* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: 'जिवंतपणाची जाणीव करून देणारा अनुभव…

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

'जिवंतपणाची जाणीव करून देणारा अनुभव… लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
'जिवंतपणाची जाणीव करून देणारा अनुभव… लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

८/१०/२२

'जिवंतपणाची जाणीव करून देणारा अनुभव…

'एकदा आम्ही बांधवगडच्या जंगलात फिरत होतो. अचानक लंगुरने दिलेल्या कॉलवरून गाईडने जवळच वाघ-बिबळ्या असावा अशी खूण केली आणि आमच्या गाड्या थांबल्या... सर्वांचे कान कॉलच्या दिशेने टवकारले गेले. एक वाघीण डाव्या बाजूच्या बांबूच्या गचपणातून बाहेर पडली आणि रस्त्याकडे यायला लागली. मध्येच ती थांबली आणि मागे वळून बघितलं... मनाचा निर्णय न झाल्यासारखी तशीच थांबली आणि नंतर तिने हळूहळू समोरचा रस्ता ओलांडला, थोडी पुढे गेली आणि नंतर गवताच्या दाट पॅचमध्ये शिरून तिथेच रस्त्याकडे बघत मुरून बसली...एकूण वागणुकीवरून कळत होत की 'all is not well'...गाईड म्हणाला की ही बच्चेवाली वाघीण आहे.आणि गेल्या काही दिवसात तिला तिच्या बच्च्यांबरोबर बऱ्याच वेळेला या ठिकाणी बघण्यात आलंय... कदाचित तिचे बच्चे रस्त्याच्या अलीकडे असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण गाडी थोडी पुढे घेऊया... आम्ही गाडी फर्लांगभर पुढे घेतली आणि थांबलो. वाघिणीची नजर होतीच... बराच वेळ ती हलली नाही आणि मग मात्र ती गवतातून बाहेर पडली, परत रस्त्यावर आली,थांबली,आमच्या दिशेला बघत मिनिटभर उभी राहिली, आसपास काहीही धोका नाही याची खात्री पटल्यावर रस्ता ओलांडला आणि एकदा दोनदा 'आऽऽऊ, आऽऽऊ' असा दबक्या आवाजातील कॉल दिला (डरकाळी नव्हे). त्याक्षणी बांबूच्या गचपणातून दोन छावे बाहेर पडले आणि सावकाश वाघिणीपर्यंत आले. तिने त्यांचे अंग एकदा चाटले आणि मग तिच्या पावलावर पाऊल टाकून ते सर्व जण रस्ता ओलांडून गवताच्या दिशेला निघून गेले...'


काय झालं असावं ? मगाशीच या कुटुंबाचा रस्ता ओलांडण्याचा इरादा होता पण वाघीण रस्त्याच्या जवळ आली आणि आमची गाडी तिला दिसली त्यामुळे तिने पिल्लांना घेऊन रस्ता ओलांडणे रद्द केले. तिला त्यांच्या अस्तित्वाचं भांड फोडायचं नव्हत. तिने एकटीने रस्ता ओलांडला,वाट बघितली आणि आमची गाडी पुढे गेलीये आणि फारसा धोका नाहीये हे कळल्यावर ती परत रस्त्यावर आली. परत एकदा धोका नाही याची खात्री करून घेतल्यावर तिने विशिष्ट कॉल देऊन त्यांना बोलावलं. या प्रसंगात तिचा एक निराळा कॉल, वागणूक याचं निरीक्षणं अतिशय सुंदर अनुभव देणारं होतं...!


असा अनुभव आपल्याला मांजर पिलांना कशी बोलावते याचे निरीक्षण करून सुद्धा घेता येईल. कुत्रे, मांजर, पक्षी यांच्या बाबतीत देखील आपण पिल्ले आणि पालक यांच्यातील संवादाच्या वेळचे आवाजातील बदल नोंदवू शकतो.


 'अरण्यवाचन' या पुस्तकातून…विश्वास भावे