* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१४/८/२४

मौसमी पावसाच्या मागावर/On the trail of monsoon rains

अलेक्झांडर फ्रेटर..!!


एका दुर्मिळ व्याधीने नैराश्याच्या गर्तेत गेलेल्या अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश पत्रकार लेखकाला भारतीय मॉन्सूनने आशेचा किरण दाखवला. आपलं दुःख विसरून तो या मॉन्सूनच्या यात्रेवर निघाला.

त्यांचा हा प्रवास मॉन्सूनचा अभ्यास म्हणून तर रोचक आहेच,पण आपल्याला आपल्याच देशाची नव्याने ओळख करून देणाराही आहे.


भारताच्या अर्थकारणात नैऋत्य मौसमी पाऊस मोठी महत्त्वाची भूमिका बजावतो.या पावसाच्या आगमनाचे अंदाज,त्यानुसारची त्याची वाटचाल याकडे सर्वांचंच लक्ष लागून राहिलेलं असतं. मौसमी पावसाची नियमितता- अनियमितता हा हवामानतज्ज्ञांसाठी मोठा अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय असतो.अलेक्झांडर फ्रेटर या ब्रिटिश लेखक आणि पत्रकारालाही या मौसमी पावसाने वेड लावलं.खरं तर अलेक्झांडर अगदी योगायोगानेच जगातलं सर्वाधिक पावसाचं गाव असणाऱ्या ईशान्य भारतातील चेरापुंजीला येऊन दाखल झाला होता,पण त्यानंतर त्याने इथल्या मॉन्सूनचा चक्क पाठलाग करण्याचा अचाट निर्णय घेतला. मौसमी पाऊस केरळमध्ये अवतरतो त्या सुमारास हा देखील तिथे पोहोचला आणि तिथून चेरापुंजीपर्यंत त्याने पावसाच्या प्रवासाचा मागोवा घेतला.त्या अनुभवांतून साकारलं एक विलक्षण पुस्तक- 'चेझिंग द मॉन्सून'.


अलेक्झांडर फ्रेटर आणि वादळी पाऊस यांची जोडी तशी त्याच्या जन्मापासूनचीच !त्याचे वडील स्कॉटिश मिशनरी डॉक्टर होते. अलेक्झांडरचा जन्म झाला तेव्हा ते वानुताऊ

या दक्षिण पॅसिफिक बेटावर स्थानिकांना वैद्यकीय मदत पुरवण्याचं काम करत होते.त्यादिवशी प्रचंड पाऊस पडत होता आणि वादळवारं सुटलं होतं.त्यावेळीच या बाळाने पहिला टाहो फोडला. घराला पत्र्याचं छप्पर होतं.जन्माला आल्याबरोबर ज्या बाळाने धो धो पावसाचा छपरावर होणाऱ्या आघातांचा आवाज ऐकला,त्याच्याच हातून मौसमी पावसाच्या प्रवासाचा मागोवा घेतला जाऊ

शकतो !त्यावेळी अलेक्झांडरचे वडील पॅसिफिक महासागरातील त्या द्वीपसमूहाच्या एक हजार मैल त्रिज्येच्या परिसरातले एकमेव डॉक्टर होते.बायकोचं बाळंतपण त्यांनीच केलं होतं,दुसरं कोण होतं तिथे ? तिथे होणारा पाऊस,हवेतील आर्द्रता,दिवसाचं आणि रात्रीचं तापमान यांची दैनंदिन नोंदही तेच ठेवत असत. त्यामुळे अलेक्झांडरला सोसायट्याचा वारा, सागरी वादळ वगैरे गोष्टींचं बाळकडूच मिळालं होतं.(पुढे काही वर्षांनी वडिलांनी आपल्या नोंदवह्या बघून 'तू जन्माला आलास त्यादिवशी ७ तास १३ मिनिटांमध्ये २.१ इंच पाऊस पडल्याचं' आपल्या मुलाला ऐकवलं होतं.)


वानुताऊमधल्या त्यांच्या घरात एक पेंटिंग होतं. त्याच्या खाली 'चेरापुंजी, शआसाम,द वेटेस्ट प्लेस ऑन अर्थ' असं लिहिलेलं होतं. हे पेंटिंग फ्रेटरच्या वडिलांना त्यांच्या ग्लासगोमधल्या वॅपशॉट नावाच्या शाळासोबत्याने भेट दिलेलं होतं.वॅपशॉट चेरापुंजीमध्ये स्कॉटिश मिशनमध्ये कार्यरत होता.वॅपशॉट आणि अलेक्झांडरच्या वडिलांचा पत्रव्यवहार म्हणजे हवामानविषयक वार्ताची देवाणघेवाणच असे.वॅपशॉटचं पत्र आलं की बाबा फ्रेटर अंतर्मुख बनत.चेरापुंजीला एका दिवसात पडणारा पस्तीस इंच (एक हजार पन्नास मि.मी.) पाऊस म्हणजे त्यांच्या कल्पनेबाहेरची घटना होती.अलेक्झांडरचे वडील त्या वेळी 'कधीतरी चेरापुंजीला जाऊ या' असं नेहमी म्हणत.त्यांना वाटत असे,की हवामान शास्त्राच्या दृष्टीने चेरापुंजी हे 'व्हॅटिकन' समान आहे आणि तिथे भर मॉन्सूनमध्ये पाऊसमापी घेऊन उपस्थित असणं ही पवित्र तीर्थयात्रा आहे! वॅपशॉटच्या पत्रातल्या आणखी एका घटनेचा त्यांना कायम अचंबा वाटत असे.तिथे पावसामुळे जमिनीची दलदल व्हायची.त्यामुळे मृतदेह पुरणं शक्य होत नसे.मग हे मृतदेह मधाने भरलेल्या पिंपांमध्ये ठेवले जात असत.पावसाळा संपला आणि जमीन कोरडी झाली की मग त्यांचे अंत्यसंस्कार पार पडत.)


वडिलांच्या अशा चिकित्सक,जिज्ञासू छत्रछायेखाली अलेक्झांडर वाढत होता.तो पाच वर्षांचा असताना जपानने फिलिपीन्समध्ये सैन्य उतरवलं.फ्रेटर कुटुंबीय राहत होते त्या भागातल्या सर्व ब्रिटिश नागरिकांना ऑस्ट्रेलियात हलवण्यात आलं.त्यात अलेक्झांडर,त्याची आई आणि बहीण हेदेखील होतेच.अलेक्झांडरच्या वडिलांनी मात्र ऑस्ट्रेलियात जायला नकार दिला.युद्ध संपेपर्यंत ते अमेरिकी सैनिकांवर उपचार करत युद्धक्षेत्रातच वावरले.युद्ध संपलं. युद्धात जपान्यांशी लढता लढता कोहिमा इथे वॅपशॉट मारला गेल्याची बातमी फ्रेटरना मिळाली.बातमीसोबतच वॅपशॉटची अखेरच्या दिवसांतली पत्रंही त्यांच्याकडे आली.वॅपशॉटचं प्रेत ब्रिटिश उपायुक्तांच्या बंगल्याच्या आवारात पुरलेलं होतं.वॅपशॉटलाही मधाच्या बुधल्यात ठेवला होतं का,हा प्रश्न अलेक्झांडरला ती बातमी कळल्यावर पडला होता;

पण त्या शंकेचं निरसन करून घ्यायचं त्याने टाळलं होतं. 


अलेक्झांडरच्या वडिलांनी त्यानंतर मरेपर्यंत एकदाही चेरापुंजीचं नाव पुन्हा तोंडातून काढलं नाही.त्यांनी युद्धकाळात केलेल्या सैनिकांच्या सेवेबद्दल त्यांना 'एमबीई सिव्हील' ही पदवी आणि पदक मिळालं.ते पाचव्या वर्गाचं होतं.ते पाचव्या वर्गाचं का,दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्गाचं का नाही,हा प्रश्नही अलेक्झांडरला पडत असे; पण त्याचं उत्तरही त्याने कधी शोधण्याचा प्रयत्न केला नाही.मोठेपणी अलेक्झांडर वृत्तपत्रलेखन करू लागला.पंच,न्यूयॉर्कर यासारख्या प्रतिष्ठित नियतकालिकां

साठी त्याने लेखन केलं.आपल्या लेखनकामाचा एक भाग म्हणून त्याला चिनी तुर्कस्तानातून प्रवास करावा लागला.

सागरी सपाटीपासून सरासरी दहा हजार फुटांवर असणाऱ्या भूभागातून त्याने जीपचा चित्तथरारक प्रवास केला.तिथलं काम उरकून तो काही दिवसांसाठी लंडनला आला असता एक दिवस त्याच्या पायांमधल्या संवेदनाच नाहीशा झाल्या.बूट खूप घट्ट बांधल्यामुळे किंवा वेडंवाकडं झोपल्यामुळे असं होत असावं,असा त्याने निष्कर्ष काढला.पहिल्या दिवशी फक्त पावलं बधीर होती,दुसऱ्या दिवशी गुडघ्यापर्यंतच्या पायांमधली जाणीव नष्ट झाली, तेव्हा हे काहीतरी वेगळं आहे हे त्याला जाणवलं. तरीही तो डॉक्टरकडे जायची टाळाटाळ करत होता.कारण त्याच्या मते पाकिस्तानातून काराकोरम महामार्गावरून काशगरला जाऊन परत येतानाच्या प्रवासात विषाणूबाधा होणं अशक्य नव्हतं.शिवाय त्यात कुठे तरी 'आपल्याला काय होणार?' हा फाजील आत्मविश्वासही होताच.


मात्र,ज्या वेळी हातापायांत,पाठीत आणि छातीतही मुंग्या यायला लागल्या तेव्हा मात्र अलेक्झांडर हादरला.त्याने रुग्णालयात जायचा निर्णय घेतला.प्राथमिक वैद्यकीय तपासणीनंतर त्याला 'नॅशनल हॉस्पिटल फॉर नर्व्हस डिसीझेस'मध्ये दाखल करण्यात आलं.चेतासंस्थेचे इंग्लंडमधील एक ख्यातनाम तज्ज्ञ जॉन मॉर्गन-ह्यूज आणि त्यांच्या वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी त्याची प्राथमिक तपासणी केली. अलेक्झांडरच्या मणक्यांमधला द्रव काढून त्याचीही तपासणी करण्यात आली.इतरही (त्याच्या मते) भयावह चाचण्या करण्यात आल्या.

त्यावरून असं निदान केलं गेलं,की अलेक्झांडरला अरनॉल्ड-चिआरी नावाची एक अत्यंत दुर्मिळ आनुवंशिक व्याधी होती आणि हिंदकुश-काराकोरम

मधील जीपच्या प्रवासातील धक्क्यांनी ती आणखी त्रासदायक बनली होती.या व्याधीवर उपाय नाही असं तज्ज्ञांचं मत बनलं.अलेक्झांडरला गळापट्टा वापरण्याचा सल्ला दिला गेला.त्याने जीपचा प्रवास टाळायला हवा,

असंही वापरण्यात आले. मात्र घरी जाण्यापूर्वी चेतासंस्थेचे शल्यशास्त्रज्ञ डॉ.डेव्हिड ग्रेट त्याला तपासतीलअसंही सांगण्यात आलं.ग्रँटनी त्याचे सर्व वैद्यकीय अहवाल काळजीपूर्वक वाचले आणि शस्त्रक्रियेने अलेक्झांडर बरा होण्याची पन्नास टक्के शक्यता वर्तवली.मात्र,शस्त्रक्रियेमुळे कायमस्वरूपी सुधारणा होईलच याची खात्री देता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.अलेक्झांडरला नैराश्याने ग्रासलं.त्याचं कामातलं लक्ष उडालं.साध्या साध्या गोष्टीही पूर्ण करणं त्याला कठीण होऊ लागलं.एकदा तो नेहमीप्रमाणे तपासणीसाठी गेलेला असताना तिथे त्याला एक उत्कृष्ट इंग्रजी बोलणारी बाप्टिस्टा नावाची गोव्याची स्त्री भेटली.तिच्या नवऱ्यालाही असाच त्रास होत होता.


हे जोडपं खानदानी श्रीमंत होतं.दर पावसाळ्यात तो केरळात उपचाराला जायचा आणि मौसमी पावसाचं स्वागत करायचा.अशी व्याधी जडलेली असूनही तो निराश मात्र वाटत नव्हता. अलेक्झांडरने त्या दोघांशी गप्पा मारायला सुरुवात केली.पाहता पाहता त्यांच्या गप्पा रंगल्या.गप्पांदरम्यान त्या स्त्रीने फ्रेटरला भारतातल्या मौसमी पावसाळ्यातल्या वाऱ्यांबद्दल ऐकवलं.तिच्या पतीने त्या वाऱ्यांचा फायदा घेऊन ग्लायडिंग क्षेत्रात केलेला पराक्रम ऐकवला.त्या ओघात मुंबईचा पाऊस,

गोव्याचा पाऊस यांची माहितीही आलीच.अलेक्झांडरने भारतातल्या पावसाचा एकदा तरी अनुभव घ्यायलाच हवा,असं आवर्जून सांगितलं.'मॉन्सून हा प्रचंड सेक्सी असतो'.तो अलेक्झांडरला म्हणाला,मॉन्सूननंतर मार्चमध्ये अनेक अनौरस मुलं जन्माला येतात.पुढे त्याच्या बायकोने पुष्टी जोडली,पावसाने पुनरुज्जीवनाचा आनंद मिळतो.

बाप्टिस्टा पती-पत्नीकडून अलेक्झांडरला कळलं,की


 एक जूनला मॉन्सून केरळात दाखल होतो,नैऋत्य मौसमी वारे त्याला उत्तरेकडे ढकलत नेतात,तो हिमालयापर्यंत प्रवास करतो आणि चेरापुंजीला कळस गाठतो. दिल्लीला मॉन्सून एकोणतीस जूनला पोहोचतो,हे फ्रेटरला सांगताना 'त्याची शाश्वती देता येत नाही' हे त्याला सांगायलाही दोघं विसरले नाहीत.


हे सारं ऐकून अलेक्झांडरची उत्सुकता चाळवली गेली आणि त्याच्या डोक्यात मॉन्सूनचा पाठलाग करण्याची कल्पना चमकून गेली. त्याने तसं त्या दोघांना बोलून दाखवल्यावर त्यांनी चमकून त्याच्याकडे पाहिलं.त्यात अवघड असं काही नाही,पण त्यासाठी त्रिवेंद्रमला सुरुवात करावी लागेल.मग त्याच्याबरोबर धावायचं.ते म्हणाले. त्यांनी आपलं व्हिजिटिंग कार्ड अलेक्झांडरला दिलं आणि त्याचा निरोप घेतला.डोक्यात चमकून गेलेल्या त्या एका कल्पनेने अलेक्झांडर इतका उत्तेजित झाला,की तो तपासणीसाठी डॉक्टरांसमोर गेला तेव्हा त्याचा आनंदी चेहरा पाहून त्यांनाही आश्चर्य वाटलं.


मान कशी आहे?" त्यांनी विचारलं


"ती आहे तशीच आहे! तिची सवय होतेय."तो म्हणाला.तो हे प्रथमच कोणाकडे तरी कबूल करत होता;पण ते खरं होतं.डॉक्टरांनी त्याची तपासणी केली.मग विचारलं,तू मधला काळ काय करत होतास?फारसं काही नाही. ओढवलेल्या परिस्थितीला सामोरं कसं जायचं याचा विचार करत होतो.स्वतःची कीव करत होतो.


आणि आता ?


आता मी भारतात जायची तयारी करतोय!

तो म्हणाला.


पावसाच्या प्रदेशात जायचंय,हे मनात आल्यानंतर अलेक्झांडरच्या मेंदूतल्या काही सुप्त पेशी जागृत झाल्या.त्यांनी त्याच्या बऱ्याच निद्रीस्त स्मृतींना खडबडून जागृत केलं. बालपणीच्या चेरापुंजीच्या पावसाच्या स्मृतींनी भारतात जाऊन पावसात भिजायची त्याला ओढ लागून राहिली.


मौसमी पावसाचा पाठलाग करण्याचा निश्चय झाल्यानंतर अलेक्झांडरने प्रामुख्याने मौसमी पाऊस आणि थोड्याफार प्रमाणात भारताबद्दल जी मिळेल ती माहिती वाचायला सुरुवात केली. त्या वाचनातून त्याच्या एक लक्षात आलं,की भारतात त्या आधीची दोन-तीन वर्षं मौसमी पाऊस खूप अनियमित झाला होता.लंडनमधील वृत्तपत्रांनी त्या वर्षीही पावसाची लक्षणं ठीक नाहीत,

त्यामुळे भारतात दुष्काळ पडू शकतो, अशी शक्यता वर्तवली होती.भारताच्या काही भागांत गेल्या काही वर्षांत नेहमीपेक्षा कमी पाऊस होत होता,काही भागात तो अजिबात झालेला नव्हता,तीच परिस्थिती याही वर्षी असेल,असं या बातम्या वर्तवत होत्या.


या वाचनाच्या जोडीला अलेक्झांडरने पावसासाठी भारतात कोणते उपाय केले गेले, याचीही माहिती मिळवली.पुस्तकात अलेक्झांडर अशा ऐकीव माहितीद्वारे कळलेल्या सरकारी जलसंपदा खात्यातर्फे एका योगसाधना करणाऱ्या साधूला पाऊस पाडण्यासाठी बोलावलं जाणं,व्याघ्रचर्मावर बसून त्या साधूने दोन तास चार मिनिटं ध्यान लावणं,त्यानंतर मुसळधार पाऊस होण्याचं भाकीत वर्तवण योगायोगाने त्याचवेळी कोचीनमधे मुसळधार पाऊस होणं,मग बंगलोरमधल्या अधिकाऱ्यांनी त्याला त्याबद्दल जाब विचारल्यावर त्याचं चिडणं,वगैरे वगैर अलेक्झांडरने असंही नमूद केलं आहे,की 'तो साधू भारतीय प्रशासनाने भारतीय अवकाश कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणूनही अधिकृतरित्या नेमलेला होता. भारताच्या पहिल्या अग्निबाणाचं प्रक्षेपण अयशस्वी झालं.तेव्हा त्याची नेमणूक झाली. त्याच्या आशीर्वादाने दुसरं प्रक्षेपण यशस्वी झालं.'अलेक्झांडरने लिहिलेल्या या माहितीचं मात्र मी इथे खंडन करू इच्छितो.मी गेली कित्येक दशकं मौसमी पाऊस आणि भारतीय अवकाश संशोधनाच्या बातम्या गोळा करत आलो आहे.

आकाशवाणीतर्फे श्रीहरीकोटा इथे जाऊन भारतीय अवकाश कार्यक्रम आणि एसएलव्ही-३ चं प्रक्षेपण यासंबंधी 'नवे सीमोल्लंघन' हा कार्यक्रम तयार करण्याची संधी मला मिळाली होती.त्यावेळी 'नारळ फोडणे' हा विधी सोडला तर कुठल्याही साधू वगैरेचा उल्लेख कुणी केल्याचं मला आठवत नाही. 


त्यामुळे अलेक्झांडरचं पुस्तक प्रथम वाचल्यावर मी हा विषय माझ्या परिचितांकडे काढला. त्यावेळी 'असं काहीही झालेलं नाही.डॉ. गोवारीकरांना असली थोतांडं मान्य नव्हती.असं मला सांगण्यात आलं.असो.


आवश्यक ती माहिती मिळवून मग नाणेफेक करून एक दिवस अलेक्झांडरने भारतात जायचं ठरवलं.ही गोष्ट आहे १९८७ सालची.मुंबईत उतरल्यावर त्याने प्रथम 'इंडियन एक्स्प्रेस' हे इंग्रजी वृत्तपत्र विकत घेतलं.त्यात पहिल्याच पानावर मौसमी पावसाची बातमी होती.नैऋत्य मौसमी वारे वाहायला सुरुवात झाली होती. दक्षिण अंदमानच्या आणि त्याला लागून असलेल्या सागरावरून हे वारे वाहत असले तरी ते अगदीच क्षीण होते.नेहमी मॉन्सून अंदमान द्वीपसमूहावर वीस मेच्या सुमारास जोर धरतो. या वर्षी त्याला एक आठवडा उशीर होईल,असा अंदाज वर्तवलेला होता.एअर इंडियाच्या विमानाने अलेक्झांडर त्रिवेंद्रमला पोहोचला तेव्हा मे महिन्याचा अखेरचा आठवडा होता.

अशा त-हेने केरळमध्ये मौसमी पाऊस यायच्या आधी तेरा दिवस तो केरळमध्ये येऊन दाखल झाला होता.त्यावेळी सात राज्यांत दुष्काळी परिस्थिती होती.बऱ्याच ठिकाणी दोन दिवसांतून एकदा पाणी येत होतं.


दरवर्षी भारतातील अनेक प्रमुख वृत्तपत्रांचे प्रतिनिधी त्रिवेंद्रममध्ये मौसमी पावसाच्या वार्तांकनासाठी गोळा होतात.त्यामुळे त्रिवेंद्रमची वेधशाळा जगभर प्रसिद्ध आहे.ही वेधशाळा इ.स.१८४० मध्ये त्रावणकोरच्या महाराजांनी बांधली. त्यांना पाश्चात्य विज्ञान प्रगतीबद्दल खूप कुतूहल होतं.त्रिवेंद्रममधल्या एका टेकडीच्या माथ्यावर ही वेधशाळा उभी करण्यात आली आहे.ती बांधली गेली तेव्हा नागरी वस्तीपासून दूर होती.ती उंच ठिकाणी बांधल्यामुळे पूर्वीच्या काळी जेव्हा रडार यंत्रणा किंवा उपग्रहाने घेतलेल्या प्रतिमा उपलब्ध नसत. त्यावेळी व्हरांड्यात उभं राहून दूरदर्शीच्या साहाय्याने वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना मौसमी पावसाच्या ढगांचं निरीक्षण करता येत असे. आजही भारतात मौसमी पावसाचं आगमन झाल्याची घोषणा सर्वप्रथम इथूनच केली जाते.१८५२ ते १८६९ या कालावधीत जॉन ॲलन ब्राऊन हे खगोलशास्त्रज्ञ या वेधशाळेचे प्रमुख होते.त्यांच्या प्रयत्नांनी त्रिवेंद्रमची वेधशाळा वायव्य आशियातील सर्वांत महत्त्वाची वेधशाळा बनली,असं अलेक्झांडर नमूद करतो.हटके भटके,निरंजन घाटे,

समकालीन प्रकाशन(अलेक्झांडर जरी या वेधशाळेला वायव्य आशियातील सर्वांत महत्त्वाची वेधशाळा म्हणत असला तरी एकेकाळी ती आशिया खंडातील सर्वांत प्रगत वेधशाळा होती.योगायोगाने

ती पृथ्वीच्या चुंबकीय विषुववृत्तावर प्रस्थापित झाली.खरंतर ती दक्षिण आशियातील वेधशाळा आहे.)जॉन ॲलन ब्राऊन यांनी या ठिकाणी कार्यरत असताना दरवर्षी पाच ते सात जून दरम्यान मृग नक्षत्रावर (याला अलेक्झांडर मॉन्सून स्टार असं म्हणतो) या ठिकाणी पाऊस येतो, याची नोंद केली.अलेक्झांडर त्रिवेंद्रमच्या या वेधशाळेत ज्युलियस जोसेफ यांना भेटला.त्यावेळी जोसेफ हे दिल्लीतील विविध मंत्रालयांना आणि जगभरच्या वृत्तपत्रप्रतिनिधींना तसंच बीबीसी

सारख्या इतर माध्यमांना मौसमी पावसाच्या प्रगतीची माहिती देत होते.पाऊस त्यावेळी श्रीलंकेच्या उत्तर भागात होता.तो केव्हाही केरळात प्रवेश करेल अशी परिस्थिती होती.जोसेफना सतत दूरध्वनीवरून होणाऱ्या चौकशांना तोंड द्यावं लागत होतं.त्यातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ते अलेक्झांडरशी बोलत होते. 'हे क्षेत्र फारच नाजूक पण खदखदतं क्षेत्र आहे. मी शास्त्रज्ञ म्हणून अलिप्तपणे बोलायचा, वागायचा प्रयत्न करतो;पण लोकांच्या भावना याबाबतीत गुंतलेल्या असतात.'हे त्यांचं म्हणणं खरं होतं.

कोट्यवधी भारतीयांचं जगणं,देशाची अर्थव्यवस्था यांचा मौसमी पावसाशी घनिष्ट संबंध असतो.एकादा शब्द चुकीचा वापरला गेला तर भारतभर खळबळ माजण्याची शक्यता असते.

१२/८/२४

प्रेमानं बोला / Speak with love…!

थिओडर रूझवेल्टच्या सर्व पाहुण्यांना त्याच्या विविध क्षेत्रांतील नेत्रदीपक ज्ञानाचे नवल वाटत असे.त्याचा पाहुणा काऊबॉय असो किंवा न्यूयॉर्कमधील राजकारणी धुरंधर असो;पण रूझवेल्टला कोणाशी काय आणि कसे बोलावे हे अचूकतेने उमजत असे आणि रूझवेल्ट यासाठी काही विशेष करत असे का?नाही,पण तो आवर्जून आदल्या रात्री त्या पाहुण्याची कुंडली मांडून बसत असे म्हणजे त्याचे कामाचे क्षेत्र, त्याची पार्श्वभूमी,

त्याचे शिक्षण,त्याच्या आवडीनिवडी वगैरेची माहिती घेत असे.एखाद्याला प्रिय असणाऱ्या गोष्टींविषयी बोलण्यातूनच त्याच्या अंतरंगाशी संवाद साधता येतो,हे इतर सगळ्या नेत्यांप्रमाणे रूझवेल्टलाही माहिती होते.


विल्यम फेल्प्सने ह्युमन नेचर या निबंधात लिहिले आहे की,आठ वर्षांचा असताना माझ्या शाळेला सुट्टी लागली म्हणून मी स्ट्रॅटफोर्डमध्ये राहणाऱ्या माझ्या आत्याकडे गेलो होतो,तेव्हा तेथे येणाऱ्या एका मध्यमवयीन गृहस्थांना चेष्टा-मस्करी करण्याची खूप आवड होती,असे माझ्या लक्षात आले.बाकी सगळ्यांशी हास्यविनोद करून झाले की ते त्यांचा मोर्चा माझ्याकडे वळवायचे.त्यावेळी मला बोटींविषयी खूप आकर्षण वाटायचे आणि ते सद्‌गृहस्थसुद्धा फक्त बोटींविषयीच बोलायचे.जणू काही त्यांनाही बोटीमध्येच रस होता.ते गेल्यावर एकदा मी माझ्या आत्याजवळ त्यांचे खूप कौतुक केले.मी म्हणालो,किती छान माणूस आहे! तेव्हा ती म्हणाली की,ते न्यूयॉर्कमधील एक मोठे वकील आहेत आणि त्यांचा बोटींशी काहीही संबंध नाही.बोटींमध्ये त्यांना रससुद्धा नाही.मी आश्चर्याने विचारले,मग इतका वेळ ते माझ्याशी बोटींबद्दल का बोलले ? तेव्हा मला कळले की मला खूष करण्यासाठी ते माझ्या आवडीच्या विषयावर बोलले.त्यांनी स्वतःला माझ्याशी सहमत करून घेतले.विल्यम फेल्प्स पुढे लिहितात : माझ्या आत्याने त्यावेळी केलेले तिचे मतप्रदर्शन मी आयुष्यात कायम लक्षात ठेवले.हे प्रकरण लिहायला सुरुवात करताना मला खलिफ नावाच्या व्यक्तीचे एक पत्र मिळाले होते.

मुलांच्या स्काउटमध्ये विशेष कार्यरत असणाऱ्या खलिफने लिहिले होते एके दिवशी, मला मदतीची खूप गरज भासत होती,कारण स्काउटची एक मोठी रॅलीच युरोपमध्ये आली होती आणि अमेरिकेतील एवढ्या मोठ्या कार्पोरेशनच्या प्रेसिडेंटकडून यातील एका मुलाचा तरी युरोप ट्रीपचा खर्च भागवला जावा, असे मला वाटत होते.सुदैवाने मी त्या प्रेसिडेंटकडे जातानाच नेमके ऐकले की,त्याने आत्तापर्यंत लाखो डॉलर्सचे चेक्स मदतीसाठी दिले आहेत आणि जो चेक रद्द झाला तो फ्रेम करून लावला आहे.त्याच्या ऑफिसमध्ये गेल्यावर मी तो चेक पाहण्याची इच्छा दर्शवली. लाखो डॉलर्सचा चेक ! मी म्हणालो की,इतका मोठा चेक लिहिणारे तुम्हीच एकटे आहात आणि म्हणूनच माझ्या स्काउटच्या मुलांना मला हे सांगायचे आहे की,एवढ्या मोठ्या आकड्यांचा चेक मी प्रथमच पाहिला आहे.त्याबरोबर प्रेसिडेंटने आनंदाने तो चेक मला दाखवला.मी त्याची खूप स्तुती केली व मी पुन्हा त्याला त्या चेकबद्दल अधिक माहिती विचारली.


मि.खलिफने संभाषणाची सुरुवात स्काउट बॉईजपासूनही केली नाही किंवा युरोपमध्ये आलेल्या त्याच्या रॅलीपासूनही केली नाही.त्या माणसाला ज्याच्यात रस होता त्या विषयालाच त्याने हात घातला,हे तुमच्या लक्षात आले असेलच ! परिणामी असे झाले की,तो प्रेसिडेंट स्वतःहून म्हणाला,अरे हो,तुम्ही मला भेटायला का आलात त्याबद्दल बोलाल का? मग खलिफने त्याला सारे सांगितले.मि.खलिफ पुढे म्हणाले,मला आश्चर्याचा धक्काच बसला.मी ज्याबद्दल गळ घातली,ती माझी मागणी तर त्याने ताबडतोब मान्य केलीच आणि त्याशिवाय स्वतःहून एक नाही तर तब्बल पाच मुलांचा ट्रीपचा खर्च,शिवाय माझासुद्धा ट्रीप-खर्च दिला आणि एक हजार डॉलर्सचे क्रेडिट दिले. युरोपमध्ये सात आठवडे राहायला परवानगी दिली.शिवाय निरनिराळ्या ठिकाणी ओळखीची पत्रे दिली.शिवाय तो स्वतः आम्हाला पॅरीसला भेटून सर्व शहर दाखवेल असे सांगितले.त्यानंतर आमची आर्थिक परिस्थिती वाईट होती तेव्हा त्याने नोकरीसुद्धा दिली.अजूनही आमचा हा ग्रुप त्याच्या संपर्कात आहे.


त्याला कशात रस आहे हे जर मला आधी समजलं नसतं,

तर मी कदाचित थेट माझा मुद्दा मांडून मोकळा झालो असतो आणि मग, कदाचित आत्ता जशी भरभरून मदत मिळाली त्याच्या एक दशांशसुद्धा मिळाली नसती.


व्यवसायातसुद्धा हे तंत्र वापरणे फायद्याचे आहे. हेन्री दुवेन रॉय यांची दुवेन रॉय ॲन्ड सन्स ही न्यूयॉर्कमधील घाऊक मालाची बेकरी होती. दुवेन रॉय हे न्यूयॉर्कमधील एका विशिष्ट हॉटेलला ब्रेड विकण्याच्या प्रयत्नात होते.तेथील सार्वजनिक ठिकाणच्या कार्यक्रमांना ते हेतुपुरस्सर जात असत.आपल्याला अधिक धंदा मिळावा म्हणून तो मॅनेजर ज्या हॉटेलमध्ये उतरत असे,तेथेसुद्धा दुवेन रॉयने राहून पाहिले; पण व्यर्थ ! यश मिळाले नाही.


मि.दुवेन रॉय नंतर म्हणाले,मानवी नातेसंबंधांचा थोडा अभ्यास केल्यावर माझ्या असे लक्षात आले की हे कुलूप उघडायला वेगळ्या किल्ल्या वापरायला हव्यात.या माणसाचे रसविषय कोणते याचा मग मी शोध घेतला आणि मला समजले की,हॉटेल ग्रीटर्स ऑफ अमेरिका या हॉटेल - व्यवसायातील उच्च अधिकाऱ्यांच्या सोसायटीचा हा सभासद होता. फक्त सभासदच नव्हता,तर त्याच्या उदंड उत्साहामुळे तो त्या सोसायटीच्या प्रेसिडेंटपदी पोहोचला होता.तो आंतरराष्ट्रीय ग्रीटर्सचासुद्धा प्रेसिडेंट होता! त्या सोसायटीच्या संबंधातल्या सर्व कार्यक्रमांना तो जातीने हजर राहत असे.म्हणून दुसऱ्या दिवशी जेव्हा आम्ही भेटलो तेव्हा मी माझ्या संभाषणाचा रोख ग्रीटर्सकडे वळवला आणि मग मला अवर्णनीय प्रतिसाद मिळाला.आम्ही अर्धा तास ग्रीटर्सबद्दलच बोलत होतो.तो भरभरून बोलत होता.माझ्या लक्षात आले की,ही सोसायटी म्हणजे त्याची निव्वळ आवड नव्हती, तर ते त्याच्या जीवनाचे ध्येय होते.त्या दिवशी त्या सोसायटीचे सभासदत्व त्याने मला विकले होते.या सगळ्या वेळात मी त्याच्याशी एकदाही ब्रेडबद्दल बोललो नाही,पण थोड्याच दिवसात त्याच्या एका आचाऱ्याने मला फोन केला की, माझ्या ब्रेडचे सँपल किमतीसह घेऊन या.


त्या आचाऱ्यालापण माझे खूप कौतुक वाटले. कारण त्याला कळत नव्हते,मी त्या माणसावर काय जादू केली! पण मी जिंकलो होतो !


जी गोष्ट घडवून आणण्यासाठी मी चार वर्षे या माणसाचा पाठपुरावा केला होता,पण उपयोग झाला नव्हता.त्याला कशात रस होता आणि कशाबद्दल बोलणे आवडत होते,हे समजून घेतल्यामुळेच माझे काम झाले.


आणखी एक उदाहरण पाहा.एडवर्ड हॅरीमन हा मेरीलँडमधील एक निवृत्त मिलिटरी ऑफिसर होता आणि त्याने निवृत्त झाल्यावर कंबरलँड येथील सुंदर खोऱ्यात राहायचे ठरवले.दुर्दैवाने त्या काळात फारसे काम उपलब्ध नव्हते.थोडेसे शोधल्यावर त्याच्या लक्षात आले की, त्या भागातील जवळपास सगळ्या कंपन्या फंकहाउझर नावाच्या माणसाच्या मालकीच्या किंवा त्याच्या ताब्यात असणाऱ्या होत्या.हा माणूस अत्यंत गरिबीतून आपल्या मेहनतीवर इथपर्यंत पोचला होता.हे ऐकल्यावर हॅरीमनला त्याला भेटावेसे वाटू लागले,पण फंकहाउझर कोणा बेकार माणसांना भेटत नसे.हॅरीमन लिहितो : - फंकहाउझरला कशात रस आहे हे जाणून घेण्यासाठी मी खूप चौकशी केली.मला असे कळले की त्याला त्याने मोठ्या कष्टाने मिळवलेल्या पैशामध्ये व सत्तेमध्ये रस आहे.एक कडक,तुसड्या स्वभावाची त्याची सेक्रेटरी त्याला लोकांपासून दूर ठेवण्याचे काम चोख करण्यासाठी ठेवली होती.मी तिचीही ध्येये, आवडीनिवडी यांची माहिती काढली आणि मुद्दामच अचानकपणे सरळ त्या सेक्रेटरीला गाठले.पंधरा वर्षांपासून ती त्याची डायरी व इतर वैयक्तिक कामे सांभाळत होती.माझ्याकडे फंकहाउझरसाठी आर्थिक फायद्याचे व सत्तेचे राजकारण करणारी एक योजना आहे असे जेव्हा मी तिला सांगितले,

तेव्हा ती उत्साहाने माझे बोलणे ऐकू लागली.मी तिला तिच्या फायद्याच्याही काही गोष्टी सांगितल्या.आमचे हे संभाषण झाल्यावर तिने माझी फंकहाउझर

बरोबर भेट निश्चित केली.


त्याच्या दिमाखदार भव्य ऑफिसमध्ये जाताना मी मनाशी पक्की खूणगाठ बांधली होती की,मी माझ्या नोकरीबद्दल एक चकार शब्दही काढणार नाही.फंकहाउझर एका मोठ्या,शिसवी कोरीवकाम केलेल्या टेबलमागे बसला होता आणि मला लवकरात लवकर कटवण्याचा त्याचा विचार त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.मी म्हणालो,मि.फंकहाउझर मला विश्वास वाटतो की,मी तुम्हाला अधिक पैसे मिळवून देईन.तर त्याने मला जवळ बसवून घेतले.मी माझ्याकडे असलेल्या सगळ्या योजना त्याला सांगितल्या.तसेच माझी गुणवत्ताही त्या ओघात कथन केली आणि या योजनांमुळे त्याला निश्चित व्यावसायिक यश कसे मिळेल ते सांगितले.


आता तो मला नावाने हाक मारू लागला होता. 

(मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी, मंजुल प्रकाशन..)तो लगेच म्हणाला- आरजे,चल,तू आजपासून माझ्याकडे काम कर.आजतागायत वीस वर्षे मी त्याच्याकडेच काम करतो आहे आणि आम्ही दोघांनीही भरपूर पैसा कमावला आहे.समोरच्या माणसाची आवड जाणून त्या विषयी बोलून, बोलणारा व ऐकणारा अशा दोघांनाही फायदा होतो.एक यशस्वी उद्योजक हॉवर्ड हा उत्तम संवादकर्ताही आहे.तो हे तत्त्व तंतोतंत पाळतो. त्याला याचा काय फायदा होतो असे विचारण्यात आले तेव्हा हॉवर्ड म्हणाला,


प्रत्येक माणसाकडून मला प्रत्येक वेळी वेगवेगळे बक्षीस तर मिळालेच.पण त्याचबरोबर त्यांना प्रिय असलेल्या गोष्टी प्रत्येकवेळी त्यांच्याशी बोलत राहिल्यामुळे मला दीर्घायुष्य लाभले.


थोडक्यात समोरच्याला जे प्रिय आहे तेच बोला..!



१०/८/२४

प्रेमाकडून संशोधनाकडे From love to research

सर्पदंशानंतर अण्णा वाचला खरा,पण त्याला हात गमवावा लागला याचं दुःख मोठं होतं. त्याच्यावर वेळीच आणि योग्य उपचार झाले असते तर कदाचित त्याचा हात वाचू शकला असता.माझ्याबरोबरच माझ्या मित्रांनाही याची खंत होतीच.एवढंच नव्हे,तर लवकरच मला कळलं, की ससूनमधल्या काही डॉक्टरांनाही त्याची रुखरुख लागून राहिली होती.डॉ.डी.एन. जोशी आणि डॉ.डी.बी. कदम हे त्यातलेच दोघं.हे दोघं उत्साही तरुण नुकतेच बी.जे.मेडिकल कॉलेजमधून पोस्ट - ग्रॅज्युएशन करून तिथेच लेक्चरर म्हणून लागले होते.


अण्णाच्या सर्पदंशाच्या वेळी दोघंही ज्युनियर विद्यार्थी होते.अण्णाच्या ट्रीटमेंट प्रोटोकॉलमध्ये काही तरी चुकतंय असं दोघांनाही तेव्हाच समजलं असावं.

त्यामुळे किमान यापुढे ससूनमध्ये येणाऱ्या सर्पदंशाच्या प्रत्येक केसचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करायचा असं त्या दोघांनी ठरवलं होतं.

त्यातून कदाचित उपचाराची नवी सुधारित पद्धती तयार होऊ शकेल आणि पर्यायाने सर्पदंशाने मृत्यू होण्याचं किंवा हातपाय गमावावे लागण्याचं प्रमाण कमी होईल अशी त्यांना आशा होती.त्यांच्या कामाबद्दल कळल्यावर मी आपणहून या संशोधनात सहभागी व्हायचं ठरवलं.त्या वेळी टेल्कोमध्ये माझी कायम फर्स्ट शिफ्ट असायची.दुपारी घरी आलो की मी लगेचच ससूनला पळायचो.१९८७ सालच्या जानेवारी महिन्यात आमच्या संशोधनाला सुरुवात झाली.त्यासाठी मेडिसिन विभागाचे प्रमुख,कॉलेजचे डीन आणि ससून हॉस्पिटलचे सुपरिंटेंडन्ट अशा अधिकाऱ्यांची परवानगी मिळवली.


पहिल्या टप्प्यात आम्ही १९८६ या संपूर्ण वर्षभरात सर्पदंशाने दाखल झालेल्या रुग्णांच्या केस स्टडीज करायला सुरुवात केली.पुढचे दोन महिने त्या वर्षातील सर्पदंशाच्या सगळ्या रुग्णांचे केसपेपर नीट तारीखवार लावून घेण्यातच गेले.आता अनेक शिकाऊ डॉक्टरांनी हाताळलेले,अनेकविध हस्ताक्षरांत टिप्पणी केलेले,अमुकतमुक उपचार, उपाय आणि तपासण्या करण्याचे आदेश, त्यावरचे उपचार आणि कार्यवाही अशा असंख्य केसपेपरचा अभ्यास करण्याचं डोईजड काम पुढे होतं.

अभ्यासाला सुरुवात कुठून करावी हे आमच्यापैकी कुणालाच सुचत नव्हतं.तीन-चार दिवस असेच गेले.एका संध्याकाळी आम्ही तिघं कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये चहा घेत असताना डी. बी.ताडकन उठला आणि निघाला.मी आणि डी. एन.त्याच्या मागोमाग गेलो.पहिला केसपेपर खसकन् ओढून डी.बी.बारकाईने पाहू लागला. आम्ही जमवलेल्या केसपेपरवर त्याने त्याची अभ्यासू नजर रोखली आणि तो म्हणाला, "कळलं!आपण पहिल्यांदा जेंडरपासून सुरू करू यात.पेशंट स्त्री होती की पुरुष,मग वय,मग भौगोलिक स्थान आणि मग बाकी क्लिनिकल डीटेल्स."आम्ही तत्परतेने कामाला लागलो. अशा रीतीने आमच्या नव्या रिसर्च प्रोजेक्टची सुरुवात झाली.


बी.जे.मेडिकलचे इतरही काही लेक्चरर्स स्वतःहून आम्हाला मदत करू लागले, तर काहीजणांनी हेटाळणीही चालवली;पण आम्ही अर्थातच त्याकडे लक्ष न देता आमचं काम सुरू ठेवलं.सुमारे सातशे केसपेपर्सचा अभ्यास करायला तीन-चार महिन्यांचा काळ लागला.या सर्व माहितीचा तर्कसुसंगत अभ्यास करून नेमकं अनुमान काढण्याचं आणि त्यावर विश्लेषण करण्याचं मुख्य काम अद्यापही बाकी होतं.एकदा डीबी आणि डीएनचे सीनियर मित्र डॉ.श्याम बावीकर सहजच आमच्या रूमवर आले.


आम्ही लिहिलेल्या पत्रावळ्या त्यांनी निरखून पाहिल्या आणि तिथलीच कात्री घेऊन नवीन कागदाच्या उभ्या पट्ट्या कापायला सुरुवात केली.

त्यांना डिंक लावून आमच्या पत्रावळ्या मागच्या बाजूने एकापुढे एक अशा संगतवार पद्धतीने चिकटवायला घेतल्या.त्यांच्या या नव्या कल्पनेमुळे आमच्या कामात खूपच सुसूत्रता आली.आम्ही चौघांनी अशा पद्धतीने डाटा कम्पायलेशन करायला घेतलं. पुढच्या तीन-चार दिवसांतच अख्ख्या खोलीभर आमचं डाटा शीट तयार झालं.त्यामुळे आता तिथे पायही ठेवायला जागा उरली नव्हती.

आता आमच्या अभ्यासात आणखी मजा येऊ लागली.शिरूर परिसरातून आलेले घोणसदंशाचे रुग्ण;भोर, वेल्हा परिसरातील मण्यारदंश,मुळशी-मावळातील नागदंश,पावसाळ्याच्या सुरुवातीचे फुरशांचे दंश आणि एखाद-दुसरा ट्रेकवर गेलेल्या शहरी तरुणाला झालेला चापड्याचा (बांबू पिट व्हायपर) दंश अशा विविध प्रकारचे दंश झालेल्या व्यक्तींची वयं,त्यांचे व्यवसाय आणि कामाचं स्वरूप अशी खूपमाहिती आमच्याकडे जमा होऊ लागली.


घोणसाचा दंश प्रामुख्याने दिवसा होतो,तर मण्यारीचा रात्री.नागाचा कधीही आणि फुरशाचा मात्र कधीतरीच. 


सर्पदंश हे प्रामुख्याने २८ ते ४० या वयोगटातील शेतीचं काम करणाऱ्या पुरुषांना झाले असल्याचंही आमच्या लक्षात आलं.त्यातूनही पायापेक्षा हाताला जास्त सर्पदंश झाले होते. अशा सर्वच रुग्णांवर केली गेलेली उपाय योजना,त्यात अनवधानाने राहिलेल्या त्रुटी अशा सर्वच बाबींचा सविस्तर अभ्यास करायला मिळाला आणि त्यातूनच सर्पदंश उपाययोजनेमध्ये विशिष्ट मापदंड ठरवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो.


त्याच दरम्यान डीएनला कुठून तरी समजलं की सिंगापूर विद्यापीठात सर्पविष व सर्पदंश या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे.तिथे आम्ही आमच्या शोधनिबंधाचं प्रारूप पाठवून दिलं,आणि ते चक्क स्वीकारलंही गेलं.

एवढंच नव्हे,तर हा शोधनिबंध सादर करण्यासाठी सिंगापूरला येण्याचं आमंत्रणही आम्हा तिघांना मिळालं.आम्ही आनंदाने अक्षरशः वेडे झालो. निमंत्रण आम्हा तिघांनाही होतं,पण त्याचा प्रवासखर्च आयोजक देणार नव्हते.त्यामुळे तिघांनी जाणं परवडणारं नव्हतं.पण आमच्यापैकी कोणीच एकट्याने जायला तयार होईना.


मेडिसिन डिपार्टमेंटला कामाचा खूप लोड आहे,अशी सबब पुढे करून डीबी मागे हटला. त्याच्या या निर्णयामुळे मी आणि डीएन असं दोघांनीच जायचं निश्चित झालं. 


मुंबई-सिंगापूर-मुंबई अशा विमानखर्चाच्याच किमतीमध्ये आमच्या एका ट्रॅव्हल एजंट मित्राने आम्हाला बँकॉक-पटाया-सिंगापूर अशी पर्यटन सहलच बुक करून दिली.विमानाच्या तिकिटांसाठी घरच्यांकडून आणि मित्रांकडून पैसे जमवले.

वरखर्चासाठी मात्र आमच्याकडे पैसे नव्हते.


त्यामुळे प्रवासात पैशाची काटकसर करण्याशिवाय इलाज नव्हता.सर्वप्रथम बँकॉकला पोहोचलो,तिथून पटाया गाठलं.तिथे दोन दिवस राहिलो.इतर पर्यटक भरपूर पैसे खर्च करून वॉटर स्पोर्ट खेळत होते. आम्ही मात्र तिथल्या टेकडीवजा डोंगरावर छोटासा ट्रेक करण्याचा निर्णय घेतला.टेकडीवर पोहोचून सगळ्यांचे 'वॉटर स्पोर्ट्स' पाहत बसलो. बँकॉकमध्ये सोन्याचा बुद्ध,झोपलेला नव्वद फुटी बुद्ध,नदीतला बाजार वगैरे पाहिलंच,पण आम्हाला मुख्य आकर्षण होतं ते तिथल्या सर्प उद्यानाचं.तिथे आशिया खंडात आढळणारे अनेक रंगीबेरंगी,आकर्षक पण विषारी असे पिट व्हायपर साप पाहिले.भला थोरला किंग कोब्रा तिथले कामगार लीलया हाताळत होते.तीन-चार प्रकारच्या मण्यारीही बघायला मिळाल्या. तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो.ओळखी करून घेतल्या.तिथे आलेल्या पर्यटकांना ते लोक सतत निरनिराळ्या सापांचे विष काढून दाखवत होते आणि ते विष ताबडतोब प्रयोगशाळेत पाठवलं जात होतं.

त्यापासून अँटिव्हेनम लस बनवून ती जगभर निर्यात केली जात होती.ओळख काढल्यामुळे ही सर्व प्रक्रिया जवळून बघता आली.या ओळखीमुळेच पुढे आमच्या सर्वोद्यानामध्ये किंग कोब्राच्या विषासाठी लागणारं अँटिव्हेनम आम्हाला त्यांच्याकडून मिळवता आलं.अर्थात ती बरीच नंतरची गोष्ट.सिंगापूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी विद्यापीठ गाठलं.

कॉन्फरन्समध्ये विविध देशांतील जागतिक कीर्तीचे शास्त्रज्ञ, सर्पविषतज्ज्ञ,फिजिशियन्स,क्लिनिशियन्स आणि काही शल्यविशारदही सहभागी झाले होते.

आमच्या शोधनिबंधाचा प्रथम लेखक डॉ.डी. एन.

जोशी असल्याने तो सादर करण्याची जबाबदारी त्याचीच होती.आमच्या प्रेझेंटेशनची वेळ आली तशी त्याची छाती धडधडू लागली. डीएनने आपल्या खास पुणेरी इंग्लिशमध्ये प्रेझेंटेशनला सुरुवात केली तेव्हा तो किती प्रभावी बोलू शकेल याबद्दल मला शंकाच होती; पण अतिशय शांतपणे आणि सोप्या भाषेत माहिती सांगत त्याने लवकरच सगळ्यांची मनं जिंकली.मी स्लाइड्स बदलण्याचं काम करत होतो.

आम्ही जवळपास पस्तीसेक स्लाईड्स दाखवल्या.

प्रत्येक स्लाइडवर डीएन अत्यंत आश्वासकपणे आमचे निष्कर्ष मांडत होता. व्याख्यान संपल्यावर त्याला जोरदार टाळ्या पडल्या आणि भरपूर प्रश्नोत्तरं झाली.प्रश्नांनाही त्याने समाधानकारक उत्तरं दिली.मी तर चाट पडलो.


मराठमोळ्या वातावरणात वाढलेल्या डीएनने परिषद गाजवली.सर्वच देशांच्या प्रतिनिधींनी त्याच्या आणि पर्यायाने आम्हा सर्वांच्याच संशोधनाला पावती दिली होती.चार दिवसांच्या या परिषदेमध्ये आम्हाला खूप काही नवं शिकायला मिळालं.सर्पदंश आणि उपचार या विषयामध्ये पारंगत असणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील अधिकारी व्यक्तींशी ओळखी झाल्या. माझ्यासाठी तर पुढच्या कामाच्या दृष्टीने ही मोठीच पर्वणी होती.आमच्याकडे पैसे इतके कमी होते की जवळपास चारही रात्री आम्ही काही न खाता उपाशीपोटीच झोपून गेलो. परतण्याच्या दिवशी हॉटेलचं बिल चुकवलं आणि पैसे मोजले तर जेमतेम विमानतळावर पोहोचण्याएवढी आणि पुढे मुंबई-पुणे बसप्रवासाएवढीच शिल्लक सोबत होती.

 विमानतळावर खाण्याचे प्रचंड पदार्थ डोळ्यांसमोर नाचत होते,पण पैसे नसल्याने खाता येत नव्हतं.


अखेर विमानात बसलो. टेक-ऑफपूर्वी एक हवाईसुंदरी गोळ्या चॉकलेट्सनी भरलेला ट्रे सर्वांसमोर नाचवत आमच्या जवळ आली.


आम्ही दोघांनी हावरटासारख्या दोन्ही मुठी भरून घेतल्या आणि अक्षरशः अधाशासारखे खाऊ लागलो.त्यानंतर पुढ्यात आलेले खाद्यपदार्थही अधाशासारखे चापले.वर दोन-दोन कप कॉफी मारली आणि आत्मा शांत केला.पण असं असलं तरीही आम्ही खूष होतो.या कॉन्फरन्सने आम्हाला वेगळाच आत्मविश्वास दिला होता.- सोयरे वनचरे,अनिल खैर,समकालीन प्रकाशन..!


लवकरच आम्हाला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली.सर्पविष आणि सर्पदंश या विषयावर अमेरिकेतून प्रसिद्ध होणाऱ्या 'टॉक्सिकॉन' या जगप्रसिद्ध शोध नियतकालिकातही आमच्या शोधनिबंधाची दखल घेण्यात आली होती.त्यातूनही या क्षेत्रात आम्हाला भरपूर प्रसिद्ध मिळाली आणि ओळखी वाढल्या.पुढे डॉ.डी.एन.जोशी परदेशी गेला आणि डॉ.डी.बी.कदम बी.जे.मध्ये आधी प्राध्यापक आणि पुढे विभागप्रमुखही झाला.



एक वाचणीय नोंद - शिवाजीराजांचे वकील : १६७२ मध्ये पोर्तुगीजांशी चौथाईच्या वसुलीबाबत बोलणी करण्यासाठी शिवाजीराजांनी पाठवलेले ते वकील म्हणजे पितांबर शेणवी,जिवाजी शेणवी आणि गणेश शेठ.१६७७ मध्ये रामनगर आणि कोळी राजांचा संपूर्ण मुलूख शिवाजीराजांच्या ताब्यात आला.

त्यानंतर दमणच्या सीमेवर सैन्य ठेवून दमणला लुटारूंचा उपद्रव होणार नाही याची काळजी शिवाजीराजांनी घेतली आणि त्या बदल्यातल्या चौथाईची मागणी पोर्तुगीजांकडे केली.ही मागणी रास्त असल्याचे दमणच्या नगपालिकेने ठरविले आणि त्याबाबत पोर्तुगीज विजरईसही कळविण्यात आले.१० जानेवारी १६७८ रोजी विजरईने शिवाजीराजांचा हा हक्क मान्य केला व तसे त्यांना कळविले.त्यापूर्वी १५ सप्टेंबर १६७७ रोजी त्याने वसईच्या जनरलला लिहिलेल्या पत्रात आज्ञा केली आहे की 'चौथाईची रक्कम वसूल करून ठेवावी व चौथिया राजांशी ह्या बाबतीत जसा करार केला होता तसाच करार शिवाजींशी करावा.पण शिवाजीस द्यावयाची चौथाईची रक्कम त्याने रामनगरचे संपूर्ण राज्य हस्तगत केल्यापासूनच द्यावी.त्यापूर्वी देऊ नये.' त्यानंतर हे वकील बोलणी करण्यासाठी आले होते.त्याबाबत कॅरे यांनी ही नोंद केली आहे.पण तारीख चुकली आहे.वसईचा कॅप्टन दों मानुयेल लोबु द सिल्व्हैर यांच्याकडे चौथाईसंबंधाने विचारविनिमय करण्यासाठी शिवाजीराजांनी मे १६७७ मध्ये आवजीपंत ह्याला पाठवले होते. ही चौथाई शिवाजीराजांना देण्याचे पोर्तुगीजांनी कबूल केले परंतु अनेक सबबी सांगत पोर्तुगीजांनी ही रक्कम अखेरपर्यंत दिली नाहीच.उलट सदर रकमेपैकी तेरा हजारांपेक्षा अधिक रुपये गुप्तपणे रामनगरकरास दिले.तेही शिवाजीराजांविरुद्ध लढा सुरू ठेवण्यासाठी.ह्याचा उल्लेख गोव्याच्या हंगामी गव्हर्नरच्या दि.१२ मे १६७८च्या पत्रात आढळतो.पण लिस्बन येथील आज्युदच्या ग्रंथसंग्रहालयातील एका हस्तलिखितानुसार दमण प्रांतातील चौथाईचे उत्पन्न दरसाली १२९९५ असुर्प्या असून त्यापैकी १८९८असुर्प्या वतनदारासंबंधीचा खर्च वजा जाता चौथिया राजास ९०७७ असुर्प्या राहतात,अशी ४ जून १६८३ ची नोंद आहे.ह्यावरून शिवाजीराजास पोर्तुगीजांकडून चौथाईबद्दल दरवर्षी ही रक्कम येणे होते.१६८१ च्या अखेरपर्यंत ह्या चौथाईपैकी अनामत ठेवलेली रक्कम ११७३८असुर्प्या होते अशीही नोंद आढळते.ह्यावरून १६८१ पर्यंत ही रक्कम वसूल झाली नव्हती असे दिसून येते.


असरफी हा 'सेराफिन' ह्या पोर्तुगीज चांदीच्या नाण्याचा अपभ्रंश.एक रुपया म्हणजे १.४ सेराफिन तर १० रुपये म्हणजे १३

८/८/२४

अभ्यासपूर्ण नोंदी / Scholarly Notes

प्राणी कोणता का असेना,पाळीव कुत्रा असो नाहीतर जंगली हत्ती,नुसते त्यांच्यासमोर उभे राहून संवाद साधला जात नाही,तर त्यांना प्रतिसाद देणे तितकेच महत्त्वाचे असते.त्यांना प्रतिसाद दिला,की तुमचा संवाद पूर्ण होतो.इतर सगळ्यांसारखाच प्राण्यांमध्ये संवाद हा दोन्ही बाजूंनी,विचारांची,संभाषणाची देवाणघेवाण करून होतो.जर तुम्ही त्यांना प्रत्युत्तर दिले नाहीत,तर संवाद पूर्ण होत नाही.इतकी ही साधी गोष्ट आहे,पण लक्षात लवकर येत नाही.प्रत्युत्तर द्यायला एखादी नजरदेखील पुरेशी असते.निकटचा संबंध असलेल्या प्राण्याकडे तुम्ही नुसता कटाक्ष जरी टाकला तरी पुरत असले,तरी तसाच कटाक्ष अनोळखी प्राण्यासाठी आव्हान दिल्यासारखा होऊ शकतो.तुम्ही बोलताना ज्या आविर्भावात आपले शब्द वापरता त्याच आविर्भावात,त्याच स्वरात तुम्ही चार शब्द बोललात तरी देखील पुरते.इतरही काही घटक विचारात घेण्यासारखे आहेत.माणसांसारखेच आदर दाखवणे महत्त्वाचे असते.तुमच्या मनातील भाव प्राण्यांना बरोबर कळतो,विशेषतः जर तुम्ही विरोधी किंवा आक्रमक असाल तर त्यांच्या लगेच लक्षात येते. खुल्या मनाने सामोरे जाणे, हे प्रगती करण्यासाठी आवश्यक आहे.

त्याबरोबरच संयम आणि चिकाटीदेखील तितकीच महत्त्वाची आहे.सगळ्यात गंमत म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात,हे तुम्हाला लगेच कळते.माझ्यावर विश्वास ठेवा,कोणालाही हे करता येईल आणि त्याने खूपच समाधान मिळते. त्यासाठी कोणत्या अतिमानवी शक्तीची आवश्यकता नाही.


 शास्त्रज्ञांनी असा शोध लावला आहे,की प्राण्यांना केवळ पन्नासच्या आसपास शब्द कळू शकतात.पण म्हणून त्यांच्याशी न बोलणे किंवा संवाद साधण्याचा प्रयत्नदेखील न करणे चुकीचे आहे.केवळ मनुष्यच एकमेकांशी संवाद साधू शकतात,असा विचार करणे पूर्णपणे चूक आहे.दोन जीवांमधला संवाद हा भाषेच्या मर्यादा ओलांडून जातो शब्द पोहोचले नाहीत तरी भाव नक्की पोहोचतो.


काही पिल्लांच्या पायाचे ठसे खोल खाईच्या फारच जवळ होते,असे मला वाटले.हत्ती जेव्हा फिरत असतात,तेव्हा ते फारच कमी वेळा सरळ रेषेत चालतात.एकमेकांशी धक्काबुक्की करत, ढकलत त्यांचा खेळ सुरू असतो.

तरीही ह्या खोल खाईजवळदेखील ते अगदी आरामात आत्मविश्वासाने गेलेले दिसत होते.'कोबस राथ' नावाच्या पशुवैद्याने तो कळप आमच्याकडे आणला होता.त्याच्या बोलांची मला एकदम आठवण झाली.तो मला म्हणाला होता,की एखादे माकड ब्रीफकेस घेऊन जाऊ शकणार नाही,अशा ठिकाणी देखील हत्ती जातात.


हत्तींची एक अशी पक्की धारणा असते, की बाकी सगळ्या प्राणिमात्रांनी त्यांना मान दिला पाहिजे.ते कोठे जात असतील तर बाजूला होऊन त्यांना वाट करून दिली पाहिजे.स्विमिंग पूलच्या भोवती डिनरसाठी बसलेले परदेशी पाहुणे आणि जंगलातील एखाद्या तळ्याशेजारी बसलेली बबून माकडे ह्यात हत्तींच्या दृष्टीने काहीच फरक नाहीये.


हत्ती जरी वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला असले तरी त्यांची वास घेण्याची शक्ती इतकी तीव्र असते की वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने आलेला अगदी मंद वास देखील ते ओळखू शकतात.


नर हत्तींना त्यांच्या इच्छेविरुद्ध काहीही करायला लावलेले आवडत नाही.


आयुष्याचा सगळ्यात मोठा विरोधाभास आहे तुम्हाला जेव्हा जंगलात काहीतरी खास बघायची वेळ येते तेव्हा तुम्ही कॅमेरा घरी ठेवलेला असतो.


जंगलाचा भाग होऊन जाणे आजूबाजूच्या वातावरणात मिसळून जाणे आणि कशाचीही अपेक्षा न करणे.माझी अंत:प्रेरणा मला सांगत होती,की हत्ती जवळच आहेत त्याचवेळी नाना जवळच्या झाडीतून बाहेर आली.तिच्या पाठोपाठ बाकीची हत्ती देखील बाहेर आले.ते मला प्रत्यक्ष दिसायच्या आधीच मला त्यांची उपस्थिती जाणवली होती.नंतर माझ्या असे लक्षात आले, की हा अनुभव उलट्या पद्धतीनेदेखील अनुभवायला येतो.कधी कधी त्यांचा शोध घेत असताना मला असे जाणवायचे,की ते आसपासच्या भागात अजिबात नाहीयेत. दुसरीकडे कोठेतरी आहेत.मला ते दिसायचे नाहीत म्हणून नाही,तर त्यांच्या अनुपस्थितीत जंगल एकदम रिकामे वाटायचे.


एक दोन आठवडे सवय झाल्यावर मला ह्याचा अंदाज येऊ लागला.काही दिवसांनी योग्य परिस्थितीत त्यांना शोधणे खूपच सोपे जाऊ लागले.हत्ती आजूबाजूच्या जागेत आपल्या उपस्थितीचा ठसा उमटवतात आणि त्यांचे ह्यावर पूर्ण नियंत्रण असते.जेव्हा त्यांना आपण कोठे आहोत हे कोणालाही कळू द्यायचे नसायचे तेव्हा मी अक्षरशः त्यांच्यामध्ये असलो,तरीही मला काहीही पत्ता लागायचा नाही.


काही वेळ ह्यावर थोडे संशोधन आणि प्रयोग केल्यावर काय घडते आहे,ते माझ्या लक्षात आले. सिंह गर्जना करतो ती आपल्या कानांना ऐकू येते;कारण ती आपल्या श्रवणक्षमतेच्या टप्यात असते.हत्तींच्या कळपाचे दीर्घ रेंगाळणारे आवाज मानवी श्रवणक्षमतेच्या खालच्या पट्टीत असल्याने ते आपल्याला ऐकू येत नाहीत. आजूबाजूच्या जंगलात ते मैलोन्मैल पसरतात. जरी मला ऐकू येत नसले तरी ते मला जाणवत होते.तिथे हत्ती आहेत,असे ते सगळ्या जगाला त्यांच्या भाषेत सांगत होते.


हत्तींच्या सहवासात असताना माझ्या मनात येणाऱ्या भावनांचे मला नवल वाटत असे,कारण या भावना माझ्या नसून त्यांच्या मनातल्या भावना आहेत असे मला वाटत होते.कोणत्याही भेटीचा भाव काय असावा हे ते हत्ती ठरवायचे.


अभ्यासपूर्ण महत्वाची नोंद - मी एका दिवशी काही कामासाठी डर्बनला गेलो होतो.मी परत आलो तेव्हा सातही हत्ती घराभोवती गोळा झालेले पाहून मला आश्चर्य वाटले.जणू ते स्वागतसमितीचे सभासद असून माझी अपेक्षेने वाट पाहत होते.योगायोग असेल म्हणून मी ह्या घटनेचा जास्त विचार केला नाही.पुढच्या ट्रीपच्या वेळी हे परत घडले.काही दिवसांनी माझ्या हे लक्षात आले,की मी केव्हा जाणार आणि केव्हा परत येणार आहे ते त्यांना पक्के ठाऊक असायचे.(एक यार्ड म्हणज ३ फुट)


(द एलेफंट व्हिस्परर - लॉरेन्स अँथनी ! ग्रँहम स्पेन - अनुवाद - मंदार गोडबोले - मेहता पब्लिसिंग हाऊस )


त्या रात्रीत कळप दोन गटात विभागला गेला होता.

अभयारण्यात पोचल्यावर त्या दोघांची एकत्र भेट झाली ते तिथे कसे भेटले असतील हे मानवाच्या आकलनाच्या बाहेर आहे.संपूर्ण काळोखात कोणतेही दिशादर्शक यंत्र किंवा रेडिओ बरोबर नसताना बरोबर एकाच ठिकाणी एकाच वेळी पोहोचणे अशक्यप्राय वाटते दोन्ही गट एकमेकांपासून जवळ जवळ सात मैल लांब जाऊन दाट जंगलात एका ठिकाणी एकावेळी एकत्र आले हा प्रसंग पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की हत्तीपाशी अनाकलनीय संपर्काची साधने आहेत.ते आपल्या पोटातून मानवाला ऐकू येणार नाही,अशा फ्रिक्वेन्सीचा ध्वनी काढतात. जो कित्येक मैलांपर्यंत ऐकू येतो.हत्तींना त्यांच्या मोठ्या कानांमुळे तो संदेश पकडता येतो.नव्या सिद्धांताप्रमाणे अशी शक्यता आहे की ते आपल्या पायांद्वारे जमिनीतील कंपने ऐकू शकतात जे असेल ते खरे,पण ह्या अफलातून प्राण्यांची काही इंद्रिये आपल्यापेक्षा फार अधिक प्रगत आहेत.काही दिवसांनी मात्र... सगळे जरा अतीच झाले. मी जोहान्सबर्गच्या विमानतळावर होतो आणि माझे परतीचे विमान चुकले.चारशे मैलांवर ( एक मैल म्हणजे सुमारे १.६ किलोमिटर म्हणजे जवळपास ६०० ) किलोमीटर' थुला थुला' मध्ये सगळा कळप माझ्या घराकडे निघाला होता तो अचानक थांबला,वळला आणि झाडीत नाहीसा झाला.नंतर आमच्या लक्षात आले,की माझे जेव्हा विमान चुकले त्याच वेळी हे घडले.दुसऱ्या दिवशी मी घरी पोहोचलो तेव्हा कळप परत घराभोवती जमा झाला होता.

ह्या सगळ्यामध्ये काहीतरी विलक्षण गोष्ट आहे, ह्याचा माझ्या मनाने स्वीकार केला होता.माझ्या मर्यादित बुद्धीला आकलन होण्यापलीकडची ही काहीतरी शक्ती होती.

हत्तींची एकमेकांशी संवाद साधण्याची शक्ती अतिशय अविश्वसनीय असते हे सिद्ध झाले आहे.हत्ती आपल्या पोटातून जो गुरगुरण्याचा आवाज काढतात,तो मानवी कानांच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या खालच्या पट्टीत काढलेला असतो.तो आवाज पुष्कळ अंतरापर्यंत ऐकू येतो;पण आपल्या कानांना ऐकू येत नाही. देवमासे ज्या फ्रिक्वेन्सीमध्ये आवाज काढतात त्याच्या जवळचीच ही फ्रिक्वेन्सी आहे.काही लोक म्हणतात हे स्पंदन जगभर सगळीकडे पसरते,कोठेही ऐकू येऊ शकते.


हा कमी फ्रिक्वेन्सीतला आवाज कमीतकमी कित्येकशे मैल दूर ऐकू जातो,असे आता शास्त्रज्ञ मानू लागले आहेत.

हे जर खरे असले तर ह्याचा अर्थ हत्ती आफ्रिका खंडातील इतर अभयारण्यातील हत्तींबरोबर संवाद साधू शकतात.एक कळप दुसऱ्या कळपाशी संवाद साधतो,

दुसरा तिसऱ्याशी,असे करत संदेश त्यांच्या संपूर्ण भूभागात पसरू शकतो.जसा आपण दूरध्वनीवर लांबपर्यंत संवाद साधू शकतो तसे.


केटी पेन नावाच्या 'कॉर्नेल युनिव्हर्सिटी'तील 'एलेफंट लिसनिंग प्रोजेक्ट'वर काम करणाऱ्या (हत्तींच्या संभाषणाचे संशोधन करणारा प्रकल्प) शास्त्रज्ञ स्त्रीने हत्तींच्या पोटातून येणाऱ्या ह्या आवाजाच्या लहरींचा शोध लावला.हा शोध अतिशय महत्त्वाचा होता.हत्तींच्या वर्तणुकीविषयी आपला संपूर्ण दृष्टीकोन ह्या शोधाने बदलला.जन्मजात मिळणाऱ्या हुशारीमध्ये आणि लांबवर संभाषण करू शकण्याच्या क्षमतेमध्ये महत्त्वाचे नाते आहे. उदाहरणार्थ,एखाद्या बेडकाची संभाषण करण्याची क्षमता केवळ डराव करण्याची आहे, कारण त्याला फक्त आपल्या तळ्यापुरतीच संभाषण करण्याची गरज असते.

त्याला त्यापेक्षा जास्त आपला आवाज पसरवण्याची गरज नसते.पण हत्ती अतिशय दूरवर संवाद साधू शकतात,त्याने हे सिद्ध होते,की आपल्याला वाटले होते त्यापेक्षा हे महाकाय प्राणी जास्त पुढारलेले आहेत.

आपल्याला आधी वाटले होते त्यापेक्षा ते खूपच अधिक हुशार आहेत.जर तुम्हाला ह्याबद्दल शंका असेल तर पुढील गोष्टीवर विचार कराःहत्तींना काही निरर्थक गुरगुरण्याचा आणि हुंकारण्याचा आवाज दूरपर्यंत पाठवायची गरजच काय? केवळ त्यासाठी त्यांनी आपली ही संभाषणक्षमता विकसित केली असेल का? नक्कीच नाही. उत्क्रांती अतिशय निर्दयी आहे.जगण्यासाठी जे

गरजेचे नसेल ते केव्हाच जनुकातून नाहीसे होते. हत्ती ह्या अतिशय विकसित झालेल्या,दूरवर संभाषण करण्याच्या क्षमतेचा काही विशेष उद्देशाने उपयोग करतात- एकमेकांशी आणि दुसऱ्या कळपाशी सुसंगतपणे संभाषण करू शकण्यासाठी.मग त्यांच्या विश्वात काय घडत आहे,माणसे त्यांच्याशी कशी वागत आहेत,हे ते इतरांना सांगत असतील का? त्यांची बुद्धिमत्ता लक्षात घेता माझ्या मनात अजिबात शंका उरली नाहीये,नक्की असेच घडते आहे.


तुम्हाला हे लक्षात घ्यावे लागेल की प्राणीविश्वात 'संवाद' हा वाऱ्याच्या झुळुकीप्रमाणे एकदम सहज साधला जातो. मानवाने आपल्यावर लादून घेतलेल्या बंधनांमुळेच सुरुवातीला मला त्या प्राण्यांना समजावून घेणे जरा अवघड गेले.


आपल्या पूर्वजांना अंत:प्रेरणेने माहिती असलेल्या गोष्टी शहरातल्या गोंगाटात आपण विसरून जातो.जंगलात जीवनाचा प्रवाह अव्याहतपणे सुरू असतो आणि त्याची स्पंदने आपल्याला ऐकू येऊ शकतात; एवढेच नाही तर आपण त्यांना प्रतिसाददेखील देऊ शकतो.


आपण हे देखील लक्षात घेतले पाहिजे, की प्रत्येक गोष्ट आपल्याला समजेलच असे नाही. प्रगत विज्ञानाला उलगडा करून सांगता येणार नाही,अशा काही शक्ती हत्तींना अवगत आहेत. हत्ती एखादा कॉम्प्युटर दुरुस्त करू शकणार नाहीत,पण ते भौतिक आणि आधिभौतिकरीत्या अशा प्रकारे संवाद साधू शकतात,की ते पाहून बिल गेट्ससुद्धा आश्चर्याने थक्क होईल.काही गोष्टींमध्ये ते मानवाच्या खूपच पुढे आहेत.


वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या विश्वात काही अशा गोष्टी आहेत,ज्यांचे अवलोकन करणे अशक्य आहे.काही गोष्टी अशा असतात,ज्या तुमच्या डोळ्यांसमोर घडतात;पण तरीही तुम्हाला त्यांची कारणमीमांसा सांगता येत नाही.


पुष्कळ वर्षांपूर्वी मी एका शिकाऱ्याला शिकारीचा माग घेताना पाहिले होते.एखाद्या ब्रह्मचारी नरांच्या कळपातले एकुलते एक नर इम्पाला हरीण मारायचा त्याच्याकडे परवाना होता.पण त्या दिवशी त्याला फक्त माद्यांबरोबर फिरणारे नर दिसत होते.आश्चर्यकारक म्हणजे हे शिकार न करता येण्याजोगे नर त्याच्यासमोर अगदी बिनधास्तपणे उभे होते,त्यांना जगात कशाचीही फिकीर नव्हती.मागे ब्रह्मचारी कळपातले नर मात्र जिवाच्या भीतीने पळ काढत होते.हे कसे बरे घडत असेल? आपल्याला ह्याचे उत्तर ठाऊक नाही.आमच्यातले रुक्ष रेंजर ह्याला मर्फीचा नियम म्हणतात-मर्फीच्या नियमानुसार आपल्याबरोबर जे काही वाईट घडणार असेल ते घडतेच.जेव्हा तुम्हाला एखाद्या प्राण्याला भूल द्यायची असेल,तेव्हा ते कधीच सापडत नाहीत. हे थोडेसे गूढ रहस्य आहे.कदाचित वाऱ्याबरोबर त्यांना निरोप पोहोचत असेल.

माझ्या माहितीतल्या एका प्राण्यांचा माग काढणाऱ्या म्हाताऱ्या ट्रॅकरच्या मते,असेच काहीतरी घडते.त्याचे सगळे आयुष्य जंगलात गेले आहे.तो मला सांगत होता की त्याच्या गावातली माकडे जेव्हा फार धीट होऊन अन्न चोरायला लागतात किंवा मुलांना घाबरवायला किंवा चावायला लागतात तेव्हा बहुधा एखाद्या माकडाला गोळी घालून बाकीच्यांना घाबरवायचे ठरवले जाते."पण ही माकडे फार हुशार असतात." तो आपल्या कपाळावर बोटाने टकटक करत म्हणाला,"ज्या क्षणी तुम्ही बंदूक आणायला उठता,तेव्हा ती माकडे तिथून नाहीशी होतात.आम्ही आजकाल मोठ्याने 'बंदूक' किंवा 'माकड' असे शब्दही वापरायचे टाळतो,नाहीतर माकडे जंगलातून बाहेरदेखील येत नाहीत.जेव्हा धोका असतो, तेव्हा त्यांना न ऐकता सुद्धा कळते."


हे खरे आहे.पण थक्क करणारी बाब म्हणजे हे वनस्पतींच्या बाबतीतदेखील खरे आहे. 'थुला थुला'मधला आमचा लॉज हा आमच्या घरापासून साधारण दोन मैल अंतरावर आहे.ह्या लॉजच्या अवतीभवती बाभूळ आणि इतर स्थानिक वृक्षांची गर्दी आहे.जेव्हा एखादे हरीण किंवा जिराफ ह्या झाडांची पाने खातो तेव्हा त्या बाभळीला लगेच कळते,की आपल्यावर हल्ला होतो आहे.आणि मग ते झाड आपल्या पानांमध्ये 'टॅनीन' नावाचे एक द्रव सोडते, ज्यामुळे पानांची चव कडवट होते. मग ते झाड आपल्या

भोवतालच्या वातावरणात एक ठरावीक दुर्गंध सोडते,

ज्यामुळे बाकीच्या बाभळीच्या झाडांना पण धोका लक्षात येतो.मग बाजूच्या झाडांना लगेच तो धोका समजतो आणि ती देखील 'टॅनीन द्रव' निर्माण करायला सुरुवात करतात.आता तसे बघायला गेले तर झाडात काही मेंदू किंवा मज्जासंस्था नसते,मग हे गुंतागुंतीचे निर्णय कोण घेत असेल? अधिक महत्त्वाचे म्हणजे असा निर्णय का घेतला जात असेल? कोणतेही भावनाविरहित असलेले झाड आपल्या शेजाऱ्याच्या सुरक्षिततेबद्दल एवढ्या सगळ्या त्रासांतून का बरे जात असेल? जर मेंदूच नसेल तर त्याला आपले कुटुंब किंवा शेजारी हे सगळे कसे बरे कळत असतील?


सूक्ष्मदर्शकयंत्राखाली बघता प्रत्येक सजीव प्राण्यात केवळ काही रसायने आणि खनिजे एकत्र आलेली दिसतात.पण जे सूक्ष्मदर्शकाखाली दिसत नाही त्याचे काय? सगळ्या जीवित प्राण्यांत दिसणारी जी अमोघ ऊर्जा आहे-जी बाभळीपासून हत्तींपर्यंत सगळ्यांच्यात दिसते ती मोजता येईल का?


माझ्या कळपाने मला शिकवले,की ती ऊर्जा नक्कीच अनुभवता येते.चराचर सृष्टीतल्या प्रत्येक प्राणिमात्रातल्या आत्म्याबद्दलची जाणीव आणि त्याचे औदार्य हत्तींच्या जगात ओसंडून वाहत आहे.हत्ती हे भावनापूर्ण,एकमेकांची काळजी घेणारे आणि अतिशय बुद्धिमान प्राणी आहेत.माणसांबरोबर चांगले संबंध असलेले त्यांना हवे असतात.ही त्यांची गोष्ट आहे.त्यांनी मला शिकवले,की प्रत्येक प्राणिमात्राच्या जगण्याच्या आणि आनंदी राहण्याच्या यात्रेत प्रत्येक आयुष्य अनमोल आहे.आपण,आपले कुटुंब आणि आपली जमात,एवढ्या संकुचित मनोवृत्तीपेक्षा,आयुष्यात बरेच काही अधिक महत्त्वाचे असते.


हत्ती शांत उभे होते,फक्त मधूनमधून कान हलवत स्वतःला जमेल तेवढे थंड करत होते. एखाद्या जाड बाईच्या स्कर्टच्या आकाराएवढे हत्तींचे कान मोठे असतात.त्यामुळे त्यांच्या शरीराचे तापमान थंड राहायला मदत होते. त्यांच्या कानामागच्या त्वचेत त्यांच्या धमन्यांमध्ये कित्येक गॅलन रक्त वाहत असते आणि कान हलवल्यामुळे पंख्यासारखा परिणाम होऊन ते रक्त थंड होते,त्यामुळे शरीराच्या तापमानाचे नियमन होते.



जंगलात काम करणारा कोणीही रेंजर तुम्हाला सांगेल,की ज्या दिवशी तुम्ही एखाद्या गेंड्याला भूल देऊन दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी बाहेर पडाल,त्या दिवशी कितीही शोधले तरी तुम्हाला एकही गेंडा दिसणार नाही. अगदी आदल्या दिवशीच तुम्हाला चहूकडे गेंडे दिसलेले असतील.जणू त्यांना ठाऊक असते की,तुम्ही त्यांच्या मागावर आहात,आणि ते नाहीसे होतात.पुढच्या आठवड्यात तुम्हाला जेव्हा एखाद्या गव्याला भूल द्यायची असेल,तेव्हा तो तुम्हाला न सापडलेला गेंडा तुमच्यासमोर उभा असेल. 


पुस्तकातून वाचता …वाचता …वेचलेले..। 


६/८/२४

आपली किमंत - Your price

न्यूयॉर्कच्या ब्रूक्लीन प्रांतातल्या झोपडपट्टीत मायकेल जॉर्डनचा जन्म झाला त्याला चार बहिणी होत्या आणि त्यांच्या वडिलांची कमाई संपूर्ण कुटुंबासाठी पुरेशी नव्हती.त्यांचे शेजारी पण खूप गरीब होते.तिथल्या वातावरणात मायकेल जॉर्डनला त्याचे भविष्य अंध:कारमय दिसत होते.आत्मचिंतनात हरवलेल्या मायकेलला त्याच्या वडिलांनी पाहिले  आणि त्यांनी त्याच्यासाठी काहीतरी करण्याचा निर्णय घेतला.१३ वर्षाच्या जॉर्डनला वडिलांनी वापरलेल्या जुना एक कपडा दिला आणि त्याला विचारले "हा कपडा किती किमतीचा असेल?"

  

जॉर्डन उत्तरला असेल डॉलरचा वडील म्हणाले,याला तू कुणाला तरी २ डॉलरला विकू शकशील का?"


 हा जर २ डॉलरला विकलास तर आपल्या कुटुंबासाठी ती खूप मोठी मदत होईल.जॉर्डनने डोके खाजवले आणि म्हणाला,मी प्रयत्न करतो पण यशाची खात्री देऊ शकत नाही.जॉर्डनने कपडा स्वछ धुतला,उन्हात वाळवला.

त्याच्याकडे इस्त्री नव्हती,म्हणून त्याने तो कपडा अंथरुणाखाली ठेवला.दुसऱ्या दिवशी एका गर्दीच्या ठिकाणी कपडा विकायला घेऊन गेला.५-६ तासांच्या प्रतीक्षेनंतर एका गिर्हाईकाने तो कपडा जॉर्डन कडून २ डॉलरला विकत घेतला.जॉर्डन आनंदाने धावतच घरी आला. १० -१२ दिवसांनंतर त्याचे वडील म्हणाले, जे कापड तू २ डॉलरला विकलेस त्याला १० डॉलर किम्मत येईल का रे?"


जॉर्डन म्हणाला कसं शक्य आहे? २ डॉलर मिळताना नाकी नऊ आले.वडील म्हणाले प्रयत्न तरी करून बघ.खूप वेळ विचार केल्यानंतर जॉर्डनला आयडिया सुचली.त्याने त्याच्या चुलत भावाच्या मदतीने जुन्या धुतलेल्या कापडावर डोनाल्ड डक आणि मिकी माउस ची चित्रे रंगवली,आणि ज्या शाळेत श्रीमंत मुलं शिकतात अशा शाळेच्या बाहेर शाळा सुटण्याच्या वेळेत जाऊन कपडा विकायला उभा राहिला. 


एका मुलाला ती चित्रे असलेला कपडा खूप आवडला.

त्याने आई जवळ कडून हट्ट करून तो कपडा जॉर्डन कडून १० डॉलरला विकत घेतला. शिवाय आईने जॉर्डनचे कौतुक केले आणि अजून १० डॉलर त्याला टीप दिली. 


२० डॉलर ही मोठी रक्कम होती,जवळ जवळ त्याच्या वडिलांच्या महिन्याच्या पगारा इतकी.जेंव्हा जॉर्डनने वडिलांना २० डॉलर दिले आणि ते त्याला कसे मिळाले याची कहाणी सांगितली तेंव्हा वडील आनंदले आणि अजून एक वापरलेला कापडा त्यांनी जॉर्डनला दिला आणि म्हणाले, हा कपडा तू २०० डॉलरला विकू शकशील का?आता यावेळी जॉर्डनने वडिलांचे चॅलेंज कुठलेही आढेवेढे न घेता आत्मविश्वासाने स्वीकारले. २-३ महिन्यानंतर सुप्रसिद्द चित्रपट  "Charlie's Angels" ची  नायिका Farah Fawcett न्यूयॉर्क मध्ये तिच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आली.प्रेस कॉन्फरन्स नंतर जॉर्डन सुरक्षारक्षकां मार्फततिच्यापर्यंत पोहोचला आणि त्याने तिला कापडावर सही करण्यासाठी विनंती केली.

त्याचा निरपराध चेहरा पाहून तिने लगेचच कापडावर सही केली.आता जॉर्डन मोठमोठ्याने ओरडू लागला, "Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या, Miss Farah Fawcett ने सही केलेले कापड घ्या.थोड्याच वेळात ते कापड त्याने ३०० डॉलरला विकलं.तो जेंव्हा घरी आला आणि सर्व हकीकत वडिलांना सांगितली आणि ३००डॉलर त्यांच्या हातात दिले,तेंव्हा वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले.ते म्हणाले,मला तुझा अभिमान आहे,तू करून दाखवलस.


 रात्री जेंव्हा जॉर्डन वडिलांच्या शेजारी झोपला तेंव्हा वडिलांनी जॉर्डनला विचारले,"बाळा,तीन जुने कपडे विकण्याच्या अनुभवातून तू काय शिकलास? जॉर्डन म्हणाला,जिथे प्रबळ इच्छा असेल तिथे मार्ग नक्की दिसतो.वडिलांनी त्याला घट्ट जवळ घेतले आणि म्हणाले,तू जे सांगतोस ते काही चूक नाही,पण माझा हेतू वेगळा होता.मला तुला दाखवून द्यायचं होतं की,ज्या जुन्या कपड्याची किंमत १ डॉलर सुद्धा नाही त्याची किंमत आपण वाढवू शकतो,तर बोलणाऱ्या,

चालणाऱ्या,विचार करणाऱ्या माणसांचं काय?


आपण काळे सावळे असू किंवा गरीब असू, आपली किंमत पण वाढू शकते.वडिलांच्या या वाक्याने जॉर्डन खूपच प्रभावित झाला.वापरलेल्या जुन्या कापडाला जर मी प्रतिष्ठा देऊ शकतो,तर स्वतःला का नाही? स्वतःला कमी पणा घेण्यात काहीच हित नाही.

त्यानंतर जॉर्डनला वाटू लागलं, की माझं भविष्य खूप सुंदर आणि उज्वल असेल.काही वर्षांनी मायकेल जॉर्डन उत्कृष्ट बास्केटबॉल खेळाडू बनला.


भेट एका वाढदिवसाची...


मी सुचेता.आज माझा वाढदिवस.सचिन सकाळीच म्हणाला,"आज काही करू नकोस,मी लंचला बाहेर घेऊन जातोय तुला एक वेगळीच ट्रीट आहे."लग्नाला दहा वर्षे झालीत,सचिनला मी चांगलीच ओळखते.काहीतरी जगावेगळे अनुभव देण्यात किंवा मजेशीर प्रसंग उभे करण्यात तो माहीर होता.मुले चार वाजल्यानंतर शाळेतून येणार म्हणजे आमची लंच फक्त दोघांचीच असणार होती.दोघेही बारा वाजता बाहेर पडलो.सचिनने गाडी भरधाव सोडली होती.मध्येच विचारात मग्न झाला की गाडी स्लो होत होती.मी मनात समजून गेले की हा आज एक वेगळाच अनुभव किंवा रोमांचक प्रसंग घडवणार.

गाडी एका नवीन मॉलच्या पार्कींग मधे उभी करून आम्ही लिफ्टमधे शिरलो.सचिनने पाचव्या मजल्याचे बटण दाबलेले मी पाहीले.एकदम वरचा मजला.. तिथे तर मल्टीप्लेक्स असणार,क्वीक बाईट्सचे स्टॉल असणार.तिथे काय वाढदिवस करायचा.. 


एवढ्यात पाचवा मजला आला.खाण्यापिण्याचे वेगवेगळे स्टॉल दोन्ही बाजूनी सजले होते.सचिन कुठेही न पहाता भरभर चालत होता.शेवटी एका बंद दारासमोर आलो वर पाटी होती, 


"Dialogue in the dark" आश्चर्यात पडले.

अंधारातील संभाषण ?


खाण्याच्या स्टॉलचे नाव विचित्र वाटले.दार उघडून आत गेलो तर फक्त एक काऊंटर व त्या मागे टाय सूट मधला एक माणूस.टेबल खुर्च्या वगेरे कांहीच दिसत नव्हते आम्हाला पहाताच तो लगबगीने पुढे आला, "वेलकम सचिन सर,हॅप्पी बर्थ डे टू यू मॅडम" याचा अर्थ सचिन अगोदरच याला भेटून सर्व ठरवून आला होता. "सर,मॅडम यु आर अवर स्पेशल गेस्टस टुडे काय घेणार ते ठरवा." त्याने काऊंटर वर नेत आमच्या समोर मेनू कार्ड ठेवले.

सचिनने ते माझ्याकडे सरकवले.मी गोंधळले होते.टेबलवर बसण्या आधीच ऑर्डर द्यायची प्रथा पहिल्यांदाच अनुभवत होते.काहीतरी विचित्र वाटत होते.हसऱ्या मुद्रेने सचिन माझी मजा पहात होता.मी ऑर्डर दिली आणि तो माणूस आम्हाला घेऊन निघाला.

एक दरवाजा उघडला समोर एक छोटासा बोळकंडी सारखा रस्ता दिसला. दोघे किंवा तिघेच जातील एवढाच रुंद.आम्ही त्याच्या मागोमाग निघालो.पहिले वळण आले आणि बाहेरून येणारा उजेड खूपच कमी झाला.त्या पॅसेजमधे दिवे अजिबात नव्हते.आणखी एक दोन वळणांनंतर अंधार खूपच वाढला.मी सचिनचा हात घट्ट पकडून दुसऱ्या हाताने भिंतीला स्पर्शत चाचपडत चालले होते.सचिन माझ्या हातावर थोपटत मला धीर देत होता.

पुढच्या वळणानंतर डोळ्यात बोट घातले तरी दिसणार नाही असा मिट्ट काळोख होता पण हवा मोकळी व थंड येवू लागली होती.बहुदा आम्ही एका हॉलमध्ये पोचलो होतो.


"संपत" त्या माणसाने हाक मारली.


"येस सर," अंधारातच उत्तर आले.कुणीतरी जवळ आल्याची चाहूल लागली.


"हे आपले आजचे स्पेशल गेस्ट,मॅडमचा बर्थडे आहे. गीव्ह देम स्पेशल ट्रीट.ऑर्डर मी घेतलीच आहे.त्याना टेबलवर ने."


"येस सर,"अंधारातच आवाज आला.आता संपत आमचे हात धरून त्या अंधारातून नेत होता.खुर्ची ओढल्याचा आवाज आला त्याने माझा हात खुर्चीच्या पाठीवर ठेवला.तसाच सचिनचाही ठेवला असावा.आम्ही बसलो.मी समोरच्या टेबलवर हात फिरवून अंदाज घेतला.या मिट्ट काळोखात जेवण दिसणार कसे आम्ही जेवणार कसे ही कसली सचिनची जगावेगळी पार्टी असे कितीतरी प्रश्नांचे काहूर मनात उठले होते.असा कधी बर्थडे असतो का?पण त्याच्यावर माझा विश्वास होता.

काहीतरी निश्चित वेगळेपणा जाणवणार व मला अतिशय आश्चर्यात तो टाकणार याची खात्री वाटत होती.


पुढ्यात प्लेटस् मांडल्याचे आवाजावरून समजले.वेटर्सचे येणे जाणे चाहुलीने समजत होते.संपतने हात पकडून दोन्ही डिश कुठे आहेत ते दाखवले.चमचा हातात दिला.

एवढ्यात मागवलेले पदार्थ आल्याचे त्यांच्या घमघमाटाने माहीत पडले."वाढतो" म्हणत संपत एक एक पदार्थ डिश मधे वाढू लागला.सर्व झाल्यावर म्हणाला "मी वाढले आहे.आपल्याला कांही दिसणार नाही पण वास आणि स्पर्शाचा उपयोग करून जेवायची एक वेगळीच मजा येईल व तुम्हाला आनंद देईल याची खात्री देतो."त्या अंधारात मी चाचपडत रोटी तोडली,अंदाजाने एका भाजीत हात घातला पहिला घास तोंडात गेला.मग चार पाच घास असेच अंदाज घेण्यात गेले.डाव्या हाताने मी प्लेट पकडली होती. त्यामुळे प्रत्येक पदार्थाची जागा उजव्या हाताला समजू लागली होती.आणि अहो आश्चर्यम् आता त्या अंधारात देखील जेवण मी सहज जेवू शकत होते. हा आगळा अनुभव पदार्थांची मजा तर देतच होता पण या खेळाचा आगळा आनंद आम्ही दोघे पुरेपूर अनुभवत होतो.सचिन कोणत्या पदार्थाचा घास घेतोय हे मी विचारले की तोही विचारायचा.केव्हा आमचे उत्तर एकच असायचे केव्हा वेगळे असायचे हा खेळ खरच जाम मजा देत होता.त्या मिट्ट काळोखात स्पर्श, वास आणि आवाज हेच काम करत होते. मधुनच संपत भाज्या वाढत होता.आम्हाला त्या संपल्या की आहेत हे समजत नव्हते पण त्याला दिव्य दृष्टी असल्या सारखा तो आमची बडदास्त ठेवत होता,शेवटी स्वीटडिश आली ती मात्र त्याने आमच्या हातात दिली.माझा वाढदिवस, अंधारातील जेवणाचा,तो ही मजा देऊन गेला. कदाचित कँडल लाईट डिनर पेक्षाही मजा आली होती."आपण जाणार असाल तेव्हा सांगा,मी आपल्याला बाहेर घेऊन जाईन."संपतने सांगीतले तसा सचिन म्हणाला,"अरे बिल तर बाहेरच द्यावे लागणार,चल निघू आपण."


संपतने माझी खुर्ची हळुवार सरकवली.माझा हात पकडला.तसाच सचिनचाही पकडला असावा.तो आम्हाला घेऊन सराईता सारखा तो काळोख कापत बाहेर निघाला.पॅसेजमधे आल्याचे सहज समजले.हात आपोआप पॅसेजच्या भिंतीवर गेला.दोन वळणानंतर अंधुक प्रकाश दिसू लागला आणि संपतचा हात सोडून आता आम्ही चालू शकत होतो. 


काउंटरच्या दालनात पोचलो.सचिन बिल देण्यासाठी गेला.आमची काळजी घेणाऱ्या संपतचे आभार मानण्या साठी पाठमोऱ्या संपतला मी हाक मारली.संपत वळला. त्याच्याकडे पहाताच मी जागच्या जागीच थिजले.

संपतच्या डोळ्यांच्या जागी फक्त खाचा होत्या.तो ठार आंधळा होता.


"येस मॅडम,"काय बोलू तेच समजेना.पण सहानभूतीने भरलेले शब्द निघालेच, "संपत या स्थितीतही तू छान आदरातिथ्य केलेस.कायम लक्षात राहील." मॅडम तुम्ही जो अंधार आज अनुभवलात तो आम्हाला रोजचाच आहे. पण आम्ही त्याच्यावर विजय मिळवलाय.


We are not disabled,we are differently able people.We can lead our life without any problem with all joy and happiness as you enjoy."


आम्ही अपंग नाही,आम्ही वेगळे असे सक्षम लोक आहोत.आम्ही आमचे जीवन कोणत्याही समस्येशिवाय सर्व आनंदाने आणि आनंदात जगू शकतो जसे तुम्ही आनंद घेत आहात."


माझ्या सहानुभूतीने भरलेल्या बोलण्याची मलाच लाज वाटली.सहानभुतीची गरज नसलेला एक सशक्त माणूस मला सचिनने भेटवला होता. असा वाढदिवस होणे नाही.सचिन तुझा मला अभिमान वाटतो.सचिन बिल देऊन माझ्याकडे आला.बिल माझ्या हातात दिले.नेहमी सचिनच्या खर्चावर पाळत ठेवणारी मी बिल पहायला गेले तो तळटिपेवर लक्ष गेले. 


We do not accept tips, Please think of donating your eyes, which will bring light to somebody's life.


आम्ही टिप्स स्वीकारत नाही,कृपया तुमचे डोळे दान करण्याचा विचार करा,ज्यामुळे कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश येईल.


एका इंग्लीश मेसेजचा स्वैर अनुवाद आहे.

लेखक - अनामिक

वाचता..वाचता..वेचलेले