* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

२४/८/२५

शोध वेश्यांमधल्या शहाणपणाचा / The search for wisdom among prostitutes

तुम्ही जगाला दुसऱ्याच्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही आणि बदलू शकत नाही. - लीना कोकले


आजार आहे,एवढीच माहिती उपलब्ध होती.तो कसा पसरतो,

कोणाकडून पसरतो,त्याच्यापासून बचाव कसा करायचा,ही साथ ताबडतोब आटोक्यात कशी आणायची,या सगळ्यांबाबत गोंधळलेपण होतं.त्यामुळे समाजात अशा बाधित लोकांना बहिष्कृत जीवन जगायला लावलं जात होतं.त्यामुळेच सर्वप्रथम एड्ससंबंधित माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे,हे

एलिझाबेथ यांनी ओळखलं आणि आपल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांनी या कामात झोकून दिलं - आणि तिथेच एका अर्थाने 'विस्डम ऑफ व्होअर्स'च्या प्रवासालाही सुरुवात झाली.यूगांडासारखे आफ्रिकेतले देश,तसंच इंडोनेशिया आणि आग्नेय आशियाई देशांतील स्त्री वेश्या,पुरुष वेश्या,भाड्याने मिळणारी कोवळी मुलं-मुली,त्यांचे भडवे,त्यांची गिऱ्हाइकं, ड्रग्जचा भूमिगत व्यापार,त्यांना प्रतिबंध करू पाहणारे प्रामाणिक पोलिस आणि इतर अधिकारी,एड्सच्या रुग्णांना आणि अमली पदार्थांच्या व्यसनी लोकांना पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधत अन् त्यांच्याकडून एड्ससंबंधी माहिती खणून काढत एलिझाबेथ यांचं काम सुरू झालं.


त्याशिवाय अलीकडे ज्यांना 'एलजीबीटी' म्हणून ओळखलं जातं त्या समुदायातील व्यक्तींसोबतही या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे,हेही एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं;पण अर्थातच हे काम सोपं नव्हतं. त्या काळी बहुतेक देशांमध्ये समलैंगिक संबंध हा कायद्याने गुन्हा होता.त्यामुळे समलिंगी व्यक्ती उघडपणे समाजात वावरत नसत.तसंच वेश्यांच्या आणि अमली पदार्थांचं सेवन व विक्री करणाऱ्यांच्या जगातही बाहेरच्या व्यक्तीला सहज प्रवेश मिळणं अशक्य होतं. नको त्या चौकशा करणाऱ्या अशा व्यक्तीकडे संशयाने बघितलं जाई आणि भलत्या गोष्टीत नाक खुपसणं हे थेट जिवावर बेतणं होतं.या जगाचे नीतिनियम पूर्ण वेगळे होते.प्रवेश करणं दूरच,पण या पाताळ जगताचे दरवाजे किलकिले करून त्यात डोकावणं हेच एक अवघड काम होतं.पण याच जगाला एड्सचा विळखा पडलेला असल्यामुळे एलिझाबेथ यांच्या दृष्टीने त्या जगात प्रवेश करणं अत्यावश्यक होतं.पण या सर्वांचा विश्वास संपादन करत एलिझाबेथ यांनी इंडोनेशिया, थायलंड,हाँगकाँग,भारत तसंच आफ्रिकेतील काही देशांमध्ये अशा विविध समुदायांसोबत संपर्कच नव्हे,तर मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले.त्यासाठी त्यांनी केलेली भटकंती आणि कष्ट वाचून आपली छाती दडपून जाते.


त्यातली काही उदाहरणं बोलकी आहेत.इंडोनेशियात 'वारिया' नावाचा एक प्रकार असतो.स्त्रैण पुरुष असा त्याचा अर्थ आहे.परालिंगी (ट्रान्सजेंडर) किंवा परावेषधारी (ट्रान्सव्हेस्टाइट) असं त्यांना इतरत्र म्हटलं जातं.'वारिया' हे स्त्रीवेष करून अनेकदा वेश्याव्यवसाय स्वीकारतात.

इंडोनेशियात एचआयव्हीग्रस्तांची संख्या वाढीस लागल्याचं सर्वप्रथम 'वारियां'मुळेच उघड झालं. सर्वप्रथम १९९७ मध्ये झालेल्या सर्वेक्षणात सहा टक्के वारिया एचआयव्ही बाधित असल्याचं उघड झालं.पण पुढे २००० साली जेव्हा पुन्हा सर्वेक्षण केलं गेलं तेव्हा त्यात मात्र या 'वारियां'चा काहीच उल्लेख नव्हता.ही बाब किती गंभीर आणि धोकादायक ठरू शकते याची एलिझाबेथ यांना जाणीव होती.असं का झालं असावं याचा शोध घेण्यासाठी त्यांनी वारियांचीच मदत घेण्याचं ठरवलं.लेन्नी,नॅन्सी,आयनेस या वारियांमुळे एलिझाबेथ यांना त्यांच्या गूढ जगात प्रवेश मिळाला आणि त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळेच सर्वेक्षणातील त्रुटी लक्षात आल्या.माहिती मिळवण्यासाठी एलिझाबेथ जेव्हा या समुदायाची वस्ती असलेल्या ठिकाणी जायच्या तेव्हा तिथे सहज उपलब्ध असणाऱ्या आणि काम नसणाऱ्या वारियांशी किंवा वेश्यांशी त्या बोलायच्या.आयनेस नावाच्या वारियाने यातला फोलपणा त्यांच्या लक्षात आणून दिला.ज्या वारियांकडे कामच नाही ते एड्सबद्दल किंवा सेक्शुअल कॉन्टॅक्टच्या पॅटर्नबद्दल कशी माहिती देणार? माहिती मिळवण्यासाठीदेखील एलिझाबेथ यांना अशा 'शहाणपणा'चा उपयोग झाला.


अशा अनेक घटनांवरून एलिझाबेथ यांना जाणवलं,की योग्य उपाय करण्यासाठी योग्य माहिती हवी,आणि योग्य माहिती मिळवायची असेल तर योग्य माणसांशीच बोलावं लागेल,योग्य तेच प्रश्न विचारावे लागतील आणि उत्तरंही अचूकपणे नोंदवावी लागतील,तरच अशा माहितीच्या आधारे बनवलेले अहवाल पुढील उपाययोजनेसाठी मार्गदर्शक ठरू शकतील.या जगात वावरू लागल्यावर एड्सच्या सर्वेक्षणातल्या तसंच उपायांमधल्या इतरही अनेक त्रुटी समोर येऊ लागल्या. सर्वेक्षणाच्या फॉर्मवर लोकांच्या वर्गीकरणासाठी जे पर्याय उपलब्ध होते ते पुरेसे नसल्याचं एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं.तसंच अनेकदा लोकांना अशा ठराविक वर्गीकरणात बसवणं अवघड असतं हेही कळून चुकलं.अशा अनेक चुकांचा पाढाच एलिझाबेथ यांनी या पुस्तकात मांडला आहे.त्यातून आपल्या यंत्रणेला रोगाच्या नियंत्रणाचं काम करण्याची इच्छा असते की नाही,असा प्रश्न आपल्यापुढे उभा राहतो.दुसरीकडे,बऱ्याचदा अचूक मिळालेल्या माहितीचाही योग्य वापर केला जात नसल्याची खंत एलिझाबेथ या आफ्रिकेच्या उदाहरणासहित व्यक्त करतात.जगातील एकूण एचआयव्हीबाधित लोकांपैकी दोन तृतीयांश लोक आफ्रिकेतील काही मोजक्या देशांत राहतात.या वास्तवाला जबाबदार असणाऱ्या परिस्थितीची चिरफाडही एलिझाबेथ यांनी आपल्या भटकंतीतल्या अनुभवावरून केली आहे.एचआयव्ही हा असुरक्षित लैंगिक संबंधातून होणारा रोग आहे आणि बहुतेक एचआयव्ही

बाधित आफ्रिकेत राहतात,या दोन्हींतील कार्यकारणभाव समजून त्यानुसार उपाययोजना करण्याऐवजी तिथली राजकारणी मंडळी 'वांशिक भेदभावा'चं राजकारण करण्यात गुंग होती,असं एलिझाबेथ म्हणतात. त्यामुळे समस्येला सामोरं जाण्याऐवजी पश्चिमी देश केवळ वंशवादातूनच असे आरोप करत असल्याचा प्रचार करण्यातच तेथील राजकारण्यांनी वेळ वाया घालवला.

त्यामुळे रोगाचा प्रसार कमी होण्याऐवजी वाढतच राहिला,असं त्यांचं म्हणणं.हे म्हणणं त्या ज्या अनुभवांवरून मांडतात ते प्रत्यक्ष पुस्तकातूनच वाचण्याजोगे आहेत.


तळागाळात भटकल्यामुळे रोगाचं मूळ कशात आहे याचं नेमकं भान एलिझाबेथ यांना आलेलं दिसतं. त्यामुळे वर्ल्ड बँकेलाही त्यांची चूक साधार पटवून देण्यास त्या मागेपुढे बघत नाहीत.

एड्सचा प्रसार होण्यास गरिबी आणि स्त्री-पुरुष असमानता या गोष्टी कारणीभूत असल्याचं वर्ल्ड बँकेचं म्हणणं अमान्य करून एड्सच्या प्रसारामागे 'सेक्स आणि ड्रग्ज' हीच दोन मुख्य कारणं आहेत,असं त्या ठासून सांगतात. एलिझाबेथ यांचं आणखी एक निरीक्षण अतिशय महत्त्वाचं आहे.त्या म्हणतात 'जेव्हा जेव्हा संयुक्त राष्ट्र किंवा एखादा धनाढ्य पाश्चिमात्य देश एखाद्या कार्यासाठी आर्थिक मदत जाहीर करतात तेव्हा संबंधित क्षेत्रात कुत्र्याच्या छत्र्यांप्रमाणे सेवाभावी संस्था उगवतात.बहुतेकदा राजकीय व्यक्तींशी साटंलोटं असणाऱ्या संस्था या आर्थिक मदतीचा मलिदा खातात आणि प्रत्यक्षात नियोजित कार्याला काडीभरही हातभार लागत नाही.आग्नेय आशियातले देश किंवा आफ्रिकेतले शासकीय अधिकारी अशा सेवाभावी संस्थांचा उल्लेख अतिशय शिवराळ भाषेत करतात. एलिझाबेथही या संस्थांना 'साखरेला लागलेल्या मुंग्या' असं म्हणतात आणि एड्ससोबत अशा संस्थांच्या नियंत्रणासाठी उपाय सुचवतात.


या सगळ्या चर्चेत पुस्तकाच्या शीर्षकानुसार एड्सवर नियंत्रणासाठी वेश्यांचं शहाणपण काय सांगतं याबद्दलही वाचकांना उत्सुकता असेल.वेश्या,समलिंगी लोक आणि एचआयव्हीबाधित लोक यांनी शिकवलेल्या शहाणपणातून शिकत एलिझाबेथ यांनी एड्सचा प्रसार रोखण्यासाठी काही सोपे उपाय सुचवले आहेत.त्यांच्या मते या उपायांनी एड्सचा प्रसार अगदी सहज थांबवता येऊ शकतो.उदाहरणादाखल सांगायचं,तर वेश्यावस्तीत जागोजागी कंडोम्सची व्हेंडिंग मशिन बसवणं किंवा गरीब वस्तीत कंडोम्स सहज आणि विनामूल्य उपलब्ध करून देणं हा त्यातला मुख्य आणि सोपा उपाय. देहविक्रय करणाऱ्यांना एड्सच्या धोक्याची जाणीव करून देऊन ग्राहकाला कंडोम वापरायला लावण्यास भाग पाडणं हा दुसरा महत्त्वाचा उपाय.पण एड्सचा प्रसार इतक्या सोप्या उपायांनी रोखला जाऊ शकतो हे मान्य झालं तर बहुराष्ट्रीय औषधनिर्मात्यांची पंचाईत होईल,हा मुख्य प्रश्न आहे. दुसरीकडे,एड्सचं भूत जागं ठेवलं तरच त्यांना संशोधनासाठी अनुदान मिळणार असतं.खरं म्हणजे असं अनुदान देणाऱ्या संस्था ही औषधं स्वस्तात उपलब्ध करून देण्याची अट औषध कंपन्यांवर घालत असतात.पण संशोधनाचा खर्च फुगवून सांगून या अटीला बगल दिली जाते,याकडे एलिझाबेथ आपलं लक्ष वेधतात. सरकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या पातळीवर एड्स नियंत्रणासाठी सुरू असलेलं काम हे बऱ्याचदा त्या नियंत्रणात अडथळा ठरत असल्याचं एलिझाबेथ यांनी केलेल्या भटकंतीतून आणि त्यातून काढलेल्या निष्कर्षातून समोर येतं.


... तर अशी ही एलिझाबेथ यांनी एड्सच्या शोधात केलेली भटकंती.एड्सग्रस्तांची माहिती गोळा करत आफ्रिका आणि आग्नेय आशियाच्या तळागाळात फिरताना त्यांना खऱ्या अर्थाने समाजाचं दर्शन झालं. त्यांच्याच शब्दांत सांगायचं, तर 'आय एक्स्प्लोअर्ड द अंडरबेली ऑफ दीज पॉप्युलेशन्स !' त्यांचा हा प्रवास आपल्यालाही डोळस करत जातो. 







२२/८/२५

शोध वेश्यांमधल्या शहाणपणाचा / The search for wisdom among prostitutes


एलिझाबेथ पिसानी

जगभर भटकणारी एलिझाबेझ पिसानी एड्सचा अभ्यास करत असताना वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांना सामोरी गेली.या प्रवासात उमजलेल्या नव्या माहितीच्या आधारे एड्‌सबाबतच्या जागतिक समजाला नवा अर्थ देणाऱ्या या लेखिकेची गोष्ट.

▶ वेश्याव्यवसाय हा जगातला फार मोठा आणि बहुतेक देशांत अवैध मानला जाणारा व्यवसाय. त्यामुळेच या व्यवसायातल्या स्त्रियांचं अनुभवविश्व समाजोपयोगी ठरू शकेल,हा विचार आजवर कुणी केला नव्हता.किंबहुना एलिझाबेथ पिसानी यांनाही हा विचार आपणहून सुचला नव्हता.मग ही कल्पना त्यांच्या डोक्यात कशी आली आणि एड्सचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने वेश्यांचं हे शहाणपण समजून घेण्यासाठी त्यांनी काय उटारेटा केला त्याची हकीकत म्हणजे 'विस्डम ऑफ व्होअर्स' हे पुस्तक.

कोण या एलिझाबेथ पिसानी? एलिझाबेथ यांनी 'संसर्गजन्य रोगांचा प्रसार'या विषयात संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आहे.१९९५ पासून त्या एड्स कसा रोखता येईल यासाठी वर्ल्ड बँक, यूएनएड्स,वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आणि अशाच इतर काही आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने काम करताहेत.चीन,इंडोनेशिया,
द युनायटेड किंग्डम, अमेरिका आणि इतर काही देशांच्या आरोग्य (विशेषतः एड्स प्रतिबंधक) योजनेच्या सल्लागार म्हणून त्या काम करतात.त्यांनी अभिजात चिनी भाषा आणि वैद्यकीय सांख्यिकी (मेडिकल डेमोग्राफी) या विषयांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलाय.हे सगळं करण्याआधी त्या रॉयटर्स,द इकॉनॉमिस्ट आणि एशिया टाइम्सच्या परदेशस्थ वार्ताहर म्हणून जगभर हिंडत असत.अशाच एका भटकंतीत त्या आशियातल्या वेश्यांच्या संपर्कात आल्या.या महिलांशी बोलताना त्यांना एड्सच्या रोगाचा विळखा सर्वप्रथम जाणवला आणि हेही लक्षात आलं,की या वेश्यांकडेच एड्सवर मात करण्याचे अल्पखर्चिक उपाय आहेत.पण आजवर जगाने त्यांच्या या शहाणपणाकडे पुरेसं लक्ष दिलेलं नाही.त्यानंतर सुरू झाला या शहाणपणाकडे जगाचं लक्ष वेधण्यासाठीचा प्रवास.

वडील जगप्रवासाला निघाले होते,तर आई यूरोप भटकायला बाहेर पडली होती.या भटकंतीचा वारसा एलिझाबेथ यांना त्यांच्या आई-वडिलांकडून मिळाला.
त्यांचे भटकंतीतच त्या दोघांची ओळख झाली आणि पुढे त्यांनी लग्नही केलं.त्यामुळे एलिझाबेथ म्हणतात,
'प्रवासाची आवड,अनोळखी व्यक्तींशी गप्पा मारण्याची अन् नव्या ठिकाणाबद्दल माहिती मिळवण्याची आवड माझ्यात आई वडिलांमुळेच निर्माण झाली असावी.मी त्यांचीच मूलगी.त्यामुळे ही मुलगी बहतेकदा घरी नसते.ती कोणत्याही देशात असू शकते.ती जसे देश बदलते तसेच व्यवसायही ! तरीही या मुलीला तिचे आई-वडील सगळ्या उद्योगांमध्ये भक्कम पाठिंबा देतात.' पंधरा वर्षांच्या असताना एलिझाबेथ आपल्या एका मैत्रिणीला भेटायला युरोपहून हाँगकाँगला गेल्या.या मैत्रिणीसोबत त्या हाँगकाँगच्या गल्लीबोळांत हिंडल्या.नाना देशांतून आलेल्या प्रवाशांबरोबर,तसंच वेश्यांबरोबर बिअरबारमध्ये गप्पा मारत त्या हाँगकाँगच्या निशाचर जीवनात रमल्या.पुढे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्या रॉयटर्स न्यूज एजन्सीमध्ये वार्ताहर म्हणून रुजू झाल्या.त्यांना पहिलं पोस्टिंग मिळालं ते हाँगकाँगमध्येच.लोकांमध्ये मिसळून काम करू इच्छिणाऱ्या भटक्या एलिझाबेथ यांच्यासाठी ही नोकरी म्हणजे वरदान होतं.रॉयटर्सची प्रतिनिधी म्हणून काम करताना एलिझाबेथ चीन आणि अति पूर्वेतील अनेक महत्त्वाच्या घडामोडींच्या साक्षीदार ठरल्या.एकीकडे एलिझाबेथ यांनी चीनमधील वेश्यावस्त्यांना भेट देऊन त्यांची दुःखं जगासमोर आणण्याचं काम केलं,तर दुसरीकडे बाली बेटात ओरांग उटांच्या संवर्धनासाठी चाललेल्या प्रयत्नांना सुरुंग लावणाऱ्या चोरट्या शिकाऱ्यांच्या कारवाया उघड केल्या.कंबोडियातला हुकुमशहा पॉल पॉट याच्या माणुसकीला काळिमा फासणाऱ्या कृत्यांचं वार्तांकनही त्यांनी या काळात केलं.

दहा हजार कवट्यांच्या ढिगांबद्दल सहाशे शब्दांत लिहून ते सगळं विसरून जायचं आणि पुढच्या घटनेचं वार्तांकन करायचं याचा त्यांना वीट आला.यातून पुढे काय साध्य होणार,हा प्रश्न सतावू लागला. या कामातली निरर्थकता जाणवू लागली.

याच काळात भारत,चीन,इंडोनेशिया,हाँगकाँग या देशांमधून भटकताना वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणारे विविध प्रश्न त्यांना जाणवू लागले. लोकसंख्या नियंत्रण,त्यामागचं राजकारण,वाढता वेश्याव्यवसाय;
अफू,गांजा आणि रासायनिक अमली पदार्थांचा वाढता प्रसार;धर्माचा कुटुंबनियोजनाला होणारा विरोध;खऱ्या-खोट्या नसबंदी शस्त्रक्रिया जागोजाग भरवली जाणारी कुटुंबनियोजन उपचार शिबिरं असं बरंच काही त्यांनी जवळून अभ्यासलं.याच काळात पत्रकारितेच्या पुढे जाऊन रोगप्रसार आणि नियंत्रण या विषयात एलिझाबेथ यांना रस वाटू लागला. 

लोकसंख्यावाढीवरच रोगप्रसाराचं आणि इतरही अनेक प्रश्नांचं भवितव्य अवलंबून असल्याचं त्यांना जाणवू लागलं होतं.त्यामुळे त्यांनी 'द लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन'मध्ये 'वैद्यकीय जनसांख्यिकी'च्या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला.(अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या,हटके,भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन ) या संस्थेमध्ये शिकत असतानाचा एक किस्सा एलिझाबेथ यांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरंच काही सांगून जातो.पुढे एड्सच्या नियंत्रणसाठी त्यांनी जे काम केलं त्याची मुळं त्यांच्या या वृत्तीत दिसून येतात.संस्थेतलं पहिलं व्याख्यान वैद्यकीय सांख्यिकीच्या वेगवेगळ्या पद्धतींच्या माहितीबद्दल होतं.ते संपल्यावर व्याख्यात्याने प्रश्न केला : "धूम्रपान आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांचा संबंध प्रस्थापित करणारं सर्वेक्षण पार पडल्यानंतरही धूम्रपान आणि फुफ्फुसांचा कर्करोग यांचा संबंध आहे,ही सूचना सिगरेटच्या पाकिटावर छापावी,हा निर्णय घ्यायला अमेरिकेच्या सर्जन जनरलने चौदा वर्ष का लावली?" त्यावर एलिझाबेथ म्हणाल्या, "हा प्रश्नच मुळी चुकीचा आहे.कळीचा प्रश्न हा आहे,की ब्रिटिश-अमेरिकी तंबाखू उत्पादकांनी आणि तंबाखूजन्य पदार्थ निर्मात्यांनी गेल्या चौदा वर्षांत अमेरिकी सिनेटच्या निवडणुकांमध्ये किती पैसा गुंतवला?" समस्येच्या मुळाशी जाण्याची आणि त्या समस्येशी जोडले गेलेले अनेक अदृश्य हितसंबंध समजून घेण्याची हीच क्षमता एलिझाबेथ यांना पुढे एड्सवर काम करताना उपयोगी पडली.एलिझाबेथ यांनी हा शिक्षणक्रम पूर्ण केला,तोपर्यंत वैद्यकीय सांख्यिकी क्षेत्रात दोन गट पडले होते.एक परंपरावादी,तर दुसरा चळवळ्या गट.परंपरावादी गटाचं म्हणणं, आपले निष्कर्ष योग्य त्या अधिकारी व्यक्तीकडे सोपवा.मग पुढे त्याचं काय होतं यात लक्ष घालायचं कारण नाही.दुसरा गट म्हणत होता, एखाद्या प्रश्नाचा निष्कर्ष काढून झाल्यावरही त्या प्रश्नाचा मागोवा घेत रहा;तो निष्कर्ष एखादी समाजविघातक बाब प्रकट करणारा असेल तर त्या बाबीवर बंदी येईपर्यंत लढत रहा.एलिझाबेथ यांना या दुसऱ्या गटाचं म्हणणं खुणावत होतं.याच सुमारास 'लंडन स्कूल ऑफ हायजिन'च्या अभ्यासक्रमात एड्स या विषयाचा समावेश झाला. खरं तर १९८० नंतरच्या दशकातच एड्सबद्दल चर्चा सुरू झाली होती.हळूहळू त्या रोगाचा आणि लैंगिक संबंधांचा परस्परसंबंध स्पष्ट होऊ लागला.तसंच इंजेक्शनच्या साहाय्याने अमली पदार्थ टोचून घेणाऱ्या व्यक्तींमध्येही एड्सचा प्रसार होतो,हेही उघड होऊ लागलं.हा विषय अभ्यासक्रमात येताच एलिझाबेथ यांनी त्याची विशेष विषय म्हणून निवड केली आणि पुढे तोच विषय त्यांचं जीवितध्येय बनलं.त्यानंतरची म्हणजे १९९६ नंतरची त्यांची भटकंती ही एड्स प्रसार आणि त्याला आळा घालण्याचे उपाय यांच्या अभ्यासासाठीच झालेली दिसते.त्या काळात अजूनही एड्सच्या संशोधनात फारशी प्रगती झालेली नव्हती.फक्त तो विषाणुजन्य
आजार आहे,एवढीच माहिती उपलब्ध होती. 

तो कसा पसरतो,कोणाकडून पसरतो, त्याच्यापासून बचाव कसा करायचा,ही साथ ताबडतोब आटोक्यात कशीआणायची,या सगळ्यांबाबत गोंधळलेपण होतं.
त्यामुळे समाजात अशा बाधित लोकांना बहिष्कृत जीवन जगायला लावलं जात होतं.त्यामुळेच सर्वप्रथम एड्ससंबंधित माहिती गोळा करणं महत्त्वाचं आहे,हे एलिझाबेथ यांनी ओळखलं आणि आपल्या काही सहकाऱ्यांसोबत त्यांनी या कामात झोकून दिलं- आणि तिथेच एका अर्थाने 'विस्डम ऑफ व्होअर्स'च्या प्रवासालाही सुरुवात झाली.युगांडासारखे आफ्रिकेतले देश, तसंच इंडोनेशिया आणि आग्नेय आशियाई देशांतील स्त्री वेश्या,पुरुष वेश्या,भाड्याने मिळणारी कोवळी मुलं-मुली,त्यांचे भडवे,त्यांची गिऱ्हाइकं, ड्रग्जचा भूमिगत व्यापार,त्यांना प्रतिबंध करू पाहणारे प्रामाणिक पोलिस आणि इतर अधिकारी, एड्सच्या रुग्णांना आणि अमली पदार्थांच्या व्यसनी लोकांना पुन्हा सरळ मार्गावर आणण्याचा प्रयत्न करणारे कार्यकर्ते यांच्याशी संपर्क साधत अन् त्यांच्याकडून एड्ससंबंधी माहिती खणून काढत एलिझाबेथ यांचं काम सुरू झालं.त्याशिवाय अलीकडे ज्यांना 'एलजीबीटी' म्हणून ओळखलं जातं त्या समुदायातील व्यक्तींसोबतही या विषयावर चर्चा करण्याची गरज आहे, हेही एलिझाबेथ यांच्या लक्षात आलं;पण अर्थातच हे काम सोपं नव्हतं.

संपुर्ण…उर्वरित…पुढील भागात.‌..!!

२०/८/२५

स्वागत असे स्विकारा /Accept as welcome

या पत्रांवर आम्हा दीडशे विद्यार्थ्यांच्या सह्या होत्या.नंतर आमच्या लक्षात आले की,लेखकमंडळी त्यांच्या कामात खूप व्यग्र असतात,

त्यामुळे व्याख्यान तयार करण्यात त्यांचा खूप वेळ जाईल म्हणून आम्ही त्यांच्या कामाच्या पद्धतीवरील प्रश्न असणारी एक प्रश्नावली तयार केली व ती प्रत्येक पत्रासोबत पाठवली.


त्या सगळ्या लेखकांनाही पद्धत आवडली.यामुळे ते सर्वच लेखक खूप प्रभावित झाले आणि आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला.


थिओडर रूझवेल्टच्या मंत्रिमंडळात खजिनदार म्हणून कार्यरत असलेला सचिव लेस्की शॉयाचे मन हीच पद्धत वापरून मी वळवले,तसेच अ‍ॅटर्नी जनरल ब्रायन,फ्रँकलिन रूझवेल्ट वगैरेसारख्या मान्यवर लोकांनाही भाषणाला बोलावले आणि अर्थात ही पद्धत वापरून मी माझ्या जाहीर भाषण कलेच्या कोर्ससाठीही अशा अनेक मोठमोठ्या लोकांना विद्यार्थ्यांशी बोलायला बोलावले.आपले कौतुक करणारी माणसे आपल्यापैकी सगळ्यांनाच मग ते कारखान्यात काम करणारे कामगार असोत,

ऑफिसमध्ये काम करणारे कारकून असोत किंवा अगदी सिंहासनावर बसलेला राजा असू दे सगळ्यांनाच आवडतात.जर्मन कैसरचेच उदाहरण घ्यायचे झाले,तर पहिले महायुद्ध संपण्याच्या सुमारास कैसर हा संपूर्ण जगाच्या दृष्टीने अत्यंत निर्दयी आणि तिरस्करणीय माणूस होता.त्याचा देशसुद्धा त्याच्या विरोधात होता.स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो हॉलंडला पळून गेला.

त्याच्याबद्दल लोकांच्या मनात इतका संताप खदखदत होता की,शक्य असते,तर लोकांनी त्याला उभा चिरला असता आणि जाळून टाकला असता.या सगळ्या रणधुमाळीमध्ये एका छोट्या मुलाने कैसरला एक अतिशय साधे;पण मनापासून आणि कुठलाही हेतू मनात न बाळगता पत्र लिहिले.त्या पत्रात कैसरबद्दल आदर व कौतुक ओतप्रोत भरलेले होते.त्यात लिहिले होते की,लोकांना काहीही वाटले, तरी माझ्या राजावर मी नेहमीच प्रेम करीत राहीन.या पत्रामुळे कैसर अंतर्बाह्य हेलावला व त्याने त्या छोट्या मुलाला भेटीसाठी निमंत्रण पाठवले.तो मुलगा आईबरोबर आला आणि कैसरने त्या मुलाच्या आईबरोबर लग्न केले.तुम्हाला काय वाटते,त्या छोट्या मुलाने कधी हाउ टू विन फ्रेंड्स पुस्तक वाचले असेल का? त्याला हे त्याच्या अंतर्मनातून समजले !


लोकांसाठी काही तरी करून,त्यांच्यासाठी झीज सोसून आपण मित्र जोडू शकतो.वेळ,ऊर्जा,निःस्वार्थी भाव आणि वैचारिक प्रगल्भतेच्या मदतीने तुम्ही लोकांशी जिव्हाळ्याचे नाते जोडू शकता.प्रिन्स ऑफ वेल्स असताना ड्युक ऑफ विंडसरने दक्षिण अमेरिकेला जाण्याचा बेत केला.जाण्यापूर्वी काही महिने आधी खूप मेहनतीने स्पॅनिश भाषा शिकण्याचा त्याने प्रयत्न केला, कारण त्याला तेथे स्पॅनिश भाषेमध्ये भाषण करायचे होते आणि असे केल्यामुळे दक्षिण अमेरिकेतील लोकांचा तो खूप लाडका झाला.


गेली काही वर्षे मी माझ्या मित्रमंडळींच्या वाढदिवसाच्या तारखा नोंदवून घेतो.हे मी कसे करतो? माझा ज्योतिषशास्त्रावर खरेतर अजिबात विश्वास नसला तरीही मी समोरच्या माणसाला विचारतो की, 'जन्मतारखेशी माणसाच्या स्वभावाचा काही संबंध आहे,हे तुला पटते का?' मग पुढे मी विचारतो की,तुझा जन्मदिवस आणि महिना सांगशील का? मग जर उत्तर आले की,'नोव्हेंबर २४' तर मग मी ते लक्षात ठेवून टिपून घेतो.प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला मी माझ्या कॅलेंडरवर त्या तारखांपुढे नावे लिहून ठेवतो,त्यामुळे आपोआपच त्या-त्या व्यक्तीचा वाढदिवस माझ्या लक्षात राहतो.

मला विसर पडत नाही आणि मग नाताळचा दिवस येतो तेव्हा माझ्यावरही शुभेच्छांचा वर्षावच होतो. मला कोणीच विसरू शकत नाही.जर आपल्याला मित्र जोडायचे असतील,तर आपण लोकांशी खूप उत्साहाने व चैतन्याने बोलले पाहिजे.


जेव्हा तुम्हाला कोणी फोन करते तेव्हा हेच मानसशास्त्र वापरले पाहिजे.तुमचा 'हॅलो' उच्चार असा पाहिजे ज्यामुळे समोरच्याला हे जाणवेल की,तुम्हाला त्याच्या फोनमुळे किती आनंद झाला आहे.अनेक कंपन्यांच्या टेलिफोन ऑपरेटरला चैतन्यपूर्ण आणि मार्दवाने बोलण्यासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.त्या टेलिफोन ऑपरेटरशी बोलल्यावर ग्राहकाला असे वाटले पाहिजे;नव्हे त्याची खात्री पटली पाहिजे की,या कंपनीला आपल्याबद्दल आत्मीयता वाटते.उद्या फोनवर बोलताना आपण हे नक्कीच लक्षात ठेवू.


समोरच्यामध्ये प्रामाणिकपणे रुची दाखवली,तर तुम्हाला फक्त मित्रच मिळतात,असे नव्हे,तर तुमच्या कंपनीला निष्ठावान ग्राहकसुद्धा मिळतात. न्यू यॉर्कमधील नॅशनल बँकेने प्रसिद्ध केलेल्या अंकात,मॅडोलिन रोझडेल नावाच्या एका ठेवीदाराने पुढील पत्र प्रकाशित केले.


'मला तुम्हाला हे मनापासून सांगावेसे वाटते की,मी तुमच्या स्टाफचे खूप कौतुक करते.प्रत्येक जण अगदी अदबीने वागतो आणि मदतीला सदैव तत्पर असतो. रांगेत खूप वेळ उभे राहिल्यानंतर कर्मचाऱ्यांकडून इतकी प्रेमळ वागणूक मिळणे खरोखरच किती आनंददायी असते.गेल्या वर्षी माझी आई हॉस्पिटलमध्ये पाच महिने अ‍ॅडमिट होती,तेव्हा वारंवार मला बँकेत यावे लागत असे.मी बऱ्याचदा मेरी पेट्रसेलोकडे जात असे.ती आत्मीयतेने माझ्या आईच्या तब्येतीची चौकशी करत असे.' मिसेस रोझडेल कधी तरी या बँकेपासून लांब जाईल का? तुम्हाला काय वाटते ?


एका कार्पोरेशनचा गुप्त अहवाल तयार करण्याची कामगिरी न्यू यॉर्क शहरातील एका मोठ्या बँकेतील कर्मचारी चार्ल्स आर.

वॉल्टर्सवर सोपवली होती. याबद्दलची अचूक माहिती देऊ शकणारा फक्त एकच माणूस त्याला माहिती होता.वॉल्टर्सकडे खूप कमी वेळ होता.त्या माणसाने मि.वॉल्टर्सला प्रेसिडेंटच्या ऑफिसमध्ये नेऊन बसवले.नेमकी त्याचवेळी एक तरुण स्त्री आत डोकावली व तिने प्रेसिडेंटला सांगितले की, त्या दिवशी त्याला द्यायला तिच्याकडे तिकिटे नव्हती.


"मी माझ्या बारा वर्षांच्या मुलासाठी तिकिटे गोळा करत आहे," प्रेसिडेंटने मि.वॉल्टर्सला खुलासा केला.


मग मि.वॉल्टर्सने त्याच्यावर सोपवलेल्या कामाबद्दल सांगितले आणि तो प्रेसिडेंटला प्रश्न विचारू लागला. मात्र,प्रेसिडेंट अगदीच थातूरमातूर उत्तरे देत होता. त्याची उत्तरे अगदीच सर्वसामान्य व अस्पष्ट होती. त्याला काही बोलायची इच्छा नव्हती.आणि स्पष्ट दिसत होते की,तो कशानेच बधणार नव्हता. मुलाखत अत्यंत अपुरी व निष्फळ ठरली.


मि.वॉल्टर्स म्हणाले की,मी आता हताश झालो होतो; पण मग मला त्याचा बारा वर्षांचा मुलगा... त्यासाठी हवे असलेले स्टॅम्प्स... हे सगळे आठवले.आमच्या परदेश विभागाकडे होणाऱ्या पत्रव्यवहारामुळे आमच्याकडे अनेक वेगवेगळे स्टॅम्प्स होते;अगदी सातासमुद्रापलीकडचे !


दुसऱ्या दिवशी मी पुन्हा प्रेसिडेंटशी संपर्क करून त्याला सांगितले की,माझ्याकडे त्याच्या मुलाला हवी असणारी अनेक तिकिटे आहेत.मग मात्र त्याची वागणूक एकदम बदलून गेली.'माझ्या जॉर्जला हे खूप आवडेल,'असे म्हणत त्याने माझ्या हातातून तिकिटे लगबगीने घेतली व म्हणाला की,केवढा मोठा खजिनाच जणू माझ्या हाती लागला आहे! आम्ही सुमारे अर्धा तास फक्त तिकिटांबद्दलच बोललो.मी मुलाचे फोटोही पाहिले आणि मग मात्र एक तास त्याने मला हवी असलेली माहिती देण्यात खर्च केला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या वेळी मी त्याला तसे करण्याबद्दल एकदाही सुचवले नाही.त्याला माहिती असणाऱ्या सगळ्या गोष्टी त्याने मला स्वतःहून सांगितल्या.त्याच्या काही साहाय्यकांशी बोलून अजूनही काही माहिती त्याने अहवाल,

आकडेमोडीचे पेपर्स,पत्रव्यवहार या सगळ्या पुराव्यांनिशी माझ्या हाती सोपवली.मला जणू खूप मोठे घबाडच मिळाले होते !


आणखी एक उदाहरण बघा.


फिलाडेल्फियामधील एक गृहस्थ सी. एम. नाफळे आमच्या क्लासमध्ये दाखल झाले होते.ते एका फार मोठ्या संस्थेला इंधन पुरवण्याचे कंत्राट मिळवण्याच्या प्रयत्नात अनेक वर्षांपासून होते;पण ती संस्था नेहमीच त्यांना हुलकावण्या देऊन दुसऱ्या शहरातून इंधन खरेदी करत होती.एकेदिवशी रात्री क्लासमध्ये नाफळे यांच्या मनातील संताप बाहेर पडला व त्यांनी दुकानांच्या साखळी-पद्धतीला खूप शिव्या घातल्या व या संस्था म्हणजे देशाला कलंक आहे वगैरे वगैरे सांगितले;पण तरीही एका गोष्टीचे त्यांना आश्चर्य वाटत होते की,तो त्यांना इंधन का विकू शकत नव्हता? मग मी त्यांना सुचवले की,आता आपण काही वेगळ्या युक्त्या वापरून पाहू.त्यानुसार आम्ही स्टेजवर एक वादविवाद स्पर्धा घेतली.फक्त कोर्समधील विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या त्या स्पर्धेचा विषय होता, जगभर पसरलेली दुकानांची साखळीपद्धत देशासाठी विधायक आहे की विघातक ?


मी नाफळे यांना नकारात्मक बाजू मांडायला सांगितले आणि मग ते सरळ दुकानांच्या साखळी पद्धतीच्या संस्थेच्या उच्च अधिकाऱ्यांकडे गेले.त्यांना म्हणाले की,आज मी तुमच्याकडे इंधन विकायला आलेलो नाही;पण मला तुमची जरा मदत हवी आहे.मग त्यांनी त्यांच्या वादविवाद स्पर्धेबद्दल सांगितले आणि तुमच्याशिवाय अधिक चांगले माहीतगार कोण असू शकेल? मलाही वादविवाद स्पर्धा जिंकायची आहे आणि जर तुम्ही मला मदत केलीत,तर मी तुमचा शतशः ऋणी राहीन असे सांगितले.


मि. नाफळेच्या तोंडून पुढची गोष्ट ऐका -


"मी त्या माणसाला मला फक्त एक मिनिट वेळ दे असे विनवले.मग तो मला भेटणार एवढेच फक्त निश्चित झाले.जेव्हा मी त्याला माझे म्हणणे सांगितले,तेव्हा तो माझ्याशी एक तास सत्तेचाळीस मिनिटे बोलला.नंतर त्याने आणखी एका उच्च पदस्थाला बोलावले,ज्याने दुकानांच्या साखळी-पद्धतीवर पुस्तक लिहिले होते. नंतर त्या अधिकाऱ्याने लगेचच 'नॅशनल चेन स्टोअर असोसिएशन'ला पत्र लिहिले व त्या पुस्तकाची एक कॉपी माझ्या स्पर्धेच्या तयारीला मदत होण्याच्या दृष्टीने पाठवायला सांगितली.त्याच्या मते दुकानांची साखळी पद्धत म्हणजे मानवतेच्या दृष्टिकोनातून निष्काम सेवाभावी पद्धत होती आणि त्याला या कार्याबद्दल ज्वलंत अभिमान होता.

बोलताना ते तेज त्याच्या डोळ्यांमधून ओसंडून वाहत होते आणि त्यामुळे माझेही डोळे चांगलेच उघडले.कारण मी चेनस्टोअरकडे या दृष्टिकोनातून कधीच पाहिले नव्हते.त्या अधिकाऱ्याने माझा संपूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकला.


जेव्हा मी जायला निघालो,तेव्हा त्याने मला स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आणि स्पर्धेच्या निकालाबाबत उत्सुकता दाखवली.जाता जाता तो म्हणाला की,आता तू मार्च महिन्यात मला भेट.कारण त्या वेळी मी तुला इंधनाची ऑर्डर देऊ शकेन.माझ्यासाठी हा एक चमत्कार होता. ज्या दिवशी एका शब्दानेही मला ऑर्डर देण्याविषयी मी त्याला सुचवले नव्हते,त्या दिवशी त्याने मला ऑर्डर देण्याबद्दल सांगितले.मी त्याच्यामध्ये,त्याच्या कामामध्ये जेव्हा प्रामाणिक स्वारस्य दाखवले,त्याच्यासमोरील समस्यांची आपुलकीने दखल घेतली,तेव्हाच त्याने माझ्यामध्ये व माझ्या उत्पादनांमध्ये स्वारस्य दाखवले."


मि.नाफळे, तुम्ही सांगितलेली गोष्ट नवी नाही.प्रसिद्ध रोमनकवी सायरस याने पुढील विधान लिहून ठेवले आहे,'आपण इतरांमध्ये रुची दाखवतो,तेव्हा इतर लोक आपल्यात रुची दाखवतात.'अत्यंत प्रामाणिकपणे दुसऱ्यांच्या सुख-दुःखात स्वारस्य दाखवणे हे मानवी नात्यांच्या संदर्भात खूप हितकारी आहे आणि त्यामुळे त्या दोन व्यक्तींचा फायदाच होत असतो.


मार्टीन गिन्सबर्ग न्यू यॉर्कमधील लाँग आयलंड येथे राहत होता.

आमच्या कोर्समध्ये त्याने त्याच्या आयुष्यावर एका नर्सचा खोलवर प्रभाव कसा पडला व त्यामुळे तिने त्याच्यामध्ये विशेष रस कसा दाखवला त्याची गोष्ट सांगितली त्या दिवशी 'थैंक्स गिव्हिंग डे' होता.दहा वर्षांचा मी शहरातील एका हॉस्पिटलमध्ये बिछान्यावर पडून होतो.माझ्यावर दुसऱ्या दिवशी मोठी शस्त्रक्रिया होणार होती.आता पुढचे दोन महिने वेदनेने विव्हळत मला बिछान्यावरच पडून राहावे लागणार होते,याची जाणीव मला अस्वस्थ करत होती ! माझे वडील पूर्वीच वारले होते.माझी आई आणि मी एका छोट्या घरात राहत होतो आणि लोकांच्या दयेवर जगत होतो.माझी आई त्या दिवशी मला भेटायला येऊ शकणार नव्हती.


जसजसा दिवस पुढे सरकू लागला तसतसे मला खूप एकाकी,

निराश वाटू लागले.मला खूप भीती वाटत होती. माझी आई एकटीच घरी काळजी करत बसली असणार.तिच्याबरोबर जेवायला कोणी नसणार आणि तिच्याकडे तेवढे पैसेपण नव्हते की,तिला 'थैंक्स गिव्हिंग डे'ला जेवण बाहेर घेणे परवडले असते,हे विचार मला छळत होते.माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू जमा झाले.ते दिसू नये म्हणून मी उशीत डोके खुपसले आणि माझ्या अश्रूना मोकळी वाट करून दिली.मी मूकपणे रडत होतो;पण त्यामुळेच माझ्या वेदना असह्य झाल्या होत्या.


हे सगळे दुरून पाहणारी एक तरुण शिकाऊ नर्स माझ्याजवळ आली.तिने मला सांगितले की,तीसुद्धा माझ्यासारखीच एकाकी होती,कारण तिला दिवसभर काम करायचे होते,त्यामुळे तीसुद्धा घरी जाऊ शकत नव्हती,मग तिने मला विचारले की,आपण दोघांनी जेवण बरोबर घ्यायचे का? मग तिने जेवण आणले. त्यामध्ये टर्कीच्या स्लाइसेस,कुस्करलेला बटाटा, कॅनबेरी सॉस,

आइस्क्रीम आणि आणखीही काही गोड पदार्थ होते.ती माझ्याशी बोलत राहिली आणि माझी भीती,एकाकीपणा पळून गेला.खरेतर तिची ड्युटी दुपारी चार वाजता संपत होती;पण ती माझ्यासाठी रात्री अकरा वाजेपर्यंत थांबून राहिली.आम्ही काही वेळ खेळलो. शेवटी मला झोप लागल्यावरच ती गेली.


कित्येक 'थैंक्स-गिव्हींग डेज' आले आणि गेले;पण प्रत्येक थैंक्स-गिव्हींग डेला मला तोच दिवस आठवतो. मला स्पष्ट आठवतंय... किती भयभीत निराश आणि एकाकी वाटत होतं मला त्या दिवशी ! पण एका अनोळखी माणसानं मला प्रेम आणि आपलेपणा दिला.म्हणूनच मी सर्व काही सहन करण्यासाठी तयार झालो.इतरांनी तुम्हाला मदत करावी असं वाटतं का? आपल्यावर निर्व्याज प्रेम करणारे मित्र असावेत असं वाटतं का? आपणही इतरांच्या उपयोगी पडावं असं तुम्हाला वाटतं का? मग,या सिद्धान्ताचा नेहमी उपयोग करा. इतरांमध्ये नेहमी रस घ्या….!!


संपुर्ण….!!

१८/८/२५

स्वागत असे स्विकारा /Accept as welcome

पुस्तके वाचून मित्र जोडता येत नसतात.ही कौशल्ये तुम्हाला सहज शिकवणारा एक जगन्मित्र तुमच्या आजूबाजूलाच वावरत असतो,

अगदी रस्त्यावरही तो तुम्हाला भेटू शकतो.तुमच्याकडे शेपटी हलवत येऊन, आनंदाने उड्या मारून तो तुम्ही त्याला किती आवडता हे दाखवून देईल.हे सारे तो मनात कोणताही वाईट हेतू ठेवून करत नसतो.त्याला तुमच्याशी लग्नही करायचे नसते किंवा त्याची जागा तुम्ही विकत घ्यावी असेही त्याला वाटत नसते.ज्याला स्वतःसाठी काम करावे लागत नाही, असा कुत्रा हा एकमेव पाळीव प्राणी आहे.कोंबडी,गाय, कॅनरी पक्षी या तिघांनाही अनुक्रमे अंडी द्यावी लागतात, दूध द्यावे लागते,गावे लागते;पण कुत्रा माणसाळतो आणि माणसांना प्रेम देऊन जगतो.प्रेमाशिवाय त्याला दुसरे काही करावे लागत नाही..(स्वागत स्वीकारण्यासाठी हे करा.!मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,मंजुल प्रकाशन) 


माझ्या वडिलांनी एकदा पिवळ्या रंगाच्या केसांचे कुत्र्याचे छोटे पिल्लू पन्नास सेंट्सना आणले.त्याचे नाव आम्ही 'टीपी' ठेवले.मी तेव्हा पाच वर्षांचा होतो.माझे लहानपण त्याच्यामुळे अत्यंत आनंदात गेले.रोज दुपारी साडेचार वाजता तो दारात रस्त्याकडे बघत माझी वाट पाहायचा आणि माझा आवाज ऐकताच उत्साहाने उड्या मारायचा.तो पाय हवेत उचलून गिरकी घ्यायचा, माझ्या अंगावर चढायचा आणि अत्यानंदाने ओरडायचा!


टीपी माझा जिवाभावाचा सखा होता;पण एके रात्री घडलेली ती दुर्घटना मी कधीच विसरणार नाही. माझ्यापासून अवघ्या दहा फुटांवर असताना अंगावर वीज पडून तो मेला.टीपीच्या अकस्मात मृत्यूमुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो ! टीपीने कधीच सायकॉलॉजीचे गाइड वाचले नसेल;पण केवळ दोन महिन्यांत इतर लोकांमध्ये रस दाखवून तो अनेक मित्र जोडू शकत होता;त्याला तशी दैवी देणगी मिळाली होती बहुधा !


माणसांना यासाठी दोन महिने नाही,दोन वर्षेही अपुरी पडतात.

लोकांना आपल्याबद्दल कुतूहल वाटावे,त्यांनी आपल्यामध्ये रस घ्यावा,असे वाटणारे अनेक लोक आपल्या आवतीभोवती असतात.जे संपूर्ण आयुष्यभर अविचाराने वागतात आणि तरीही अशी इच्छा बाळगून घोडचूक करतात.माणूस हा सदैव,तिन्ही त्रिकाळ स्वतःमध्ये रस घेणारा प्राणी आहे.


न्यू यॉर्क टेलिफोन कंपनीने टेलिफोनवरील संभाषणांचा सर्व्हे केला आणि सखोल संशोधन केले.जेव्हा त्याचा निष्कर्ष हातात आला,तेव्हा तो काहीसा असा होता, संभाषणात सतत वापरला जाणारा शब्द हा प्रथम पुरुषी एकवचन म्हणजे 'मी' हा होता.'मी' हा शब्द टेलिफोनवरील रेकॉर्ड संभाषणांमध्ये ३९०० वेळा वापरण्यात आलेला आढळून आला.ग्रुप फोटोमध्ये दुसऱ्यांचे फोटो आधी शोधणारी माणसे क्वचितच आढळतात.तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा त्यामध्ये आधी काय शोधता ? स्वतःचाच चेहरा ना?तुम्हाला इमानदार मित्र मिळवायचे असतील,तर लोकांनी तुमच्यात इंटरेस्ट घ्यावा या हेतूने त्यांच्यावर छाप टाकायचा प्रयत्न बंद करा.नेपोलियन हा याचे उत्तम उदाहरण.शेवटच्या भेटीत तो जोसेफाईला म्हणाला, 


"जोसेफाई, मी या पृथ्वीवरचा सर्वाधिक भाग्यशाली माणूस आहे.कारण या क्षणाला तुझ्याशिवाय असे कोणीच नाही,

ज्याच्यावर मी विश्वास टाकू शकतो," तरीही इतिहासकारांना अजूनही असा संशय आहे की, नेपोलियनने जोसेफाईवर खरेच विश्वास ठेवला होता की नाही!


व्हिएन्नामधला एक थोर मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड अ‍ॅडलर याचे 'व्हॉट लाइफ गुड मिन टू यू' हे पुस्तक प्रसिद्ध आहे.त्यात तो म्हणतो,'ज्या व्यक्तीला आपल्याशी सहकार्य करण्यामध्ये रस नाही,तिला या जगात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि अशा माणसांमुळेच अपयश पदरी पडते.'


मानसशास्त्रावरची कितीही विद्वत्ता प्रचुर पुस्तके तुम्ही वाचलीत,

तरीही अ‍ॅडलरच्या पंक्तीमध्ये असलेले महत्त्व समजून घेतल्या

शिवाय आपले ज्ञान पूर्ण होणार नाही म्हणून मी पुन्हा त्या ओळी पुढे देत आहे.'ज्या व्यक्तीला आपल्या साथीदारांमध्ये रस नाही,

तिला या जगात अनेक संकटांना तोंड द्यावे लागते आणि एवढेच नाही,तर ती इतरांनासुद्धा दुखापत करते आणि अशा माणसांमुळेच मानवी अपयश उदयाला येते.'


न्यू यॉर्क विद्यापीठात कथा-लेखनाच्या प्रशिक्षणाला मी प्रवेश घेतलेला असताना एका प्रसिद्ध मासिकाचे संपादक आमच्या वर्गात बोलत होते.ते म्हणाले,"माणसे न आवडणाऱ्या लेखकांनी लिहिलेल्या डझनभर तरी अशा कथा माझ्या टेबलावर रोज येऊन पडतात.मला असा प्रश्न पडतो की,जर लेखकाला माणसे आवडली नाहीत,तर वाचकालासुद्धा त्या लेखकाच्या कथा आवडत नाहीत."कथा-लेखनाच्या बाबतीत सत्य असणारी ही गोष्ट आपल्या भोवताली वावरणाऱ्या माणसांच्या बाबतीतसुद्धा असत्य कशी असेल ?


प्रसिद्ध जादूगारांचा जादूगार हॉबर्ट थर्सटन गेल्या चाळीस वर्षांपासून जगभर आपले प्रयोग करत फिरतो आहे.त्याचे प्रयोग हे आश्चर्यकारक,भ्रम निर्माण करणारे, गूढ होते.ते पाहताना मती गुंग होऊन जाई.इतके की, त्याचा प्रेक्षकवर्ग आश्चर्याने तोंडाचा आ वासून बसलेला असे.साठ लाखांपेक्षा अधिक लोकांनी त्याचे प्रयोग पाहिले आणि या प्रयोगांमधून त्याने दोन लाख डॉलर्स

पेक्षाही अधिक फायदा कमावला.


थर्सटनला त्याच्या एवढ्या मोठ्या यशाचे रहस्य विचारले.मला हे माहीत होते की,त्याच्या शालेय दिवसांचा याच्याशी नक्कीच काही संबंध नसावा,कारण तो अगदी लहान मुलगा होता,तेव्हाच घरातून पळून गेला होता.इकडून तिकडे भटकत मिळेल ते काम करत होता.कोणत्याही वाहनांमधून प्रवास करत होता. झोपडीत झोपत होता.दारोदार भीक मागत होता आणि स्टेशनवरील पाट्या वाचत वाचत शिकत होता.मग त्याला जादूविषयी काही विशेषज्ञान होते का,असे मी त्याला विचारले,तेव्हा तो मला म्हणाला की नाही. हातचलाखीवर आजपर्यंत शंभर एक पुस्तके तरी लिहिली गेली आहेत आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे;पण इतरांकडे नसलेल्या दोन विशेष गोष्टी त्याच्याकडे होत्या.एक म्हणजे फूट लाइट्सच्या उजेडात सावलीद्वारे त्याचे व्यक्तिमत्त्व बदलू शकणारा तो एक कलाकार होता.त्याला मानवी स्वभावाचे बारकावेही माहिती होते.चेहऱ्यावरील हावभाव,आवाजातील बदल, भुवईचे उंचावणे या सगळ्याची रंगीत तालीम आधीच झालेली असायची आणि तंतोतंत अचूक वेळेचे गणित तो जमवून ते सादर करायचा.

डोळ्याचे पाते लवते न लवते तोच कार्यभाग साधता येईल,इतक्या वेगवान हालचाली करून तो लोकांना मंत्रमुग्ध करीत असे. याशिवाय त्याचा आणखी एक गुण असा होता की, त्याला लोकांमध्ये प्रचंड इंटरेस्ट होता.त्याने मला सांगितले की,अनेक जादुगारांचीही सवय असते की. प्रेक्षकांना बुद्धू समजणाऱ्या,मूर्ख बनवणाऱ्या जादूगारांसारखा तो नव्हता.थर्सटनच्या पद्धतीचा वेगळेपणा हा होता की,प्रत्येक वेळी स्टेजवर पाऊल ठेवताना तो स्वतःशी म्हणत असे.'माझा प्रयोग पाहायला येथे जमणाऱ्या लोकांविषयी मी कृतज्ञ आहे. त्यांच्यामुळेच माझे आयुष्य मी चांगल्या प्रकारे घालवू शकतो म्हणूनच मला त्यांना जेवढे जास्त देणे शक्य होईल तेवढे मी देण्याचा प्रयत्न करेन.'


त्याने हेसुद्धा जाहीररीत्या सांगितले की,तो कधीही फुटलाइट्स

समोर 'माझे माझ्या प्रेक्षकांवर प्रेम आहे' असे म्हटल्याशिवाय जात नसे.हे मूर्खपणाचे आहे असे जर तुम्हाला वाटत असेल,तर तो तुमचा प्रश्न आहे. एखाद्या गृहिणीच्या एखाद्या पाककृतीप्रमाणे एका मोठ्या प्रसिद्ध जादूगाराची ही पाककृती मी माझे कोणतेही मत न नोंदवता तुमच्याकडे सोपवत आहे.


पेनिसिल्व्हानिया येथील जॉर्ज डाइकचे सर्व्हिस स्टेशनवरील काम बळजबरीने त्याच्याकडून हिरावून घेण्यात आले.नवीन हायवेच्या रस्ता रुंदीच्या पट्ट्यामध्ये ती जागा गेली.तीस वर्षे कामाची सवय असलेल्या त्याला अशा या सक्तीच्या निवृत्तीमुळे खूप कंटाळवाणे वाटू लागले.मग या रिकाम्या वेळेत तो त्याच्या जुन्या फिडलवर गाणे वाजवायला लागला. हळूहळू तो संगीत ऐकण्यासाठी सगळीकडे प्रवास करू लागला.त्या प्रवासात अनेक यशस्वी फिडल वाजवणाऱ्यांशी त्याची भेट झाली.आपल्या नम्र आणि मनमिळाऊ स्वभावामुळे तो इतरांच्या संगीत शिकण्याच्या पार्श्वभूमीबद्दल जाणून घेऊ लागला.स्वतः फार मोठा फिडलवादक नसूनही,त्या क्षेत्रातील अनेक मित्र जोडल्यामुळे,अनेक संगीत जलशांना उपस्थित राहिल्यामुळे थोड्याच दिवसांत त्याला म्युझिक फॅनक्लबचा 'अंकल जॉर्ज' म्हणून ओळखले जाऊ लागले.बहात्तर वर्षांच्या वयात अशा प्रकारे इतर लोकांमध्ये रुची दाखवून त्याने आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने उपभोगला.वयात लोकांना आपण आता निरुपयोगी झालो आहोत,वाटते त्या वयात त्याने स्वतःचे आयुष्य नव्याने उभे केले.


थिओडर रूझवेल्टवर त्याचे नोकरसुद्धा प्रेम करायचे. इतकी आश्चर्यजनक लोकप्रियता त्याला कशी मिळाली यामागचे गुपित काहीसे असेच आहे.त्याचा विश्वासू नोकर जेम्स अमोस याने रूझवेल्टबद्दल लिहिलेल्या - थिओडर रूझवेल्ट - हिरो टू व्हॅलेट या पुस्तकात एक अत्यंत हृदयस्पर्शी घटना आहे. म्हणतो की,


एके दिवशी माझ्या पत्नीने प्रेसिडेंट यांना 'बॉबव्हाइट प्राण्याबद्दल विचारले.तिने आत्तापर्यंत तो प्राणी कधीच पाहिला नव्हता म्हणून प्रेसिडेंटने तिला त्याचे वर्णन करुन सांगितले.त्यानंतर काही दिवसांनी ऑयस्टरबे येथील रूझवेल्ट इस्टेटमधील एका झोपडीत राहणाऱ्या अमोस घरातील टेलिफोन वाजला.मिसेस अमोसने फोन उचलला आश्चर्य म्हणजे रूझवेल्ट यांनी मुद्दाम तो फोन केला होता.'तिच्या खिडकीबाहेर बॉबव्हाइट आला होता.हे सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता.खरेतर तिला तो तसाही दिसला असता;पण लहान माणसांच्या लहानसहान गोष्टी लक्षात ठेवणे रूझवेल्ट यांचे वैशिष्ट्ये होते.कधी ते आमच्या झोपडीवरून जात तेव्हा,त्यांनी आम्हाला मारलेली हाक ऐकू येई, 'अ अ‍ॅनी...' किंवा ' जेम्स.' इतके जिव्हाळ्याचे संबंध जपणारे रूझवेल्टसारखे मालक नोकरांना आवडणार नाहीत,असे होणे शक्यच नाही ना? अशा माणसावर प्रेम करणे ही एक स्वाभाविक अपरिहार्य गोष्ट असते.


एकदा व्हाइट हाउसमध्ये प्रेसिडेंट व मि.टॅफ्ट यांना भेटायचे आमंत्रण रूझवेल्ट यांना मिळाले.त्याप्रमाणे ते तिथे गेले असताना प्रेसिडेंट बाहेर गेले होते.रूझवेल्टला नम्र माणसे खूप आवडत.

जेव्हा तो व्हाइट हाउसमधल्या जुन्या नोकर माणसांना भेटत असे,तेव्हा तो त्यांना नावाने हाक मारत असे.एकदा ते अ‍ॅलिस या स्वयंपाकिणीला म्हणाले की,तू अजून कॉर्नब्रेड बनवतेस का? त्यावर ती म्हणाली की,नोकर माणसांसाठी काही वेळा बनवते;पण वरिष्ठ मंडळी मात्र ते खात नाहीत.


त्यावर रूझवेल्ट मिश्कीलपणे म्हणाला की,त्यांना चवीने कसे खावे तेच समजत नाही.थांब,आता प्रेसिडेंट मला भेटले की,त्यांना मी कॉर्नब्रेडबद्दल सांगतो.अ‍ॅलिसने रूझवेल्टसाठी तो ब्रेड बनवून दिला आणि गंमत म्हणजे तो खात खात रूझवेल्ट ऑफिसपर्यंत पोहोचला.वाटेत भेटणाऱ्या माळ्यांशी,कामगारांशी बोलत बोलत,

प्रत्येक माणसाला नावानिशी हाक मारत आणि पूर्वीसारखाच त्याच्याशी बोलत तो पुढे जात होता.गेली चाळीस वर्षे प्रत्येकाला आपली जागा दाखवण्यासाठी हुव्हर नावाचा एक नोकर व्हाइट हाउसमध्ये नेमला होता.तो गहिवरून म्हणाला की,दोन वर्षांनी आज रूझवेल्टसाहेब आलेत.आजचा दिवस सोनियाचा दिवस आहे.या दिवसाच्या बदल्यात आम्हाला कोणी दोनशे डॉलर्स जरी दिले,तरी आम्ही ते घेणार नाही.


आणखी असाच एक अनुभव तुम्हाला सांगतो.अगदी नगण्य लोकांनाही जमेत धरणे विक्री कौशल्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते! 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीचा विक्रेता म्हणून काम करणाऱ्या न्यू जर्सीमधील एडवर्ड स्काइंगकडे मॅसच्युसेट्स व आसपासचा भाग सोपवला होता.अनेक वर्षांपूर्वी एकदा तो हिंगाम येथील औषधाच्या दुकानात गेला.ते कंपनीचे नेहमीचे ग्राहक होते.जेव्हा जेव्हा एडवर्ड त्या दुकानात जात असे,तेव्हा तेव्हा त्या दुकानातील सोडा क्लार्क व सेल्स क्लार्क यांची आपुलकीने चौकशी करत असे आणि नंतरच त्या दुकानाच्या मालकाकडे जात असे.एके दिवशी त्या मालकाने स्पष्ट सांगितले की,आम्हाला इथून पुढे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची उत्पादने नको आहेत, कारण कंपनीचे सगळे लक्ष आता खाद्यपदार्थांवर व सवलतीच्या केंद्रांवर केंद्रित झाले आहे,त्यामुळे आमच्यासारख्या छोट्या दुकानदारांचे नुकसान होते. अचानक बसलेल्या या धक्क्यामुळे एडवर्ड अवाक् झाला होता.तो सांगतो की,तिथून मी निमूटपणे काढता पाय घेतल्यानंतर कित्येक तास शहरात भटकल्यानंतर शेवटी मी परत त्या दुकानाच्या मालकाकडे जायचे ठरवले व आमची बाजू त्याला समजावून सांगण्याचे ठरवले.मी त्या दुकानात परत गेलो व सोडा क्लार्क आणि सेल्स क्लार्कला नेहमीप्रमाणे 'हॅलो' म्हणालो.मग मी मालकाकडे गेलो.तो माझ्याकडे बघून हसला व त्याने माझे चांगले स्वागत केले.नंतर त्याने मला नेहमीच्यापेक्षा दुप्पट उत्पादनांची ऑर्डर दिली.मला आश्चर्याचा धक्का बसला व मी त्याला विचारले की,केवळ काही तासांमध्ये असे काय घडले? सोडा फाउंटन जवळ उभ्या असलेल्या तरुणाकडे बोट दाखवून तो म्हणाला की, तुम्ही गेल्यानंतर हा मुलगा आत आला व म्हणाला की, कोणतेच औषध-विक्रेते आमची दखल घेत नाहीत व आम्हाला 'हॅलो' सुद्धा म्हणत नाहीत.जे काही थोडे विक्रेते आम्हालाही प्रेम लावतात,

त्यापैकी तुम्ही एक आहात आणि जर धंदा वाढवण्याची पात्रता कोणात असेल,तर ती तुमच्यामध्येच आहे.


मला ते सगळे पटले. त्यानंतर तो आमचा कायमस्वरूपी असा निष्ठावान ग्राहक बनून राहिला.ही एक अविस्मरणीय गोष्ट आहे. या प्रसंगामुळे मी शिकलो की,जर विक्रेत्यामध्ये गरजेचा असणारा महत्त्वाचा गुण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत लहानातल्या लहान माणसाच्या उपस्थितीची त्याने नोंद घ्यायला हवी.जो कोणी सभोवतालच्या माणसाबद्दल आस्था दाखवेल,त्याची आपुलकीने चौकशी करेल तो त्याचे लक्ष,वेळ व सहकार्य मिळवू शकतो,अशा निष्कर्षापर्यंत मी माझ्या वैयक्तिक अनुभवांवरून आलो आहे.


काही वर्षांपूर्वी ब्रुकलिन इन्स्टिट्यूट आर्ट्स अँड सायन्सेज येथे कथालेखनाबद्दलच्या प्रशिक्षणाचा कोर्स करत असताना आम्ही कॅथलिक नॉरीस,फॅनी हर्स्ट,इडा तारबेल,अलबर्ट पेसन,रूचर्ट ह्युजेस यांच्यासारख्या ख्यातनाम मातब्बर मंडळींना पत्र लिहिले की,त्यांनी त्यांचे वैयक्तिक अनुभव आमच्या विद्यार्थ्यांबरोबर शेअर करावेत.आम्हाला त्यांचे लेखन खूप आवडते आणि त्यामुळे त्यांच्या अनुभवांचा व विचारांचा आम्हाला आमच्या भावी आयुष्यात यशस्वी होण्यासाठी उपयोग होईल.


अपुर्ण…. पुढील…लेखामध्ये…!


१६/८/२५

सूर्यपक्षी,तांबड्या मुंग्या व अर्जुन / Sunbirds,red ants and Arjuna

कौरव व पांडव हे द्रोणाचार्यांचे विद्यार्थी.आपले सर्व विद्यार्थी अस्त्रविद्येत पटाईत झाले आहेत व सर्व प्रकारच्या शस्त्रविद्येत पारंगत झाले आहेत,असं पाहून लक्ष्यवेधासाठी अत्यंत आवश्यक अशी चित्ताची एकाग्रता त्यांच्या ठिकाणी किती बाणली आहे,याची परीक्षा घ्यायचं द्रोणाचार्यांनी ठरवलं. त्यांनी कारागिराकडून एक भासपक्षी तयार करून, त्याला एका झाडाच्या शेंड्यावर ठेवून दिला व आपल्या शिष्यांना त्याचा लक्ष्यवेध करावयास सांगितलं.परंतु लक्ष्यवेध करणं चौघा पांडवांना व कौरवांना जमलं नाही.त्यापूर्वी द्रोणाचार्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाचं समर्पक उत्तर देणंही त्यांना जमलं नाही.शेवटी त्यांनी अर्जुनास बोलावलं व त्याला सांगितलं की,"अर्जुना,तुला या लक्ष्यावर आता नेम धरावयाचा आहे. लक्ष्य नीट पाहून घे.मी आज्ञा देताक्षणी तुला बाण सोडावा लागेल." गुरूच्या आज्ञेप्रमाणे अर्जुनानं धनुष्य सज्ज करून व त्यावर बाण चढवून ते ताणलं.लक्ष्यावर आपली नजर स्थिर करून तो उभा राहिला.काही क्षणांत आचार्यांनी अर्जुनाला विचारलं की,"तुला भासपक्षी,झाड आणि मी हे सर्वच दिसतं काय?" त्यावर अर्जुन म्हणाला,"आचार्य! मला आपण,वृक्ष अथवा इतर कोणीही दिसत नाही.


मला फक्त भासपक्षी दिसतो." ह्याबरोबर आचार्यांना अतिशय आनंद झाला.नंतर त्यांनी पुन्हा विचारलं,"आताही तुला भासपक्षीच दिसतो काय?" एकाग्रचित्त अर्जुनानं सांगितलं,"मला फक्त भासपक्ष्याचं मस्तक दिसतं.बाकी त्याचा कोणताही अवयव दिसत नाही."द्रोणाचार्य अर्जुनाला एकदम म्हणाले,"सोड बाण." त्याबरोबर अर्जुनानं आपल्या तीक्ष्ण बाणानं त्या पक्ष्याचं डोकं तोडून खाली पाडलं.अर्जुन हा निष्णात धनुर्धारी होता.या परीक्षेनंतर अर्जुन जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेला. 


या विजयानंतर लोकांपासून दूर असलेल्या जंगलातील शांतता त्याला अनुभवायची होती. त्याला सारं जंगल लहानमोठ्या वनचरांनी भरलेलं दिसलं.परीक्षेचा त्याच्यावर खूप ताण पडला होता. कडक उन्हामुळे उकडत होतं.वारा घेण्यासाठी फांदी तोडावी म्हणून एका झाडाला हात लावताच त्यातून एक चिमुकला सूर्यपक्षी उडून त्याच्या हातावर बसला.त्याचा रंग निळा-जांभळा होता.चोच अणकुचीदार होती.डोळे बारीक मण्यांसारखे होते. तो धीटपणे अर्जुनाकडे पाहू लागला आणि मोठ्या नम्रपणाने अर्जुनाला म्हणाला,"हे बंधू,ही फांदी तोडू नकोस.कारण त्यात माझं घरटं आहे.

घरट्यात पिल्लं निजली आहेत." "घरटं?" असं म्हणत अर्जुनानं त्या फांदीत पाहिलं. मऊ गवत व जाळीनं तयार केलेलं घरटं पिशवीसारखं लोंबताना दिसलं.पुढे तो धिटुकला पक्षी म्हणाला, "हे घरटं मोठ्या प्रेमानं अन् कष्टानं बांधलं आहे.त्यात माझी तीन पिल्लं आहेत.त्यांना चारा भरवायचा आहे." इवलीशी चोच असलेली गोजिरवाणी पिल्लं घरट्यातून डोकावत होती.चारा घेण्यासाठी त्यांनी चोच वासली होती.


हे चिमुकल्या जिवा,तुला किंवा तुझ्या घरट्याला मी इजा करणार नाही." तो पक्षी अजूनही अर्जुनाच्या हातावर बसला होता. "जा.आता तुझ्या पिल्लांना भरव."


तो सूर्यपक्षी म्हणाला, "हे धनुर्धरा,कधीतरी आम्ही तुझ्या उपयोगी पडू."


आता अर्जुनानं किंचित उंच असलेल्या फांदीला धरलं.तोच काही चावऱ्या तांबड्या मुंग्या त्याच्या अंगाखांद्यावर पडल्या.

त्यानं वर पाहिलं तर त्याला हिरव्या पानांनी बांधलेली अनेक घरटी दिसली.ती त्या तांबड्या मुंग्यांची होती. पांढऱ्या जाळीनं पानं एकमेकांना जोडली होती. त्या मुंग्या म्हणाल्या,"हे बंधू, झाडाची फांदी तोडू नकोस.कारण त्यामुळे अनेक दिवसांपासून मोठ्या परिश्रमानं बांधलेल्या घरट्यांचा नाश होईल.या घरट्यात राणी मुंगी, कामकरी व शिपाई मुंग्या आहेत.आमची पिल्लं आहेत.साऱ्या फांदीवर लहान चेंडूसारखी घरटी दिसतात ती म्हणजे आमच्या गाईंचे गोठे आहेत. त्यात मातकट रंगाचे मावा जातीचे कीटक आहेत.


ते त्या पानांतून रस शोषून घेतात आणि आम्ही त्यांना दुधासाठी दोहतो.म्हणून हे बंधू,या फांद्या तोडू नकोस,अशी तुला विनंती आहे. भविष्यकाळात तुझ्या उपयोगी पडून आम्ही तुझे हे उपकार फेडू."


अर्जुन स्वतःशीच म्हणाला,"या वनात कितीतरी लहान जीव आहेत.त्यांना मी कसलाच अपाय करणार नाही. अर्थात मी कुठल्याच झाडाची फांदी तोडणार नाही." वनातून वाटचाल करीत असता त्याला वाटलं,"मी एक श्रेष्ठ धनुर्धारी व शस्त्रयोद्धा आहे.हे लहान जीव मला कोणती मदत करणार!"


या प्रसंगानंतर अनेक वर्षे लोटली.पाच पांडवांना कौरवांच्या अनेक षड्यंत्रातून जावं लागलं.अति दुःख भोगावं लागलं.ती सारी जण एकाच राजवाड्यात राहत होती.एकाच गुरूकडून विद्या शिकली होती.परंतु,कौरवांना पांडवांविषयी असूया वाटे.त्यांचा ते द्वेष करीत.शौर्यात कमी पडतात म्हणून पांडवांविरुद्ध अनेक षड्यंत्रं रचीत.


पांडवांचा बारा वर्षांचा वनवास संपला होता.आता तेरावं वर्ष अज्ञातवासाचं होतं.अर्जुन भटकत होता. आता त्याच्या अंगावर ना चिलखत होतं ना हातात शस्त्र.तो बैराग्याच्या वेशात होता.अशा निर्मनुष्य वनात अर्जुनाला वाटसरूंच्या बोलण्याचा आवाज येत होता.अर्जुन एक शूर,धाडसी योद्धा होता. दरोडेखोरांच्या टोळीला देखील त्यानं शौर्यानं तोंड दिलं असतं.परंतु आजची परिस्थिती वेगळी होती. आता तो अज्ञातवासात होता.कोणी त्याला ओळखलं असतं तर संकट उभं राहिलं असतं.इतक्यात त्याला 'चीविट-चीविट' असा सूर्यपक्ष्याचा परिचित आवाज ऐकू आला.जणू काही तो एका झाडाकडे येण्यास खुणावत होता.अर्जुन त्या झाडाजवळ आला.त्या झाडात पुरुषभर उंचीची ढोली होती.अर्जुनानं लगेच त्यात उडी मारताच लाल मुंग्यांच्या झुंडीनं त्याचं मस्तक झाकलं आता तो दिसेनासा झाला.


( निळावंती,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र,सीताबर्डी,

नागपूर … ) परंतु दुरून येणाऱ्या दरोडेखोरांच्या टोळीनं या नवख्या प्रवाशाला पाहिलं होतं.त्यांना आश्चर्य वाटलं की,इथेच तो दिसला,मग कुठे गायब झाला असावा. बैराग्याचा वेष घातलेली व्यक्ती असाधारण उंच व सुदृढ शरीराची होती हेही त्यांनी पाहिलं होतं.आजूबाजूला धुंडाळत असताना त्या उंच झाडाच्या ढोलीत त्यांनी डोकावून पाहिलं.तो इथे तर लपला नसावा?तोच सूर्यपक्ष्यानं त्यांच्या तोंडावर पंखांचा झपाटा मारला.चोचीनं टोचलं.त्या ढोलीत त्यांनी काठीनं डिवचण्याचा प्रयत्न केला;तोच असंख्य तांबड्या,चावऱ्या मुंग्या त्यांच्या अंगाखांद्यावर, डोक्यावर तुटून पडल्या.त्या त्यांना कडकडून चावल्या.त्यांना वाटलं,तो बैरागी त्या ढोलीत लपला असेल,तर त्या मुंग्यांनी त्याला एव्हाना ठार मारलं असेल.


नंतर काही वेळानं वनात जिकडेतिकडे शांतता पसरली.

'चीविट-चीविट-चीविट'असा आवाज करून धोका गेल्याची सूचना त्या सूर्यपक्ष्यानं अर्जुनाला दिली.अर्जुनाच्या मस्तकावरील मुंग्यांच्या झुंडी क्षणात बाजूला झाल्या.अर्जुन लगेच ढोलीबाहेर आला.त्यानं मोठ्या कृतज्ञतेनं त्या चिमुकल्या पाखराचे व मुंग्यांचे आभार मानले.त्या वेळी अर्जुनाला आठवलं की,काही वर्षांपूर्वी या लहान जीवांनी मला 'संकटकाळात मदत करू' असं वचन दिलं होतं,ते त्यांनी अशा रीतीनं पार पाडलं तर! त्यांच्या विषयीच्या कौतुकानं अर्जुनाचा ऊर भरून आला. या प्राणिमात्रांचं आपल्यावर प्रेम असल्याचं पाहून त्याला धन्यता वाटली अन् कृतज्ञतेनं एकदा त्यांच्याकडे पाहून त्यानं आपली वाट धरली.