* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/१२/२३

लोकांना त्यांचा आत्मसन्मान राखू द्या! Let people keep their self respect!

अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.जनरल इलेक्ट्रिक कंपनीला चार्ल्स स्टीनमेट्जला विभाग प्रमुखाच्या पदावरून काढायचे नाजूक काम करायचे होते.स्टीनमेट्ज वीजेच्या कामात तरबेज होता,पण कॅलक्युलेटिंग विभागाच्या प्रमुखाच्या रुपात अपयशी ठरला होता.पण कंपनीला त्याला नाराजही करायचे नव्हते.तो खूप कामाचा माणूस होता आणि संवेदनशीलही म्हणून त्यांनी त्याला एक नवीन पद दिले.त्यांनी त्याला जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा कंसल्टिंग इंजिनियर बनवले. त्याचे काम तेच होते जे तो आता करत होता, तरी त्याचे पद बदलले होते आणि यानंतर त्याच्या जागी दुसऱ्या माणसाला विभागप्रमुख बनवलं गेलं.स्टीनमेट्ज खुश होता.जी. ई. कंपनीचे अधिकारीही खुश होते.त्यांनी आपल्या संवेदनशील अधिकाऱ्याला नाराज केल्यावाचून विभाग प्रमुखाच्या पदावरून हटवून दिलं होतं आणि त्याचा आत्मसन्मान राखू दिला होता.मित्र जोडा,डेल कार्नेगी,अनु-कृपा कुलकर्णी,मंजुल पब्लिशिंग हाऊस लोकांना त्यांचा आत्मसन्मान राखू द्या! हे कितीतरी महत्त्वपूर्ण आहे!आणि आमच्यापैकी किती कमी लोक याबाबत विचार करून ते लक्षात ठेवतात?आम्ही दुसऱ्यांच्या भावनांना आपल्या पायतळी तुडवत जातो,स्वतःची मनमानी करतो,लोकांच्या चुका काढतो,धमक्या देतो,दुसऱ्यांसमोर आपल्या मुलांवर किंवा कर्मचाऱ्यावर टीका करतो आणि कधी हा विचारच करत नाही की आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत आहोत.


जर आपण विचार केला,तर समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजू शकतो आणि शांततेने समस्या सुटू शकते.


जेव्हा कधी आम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला रागावत असू किंवा नोकरीतून काढून टाकण्याचे अप्रिय काम करत असू,तेव्हा आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे."कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात कोणाला मजा येत नाही.

नोकरीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याला तर यात फारच कमी मजा येते." (मी इथे एका पब्लिक अकाउंटंट मार्शल रा.ग्रॅजरच्या पत्राचा अंश देतोय.) "आमचा व्यवसाय बहुतांश हंगामी आहे.म्हणून जेव्हा आयकराची गर्दी ओसरून जाते, तेव्हा आम्हाला अनेक लोकांना कामावरून काढावं लागतं.


"आमच्या व्यवसायात अशी म्हण आहे,की कुणालाच कुऱ्हाड चालवण्यात आनंद होत नाही. परिणामतःअशी परंपरा विकसित झाली आहे की या कामाला जितक्या लवकर उरकता येईल तेवढं लवकर उरकायचं आणि साधारणतःअशा तऱ्हेनं करायचं. "बसा,मिस्टर स्मिथ.

हंगाम संपला आहे आणि आता आमच्यापाशी तुम्हाला देण्यासारखं काही काम नाही.उघडच आहे की तुम्हाला पण हे ज्ञातच होतं की तुम्हाला या व्यस्त हंगामासाठी कामावर ठेवलं गेलं होतं.या लोकांवर याचा प्रभाव निराशेचा व्हायचा आणि त्यांची मानहानी केली गेली असं त्यांना वाटायचं.यापैकी बहुतेक लोक जन्मभर अकाउंटिंग क्षेत्राशी संलग्न असतात आणि ते अशा कंपनीविषयी खास आस्था बाळगत नाहीत,जी त्यांना इतक्या सामान्य प्रकारे कामावरून काढून टाकते.मी इतक्यातच असा निर्णय घेतलाय की आमच्या हंगामी कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना अधिक कूटनीती आणि बुद्धीचा बापर करायला हवा.म्हणून मी हिवाळ्याच्या दरम्यान प्रत्येक माणसाकडून केल्या गेलेल्या कामाचा कसून आढावा घेऊन त्यावर चिंतन करीत असे आणि मी त्यांच्याशी अशा त-हेने बोलत असे.


"मिस्टर स्मिथ,तुमचं काम खरोखर चांगलं आहे (जर ते खरंच चांगलं असेल तर) जेव्हा आम्ही तुम्हाला नेवार्कला पाठवलं होतं तेव्हा तुमचं काम कठीण होतं.तुम्ही तिथे खूपच चांगल्या तऱ्हेने काम करून आपले कौशल्य दाखवून दिलंत. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.

तुमच्यात क्षमता आणि योग्यता आहे.तुम्ही कुठेही काम केलंत तरी तुम्ही खूप पुढे जाल.ही कंपनी तुमच्यावर विश्वास दाखवते आणि तुम्हाला सोडूही इच्छित नाही आणि तुम्ही हे विसरू नये असे आम्हास वाटते.

परिणामी,लोक नोकरी सुटल्यावरसुध्दा चांगला अनुभव घेऊन जात.त्यांची मानहानी झाल्यासारखं त्यांना वाटत नसे. त्यांना जाणीव असे की जर आमच्याकडे त्यांच्या योग्यतेचं काम असतं तर आम्ही निश्चितपणे त्यांना काढलं नसतं आणि आम्हाला पुन्हा त्यांची गरज भासली तर ते आमच्याकडे प्रेमाने येतात.आमच्या वर्गात एका सत्राच्या दरम्यान दोन सदस्य चर्चा करत होते.


चर्चेचा विषय होता,चूक काढण्याचा नकारात्मक प्रभाव आणि समोरच्याचा आत्मसन्मान राखल्यामुळे होणारा सकारात्मक प्रभाव.हॅरिसबर्ग,पेनासिल्वानियाच्या फ्रेड क्लार्कने आम्हाला त्याच्या कंपनीतली एक घटना ऐकवली.


 "आमच्या कंपनीच्या एका प्रॉडक्शन मीटिंगमध्ये व्हाईस प्रेसिडेंट उत्पादनाच्या प्रक्रियेबद्दल एका सुपरवायझरला सरळ सरळ प्रश्न विचारत होते. त्यांचा आवाज आक्रमक होता आणि त्यांना सुपरवायझरची चूक झाली आहे हे सांगण्याचा स्पष्ट हेतू होता.तो आपल्या सहकर्मीसमोर बोलणी खाण्यापासून वाचू बघत होता,म्हणून तो सरळ उत्तरं देत नव्हता.यामुळे व्हाईस प्रसिडेंटला राग आला आणि ज्यांनी त्याला खूप रागावलं आणि त्याच्यावर खोटं बोलण्याचा आरोपही लावला.या बोलाचालीत पूर्वीचे कामाचे संबंध काही क्षणातच संपून गेले.सुपरवायजर खूपच चांगला कर्मचारी होता आणि खूप कष्टाळूही होता,पण त्या घटनेनंतर तो आमच्या कंपनीच्या काही कामाचा राहिला नाही.काही महिन्यांनी तो आमच्या कंपनीला सोडून प्रतिस्पर्धी कंपनीत काम करू लागला, जिथे तो उत्तम काम करतो आहे."आमच्या वर्गातली अजून एक सदस्या ॲना मॅजोनने तिच्या कंपनीत झालेल्या अशाच एका घटनेबद्दल सांगितलं;पण पध्दती आणि परिणाम किती वेगळे होते! मिस मॅजोन एका फूड पॅक करणाऱ्या कंपनीत मार्केटिंग स्पेशालिस्ट होती.तिला असं एक मोठं काम सोपवलं गेलं होतं ज्यात तिला एका नवीन उत्पादनाचा टेस्ट मार्केटिंग रिपोर्ट सादर करायचा होता.तिने क्लासला सांगितलं,"जेव्हा टेस्टचा अहवाल आला तेव्हा माझे धाबे दणाणले.मी योजना बनवण्यात एक मोठी चूक केली होती, ज्यामुळे मला पूर्ण चाचणी पुन्हा करावी लागली असती.एवढंच नाही,तर माझ्यापाशी मीटिंगच्या आधी ही गोष्ट बॉसला सांगण्यासाठी अवधी नव्हता.कारण ज्या मीटिंगमध्ये मला अहवाल प्रस्तुत करायचा होता,ती लगेचच सुरू होणार होती.जेव्हा मला अहवाल प्रस्तुत करण्यास सांगितलं गेलं तेव्हा मी भितीने थरथर कापत होते.मी हा निश्चय केला होता की मी अश्रू ढाळणार नाही आणि लोकांना असं म्हणायची संधी देणार नाही,की स्त्रिया जास्त भावुक असल्यामुळे मॅनेजमेंटचं काम चांगल्या त-हेनं करू शकत नाहीत.मी माझा अहवाल सारांश रूपात प्रस्तुत केला आणि म्हटलं की माझी एक चूक झाली ज्यामुळे मला पुढच्या मीटिंगच्या आधी ही टेस्ट पुन्हा एकवार करावी लागेल.मी बसले आणि मला अपेक्षा होती की यावर माझे बॉस खूप रागावतील."


परंतु त्यांनी उलट मला माझ्या कामासाठी धन्यवाद दिले.ते म्हणाले,की नवीन प्रकल्पात चूक होणं सर्वसाधारण गोष्ट आहे.ते असंही म्हणाले,की त्यांना पूर्ण खात्री आहे की मी जेव्हा पुन्हा ती चाचणी करेन तेव्हा मी सफल आणि योग्य ठरेन.कंपनीला उपयोगी ठरेल.त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमोर मला आश्वस्त केलं की त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते जाणतात की मी पूर्ण क्षमतेने माझं काम केलं आहे.तेसुद्धा म्हणाले की,माझ्यात क्षमता नव्हती हे कारण नसून मला कमी अनुभव होता हे खरं कारण होतं."मी मीटिंगहून परतताना आकाशात उडत होते.मी निश्चय केला की इतक्या चांगल्या बॉसवर मी कधीही खाली पाहण्याचा प्रसंग आणणार नाही." आम्ही बरोबर असलो आणि समोरचा चूक असला तरी त्याचा अहंकार

दुखावण्याचा आम्हाला काय हक्क आहे?आम्ही त्याला आपला आत्मसन्मान राखण्याची संधी का देत नाही? फ्रेंच एव्हिएशन पायोनियर आणि लेखक रूपात प्रस्तुत केला आणि म्हटलं की माझी एक चूक झाली ज्यामुळे मला पुढच्या मीटिंगच्या आधी ही टेस्ट पुन्हा एकवार करावी लागेल. मी बसले आणि मला अपेक्षा होती की यावर माझे बॉस खूप रागावतील."


"परंतु त्यांनी उलट मला माझ्या कामासाठी धन्यवाद दिले.ते म्हणाले, की नवीन प्रकल्पात चूक होणं सर्वसाधारण गोष्ट आहे.ते असंही म्हणाले, की त्यांना पूर्ण खात्री आहे की मी जेव्हा पुन्हा ती चाचणी करेन तेव्हा मी सफल आणि योग्य ठरेन. कंपनीला उपयोगी ठरेल. त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमोर मला आश्वस्त केलं की त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते जाणतात की मी पूर्ण क्षमतेने माझं काम केलं आहे. तेसुद्धा म्हणाले की, माझ्यात क्षमता नव्हती हे कारण नसून मला कमी अनुभव होता हे खरं कारण होतं.


"मी मीटिंगहून परतताना आकाशात उडत होते.मी निश्चय केला की इतक्या चांगल्या बॉसवर मी कधीही खाली पाहण्याचा प्रसंग आणणार नाही." आम्ही बरोबर असलो आणि समोरचा चूक असला तरी त्याचा अहंकार दुखावण्याचा आम्हाला काय हक्क आहे? आम्ही त्याला आपला आत्मसन्मान राखण्याची संधी का देत नाही? फ्रेंच एव्हिएशन पायोनियर आणि लेखक ॲटोनिया द सेंट एग्जपरीने लिहिलं होतं,


 "मला असं काही बोलायचा अधिकार नाहीए, ज्यामुळे एखाद्याच्या नजरेतून तो उतरून जाईल. या गोष्टीमुळे काही फरक पडत नाही की मी त्याच्याबद्दल काय विचार करतोय,परंतु ह्या गोष्टीने नक्की फरक पडतो की तो स्वतःबाबत काय विचार करतोय.

कुणाच्याही आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणे हा मोठा अपराध आहे."


०८.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..



१४/१२/२३

एक माणुकीची शाल.. उत्तरार्ध A manuki shawl.. Late Such

आज बाबांना सोडायला जायचं.आमची पहाटेपासूनच लगीन घाई सुरू झाली...प्रवासात जेवण लागेल म्हणून मनीषाने स्वयंपाक केला.ब्रश घेतला का ?  साबण ? टॉवेल कुठे ठेवला आहेस ?  आणि कपडे ?आम्ही एकमेकांना विचारून सामानाची पुन्हा पुन्हा खात्री करत होतो. नुसत्ती गडबड ... काय न्हवंच ! गेल्यावर बाबांना पुन्हा एकदा अंघोळ घातली आणि एकेक पांढरा शुभ्र कपडा अंगावर चढवला...बाबांचं रुपडं पालटलं.... हा नव्या रुपातला फोटो काढून बाबांना दाखवला त्यांचा स्वतःचाच विश्वास बसेना फोटो पाहून. 


त्यांना गहिवरुन आलं. मनीषाच्या डोळ्यात पाणी दिसलं.मी तिला खुणेनेच विचारलं,'काय झालं ?' 


मनीषा चे वडील म्हणजे तिचं सर्वस्व ! 

ती त्यांना तात्या म्हणते. परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून ती माहेरी जाऊ शकली नाही.


मी पुन्हा तिला खुणेनंच  विचारलं,'काय झालं ?' 


हुंदका आवरत ती एकच शब्द बोलली "तात्या"...! प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना हाक मारताना डॅडी,पप्पा,

बाबा,अण्णा,तात्या, नाना,दादा,भाऊ यापैकी अशाच एका नावाने हाक मारते ! नीट बघितलं तर हे फक्त दोन अडीच शब्द... ! पण हेच अडीच शब्द म्हणजे प्रत्येक मुलीच सर्वस्व... ! या दोन अडीच शब्दात मुलीचं आख्खं जग सामावलेलं असतं. 


या दोन-अडीच शब्दांना मायेच्या पाकात मुरवलं, खस्ता खायच्या तव्यावर जरा भाजलं,मुलगी सासरी जाताना रडला होता,त्यातल्या एका थेंबाचं मीठ टाकलं आणि घासलेल्या टाचांतुन निर्माण झालेल्या आगीत थोडं शेकलं,की तयार होतो त्या पदार्थाचं नाव म्हणजे "बाप" ! 


आमच्या दोघांच्याही आयुष्यात आजच्या दिवशी ही व्यक्ती बाप म्हणून आली ! 


निघता निघता बाबांनी मनीषाला जवळ बोलावलं,तिचे हात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावले... आणि काही चिल्लर तिच्या हातात कोंबली.आणि भरल्या गळ्याने म्हणाले, 'सोहमला काहीतरी खाऊ घेऊन जा घरी बेटा, माझ्याकडे जेवढे होते ते सर्वच देतोय... !


प्रत्येक वेळेस बाबा सर्वांना सर्वच देत आले होते, आम्हालाही यावेळी सर्वच दिलं... ! ही चिल्लर कपाळाला लावुन माझ्या बॕगेत मी जपुन ठेवली आहे,मरेपर्यंत ठेवणार... ! जगातलं सगळं धन माझ्या या छोट्याशा बॕगेत सामावलं होतं...! 


आज पयल्यांदाच आपुन बी लय श्रीमंत हाय याची जाणिव झाली ! 


जायची वेळ झाली आणि इतका वेळ थांबवून ठेवलेल्या हुंदक्यांचे बांध आता मात्र  फुटले ... !


काहीवेळा बांध फुटणंच चांगलं... ! 

योग्य वेळी बांधुन ठेवतो तो बांध !


बाबांना आम्ही ताईंकडे रवाना केलं... गाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबांचा हात खिडकी बाहेरून हलत होता... !


ते नजरेआड झाले... भरलेल्या डोळ्यांना पुढचं काहीच दिसेना...आमच्यासोबत एक सहृद आले होते आम्हाला आशीर्वाद द्यायला.ते निघाले,म्हणाले, डाॕक्टर येतो आता, घरी जावुन पुजा अर्चा आटोपुन आॕफिसला पळायचंय. 


त्यांना निरोप देवुन आम्ही चालु लागलो... चालता चालता,आज सकाळपासून आपण काय काय केलं याचा विचार करायला लागलो... ! बाबांना स्नान घातले म्हणजे आपल्याला आता कुठे जाऊन अभिषेक करायची गरज नाही... ! साबण लावून बाबांच्या अंगावरची घाण साफ केली, बाबा सुगंधी झाले आणि जाता जाता आमचेही हात सुगंधी करुन गेले.... चला, म्हणजे अगरबत्ती लावायची आता गरजच नाही ... ! 


बाबांना दुपारचा जेवणाचा डब्बा दिला आहे, काही फळं दिली आहेत.... अरे आपण तर नैवेद्य सुद्धा वाहिला की.... ! बाबांनी त्यांची चिल्लर आमच्या झोळीत टाकली होती...  अरे वा... आपल्याला प्रसाद सुद्धा मिळाला की ! 


जातांना आपण बाबांना वाकुन नमस्कार केला... त्यांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवुन जवळ घेतलं होतं... अगं बघ मनिषा... म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आशिर्वाद सुद्धा मिळाला की.... ! अरेच्च्या,आपल्याही नकळत,आपली पुजाअर्चा अगोदरच आटोपली आहे,चल पळु आता पुढल्या कामाला... !


मी टाळी घेण्यासाठी माझा हात पुढे केला, हातावर टाळी देत मनीषा ने माझा हात पकडला... सुगंधी झालेले आमचे हात एकमेकांच्या हातात घेवुन आम्ही निघालो पुढची पुजा गाठण्यासाठी .... ! 


८ सप्टेंबर २०२०


ईद मुबारक ... !


मै आपके लिए इबादत करुँ... या आप मेरे लिए पुजा करें... 


दोनो एक बराबर है... 


मै आपको भाई कहुँ... आप मुझे भाऊ कहो... 


दोनो एक बराबर है... 


मै आपको इन्सान कहुँ आप मुझे माणुस कहो 


दोनो एक बराबर है... 


आप मेरेलिए मस्जिद में दिया जलाये हम मंदीर में आपके लिए घुटने टेंके 


दोनो एक बराबर है...


मै खजुर खाऊँ... आप लड्डु खाओ...


दोनो एक बराबर है... 


मै आपको राम पुकारुँ.., आप मुझे रहीम बुलाओ


दोनो एक बराबर है... 



मनत्रयोदशी ...!!!


आज धन्वंतरी प्रकट दिन... 


धन्वंतरी म्हणजे जगातले पहिले डॉक्टर...


सर्व वैद्यांचे देव... !!!


आज शुक्रवार,आज धनत्रयोदशी सुद्धा आहे...! 


आणि आज शुक्रवार म्हणजे आमचा रक्तदान करण्याचाही  ठरलेला दिवस आहे ... ! 


सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे, आपापल्या परीने प्रत्येक जण दिवाळी साजरी करीत आहे... ! दर आठवड्यातील शुक्रवार प्रमाणे आजही आमच्या भिक्षेकऱ्यांनी रक्तदान करून दिवाळी साजरी केली.एक वैद्य म्हणून धन्वंतरी ची पूजा आम्ही अशा प्रकारे साजरी केली.... !


आज म्हणे धनाचं पूजन करतात... 


आम्ही ज्यांच्यासाठी काम  करतो त्यांच्याकडे धन नाही पण सात्विक मन आहे... ! 


"धनाचं पुजणं" म्हणजे जर *धनत्रयोदशी* असेल....तर, "मनाला जपणं" ही *मनत्रयोदशी* असेल का ? "पुजणं" आणि "जपणं" ... दोन्ही शब्दांत, शब्दांची फक्त अदलाबदल  आहे... !


पण, अर्थ मात्र जमीन आसमानाइतके भिन्न... ! 


'पुजण्यामध्ये' आशिर्वादाची अपेक्षा असते...काहीतरी मागणं असतं... ! 


'जपण्यामध्ये' मागणी काहीच नसते.... असतं फक्त मनापासुन देणं... !!


मनापासुन कुणाला जपण्याची सुरुवात होते... त्याचं आख्खं आयुष्यंच मग "आशिर्वाद" होवुन जातं.... ! मागण्यासारखं काही उरतच नाही मग... !!! मागणंच संपलं तर पुजणं राहत नाही... तिथुन सुरु होतं मग जपणं... ! 


आपणांस दिवाळीच्या शुभेच्छा !!!


डाॕ.मनिषा व डाॕ.अभिजीत सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स' भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

१२/१२/२३

15 आॕगस्ट माझाही स्वातंत्र्य दिन 15th August is also my independence day..

१५ ऑगस्ट !!! 


ही नुसती तारीख नव्हे,आपणा सर्व भारतीयांच्या मनावर सुवर्णाक्षराने कोरलेला हा अभिमानाचा दिवस ! याच तारखेला एकेवर्षी भारत स्वतंत्र झाला होता... आणि एकेवर्षी मी सुद्धा


भारत इंग्रजांच्या गुलामगिरीत होता आणि मी माझ्याच


सुरुवातीला इंटरनॅशनल कंपनीमध्ये मी महाराष्ट्र प्रमुख होतो.महिन्याचं उत्पन्न ३ ते ४लाख ! 


पण यांतही समाधानी नव्हतो ! 

भरपूर पैसे कमावणे,वर ...वर... वर जाणे ...आणखी वरचे पद मिळवणे... ! 


घर गाडी बंगला घेणे..आज महाराष्ट्र प्रमुख आहे, उद्या भारताचा प्रमुख होणे...जमलंच तर परवा जगातील काही देशांचासुद्धा प्रमुख होणे  ... !


जग जिंकायला निघालेला सिकंदर होतो मी !

फरक इतकाच,तो सिकंदर घोड्यावर होता, आणि दिडशहाणा मी...  गाढवावरहे गाढव मीच होतो आणि गाढवावर बसलेला दिडशहाणाही मीच !


एके दिवशी,आयुष्याच्या वाटेत  भेटलेल्या भीक मागणाऱ्या एका आजोबांनी या दिड शहाण्या सिकंदराची नशा उतरवली...! 


माणूस म्हणून जगण्याचे सूत्र सांगितलं... ! 


ॲलोपॅथी,होमिओपॅथी,नॕचरोपॕथी आणि इतर कुठल्याही पॕथीपेक्षा Sympathy आणि Empathy (अनुभुती आणि सह अनुभुती) या पॕथी वापरणं हे माणुस असल्याचं लक्षण असतं हे  त्यांनी माझ्यावर ठसवलं... !  वेद शिकण्यापेक्षा एखाद्याची वेदना समजून घेणं, हे वैद्य असल्याचं खरं लक्षण,हे त्यांनीच मनावर  बिंबवलं ! डोंगरावर चढणार्‍या माणसाचे पाय ओढुन त्याला पाडण्यापेक्षा, जमिनीवर पडलेल्या एखाद्या निराधाराचे हात ओढुन त्याला उभं करणं यातच खरा पुरुषार्थ असतो... पुरुषार्थाची व्याख्या नव्यानं त्यांनी मला सांगितली... !


ते खरंतर भिक्षेकरी नव्हते,ते उच्चशिक्षित होते. या गोड व्यक्तीमधुन मधुर रस चावुन चावुन ओरबाडुन घेवुन उसाच्या चोयटीसारखं त्यांच्या भाऊबंदांनी त्यांना रस्त्यात फेकलं होतं !बाबांनी सांगितलेल्या त्या बाबी त्यावेळी कानात आल्या होत्या... पण मनात नाही... ! 

मी धावत होतो शर्यतीत...!

शर्यतीची नशा होती ...!! 

पैसे... पद... प्रतिष्ठा ... मी एकेक गड जिंकत चाललो होतो... पण मन भरत नव्हतं !

हे सगळं कमावून झाल्यावर

एके दिवशी भेटायला गेलो त्यांना... आणि समजलं,की मला मुलगा समजणारे "ते" बाबा बेवारस म्हणुन रस्त्यावर "मेले"... ! 


हो... स्वर्गवासी होणं, कैलासवासी होणं आणि देवाघरी जाणं ही प्रतिष्ठितांची मक्तेदारी ...! 


"मेला" हा शब्द प्रतिष्ठा नसणारांसाठीच ठेवणीत ठेवलाय.


ते मरुन गेले... आणि जातांना भिका-यांच्या डाॕक्टरला जन्माला घालुन गेले... ! 


मी त्यांचा मुलगा म्हणुन जिवंत असुनही ते बेवारस म्हणुन गेले... ! ज्यांनी त्यांना रस काढून हाकलुन दिलं होत, त्यां लोकांत आणि माझ्यात फरक काय ?


मी अंतर्मुख झालो !


पुर्वी दिलेले त्यांचे विचार आता कानातुन मनात यायला लागले... Heart पासुन हृदयात यायला लागले... ! त्यांच्या विचारांचं मनन चिंतन व्हायला लागलं, माझ्याही नकळत .... ! आणि या दिडशहाण्या सिकंदराची नशा पुर्ण उतरली ! जग जिंकण्यापेक्षा, जगातला "माणुस" जिंकावा किंवा माणुसकीचं "जग" जिंकावं...! 

उतरलेल्या नशेनं हेच शिकवलं ! 


आणि, हा दिडशहाणा सिकंदर त्या  गाढवावरून उतरला आणि १४ ऑगस्टला त्याने या इंटरनॅशनल संस्थेचा राजीनामा दिला.आणि १५ ऑगस्ट २०१५ला  भिकाऱ्यांचा डॉक्टर म्हणून तो रस्त्यावर आला... ! स्वतःच स्वतःवर लादलेल्या गुलामगिरीतुन तो मुक्त झाला... !


मीच आखुन घेतलेल्या पद-पैसा-प्रतिष्ठा या शर्यतीतुन मी स्वतंत्र झालो १५ आॕगस्ट २०१५ ला.... म्हणुन  हा माझ्या दृष्टीने माझाही स्वातंत्र्य दिन... ! या अगोदर असलेले सर्व दिवस माझ्यासाठी पैसा असुनही "दीन" होते... 


१५ आॕगस्ट २०१५ नंतर ते पैसा नसुनही "दिन" झाले ! जवळचे लोक म्हणतात... हरलास तु आभ्या ! 


नाही...! 


शर्यतीत किती धावायचं ? कसं धावायचं ? यापेक्षा कुठं थांबायचं ... ? हे कळणं जास्त महत्वाचं ! योग्य ठिकाणी हरावंच लागतं... !


कुठं आणि कधी हरायचं हे ज्याला कळतं तो कायम जिंकतो,कारण शर्यतीत धावणाराला हे कधीच कळत नाही... की शर्यत लावणारा स्वतः कधीच पळत नाही ! 


एखाद्याला आपल्या पुढं जाताना बघुनही आपल्याला आनंद झाला तर समजावं... आपण आत्ता खरे "मोठे" झालो...बाकी वय बीय सारं झुठ ,वय फक्त केस पांढरे करण्यापुरतं येतं... जेव्हा ते मन शुभ्र करेल... तेव्हा त्याची किंमत.! नाहीतर नुसताच तो गणितातला एक फालतु आकडा !! दरवेळी मी सर्वांना दर महिन्याचा लेखा-जोखा सादर करत असतो.


१५ ऑगस्ट २०१५  ला मी इंटरनॅशनल संस्थेमधला जॉब सोडला होता,अंगावरची झूल काढली होती.मी स्वतः मुक्त झालो होतो यादिवशी आज बरोबर या गोष्टीला पाच वर्षे पूर्ण झाली,म्हणून साधारण पाच वर्षाचा लेखाजोखा आज अगदी थोडक्यात सादर करत आहे...


वाटेत भेटलेल्या भीक मागणा-या आजोबांना आदरांजली वहायची म्हणुन भीक मागणा-या समुहासाठी मी काम करायचं ठरवलं. 


ते तर गेले... पण त्यांच्यासारखे अजुन खुप आहेत... त्यांतल्या एखाद्याला हात देवु, या विचारांतुन ...! 


या समुहासाठी काहीतरी काम करायचं म्हणून रस्त्यावर फिरायला सुरुवात केली.  


सुरुवातीला मला सुद्धा कशाचीही माहिती नव्हती.मी भीक मागणारांमध्ये  मिसळायचा प्रयत्न करु लागलो. 


सुरूवातीला लाज वाटायची...!  


डोक्यावर कॅप,डोळ्यावर गॉगल आणि चेहऱ्यावर रुमाल बांधून मी त्यांच्यात मिक्स होण्याचा प्रयत्न करायचो.  


मुखवटा लावला होता... ! 


पण मला भीक मागणा-या  लोकांनी त्यांच्यात मिसळू दिलं नाही.त्यांना वाटायचं,हा पोलिसांचा खबऱ्या असेल आणि आपल्याला पकडून देईल पोलिसांत, भीक मागतो म्हणुन ... !(कारण भीक मागणं हा गुन्हा आहे कायद्यानं ) किंवा कदाचित आपल्या बरोबर धोका करून, आपली जमा झालेली भीक घेऊन कुठेतरी पळून जाईल हा भामटा ...! डाॕक्टर आहे हा xxx,गोड बोलुन आपल्या किडन्या काढून विकेल,रक्त विकेल, अजुन काही काही पार्ट काढुन हा बाजारात विकेल.... यांत आपण मरुन जाऊ... याचा भरवसा काय ? 


किंवा आपल्या पोरीबाळींना कुठेतरी फसवेल, फसवुन "धंद्याला" लावेल. (मी अगोदर शरीर विक्रय करणा-या मुलींचं पुनर्वसन करणा-या एका संस्थेत बुधवार पेठेत काम करायचो.या ताईंमध्ये माझी उठबस होती,त्यांना वाटायचं, हा माझा "धंदा" आहे, आणि मी मधला दलाल !)


या सर्व गैरसमजापोटी,या लोकांनी मला त्यांच्यात येण्यास पूर्णपणे बंदी घातलीधमक्या दिल्या,शिव्याही दिल्या.खूप वेळा अंगावर धावुन सुद्धा आले,काही लोक तर चप्पल दाखवायचे किंवा अंगावर थुंकायचे...! 


मी त्यांच्यात येवुच नये,यासाठी ते हरत-हेनं मला विरोध करायचे ! 


मी पूर्णपणे निराश झालो होतो. 


या लोकांसाठी मी माझी खुर्ची आणि प्रतिष्ठा पणाला लावली होती. माझ्या चार ते पाच लाखांच्या उत्पन्नावर पाणी सोडलं होतं...


मी पूर्णपणे निराश झालो ! 


धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली.कुत्रं तरी बरं,त्याला कुणीतरी हाड् म्हणुन का होईना, तुकडा तरी टाकतं... मला ते ही मिळेना ! 

एकीकडे काहीही कमवत नव्हतो आणि ज्यांच्यासाठी काम करायचं म्हणुन नोकरी सोडली, ते लोक मला भाव देत नव्हते,नव्हे ते मलाच हाकलून लावायचे, जसा काही मीच भिकारी होतो... ! 


या काळात भिक्षेक-यांपेक्षा  वाईट अवस्था झाली माझी !


मी खरोखरचा बेरोजगार, 

बेनाम  झालो होतो... 


१४ आॕगस्ट पुर्वी लोक अपाॕइंटमेंट घेवुन आदरानं भेटायला यायचे ...१५ आॕगस्ट नंतर भिक्षेकरी लोक पण मला हाकलुन द्यायचे... माझ्यावर थुंकायचे ! 


किती विरोधाभास !


लाखोंचा पगार थांबल्यामुळे,माझं घर डबघाईला आलं... कालचा साहेब,आज भिकारी झाला !


एका रात्रीत रावाचा रंक होतो... आणि रंकाचा रावही होवु शकतो... ही म्हण मला माहीत होती... ! 


मी रावाचा रंक झालो होतो,त्या काळात, एका भिका-यांचं उत्पन्न माझ्यापेक्षा जास्त होतं ... !


अशा परिस्थितीत,डॉक्टर मनीषा धावुन आली. अर्धांगिनी असण्याचं कर्तव्य तीनं निभावलं ! तीने आर्थिक स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला... 


आई-वडील डॉक्टर पीडी सोनवणे आणि सौ.

भारती सोनवणे यांनी मानसिक आधार दिला. 


माझा भाऊ अमित सोनवणे आणि बहीण दिप्ती सोनवणे यांनी चोहोबाजुंनी आधार दिला...!

पण तरीही मी पुर्ण ढासळलो होतो... ! आर्थिक आणि मानसिक ! यांतुनही मी रस्त्यांवर फिरायचो भिक्षेक-यांत....आणि मला ओळखणारे लोक मात्र माझी खिल्ली उडवायचे... 


काय हो, महाराष्ट्र प्रमुख,आज रस्त्यावर कसे काय तुम्ही...? खी.खी.. खी... हसत  लोक टोमणा मारायचे... !


एसी हाफीसात बसणारे तुमी... आज गटाराजवळ बसले, वास घेत गटाराचा ... आरारारा.... वाईट वाटतं बुवा तुमचं... खी..खी... खी...! 


काय वो सर... आज भिका-यांत बसले तुम्ही...? काय पाळी आली राव तुमच्यावर...  खी..खी... खी...! कशाचा सर रे तो ...? खी..खी... खी...


हि,  खी... खी... खी... मी आयुष्यात कधीही विसरु शकत नाही !!!


मात्र या खी... खी... खी...ने इरादे अजुन मजबुत केले ! 


मित्र म्हणायचे,काय बे,आब्या उतरली का रे मस्ती तुजी ?


साल्या,लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत,तु मोटा तीस मार खान निघालास होय ? स्वतःला शाना समजतो का रे ?एवढी मोठी नोकरी सोडलीस ? मर साल्या आता,नोकरी  सोडून जो शहाणपणा केला आहेस भोग त्याची फळं... त्याच लायकीचा आहेस xxxx तु... !


हि xxxx शिवी मनात रुतुन बसलीय, काट्यासारखी ... !


हि शिवी मी मनात जपुन ठेवलीय... फ्रेम करुन आणि या फ्रेमवर मी खुप प्रेम करतो ! 


मी पुर्ण डिप्रेस झालो होतो,डिप्रेस करणारे माझेच होते...!


बुडण्याचं दुःखं नसतं... मरण्याचंही नसतं, पोहता येत नाही याचंही दुःखं मुळीच नसतं... पाण्यात ढकलणारा जेव्हा आपलाच असतो ते खरं दुःखं !


मी या दुःखात बुडुन गेलो !  


तरीही निर्लज्जासारखं,मला हाकलून देणाऱ्या भिक्षेक-यांमध्ये  मी रोज रोज जायचो.नाही नाही ते त्यांचं ऐकून घ्यायचो,त्यांच्या पोटभर शिव्या खायचो,रात्री झोप लागायची नाही,कारण शिव्याशाप खावुनही शेवटी पोट रिकामंच असायचं.... ! 


हे असं एक नाही, दोन नाही, तीन नाही, तर तब्बल ३१ महिने चाललं... ! 


एकेदिवशी,अंगावर अक्षरशः किडे पडलेले, फुटपाथवर २४ वर्षे पडलेले एक आजोबा होते, त्यांच्या पाच फुटांवर सुद्धा कुणीही जात नसे.त्यांचं सर्व ड्रेसिंग करून,त्यांना स्वच्छ करून "आपलं घर" च्या विजय फळणीकर सरांकडे एका वृद्धाश्रमात ठेवलं. 


या बाबांना पूर्ण माणसात आणलं....! 


ते गेले, तेव्हा त्यांचा मुलगा म्हणुन त्यांचे अंत्यसंस्कारही केले.... ! भीक मागणाऱ्या समूहाने हे सर्व पाहिलं... ! 

यानंतरही या समुहाने मी भिक्षेक-यांसाठी केलेल्या अनंत गोष्टी दुरुन दुरुन पाहिल्या... !


आणि हळूहळू माझ्याबद्दलचं त्यांचं मत बदलत गेलं...! यार ... हे सालं आपल्यातलंच हाय... ह्यो आपल्यासाटीच कायतरी करतोय ... ! 


इतकी साधी गोष्ट त्यांना कळायला ३१ महिने गेले होते... आणि हे त्यांना कळेपर्यंत मी पण ख-या अर्थानं भिकारी झालो होतो... ! हळूहळू मला त्यांनी आपल्या मध्ये ऊठ-बस करण्याची मनापासुन परवानगी दिली. 


आॕगस्ट २०१५ ते मार्च २०१८ अशी अडीच वर्षे मी फक्त त्यांच्यात मिक्स होण्यासाठी झुंजत होतो...! 


हा काळ माझ्यासाठी अत्यंत वाईट होता... खडतर होता... ! त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी मला अडीच  वर्षे झुंज द्यावी लागली.या काळात त्यांच्याशी नातं निर्माण करण्यासाठी मी त्यांच्याबरोबर सतत बसत असे, उठत असे, जेवत असे,खात असे...! 


भिक्षेक-यांनी माझी अशी अडीच  वर्षे कठोर परीक्षा पाहून मला त्यांच्यातला एक होण्याची संधी दिली... !


भिकारी होणंही इतकं सोपं नसतं तर ! त्यासाठी पण परिक्षा असतात... MPSC आणि UPSC पेक्षा अवघड ! यासाठीही कठोर परिश्रम असतात तर !!! 


साधारण एप्रिल २०१८ पासून माझं डॉक्टर फाॕर बेगर्स म्हणून खऱ्या अर्थाने काम सुरू झालं. 


डॉक्टर होण्यासाठी, कलेक्टर होण्यासाठी किंवा एखादा ऑफिसर होण्यासाठी आधी तीन ते चार - पाच वर्षे कठोर अभ्यास करावा लागतो आणि त्यानंतरच पदवी हातात मिळते.मी सुद्धा अडीच तीन वर्षे कठोर परिश्रम घेऊन भिकाऱ्यांचा डॉक्टर ही पदवी मिळवली होती, उत्तम मार्कांनी मी पास झालो होतो ! 


मी भिका-यांचा डाॕक्टर झालो होतो... ! 


हि पदवी मात्र एकदा हातात पडल्यानंतर, मी मागं वळून पाहिलंच नाही. 


सांगायला अभिमान वाटतो की,आज या भिक्षेकरी कुटुंबाचा मी कुटुंबप्रमुख आहे.मला विचारल्याशिवाय आज  कोणतीही गोष्ट आज यांच्यात होत नाही...

यांच्यामध्ये सोयरीक जुळताना सुद्धा आज माझा शब्द शेवटचा धरला जातो.यांच्या पोरांची नावं मला विचारुन ठेवली जातात...! पोरी कुठलीही गोष्ट पहिल्यांदा आपल्या आईला सांगतात.पण,आज भिक्षेकरी पोरी मला नी मनिषाला आईअगोदर आम्हाला सारं सांगतात.!


आमी आईबाप होवुन गेलो अशा पोरींचे... 


बिन बाळंतपणाची मनिषा... आई झाली त्यांची ! 


लगीन झालेली बाई,सर्व गोष्टीं आपल्या नव-याला,नायतर आपल्या बापाला सांगते... 


पोरी मलाच बाप समजाया लागल्या.... आयशप्पत ... मी पन्न्नास वर्षाच्या विवाहित पोरीचा मी बाप झालो... ! 


बापापेक्षा पोरगी वयानं मोठी... पण म्हटलं ना ? वय हा फक्त एक आकडा ! नातं महत्वाचं... आणि नात्याला वय नसतं ! भिक्षेक-यांच्या  शंभराहुन अधिक  पोरांची नावं आज "अभिजीत" आहेत...पन्नासाहुन अधिक पोरींची नाव आज "मनिषा" आहेत... !


कोणताही  पुरस्कार फिका वाटतो मला यापुढं !


आज पाच वर्षानंतर माझं भिक्षेक-यांचं कुटुंब ११०० इतक्या लोकांचं आहे.यात मला २०० ते ३०० इतके आईबाप आहेत, तितकेच आजी-आजोबा आहेत आणि या वयामध्ये मला आणि मनिषाला २०० ते ३०० पोरं सुद्धा आहेत ! आज जगातला सर्वात श्रीमंत व्यक्ती मी असेन असं मला वाटतं !


या सर्वांशी मानसिक नाती जुळवता जुळवता १०० भिक्षेक-यांना वैद्यकीय सुविधा देत आहोत. 

यांच्या,म्हणजेच आमच्या ५२ पोराबाळांचे शिक्षण  करत आहोत,याहुन आनंद कोणता ?


डोळ्यांना दिसत नसल्यामुळे या भिक्षेकरी आजी

आजोबांचे रस्त्यांत अपघात होतात,यात त्यांचे जीव जातात,हातपाय मोडतात.... ते टाळावे म्हणून अशा ५५० लोकांचे डोळ्यांचे ऑपरेशन आपण करून दिले आहेत आणि आता अपघाताचे प्रमाण सुद्धा कमी झाले आहे. 


रस्त्यावर बेवारस म्हणून कित्येक वर्षे खितपत पडलेल्या १६ आजी आणि आजोबांना महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या वृद्धाश्रमांमध्ये निवारा मिळवून दिला आहे.ते तिथे माझे आई बाप -  आजी आजोबा म्हणूनच राहतात. 


तीथं ते आडनाव "सोनवणे" म्हणुन लावतात ! 

सोनवणे आडनावाला याआधी इतका सन्मान कधी मिळाला नव्हता... !


यांत आईबापाला आधार दिला म्हणुन स्वतःला सुदैवी समजु की आईबापाला वृद्धाश्रमात ठेवावं लागतंय म्हणुन स्वतःला दुर्दैवी समजु... ?


या विचारांत आजही झोप लागत नाही मला !


हा भीक मागणारा समुह जर कष्टकरी झाला तरच समाज त्याला गावकरी म्हणून स्वीकारेल याची मला जाणिव झाली. भीक मागणारांना गावकरी बनवायचं हे ध्येय ठरवुन "भिक्षेकरी ते कष्टकरी आणि कष्टकरी ते गावकरी" हि आमच्या कामाची टॕगलाईन मी ठरवली ! 


माझ्या शब्दांना थोडी किंमत आहे हे कळल्यानंतर मी त्यांना भीक मागणं सोडायला प्रवृत्त केलं, णि त्यांना त्यांच्या कुवतीप्रमाणे वेगवेगळे व्यवसाय सुचवण्यात सुरुवात केली.याला यश येऊन ८५ कुटुंबांनी भीक मागणं सोडलं आहे आणि हि  कुटुंबं आज सन्मानाने जगत आहेत.रस्त्यावर चालणार्‍या या कामांमध्ये मला अनेक व्यक्ती आणि संस्था यांची मदत झाली.पब्लिक चॕरिटी कमिशनर आॕफिस, इन्कम टॅक्स ऑफिस, महिला व बालकल्याण, दिनानाथ मंगेशकर हाॕस्पिटल,लेले हाॕस्पिटल, पोलीस डिपार्टमेंट, पुण्यातील नामांकीत संस्था आणि व्यक्ती ! संस्थेतील बड्या अधिका-यांची नुसती भेट घेणं, "मुश्कील ही नही नामुमकीन है" ... तरीही हि मंडळी मला लहान पोरगं समजुन मला वेळ देतात... माझं ऐकुन घेतात... मदत करतात. मोठ्ठ्या खुर्चीतली ही सर्व माणसं  माझ्यासाठी मुद्दामहुन छोटी होतात ! 


लहान बाळाबरोबर खेळतांना आपणही लहान होतो तसंच...!!! 


कसे ऋण फेडावे यांचे ? 


याच प्रवासात आपल्यासारखे सहृद भेटले आणि आपण  माझ्यावर पूर्णपणे विश्वास टाकून संस्थेला देणगी देण्यासाठी सुरुवात केली.मी सुद्धा या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी करत असलेल्या कामाचा सर्व लेखा-जोखा दर महिन्याला सर्व सहृदांना  पाठवत असतो. मी करत असलेल्या कामाबद्दल सर्व बाबी प्रांजळपणे कळवतो आणि त्यांचा सल्ला सुद्धा घेतो.यातून कामांमध्ये एक पारदर्शीपणा राहण्यासाठी खूप मदत झाली, शिवाय हे काम फक्त डॉक्टरच नाही तर आपलंही आहे हे समाजाला वाटायला लागलं !


न फेडता येणा-या आपल्या ऋणांत आहे मी, माझा साष्टांग नमस्कार स्विकारावा ! 


हे सर्व करत असताना मी भीक मागणा-या व्यक्तींच्या हृदयापर्यंत  पोहोचण्याचा प्रयत्न करू लागलो. त्यांची सुखदुःख समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो.आणि यातूनच जन्म झाला माझ्या ब्लॉगचा... !


भारतात आणि भारताबाहेर हे ब्लॉग पोहोचू लागले. 

शाबासकी मिळू लागली आणि या अशा शाबासकी ने  माझा हुरूप आणखी वाढला. काही लोक माझे ब्लॉग स्वतःचे म्हणून त्यांच्या नावावर कॉपी करून पुढे पाठवतात.या गोष्टीचा मला मुळीच खेद नाही.... पण खेद याचा वाटतो की ते फक्त माझे ब्लॉग कॉपी करतात माझं काम नाही... ! ब्लॉग कॉपी करण्याबरोबरच माझं काम जेव्हा ते कॉपी करतील तो दिवस माझ्या आनंदाचा !

जवळचे लोक मला नेहमी विचारतात आभ्या, इतकं सगळं करून तू काय कमावलंस...? 


मी खूप काही कमावलंय...


आदरणीय सिंधुताई सपकाळ उर्फ माई यांनी मला मुलगा म्हणून मला स्वीकारलं,हे पुत्रत्व मी कमावलं ! आदरणीय राणीताई बंग यांचा हात डोक्यावर मायेने पडला,तो मायेचा हात मी कमावला ...! आदरणीय डॉक्टर प्रकाश आमटे यांनी हूरूप देऊन सामर्थ्य दिले,हात धरून शक्ती दिली, ती शक्ती मी कमावली...! 


शास्त्रज्ञ आदरणीय रघुनाथ माशेलकर यांनी पोटाशी धरुन उच्चारलेले I am proud of you my child हे शब्द, या शब्दांतुन child असणं मी कमावलं ! 


सुपर कॉम्प्युटर चे जनक श्री विजय भटकर म्हणाले होते, 'मी कॉम्प्युटर बनवला,पण तू माणूस घडवतो आहेस... ' मी हा "विजय" कमावला...!


विश्वास नांगरे पाटील सर म्हणाले होते,भारीच करतोय तु राव कायतरी,आयुष्यात कधी अडचण आली तर मला फोन कर... हा घे माझा पर्सनल नंबर... हा "विश्वास" मी कमावला... !


तुमच्यासारखे जवळचे लोक मी कमावले... ! 


जन्माला येताना माकड म्हणूनच जन्माला आलो... परंतु भीक मागणाऱ्या लोकांमध्ये राहून मी हळूहळू माणूस बनत गेलो... माणुस म्हणुन चेहरा मी कमावला... ! 


ते खरं रे आभ्या परंतु या बदल्यात तु गमावलंस किती.? 

अरे हो, खरंच मी खूप काही गमावलं सुद्धा आहे... 

ह्या कामानं मी... मी पणा गमावला ! आपण कुणीतरी आहोत याचा अहंकार मी गमावला ! केवळ स्वतःपुरतं जगायचं हा स्वार्थ मी याच कामा मध्ये गमावला ! 

स्वतःच्या चेहर्‍यावर लावलेला खोटा खोटा मुखवटा मी गमावला सर आणि साहेब यांची खोटी प्रतिष्ठा गमावली. !पोरा - लेकरा-  बाळा या उबदार शब्दात मी  विसावलोय आता...मला खुर्चीपेक्षा ... उकीरडा आवडायला लागलाय आता ! मला उष्टं... खरकटं... शिळं ... आणि नासकं जेवण आवडतं हल्ली आणि आवडत राहील, तोपर्यंत .... जोपर्यंत माज्या भिकारी आईबापाला सन्मान मिळत नाही तोपर्यंत ! माझा भिक्षेकरी जोपर्यत कष्टकरी होत नाही तो पर्यंत तो गांवकरी होणार नाही... ! 


माझ्या आईबापाला जेव्हा मी भिक्षेकरी म्हणुन स्वतंत्र करेन तोच माझा स्वातंत्र्य दिन असेल..!


मी तर सारा लेखाजोखा मांडलाय  थोडक्यात...

आता अजुन कमवायचं राहिलं काय... ? 

आणि गमवायचं राहिलं काय ?

माय बापहो...तुम्हीच निवाडा करा... !


जयहिंद !!! 


१५ आॕगस्ट २०२०


डाॕ.अभिजीत सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स

भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर