अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.जनरल इलेक्ट्रिक कंपनीला चार्ल्स स्टीनमेट्जला विभाग प्रमुखाच्या पदावरून काढायचे नाजूक काम करायचे होते.स्टीनमेट्ज वीजेच्या कामात तरबेज होता,पण कॅलक्युलेटिंग विभागाच्या प्रमुखाच्या रुपात अपयशी ठरला होता.पण कंपनीला त्याला नाराजही करायचे नव्हते.तो खूप कामाचा माणूस होता आणि संवेदनशीलही म्हणून त्यांनी त्याला एक नवीन पद दिले.त्यांनी त्याला जनरल इलेक्ट्रिक कंपनीचा कंसल्टिंग इंजिनियर बनवले. त्याचे काम तेच होते जे तो आता करत होता, तरी त्याचे पद बदलले होते आणि यानंतर त्याच्या जागी दुसऱ्या माणसाला विभागप्रमुख बनवलं गेलं.स्टीनमेट्ज खुश होता.जी. ई. कंपनीचे अधिकारीही खुश होते.त्यांनी आपल्या संवेदनशील अधिकाऱ्याला नाराज केल्यावाचून विभाग प्रमुखाच्या पदावरून हटवून दिलं होतं आणि त्याचा आत्मसन्मान राखू दिला होता.मित्र जोडा,डेल कार्नेगी,अनु-कृपा कुलकर्णी,मंजुल पब्लिशिंग हाऊस लोकांना त्यांचा आत्मसन्मान राखू द्या! हे कितीतरी महत्त्वपूर्ण आहे!आणि आमच्यापैकी किती कमी लोक याबाबत विचार करून ते लक्षात ठेवतात?आम्ही दुसऱ्यांच्या भावनांना आपल्या पायतळी तुडवत जातो,स्वतःची मनमानी करतो,लोकांच्या चुका काढतो,धमक्या देतो,दुसऱ्यांसमोर आपल्या मुलांवर किंवा कर्मचाऱ्यावर टीका करतो आणि कधी हा विचारच करत नाही की आम्ही त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचवत आहोत.
जर आपण विचार केला,तर समोरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन समजू शकतो आणि शांततेने समस्या सुटू शकते.
जेव्हा कधी आम्ही एखाद्या कर्मचाऱ्याला रागावत असू किंवा नोकरीतून काढून टाकण्याचे अप्रिय काम करत असू,तेव्हा आम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे."कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढून टाकण्यात कोणाला मजा येत नाही.
नोकरीतून काढून टाकलेल्या कर्मचाऱ्याला तर यात फारच कमी मजा येते." (मी इथे एका पब्लिक अकाउंटंट मार्शल रा.ग्रॅजरच्या पत्राचा अंश देतोय.) "आमचा व्यवसाय बहुतांश हंगामी आहे.म्हणून जेव्हा आयकराची गर्दी ओसरून जाते, तेव्हा आम्हाला अनेक लोकांना कामावरून काढावं लागतं.
"आमच्या व्यवसायात अशी म्हण आहे,की कुणालाच कुऱ्हाड चालवण्यात आनंद होत नाही. परिणामतःअशी परंपरा विकसित झाली आहे की या कामाला जितक्या लवकर उरकता येईल तेवढं लवकर उरकायचं आणि साधारणतःअशा तऱ्हेनं करायचं. "बसा,मिस्टर स्मिथ.
हंगाम संपला आहे आणि आता आमच्यापाशी तुम्हाला देण्यासारखं काही काम नाही.उघडच आहे की तुम्हाला पण हे ज्ञातच होतं की तुम्हाला या व्यस्त हंगामासाठी कामावर ठेवलं गेलं होतं.या लोकांवर याचा प्रभाव निराशेचा व्हायचा आणि त्यांची मानहानी केली गेली असं त्यांना वाटायचं.यापैकी बहुतेक लोक जन्मभर अकाउंटिंग क्षेत्राशी संलग्न असतात आणि ते अशा कंपनीविषयी खास आस्था बाळगत नाहीत,जी त्यांना इतक्या सामान्य प्रकारे कामावरून काढून टाकते.मी इतक्यातच असा निर्णय घेतलाय की आमच्या हंगामी कर्मचाऱ्यांना कामावरून काढताना अधिक कूटनीती आणि बुद्धीचा बापर करायला हवा.म्हणून मी हिवाळ्याच्या दरम्यान प्रत्येक माणसाकडून केल्या गेलेल्या कामाचा कसून आढावा घेऊन त्यावर चिंतन करीत असे आणि मी त्यांच्याशी अशा त-हेने बोलत असे.
"मिस्टर स्मिथ,तुमचं काम खरोखर चांगलं आहे (जर ते खरंच चांगलं असेल तर) जेव्हा आम्ही तुम्हाला नेवार्कला पाठवलं होतं तेव्हा तुमचं काम कठीण होतं.तुम्ही तिथे खूपच चांगल्या तऱ्हेने काम करून आपले कौशल्य दाखवून दिलंत. आम्हाला तुमचा अभिमान वाटतो.
तुमच्यात क्षमता आणि योग्यता आहे.तुम्ही कुठेही काम केलंत तरी तुम्ही खूप पुढे जाल.ही कंपनी तुमच्यावर विश्वास दाखवते आणि तुम्हाला सोडूही इच्छित नाही आणि तुम्ही हे विसरू नये असे आम्हास वाटते.
परिणामी,लोक नोकरी सुटल्यावरसुध्दा चांगला अनुभव घेऊन जात.त्यांची मानहानी झाल्यासारखं त्यांना वाटत नसे. त्यांना जाणीव असे की जर आमच्याकडे त्यांच्या योग्यतेचं काम असतं तर आम्ही निश्चितपणे त्यांना काढलं नसतं आणि आम्हाला पुन्हा त्यांची गरज भासली तर ते आमच्याकडे प्रेमाने येतात.आमच्या वर्गात एका सत्राच्या दरम्यान दोन सदस्य चर्चा करत होते.
चर्चेचा विषय होता,चूक काढण्याचा नकारात्मक प्रभाव आणि समोरच्याचा आत्मसन्मान राखल्यामुळे होणारा सकारात्मक प्रभाव.हॅरिसबर्ग,पेनासिल्वानियाच्या फ्रेड क्लार्कने आम्हाला त्याच्या कंपनीतली एक घटना ऐकवली.
"आमच्या कंपनीच्या एका प्रॉडक्शन मीटिंगमध्ये व्हाईस प्रेसिडेंट उत्पादनाच्या प्रक्रियेबद्दल एका सुपरवायझरला सरळ सरळ प्रश्न विचारत होते. त्यांचा आवाज आक्रमक होता आणि त्यांना सुपरवायझरची चूक झाली आहे हे सांगण्याचा स्पष्ट हेतू होता.तो आपल्या सहकर्मीसमोर बोलणी खाण्यापासून वाचू बघत होता,म्हणून तो सरळ उत्तरं देत नव्हता.यामुळे व्हाईस प्रसिडेंटला राग आला आणि ज्यांनी त्याला खूप रागावलं आणि त्याच्यावर खोटं बोलण्याचा आरोपही लावला.या बोलाचालीत पूर्वीचे कामाचे संबंध काही क्षणातच संपून गेले.सुपरवायजर खूपच चांगला कर्मचारी होता आणि खूप कष्टाळूही होता,पण त्या घटनेनंतर तो आमच्या कंपनीच्या काही कामाचा राहिला नाही.काही महिन्यांनी तो आमच्या कंपनीला सोडून प्रतिस्पर्धी कंपनीत काम करू लागला, जिथे तो उत्तम काम करतो आहे."आमच्या वर्गातली अजून एक सदस्या ॲना मॅजोनने तिच्या कंपनीत झालेल्या अशाच एका घटनेबद्दल सांगितलं;पण पध्दती आणि परिणाम किती वेगळे होते! मिस मॅजोन एका फूड पॅक करणाऱ्या कंपनीत मार्केटिंग स्पेशालिस्ट होती.तिला असं एक मोठं काम सोपवलं गेलं होतं ज्यात तिला एका नवीन उत्पादनाचा टेस्ट मार्केटिंग रिपोर्ट सादर करायचा होता.तिने क्लासला सांगितलं,"जेव्हा टेस्टचा अहवाल आला तेव्हा माझे धाबे दणाणले.मी योजना बनवण्यात एक मोठी चूक केली होती, ज्यामुळे मला पूर्ण चाचणी पुन्हा करावी लागली असती.एवढंच नाही,तर माझ्यापाशी मीटिंगच्या आधी ही गोष्ट बॉसला सांगण्यासाठी अवधी नव्हता.कारण ज्या मीटिंगमध्ये मला अहवाल प्रस्तुत करायचा होता,ती लगेचच सुरू होणार होती.जेव्हा मला अहवाल प्रस्तुत करण्यास सांगितलं गेलं तेव्हा मी भितीने थरथर कापत होते.मी हा निश्चय केला होता की मी अश्रू ढाळणार नाही आणि लोकांना असं म्हणायची संधी देणार नाही,की स्त्रिया जास्त भावुक असल्यामुळे मॅनेजमेंटचं काम चांगल्या त-हेनं करू शकत नाहीत.मी माझा अहवाल सारांश रूपात प्रस्तुत केला आणि म्हटलं की माझी एक चूक झाली ज्यामुळे मला पुढच्या मीटिंगच्या आधी ही टेस्ट पुन्हा एकवार करावी लागेल.मी बसले आणि मला अपेक्षा होती की यावर माझे बॉस खूप रागावतील."
परंतु त्यांनी उलट मला माझ्या कामासाठी धन्यवाद दिले.ते म्हणाले,की नवीन प्रकल्पात चूक होणं सर्वसाधारण गोष्ट आहे.ते असंही म्हणाले,की त्यांना पूर्ण खात्री आहे की मी जेव्हा पुन्हा ती चाचणी करेन तेव्हा मी सफल आणि योग्य ठरेन.कंपनीला उपयोगी ठरेल.त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमोर मला आश्वस्त केलं की त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते जाणतात की मी पूर्ण क्षमतेने माझं काम केलं आहे.तेसुद्धा म्हणाले की,माझ्यात क्षमता नव्हती हे कारण नसून मला कमी अनुभव होता हे खरं कारण होतं."मी मीटिंगहून परतताना आकाशात उडत होते.मी निश्चय केला की इतक्या चांगल्या बॉसवर मी कधीही खाली पाहण्याचा प्रसंग आणणार नाही." आम्ही बरोबर असलो आणि समोरचा चूक असला तरी त्याचा अहंकार
दुखावण्याचा आम्हाला काय हक्क आहे?आम्ही त्याला आपला आत्मसन्मान राखण्याची संधी का देत नाही? फ्रेंच एव्हिएशन पायोनियर आणि लेखक रूपात प्रस्तुत केला आणि म्हटलं की माझी एक चूक झाली ज्यामुळे मला पुढच्या मीटिंगच्या आधी ही टेस्ट पुन्हा एकवार करावी लागेल. मी बसले आणि मला अपेक्षा होती की यावर माझे बॉस खूप रागावतील."
"परंतु त्यांनी उलट मला माझ्या कामासाठी धन्यवाद दिले.ते म्हणाले, की नवीन प्रकल्पात चूक होणं सर्वसाधारण गोष्ट आहे.ते असंही म्हणाले, की त्यांना पूर्ण खात्री आहे की मी जेव्हा पुन्हा ती चाचणी करेन तेव्हा मी सफल आणि योग्य ठरेन. कंपनीला उपयोगी ठरेल. त्यांनी आपल्या सहकाऱ्यासमोर मला आश्वस्त केलं की त्यांना माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि ते जाणतात की मी पूर्ण क्षमतेने माझं काम केलं आहे. तेसुद्धा म्हणाले की, माझ्यात क्षमता नव्हती हे कारण नसून मला कमी अनुभव होता हे खरं कारण होतं.
"मी मीटिंगहून परतताना आकाशात उडत होते.मी निश्चय केला की इतक्या चांगल्या बॉसवर मी कधीही खाली पाहण्याचा प्रसंग आणणार नाही." आम्ही बरोबर असलो आणि समोरचा चूक असला तरी त्याचा अहंकार दुखावण्याचा आम्हाला काय हक्क आहे? आम्ही त्याला आपला आत्मसन्मान राखण्याची संधी का देत नाही? फ्रेंच एव्हिएशन पायोनियर आणि लेखक ॲटोनिया द सेंट एग्जपरीने लिहिलं होतं,
"मला असं काही बोलायचा अधिकार नाहीए, ज्यामुळे एखाद्याच्या नजरेतून तो उतरून जाईल. या गोष्टीमुळे काही फरक पडत नाही की मी त्याच्याबद्दल काय विचार करतोय,परंतु ह्या गोष्टीने नक्की फरक पडतो की तो स्वतःबाबत काय विचार करतोय.
कुणाच्याही आत्मसन्मानाला ठेच पोहोचवणे हा मोठा अपराध आहे."
०८.१२.२३ या लेखमालेतील पुढील भाग..