* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सत्यकथा थक्क करुन सोडणारी

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड
सत्यकथा थक्क करुन सोडणारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सत्यकथा थक्क करुन सोडणारी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१७/११/२२

.. सत्यकथा थक्क करुन सोडणारी

हावरटपणा,सर्व काही मलाच मिळाले पाहिजे.हा स्वार्थी विचार,व स्वार्थी वागणं पक्षी,प्राण्यांकडून कधीच होत नाही.ही सर्वजण निसर्ग नियमातून जीवन जगणारी असतात.


मेनन पिस्टन रिंग्ज (टोप,संभापूर) या ठिकाणी मी जनरल कास्टींगमध्ये ( फौन्ड्री ) काम करतो.या ठिकाणी प्रिसिजन मशिन् ड कास्टींग उत्पादनाची निर्मिती होते.शारीरिक श्रमाची कामे असतात.ज्यामुळे जीवनातील 'प्रतिष्ठा' वाढीला लागते.कंपनी म्हणजे जिव्हाळ्याचं,प्रेमाचं ठिकाणं आमचे 'वरिष्ठ साहेब' हे फारच मनस्वी स्वभावाचे आहेत.राकेश सावंत,सचिन पाटील,ही माणुसकी जतन करत असताना.कामामध्ये न कळत चुक झाल्यास 'शिक्षा न देता शिक्षण देतात' त्याचबरोबर सर्वोत्तम असा (HRD) विभाग,(मानव संसाधन विभाग कंपनीच्या जो मानवी संसाधनांचे व्यवस्थापन करतो.) याठिकाणी सुसंवाद साधून 'चांगुलपणा' आपल्या वागण्यातून शिकवणारे काळे साहेब कंपनीमध्ये वीजेचा अनावश्यक वापर बंद करुन वीज वाचवणे काळाची गरज आहे.वीज जीवनातील महत्वाचा भाग आहे.म्हणून ते प्रत्यक्ष येवून दिवस सुरु होताच लाईट बंद करतात.(थॉमस अल्व्हा एडिसन यांना आनंद नक्कीच झाला असेल.) त्यांना या संदर्भात बोललो असता ते सहजच म्हणालेत,आपण चांगलं करत रहायचे म्हणजे चांगुलपणा आपली पाठराखण सदैव करतो.


या ठिकाणी असाच एक प्रसंग संवेदनशील मनाला भावनिक भुरळ घालून गेला.या ठिकाणी पपईचे एक झाड आहे.(आमच्या कंपनीमध्ये निसर्गाचे जतन केले जाते.) या झाडावरती पपई लागलेल्या आहेत. एक वानर या झाडावरती चढले या झाडावर लागलेल्या सर्व पपई त्याने हाताने दाबून पिकलेल्या आहेत का? याची खात्री केली एकही पपई खाण्यासाठी पिकलेली नव्हती.ज्या सन्मानाने ते वानर त्या झाडावर चढले होते.त्याच सन्मानाने ते खाली उतरले.कोणत्याही प्रकारचा राग नाही. कोणत्याही प्रकारचा त्याचा इगो दुखावला नाही. 'जे जसं आहे,ते तसं त्यानं स्विकारलं' हा माणसाला बरंच काही शिकवणारा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला नाही.पण फेटलिंग या विभागात काम करणारे 'माणुस' असणारे आमचे सहकारी मित्र 'सोहेल' यांनी हा ह्रदयस्पर्शी प्रसंग याची देही याची डोळा पाहिला.व पळत येवून मला सांगितला. हा धडा मला बरचं काही सागून गेला.हा प्रसंग ऐकल्यानंतर माझ्यामध्ये असणारा प्राचीन व सनातन DNA मात्र सुखावला..!


'पाखरमाया' हे मारुती चितमपल्ली यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे वाचन सुरू होते.यावेळी या पुस्तकातील एक मुलाखत बरचं काही ज्ञान देऊन जाते.

एस. एच. स्केफ या कीटकशास्त्रज्ञाला एका मुलाखतीत विचारण्यात आलं

की, 'तुम्ही जर मानव नसता, तर कोणत्या प्राण्याचा जन्म घेणं तुम्हांला आवडलं असतं ?

त्यावर स्केफ म्हणाला,

'मला कालव-शिंपला (ऑइस्टर) व्हायला आवडेल.'

हे त्याचं उत्तर ऐकून परीक्षकाला आश्चर्य वाटलं. त्यांनी विचारलं,

'का बरं?'

'कारण कालव-शिंपल्याच्या जीवनाला नर म्हणून सुरुवात होते. नंतर त्याचं रूपांतर मादीत होतं अन् शेवटी तो अर्धनारीनटेश्वर होतो. जीवनाच्या सर्व थरांच्या अनुभवांतून तो जातो. त्यामुळं संपूर्ण जीवनाविषयीचं ज्ञान त्याला अवगत होतं.'

परीक्षकांना हे उत्तर आवडलं,हे सांगायला नकोच.


(हा लेख लिहीत असताना आमचे परममित्र माधव गव्हाणे सरांचा फोन आला आणि याच अनुषंगाने थोडी नवीन चर्चा झाली त्यातून नवीन माहिती मिळाली.वानरे संत्री खात नाहीत.कारण ती सोलत असताना संत्र्याच्या सालीमध्ये असणारा रस डोळ्यात उडतो,व डोळे चरचरतात,हे ज्ञान त्यांनी अनुभवातून मिळवलेले आहे त्यामुळेच वानरे संत्री खात नाहीत.)


सर्वांचे पुनश्च आभार व धन्यवाद


● विजय कृष्णात गायकवाड