झाडांचा वापर करणारे बहुतांश प्राणी त्यांना इजा करत नाहीत.झाडाचा डेरा किंवा खोडातून येणारा उजेड आणि आर्द्रता जागेनुसार बदलते.यामध्ये पर्यावरणीय कोनाडा शोधून तिथे ते आपलं घर बनवतात.संशोधकांकडून झाडाच्या वरच्या भागाचा फार अभ्यास झाला नाही,कारण त्यासाठी त्यांना क्रेनचा वापर करावा लागेल किंवा बांधकामात वापरतात तसे पहाड बांधावे लागतील.हे खर्चीक असते.
त्यामुळे खर्च कमी ठेवण्यासाठी शास्त्रज्ञ काही क्रूर पद्धतीचा वापर करतात.
द हिडन लाईफ ऑफ ट्रीज
पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर
अरविंद घनश्याम पाटकर
मनोविकास प्रकाशन
२००९ साली बाव्हेरियन राष्ट्रीय अभयारण्यात मार्टिन गॉसनर नावाच्या संशोधकाने सहाशे वर्ष जुन्या आणि १७० फूट उंच झाडावर कीटकनाशक फवारणी केली.पायरेथ्रम या रासायनिक कीटकनाशकामुळे लाखो कोळी आणि कीटक जमिनीवर मरून पडले.या जीवघेण्या औषधामुळे शास्त्रज्ञांना झाडावर असलेली जैवविविधता कळली.यामध्ये २५७ प्रजातींचे कीटक होते आणि २०४१ इतकी त्यांची संख्या होती. झाडाच्या डेऱ्यात वैशिष्ट्यपूर्ण पाणथळ जागाही सापडतात.जेव्हा एखादे खोड दुभंगते तेव्हा त्यात पावसाचे पाणी साठते.त्या इवल्याशा तळ्यामध्ये छोट्या माशांना आसरा मिळतो आणि एका दुर्मिळ प्रकारच्या बीटल कीटकाला खाद्य.
झाडाच्या खोडात तयार झालेल्या पोकळीमध्ये राहाणे तसे सोपे नाही.तिथे अंधार असतो आणि बुरसटलेल्या पाण्यात प्राणवायूचा अभाव असतो. अशा ठिकाणी जन्म घेतलेल्या अळ्यांना श्वास घेता येत नाही.पण जर त्यांच्या नाकाला पाणबुड्यासारखी लांब नळी असली तर मात्र ते इथे तग धरू शकतील.भुग्याच्या पिलांना अशीच नळी असते ज्याच्यामुळे ते इथे जिवंत राहू शकतात.त्यांच्याव्यतिरिक्त इथे फक्त सूक्ष्म जिवाणू असतात,त्यामुळे बहुधा हेच त्या भुंग्यांच्या पिलांचे खाद्य असेल.
सुतार पक्षी प्रत्येक झाडांमध्ये आपले घरटे बनवत नाही.
त्यामुळे प्रत्येक झाडाच्या नशिबी कुजून जाणे नसते.आणि यामुळेच काही विशिष्ट प्रजातींना दुर्मिळ आसरे मिळू शकतात.अनेक झाडं लवकर मरतात.वादळात एखाद्याचे खोड मोडून जाऊ शकते किंवा खोडावर आक्रमण करणारे बीटल एखाद्या झाडाचे साल काही आठवड्यातच नष्ट करू शकतात,ज्यामुळे थंडीत ते झाड मरून जाते किंवा झाडाभोवतीची परिस्थिती अचानक बदलू शकते.झाड मेले की त्याच्या गोड द्रव्यावर जगणारे प्राणी आणि बुरशीला मात्र या मृत वृक्षाला सोडून जावे लागते.एक छोटे विश्व संपून जाते,संपते की नवीन सुरुवात होते ?
'आणि जेव्हा मी जातो तेव्हा माझा फक्त एक भाग जातो.' जर्मन गायक पीटर मॅफेचे हे गाणे जणू एका झाडासाठीच लिहिलेले आहे.
कारण वठलेल्या झाडाचे खोड हे जंगलाच्या जीवनचक्रामध्ये जिवंत झाडाइतकेच महत्त्वाचे असते.अनेक शतकं या झाडाने जमिनीतली पोषणद्रव्ये शोषून आपल्या लाकडात आणि सालात साठवलेली असतात.आणि आता त्या मृत वृक्षांच्या पिलांचे हेच खाद्य होणार असते.पण आपल्या पालकांमध्ये दडलेले हे खाद्य त्यांना थेट सहजपणे मिळणार नसते.हे मिळवायला त्यांना इतर सजीवांची मदत घ्यावी लागते.ज्या क्षणी ते मृत झाड जमिनीवर पडते त्याक्षणी बुरशी आणि हजारो प्रकारचे कीटक त्या खाद्याकडे पोचण्याच्या शर्यतीत जुंपतात.प्रत्येक सजीव त्या वठलेल्या झाडाच्या विशिष्ट भागाकडे आकर्षित होतो आणि कुजण्याच्या प्रक्रियेत वेगळी भूमिका साकारतो. आणि त्यामुळेच या प्रजातींचा जिवंत झाडाला धोका नसतो.त्यांच्यासाठी ते फारच ताजे लाकूड असते.त्यांना आवडतं ते मऊ तंतुयुक्त दमट असं लाकूड.हे कीटक त्यांच्या खाद्यासाठी आणि जीवनचक्रासाठी भरपूर वेळ घेतात.स्टॅग बीटल आपल्याला याचे प्रात्यक्षिकच देतो प्रौढ बीटल काही आठवडेच जिवंत राहतो,पण त्यात त्याला प्रजनन करण्याची संधी मिळते.या कीटकाचे बहुतांश आयुष्य अळी अवस्थेत असते.आणि या अवस्थेत तो मेलेल्या झाडांची मुळं संथपणे खात असतो. लड्डू होऊन आपला कोश बनवण्यासाठी त्याला सुमारे आठ वर्ष लागू शकतात.
ब्रकेट फंगस अशीच संथपणे वाढत असते.ही बुरशी मेलेल्या खोडावर एखाद्या मोडक्या थाळीप्रमाणे चिकटून असते आणि फडताळासारखी दिसते. त्यावरूनच ब्रकेट हे नाव पडले आहे.लाल पट्ट्याचा कॉन्क हे अजून एक उदाहरण.ही बुरशी लाकडामधील पांढऱ्या सेल्युलोजच्या तंतूवर ताव मारते आणि याचा पुरावा म्हणजे तिच्याभोवती तपकिरी चुरा पडलेला सापडतो.मोडक्या थाळीसारखा दिसणारा या बुरशीचा फळणारा अवयव खोडाला काटकोनात चिकटलेला असतो. फक्त या स्थितीमध्येच बुरशीचे बीजाणू तिच्या खालच्या भागात असलेल्या छोट्या नलिकेतून बाहेर पडू शकतात.तिने जखडून ठेवलेलं कुजकं झाड जर मरून खाली पडलं तर ही बुरशी आपल्या बीजाणू सोडणाऱ्या नलिका बंद करून ठेवते आणि पुन्हा काटकोनात वाढायला सुरुवात करते.
- काही बुरशी खाद्य मिळवण्यासाठी कडव्या स्पर्धेत उतरतात.खाली पडलेल्या लाकडाच्या तुकड्याचा काटछेद घेतला तर हे चित्र स्पष्ट दिसते.फिक्या आणि गडद रंगाची बुरशी काळ्या रेषांनी विभाजलेली दिसते.प्रत्येक रंगाची बुरशी एक वेगळी प्रजाती असते.आपल्या हद्दीत दुसरी प्रजाती येऊ नये म्हणून ते गडद रंगाच्या रासायनिक (पॉलिमरच्या) भिंती बांधतात.
प्राणी आणि वनस्पतींच्या एक पंचमांश,म्हणजे आपल्याला माहीत असलेल्या पैकी सहा हजार प्रजाती मेलेल्या लाकडावर जगतात. ५० आधी म्हटल्या प्रमाणे हे लाकूड पोषणद्रव्यांच्या चक्रीयतेत उपयुक्त असते.पण याचा जंगलात काही धोका असू शकतो का? कारण जर एखाद्या क्षेत्रात पुरेसं लाकूड पडलेलं नसेल तर हे सजीव जिवंत झाडांना आपलं खाद्य बनवतील.जंगलात येणाऱ्या अनेक पर्यटकांकडून ही शंका आम्हाला विचारली जाते. आणि अनेक खाजगी जंगलांचे मालक मोठे मोठे पडलेले खोडही उचलत नाहीत.तसे करणे गरजेचे नसते आणि त्याचा तसा फायदाही नाही.मेलेली खोड उचलून टाकल्यामुळे फक्त कीटकांचे अधिवास नष्ट होतात,कारण जगण्यासाठी जिवंत लाकूड त्यांना उपयोगी नसते.जिवंत लाकूड पाहिजे तेवढे मृदू नसते,अधिक दमट असते आणि त्यात खूप साखर असते.
आणि मुख्य म्हणजे या कीटकाच्या वसाहती होऊ नये यासाठी बीच,ओक आणि स्प्रूस स्वतःचे संरक्षण करतच असतात.
सशक्त झाडांना योग्य पोषण मिळाले तर जवळजवळ प्रत्येक आक्रमणापासून ते सुरक्षित राहू शकतात.आणि विघटन करणारे हे सैन्य जोपर्यंत जंगलात राहू आणि वाढू शकते तोपर्यंत जिवंत झाडांना पोषण मिळत राहते.
पडलेली फांदी एखाद्या नवीन रोपासाठी पाळणा बनते.
मेलेल्या झाडांचा जिवंत झाडांना थेट उपयोग होतो. विशेषतः स्प्रूसची रोपटी आपल्या मृत पालकांवर उगवताना दिसतात.याला इंग्रजीमध्ये नर्स-लॉग प्रजनन म्हणतात आणि जर्मन मध्ये हे शव-प्रजनन. मेलेल्या फांदीच्या कुजक्या लाकडात पाणी चांगल्या प्रकारे साठवलेले असते आणि त्यात लाकडातील काही पोषणद्रव्ये जी कीटक आणि बुरशीमुळे बाहेर निघालेली असतात,तीसुद्धा या कुजलेल्या लाकडात शाबूत असतात.पण तरीही असे कुजलेले लाकूड काही जमिनीतल्या मातीची जागा घेऊ शकत नाही,कारण इथली पोषणद्रव्ये हळूहळू नाहीशी होत राहतात.त्यामुळे एके दिवशी ते कुजलेले लाकूड जंगलाच्या मातीत जैविकमाल होऊन मिसळणार असते.मग त्या वर उगवलेल्या रोपट्यांचे काय होणार? असे झाल्यास त्यांच्या मुळांचा आधार जाऊन ती उघडी पडतील.पण हे होण्यासाठी काही दशकं जातात.
नंतर ही मुळं कुजणाऱ्या लाकडाबरोबरच मातीत शिरतात.
अशा पद्धतीने वाढलेल्या स्प्रूसचे रोपटे मोठे झाल्यावर खांबावर उभे केल्यासारखे दिसते.ज्या ओडक्यावर त्यांची वाढ होते तिच्या उंची इतके त्यांचे खांब उंच होतात…
समाप्त…!!