* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: प्रेम जाणून घेताना..

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/११/२२

प्रेम जाणून घेताना..

खरे प्रेम तसे कठीणच असते. पण आपण ते अनुभवायला आतुर असतो.प्रेम हे जीवनात सर्वात महत्त्वाचे आहे. बाकी सर्व त्याच्या पार्श्वभूमीसाठी असते. प्रेम करणे हे निसर्गाने मानवावर सोपवलेले सर्वांत कठीण आणि सर्वात महत्त्वाचे कार्य आहे. तरुणाईला वाटते की प्रेम हा आपला प्रांत आहे,पण तरुणांची प्रेम करायची कुवतच नसते.आपल्या सर्वस्वानिशी प्रेम करायला शिकावे लागते. प्रेम म्हणजे दुसऱ्यामध्ये विरघळून जाणे किंवा स्वतःला समर्पित करणे किंवा एक होणे नव्हे ! कारण दोन अपूर्ण, स्वतःला नीट न ओळखणारी,एकस्पंद नसलेली माणसे एक कशी होतील ?


प्रेम हे तुम्हाला संपूर्ण परिपक्क करणारी गोष्ट आहे. स्वतः पूर्णत्वाकडे नेणारी,आपल्या आतील अवकाश असीम विस्तारणारी,दुसऱ्यासाठी अवघे विश्वच बनायची प्रेरणा देणारी बाब म्हणजे प्रेम !कधी कधी एका आयुष्यात ते पूर्णत्वाला जाईल असे नाही.प्रेम जीवनाचे अंतिम रूप आहे.तरुण माणसे प्रेमात स्वतःला विरून टाकतात. एकासाठी दुसरा मिटवून घेतो,अन् आपल्याबरोबर दुसऱ्यालाही अपूर्ण बनवतो.अशा तुकड्यातून कुणाला कसे काय पूर्णत्व मिळू शकेल? त्यातच आनंद मानून राहणाऱ्याच्या वाट्याला भविष्यात निराशा अन तिरस्कार हेच येईल. सामान्यांना त्यातच स्वर्ग आहे,असे वाटते,पण आपला आतील अवकाश,आपला सर्जनाला प्रेरक ठरणारा असीम एकाकीपणा कधीही मिटू देऊ नये. प्रेमाने त्याच्या या अवकाशाच्या कक्षा आणखी रुंदावायला हव्यात खऱ्या प्रेमात दोघांचाही विकास व्हायला हवा ! एकमेकांपासून स्वतंत्र, विकसनशील अन तरीही बंधनात असणे, ही भावना जाणवायला हवी !


'प्रेम' या मूल्याविषयी जर्मन कवी रिने मारिया रिल्के याने एका तरुण कवीला लिहिलेले पत्र..!


'अवेकन द जायंट विदिन मधून..'