माझी ही सकाळी सकाळी कामाला जायची लगबग चालली होती.( सौ. मेघा ) ही फारच गडबडीत होती.तव्यामध्ये भाकरी टाकली. व काही तरी कामासाठी ती बाहेर निघून गेली. मी सकाळी कामाला जाण्याअगोदरच जेवतो ..!
भाकरी तव्यामध्ये होती.मी सुक्ष्मपणे,चिंतनशीलपणे त्या भाकरीकडे पाहत होतो. हळूहळू भाकरी करपून धुर यायला सुरू झाला. काही वेळापूर्व संपूर्ण,सर्वश्रेष्ठ,
प्रकाशमय अशा भाकरीमध्ये अमूलाग्र बदल होत होता.भाकरी संपूर्ण काळी पडून करपरली यावेळेस 'तिचे' आगमन झाले...!
'तुम्हाला काय झालयं...? ही भाकरी दिसत नव्हती का..? मला हाक तरी मारायची ..? माझ्या वाटणीची भाकरी करपली ? तुम्ही हे मुद्दाम केलं आहे.दिसत असूनही तुम्ही गप्प बसलात,अवघड आहे या माणसाचं ..!
मी शांत निवांत करपलेल्या भाकरीचं तत्वज्ञान समजून घेतलं भाकरीला माणसाचा हात लागला नाही.तर अनपेक्षित असा तिच्यामध्ये आश्चर्यकारक बदल होतो.तिच्या अस्तित्वामध्ये असण्यामध्ये चिरंतन फरक पडतो.बदलनं,जागा सोडनं,उत्क्रांत होणं.जीवनातील हेच अटळ सत्य आहे." मग सूक्ष्मपणे विचार केला कि मी कधी बदलणार...!
"असाच काहीसा प्रसंग माझ्या नजरेसमोरून गेला.जो हेन्री डेव्हिड थोरो यांच्या सर्वोत्तम जीवनाशी निगडित आहे." ( जो हेन्री डेव्हिड थोरो यांचे चरित्र या पुस्तकातील आहे.)
" दोन दिवसांपूर्वी मला मारिया मावशीने डॉ.चॅमर्सचे चरित्र वाचण्यास सांगितले.मी अर्थातच तसे काही वचन तिला दिले नव्हते.
कालच ती ओरडून शेजारच्या जेन मावशीला
( हिला कमी ऐकू येत असे ) सांगत होती,"काय माणूस आहे ! काल दिवसभर त्या बेडकांचे ओरडणे ऐकत उभा होता पण वाचायला सांगितली तर त्याच्याकडे चक्क दुर्लक्ष केलं त्याने...."
● विजय कृष्णात गायकवाड