* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आपला जागतिक वारसा !

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

आपला जागतिक वारसा ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आपला जागतिक वारसा ! लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

२६/१/२३

धातूचा आरसा,आपला जागतिक वारसा !

चिंचोळ्या आकारात असलेल्या केरळच्या दक्षिणेला,पण आतल्या भागात,मध्यभागी,एक लहानसं सुबक गाव आहे - अरणमुला. तिरुअनंतपुरम पासून ११६ किमी.अंतरावर असलेलं हे गाव राष्ट्रीय महामार्गावर नसलं,तरी अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे.पंपा नदीच्या काठावर वसलेल्या अरणमुलाला ओळखलं जातं ते नावांच्या (बोटींच्या) शर्यतीसाठी. 'स्नेक बोट रेस' नावाने प्रसिद्ध असलेल्या या शर्यती बघण्यास देश-विदेशांतून पर्यटक येतात.


याच अरणमुलामधे श्रीकृष्णाचे एक भव्य-दिव्य मंदिर आहे.'अरणमुला पार्थसारथी मंदिर'ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या मंदिरामुळे हे स्थान जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट झालेले आहे.अशी मान्यता आहे की,भगवान परशुरामाने

श्रीविष्णूंची १०८ मंदिरं बांधली,त्यांपैकीच हे एक

मंदिर आहे.केरळचें प्रसिद्ध शबरीमलाई मंदिर

येथून तसे जवळच.एकाच 'पथनामथिट्टा' ह्या

जिल्ह्यात.. भगवान अय्यप्पांची जी भव्य यात्रा

दरवर्षी शबरीमलाईहून निघते,त्या यात्रेचा एक टप्पा म्हणजे हे 'अरणमुला पार्थसारथी मंदिर'..


आणखी एका गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे.ते म्हणजे येथील शाकाहारी थाळी.

'वाला सध्या'नावाच्या ह्या जेवण प्रकारात ४२ वेगवेगळे पदार्थ असतात.आणि हे सर्व,अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने,आयुर्वेदाचा विचार करून,आहारशास्त्रानुसार वाढले जातात.


अरणमुलाच्या आजूबाजूला असलेल्या संपन्न सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणाचा परिणाम असेल कदाचित,पण त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून ख्रिश्चनांनी येथे बरेच उपक्रम चालविले आहेत.येथे चर्चेसची संख्या बरीच जास्त आहे. दरवर्षी त्यांचा एक महाप्रचंड मेळावा येथे भरतो.

पण ह्या सर्व बाबींपेक्षाही एका अगदी 


आगळ्या-वेगळ्या गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे.आणि ते म्हणजे 'अरणमुळा कन्नडी!' कन्नडीचा मल्याळममधला अर्थ आहे,आरसा ! अर्थात 'अरणमुळा आरसा.' ह्या आरशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आरसा काचेचा नसून धातूचा असतो..!


जगभरात आरसे म्हणजे काचेचेच असे समीकरण आहे.


काचेला पाऱ्याचा थर लावून आरसे तयार केले जातात.सिल्वर नाइट्रेट आणि सोडियम हायड्रोक्साईड यांच्या द्रवरूपातील मिश्रणात किंचित साखर मिसळून गरम करतात आणि अशा मिश्रणाचा थर काचेच्या मागे देऊन आरसा तयार करतात.ही झाली आरसे बनविण्याची ढोबळ पद्धत.यात विशिष्ट रसायने वापरून आणि विशिष्ट प्रकारची काच वापरून सामान्य ते अत्युत्कृष्ट दर्जाचे आरसे बनविले जातात.


अर्थात ही आरसे बनविण्याची पद्धत गेल्या दीडशे-दोनशे वर्षांतली.पाऱ्याचा थर दिलेले आरसे बनविण्याचा शोध जर्मनीत लागला.

सन १८३५च्या आसपास जर्मन रसायनशास्त्रज्ञ जुस्तुस लाईबिग याने पहिला 'पाऱ्याचा थर दिलेला आरसा'तयार केला.


मात्र जगाच्या पाठीवर आरसे बनविण्याची कला फार जुनी आहे.


सर्वांत जुना म्हणजे सुमारे ८००० वर्षांपूर्वी आरशांचा उल्लेख आस्तोनिया म्हणजे आजच्या तुर्कस्थानात आढळतो.त्याच्यानंतर इजिप्तमधे आरसे मिळाल्याची नोंद आहे.दक्षिण अमेरिका, चीनमधेही काही हजार वर्षांपूर्वी आरसे वापरात होते असे उल्लेख आढळतात.


या आरशांचे प्रकार वेगवेगळे होते.दगडाचे, धातूचे,काचेचे आरसे वापरण्याच्या नोंदी आहेत. मात्र काचेशिवाय इतर धातू / दगडांपासून बनविलेले आरसे उच्च प्रतीचे नसायचे. 


तुर्कस्थानात सापडलेले आरसे हे ओब्सिडियन (म्हणजे लाव्हा रसापासून बनविलेली काच) चे होते.


आरशासंबंधी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रबंधांत किंवा विकिपीडियासारख्या ठिकाणी भारताचा उल्लेख फारसा आढळत नाही.याचे कारण म्हणजे भारतातले लिखित साहित्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात आक्रमकांनी नष्ट केले.श्रुती, स्मृती,वेद,पुराण,उपनिषदे वगैरे ग्रंथ वाचिक परंपरेच्या माध्यमातून टिकले..पण आपली प्राग-ऐतिहासिक किंवा ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात बरीचशी नष्ट झाली.असे असले तरीही अजिंठ्याच्या चित्रात किंवा खजुराहोच्या शिल्पात,हातात आरसा घेतलेली, शृंगार करत असलेली रमणी आपल्याला दिसते. म्हणजे आरशाचा उपयोग हजारो वर्षांपासून भारतात सर्वमान्य होता हे निश्चित.


सध्या बेल्जियमची काच आणि बेल्जियमचे आरसे जगभरात प्रसिद्ध आहेत.मात्र त्या बेल्जियमच्या आरशांना टक्कर देतील असे धातूचे आरसे अरणमुलाला बनवले जातात. अगदी नितळ आणि आरस्पानी प्रतिमा दाखविणारे आरसे..!


हे आरसे एका विशिष्ट मिश्र धातूचे बनलेले असतात.मात्र यात नेमके कोणते धातू वापरले जातात हे अजूनही गुलदस्त्यात आहे. धातुशास्त्रज्ञांनी ह्या आरशांचं विश्लेषण करून सांगितलं की,तांबे आणि टीनच्या विशिष्ट मिश्रणाने बनविलेल्या धातूला अनेक दिवस पॉलिश केले की बेल्जियमच्या काचेच्या आरशांशी स्पर्धा करणारे आरसे तयार होतात. आणि हे ओळखले जातात,'अरणमुळा कन्नडी' ह्या नावाने.


केरळच्या अरणमुलामधे तयार होणारे हे आरसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत,कारण जगाच्या पाठीवर, इतरत्र कोठेही असे आरसे तयार होत नाहीत. किंबहुना धातूपासून इतके नितळ आणि सुस्पष्ट प्रतिमा दाखविणारे आरसे तयार करण्याचं तंत्र, ह्या एकविसाव्या शतकातही कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य झालेलं नाही.जगात प्रचलित आरशांमध्ये प्रकाशाचे परावर्तन मागून होते.मात्र अरणमुला कन्नडीमधे ते समोरच्या पृष्ठभागातून होते,आणि त्यामुळे उमटलेली प्रतिमा ही स्वच्छ आणि सुस्पष्ट असते.लंडनच्या 'ब्रिटिश म्युझियम' मध्ये एक ४५ इंचांचा भला मोठा अरणमुला कन्नडी ठेवलेला आहे,जो पर्यटकांचे आकर्षण आहे.


ह्या आरशांच्या उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे काही कुटुंबाच्या समूहाने जपलेले एक रहस्य आहे. त्यामुळे ह्या लोकांशिवाय हे आरसे इतर कुणालाही तयार करता येत नाहीत.असं म्हणतात,अरणमुलाच्या पार्थसारथी (श्रीकृष्ण) मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी,काही शतकांपूर्वी तेथील राजाने,शिल्पशास्त्रात प्रवीण असलेल्या आठ कुटुंबांना पाचारण केलं होतं. या कुटुंबांजवळ हे धातूचे आरसे तयार करण्याचं तंत्रज्ञान होतं.मुळात बांधकामात तज्ज्ञ असलेल्या या कुटुंबांजवळ हे तंत्रज्ञान कुठून आलं,याबद्दल काहीही भक्कम माहिती मिळत नाही.ही आठ कुटुंबं तामिळनाडूमधून अरणमुलाला आली हे निश्चित.यांच्याजवळ धातूंना आरशाप्रमाणे चकचकीत करण्याचं तंत्रज्ञान फार आधीपासून होतं.मात्र त्याचा व्यापारिक उपयोग करायचं काही ह्या कुटुंबांच्या लक्षात आलं नसावं.


अरणमुला पार्थसारथी मंदिराचा जीर्णोद्धार करून झाल्यावर पुढे काय ? असा विचार करत असताना या कुटुंबांनी तिथल्या राजाला चमकत्या धातूचा राजमुकुट करून दिला. राजाला तो इतका आवडला की,त्याने ह्या कुटुंबांना जागा दिली,भांडवल दिलं आणि त्यांना धातूचे आरसे तयार करायला सांगितलं.ह्या आरशांना बायकांच्या आठ सौभाग्य लेण्यांमध्ये समाविष्ट केलं.आणि तेव्हापासून ह्या कुटुंबांनी धातूंचे आरसे तयार करण्याचा पेशा पत्करला.


ह्या आरशांमागे अनेक पौराणिक कथा / दंतकथा आहेत.हा आरसा सर्वप्रथम पार्वतीने शृंगार करताना वापरला असंही मानलं जातं.विशेषतः वैष्णवांच्या पार्थसारथी मंदिराच्या परिसरात ही पौराणिक कथा शेकडो वर्षांपासून श्रद्धेने ऐकली जाते.आज हे आरसे म्हणजे जागतिक ठेवा आहे.हे सर्व आरसे हातानेच तयार केले जातात. सुमारे डझनभर आरसे तयार करायला दोन आठवडे लागतात.कोणतेही दोन आरसे सहसा एकसारखे नसतात.परदेशी पर्यटकांमध्ये ह्या आरशांबद्दल प्रचंड आकर्षण आहे.अगदी लहानात लहान,म्हणजे एक-दीड इंचाच्या आरशाची किंमत १,२०० रुपयांच्या पुढे असते.दहा- बारा इंची आरसे तर अनेकदा वीस-पंचवीस हजारांपर्यंत विकले जातात. अनेक कॉर्पोरेट कंपन्या हे आरसे भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वापरतात.


जगाच्या पाठीवर एकमेव असलेली आणि वैज्ञानिकांना कोड्यात पाडणारी,ही धातूचे आरसे तयार करण्याची कला काही शतकांपूर्वी उजेडात आली.मात्र ती काही हजार वर्षं जुनी असावी हे निश्चित,पण मूळ मुद्दा तसाच राहतो- हजारो वर्षांपूर्वी धातुशास्त्रातली ही नजाकत,हे ज्ञान आपल्याजवळ आले कोठून.. ?


२२ जानेवारी २०२३ लेखामधील पुढील भाग..