बुद्धाने जातिभेद नाकारले होते.परंतु भारतीय समाजात जातिभेद विरून जाऊ शकले नाहीत व शेवटी बौद्ध धर्मच लयाला गेला.पण भारताबाहेर ईशान्येस चीन,कोरिया,
मंगोलिया, जपानपर्यंत व आग्नेयेस ब्रह्मदेश थायलंड, कंबोडिया,इन्डोनेशियापर्यंत बौद्ध धर्म फैलावला. चीनच्या यांगत्से व पिवळ्या नद्यांच्या खोऱ्यांतल्या सुपीक मैदानात नाईल नदीच्या खोऱ्यासारखीच समृद्ध शेती होत होती.
तिच्या जोरावर कारागिरी,विद्याव्यासंग पोसले होते. जेव्हा भारतातून बौद्ध भिक्खु चीनमध्ये पोचले, तेव्हा त्यांनी आणलेले आयुर्वेदाचे ज्ञान चिन्यांना हवे होते,म्हणून त्यांचे स्वागत केले गेले.त्यांना राजदरबारात नेले.तिथे त्यांनी राजासमोर लवण्यास नकार दिला;म्हणाले,आम्ही फक्त बुद्धापुढे वाकतो.खरे तर ह्या उर्मटपणाबद्दल त्यांना देहदंड देण्याची रूढी होती; पण चीनच्या सम्राटाने त्यांना माफी दिली. बौद्ध धर्माचा प्रचार करण्याची मुभा दिली.चिनी लोक शोध लावण्यात पटाईत.बुद्धाचा संदेश पसरवण्यासाठी त्याच्या चिक्कार प्रती काढायला हव्यात.हाताने लिहीत बसण्यात फार वेळ जातो, श्रम लागतात.मग त्यांनी इसवी सनपूर्व दोनशे वर्षे बांबूचा कागद बनवण्याची कृती शोधून काढली आणि ब्लॉक प्रिन्टिंगचीही.
युरोपीय बढाई मारतात की जगात प्रथम जर्मनीत गुटेन्बर्गने शतकात मुद्रणकलेचा शोध लावून बायबल छापले.पण त्याच्या तब्बल अठरा शतके आधीच चिनी बुद्धाचा संदेश छापू लागले होते. चिन्यांनीच होकायंत्राचा,
बंदुकीच्या दारूचा, अग्निबाणांचा शोध लावला.ज्ञानाच्या इतरही अनेक शाखांत चिन्यांनी उत्तम प्रगती केली.
चिनी समाज भारतीय समाजासारखा जाती-पातींनी चिराळलेला नव्हता.चिन्यांना अंगभूत बुद्धीच्या बळावर मॅन्डारिन ह्या शासकवर्गात प्रवेश करून समाजात वर येता येणे शक्य होते.ह्या सर्व वैशिष्ट्यांमुळे पंधरा -
सोळाव्या शतकांपर्यंत चीन हा जगातला ज्ञान- तंत्रज्ञानात अग्रेसर देश होता.
चीनचाच उत्तरेचा शेजारी मंगोलिया.इथे सुपीक शेती बिलकूल नव्हती,होते फिरस्त्यांचे पशुपालन.ते घोड्यांवर बसून गुरांचे कळप हाकत हाकत कुरणांच्या शोधात हिंडायचे.अशा जीवनशैलीतून इतर समाजांवर आक्रमण करण्यासाठी उपयुक्त अशी अनेक तंत्रे,कौशल्ये पोसली जातात.साडेतीन हजार वर्षांपूर्वी वैदिक संस्कृती अशाच समाजांत निर्माण झाली होती, आणि भारतात फैलावली होती.इसवी सनाच्या बाराव्या शतकात मंगोलियात अशाच समाजात 'झाले बहु,होतील बहु,परंतु ह्यासम हा' असा चेंगीजखान हा डोकेबाज,धीट पुढारी जन्मला. त्याने घोडे भरधाव दौडत असताना दोनही हात सोडून धनुष्याने बाण मारण्याचे तंत्र विकसित केले.रात्री रंगीत दिवे वापरत सैन्याच्या सुसूत्र हालचाली करण्याचे तंत्र विकसित केले.
अशा युद्धतंत्रांच्या बळावर त्याने इराकपासून पूर्ण मध्य आशिया व हंगेरी- रशियाच्या बऱ्याचशा भागासकट थेट चीन- कोरियापर्यंत पसरलेले विस्तृत साम्राज्य स्थापले.
इटलीतल्या व्हेनिस ह्या व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाच्या शहराला त्याच्या सैन्याने वेढा घातला होता.हे साम्राज्य नीट हाकण्यासाठी एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वेगाने संदेश पोहोचले पाहिजेत. त्यासाठी त्याने वीस-तीस किलोमीटरच्या अंतरांवर घोड्यांची ठाणी बसवली.तिथे नेहमी ताज्या दमाचे घोडे व घोडेस्वार सज्ज असायचे. चेंगीजखानाचा कोणताही खलिता घेऊन स्वार निघाला की तो भरधाव पुढच्या ठाण्यापर्यंत जायचा.तिथून तातडीने नवा स्वार निघायचा. अजिबात वेळ न गमावता हवे तिथे संदेश पोचवला जायचा.वाटेत जर घोड्याला काहीही दुखापत झाली,तर जो पहिला घोडा भेटेल, त्याला ताब्यात घेऊन पुढची दौड सुरू व्हायची. कोणी ह्या कामासाठी घोडा द्यायला नाकारले, तर त्याला देहदंड ठोठावला जायचा. प्रतिभाशाली चेंगीजखानाने युद्धनीतीत, शासननीतीत अशी अनेक नवनवी स्मरुके निर्मिली.त्याच्या साम्राज्याबरोबर तीही फैलावली. वर आपण उल्लेख केला होता की संत ज्ञानेश्वरांनी निर्मिलेली स्मरुके फैलावली. पण त्यांच्या ह्या प्रतिभेला कदाचित आधारभूत असलेली जनुके त्यांच्या बरोबरच लयाला गेली असावीत.चेंगीजखानचे असे झाले नाही.आजच्या शास्त्रीय प्रगतीमुळे मानवाच्या आनुवंशिकतेचा आधार असणारे रेणू अभ्यासून जनुकांचा प्रसार कसा होतो ह्याचा अभ्यास साध्य झाला आहे.मध्य आशियाच्या मोठ्या पट्ट्यात आज एक विशिष्ट जनुकसंच प्रचंड प्रमाणात आढळतो.हा कुठून आला? जवळजवळ नक्की की चेंगीजखानापासूनच ह्या खास जनुकसंचाचा उगम झाला असावा.तेव्हा चेंगीजखानाने निर्मिलेले अनेक स्मरुक जसे वेगाने पसरले,तसे जोडीनेच त्याचे जनुकही फैलावले असावेत ! अशा साऱ्या घडामोडींतून चेंगीजखानाने चीनपासून ते अरब देश व युरोपपर्यंत दळणवळण सुरू केले.त्यातून चीनमधले बंदुकीच्या दारूसारखे शोध प्रथम अरबांपर्यंत व नंतर युरोपात पोचले.चीनच्या रेशीम आणि इतर अनेक उत्पादनांना युरोपात मोठी मागणी होती. ह्यातून जो व्यापार सुरू झाला त्यातून आर्थिक उलाढालींना मोठी चालना मिळाली.इटलीत जो पैसा लोटला,त्यातून युरोपात बाराव्या शतकानंतर एक नवचैतन्य बहरले.
युरोप….
प्राचीन ग्रीक संस्कृतीत अगणित देवांची आणि निसर्गाचीही पूजा चालू होती.अशा वातावरणात अतिशक्तिमान केन्द्रीय शासनाला वाव नव्हता, आणि एकूण परिस्थिती मुक्त विचारांना, अभिव्यक्तीला अनुकूल होती.साहजिकच ग्रीसमध्ये बुद्ध कालापासून इसवी सनाच्या पहिल्या दोन शतकांपर्यंत ज्ञान - विज्ञान-साहित्य शिल्प बहरली होती.ईसाई धर्मानुसार राजा हा ईश्वरी अंश आहे असा अर्थ लावता येत होता.तेव्हा राजसत्तांच्या पाठिंब्यातून ग्रीसमध्ये व हळूहळू सर्वच युरोपभर ईसाई धर्माचा प्रसार झाला.आता बायबलात दिले तेच सत्य,
इतर पाखंड,व हे पाखंड जबरदस्तीने दडपणे समर्थनीय आहे अशी विचारसरणी फैलावली व ज्ञान विज्ञानाचा झपाट्याने ऱ्हास झाला.युरोपीय प्लेटो,
सॉक्रेटिस,ॲरिस्टॉटल,आर्किमिडिज अशा विद्वानांचे लिखाण पूर्ण विसरून गेले.ग्रीसच्या पूर्वीच इजिप्त, इराकसारख्या अरब देशांत आधुनिक ज्ञान - विज्ञानाची भरभराट झाली होती.ह्या देशांचा ग्रीसशी जवळचा संपर्क होता.ईसाई धर्माच्या प्रसाराबरोबर ग्रीसमधल्या ज्ञान विज्ञानाचा नाश झाला तेव्हा त्या साहित्याचा अरबी भाषेत अनुवाद करून अरबांनी हे ज्ञान जिवंत ठेवले;ते त्यात भरही घालत राहिले.(वारुळ पुराण,माधव गाडगीळ,
ई.ओ.विल्सन,संक्षिप्त अनुवाद नंदा खरे,मनोविकास प्रकाशन) युरोपात बाराव्या शतकानंतर जेव्हा ज्ञान - विज्ञानाची जोपासना पुनश्च सुरू झाली,तेव्हा अरबांनी जपलेल्या ग्रिट ज्ञान- विज्ञानाचे पुनरुज्जीवन केले गेले.
हे होत असताच युरोपावर अनेक संकटे आली.विशेषत:
तेराशे साठपासून सोळाशे सदुसष्टपर्यंत प्लेगच्या एकामागून एक साथी येत राहून लोक मोठ्या प्रमाणावर मृत्युमुखी पडले.पंधराशे पन्नास पासून अठराशे पन्नास पर्यंत एक छोटे हिमयुग सुरू होऊन शेतीचे उत्पन्न खूप घटले. ह्या शतकांत जंगलांची बेसुमार तोड होऊन हिवाळ्यात उबेला जाळायला लाकूडही मिळेना.
ह्या सगळ्या अडचणींना तोंड द्यायला भक्कम ज्ञान - विज्ञानाची मोठी मदत होईल ही जाणीव युरोपात पसरली,
आणि ह्या मंथनातून वस्तुनिष्ठता,तर्कशुद्धता व मांडणीतून जे पडताळता येतील असे काही तरी वेगळे,नवे निष्कर्ष काढण्याची क्षमता ह्या तीन महत्त्वाच्या पैलूंवर आधारित वैज्ञानिक कार्यपद्धती विकसित झाली.ज्ञानसर्जनाच्या इतर साऱ्या प्रणालींहून अतिशय वेगाने वैज्ञानिक कार्यपद्धतीद्वारा नवे ज्ञान निर्माण करता येते.युरोपात सतराव्या शतकापर्यंत ही कार्यपद्धती नेटकेपणे कार्यरत करण्यासाठी विद्यापीठे,वैज्ञानिकांच्या संघटना, संशोधन केन्द्रे प्रस्थापित केली गेली,आणि विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती झपाट्याने सुरू झाली.ह्यातून निर्माण झालेल्या ज्ञानाचा वेगवेगळ्या प्रकारे फायदा उठवता आला.ह्यात खास महत्त्वाची होती दोन क्षेत्रे नौकानयन आणि युद्धकला.नौकानयनासाठी खगोलशास्त्र फार उपयुक्त होते,आणि इसवी सनाच्या दुसऱ्या शतकातील अरब - ग्रीक खगोलशास्त्रज्ञ टोलेमीच्या काळापासून पंधरा- सोळाव्या शतकापर्यंत युरोपात पूर्णपणे थंडावलेल्या खगोलशास्त्रात झपाट्याने प्रगती सुरू झाली.
वस्तुनिष्ठता हे विज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे,तेव्हा खगोलशास्त्राच्या प्रगतीसाठी काटेकोरपणे केलेली निरीक्षणे फार महत्वाची होती.ही गोळा करण्यात सर्वांहून मोठे,महत्त्वाचे योगदान केले मर्डेकरांनी खास उल्लेखिलेल्या टैको ब्राहीनी.ह्या काळात सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या शास्त्रीय संशोधनात अनेक युरोपीय श्रीमंतांनी पुढाकार घेतला,तसाच हा टैको ब्राही
डेन्मार्कच्या राजदरबारातला एक उमराव होता.
पण एक दरबारी म्हणून त्याचा अंतही एका राजदरबारातल्या मेजवानीत विलक्षण प्रकारे झाला.अशा मेजवानीत भरपूर मद्यपान व्हायचे,तेव्हा मूत्राशये गच्च भरून जायची.पण इतरांच्या आधी उठणे हे शिष्टाचारा
विरुद्ध होते.तेव्हा दाबून धरणे भाग असायचे.एका मेजवानीत हे मर्यादेबाहेर गेले.मग टैको ब्राहीची कोंडलेली लघवी कायमचीच रोखली जाऊन तो नंतर अकरा दिवसांनी स्वर्गवासी झाला.मरताना त्याने स्वतःबद्दल लिहून ठेवले. टैको ब्राही एका सिद्धपुरुषासारखा जगला आणि महामूर्खासारखा मेला !
भारत पादाक्रान्त करण्यात इंग्रजांना नौकानयन आणि युद्धकला ह्या दोनही सामर्थ्यांचा प्रचंड फायदा झाला.
मराठ्यांच्या आरमारातल्या नौका खोल समुद्रात जाऊ शकत नव्हत्या,तर इंग्रजांची गलबते साता समुद्रांना सहज ओलांडू लागली होती.वैज्ञानिक कार्यपद्धतीतून युद्धकलेत कशी सरशी करता आली ह्याचे नेटके उदाहरण आहे.
म्हैसूरच्या टिपू सुलतानाबरोबरच्या लढाया. चिन्यांनी शतकातच रॉकेट,अग्निबाण शोधले होते.तिथून ते भारतात पोहोचले होते.म्हैसूरचा टिपू सुलतान ते युद्धात वापरत होता.१७८० मध्ये इंग्रजांची म्हैसूर सेनेशी पहिली लढाई झाली.त्यात टिपूच्या सैन्याने केलेल्या अग्निबाणांच्या माऱ्यातून इंग्रज फौज चक्रावून गेली,धूम पळाली.पण हा पराभव स्वीकारताना इंग्रजांनी वापरलेले,न फुटलेले अग्निबाण गोळा करून मायदेशी पाठवले.इंग्रजांचा दारूगोळ्याचा कारखाना वूलवर्थ गावी होता.त्या कारखान्याला जोडून दारूगोळा अधिकाधिक परिणामकारक बनवण्याचे संशोधन चालायचे.त्या प्रयोगशाळेत सापडलेल्या अग्निबाणांचा अभ्यास करून त्यांनी त्यांना कसे तोंड द्यायचे याचे डावपेच रचले. स्वतःबनवण्याचे प्रयत्न सुरू केले.दरम्यान टिपूला शास्त्रीय संशोधन हा विषयच ठाऊक नव्हता.तेव्हा इंग्रजांबरोबरच्या १७९२ च्या पुढच्या लढाईत टिपूचे युद्धतंत्र 'जैसे थे' होते. इंग्रजांचे पुढे गेले होते.म्हणून 'थांबला तो संपला' या न्यायाने दुसऱ्या लढाईत इंग्रजांनी टिपूचा धुव्वा उडवला.मराठ्यांची पण हीच गत होती.
इतिहासाचार्य राजवाडे सांगतात की एवढ्या बुद्धिमान नाना फडणवीसांच्या संग्रहात इंग्रजांकडून पकडलेल्या दुर्बिणी, होकायंत्रे होती;पण त्यांचा उपयोग काय,याचा
त्याने काहीही विचार केल्याची नोंद नाही.
एक महत्त्वाची नोंद - रॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ - १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला.हा विएन्ना विद्यापीठात शिकला.पुढे १९१० मध्ये भारत आणि ब्रह्मदेशाच्या दौऱ्यावर आला.
भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरू केला.
त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले.आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की,भारतीय जहाजे,कोलंबसच्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरूमधे जात होती!भारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता.याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे..? आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबसने शोधलं आणि भारताचा 'शोध' (!) वास्को-डी-गामा ने लावला!!मुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला.
डॉ.हरिभाऊ (विष्णू श्रीधर) वाकणकर हे उज्जैनचे प्रसिद्ध पुरातत्त्ववेत्ता.भारतातील सर्वांत प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या 'भीमबेटका' गुहांचा उल्लेख होतो,त्या डॉ.वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत.
डॉ.वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंडला गेले होते.तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामाची दैनंदिनी ठेवलेली दिसली.ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला.
त्यात वास्को-डी-गामाने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.वास्को-डी-गामाचे जहाज जेव्हा आफ्रिकेतील जान्जीबारला आले,तेव्हा त्याने तिथे त्याच्या जहाजाच्या तिप्पट आकाराचे मोठे जहाज बघितले.
एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा,त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. 'चंदन' नावाचा तो भारतीय व्यापारी अत्यंत साध्या वेषात खाटेवर बसला होता.जेव्हा वास्को-डी-गामाने भारतात येण्याची इच्छा दाखविली,तेव्हा सहजपणे त्या भारतीय व्यापाऱ्याने सांगितले,'मी उद्या भारतात परत चाललोय.तू माझ्या मागोमाग ये...'
आणि अशा रीतीने वास्को-डी-गामा भारताच्या किनाऱ्याला लागला..!!
दुर्दैवाने आजही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांत 'वास्को-डी- गामाने भारताचा 'शोध' लावला असा उल्लेख असतो..!!'
भारताचे नौकानयन शास्त्र.. (भारतीय ज्ञानाचा खजिना,प्रशांत पोळ,स्नेहल प्रकाशन )