* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एक छोटी गोष्ट जगणं मोठंं करुन सांगणारी..!

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

९/९/२२

एक छोटी गोष्ट जगणं मोठंं करुन सांगणारी..!

एका श्रीमंत माणसाला साक्षात अनुभवाविषयी विलक्षण आकर्षण असते.एके दिवशी तो एका सुंदर बेटाची आपल्या राहण्यासाठी निवड करतो.तिथे तो अनेक वर्षे राहतो.निसर्गाच्या सहवासात आपण इथे खूप वर्षे राहिलो,आता आपण आपल्या मुळ ठिकाणी परत जायला हवे असे त्याला वाटायला लागते.खरे तर तो त्या बेटावर तब्बल तीस वर्षे राहिलेला असतो.जेव्हा तो परत आपल्या मूळ स्थानी येतो. तेव्हा निरनिराळ्या माध्यमातील लोक-पत्रकार त्याची मुलाखत घेण्यासाठी त्याच्या बंगल्यावर येतात. ज्या बेटावर तो श्रीमंत वास्तव्याला असतो, ते बेट खरोखरीच अप्रतिम असते, सगळे त्याला विचारायला लागतात..ते निसर्गरम्य बेट कसे आहे? तीस वर्षाच्या या बेटावरील अनुभवाविषयी सविस्तर सांगा ना? या बेटावरील जंगली जनावरांचा तुम्हाला काही अनुभव आला का? या बेटावरचे पर्यावरण व ऋतूचक्र कसे होते? बदलत्या हवामानाचा तुम्हाला त्रास झाला नाही का? इतकी वर्षे तुम्ही या बेटावर राहिलात, त्या बेटाच्या वैशिष्ट्यांविषयी, निसर्गसौंदर्यांविषयी विस्ताराने सांगा ना? असे एक ना अनेक प्रश्न लोकांनी त्या श्रीमंत माणसाला विचारले. त्याने ते सगळे प्रश्न ऐकले आणि तो म्हणाला - अरे देवा, इतके ते बेट निसर्गरम्य व सुंदर होते, मी हे जर आधी जे ऐकले असते, तर त्या बेटाचा, तिथल्या निसर्गाचा-बदलत्या ऋतुचक्राचा मी अधिक मनापासून अनुभव घेतला असता.!


पत्रकार जेव्हा त्याला सारे प्रश्न विचारतात,तेव्हा त्याला त्या बेटाविषयी कुतूहल वाटायला लागते. मग त्याच्या लक्षात येते की, आपण त्या बेटावर तीस वर्षे राहिलो खरे, पण प्रत्यक्षात आपले त्या बेटाशी काहीच नाते नव्हते,आपण तसे काहीच पाहिले नाही,ना कुठला विशिष्ट अनुभव घेतला‌. आपण फक्त ऋतुचक्र ढकलत, तिथे जगत राहिलो.


पुस्तकातील ही एक छोटी गोष्ट जीवनातील मोठी गोष्ट सांगून जाते.आपल्या बाबतीतही असं होतं का?

चला जरा आपण विचार करू..।


नाही तर 'चांदण्यात भिजायचं राहून जायचं..'