इतिहासातील घटनांचा क्रम महत्त्वाचाच आहे.परंतु त्याच्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे हा दृष्टिकोण घटनांच्या जुन्या क्रमातील खंडांकडे लाणि नव्या उपक्रमांकडेच जास्त लक्ष देतील.त्यामुळे बदल घडवून आणू शकणाऱ्या घटता घडत असतानाच,त्यांची पुरी ओळख पटून,त्यांच्यावर प्रभुत्व मिळविणे आपल्याला शक्य होईल.अगदी साथी सरळ कल्पना अशी,की शेतीचा उदय हा मानवाच्या सामाजिक घडणीतला पहिला,नवे वळण घेणारा असा क्षण होता,आणि नौद्योगिक क्रांती हाही फळी फोडण्याचाच प्रकार होता.यातली कोणतीही घटना ही एकदमच घडलेली दूरवर परिणाम करणारी घटना नव्हती,तर एका विवक्षित वेगाने येणारी बदलाची एकेक लाट होती,अशा तन्हेने त्यांचा विचार होईल.
बदलाच्या पहिल्या लाटेपूर्वी माणसे छोटे छोटे गट करून रहात होती.हे गट स्थानान्तर करीत रहाणारे होते. अन्नाच्या शोधात भटकत,मच्छिमारी करत,शिकारी करत आणि गुरे राखून पोट भरणारे होते.अशा स्थितीत कोणत्यातरी वेळी,सुमारे दहा हजार वर्षापूर्वी शेतीची क्रांतिकारी सुरूवात झाली.गावोगाव,
वस्त्यावस्त्यांत ती हळूहळू पसरत गेली.जमिनी नांगराखाली आल्या. मशागती झाल्या.जीवनाचा नवीनच मार्ग सुरू झाला.
सतराव्या शतकाच्या अखेरीपर्यंत ही पहिली लाट राहिलीच होती.त्यानंतर युरोपात औद्योगिक क्रांतीचा उद्रेक झाला आणि बदलाच्या या दुसऱ्या भल्या थोरल्या लाटेने पृथ्वीवर आक्रमण केले.औद्योगिकीकरणाची ही प्रक्रिया फार मोठ्या वेगाने निरनिराळ्या दिशांमधून, खंडाखंडांमधून पसरत गेली.अशा त-हेने पृथ्वीवर एकाचवेळी पण भिन्न वेगात दोन स्वतंत्र आणि वेगळ्या अशा बदलाच्या प्रक्रिया संचरत होत्या.
आज पहिली लाट पूर्णपणे निमाली आहे.फार थोडया आदिवासी जमाती,उदाः दक्षिण आफ्रिकेतील किंवा न्यू गियानात पापुआतील,केवळ शेतीच्या आधारे जगत आहेत.पण या पहिल्या लाटेचा भर संपूर्णतया ओसरलेला आहे.
युरोप आणि उत्तर अमेरिकेतील,तसेच पृथ्वीच्या इतर काही भागात फार थोड्या शतकांच्या कालावधीत या दुसऱ्या लाटेने जीवनक्रांती घडवून आंणली.अजून तिचा वेग तसाच आहे.पुष्कळ शेतीप्रधान देश पोलाद कारखाने,कापड गिरण्या,वाहन उत्पादक कारखाने, रेल्वे,अन्नावर प्रक्रिया करणारे कारखाने उभारण्याचा प्रयत्न करीत आहेत.औद्योगिकीकरणाचा वेग अजूनही जाणवेल इतका प्रचंड आहे.या दुसऱ्या लाटेचा भर अजूनही संपलेला नाही.पुष्कळ शिल्लक आहे.परंतु अजून ही प्रक्रिया चालू आहे तोवरच याहीपेक्षा खूप महत्त्वाची प्रक्रिया चालू झाली आहे.
औद्योगिकीकरणाच्या लाटेने दुसन्या महायद्धानंतरच्या काळात सर्वोच्च उंची गाठलेली असतानाच न कळतच तिसरी लाट पृथ्वीनर पसरायला सुरूवात झाली असून जिला तिचा स्पर्श होईल ती प्रत्येक वस्तू बदलत चालली आहे.त्यामुळे पुष्कळ देशातून एकाच वेळी दोन,तीन सुद्धा संपूर्ण वेगळेचा लाटा वेगवेगळ्या वेगात, वेगवेगळ्या ताकदीनिशी आपले अस्तित्य जाणवून देत राहिल्या आहेत.या पुस्तकांत आपण ख्रिस्तपूर्व ८००० वर्ष या काळात पृथ्वीवर सुरु झालेल्या आणि इ. स. १६५०-१७५० पर्यंत अनिर्बंध अधिसत्ता गाजविणाऱ्या पहिल्या लाटेच्या युगाचाही जाता जाता विचार करणार आहोत.या वेळेनंतर पहिल्या लाटेची चलती कमी झाली;आणि दुसऱ्या लाटेचे अपत्य असणाऱ्या औद्योगिक संस्कृतीने पृथ्वीवर ताबा मिळविण्याच्या दृष्टीने गती घेतली;लवकरच तिने कळसही गाठला.
१९५५ च्या सुमाराला सुरू झालेल्या दशकाने ऐतिहासिक महत्त्वाचा ठरणारा परिवर्तन क्षण आलेला पाहिला.या वेळी अमेरिकन संयुक्त संस्थानात पांढरपेशे व नोकरदार यांना प्रथमच श्रमिकांनी मागे टाकलेले.याच दशकात फार मोठ्या प्रमाणात गणकयंत्रे,व्यापारी जेट प्रवास,कुटुंब नियोजनाच्या गोळया आणि अशाच अनेक प्रभावशाली गोष्ठी वापरात आल्या आणि याच दशकात तिसऱ्या लाटेने आपली ताकद एकवटायला सुरूवात केली.त्यानंतर थोडे मागे पुढे असे करत ती इंग्लंड,
फ्रान्स,स्वीडन,जर्मनी,रशिया, जपान,यासह इतरही उद्योगप्रधान देशांमध्ये येऊन पोचला.आणि सध्या तंत्राधष्ठित असे हे सर्व देश तिसऱ्या लाटेच्या आणि दुसऱ्या लाटेच्या कालबाह्य अशा कठीण पण सुस्थित अर्थव्यवस्थेच्या संघर्षांत भरडून निघत आहेत.आणि आपल्या भोवताली जे राजकीय आणि सामाजिक संघर्ष उठत राहिलेले आपण बघतो आहोत,त्याचे खरे मूळ हेच आहे.
आगामी लाटा…
ज्यावेळी एखादी लाट एखाद्या समाजावर प्रभुत्व गाजवताना आढळते त्यावेळी त्या समाजाच्या भविष्यकालीन घडणीच्या धोरणाचा अंदाज करणे तसे सोपेच असते.लेखक,कलाकार,वृत्तपत्रकार आणि इतरांनाही भविष्यकालीन लाटेचा शोध लागतो.अशाच प्रकारे एकोणीसाव्या शतकातील युरोपीय विचारवंत, उद्योगातील अग्रणी,राजकारणी आणि सर्वसामान्य लोक यांना भविष्यकाळाचे मूलतःअचूक अशा चित्राचे आकलन झाले होते.त्यांना यंत्राधिष्ठित शेतीवर उद्योग निर्विवाद असा विजय मिळवणार असल्याची जाणीव झाली होती.आाणि दुसरी लाट भविष्य काळात स्वतःबरोबर आणत असलेले बदलही त्यांना आधीच विलक्षण अचूकतेने उमजले होते.अधिक प्रभावी तंत्रज्ञान,अधिक मोठी शहरे,अधिक गतीची वाहतूक सामुदायिक स्वरूपाचे शिक्षण या व अशाच इतर काही गोष्टींची त्यांना चाहूल लागली होती.
आणि अतिशय स्पष्टपणे झालेल्या भविष्याच्या या दर्शनाचे राजकारणावर प्रत्यक्षच परिणाम झाले.पक्ष आणि राजकीय चळवळी आगामी घटनांची व्यवस्थित चाहूल घेतच आपले कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करू लागले.
औद्योगिक क्रांतीच्या अगोदरच्या शेतीप्रधान, संस्कृतीच्या हितसंबंधींनी सर्वदूर जाळे पसरणाऱ्या 'उद्योगा' विरुद्ध,मोठ्या,उद्योगाविरूद्ध,'संघटनांच्या दादा' विरूद्ध आणि,'पापी शहराविरूद्ध पिछाडीकडून' हल्ला होईल अशी व्यवस्था केली.उदयोन्मुख उद्योगप्रधान समाजाच्या मुख्य कळांवर ताबा ठेवण्यासाठी मजूर व व्यवस्थापन झटत राहिले जातीय किंवा वशीय अल्पसंख्यांक औद्योगिक जगाच्या संदर्भात बदललेल्या भूमिकेनुसार आपल्या हक्कांच्या व्याख्या करीत नोकरीतील सवलती,सामुदायिक दर्जा,शहरी निवास, सुधारित वेतन,सामुदायिक लोकशिक्षण इत्यादींबाबत अधिक संधी मागू लागले.या भविष्यकालीन औद्योगिक चित्राचे महत्त्वाचे मानसिक परिणामही आहेतच लोकांचे मतभेद होऊन त्यातून तीव्र आणि काही वेळा तर रक्तपाती संघर्ष देखील निर्माण होत राहिले.
तेजी,मंदीमुळे लोकांची जीवने उध्वस्त होणेही अशक्य नव्हते.या औद्योगिक भविष्याच्या चित्रामुळे विरोधांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या.प्रत्येक व्यक्तीला आपण स्वतः कोण आहोत,कसे आहोत आणि पुढे आपले काय होण्याची शक्यता आहे याची देखील समज त्या चित्राने दिली.त्यामुळे समाजात प्रचंड बदल घडत असतानाच व्यक्तीला काही प्रमाणात स्थैर्य आणि अस्मिता मिळत गेली.उलट,ज्या वेळी एखादा समाज दोन किंवा अधिक अशा बदलाच्या भल्या मोठ्या लाटांच्या तडाख्यात सापडतो,आणि त्यातली कोणतीही एक त्यावेळी खास प्रभुत्वही मिळवू शकत नसते,अशा वेळी भविष्याचे चित्र भंग पावते.घडत रहाणारे बदल आणि भडकत रहाणारे संघर्ष यांचे अर्थ लावणेही अतिशय कठीण होत रहाते. ज्यावेळी दोन लाटांची टक्कर होते,तेव्हा सागरात वादळ उठते.प्रवाहांचे संघर्ष होतात,छोटे मोठे भोवरे निर्माण होऊन खळबळ माजते आणि खोलवर असलेल्या खऱ्या ऐतिहासिक महत्त्वाच्या लाटा त्यामुळे लपूनच रहातात.
इतर देशांप्रमाणेच अमेरिकेतही दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेची घडणारी टक्कर सामाजिक तणाव,भयानक संघर्ष आणि नवीन काही विचित्रच अशा राजकीय प्रणाली निर्माण करते की ती वर्ग,वंश,लिंग किवा पक्ष यामुळे निर्माण होणारे भेद मानीत नाही;नाहीसेच करते. ही टक्कर नेहमीच्या राजकीय शब्दसमूहात गोंधळ माजवते आणि प्रागतिक व प्रतिगामी,शत्रू व मित्र यांच्यातला भेद जाणणे अशक्य करून टाकते.सर्व जुने मतभेद,विसंगत्या आणि युत्या भंग करून टाकते; संघटना आणि नोकर यांच्यात काही मतभेद असले तरी परिस्थितीशी झुंज देण्यासाठी ते एकी करतात. कृष्णवर्णीय आणि ज्यू एकदा आपल्याला मिळणाऱ्या अन्याय्य वागणुकीविरुद्ध झगडण्यासाठी एकत्र आले आणि नंतर परस्पर विरोधीही झाले.
अनेक देशांमध्ये सर्वसाधारणपणे उत्पन्नाच्या फेरवाटणीसारख्या पुरोगामी धोरणांना पाठिंबा असे. परंतु ते आता अनेकदा स्त्रियांचे हक्क,कुटुंबविषयक नियम,देशाच्या बाहेरून येणाऱ्या स्थलांतरितांबाबतचे नियम,आयातीवरील कर,प्रादेशिकता इत्यादी बाबींचा प्रतिगामी दृष्टिकोणातून विचार करतात.परंपरागत 'डावे' सहसा कडवे देशभक्त व केंद्रसत्तावादी असतात.आपल्या भोवतीच्या सद्यःपरिस्थितीशी त्यांना कर्तव्य असे नसते.आपल्या भोवतीच्या सद्य:परिस्थितीशी त्यांना कर्तव्य असे नसते.त्याच वेळी आपणास जिमी कार्टर किवा जेरी ब्राऊन,व्हॅलेरी जी.ड्इस्टींग यांच्या सारखे राजकारणी लोक आढळतात.त्यांच्या आर्थिक प्रश्नाबाबतचा दृष्टिकोण अगदी 'सनातन' असतो.हेच लोक कला,लैंगिक नीतिमत्ता,स्रियांचे हक्क,निराळया समाजगटांचे ऐहिक किंवा सामाजिक,सांस्कृतिक रचनांच्या संदर्भातले एकमेकांशी असणारे संबंध,अशा गोष्टींबाबत उदार दृष्टिकोण धारण करतात.
त्यामुळेच गोंधळून जाऊन आपल्या जगांचा अर्थ लावू शकत नाहीत.अशातच निरनिराळी वृत्तमाध्यमे निरनिराळे शोध, वेगळया बाबतीतले विरोध,विचित्र घटना,खून, जबरदस्तीने किंवा फसवून कोणाला पळवूनच नेणे, अंतराळातील विक्रम,राजकीय उलथापालथी,गटांनी केलेले हल्ले,अफवा,अशा कित्येक असंबद्ध घटनांबद्दल आपल्याला सांगत असतात.
राजकीय जीवनात स्पष्टपणे दिसून येणाऱ्या विसंगतीचे प्रतिबिंब विस्कळित किंवा खंडित व्यक्तिमत्वातून आपल्याला आढळते.मनोवैज्ञानिक आणि निरनिराळे 'गुरू' या गोष्टीचा चांगलाच फायदा उठवतात.लोक सर्व प्रकारच्या उपचार-पद्धतींकडे धाव घेत,इकडून तिकडे जात रहातात.निरनिराळे पंथ धुंडाळत रहातात किवा गुप्तपणे निरनिराळया तपासण्या करून घेत रहातात. त्यांना सत्य हे हास्यास्पद,विवेकशून्य आणि निरर्थक असल्याचे कळून चुकलेले असते.परंतु यामुळे असे म्हणता येणार नाही,की सध्या घडणाऱ्या घटनांना काही पद्धत किंवा रीतच नाही.खरे पहाता,आपल्याला जर विरत चालल्या दुसऱ्या लाटेशी संबंधित असणाऱ्या बदलांहून वेगळे असे तिसऱ्या लाटेशी संबधित असलेले बदल ओळखता येऊ लागले तर ह्या सर्व घटनांमाग लपून असलेले परंतु स्पष्टपणे अस्तित्वात असलेले सूत्र असल्याचे आपल्या ध्यानात येईल.
या दोन लाटांच्या टकरीतून निर्माण झालेल्या संघर्षाचे आकलन आपल्याला या बदलत्या स्वरूपाचे अधिक स्पष्टचित्र तर दाखवतेच,शिवाय राजकीय आणि सामाजिक शक्ती आपल्यावर करीत असलेल्या 'कार्या’च्या देखील क्षकिरण सदृश सखोल व स्वच्छ प्रतिमा आपल्यापुढे सादर करते.शिवाय ते इतिहासात असणाऱ्या आपल्या स्वतःच्या वैयक्तिक भूमिकेबाबतच्या अंतरंगाचे यथार्थ ज्ञानही देते.कारण आपण प्रत्येकजण वरवर जरी कमी महत्त्वाचे भासलो, तरी प्रत्यक्षात इतिहासाचे जिते जागते अंश,घटक आहोत ! लाटांच्या बदलातून निर्माण झालेले अंतःप्रवाह आपल्याला आपल्या कामां-मधून आपल्या,कौटुंबिक जीवनातून,
आपल्या लैंगिक बाबींबद्दलच्या दृष्टिकोणांतून,आपल्या स्वतःच्या नीतिमत्तेतून प्रतिबिंबित होत असतात.आपल्या जीवन पध्दतीतून आणि राजकीय कृतींमध्ये श्रीमंत राष्ट्रातील आपल्यापैकी बहुतेकजण मरू घातलेल्या दुसऱ्या लाटेचे पाईक तरी असतात;आमूलाग्र भिन्न असणाऱ्या 'उद्याच्या' तिसऱ्या लाटेला वाहून घेणारे तरी असतात, किंवा स्वत्व नाहीसे करुन टाकणाऱ्या,या दोन्हींच्या मिश्रणाची निर्मिती तरी असतात !
सोनेरी किडे आणि छुपे मारेकरी..
दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेच्या गटांमधील संघर्ष,खरे पहाता मध्यवर्ती राजकीय तणाव आपल्या समाजाचे तुकडे करत आहेत.आजचे राजकीय पक्ष किवा त्यांचे उमेदवार आपल्याला काहीही पढवत असले,तरी आपल्या कोसळत्या औद्योगिक प्रणालीतील जे काही शिल्लक आहे,त्याचे जास्तीत जास्त फायदे उठविण्याच्या वादाहूनही थोड्या अधिकच,त्यांच्यातील अंतर्गत झुंजी चितनीय आहेत.हेच दुसऱ्या तऱ्हेने म्हणावयाचे झाले तर असे म्हणता येईल,की बुडत्या टिटॅनिकच्या प्रसिध्द डेक खुर्ध्या पटकावण्यासाठी ते हमरीतुमरीवर आलेले आहेत.
आपल्याला असे आढळून येईल,की औद्योगिक समाजाचे अखेरचे दिवस कोणाच्या सत्तेखाली जाणार आहेत या गोष्टीपेक्षा,रिकामी होणारी जागा घेऊ पहाणाऱ्या झपाट्याने उभारणाऱ्या नव्या संस्कृतीला कोण आकार देणार हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. आपली सारी शक्ती आणि लक्ष अल्पकालीन राजकीय चकमकींवरच खचून जात असतानाच,एक फार गंभीर स्वरुपाची लढाई या सर्व पृष्ठभागाखाली चालू आहे. तीत एका बाजूला औद्योगिक गतकालाचे पाठीराखे असून,दुसऱ्या बाजूला ज्यांना जगाचे तातडीने सोडवण्याजोगे प्रश्न,अन्न,ऊर्जा,
शस्त्रांचे नियंत्रण, लोकसंख्या,गरीबी,भौगोलिक नैसर्गिक संपत्ती,वर्गभेद, हवामान,वृध्दांचे प्रश्न,नागरी समाजाचे विदारण, उत्पादक व फलदायी कार्याची गरज औद्योगिक रचनेच्या चौकटीत सोडवता येणे आता शक्य नाही हे समजते,असे लोक आहेत.हा संघर्ष उद्याचा महान संघर्ष असणार आहे.प्रत्येक देशांच्या राजकीय जीवनातून दुसऱ्या लाटेच्या फुसक्या हितसंबंधीयात आणि तिसऱ्या लाटेच्या अनुयायात घडणाऱ्या या टक्करीच्या लहरी एखाद्या विद्युत् प्रवाहाप्रमाणे संचारत आहेत.
जगात जे देश औद्योगिक म्हणून गणले जात नाहीत त्या देशांतून या तिसऱ्या लाटेच्या आगमनानिशी पूर्वीच्या जुन्या झगड्यांचा बळेबळेच पुनर्जन्म घडलेला आहे.सहसा सरंजामशाहीशी संबंधित असलेला शेतीविषयक पुरातन लढा,'उद्योगा' च्या बळावर श्रेष्ठ ठरलेल्या 'उच्च' लोकांविरुध्द असणारे विचार-प्रवाह व ते धारण करणारे लोक-भांडवलदार किंवा समाजवादी,
औद्योगिकीकरणाच्या आगामी विलयाच्या संदर्भात एक वेगळाच आकार धारण करत आहे.आता तिस-या लाटेची संस्कृती अस्तित्वात येते आहे अशावेळी झपाट्याचे औद्योगिकीकरण नववसाहत - वादापासून किंवा गरीबीपासून सुटका करु शकणार आहे का ? किंवा त्याच्यावर कायम अवलंबून रहाता यावे अशी हमी देऊ शकणार आहे का ?
केवळ यांच विस्तृत पार्श्वभूमीवर आपणास मथळयांचा अर्थ लागू शकणार आहे.आपल्या जीवनात घडून येणाऱ्या बदलाच्या संयोजनाबाबतची उचित धोरणे आखणे आता शक्य होणार आहे.
हे मी लिहीत आहे अशावेळी वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर इराणमधील उद्रेक व ओलीस प्रकरणे,दक्षिण कोरियातील कत्तली,
सोन्याचे वेगवान सट्टे,काळे लोक व ज्यू यांच्यात अमेरिकेत उडत असलेल्या चकमकी, पश्चिम जर्मनीने संरक्षण खर्चात केलेली मोठी वाढ लाँग आयलंडमधील जळिते,मेक्सिकोच्या आखातातील तेलाचा प्रचंड भडका,इतिहासात सर्वात मोठी ठरणारा अण्वस्त्रविरोधी मेळावा,रेडिओलहरीच्या ताब्याविषयी श्रीमंत व गरीब राष्ट्रात चालू असलेला लढा,अशा गोष्टींचे वृत्तांत आलेले आहेत,लिबिया,सीरिया आणि अमेरिका या देशांमध्ये धार्मिक पुनरुज्जीवनाच्या लाटा धडाक्याने उठत आहेत.नवफॅसिस्ट कल्पना पॅरिसच्या राजकीय 'कत्तली' चे 'श्रेय' स्वतःकडे घेत आहेत.आणि विजेवर चालणाऱ्या स्वयंप्रेरकांना आवश्यक असणाऱ्या तंत्रात मारलेल्या मुसंडीचा अहवाल 'जनरल मोटर्स' ने दिलेला आहेच.अशा तऱ्हेच्या तऱ्हतऱ्हेने विसंगत असणाऱ्या बातम्यांचे तुकडे एकात्मतेसाठी आणि संयोगासाठी टाहो फोडत आहेत.औद्योगिकीकरणाच्या रक्षणास सिध्द असलेले आणि त्याच्या जागी दुसन्या कशाची तरी स्थापना करण्यास उत्सुक असलेले यांच्यामध्ये भडकलेल्या तीव्र लढ्याची आपल्याला कल्पना आली म्हणजे जग जाणण्याची नवी गुरुकिल्लीच आपल्याला प्राप्त झाली,असे म्हणावे लागेल.याहून महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखाद्या राष्ट्राची धोरणे आखत असू,किंवा मोठ्या संस्थांची धोरणे ठरवत असू,किंवा आपल्या स्वतःच्या जीवनाची ध्येये पक्की करत असू;आपल्याला जुने जग बदलून टाकणारे नवे साधन मिळाले आहे.या हत्याराचा वापर करण्यासाठी,आपल्याला जुन्या औद्योगिक संस्कृतीकडे झुकणारे बदल,आणि नव्या संस्कृतीच्या आगमनाचा गौरव ठरणारे बदल यांच्यात असणारा फरक ओळखता यायला हवा.
थोडक्यात,आपल्याला दोन्ही जुनी व नवी-जिच्यात आपण जन्म घेतला ती औद्योगिक रचना असणारी दुसरी व आपण व आपली मुले जिच्यात वास करणार आहोत ती तिसरी संस्कृतीही समजायला हवी.
या पुढील प्रकरणात तिसरीच्या उद्भवाची पूर्वतयारी म्हणून आपण बदलाच्या पहिल्या दोन लाटांचे सूक्ष्म अवलोकन करणार आहोत.आपल्याला असे आढळून येईल की,दुसरी लाट संस्कृती ही अनेक घटकांची आपाततःघडून आलेली मिसळ नसून एकमेकांबर,एका अर्थी सूचक,परिणाम करणाऱ्या विभागांची ती एक निश्चित प्रणाली होती आणि औद्योगिक जीवनाचे मूलभूत नमुने देशादेशांतूत तेच एकसारखेच होते;मग या देशांचे सांस्कृतिक वारसे कोणते का असेनात,आणि त्यातील राजकीय मतभेद कसे का असेनात.आणि आजचे 'डावे' व 'उजवे' दोन्ही प्रकारचे 'प्रतिगामी' ह्याच संस्कृतीच्या रक्षणासाठी झगडून राहिले आहेत.आणि याच वेळी सांस्कृतिक बदलाच्या इतिहासातील तिसऱ्या लाटेने हेच जग बदलून टाकण्याचा इशारा दिलेला आहे.
पहिले प्रकरण संपले…!!