* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

६/४/२३

जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.ही सांगणारी गोष्ट..

१९६१-७०च्या दशकातील ही कहाणी वाचकांना मानवी स्वभावाबद्दलच दुःखद सत्य उघडकीस आणणारी ही कहाणी आहे.आपण 'जे करतो' त्याबद्दल ही कहाणी नसून आपण 'जे करत नाही' त्याची ही कहाणी आहे. दुसऱ्या महायुद्धात लाखो ज्यूंना अटक झाली,त्यांना देशातून हाकलून देण्यात आलं,त्यांची हत्या झाली.

त्याबद्दल जर्मन,डच,फ्रेंच,ऑस्ट्रियन आणि युरोपभरातल्या अन्य लोकांनी स्वतःची बाजू मांडताना केलेल्या दाव्याचे प्रतिध्वनी या कहाणीत ऐकू येतात.ते लोक म्हणाले होते की, विअर हाबेन एस निश्ट गेवूस्ट म्हणजे 'आम्हाला याची काही कल्पनाच नव्हती.' तो दिवस होता १३ मार्च,

१९६४ पहाटेचे सव्वातीन वाजले होते.कॅथरिन सुसान जिनोवेजेने तिची लाल फियाट अंधारातून जेमतेम दिसणाऱ्या 'नो पार्किंग' खांबावरून पुढे नेली आणि ऑस्टिन स्ट्रीटवरील सबवे स्थानकाबाहेर थांबवली.सगळे जण तिला 'किटी' म्हणूनच ओळखायचे.ती उत्साहाचा खळाळता झराच होती.अठ्ठावीस वर्षांच्या किटीला नृत्याचं वेड होतं.'मोकळा वेळ कमी आणि मित्रमैत्रिणी जास्त'

असा तिचा प्रकार होता. किटीला न्यू यॉर्क शहर खूप आवडायचं. तिथे तिला अगदी मनासारखं वागता येई.इथे ती स्वतंत्र होती.त्या रात्री बाहेर फारच थंडी होती आणि मैत्रिणीला भेटायला घरी जायची किटीला कोण घाई झाली होती.त्या एकत्र राहायला लागून आजच एक वर्ष झालं होतं.आणि किटीला मेरी अँनला बिलगून झोपण्याची इच्छा होती.गाडीचे दिवे बंद करून,दरवाजे लॉक करून ती त्यांच्या छोट्याशा घराच्या दिशेनं जाऊ लागली.तिचं घर तिथून १०० पावलांपेक्षाही कमी अंतरावर होतं.परंतु हा आपल्या जीवनातील शेवटचा तास आहे हे किटीला माहिती नव्हतं.

"अगं आई गं,त्याने मला भोसकलं,मला मदत करा.मदत करा मला..'पहाटेचे ३.१९ झाले होते.तिच्या किंकाळ्या रात्रीला चिरत गेल्या.त्या एवढ्या तीव्र होत्या की,

शेजारीपाजारी जागे झाले.बऱ्याच घरांमधले दिवेही लागले.खिडक्या उघडल्या गेल्या,रात्रीच्या अंधारात आवाजांची कुजबुज ऐकू येऊ लागली.कुणीतरी सगळ्यांना सांगितलं,'त्या मुलीकडे लक्ष देऊ नका,सोडा तिला" परंतु किटीचा मारेकरी परतला,त्याने दुसऱ्यांदा तिला चाकू भोसकला,कोपऱ्यासी धडपडत ती पुन्हा ओरडली,"मी मरतेय रे,कुणी तरी या रे" पण कुणीही बाहेर आलं नाही,कुणीही मदत करायला साधं बोटही उचललं नाही.त्याऐवजी डझनभर शेजारी एखादा'रिअँलिटी शो'

टीव्हीवर पाहावा तसे आपापल्या खिडक्यातून पाहत राहिले.एका जोडप्यानं तर खिडकीपाशी बसायला खुच्या आणल्या आणि नीट दिसावं म्हणून दिवेही मंद केले.मारेकरी तिसऱ्यांदा आला तेव्हा ती तिच्या इमारतीच्या जिन्याच्या पायथ्याशी पडलेली होती.वरती मेरी अँन गाढ झोपलेली होती.तिला तर यातलं काही कळलंच नव्हतं.किटीच्या मारेकऱ्याने तिला पुन्हा पुन्हा भोसकलं.पोलीस ठाण्यात पहिला फोन गेला तेव्हा पहाटेचे ३.५० झाले होते.फोन करणाऱ्या शेजाऱ्याने 'आता आपण काय करावं' या विचारमंथनात बराच काळ घालवला होता.दोन मिनिटांत पोलीस अधिकारी तिथे पोहोचले; परंतु तोवर खूप उशीर झाला होता.त्या फोन करणाऱ्याने पोलिसांना सांगितलं,"मला या भानगडीत पडायचं नव्हतं."

'मला या भानगडीत पडायचं नव्हतं,हे

ते पाच शब्द सगळ्या जगभरात घुमले.

सुरुवातीला किटीचा 'खून' हा न्यू यॉर्क शहरात त्या वर्षी घडलेल्या ६३६ खुनांपैकी एक होता. एक जीवनज्योत अकाली विझली,एक प्रेम अकाली अस्तंगत हरपलं आणि शहर आपण त्या 'गावचं'च नसल्यासारखं पुढे चालू लागलं;परंतु दोन आठवड्यांनी ती गोष्ट पेपरात छापून आलीच आणि थोड्याच काळात किटीची हत्या इतिहासाच्या पुस्तकांतही समाविष्ट झाली.

ती कहाणी समाविष्ट होण्याचं कारण तो मारेकरी किंवा बळी पडलेली किटी हे नव्हते तर हा खून नुसतं बघत राहणारे बघे होते.


(ह्युमनकाइंड - रूट्गर ब्रेगमन,अनुवाद - सविता दामले,मजुंल पब्लिशिंग हाऊस)


२७ मार्च,१९६४,गुड फ्रायडे या दिवशी प्रसारमाध्यमातील वादळ सुरू झालं.न्यू यॉर्क टाइम्समध्ये पहिल्या पानावर बातमी आली,'खून पाहणाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं नाही.'त्या लेखाची सुरुवातच अशी होती की,'क्यू गार्डन येथे एका मारेकऱ्याने एका तरुणीला थोड्या थोड्या अंतराने तीनदा येऊन भोसकलं;परंतु क्वीन्स परिसरातील प्रतिष्ठित,कायदेपालन करणारे ३८ नागरिक अर्ध्या तासाहूनही अधिक काळ ते दृश्य नुसतेच बघत राहिले.त्या बातमीत पुढे लिहिलं होतं,'एका गुप्तहेराच्या म्हणण्यानुसार केवळ एक फोन त्यांनी केला असता तर किटी आज जिवंत असती.ग्रेट ब्रिटन ते रशिया आणि जपान ते इराण - सर्वत्र किटी बातमीचा विषय बनली.'सोव्हिएत वृत्तपत्र 'इझवेस्तियाने लिहिलं की,'भांडवलवादाच्या जंगलनीतीचा हा पुरावाच आहे.ब्रुकलिनमधील एका धर्मोपदेशकानं म्हटलं की,'येशूला सुळावर देणाऱ्या समाजाइतकाच अमेरिकन समाजही विकृत बनला आहे.तर एका सदरलेखकाने आपल्या सदरातून देशबांधवांचा धिक्कार करत लिहिल की,ते दुसऱ्याच्या भावनांची कदर न करणारे,भ्याड आणि अनीतिमान लोक आहेत.किटी राहत होती त्या क्यू गार्डन परिसरात पत्रकार,छायाचित्रकार आणि टीव्हीच्या ताफ्याने एकच गर्दी केली.हा परिसर खूप चांगला, व्यवस्थित,

प्रतिष्ठित शेजाऱ्यापाजाऱ्यांचा आहे, यावर त्यांचा विश्वासही बसत नव्हता.कारण,तसं जर होतं तर या परिसरातले रहिवासी एवढी अंगावर काटा आणणारी बेपर्वा वृत्ती कशी काय दाखवू शकले होते?कुणीतरी दावा केला की, टेलिव्हिजनने सगळ्यांच्या संवेदना बधिर करून टाकल्या,तर दुसरा म्हणाला की,'नाही,या स्त्रीवादाने पुरुषांचं रूपांतर नामर्दात करून टाकलं आहे'.आणखी काहींना वाटलं की,'मोठ्या शहरात कुणीच कुणाला ओळखत नसल्याचा हा परिणाम आहे'.होलोकॉस्ट झाल्यावर जर्मन लोक बोलले होते,त्याची आठवणच हा प्रसंग करून देत होता का? कारण त्यांनीही आपल्याला काहीही माहिती नसल्याचा दावा केला होता.आम्हाला कल्पनाच नव्हती काही असं म्हणाले होते ते.न्यू यॉर्क टाइम्सचे महानगरीय संपादक एब रोझेन्थाल यांनी केलेलं विश्लेषण खूप लोकांना पटलं.एब हा त्या काळातला आघाडीचा पत्रकार होता.त्याने लिहिलं,'ऑस्टिन स्ट्रीटवरील इमारतींमध्ये आणि घरांमध्ये जे काही घडलं त्यातून मानवी परिस्थितीचं एक भयानक वास्तवच नजरेसमोर आलं.'


जेव्हा वेळप्रसंग येतो तेव्हा आपण एकाकीच असतो.


थांबा अजून गोष्ट पुढे आहे.ती पुढील लेखामध्ये..

४/४/२३

भगवद्गीता - व्यास (इसपू चौथं ते पाचवं शतक)

'व्यासोच्छिष्टं जगत्सर्वम्' म्हणजेच व्यासांनी जगातलं सगळं ज्ञान उष्टं करून सोडलं आहे (म्हणजे,जगात असा कोणताही विषय नसेल, ज्याला महर्षी व्यासांनी त्यांच्या लेखनात स्पर्श केला नाही),असा समज सर्वत्र आहे.कारण,भगवद्गीतेमध्ये किंवा महाभारतामध्ये मानवी जीवनातल्या नीतिशास्त्र,

व्यवहारशास्त्र आणि मानसशास्त्र या विषयांचं सखोल विवेचन केलं आहे.अनेक धर्मांतल्या तत्त्वज्ञांनी,विचारवंतांनी आणि शास्त्रज्ञांनी

भगवद्गीतेची प्रशंसा केली आहे.महात्मा गांधींपासून अल्बर्ट आईन्स्टाईनपर्यंत अनेक थोरांना भगवद्गीतेनं प्रभावित करून सोडलं आहे.

"जेव्हा जेव्हा मनात शंकांचं काहूर माजतं आणि समोर फक्त नैराश्य दिसतं;दूर क्षितिजापर्यंत आशेचा एकही किरण दिसत नाही,अशा वेळी भगवद्गीतेमधल्या एका श्लोकाचा आधार मला मिळतो आणि त्या परिस्थितीतही माझ्या चेहऱ्यावर हासू फुलतं.भगवद्गीतेचं ध्यान केल्यानं आयुष्यात रोज नवा आनंद आणि नवा अर्थ प्राप्त होतो,"

असं म्हटलंय महात्मा गांधी यांनी!फक्त हिंदूंचाच नव्हे तर ओडिसी, इलियाडसारख्या ग्रीक महाकाव्याइतकाच महत्त्वाच्या आणि मानवी इतिहासातल्या महत्त्वाच्या ग्रंथांपैकी एक प्राचीन ग्रंथ म्हणून भगवद्गीता ओळखली जाते.म्हणूनच न्यायालयात भारतामधल्या भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घ्यायला लावलं जातं आणि मगच आरोपी असेल,साक्षीदार असेल किंवा फिर्यादी असेल ते आपलं म्हणणं मांडतात.या पवित्र ग्रंथावर हात ठेवल्यावर तो सत्यच कथन करेल,असा एक विश्वास बाळगला जातो.'गीतोपनिषद' किंवा 'योगोपनिषद' या नावांनी म्हणजेच वेदांच्या शेवटच्या रचनेतला भगवद्गीता एक ग्रंथ मानला जातो.भगवद्गीतेला उपनिषदाचा दर्जा दिला गेला आहे. तत्त्वज्ञानावर आधारलेला हा ग्रंथ आहे.गीता म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वरानं म्हणजेच श्रीकृष्णानं (श्रीकृष्ण म्हणजेच विष्णूचं रूप असं मानलं जातं.) युद्धाच्या वेळी अर्जुनाला आयुष्यात येणाऱ्या वेगवेगळ्या प्रसंगांत कसं वागावं याबद्दल सांगितलं आहे.मूळ संस्कृत 'भाषेमध्ये असलेल्या भगवद्गीतेमध्ये एकूण १८ अध्याय असून ७०० श्लोक आहेत.भगवद्गीतेची निर्मिती ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतकं झाली असावी असं मानण्यात येतं.मात्र याबद्दल तज्ज्ञांमध्ये एकवाक्यता नाही.तसंच भगवद्गीता ही महाभारतात असल्यानं ती व्यास ऋषींनी लिहिली असावी असं मानण्यात येतं.काही अभ्यासकांच्या मते भगवद्गीता ही मूळ महाभारतात नव्हतीच,तर ती महाभारतात नंतर समाविष्ट करण्यात आली असावी.अशी अनेक मतमतांतरं असली तरी भारतामध्ये पूर्वीपासून अनेक विषयांवरचं ज्ञान हे मौखिक स्वरूपात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असल्यानं भगवद्गीतेची प्राचीनता कोणीही नाकारत नाही.भगवद्गीतेमधलं तत्त्वज्ञान हे कालातीत असल्याचंही मानण्यात येतं.याचं कारण कुठल्याही काळात यातलं तत्त्वज्ञान मानवी जीवनाला लागू पडतं.असं म्हणतात,सुमारे ५००० वर्षांपूर्वी श्रीकृष्णाने आपला शिष्य अर्जुन हा युद्धभूमीवर संभ्रमावस्थेत असताना त्याच्याशी साधलेला संवाद म्हणजे भगवद्गीता आहे.अर्थात है समजून घेण्यासाठी आधी आपल्याला एक गोष्ट जाणून घ्यावी लागेल.कुरुक्षेत्रात जन्म झालेले भरत वंशातले धृतराष्ट्र आणि पांडू है दोन भाऊ होते.धृतराष्ट्र हा जन्मापासूनच अंध असल्यानं तो मोठा असूनही राज्यपद हे लहान असलेल्या पांडूला मिळालं होतं.पांडूला पाच मुलं,तर धृतराष्ट्राला १०० मुलं होती.पांडूची मुलं पांडव म्हणून,तर धृतराष्ट्राची मुलं कौरव म्हणून ओळखली जात होती.तरुण वयातच पांडूचा मृत्यू झाल्यामुळे युधिष्ठिर,भीम,अर्जुन,नकुल आणि सहदेव या पांडूच्या पाच मुलांचं संगोपन काही काळ राजपदावर बसलेल्या धृतराष्ट्राने केलं.कौरव आणि पांडव यांना गुरू द्रोणाचार्य यांनी क्षत्रिय विद्येत प्रवीण केलं.आपण वयानं ज्येष्ठ असल्यामुळे आता आपल्याच मुलांना राजपदावर बसण्याचा अधिकार असला पाहिजे असं धृतराष्ट्राला वाटत होतं.त्यातच धृतराष्ट्राचा मोठा मुलगा.दुर्योधन हा पांडवांचा द्वेष करत असे.त्यानं धृतराष्ट्राच्या मदतीने पांडवांना ठार मारून राज्य बळकावण्याचं ठरवलं.या कामात त्याला त्याचा मामा शकुनी याची नेहमीच साथ मिळत असे.मात्र पांडवांना त्यांचा काका विदुर आणि त्यांचा मामेभाऊ श्रीकृष्ण यांनी वाचवलं. विदुर आणि श्रीकृष्ण पांडवांचं वेळोवेळी रक्षण करत असले,तरी कौरव कट-कपट करण्यात कमी नव्हते.त्यांनी पांडवांना एकदा द्यूत हा खेळ खेळण्याचं आव्हान दिलं.या खेळात पांडव एक एक गोष्ट हरत गेले.अखेर त्यांच्याजवळ लावण्यासाठी काहीही शिल्लक राहिलं नाही.अशा वेळी त्यांनी आपली पत्नी द्रौपदी हिला खेळात उभं केलं.या वेळी श्रीकृष्णानं द्रौपदीचं रक्षण केलं;पण पांडव या खेळात आपलं राज्य गमावून बसले आणि त्यांना १३ वर्ष वनवास भोगण्याची शिक्षा मिळाली.१३ वर्षांच्या वनवासानंतर परत आल्यावर पांडवांनी दुर्योधनाकडे आपलं राज्य परत मागितलं, तेव्हा दुर्योधनानं सपशेल नकार दिला.इतकंच नाही तर सुईच्या टोकावर मावेल इतकी भूमीसुद्धा मी देणार नाही,असं उर्मटपणे उत्तर त्यानं पांडवांना दिलं.खरं तर आत्तापर्यंत वेळोवेळी पांडवांनी नेहमीच समंजसपणाची भूमिका घेतली होती; पण क्षत्रिय असल्यानं राज्य करणं हा आपला धर्म असून आता आपण युद्ध करायलाच हवं हे त्यांच्या लक्षात आलं.

युद्धाचा निर्णय होण्याआधी श्रीकृष्णानं मध्यस्थाची भूमिका बजावत दुर्योधनाला समजावण्याचा प्रयत्न केला;पण दुर्योधनानं काहीही ऐकायला नकार दिला आणि शेवटी युद्ध होणार हे नक्की झालं.या युद्धात श्रीकृष्ण हा पांडवांच्या बाजूनं उभा राहिला. त्यानंच अर्जुनाच्या रथाचं सारथ्यही केलं.या युद्धामध्ये अर्जुनाची मन:स्थिती खूपच द्विधा झालेली होती.आपण आपल्याच भावांशी, स्नेह्यांशी लढणार या गोष्टीचं त्याला खूप वाईट वाटत होतं.युद्धभूमीवर धारातीर्थी पडलेले आपल्याच माणसांचे मृतदेह पाहण्यापेक्षा आपण युद्धात माघार घेतलेली बरी,असे विचार त्याच्या मनात डोकावायला लागले.अशा वेळी अर्जुनाच्या मनात आलेले प्रश्न आणि त्यांना श्रीकृष्णाने दिलेली उत्तर आणि त्याला करून दिलेली कर्तव्याची जाणीव म्हणजेच भगवद्गीता आहे.कुठल्या परिस्थितीत कसं वागायला हवं याचं मार्गदर्शन श्रीकृष्ण अर्जुनाला करतो.श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेल्या संवादात आयुष्याचं तत्त्वज्ञान आहे. ज्ञान आहे आणि माहिती आहे. तसंच वेगवेगळ्या प्रसंगांतली उदाहरणं आहेत आणि अनेकविध उपमाही आहेत.मनुष्याला योग आणि वेदान्त याविषयीचं मार्गदर्शन यात केलं आहे. तसंच अशा प्रकारे वागल्यास माणसाचं आयुष्य सुखाने व्यतीत करता येऊ शकतं हेही या ग्रंथात सांगितलं आहे.'भगवद्गीता' या ग्रंथामुळे माणसाला ज्ञान मिळतं,समाधान मिळतं आणि अखेर आनंदही मिळतो.

अखेर त्याला आयुष्य सुखकर करून मोक्षाचा मार्ग शोधायला मदत होते,असं मानण्यात आल्यामुळे या ग्रंथाला 'मोक्षशास्त्र' असंही म्हटलं गेलं आहे.भारतीय संस्कृतीत रामायण आणि महाभारत ही दोन पर्व अतिशय महत्त्वाची मानली जातात. त्यातल्या महाभारत या पर्वामध्ये भीष्मपर्वात भगवद्गीतेविषयी सांगण्यात आलं आहे. महाभारतातल्या २५ ते ४२ अध्यायांमध्ये भगवद्गीतेविषयी सांगण्यात आलं आहे.संस्कृत भाषेत असलेला हा मूळ ग्रंथ इतक्या ओघवत्या आणि छंदात्मक भाषेत लिहिला गेला आहे,की वाचताना त्या श्लोकांना आपोआपच एक लय आणि एक नाद प्राप्त झाल्यामुळेच भारतात अनेक ठिकाणी भगवद्गीता गायलीही जाते.भगवद्गीतेतल्या जे अठरा अध्यायाची नावं अर्जुनविषादयोग,सांख्ययोग,

कर्मयोग, ज्ञानसंन्यासयोग,कर्मसंन्यासयोग,

आत्मसंयमयोग,ज्ञानविज्ञानयोग,अक्षरब्रह्मयोग,

राजविद्याराजगुह्ययोग, विभूतियोग,विश्वरूप-दर्शनयोग,भक्तियोग,क्षेत्रक्षेज्ञविभागयोग,गुणत्रयविभागयोग, पुरुषोत्तमयोग,दैवासुर संपविभागयोग, श्रद्धात्रयविभागयोग आणि मोक्षसंन्यासयोग अशी आहेत.भगवद्गीतेतल्या १८ अध्यायांना ज्याप्रमाणे १८ नावं आहेत,त्याचप्रमाणे गीतेलाही १८ नावांनी संबोधलं जातं.गीता,गंगा,गायत्री,सीता,सत्या,

सरस्वती,ब्रह्मविद्या,ब्रह्मवल्ली,त्रिसंध्या,मुक्तगेहिनी,अर्धमात्रा,चिदानंदा,भवग्नी,भय नाशिनी,वेदत्रयी,परा,

अनंता आणि तत्त्वार्थ ज्ञानमंजिरी अशी ती नावं आहेत.रोज जर या १८ नावांचं स्मरण केलं तर माणसाला पुण्य लाभतं,असाही एक समज हिंदुधर्मात प्रचलित आहे.भगवद्गीतेमध्ये एकूण ६० विषयांवर बोललं गेलंय.परमेश्वराची भक्ती, त्या भक्तीचे प्रकार,परमेश्वराचं स्मरण केल्यानं मिळणारे फायदे,माणसानं कुठल्या प्रकारे कर्म केलं पाहिजे,परमेश्वराला शरण जाणं,स्वतःचं प्रबोधन,शत्रूवर विजय मिळवणं,योगाभ्यास, समाधीभ्यास,परमेश्वराची प्रशंसा,संसार,नरक कसा टाळावा,आहार कसा असावा,साधना कशी करावी,

लोकसंग्रह कसा करावा किंवा असावा, मोहाचा त्याग कसा करावा,ज्ञानप्राप्ती कशी करावी,स्वधर्मपालन कसं करावं,स्थितप्रज्ञता अंगी कशी बाणवावी अशा प्रकारचे विषय यात मोडतात.भगवद्गीतेच्या १८ अध्यायांपैकी पहिल्या अध्यायामध्ये काय आहे? कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर अर्जुन आपल्या रथासह दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा असून त्याला त्या युद्धाचे भयंकर परिणाम डोळ्यासमोर दिसत होते आणि अशा वेळी आपण आपल्याच माणसांना मारून युद्ध जिंकून काय मिळवणार आहोत,असा प्रश्न पडला आणि मनोधैर्य खचल्यानं तो युद्ध करायला नकार देतो.दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनाची कानउघाडणी करतो.

अनेक तज्ज्ञांच्या मते दुसऱ्या अध्यायात भगवद्गीतेचा खरा सार आहे.

वासांसि जीर्णानि यथा विहाय ।

नवानि गृह् णाति नरोऽपराणि।

तथा शरीराणि विहाय जीर्णा 

न्यन्यानि संयाति नवानि देही ॥२२॥ 

यात युद्धानं मरण पावलेल्यांविषयी अर्जुन

विचार करताना श्रीकृष्ण त्याला म्हणतो, की मृत्यू म्हणजे दुसरं काही नसून मनुष्य आपली जीर्ण किंवा जुनी वस्त्रं टाकून नवी वस्त्रं धारण करतो,म्हणजेच नवा जन्म घेतो.त्यामुळे तू दुःखी होऊ नकोस.तसंच यात महत्त्वाचा श्लोक आहे तो म्हणजे :

कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। 

मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते संगो €

 स्त्वकर्मणि ॥४७॥

मनुष्यानं आपलं काम करत राहिलं पाहिजे.मात्र काम करत असताना त्याचं फळ मिळेल,ही अपेक्षा ठेवून काम करू नये.माणूस आपल्या इच्छा आणि वासना सोडतो,

तेव्हा तो खरा समाधानी होतो.आयुष्य जगताना अकर्म,कर्म आणि विकर्म असे तीन प्रकार असून कर्म म्हणजे मनुष्य करत असलेली कृती,तर फळाची अपेक्षा न करता केलेली कृती म्हणजे अकर्म आणि हिंसक,भयंकर अशी कृती म्हणजे विकर्म, असं श्रीकृष्णानं सांगितलं आहे.या जगात ज्ञानासारखं दुसरं महत्त्वाचं काही नाही.

ज्ञानी पुरुषाची समदृष्टी असते.म्हणजेच तो सगळ्यांकडे

सारख्याच दृष्टीनं बघतो.आपल्या इंद्रियांवर नियंत्रण कसं मिळवावं याविषयी योगाबद्दलची विस्तृत माहितीदेखील भगद्गीतेत सांगितली आहे.अभ्यासापेक्षा ज्ञान गहन असून ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे आणि ध्यानापेक्षा कृती करून मिळणाऱ्या फळाचा त्याग जास्त श्रेष्ठ असून,कर्मफलत्याग यापेक्षाही शांती ही श्रेष्ठ असते,असं भगवद्गीता सांगते.

विशेष म्हणजे यात सजीव सृष्टीच्या निर्मितीबद्दलही श्रीकृष्णानं सांगितलं आहे.रजो तमो-सत्त्वगुणांविषयी सखोल माहिती यात आहे.माणसाच्या वृत्ती त्याला माणूस म्हणून आणि राक्षस म्हणून कशा घडवतात याविषयी गीता बोलते.काम,क्रोध आणि लोभ ही विनाशाकडे जाणारी लक्षणं असून माणसानं या तिन्ही गोष्टींपासून दूर राहायला हवं.भगवद्गीतेमधला १८ वा अध्याय खूप महत्त्वाचा असून त्यात आयुष्य जगताना माणूस दोन मार्ग निवडू शकतो आणि मोक्ष प्राप्त करू शकतो,असं म्हटलं आहे.पहिला मार्ग म्हणजे सांख्य मार्ग याचाच अर्थ संन्यासी होऊन चालण्याचा मार्ग आणि दुसरा मार्ग म्हणजे कर्मयोगाचा,श्रीकृष्ण कर्मयोगाचा मार्ग जास्त चांगला,असं म्हणतो.फक्त कर्म करताना तटस्थ बुद्धी,फळाची इच्छा न धरता मार्गक्रमण, इंद्रियांवरचा निग्रह किंवा नियंत्रण,

परमेश्वर आणि भक्ती,स्वधर्माला जाणणं,अशा अनेक गोष्टींबद्दल बोललं गेलंय.एकूणच मानवी जीवन जगताना ते अर्थपूर्ण,समाधानी आणि समृद्ध होण्याच्या पायऱ्या भगवद्गीता सांगते.खरं तर भगवद्गीता म्हणजे आयुष्य समृद्ध करण्यासाठी चढायची एक एक पायरी आहे. भगवद्गीतेच्या अध्ययनामुळे आत्मपरीक्षण,संयम,

ध्यान,योग, दया यांचं ज्ञान प्राप्त होतं.अनेक प्रसंगांत माणसाचं मन द्विधा होतं आणि मनात कोलाहल माजतो.

अशा वेळी काय करावं हे त्याला सुचत नाही.अशा वेळी गीतेच्या पठणानं त्याचं मन शांत होतं.भगवद्गीतेमध्ये चातुर्वर्ण्य-देखील मांडला आहे.त्यामुळे त्यावर वेळोवेळी टीकाही झाली आहे.माणसाला भगवद्गीता सत्य आणि सदाचार यांचा मार्ग दाखवते.भगवद्गीतेनं सांगितलेल्या मार्गावरून जो चालेल त्याच आयुष्य उजळून निघेल असं मानलं जातं.भगवद्गीतेची शिकवण जो आचरणात आणल त्याचं जीवन सुखकर तर होतंच,पण भगवद्गीतेची सगळ्यात महत्त्वाची शिकवण म्हणजे आपण कुठलीही अपेक्षा न करता आपलं काम आणि कर्तव्य करत पुढे जाणं होय.थोडक्यात,भगवद्गीतेची ही शिकवण माणसाला निःस्वार्थीपणाचे धडे देते. निःस्वार्थीपणा ही आध्यात्मिक उन्नतीची पहिली पायरी समजली जाते.कठीण प्रसंगात परिस्थितीला सामोरं जाण्याचं धैर्य,संकटांशी दोन हात करण्याचं सामर्थ्य ती देते.तसंच आयुष्याकडे बघण्याची समतोल दृष्टीही भगवद्गीताच देते.आपल्या राग,लोभ,

संताप या भावनांना काबूत ठेवण्याची ताकद मनुष्याला तीच देते.माणसाला विवेकशील बनवण्याचं सामर्थ्य भगवद्गीतेमध्ये आहे.मनातले नकारात्मक विचार घालवून सकारात्मक विचारांची ज्योत तेवायला तीच मदत करते.

ज्याप्रमाणे मनुष्य आपली जुनी वस्त्रे टाकून नवीन वस्त्रे धारण करतो त्याचप्रमाणे मृत्यू म्हणजे मनुष्य आपलं वृद्धावस्थेमुळे जीर्ण झालेलं शरीर त्यागून नवीन शरीर धारण करतो, असं भगवद्गीता सांगते.त्यामुळे माणसानं मृत्यूला घाबरू नये आणि शोक करू नये असे यातून ती सूचित करते आत्मा असून त्याला कोणीही नष्ट करू शकत नाही,असे भगवद्गीतेमध्ये सांगितले आहे.तसंच जन्म आणि मृत्यू हे अटळ असून त्यांचं दुःख करू नये,काम क्रोध आणि लोभ या तीन गोष्टी मनुष्याला नरकाकडे नेतात त्यामुळे माणसाने या तिन्हींचा त्याग केला पाहिजे असं भगवद्गीता सांगते.भगवद्गीता फक्त वाचायचाच ग्रंथ नाही,तर तो सांगितला जातो आणि एकलाही जातो आणि मुख्य म्हणजे तो आचरणात आणण्याचे प्रयत्न केले जातात.


अपुर्ण..

जग बदलणारे ग्रंथ


२/४/२३

झाडांच्या अबोल विश्वाचं बोलकं दर्शन - झाडांची भाषा..

डिक्शनरीप्रमाणे भाषेची व्याख्या करायची झाल्यास,

एकमेकांशी संवाद साधताना आपण जे साधन वापरतो ते म्हणजे भाषा.या दृष्टिकोनातून विचार केला तर पृथ्वीच्या सजीव सृष्टीत फक्त मानव जातीतच भाषेचा वापर होतो असे म्हणावे लागेल,कारण या संकल्पनेची व्याप्ती मानवकेंद्रित आहे.पण जंगलातून झाडांचं एकमेकांशी संभाषण चालत असेल का,हे जाणून घेणं रोचक ठरणार नाही का?पण ते एकमेकांशी संवाद तरी कसा करत असतील? झाडं काही आवाज काढत नाहीत,वाऱ्याने

एकमेकांवर घासून फांद्यांची करकर आणि पानांची सळसळ ऐकू येते,मात्र त्यात झाडाला काही श्रेय नाही.असं लक्षात आलंय की झाडं एका निराळ्याच पद्धतीने एकमेकांशी संवाद साधतात.त्यासाठी ते गंधाचा वापर करतात.गंधाच्या वापरातून संभाषण' हे कसं शक्य आहे? अहो,ही गोष्ट काही आपल्याला अगदीच अनोळखी नाही.नाहीतर आपण अत्तर आणि सुगंधाचा वापर कशाला केला असता?आणि अत्तर वापरलं नाही तरीही आपला गंध कळत नकळत दुसऱ्यांना काहीतरी सांगून जात असतोच की! काही लोकांना वास येतच नाही.तरीही आपण दुसऱ्याच्या गंधाकडे आपोआप आकर्षित होत असतो.आपल्या घामातील'फेरोमोन्स' या रसायनामुळे प्रत्येक व्यक्तीला एक विशिष्ट गंध असतो आणि हे 'फेरोमोन्स'च आपल्या जोडीदाराच्या निवडीत आपल्याला निर्णायक मदत करतात.थोडक्यात,

आपल्या वंशवाढीसाठी कुणाला निवडावे,हे ठरवण्यात 'फेरोमोन्स'ची भूमिका महत्त्वाची आहे.

म्हणजे गंधाची गुप्त भाषा मानवालाही कळते असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही.चार दशकांपूर्वी आफ्रिकन सव्हानामध्ये शास्त्रज्ञांना एक शोध लागला.काही जिराफ अम्ब्रेला थॉर्न अकेशिया (बाभूळ) झाडांची पालवी खात होते,जे साहाजिकच त्या झाडांना पसंत नव्हतं.काही क्षणातच त्या झाडांनी आपल्या पानांमध्ये विषारी द्रव्य सोडायला सुरुवात केली.आपण इथे नकोसे आहोत असा संदेश त्या जिराफांना मिळाला आणि ते निघून गेले.पण ते शेजारच्या झाडाकडे वळले का? नाही! सुमारे शंभर यार्ड दूर जाऊन त्यांनी परत आपली खादाडी सुरू केली.याचं कारण फारच आश्चर्यकारक आहे.ज्या झाडांवर जिराफांचा फराळ चालू होता त्या झाडांनी हवेत इथिलिन नावाचा एक गॅस सोडला.यामुळे आजूबाजूच्या झाडांना काहीतरी संकट असल्याचा संदेश मिळाला.मग तेही आपल्या पानातून विषारी रसायन सोडायला लागले.जिराफही हुशार होते ते सव्हानाच्या अशा भागात गेले जिथे संदेश पोहोचला नसेल किंवा वाऱ्याच्या उलट्या दिशेला चालू लागले.इतरांना खबर पोचवणारा वायू वाऱ्याबरोबर वाहत जातो आणि उलट्या दिशेच्या झाडांना जिराफ येत असल्याची सूचना मिळालेली नसते.फक्त आफ्रिकेतच नव्हे तर आपल्या भागातील जंगलातही अशा प्रकारचा संवाद चालू असतो. आपल्या पालवीची चराई होत असताना झाडाला ज्या वेदना होतात त्याची नोंद बीच,स्प्रूस आणि ओक प्रजातीची झाडंही ठेवतात.जेव्हा एखादा सुरवंट पान खायला सुरुवात करतो तेव्हा जखमेच्या भोवतालच्या ऊतीमध्ये बदल होतो. त्या ऊती काही विद्युत संदेश सोडतात.जखम झालेल्या मानवी ऊतीमध्येही हेच दिसतं.आपल्या मेंदूला असा संदेश काही मिली-

सेकंदात पोहोचतो,पण वनस्पतीत त्याचा प्रवास मिनिटाला एक तृतीयांश इंच इतका संथ असतो.

त्यामुळे संरक्षण रसायनांचे काम सुरू होईपर्यंत काही तास जातात.वनस्पतींचे जीवनचक्र संकटसमयीसुद्धा असेच संथ गतीने चालते.पण याचा अर्थ असा नव्हे की झाडांचे आपल्या अवयवात काय चालू आहे.

यावर नियंत्रण नाहीं.मुळांवर काही संकट बेतलं तर पूर्ण झाडाला ते कळतं आणि पानातून गंधित सुरक्षा द्रव्यं सोडली जातात.या द्रव्यांचा साठा केला जात नाही,ती त्याक्षणी लाईफ आणि त्या कामासाठी बनवली जातात.झाडात अशी वेगवेगळी द्रव्यं बनवण्याची क्षमता असते त्यामुळे काही क्षण तरी त्यांना स्वतःवरच्या हल्ल्यापासून रक्षण करता येतं.झाडांना आपले मित्र कीटक आणि शत्रू कीटकांची अचूक ओळख असते.प्रत्येक कीटकाची लाळ वेगळी असते,त्यावरून झाडाला कीटक ओळखता येतो.झाडांकडून कीटकांना ओळखण्याची प्रक्रिया इतकी अचूक असते की झाड त्यानंतर अशी 'फेरोमोन्स' हवेत सोडतात जी त्या विशिष्ट कीटकांना खाणाऱ्या विशिष्ट भक्षकांनाच आकर्षित करतात.ते उपकारक भक्षक मग या त्रासदायक कीटकांना खाऊन टाकतात आणि झाडांची मदत करतात. उदाहरणार्थ,एल्म आणि पाईनच्या झाडांकडून एका परोपजीवी माशीला आमंत्रण दिलं जातं. ती माशी झाडावर येऊन पान खाणाऱ्या सुरवंटामध्ये आपली अंडी घालते.माशीची पिल्लं मोठी झाली की सुरवंटाला आतून खायला ते सुरुवात करतात मरण पावण्याची ही नक्कीच आल्हाददायी पद्धत नाही! पण याचा परिणाम म्हणजे त्या कीटकांपासून झाडाची सुरक्षा होते आणि वाढ होत राहते.झाडांना कीटकांची लाळ ओळखता येते म्हणजे त्यांच्यात अजून एक क्षमता आहे,ती म्हणजे चवीची पारख.गंधाची एक मर्यादा म्हणजे वाऱ्याने तो लगेच उडून जातो आणि फार फार तर शंभर एक यार्डाच्या परिसरातच दरवळतो.पण वास झपाट्याने पसरतो त्यामुळे या मार्गाने संकटाचा इशारा आपल्या इतर भागांना तत्काळ पोचवता येतो.एखाद्या कीटकाचा इशारा देण्यासाठी झाडाला विशिष्ट सूचना देण्याची गरज नसते. झाडांनी सोडलेला मूलभूत रासायनिक इशारा प्राणी जगताला ओळखू येतोच आणि त्यांना कळतं की झाडावर हल्ला झाला आहे.भुकेल्या कीटक- भक्षकांना खाद्यापासून दूर राहणे अशक्य असते.मग त्यांची मेजवानीच झडते.झाडं स्वत:ची सुरक्षा स्वत: ही करू शकतात. उदाहरणार्थ,ओक प्रजातीच्या झाडांच्या पानांत आणि सालात कडू विषारी टॅनिन द्रव्य असतं.हे खाऊन काही कीटक मरतात तर काहींना त्याची कडू चव सहन होत नाही.

विलो वृक्षात अशाच प्रकारचं सालिसिलिक अँसिडचं उत्पादन होतं. आपण या अँसिडचा वापर अँस्प्रिन औषधात करतो त्यामुळे विलो झाडाच्या सालापासून बनवलेला चहा आपल्याला डोकेदुखीसाठी आणि तापावर उपयुक्त असतो. पण अशा प्रकारची सुरक्षाप्रणाली राबवण्यात झाडाला खूप वेळ लागतो.त्यामुळे स्वसुरक्षेसाठी झाडांना रासायनिक द्रव्यं आणि गंध यांचा दुहेरी वापर करावा लागतो.

संकटसमयी झाड फक्त गंधाचा वापर करून गप्प बसत नाही,कारण जिकडे वारं पोहोचणार नाही तिथले आपले काही बांधव त्यापासून वंचित राहतील.बॅनकुवर येथील युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिटिश कोलंबियाच्या सुसन सीमार्ड यांनी असा शोध लावला की एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी झाडं आपल्या मुळाला जखडलेल्या बुरशीच्या जाळ्यातून (फंगल नेटवर्क) रासायनिक संदेश पाठवू शकतात.'आणि आश्चर्य म्हणजे मुळातून फक्त रसायनाद्वारे बातम्या दिल्या जात नाहीत तर त्यासाठी झाडांकडून इलेक्ट्रिक इम्पल्स म्हणजे विद्युत लहरींचा वापरही होतो.यांचा वेग सेकंदाला एक तृतीयांश इंच इतका असतो.आपल्या शरीराच्या मानाने हा वेग खूपच मंद म्हणायला हवा.पण जेलीफिश आणि काही अळ्यांच्या मज्जातंतूंतून धावणाऱ्या संदेशाचा असाच वेग असतो.

एकदा का अशा ताज्या बातम्या प्रसारित झाल्या की लगेच इतर ओक संरक्षणासाठी त्याच्या धमन्यांतून टॅनिन सोडू लागतात.झाडांच्या मुळांचा विस्तार त्यांच्या पानांच्या विस्तारापेक्षा दुप्पट तरी असतो. त्यामुळे आपल्या शेजारच्या झाडाच्या मुळांना त्यांना नक्कीच जोडून घेता येतं.तरीही त्यात काही अपवाद आहेत.

जंगलात काही एकलकोंडे वृक्ष असतात ज्यांना इतरांशी संबंध ठेवायचा नसतो.अशा झाडांचा परिसंस्थेत सहभाग नसल्याने त्यांच्याकडून संकट सूचना अडवल्या जातात का? सुदैवाने याचे उत्तर नाही असं आहे.संदेश पोचवण्याच्या कामात बुरशी मध्यस्थाचं काम करतात. इंटरनेटच्या फायबर ऑप्टिक तारेप्रमाणे बुरशी काम करतात.बुरशीचे सूक्ष्म तंतू जमिनीत सर्वत्र पसरून त्यांचं एक घनदाट जाळं तयार झालेलं असतं.जंगलातून एक चमचा माती घेतली तर काही मैल तंतू त्यात असतात.'हायफी'हे त्यांचं शास्त्रोक्त नाव.' काही शतकाच्या कालावधीत एका बुरशीचं जाळं काही चौरस मैल,म्हणजे संपूर्ण जंगलात पसरलं जातं.या जाळ्यातून झाडांचे संदेश जंगलात पसरू शकतात आणि कीटक,दुष्काळ किंवा इतर संकटांचा इशारा सर्वांना पोचतो.सीमार्डने शोधालेल्या या जाळ्याला 'नेचर' या प्रसिद्ध नियतकालिकाने 'वूड वाईड वेब" असं नाव दिलं आहे,ज्याचा आज विज्ञानात वापर केला जातो.पण या जाळ्यातून किती आणि कोणत्या प्रकारच्या माहितीची देवाण-घेवाण होते,याचा आपला अभ्यास अजून प्राथमिक अवस्थेतच आहे. सीमार्डच्या संशोधनात असंही दिसलं की भिन्न प्रजातीची झाडं एकमेकांचे स्पर्धक असले तरी ते एकमेकांच्या संपर्कात असतात.आणि यांना मदत करणाऱ्या बुरशीचा या सर्वांमध्ये तालमेल बसवणं,समेट घडवणं आणि माहिती व पोषकद्रव्यांचं समान वाटप करणं याकडेच कल असतो.कारण त्यातून त्यांचा स्वतःचा फायदा असतो.एखादं झाड जेव्हा कमकुवत होतं तेव्हा अशा प्रकारे संवाद साधण्याची आणि स्वत:ची सुरक्षा करण्याची त्याची क्षमता कमी होते. कीटक दुर्बल झाडांची निवड करतात त्यामागे हेच कारण असावे.कीटकांना झाडांनी दिलेला संकटाचा इशारा जाणवत असावा.

झाडाच्या पानाचा चावा घेऊन कदाचित कीटक तपासात असतील की झाड संकटाचा संदेश पाठवू शकत आहे का? जर झाड मौन राहिलं तर ते आजारी तरी असेल किंवा बुरशीच्या जाळ्यापासून तुटलेलं तरी असेल.अशा वेळेस कीटकाची मेजवानीच असते.! कमकुवत झाडांप्रमाणेच जंगलातले एकलकोंडे वृक्षसुद्धा संकटापासून सुरक्षित नसतात,कारण त्यांना आजूबाजूला काय चाललं आहे याची कल्पना नसते.एका सहजीवी जंगलात असा संवाद फक्त झाडांमधून चालत नाही तर गवत आणि झुडपं ही अशाप्रकारे आपापसात संवाद करतात.पण एखाद्या शेताला भेट दिली तर तिथे मात्र वनस्पती चूपचाप बसलेली असतात.शेतीत निवडक पैदास पद्धतीमुळे (सिलेक्टिव्ह ब्रीडिंग) वनस्पतींची दुसऱ्यांबरोबर संवाद साधण्याची क्षमता नाहीशी झाली आहे.जमिनीखालून किंवा वरून ते एकमेकांशी बोलू शकत नाहीत,म्हणजे एका प्रकारे ते मूकबधीर असतात आणि त्यामुळे कीटकांची सहज शिकार बनतात.

आधुनिक शेतीमध्ये कीटकनाशकांचा अतिवापर होण्यामागचं हे एक कारण आहे.जर शेतकऱ्यांनी जंगलाकडून धडा घेतला तर कदाचित आपल्या शेतीत ते थोडी जंगली झाडांचा रानवा आणून शेतातल्या पिकांना 'बोलते' करू शकतील.झाडं आणि कीटकांतील संवाद फक्त संरक्षण आणि आजारपणाबद्दल नसतो.आपल्या विकसित प्रगल्भ घ्राणेंद्रियांच्या आधारे आपण याचा अनुभव घेतच असतो.झाडांच्या आसपास उल्हसित करणारा सुगंध दरवळत असतो,तेव्हा ही झाडं कीटकांना मंद सुगंधी आमंत्रण देत असतात,त्याबद्दल मी बोलतो आहे.फुलोरे तुमच्या-आमच्यासाठी किंवा उगीचच सुगंध सोडत नाहीत.फळणारी झाडं,विलोज आणि चेस्टनट हे सुगंधाचा वापर करून परिसरात हिंडणाऱ्या मधमाशांना आकर्षित करतात. आपल्या फुलावर बसून दुसरीकडून आणलेल्या परागाची धूळ उडवल्याबद्दल त्या मधमाशांना फुलातला मकरंद इनामात मिळतो.फुलाचे विशिष्ट रंगरूप म्हणजे कीटकांना एक संदेश असतो.त्यांच्या दृष्टीत जंगलाच्या हिरव्या आच्छादनात रंगीत फुलं म्हणजे चवदार फराळाकडे जाण्याचा मार्ग दाखवणारे फलकच असतात.म्हणजे गंध,दृष्टी आणि विद्युत प्रवाहाचा वापर करून झाडं बोलतात.(मुळांच्या टोकाशी चेतापेशीच्या माध्यमातून विद्युत प्रवाहाच्या रूपात).पण आवाज आणि श्रवणाचं काय? जरा पुन्हा त्याकडे वळू.प्रकरणाच्या सुरुवातीला मी म्हटलं की झाडं बधीर असतात पण नवीन संशोधनाने यावरही शंका घेतली आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या मोनिका गॅगलिओनो यांनी ब्रिस्टल आणि फ्लोरेंसच्या संशोधकांबरोबर अक्षरशः जमिनीला कान लावून झाडांचे आवाज ऐकण्याचा प्रयोग केला."प्रयोगशाळेमध्ये झाडांचा अभ्यास करणं शक्य नसतं,त्यामुळे धान्याच्या बियांच्या छोट्या रोपांवर त्यांनी हा प्रयोग केला.प्रयोग सुरू झाल्यावर मुळांच्या तडतडण्याचा आवाज त्यांच्या उपकरणात नोंदला गेला.या रोपांची मुळं २२० हर्ट्स फ्रिक्वेन्सीचा आवाज करत होती. पण मुळांच्या तडतडण्याचं काय कौतुक? साधं लाकूड जरी स्टोव्हमध्ये जाळलं तरी हा आवाज येतोच की!पण या तडतडण्याच्या आवाजामुळे शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं की,या आवाजाचा परिणाम वेगळ्या रोपांवर होतोय.त्यांनी नीट निरीक्षण करायला सुरुवात केली तर त्यांच्या लक्षात आलं की,प्रयोगशाळेतील ज्या धान्याच्या बिया प्रत्यक्ष प्रयोगात नव्हत्या त्यांची मुळं ही या आवाजाला प्रतिसाद देत हाती.ज्या दिशेला २२० हर्ट्सचा आवाज येत होता त्या दिशेला त्यांची टोकं वळत होती.प्रयोगशाळेतल्या गवताला या फ्रिक्वेन्सीच्या ध्वनिलहरी ऐकू येत होत्या तर! झाडं ध्वनिलहरींचा वापर करून बोलतात यावर अधिक जाणून घ्यायची माझी उत्सुकता आता वाढली,कारण हे माणसांपेक्षा फार काही वेगळं नव्हतं.आपणही आवाजाच्या माध्यमातूनच एकमेकांशी बोलतो.झाडांच्या जीवनाचं गुपित उलगडण्याची ही गुरुकिल्लीच तर नसेल ना? आपल्याला बीच,ओक आणि पाईन वृक्षांची खुशाली कळाली तर काय मजा येईल!दुर्दैवाने आपलं यातलं संशोधन फारच कमी आहे.तिथे पोहोचायला आपल्याला अजून खूप काळ लागेल.पण इतकं लक्षात ठेवा,की पुढल्या वेळेस जंगलातून चालताना काही तडतड किंवा चरचर ऐकू आली तर ती फक्त वाऱ्याचीच असेल असं नाही बरं!


द हिडन लाईफ ऑफ ट्रीज

१५ मार्च २०२३ या लेखातील पुढील भाग

३१/३/२३

द ओरिजिन ऑफ स्पीशीज - चार्ल्स डार्विन ( १८५९ )

प्रत्येक जीव आपलं अस्तित्व टिकवण्याच्या प्रयत्नात संघर्ष करत असतो.कधी अन्नासाठी,कधी पुनरुत्पादनासाठी,कधी शत्रूविरुद्ध प्रत्येक जीव लढा देत असतो.यात अजून एक बाब त्याच्या लक्षात आली,ती म्हणजे शत्रूही या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावत असतात. मांसाहारी प्राण्यांसाठी इतर प्राणी हे अन्नच असतात.त्यामुळे इतर प्राणी आणि पक्षी या हिंस्र आक्रमक प्राण्यांच्या हाती न लागण्याचा प्रयत्न करतात.नाही तर त्यांच्या जातीचं अस्तित्व कायमचं संपण्याचाही धोका निर्माण होऊ शकतो.हे सगळं निसर्गानं निर्माण केलेलं चक्र आहे.निसर्गातल्या अडचणींचा सामना करत जे जगतात त्यांचंच अस्तित्व टिकू शकतं. पुनरुत्पादन होत असताना बऱ्याचदा पुढची पिढी आधीच्या पिढीसारखीच जन्माला येते. एखादे वेळी पुढच्या पिढीत काही जीव आधीच्या पिढीपेक्षा वेगळे गुण घेऊन जन्माला येतात.हे नवीन जीव जर नैसर्गिक वातावरणात आपलं अस्तित्व टिकवू शकले तर सजीवांची एक नवीन जात निर्माण होते.जर याउलट ते नवीन जीव नैसर्गिक संकटांचा सामना करण्यास सक्षम नसतील तर मात्र हे नवे जीव संपुष्टात येतात.हेच मुद्दे वनस्पतींच्या बाबतीतही खरे आहेत. एखाद्या झाडाची बी पक्ष्यांमार्फत अनेक मैल दूर प्रवास करते.जिथं ती पडते तिथं.रुजते आणि त्याचं झाड तयार होतं;पण जर तिथलं वातावरण त्या वनस्पतीला पोषक नसेल तर ते झाड तिथंच मरतं.त्या वनस्पतीच्या जातीचं अस्तित्वही यामुळं अनेकदा धोक्यात येत असतं.कधी कधी त्या वातावरणानुसार वनस्पतीमध्येही अनेकदा बदल होताना दिसतात.

म्हणूनच आपल्याला एकाच प्राण्याची,पक्ष्याची किंवा वनस्पतीची वेगवेगळी रूपं बघायला मिळतात.

निसर्गानं प्रत्येकाला तर आपली पुनरुत्पादनाची सीमाही आखून दिलेली असते.फुलातला पराग किंवा बी यांसारखे कुठलेही पुनरुत्पादन करणारे भाग जास्त काळ टिकून राहत नाही.त्यांची शक्ती हळूहळू कमी होत जाते.हे जर असं नसतं तर प्रत्येकानं आपलं पुनरुत्पादन इतकं केलं असतं की,संपूर्ण पृथ्वीच व्यापून टाकली असती. हा निसर्गानं आपला समतोल राखण्यासाठीच केलेला एक उपाय आहे.या प्रक्रियेला डार्विननं 'नॅचरल सिलेक्शन'असं नाव दिलं,तर माणसाने स्वतः प्रयत्नपूर्वक 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग' करून निर्माण जाती निर्माण करण्याच्या प्रक्रियेला त्यानं "आर्टिफिशियल सिलेक्शन' असं नाव दिलं.

जलमोहिमेवरच्या प्रवासात डार्विननं अनेक कीटक,पक्षी,

प्राणी सगळं काही खाल्लं होतं. घुबडाचं मांस मात्र त्याला अजिबात आवडलं नव्हतं.कुठल्या मांसाची चव कशी होती याविषयीदेखील तो नोंद करून ठेवत असे.दरम्यान डार्विनला जहाजावर आलेले चित्रविचित्र अनुभव आणि जमवलेली माहिती १८३९ साली त्यानं 'जर्नल ऑफ रिसर्चेस इंटु जिऑलॉजी अँड नॅचरल हिस्ट्री ऑफ व्हेरियस कंट्रीज व्हिजिटेड बाय एच.एम.एस.बीगल' या नावानं प्रकाशित केली.डार्विनला आपल्याला आतापर्यंतच्या निरीक्षणांतून आणि अभ्यासांतून जे लक्षात आलं होतं.त्यातूनच सजीवांच्या विविध जातींचा कसा जन्म झाला याविषयीचे त्याचे विचार पक्के होत गेले.त्यानं २० वर्षांपासून गोळा केलेली विविध प्रकारची माहिती एकत्र केली.बीगल मोहिमेत आलेले सगळे अनुभवही त्याच्या पाठीशी होतेच.बागकाम,प्राणी,नॅचरल हिस्ट्री यांच्याविषयीची अनेक पुस्तकं,याशिवाय परत प्रवासवर्णनं अशा अनेक पुस्तकांचा अभ्यास करून त्यानं माहिती गोळा केली.तो वनस्पती,प्राणी,पक्षी, 'भूरचनाशास्त्रज्ञ यातल्या अनेक तज्ज्ञांनाही भेटला,त्यांना प्रश्नावली देऊन त्यांच्याकडून उत्तरं घेतली आणि अनेक विषय समजून घेतले. डार्विननं पाळीव पक्ष्यांचं वय आणि त्यांची हाडे यांची जंगलातल्या पक्ष्यांचं वय आणि त्यांची हाडे यांच्याबरोबर तुलनाही करून बघितली.ज्यातून पुरावा मिळण्याची शक्यता होती असा कोणताच भाग त्यानं सोडला नाही.त्यानं तर समुद्रात फळं टाकून,बियांची नैसर्गिकरीत्या देवाणघेवाण कशी होते हेही बघितलं.

जितका तो या विषयाच्या खोलात शिरत होता तितकाच तो नॅचरल सिलेक्शन या एका मोठ्या निष्कर्षाकडे पोचत होता.नॅचरल सिलेक्शनची आपली थिअरी योग्यच आहे हेच दर वेळी सिद्ध होत होतं. आपल्याकडच्या सगळ्या माहितीचं संकलन करून त्यानं शेवटी एक थिअरी तयार केली. हीच 'थिअरी 'डार्विनिझम' या नावानं प्रसिद्ध झाली.डार्विननं ती आपल्या काही जवळच्या वनस्पती शास्त्रज्ञांना दाखवली;पण अजूनही ही थिअरी प्रकाशित करून लोकांपर्यंत पोहोचवण्याची त्याची मनापासून तयारी होत नव्हती.याचं कारण म्हणजे त्याची थिअरी धर्मालाच आव्हान देणारी होती.पुरेसे पुरावे गोळा करून मगच ही थिअरी जगासमोर आणावी, असा विचार डार्विननं केला आणि मग तो पुराव्याच्या मागे लागला.

१८४२ साली त्यानं आतापर्यंत जमवलेली माहिती पुस्तकरूपात लिहायला सुरुवात केली.हे सगळं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' या पुस्तकात सामील होणार होतं;पण हे काम सोपं नव्हतं.सजीवांच्या प्रजातींच्या अस्तित्वाबद्दलचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं लोकांना समजतील आणि पटतील अशा पद्धतीनं डार्विनला लिहायचं होतं.डार्विननं आपली ही कल्पना १८४२ च्या जानेवारी महिन्यात प्रसिद्ध भूशास्त्रज्ञ ल्येल याला कळवली आणि १८४४ साली डार्विनच्या या पुस्तकाची २३० पानं लिहून पूर्ण झाली! एके दिवशी डार्विनला आल्फ्रेड रसेल वॉलेस या सृष्टिवैज्ञानिक / नॅचरलिस्टकडून 'एसे ऑन टेंडन्सी ऑफ व्हरायटीज टु डिपार्ट इनडेफिनेटली फ्रॉम द ओरिजिनल टाइप' या नावानं लिखाणाचा एक ड्राफ्ट आला.त्या ड्राफ्टमध्ये डार्विनच्याच थिअरीचं संक्षिप्त रूप होतं.याचा अर्थ वॉलेसनंही डार्विनसारखीच उत्क्रांतीवादाची थिअरी मांडली होती.

वॉलेसनंही अँमेझॉन आणि काही जंगलांतून बरेच नमुने गोळा केले होते.डार्विनला पुराव्यासकटचं आपली थिअरी पुस्तकात मांडायची होती आणि त्यामुळेच त्यानं आतापर्यंत आपलं पुस्तक छापलं नव्हतं.हा ड्राफ्ट जर वॉलेसनं आधीच छापला असता तर तो आपण लिहीत असलेल्या पुस्तकाचंच संक्षिप्त रूप असलं असतं,असं डार्विनच्या लक्षात आलं.आपल्या आधी वॉलेसनं त्याच पुस्तक छापलं तर आपली मेहनत पाण्यात जाणार,

या विचारानं डार्विन अस्वस्थ झाला. डार्विननं आपली अनेक वर्ष केवळ या विषयाच्या खोलवर अभ्यासातच घालवली होती.आता नेमक काय करावं हे त्याला सुचतच नव्हतं.शेवटी ल्येल आणि जोसेफ कर यांच्याकडे डार्विननं सल्ला मागितला.या दोघांनी डार्विनला 'ही थिअरी डार्विन आणि वॉलेस या दोघांची आहे' असं जाहीर करण्याचा सल्ला दिला.हा सल्ला डार्विननं मान्य केला.विशेष म्हणजे वॉलेसनंही कुठलीही कटकट न करता हा सल्ला मान्य केला.या दोघांची थिअरी १ जुलै १८५८ या दिवशी 'डार्विन वॉलेस' थिअरी या नावानं लिनियन सोसायटीत वाचली गेली!पण उत्क्रांतीचा हा पेपर वाचण्यासाठी काही कारणांमुळे त्या वेळी डार्विन आणि वॉलेस या दोघांपैकी कोणीच उपस्थित राहू शकलं नव्हतं. तसंच तिथे फक्त ३० जणच हजर होते.ही थिअरी ऐकल्यावर जग हादरवून टाकणारा हा शोध आहे,असं म्हणत लोकांचा जो अनुकूल किंवा प्रतिकूल प्रतिसाद हवा होता,तसं काहीच घडलं नाही.उलट 'मागच्या वर्षी एकही नवीन शोध लागलेला नाही.'असं लिनियन सोसायटीच्या प्रेसिडेंटनं १८५९ च्या मे महिन्यात चक्क जाहीरही करून टाकलं! वॉलेसन कधीही ती थिअरी फक्त आपल्या नावावर प्रसिद्ध केली नाही.एवढंच नाही,तर त्यानं ही थिअरी 'डार्विनिझम' या नावानंच ओळखली जावी असंच मुळी जाहीर करून टाकलं.! मग मात्र डार्विननं जास्त वेळ घालवला नाही.त्यानं लगेच एका वर्षानेच ही थिअरी 'क्वार्टरली रिव्ह्यू' या नियतकालिकात प्रकाशित केली.या पुस्तकाचं नाव त्यानं सुरुवातीला 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन और द प्रिझर्व्हेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' असं भलंमोठं दिलं होतं. आपल्या पुस्तकाची प्रत जेव्हा डार्विननं प्रकाशकाकडे दिली तेव्हा या नियतकालिकेचा प्रकाशक जॉन मरे चक्क घाबरला होता.

हे पुस्तक अजिबात खपणार नाही असंच वाटलं होतं.

त्यानं डार्विनला 'यापेक्षा तू कबुतरांवर लिही,मी छापतो,'

असं म्हटलं होतं.तरीही अखेर मरेन हिंमत करून पुस्तकाचं नाव जरा कमी करून 'द अँब्स्ट्रॅक्ट ऑफ व्हरायटीज थ्रू नॅचरल सिलेक्शन' या पुस्तकाच्या १२०० प्रती छापल्या.पुस्तक खपावं म्हणून पुस्तकाची किंमत केवळ १५ शिलांग ठेवली.मात्र या पुस्तकाच्या १२०० प्रती पहिल्याच दिवशी खपल्या! त्यानंतर या पुस्तकाची अनेक भाषांतरही झाली.डार्विनचं हे पुस्तक अनेक देशांत घरोघरी वाचलं गेलं. काळानुसार त्याचं नावही बदलत गेलं. सुरुवातीला असलेलं 'द अँब्स्ट्रक्ट ऑफ व्हरायटीज थू नॅचरल सिलेक्शन' हे नाव बदलून 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन और द प्रिझव्र्हेशन ऑफ फेवर्ड रेसेस इन द स्ट्रगल फॉर लाइफ' झालं होतंच,त्यानंतर या पुस्तकाचं नाव 'ओरिजिन ऑफ स्पीशीज' एवढं लहान झालं. १८८२ सालापर्यंत फक्त इंग्लंडमध्ये या पुस्तकाच्या जवळजवळ २४००० प्रती विकल्या गेल्या होत्या.!

या पुस्तकात सुरुवातीच्या पहिल्या चार प्रकरणांत डार्विननं आपल्या थिअरीची मूलतत्त्वं उलगडून सांगितली,

तर पुढच्या चार प्रकरणांत या थिअरीवरच्या शक्य आरोपांविषयी चर्चा केलेली आहे.त्यानंतरच्या प्रकरणांत भूरचनाशास्त्र,वनस्पती आणि प्राण्यांची भौगोलिक विभागणी तसंच त्यांचं वर्गीकरण, त्यांची रचना आणि त्यांची ऍम्ब्रिओलॉजी यांच्याविषयी चर्चा केलेली होती.

पुस्तकाच्या सुरुवातीलाच डार्विननं सजीवांमध्ये बदल घडत असतात आणि ते तसेच्या तसे राहात नाहीत हा मुद्दा सामान्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता.'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग'मुळे जन्म झालेला अनोळखी जीव हा नवीन प्रजाती म्हणून म्हणून ओळखला जावा,असं मत त्यानं मांडलं.

वातावरण,अन्न,मांसाहारी प्राणी,उपलब्ध जागा अशा अनेक गोष्टींमुळे सजीवांचं अस्तित्व आणि प्रमाण कसं नियंत्रित होतं हेही त्यानं समजावून सांगितलं, त्यानंतर डार्विननं 'नॅचरल सिलेक्शन'विषयी भाष्य केलं.

या पुस्तकातले उत्क्रांतीवादामधले काही महत्त्वाचे मुद्दे म्हणजे,

सजीवांच्या जातींना कायमचं अस्तित्व नसतं,तर त्या कायम बदलत असतात.सर्व जातींना अस्तित्वासाठी आणि पुनरुत्पादनासाठी झगड़ा करत राहावा लागतो.याअस्तित्वाच्या लढाईमध्ये ज्याज्या टिकून राहातात,त्यांच्या पुनरुत्पादनातून अशा जातींची वाढ होते.यालाच 'नॅचलर सिलेक्शन' असं म्हणतात.

डार्विननं अतिशय सोप्या भाषेत या गोष्टी समजावून सांगितल्या मुळे सामान्य माणसालाही ही थिअरी समजून घ्यायला फारशी अवघड गेली नाही.

हे पुस्तक लोकांच्या हातात पहिल्यांदा पडल्यावर इंग्लंडमध्ये एकच खळबळ उडाली.नंतर मात्र हळूहळू ते पुस्तक जगभर वाचलं गेलं.काहींना डार्विनचे विचार पटले,तर काहींनी त्याच्यावर टीका केली.डार्विनचे विचार चर्चला आणि धर्मनिष्ठ लोकांना मान्य नव्हतेच.तसंच काही शास्त्रज्ञांनाही त्याविषयी शंका होत्या.डार्विनची थिअरी 'फॉसिल्स'- वरून सिद्ध होत नाही,असं काहीचं म्हणणं होतं.जर प्राणी उत्क्रांतीन हळूहळू बदलत असतील,तर मग दोन प्राण्यांमधले ही वेगवेगळ्या अवस्थेतले अनेक प्राणी सापडायला हवे होते,असं त्यांचं म्हणण होते;पण या उत्क्रांतीसाठी प्रचंड मोठा काळ लागतो,'असं डार्विननं म्हटलं होतं.डार्विनची खिल्ली उडवणारी व्यंगचित्रंही त्या काळी प्रकाशित होत.नाकतोडा,कुठलासा बग,फुलपाखरू यांचे वेगवेगळे अवयव कापून ते एकमेकांना जोडून 'नवीनच' एक प्राणी बनवून डार्विनची चेष्टा करायला लोक घेऊन येत.डार्विन जिवंत असेपर्यंत 'ओरिजिन ऑफ स्पीशीज'च्या प्रत्येक आवृत्तीत अनेक बदल होत गेले आणि दर वेळी त्यात नवीन माहिती लिहिली गेली;

त्यातल्या चुका दुरुस्त केल्या गेल्या;नवीन पुरावेही जोडले गेले आणि काही रेखाटनंही काढली गेली.दर वेळी हे पुस्तक अधिकाधिक चांगलं आणि वाचनीय होत गेलं. या पुस्तकात डार्विननं अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत उत्क्रांतीची थिअरी अतिशय सोपी उदाहरणं देऊन स्पष्ट केली होती.

पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर 'ही थिअरी माझी आहे आणि ती डार्विननं चोरली आहे' असा दावा करणारे अनेक होते तरी त्यात पेंट्रिक मॅथ्यू नावाच्या शास्त्रज्ञाचा दावा बरोबर होता.डार्विननं ही नॅचरल सिलेक्शनची थिअरी मांडायच्या २० वर्ष आधीच ही थिअरी 'नेव्हल टिंबर अँड अर्बोरीकल्चर' या पुस्तकाच्या 'अँपेंडिक्स' मध्ये छापली होती.हे पुस्तक कुणाला फारसं माहीतच नसल्यामुळे मॅथ्यूनं लिहिलेली थिअरी कुणी वाचणं शक्यच नव्हत.

डार्विनही या पुस्तकाबद्दल अनभिज्ञ होता. त्यामुळं त्यानं मॅथ्यूची थिअरी चोरल्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता, पण तरीही डार्विननं मॅथ्यूची माफी मागितली!

डार्विनच्या 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज बाय मीन्स ऑफ नॅचरल सिलेक्शन' या पुस्तकानं जगभरातल्या शास्त्रज्ञांना जाग केल्यावर डार्विननं 'द डिसेंट ऑफ मॅन' नावाचं अजून एक पुस्तक लिहिलं.या पुस्तकात डार्विननं 'एप' पासून माणूस झाला आणि तो कसा झाला हे सांगितलं.

डार्विनला अनेकांकडून विरोध होत असतानाही डार्विनचे अनेक कट्टर समर्थकही त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहिले.टी.एच. हक्सलेन तर डार्विनला जोरदार पाठिंबा दिला.यानंतर डार्विननं 'नॅचरल सिलेक्शन' प्रमाणेच 'सेक्श्युअल सिलेक्शन' हेही उत्क्रांतीसाठी जबाबदार कसं ठरतं हे शोधून काढलं आणि ही चिअरी त्यानं द डिसेंट ऑफ मॅन अँड सिलेक्शन इन रिलेशन टू सेक्स'या त्याच्या पुस्तकात मांडली.यावरही बरेच वाद आणि चर्चा झाल्या.डार्विननं 'द एक्स्प्रेशन ऑफ द इमोशन्स इन मॅन अँड अँनिमल्स' या नावानं अजून एक पुस्तक लिहिलं.या पुस्तकात त्यानं माणसांमध्ये आणि प्राण्यांमध्ये असलेल्या भावनांविषयी लिहिल १८८१ साली त्याचं 'द फॉर्मेशन ऑफ व्हेजिटेबल मोल्ड थ्रू द अँक्शन ऑफ वर्क्स' हे पुस्तक आलं.वनस्पती,गांडूळ आणि माती या विषयांवरही त्यानं अनेक पुस्तकं लिहिली.पण 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' इतकी प्रसिद्धी त्याच्या इतर कुठल्याच पुस्तकाला मिळाली नाही.डार्विन प्रत्येक गोष्ट विज्ञान आणि तर्क यांच्या कसोटीवर तपासून बघत असे.इतकंच काय,पण त्यानं लग्न या विषयावरदेखील त्यातल्या फायद्यातोट्यांविषयी अभ्यास करून लिखाण केलं होतं.एम्मा वेजवूड या त्याच्यापेक्षा नऊ वर्षांनी मोठ्या असलेल्या स्त्रीशी डार्विनचं लग्न झालं.या दांपत्याला एकूण १० मुलं झाली.एम्मानं डार्विनला शेवटपर्यंत साथ दिली. फावल्या वेळात तो तिच्याबरोबर सारिपाटही खेळायचा.इतकंच नाही तर या खेळात कोण जिंकलं आणि कसं जिंकलं हेही तो टिपून ठेवायचा.आपली तब्येत खालावलेली असतानाही डार्विन शेवटपर्यंत काम करतच राहिला.मृत्यूला कवटाळण्यापूर्वी डार्विन एम्माजवळ अखेरचं बोलला.तो म्हणाला,'मला मृत्यूची जराही भीती वाटत नाही.लक्षात ठेव, पत्नी म्हणून तू मला शेवटपर्यंत झकास साथ दिलीस. मुलांनाही हेच आठवायला सांग, की माझ्यासाठी माझी मुलं नेहमीच चांगली होती.'हेन्रिटा आणि फ्रान्सिस या आपल्या शुश्रूषा करणाऱ्यांनाही त्यांनी आपली खूप चांगली सेवा केली,ही गोष्ट आवर्जून सांगितली. १८ एप्रिल १८८२ या दिवशी चार्ल्स डार्विननं या जगाचा कायमचा निरोप घेतला.! खरं तर आपल्याला सेंट चर्च यार्डमध्ये दफन केलं जावं,अशी त्याची इच्छा होती;पण सगळ्यांना मात्र त्याला सन्मानानं इंग्लंडच्या वेस्टमिनिस्टर अँबेच्या दफनभूमीत दफन करायचं होतं,त्यामुळे २६ एप्रिल १८८२ या दिवशी त्याचे हजारो चाहते,कुटुंबीय,

स्नेही,तत्त्वज्ञ,शास्त्रज्ञ अशा अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत विख्यात शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटनच्या शेजारी डार्विनला दफन करण्यात आलं.

आज चार्ल्स डार्विन जरी या जगात नसला तरी त्याचं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' हे पुस्तक आजही प्रचंड लोकप्रिय आहे,जितकं तो जिवंत असताना होतं.या पुस्तकामुळं अनेक शास्त्रज्ञांना सजीवांकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी तर दिलीच,पण धर्मात सांगितलेल्या चुकीच्या संकल्पना खोडून काढण्यासाठी हिंमतही दिली.हे पुस्तक उत्क्रांतीची प्रक्रिया हळूहळू घडते,असं सांगणारं असलं तरी त्यानं विज्ञानात वेगानं मोठी क्रांती केली यात मात्र शंका नाही.


२६ मार्च २०२३ या लेखातील शेवटचा भाग.

२९/३/२३

Law of Diminishing Marginal Utility "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत"

एका जंगलात एक शिकारी आपल्या सावजाचा पाठलाग करता करता रस्ता चुकला.सावज तर पळूनच गेले आणि ह्या शिकाऱ्याला जंगलाच्या बाहेर पडायचा मार्ग मिळे ना! मार्ग शोधता शोधता तो आणखीनच जंगलाच्या आतल्या भागात गुंतत गेला.एक दिवस गेला,दोन दिवस गेले,तीन दिवस गेले तरी हा शिकारी जंगलाच्या बाहेर पडू शकला नाही.भुकेने व्याकूळ झालेला हा माणूस कुठे काही खायला मिळतेय का ते शोधू लागला.तेवढ्यात एक सफरचंदाचे झाड त्याच्या दृष्टीस पडले.धावतच तो त्या झाडाकडे गेला आणि त्याने सफरचंद काढण्यास सुरुवात केली.दहा सफरचंद काढल्यानंतर त्याने एका जागी बसून ती खायला सुरुवात केली.तीन दिवसांचा उपास घडलेल्या त्या शिकाऱ्याने पहिले सफरचंद मोठ्या आवडीने खाल्ले आणि त्याच बरोबर ते सफरचंद मिळाल्याबद्दल परमेश्वराचे मनापासून आभारही मानले.दुसरे सफरचंद खाताना त्याला पहिल्या सफरचंदाएवढा आनंद मिळाला नाही.तरीही त्याने भुकेपोटी ते खाल्लेच;आणि देवाप्रति कृतज्ञता व्यक्त केली.जसजसे त्याचे पोट भरू लागले तसतशी त्याला त्या पुढच्या सर्व सफरचंदांमधील गोडी कमी वाटू लागली.दहावे सफरचंद तर त्याने टाकून दिले.

ह्या मानवी वृत्तीला अर्थशास्त्रामध्ये Law of Diminishing Marginal Utility म्हणजेच "घटत्या उपभोग्यतेचा सिद्धांत" असे म्हणतात.ही केवळ घटती उपभोग्यता नसते तर ती " घटती कृतज्ञता " असते.! आयुष्यात आपल्याला मिळालेल्या विविध सुखसोयींबद्दल विधात्याप्रति ऋण व्यक्त करण्याची आपली मानसिकताही घटतीच असते.आणि सर्व काही मिळाल्यानंतर तर ती शून्य होऊन जाते.कारण आपल्याला जे काही मिळाले आहे तो तर आपला हक्कच आहे,त्यात कुणाचे ऋण कसले व्यक्त करायचे,अशी वृत्ती होऊन जाते.ह्या कथेत तो शिकारी म्हणजे आपण सर्वजण आहोत आणि ती सफरचंदं म्हणजे आपल्याला आपल्या आयुष्यात मिळालेल्या सर्व सुखसोयी !आपल्याकडे ह्या सर्व सोयी उदंड असताना आपल्याला कुणाच्या ऋणाची जाणीवही होत नव्हती.उलट आपण सतत कुठल्या ना कुठल्या कारणांनी उदा.नोकरीतील काम,वाढत्या किंमती,सरकारी धोरण,वाढलेला ट्रॅफिक,प्रदूषण ह्यांबाबत तक्रारीच करीत होतो.पण

आज आपण ' तक्रार  मोडवरून ' एकदम 'कृतज्ञता मोडमध्ये' आलेले आहोत.

आज 'मला भाजी मिळाली','मला दूध मिळालं', 'मी सुरक्षित आहे','मी तंदुरुस्त आहे.'असल्या गोष्टींसाठी आपण देवाचे आभार मानतो.दोन महिन्यांपूर्वी जर कुणी आपल्याला सांगितलं असतं की ह्या सर्व गोष्टी हा आपला हक्क होऊ शकत नाही,त्या आपल्याला कुणामुळे तरी मिळताहेत;तर ते पटलंही नसतं.ह्या परिस्थितीनं आपल्याला कृतज्ञ व्हायला शिकवलं हे निश्चित ! आता पुढल्या आयुष्यात आपण 'कृतज्ञ' म्हणून वागायचं की 'उद्विग्न' म्हणून वागायचं हे प्रत्येकाने ठरवायचे आहे.कृतज्ञ म्हणून वागण्याने आपला आनंद वाढतो; कारण आपल्याला काय काय मिळालं आहे याचेच विचार आपल्या मनात घोळत असतात.पण उद्वेग धारण करून वागण्याने आपल्या दुःखात भर मात्र पडते.


ह्याचे एक फारच सुंदर उदाहरण म्हणजे गेल्या महिन्यात इटलीमध्ये घडलेली कथा.


साठ वर्षे वयाचा एक रुग्ण बरा होऊन दवाखान्यातून घरी जायला निघतो.दवाखान्याचे बिल बघून तो ओक्साबोक्शी रडायला लागतो. डाॅक्टर मंडळी त्याला धीर देतात आणि त्याचे बील कमी करण्याची तयारी दाखवितात.पण त्याचे रडण्याचे कारण ऐकल्यावर डाॅक्टरांच्या डोळ्यातही पाणी येते.तो म्हणतो "मी बिलाची रक्कम पाहून नाही रडलो.माझी आर्थिक स्थिती खूपच चांगली आहे. पण ह्या बिलामध्ये शेवटच्या रकान्यात एक दिवसाच्या ऑक्सिजनचा आकार जो ५००० युरो लावलेला आहे,ते पाहून माझ्या मनात विचार आला की मी निसर्गाचे (परमेश्वर)किती देणे लागतो; कारण हा एवढा महागडा प्राणवायू मी गेली साठ वर्षे निसर्गाकडून विनामूल्य मिळवतोय."

अशी कृतज्ञता असेल तर जीवनात फक्त आनंदच दिसणार आहे.आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी फक्त 'धन्यवाद' ह्या शब्दाची पारायणं करायची आहेत.अन्य काहीच नाही.जेवढ्या जास्त वेळा कृतज्ञता व्यक्त कराल तेवढ्या जास्त घटना कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घडतच जातील.कृतज्ञता निसर्गाप्रती आणि व्यक्तींप्रती हे जे विनामूल्य आहे तेच सर्वात मौल्यवान आहे.झोप,शांतता,आनंद,हवा,पाणी,प्रकाश आणि सर्वात जरूरी आपला श्वास,नेहमी आनंदी रहा.


..अनामिक