* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावे सोडण्यात आला.आर्यभट्ट Aryabhatt (इ. स. ४७६)

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड
भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावे सोडण्यात आला.आर्यभट्ट Aryabhatt (इ. स. ४७६) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावे सोडण्यात आला.आर्यभट्ट Aryabhatt (इ. स. ४७६) लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

११/१२/२२

भारताचा पहिला उपग्रह यांच्या नावे सोडण्यात आला.आर्यभट्ट Aryabhatt (इ. स. ४७६)

बिहारमधील पाटणा येथील या खगोलशास्त्रज्ञाने 'आर्यभट्टीय' अर्थात 'आर्य सिद्धांत' हा पहिला ग्रंथ लिहिला.श्लोक स्वरूपामध्ये आणि भाषेमध्ये असल्यामुळे या ग्रंथाचे यशापयश हे अर्थ काढणाऱ्यांच्यावरच अवलंबून राहिले. पृथ्वी स्वतःभोवती फिरते असे मानणाऱ्या या प्रतिभावंत शास्त्रज्ञाला तत्कालिन तथाकथित भारतीय पंडितांनी वेडा ठरवले आणि बिहारमधून हाकलून दिले नंतर केरळमध्ये गेल्यावर त्यांनी आपल्या संशोधनास तेथे वाट मोकळी करून दिली.भारताने १९७५ साली अंतराळात सोडलेला पहिला उपग्रह 'आर्यभट्ट' या नावानेच ओळखला जातो. ही भारतीयांनी आर्यभट्ट या महान शास्त्रज्ञाला दिलेली मानवंदनाच होय.


वराहमिहिर (इ. स. ४९० )


वराहमिहिर यांनी 'पंचसिद्धांतिका' हा खगोलावर आधारीत ग्रंथ लिहिला.सृष्टीचमत्कार,पदार्थाचे गुणधर्म आणि त्यांचा व्यवहारातील उपयोग यावर स्वतंत्रपणे विचार करणारा हा पहिला भारतीय शास्त्रज्ञ.वराहीसंहिता आणि बृहज्जातक हे त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध आहेत.


ब्रम्हगुप्त (इ. स. ५९८)


ब्राह्मस्फुटसिद्धांत लिहिणाऱ्या ब्रह्मगुप्ताचा जन्म गुजरातमध्ये झाला.भास्कराचार्यांनी 'गणकचक्रचूडामणी' म्हणून यांचा मोठा गौरव केलेला आहे. 


भास्कराचार्य (इ. स. १११४)


'लीलावती' आणि 'सिद्धांतशिरोमणी' ग्रंथ लिहिणाऱ्या या भारतीय खगोलवैज्ञानिकाने गणितामधील शून्याची उपलब्धी सर्व जगाला दिली असे मानतात.या ग्रंथातील उदाहरणे काव्यमय आणि संस्कृत भाषेमध्ये आहेत.


डॉ. सुब्रह्मण्यम् चंद्रशेखर 

(१९ ऑक्टो. १९१० २१ ऑगस्ट १९९५)


भारताचे पहिले नोबेल पारितोषिक प्राप्त शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रामण यांचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. एस. चंद्रशेखर पुतणे होते.जन्माने भारतीय परंतु अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारलेल्या चंद्रशेखर यांनी १९८३ सालचे भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्राप्त केले होते.ताऱ्यांचे स्वरूप आणि त्यांची निर्मिती या त्यांच्या संशोधनाला हा पुरस्कार मिळालेला होता.


खगोलशास्त्रातील त्यांचे योगदान 'चंद्रशेखर मर्यादा' या नावाने प्रचलित आहे.श्वेतबटू ताऱ्यांचे वस्तुमान सूर्याच्या वस्तुमानाच्या १.४४ पट झाले की तारे आकुंचन पावण्यास सुरुवात होते आणि शेवटी त्या ताऱ्याचे न्यूट्रॉन ताऱ्यामध्ये अथवा कृष्णविवरामध्ये रुपांतर होते.यालाच चंद्रशेखर मर्यादा म्हणतात.हे संशोधन त्यांनी १९३० साली प्रसिद्ध केले होते..


डॉ. चंद्रशेखर यांच्या स्मरणार्थ 'चंद्रा एक्स रे' ही प्रयोगशाळा कोलंबिया अवकाशयानाच्या सहाय्याने दि.२३ जुलै १९९९ रोजी अंतराळात निरीक्षणासाठी सोडण्यात आलेली होती.पृथ्वीवर सापडलेल्या एका अशनीचे 'अशनी १९५८ चंद्रा' असेही नामकरण करण्यात आले आहे.खगोलशास्त्रज्ञाला पाश्चिमात्य किती मान देतात याचा तरुणांनी विचार करण्याची आवश्यकता आहे.भाषा, प्रांत, जात, धर्म, देश यांच्यापलीकडे वैज्ञानिक पोहोचलेले असतात.


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ

डॉ. जयंत नारळीकर (१९ जुलै १९३८) 


आंतरराष्ट्रीय ख्यातीचे भारतीय खगोलशास्त्रज्ञ. बनारस हिंदू विश्वविद्यापीठातून त्यांनी १९५७ मध्ये बी.एस्सी.

पदवी प्राप्त करून नंतर इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून पीएच. डी. पदवी संपादन केली.

विश्वविख्यात खगोलशास्त्रज्ञ फ्रेड हॉएल यांनी स्थापन केलेल्या Institute of Theoretical Astronomy मध्ये त्यांनी १९९२ पर्यंत संस्थापक सदस्य म्हणून जबाबदारी सांभाळली. 


१९८८ मध्ये पुणे येथे स्थापन झालेल्या IUCAA (Inter University Center for Astronomy and Astrophysics) संस्थेचे संस्थापक संचालक म्हणून डॉ. नारळीकर कार्यरत राहिले.सैद्धांतिक भौतिकशास्त्र, खगोलभौतिकशास्त्र तसेच विश्वरचनाशास्त्र हे डॉ.नारळीकरांचे संशोधनाचे विषय आहेत. मूलभूत संशोधनासमवेत विज्ञान लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या कार्यातही त्यांचा मोठा वाटा आहे.आकाशाशी जडले नाते,खगोलशास्त्राचे विश्व,व्हायरस इ. त्यांची पुस्तके वाचकांच्या पसंतीस उतरलेली आहेत.


स्थिर विश्वनिर्मितीच्या सिद्धांताचे १९९३ मध्ये फ्रेड हॉएल,जेफरी बर्बिज आणि डॉ. नारळीकर यांनी पुनरूज्जीवन केले आणि 'स्थिरवत स्थितीचे विश्व' (Quasi Steady State Cosmology) या नावे नवीन सिद्धांत रूढ केला.


९ डिसेंबर २०२२ मधील लेखातील पुढील भाग..