* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एक छोटी घटना

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

एक छोटी घटना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
एक छोटी घटना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

१४/९/२२

एक छोटी घटना,जी बरचं काही सांगून जाते…

रात्र झाली होती. घोड्यावर स्वार होऊन एक प्रवासी समुद्राकडे निघाला होता.रस्त्याच्या कडेला एक खानावळ लागली. स्वार थांबला. घोड्यावरून उतरला. एका झाडाच्या बुंध्याला त्याने घोडा बांधला आणि खानावळीत प्रवेश केला.'समुद्र सफरीवर जाणाऱ्या सर्वांच्याच अंतकरणात माणसांवर विश्वास असतो. रात्रीच्या प्रहरांवर विश्वास असतो.'


मध्यरात्र झाली. सगळे जण गाढ झोपेत होते. एक चोर आला आणि त्यानं त्या प्रवासाचा घोडा पळवून नेला.


सकाळ झाली प्रवासी जागा झाला. त्याला दिसून आलं की आपला घोडा नाहीसा झाला आहे. त्याला फार वाईट वाटलं ' कोणातरी माणसाच्या मनात घोडा चोरावा असं येतं याचा त्याला मोठा खेद झाला‌‌. 'खानावळीत निवासाला असलेले एकामागून एक त्याच्या भोवती जमले आणि बोलू लागले‌


पहिला सहनिवासी म्हणाला " तबेल्या बाहेरच घोडा बांधलास हे मूर्खपणाच नाही काय ? "


दुसरा म्हणाला," घोड्याला पायबंद घातला नाहीस हे त्याहून मूर्खपणाच आहे."


तिसरा बोलला," समुद्रापर्यंत येण्यासाठी घोडा वापरावा हे खरंतर खुळेपणाचं आहे."


चौथा म्हणाला," खुशालचंद सुस्त माणसांना पायी चालायचं जीवावर येतं. अशी माणसं घोडी विकत घेतात."


सर्वांच सर्व ऐकूण प्रवाशाला फार अचंबा वाटला. तो म्हणाला," मित्रहो, माझा घोडा चोरीला गेला यात माझा अपराध कोणता ते सांगायला तुमच्यात अहमहमिका लागली आहे. पण काय आश्चर्य ! ज्यानं माझा घोडा चोरला त्याच्यावर कसलाही ठपका तुम्ही ठेवत नाही."


 ' द प्रॉफेट ' खलील जिब्रान यांच्या पुस्तकातून