* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: तुझं की माझं ? Yours or mine?

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

३१/१०/२५

तुझं की माझं ? Yours or mine?

जंगलाची परिसंस्था एका अतिशय नाजूक संतुलनात असते.इथल्या प्रत्येक सजीवाची एक भूमिका असते आणि परिसंस्थेमध्ये प्रत्येकाचा एक वैशिष्ट्यपूर्ण कोनाडा असतो.निसर्गाचे वर्णन अनेकदा असे केले जाते.पण दुर्दैवाने हे अचूक नाही.कारण झाडांच्या खाली जंगलाचे नियम चालतात.प्रत्येक प्रजातीची जिवंत राहण्याची धडपड असते आणि आपल्याला लागेल ते तो दुसऱ्यांकडून घेत राहतो.प्रत्येक जण तसा निर्दय असतो.पण ही व्यवस्था कोलमडत नाही कारण गरजेपेक्षा जास्त ओरबाडणाऱ्यांपासून इथे संरक्षण असते.याच बरोबर प्रत्येक सजीवाला एक जनुकीय मर्यादा असते.गरजेपेक्षा जास्त घेणारा सजीव हा परिसंस्थेत परतफेड करत नाही.त्यामुळे त्याला जगण्यासाठी जे लागते ते खलास करून तो स्वतःही तग धरू शकत नाही.

 बहुतांश प्रजातींमध्ये काही अंगभूत आचरण असते,
ज्यामुळे जंगलाचा ओरबडा होऊ शकत नाही.याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे 'जे' (नीलकंठ प्रजातीचा पक्षी) नावाचा पक्षी.हा पक्षी ओक आणि बीच वृक्षाच्या या बिया खातो.पण अनेक बिया तो जमिनीत पुरून ठेवतो.यामुळे पुन्हा या झाडांची रोपटी तयार होऊन जंगलाची वाढ होऊ शकते.तुम्ही जेव्हा एखाद्या उंच,अंधाऱ्या जंगलातून चालता तेव्हा ते किराणा
मालाच्या दुकानात चालण्यापेक्षा फार वेगळे नसते.
इथंही भरपूर मेवा असतो - निदान जनावरं,
बुरशी आणि सूक्ष्मजीवांसाठी तरी असतो.साखर,
सेल्युलोज, लिग्निन आणि कर्बोदके मिळून एका झाडात लक्षावधी कॅलरीज (उष्मांक) असतात.त्याच बरोबर मौल्यवान खनिजे आणि पाणीही असते.मी किराणा मालाचं दुकान म्हटले का?नाही,याचे अधिक योग्य वर्णन म्हणजे अतिशय सुरक्षित असे गोदाम,
कारण इथं कोणीही जाऊन काहीही घेऊ शकत नाही.दरवाजा बंद आहे आणि साल जाड आहे.
त्यामुळे जर तुम्हाला तिथला गोड खाऊ घ्यायचा असेल तर त्यासाठी एक आराखडा हवा. समजा तुम्ही सुतार पक्षी (वूडपेकर) आहात.

|या पक्ष्याला एक विशिष्ट शारीरिक रचना लाभलेली असते.त्यामुळे त्याची चोच काही प्रमाणात वाकू शकते आणि डोक्याचा स्नायू धडक पचवू शकतात. हा पक्षी डोकेदुखी न होता झाडांवर वारंवार चोच्या मारू शकतो.वसंत ऋतूमध्ये जेव्हा झाडाच्या खोडातून पाणी वर पोचवलं जात असतं,तेव्हा त्यावर ताव मारण्यासाठी सुतार पक्ष्यांच्या काही प्रजाती छोट्या फांद्यांवर बारीक भोके पाडून या रसाचे सेवन करतात.यांना 'सॅपसकर' म्हणतात. हाडांच्या या जखमेतून रक्तस्राव होतो.पण झाडाचे रक्त काही भीतीदायक नसते.ते पाण्यासारखेच असते.पण रक्त गेल्यावर आपल्याला जसा त्रास होतो तसाच झाडालाही होतो.आणि याच द्रव्यावर सॅपसकर सुतार पक्ष्यांचा डोळा असतो.जोपर्यंत सुतार पक्षी फार जास्त भोकं करत नाही,तोपर्यंत झाडाला जखमांची फार काळजी नसते,ती सहन करायची ताकद असते.
कालांतराने जखमा भरून निघतात आणि झाडाच्या सालावर मुद्दाम केलेल्या सजावटीसारखे रूप येते.

अफिड (यांना झाडाच्या उवा किंवा ग्रीनफ्लाय म्हटले जाते) हा सुतार पक्ष्यापेक्षा फार आळशी असतो.महत कष्टाने उगीच उडून झाडाला भोकं पाडण्यापेक्षा तो स्वतःचे तोंड झाडांच्या नसांमध्ये किंवा सुयांमध्ये घुसवत ठेवतो आणि द्रव्य शोषून घेतो.इतर कोणीही पिऊ शकत नाही इतके द्रव्य त्याला पिता येते.झाडाचे प्राणद्रव्य या कीटकाच्या शरीरात शिरते आणि दुसऱ्या बाजूने मोठ्या थेंबाच्या रूपात बाहेर येते.अफिडना अशा प्रकारे भरपूर पेयपान करावे लागते कारण या द्रव्यात अत्यल्प प्रथिने असतात.प्रथिने अफिडना वाढण्यासाठी आणि प्रजननासाठी गरजेचे असते. या द्रव्याला ते गाळून घेतात आणि कर्बोदक आणि साखर न वापरता बाहेर सोडतात त्यामुळे अफिडची लागण झालेल्या झाडांच्या खाली चिकट हनीड्यू द्रव्य पडत राहते.कदाचित तुम्ही कधीतरी आपली गाडी अफिडची लागण झालेल्या मेपलच्या झाडाखाली ठेवली तर थोड्या वेळातच गाडीची काच चिकट झालेली तुम्हाला जाणवेल.

प्रत्येक झाडाला असे द्रव्य शोषणारे वैशिष्ट्यपूर्ण कीटक असतात.फर ३ (बाल्सम ट्विग अफिड), स्प्रूस (हिरवा स्प्रूस अफिड),ओक (ओक पानाचा फायलोक्सेरा),आणि बीच (वूली बीच अफिड) पूर्ण जंगलात शोषण आणि विष्ठा विसर्जन चालू असतं. झाडांची पान खाणाऱ्या जनावरांची जागा पक्की असल्यामुळे इतर प्रजाती अतिशय कष्टाने जाड सालीला भोक पाडून आतले द्रव्य घेण्याच्या मागे लागतात.सालीतून पोषण मिळविणारे वूली बीच स्केल सारखे कीटक आपल्या मेणचट चंदेरी-पांढऱ्या लोकरीने पूर्ण खोडाला वेटोळे घालू शकतात.
आपल्याला खरूज झाल्यावर जसा त्रास होतो,तसाच त्रास या कीटकांमुळे झाडालाही होतो. या जखमा भरून यायला वेळ लागतो आणि खोडावर त्याचे वर्ण शिल्लक राहतात.असे झाल्यावर बुरशी आणि सूक्ष्म जीव त्यात शिरतात आणि झाड खचत जाऊन शेवटी मरतं.त्यामुळे यांच्यापासून संरक्षण मिळविण्यासाठी झाड रासायनिक पदार्थ तयार करतं,यात काहीच आश्चर्य नाही.अशी आक्रमणं होत राहणार असतील तर आपले साल जाड असण्याचा झाडाला फायदा होतो.असं करून झाडं काही वर्ष तरी सुरक्षित राहतात.पण केवळ या कीटकांचा संसर्ग हा एकच प्रश्न त्यांच्यासमोर नसतो.द्रव्य शोषणारे कीटक आपली भूक शमवण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडातले पोषणद्रव्य काढून घेतात.एक चौरस यार्ड जंगलातून झाडांच्या पोषणद्रव्यांतून शेकडो टन साखर हे कीटक काढून घेऊ शकतात.त्यामुळे झाडं आपला पोषणाचा साठा गमावून बसतात आणि येणाऱ्या वर्षी त्यांची वाढ कमी होते.पण काही जनावरांना मात्र हे शोषण करणारे कीटक उपयुक्त ठरतात.लेडीबगच्या आळ्या अफिड आवडीने खातात.तसेच जंगली मुंग्यांना अफिडने सोडलेले हनीड्यू द्रव्य इतके आवडते की ते चक्क अफिडच्या पार्श्वभाग चाटतात.

(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे नअनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

आपल्या संवेदनाग्रांनी अफिडला गोंजारून ते अफिडला जास्त वेगाने हनीड्यू काढून घेण्यासाठी उद्युक्त करतात.दुसऱ्या कोणाला हनीड्यूची चाहूल लागू नये म्हणून ते अफिडचे संरक्षणही करतात. जंगलामध्येसुद्धा पाळीव प्राणी आहेत ! मुंग्यांना जास्त झालेला हनीड्यू वाया जात नाही.अफिड लागलेल्या झाडाभोवती सांडलेल्या चिकट हनीड्यूवर बुरशी आणि सूक्ष्मजीव लगेच येतात आणि तिथे काळी बुरशी जमा होते.मधमाशांनाही अफिडने सोडलेले हनीड्यू आवडते.थोडंसं तिथच शोषून बाकीचं त्या आपल्या पोळ्यात घेऊन जातात.पोळ्यात ते परत बाहेर काढतात आणि त्याचाच जंगली मध बनतो.जरी फुलातल्या मकरंदाशी संबंध नसला तरीही ग्राहकांना हा मध फारच आवडतो.गॉल मिज आणि वास्प कीटक थोडे मार्मिक असतात.पानांना भोक पाडण्यापेक्षा ते पानांना प्रोग्रॅम (नकळत सूचना देणे) करतात. यासाठी प्रथम ते बीच किंवा ओकच्या पानांवर आपली अंडी घालतात.त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या या झाडाचे द्रव्य शोषून घेतात.असे करताना त्यांच्या लाळेतील रसायने बाहेर आल्यामुळे पान त्यांच्याभोवती एक सुरक्षा कवच बनवायला लागते. बीज वृक्षात हे कवच टोकदार असते आणि ओक वृक्षाचे गोलसर.पण दोन्ही प्रकारच्या कवचात राहणाऱ्या कीटकांना त्यांच्या भक्षकांपासून संरक्षण मिळते.उन्हाळ्याच्या आधी पान गळून पडते आणि वसंत ऋतू आला की आतल्या आळ्या कोशातून बाहेर पडतात.यांची लागण बीच वृक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात होते पण झाडाला त्याचा त्रास होत नाही.

सुरवंटांची गोष्ट वेगळीच असते.त्यांचा डोळा झाडाच्या पोषणद्रव्यावर नसतो त्यांना तर पूर्ण पान हवं असतं.
जर सुरवंटं जास्त नसतील तर झाड लक्ष देत नाही.
पण यांच्या संख्येत वाढ आणि घट चालूच असते.
माझ्या जंगलात एकदा काही ओक वृक्षांवर प्रचंड प्रमाणात सुरवंट झाले होते.ही झाडं एका दक्षिणमुखी उतारावर होती.त्या जूनमध्ये मला असं दिसलं की,
वृक्षांची नवीन पालवी पूर्णपणे नाहीशी झाली होती.झाडं थंडीत पानझड झाल्यासारखी दिसत होती.
माझ्या जीपमधून मी उतरलो तेव्हा मला वादळी पावसासारखा गडगडाट ऐकू आला. पण आकाश तर निरभ्र होते म्हणजे हा आवाज हवामानाचा नव्हता.
नाही.झाडावरून लाखो सुरवंटांची काळीकाळी विष्ठा माझ्या डोक्यावर आणि खांद्यावर टपकत होती.शी! हे दृश्य पूर्व आणि उत्तर जर्मनीच्या मोठ्या पाईन जंगलातूनही दिसते.व्यावसायिक लागवडी होणारी एकसुरी जंगलं फुलपाखरू 'नन' आणि 'पाईन लूपर'
सारख्या पतंगांच्या घाऊक प्रजननाला संधी देते.
त्यांच्या जीवनचक्राच्या शेवटी मात्र झाडं आजारी पडतात आणि मग त्यांची संख्या एकदम रोडावते.जून महिन्याअखेर झाडावरची पानं संपली की मग सुरवंटांची विष्ठा पडायची थांबते.आता झाडांना आपली सर्व शक्ती पणाला लावून पुन्हा पालवी उगवायची असते.याला तशी अडचण येत नाही.काही आठवड्यानंतर सुरवंटांच्या चराईचे नामोनिशाण दिसत नाहीत,पण झाडाची वाढ मात्र मर्यादित होते.यावर्षी झाडाची वाढ कमी झाल्याचे खोडामधील अरुंद झालेल्या वाढीच्या चक्तीतून दिसून येते.जर सलग दोन-तीन वर्ष सुरवंटांची संख्या वाढली तर मात्र झाड अशक्त होऊन वठून जाते.जंगलात फुलपाखरांच्या अळ्यांबरोबर सूचीपर्णी सॉफ्लाईजसुद्धा असतात. 'सॉ' म्हणजे करवतीने कापणे.या माशा चक्क झाडाची उती कापतात आणि त्यात आपली अंडी घालतात. झाडांना त्यांच्या आळ्यांची जितकी भीती असते तितकी प्रौढ माशांपासून नसते.अळ्यांच्या इवल्याशा तोंडातून दिवसाला बारा सूचीपर्ण खाल्ली जातात आणि लवकरच झाडाला धोका निर्माण होतो.. 

अपूर्ण उर्वरित भाग पुढील लेखामध्ये..