* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: प्लेटोचा संदर्भ / A reference to Plato

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१५/७/२४

प्लेटोचा संदर्भ / A reference to Plato

युरोपच्या नकाशाकडे नजर फेका,भूमध्य समुद्रात आपली वाकडी बोटे लांबवणारा ग्रीसचा कृश हात तुम्हाला दिसेल.ग्रीसच्या दक्षिणेस महान् क्रीट बेट आहे.या बेटापासून ख्रिस्तपूर्वीच्या दुसऱ्या सुवर्णयुगात संस्कृती व सुधारणा यांना आरंभ झाला.

त्याला ग्रीसच्या देशाने घट्ट पकडून जिंकून घेतले.या बेटापासूनच ख्रिस्तपूर्व दुसऱ्या सुवर्णयुगात ग्रीसने संस्कृती सुधारणा यांना पकडून हस्तगत केले.पूर्वेकडे ईजिप्तसमुद्राचे पलीकडे आशिया मायनर आहे.

आशिया मायनर आज शांत व स्वस्थ दिसले तरी एकेकाळी ते चैतन्याने मुसमुस होते. प्लेटोच्या पूर्वकाळात उद्योगधंदे, व्यापार व मुक्त विचार या सर्वांनी आशिया मायनर चैतन्याने सळसळत होते.

पश्चिमेस पलीकडे इटली उभा आहे.तो जणू समुद्रातील स्तंभ,झुलता मनोरा आहे आणि सिसिली व स्पेनही पश्चिमेसच आहेत.या भागांतून ग्रीकांच्या भरभराटीस आलेल्या वसाहती होत्या आणि सर्वांच्या पलीकडे ज्याला आपण जिब्राल्टर म्हणतो ते हरक्युलिसचे खांब उभे आहेत.जिब्राल्टरच्या भव्य भीषण जबड्यातून पलीकडे जावयास फारसे प्राचीन खलाशी धजत नसत आणि उत्तरेस माणसाळलेले अर्धवट रानटी असे थिसली, एपिरस व मॅसिडोनिया वगैरे भाग होते.या भागातूनच होमर व पेरिक्लीस या ग्रीसांच्या काळातील प्रज्ञावंत पुरुषांच्या पूर्वजांच्या टोळ्या ग्रीसमध्ये आल्या होत्या.


पुन्हा या नकाशाकडे नीट पहा.समुद्राचा ठायीठायी फाटलेला दंतुर किनारा तुम्हास दिसेल व जमिनीचे चढावही दिसतील. जिकडे तिकडे आखाते,भूशिरे आणि आत शिरलेला सागर.समुद्र व जमीन जणू पर्वत व टेकड्या यांच्यात ठेचकाळत आणि हेलकावे खात आहे.समुद्र व जमीन यांच्या या नैसर्गिक अडथळ्यांमुळे ग्रीस देशाचे अलग अलग असे अनेक तुकडे पडले होते.त्या काळात प्रवास व दळणवळण करणे आताच्या मानाने फारच कठीण व दगदगीचे असे.म्हणून प्रत्येक दरी आपापले स्वतंत्र आर्थिक जीवन निर्माण करीत असे व स्वयंपूर्ण होण्याचा प्रयत्न करीत असे.त्या त्या भागात प्रत्येकाने स्वायत्त सरकार,स्वतःच्या स्वतंत्र संस्था,त्यांची विशिष्ट बोली भाषा, विशिष्ट धर्म व संस्कृती वगैरेंची निर्मिती होत असे.प्रत्येक भागाचा असा अलग अलग विकास होई.त्या त्या स्वतंत्र भागात एक दोन मोठी शहरे असत व त्यांच्याभोवती डोंगर उतरणीवरून पसरलेली शेतजमीन असे.ही शेतजमीन संपली की,दुसऱ्या स्वतंत्र भागाची शेतजमीन सुरू होई.

इयुबा,लोक्रिस,इटोलिया,फोसिस,बोटिया,अकिया,

अर्गोलिस,एलिस,मेसेनिया आणि लॅकोनिया,स्पार्टा आणि अत्तिका आणि त्याचे अथेन्स अशी अनेक नगरराज्ये विखुरलेली होती.


आणि अखेरची पुन्हा एकवार दृष्टी फेका आणि त्यातील अथेन्सचे स्थान नीट पहा. ग्रीसच्या मोठ्या शहरांच्या अती पूर्वेस ते आहे.आशिया मायनरच्या भरभराटलेल्या शहरांशी दळणवळण ठेवण्यासाठी अथेन्सच्या दरवाज्यातून जाणे सोयीचे पडे. आशिया मायनरमधील जूनी शहरे ग्रीस देशांतील विकास पावणाऱ्या शहरांना येणाऱ्या जाणाऱ्या रहिवाशांच्या द्वारा आपल्या ऐषआरामाच्या वस्तू तर पाठवीतच; परंतु आपली संस्कृतीही पाठवीत असत. आशिया मायनरमध्ये एक फार सुंदर बंदर होते,याचे नाव पिरस.समुद्राच्या प्रक्षुब्ध पाण्यापासून शकडो गलबते या बंदरात निवारा घेऊ शकत.तसेच या शहराजवळ भलामोठा आरमारी ताफाही होता.


ख्रिस्तपूर्व ४९० ते ४७० या काळात स्पार्ट व अथेन्स परस्परांचे हेवेदावे विसरून एक झाली.डरायस व झर्सिस हे ग्रीक लोकांस गुलाम करू पहात होते.

आशियायी साम्राज्य वाढवून ग्रीस देशाला आपली वसाहत करू पहात होते.परंतु एकजूट झालेल्या अथेन्स व स्पार्ट यांच्या सैन्याने त्यांचे हेतू विफल केले. तरुण नवजवान व युरोपचा वृद्ध आशियाशी हा सामना होता.या युद्धात स्पार्टाने सैन्य पुरविले व अथेन्सने आरमार दिले.युद्ध संपले.स्पार्टाने आपल्या सैन्यास रजा दिली. स्पार्टात एकप्रकारची आर्थिक अव्यवस्था माजली.युद्धानंतर सर्वत्रच तसा अनुभव येतो.परंतु अथेन्सने मात्र आपल्या आरमाराचे व्यापारी काफिल्यात रूपांतर केले.लढणारी गलबते व्यापार करू लागली.अथेन्स हे प्राचीन जगातील सर्वांत महत्त्वाचे असे व्यापारी शहर बनले स्पार्टा पुन्हा शेतीभाती करू लागले व एका बाजूस पडले.त्याची वाढ खुंटली.परंतु अथेन्स गजबजले.व्यापार वाढला.बंदर वाढले.शेकडो जातिजमातीचे, नाना वंशाचे लोक,येथे एकत्र येत,भेटत, बोलत.विविध मानवांचे हे मीलनस्थान झाले. नाना प्रकारच्या चालीरीती,नाना संस्कृती, नाना विचार यांचा संबंध येऊ लागला.या संबंधांमुळे व स्पर्धांमुळे तुलना करण्याची प्रवृत्ती बळावली.लोक पृथक्करण व विचार करू लागले.


जेथे अशी मिळणी होत असते,तेथे परंपरा, रूढी,

समजुती व आग्रही मते ही एकमेकांवर घासून शेवटी काहीच उरत नसते.जेथे हजारो पंथ व संप्रदाय असतात तेथे त्या सर्वांविषयी एकप्रकारची साशंकवृत्ती व अंधश्रद्धा उत्पन्न होते.बहुधा व्यापारी हे पहिले नास्तिक असावेत.त्यांनी इतके पाहिलेले असे की,त्यांची फारशी कशावर श्रद्धा उरतच नसे आणि व्यापाऱ्यांची सर्वसाधारण प्रवृत्ती जगातील लोक ठक तरी असतील नाहीतर मूर्ख तरी असतील असे मानण्याची असल्याने प्रत्येक धर्माबद्दल ते साशंक असत.प्रत्येक पंथ व संप्रदाय याविषयी ते प्रश्न करीत.

या व्यापाऱ्यात आस्ते आस्ते विज्ञानही वाढू लागले.

विनिमयाचे व्यवहार अधिकाधिक गुंतागुंतीचे होऊ लागल्यामुळे गणित वाढले.समुद्रप्रवास अधिक धाडसाचा होऊ लागल्यामुळे खगोल विद्या वाढली. संपत्ती वाढल्यामुळे फुरसत व सुरक्षितता आली आणि त्यामुळे शोधबोधास अनुकूल परिस्थिती उत्पन्न झाली.अशा काळातच तत्त्वज्ञाते जन्मतात.चिंतेन-मनन सुरू होतात. आता समुद्रावरून जाताना दिग्दर्शन करा एवढेच ताऱ्यांना विचारून माणसे स्वस्थ बसतानाशी झाली,तर या विश्वाच्या कोड्याचे उत्तर द्या अशीही मागणी ते ताऱ्यांजवळ करू लागले.

आरंभीचे ग्रीक तत्त्ववेत्ते खगोलशास्त्रज्ञ होते.

ॲरिस्टॉटल म्हणतो, मिळालेल्या सिद्धीमुळे ग्रीकांना अभिमान वाटून ते अधिक पुढे जाऊ लागले. इराणजवळ झालेल्या लढ्यानंतर सर्व क्षेत्रांत ग्रीक पुढे सरसावू लागले.संपूर्ण ज्ञानाचा प्रांत ते आपला मानू लागले.त्यांची बुद्धी सर्वत्र संचरू लागली.

उत्तरोत्तर अधिक व्यापक व विशाल अध्ययन होऊ लागले.पूर्वी घडामोडी अतीमानवी शक्तीने होतात असे वाटे,त्याची कारणमीमांसा ते धैर्याने करू लागले.निरनिराळ्या घडामोडी व गोष्टी यांचे नैसर्गिक पद्धतीने स्पष्टीकरण ते विचारू लागले. जादुटोणे व धार्मिक कर्मकांड यांचे स्तोम हळूहळू कमी होऊन विज्ञान व त्याद्वारे नियंत्रण यांना स्थान मिळू लागले;

तत्त्वज्ञानास आरंभ झाला.


आरंभी हे तत्त्वज्ञान सृष्टिज्ञानात्मक होते.या भौतिक जगाकडे दृष्टी फेकून या सर्व वस्तूजातीचे अंतिम आणि अविच्छेद्य घटक कोणते याचा तपास तत्त्वज्ञानाने सुरू केला.या सर्व विचारांचे पर्यवसान म्हणजे डेमॉक्रिटसचा भौतिकवाद


(डिमॉक्रिटस ख्रि.पू.४६० ते ३६०) डेमॉक्रिटस म्हणे,वस्तूतःदोनच तत्त्वे उरतात.अणू व अवकाश.

ग्रीकांच्या तात्त्विक विचारातील हा एक महत्त्वाचा प्रवाह होता.प्लेटोच्या काळी हा प्रवाह जरा लुप्त झाल्यासारखा वाटला. परंतु एपिक्युरसच्या काळात पुन्हा वर आला (एपिक्युरसचा काळ ख्रि.पू. ३४२ ते २७०); आणि या प्रवाहाचे मोठ्या प्रचंड घवघवीत नदीमध्ये ल्युक्रेशियसच्या काळात रूपांतर झाले.(ल्युक्रेशियसचा काळ खि.पू. ९८ ते ५५),परंतु ग्रीकांचे सर्जक विचारदर्शन सोफिस्टांकडून झाले.सोफिस्ट म्हणजे प्रज्ञानाचे फिरते आचार्य.या बाह्य वस्तुमानाकडे पाहण्याऐवजी ते अंतर्मुख होऊन स्वतःचे विचार व स्वतःची वृत्ती यांचा विचार करीत.हे फार हुशार लोक होते. (उदाहरणार्थजॉर्जियास व हिप्पियाज) यापैकी काही काही फार खोल विचार करणारे होते.उदा.प्रोटॅगोरस,प्रॉडिकस.आजच्या अर्वाचीन तत्त्वज्ञानात मनाचा व वर्तनाचा असा एकही प्रश्न किंवा उत्तर नाही की,जे त्या लोकांना जाणवले नाही व ज्याची त्यांनी चर्चा केली नाही.

आजचे नीतिशास्त्र व आजचे मानसशास्त्र, आजचे तत्त्वज्ञान व आजचे जीवनाचे प्रश्न या सर्वांचे पडसाद त्या सोफिस्ट लोकांच्या विवेचनांत दिसून येतात. हे सोफिस्ट कोणत्याही गोष्टींबद्दल प्रश्न करीत.धार्मिक व राजकीय विधिनिषेधांची ते पर्वा करीत नसत.ते निर्भयपणे सर्व प्रश्नांची चर्चा करीत.बुद्धीच्या सिंहासनासमोर प्रत्येक पंथ,संस्था व मत आणून ते उभे करीत. शासनविषयक क्षेत्रात त्यांच्यात दोन पक्ष होते.एक पक्ष रूसोप्रमाणे जे स्वाभाविक आहे ते चांगले आहे,सारी सुधारणा वाईट आहे असे म्हणे.

निसर्गतः सारी माणसे समान असतात परंतु वर्गनिर्मित संस्थांमुळे माणसात विषमता उत्पन्न होते.कायदा ही वस्तू बळवंतांनी निर्मिली आहे,

दुबळ्यांवर सत्ता चालविण्याचे ते साधन आहे.असे त्याचे मत होते.आणखी एक पक्ष होता,त्याचे नीत्शेप्रमाणे मत होते.निसर्ग हा सद्सताच्या पलीकडे आहे.त्याच्यामते स्वभावतःसारी माणसे असमानच असतात.बळवंतांना मर्यादा घालण्यासाठी,त्यांनाना रोखण्यासाठी दुबळ्यांनी नीतिशास्त्र निर्मिले आहे. 


बलशाली होणे हा मानवाचा सर्वोत्कृष्ट सद्‌गुण होय;मानवाची हीच खरीखुरी इच्छा असते.

शासनाच्या सर्व प्रकारात अत्यंत शहाणपणाचा व स्वाभाविक प्रकार म्हणजे नबाबशाही,अमीरशाही ही होय.लोकशाहीवर हा जो हल्ला अथेन्समध्ये सुरू झाला त्याचे कारण काय बरे होते?अथेन्स शहरात श्रीमंतांचा एक अल्पसंख्य वर्ग वाढत होता,उदयास येत होता.हा पक्ष स्वतःला अल्प लोकसत्ताकं राज्यपद्धतीचा पुरस्कर्ता म्हणवी.लोकशाहीत राम नाही,लोकशाही कुचकामी आहे,कार्यक्षम नाही,असे ते म्हणत.खरे पाहता अथेन्समध्ये फारशी लोकसत्ता नव्हती की जिला नावे ठेवावी. अथेन्सच्या ४ लाख लौकांपैकी अडीच लक्ष गुलाम होते.त्यांना कोणत्याही प्रकारचा राजकीय हक्क नव्हता.जे दीड लाख स्वतंत्र नागरिक उरले,त्यांच्यापैकी फारच थोडे सर्वसामान्य सभेला उपस्थित रहात. एक्लेशिया या सर्वसामान्य सभेत राज्याचे सारे धोरण आखण्यात येई,चर्चिले जाई. परंतु जी काही लोकशाही तेथे होती,ती एकप्रकारे परिपूर्ण होती.


इतकी परिपूर्ण लोकसत्ता कुठेही आपणास दिसणार नाही.सर्वश्रेष्ठ अधिकारी मंडळाला डिकास्टेरिया (Dikasteria) म्हणत.यात जवळजवळ एक हजार लोक त्यांच्या यादीतून आद्याक्षराप्रमाणे घेतले जात. लोकशाहीचे शत्रू म्हणत की,अशी,इतकी परिपूर्ण आणि तरीही विरोधकांच्याच मते तितकीच हास्यापद लोकशाही अन्यत्र क्वचितच कोठे असेल.


ख्रिस्तपूर्व ४३० ते ४०० पर्यंत जी पेलोपोनेशियन लढाई एक पिढीभर सारखी चालली होती तीत स्पार्टाने अथेन्सची आरमारी सत्ता शेवटी नष्ट केली.

त्यामुळे क्रिटियाज ज्याचा नेता होता.अशा अथेन्समधील मूठभर वरिष्ठ वर्ग म्हणू लागला की,लोकशाही कुचकामी आहे.लोकशाहीमुळे आपणास युद्ध यशस्वीरित्या करता आले नाही.हे श्रीमंत अथेनियन स्पार्टातील वरिष्ठ वर्गाच्या सत्तेची गुप्तरीतीने स्तुती करीत.अथेन्समधील अल्पसंख्याची सत्ता असावी असे म्हणणाऱ्यांमध्ये बरेचसे पुढारी हद्दपार केले गेले.परंतु जेव्हा अथेन्स स्पार्टाला शरण गेले व शेवटी तह झाला तेव्हा त्या तहात अशी एक अट होती की,हद्दपार झालेले बडे लोक परत बोलविले जावेत.ते अथेन्समध्ये आले व त्यांनी लगेच वरिष्ठ वर्गाचे बंड पुकारले.


क्रिटियाज त्यांचा पुढारी होता.राष्ट्राची दुर्दशा करून टाकणाऱ्या लोकशाही सत्तेविरुद्ध त्यांचा हा उठाव होता.परंतु श्रीमंतांची ही क्रांती अपयशी झाली. क्रिटियाज रणांगणी धारातीर्थी पडला.हा क्रिट्यीज सॉक्रेटिसचा शिष्य होता;प्लेटोचा चुलता होता.