झाडांना आपली भूक कधीही भागवता येते, पण तहानेचं मात्र तसं नसतं,त्यामुळे भुकेपेक्षा त्यांच्यासाठी तहान अधिक त्रासदायक असते.ज्याप्रमाणे एखाद्या ब्रेडच्या भट्टीमध्ये ब्रेड कधीही बनू शकतो तसंच भूक लागली की झाडांना खाद्य बनवता येतं.पण बेकरीत पाणी नसलं तर ब्रेड बनत नाही त्याप्रमाणे पाण्याशिवाय झाडंही खाद्य बनवू शकत नाहीत.
जेव्हा पाणी उपलब्ध असतं तेव्हा एक प्रौढ बीच झाड दिवसाला १३० गॅलन पाणी आपल्या फांद्यांना पोचवत असतं.पण उन्हाळ्यात असं केलं तर मात्र मातीतील आर्द्रता संपून जाते.गर्मीमध्ये रोज पाऊस पडत नाही त्यामुळे माती जरा कोरडीच राहते.म्हणून झाड थंडीमध्ये पाण्याचा साठा करून ठेवतं.थंडीत जेव्हा भरपूर पाऊस असतो तेव्हा झाड पाण्याचा अगदी कमी वापर करतं,कारण या काळात त्याला स्वतःची वाढ करायची नसते.
जमिनीखालील पाणी आणि झाडामधला साठा यातून त्याची उन्हाळ्याची सोय होणार असते.पण काही वर्षांनी पाण्याची कमतरता जाणवू लागते.
उन्हाळा काही आठवडे जास्त रेंगाळला आणि पावसाने दांडी मारली तर मात्र जंगलावर त्याचा विपरीत परिणाम सुरू होतो.भरपूर आर्द्रता असलेल्या मातीत उगवणाऱ्या झाडांना या गोष्टीचा सर्वाधिक त्रास होतो,कारण त्यांनी पाण्याचा वापर कधीही काटकसरीने केलेला नसतो.पाण्याबाबतच्या अशा उधळ्या सवयीचा फटका विशाल आणि जोमदार असलेल्या वृक्षालाही बसतो.
मी ज्या जंगलाचा सांभाळ करतो तिथे स्प्रूस झाडांना पाणी तुटवड्याचा सर्वाधिक त्रास होतो.जेव्हा जमीन सुकून जाते तरीही त्यांची टोकाकडची सुईसारखी पानं पाणी मागत राहतात तेव्हा या झाडांची कोरडी पडलेली खोडं हा ताण सहन करू शकत नाहीत. आणि त्यांच्या खोडाचं साल फाटू लागतं.तीन फुटांपर्यंत फाटलेल्या सालाची जखम आतपर्यंत पोहोचते आणि झाडाला मोठी इजा करू शकते.याचा फायदा फंगस लगेच घेतात आणि झाडाच्या आतपर्यंत जाऊन आपलं कारस्थान सुरू करतात.
येणाऱ्या काळात स्प्रूस आपली जखम भरण्याचा प्रयत्न करतो,पण साल काही बंद होत नाही. लांबूनही काळा ओघळ येणारी जखम दिसून येते.आणि या चर्चेद्वारे आपण झाडाच्या शाळेत प्रवेश करीत आहोत.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न
अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)
निसर्ग एक कठोर शिक्षक असल्यामुळे या शाळांमधून अजूनही शारीरिक शिक्षेची पद्धत सुरू आहे. एखाद्या झाडाने सांगितलेले काम केलं नाही तर त्याला त्याची किंमत मोजावीच लागते.
कुठे लाकूड मोडतं तर कुठे झाडाचा कॅम्बियम नावाचा सर्वांत संवेदनशील जीवनदायी भाग फाटतो.हा कॅम्बियम थर खोडाच्या खाली लागूनच असतो,पण जखम भरणे इतकाच धडा झाडाला मिळत नाही तर यामुळे ते पाण्याचा वापर काटकसरीने करायला सुरुवात करतं.
जमिनीत भरपूर आर्द्रता असली तरीही हे झाड यापुढे पाण्याची उधळपट्टी करणार नाही,कारण पुढे पाणी मिळेल का नाही,काही सांगता येत नाही!हा धडा मिळतो तो जास्त करून भरपूर आर्द्रता असलेल्या जमिनीत उगवणाऱ्या स्प्रूस झाडांना.पण यात काही आश्चर्य नाही. पाण्याच्या मुबलक पुरवठ्यामुळे ते असे खट्याळ झालेले असतात.जेमतेम अर्ध्या मैलावर कोरड्या दगडी भागात उतारावर वाढणाऱ्या झाडांच्यात दृश्य वेगळंच असतं. पहिल्यांदा मला वाटायचं पाण्याच्या अभावाचा सर्वाधिक फटका इथल्या झाडांना बसेल.पण इथं तर चित्र उलटच होतं. तिथल्या उतारावर वाढणारी झाडे पाण्याचा संयमित वापर करून स्वतःला कणखर बनवतात.त्यामुळे ते याहीपेक्षा प्रखर परिस्थितीत तग धरू शकतात.
इथल्या मातीत आर्द्रता कमी राहते कारण सूर्य कडक असतो.तरीही इथले स्प्रूस धडधाकट राहतात.आपली वाढ अगदी संथ करून मिळेल तेवढ्या पाण्यात स्वतःला जिवंत ठेवण्याची कला त्यांना जमलेली आहे.याहून महत्त्वाचा एक धडा झाडांच्या शाळेत शिकवला जातो,तो म्हणजे स्वतःच स्वतःला आधार द्यायला कसं शिकायचं? झाडांना उगाचच गोष्टी अवघड करून ठेवायला आवडत नाही.जर सुदैवाने एखादा धष्टपुष्ट शेजारी मिळाला आणि त्याच्या आधाराने उंच होता आलं तर उगीच स्वतःचं खोड वाढवण्यात ऊर्जा कशाला खर्च करायची? जोपर्यंत दोघेही उभे आहेत तोपर्यंत काहीच भीती नाही.पण मध्य युरोपातील व्यवसायिक लागवडीच्या जंगलात दर थोड्या वर्षांनी झाड कापण्याची यंत्रसामग्री आणली जाते आणि १० टक्के झाडं कापली जातात.नैसर्गिक जंगलात मात्र एखादं वयोवृद्ध वृक्ष वठला की मगच पोकळी निर्माण होते.अशा वेळेस आधार गेला की आधार घेणारं झाड अचानक अस्थिर होऊ लागतं.मग स्वतःची मजबुती वाढवत ते स्वतःचाच आधार बन्नू लागत.झाडांच्या वाढीचा वेग अत्यंत संथ असल्यामुळे पुन्हा स्थिरता यायला तीन ते दहा वर्षे लागू शकतात.
आधार कसा मिळवावा,या शिक्षणात वाऱ्याचीही भूमिका असते.वाऱ्याने झाड एकदा या बाजूला तर एकदा त्या बाजूला वाकवलं जाते.त्यामुळे खोडाला सूक्ष्म छेद जातात.आणि ज्या बाजूला जास्त भार पडतो तिथे झाडाला खोडातील ताकद वाढवावी लागते.हे करण्यासाठी भरपूर ऊर्जा लागते मग वृक्षाच्या वाढीसाठी लागणारी ऊर्जा इकडे वळवावी लागते.ताकदीचा उपयोग पुढे वाढण्यात कामी येतो. शेजाऱ्याचा आधार गेला की झाडाला थोडंसं जास्त ऊन मिळू लागतं,हा थोडा फायदा होतो पण हा फायदा घ्यायलाही अनेक वर्षं लागतात.कारण आजपर्यंत झाडाची पानं कमी सूर्यप्रकाशासाठी अनुकूल झालेली असतात,ती नाजूक आणि प्रकाशाला संवेदनशील असतात.आता अचानक लख्ख सूर्यप्रकाश मिळाल्यावर त्यांना चटके बसतात.
झाडांवर नवीन पालवीचे अंकुर आदल्या वर्षीच्या वसंत ऋतूतच तयार होऊन गेलेले असतात.
त्यामुळे पानझडी झाडाला जास्त सूर्यप्रकाशाचा फायदा घेण्यासाठी किमान दोन ऋतूंची वाट पाहावी लागते. सूचीपर्णी झाडांना तर यापेक्षा अधिक वेळ लागू शकतो कारण त्यांची सुयांसारखी पाने जवळजवळ दहा वर्षांपर्यंत फांद्यांवर राहतात.
जोपर्यंत सर्व पानं किंवा सूचीपर्णी झाडांची पालवी बदलत नाही तोपर्यंत परिस्थिती जरा गंभीरच असते.
खोडाच्या घेराची वाढ सुरू असेपर्यंत आणि स्थैर्य मिळेपर्यंत झाडाला अनेक छोटी-मोठी दुखणी आणि इजा सहन कराव्या लागत असतात.नैसर्गिक जंगलांमधल्या झाडाच्या आयुष्यात हे असं अनेक वेळा होणार असतं.वठलेल्या झाडांमुळे आच्छादनात पडलेली खिंडारं एकदा का झाडांनी आपली छत्री वाढवून भरून काढली,की मगच पुन्हा एकमेकांचा आधार घेत वाढणं शक्य होतं. आणि असं झालं की खोडाचा घेर वाढवण्यापेक्षा उंची वाढवण्यासाठी झाड अधिक ऊर्जा खर्च करतं.पण परत आपण झाडांच्या शाळेकडे येऊ या.जर झाडांना शिकण्याची कला जमत असेल,जसं आपण आत्ता अनुभवलं,तर मग असा प्रश्न पडतो की या शिक्षणाची नोंद कुठल्या अवयवात होते? मिळालेले ज्ञान,अनुभव कुठं साठवलं जातं? त्यांना आकडेवारी साठवण्यासाठी किंवा त्यावर काही प्रक्रिया करण्यासाठी मेंदू नसतो.हे सगळ्या झाडांच्या बाबत असंच असतं.त्यामुळे शास्त्रज्ञांना प्रश्न पडतो की खरंच झाडांना शिकण्याची कला अवगत आहे का? परत एकदा ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ मोनिका गॅगलियानोचा अभ्यास इथे आपल्याला दिशा दाखवतो.
या शास्त्रज्ञ मिमोसास (लाजाळू) नावाच्या सूक्ष्म संवेदनशील वनस्पतींचा अभ्यास करीत आहेत.मिमोसास या उष्ण कटिबंध भागातील वेली आहेत.अभ्यासासाठी ही वनस्पती साजेशी आहे,कारण तिला लगेच चिथवता येते.त्यांना हात लावताच त्यांची इवलीशी पानं स्वसंरक्षणासाठी बंद होतात.गॅगलियानोच्या प्रयोगात या पानांवर ठरावीक वेळेला एक पाण्याचा थेंब पडत राहतो. सुरुवातीला ही सतर्क पानं लगेच बंद होतात, पण काही वेळातच त्यांना लक्षात येतं की या थेंबांपासून आपल्याला धोका नाही.त्यानंतर पानं उघडीच राहतात.यातली सर्वांत आश्चर्यकारक सत्य म्हणजे गॅगलियानोला असं दिसलं की एका आठवड्यानंतरही त्या पानांना हे मिळालेले हे नवं ज्ञान त्यांच्या लक्षात राहिलं होतं.
बीच किंवा एक सबंध झाड प्रयोगशाळेत नेऊन त्यावर असे प्रयोग करता येत नाहीत, हे किती दुर्दैवी आहे! पण पाण्याच्या बाबतीत मात्र यावर अभ्यास आहे.त्यात असं दिसतं की प्रचंड तहान लागली की झाडे किंचाळू लागतात.तुम्ही जंगलात असाल तर मात्र हे ऐकू येणार नाही कारण हे मानवी श्रवण मर्यादेबाहेरच्या ध्वनिलहरी असतात. स्वीस फेडरल इन्स्टिट्यूट फॉर फॉरेस्ट,स्नो अँड लँडस्केप रिसर्च नावाच्या संस्थेत झाडांच्या ध्वनींचा अभ्यास केला गेला आहे.ते म्हणतात की,जेव्हा मुळाकडून पानांपर्यंत पाण्याचा प्रवाह होत नाही तेव्हा खोडातून कंपन होते.कदाचित हा एक तांत्रिक प्रतिसाद असेल... पण तरीही?
आपल्याला ध्वनी कसा तयार होतो,याची वैज्ञानिक माहिती आहे.मानव ध्वनी कसे काढतात,हे जर आपण सूक्ष्मदर्शिकेतून पाहिलं तर फार काही वेगळं दिसणार नाही. आपल्या श्वासनलिकेतून जेव्हा हवा जाते, त्या वेळेस आपल्या स्वरतंतूंचं कंपन होतं आणि ध्वनी तयार होतो.त्या दृष्टीने मी जेव्हा खोडांच्या या कंपनाचा विचार करतो, खासकरून मागे वर्णन केलल्या रोपट्यांच्या मुळांचा 'तडतडणारा' आवाजाच्या संदर्भात ! मला अशी खात्री वाटू लागली की ही स्पंदनेसुद्धा खोडाकडून मारलेल्या तहानेच्या हाका आहेत.झाड आपल्या मित्रांना ओरडून सांगायचा प्रयत्न करत असतील की पाणीपुरवठा धोक्यात आला आहे.
वाचता..वाचता… वेचलेले..।
रूसोचे पुस्तक स्विस अधिकाऱ्यांनी जाळले हे एकून तो रागावला.कारण विचार स्वातंत्र्याचा तो भोक्ता होता.तो रूसोला लिहिता झाला.
तुम्ही लिहिता त्यातील एका अक्षराशीही मीसहमत नाही परंतु तुम्हाला ते लिहिण्याचा हक्क आहे व त्या हक्काचे मी मरेपर्यंत समर्थन करीन.तुमच्या विचार करण्याच्या व ते व्यक्त करण्याच्या स्वातंत्र्याचे अखेरपर्यंत संरक्षण करीन.
आणि रूसोला जेव्हा कोठे आधार मिळेना, शकडो शत्रू त्याचा पाठलाग करीत होते, त्याला सतावीत होते व रूसो सारखा इकडे तिकडे पळता पळता थकून जात होता.त्यावेळेस व्हॉल्टेअरने त्याला लिहिले.
माझ्या घरी येऊन रहामी तुमचे मनापासून स्वागत करीन. हे दोन महान पुरुष एकत्र राहते तर केवढा चमत्कार झाला असता !
दुखण्यातून सुधारणा होत जाणे यासारख्या गोष्टी झोपेतच होत असतात.निद्रा ही मूळ अवस्थेसारखी असते असे बुर्ताशा जे म्हणाला होता ते त्याचे म्हणणे बरोबर होतेः
गर्भाशायातील जीव सदैव झोपलेलाच असतो;लहान मूल बरेचसे झोपेतच असते.जीवन म्हणजे गमावलेले परत मिळविणे.झोप म्हणजे मरणाचा घास; दिवसाच्या श्रमाने जीवनाचा जो भाग झिजला, श्रमला असतो त्या भागाला पुन्हा तरतरीत करण्यासाठी झोप असते.मरणापासून उसनां घेतलेला हा घास खाऊन ते जीवन पुन्हा तरतरीत होते.निद्रा म्हणजे आपला चिरशत्रू. आपण जागे असतानाही ती थोडीफार आपणाजवळ असते.शेवटी अगदी शहाण्या लोकांच्या डोक्यातही प्रत्येक रात्री अत्यंत चमत्कारिक व अर्थहीन स्वप्नांचा धूमाकूळ चालत असतो.अशा डोक्यांकडून (मेंदूकडून) कशाची अपेक्षा करायची? त्यांना आपल्या स्वप्नांतून जागे झाल्यानंतर पूनःआपले नित्याचे विचार करणे सुरू करावयाचे असते.असे मेंदू अधिक काय करणार? इच्छाशक्ती म्हणजे माणसाचे सारस्वरूप.जीवनाचे ते स्वरूप आहे.जीवन कोणत्याही स्वरूपात असो;निर्जीव सृष्टीही का असेना.
सर्वत्रही जडातही तर तीच संकल्पशक्ती जर भरून राहिली असेल तर मग काय? इतका दीर्घ काल जिचा शोध केला जात आहे,व जिने इतका दीर्घकाल निराश केलेली असेल,अशीच जर ती 'स्वरूप सत्ता' असेल,तीच संकल्पशक्ती जर अंतिम अन्नःसत्ता असेल व सर्व गोष्टींचे तो गुप्त रहस्य असेल तर काय?
प्रत्येक वस्तूत एक अंतःशक्ती आहे,ती त्या वस्तूला आकार देते.झाडे घ्या;ग्रह घ्या; पशुपक्षी घ्या,त्या सर्वांत ती असते व त्यांना आकार देत असते.प्राण्यातील सहजप्रवृत्ती निसर्गात जी सहेतूकता शिल्लक राहिली आहे तिचे हे उदाहरण आहे.जी कृती हेतूच्या प्राप्तीने प्रेरित झालेली म्हणजे सहेतूक असते तशीच सहज प्रवृत्तीही असते;
आणि तरीही ती हेतुविरहित असते.निसर्गातील सर्व रचनानिर्मिती ही हेतुप्रधान कृतीच्या सदृशा असते,आणि तरीही ती हेतुविरहित असते.बुद्धीपेक्षा संकल्पशक्ती किती आधीची,किती पूर्वीची आहे ते प्राण्यांतील आश्चर्यकारक यांत्रिक कुशलतेवरून दिसून येते.
युरोपातून सर्वत्र हिंडलेला असा एक हत्ती होता. त्याने शकडो पूल ओलांडले होते जरी त्या पुलावरून अनेक माणसे,घोडे जाताना तो बघत होता तरी त्या तकलुपी पुलावरून स्वतः मात्र पुढे जाईना.कारण त्याला आधी तसा अनुभव कधी आलेला नसतो.तर त्याला तसे सहजप्रवृत्तीकडे तसे वाटते.
ओरँग ऊटँग माकडे कोठे विस्तव दिसला तर त्याच्याजवळ शकत बसतो;परंतु विस्तवात तो जळण नाही घालीत.अर्थातच अशी ही कृत्ये सहजप्रवृत्त असतात,तर्कशुद्ध विचारांचे फलित नसतात.ती बुद्धीची अभिव्यक्ती नसते,तर तो संकल्पशक्तीचा आविष्कार असतो. ही जिजीविषा,अर्थात जगण्याची इच्छा असते. जास्तीत जास्त जीवन जगण्याची इच्छा असते. सर्व जिवंत प्राण्यांना जीवन किती प्यारे असते ! आणि किती धीराने,काही न बोलता,गाजावाजा न करता,धिम्मेपणाने संकल्पशक्ती आपली कालक्रमण करीत असते ! हजारो वर्षे विद्युत तांबे व जस्त यात गाढ झोपून राहिली होती; आणि तांबे व जस्त रूप्याजवळ पडून होती. काही विवक्षित वेळी तिन्ही आणली तर आगीत जळून जातात.
सजीव सृष्टीतही पाहू तर बीज आपल्यामध्ये सर्जनशक्ती सुप्तरूपात तीन तीन हजार वर्षे साठवून पडून राहू शकते;
आणि अनुकुल परिस्थिती येताच ती बी अंकुरते, वनस्पतीच नाही तर बेडूक वगैरे प्राणी सुद्धा हजारो वर्षे दगड धोंड्यात जगू शकतात.म्हणून ही संकल्पशक्ती म्हणजे जगण्याची इच्छा; संकल्पशक्ती असते आणि तिचा सनातन शत्रू म्हणजे मरण असते.परंतु ही संकल्पशक्ती मरणासही कदाचित पराभूत करू शकते का?
प्रत्येक व्यक्तीला आवश्यक इतके दुःखाचे माप तिच्या प्रकृतीने,स्वभावानेच एकदा निश्चित करून टाकलेले असते.तो पेला कधी रिकामा होणार नाही किंवा भरलेला आहे.त्याहून अधिक भरला जाणार नाही... एखादी थोडी भारी चिंता आपल्या छातीवरून दूर झाली तर दुसरी तेथे येऊन बसते.या दुसऱ्या चिंतेचे सारे साहित्य आधीपासून होतो तयार.काळजीच्या स्वरूपात आपल्या जाणिवेत शिरायला तिला जागा नव्हती,परंतु जागा रिकामी होताच ती घुसते बघा आत.बसते सिंहासनावर राणी.
हे जीवन दुरितमय,वाईट आहे,कारण दुःख हेच जीवनाचे मूलभूत यथार्थ स्वरूप आहे. दुःखातूनच प्रेरणा मिळते.Pain is basic stimulus & reality.सुख म्हणजे दुःखाचे केवळ थांबण असते.सुख अनुभवरूप आहे. दुःखाचा अभाव म्हणजे सुख.
ॲरिस्टॉटल म्हणे की,शहाणा मनुष्य सुख नाही शोधीत,तर चिंता व दुःख यातून तो मुक्ती मिळवू पाहतो.त्याचे म्हणणे यथार्थ होते.
पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची कहाणी - सानेगुरुजी, इंद्रनिल प्रकाशन,कोल्हापूर
ऑस्ट्रेलियातील बुलडाग मुंगीचे उदाहरण फारच आश्चर्यकारक आहे.तिचे जर दोन तुकडे केले तर त्या दोन तुकड्यांत लढाई सुरू होते,शेपटी व डोळे यांचे युद्ध सुरू होते.डोके दातांनी शेवटीला चावू पाहते तर शेपटी डोक्यात नांगी मारू पाहते व शौर्याने स्वरंक्षण करते.अर्धा तास चालते अशी लढायी,शेवटी दोन्ही तुकडे मरतात,
किंवा दुसऱ्या मुंग्या त्यांना ओढून नेतात.ज्या ज्या वेळेस हा प्रयोग करण्यात आला त्या त्या वेळेस हा झगडा दिसून आला.Yunghahn युंघान एका जावा बेटातील अशी गोष्ट सांगतो.जावा बेटात एक विस्तृत मैदान आहे.त्या मैदानात जिकडे तिकडे हाडे पडलेली आहेत.हे रणक्षेत्र असावे असे मला वाटले.परंतु ही हाडे large turtles (हाडे) मोठ्या कासव प्राण्याची होती... अंडी घालण्याकरीता ते समुद्रातून येथे जमिनीवर येतात आणि नंतर रानकुत्रे त्यांच्यावर हल्ला करतात.ते कुत्रे यांच्या पाठी उलट्या करून त्यांच्यावर बसतात.त्यांच्या पोटापासून लहानसे कवच दूर करून त्यांना जिवंत खाऊन टाकतात. परंतु पुष्कळदा असे होते की,एखादा वाघ या कुत्र्यांवर झडप घालतो.