* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: प्रेम जाणून घेताना..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१३/११/२२

प्रेम जाणून घेताना..

खरे प्रेम तसे कठीणच असते. पण आपण ते अनुभवायला आतुर असतो.प्रेम हे जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी सर्व त्याच्या पार्श्वभूमीसाठी असते. प्रेम करणे हे निसर्गाने मानवावर सोपवलेले सर्वांत कठीण आणि सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. तरुणाईला वाटते की प्रेम हा आपला प्रांत आहे,पण तरुणांची प्रेम करायची कुवतच नसते.आपल्या सर्वस्वानिशी प्रेम करायला शिकावे लागते. प्रेम म्हणजे दुसऱ्यामध्ये विरघळून जाणे किंवा स्वतःला समर्पित करणे किंवा एक होणे नव्हे ! कारण दोन अपूर्ण, स्वतःला नीट न ओळखणारी,एकस्पंद नसलेली माणसे एक कशी होतील ?


प्रेम हे तुम्हाला संपूर्ण परिपक्क करणारी गोष्ट आहे. स्वतः पूर्णत्वाकडे नेणारी,आपल्या आतील अवकाश असीम विस्तारणारी,दुसऱ्यासाठी अवघे विश्वच बनायची प्रेरणा देणारी बाब म्हणजे प्रेम !कधी कधी एका आयुष्यात ते पूर्णत्वाला जाईल असे नाही.प्रेम जीवनाचे अंतिम रूप आहे.तरुण माणसे प्रेमात स्वतःला विरून टाकतात. एकासाठी दुसरा मिटवून घेतो,अन् आपल्याबरोबर दुसऱ्यालाही अपूर्ण बनवतो.अशा तुकड्यातून कुणाला कसे काय पूर्णत्व मिळू शकेल? त्यातच आनंद मानून राहणाऱ्याच्या वाट्याला भविष्यात निराशा अन तिरस्कार हेच येईल. सामान्यांना त्यातच स्वर्ग आहे,असे वाटते,पण आपला आतील अवकाश,आपला सर्जनाला प्रेरक ठरणारा असीम एकाकीपणा कधीही मिटू देऊ नये. प्रेमाने त्याच्या या अवकाशाच्या कक्षा आणखी रुंदावायला हव्यात खऱ्या प्रेमात दोघांचाही विकास व्हायला हवा ! एकमेकांपासून स्वतंत्र, विकसनशील अन तरीही बंधनात असणे, ही भावना जाणवायला हवी !


'प्रेम' या मूल्याविषयी जर्मन कवी रिने मारिया रिल्के याने एका तरुण कवीला लिहिलेले पत्र..!


'अवेकन द जायंट विदिन मधून..'