* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: जाणून घेवू प्राण्यांबद्दल वेगळ असं काहीतरी..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड
Showing posts with label जाणून घेवू प्राण्यांबद्दल वेगळ असं काहीतरी... Show all posts
Showing posts with label जाणून घेवू प्राण्यांबद्दल वेगळ असं काहीतरी... Show all posts

11/25/22

जाणून घेवू प्राण्यांबद्दल वेगळ असं काहीतरी..

माकड,शेळी,बकरी,कुत्री हे आपल्या पिलांचा आवाज चार वर्षानंतरही ओळखतात व त्याला बिलगतात.


आता जाणून घेऊया कॉफीच्या व मोहाच्या शोधाबाबत..


कॉपी व मोहाचा शोध शेळ्या व मेंढ्यामुळे लागला आहे.मध्यएशियातील ही कहाणी आहे काही शतकांपूर्वीची एकदा एक मेंढपाळ आपल्या शेळ्या बकऱ्या घेऊन चरण्यासाठी घेऊन गेला होता.त्याचं चरणं चालू असताना त्याच्या शेळ्या मेंढ्यांनी एक फळ खाल्लं आणि त्या उड्या मारायला लागल्या त्यांच्यामधील असणारी एनर्जी,त्यांच्यामधील असणारा उत्साह अचानक वाढू लागला.आणि त्या सैरावैरा इकडे तिकडे धावत जावू लागल्या,आणि उड्या मारू लागल्या त्या मेंढपाळाला काय समजेना कोणता तरी विषारी पदार्थ खाल्ल्यामुळे काय तरी होते आहे का?असा त्याला प्रश्न पडला.पण याचे उत्तर थोडावेळ थांबल्या नंतर त्याला मिळाले.

असाच थोडा वेळ गेला.आणि नंतर त्यांचा तो उत्साह त्यांचे उड्या घेणे,थांबले,आणि त्या नेहमीप्रमाणे चरायला लागल्या.अशाप्रकारे दररोज ते फळ खाल्ल्यानंतर त्यांना असंच व्हायचं उड्या मारणं सैरावैरा पळण्याचा प्रकार वारंवार बघितला आणि शेवटी त्याने निरीक्षण केलं आणि ते फळ खाऊन त्याने स्वतः खावून बघितलं,त्यानंतर त्यालासुद्धा ते फळ खाल्ल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची ऊर्जा निर्माण झाल्यासारखी वाटली.आणि इथे कॉफीचा शोध लागला.


अशाच एका दिवशी हरणाने सहज मोहाची फुले खाल्ली आणि ती झिंगायाला लागली.असं दोन-तीन वेळा झाल्यानंतर माणसांनी त्याचं निरीक्षण केलं.आणि ती फुल स्वतः खाऊन बघितली आणि त्यांनाही तसेच वाटलं आणि या फुलापासून उत्तेजना निर्माण होते,झिंगायला होतं याचा त्यांना शोध लागला.तर अशाच शोधांमध्ये प्राण्याचीही भूमिका महत्त्वाचे असते.


या प्राणी जीवांच्या संवेदना,भावना, बुद्धिमत्ता,प्रेम ह्या काही वेळा स्वतः ला बुद्धिमान समजणारा 'माणूस' ही समजू शकत नाही.


एका ठिकाणी पोल्ट्री फार्म होता.ही घटना साधारणतःत्यावेळची आहे ज्यावेळी कॅमेरे नव्हते.या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंडी निर्मितीची प्रक्रिया चालायची.व ती अंडी योग्य ठिकाणी पोहोचवली जायची.यासाठी कर्मचारी वर्ग ही मोठा होता.बरेच दिवस सर्व काही सुरळीत चाललं होतं.आणि एक दिवस नोंद घेण्यासारखी घटना घडली.त्याचं झालं काय दिवसभरामध्ये जमलेली सर्व अंडी मोजून एकत्रितपणे क्रेटमध्ये व्यवस्थित लावली जायचीत.यासाठी विशिष्ट जबाबदार व्यक्ती होती.ती या सर्व गोष्टींची नोंद घेत असे.आदल्या दिवशी सायंकाळी मोजणी झाली.त्याची नोंदणी केली.दुसऱ्या दिवशी ती अंडी ठराविक ठिकाणी पोहोचवण्यापूर्वी आणखी एकदा खात्री करण्यात आली.तर त्यावेळी २०० अंडी कमी लागली.एक दोन अंड्यांचा फरक नव्हता.तर तो फरक होता तब्बल १०० ते २०० अंड्यांचा परत दुसऱ्या दिवशी नियमाप्रमाणे काम सुरू झाले. ते सायंकाळी बंद झाले.अंड्यांची मोजणी व नोंदणी झाली.दुसऱ्या दिवशी सकाळी परत मोजली असता २०० अंडी कमी पडलीत.या प्रसंगाने संबंधित व्यक्तीला घाम फुटला.त्याला काहीच कळेना.त्यांने ही गंभीर घटना वरिष्ठांना सांगितली.त्यांनाही आश्चर्य वाटले.संशयाने सर्व लोकांची कसून तपासणी करण्यात आली. या सर्व नियमाची शिस्तबद्ध पद्धतीने अंमलबजावणी होत होती. पण तिकडेही दररोज २०० अंडी गायब होत होती. संपूर्ण रात्र पहारे ठेवण्यात आले.स्टोअरवरही 'निगराणी' ठेवण्यात आली.


इतके सगळे करूनही ठोस असे कोणतेच कारण सापडेना.सगळ्यांनी विचार केला पण काही सूचेना,ज्यावेळी आपण सर्व विचार करतो. आणि आपल्याला काही सुचत नाही.त्यावेळी आपण म्हणतो, 'की ही काहीतरी भुताटकीची भानगड आहे.भुताटकी आली कि पोटात भीतीचा गोळा आलाच.


मग एकदा रात्री एक धाडस करायचं ठरवलं स्टोअरची रात्री तपासणी करून निरीक्षण करायचे ठरले.मग रात्री उशिरा स्टोअरमध्ये जावून लाईट लावून पाहीले.सर्वकाही व्यवस्थित होते.


मग त्यांनी एक 'वेगळा' विचार केला.दुसर्‍या रात्री अंधारात या कारणाचा शोध घेण्याचे ठरले. त्याप्रमाणे त्यांनी शोध घेतला. त्यावेळी अंधारात त्यांनी जे पाहिलं. ते पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.


त्यांनी अंधारात पाहीलं होत.दोन उंदीर हळूच बिळातून बाहेर यायचे.ज्या ठिकाणी अंड्याचा क्रेठ ठेवला होता.तिथेपर्यंत दोन उंदीर जायचे दोन पायांनी अंडी उचलून तिथेच जवळ असणाऱ्या टेबलावर ठेवून पायाने अंडी खाली सोडून द्यायचेत.अंडे खाली पडल्यानंतर फुटू नयेत. म्हणून विशिष्ट प्रकारचे मॅट खाली अंथरलेले असल्याकारणाने ती अंडी फुटत नव्हती.खाली पडलेली अंडी दुसरे दोन उंदीर ढकलत पुढे घेवून जात.तिथून पुढे दुसरे उंदीर अशी एक संपूर्ण टीम ((टीमवर्क म्हणजे काय अंडी फुटू नये म्हणून केले जाणारे काम याचे निरीक्षण उंदरानी केलेले होते.)त्यामुळेच हे काम हुशारीने नियोजन पध्दतीने ती करत होती.


ही काम करण्याची पद्धत ज्याला आपण टीमवर्क म्हणतो.त्या टिमवर्कचे काम हे उंदीर दिवसभर बघत असायचेत. त्याच पद्धतीने त्यानी हे काम केले होते. ही त्यांची ही काम करण्याची पद्धत (टिमवर्क) बघून त्यांची बुद्धिमत्ता पाहून सर्व लोकांना हसू आवरता आले नाही.


मग सावकाशपणे त्यांच्या बिळांचा शोध घेतला. आणि त्या ठिकाणी उकरले असता त्यांच्या बिळामध्ये शेकडो अंडी होती. काही फुटलेली, काही खाल्लेली तर काही तशीच पडलेली. त्यांची ती बिळे त्यांनी मुजवून टाकलीत. व या प्रकरणावर पडदा पडला. ही होती उंदरांच्या बुद्धिमत्तेची गोष्ट..!


दुसरी सत्य घटना आहे कोथरूडमध्ये घडलेली. असंच एक कुटुंब ज्या कुटुंबातील सर्व लोकं नोकरीनिमित्त घराबाहेर जायचे.प्रत्येक घरात फ्रिज हा असतोच तसा यांच्याही घरी फ्रीज होता.आणि त्यांनी फ्रिजमध्ये वरच्या बाजूला अंड्याच्या ट्रेमध्ये अंडी ठेवलेली असायची आणि एक दिवस अशी एक घटना घडली की ज्यामुळे त्यांना विचार करायला भाग पडलं पाच सहा अंडी होती त्यातील एक दोन अंडी ही मोकळीच होती.( त्यातील पिवला बलक गायब होता.) त्यांना आश्चर्य वाटलं अंड्याला कुठेही तडा गेलेला नाही,अंड कुठेही फुटलेले नाही वरचं कवच तळ व्यवस्थित आहे,मग आतला बलक कुठे आहे?असे प्रकार वारंवार घडायला लागले. त्यांनी याचा शास्त्रीय शोध घेण्यासाठी प्रयत्न केला पण उत्तर काय सापडेना ती नवीन अंडी आणून ठेवायचीत आणि दुसऱ्या दिवशी ती अंडी मोकळी असायचीत.आता गमंतीचा भाग सुरू होतो.एक दिवशी सुट्टी असल्यामुळे सर्वजण घरात होते. (मांजरीच्या हे लक्षात आले नाही.) आणि एक मांजर नेहमीप्रमाणेच तिथे आली तिने हळूच फ्रीजचा दरवाजा थोडाच उघडला आणि एका पायाने तो दरवाजा धरला आणि दुसऱ्या पायाच्या नखाने त्या अंड्यावर टक्क करुन एक लहान छिद्र पाडले आणि त्यातून बलग तिने ओढून घेतला.त्या मांजराने अभ्यासपूर्ण निरीक्षण केले होते,त्या घरातील लोकांची कामावर जाण्याची वेळ,फ्रीज कसा उघडतात तो कसा झाकतात कोणत्या ठिकाणी अंडे आहेत यातून तिने 'शिक्षण' घेतले होते.त्याचा न चुकता वापर करत होते.या प्रत्यक्ष बघितलेल्या घटनेमुळे त्यांना हायसे वाटले,या प्रश्नाचे अचूक उत्तरही सापडले आणि मांजरीच्या बुद्धिमत्तेचे कौतुकही त्यांना वाटले.


'निसर्गाची नवलाई' सतीश खाडे यांच्या पॉडकास्ट वरून…


★ विजय कृष्णात गायकवाड.