* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जी बरचं काही सांगून जाते…

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड
Showing posts with label जी बरचं काही सांगून जाते…. Show all posts
Showing posts with label जी बरचं काही सांगून जाते…. Show all posts

9/14/22

एक छोटी घटना,जी बरचं काही सांगून जाते…

रात्र झाली होती. घोड्यावर स्वार होऊन एक प्रवासी समुद्राकडे निघाला होता.रस्त्याच्या कडेला एक खानावळ लागली. स्वार थांबला. घोड्यावरून उतरला. एका झाडाच्या बुंध्याला त्याने घोडा बांधला आणि खानावळीत प्रवेश केला.'समुद्र सफरीवर जाणाऱ्या सर्वांच्याच अंतकरणात माणसांवर विश्वास असतो. रात्रीच्या प्रहरांवर विश्वास असतो.'


मध्यरात्र झाली. सगळे जण गाढ झोपेत होते. एक चोर आला आणि त्यानं त्या प्रवासाचा घोडा पळवून नेला.


सकाळ झाली प्रवासी जागा झाला. त्याला दिसून आलं की आपला घोडा नाहीसा झाला आहे. त्याला फार वाईट वाटलं ' कोणातरी माणसाच्या मनात घोडा चोरावा असं येतं याचा त्याला मोठा खेद झाला‌‌. 'खानावळीत निवासाला असलेले एकामागून एक त्याच्या भोवती जमले आणि बोलू लागले‌


पहिला सहनिवासी म्हणाला " तबेल्या बाहेरच घोडा बांधलास हे मूर्खपणाच नाही काय ? "


दुसरा म्हणाला," घोड्याला पायबंद घातला नाहीस हे त्याहून मूर्खपणाच आहे."


तिसरा बोलला," समुद्रापर्यंत येण्यासाठी घोडा वापरावा हे खरंतर खुळेपणाचं आहे."


चौथा म्हणाला," खुशालचंद सुस्त माणसांना पायी चालायचं जीवावर येतं. अशी माणसं घोडी विकत घेतात."


सर्वांच सर्व ऐकूण प्रवाशाला फार अचंबा वाटला. तो म्हणाला," मित्रहो, माझा घोडा चोरीला गेला यात माझा अपराध कोणता ते सांगायला तुमच्यात अहमहमिका लागली आहे. पण काय आश्चर्य ! ज्यानं माझा घोडा चोरला त्याच्यावर कसलाही ठपका तुम्ही ठेवत नाही."


 ' द प्रॉफेट ' खलील जिब्रान यांच्या पुस्तकातून