* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सप्टेंबर 2022

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

३०/९/२२

"मला 'मी' च बनायचं आहे!" हे जाणीपूर्वक सांगणारं पुस्तक .! द बायोलॉजी ऑफ बिलीफ

ज्या पाच लोकांच्या संगतीत तुम्ही असता त्या पाच लोकांच्या व्यक्तिमत्वाची 'सरासरी' म्हणजे तुम्ही असता.


जिम रॉन


माझ्यासोबत असणाऱ्या नेहमीच माझ्या जीवनामध्ये मला मार्गदर्शन करणाऱ्या सर्वांचा मनापासून आभारी आहे.


 मी 'शरीर' अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे या लेखकांचे पुस्तक वाचत होतो.या पुस्तकात शरीराबद्दल संपूर्ण माहिती शरीरातील अवयवांची त्या अवयवांचा लागलेला शोध खूपच प्रभावीपणे,सोप्या भाषेत सुरेख पद्धतीने लिहिले आहे.५५८ पानांचे हे पुस्तक मला माझ्या शरीररुपी चेहऱ्याची ओळख करून देत आहे,तेही जिव्हाळ्याने प्रेमाने,२७३ पाने वाचून संपली आहेत. याच पुस्तकातील मनोगतामध्ये आदरणीय लेखक अच्युत गोडबोले पान १९ वरती डायबेटीसच्या बाबतीत एका डॉक्टरांशी बोलत होते. तेव्हा त्यांनी विचारलं, " डायबेटिस न होण्याकरता काय करावं ? " तर त्यांनी उत्तर दिलं, " आधी तुम्ही डायबेटीस न झालेले आई-वडील निवडा ! " याचाच अर्थ, डायबेटीस ( मधूमेह ) ते डिप्रेशनपर्यंत आपल्याला होणारे कित्येक विकार हे आनुवंशिकतेमध्येच ( जेनेटिकली ) ठरलेले असतात.


हे वाचत असता काही दिवसांपूर्वी 'द बायोलॉजी ऑफ बिलीफ' हे पुस्तक वाचलं होतं. साकेत प्रकाशन यांनी प्रकाशित केलेले.ब्रुस एच.लिप्टन मुळ लेखक हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पेशीशास्त्रज्ञ आहेत. या पुस्तकाचा अनुवाद शुभांगी रानडे - बिंदू यांनी केला आहे.पुस्तकाची पाने २५३ आहेत.


अनुवंशशास्त्रांच्या आत्तापर्यंत रूढ असलेल्या वर्चस्वाचं गुपित उलगडणारे स्वतःला अनुवंशिकतेचा बळी मांनण्याच्या मानसिकतेला स्पष्ट धुडकावून लावणारे हे पुस्तक अत्यंत निर्भीड आणि नवी दृष्टी देणारे आहे.डॉ.लिप्टन यांच्या या प्रतिपादनासाठी त्यांनी क्वांटम जीवशास्त्रातील ठोस पुरावेही यात दिले आहेत. आपल्या मानसिक धारणाच आपलं आयुष्य घडवत असतात, ही माहिती डॉ.लिप्टन वाचकांना केवळ सांगतात असे नव्हे,तर अत्यंत शास्त्रशुद्ध विवेचनाद्वारे पटवूनही देतात. हे आपल्याला विचार करायला लावणारे, प्रेरणादायी पुस्तक आहे.असे ली पुलोस,Ph.D.A.B.P.P, युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबिया Miracles & Other Realities च्या लेखकांनी व इतरही सर्वोत्तम लोकांनी या पुस्तकाबद्दल सांगितले आहे.


एपिजेनेटिक्स हे नवं विज्ञान आपल्या वैयक्तिक आयुष्यावर, तसंच संपूर्ण मानव जातीच्या आयुष्यावर कसं परिणाम करतं या संशोधनाचे निष्कर्ष, आपल्या आत्तापर्यंतच्या जीवनाबद्दलच्या संकल्पनांनि आमूलाग्र बदलून टाकणारे आहेत. आपली जनुकं आणि डीएनए आपल्या आयुष्याचं नियंत्रण करीत नाहीत, तर पेशीच्या बाहेरच्या वातावरणातून येणाऱ्या संदेशामुळे डीएनएचे नियंत्रण होत असतं. पेशीबाहेरच्या वातावरणातून मिळणाऱ्या संदेशामध्ये आपल्या ( सकारात्मक किंवा नकारात्मक ) विचारांतून तयार होणाऱ्या उर्जातरंगाचाही समावेश असतो,असं लिफ्टने म्हणतात.


पेशी विज्ञान आणि क्वांटम फिजिक्सच्या आधारानं केलेलं संशोधन कमालीचं आशादायी आहे आणि त्याची सर्वत्र विज्ञान जगतातला क्रांतिकारी शोध, अशी प्रशंसा होत आहे. आपल्या विचारांना योग्य ते वळण देऊन आपल्या आयुष्यात बदल घडवता येतात असे हे संशोधन सांगतं.


पुस्तकाचे मलपृष्ठ आपल्याला पुस्तकाच्या मुख्य विषयाकडं घेऊन जातं.!


डॉ.लिप्टन यांना निसर्गाच्या सानिध्यात राहून करत असलेल्या विद्यादानातून जीवशास्त्र हे खरोखरीच एक जिवंत, चैतन्यमय आणि आपल्यात मिसळून गेलेलं विज्ञान आहे, पृथ्वीच्या कोठल्यातरी तुकड्यात अस्तित्वात असलेलं दूरस्थ विज्ञान नाही,याची खात्री पटली.


त्या कॅरेबियनच्या महाविद्यालयात शिकवताना निसर्ग आमच्या अवतीभवती होता.त्या बेटावरच्या सुंदर बागांसारख्या जंगलात शांततेने बसलेलो असताना आणि त्या नितळ पाण्यातल्या सुंदर प्रवाळ भिंतीचं निरीक्षण करताना, प्राणी आणि वनस्पती प्रजातींचं जीवन किती अद्भुतपणे मिसळून गेलं आहे, हे मला समजलं. या सर्वांचे निसर्गाने किती नाजूक संतुलन साधलेलं असतं, हे जाणवलं. केवळ प्राणी आणि वनस्पती यांचंच नाही, तर त्या सर्वांचं त्यांच्या सभोवतालच्या वातावरणाशी किती अचूक संतुलन असतं हे मला दिसून आलं.कॅरेबियन बेटांच्या त्या स्वर्गीय वातावरणात, निसर्गाच्या कुशीत बसून त्याचं निरीक्षण करताना मला तीव्रतेने जाणवलं की, आपण जे पाहत आहोत, तो जीवनाचा लढा ( Struggle for Life ) नाही,तर या सर्वांनी मिळून गायलेलं जीवनाचं मधुर गाणं आहे. डार्विनच्या प्रभावामुळे आपल्या जीवशास्त्रज्ञांनी निसर्गातल्या विविध प्रजातींमधल्या सहकार्याकडे काहीही लक्ष न देता, त्यांच्यातल्या लढ्यायाकडेच जास्त लक्ष केंद्रित केलं आहे, याची मला खात्री पटली.


शास्त्रज्ञ जेव्हा एखाद्या पेशीला शरीरापासून वेगळे काढून कृत्रिम स्थितीत प्रयोगशाळेत वाढतात तेव्हा ती लीलया तेथे जिवंत राहते वाढते. प्रत्येक पेशी काही विशिष्ट कार्यासाठी अस्तित्वात आलेली असते आणि तिच्या वाढीला उपयुक्त ठरतील अशा वातावरणाची ती जाणीवपूर्वक निवड करते आणि जे वातावरण तिला घातक ठरू शकेल ते ती जाणीवपूर्वक टाळतेसुद्धा. मानवाप्रमाणेच प्रत्येक पेशीसुद्धा आपल्या सभोवतालच्या वातावरणातील विविध प्रेरक घटक ओळखते, त्याचे विश्लेषण करते आणि मग स्वतः जिवंत राहण्याच्या दृष्टीने त्या घटकांना योग्य तसा प्रतिसाद देते.


इतकेच नाही तर आपल्या अवतीभवतीच्या वातावरणामुळे येणार्‍या अनुभवांचे स्मरणसुद्धा पेशी ठेवू शकते आणि पुढच्या पिढीच्या पेशींपर्यंत पोहोचवूही शकते. उदाहरणार्थ जेव्हा गोवराचे विषाणू एकाद्या बालकाच्या शरीरात प्रवेश करतात, जेव्हा त्या बालकाच्या शरीरातील एक अपरिपक्व प्रतिकारक पेशी त्याचा सामना करण्यासाठी पुढे येते. या विषाणूला प्रतिकार करेल असे प्रथिन,ज्याला प्रतिद्रव्य किंवा अँटीबॉडी असे म्हणतात, तयार करणे हे त्याचे काम असते.


या प्रक्रियेत सर्वात आधी या प्रतिकारक पेशीला असे एक जनुक तयार करावे लागते, ज्यामध्ये त्या विषाणूच्या प्रतिद्रव्याच्या रचनेचा आराखडा असेल. हे असे जनुक निर्माण करण्याची पहिली पायरी त्या अपरिपक्व प्रतिकारक पेशीच्या केंद्रकात घडते. या केंद्रकामध्ये डीएनएच्या रेणूंनी बनलेले असंख्य तुकडे असतात. असा प्रत्येक तुकडा म्हणजे एका विशिष्ट प्रथिनासाठीचा आराखडा असतो. डीएनएचे हे असंख्य तुकडे अनेक वेगवेगळ्या तर्‍हांनी एकमेकांशी जोडून,अपरिपक्व प्रतिकारक पेशी अनेक जनुके तयार करते. प्रत्येक जनुक एकमेव रचनेचे एक प्रतिद्रव्य तयार करू शकते. जेव्हा गोवराच्या विषाणूच्या रचनेला सुयोग्य असे प्रतिद्रव्य एखाद्या प्रतिकारक पेशीत तयार होते, तेव्हा ती त्या कार्यासाठी 'सुरू' होते. विषाणूंवर असलेले अँटिजन आणि त्यावर लागू पडणारु अँटीबॉडी यांची भौतिक रचना कुलूपकिल्लीच्या उदाहरणाने स्पष्ट होईल. प्रत्येक कुलपाला त्याची स्वतःचीच किल्ली उघडू शकते. तसेच प्रत्येक अँटिजेनला त्याची अँटीबॉडीच लागू पडते.


अशा रीतीने 'चेतलेल्या' प्रतिकारक पेशी अजून एका अद्भुत प्रक्रियेद्वारे,जिला 'आकर्षण परिपक्वता' असे नाव आहे, प्रतिद्रव्याच्या प्रथिनाचा आकार गोवराच्या विषाणूच्या अँटिजेनला अगदी चपलख लागू पडेल,असा बनवतात.( ली आणि सहकारी २००३,अँडम्स आणि सहकारी २००३.)


यानंतर सोमॅटिक हायपरम्युटेशन या गुंतागुंतीच्या प्रक्रियेद्वारे ही पेशी या नवीन जनुकाच्या शेकडो प्रति तयार करते. मात्र, प्रत्येक नवीन जनुकात किंचित वेगळ्या रचनेच्या प्रतिद्रव्याचा आराखडा असतो, जेणेकरून ते प्रतिद्रव्य किंचित वेगळ्या रचनेच्या अँटिजेनला लागू व्हावे. त्यानंतर ती प्रतिकारक पेशी असे जनुक निवडते, ज्याचे प्रतिद्रव्य गोवराच्या त्या विषाणूला तंतोतंत लागू पडते. हे निवडलेले जनुकसुद्धा सोमॅटिक हायपरम्युटेशन प्रक्रियेद्वारे अधिकाधिक अचूक प्रतिद्रव्य मिळेल, असा बदल स्वतःच्या रचनेत घडवून आणते. ( वू आणि सहकारी २००३,ब्लॅडन आणि स्टील १९९८,दियाज आणि कसाली २००२,गीअरहार्ट २००२.)


अशा रीतीने घडवलेले प्रतिद्रव्य गोवराच्या विषाणूवर चिकटून त्याला जणू कुलूपबंद,निष्प्रभ करते आणि प्रतिद्रव्य चिकटलेला विषाणू, शरीरातील लढाऊ पेशींना ओळखू येतो आणि त्या त्याचा झपाट्याने नाश करतात आणि ते बालक गोवरापासून वाचते, पेशी या विशिष्ट प्रतिद्रव्यांचे चांगलेच 'जनुकीय स्मरण' ठेवतात आणि भविष्यात जर कधी पुन्हा गोवराचा विषाणू शरीरात शिरला,तर त्याच्या प्रतिकारासाठी अचूक ती प्रतिद्रव्ये निर्माण करण्याची प्रक्रिया ताबडतोब सुरू होते. हे प्रतिद्रव्य निर्माण करणारी पेशी जेव्हा विभाजित होते, तेव्हा हे जनुक पुढच्या पेशींमध्ये पाठवले जाते. यावरून हे लक्षात येते की, गोवराच्या विषाणूबाबत पेशी केवळ 'शिकते'असे नाही, तर त्याचे 'स्मरणही' ठेवते, जे नवीन जनुकाद्वारे तिच्या पुढच्या पिढ्यांमध्ये नेले जाते. जनुकीय अभियांत्रिकीचा हा अद्भुत पराक्रम अत्यंत महत्वाचा आहे; कारण या वरून पेशींना पिढीजात 'बुद्धिमत्ता'असते,हे कळून येते. या बुद्धिमत्तेच्या मुळेच पेशी उत्क्रांत होऊ शकतात. (स्टील आणि सहकारी,१९९८)


पेशी इतक्यात चतुर चलाख असतात, यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. या पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती झाली तीच मुळी एकपेशीय सूक्ष्मजीवांचा रूपात पृथ्वी निर्माण झाल्यापासून साठ कोटी वर्षांमध्ये हे एकपेशीय सजीव अस्तित्वात आल्याचे पुरावे जीवाश्मांच्या अभ्यासातून मिळालेले आहेत.त्यापुढची सुमारे पावणेतीन अब्ज वर्षे पृथ्वीवर निरनिराळ्या एकपेशीय सजीवांचेच राज्य होते. यात बॅक्टेरिया,अल्गी आणि अमिबासारख्या एकपेशीय सजीवांच्या समावेश होतो.


सुमारे साडेसात कोटी वर्षांपूर्वी या एकपेशीय सजीवांनी अधिक चतुरपणा गाठला, तेव्हा प्रथम वनस्पती आणि प्राण्यांसारखे बहुपेशीय सजीव अस्तित्वात आले‌.हे सुरुवातीचे बहुपेशीय सजीव म्हणजे एकपेशीय सजीवांचे, एकमेकांशी सैलसरपणे जोडलेले मोठे समूहच होते.सुरुवातीचे असे हे समूह केवळ शेकडो किंवा हजारो पेशींचे, तुलनेने लहानच असे समूह होते. मात्र सातत्याने असे एकमेकांशी जोडून राहण्याचे उत्क्रांतीच्या दृष्टीने होणारे फायदे या चतुर पेशींना काही काळातच समजले आणि या ज्ञानाचा उपयोग करत,या पेशींना लक्षावधी,कोट्यावधी आणि अगदी अब्जावधींचे समूह करत, एकमेकांची सामंजस्यपूर्ण व्यवहार करणाऱ्या पेशींच्या संस्था उभारल्या. एका पेशीचा आकार अतिसूक्ष्म, मानवी डोळ्यांना न दिसणारा असला, तरी पेशींनी चतुरपणे जमवलेल्या या समूहांचा आकार डोळ्यांना न दिसणार्‍या एखाद्या ठिपक्यापासून ते एखाद्या मोठ्या कातळाएवढा असू शकतो.मानवी डोळ्यांना या सुस्थापित पेशीसमूहांचे जसे आकलन होते, त्यानुसार जीवशास्त्रज्ञांनी त्यांचे वर्गीकरण केले‌ जसे की,हा उंदीर,तो ससा,तो हत्ती.मानवी डोळ्यांना ससा,हा 'एक' सजीव म्हणून दिसत असला,तरी तो प्रत्यक्षात, अत्यंत सुसंगत आणि कार्यक्षम रीतीने एकमेकांशी जोडल्या गेलेल्या अब्जावधी पेशींचा समूहच असतो.


फारच गुंतागुंतीची सरळ साधी सोडवणूक करताना,काही बौद्धिक, वैचारिक मंथन घडवत वाचन सुरूचं असतं.


पुढे तर धक्काच बसला. डार्विन हा जरी आत्तापर्यंतचा सर्वात प्रसिद्ध उत्क्रांतीवादी शास्त्रज्ञ असला तरी उत्क्रांती हे वैज्ञानिक सत्य असल्याचे प्रथम दाखवून देणारा शास्त्रज्ञ होता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ जीन बाप्टिस्ट डी‌.लॅमार्क.अगदी डार्विनच्या सिद्धांताला विसाव्या शतकातील रेण्वीय अनुवंशशास्त्राची जोड देऊन 'निओडार्विनिझम' या सिद्धांताची रचना करणारा अनर्स्ट मेयर हा शास्त्रज्ञ सुद्धा लॅमार्कलाच उत्क्रांती सिद्धांताचा  जनक मानतो.मेयरने १९७० मध्ये लिहिलेल्या 'उत्क्रांती आणि जीवनाची विविधता' या पुस्तकात,लॅमार्क हाच उत्क्रांतीवादाचा जनक असल्याचे मत नोंदवले आहे.*


लॅमार्कने डार्विनच्या पन्नास वर्षे आधीच आपला सिद्धांत मांडला होता आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेबाबत त्याची मते डार्विनपेक्षा काहीशी मवाळ होती.लॅमार्कच्या मते सजीव आणि त्यांचे वातावरण, यांच्यातील 'सहकार्यपूर्ण' आणि 'निर्देशक' देवाण-घेवाणमुळे सजीवांना या गतिशील जगात जिवंत राहणे आणि उत्क्रांत होणे शक्य होते. आपल्या भोवतीच्या बदलत्या वातावरणाशी सजीव सातत्याने जुळवून घेतात आणि या दरम्यान त्यांच्या रचनेत होणारे उपयोगी बदल ते पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचवत राहतात. उक्रांतीबाबतचे लॅमार्कचे हे विचार आणि आजच्या आधुनिक पेशीशास्त्रज्ञांचे, शरीरातील प्रतिकारक संस्था त्यांच्या वागण्यानुसार कशा जुळते घेतात, याबाबतचे विचार,आश्चर्यकारकरित्या एकमेकांना अनुरूप आहेत. उत्क्रांतीसाठी शरीररचनेतील बदल होण्यास "फार मोठा कालावधी" लागतो,असेच लॅमार्कने म्हटले होते.


मात्र,"सजीवांना निर्माण करणाऱ्या तत्त्वाने, कोट्यवधी वर्षाच्या कालावधीत अधिकाधिक क्लिष्ट रचनेचे सजीव निर्माण केले आहेत" या आणि अशा विचारांवर लॅमार्कचा सिद्धांत आधारित आहे, असे आपल्या पुस्तकात लिहून जॉर्डानोव्हा,या शास्त्रज्ञाने जणू लॅमार्कला पाठिंबा दिला.


या दरम्यान झालेला त्रास, त्यांच्या सहकाऱ्यांनी या मताची केलेली टवाळी हि खुपचं मनाला लागते.


ब्रिटिश डॉक्टर फ्रँक रायन यांनी आपल्या, ( Ryan 2002, Page 16 ) 'डार्विन्स ब्लाइंड स्पॉट'या पुस्तकात जीवसृष्टीत 'सिंबायोटिक' म्हणजेच सहजीवी नातेसंबंध असतात.या अनुषंगाने उदाहरण दिले आहे. गोबी मासा आणि एक प्रकारचा शिंपला एकमेकांच्या सहाय्याने राहतात. शिंपला अन्न मिळवतो,तर गोबी मासा संरक्षण पुरवतो.'हर्मिट' खेकड्याची एक प्रजाती एका गुलाबी ॲनेमोन प्राण्याला स्वतःच्या कवचावर राहू देते. मोठे मासे ऑक्टोपस हर्मिट खेकड्याला खाऊ पाहतात,तेव्हा ॲनेमोन हा प्राणी आपले चमकदार रंगीत तंतू फिस्कारून त्यातील विष त्या शत्रूंवर उधळतो, त्यामुळेच त्या भक्षक प्राण्यांना हर्मिट खेकड्याचा नाद सोडून पळ काढावा लागतो,हे सर्वज्ञात आहे. या विलक्षण सुरक्षेबद्दल ॲनेमोनला खेकड्याने खाऊन उरलेले अन्न मिळते.जे त्याला पुरेसे असते.


अमेरिकेच्या ऊर्जा विभागाचे प्रबंधक डॅनियल ड्रेल यांनी 'सायन्स' या नियतकालिकासाठी बोलताना म्हटले होते की,"प्रजाती, म्हणजे काय, हे सुलभपणे सांगणे आता अवघड झाले आहे !" ( पेनिसी २००१ )


टोमॅटोच्या रोपातील एकाद्या जनुकात केलेला हस्तक्षेप केवळ त्या प्रजातीपुरता न राहता, पूर्ण सजीवसृष्टीवर परिणाम करणारे ठरू शकतो आणि तो परिणाम ही असा की, ज्याची आपण आता कल्पना करू शकत नाही. आत्ताच एका अभ्यासातून असे दिसून आले आहे की, जनुकीय फेरफार केलेले पदार्थ जेव्हा मानव खातो तेव्हा त्या खाद्यान्नातील कृत्रिम जनुके आतड्यातील उपकारक जिवाणूंमध्येही प्रवेश करतात आणि त्या जीवाणूंच्या गुणधर्मात बदल घडवतात. ( हेरिटेज २००४,नेदरवूड आणि सहकारी २००४ ) तसेच जनुकीय फेरफार केलेल्या प्रजाती आणि स्थानिक वनस्पती प्रजाती यांच्यात जनुकीय देवाण-घेवाण होऊन कोणत्याही प्रतिबंधक औषधाला दाद न देणार्‍या तण प्रजाती उत्पन्न झालेले आहेत.(मिलियन २००३,हेगुड आणि सहकारी २००३,देस्प्लांक आणि सहकारी २००२,स्टेशन्सवर आणि स्नो २००१)


सर्व प्रजातींमध्ये येनकेन प्रकारेण साहचर्य असते, हे सत्य न ओळखता आपण जनुकीय अभियांत्रिकीचे प्रयोग करत राहिलो, तर मनुष्यजातीच्या अस्तित्वालाच आपण धोक्यात घालू,असा इशारा आपल्याला जनुकीय उत्क्रांतीशास्त्रज्ञ देत आहेत.'एका प्राण्याला' मध्यवर्ती धरून रचल्या गेलेल्या डार्विनवादाच्या पलीकडे आपण पाहायला हवे,'सजीवांच्या समूहा' ला केंद्रस्थानी ठेवणारा सिद्धांत अंगीकारायला हवा. उत्क्रांती ही सर्वात प्रबळ सजीवाच्या जिवंत राहण्याशी निगडित आहे.इ.स.१९९८ मध्ये 'सायन्स' या नियतकालिकातील लेखात लेंटनम्हणतात,"उत्क्रांतीमध्ये सुट्ट्या, एकट्या जीवांच्या भूमिकेवर लक्ष देण्याऐवजी सगळ्या सजीवांवर आणि त्यांच्या भोवतालच्या वातावरणावर लक्ष केंद्रित करायला हवे, तेव्हाच कोणते गुण टिकणार आहेत आणि वर्चस्व गाजवणार आहेत, हे आपल्याला पूर्णपणे समजेल." टिमोथी लेंटन हे जेम्स लव्हलॉक या शास्त्रज्ञाने मांडलेल्या या सिद्धांताला अनुमोदन देतात. (गाया ग्रीक शब्दाचा अर्थ आहे पृथ्वी देवता.) या सिद्धांतामध्ये असा विचार मांडलेला आहे की, पृथ्वी आणि पृथ्वीवरची संपूर्ण सजीव सृष्टी यांना एकत्रितपणे एकच जिवंत प्राणी समजायला हवे. हा सिद्धांत ज्यांना मान्य आहे, असे शास्त्रज्ञ साहजिकपणे अर्थात या सर्वश्रेष्ठ प्राणीमात्रांचे, निसर्गाने कुशलपणे साधलेले संतुलन बिघडू शकेल, अशा कोणत्याही घटकाला कडाडून विरोध करतात. मग तो घटक जंगलतोड,असो

ओझोनच्या थराचा नाश असो किंवा जनुकीय अभियांत्रिकीच्या मदतीने सजीवांची जनुकीय रचना बदलणे हा असो. असा कोणताही घटक पृथ्वीसह सजीवसृष्टीच्या अस्तित्वाचाच घात ठरेल असे शास्त्रज्ञ मानतात.


ब्रिटनच्या राष्ट्रीय पर्यावरण संशोधन परिषदेने नुकतेच केलेल्या संशोधन वरील सिद्धांताला आधार देणारे आहे. (थॉमस आणि सहकारी २००४, स्टीव्हन्स आणि सहकारी २००४). पृथ्वीच्या इतिहासात आत्तापर्यंत पाच वेळा सजीवसृष्टीचा महासंहार घडून आल्याचे पुरावे सापडतात. हे सगळे संहार पृथ्वीच्या बाहेरच्या घटकांमुळे झाले, असे मानले जाते. जसे की धूमकेतूने पृथ्वीला दिलेली धडक. मात्र हल्लीच्या एका संशोधनातून असा निष्कर्ष निघाला आहे की, पृथ्वी सध्या सहावा महासंहार अनुभवत आहे.(लोवेल २००४) मात्र, यावेळच्या महासंहाराचे कारण पृथ्वीबाहेरचे नाही. या संशोधनात सहभागी झालेले जेरेमी थॉमस हे शास्त्रज्ञ म्हणतात,"आम्हाला विचाराल,तर सध्याचा हा महासंहार केवळ एका प्राण्यांमुळे होत आहे -  मानव."


हे पुस्तक म्हणजे माझ्यासाठी नवीन माहिती त्याच बरोबर धक्क्यावर धक्के देणारे केंद्रक होते. सगळीकडे आश्चर्य अचंबा, सर्व काही अविस्मरणीय


प्रत्येक वैद्यकीय विद्यार्थ्याला इतकं नक्कीच माहीत असतं, की मनाचा शरीरावर परिणाम होत असतो. काही लोकांना आपल्याला औषध मिळत आहे, या केवळ विश्वासाऩच बरोबर वाटू लागतं, हे या विद्यार्थ्यांना दिसून आलेलं असतं."हे औषध आहे, घे, म्हणजे बरे वाटेल,"असं डॉक्टरनं सांगून दिलेली गोळी घेतल्यावर त्या पेशंटला बरं वाटल्याची कित्येक उदाहरणं असतात. भले मग ती गोळी फक्त साखरेची का असेना! वास्तवात औषध नसलेला पदार्थ औषध समजून घेतल्यानंतर बरं वाटणं, याला वैद्यकीय भाषेत प्लॅसीबो परिणाम, असं म्हणतात. उर्जेवर आधारित असलेल्या PSYCH - K या मानसोपचार पद्धतीचा जनक असलेला लेखकांचा मित्र शास्त्रज्ञ रॉब विल्यम्स याला 'प्लॅसीबो परिणाम' म्हणण्यापेक्षा  'दृष्टीकोनाचा परिणाम'असं म्हणणं संयुक्तिक वाटतं.थोडक्यात हा 'धारणांचा परिणाम' मान्य केला जातो.


क्योटो विद्यापीठातल्या संशोधन संस्थेतल्या शास्त्रज्ञांनाही दिसून आलं आहे, चिंपांझी माकडांची पिल्लं केवळ त्यांच्या आईच्या वर्तणुकीचे निरीक्षण करूनच आयुष्याचे धडे शिकतात. केवळ आईचं निरीक्षण करून लहान पिलं/बालकं अनेक गुंतागुंतीच्या गोष्टी शिकू शकतात. त्यांना त्या पालकांनी प्रत्यक्ष समजावून द्यावे लागतातच असं नाही! (सायन्स २००१)


मानव जाती मध्ये सुद्धा असचं घडतं. पालकाची वर्तणूक, त्यांच्या धारणा आणि त्यांचे दृष्टिकोन त्यांच्या मुलांच्या सुप्त मनामध्ये कायमचे कोरले जातात. एकदा का ते असे सुप्त मनात कोरले गेले की, पुढच्या आयुष्यात तेच सगळ्या जीवनाचं नियंत्रण करतात. जर आपण त्यांना बदलण्याचा मार्ग शोधून काढला नाही, तर..


पालकांकडे पाहूनच मुलं सगळं शिकतात, ते ज्यांना अजून पटत नसेल त्यांनी त्यांच्या स्वतःच्या तोंडात बसलेले अपशब्द त्यांची मुलं पण वापरतात का नाही,ते आठवून पहावे. त्यांच्या मुलांनं तो अपशब्द पहिल्यांदा केव्हा उच्चारला, ते हे आठवून पहावं. व तो शब्द अगदी तुमच्याच स्टाईलनं बोलला असल्याचेही तुमच्या लक्षात आले असेल, अशी लेखकाने दिलेली खात्री मला खरच मनापासून खात्रीशीर वाटली.


(तसं तर कुठलंच मूल जन्माला येताना मनाची पाटी कोरी ठेऊन येतचं नाही, गर्भावस्थेत असताना ते काही गोष्टी ग्रहण करून मगच जन्माला आलेलं असतं.) दत्तक पालकांनी हे सत्य एकदा समजून घेतलं, की मग त्यांचं मुलांसह आयुष्य सोपे होईल, प्रसंगी मुलांच्या काही समजून ती बदलण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहेत, हे त्यांना कळेल आणि ते त्याप्रमाणे वागू शकतील.


अर्थातच मानवाला त्याच्या बालपणात काय हवं असतं, तर प्रेमानं केलेलं पालन पोषण आणि भरपूर लोकांचा सहवास, ज्यातून ते बालक चालणं बोलणं, रितीरिवाज शिकतं. अनाथालयातल्या बालकांना केवळ पाळण्यात ठेवून वेळच्यावेळी अन्न, पाणी, आणि औषध दिलं जातं, ते काम करणाऱ्या व्यक्तीच्या मनात या सगळ्यांबद्दल खूप प्रेम असेल असं नसतंच. त्या अश्राफ बालकांना कधी प्रेमळ हास्य मिठी किंवा गालावरचा पापा मिळत नाही, त्याच्या विकासात अतिशय गंभीर समस्या येतात.रोमानियातल्या अशा एका अनाथालयातल्या  मुलांचा अभ्यास मेरी कार्लसन यांनी केला. त्या हार्वढ वैद्यकीय महाविद्यालयातल्या मज्जाजैवशास्त्रज्ञ आहेत. प्रेमाचा स्पर्श न होता, केवळ अन्नपाणी देऊन वाढवलेल्या त्या मुलांची वाढ योग्य तऱ्हेनं न होतात खुटंली आणि त्यांचं वागणं सामान्य मुलांसारखं न राहता विचित्र झालं,असं त्यांना या अभ्यासातून दिसून आलं कार्लसन यांनी या अनाथालयातल्या काही महिने ते तीन वर्षे,या वयोगटातल्या साठ मुलांचा अभ्यास केला.या मुलांच्या लाळेतून त्यांनी त्यांच्या रक्तातलं कॉर्टिसोलचं प्रमाण तपासलं.ज्या मुलांच्या रक्तात कॉर्टिसोलची पातळी जास्त होती, त्यांच्या वाढीवर जास्त विपरीत परिणाम झाला, असं दिसून आलं.

( होल्डर १९९६.)


निकोलस कोपर्निकस या उत्तम राजकारणपटू आणि प्रतिभावान खगोलशास्त्रज्ञानं धर्मसंस्था आणि वैज्ञानिक यांच्या दरम्यान उभी रेघ मारून अध्यात्मापासून विज्ञान वेगळं केलं. कारण पृथ्वी नव्हे तर सूर्य मध्यभागी असतो आणि सूर्य पृथ्वीभोवती नाही तर पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा त्याचा महान शोध,धर्मसंस्थेच्या पचनी पडणे शक्यच नव्हतं.चर्चेच्या मते पृथ्वी हाच विश्वाचा केंद्रबिंदू होता.आपण हा शोध जाहीर केला,तर धर्मसंस्थेकडून आपल्यावर पाखंडी असल्याचा शिक्का बसेल आणि मृत्यूला सामोरं जावं लागेल,याची पूर्ण कल्पना असल्यानं कोपर्निकसनं हा महान शोध कित्येक वर्षे गुप्तच ठेवला. आपल्या आयुष्याची अखेर दिसू लागेपर्यंत त्यांनं हा शोध हुशारीने लपवला आणि आपली अखेर जवळ आली आहे,असं पाहताच तो प्रसिद्ध केला. त्याची ही चतुराई अत्यंत योग्य ठरली, असंच म्हणावं लागेल; कारण त्यानंतर सत्तावन्न वर्षांनी जिआर्डानो ब्रूनो,या डॉमिनिक धर्मगुरूनं जेव्हा धाडस दाखवून कोपर्निकसच्या या सिद्धांताला मान्यता जाहीर केली तेव्हा त्याला पाखंडी ठरवून चक्क जाळून टाकलं गेलं... कोपर्निकस खरंच हुशार म्हणायचा... कारण त्यानं आपला शोध मरणाआधी जाहीर केल्यानं त्याला पाखंडी ठरवून त्याचा छळ करण्याची धर्मसंस्थेची संधी हुकली."थडग्यात जाऊन छळ करणं त्यांना शक्य झालं नाही !" शोधकर्ताच मरण पावल्यानं त्या शोधाचा सामना धर्मसंस्थेला करावा लागला.


जाता जाता


तुम्ही संध्याकाळी तुमच्या बागेत बसता आणि सूर्यास्त पाहता. त्यावेळी तुम्हाला आकाश रंगीबेरंगी दिसतं आणि ते तुम्हाला आवडतं.आता हे रंग कशामुळे उद्भवतात, तर हवेच्या प्रदूषणामुळे, जितकी हवा प्रदूषित तितके सूर्यास्ताच्या वेळी जास्त रंग दिसतात. मानवाने आपले उद्योग असेच सुरू ठेवले तर आपली पृथ्वी आपल्याला याहूनही जास्त रंगाची उधळण असलेले सूर्यास्त दाखवेल,हे नक्की.


माझा 'स्व' हा वातावरणात अस्तित्वात असतो, माझं शरीर अस्तित्वात असो की नसो. टीव्हीचं उदाहरण घेऊन बोलायचं तर माझं शरीर बंद पडलं आणि भविष्यात असं एक मूल (जैविक टिव्ही सेट) जन्माला आलं,ज्याची सेल्फ रिसेप्टर प्रथिनं अगदी तंतोतंत माझ्या आधीच्या शहराच्या सेल्फ रिसेप्टर प्रथिनांसारखी असतील,तर ते नवं मूल माझा 'स्व' वातावरणातून उतरवून घेईल. मी या जगात पुन्हा अवतरेन. माझा शरीराचा टीव्ही मेला, तरी माझ्या 'स्व' चं प्रक्षेपण हवेत असतंच.माझं 'स्व' त्व ही माहितीच्या प्रचंड साठ्यांनं बनलेल्या वातावरणात अस्तित्वात असलेली माझी सही आहे. शरीर मेलं तरी आपला 'स्व' वातावरणात अस्तित्‍वात असतोच.'स्व' चे सिग्नल्स वातावरणात निरंतर अस्तित्वात असतात, ते अमर असतात. आपण सगळेच या तर्‍हेनं अमर आहोत. वातावरण म्हणजे सर्वेसर्वा, तो परमात्मा आणि आपल्या सेल्फ रेस्पेक्ट अँटेना त्या पूर्ण वर्णपटातला एक लहानसा पट्टा डाऊनलोड करून घेतात. आपण त्या परमात्म्याचा एक लहानसा अंश आहोत.


हे पुस्तक स्वतःबद्दल सांगत आणि जाता जाता मला एका पुस्तकाची आठवण करून जातं जे आमचे परममित्र आहेत डॉ.रवींद्र श्रावस्ती लिखित"मृत्यू सुंदर आहे ?"


निष्प्रेम आयुष्याला काही अर्थ नसतो, प्रेम म्हणजे जीवनाचं जल ते ह्रदयानं आणि आत्म्यानं पिऊन घ्या


या नाविन्यपूर्ण जीवन जगण्याचा दृष्टीकोनातून जीवन दाखवणार्‍या पुस्तकाचे,लेखकांचे सर्वांचे मनपूर्वक आभार व धन्यवाद..

२८/९/२२

'असण्याची जाणीव करून देणारा अनुभव…'

'एकदा आम्ही बांधवगडच्या जंगलात फिरत होतो. अचानक लंगुरने दिलेल्या कॉलवरून गाईडने जवळच वाघ-बिबळ्या असावा अशी खूण केली आणि आमच्या गाड्या थांबल्या... सर्वांचे कान कॉलच्या दिशेने टवकारले गेले. एक वाघीण डाव्या बाजूच्या बांबूच्या गचपणातून बाहेर पडली आणि रस्त्याकडे यायला लागली. मध्येच ती थांबली आणि मागे वळून बघितलं... मनाचा निर्णय न झाल्यासारखी तशीच थांबली आणि नंतर तिने हळूहळू समोरचा रस्ता ओलांडला, थोडी पुढे गेली आणि नंतर गवताच्या दाट पॅचमध्ये शिरून तिथेच रस्त्याकडे बघत मुरून बसली...एकूण वागणुकीवरून कळत होत की 'all is not well'...गाईड म्हणाला की ही बच्चेवाली वाघीण आहे.आणि गेल्या काही दिवसात तिला तिच्या बच्च्यांबरोबर बऱ्याच वेळेला या ठिकाणी बघण्यात आलंय... कदाचित तिचे बच्चे रस्त्याच्या अलीकडे असण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण गाडी थोडी पुढे घेऊया... आम्ही गाडी फर्लांगभर पुढे घेतली आणि थांबलो. वाघिणीची नजर होतीच... बराच वेळ ती हलली नाही आणि मग मात्र ती गवतातून बाहेर पडली, परत रस्त्यावर आली,थांबली,आमच्या दिशेला बघत मिनिटभर उभी राहिली, आसपास काहीही धोका नाही याची खात्री पटल्यावर रस्ता ओलांडला आणि एकदा दोनदा 'आऽऽऊ, आऽऽऊ' असा दबक्या आवाजातील कॉल दिला (डरकाळी नव्हे). त्याक्षणी बांबूच्या गचपणातून दोन छावे बाहेर पडले आणि सावकाश वाघिणीपर्यंत आले. तिने त्यांचे अंग एकदा चाटले आणि मग तिच्या पावलावर पाऊल टाकून ते सर्व जण रस्ता ओलांडून गवताच्या दिशेला निघून गेले...'


काय झालं असावं ? मगाशीच या कुटुंबाचा रस्ता ओलांडण्याचा इरादा होता पण वाघीण रस्त्याच्या जवळ आली आणि आमची गाडी तिला दिसली त्यामुळे तिने पिल्लांना घेऊन रस्ता ओलांडणे रद्द केले. तिला त्यांच्या अस्तित्वाचं भांड फोडायचं नव्हत. तिने एकटीने रस्ता ओलांडला,वाट बघितली आणि आमची गाडी पुढे गेलीये आणि फारसा धोका नाहीये हे कळल्यावर ती परत रस्त्यावर आली. परत एकदा धोका नाही याची खात्री करून घेतल्यावर तिने विशिष्ट कॉल देऊन त्यांना बोलावलं. या प्रसंगात तिचा एक निराळा कॉल, वागणूक याचं निरीक्षणं अतिशय सुंदर अनुभव देणारं होतं...!


असा अनुभव आपल्याला मांजर पिलांना कशी बोलावते याचे निरीक्षण करून सुद्धा घेता येईल. कुत्रे, मांजर, पक्षी यांच्या बाबतीत देखील आपण पिल्ले आणि पालक यांच्यातील संवादाच्या वेळचे आवाजातील बदल नोंदवू शकतो.


 'अरण्यवाचन' या पुस्तकातून…

लेखक - विश्वास भावे

२६/९/२२

वैज्ञानिक जीवन सत्य उलगडणारे पुस्तक जादूई वास्तव (द मॅजिक ऑफ रिॲलिटी)

लेखक ज्या हेतूने एखादे पुस्तक लिहितो,ज्या आत्मीयतेने लिहितो त्या आत्मीयतेने वाचकाने ते वाचले पाहिजे. बरं ज्या भाषेत ते लिहिले आहे नुसती ती भाषा येऊन चालत नाही. कारण बोलीभाषा आणि लिखित भाषा याच्यात बरेच अंतर असते. कानावर पडणारी भाषा आणि डोळ्यासमोर येणारी भाषा यात महदंतर असते. एक औटघटकेची असते. तिच्यात क्षणाक्षणाला बदल होत असतात. ती आपण आवाज आणि जिभेच्या सहाय्याने शिकतो. त्याबाबतीत आपल्यात आणि जनावरांमध्ये फारसा फरक नाही कारण ती आपण आपल्या आईकडून नकळत उचलतो. दुसरी मात्र बरीच परिपक्व असते,अनुभवसिद्ध असते.पहिली जर आपली मातृभाषा असेल तर ही पितृभाषा आहे असे म्हणावे लागेल.


आपण शारीरिक आजारांवर पैसे खर्च करतो पण मानसिक आजारावर नाही किंवा असे म्हणूया की मानसिक आजार होऊ नये म्हणून कसलीही उपाययोजना करीत नाही. वाचन हा त्या उपाय योजनेचा एक भाग आहे.एखादा पूल बांधला नाही तरी चालेल. आपण नदीला वळसा घालून जाऊ शकतो. पण ज्या अज्ञानाच्या लाटांनी आपल्याला वेढले आहे, ती अज्ञानाची खाई पार करण्यासाठी सगळे मिळून त्याच्यावर एखादी तरी कमान बांधूया !..


प्रकाशाचा वेग इतका प्रचंड आहे की सहसा घटना घडल्याक्षणीच आपल्याला दिसलेली आहे असे आपण समजतो. पण दूरदूरच्या ताऱ्याकडून येणाऱ्या प्रकाशांच काय? सूर्याचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहचायला आठ मिनिटे लागतात.म्हणजे उद्या सूर्याचा स्फोट झाला. तर या सत्याची जाणीव होईपर्यंत मधे आठ मिनीटं गेलेली असतील ! पण तोपर्यंत आपण संपलेले असू सूर्यानंतर आपल्याला जवळचा तारा म्हणजे प्रॉक्झिमा सेंटॉरी.! याच्याकडून येणारा उजेड आपल्या पर्यंत पोहोचायला चार वर्षे लागतात.( म्हणजेच हा आपल्या पासून चार प्रकाशवर्ष दूर आहे ) आज (२०१६ दुर्बिणीतून दिसणारं त्याचं रूप हे २०१२ सालीचं असणार आहे. आपण मिल्की वे नावाच्या आकाशगंगेच्या किनारी राहतो. आकाशगंगा म्हणजे तारकांचे पुंजके.आपल्या सगळ्यात नजीकची आकाशगंगा आहे.


ॲण्ड्रोमेडा,अडीच कोटी प्रकाशवर्ष दूर ! म्हणजे आज इथून दिसणारी ॲण्ड्रोमेडाची छबी ही तिची अडीच कोटी वर्षापूर्वीची अवस्था आहे तर. म्हणजे काळयंत्रात बसून उलटा प्रवास केल्यासारखं आहे हे.


हबल दुर्बिणीतून आपल्याला स्टीफनची पंचकडी नावाची,एकमेकांसी टकरा घेणाऱ्या पाच आकाशगंगाची मालिका दिसते. पावणेतीन कोटी प्रकाश वर्ष अंतरावर आहे ही.आज जे आपल्याला दिसतयं ते तिथे पावणेतीन कोटी वर्षांपूर्वी घडलं होतं.तिथे जर कुणी परग्रहवाशी असतील आणि जर त्यांच्याकडे शक्तिशाली दुर्बीण असेल आणि आज त्यांनी पृथ्वीकडे पाहिलं तर त्यांना आपण नाहीच दिसणार,त्यांना दिसतील पावणेतीन कोटी वर्षांपूर्वीचे आपले 'डायनासोर भाईबंद'


अचंबित करणारे हे वास्तव कथन वाचून मी किती क्षुद्र जीव आहे याची मला प्रखरपणे जाणीव झाली.


तुम्हाला आश्चर्य वाटेल पण "पहिला"असा कुणी माणूस नव्हताच. कारण ज्याला "पहिला" म्हणाव, त्याला आई-बाप असणारच आणि तेही 'मानव' असणार ! माणसाचंच कशाला,सशांचही असचं आहे. पहिला ससा, असा कधी नव्हताच, ना होती पहिली मगर, ना होता पहिला चतुर, जन्मलेला प्रत्येक जीव आप-आपल्या आई-बाबांच्याच जातीचा (Species) होता. (काही अति दुर्मिळ अपवाद येथे जमेस धरलेले नाहीत.) आई- बाबांसारखा होता म्हणजे आजी-आजोबांचा सारखा असणारच,म्हणजे पणजोंबासारखाही असणार तो.असं मागे मागे अखंडपणे चालूच.जीवशास्त्र असं शिकवतं की होमो सेपियन आणि होमो इरेक्टस यांचा संकर होऊ शकत नाही.हे विज्ञान सत्य समजलं


आपले पुरातन पूर्वज होते कोण आणि कसे हे कळलं कसं आपल्याला? जीवाश्मावरून जीवाश्म हे 'अश्म' म्हणजे दगड असतात. मृत प्राण्यांच्या, वनस्पतींच्या आकारात आपोआप तयार झालेले हे दगड,बहुतेक जीव जीवाश्म न बनताच नष्ट पावतात. जर तुम्हाला जीवाश्म बनायचे असेल तर सुयोग्य अशा मातीत, गाळात तुम्ही मरायला हवं. ह्या गाळाचे खडक (स्तरीय खडक) होतील तेव्हा तुम्ही जीवाश्म व्हाल... ह्या ठिकानी मी अंगभर शहारलो.


आता आपण जाऊ प्राण्यांच्याकडे अनेक मिळत्याजुळत्या प्रजातींची एक 'फॅमिली' (कुटुंब) बनते.'Felidac' ही मार्जार फॅमिली. यामध्ये आहेत सिंह, बिबटे, चित्ते, वाघ आणि (वाघाची मावशी) मांजरे वगैरे. अनेक फॅमिल्या मिळून बनते एक 'ऑर्डर' (गण) कुत्र, मांजर, अस्वल, मुंगूस, तरस हे सारे कार्निव्होरा ह्या 'ऑर्डर' चे पण वेगवेगळ्या फॅमिलीचे 'प्रायमेट' ही सुद्धा एक ऑर्डरच आहे. यात 'एप्स' आहेत. (आपण एप्सचा उपप्रकार म्हणून आहोत.),माकडे आहेत, लेमूर माकडे आहेत; असे भिन्न भिन्न फॅमिलीतील भिन्न प्राणी आहेत. अनेक ऑर्डरचा मिळून 'क्लास' (प्रगण) होतो. सर्व सस्तन प्राणी हे 'मॅमेलीया' ह्या क्लासचे आहेत.ही माहिती वाचून माझी उत्कंठा शिगेला पोहोचली होती.


आता विश्व माझ्याशी बोलत होते. विश्व बनलं आहे अणूंचं. सोन्याचा अणु हा सोन्याचा सर्वात छोटा तुकडा. हा पुढे विभागाला तर आता त्यात सोन्याचे गुणधर्म राहणार नाहीत. जी गोष्ट सोन्याची तीच लोहाची, आणि इतर मूलद्रव्यांची. एकाच प्रकारच्या अणूनी बनलेल्या पदार्थांना मूलद्रव्य म्हणतात. लोह,तांबे सोनं,चांदी यासारखे धातू ; ऑक्सिजन,हायड्रोजन,नायट्रोजन यासारखे वायूही मूलद्रव्यं आहेत.मॉलीब्डीनम् हे अगदी दुर्मिळ मूलद्रव्य आहे. इतक की कदाचित तुम्ही हे नाव ही ऐकलं नसेल. पण ते दुर्मिळ आहे इहलोकी, पृथ्वीवर. विश्वात इतरत्र ते विपुल प्रमाणात आढळतं. अशी सुमारे १०० मूलद्रव्य आहेत. पैकी निसर्गत: ९० आढळतात. बाकीची अगदी अल्प प्रमाणात,निव्वळ कृत्रिमरीत्या निर्माण केलेली आहेत.


पृथ्वीवर मिथेन (गोबर गॅस) हा वायूरूप आहे. पण शनीच्या, टायटन नामे उपग्रहावर, इतकी थंडी आहे की हा गॅस तिथे द्रवरूपात आहे. गोबरगॅसचे समुद्र आहेत तिथे. आणखी थंड ग्रहावर गोबरगॅसचे खडक असणेही शक्य आहे. पारा हा आपल्याला द्रव्य म्हणून माहित आहे. पण टुंड्रा प्रदेशाच्या थंडीत पार्‍याचा दगड व्हायला वेळ लागणार नाही.घनरूप लोखंड तापवलं तर त्याचा रस होतो. पुरेशी उष्णता दिली तर त्याची वाफही होईल. पृथ्वीच्या पोटात खोल खोल इतके उच्च तापमान आहे की तिथे लोहाचा (आणि निकेलचा) रसच आहे. कुणी सांगावं, एखादा अतितप्त ग्रह असेल सुद्धा, त्याच्यावर लोखंडाचे रसाचे सागर उसळत असतील आणि यात सुखाने पोहणारे काही जीवही असतील.!


असे या पुस्तकातील पानापानावर मला नवीन आश्चर्यकारक सत्य धक्के बसत होते.


सूर्य आकाशात पूर्वेकडून पश्चिमेला जात नसून पृथ्वी स्वतःभोवती फिरते. त्यामुळे सूर्यभ्रमणाचा आभास फक्त निर्माण होतो. पृथ्वी स्वतःच्या आसाभोवती फिरते आहे. आस म्हणजे जणू उत्तरध्रुवा पासून दक्षिण ध्रुवापर्यंत आर पार जाणारा एक दांडा आहे असं समजायला हरकत नाही. या भोवती पृथ्वी फिरते आहे.फिरताना पृथ्वीला धक्के बसत नाही तर,त्यामुळे ती फिरते आहे हे लक्षात येत नाही. पृथ्वी फिरते, तिच्यावरचे आपण फिरतो,आपल्या भोवतीचं वातावरण ही त्याच गतीनं फिरत असतं. तसं नसतं तर पृथ्वीच्या वेगाने वाहणारे, म्हणजे ताशी काही हजार किलोमीटरने वाहणारे वारे आपल्याला सतत जाणवले असते. हे अर्थात विषुववृत्तापाशी,जसे जसे आपण ध्रुवांकडे सरकतो तसा तसा पृथ्वीचा वेग कमी होतो. ध्रुवांजवळ आसाभोवती एक चक्कर मारायला तास चोवीसच, कापायचं अंतर कमी. विषुववृत्तापाशी केवढी तरी मोठी चक्कर,ध्रुवाजवळ अगदी छोटी चक्कर,यामुळे ध्रुवाजवळ पृथ्वीचा फिरण्याचा वेग कमी असतो. पृथ्वी एका लयीत फिरत असते (धक्के नाहीतच) आणि वातावरणही तिच्याबरोबर फिरत असतं, त्यामुळे आपण फिरतोय हे आपल्याला जाणवतच नाही एखाद्या स्थिर वस्तूकडे बघितलं (रेल्वेतून प्लॅटफॉर्मकडे) तरच आपली हालचाल आपल्याला समजेल. अशा स्थिर वस्तू म्हणजे सूर्य आणि तारे पण आपल्याला वाटतं,हिच मंडळी आभाळात घिरट्या घालत आहेत.आपण स्थिर आहोत आणि प्लॅटफॉर्म सरकायला लागला आहे, असं समजण्यासारखं आहे हे. दृष्टीभ्रम तो हाच.. अशा अनेक वैज्ञानिक अवघड गोष्टी मला सरळ साध्या भाषेमध्ये दाखवलेल्या दिसत होत्या. काही काही वेळा मी अवकाश प्रवास केल्यासारखे मला जाणवत होते.


कथेनुसार दक्षिण आणि मध्य अमेरिकेत, स्पॅनिश पोहोचण्यापूर्वी (सोळाव्या शतकापूर्वी), इंका,अझ्टेक (मायन संस्कृती नंतर मला नवीन समजलेली संस्कृती) अशा महान संस्कृती नांदत होत्या. हे सारे लोक सूर्योपासक होते.ॲन्डीजनिवासी इंका लोक स्वतःला चंद्र-सूर्याचे वंशज समजत. मेक्सिकोतल्या ॲझ्टेक संस्कृतीत आणि त्याहीपूर्वी माया संस्कृती, सूर्यदेव आहेच. 


सूर्याला खूष करण्यासाठी विविध बळी, भोग, प्रसाद, हवि, नैवद्य दाखवले जायचे. पण सूर्य देवाचा लाडका नैवद्य म्हणजे ताजंताजं, अजूनही फडफडणारं, मानवी ह्रदय,लढाया व्हायच्या त्या मुख्यत्वे युद्धबंदी मिळवण्यासाठी, म्हणजे मग एकेक करून त्यांचं हृदयार्पण करणं सोप्प. पिरॅमिडच्या टोकाशी, एका उंच उंच वेदीवर हा ह्रदयार्पण सोहळा चालायचा. सूर्याच्या तेवढंच जवळ, ॲझ्टेक, माया आणि इंका संस्कृतीत हे पिरॅमिड बांधायचे तंत्र चांगलंच विकसित झालं होतं. 


सूर्य हा तारा आहे. इतर अनेक ताऱ्यांप्रमाणे हा एक,फक्त आपल्या खूपच जवळ आहे. नुसता जवळ नाही अगदी खेटूनच आहे आपल्याला,त्यामुळे तो आपल्याला इतर सूर्याच्या मानाने खूप मोठा आणि तेजस्वी दिसतो. तो जवळ असल्यामुळे त्यांची तीव्र उष्णता आपल्याला भाजून काढते, कडक उन्हाने रापून जाते त्वचा, थेट त्याकडे पाहिलं तर डोळे जातात आपले,इतरांपेक्षा जवळ म्हणजे किती जवळ, ह्याच आकलन होणे अवघड आहे. विश्वाच्या पसाऱ्याचं आकलन,अवघड नाही अशक्य आहे असं म्हटलं तरी चालेल. अशा या सूर्याला माझा बसल्या ठिकाणाहून नमस्कार


साडेतीनशे वर्षांपूर्वी न्यूटनने असं पाहिलं की पांढरा रंग म्हणजे सप्तरंगाचे मिश्रण आहे. (या सप्तरंगासारखं न्यूटनचं कर्तुत्व ही सप्तरंगी आहे) वर्णपटाबरोबरच त्याने इतर अनेक शोध लावले कल्पना मांडल्या.


 प्रकाश म्हणजे भौतिक शास्त्राच्या दृष्टीने सर्व रंगाचे मिश्रण,हवेतून काचेत शिरताच प्रकाश किरण वाकतात, ह्याची ही किमया,कोणत्याही पारदर्शक पदार्थातून आरपार जाताना,अगदी पाण्यातूनही जाताना प्रकाश किरण वाकतात. त्यांचे अपवर्तन होते,अपवर्तनामुळे पाण्यात बुडालेला वल्ह्याचा भाग वाकलेला भासतो. याठिकाणी मला इंद्रधनुष्याचे रहस्य समजले. मनाला एक चैतन्य उभारी आली.


प्रत्यक्षात आपल्याला दिसणारे सारे रंग सूर्यप्रकाशात असतात आणि सारेच आल्याला दिसतात. न्यूटनने हे दाखवून दिलंच आहे. आपल्याला दिसू शकतात,पण अजून दिसले नाहीत,असे रंगच नाहीत.चित्रकारांनी कितीही निरनिराळ्या छटा वापरल्या, नवीन नवीन वापरल्या तरी सुर्यप्रकाशात त्या आहेतच. प्रत्येक रंघ

छटा म्हणजे विशिष्ट तरंग लांबीचा प्रकाश लाल,पिवळा,निळा ही त्या त्या तरंगलांबीला आपण दिलेली नाव, दिसू शकणारे सगळे रंग इये 

पृथ्वीचीये नगरी,आपल्या आसपास मौजुद 

आहेत. ग्रह ताऱ्यांकडे उधळायला आता आणखी रंग नाहीत. 


ताऱ्यांचाच का, इथलाही निरनिराळ्या स्तोत्रांकडून येणारा प्रकाश अभ्यासला तर निरनिराळे बारकोड दिसतात कोणत्या मूलद्रव्यांकडून हा प्रकाशयेतोय  यावर हे यावर हे अवलंबून आहे. प्रत्येक मूलद्रव्याचा प्रकाशाचा बारकोड निराळा.सोडियमपासून येणारा उजेड पिवळा असतो. (सोडियमच्या वाफेत विजेचा लोळ सोडला कि ती निळी प्रकाशमान होते. आपण रस्त्यावर सोडीयम पेपर लॅम्प वापरतो त्यातूनही पिवळा प्रकाश येतो.) पिवळ्या पट्ट्यात मधूनच काळ्या रेघा उमटलेल्या दिसतात. असं का याचं उत्तर क्कांटम थिअरीत आहे म्हणे,पण मलाही ते नीट उमगलेलं नाही. मी आहे जीवशास्त्रज्ञ,(रिचर्ड डॉकिन्स) आणि हा तर भौतिकशास्त्राचा प्रदेश.ही सत्याची स्पष्ट कबुली मला जीवनात बरंच काही सांगून गेली.


आवाजाच्या लहरींचा वेग ठरलेला असतो. आवाज बेडकाचा असो, बिगुलाचा असो वा बोलण्याचा असो, वेग तोच. आवाज कुणाचा? हा प्रश्न इथे गैरलागू. हवेत वेग असतो ताशी १२३६ कि.मी... पाण्यात हा चौपट होतो आणि काही घन पदार्थाच्या याहीपेक्षा जास्त असतो. हा आवाजाचा वेग पाहून मी अचंबित झालो आणि पुढील प्रकरणाकडे मी आपसूकच आलो.


कधी तरी असं होतं की जाग तर येते,पण स्नायू मात्र लुळे ते लुळेच राहतात. याला म्हणतात स्लिप पॅरॅलीसीस. भयप्रदच अनुभव हा. आपण जागे असतो. सगळं दिसत असतं, ऐकू येत असतं, पण हालचाल अजिबातच करता येत नाही. कधी या अवस्थेत भयानक भास होतात. काहीतरी जीवघेणा प्रकार आहे, काय ते कळत नाहीये असं वाटायला लागतं. स्वप्न आणि जाणिवेच्या सीमेवर झुलत राहतो आपण. कधी भास व्हायला लागतात. हे आभासी जग अगदी खरंखुरं वाटायला लागतं. मानसशास्त्रज्ञ स्यु ब्लॅकमोर यांच्या मते स्वप्न - वास्तवाच्या सीमारेषेवरच्या भासांच कारण,स्लीप पॅरॅलिसीस हेच आहे. माझ्यासाठी ही माहिती संपूर्ण नवीन होती.


भूकंप म्हणजे नक्की काय हे समजून घेण्याआधी आपल्याला ( प्लेट टेटॉनिक्स ) भुकवच आणि त्याच्या हालचालींची माहिती करून घ्यावी लागेल. यासोबतच शतकभरापूर्वी,आल्फ्रेड वेगेनेर ह्या जर्मन शास्त्रज्ञाने, खंड सरकतात अशी एक बंडखोर कल्पना मांडली. बऱ्याच जणांनी त्याला वेड्यात काढलं प्रचंड गलबतासारखे खंड हलत असतात असे त्याने सुचवले. वेगनरच्या मते आफ्रिका, दक्षिण अमेरिका,ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका हे सारे खंड आधी एकत्र होते. पुढे ते सरकत सरकत लांब लांब गेले. वेगेनेरची भरपूर चेष्टा झाली. पण अखेर त्यांचं म्हणणं खरं ठरलं. व जे हसले त्यांचे दात दिसले. हा नवीन सिद्धांत मला बदलाची व समजून घेण्याची जाणीव देऊन गेला.


 तो जर सुखकर्ता, तर मग विघ्नाची का वार्ता यामध्ये तर जर घोटाळा किंवा काही गोची व्हायची असेल तर ती होतेच' हा मर्फीचा मजेशीर नियम जगप्रसिद्ध आहे."लोणी लावून टाकलेला ब्रेडचा स्लाईस नेमका लोण्याच्या बाजूलाच जमिनीवर पडतो", हाही मर्फी चा आणखी एक नियम मला खुपचं भारी वाटला. मर्फीच्या नियमाचे आणखी एक उदाहरण नाणेफेकीमध्ये आपल्याला जेव्हा काटा हवा असेल तेव्हा नेमका छापा पडतो याला तुम्ही निराशावादी नियमही म्हणू शकता आशावादी म्हणतील जबरदस्त इच्छा असेल तर नाणे तुमच्या मर्जीप्रमाणे पडेलच पडेल. त्याच बरोबर डॉ.पंग्लोस यांच्या म्हणण्यानुसार " या चांगल्या जगात सदैव चांगले तेच घडत असतं,अशी त्यांची खात्री होती. हे विस्ताराने समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचल पाहिजे.


शेवटी निसर्गात भलंबुरं जे जे घडतं ते ते साधारण समप्रमाणात घडत असतं.नया विश्वाला ना मन आहे, ना जाणीव,ना व्यक्तिमत्व.त्यामुळे तुम्हाला व्यक्तीश: खुश करायला गोष्टी घडत नसतात. त्या आपल्या ओघाने घडत असतात, त्यात काही वेळा त्या सुखकारक तर काही वेळा दुःखकारक असतात एवढंच. आपल्याला त्या चांगल्या-वाईट कशाही वाटोत,आपल्या वाटण्यामुळे घटितांची वारंवारता बदलत नाही. हे पचणं खूप कठीण आहे.पाप्यांच्या पदरी वेदना आणि पुण्यवानांना सुखाचं वरदानची कल्पना गोंजारायला खूप खूप सोयीची आहे. पण दुर्दैवाने या विश्वाला तुमच्या सोयीशी काही सोयरसुतक नाही. हे सत्य जीवन तत्व मनापासून स्वीकारलं व त्यापासून मी खूप दूर होतो.हे पुस्तक वाचून,विचाराने आणि तत्त्वाने मी सत्याच्या आसपास आलो हे माझ्यासाठी खूप खूप महत्वपुर्ण आहे.         

       

भक्ष भक्षकांच्या भक्षस्थानी पडतात. तसेच भक्षकही भक्ष्यांना बळी पडू शकतात.हरणाने स्वतःचा जीव वाचवणे म्हणजे सिंहाला उपाशी मारणं आहे. असंच काहीसं परोपजीवी आणि त्यांच्या यजमानांबद्दलही म्हणता येईल शिवाय प्रत्येक जीव,प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या जातीच्या इतर जीवांशी अशी स्पर्धा करत असतो. एक पारड जड झाले की परिणामी,दुसऱ्यात नैसर्गिक निवडीचं जास्तीचं दान पडतं.


तुम्हा सर्वांचा जाताजाता निरोप घेताना एकदा चमत्काराचं लेबल लावलं की शोध संपतो, शोधायची जबाबदारी ही संपते. हे आळसाचं, अप्रामाणिकपणाचं आहे. आज याचा कार्यकारणभाव ज्ञात नाही आणि उद्या ही ज्ञात होणं शक्य नाही,असं मान्य केल्यासारखं आहे हे 'अतिनैसर्गिक'असा शिक्का ही शरणागती आहे, आज याचा बोध होत नाहीये आणि पुढे कधीच होणार नाही असं मान्य केल्यासारखे आहे.


द मॅजिक ऑफ रिॲलिटी

रिचर्ड डॉकिन्स (प्रकाशक विवेक जागर संस्थेसाठी प्राचार्य मच्छिंद्रनाथ मुंडे राज्य कार्यवाह,प्रकाशन विभाग महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती)

जादुई वास्तव-मूळ लेखक रिचर्ड डॉकिन्स,भावानुवाद-

डॉ. शंतनू अभ्यंकर ! एकूण पाने-२०७


आपणा सर्वांचे मनःपूर्वक आभार व धन्यवाद


 हे पुस्तक आपल्याला पुन्हा परत लवकरच भेटेन म्हणून सांगत आहे.


माणसाला या विश्वाच्या पसार्‍यात कस्पटाएवढंही स्थान नाही हे. लक्षात आणून देणार आहे. मनुष्यमात्रांचा अहंभाव निखळून पाडणारा आहे. विश्वाचा पसार्‍याप्रती विस्मय वाढवणारं आहे. हाच आहे निखळ वैज्ञानिक सत्याचा चमत्कार. हेच आहे जादुई सत्य..!


ज्यांनी ज्यांच्या पुस्तकातून मला नवीन दृष्टिकोन दिला. त्या लेखकांना "वॉल्डन" मधील चार ओळीतील सत्य नम्रपणे अर्पित करत आहे.


अंतरात्म्यात डोकावून पहा,

हजारो प्रदेश दिसतील मनात


ज्याचा शोध नसेल घेतला कोणी

त्या अज्ञात विश्वाचा शोध घ्या..!


धन्यवाद अल्पशी विश्रांती

२४/९/२२

मानवी नातं उलगडून सांगणाऱ्या 'भाजलेल्या शेंगा'

खूप दिवसांनी छान गाढ झोप लागली. जाग आल्यावर हॉस्पिटलमध्ये आहोत हे लक्षात यायला काही क्षण लागले. बेल वाजवल्यावर रुममध्ये नर्स आल्या.

"गुड ईव्हिनिंग सर,"

"कोणी भेटायला आलं होत का?

"नाही"

"बराच वेळ झोपलो होतो म्हणून विचारलं" मोबाईलवरसुद्धा एकही मिस कॉल किवा मेसेज नव्हता.

"आता कसं वाटतंय" नर्स 

"प्रचंड बोर झालंय"

"तीन दिवसात ते प्यून काका सोडून तर भेटायला दुसरं कोणीच कसं आलं नाही?"

"सगळे बिझी असतील"

"आपलं माणूस म्हणून काळजी आहे की नाही" नर्स बोलत होत्या, पण मी काहीच उत्तर दिलं नाही.

"सॉरी, मी जरा जास्तच बोलले." नर्स 

"जे खरं तेच तर बोललात!"

ब्लडप्रेशर तपासताना दोन-तीन वेळा 'सॉरी' म्हणून नर्स निघून गेल्या. त्यांनी सहजपणे म्हटलेलं खोलवर लागलं. दोन शब्द बोलायला, विचारपूस करायला हक्काचं, प्रेमाचं कोणीच नाही याचं खूप वाईट वाटलं. एकदम रडायला आलं. भर ओसरल्यावर बाहीने डोळे पुसले. डोक्यात विचारांचा पंखा गरागरा फिरायला लागला.अस्वस्थता वाढली.आज मला काही कमी नाही. मोठा बंगला, फार्म हाउस, तीन तीन गाड्या,भरपूर बँक बॅलन्स, सोशल स्टेटस सगळं आहे, तरीही मन शांत नाही. कशाची तरी उणीव भासतेय. प्रत्येकजणच स्वार्थी असतो, पण मी पराकोटीचा आहे. प्रचंड हुशार, तल्लख बुद्धी परंतु तिरसट, हेकेखोर स्वभावामुळे कधीच आवडता नव्हतो. फटकळ बोलण्यामुळे फारसे मित्र नव्हते. जे होते तेसुद्धा लांब गेले. माझ्या आयुष्यात कधीच कोणाला ढवळाढवळ करू दिली नाही अगदी बायकोलासुद्धा,तिला नेहमीच ठराविक अंतरावर ठेवलं. लौकिक अर्थाने सुखाचा संसार असला तरी आमच्यात दुरावा कायम राहिला. पैशाच्या नादात म्हातारपणी आई-वडिलांना दुखावले. मोठ्या भावाला फसवून वडिलोपार्जित संपत्ती नावावर करून घेतली. एवढं सगळं करून काय मिळवलं तर अफाट पैसा सोबत विकृत समाधान आणि टोचणारं एकटेपण,विचारांची वावटळ डोक्यात उठली होतो. स्वतःचा खूप राग आला. मन मोकळं करायची इच्छा झाली. बायकोला फोन केला पण उगीच डिस्टर्ब करू नकोस. काही हवं असेल तर मेसेज कर असं सांगत तिनं फोन कट केला. तारुण्याच्या धुंदीतल्या मुलांशी बोलायचा तर प्रश्नच नव्हता.

......फोन नंबर पाहताना दादाच्या नंबरवर नजर स्थिरावली. पुन्हा आठवणींची गर्दी. दादाचा नंबर डायल केला पण लगेच कट केला कारण आमच्यातला अबोला,तीन वर्षांपूर्वी आमच्यात कडाक्याचे भांडण झालं होत. त्यानंतर पुढाकार घेऊन दादानं समेटाचा प्रयत्न केला पण माझा ईगो आडवा आला. म्हणूनच आता तोंड उघडायची हिंमत होत नव्हती तरीपण बोलावसं वाटत होतं. शेवटी धाडस करून नंबर डायल केला आणि डोळे गच्च मिटले.

"हं" तोच दादाचा आवाज 

"दादा, मी बोलतोय"

"अजून नंबर डिलीट केलेला नाही"

"कसायेस"

"फोन कशाला केलास"

"तुझा राग समजू शकतो.खूप चुकीचा वागलो.गोड गोड बोलून तुला फसवले" ठरवलं नसताना आपसूकच मनात साठलेलं धाडधाड बोलायला लागलो.

"मुद्द्याचं बोल.उगीच शिळ्या कढीला ऊत आणू नकोस. आपल्यात आता काही शिल्लक राहिलेलं नाही"

"दादा, इतकं तोडून बोलू नकोस"

"मी तर फक्त बोलतोय. तू तर.........."

"पैशाच्या नादानं भरकटलो होतो. चुकलो."

"एकदम फोन का केलास. सगळ्या वाटण्या झाल्यात आता काहीच शिल्लक नाही"

"मला माफ कर" म्हणालो पण पलीकडून काहीच उत्तर आलं नाही.

"दादा!"

"ऐकतोय, काय काम होतं"

"माझ्याकडून डोंगराएवढ्या चुका झाल्यात"

"मुद्द्याचं बोल"

"झालं गेलं विसरून जा."

"ठीकय" दादा कोरडेपणाने बोलला परंतु मी मात्र प्रचंड भावूक झालो.

"झालं असेल तर फोन ठेवतो"

"आज सगळं काही आहे अन् नाहीही."

"काय ते स्पष्ट बोल"

"हॉस्पिटलमध्ये एकटा पडलोय"

"का, काय झालं" दादाचा आवाज एकदम कापरा झाला.

"बीपी वाढलंय. चक्कर आली म्हणून भरती झालोय. डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय."

"सोबत कोण आहे "

"कोणीच नाही. दिवसातून दोनदा बायको आणि मुलं व्हिडीओ कॉल करून विचारपूस करायचं कर्तव्य पार पाडतात"

"अजबच आहे"

"जे पेरलं तेच उगवलं. मी त्यांच्याशी असाच वागलोय. कधीच प्रेमाचे दोन शब्द बोललो नाही. फक्त व्यवहार पाहिला. स्वार्थासाठी नाती वापरली आणि तोडली. आता एकटेपणाने कासावीस झाल्यावर डोळे उघडलेत"

कंठ दाटल्याने फोन कट केला. अंधार करून पडून राहिलो. बऱ्याच वेळानंतर नर्स आल्या. लाईट लावून हातात कागदाचा पुडा दिला.मस्त घमघमाट सुटला होता. घाईघाईने पुडा उघडला तर त्यात भाजलेल्या शेंगा. प्रचंड आनंद झाला.

"नक्की दादा आलाय. कुठंय?"

"मी इथचं आहे" दादा समोर आला. 

आम्ही सख्खे भाऊ तीन वर्षानंतर एकमेकांना भेटत होतो. दोघांच्याही मनाची विचित्र अवस्था झाली. फक्त एकमेकांकडे एकटक पाहत होतो. नकळतपणे माझे हात जोडले गेले.

"राग बाजूला ठेवून लगेच भेटायला आलास." 

"काय करणार तुझा फोन आल्यावर रहावलं नाही. जे झालं ते झालं. आता फार विचार करू नको."

"तुला राग नाही आला" 

"खूप आला. तीन वर्षे तोच कुरवाळत होतो पण आज तुझ्याशी बोलल्यावर सगळा राग वाहून गेला.तुला आवडणाऱ्या भाजलेल्या शेंगा घेतल्या आणि तडक इथं आलो"

"दादा!!...." मला पुढे काही बोलता येईना. दादानं डोक्यावरून हात फिरवला तेव्हा खूप शांत शांत वाटलं.

"राग कधीच नात्यापेक्षा मोठा नसतो. मग ते रक्ताचं असो वा मैत्रीचं.चुका,अपमान काळाच्या ओघात बोथट होतात.जुन्या गोष्टींना चिकटून बसल्याचा त्रास स्वतःलाच जास्त होतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेव - आपलं नातं म्हणजे फेविकोल का जोड ... .." 

दादा लहानपणी द्यायचा तसचं शेंगा सोलून दाणे मला देत बोलत होता.त्या भाजलेल्या खरपूस दाण्यांची चव अफलातून होती.


..आणि सहज कचऱ्याच्या डब्याकडे लक्ष गेलं त्यात शेगांच्या टरफलाच्या जागी मलाच माझा इगो दिसत होता.!!


■ लेखक-अज्ञात..


मनमोकळं आयुष्य जगा.. सर्वप्रथम स्वतःला व नंतर इतरांना मनापासून माफ करा.. कारण तुम्ही खुपच महत्वपूर्ण आहात.


२२/९/२२

माणसाला माणसाची ओळख करून देणारा पुस्तकरूपी 'प्रवास' ..!

माझा विश्वास आहे की,महान पुस्तके वाचण्याचा फायदा हा असतो की ती आपल्याला जीवनाच्या अधिकतर आव्हानांना आणि संधींना त्या यायच्या आधीच कसे हाताळायचे हे शिकवतात.ती तुम्हाला ही शिकवण देतात की, तहान लागण्याच्या आधीच विहीर खोदा आणि भूक लागण्याच्या आधीच बी पेरा - 

जॉन मेसन


अश्मयुगीन चाकांपासून ते मंगळावरच्या स्वारी पर्यंतचा..!


मानवी प्रगतीचा अविस्मरणीय,जिद्द,शोधामागील ज्ञिज्ञासा,जगाला जगाची ओळख करून देणारा हा प्रवास माझ्यासाठी उत्कंठावर्धक,वास्तववादी व सत्य कथन करणारा आहे.


प्रस्तावनेतील नोंद माणसाची प्रगती या शोधानंतर चांगलीच विकसित झाली. याची आपल्याला कल्पना आहेच‌.पण आमच्या मते, हा इतिहास फक्त यंत्राच्या निर्मितीचा आणि विकासाचा नाही; तर कल्पनांचा विकास, माणसाची धडपडी वृत्ती, वसाहतवाद, औद्योगिकीकरण, धार्मिक प्रसार, महिलांचं सबलीकरण, देशाचं अर्थकारण आणि सामाजिक बदल या सगळ्यांचा आहे. फक्त मोटार गाड्यांचा विचार केला तर मोठ्या गाडीच्या शोधाच्या प्रवासात लहान-मोठे असे किमान लाखभर तरी पेटंट्स आपल्याला आढळून येतील. असा प्रत्येक वाहनाच्या बाबतीत म्हणता येईल.


दर्यावर्दीच्या जहाजांचा ताफा कसा असायचा,

जहाजनिर्मितीची प्रक्रिया कशी असायची, प्रवासाला निघताना अन्न पाण्याची सोय कशी केली जायची, मुख्य खलाशी कोण कोण असायचे, या सगळ्या गोष्टी मजेदार आहेत. 'आपल्या जहाजाचा कॅप्टन हा जहाजाचा मुख्य माणूस असतो. हे आपल्याला माहीत आहे, पण मांजरही जहाजात मोठी भूमिका बजावतं हे वाचून गंमत वाटली.' प्रवासाला ठराविक काळासाठी लागणारा अन्नसाठा आणि पाणी जहाजांमधून नेलं जायचं. उंदराकडून त्या अन्नाची नासाडी होण्याचे किंवा अगदी जहाजालाही नुकसान होण्याचे प्रकार अनेकदा व्हायचे. 'त्यामुळे उंदरांना रोखण्यासाठी ' मांजर ' मुख्य खलाशांच्या यादीत असायचं..!' हे वाचून मी अक्षरशःअवाक झालो होतो.


आकाशातील ग्रह तारे खलाशांचे मित्र किंवा मार्गदर्शन बनायचे.अनेक तारे रात्रीच्या अंधारात तेजस्वी दिसतात आणि त्यांची जागा हलत नाही. त्यामुळेच हे तारे उत्तम मार्गदर्शक ठरायचे. त्यातला सगळ्यात जवळचा मित्र म्हणजे ध्रुव तारा‌ हा तारा कधीच आपली जागा सोडत नाही. हे आपल्याला माहित आहेच. रेखांशांचा अंदाज कसा काढायचा हे पहिल्यांदा इजिप्तच्या खलाशांनी शोधून काढलं.कुठले तारे आकाशात नेमके कुठे असतात,कोणत्या मोसमात ते आपली जागा कशी बदलतात अशा सगळ्यांचा अभ्यास त्यांनी केला होता आणि तोही हजारो वर्षापूर्वी..! वार्‍याची दिशा दाखवणार्‍या नकाशाला 'विंड रोझ' म्हंटल जायचं ग्रीसमधल्या अथेन्समध्ये 'टॉवर ऑफ विंड्स' या नावाचं एक टॉवर प्रसिद्ध आहे.या टॉवरच्या ८ बाजूंवर त्या त्या वार्‍याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या मूर्ती कोरलेल्या आहेत.आधी 'विंड रोझ' मध्ये वार्‍याचे आठच प्रकार होते.ख्रिस्तपूर्व २५० मध्ये इजिप्तचा राजा टॉलेमी यानं त्यात अजून चार प्रकारांची भर टाकली.मला फक्त वारा माहीत होतां.या ठिकाणी तर वार्‍याचे १२ प्रकार दिसले.


कुठलाही पक्षी आपला स्वभाव कधीच बदलत नाही. निसर्गाने घालून दिलेल्या नियमावर तो आयुष्यभर चालत असतो पक्षांचा स्वभाव आणि त्याची दिनचर्या यांचा अभ्यास केला तर ते ठराविकच पद्धतीने वागताना आपल्या लक्षात येते.उदा. ठराविक हंगामात काही पक्षी स्थलांतरित होतात.ठराविकच झाडावर आपलं घरटं बांधतात,अन्नाच्या वेळाही त्यांच्या साधारणपणे ठरलेल्या असतात. त्यांच्या या सवयीचा उपयोग आपल्याला दिशादर्शक म्हणून होऊ शकतो. ही कल्पना खलाशांना आली.आणि त्यांनी त्यांचा अभ्यास चालू केला. दिशादर्शकाचा असा कोणताही पर्याय उपलब्ध नसताना पक्षी हे आपल्याला मार्गदर्शन करू शकतात ही कल्पना खरोखरच भन्नाट होती मुख्य म्हणजे विश्वासार्ह होती. 


समुद्री पक्षी जर चोचीत मासे घेऊन उडत असतील, तर जवळपास जमीन नक्कीच आहे याची खलाशांना खात्री पटायची.कारण पक्षी चोचीत मासे आपल्या पिलांसाठी घेऊन जातात आणि ती पिल्ले जमिनीवरच असतात.काही पक्ष्यांची उडण्याची क्षमता जास्त नसते. त्यामुळे ते जमिनीपासून फार लांब जात नाहीत. हा ही स्वभाव खलाशांच्या लक्षात आला होता.फ्लॉकी - वल्गॲडर्सन नावाचा एक दर्यावर्दी होता. आईसलंडच्या शोधाचे श्रेय यालाच दिलं जातं. तो आपल्याबरोबर रावेन नावाचे पक्षी घेऊन जायचा. जमीन जवळ आली आहे अशी शंका आली की पिंजऱ्यातला एक पक्षी सोडला जायचा जर जमीन जवळ असेल तर तो पक्षी जमिनीच्या दिशेने उडत जायचा आणि मग वल्गॲडर्सन आपल्या बोटी त्या पक्षाच्या मागोमाग न्यायचा. पण जमीन जवळपास नसेल तर मात्र तो पक्षी बोटीवरच घिरट्या घालून परत बोटीवर उतरायचा.अशी नवीन व नाविन्यपूर्ण माहिती वाचत असताना मी गंभीरपणे चिंतन मनन करत होतो.


एकदा ग्रीस येथील ॲथेन्समध्ये सॉक्रेटिसला प्रत्यक्ष भेटण्यासाठी एक पत्रकार आला. त्याने बरीच शोधाशोध केली. बऱ्याच लोकांना विचारलं पण प्रत्येकांनीच नाही म्हणून सांगितलं. निराश हताश होऊन तो बाहेर पडत असताना वाटेत त्याने प्रत्यक्ष सॉक्रेटिसला विचारले "मला सॉक्रेटिसला भेटायच आहे. त्यावेळी सॉक्रेटिसने मार्मिकपणे उत्तर दिले. मी ही सॉक्रेटिसला शोधत आहे. जर तो तुम्हाला सापडला तर मला नक्की सांगा.मलाही आनंद होईल व मी आपला आभारी असेन. या प्रसंगाची मला या ठिकाणी प्रकर्षाने आठवण झाली.


पृथ्वीविषयी अनेक 'सत्य' समोर आली.आणि दूरदूरच्या देशांत वसाहती झाल्या.ख्रिस्तपूर्व १३८ मध्ये चँग चीन नावाच्या एका दर्यावर्दींनं मध्य आशियाचा दौरा केला होता.पण ख्रिस्तपूर्व ३९९ मध्ये फा सीन नावाचा एक भिक्खू आपल्या ३ साथीदारांसोबत भारतात आला,बुध्दिझम शिकला आणि ती शिकवण घेऊन तो श्रीलंका आणि जावा यांच्यामार्गे चीनला गेला.त्यानंतर मार्को पोलो,इब्न बतुता,वास्को द गामा, ख्रिस्तोफर कोलंबस,अमेरिगो वेस्पुची,जेम्स कुक,अशा अनेक दर्यावर्दींनी सर्वस्व अर्पण करुन जगाला ओळख देण्याचे महान काम केलं हे वाचत असताना मी अचंबित होतो.थक्क होतं होतो. अमेरिकेचा शोध ख्रिस्तोफर कोलंबसने लावला.पण अमेरिगो वेस्पुची यांचे नाव कसं लागलं हे वाचत असताना.सत्य स्वतःला उलगडून दाखवत होतं.


त्यानंतर जहाजांचे निर्माण,त्यामध्ये होत गेलेला बदल हे वाचणीय आहे.माझ्यासाठी जगणं किती अनोळखी आहे.याची जाणीव झाली.१९०९ साली ऑलिम्पिक, टायटॅनिक,आणि ब्रिटॅनिक यांच्या चित्तथरारक प्रवासांचे वर्णन वाचताना अंगावर शहारे आले.या अवाढव्य,समुद्रातील तरंगते राजमहलच जणू..! टायटॅनिकच्या अपघातानंतर अनेक वर्षांनी या जहाजाचे अवशेष मिळाले.संपूर्णपणे गंज चढलेल्या अवस्थेतही हे जहाज आपल्या सौंदर्याचा पुरावा देत होतं..!


अश्मयुगीन चाक आपल्याला १५ ते ७५ हजार वर्षांपूर्वीच्या काळात घेवून जातो.बायसिकल - पहिलंवहिलं जनावरविरहित प्रवासी वाहनाचा व डनलप टायरचा लेखाजोखा खुपचं प्रभावी व दर्शनीय आहे.


चारचाकी वाहनांची सुरुवात १३३५ साली गुईडो वॉन विगेवानो या डच संशोधकाने विंडवॅगनचा कच्चा आराखडा तयार केला होता.हीच संकल्पना वापरून लिओनार्दो दा विंचींन एखाद्या भल्या मोठ्या घड्याळासारखी कार तयार केली होती. खरं तर त्याची ही कार म्हणजे पहिली स्वयंचलित वाहनाची सुरुवात होती. त्यानंतर अनेक आधुनिक बदल होत गेले. अनेक संशोधकांच्या अथक प्रयत्नातून मोटारगाड्यांची निर्मिती झाली. कार्ल बेंज यानं पहिली मोटर गाडी कशी तयार केली, पण लोकांनी घाबरून त्याचा स्वीकारच केला नाही. मग लोकांची भीती कमी व्हावी यासाठी बेंझची बायको चक्क ती चालवत आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेली हा प्रवास कसा केला तिला काय अडचण याला लोकांच्या कशा प्रतिक्रिया होत्या हे फारच मजेशीर आहे.आपल्या पतिच्या पाठिशी खंबीरपणे उभी राहणारी स्त्री शक्तीचा होती.हे वाचताना समस्त स्त्री शक्तीपुढे मी नम्र झालो.मला माझ्या पत्नीच्या असण्याची जाणीव झाली.ही भावनिक संवेदना अशीच जागी ठेवून मी पुढील प्रवासाला निघालो.


मर्सिडीज एमिल जेलिनिक या एका प्रतिष्ठित उद्योजकाच्या मुलीचे नाव 'मर्सिडीज' होते.


हेन्री फोर्ड यांनी १३ ऑगस्ट १९४१ रोजी एक भन्नाट कार प्रदर्शनात प्रदर्शित केली.स्टीलची प्रेम आणि १४ प्लॅस्टिक पॅनल्सनी बनवलेली ही कार वजनानं फारच हलकी होती.यासाठी सोयाबीनचा वापर केल्याचा दावा केला जातो. 


२७ सप्टेंबर १८२५ रोजी ४५० प्रवासी घेऊन डार्लिंग्टनवरुन ताशी १५ मैल एवढ्या वेगानं प्रवास करत ही रेल्वे २५ मैलाचं अंतर पार करत स्टॉकटनला पोहचली आणि थांबली.१६ एप्रिल १८५३ ! भारतीय इतिहासातला अतिशय महत्त्वाचा दिवस याच दिवशी बोरीबंदर ( नंतरच बॅक्टरिया टर्मिनस आणि आत्ताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ) ते ठाणे या दोन स्थानकांदरम्यान पहिली प्रवासी रेल्वे धावली.सुमारे ३४ कि.मी.प्रवासादरम्यान १४ डब्यांत ४०० प्रवासी घेऊन ही गाडी रवाना झाली. त्यावेळी या गाडीला साहिब,सिंध,आणि सुलतान असे तीन इंजन्स लावले होते.हा आनंदी सोहळा मी प्रत्यक्ष अनुभवला...!


'पुढे धोका आहे' याची ट्रेन मधल्या प्रवाशाला माहिती असणार अर्थातच शक्य नसतं. पण भारतात मात्र एका प्रवाशालाच रेल्वे प्रवासादरम्यान हे समजलं होतं काय होतं.काय होता हा किस्सा ? रात्रीच्या भयाण अंधारातून एक ट्रेन धावत होती. आतमधले अनेक प्रवासी गाढ झोपेत होते.अचानक ट्रेन थांबली अचानक ट्रेन थांबल्यामुळे प्रवासी खडबडून जागे झाले. तोवर एका डब्यात रेल्वे कर्मचारी चढले एका तरुणानं ट्रेनमधली चेन ओढून ती थांबवल्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं. सगळ्यांनी त्याला या बद्दल विचारल्यावर त्यानं काही मीटर अंतरावर रेल्वे रुळावर एक फट आहे आणि त्यावरून जर ट्रेन गेली असती तर अपघात झाला असता असं सांगितलं.याची चाचपणी करायला रेल्वे कर्मचार्‍यांसकट अनेक प्रवासी धावले.बॅटरीच्या उजेडात काही अंतरावरच रुळावर एक मोठी फट होती. त्या तरुणाचं म्हणणं चक्क खरं निघालं होतं. पण त्याला इतक्या काळोखात तेही प्रवास करत असताना हे समजलचं कसं ? हाच प्रश्न सगळ्यांनी जेव्हा त्याला विचारला तेव्हा त्यानं अगदी सहजपणे याचं उत्तर दिलं इतर प्रवाशांसारखाच तोही झोपलेला होता. खिडकीला डोकं टेकवून तो झोपलेला असताना तो रेल्वे आणि रुळ यांचा आवाज ऐकत होता. अचानक रुळांच्या कंपनानं होणार्‍या आवाजामध्ये बदल त्याला जाणवले आणि तो सावध झाला. त्याच्या सतर्कतेमुळे रेल्वेचा मोठा अपघात टळला होता. कित्येक प्रवाशांचे जीव वाचले होते हा तरुण म्हणजे ज्यांची जयंती दरवर्षी 'इंजिनियर्स डे' म्हणून साजरी होते ते प्रसिद्ध भारतीय अभियंते डॉ.मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या..! 


हा किस्सा आणि आपोआपच मी सलाम केला.


यानंतर फुगे ( हॉट एअर बलून्स) यामध्ये फुग्यांचा प्रवास ज्ञानात वाढ करणारा आहे.


ग्लायडर्स, विमान आणि हेलिकॉप्टर ख्रिस्तपूर्व चौथ्य शतकात महर्षी भारद्वाज यांनी 'वैमानिकशास्र' नावाचा ग्रंथ लिहिला होता.अनेक शास्त्रज्ञांनी जीवमोलाने या विमान शोधामध्ये आपलं योगदान दिले आहे.माणसाला माणसाची ओळख होण्यामध्ये हे खुपचं महत्त्वपूर्ण आहे.विल्बर व ऑर्व्हिल या राइट बंधूंचा जन्म मिल्टन राईट या चर्चच्या पाद्र्याच्या घरी झाला.विल्बर व ऑर्व्हिल मिळून एकूण ५ भावंडे होती.गंमत अशी की या पाचही भावंडांचा जन्म वेगवेगळ्या गावात झाला. अर्थातच याला कारणीभूत वडिलांची फिरस्ती होती हे होतं.विल्बर १८६७ साली अमेरिकेतल्या इंडियानातल्या मिलवाईल इथं जन्मला तर ऑर्व्हिलचा जन्म अमेरिकेतल्याच ओहयोमधल्या डेटन या गावात १८७१ साली झाला. ही दोन भावंड एकमेकांच्या जवळ होती.


राईट बंधूंना आपण जरी विमानाचे संशोधक मानत असलो तरी ते स्वतः मात्र तसं मानत नव्हते. विशेषतः विमानाचा शोध आपण स्वतःच लावला असा त्यांनी कधी दावाच केला नाही. त्यांनी १९०६ साली जे पेटंट घेतलं त्यातुनही आपल्याला हे जाणवतं." उडणाऱ्या यंत्रामध्ये आपण काही नवीन उपकरणं तयार केली आहेत.आणि त्यात काही सुधारणा केल्या आहेत अशा आशयाचं त्यांच पेटंट होतं. त्यांच्या पेटंटच शीर्षक होतं : न्यू अँड युजफुल इम्प्रुव्हमेंट्स इन फ्लाइंग मशिन्स..!


ऑर्व्हिल विमानाचे प्रात्यक्षिक करत असताना त्याचा जीव धोक्यात आला. या अपघातात तो जबर जखमी झाला. त्याच्या सोबत असणारा सेल्फ्रिज याचा मृत्यू झाला. त्या मानानं ऑर्व्हिल सुदैवी ठरला. या अपघातात त्याची हाडं मोडली होती.१२ वर्षानंतर त्याची अजून काही हाड दुखावली गेल्याचं लक्षात आलं होतं. यादरम्यान त्याच्या ( कॅथरीन ) या बहिणींनं त्याची भरपूर सेवा केली. शाळेत शिक्षिका असलेली कॅथरीन आपल्या भावांची बहीणच नाही तर त्यांची आईही होती. सेक्रेटरीही होती आणि सहकारीही ! या अपघातानंतर लष्करानं राईट बंधूना दिलेला करार मोडण्याचा निर्णय

जवळजवळ घेतलाच होता,मात्र कॅथरीननं तसं होऊ दिलं नाही. उलट हा करार अजून एका वर्षासाठी तिनं वाढवून घेतला.एकीकडे विल्बरनंही आपला लढा यशस्वीरित्या चालू ठेवला होता. राईट बंधूंच्या विमान संशोधनाच्या प्रवासात अनेकदा त्यांना कोर्टाच्या पायऱ्याही चढाव्या लागल्या होत्या. पण या सगळ्या चढ-उतारात त्यांच्या पाठीशी एक व्यक्ती भक्कमपणे उभी होती आणि ती म्हणजे त्याची बहीण कॅथरीन ! आई गेल्यापासून घराची सगळी जबाबदारी कॅथरीनचं सांभाळत होती. आई गेली तेव्हा ती १५ वर्षाचीच होती. आईच्या मृत्यूचा धक्का बसलेल्या कॅथरीननं घरची अडचण समजून घेऊन लगेचच स्वतःला सावरलं आणि स्वतःहून घरातली सगळी जबाबदारी अंगावर घेतली. इतकंच नाही तर आपल्या दोन भावांच्या प्रयोगांदरम्यान तिची मोलाची साथ त्यांना लाभली. त्यांचे प्रयत्न चालू असताना तिने त्यांना नुसता पाठिंबाच दिला नाही तर तिनं त्यांना अनेकदा मदतही केली.तिनं आपल्या भावांनी तयार केलेल्या विमानातून हवाई उड्डाणही केलं होतं


हा विमान प्रवासा वाचत असताना मानव व मानवतेपुढे मी नतमस्तक झालो..!


पुढील घटना व प्रसंग वाचत असताना जीवाची घालमेल होत होती.


मला वाटतं, आमच्या कामाची दखल ही आतिषबाजीच्या एका तुकड्या पेक्षा दैनदिन कामावरून घेतली गेली तर तेआम्हाला जास्त आवडेल. हे शब्द होते चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलेल्या नील आर्मस्ट्रॉंग याचे..! ऑल्ड्रिन व आर्मस्ट्रॉंग २० जुलै १९६९ वेळ रात्रीचे १० वाजून ५६ मिनिटं ! ईगल चंद्रावर अलगद उतरलं. तेव्हा यानात फक्त २५ सेकंद चालेल इतकंच इंधन शिल्लक होतं..! ईगल चे दरवाजे उघडले आणि आर्मस्ट्राँगनं पहिल्यांदा आपला डावा पाय चंद्रावर ठेवला. त्याच्या पायाचा ठसा उमटला. त्यांनी आपल्याबरोबर राइट बंधूंच्या पहिल्या यशस्वी उड्डाणाच्या विमानाचा एक छोटासा भाग आणला होता. त्यांनी चंद्रावर अमेरिकेचा झेंडा रोवला आणि सोबत आणलेल्या एका फळ्यावर,'आम्ही मानव जातीच्या शांततेसाठी इथं आलोय' असं लिहून ठेवलं. त्या दोघांनी मग चंद्रावरचे नमुने गोळा कर, निरीक्षण कर, फोटो काढ, असं करत जवळपास १५० कि.मी.चा परिसर पालथा घातला.सुमारे २१ तास ३६ मिनिटं ते चंद्रावर होते.


आर्मस्ट्राँग आणि ऑल्ड्रिन परत जायला सज्ज झाले आणि ईगलमध्ये बसले. पण त्यांच्या स्पेस सूटचा धक्का लागून ईगलमधल्या महत्वाच्या स्वीचचा भागच तुटला. हे स्वीच ईगलला वर उचलण्यासाठी महत्त्वाचं होतं. आता चांगलीच पंचाईत झाली. कारण ईगल वर उचललं गेलं नाही तर या दोघांना चंद्रावरच राहावं लागलं असतं. ही अडचण हॉस्टनच्या मिशन कंट्रोल ऑफिसनी सोडवली. त्यांनी चक्क बॉलपॉइंट पेंनच झाकन त्या स्वीचच्या तुटलेल्या भागात बसवायला सांगितलं.खरंच तर हा कोणालाही मूर्खपणा वाटेल. पण त्यावेळी हाच मुर्खपणा शहाणपणा ठरला.पेनचं झाकण बसल्यावर ईगल 'टेक ऑफ' साठी सज्ज झालं..! आणि माझा जीव भांड्यात पडला...!


भविष्यातली वाहन हे प्रकरण  या पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे. भविष्यात येणारी वाहन त्यांच्याकडून केली जाणारी काम अविश्वसनीय पण सत्याला धरून सत्य सांगणार हे प्रकरण,या पुस्तकाचा आवाका फार मोठा आहे. गंभीरपणे,चिंतन, मनन केल्यास गुंतागुंत असणारा हा विषय खूपच सुटसुटीत व सोपा करून सांगण्यामध्ये आदरणीय लेखकांना यश आलेले आहे. "माणूस म्हणून समजून घ्यायचं असेल तर हे पुस्तक वाचणे अनिवार्य आहे." इतिहास वर्तमान भविष्य येणारा काळ त्यामध्ये असणारं माणसाचे स्थान..! इतिहासातील भूतकाळातील माणूस व येणाऱ्या काळातील माणूस यातील स्पष्टपणा सांगणारं हे पुस्तक सर्वांनी वाचावे..! हे पुस्तक म्हणजे अखिल मानवजातीसाठी 'प्रवास' करण्यासाठीचा महामार्ग आहे...!


शेवटी जाता..जाता..! 


एक म्हातारा माणूस त्याच्या नातवाला म्हणतो - 


" माझ्या मनात सदैव एक लढा चाललेला असतो. या भयंकर लढाईत दोन लांडगे लढत असतात. त्यातला एक लांडगा असतो दुष्टस्वभावी म्हणजे संतापी, हावरा, मस्तरी,उध्दट आणि भ्याड,तर दुसरा असतो सुष्टस्वभावी म्हणजे शांत, प्रेमळ, विनम्र, उदार प्रामाणिक आणि विश्वासू ! हे दोन लांडगे तुझ्याही मनात आणि सर्वच माणसांच्या मनात लढत असतात."


क्षणभर विचार करुन नातवाने विचारलं, " त्यातला कुठला लांडगा जिंकणार ? "

त्यावर म्हातारा हसून म्हणाला, " तु ज्याला खाऊ घालशील तो जिंकणार…


एके ठिकाणी वाचलेली ही वरील गोष्ट खुपचं काही सांगून जाते.


प्रवास हे पुस्तक संदर्भ सूची सहीत ५१५ पानांचे आहे,अच्युत गोडबोले,आसावरी निफाडकर यांनी लिहीलेले.व मधुश्री पब्लिकेशन यांनी प्रकाशित केलेले आहे.

२०/९/२२

.. मासिक शिक्षणयात्री मधील अद्भूत प्रेम

'प्रेम' या जगात जिवंत असणारा शब्द व जिवंत असणारी भावना,असं म्हणतात प्रेमानं जग जिंकता येतं.जे प्रेम करतात आणि ज्यांना प्रेम समजलं आहे.त्यांना प्रेम ही एक अशी समर्पित भावना आहे. जी सर्वाठायी एकसमान आहे.या सत्याची ओळख झाली आहे.कारण प्रेम या भावनेमध्येच आपण सर्वजण एकच जीवन जगतो.


मित्र नाही अशी एकही व्यक्ती नाही.मित्र म्हणजे प्रेम व विश्वास,मैत्रीच्या कथा ऐकतच आपण मोठे झालेलो आहे.


अशीच एक कथा आहे.जी जोओ व त्याचा मित्र पेंग्विन डिनडिमची.


 साधारणपणे २०११ ठिकाण होते.ब्राझिल शहरातील रियो दे जानेरियोच्या जवळ एक समुद्रकिनारा..!


समुद्रातून मालवाहतूक करणारे मोठे जहाज या जहाजाला असणाऱ्या तेलाच्या टाकीला गळती लागली. लाखो लिटर तेलाचा तवंग समुद्राच्या पृष्ठभागावरती पसरला. त्यामध्ये अनेक समुद्री जीवांनी केविलवाण्या परिस्थितीत या जगाचा निरोप घेतला. त्याच दरम्यान जोओ हा मानवी भावनेशी जोडला गेलेला माणूस,ज्याला प्रेमाची भाषा चटकन कळत असे.


तो समुद्र काठावरून फिरत असताना त्याला काहीतरी पडलेले दिसलं.उत्सुकता म्हणून तो जवळ गेला पाहतो तर एक पेंग्विन मृत्यूच्या जवळ जाऊ लागला होता..जोओच्या मनात कालवाकालव झाली.तो त्याला घेऊन आपल्या घरी गेला.


पेंग्विन म्हणजेच डिनडिम पूर्णपणे तेलाने माखला होता. श्वास घेण्यास अडचण येत होती. भुकेने तो कासावीस झाला होता.जोओने त्याला आंघोळ घालून स्वच्छ केले. त्याला प्रेमाने खाऊ घातले. हळूहळू डिनडिम बरा होऊ लागला. आठ ते दहा दिवस तो जोओ जवळ राहिला. या दिवसात तो पूर्णपणे तंदुरुस्त झाला.डिनडिम आपल्या मूळ घरी निघून गेला.


त्याच घर तसं फारच दूर होतं कारण पेंग्विन हे ध्रुवावर राहतात.डिनडिम निघून गेला जोओ परत आपलं सरळ साधं जिवन जगू लागला.असं म्हणतात.आनंदी राहणे ही साधी गोष्ट आहे,पण साधे राहणे खूप अवघड काम आहे..! पण तो हे अवघड काम सहजच करत होता.कारण त्याला प्रेम समजलं होतं.


काही महिने असेच गेले आणि सकाळी लवकरच त्यांच्या घरासमोरील अंगणातून एक ओळखीचा आवाज आला.बाहेर जावून जोओ बघतो,तर डिनडिम आला होता.(डिनडिमबाबत घडलेली घटना ही नेहमीप्रमाणेच समजल्यामुळे) अचानक डिनडिमला समोर बघून जोओचं मन प्रेमाने भरून गेले. त्याने त्याला पळत जाऊन मिठीत घेतले. दोघांनी एकमेकांना मिठी मारली.डिनडिम ही प्रेम करू लागला.तो साधारणतः जूनमध्ये परत आला होता. त्यानंतर तो बरेच महिने जोओच्या घरी राहिला. घरातील दुसऱ्या कोणत्याही माणसाला डिनडिम जवळ येऊ देत नव्हता. तो फक्त ज्यानं त्याला जीवनदान दिलं त्या जोओवरतीच जिवापाड प्रेम करत होता. त्या आपल्या मित्रासाठीच तो परत आला होता.


डिनडिम ठरलेल्या वेळी न चुकता यायचा व तो जून ते फेब्रुवारी ( जवळपास ८ महिने ) जोओ जवळ राहायचा व परत निघून आपल्या घरी जायचा.


.. आणि आश्चर्यचकित करणारा हा प्रवास होता.


तब्बल ५ हजार किलोमीटर अंतराचा एवढ्या दूरवरून सर्व संकटांचा सामना करत डिनडिम आपल्या प्राणप्रिय मित्र जोओला भेटण्यासाठी येत होता.


काय ते प्रेम,काय ती भावना खरचं अचंबित करणारी आहे.'निसर्गाची नवलाई' प्रेम शिकवणारी आहे.


सत्यकथा..सतीश खाडे यांचा पाॅडकास्ट व युट्युब वर आधारीत..!


सदरची कथा 'मासिक शिक्षणयात्री' मध्ये 'प्रेम' या नावाने सप्टेंबर २०२२ मध्ये प्रकाशित केली. सर्वच संपादकीय मंडळाचे आभार..