* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: आता आपण पाहू टायटॅनिक…

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

आता आपण पाहू टायटॅनिक… लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आता आपण पाहू टायटॅनिक… लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

३१/१२/२२

आता आपण पाहू टायटॅनिक…

१० एप्रिल १९१२! इंग्लंडमधल्या साऊथहँम्पटनच्या बंदरावर हजारो लोकांची गर्दी जमली होती.एक मलंमोठं जहाज रवाना होणार होतं.त्यातले प्रवासी आणि क्रू मेंबर्स तसंच त्यांना सोडायला आलेले त्यांचे नातेवाईक हे तर तिथं जमले होतेच,शिवाय अनेकजण एका खास घटनेचा साक्षीदार होण्यासाठीही जमले होते.सगळीकडे उत्साह संचारला होता.कारणही तसंच होतं.


हे जहाज काही साधंसुधं नव्हतं.प्रचंड मोठं,अतिशय देखणं,सुखसुविधांनी भरलेलं आणि मुख्य म्हणजे 'न बुडणारं (अनसिंकेबल)' असं हे जहाज होतं,असं जहाज याआधी कधीच कुणी बनवलंही नव्हतं आणि बघितलंही नव्हतं.या जहाजाचं नाव होतं 'आर. एम. एस. टायटॅनिक ! 'टायटॅनिक' नुसतं एक जहाज नव्हतं.ते एक स्वप्न होतं.'अनसिंकेबल','ड्रीम शिप' अशा अनेक उपाधी लागलेलं एक स्वप्न.या जहाजाची शोकांतिका आजही अस्वस्थ करते.


इंग्लंडमधल्या 'व्हाईट स्टार लाइन' या कंपनीचं हे जहाज होतं.कुनार्ड' आणि 'व्हाईट स्टार लाइन'या त्या काळच्या ब्रिटनमधल्या सगळ्यात गाजलेल्या कंपन्या.या दोन जहाज कंपन्यांमध्ये प्रचंडच चढाओढ चालायची.


कुनार्डनं १९०६ साली 'लुसीटानिया (Lusitania)'आणि १९०६ साली 'मॉरेटिनिया (Mauretinia)' अशी दोन जहाज सेवेत दाखल केली.या जहाजांनी आपल्या 'वेगानं सगळ्यांची मनं जिंकली.ॲटलांटिक समुद्र अतिशय वेगात पार करून या जहाजांनी एक रेकॉर्डच बनवलं. हे ऐकल्यावर 'व्हाईट स्टार लाइन कंपनीचा चेअरमन जे. ब्रूस इस्मे गप्प बसणं शक्यच नव्हतं. 'व्हाईट स्टार लाइनची जहाजं बनवण्याचं काम आयर्लंडमधल्या बेलफास्ट इथल्या 'हारलँड अँड वॉफ (Harland and Woff)' या जहाज कंपनीकडे होतं.या कंपनीचा मॅनेजर होता विल्यम पिरे (William Pirre). इस्मेनं आपल्या डोक्यातली कल्पना पिरेला ऐकवली.त्यावेळच्या जहाज कंपन्या आपल्या जहाजांचा वेग जास्त कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न करायच्या इस्मे आणि पिरे यांनी मात्र कुणी कल्पनाही करू शकणार नाही अशी आलिशान आणि भलंमोठी जहाजं बनवायचं ठरवलं.


१९०९ साली अशा एकूण ३ जहाजांवर काम सुरू होणार होतं.या तीन जहाजांची नावं होती ऑलिम्पिक,टायटॅनिक आणि ब्रिटॅनिक! थॉमस अँड्र्यूज यानं या तिन्ही जहाजांची डिझाइन्स बनवली होती. या जहाजांचा आकार त्या वेळी असलेल्या जहाजांपेक्षा मोठा असणार होता.त्यामुळे त्यांच्या बांधणीसाठी आता असलेल्या गँट्रीज (Gantris) लहान पडणार होत्या.मग आधी ६९ मीटर उंच इतक्या मोठ्या गॅट्रीज बनवल्या गेल्या आणि एका शेजारी एक अशा दोन जहाजांवर काम सुरू झालं.३१ मार्च

१९०९ रोजी ऑलिम्पिक जहाज बांधणीला सुरुवात झाली.त्यानंतर ३ महिन्यांनी टायटॅनिक बांधणीला सुरुवात झाली.३००० कामगार या कामाला लागले.त्या काळातलं सगळ्यात मोठं जहाज बनवायचा प्रयत्न चालू होता.त्यामुळे त्यात सगळंच भलंमोठं आणि वजनदार होतं. त्याच्या एका शिप अँकरचं वजनच मुळी १७५ टन होतं. हे जहाज बनवताना तब्बल ३ लाख खिळ्यांचा (rivet) वापर झाला. इतकं मोठं धूड चालवत न्यायचं म्हणजे इंधनही तितकंच लागणार.त्यासाठी २ मोठे स्टीम इंजिन्स बसवले गेले होते.आणि त्याला ऊर्जा देण्यासाठी २९ प्रचंड मोठ्या बॉयलर्सची सोय त्यात करण्यात आली होती.८८२.५ फूट उंच आणि ९२.५ फूट रुंद असलेल्या या जहाजावर १७५ फूट उंच असे ४ फनेल्स बसवण्यात आले होते.ऑलिम्पिक हे जहाजही आलिशान बनत असलं तरी त्याच्या मानानं टायटॅनिकमध्ये जास्त सुविधा होत्या. स्वीमिंग पूल,स्कॅश आणि टेनिस कोर्ट्स,जिम, टर्किश

बाथ् स,लायब्ररी,स्मोकिंग रूम्स, आलिशान खोल्या,

आलिशान डायनिंग रूम्स,साइडवॉक कॅफेसाठी एक खास डेक वगैरे अशा सुविधा देण्यात येणार होत्या.

ऑलिम्पिकपेक्षा जवळपास १०० एक जास्तीच्या फर्स्ट क्लास केबिन्स होत्या.इतकंच काय,पण या प्रवाशांना किनाऱ्यावरच्या आप्तांबरोबर संदेशांची देवाणघेवाण करता यावी यासाठी मार्कोनी टेलिग्राफ कंपनीचे दोन ऑपरेटर्सही सेवेत तैनात होते.


या जास्तीच्या सुविधांमुळे २६ महिन्यांनी टायटॅनिक तयार झालं,तेव्हा ऑलिम्पिकपेक्षा त्याचं वजन तब्बल १००० टन जास्त भरलं.त्याची निर्मिती होत असतानाच ते चर्चेचा विषय ठरलं होतं.सौंदर्य,भलामोठा आकार आणि आलिशान सुविधा याव्यतिरिक्त टायटॅनिक हे जहाज अजून एका गोष्टीमुळे चर्चेचा विषय बनलं होतं. 


ते कारण म्हणजे कंपनीनं जहाजाबद्दल केलेला अजब दावा.त्यांनी हे जहाज चक्क 'बुडू' च शकणार नाही असा दावा केला होता! यामागे कारणही तसंच होतं.टायटॅनिकच्या खालच्या बाजूला दोन थर होते.त्यातल्या एका थरात १६ मोठाले कप्पे (वॉटरटाईट कंपार्टमेंट्स) बनवले होते.यात पाणी शिरणार नाही अशी सोय करण्यात आली होती.


त्यामुळे वर जहाजाला काहीही नुकसान झालं तरी हे कप्पे बंद केले तर त्यात पाणी शिरणार नाही आणि जहाज बुडण्यापासून वाचेल अशी यामागची संकल्पना होती.वॉटरटाईट कंपार्टमेंट्स थेट जाऊन तसंच वरच्या डेकवरूनही नियंत्रित करता यावेत.यासाठी इलेक्ट्रिकचे दरवाजे बसवले होते.हे दरवाजे एक तर हाताने सरकवता येत होते किंवा जहाजाच्या ब्रीजवर असलेल्या स्वीचनं ते नियंत्रित करता येत होते.वॉटरटाईट कंपार्टमेंट्सच्या संकल्पनेवर कंपनीला पूर्ण विश्वास आणि अभिमानही होता!


टायटॅनिक देखणं करायचा पुरेपूर प्रयत्न केला गेला होता.अत्यंत सुंदर कोरीवकाम,नक्षीकाम, रंग अशांवर प्रचंड कष्ट घेतले गेले होते.फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना त्यांच्या ४ खोल्यांमध्ये जायला किंवा डायनिंग एरियामध्ये यायला एक अत्यंत देखणा आणि मोठा जिना होता.सुंदर नक्षीकाम केलेला हा जिना म्हणजे टायटॅनिकची शान होती.दिवसा कोणत्याही वेळेला नैसर्गिक प्रकाश येत राहण्यासाठी छपरावर काचेचं डोम तयार केलं होतं. फर्स्ट क्लासच्या प्रवाशांचा डायनिंग हॉलही खास बनवला होता.या हॉलला राजेशाही थाट होता.झुंबरं,गालिचे,

सिल्कचे पडदे,महागडं फर्निचर असं सगळं तर होतंच,शिवाय ऑर्केस्ट्राही होता.सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण,संध्याकाळचा चहा-नाश्ता आणि रात्रीचं जेवण असं सगळ्याची सोय फर्स्ट क्लास प्रवाशांसाठी केली गेली होती.त्यांना अनेकदा आपल्या आवडीप्रमाणे पदार्थ मागवता यायचे. सेकंड क्लासच्या प्रवाशांसाठीही अनेक सुविधा देण्यात आल्या होत्या.त्या जरी फर्स्ट क्लास प्रवाशांपेक्षा कमी असल्या तरी त्यांनाही आलिशान प्रवासाचा अनुभव घेता येईल इतक्या तरी त्या नक्कीच होत्या. 


थर्ड क्लास प्रवाशांसाठी सेकंड क्लासपेक्षा कमी सुविधा होत्या.पण त्या वेळी इतर जहाजांमध्ये मिळणाऱ्या सुविधांपेक्षा त्या नक्कीच जास्त होत्या.पण फर्स्ट क्लास प्रवाशांना मिळणारा पदार्थ निवडीचा पर्याय या दोन्ही क्लासेसना मात्र नव्हता.एकूणच अशा आलिशान जहाजातून प्रवास करणं हीच मोठी पर्वणी होती.


हे संपूर्ण जहाज तयार व्हायला तब्बल १५०००० डॉलर्स इतका खर्च आला होता ! इतकं भव्य जहाज याआधी कधीच बनलेलं नव्हतं.त्यामुळे टायटॅनिक तयार होण्याआधीच त्याच्याबद्दल चर्चा सुरू झाली होती.

वर्तमानपत्रांमध्ये त्याविषयी अनेकदा माहिती असायची.एकूणच ब्रिटनमधला प्रत्येकजण या जहाजाविषयी उत्सुक होता.


३१ मे १९११ रोजी पहिल्यांदा पाण्यात उतरलं. हा सोहळा पाहण्यासाठी लाखभर लोक जमा झाले होते.१० एप्रिल १९१२ रोजी २२४० प्रवासी आणि जवळपास ९०० क्रू सदस्यांना घेऊन इंग्लंडमधल्या साऊथहॅम्पटनहून न्यूयॉर्ककडे टायटॅनिक रवाना झालं. अनेक विद्वान,

उद्योजक,मोठे सरकारी अधिकारी, सेलेब्रिटीज इथपासून मध्यमवर्गीय आणि खालच्या वर्गातल्या अनेक जणांचा यात समावेश होता.टायटॅनिकमधले प्रवासी स्वतःला खूपच भाग्यशाली समजत होते.या जहाजाची जबाबदारी जहाज कंपनीचा जुना 


कॅप्टन एडवर्ड स्मिथ याच्यावर सोपवण्यात आली.एडवर्ड स्मिथ श्रीमंतांमध्ये बराच लोकप्रिय कॅप्टन होता.त्यामुळे त्याला 'मिलेनियर कॅप्टन' असंही म्हणत.


पण त्यांची वेळच चुकलेली होती.याचा त्यांना नंतर प्रत्यय येणार होता.टायटॅनिक निघालं खरं,पण काही अंतरावरच ते एका जहाजाला धडकताना थोडक्यात बचावलं आणि पुढे निघालं.


हा प्रवास एकूण आठवड्याभराचा असणार होता.फ्रान्समधल्या चेरबॉग (Cherboug) आणि व्कीन्सटाऊन इथं थांबा घेतल्यावर परत एकदा टायटॅनिक न्यूयॉर्कसाठी रवाना झालं.या वेळी प्रवाशांची/पत्रांची देवाणघेवाणही झाली. एकूण प्रवास छानच चालू होता.प्रवासी प्रवासात रमले होते.कोणी जहाजाच्या सौंदर्याचा,त्यातल्या सुखसुविधांचा आनंद लुटत होते, कोणी संगीताचा,कोणी पदार्थांचा,कोणी गप्पांचा आनंद लुटत होते.मुलं खेळण्यात दंग होती,तर जहाजावरचे कर्मचारी सगळ्यांना सेवा पुरवण्यात.हा सगळा माहोल पाहून कॅप्टनलाही अभिमान वाटत होता.यापुढे काही विपरीत घडणार आहे याची सुतराम शंकाही कुणाला नव्हती. 


१४ एप्रिल १९१२ रोजी रात्री ११:४० वाजता एका लुकआऊटला (क्रू सदस्याला) ओझरता हिमनग दिसला.त्यानं ताबडतोब विल्यम मर्डोकला ही खबर दिली.त्यानं धोका लक्षात घेऊन जहाजाला मागे नेण्याचे आदेश दिले आणि वॉटरटाईट कंपार्टमेंट्सची लिव्हर्स ओढले. या लिव्हरमुळे हे कप्पे बंद होतील असं त्याला वाटलं.ते कप्पे बंद झालेही.पण त्याला उशीर झाला होता.जहाज हिमनगाच्या बरंच जवळ आल्यावर हिमनग दिसल्यामुळे जहाजाचा मार्ग बदलायला थोडा उशीरच झाला होता.हे हिमनग दिसल्यापासून तब्बल ३७ व्या सेकंदाला जहाज त्या हिमनगाच्या जवळ आलं होतं. जहाज त्या हिमनगावर धडकलं मात्र नाही. ते हिमनगाला खेटून पुढे गेलं.त्या धडकेत बर्फाचा काही भाग डेकवर पडला.थोडक्यात बचावलो असं वाटल्यामुळे सगळेच निश्चिंत झाले.पण हिमनगामुळे जहाजाची खालची बाजू अनेक ठिकाणी चिरली गेली आहे हे त्यांच्या लक्षात यायला थोडा उशीरच झाला.या चिरांमुळे ६ वॉटरटाईट कंपार्टमेंट्समध्ये आधीच पाणी शिरलं होतं.या कप्प्यांमध्ये १० मिनिटांत तब्बल ७ फूट पाणी शिरलं होतं. 


खासकरून खालच्या मजल्यावरच्या प्रवाशांना जहाज कशालातरी आपटल्याची जाणीव झाली. त्यानंतर इंजिन्सही थांबल्याचं त्यांच्या आणि काही फर्स्ट तसंच सेकंड क्लासमधल्या प्रवाशांच्या लक्षात आलं.थोड्याच वेळात नेमकी परिस्थिती सगळ्यांच्याच लक्षात आली आणि एकच गोंधळ उडाला.नेमक्या सूचना न मिळाल्यानं या परिस्थितीत काय करायचं तेच कुणाला कळेना.


लाइफ बोट्स होत्या.पण त्या अपुऱ्या होत्या.

२४३५ प्रवासी आणि जवळपास ९०० क्रू सदस्य अशा ३३०० लोकांसाठी केवळ १६ जीवरक्षक नौका (लाइफ बोट्स),२ कटर्स आणि ४ कोलॅप्सेबल बोटी होत्या. तसंच ४० ते ६० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या २० बोटी होत्या. त्यावेळी एका जहाजाला कमीत कमी १४ लाइफ बोट्सची सोय करण्याचा नियम होता.पण टायटॅनिक जहाज इतर जहाजांपेक्षा प्रचंडच मोठं होतं आणि त्यात प्रवाशांची संख्या लक्षात घेता लाइफ बोट्सची संख्या अत्यल्प होती.बोटी घेतल्या तर टायटॅनिकच्या सौंदर्यात बाधा येईल असं निर्मात्यांना वाटत असल्यानं त्यांनी या गोष्टीकडे सपशेल दुर्लक्ष केलं होतं. 


या निष्काळजीपणाचा फटका आता प्रवाशांना भोगावा लागणार होता.कुणाला त्या लाइफ बोट्समध्ये बसवायचं याच्या सूचना क्रूला नीटशा मिळत नव्हत्या.आधी फर्स्ट क्लासच्या प्रवाशांना या बोटीमध्ये बसवावं असं ठरत होतं.नंतर फर्स्ट क्लास आणि सेकंड क्लासमधल्या सगळ्या बायका आणि लहान मुलं यांना वाचवावं आणि पुरुषांनी मात्र तात्पुरतं तरी जहाजातच राहावं असा विचार झाला.पण यातही प्रचंड गोंधळ उडाला.अनेक बोटींमध्ये क्षमतेच्या कितीतरी कमी प्रमाणात प्रवासी भरले गेले. हे होत असताना अनेक कुटुंबं एकमेकांपासून विलग झाली.

काही पुरुष सूचनांचं पालन न करता बोटीत चढले.या सगळ्यात 


थर्ड क्लासच्या प्रवाशांवर मात्र जास्त प्रमाणात अन्याय झाला.त्यांच्याकडे कुणीही लक्ष दिलं नाही.


नंतर काही पुरुषांनाही बोटीत बसवलं गेलं.पण अजूनही अनेक महिला आणि मुलं जहाजात अडकली होती.

त्यांच्यापर्यंत सूचना गेलेल्याच नव्हत्या.हा सगळा गोंधळ चालू असतानाच रात्री २:२० ला टायटॅनिकचे दोन भाग झाले.त्यातला एक भाग पाण्याखाली गेला आणि दुसरा ९० अंशात वर तरंगायला लागला.हे झालं तेव्हा जहाजावर तब्बल १००० प्रवासी अडकले होते!


टायटॅनिक बुडत होतं,तेव्हा अवघ्या १० मैलांवरून मालवाहतूक करणारं 'कॅलिफोर्नियन' हे जहाज जात होतं.टायटॅनिकचे सिग्नल्स त्यांना मिळाले होते.पण टायटॅनिकचा अपघात व्हायच्या काही मिनिटं आधीच कॅलिफोर्नियनमधल्या वायरलेस ऑपरेटरला झोप लागली होती.त्यामुळे हे जहाज वेळेवर मदतीला येऊ शकलं नाही.


…२९ डिसेंबर २०२२ लेखामधील पुढील भाग..