* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जाणून घेऊ शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी व अलौकिक जीवन प्रवास..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड
Showing posts with label जाणून घेऊ शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी व अलौकिक जीवन प्रवास... Show all posts
Showing posts with label जाणून घेऊ शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी व अलौकिक जीवन प्रवास... Show all posts

12/1/22

जाणून घेऊ शास्त्रज्ञांचा प्रेरणादायी व अलौकिक जीवन प्रवास..

ॲरिस्टॉटल Aristotle (इ. स. पूर्व ३८४-३२२) ॲरिस्टॉटल इसवीसनापूर्वी होऊन गेलेला एक फार मोठा ग्रीक तत्त्ववेत्ता होता.जगज्जेत्ता राजा ओळखल्या गेलेल्या 'अलेक्झांडर द ग्रेट' चा ॲरिस्टॉटल गुरू,सृष्टीचे निरीक्षण करणे आणि तर्कशास्त्र,तत्त्वज्ञान,नीतिशास्त्र,राजकारण अशा विविध विषयावर आपले विचार मांडण्याचे महत्त्वाचे काम ॲरिस्टॉटल करत होता.आपल्या शौर्याच्या जोरावर जग जिंकायला निघालेल्या या अलेक्झांडर राजाने बहुतांश ठिकाणी प्रभुत्व मिळविलेले होते.अशा या जगज्जेत्त्या राजाचा गुरूसुद्धा महानच असला पाहिजे हा विचार सर्वसामान्यांच्यात दृढ झालेला होता. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य शतकभरसुद्धा टिकले नाही.पण ॲरिस्टॉटलच्या विचाराने मात्र सोळाव्या शतकापर्यंत आपले वर्चस्व अबाधित राखले.विचारांमध्ये किती सामर्थ्य आणि ताकद असते हे इतिहासाने वेळोवेळी दाखवून दिलेले आहे.अर्थात तो विचार योग्य असो अथवा अयोग्य…!


क्लॉडियस टॉलेमी Claudius Ptolemy

 (इ. स.१२७ ते १६८)


इसवीसनानंतर ज्या खगोलशास्त्रज्ञाने आपल्या सिद्धांताचा ठसा सोळाव्या शतकापर्यंत उमटवला त्याचे नाव क्लॉडियस टॉलेमी,टॉलेमीने 'अल्मागेस्ट' नावाच्या पुस्तकामध्ये पृथ्वीकेंद्रित सिद्धांत मांडलेला होता.पृथ्वी स्थिर आहे आणि पृथ्वीभोवती सूर्यासहित सर्व विश्व फिरत आहे हाच त्या सिद्धांताचा गाभा..


दुसऱ्या शतकात मांडलेल्या या सिद्धांताने सोळाव्या शतकापर्यंत न अडखळता मजल मारलेली होती.धर्माचे अधिष्ठान पृथ्वीकेंद्रित सिद्धांताला मिळाल्यामुळे विरोध करण्याचे अथवा तपासण्याचे सामर्थ्य सर्वसामान्यांच्यात नव्हते.भूगोलविषयक आठ पुस्तके टॉलेमीने लिहिली आहेत.तसेच माहीत असलेल्या स्थळांचे बिनचूक नकाशेही त्याने तयार केले होते.


आज आपण आनंदी,सुखी,आयुष्य जगत आहोत.हे सुखी आयुष्य जगत असताना अनेक ज्ञात अज्ञात महान लोकांनी आश्चर्यकारक,प्रेरणादायी,सर्वोच्च असे जीवन जगून आपल्याला सुखाच्या सावली प्रदान केली.त्या सर्वांचा जीवन प्रवास जाणून घेत असताना.

आपण जर दुःखात असलो,तर त्या दुःखाचे रूपांतर सुखात होते व आपण जर सुखात असलो तर सुखाचे रूपांतर दुःखात होते.हे सर्व जाणून घेत असतानाच मनापासूनच अचंबित,अलौकिक व अविस्मरणीय भावना व्यक्त व प्रकट होतात.


निकोलस कोपर्निकस,सॅमोसचा ॲरिस्टार्कस,

ॲरिस्टॉटल,क्लॉडियस टॉलेमी,टायको ब्राहे,जोहानर केप्लर,गॅलिलेई गॅलेलियो,फिलीपो ब्रूनो,आयझॅक न्यूटन,अल्बर्ट आईन्स्टाईन,आर्यभट्ट,वराहमिहीर,ब्रह्मगुप्त,

भास्कराचार्य,डॉ.सुब्रह्मण्यम चंद्रशेखर,डॉ.जयंत नारळीकर यांच्या बद्दल जाणून घेणार आहोत.

(सफर विश्वाची - डॉ.नितीन शिंदे,नाग-नालंदा प्रकाशन)


१४.१०.२०२२ रोजी ॲरिस्टार्कस,२१.११.२०२२ रोजी निकोलस कोपर्निकस,यांचा जीवन प्रवास समजून घेतलेला आहेच.उर्वरित या लेखामधून पुढे जाणून घेवू.


क्रमशः