं होतं.माईनी विचार केला,आपल्याला काही प्रत्यक्ष अनुभव नाही.सुखदेव म्हणतो त्याप्रमाणे रागाच्या भरात दिल्या असतील त्यांनी शिव्या.सुखदेव कशाला खोटं बोलेल ? त्यांनी सुखदेवला विचारलं,"बरं,तुझ्या जेवणाचं काय ? नसेल झालं तर गरम भाकरी आणि पिठलं करून वाढते."

सुखदेव नकार देत म्हणाला, "नका तरास घेऊ माई.मी एका दोस्ताबरोबर खाल्लंय.आता काही भूक न्हाई. सांजच्यालाच घरी जानार होतो.पन कामच आटोपलं न्हाई.आता अंधार पडल्यावर जाऊ नाही म्हन्तो, मघाशीच बाजारात जरा तनातनी झाली.कुनी सांगावं, रातच्याला काही दगाफटका झाला तर ? म्हून आज रातच्याला इथंच लवंडतो.काही हाथरायला आसलं तर द्या.बाहेर मारुतीच्या पारावर पडतो जाऊन.सकाळी झुंजूमुंजू झालं की जाईन.तीन कोसाचं तर अंतर. सकाळचा चा घरी जाऊनच पिईन."

माईंनी त्याला झोऱ्या दिला.पांघरुणाचं विचारलं तर नको म्हणाला.'उपरनं हाय,तेच घिईन पांघरायला.'असं म्हणून झोऱ्या घेऊन तो वाड्याबाहेर पडला.

माईंना तो तेव्हाही अस्वस्थच वाटला.त्याचं माईंच्या बोलण्याकडे लक्ष नव्हतं.पण हा बाजारात झालेल्या भांडणाचा परिणाम असावा,तरुण वयात लहानसहान गोष्टींमुळे मनाला त्रास होतो,असं वाटून माईनी तिकडे दुर्लक्ष केलं.

रात्रीचा साडेआठचा भोंगा वाजला.थोडावेळ अभ्यास करून मुलांचीदेखील झोपेची वेळ झाली. झोपण्याआधी माईच्या सांगण्यावरून यशाने बाहेर जाऊन ओट्यावरून पाहिलं,सुखदेव मारुतीच्या पारावर झोऱ्यावर पडला होता.पण झोपला नव्हता.सारखा ह्या कुशीवरून त्या कुशीवर वळत होता.

रात्री बाराच्या सुमारास जवळच्या श्रीकृष्ण टॉकीजमधून रात्रीचा शो संपला.

थोड्यावेळाने वाड्याचा दरवाजा खटखटण्याचा आवाज आला.माईची झोप सावध होती.त्या लगेचच उठल्या. त्यांनी आतूनच 'कोण आहे ?' विचारलं,

"माई,भी सुखदेव.इथे पारावर लई डेकनं चावत्यात. गावाबाहेर शनीच्या देवळात जाऊन झोपतो.पहाटंला झोऱ्या आनून देतो.मग गावाकडं जाईन."

"बरं." माई दार न उघडताच म्हणाल्या अन् परत अंथरुणावर येऊन पडल्या.पहाटे नेहमीप्रमाणे त्यांना जाग आली.प्रातविधी आटोपून त्यांचं भूपाळ्या म्हणणं चालू असतानाच सुखदेव झोऱ्या परत करायला आला. शनीच्या देवळात चांगली झोप लागली म्हणाला.आता त्याचा चेहराही शांत,समाधानी दिसत होता.ते पाहून माईंनाही बरं वाटलं.सुखदेव गेल्यावर माई आपल्या नित्याच्या कामाला लागल्या.यशा आणि मंदाची सकाळची शाळा असल्याने ते उठून त्यांच्या तयारीला लागले.नास्ता करून शाळेत गेले.माईंची देवपूजा झाली. मुक्ता मध्ये मध्ये लुडबुड करत होती.तिच्याशी बोलता बोलता माई कणीक भिजवत होत्या.तेवढ्यात सुखदेवचा आवाज आला.हा पहाटेच गावाला गेला आणि आता अकरा वाजता परत कशाला आला असेल ? ओच्याला हात पुसत माई स्वैपाकघरातून ओसरीवर आल्या.सुखदेव चौकातच उभा होता.त्याचा नेहमीचा तांब्याच्या वर्णाचा चेहरा तांबडालाल झाला होता शिवाय तो खूप थकलेला आणि चिंताग्रस्त वाटत होता.

"काय रे सुखदेव,काय झालं?" माईंनी काळजीच्या सुरात विचारलं.

"माई,तुम्हाला झोऱ्या देऊन गावाकडे गेलो तर आमच्या गावाच्या वेशीपाशीच

राधू, विश्वनाथ अन् त्यांचे सोयरे दिसले.रात्री ते खळ्यात झोपले होते.त्यांना कुणीतरी बेदम मारलं होतं म्हनं. चांगलेच सुजलेले दिसले.काल अमुशा.अंधार होता.अन् तोंडाला उपरनं बांधलं होतं म्हून मारनाऱ्यांची ओळख पटली न्हाई.पन त्यांचा वहीम माझ्यावर हाय. म्हून ते पोलीस कम्प्लेंट करायला इकडंच येत होते.मग मी घरी जाऊन चहा पिलो अन् उलट्या पावली माघारी फिरलो. संगटी बापपन आलाय.तो गेलाय पोलीस ठेसनात.मी तुमच्या कानावर घालायला हिथं आलू."

माईंना हे ऐकून आश्चर्यच वाटलं.त्या मनात म्हणाल्या, 'काय देव तरी एखाद्याच्या मागे लागतो बघा !'

"अरेपण,तू रात्रभर इथेच झोपलास,पहाटे माझ्यासमोरच झोऱ्या देऊन गावाकडे गेलास,तू कसा काय मारणार त्यांना ? त्या दिवशीच्या भांडणाच्या रागातून त्यांनी तुझं नाव घेतलं असणार."

माईंच्या बोलण्यामुळे सुखदेवच्या चेहऱ्यावरचा ताण कमी झाला."बघा ना माई,गरिबावर इनाकारन नाव घेत्यात.तुमची जमीन त्यांना कसायला दिली न्हाई म्हून हा राग.मी सांगू का पोलिसांना ? माईसाहेबांची साक्ष हाय! रात्री मी हिथंच होतो.बापूसाहेबांचा गावात अन् पोलिसात चांगला दाब हाय.त्यामुळे तुमच्या शब्दाला लई किंमत हाय.तुमच्या एका शब्दावर गरिबावरचं बालंट जाईल.न्हाई तर पोलीस धरून लई हान्तील इनाकारनच.त्या लोकाईचं काय हय ! लई बक्कळ पैका हाय त्याहीच्याकडं पोलिसांना दाबायला."

माई तात्काळ म्हणाल्या,"तू काही काळजी करू नकोस. खुशाल माझं नाव सांग.गरज पडली तर मी येईन कोर्टात साक्ष द्यायला."

माईंनी आश्वासन दिलं अन् त्याबरोबर सुखदेवचा चेहराच पालटला.त्याच्या चेहऱ्यावरची काळजी नाहीशी झाली.तो एकदम ताजातवाना दिसायला लागला.खरं तर,बापाला पोलीस स्टेशनात पाठवून सुखदेव ह्याच उद्देशाने वाड्यावर आला होता.माईंना 'तुम्ही साक्ष द्याल का?' हे विचारायची त्याची हिंमत होत नव्हती.पण कनवाळू माईंनी गरिबाला पोलिसांचा त्रास होऊ नये म्हणून स्वतःहून 'मी साक्ष द्यायला येईन' असं सांगितल्यावर सुखदेवने सुटकेचा निःश्वास टाकला. आता कुठलंही कोर्ट त्याला दोषी ठरवणार नव्हतं. किंबहुना आता पोलीस त्याला त्रास देण्याची सुतराम शक्यता नव्हती.गावातल्या एका प्रतिष्ठित घराण्यातल्या पापभीरू स्त्रीने सुखदेव त्या रात्री गावातच होता अशी साक्ष देणं हा सुखदेवचा हुकमी एक्का होता.तो तत्परतेने माईंच्या पाया पडला.माईंनीही त्याला 'काळजी करू नकोस, सुखी राहा',असा मनापासून आशीर्वाद दिला.माईंचा निरोप घेऊन सुखदेव पोलीस स्टेशनात जाण्यासाठी म्हणून वाड्याबाहेर पडला.माईही आपल्या कामाला लागल्या.संध्याकाळी पाचच्या सुमारास सुखदेवचा बाप वाड्यावर आला.सुखदेवला पोलिसांनी चौकशीसाठी थांबवून ठेवलंय असं सांगायला तो आला होता.

माईंनी दिलेला चहा घेऊन तो घरी जायला निघाला. निघताना अदबीने माईंना म्हणाला,"माईसाहेब,तुमच्या दर्शनाचा योग आता वारंवार येनार.ह्या पोलिसांच्या झंजाटात आन् कोर्टाच्या लफड्यात लै येळ जातो.ह्या वक्ताला तुमची जिमीन कसायला घेतली नसती तर बरं झालं असतं.ही दुष्मनी फक्त त्या जिमिनीसाठी हाय. काय करनार ? भोग हैती सगळे.ईट्टल... ईट्टल..."

आपली जमीन कसण्यामुळे सुखदेव अन् त्याचं कुटुंब अडचणीत सापडलंय ह्याचं माईंना फार वाईट वाटून कोनकोंडं वाटायला लागलं.त्या दिवशी पूजा करतानादेखील त्यांनी त्या कुटुंबासाठी प्रार्थना केली. दुसऱ्या दिवशी सुखदेवचा बाप सकाळी दहाच्या सुमारास आला.वाड्यावरून तो पोलीस स्टेशनात जाणार होता.डोक्याला पिवळं मुंडासं बांधलेला, काळ्याभोर रंगाचा,सुरकुतलेल्या कातडीचा आणि मिचमिच्या डोळ्यांचा सुखदेवचा बाप सारखा कपाळावर हात मारून म्हणत होता -

"माईसाहेब,काय भोग आलेत हो ह्या वयात... बघा, जाय-यायची दगदग,वरती पैसा परी पैसा... बाहेर जेवन,चहा... काय कमी खर्च येतो काय हल्लीच्या काळात..."

माईंना ते लगेचच पटलं.खरंच तर आहे.माईंनी मनाशी काही विचार केला.त्या सुखदेवच्या बापाला म्हणाल्या, "तुम्ही येत चला इकडे जेवायला.पोरांबरोबर तुम्ही दोघं. त्यात काय ? चार भाकरी जास्तीच्या टाकायला मला काही त्रास नाही." पडत्या फळाची आज्ञा सुखदेवच्या बापाने शिरसावंद्य मानली.

माईंनी 'जेवायला येत चला' असं सांगितल्यापासून सुखदेव कोर्टाच्या तारखेसाठी आला की,तो आणि त्याच्याबरोबर त्याचा बाप वाड्यावर जेवायला यायचे. कधी त्यांच्याबरोबर गावातले काही लोकही असायचे. आल्यावर सुरुवातीलाच 'तुमची जिमीन कसायला घेतली आन हा कुटाना झाला बघा!' ही लापनिका दरवेळेस असायची.बरोबरचे लोकसुद्धा झिलकऱ्यासारखं त्यांच्या हो ला हो मिळवायचे.

खेड्यात मोकळ्या हवेत राहणाऱ्या आणि चार कोस सहज चालणाऱ्या ह्या मंडळीचा आहार चांगलाच दांडगा होता.एक एक जण एका बैठकीत चार-पाच भाकऱ्या सहज फस्त करी.संध्याकाळी परत चहाला हजर.ही मंडळी येऊन गेली की,थकलेल्या माई कापडाचं फटकुर डोक्याला घट्ट बांधून पडून राहत.ह्या मंडळीचं येण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललं.त्याबरोबर त्यांच्यासोबत येणाऱ्यांची माणसांची संख्याही वाढत चालली होती.

एकदा जेवण झाल्यावर ओट्यावर ही मंडळी चंची काढून गप्पा हाणत बसली होती.तेव्हा त्यांच्या गप्यावरून त्यातले काही जण लग्नाचा बस्ता बांधायला आले होते,लग्नाचं कापडचापड खरेदी करणाऱ्या लोकांना सुखदेवचा बाप वाड्यावर जेवायला घेऊन आला होता,हे यशाला कळलं.त्याने ते माईंच्या कानावर घातलं.नंतर एकदा कोर्टाची तारीख म्हणून रविवारीच मंडळी आली.यशाने माईला हळूच कानात आज रविवार असल्याचं सांगितलं.माईंना सात्त्विक संताप अनावर झाला.त्यांनी सुखदेवच्या बापाला त्याचा जाब विचारला.तर तो धूर्त म्हातारा चपापला पण क्षणभरच. लगेच स्वतःला सावरून म्हणाला,

"माईसाहेब,सुखदेवच्या सांगन्यात गलती झाली.कोर्टात नाही तर वकिलाकडे जायचंय.त्यांनी बलिवलं मजूरपावतीचा कागुद घिऊन.काय है ना,ह्या तकलिफीनी पोराचं डोस्कं पन लै पिकून गेल्यागत झालंय.त्याला माफी करा.ह्या वक्ताला तुमची जिमीन कसायला घेतली नसती तर बरं झालं असतं... ही दुष्मनी फक्त त्या जिमिनीसाठी हय.काय करनार ? भोग हैती सगळे..."

आता माईंना ह्या लोकांची लबाडी लक्षात आली होती. मात्र ह्यातून बाहेर कसं पडावं,हे सुचेना.कोर्टात साक्षीला येते हे भावनेच्या भरात माई बोलून गेल्या होत्या. त्यामुळे बापूंना सांगण्याची आता त्यांनाही भीती वाटत होती.ह्या सगळ्या प्रकाराची बापूंना ते मुंबईत असल्याने काहीच कल्पना नव्हती.

पुढच्या वेळेला मंडळी आली.त्यांना जेवायला घालताना आपण फसवले जात आहोत,आपल्या चांगुलपणाचा ही मंडळी गैरफायदा घेत आहेत,ही माईंच्या मनातली भावना तीव्र झाली.योगायोगाने त्याच संध्याकाळी पुरुषोत्तम घरी आला.पुरुषोत्तम गावचा तलाठी होता. यशाचा मोठा भाऊ अशोक ह्याचा वर्गमित्र होता. पुरुषोत्तम बारा गावचं पाणी प्यायला होता.माईंना डोकं बांधून पडलेलं पाहून त्याने त्यांच्या तब्येतीची चौकशी केली आणि बोलण्याच्या ओघात त्याला माईंच्या डोकेदुखीचं कारण कळलं.आपल्या आईसारख्या असलेल्या आणि साध्या भोळ्या अशा माईंना झालेला त्रास ऐकून त्याचं माथं भडकलं.वरकरणी शांतपणा दाखवून त्याने माईंना विचारलं,

"पुन्हा कधी येणार आहेत ही मंडळी,काही कल्पना आहे का ?"

"मंगळवारी.बाजाराच्या दिवशी.आज मी ओट्यावर मैत्रिणीबरोबर ठिक्कर ठिक्कर खेळत होते ना,तेव्हा ते जायला निघाले होते.तेव्हा वाड्याबाहेर पडताना ते बोलत होते.तेव्हा मी ऐकलं." धाकटी मुक्ता पटकन् म्हणाली.

त्यावर पुरुषोत्तम म्हणाला "माई,मी मंगळवारी साडेदहा अकराला येतो.बघतो,तुमची जमीन कसण्यामुळे ह्या गरीब कुटुंबाला किती त्रास झालाय ते."

बोलल्याप्रमाणे मंगळवारी बरोबर साडेदहा वाजता पुरुषोत्तम घरी आला.ओसरीवर न बसता तो मुद्दाम आतमध्ये स्वैपाकघरात माईंशी गप्पा मारत बसला. अकराच्या सुमारास सुखदेव,त्याचा बाप आणि त्यांच्याबरोबर चौघेजण वाड्यात शिरले.ओसरीवर आलेल्या माईंना सुखदेवचा बाप म्हणाला,

"माईसाहेब,आज आम्ही सहाजनं जिवायला हाय बरं का,काय करनार ? तुमच्या जिमिनीमुळं जिवाला लै घोर झालाय..."

त्याचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच स्वैपाकघरातून पुरुषोत्तम बाहेर आला.त्याचा चेहरा संतापाने लाल झाला होता.त्याने दरडावून विचारलं,"काय रे भडव्या, खानावळीत वर्दी द्यायला आलास काय ? आणि हे बरोबर आणलेले लोक काय तुझ्या मयताला बरोबर आणलेस का काय ?"

पुरुषोत्तमचं एकंदर रूप अन् बोलणं ऐकून सुखदेवच्या बापाचे मिचमिचे डोळे विस्फारले गेले.कुणाला काय बोलावं ते समजेना.

पुरुषोत्तम पुन्हा ओरडला,"तुमचा बाप मुंबईला गेला तो काही कायमचा नाही गेला.तुम्ही ह्या देवीसारख्या बाईला फसवून कोर्टात साक्ष द्यायला मजबूर केलंत. आणि तू रे ए भुऱ्या,रात्री शनीच्या देवळात झोपायला जातो सांगून सरळ गावाला गेलास.त्या दोघांना गुरासारखं बेदम मारलंस.साळसुदासारखा सकाळी परत वाड्यावर येऊन झोऱ्या परत केलास नि गावाला निघालो असं सांगितलंस.रस्त्यात राधू अन् विश्वनाथ भेटल्यावर घरी जाऊन म्हाताऱ्याला घेऊन परत आलास.मी शनीमंदिराच्या पुजाऱ्याकडे चौकशी केली. त्या रात्री शनीमंदिरात तू गेलाच नव्हतास.खरं की नाही ?” आता सुखदेवचं धोतर ओलं व्हायचं शिल्लक राहिलं होतं.त्याचा बेरकी बापदेखील भीतीने लटलटा कापायला लागला.पुरुषोत्तमच्या आणि माईंच्या पायांवर लोळण घेत ते दोघे विनवण्या करत म्हणाले,

"एक डाव माफ करा.लै मोठी चूक झाली आमच्या हातून.परत वाड्यावर येनार नाही.बापूसाहेबांच्या कानांवर पन ही गोष्ट घालू नका." पुरुषोत्तम म्हणाला,"बापूसाहेब राहिले मुंबईला.निघा आता.नाही तर फौजदाराच्या कानावर मीच तुमचा पराक्रम घालतो,मग बघा,तो तुमची कशी सालटी काढतो ते."

मान खाली घालून सगळी मंडळी बाहेर पडली.माईंकडे वळून पुरुषोत्तम म्हणाला,"माई,आज तुमच्या खानावळीत एक पात्र माझं बरं का.खूप दिवसांत तुमच्या हातचं जेवण जेवलो नाही."

आज कितीतरी दिवसांनी माई मनमोकळं हसल्या.

●●● समाप्त ●●●