* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२६/४/२४

पातीवरल्या बाया Women on the floor

भावनांची तीव्र मूळं शब्दांच्या भुईत 

रूजवणाऱ्या कवींच्या ह्या 'पातीवरल्या बाया'


नदी युगायुगांचे तप घेऊन वाहत असते.ती थकलेल्या माणसांच्या हाडांची राखेसहित त्यांचा काळ देखील धुवून काढत असते.नदी ठेवत नाही जपून कुणाचा संदर्भ,

कुणाचा इतिहास,कुणाचा काळ.कारण नदीला व्हायचं असतं पुन्हा पुन्हा स्वच्छंद निच्छल सजक वर्तमानाच्या पिढ्यानपिढ्यांची तहान भागवण्यासाठी.'तहान' 

या एकाच शब्दाला 'पाणी' मिळालं तर अंतःकरणातून कुठल्याही सजीवाला क्षणभरात टवटवीतपण लाभतं.

म्हणून नदी कुण्या एकासाठीच वाहत नाही.तसेच ती प्रवाह जगताना कुठल्याही काळासाठी थांबत नाही.

भुईच्या गर्भातून वाहणारी तशी नदी म्हणजे भुईची लेकच.पण ह्या भुईवर 'नदी' नावाची बाई तसेच 'बाई' नावाची नदी मला तरी युगपरात वाहतांना दिसलेली नाही आणि असा संदर्भ देखील ह्या भुईनेही युगा - 

युगानुसार नोंदलेला नसावा.नदीला 'माय' म्हणणारी माणसं नदीलाच दुषित करतात,नदीचा नाला करतात,

नदीत उडी घेत आत्महत्या करतात.मात्र जनावरं नदीला माय मानत नाही.नाही नदीला दुषित करण्याचा त्यांचा हेतू असतो.ते तर नदीचा नालाही करत नाही आणि आत्महत्या तर अजिबातच करत नाही.जनावरं अलिप्त असतात माणसांच्या विचारधारेतून,हे नदीलाही कळत असावं.म्हणून माणूस नदी जगू शकतो पण जगतांना माणसाला नदीची निर्मिती करता येऊ शकत नाही.कारण नदी निर्मितीचे सर्व हक्क ह्या सृष्टीला आहेत. 


खालील प्रमाणे कवी 'नदी' ह्या कवितेतून म्हणतात -


            नदी वाहे वळणाने, दुःख घेत उदरात

             गाव निजते खुशाल, दान घेते पदरात

             {पृष्ठ क्रमांक : २१}


कुणी थांबवून विचारतं का नदीला नदीचे दुःख ? नदीचे नैसर्गिक ऐवज काळानुसार कमी होऊ लागलीयेत ! दूर्मिळ होत चाललीयेत खेकडं - मासे,रंगारंगांचे शंख शिंपले,काठाभोवतीची वनस्पती आणि नदीची ओल.गाव शहरांनी तर नदीला दुषित करून नदीचा कसच काढून टाकलाय.? नदीचा नाला करून,तिच्या भोवती अतिक्रमण करून तिचा विस्तारता काठ आखडवून टाकलाय.तिचा खळखळ - झुळझुळ - स्थिर वाहणाऱ्या प्रवाहाला देखील बांधांनी विभागून टाकलाय.जाऊळाची केसं,राख झालेल्या देहाची उरलेली हाडं,केमिकलचं सांडपाणी,

विसर्जित मुर्त्या नदीच्या गर्भात टाकून नदी हेच दुःख उदरात घेत युग जगतेय की काय ? प्रश्नच आहे.बाईचं वाहणं नात्यात आहे,तिचं उद्ध्वस्त होणं माणसात आहे पण नदीचं काय ? बाई तप जगत असेल तर नदी तपातपांचं युग जगत असते,याची नोंद भुईने युगानुयुगे घेतलीच असावी.नदीचं महत्व सांगताना स्त्री प्रासंगिकतेचा तीव्र भाव पाण्यासाठी कसा स्पष्ट होतो हे 'बाई घायाळ मनाला' ह्या पुढील कवितेच्या ओळींमधून जाणवते.कवी म्हणतात 


                  बाई घायाळ मनाला

                  कशी मारावी फुंकर

                  किती चालावे वाळूत

                  तरी रिकामी घागर

                  {पृष्ठ क्रमांक : ४१}


वरील कवितेच्या ओळीतून बाई कोरडा कंठ घेऊन उन्हाची झळ सोसतांना दिसते आहे. आशयाच्या दृष्टीने नदीलाही भागवता आली नाहीये पाणी शोधणाऱ्या बाईची तहान.इथं 'घागर' ही प्रतिमा द्विभाव व्यक्त करते.तिचा देहही पाण्यावाचून कोरड्या घागरीगतच आहे.नदीतली वाळू उपसा करून करून नदीची ओल राहिली तरी कुठं ? तरीही बाईला आस असावीच नदीत झिरे करून घागर भरून घ्यायची.उन्हाळ्याच्या दिवसात वरील कवितेच्या ओळींचा विचार केला तर पाण्यासाठी जीव लाहीलाही करणारा आहे.तशी ही समग्र कविताच बाई मनाच्या दृष्टीने पाण्यासारखी पातळ होऊन विस्तारणारी आहे.नदी,

माळरान, विहिरीचा तळ गाठणाऱ्या बाया हंडा दोन हंडा पाण्यासाठी अस्वस्थ होतात,कोसो मैल दूर पाय तोडत पाणी मिळालं तर आणण्याचा प्रयत्न करतात.कारण तहान समजून घेतांना बाई तिच्या एकट्याचाच विचार करत नाही.बाई बाहेरील भोवतालापेक्षा आपल्या अंतरील भोवतालात अधिक डवरण्याचा प्रयत्न करते.बाईचा अंतर्बाह्य भोवताल म्हणजे तिच्यासाठीचा स्वतंत्र प्रदेशच असतो.एखादी बाई बाईवरील कविता अथवा बातमी ऑनलाईन वाचून 'ति'चा ऑफलाईन अधिक विचार करू शकते.मग जरी त्या कवितेचा तो संदर्भ ती प्रतिमा तिला लागू नसली तरी बाई 'बाई' म्हणून बाईचा विचार करते अर्थात तेव्हा ती तिलाच समजून घेण्याचा प्रयत्न करते.तसा बाईला माणूस म्हणून जगण्याचा स्वतंत्र प्रवाह लाभलाय खरी पण ; तरीही बाई अस्तित्व,ग्रामीण,स्त्रीवाद,आदिवासी,शहरी,

जागतिकीकरण,वर्तमान,कामगार सारख्या आदी प्रवाहात बाई प्रवाह जगून जातांना दिसते. मनाची फांदी एकाएकीच शहारून थरथरावी असे बाईचे तपा तपातील संदर्भ - वेदना  काळाला बधिर करून सोडतात पण;बाई वेदनेला ओठांवर कमी आणि आसवांच्या काठांनाच अधिक गपगुमान भिजवून काढण्याचा प्रयत्न करत आलीये.कधी कधी भुईत जिरावं पाणी तशी बाई आपली वेदना मनातल्या भुईत जिरवून टाकण्याचा प्रयत्न करते.

असे कितीहीदा केलं तरी बाईला एखाद्या तीव्र वेदनेतील आसवांना ठेवता येत नाही गोठून डोळ्यांच्या तळ्यात.

म्हणून कवी आसवांचाच संदर्भ घेऊन पुढीलप्रमाणे म्हणतात -


    तुझे झरणारे डोळे ओल्या पापणीच्या कडा

      तुझ्या आसवांचा बाई पडे अंगणात सडा 

                           ‌          {पान नंबर : ५५}


कल्पना वाटाव्यात अशाच वरील ओळखीतल्या प्रासंगिक भावना आहेत.'आसवांचा कधी अंगणात सडा पडतो का ? ' हा प्रश्न देखील वरील कवितेच्या ओळी वाचून वाचक मनाला पडणारा आहे.कदाचित हे काल्पनिक शब्दसौंदर्य असू शकतं पण ह्या काल्पनिकतेला येऊन भिडणारं एखाद्या बाईचं जगत असलेल्या प्रवाहातील वर्तमानही असू शकतं जे आपल्याला नाकारता येऊ शकत नाही.

माझा तर्क,अंगणात पडणारा हा आसवांचा हा सडा पहाटेचा असू शकतो अथवा संध्याकाळाचा देखील असू शकतो.कारण बाईचं आसवांचं आभाळ बऱ्यापैकी ह्याच वेळी दाटून येतं.बाईला द्यायचा नसतो. आसवांचा हिशोब कुणाला म्हणून बाई काळोखाचा आधार घेऊन होत राहते.आसवांनीच व्यक्त अंगणाला झाडू मारता मारता.

बाई सहन करत जाते शरिरावरील घाव, पण तिच्या मनाला लाभलेला शब्दांचा मुक्कामार ती सहन करेलच असेही नाही.म्हणून कधी तरी बरंच सहल्यावर येऊ शकतो दाटून तिच्यातला स्त्रीवाद.  


पातीवरल्या बाया दुःखाचा आवंढा गिळून शिरतात रानात झुरतात,मनात वेदनेच्या खपल्या काढीत उघडी करतात जखम दुखरी एकमेकींपुढे - {पान नंबर : ५६}


वरील प्रमाणे सदर संग्रहाला लाभलेल्या शीर्षकी कवितेच्या ओळी आहेत.बाई वावरातलं तन निंदता निंदता मनातलं तनही खुरपून काढते,आणि भुसभुशीत करू पाहते आपलं मन. नदारी,जबाबदारी,घरेलु भांडणं बायांना सुटत नाही,जगून घेतलेला तो क्षणही मनातून निघता निघत नाही म्हणून बाया उघडी करतात जखम दुखरी एकमेकींपुढे.हे सगळं सहतांना ग्रामीण बाया सोडत नाहीत आपली कामं.कदाचित त्यांना निभावून घ्यायचा असतो त्यांना लाभलेला बाई म्हणून बाईचा जन्म.कवींच्या मते,'वर्षानुवर्ष एकाच मालकाच्या वावरात काम करणाऱ्या बायांना पातीवरल्या बाया म्हणतात.' 

तसा 'पात' या एकाच शब्दाचा अर्थ मराठी प्रदेशातील प्रादेशिक ग्रामीण विभागानुसार विविध अर्थाने दैनंदिन जगण्यात येणारा आहे. 'पात' हा शब्द कृतीशील,प्रतिक म्हणून देखील उमटणारा आहे.दोन पिकांच्या रांगेतला मधला जो भाग असतो त्याला पात म्हणतात.एका बांधापासून दुसऱ्या बांधापर्यंत जी निंदनी होते (मधलं तन खुरपलं जातं) त्याला पात लागली असं म्हटलं जातं. खानदेशात 'येक वख्खर लागनं' असं म्हणतात. (तसा 'वखर' हा शब्द कृषी निगडीत अवजारच.) दिवसभर पातीवर अशी प्रक्रिया बायांकडनं वावरात होतांना कवी 'पातीवरल्या बाया' असे उद्देशून म्हणतात.तसा 'पातीवरल्या बाया' हा काव्य संदर्भ सदर संग्रहातील तीन कवितांमध्ये विविध आशयाच्या दृष्टीने वाचावयास मिळतो.गावाकडील बायां विषयी व्यक्त होता होता कवी गावाकडच्या पोरींविषयी देखील व्यक्त होतांना दिसतात. ते म्हणतात -


  माहेराला कवेत घेणाऱ्या

  गावाकडच्या हसऱ्या कोवळ्या पोरी

  कधी बाया होतात कळतच नाही

                 {पृष्ठ क्रमांक : ६७}


हे खरं आहे.ज्वारीच्या तोट्यागत वय उंचीने टराटरा वाढणाऱ्या पोरी कधी लग्नाच्या होतात, लग्न करून नांदायला लागतात कळतच नाही. सुनं होतं घर लग्न झाल्यावर पोरीवाचून.नकोशी वाटतात दैनंदिन घरातील कामं नात्यांना ज्या पोरी पार पाडायच्या माहेराला 'पोर' म्हणून. खरंच सुनंसुनं होतात घरे लग्न झाल्यावर पोरीवाचून.करमत नाही आख्ख्या घरालाच काही दिवस,काही महिने सणासुदीच्यावेळीही. पोरी नांदायला जातात अन् माहेराला बाया होऊन येतात !? ही खरंच विचार करायची गोष्ट आहे,विचारातल्या प्रश्नाचं उत्तरं शोधायची गरज आहे.पोरींना जन्मतःच वारसा लाभतो वंशवेलींचा,म्हणूनच पोरी लग्न झाल्यावर बाई होण्याच्या अधिक प्रयत्नात असतात.


गावात नात्यांमध्ये अद्यापही तुरळक ओलावा आहे.पण बदलत्या दिवसांप्रमाणे गावाची आणि गावातल्या नात्यांची नीतीमत्ता बदलत चालली आहे ती गावं सोडून जातांना.खालील प्रमाणे 'गाव ढासळत जाते' ह्या कवितेच्या ओळी बदलत्या ग्रामीण काळाचं प्रतिनिधित्व करताना दिसतात.


                  चिंब मनाची माणसं

                  त्यांचे निसटले बंध

                  माती पुसेना मातीला

                  तिचा हरपला गंध

                  {पृष्ठ क्रमांक : ७५}


वरील कवितेच्या ओळीतून साध्या सोप्या शब्दात भाव स्पष्ट होतांना दिसतोय पण माझं वाचनीय लक्ष 'माती पुसेना मातीला' ह्या एकाच ओळी कडे पुन्हा पुन्हा लागलेलं.ह्या ओळीमध्ये मला माणसांची बदलणारी मानसिकता जाणवते. 'माती पुसेना मातीला' म्हणजे ? 


माणूस येत नाही गावाकडच्या माणसांच्या मरणाला.देत नाही मुठमाती नात्यातील थांबलेल्या श्वासाला.पाहत नाही उद्ध्वस्त झालेल्या घराला.धीर देत आपलं म्हणून घेतांना आपल्यांना.शहराला शब्दांनी कुरवाळणारा गावाकडचा माणूस,गाव - गावातले नाते मेली आहेत की जिंदी आहेत आवर्जून विचारत सुधीक नाहीत अशी खंत सदर कवितेतून कवी व्यक्त करताना दिसतात. 'ओल मनाची सुकता / नाते कोसळत जाते / माया दुभंगते वेडी / गाव ढासळत जाते.' कवी मनाची ही खंत सर्वांना पटेलच असेही नाही पण गाव खरंच ढासळत चाललंय ! याचा प्रत्यय ग्रामीण पिढीला येत आहे.ग्रामीण प्रादेशिकतेचा विचार केला तर काही प्रश्न,काही समस्या,काही संदर्भ काळानुसार सर्वच प्रादेशिक विभागांवर समान व तीव्र प्रभाव पाडतांना दिसतात.धडधड छाती मनाची माती करायला लागलेला हा काळ अस्तित्वाला टवटवीत कमी पण वाळवून अधिक सोडणारा आहे.


मातीचा गंध श्वासात भरून आकाशाकडे उंचावण्याचं बळ राहिलं नाही पिकांमध्ये,नक्षत्रेच वांझोटी होऊन जातात पाणी पावसावाचून धकत नाही मग कितीही ब्रॅण्डेड वापरा बि - बियाणं पाण्याशिवाय कुठला हंगाम उगत नाही.


            विहीर हरवून बसली तिचा गर्भ

            झालीय वांझोटी

            तहानल्या पिकांना जाळते आता सल

            कुठं गेली खोल

            मुळाखालची ओल ?

           {पृष्ठ क्रमांक : ७७}


जरका मातीचच अवसान गळायला लागलं,मग विहिरीत ओल तरी राहिल काय ? भुईचा ओलावा टिकवून ठेवणारी झाडं तुटत चाललीयेत ? ऐन पेरणीत नक्षत्र हूल देऊन जातात ग्रीष्मात रानाचीच होते लाहीलाही,पाखरं नेहमीचाचा मुक्काम सोडून दूर दिशांमध्ये गळप होतात. 'तहानल्या पिकांना जाळते आता सल' ही ओळ काळजाला चटके देवून जाणारी आहे.'कुठं गेली खोल मुळाखालची ओल ?' हा प्रश्न वावरात राबणाऱ्या माणसांचाच नाही वाटत,हा प्रश्न मुक्या जित्रबांचा - पाखरांचा देखील वाटतो... ज्यांच्यासाठी माणूस म्हणून आपल्याला काहीच कसं करता येत नाही ? पाखरं विहिरीचा तळ गाठून अस्वस्थ होतात.जित्रबे पाण्याच्याच शोधात विहिरीपाशी येतात आणि कोरड्या विहिरीत पडून आपला जीव देखील गमावतात.विहिरीला वांझोटपण येणं म्हणजे उगूच न पाहणाऱ्या हंगामी पिकपिढीचा अंतच म्हणता येईल.'गाई हुंगुन येतात कोरडे रान' [पृष्ठ क्रमांक ३५] ही एकच ओळ कविता ठरते.तशी ही कविता पंधरा ओळींची आहे.ह्या पंधरा ओळींमधून सदर कवीला या कवितेत शब्दातून प्रसंग निर्माण करायचा आहे आणि तसा शब्दात्मक प्रयत्न त्यांनी केला देखील आहे पण कवितेचं गुढ आणि कळ 'गाई हुंगुन येतात कोरडे रान' ह्या एकच ओळीतून प्रभावीपणे सिध्द होतांना दिसते.काय म्हणत असावं त्या गाईचं मन जी हुंगन येते कोरडं रान ? किती तीव्र असावी त्या गाईची भुक चारावाचून अन् तहानेनं पाणीवाचून ? माणसांना जगता येतो प्रश्न पण जित्रबांना प्रश्न देखील पडत नसावा जगण्या मरण्याचा ! त्यांना तर उपलब्धही करता येत नाही स्वतःसाठी चारापाणी. जीवाला झळ काळजाला कळ ह्या जित्रबांसाठी तरी आली पाहिजे.अशी खंत 'गाई हुंगुन येतात कोरडे रान' ही एक ओळ वाचून माझ्या वाचक मनातून जित्रबांप्रति येते.


   अंधारून ढग येता,डोई आभाळ फाकते

    पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते. {१०९}


वरील 'पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते' ही ओळ मला ह्रदय स्पर्शी जाणवली.घराला हवी असतात माणसे,

माणसातील नाते,नात्यात ओलावा,ओलाव्यात आपलंपण अनुभवता येते ते घरामुळे.घर पिढ्यानपिढ्यांच्या जगून गेलेल्या काळाची जाणीव करून देते,घराला पाहिलं जरी तरी तारूण्यातलं आपलं मन,आठणीतलं बालपणाकडे खेळायला धावताना दिसते.नेहमी मोठं कुटूंब (खटलं) असल्यामुळे काळानुसार घराची वाटणी होतांना दिसलीये.पण ह्या वाटणी झाल्यावरही बऱ्यापैकी लोकांनी आपली जुनी घरे पाडून नवी घरं बांधली नाहीत.त्यांनी जपलाय पिढ्यानपिढ्यांचा काळ,स्वतःचे बालपण,लहान मोठ्यांच्या लग्नाच्या, सणासुदीच्या आठवणी.कवी अशाच एका मातीच्या घराचं वर्णन आपल्या काव्यातून मांडताना दिसतात.जे माझ्याही वाचक मनाला भावणारं आहे. 'पोळणाऱ्या देहावर,घर पदर झाकते' ओळ खरंच उल्लेखनीय आहे.आणि अशा जाणीवा काळानुसार खरंच साहित्यात येण्या गरजेच्या आहेत.समकालीन ग्रामीण प्रवाहात सचिन शिंदे यांची कविता आगळी व वेगळ्या धाटणीची आहे. तिच्यावर कुठल्याही काळाच्या कवितेची सावली पडलेली जाणवत नाही.ती स्वतःच एक काळ घेऊन शब्दात आलेली आहे. ग्रामीण,स्त्रीवाद,कामगार,सौंदर्य, प्रेम, अस्तित्व,

वर्तमान सारख्या प्रवाहात सदर संग्रहातील कविता भरल्या कणसागत नवे अनुभव,नव्या जाणिवा,नवे प्रश्न घेऊन आलेल्या आहेत.ही कविता ऋतू,नदी - पूर,

दुष्काळ,गाव - गावशिवार,माती - नाती,घर - जित्रब - पाखरं, अस्तित्व हरवत चाललेल्या 'मी' विषयी बोलते ज्याचा माणूस विचार करून सोडतो अथवा विचार पण करत नाही.या संग्रहातील 'जमाव' नावाची कविता वर्तमानाशी भिडताना दिसते. 


'झुरणाऱ्या दावणीची कविता' अस्वस्थ मनाचे तळ गाठतांना दिसते.अपेक्षांवर फिरलेलं पुराचं पाणी,

वेदना,जखम,उन्ह,विहीर,वणवा,ओल सारख्या कविताही वाचक मनावर प्रभाव पाडणाऱ्या आहेत.भावनांची तीव्र मूळं शब्दांच्या भुईत रूजवणारा हा कवी लेखणीच्या नांगराने आपलं वर्तमान भुसभुशीत करून पुन्हा नव्या उमेदीने शब्दांचा नवा हंगाम घेऊन येईल,अशी आशा व्यक्त करतो.सचिन शिंदे यांना नव्या शब्दपेरणीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा.


प्रविण पवार - धुळे 


•••• ••••

•पुस्तकाचे नाव : पातीवरल्या बाया 

•कवीचे नाव : सचिन शिंदे 

•साहित्य प्रकार : कविता (संग्रह)

•प्रकाशकाचे नाव : अष्टगंध प्रकाशन

२४/४/२४

पक्षिसृष्टी - birdlife

साऱ्या जगात अंदाजे आठ हजार प्रकारच्या पक्ष्यांच्या जाती आढळून येतात.त्यापैकी सुमारे दोन हजार ते अडीच हजार पक्षिकुळं भारत आणि पाकिस्तानात दिसून येतात.म्हणजे जगातील एकूण पक्षिकुळांपैकी एक तृतीयांश जाती वरील क्षेत्रात आढळून येतात. 


पक्षिगणाविषयीची ही विविधता जगात अन्यत्र कुठेही आढळून येत नाही.याचं मुख्य कारण आहे या प्रदेशातील निसर्गसृष्टीची विविधता.इथे राजस्थानमधील काटेरी झाडांची वनं आहेत, तशीच हिमालयात देवदाराची अरण्यं आहेत.जसा वाळवंटी प्रदेश आहे,तशीच बर्फानं आच्छादलेली हिमालयाची उंच शिखरं आहेत.नुसता हिमालय पर्वत आहे असं नव्हे,तर साऱ्या भारतात पर्वतांच्या रांगा पसरल्या आहेत.पश्चिम घाटासारखी हिरवीगार पर्वतमाळा आहे.तसेच सातपुडा,विंध्य अरवली,खाशी आणि गारो या पर्वतांच्या रांगा आहेत.

या साऱ्याच पर्वतश्रेणींत विविधता आहे.


पर्वत आले की त्यावरचा वनप्रदेश आला.भारतातील वनं प्रामुख्यानं रुंदपर्णी वृक्षांची आहेत.हिमालयात सूचिपर्णी झाडांची जंगलं आहेत.या दोहोंतदेखील अनेक प्रकारच्या वनांचा समावेश होतो.सदाहरित,अर्ध (सेमी) सदाहरित वनं.पानगळ,काटेरी आणि समशीतोष्ण जंगलं. या समृद्ध वनांतून विविध प्रकारचे पक्षी आढळून येतात.ते पानं,फुलं,

फळं आणि मध यावर उपजीविका करतात.कीटकांची सृष्टीदेखील बहुविध आहे.हे पक्षी अनेक प्रकारच्या झाडांच्या बिया त्यांच्या शिटेतून आणि पिसांतून आणतात.त्यांच्या माध्यमातून वृक्षांच्या बियांचा प्रसार होतो.त्यात एखादी त्या क्षेत्रात न येणारी वनस्पतीदेखील असते.तीदेखील तिथे वाढू लागते.झाडांच्या शेंड्यांवर पर्णपक्षी असतात,तर मधल्या छतावर शिलींद्री आणि सुतार पक्षी आश्रय घेतात. जमिनीवर झुडपं असतात, गवत उगवतं, पालापाचोळा पडलेला असतो, हवेमुळे पडलेली पोकळ झाडं असतात. या क्षेत्रात मुख्यत्वे जमिनीवरील पक्षी राहतात.


वनं आणि पर्वतमाळा पक्षिसृष्टीतील विविधता वाढविण्यास अनुकूल असतात.त्या पर्वतांवरून उगम पावणाऱ्या नद्यादेखील पक्ष्यांची निवासस्थानं असतात.

त्या नद्या सखल प्रदेशातून वाहत शेवटी समुद्राला मिळतात.हा सारा जलमय प्रदेशदेखील पक्ष्यांसाठी आदर्श वसतिस्थान असतो.गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा उगम हिमालयात झाल्यामुळे बर्फाच्या पाण्यामुळे त्या बारमाही वाहत असतात.गंगेचं विशाल खोरं प्रसिद्ध आहे. तिथल्या भूप्रदेशात जलचर पक्षी विपुल प्रमाणात आढळून येतात.

भारत द्वीपकल्पातील नद्या पावसावर अवलंबून आहेत.

उन्हाळ्यात त्या कोरड्या होतात.अति दक्षिणेकडच्या केरळ प्रदेशात तर समुद्राचं पाणी आत दूरवर घुसलं आहे.

या नद्या जिथे समुद्राला मिळतात तिथे समुद्राच्या मुखावर खाजणीची अतिशय समृद्ध जंगलं आहेत.हा प्रदेशदेखील पक्षिकुलाचा निवास आणि वीण यांसाठी उपयुक्त आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात शेतीला पाणीपुरवठा करण्याकरिता आणि वीज निर्माण करण्याकरिता नद्यांवर लहानमोठी धरणं बांधण्यात आली.ही नवनिर्मित जलाशयं पाणपक्ष्यांसाठी उपयुक्त ठरली.भंडारा,चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांतील अनुकूल भूरचना आणि माती यामुळे मूळ पर्यावरणाला धक्का न देता लहानमोठ्या तलावांचं जाळं निर्माण झालं आहे. हा तलावाचा प्रदेशदेखील पक्षिकुलाच्या निवासासाठी योग्य आहे.

साऱ्या महाराष्ट्रात सुमारे साडेपाचशे प्रकारच्या पक्ष्यांच्या नोंदी करण्यात आल्या आहेत. परंतु,एकट्या विदर्भातच अंदाजे पाचशे प्रकारचे पक्षी आढळून येतात.


जैविक विविधता पक्षिसृष्टीला कशी अनुकूल होऊ शकते हे आत्तापर्यंत सांगितलं.शास्त्रीयदृष्ट्या पक्षिकुलाचं वर्गीकरण सांगणं अवघड असलं तरी सामान्य लोकांना समजेल असं वर्गीकरण करता येईल.


■.सागरीय पक्ष्यांत वादळी पक्षी म्हणजे पेट्रेल, पाणकावळा,गंगाचिल्ली म्हणजे गल,कावळा, समुद्र-कावळा यांचा समावेश होतो.


■.जलचर पक्ष्यांतबगळा,ढोकरी,ढोक,सारस, क्रौंच,हंस,रानबदक आणि पाणकोंबडी यांचा समावेश होतो.


■.शिकारी पक्ष्यांत गरुड,ससाणा,श्येन,शिक्रा, घार, घुबड आणि पिंगळा यांचा समावेश होतो.


■.स्थळनिवासी पक्ष्यांत मोर,रानकोंबडा,तित्तिर,

लावा,हिमालयातील पिझंट आणि चकोर यांचा समावेश होतो.


.वृक्षारोहक पक्ष्यांत पोपट,कोकिळा,भारद्वाज, नीळकंठ इत्यादींचा समावेश होतो.


पक्षिसृष्टीतील आजपर्यंत न सुटलेलं कोडं आणि विशेष प्रकार म्हणजे पक्ष्यांचं स्थलांतर. 


हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला लक्षावधी पक्षी एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशात आकाशमार्गानं उडत जातात.हा प्रवास ते काही वेळा समुद्रावरून किंवा खुश्कीच्या मार्गाने करतात.त्यांना हा आवश्यक प्रवास का करावा लागतो?इतक्या लांबच्या प्रवासाचा धोका ते का स्वीकारतात? ते आपला मार्ग कसा शोधतात? या मूलभूत प्रश्नांची समाधानकारक उत्तरं अजून तरी मिळालेली नाहीत.अलीकडे पक्ष्यांच्या पायांना कडी बांधून आणि इतर काही प्रयोगांमुळे या रहस्यमय गोष्टी पूर्वी-पेक्षा जास्त समजू लागल्या आहेत.


एका मुलुखातून दुसऱ्या मुलुखातील उलटसुलट प्रवासाचा नियमितपणा पक्षिस्थलांतराचा एक खास गुण आहे.हजारो किलोमीटर अंतरावर असणाऱ्या मुलुखात पुष्कळ वेळा तेच तळं किंवा त्याच रानात हे पक्षी हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात परत येतात.

सैबेरियातून भारतात येणारी रानबदकं आणि हंस यांचं उदाहरण आपण घेऊ या. 


निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी नागपूर


हिवाळ्यात सैबेरियात खूप थंडी पडते. तिथे बर्फ पडू लागतो. जलाशयं गोठून जातात.या पक्ष्यांना अन्न मिळेनासं होतं.अशा प्रतिकूल परिस्थितीत भारतासारख्या समशीतोष्ण प्रदेशात हे पक्षी स्थलांतर करून येऊ लागतात.स्थलांतर करणारे हे पक्षी रोजी पाचशे किलोमीटर अंतर सहज ओलांडून जातात.ताशी सत्तर ते ऐंशी किलोमीटर वेगानं ते उडतात.स्थलांतर करणारे हे पक्षी प्रामुख्यानं थव्यांतून राहणारे असतात. 


आकाशातून उडताना ते बाणाच्या टोकासारखी रचना करतात,टोकावर सर्वांत अनुभवी पक्षी असतो.तो इतरांना मार्ग दाखवितो.त्यांच्या शरीररचनेत लोहचुंबकाचं अस्तित्व असतं.त्यामुळे त्यांना उत्तर-दक्षिण दिशेचं ज्ञान होतं.शत्रुपक्ष्यांचा उपद्रव होऊ नये म्हणून हे पक्षी रात्री प्रवास करतात.त्यावेळी आकाशातील ग्रहताऱ्यांच्या साह्यानं ते उडण्याची दिशा निश्चित करतात.त्याच मार्गानं वर्षानुवर्षे प्रवास करीत असल्यानं भूगोलावरील पर्वतशिखरं,नदींचा प्रवाह आणि इतर ठळक गोष्टी त्यांच्या लक्षात राहतात.मार्ग अचूक शोधण्यासाठी ते या गोष्टींचा देखील उपयोग करतात.


उन्हाळ्याच्या सुरवातीला हे सर्व पक्षी पुन्हा आपल्या मुलुखात परतू लागतात.तोपर्यंत तेथील हिवाळा संपलेला असतो.स्थलांतराच्या वेळी पक्ष्यांच्या पिलांचं आचरण फारच आश्चर्यकारक असतं.त्या काळात ही पिलं उडण्यास थोडीफार समर्थ झाली असल्यास,ती नैसर्गिक प्रेरणेनं मातापित्यांबरोबर उड्डाण करून जातात.त्यांच्या अंगी इतका धीटपणा असतो की,हजारो किलोमीटरचं अंतर ती सहज उडून जातात.


आर्क्टिक टर्न हा कुररी जातीचा पक्षी उत्तर ध्रुवापासून दक्षिण ध्रुवाचा प्रवास करतो आणि पुन्हा उत्तर ध्रुवाकडे परततो.त्याचा एकूण प्रवास पस्तीस हजार किलोमीटर लांबीचा होतो.


कित्येक जण मला विचारतात की, ह्या पक्ष्यांचा आपणास उपयोग काय?पक्षी आपला परिसर निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त आहेत.आर्थिक दृष्ट्यादेखील त्यांचं महत्त्व कमी लेखता येणार नाही.शेतातील पिकांवर पडणाऱ्या किडींवर ते नियंत्रण ठेवतात. उपद्रवी अशा उंदीरघुशींवर काही पक्षी उपजीविका करीत असल्यानं शेतीसाठी ते उपकारकच ठरतात.घुबडांची एक जोडी एक हेक्टर शेतजमिनीचं कीटक आणि उंदीर यापासून रक्षण करते.याशिवाय ते फुलांचं परागीकरण आणि बियांचं स्थलांतर करतात.मृत झालेले कीटक आणि सरपटणाऱ्या, कुरतडणाऱ्या मेलेल्या प्राण्यांचे अवशेष खाऊन कावळे गावातील घाण नाहीशी करतात.घारी आणि गिधाडं मृत जनावरांवर तुटून पडतात.एक प्रकारे हे पक्षी नगर

पालिकेला घाण नाहीशी करण्यात साहाय्यच करतात.


परंतु कावळ्यांची संख्या शहरातून तसंच खेडेगावातून उत्तरोत्तर कमी होत आहे.याचं मुख्य कारण म्हणजे विषारी औषधांचा अति वापर.विषारी द्रव्यं खाल्यामुळे जे कीटक,उंदीर आणि सरपटणारे प्राणी मरतात ते कावळ्यांच्या खाण्यात आले की ते देखील मृत्युमुखी पडतात.यातील जे जगतात,ते प्रजोत्पत्ती करू शकत नाहीत.हजारो वर्षांपासून कावळे हे माणसाबरोबर राहत आले आहेत.गावातील कावळे जंगलात राहू शकत नाहीत.कावळ्याचं आयुष्य शंभर वर्षांचं आहे.म्हणजे तो सरासरीनं माणसापेक्षा अधिक काळ जगतो. 


महाभारतात अर्जुनाचा उल्लेख पूर्णपुरुष केला आहे.तसाच पक्ष्यांत कावळा हा पूर्णपक्षी म्हणून प्रसिद्ध आहे.अनेक प्रकारच्या ऋतुचक्रांतून तो माणसाबरोबर जगत असतो.हा अतिशय सामान्य पक्षी साऱ्या भारतभर आढळून येतो.म्हणून आपल्या प्राचीन ऋषिमुनींनी अंतर्गत पाऊस आणि हवामान यांचा अंदाज घेण्यासाठी कावळ्याची निवड केली होती.कावळे आपली घरटी झाडांवर उन्हाळ्यात पावसापूर्वी बांधतात.त्यांच्या घरटी बांधण्याच्या आचरणावरून पाऊस आणि हवामानाचा अंदाज घेता येतो.वराहमिहिर,पराशर,गार्ग्य,नारद या विज्ञाननिष्ठ पूर्वाचार्यांनी कावळ्याच्या घरटी बांधण्याच्या आचरणा

वरून पूर्वी पावसाचा अंदाज दिला आहे.याकरिता कावळ्यांच्या संबंधाने तीन घटकांचा विचार केला आहे :


१.आंबा,निंब,पिंपळ,करंज,अर्जुन या झाडांवर कावळ्यांनी घरटी केली तर पाऊस चांगला पडतो.बाभूळ,बोर,खैर,

हिवर आणि सावर या काटेरी झाडावर घरटी केली तर अवर्षण पडतं.


२.पूर्व,उत्तर,ईशान्य,नैर्ऋत्य आणि वायव्य या दिशांना कावळ्यांनी घरटी केली,तर पाऊस चांगला पडतो.

पश्चिम,दक्षिण,आग्नेय आणि वृक्षांच्या मध्यभागी घरटी केली तर पाऊस कमी पडतो. 


३.तिसऱ्या घटकात कावळ्यांनी किती अंडी घातली याचा विचार केला आहे.तीन ते चार अंडी घातली तर चांगली वृष्टी होते. एक अंडं घातलं तर अवर्षण पडतं.


याची खात्री करण्यासाठी १९९४ सालच्या उन्हाळ्यात मी कावळ्यांच्या घरट्यांचं निरीक्षण महाराष्ट्रातील पक्षि मित्रांच्या साहाय्यानं केलं.त्या पाहणीत मला आढळून आलं :


१. यंदा महाराष्ट्रात पाऊस चांगला पडावा.


२.मराठवाड्यातील भूकंपग्रस्त लातूर विभागातील कावळे लुप्त झाले आहेत. कुठेही त्यांची घरटी दिसून आली नाहीत. यात धोक्याची सूचना आहे.


३.गडचिरोली भागात कावळे अजिबात नाहीत.ही चिन्हंदेखील चांगली नाहीत.


कावळ्यांची संख्या उत्तरोत्तर कमी होत असल्याचा सार्वत्रिक अनुभव आहे. 


कावळ्यासारखा पूर्णपक्षी आपल्यातून हळूहळू निघून चालला आहे.तो अशा रीतीनं लुप्त होणं ही पर्यावरणाच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. कावळ्यां

बरोबर आणखीन एक पक्षिकुल नष्ट होईल;ते म्हणजे गोड गळ्यानं,पंचम स्वरानं गाणाऱ्या कोकिळांचं.

कारण कोकिळेची अंडी कावळे उबवितात.त्यांच्या पिलांची वाढ करतात.


पुस्तकं - books


मी गेल्यावर, 

तुला वाटेल की आपल्या बाबांनी 

वाचलियेत ही सारी पुस्तकं... 


पण नाही, 

अर्धही वाचता आलेलं नाहीय, 

येणारही नाही हे ठाऊक होतं मला तरी, 

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं... 


माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागं, 

ही अक्षर ओळख सोडून फक्त... 


जिच्या मागे धावत मी 

पोहोचलो आहे इथवर, 

तुला सांगण्या समजावण्यासाठी की, 

मलाही सोडता येणार नाहीय मागे, 

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी... 


ही काही पुस्तकं आहेत फक्त, 

जी तुला दाखवतिल वाट. 

चालवतील,तुला थांबवतील, 

कधी पळवतील,कधी 

निस्तब्ध करतिल, 

बोलतं करतील,कधी

टाकतिल संभ्रमात, 

सोडवतिल गुंते, 

वाढवतील पायाखालचा चिखल, 

कधी बुडवतील,तरवतील,कधी

वाहवतील,कधी थोपवतील,प्रवाह

अडवतील,तुडवतील,सडवतील, 

बडवतील,हरवतील,सापडतील... 


तुझ्याशी काहीही करतील, 

ही पुस्तकं... 


तू समोर आल्यावर, 

नेहेमीच कवेत घेवुन मी माझ्यातली

धडधड तुला देण्याचा प्रयत्न करतो... 


तशीच ही पुस्तकं 

उघडतील मधोमध,पसरतील हात, 

मिठीत घेतील तुला, 

आपोआप होतील हृदयाचे ठोके... 


यांच्यात रहस्य आहेत दडलेली,

अनेक उत्तरंही असतील,

प्रश्नांमधे कदाचित कुठेच

प्रश्नही नसतील... 


एक लक्षात ठेव,

आपलं आयुष्यच पल्प फिक्शन,कधी क्लासिक,सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल,कधी कवितीक,कधी किचकट,कधी सोपं असतं, ध्यानात असु दे या सगळ्यात वाईट काहिच नसतं... 


त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक, 

त्याच वेळची गरज असतं,समज नसतं... 


मी नसेन तेंव्हा ही पुस्तकं असतील, 

जी नेतील तुला जायचं आहे तिथं, 

फक्त मी असेन,तिथं मात्र तुला पोहोचता येणार नाही... कारण मी आधीच

होवुन गेलेलो असेन तुझ्यासाठी, 

एखादी कथा,एखादी कादंबरी, 

एखादी कविता,एखाद्या पुस्तकातली... 


माझी आठवण आली की, 

या प्रचंड ढिगाऱ्यातलं ते एखादं पुस्तक शोध... 


तुझा प्रवास बघ कसा

सोपा होवुन जाईल... 


(प्रसिद्ध अभिनेते किशोर कदम )


भास एक भयकथा,लेखक - विष्णू गोपाळ सुतार,

यांच्याकडून व्हाट्सअप वरून आलेली ही कवीता…




२२/४/२४

थेंब मधाचे Drops of honey

माझ्या व्यवहारामध्ये सद् भाव आणि उत्साह सरळ सरळ झळकत होता.मी हे नाही सांगितलं की,भाडं खूप जास्त आहे.मी सुरुवात या गोष्टींनी केली की,मला त्याचं घर खूप आवडतं.विश्वास ठेवा,मी त्याच्या घराची मनसोक्त तारीफ केली. मी त्याला हेपण सांगितलं की,तो त्याच्या घराची काळजी खूपच चांगल्या प्रकारे करतो.यानंतर मी त्याला सांगितलं की,खरंतर मी पुढच्या वर्षीही इतक्या चांगल्या घरात राहायचा विचार केला होता;पण मी विवश आहे,मी इतकं भाडं देऊ नाही शकत.जाहीर होतं,कोणी भाडेकरू त्याच्या बरोबर या प्रकारे वागला नव्हता.त्याला समजत नव्हतं की,तो या परिस्थितीत काय करेल.त्याने मला त्याच्या अडचणींबद्दल सांगितलं.तो नेहमी तक्रार करणाऱ्या भाडेकरूंवर वैतागला होता.एका भाडेकरूने तर त्याला चौदा पत्रं लिहिली होती, ज्यातली खूप सारी आचरटपणाने लिहिलेली होती.दुसऱ्या मजल्यावरच्या भाडेकरूने याकरता घर सोडायची धमकी दिली होती कारण वरच्या माळ्यावरचा भाडेकरू घोरत होता.त्याने सांगितलं की,तुमच्यासारख्या समाधानी भाडेकरूंना बघून किती छान वाटतं.मग त्याने माझ्या न सांगण्यावरही थोडं भाडं कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला.मी भाडं जास्त कमी करायला बघत होतो.याकरता मी त्याला सांगितलं की,मी किती भाडं देऊ शकतो आणि त्याने त्याविरुद्ध काही न बोलता माझं म्हणणं मान्य केलं.जेव्हा तो जाऊ लागला तेव्हा वळून त्याने मला विचारले की,तुम्ही आपल्या घरात कोणत्या प्रकारचं डेकोरेशन पसंत कराल? जर मी भाडं कमी करण्याकरता दुसऱ्या भाडेकरूंसारखा प्रयोग केला असता,तर निश्चित रूपानं मीसुद्धा त्यांच्याच सारखा असफल झालो असतो.मित्रत्व,सहानुभूतीपूर्ण,प्रशंसात्मक पद्धतीनेच मी सफल झालो. 


पेनसिल्व्हेनियाच्या पिटस बर्गमध्ये राहणाऱ्या डीन वुडकॉक स्थानिक इलेक्ट्रिक कंपनीच्या एका डिपार्टमेंटमध्ये सुपरिटेंडेंट आहे.त्यांच्या स्टाफला एका खांबावर लागलेल्या एका उपकरणाला ठीक करण्याचं काम दिलं.या प्रकारचं काम आधी दुसऱ्या डिपार्टमेंटला आत्ताच दिलं गेलं होतं.त्याच्या कामगारांना या कामाचं प्रशिक्षण दिलं गेलं होतं;परंतु पहिलीच वेळ होती की,

त्यांना हे काम करण्याची संधी मिळाली होती.कंपनीचा प्रत्येक माणूस हे बघू इच्छित होता की,ते हे काम करू शकतात की नाही आणि जर ते करत आहेत तर कोणत्या प्रकारे करत आहे.मिस्टर वुडकॉक,त्याचे हाताखालचे मॅनेजर आणि डिपार्टमेंटचे दुसरे सदस्य या कामाला बघण्याकरता गेले.अनेक कार आणि ट्रक तिथे उभे होते आणि खूप सारे लोक खांबावर चढलेल्या दोन माणसांना बघण्याकरता जमा झाले होते.


तेव्हा वुडकॉकला रस्त्यावर उभ्या असलेल्या कारमधून एक माणूस उतरताना दिसला, ज्याच्या हातात कॅमेरा होता.त्यांची कंपनी सार्वजनिक फोटोला घेऊन खूप जास्त सजग होती.वुडकॉकच्या मनात विचार आला की, कॅमेरा घेऊन आलेल्या माणसाला बहुतेक असं वाटेल जसं दोन माणसांच्या कामाकरिता डझनभर लोक उगीचच गोळा झाले आहेत.ते फोटोग्राफरच्या दिशेने पुढे झाले.


मला असं वाटतं की,तुम्ही आमच्या कामात रस घेत आहात.हो आणि माझी आई तर जास्तच रस घेईल.ती तुमच्या कंपनीची स्टॉकहोल्डर आहे.यामुळे त्यांचे डोळे उघडले जातील.आता त्यांना हे समजू शकेल की,त्यांनी चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केली आहे.मी त्यांना अनेक वर्षांपासून समजावतो आहे की,तुमच्यासारख्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे पैशांची बर्बादी आहे.आता हे खरं सिद्ध होईल. पेपरवाल्यांनाही हे फोटो आवडतील.तुम्ही ठीक म्हणता आहात.तुमच्या जागी मी असतो,तर मीसुद्धा याच प्रकारानी विचार केला असता;

पण वुडकॉकनी त्याला सांगितलं की,हे त्यांच्या डिपार्टमेंटचे पहिले काम आहे आणि याचकरता त्यांच्या कंपनीचे एक्झिक्युटीव्हपासून ते कर्मचाऱ्यांपर्यंत याच्या सफलतेमध्ये रस घेत आहेत.त्यांनी त्या व्यक्तीला आश्वस्त केलं की, सामान्य परिस्थितीमध्ये या कामाकरता केवळ दोनच लोक असतात.हे ऐकून फोटोग्राफरने आपला कॅमेरा ठेवून दिला,त्याने वुडकॉक बरोबर हात मिळवला आणि त्याला धन्यवाद दिले की, त्यानी इतक्या चांगल्या प्रकारे मामला समजवला.डीन वुडकॉकने दोस्तीच्या शैलीने त्याच्या कंपनीला वाईट प्रचारापासून वाचवलं.


आमच्या क्लासचे आणखी एक सदस्य न्यू हॅम्पेशायरच्या जेरॉल्ड एच.विनने सांगितलं की,कोणत्या प्रकारे मैत्रीपूर्ण शैलीच्या कारणामुळे त्यांना एक डॅमेज क्लेमवर समाधानकारक सेटलमेंट मिळाली.


त्यांनी सांगितलं, वसंताच्या सुरुवातीस जेव्हा जमिनीवर बर्फ जमा झाला होता तेव्हा खूप पाऊस पडला.जास्त करून जवळच्या नाल्यांमधून वाहून जाणारे पाणी त्या भागात शिरलं ज्यामध्ये मी नुकतंच घर बांधलं होतं. पाण्याला जायला काहीच जागा नव्हती,यामुळे घराच्या पायथ्याच्या चारी बाजूंनी दबाव पडायला लागला.पाणी काँक्रीटच्या तळघराच्या भिंतींना तोडत आतमध्ये शिरलं आणि पूर्ण तळघर पाण्याने भरलं.यामुळे फर्नेस आणि हॉट वॉटर मीटर खराब झालेत.या दुरुस्तीचा खर्च दोन हजार डॉलर्सपेक्षा जास्त होता.माझ्यापाशी या प्रकारच्या नुकसानीचा कुठलाही विमा नव्हता; पण मी लवकरच या गोष्टीचा पत्ता लावला की, सबडिव्हिजनच्या मालकांनी घराजवळ स्टॉर्म ड्रेन बनवण्याचे कष्ट घेतले नव्हते.जर स्टॉर्म ड्रेन असतं,तर या समस्येपासून दूर राहता आलं असतं.मी त्याला भेटण्याकरता अपॉइंटमेंट घेतली,त्याच्या ऑफिसपर्यंत जाताना पंचवीस मैल लांब प्रवासात मी स्थितीचे पूर्ण अवलोकन केले आणि या कोर्समध्ये शिकलेल्या सिद्धान्तांना लक्षात ठेवून मी ठरवलं की,

रागवून काही फायदा होणार नाही.जेव्हा मी पोहोचलो तेव्हा मी शांत होतो.सुरुवातीला मी त्याच्या आत्ताच्या वेस्ट इंडिज प्रवासाबद्दल विचारपूस केली.मग मला जेव्हा वाटलं की,आता योग्य वेळ आलीये तेव्हा मी त्याला सांगितलं की पाण्यामुळे माझं 'थोडंसं' नुकसान झालंय.तो तत्काळ तयार झाला की,या समस्येला सोडवायला तो आपल्या बाजूने पूर्ण सहयोग देईल.


काही दिवसांनंतर तो आला आणि त्यानी म्हटलं की,तो नुकसानभरपाई देईल व स्टॉमड्रेनही बनवेल.खरंतर ही सबडिव्हिजनच्या मालकाची चूक होती;पण जर मी मित्रत्वाच्या पद्धतीने चर्चा सुरू नसती केली तर बहुतेक तो पूर्ण नुकसानाची भरपाई करण्याकरता इतक्या लवकर तयार झाला नसता.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन


अनेक वर्षांआधी उत्तर-पश्चिमी मिसुरीमध्ये शिकणाऱ्या खेड्यातील मुलांप्रमाणे मी अनवाणी पायांनी जंगलातून जात येत होतो.मी माझ्या लहानपणी सूर्य आणि हवा यांची नीतिकथा वाचली होती.दोघांमध्ये वाद झाला होता की, जास्त ताकदवान कोण आहे.हवेने म्हटलं,मी आत्ताच सिद्ध करून दाखवते की कोण जास्त ताकदीचा आहे.

कोट घातलेल्या त्या म्हाताऱ्या माणसाला बघतो आहेस? मी शर्यत लावते की, मी या म्हाताऱ्या माणसाच्या कोटाला तुझ्यापेक्षा जास्त लवकर उतरवू शकते.सूर्य ढगामागे चालला आणि हवा जोरात वाहू लागली,इतकी जोरात की,जसं वादळ आलं आहे;परंतु हवा जेवढी जोरात वाहत होती,म्हातारा माणूस आपल्या कोटाला तितकंच कसून पकडत होता.शेवटी हवेने हार मानली आणि परत नेहमीप्रमाणे वाहू लागली.याच्यानंतर सूर्य ढगांमागून पुढे आला आणि त्या म्हाताऱ्या माणसाने आपला घाम पुसला आणि आपला कोट काढून ठेवला, तेव्हा सूर्याने हवेला समजावलं की शक्ती आणि क्रोध यापेक्षा दयाळूपणा आणि मैत्री यांच्यामुळे कोणतंही काम करवणं जास्त सोपं असतं.जे लोक हे जाणतात की,एक गॅलन व्हिनेगरपेक्षा एक थेंब मधाने जास्त माशा पकडल्या जातात,ते विनम्र आणि दोस्तीच्या शैलीचाच प्रयोग करतात.जेव्हा लूथरविले, मेरीलँड एफ.गॅल कॉनर आपल्या चार महिने जुन्या कारला कार डीलरच्या सर्व्हिस डिपार्टमेंटमध्ये तिसऱ्या वेळी घेऊन आला,तेव्हा त्यांनी याच पद्धतीचा अवलंब केला.त्यांनी आमच्या वर्गात सांगितले,हे स्पष्ट होतं की, मॅनेजरशी वाद करणं,त्याच्याशी तर्क करणं किंवा त्याच्यावर ओरडण्यानं माझी समस्या सुटणार नव्हती.मी शोरूममध्ये गेलो आणि एजन्सीच्या मालकाला - मिस्टर व्हाइटला भेटण्याची इच्छा दर्शवली. थोडा वेळ वाट बघितल्यावर,मला मिस्टर व्हाइटच्या ऑफिसमध्ये पाठवलं गेलं.मी आपला परिचय दिला आणि त्यांना सांगितलं की,मी त्यांच्या डिलरशीपकडून कार याकरता विकत घेतली होती,कारण त्यांच्या इथून कार विकत घेणाऱ्या माझ्या काही मित्रांनी मला असं करण्याचा सल्ला दिला होता.सांगितलं होतं की, तुमच्या किमती एकदम रास्त असतात,तेव्हा मिस्टर व्हाइटच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं.मग मी त्यांना सांगितलं मला सर्व्हिस डिपार्टमेंटमधून काय समस्या येते आहे.मला वाटलं बहुतेक तुम्ही अशा स्थितीला समजणं उचित समजाल, ज्यामुळे तुमच्या प्रतिष्ठेला डाग लागू शकतो.पुढे मी म्हणालो की,त्यांनी मला या गोष्टी सांगण्याबद्दल धन्यवाद दिले.मला आश्वासन दिलं की,माझी समस्या दूर होईल.


एवढंच नाही तर त्यांनी माझ्या व्यक्तिगत समस्येत रुची घेतली.त्यांनी माझी कार दुरुस्त होईपर्यंत स्वतःची कार मला दिली.


ईसाप एक ग्रीक गुलाम होते.जे क्रॉसियसच्या दरबारात राहत होते.त्यांनी ईसा मसीहच्या सहाशे वर्षांआधी आपली अमर कथा लिहिली होती;परंतु मानवी स्वभावाच्या बाबतीत ज्या सत्याला त्यांनी उजागर केलं होतं ते आजच्या बॉस्टनमध्येही तितकंच बरोबर आहे.


जितकं की, ते सव्वीसाव्या शतकाच्या आधी अथेन्समध्ये होते.हवेऐवजी सूर्य तुमचा कोट अधिक लवकर उतरवू शकतो आणि राग किंवा आलोचनेऐवजी दयाळू मैत्रीची शैली आणि प्रशंसेने लोकांची मानसिकता अधिक लवकर बदलू शकते.लक्षात ठेवा लिंकनने काय सांगितलं होतं एक गॅलन व्हिनेगारपेक्षा मधाचा एक थेंब जास्त माशा पकडू शकतो.


२०.०४.२४ या लेखातील पुढील हा शेवटचा भाग..