संप्रेषण म्हणजे कल्पना,विचार,भावना,माहिती किंवा सदेश एका व्यक्तीकडू दुसऱ्या व्यक्तीकडे,किंवा गटाकडून दुसऱ्या गटाकडे पोहचविण्याची प्रक्रिया..
" विज्ञान हे ज्ञात 'तथ्ये' तयार करण्याबद्दल नाही.
विचित्र प्रश्न विचारण्याची आणि त्यांना वास्तविकता तपासण्याची ही एक पद्धत आहे,ज्यामुळे आपल्याला जे काही चांगले वाटते त्यावर विश्वास ठेवण्याची मानवी प्रवृत्ती टाळली जाते." टेरी प्रचेट यानी म्हटलेलं आहे.
पूर्वीच्या काळी आपल्याला 'उचकी' लागली की आपण म्हणायचं 'कुणीतरी' आपलं नाव काढलं.यातूनच टेलिफिती आपल्याला समजलेली आहे.आपण जर मनापासून एखाद्या व्यक्तीची नाव काढलं आठवण काढली तर नेमके त्या व्यक्तीकडून आपल्याला काही संदेश किंवा निरोप किंवा पत्र यायचे.आपण भटक्या अवस्थेत होतो त्यावेळी शिकार करून फळ खाऊन आपण आपलं उदरनिर्वाह करत असू. वडिलांनी शिकार केलेल्या जनावरांच्या कातड्यापासून आई कपडे तयार करायची.त्यांचा मुलगा जंगलात दिवसभर खेळायचा त्याचा खेळ म्हणजे नवनवीन वनस्पती शोधणे,फळांच्या चवी घेणं,जंगलामध्ये आसपासच्या परिसरामध्ये झालेल्या बदलांची नोंद घेणे. शिकार करण्यासाठी तयार करायला जी आयुधे लागतात ती स्वतःतयार करणे आणि स्वतःला सुरक्षित करण्याचं तंत्र या खेळातून निर्माण करणे.
जॉन पँकसेप यांनी त्यांच्या Affective Neuroscience: The Foun- dations of Human and Animal Emotions यात साधारण अशाच प्रकारचा निष्कर्ष काढला आहे.त्यांनी असं लिहिलं आहे की,एक गोष्ट अगदी खात्रीलायकपणे सांगता येते,ती म्हणजे प्राणी खेळत असतात,त्या वेळी अधिक लवचीकपणा आणि निर्मितीशील पद्धती वापरण्याकडे त्यांचा जास्त कल असतो."
एडवर्ड एम.हॅलोवेल हे एक मानसोपचारतज्ज्ञ आहेत,आणि मेंदूच्या कार्यासंबंधात त्यांचा खास अभ्यास आहे.ते म्हणतात की,खेळामुळे मेंदूच्या अंमलबजावणी करण्याच्या कार्यावर सकारात्मक परिणाम होतो.त्यांनी एके ठिकाणी लिहिलंय,मेंदूच्या अंमलबजावणी कार्यामध्ये अंतर्भूत होणाऱ्या गोष्टी आहेत,त्या म्हणजे योजना आखणं,त्यांचे अग्रक्रम ठरवणं,कोणतं कार्य कधी करायचं ते ठरवणं,
कामासंदर्भातल्या अपेक्षा ठेवणं,प्रतिनिधिक गोष्टी ठरवणं,निर्णय घेणं,विश्लेषण करणं थोडक्यात सांगायचं तर व्यवसाय उत्तम तऱ्हेने चालवण्यासाठी एका कार्यकारी अधिकाऱ्याला प्रभुत्व मिळवण्यासाठी गरजेची असलेली जवळ जवळ सगळीच कौशल्यं मेंदूजवळ असतात आणि खेळामुळे ही कौशल्यं अधिक उजळून निघतात.
हॅलोविल लिहितात : पृथ्वी गोल आहे हा शोध कोलंबसला लागला तेव्हा तो खेळातच रमलेला होता. सफरचंदाच्या झाडावरून एक सफरचंद खाली पडताना न्यूटनने पाहिलं आणि गुरुत्वाकर्षणाच्या ताकदीचा शोध त्यांना लागला,त्या वेळी तेही काहीतरी खेळतच होते. वॅटसन आणि क्रिक डी.एन.ए.मॉलिक्यूलच्या संभाव्य आकाराबद्दल खेळकरपणे चर्चा करत होते,त्याच वेळी त्यांना डबल हेलिकसच्या संरचनेची कल्पना आली. Iambic meter या संकल्पनेशी शेक्सपिअर आयुष्यभर खेळले.मोझार्ट यांनी त्यांच्या हयातीतला जागेपणीचा एक क्षणही खेळाशिवाय वाया घालवला नाही.
आईनस्टाईन यांचे 'थॉट एक्सपरिमेंटस्' हे स्वतःच्या मनाशी खेळण्याचं उत्तम उदाहरण आहे.
शिकारीसाठी भरपूर वेळ लागायचा.या गरजेतूनच शोध लागत गेले.शेवटी गरज ही शोधाची जननी असते.शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे,की प्राण्यांना केवळ पन्नासच्या आसपास शब्द कळू शकतात.पण म्हणून त्यांच्याशी न बोलणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील न करणे चुकीचे आहे.केवळ मनुष्यच एकमेकांशी संवाद साधू शकतात,असा विचार करणे पूर्णपणे चूक आहे.दोन जीवांमधला संवाद हा भाषेच्या मर्यादा ओलांडून जातो शब्द पोहोचले नाहीत तरी भाव नक्की पोहोचतो.प्राणी कोणता का असेना,पाळीव कुत्रा असो नाहीतर जंगली हत्ती,नुसते त्यांच्यासमोर उभे राहून संवाद साधला जात नाही,तर त्यांना प्रतिसाद देणे तितकेच महत्त्वाचे असते.त्यांना प्रतिसाद दिला,की तुमचा संवाद पूर्ण होतो.इतर सगळ्यांसारखाच प्राण्यांमध्ये संवाद हा दोन्हीबाजूंनी,विचारांची,संभाषणाची देवाणघेवाण करून होतो.जर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले नाहीत,तर संवाद पूर्ण होत नाही.इतकी ही साधी गोष्ट आहे,पण लक्षात लवकर येत नाही.
'जमात' (Community) हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. माणूस एकटा राहत नाही.तो जमावात,समाजात राहणारा प्राणी आहे.त्यामुळे भाषा हे महत्त्वाचे संपर्क साधन आहे.पृथ्वीतलावरील एकमेकांशी संपर्क साधण्याची सर्वोत्तम क्षमता असणारा 'मानव' हा प्राणी आहे.संवाद ही आपल्याला उत्क्रांतीने दिलेली देणगी आहे.आपला आवाज,कान यांचा वापर करून आपण माहितीची देवाणघेवाण करतो. १९६० पर्यंत ५०% लोक वाचायला शिकले.त्यामुळे संपर्काचे सगळ्यात उत्तम साधन म्हणजे 'बोलणे' हे विसरून आपण लेखनाकडे वळू लागलो आहोत.लिहून आपल्या भावना दुसऱ्यापर्यंत पोहोचवू लागलो आहोत.
समूह एकत्र येऊन शिकार करू लागले.एकोप्याची ताकद त्यांच्या लक्षात आली.समूहाने राहिल्यामुळे रोगांची संख्या वाढली,त्यामुळे मृत्यूचं प्रमाण वाढलं व मग भिती मधून अंधश्रद्धे मधून अलौकिक शक्तीला शरण जाणं आलं.
माणसा-माणसातील नाते हे वेगवेगळ्या मार्गांनी व्यक्त होत असते.उदा.हस्तांदोलनाने सुरू होणाऱ्या वाटाघाटी यशस्वी होण्याची अधिक शक्यता असते.
मेंदूच्या कार्याविषयी झालेल्या संशोधनात असे आढळले की, आमने सामने (फेस टू फेस) प्रत्यक्ष संभाषण झाले तर ते स्वीकारण्यासाठी आवश्यक ती मानसिकता तयार होणे वा समोरच्या व्यक्तीचे विचार वा भावना समजून घेणे यासाठी मेंदू अधिक सक्रीय होतो, सहानुभावासाठी,दुसऱ्याला समजून घेण्यासाठी ही क्षमता आवश्यक असते आणि ती फक्त मनुष्य जातीलाच मिळाली आहे.
अगोदर कुत्रा चावल्यानंतर लाखो लोक मरायचीत.हे सर्व होत असताना आपण विज्ञाकडे हळूहळू वाटचाल करीत होतो.जेव्हा काहीही नव्हतं तेव्हा विज्ञान होतं फक्त त्याला नाव मिळायचं होतं.डॉक्टरांनी शास्त्रज्ञांनी मिळून त्यावर संशोधन केलं आणि रॅबिज या लसीचा शोध लागला.आणि या रोगाने फुकट मारणारी बुद्धिमान अशी प्रजाती मरायची थांबली.
समुद्री पक्षी जर चोचीत मासे घेऊन उडत असतील, तर जवळपास जमीन नक्कीच आहे याची खलाशांना खात्री पटायची.कारण पक्षी चोचीत मासे आपल्या पिलांसाठी घेऊन जातात आणि ती पिल्ले जमिनीवरच असतात.काही पक्ष्यांची उडण्याची क्षमता जास्त नसते. त्यामुळे ते जमिनीपासून फार लांब जात नाहीत. हा ही स्वभाव खलाशांच्या लक्षात आला होता.फ्लॉकी - वल्गॲडर्सन नावाचा एक दर्यावर्दी होता.आईसलंडच्या शोधाचे श्रेय यालाच दिलं जातं.तो आपल्याबरोबर रावेन नावाचे पक्षी घेऊन जायचा. जमीन जवळ आली आहे अशी शंका आली की पिंजऱ्यातला एक पक्षी सोडला जायचा जर जमीन जवळ असेल तर तो पक्षी जमिनीच्या दिशेने उडत जायचा आणि मग वल्गॲडर्सन आपल्या बोटी त्या पक्षाच्या मागोमाग न्यायचा.पण जमीन जवळपास नसेल तर मात्र तो पक्षी बोटीवरच घिरट्या घालून परत बोटीवर उतरायचा.
तांत्रिक ज्ञानाच्या बाबतीत चिंपांझी व आपण यांच्यात खूप फरक आहे हे खरं तरीही तंत्रज्ञानातील प्रगती ही फक्त १५०,०० वर्षे इतकीच जुनी आहे.उत्क्रांतीच्या प्रक्रियेच्या वेगापेक्षा तंत्रज्ञानातील प्रगतीचा वेग हा खूप जास्त आहे.आपला दिवस विज्ञान शिवाय सुरू होत नाही व संपतही नाही.पूर्वीच्या काळी असणारी सामाजिक परिस्थिती आणि आज असणारी सामाजिक परिस्थिती यामध्ये खूप अंतर पडलेलं आहे.पूर्वी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी आज शक्य झालेल्या आहेत.
मोबाईल, संगणक,ए आय एप्लीकेशन,वेगवेगळे अँप ॲमेझॉन सारखी शॉपिंग सेंटर या शोधाने आपलं जीवन सुखाचं आणि आनंदाचं केलेलं आहे.आपण जगातील कोणत्याही टोकावरती असलेल्या माणसाची काही मिनिटांमध्ये संपर्क साधू शकता.गुगलवर आपल्याला हवी तेवढीच माहिती एका टच वर मिळवू शकतो. माहितीचा हा समुद्र आपल्याला हवी तेव्हा माहिती देण्यास तत्पर आहे.आता अंधारही पूर्वीसारखा अंधार राहिलेला नाही.रात्र सुध्दा आपण विजेचे बल्ब लावून पांढरी केलेली आहे.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये होत असणारे नाविन्यपूर्ण शोध त्यासोबत तंत्रज्ञानातील रोबोट्स यामुळे मानवी जीवनाला वेदना मुक्त होण्यास सुखकारक ठरत आहे. विज्ञानामुळे व तंत्रज्ञानामुळे मानवी आयुष्यामध्ये वाढ झालेले आहे आत्ताच्या जगामध्ये मृत्यू सहज होत नाही. प्रत्येक रोगावर इलाज आहे.जंगलापासून बहुमजली इमारतीपर्यंतचा प्रवास हा विज्ञानामुळे सहज सोपा झालेला आहे.तंत्रज्ञानामुळे हा प्रगतीचा वेग वाढला आहे पण तंत्रज्ञानामुळे येणाऱ्या समस्या सोडण्या इतके आपण पूर्णतःसक्षम नाही.
तंत्रज्ञानाचा वारेमाप वापर आपणाला स्वतःपासून व समाजापासून खूप दुर घेऊन जात आहे.मोबाईलच्या अतिवापरामुळे त्याचे दुष्परिणाम आता जाणवू लागलेले आहेत.यासाठी मोबाईल वापरणे बंद करायचं नसून त्याचा वापर मर्यादित ठेवायचा असा आहे.वयस्कर लोकांना या नवीन व्यसनामुळे त्यांच्यात विसरभोळेपणा,निर्णयक्षमता कमी होणे,मानसिक अस्थैर्य आणि अस्वस्थपणा,चिडचिड ही लक्षणं तर दिसतातच,पण मानदुखी,पाठदुखी,दिसण्याचा त्रास, चकरा येणे,डोकेदुखी,निद्रानाश असे अनेक विकारही होतात.नवीन संशोधनात असं दिसून आलंय की त्यांच्या मेंदूची झीजही वाढते.मानवी मेंदूला विविध प्रकारच्या संवेदना होणे,अनेक प्रकारच्या उत्तेजना (स्टिम्युलस) मिळणे आवश्यक आहे,ते न मिळाल्यास मेंदूच्या पेशींची वाढ खुंटते,आहेत त्याही पेशी निकामी व्हायला लागतात. दिवसभर स्क्रीन-मोबाईलकडे बघत राहणे हे एकच काम करण्यानं मेंदूला इतर कुठलीही गोष्ट करण्याची इच्छा होत नाही. हे फार भयंकर आहे.
अगदी श्रीमंतांपासून ते गरीब-वंचितांपर्यंत, दीड-दोन वर्षांच्या बाळांपासून ते नव्वदीतल्या स्त्री-पुरुषांपर्यंत अनेकांना या व्यसनानं गिळून टाकायचा प्रयत्न चालवलाय.(डॉ.राजश देशपांडे न्यूरोलॉजिस्ट पुणे-मुंबई) त्यामुळे लवकरच हॅप्पी स्वीच ऑफ करा.
फ्रान्स दे वाल यांनी मला एका रशियन महिला शास्त्रज्ञाची गोष्ट सांगितली.त्यांनी एक चिंम्पाझीच एक पिल्लू पाळलं होतं.ते एकदा घराच्या छपरावर जाऊन बसलं.काही केल्या ते खाली उतरेना.तिने त्याला छानशा ताज्या फळांचं आमिष दाखवलं तरीही ते बघेना! मग तिने एक युक्ती केली.आपल्याला काहीतरी लागून वेदना होतायत,असं दाखवत ती खोटं खोटं रडत जमिनीवर मटकन बसली आणि काय आश्चर्य,ते पिल्ले धावत खाली येऊन,तिला मिठी मारून तिची समजूत घालू लागलं.जणू तिचं दुःख त्याला कळलं होतं. उत्क्रांतीतला आपला सगळ्यात जवळचा नातेवाईक. चिंम्पाझीमध्ये सुध्दा केळी खाण्यापेक्षा सहानुभावाची भावना अधिक जास्त प्रमाणात असते,हेच वावरून सिद्ध झालं.
जीवाश्मशास्त्रज्ञ (Paleontologist) सिमॉन कॉनवे मॉरिस यांनी बायबलमधील Love the neighbours (शेजाऱ्यांवर प्रेम करा), वचनाचा उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून असा अर्थ लावला आहे की हे वचन म्हणजे समाजातील जोडून राहण्याच्या प्रक्रियेतील एक पायरीआहे.पावित्र्य,संयम,दया,
परिश्रम,नैतिक बांधिलकी,नम्रता इ. गुण हे समाजात एकत्र राहण्यासाठी आवश्यक असणारे गुण आहेत.
इतिहासातील कुठल्याही धर्माची मूलतत्वे पाहिली तर दुसऱ्याकडून तुम्ही जशी वागण्याची अपेक्षा करता,
तसेच तुम्ही इतरांशी वागा.
शेवटी जाता जाता…
श्रीमती इला भट्ट या एक श्रेष्ठ दर्जाच्या आणि द्रष्ट्या आवश्यकतावादीक नेत्या आहेत.त्यांच्या कामाचा आणि उल्लेखनीय कामगिरीचा वारसाही तितकाच श्रेष्ठ दर्जाचा आहे. 'Indira Gandhi Prize for Peace' सारखा प्रतिष्ठित पुरस्कार तर त्यांनी मिळवलेला आहेच शिवाय भारतातल्या गरीब स्त्रियांच्या उद्धारासाठी,त्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी स्वतःला वाहून घेणाऱ्या डझनभराहूनही अधिक संस्था त्यांनी स्थापन केल्या आहेत.हिलरी क्लिंटन यांच्या काही 'पर्सनल हिरॉईन्स' पैकी एक म्हणूनही त्यांचं नाव घेतलं जातं.त्या म्हणतात,
"माणसाच्या अनेक गुणांमध्ये त्याचा साधेपणा हा गुण मला सर्वाधिक प्रिय आहे.इतका जास्त प्रिय की साधेपणामुळेच अनेक वैयक्तिक आणि जागतिक समस्या सुटू शकतात,यावर मला मनापासून विश्वास ठेवावासा वाटतो.जीवनाकडे बघण्याचा एखाद्याचा दृष्टिकोन अगदी साधा असेल,तर त्याला वरचेवर खोटं बोलावं लागत नाही.त्याला कधी कुणाशी भांडावं लागत नाही,कधी चोरी करावी लागत नाही.
हेवेदावे,संताप, शिवीगाळ,कुणाचा जीव घेणं या गोष्टींची त्याला गरजच भासत नाही.प्रत्येकाला पुरेसं,भरपूर मिळू शकतं. त्यामुळेसाठेबाजी,सट्टेबाजी,
जुगार खेळणं,कुणाचा तिरस्कार करणं या गोष्टींची गरजच नाही.तुमचं चारित्र्य सुंदर असेल तर तुम्हीही सुंदरच असता. साधेपणाचं हेच सौंदर्य आहे."
विज्ञान संप्रेषणातून जागरूकता वाढवणे.डॉ.दिपक शेटे,गणितायन लॅबचे निर्माते,महाराष्ट्र शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित