* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कारण ..हे आयुष्य पुन्हा नाही..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड
Showing posts with label कारण ..हे आयुष्य पुन्हा नाही... Show all posts
Showing posts with label कारण ..हे आयुष्य पुन्हा नाही... Show all posts

1/24/23

कारण ..हे आयुष्य पुन्हा नाही..

आपल्या आयुष्यातील सर्व उंट एकाचवेळी झोपनार नाहीत.'


एक गोष्ट शिकण्यासारखी :

आपण सर्व ५ मिनिटांसाठी आप आपल्या आयुष्यातील आप आपले उंट सांभाळणाऱ्या एका राखवालदारा प्रमाणेच आहोत असे समजूया.. एका माणसाकडे १०० उंट होते आणि त्यांना सांभाळण्यासाठी एक रखवालदार होता. काही कारणामुळे त्याचा हा रखवालदार नोकरी सोडून गेला. त्याच्या जागी त्याने एका दुसर्‍या माणसाची नेमणुक केली.दुसर्‍या माणसाला त्याने एक अट घातली, की रात्री त्याने पहार्‍यावर असताना सगळे उंट झोपल्याशिवाय झोपायचं नाही.एक जरी उंट जागा असेल तरी झोपायचं नाही. 


नोकरीची गरज असल्याने त्याने ही अट मान्य केली.दोन दिवस, तीन दिवस त्याला झोप मिळाली नाही.तो प्रामाणिकपणे आपले काम करत राहिला. मात्र १५/२० दिवस तो झोपू शकला नाही,कारण सर्व उंट एकदम कधीच झोपत नसत.एके दिवशी मात्र त्याचे नशीब फळफळले. १०० पैकी ९९ उंट झोपले. हा शेवटचा उंट झोपण्याची वाट पाहू लागला. मात्र तो काही झोपेना.म्हणून बर्‍याच वेळाने त्याने त्या उंटाला झोपवण्याचा प्रयत्न केला. त्याने त्याच्या गळ्याला मिठी मारुन त्याला झोपवायचा प्रयत्न केला. मात्र झालं भलतंच.. त्याच्या या प्रयत्नात त्याच्या गळ्यातली घंटी वाजून बाकीचे उंट जागे झाले आणि याला जागावे लागले.


वैतागून तो पहिल्या रखवालदाराचा सल्ला घ्यायला गेला आणि विचारले, "एवढी वर्षं तू कसा काय न झोपता राहिलास? कारण सगळे उंट काही एकदम झोपत नाहीत."

त्यावर तो म्हणाला "मी कधीच सगळे उंट झोपायची वाट पाहिली नाही.माझ्या वेळेत मी झोपत होतो.कारण सर्व उंट एकावेळी झोपणे हे अशक्य आहे.आपण त्याकडे दुर्लक्ष करायचे…"

Moral of the story…

मित्रांनो,आपण आपल्या आयुष्यात बर्‍याचदा असे ठरवतो,कि आता हा एक टप्पा पूर्ण केला कि मग संपलं सगळं,मग मला काही करायची गरज नाही किंवा हे काम पूर्ण झाले,की मी निवांत;मला कुठलीही काळजी नाही;मग मी आनंदात जगेन.हा प्रोजेक्ट किंवा हे उरकलं,कि मी जीवनाचा आनंद घ्यायला मोकळा..

त्यासाठी आपण आपले आत्ताचे सुख सोडून देतो,एखादी सुखावणारी गोष्ट करणे लांबणीवर टाकतो.पुन्हा काही काळजी नाही आता निवांत झालो,असं म्हणून श्वास सोडतो;पण त्याचवेळी दुसरे काहीतरी समोर उभे राहते अन् पुन्हा आपले रहाटगाडगे सुरु राहते पुढच्या आशेवर. पण हे संपत नाही आणि मनासारखे जगणे होत नाही.आपल्या कामांच्या आणि अपेक्षांचे,चिंतांचे उंट कधीही एकावेळी झोपणार नाहीत,एखादा जागा राहणार आहेच,त्याला झोपवायच्या नादात बाकीचे जागे करु नका,त्याकडे "थोडसं" दुर्लक्ष करा,आणि आयुष्य उपभोगा!!! आपल्या चिंता आणि आपली कामे सर्व कधीच न संपणारी आहेत तेंव्हा चिंतामुक्त व्हा आणि मोकळेपणे जगा. मन मारुन जगने थांबाले पाहिजे...जीवनाचा आनंद घेऊया.


नंतर करु असं म्हणत टाळत असलेल्या गोष्टी करायला पुढे पुरेसा वेळ आणि तो उत्साह शिल्लक राहील का,हे तरी आपल्याला माहीत आहे का? याचाही विचार होणं गरजेचं आहे.

बघा विचार करा..


एका सेमिनारमधील गोष्ट..