* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

५/३/२३

आपल्या पूर्वजांचा परिचय करून देणारा चार्लस डार्विन..

पास्कल एकदा म्हणाला की,क्लिओपात्रा हिच्या नाकाच्या आकारामुळे साऱ्या जगाचे स्वरूप बदलून गेले.त्यानंतर जवळजवळ दोन हजार वर्षांनी इतिहासाचे सारे स्वरूप एका केसावर आधारलेले होते.दुसऱ्या एकाच्या नाकावर नाकाच्या आकारावर इतिहास लोंबकळत होता. तो १८३१मधील मंदीचा काळ होता.बावीस वर्षांचा धर्माभ्यासक चार्लस डार्विन बादशहाच्या गलबतातून अवैज्ञानिक निसर्गाभ्यासक म्हणून जाणार होता.पण गलबताचा कप्तान फिट्झरॉय त्याला घेईना.त्याचे नाक पाहून शास्त्रज्ञ होण्याची पात्रता अगर त्यासाठी आवश्यक तो उत्साह त्याच्या (डार्विनच्या) ठिकाणी असेल,असे कप्तानला वाटेना.


डार्विन या 'बीगल' नामक जहाजातून न जाता,तर तो धर्मोपदेशक झाला असता.मानवाच्या उत्क्रांतीवरील त्याच्या युगप्रवर्तक संशोधनाला जग मुकले असते व या शोधामुळे इतिहास समृद्ध झाला,तसा झाला नसता.


 डार्विन वस्तुतः धर्मोपाध्यायच व्हावयाचा;पण थोडक्यात चुकले.एकोणिसाव्या शतकाच्या आरंभी मस्तिष्कशास्त्राचा फार बोलबाला होता. एका मस्तिष्कशास्त्रज्ञाने डार्विनचे डोके तपासून सागितले की,तो धर्माचा मोठा आधारस्तंभ होईल.कारण त्याला त्याच्या डोक्यातला धर्मशास्त्रदर्शक भाग चांगलाच वर आलेला दिसला.दहा सामान्य धर्मोपाध्यायांच्या डोक्यांतल्या भागाइतका भाग त्याच्या एकट्याच्या डोक्यात त्या मस्तिष्कशास्त्रज्ञाला आढळला.डार्विनचे नाक,तसेच त्याचे डोके त्याला सरळ इंग्लंडमधील चर्चच्या सिंहासनावर नेऊन बसवणार असे दिसत असता,


मानव जातीच्या सुदैवाने कप्तानाचे डार्विनच्या नाकाबद्दलचे मत बदलले व डार्विनला 'बीगल' गलबतावर जागा मिळाली. 


त्याने बायबल मिटले.त्यातील सृष्टिनिर्मितीच्या कल्पित कथा सोडून दिल्या व साता समुद्रांत फिरून पशुपक्ष्यांत,

फुलाफळांत,वृक्षवनस्पर्तीत जगाचा इतिहास पाहण्यास प्रारंभ केला.जगाच्या इतिहासावरील प्रवचने दगडार्धोड्यांतून,नद्यांतून,वाळवंटांतून व पर्वतांतून ऐकत तो सर्वत्र हिंडला. किती मनोरंजक व सत्यमय ही जगाची कथा ! परत आल्यावर पूर्वी धर्मोपदेशक होऊ इच्छित असलेलाच डार्विन ज्या आधारावर चर्चची उभारणी झाली होती,त्या आधाराच्याच सत्यतेविषयी शंका घेऊ लागला.त्याने आव्हान दिले.


अदृश्य स्वर्गाचा अभ्यास व परलोकाचा विचार सोडून देऊन तो प्रत्यक्ष पृथ्वीचा अभ्यास करू लागला.जग एका धर्मोपदेशकाला मुकले खरे;पण त्याला एक अत्यंत मोठा शास्त्रज्ञ लाभला.


डार्विन व अब्राहम लिंकन एकाच दिवशी १२ फेब्रुवारी १८०९ रोजी जन्मल्यामुळे प्रोफेसर लल् म्हणे की,लिंकनने मानवाचे देह गुलामगिरीतून मुक्त केले.त्याप्रमाणे डार्विनने मानवी मन अज्ञानाच्या बंधनांपासून मुक्त केले.


 १८०९ साल महापुरुषांच्या जन्मांनी भरलेले आहे.या वर्षी निसर्गाने मानवजातीच्या मांडीवर जणू महापुरुषाचे ताटच वाढून आणून ठेवले.डार्विन,लिंकन,गॉडस्ट,मेंडेलसन,

चॉपिन,पो,टेनिसन,ऑलिव्हर वेंडेल होल्म्स,एलिझाबेथ बॅरेट ब्राऊनिंग या सर्वांचा जन्म याच वर्षी झाला. 


आणखीही कित्येक याच साली जन्मले असतील.यांपैकी प्रत्येकाने मानवजातीला शाश्वत सुंदरतेची व उदात्ततेची जोड करून दिली आहे. त्यात भरपूर भर घातली आहे.

डार्विनने घातलेली भरही काही कमी नव्हती.


डार्विनची मातृकुल व पितृकुल दोन्ही चांगली होती.त्याच्या वडिलांचे वडील इरॅस्मस डार्विन हे प्रसिद्ध निसर्गशास्त्री होते.त्यांनी वनस्पतींच्या प्रेमलीला हे काव्य तसेच लॉज ऑफ ऑरंगनिक लाइफ (सेंद्रीय जीवनाचे नियम) हे पुस्तक लिहिले.त्याचे आईकडचे पणजोबा चिनी मातीच्या भांड्यांचे मोठे कारखानदार होते.त्यांचे नाव जोशिया वेजवूड.शास्त्रे व कला यात खूप रस घेणारे वातावरण डार्विनच्या घरात असणे साहजिकच आहे.लहानपणी डार्विन सौम्य वृत्तीचा व चिंतनशील होता.त्याला लहानलहान खडे,दगड,शिंपले,नाणी,फुले,कृमी,जीवजंतू पक्ष्यांची अंडी,कीटक वगैरे जमविण्याचा फार नाद होता.तो जिवंत कीटक पकडीत नसे.मेलेले आढळले तरच उचली.फुलपाखरांनाही तो मारीत नसे.पण पक्षी मात्र आपल्या छोट्या बंदुकीने तो खुशाल मारी.दुरून जीव घेण्यात त्याच्या बालमनाला जणू हरकत वाटत नसावी.

पुष्कळ वर्षे त्याला शिकारीचा नाद होता.पण एके दिवशी एका जखमी पक्ष्याच्या वेदना पाहून त्याच्या मनावर खूप परिणाम झाला व केवळ करमणुकीखातर पुन्हा प्राण्यांची हिंसा करायची नाही,असा निश्चय त्याने केला.त्याची आई तो आठ वर्षांचा असताना वारली.त्याचा बाप रॉबर्ट वेअरिंग डार्विन हा भीमकाय पुरुष होता.त्याचे वजन साडेतीनशे पौंड होते.तो अत्यंत आनंदी व कार्यक्षम होता.पण त्याला पुत्राचा स्वभाव मात्र नीट समजला नाही.


तो निरुपयोगी उडाणटप्पू आहे,असे त्याचे मत होते.जगातला सारा केरकचरा फुले,पाखरे,

दगडधोंडे घरात आणून भरणारा हा पोरगा पुढे काय करणार असे त्याला वाटे. 


मुलाच्या हातून काही कर्तबगारी होईल असे बापाला वाटेना.त्याच्या डोक्यात थोडेफार जुने ज्ञान कोंबण्यासाठी बापाने त्याला ग्रीक व लॅटिन शिकवणाऱ्या एका शाळेत घातले.पण मुलाने शिक्षणाकडे लक्ष न देता बापाच्या बागेतच एक गुप्त प्रयोगशाळा सुरू करून रसायनशास्त्राचे व पदार्थविज्ञानाचे प्रयोग चालवले.त्यामुळे त्याला सारे जण वेडपट म्हणू लागले.मुले त्याला 'गॅस' म्हणत.

हेडमास्तरांनी त्याला 'निष्काळजी माणूस' ही पदवी दिली.मुलाच्या या प्रयोगांमुळे व उंदीर पकडण्याच्या खेळामुळे विटून व घाबरून बापाने त्याला क्लासिकल शाळेतून काढून घेऊन एडिंबरो येथे वैद्यकाचा अभ्यास करण्यास पाठवले.


पित्याच्या धंद्याचे शिक्षण घेण्यात डार्विन थोडा वेळ रमला.पण अँनॉटॉमीची व्याख्याने त्याला कंटाळवाणी वाटू लागली.


शस्त्रक्रियेचे प्रयोगही त्याला बघवेनात.एका मुलावर करण्यात येत असलेली शस्त्रक्रिया पाहून डार्विन खोलीतून पळून गेला.त्यावेळी गुंगी आणणारा क्लोरोफॉर्म नसल्यामुळे तो मुलगा फोडीत असलेल्या किंकाळ्या पुढे कित्येक वर्षे तो विसरू शकला नाही.


गटेप्रमाणेच तो वर्गात फारसे शिकला नाही.तो शाळेबाहेरच बरेचसे शिकला.तो दारू पिई, जुगार खेळे,प्रेम करी.हे सर्व करीत असताना तो आपल्या अजबखान्यात अधिकाधिक वस्तूंची भर घाली.'मुलगा डॉक्टर होणे शक्य नाही'असे वाटल्यामुळे बापाने त्याला धर्मोपदेशक करायचे ठरवून केंब्रिजच्या ख्रिश्चन कॉलेजात घातले.या वेळी तो अठरा वर्षांचा होता.येथे तो तीन वर्षे होता. 'ही तीन वर्षे फुकट गेली,वाईट वाटते.नुसती फुकट जाती तरी बरे.पण प्रार्थना,दारू पिणे,गाणे,पत्ते खेळणे या आणखी गोष्टी त्यात होत्या.'


'बीगल' गलबतावरच्या प्रवासाने डार्विनच्या जीवनाला तर नवीन दिशा लावलीच.पण साऱ्या मानवी विचारांचीही दिशा बदलली.ही युगप्रवर्तक सफर पाच वर्षे चालली होती. गलबतातून पृथ्वीप्रदक्षिणा करून डार्विनने जीवनाचे कोडे उलगडण्यासाठी निसर्गाच्या अनेक वस्तू जमा केल्या.सृष्टीत सर्वत्र विखुरलेले नाना नमुने त्याने पाहिले,गोळा केले व त्यांचे वर्गीकरण केले.त्याची दृष्टी शास्त्रज्ञाची होती. त्याचे मन व त्याची बुद्धी ही कवीची होती.त्याने जमवलेले प्राण्यांचे हजारों नमुने एकत्र जोडून त्यातून सुसंगत अशी प्राण्यांच्या उत्पत्तीची मीमांसा करून उपपत्ती त्याने लावली व त्यांच्या विविधतेचे विवेचन केले.आपले संशोधन आपणास कोठे घेऊन जात आहे याची तो गलबतावर होता,तेव्हा त्याला नीटशी कल्पना आली नव्हती.प्रत्येक खऱ्या निरीक्षकाप्रमाणे आधीच मनात एखादी मीमांसा निश्चित करून तो निघाला नाही.प्रत्यक्ष वस्तुस्थिती पाहून तो सिद्धांताकडे जाई.वीस वर्षे त्याचे संशोधन अखंड व परिश्रमपूर्वक चालू होते.त्याने अपरंपार माहिती मिळवली व तिची निःपक्षपातीपणे छाननी केल्यावर त्याला उत्क्रांतीची महत्त्वाची उपपत्ती आढळून आली.


हे सारे जगत म्हणजे डार्विनपुढे एक प्रश्नचिन्ह होते.एक गूढ व बिकट अशी समस्या होती.तो जणू गणितातलाच एक प्रश्न होता.भूमितीतील एक सिद्धांत होता.तो सोडवावयास पाहिजे होता.त्यात पुष्कळच अज्ञात राशी होत्या.जग हे कौतुक करण्यासारखी कलाकृती नसून ते एक गणित आहे.एक कोडे आहे असे डार्विनला वाटे.वाड् मयाची त्याची आवड कधीच नष्ट झाली होती.

पण त्यांचे विज्ञानच त्याला वाड्मयाप्रमाणे,

कलेप्रमाणे,संगीताप्रमाणे झाले होते.मानवांविषयीचे त्याचे प्रेम कधीही नष्ट झाले नाही.विज्ञानाखालोखाल त्याला न्यायाविषयी उत्कट आस्था वाटे.एकदा त्याचे 'बीगल' गलबत ब्राझील येथे थांबले.काही नीग्रो गुलाम पळत होते.त्यामध्ये एक स्त्रीही होती.पाठलाग करणाऱ्यांच्या हाती लागू नये म्हणून त्या म्हाताच्या नीग्रो स्त्रीने कड्यावरून उडी घेतली.तिचे तुकडेतुकडे झाले!डार्विन लिहितो, 


एखाद्या पोक्त व पावन रोमन स्त्रीने जर असे केले असते तर 'केवढे हे स्वातंत्र्यप्रेम!' असे म्हटले गेले असते.पण तेच नीग्रो स्त्रीने केले म्हणून त्याचे 'पाशवी हट्टीपणा'असे विकृत वर्णन करण्यात आले!


 गुलामगिरीवर अन्यत्र टीका करताना तो लिहितो (आणि त्याने अमेरिकेतील सिव्हिल वॉरच्या आधी वीस वर्षे हे लिहिले होते,हे लक्षात घेतले पाहिजे.)

'गुलामांच्या धन्याकडे करुणेने व आस्थेने पण गुलामांकडे मात्र निष्ठुरतेने पाहणारे लोक स्वतः गुलामांच्या स्थितीत असल्याची करू पाहतील,तर गुलामांची स्थिती किती निराशजनक असते हे त्यांना कळून येईल.


आशेचा किरण नाही,उत्साह नाही,आनंद नाही, जीवनात कधी काही फरक पडण्याची वा स्थिती सुधारण्याची तीळमात्र शक्यता नाही!किती केविलवाणे जीवन!आपली मुले-बाळे व पत्नी आपणापासून केव्हा वियुक्त केली जातील, ओढून नेली जातील याचा नेम नाही.क्षणोक्षणी ताटातूट होण्याची चिंता सतावीत आहे अशी परिस्थिती डोळ्यांसमोर आणा.ही माझी पत्नी, 'ही माझी मुलेबाळे !'असे म्हणण्याचा, निसर्गानेही न नाकारलेला गुलामांचा हक हिरावून घेऊन त्यांची लाडकी मुले-बाळे,त्यांची प्रियतम पत्नी यांची गुराढोराप्रमाणे अधिकात अधिक किंमत देणाऱ्यांना विक्री करण्यात येते आणि तीही कोणाकडून!तर शेजाऱ्यांवरही आपल्याइतकेच प्रेम करण्याचा आव आणणाऱ्यांकडून!ईश्वरावर श्रद्धा ठेवणारे, त्याच्या इच्छेप्रमाणे पृथ्वीवर सर्वांनी वागावे असे उपदेशिणारेच या प्रकाराचे पुरस्कर्ते असावेत, त्यांनी त्याचे समर्थन करावे,व 'यात काय आहे!' असे म्हणून उडवाउडवी करावी हे केवढे आश्चर्य !'


'बीगल'मधून सफर करीत असता मानवप्राण्यांची उत्पत्ती कसकशी होत गेली,हे शोधून काढण्यासाठी ज्याप्रमाणे त्याने बारकाईने निरीक्षण चालवले होते,त्याप्रमाणेच मानवांच्या दुःखांकडेही त्याची बारीक नजर होती.त्याकडे तो काणाडोळा करीत नव्हता,करुणेने पाहत होता.


सफरीहून परत आल्यावर त्याने आपली भाची एम्मा वेजवूड हिच्याशी विवाह केला.त्याला पुढे दहा मुले झाली.या मुलांचे खरे पूर्वज कोण याचाही शोध तो करीतच राहिला.त्याने खेड्यात एक घर खरेदी केले.

त्याच्याभोवती विस्तृत बगिचा होता.सुदैवाने,त्याला पोटासाठी काम करण्याची आवश्यकता नव्हती.त्याच्या वडिलांनी भरपूर मिळवून ठेवले होते.आपली मुले काहीही कष्ट न करता नीट जगू शकतील,आळसात राहू शकतील अगर आपल्या उज्वल प्रतिभेची व अपूर्व बुद्धिमत्तेची करामत दाखवू शकतील अशी सोय त्यांनी करून ठेवली होती.चार्लस डार्विन आपल्या प्रतिभेच्या पूजनात रमला.


लग्न करण्याच्या किंचित आधी त्याची प्रकृती बरीच खालावली होती.ती कधीच सुधारली नाही.तो जवळजवळ चाळीस वर्षे आजाऱ्यासारखाच होता.तरीही त्याने एकट्याने दहा माणसांइतके काम केले!प्रथम त्याने 'बीगल' वरून केलेल्या प्रवासाचे इतिवृत्त प्रसिद्ध केले.हे पुस्तक शास्त्रीय असूनही एखाद्या मनोरंजक कादंबरीप्रमाणे रसाळ वाटते.

हरएक गोष्ट लिहिताना त्याच्या डोळ्यांसमोर एकच ध्येय असे लिहिलेले सर्वांना समजेल अशी भाषाशैली तो वापरत असे तो लिहितो,'लहानलहान जुने सॅक्सन शब्द वापरणे चांगले.'एखादे लहान रोपटे अफू घेतल्याप्रमाणे जणू गुंगीत असते आणि अशा वृत्तीनेच ते जगते',अशी वाक्ये कानाला इंग्रजी नाही वाटत.त्याचे भाषांतर करावेसे वाटते.पण हेही खरे की,भाषाशैली अती सोपी,सहजसुंदर व प्रासादिक असावी यासाठी फार श्रम घेणे बरे नाही.वाग्वैभव केवळ निरुपयोगी असेही नाही.लिखाणात परमोच्च वक्तृत्व असूनही फारसा आटापिटा न करता प्रसाद व सहजसुंदरता दोन्ही साधता येतील तर चांगलेच.'


भाषा सहजसुंदर व स्वच्छ आणि विशद अर्थ सांगणारी व्हावी म्हणून डार्विनने खूप प्रयत्न केले.सुंदर लिहिणे प्रथम त्याला जड जात होते. पण अविरत प्रयत्नाने त्याने स्वतःची एक विशिष्ट भाषाशैली बनवली.मोकळी,सोपी व मनोहर भाषाशैली त्याने निर्मिली.त्याच्या जीवनाचे ब्रीदवाक्य 'सतत प्रयत्नाने कार्य होते',हे होते. काव्याविषयी आपणास फार आवड नसल्याबद्दल त्याला वाईट वाटे.तरीही पण 'बीगलवरील प्रवास' या त्याच्या पुस्तकात कवितांचे पुष्कळ उतारे आहेत.ब्राझीलचे पुढील वर्णन पाहा,'येथील जमीन म्हणजे एक विस्तृत, अनिर्बंध,

भव्य,भीषण व वैभवसंपन्न असे निसर्गाचे जणू उष्ण मंदिरच आहे.पण निसर्गाच्या या घराचा कब्जा मानवाने घेतला आहे.येथे मानवाने ठायीठायी सुंदर घरे व लहानलहान बागा निर्मिल्या आहेत.' ब्राझीलची भूमी पाहून त्याला प्रथम काय वाटले ते पाहा,तो म्हणतो, "आनंदाच्या व आश्चर्याच्या वादळात मी बुडून गेलो." व मग लिहितो,'नारिंगे,संत्री,नारळ,ताड, आंबे,केळी वगैरेंची बाह्यरूपे पृथक् आहेत.पण या भिन्न भिन्न वृक्षवनस्पतींची सहस्त्रावधी सौंदर्ये शेवटी एक भव्य अशी सौंदर्यकल्पना देतात आणि वेगवेगळी सुंदर रूपे विलीन होऊन एकच सौंदर्यकल्पना मनात राहते.पण ही विविधता गेली तरीही अस्पष्ट;पण अत्यंत सुंदर अशा आकृतींची चित्रे हृदयफलकावर राहतातच. '


'बीगलवरील प्रवास' हे पुस्तक लिहून शंभर वर्षे होऊन गेली.तरीही तें पुस्तक अरबी भाषेतील सुरस गोष्टींप्रमाणे गोड वाटते. 


डार्विनचे यानंतरचे पुस्तक मात्र केवळ शास्त्रीय होते.त्यात निसर्गाच्या स्वरूपाविषयी बरीच माहिती असून समुद्रातल्या बानेंकल नामक प्राण्याची ही हकिकत आहे.हा प्राणी आपल्या डोक्यावर उभा असतो व आपल्या पायांनी तोंडात अन्न फेकतो,हे पुस्तक डार्विन आठ वर्षे लिहित होता. 


त्याच्या आयुष्यातली ही आठ वर्षे अत्यंत उपयोगी कामात गेली.या एका विषयाला सतत आठ वर्षे चिकटून बसून डार्विनने स्वत:मध्येही जणू बार्नेकलची चिकाटी बाणवून घेतली. असल्या विषयावर निरर्थक इतके प्रयत्न करण्याबद्दल डार्विनचे मित्र त्याची खूप टिंगल करीत.पण डार्विन हळूहळू 'सर्वांत मोठा सृष्टिज्ञानी व निसर्गाभ्यासी'अशी आपली प्रतिष्ठा प्रस्थापित करीत होता व आपल्या आयुष्यातल्या सर्वांत मोठ्या कामासाठी आपले मन आपल्या मनाचे स्नायू मजबूत करीत होता.


ही आठ वर्षे किती मोलाची!तो सारखा मिळवीत होता व चिकित्सक बुद्धीने त्या माहितीतून सत्य शोधीत होता, निवडानिवड करीत होता. 'निरनिराळ्या जातींची उत्पत्ती आणि मानवाची उत्क्रांती ( मानवाचा अवतार ) ' यासंबंधी आपली उपपत्ती पूर्णावस्थेस नेऊ पाहत होता.


अपुरे ( अपूर्ण )

१९ फेब्रुवारी २०२३ या लेखामधील पुढील भाग..