* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एक माणुकीची शाल.. उत्तरार्ध A manuki shawl.. Late Such

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१४/१२/२३

एक माणुकीची शाल.. उत्तरार्ध A manuki shawl.. Late Such

आज बाबांना सोडायला जायचं.आमची पहाटेपासूनच लगीन घाई सुरू झाली...प्रवासात जेवण लागेल म्हणून मनीषाने स्वयंपाक केला.ब्रश घेतला का ?  साबण ? टॉवेल कुठे ठेवला आहेस ?  आणि कपडे ?आम्ही एकमेकांना विचारून सामानाची पुन्हा पुन्हा खात्री करत होतो. नुसत्ती गडबड ... काय न्हवंच ! गेल्यावर बाबांना पुन्हा एकदा अंघोळ घातली आणि एकेक पांढरा शुभ्र कपडा अंगावर चढवला...बाबांचं रुपडं पालटलं.... हा नव्या रुपातला फोटो काढून बाबांना दाखवला त्यांचा स्वतःचाच विश्वास बसेना फोटो पाहून. 


त्यांना गहिवरुन आलं. मनीषाच्या डोळ्यात पाणी दिसलं.मी तिला खुणेनेच विचारलं,'काय झालं ?' 


मनीषा चे वडील म्हणजे तिचं सर्वस्व ! 

ती त्यांना तात्या म्हणते. परंतु गेल्या कित्येक महिन्यांपासून ती माहेरी जाऊ शकली नाही.


मी पुन्हा तिला खुणेनंच  विचारलं,'काय झालं ?' 


हुंदका आवरत ती एकच शब्द बोलली "तात्या"...! प्रत्येक मुलगी आपल्या वडिलांना हाक मारताना डॅडी,पप्पा,

बाबा,अण्णा,तात्या, नाना,दादा,भाऊ यापैकी अशाच एका नावाने हाक मारते ! नीट बघितलं तर हे फक्त दोन अडीच शब्द... ! पण हेच अडीच शब्द म्हणजे प्रत्येक मुलीच सर्वस्व... ! या दोन अडीच शब्दात मुलीचं आख्खं जग सामावलेलं असतं. 


या दोन-अडीच शब्दांना मायेच्या पाकात मुरवलं, खस्ता खायच्या तव्यावर जरा भाजलं,मुलगी सासरी जाताना रडला होता,त्यातल्या एका थेंबाचं मीठ टाकलं आणि घासलेल्या टाचांतुन निर्माण झालेल्या आगीत थोडं शेकलं,की तयार होतो त्या पदार्थाचं नाव म्हणजे "बाप" ! 


आमच्या दोघांच्याही आयुष्यात आजच्या दिवशी ही व्यक्ती बाप म्हणून आली ! 


निघता निघता बाबांनी मनीषाला जवळ बोलावलं,तिचे हात घेऊन स्वतःच्या कपाळाला लावले... आणि काही चिल्लर तिच्या हातात कोंबली.आणि भरल्या गळ्याने म्हणाले, 'सोहमला काहीतरी खाऊ घेऊन जा घरी बेटा, माझ्याकडे जेवढे होते ते सर्वच देतोय... !


प्रत्येक वेळेस बाबा सर्वांना सर्वच देत आले होते, आम्हालाही यावेळी सर्वच दिलं... ! ही चिल्लर कपाळाला लावुन माझ्या बॕगेत मी जपुन ठेवली आहे,मरेपर्यंत ठेवणार... ! जगातलं सगळं धन माझ्या या छोट्याशा बॕगेत सामावलं होतं...! 


आज पयल्यांदाच आपुन बी लय श्रीमंत हाय याची जाणिव झाली ! 


जायची वेळ झाली आणि इतका वेळ थांबवून ठेवलेल्या हुंदक्यांचे बांध आता मात्र  फुटले ... !


काहीवेळा बांध फुटणंच चांगलं... ! 

योग्य वेळी बांधुन ठेवतो तो बांध !


बाबांना आम्ही ताईंकडे रवाना केलं... गाडी दिसेनाशी होईपर्यंत बाबांचा हात खिडकी बाहेरून हलत होता... !


ते नजरेआड झाले... भरलेल्या डोळ्यांना पुढचं काहीच दिसेना...आमच्यासोबत एक सहृद आले होते आम्हाला आशीर्वाद द्यायला.ते निघाले,म्हणाले, डाॕक्टर येतो आता, घरी जावुन पुजा अर्चा आटोपुन आॕफिसला पळायचंय. 


त्यांना निरोप देवुन आम्ही चालु लागलो... चालता चालता,आज सकाळपासून आपण काय काय केलं याचा विचार करायला लागलो... ! बाबांना स्नान घातले म्हणजे आपल्याला आता कुठे जाऊन अभिषेक करायची गरज नाही... ! साबण लावून बाबांच्या अंगावरची घाण साफ केली, बाबा सुगंधी झाले आणि जाता जाता आमचेही हात सुगंधी करुन गेले.... चला, म्हणजे अगरबत्ती लावायची आता गरजच नाही ... ! 


बाबांना दुपारचा जेवणाचा डब्बा दिला आहे, काही फळं दिली आहेत.... अरे आपण तर नैवेद्य सुद्धा वाहिला की.... ! बाबांनी त्यांची चिल्लर आमच्या झोळीत टाकली होती...  अरे वा... आपल्याला प्रसाद सुद्धा मिळाला की ! 


जातांना आपण बाबांना वाकुन नमस्कार केला... त्यांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवुन जवळ घेतलं होतं... अगं बघ मनिषा... म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष आशिर्वाद सुद्धा मिळाला की.... ! अरेच्च्या,आपल्याही नकळत,आपली पुजाअर्चा अगोदरच आटोपली आहे,चल पळु आता पुढल्या कामाला... !


मी टाळी घेण्यासाठी माझा हात पुढे केला, हातावर टाळी देत मनीषा ने माझा हात पकडला... सुगंधी झालेले आमचे हात एकमेकांच्या हातात घेवुन आम्ही निघालो पुढची पुजा गाठण्यासाठी .... ! 


८ सप्टेंबर २०२०


ईद मुबारक ... !


मै आपके लिए इबादत करुँ... या आप मेरे लिए पुजा करें... 


दोनो एक बराबर है... 


मै आपको भाई कहुँ... आप मुझे भाऊ कहो... 


दोनो एक बराबर है... 


मै आपको इन्सान कहुँ आप मुझे माणुस कहो 


दोनो एक बराबर है... 


आप मेरेलिए मस्जिद में दिया जलाये हम मंदीर में आपके लिए घुटने टेंके 


दोनो एक बराबर है...


मै खजुर खाऊँ... आप लड्डु खाओ...


दोनो एक बराबर है... 


मै आपको राम पुकारुँ.., आप मुझे रहीम बुलाओ


दोनो एक बराबर है... 



मनत्रयोदशी ...!!!


आज धन्वंतरी प्रकट दिन... 


धन्वंतरी म्हणजे जगातले पहिले डॉक्टर...


सर्व वैद्यांचे देव... !!!


आज शुक्रवार,आज धनत्रयोदशी सुद्धा आहे...! 


आणि आज शुक्रवार म्हणजे आमचा रक्तदान करण्याचाही  ठरलेला दिवस आहे ... ! 


सगळीकडे दिवाळीची धामधूम सुरू आहे, आपापल्या परीने प्रत्येक जण दिवाळी साजरी करीत आहे... ! दर आठवड्यातील शुक्रवार प्रमाणे आजही आमच्या भिक्षेकऱ्यांनी रक्तदान करून दिवाळी साजरी केली.एक वैद्य म्हणून धन्वंतरी ची पूजा आम्ही अशा प्रकारे साजरी केली.... !


आज म्हणे धनाचं पूजन करतात... 


आम्ही ज्यांच्यासाठी काम  करतो त्यांच्याकडे धन नाही पण सात्विक मन आहे... ! 


"धनाचं पुजणं" म्हणजे जर *धनत्रयोदशी* असेल....तर, "मनाला जपणं" ही *मनत्रयोदशी* असेल का ? "पुजणं" आणि "जपणं" ... दोन्ही शब्दांत, शब्दांची फक्त अदलाबदल  आहे... !


पण, अर्थ मात्र जमीन आसमानाइतके भिन्न... ! 


'पुजण्यामध्ये' आशिर्वादाची अपेक्षा असते...काहीतरी मागणं असतं... ! 


'जपण्यामध्ये' मागणी काहीच नसते.... असतं फक्त मनापासुन देणं... !!


मनापासुन कुणाला जपण्याची सुरुवात होते... त्याचं आख्खं आयुष्यंच मग "आशिर्वाद" होवुन जातं.... ! मागण्यासारखं काही उरतच नाही मग... !!! मागणंच संपलं तर पुजणं राहत नाही... तिथुन सुरु होतं मग जपणं... ! 


आपणांस दिवाळीच्या शुभेच्छा !!!


डाॕ.मनिषा व डाॕ.अभिजीत सोनवणे

डाॕक्टर फाॕर बेगर्स' भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर