रोज सकाळी आपलं नैसर्गिक घड्याळ सेट करण्यासाठी आपल्या डोळ्यांना सकाळच्या कोवळ्या उन्हाची गरज असते.जर सकाळी हे घड्याळ सेट झालं तर रात्री शांत झोप लागते. पण हा प्रकाश खिडकीच्या काचेतून किंवा गॉगलमधून मिळालेला नसावा. सरळ सूर्यप्रकाश मिळण्यासाठी सकाळचा काही वेळ काढा किंवा ऑफिसला जाताना गाडीच्या काचाखाली करून सुर्याचे दर्शन घ्या आणि कवळ्या सूर्यप्रकाशाचा लाभ घ्या.
इमोशनल इंटेलिजन्स या पुस्तकातील वाक्य वाचून जरा थांबलोच.
असाच व्हॉट्सॲपचा स्टेटस बघत होतो.एका ठिकाणी डॉ.प्रभाकर शेळके यांचा ग्रामीण जीवनाचा ' सत्य ' सांगणारा कथासंग्रह या कथासंग्रहावर आमचे मित्र शरद ठाकर यांनी लिहिलेली वृत्तपत्रातील समीक्षा वाचली. त्यांनी आदरणीय डॉ.प्रभाकर शेळके यांचा भ्रमणध्वनी नंबर दिला.या समिक्षेवर व कथासंग्रहाबाबत लेखकांसोबत सर्वोच्च आत्मिय सुसंवाद झाला.बैल व बइल,देव व दैव या मानवी जीवनातील शब्दांमागची इमोशनल भावना,या संबधी अवर्णनीय अशी माहिती त्यांच्या ओजस्वी वाणीतून प्रकट झाली.साहेबांनी माझ्या सन्मित्र हाकेला पुस्तकरुपी ओ दिली,भेटस्वरुप म्हणून व्यवस्थेचा बइल हे पुस्तक मला मिळाले.प्रथमत:त्यांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद
१२ कथांचा हा संग्रह संपुर्ण ग्रामीण जीवनाचे जीवंत दर्शन घडवितो.यातील कथा,पात्र ही प्रत्येक माणसाची जिंदगी आहे.
मी माझाच उधळत गेलो.मस्तवाल बैलासारखा.मी या व्यवस्थेचा उधळलेला बैल हे 'प्रामाणिक मनोगत काळजाची ठाव घेते.डॉ.दादा गोरे यांची प्रस्तावना स्वतःला स्वतःसाठी स्वतःमध्ये कसं तटस्थपणे बघायचा 'आरसा' च आहे.या प्रस्तावनेमुळे हे पुस्तक समजण्यास सोपे जाते.
व्यवस्थेचा बइल,चांदणफुला,मुलडा,मिरग,जटायू,दंडुका,कंदुरी,
कुरण,खुरमुंढी,उमश्याचा बाप,भदपड्या,कुब्जा,संट्या अशा विचारांच्या या वेगवेगळ्या कथा,या कथा माणसात,मानसिकतेत झालेला बदल,गावांचं झालेलं शहरात रुपांतर,मुलभूत गरज व दिखाऊ गरज,
माणसाच्या माणुसकीचा होणारी घुसमट,प्रत्येक ठिकाणी स्वार्थीपणाने विविध पातळ्यांवर होणारी पिळवणूक,काय केलं व काय करायला हवं होतं याची भुमिका स्पष्ट करणारी सुक्ष्म रेषा म्हणजे हा कथासंग्रह
माय, तु मला जन्म दिला.तुझ्या पदराच्या सावलीत नाही विसावलो.तुझ्या दुधाचे उपकार कसे फेडू ? घरच्या दरिद्री परिस्थितीमध्ये बदल करुन सुखाचे चार घास खाण्यासाठी लवकरच मोठा झालेला लेक परिस्थितीतीचे चटके खातो.नोकरीसाठी गाव सोडावं लागतं.गावशिवारात राहिला नाही 'गोतावळा' उडाला 'पाचोळा' मनातली 'धग' घेवून शहरातल्या भोंगळ 'कोसल्या'मध्ये आणि म्हणून वाट्याला येतं आहे जगण्यातली 'काचवेल'.. नोकरीसाठी शिक्षण पदव्यांचा ढिग पण नोकरीच नाही.मी उध्वस्त आत्म्याचा कैदी ..शिंगे खिलार आहे,खांदा,रंग,शेपूट,दात सगळं चांगलं आहे.एकीकडे मनात सुगंधाशी लग्न करावं,एकीकडे बेकारीने तळपतो.ह्या व्यवस्थेत मी दीन झालेला नंदीबइल..विशाल मनाचं दर्शन होतं.
चांदणफुला जयर्याच्या प्रेमाचा झालेला चुराडा ही प्रेमकहाणी जीवनातील क्षणभंगुरता दाखविते.इकडे जयर्याचा वळू गावभर सैराट होऊन पळतो आहे.तिकडे संजीचा चांदणफुला आभाळ गोदतो आहे.
माणसं पैशासाठी काम करत्यात की,मरण पुढं लोटण्यासाठी कळतं नाही.हे कळण्यासाठी मुलडा प्रत्यक्ष वाचलाच पाहीजे.
शेतकर्यांचा उपाशी संघर्षमय जीवन प्रवास उपाशी पोटाने केली जाणारी बियाणांची खरेदी पाचशे एकावन्न रूपयाची खरेदी झाली.ते देण्यासाठी बगलखिशात हात घातला तर सगळं जगणंच थांबलेलं हे सर्व भयावह वास्तव आहे.मिरुग आहे.
तो,आयुष्याची काही लक्तरे बांधून जगतो आहे.गावशीव सोडून शहराच्या गुर्हाळात चिपाड होऊन.त्यानं घालवलेलं असतं आपलं मरणप्राय आयुष्य मी सुद्धा जटायू आहे याची जाणीव झाली.
नोकरीवरुन अचानक कारणाशिवाय काढून टाकल्यानंतर झालेली अनेक जीवांची घालमेल गावकरी,सरपंच यांनी न्यायासाठी दिलेला लढा प्रेरणादायी आहे.जगण्यासाठीचा दंडुका
कंदुरी माणसाच्या जगण्याचे वैविध्यपूर्ण स्वभाव मान,सन्मान,अपमान,प्रेम,जिव्हाळा,यांच आध्यात्मिक दर्शन देणारी कथा भावनेला हात घालते.
जग रडून ऐकतो हसून सांगतो हे जगण्याचं मर्म सांगणारं कुरणं सत्याच्या जवळ घेवून जाते.
खुरमुंढी व्यसनाधीनता व त्याचे परिणाम यावर भाष्य करणारी कथा बरंच काही सांगून जाते.
उमश्याचा बाप विचारांच्या पलिकडे विचार करायला लावतो.
भदपड्या,कुबदा,संट्या आवर्जून समजून,उमजून जीवन उलगडुन दाखविणार्या कथा अप्रतिम आहेत.
हा कथासंग्रह वाचत असताना त्याच्यासोबत मी दुसरं पुस्तक 'संन्यासारखा विचार करा'वाचत होतो.मी नेहमीच दोन पुस्तके वाचण्यास घेतो. या पुस्तकात एक प्रसंग आहे. लंडनमधील मंदिरात राधानाथ स्वामी व्याख्यान देत असताना त्यांच्याकडून सांगितलेली विचार पद्धत..! ज्यांनी मिठासारखं जगायला सांगितलं आणि आपल्या अन्नात खूपच मीठ असलं किंवा अगदीच कमी मीठ असलं तरच आपलं त्याच्याकडे लक्ष जातं याकडे आमचे लक्ष वेधलं,आत्तापर्यंत कोणीही कधीच असं म्हणत नाही की,'किती छान,या अन्नात अगदी योग्य प्रमाणात मीठ आहे.ज्या वेळी मिठाचा शक्य तितक्या उत्तम प्रकारे वापर केला जातो. त्या वेळी ते लक्षातही येत नाही.मिठ इतकं विनयशील असतं की, ज्यावेळी एखादा पदार्थ बिघडतो, त्यावेळी त्याचा दोषारोप ते स्वत:वर घेतं आणि ज्यावेळी काही सारं आलबेल असतं, त्यावेळी त्याचं श्रेय ते घेत नाही.
खरचं हा कथासंग्रह म्हणजे मानवी जीवनातील मिठच आहे.आदरणीय लेखक डॉ.प्रभाकर शेळके यांचे पुनश्च मनापासून आभार…!
● विजय कृष्णात गायकवाड
● विजय कृष्णात गायकवाड