● मुंग्या
जगात १२ हजार प्रकारच्या मुंग्यांच्या प्रजाती आहेत.
ह्या कमीतकमी १० हजार ते १० लाख संख्येने एकत्रितपणे राहतात.
मुंग्या एकाचवेळी एकाच झाडाची सगळी पाने तोडत नाहीत.(निसर्गाने त्यांना तशी बुध्दी दिली आहे.)
लाखो हजारो संख्येने हल्ला करुन संपूर्ण झाडावरील सगळी पाने तोडू शकतात.पण त्या तसं करत नाही.आसपास असणाऱ्या इतर झाडांची पाने ती तोडतात.ही पाने आपल्या जमिनीखाली असणाऱ्या वारूळामध्ये (त्यांच्या घरात) नेऊन ठेवतात, व त्यावरती त्यांना खाण्यासाठी लागणारी बुरशी पसरवतात,त्यांची वाढ करतात.अशा पध्दतीने मुंग्या शेती करतात..
मुंग्या दुग्धपालन व पशुपालन सुद्धा करतात त्यांना आवडणारे जे किडे असतात. त्यांच्या शरीरातून जो पांढरा द्रव येतो. तो मुंग्यांना फार आवडतो अशा किड्यांना मुंग्या पाळतात त्यांना खायला घालतात आणि त्यांच्या शरीरातून बाहेर पडणारा तो पांढरा द्रव खातात. मुंग्यांच्या नादाला कोणताही प्राणी किंवा पक्षी लागत नाही आणि मुंग्याही कुणाला भीत नाहीत कारण त्या एकाच वेळी सर्व बाजूंनी हल्ला करतात.
( हत्तीसुध्दा यांच्या नादाला लागत नाहीत.)
या मुंगीच्या घराची रचना ही विशिष्ट प्रकारे केलेली असते.ज्या छोट्याशा जागेतून म्हणजे मुंग्या आत जातात त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून काही मुंग्यांची ही नियुक्ती केली जात असते.( तिन्ही शिफ्टमध्ये यांचे हे सुरक्षा देण्याचे काम चालते.) तर विशिष्ट असा वेगळा आहार देऊन त्या मुंग्यांना बलवान केले जाते आणि मुंग्यानीच स्वतः तयार केलेल्या रसायनाचा वापर त्यांच्या डोक्यावरती करून त्यांचं डोकं ढालीसारखं टणक केलं जातं. यामुळे त्यांचं डोकं हे दरवाज्यासारखं होतं आणि घरात येणाऱ्या मार्गासमोर ते एका चिरेबंद दारासारखं बंद केलं जातं. या दरवाजातून ज्या वेळेला मुंगी आत येते त्यावेळी ही मुंगी आपलीच आहे का? याची खात्री करून घेण्यासाठी तिच्या अंगाला 'ओळखीचा' वास येतो का याची आधी खात्री करून घेतली जाते,आणि मगच तिला या घरामध्ये प्रवेश दिला जातो. मुंगी आपल्या वजनापेक्षा पाच ते सात पट वजन जास्त उचलू शकते. आणि जर त्या एकाचवेळी एकत्रित आल्या.तर आपल्या समुहापेक्षा ५० ते ६० पट वजन उचलू शकतात.
● फुलपाखरु
मोनार जातीच्या फुलपाखरांची रूंदी जवळजवळ १ फुटांपर्यंत असते.ते अंडी घालण्यासाठी आपल्या वस्तीपासून ४ हजार किलोमीटर दूर जातात.आणि तिथे अंडी घालतात.ते अंतर आहे कन्याकुमारीचे टोक लडाख असे जरी धरले.
तरी ते ३८००(अडत्तीशे) कि.मी.होते. त्या ठिकाणी जाऊन तिथे अंडे घालतात.व परत येताना ते आपल्या पिल्लांना सोबत घेऊन मूळ ठिकाणी परत येतात.
का,कसं याचं संशोधन अजून बाकी आहे?
फुलपाखरे ही क्षार मिळवण्यासाठी समुद्राकाठी येतात.कारण त्यांच्या शरीरामध्ये क्षार नसते. ते मिळवण्यासाठी ते मृत प्राण्याजवळ जातात. सर्वात अगोदर फुलपाखरे याठिकाणी पोहोचतात.याकामी त्यांची तीक्ष्ण संवेदना नैसर्गिकरित्या उपयोगाला येते.जी मृत प्राण्याजवळ जाण्यासाठी त्यांना मदत करते.
पहिली औद्योगिक क्रांती इंग्लंडमध्ये झाली. आणि यासाठी ऊर्जेची गरज भासली.व ही ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी कोळशाच्या खाणी मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आल्या.ज्यावेळी खाणींमध्ये काम करत असताना. कोळशाचा चुरा,राख व इतर घटक हे हवेमध्ये मोठ्याप्रमाणात वातावरणात मिसळून जात.त्यामुळे आसपासचा सर्व परिसर हा काळाकुट्ट व्हायचा.हे सर्व होत असताना.नकळतपणे जवळच असणारी माणसं,झाडं हीसुध्दा काळी झाली होती..पण या काळ्या वातावरणात मात्र ही फुलपाखरे रंगीबेरंगी होती.त्यामुळे एक अडचण निर्माण झाली होती.सगळा परिसर काळा पण फुलपाखरे मात्र रंगीबेरंगी यामुळे त्यांना खाणारे सहज त्यांना ओळखत व मटकन खाऊन टाकत होते. त्यामुळे त्यांची पुढील पिढी अनुभव घेवून उत्क्रांत झाली.व त्यांनी काही कालांतराने आपला रंग कळा करून घेतला.पुढे कोळशाच्या खाणी बंद पडल्या त्यांची कोळशाची गरज संपली. परत पुढच्या ६० ते ७० वर्षामध्ये गंमत झाली. त्या फुलपाखरांनी परत आपला पुर्वीसारखा मुळ निसर्गाचा रंग धारण केला. त्यांच्या स्पिसिजमध्ये जे रंग होते.ते त्यांना सन्मानाने परत मिळाले.
● कोळी ( स्पायडर )
आपल्याला जे कोळी दिसतात. त्यात कोळी जो जाळ विणतो. शक्यतो हे जाळ दरवेळी नर विणतो.त्यावेळी मादी बाजूला असते. मादी ही नरापेक्षा तीन चार पटीने मोठी असते. या जाळ्यामध्ये जर शिकार अडकली. तर नर आणि मादी दोघे मिळून त्याचा ताबा घेतात. यांच्यामध्ये एक भन्नाट पद्धत असते.जर एखाद्या नर कोळ्याला मादीला प्रपोज करायचं असेल तर त्या मादीला आवडणाऱ्या किड्याची शिकार करून त्याला अर्धमेला करून व्यवस्थित पॅकिंग करून मादीला तो भेट म्हणून देतो व तीला मागणी घालतो.(प्रपोज करतो)
जर मादीला ते पॅकिंग त्यातील किडा आवडला तर ती त्याला होकार देते,व ते एक होतात. असे निरीक्षण करून शास्त्रज्ञांनी त्याची नोंद घेतलेली आहे.
काही कोळी हुशार असतात त्यांना मुंग्या फार आवडतात. इतर कीटक त्यांना आवडतात पण मुंग्या त्यांच्या खास आवडीच्या असतात.आपण लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की वाघाचं कातडं पांघरून वावरणारा लांडगा नेमकी याच गोष्टीची उजळणी हे कोळी करत असतात.
कोळ्यांना मुंग्या आवडतात पण मुंग्या सहजासहजी त्यांना 'हिगंलत' नाहीत.(विचारत) नाहीत.कारण त्या हल्ला करतात ही भीती असतेच. मग याठिकाणी कोळ्यांची कल्पकता धावून येते.हे कोळी मुंग्यांच्या जवळ जाऊन आकर्षित हालचाली करतात. आणि वेळ मिळताच एका मुंगीला अर्धमेली करतात.तिचे संपूर्ण शरीर आतून पोखरतात. व त्या शरीराच्या आत जातात. 'वरून मुंगी आतून कोळी' असं बहुरूप घेऊन हा कोळी मुंग्यांच्या वारूळात शिरतो.आणि हळूहळू त्यातील मुंग्यांचा फरशा पडतो. ही गोष्ट शोधून संशोधकांनी नवीन माहिती आपल्याकरिता उपलब्ध करून दिलेली आहे.
(सोनकिडे किंवा सोंडकिडे ही हाच मार्ग अवलंबतात.पण जर ते सापडले तर मात्र मुंग्या त्यांचा फडशा पाडतात. )
आतापर्यंत शोध लागलेल्या व शोधलेल्या अशा
७ लाख कीटकांच्या जाती माहीत झालेल्या आहेत.
जाता जाता..!
मित्रांनो,जगामध्ये अमेरिकासारख्या देशात 'किड्याचा' मोठा पुतळा आहे.जो अलाबामा शहरात १०० वर्षापूर्वी सन्मानपूर्वक उभा केला आहे.अमेरीकेत त्यावेळी साधारणतः कपाशीचे पिके घेतले जात असे.त्यावेळी त्या राज्यातील सर्व पिकांवर कीड पडली. व किड्यांनी संपूर्ण पीक नष्ट केले. सर्वजण देशोधडीला लागली.
लोक परागंदा झाली.काहींनी राज्य सोडले.आणि त्याच वेळी 'एक होता कार्व्हर' यांचे आगमन झाले.त्यांनी त्या लोकांना भुईमूग,मका अशी वेगवेगळ्या पिकांचे उत्पन्न घेण्यास सांगितले.त्यासाठी लागणारी सर्व माहिती त्यांनी लोकांना सांगितली. त्यानंतर दहा वर्षातच कष्ट करून त्या राज्याने आपली प्रगती केली.व लवकरच ते राज्य समृद्ध राज्य म्हणून गणले जावू लागले.
मग सर्वानुमते एक ठराव संमत करण्यात आला.आणि तो ऐतिहासिक,क्रांतिकारी जगावेगळा निर्णय घेण्यात आला. ज्या किड्यामुळे आपले कपाशीचे पीक नष्ट झाले,आणि आपणास पर्यायी पिकांचे उत्पादन घेण्याचा मार्ग मिळाली.त्यासाठी प्रेरणा देणाऱ्या व प्रतिकूल परिस्थितीत लढण्याचे बळ प्रदान करून नैसर्गिक निवड करायला सहकार्य केलेल्या त्या किड्याचा आपण मनस्वी सन्मान करायचा.त्या किड्याने जर पीक नष्ट केले नसते तर आपण दुसऱ्या पिकांचा विचारही केला त्या किड्याने आपणास पर्यायी मार्ग शोधण्यासाठी मदतच केली. म्हणून सन्मानपूर्वक सन्माननीय असा पुतळा बसवला गेला.
धन्य ती लोकं धन्य तो किडा..! हिच ती 'निसर्गाची नवलाई'
'निसर्गाची नवलाई' या सतीश खाडे यांच्या पाॅडकास्टमधून..
शब्दांकन - विजय कृष्णात गायकवाड
सदर लेखामधील भाग "मासिक शिक्षणयात्री ऑक्टो - नोव्हे जोडअंक 2022 ( दिवाळी विशेषांक ) मध्ये प्रकाशित केल्याबद्दल सर्वच संपादकीय मंडळाचे आभार..