* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: द ओरिजिन ऑफ स्पीशीज - चार्ल्स डार्विन ( १८५९ )

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२६/३/२३

द ओरिजिन ऑफ स्पीशीज - चार्ल्स डार्विन ( १८५९ )

डार्विन जिवंत असेपर्यंत 'ओरिजिन ऑफ स्पीशीज'च्या प्रत्येक आवृत्तीत अनेक बदल होत गेले आणि दर वेळी त्यात नवीन माहिती लिहिली गेली;त्यातल्या चुका दुरुस्त करत नवीन पुरावेही जोडले गेले आणि काही रेखाटनंही काढली गेली.दर वेळी हे पुस्तक अधिकाधिक चांगलं आणि वाचनीय होत गेलं.या पुस्तकात डार्विननं उत्क्रांतीची थिअरी अतिशय सोपी उदाहरणं देऊन स्पष्ट केली.आजही त्याचं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' हे पुस्तक प्रचंड लोकप्रिय आहे, जितकं तो जिवंत असताना होतं.


पृथ्वी कधी आणि कशी निर्माण झाली,सजीव कधी आणि कसे निर्माण झाले किंवा मानवाची उत्क्रांती नेमकी कशी झाली या विषयांबद्दल लोकांच्या मनात पूर्वीपासून नेहमीच कुतूहल होतं.१८ व्या शतकाच्या आधी मानवाची किंवा कुठल्याही सजीवांच्या उत्क्रांतीमागे दैवी शक्तीचाच हात आहे आणि त्यानं निर्माण केलेला प्रत्येक जीव हा सुरुवातीला जसा निर्माण केला होता तसाच कायम आहे,असा समज अनेक लोकांचा होता;पण चार्ल्स डार्विनच्या 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' या पुस्तकानं मानवाची उत्क्रांतीबाबतची विचारधाराच बदलून टाकली! हा चार्ल्स डार्विन होता कोण ? त्यानं 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' कधी आणि का लिहिलं? डार्विनच्या आधी सजीवांच्या उत्क्रांतीबाबत जाणून घेण्यासाठी कोणी कोणी खूपच प्रयत्न केले? सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये कुठलेच बदल झाले नाहीत,कारण सजीवांची निर्मिती परमेश्वरानं निर्माण केलीये,असं ग्रीसमधल्या ॲरिस्टॉटलनं म्हणून ठेवलं होतं आणि ॲरिस्टॉटल जे म्हणेल ते चर्चसाठी प्रमाण होतं.रोमचा लुक्रेटिअससह अनेकांनी ॲरिस्टॉटलचं समर्थन केलं होतं.इतकंच काय, पण खुद्द चार्ल्स डार्विनचे आजोबा इरॅस्मस डार्विन यांचंही ॲरिस्टॉटलसारखंच मत होतं. उत्क्रांतीवादात चर्चच्या विरोधात जाऊन आपली लॅमार्किझमची थिअरी फ्रेंच शरीरतज्ज्ञ आणि वनस्पतिशास्त्रज्ञ जाँ बॉप्तिस्ट द लॅमार्क यानं मांडली.लॅमार्काचा कट्टर शत्रू असलेला जॉर्ज कॅव्हिए यानदेखील ॲरिस्टॉटलच्या विचारांना विरोध केला होता.लॅमार्कन सविस्तर मांडणी करत 'झुऑलॉजिकल फिलॉसॉफी' हे पुस्तकही लिहिलं.'प्रत्येक जीव शिडीच्या खालच्या टोकापासून वरपर्यंत जायच्या प्रयत्नात जास्त गुंतागुंतीचा बनत जातो.आजूबाजूच्या परिस्थितीनुसार प्रत्येक जीव आपल्या काही अवयवांचा जास्तीत जास्त उपयोग करतो (उदाहरणार्थ, जिराफाची मान) आणि हे अवयव कालांतरानं बळकट होतात आणि परिस्थितीमुळं झालेले हे बदल म्हणजेच गुणधर्म पुढच्या पिढीकडे आपोआप 'जातात' असे मुद्दे त्यानं मांडले होते.खरं तर 'पृथ्वीवरचे जीव हे स्थिर नसून त्यांच्यात कालांतरानं हळूहळू बदल घडत जातात' हे लॅमार्कनंच सर्वप्रथम ओळखलं होतं. त्याच्या आधी ही थिअरी कुणीही मांडली आणि ही थिअरी चक्क देवाला आव्हान देणारी असल्यानं लॅमार्कला चर्चचा नसल्यान आणि रोष पत्करावा लागला होता.!यानंतर आला तो चार्ल्स डार्विन ! 


चार्ल्स डार्विनचा जन्म १२ फेब्रुवारी १८०९ या दिवशी इंग्लडमधल्या श्रॉप्शायर शहरातल्या श्रुसबरी गावात  एका सधन आणि सुशिक्षित कुटुंबात झाला.चार्लसचे आजोबा इरॅस्मस डार्विन आणि वडील रॉबर्ट डार्विन दोघंही प्रसिद्ध डॉक्टर होते.आपल्या सह मुलांपैकी चार्ल्सनं आपले आजोबा आणि वडील यांच्याप्रमाणे डॉक्टर व्हावं,अशी चार्लसच्या वडिलांची इच्छा होती.

चार्ल्स डार्विनची आई त्याच्या वयाच्या आठव्या वर्षी वारली.त्यामुळे घरात धाक दाखवायला कोणी न उरल्यामुळे लहानपणी चार्ल्सला शाळेपेक्षा निसर्गामध्ये रमायला जास्त आवडायचं.किडे,भुंगे पकडणं आणि त्याच तासन् तास निरीक्षण करण हा त्याचा आवडता उद्योग असायचा.त्याच्या या उद्योगांमुळ त्याचे वडील नेहमीच त्याच्यावर वैतागायचे शालेय शिक्षण संपल्यावर काही दिवस चार्ल्सनं आपल्या वडिलांना त्यांच्या दवाखान्यात मदत केली होती. त्यानंतर डॉक्टर होण्यासाठी चार्ल्स एडिंबर विद्यापीठात दाखल झाला.रुग्णांचे रक्त शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या वेदनांमुळ किंचाळणारे रुग्ण आणि एकूणच हॉस्पिटल वातावरण चार्ल्सला आवडायचं नाही.रक्त बघितलं की त्याला मळमळून यायचं.तसंच तिथलं शिक्षणही त्याला कंटाळवाणं वाटायच मग तिथे असलेल्या प्लिनियन सोसायटीचं त्यानं सदस्यत्व घेतलं.इथे विज्ञानातल्या जुन्या विचाराना आव्हान देणाऱ्या चर्चा होत.धर्मातल्या अनेक गोष्टींवर वादचर्चा होत.ही गोष्ट कानावर पडताच चार्ल्सच्या वडिलांनी त्याची एडिंबरो विद्यापीठातून उचलबांगडी केली आणि चक्क त्याला पाद्री बनवण्याचा निर्णय घेतला.! पण धर्मोपदेशक होण्यासाठी चार्ल्स डार्विनला बीएची पदवी मिळवणं भाग होतं.त्यासाठी त्यानं केंब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला. इथे धर्मशास्त्रासोबतच,भूशास्त्र, प्राणिशास्त्र,

वनस्पतीशास्त्र यांच्यासारखे विषयही शिकवले जायचे;पण डार्विन धर्मशास्त्र सोडून भूशास्त्र,

प्राणिशास्त्र,वनस्पतीशास्त्र या विषयांमध्येच जास्त रमायला लागला! इथे असताना डार्विनला फॉक्स नावाचा तरुण भेटला.त्याला फुलपाखरं जमवण्याचा नाद होता. त्याच्या नादामुळे मग डार्विननंही फुलपाखरासह अनेक कीटक जमवणं सुरू केलं.याच दरम्यान केंब्रिज विद्यापीठातल्या जॉन स्टीव्हन्स हेन्स्लो या वनस्पती शास्त्रज्ञाची ओळख फॉक्सनं करून दिली आणि त्यांच्या हाताखाली शिकण्याची संधी डार्विनला मिळाली.या काळात दोघांचं चांगलंच सूत जमलं.त्या जोडीला बघून तिथले टारगट विद्यार्थी हेन्स्लोची फोड करत हेन स्लो म्हणजेच मंद कोंबडीबरोबर फिरणारा,असं म्हणत डार्विनला चिडवत असत.विलियम पॅले या ब्रिटिश नॅचरलिस्ट आणि थिऑलॉजिस्टनं लिहिलेल्या 'नॅचरल थिऑलॉजी' या पुस्तकाचा डार्विनवर चांगलाच प्रभाव पडला.इथे असताना सजीवांची उत्क्रांती या विषयाबद्दलचं डार्विनचं कुतूहल आणखीनच वाढलं होतं.याच सुमारास डार्विनच्या आयुष्याला वळण देणारी एक घटना घडली.त्या काळी वेगवेगळ्या बेटांवरचा अभ्यास आणि वैज्ञानिक संशोधन करण्यासाठी अनेक जलमोहिमा निघायच्या.

ब्राझीलमध्ये झालेल्या अशाच मोहिमांची प्रवासवर्णनं डार्विननं वाचली आणि आपणही अशीच कोणती तरी धाडसी मोहीम करावी असं त्याला वाटायला लागलं. १८३१ साली तो पदवीधर झाला आणि पुढचं शिक्षण घेण्याऐवजी त्यानं चक्क एक धाडसी जलप्रवासी मोहीम आखली;पण काही कारणांमुळे त्याची ही मोहीम बारगळली.मात्र लवकरच एक चांगली संधी चालून आली. १८३१ साली कॅप्टन रॉबर्ट फिट्झरॉयच्या नेतृत्वाखाली रॉयल नेव्हीची एक (एच.एम.एस. बीगल) बोट मोहिमेवर निघणार होती.चिली,पेरू, इंडियन द्वीपसमूह यांचा अभ्यास,

सर्वेक्षण,नकाशा तयार करणं,घड्याळं तपासणं अशी अनेक कामं ते करणार होते.आपल्याबरोबर एका जीवशास्त्रज्ञानं याव म्हणून फिट्झरॉय यांनी हेन्स्लो म्हणजेच डार्विनच्या गुरूला प्रस्ताव दिला.त्यांना जाण शक्य नसल्यानं त्यांनी तो प्रस्ताव डार्विनसमोर ठेवला आणि २३ वर्षांच्या डार्विननं आनंदानं होकार दिला,पण गंमत म्हणजे बीगलच्या कॅप्टननं मात्र डार्विनकडे बघून 'याचं नाक मला आवडलं नाही,'असं' म्हणत चक्क आपल्या बरोबर घ्यायला सुरुवातीला नकार दिला होता.मग हेन्स्लोन कॅप्टनची कशीबशी समजूत काढून त्याला राजी केलं. पुढे या प्रवासात कॅप्टन डार्विनचा जबरदस्त फॅन झाला हेही तितकंच खरं! खरं तर या जलमोहिमेत डार्विनची काही वर्ष वाया जाणार होती आणि दुसरं म्हणजे डार्विनला या प्रवासाचा आपला खर्च स्वत:लाच उचलावा लागणार होता! त्यातच त्याच्या वडिलांनी त्याला या प्रवासासाठी एक दमडीही देणार नाही,असं सांगितलं होतं.या जलप्रवासाची मोहीम दोन वर्षांची आखण्यात आली होती,पण प्रत्यक्षात मात्र पुन्हा इंग्लंडला परतायला या बोटीला चक्क पाच वर्ष लागली.या प्रवासात डार्विननं टेनेराईफ, केप वर्दे,ब्राझील,गॅलापोगॅस अशा अनेक बेटांना भेटी दिल्या.प्रत्येक ठिकाणच्या वनस्पती,पक्षी, समुद्री जीव आणि किडे यांची तो माहिती गोळा करत असे.अनेक ठिकाणचे जीवाश्मही त्यानं गोळा केले होते.कधीकधी समुद्री प्राण्यांचं विच्छेदन करून त्याची निरीक्षणंही तो लिहून ठेवायचा.तो काही नमुने आणि त्यांच्याविषयीची निरीक्षण केंब्रिज विद्यापीठातही पाठवायचा.विद्यापीठात आपली निरीक्षणं पाठवताना तो त्याची एक कॉपी आपल्या घरच्यांसाठीही पाठवायचा.त्याला या प्रवासात विविध बेटांवरची भूशास्त्रीय विविधतेची माहितीही झाली.

भूकंप,ज्वालामुखी,वादळं,स्थानिक लोकांचे हल्ले यांसारख्या अनेक संकटांचाही त्याला अनुभव आला.या प्रवासादरम्यान त्यानं दक्षिण अमेरिकेतल्या बेटांवर होणारी गुलामगिरीही बघितली आणि ती बघून तो प्रचंड अस्वस्थही झाला.जलप्रवासादरम्यान जितकी बेटं डार्विन फिरला त्या सगळ्या बेटांमध्ये त्याला सगळ्यात भावलेलं बेट म्हणजे गॅलापाँगास.या बेटावर त्याला जी विविधता दिसली ती इतर कुठल्याही बेटावर दिसली नाही.या ओसाड बेटावर त्याच्या अपेक्षेपेक्षा जास्त वैविध्य दिसलं.या बेटावरचे प्राणी इतर बेटांवरच्या प्राण्यांपेक्षा प्रचंड मोठे होते.मोठमोठ्या पाली,कासवं,सी लायन,खेकडे यांसारखे बलाढ्य प्राणी त्यानं याआधी कुठेच पाहिले नव्हते.डार्विनला बोट लागत असल्यान त्याला या प्रवासात चांगलाच त्रास झाला,तसचं तो वारंवार आजारी पडायचा.त्यातच परतीच्या प्रवासात डार्विन सपाटून आजारी पडला,इतका की त्याला चक्क व्हीलचेअरवर खिळून राहावं लागलं.या वेळी त्यानं ल्येल या भूवैज्ञानिकानं लिहिलेलं 'प्रिन्सिपल्स ऑफ 'जिऑलॉजी' नावाचं भूशास्त्रावरचं पुस्तक वाचलं आणि या पुस्तकाचा खूप मोठा प्रभाव त्याच्यावर पडला. ल्येल यानं पृथ्वीच्या भूरचनेत शतकानुशतकं कसकसे बदल होत गेले याविषयी लिहिलं होतं.या जलप्रवासामुळं डार्विनची तब्येत खराब झाली असली तरी डार्विनला या जलप्रवासातून दोन मोठे फायदे मात्र नक्कीच झाले होते.एक तर त्यानं या प्रवासात केलेलं काम आणि जमा केलेले नमुने बघून डार्विनला हे संशोधन असंच पुढं चालू ठेवता यावं यासाठी त्याला दरवर्षी ४०० पौंड देण्याचं त्याच्या वडिलांनी कबूल केलं. प्रत्येक जीव वेगळा असला तरी त्या प्रत्येकाची एकाच पूर्वजाकडून उत्पत्ती झाली असली पाहिजे,असं डार्विनला नेहमी वाटायचं,पण धर्मात प्रत्येक जीव वेगळा निर्माण झाला आहे आणि तो पहिल्यापासूनच आता जसा दिसतो तसाच निर्माण केलेला आहे असं मानलं जायचं.देवानं त्याला हव तसंच प्रत्येक जीवाला निर्माण केलं आणि नंतर त्यांच्यात कधीही बदल झालेले नाहीत,अस सांगून ठेवल्यामुळं आणि लोक पापभीरू असल्यानं हाच विचार अनेक पिढ्या चालत आला होता. डार्विनलाही लहानपणापासून हेच शिकवलं गेलं होतं;पण त्या वेळीही त्याला हे विचार मनापासून कधीच पटले नव्हते पण आपल्या मनाला पुष्टी मिळेल असं ठोस त्याला आतापर्यंत काहीच सापडत नव्हतं, ते त्याला या जलसफरीत सापडल. इथूनच त्याचं उत्क्रांतीवादाचं आकर्षण वाढणार होतं आणि ही खरी त्याची 'द ओरिजिन ऑफ स्पीशीज' या पुस्तकाची सुरुवात असणार होती.डार्विननं आपल्या प्रवासात जीवाश्मांचे जे नमुने गोळा केले होते ते त्यानं मोहिमेवरून परत आल्यावर निरीक्षणासाठी काढले.त्यातली पक्ष्यांची पिसं आणि चोची त्यानं जॉन गूल्ड या प्रसिद्ध पक्षितज्ज्ञाकडे निरीक्षणासाठी दिली. डार्विनला हे नमुने १३- १५ वेगवेगळ्या पक्ष्यांचे असतील असंच वाटलं होतं;पण त्याला गूल्डन या नमुन्यांच्या निरीक्षणानंतर जे सांगितलं, ते ऐकून डार्विन चक्क उडालाच. गूल्डनं हे नमुने फ्लिंच या एकाच पक्ष्याच्या विविध जातींचे आहेत,असं डार्विनला सांगितलं.!नमुन्यातली पिसं आणि चोची यांच्यामध्ये इतकी विविधता होती की,ही एकाच पक्ष्याची विविध रूपं आहेत यावर सुरुवातीला विश्वास बसणं थोडं कठीण होतं.बरं,डार्विननं प्रत्येक बेटावर या पक्ष्यांच्या सवयी,त्यांचं वागणं अशा अनेक गोष्टींची निरीक्षणंही केली होती.त्यांच्या सवयी थोड्याफार सारख्या असल्या,तरी त्या वेगळ्या पक्ष्यांच्या असाव्यात इतपत वेगळ्या होत्या. त्यांच्या चोचीही एकसारख्या नव्हत्या.त्यामुळंच तर डार्विनला या एकाच पक्ष्याच्या विविध जाती आहेत,अशी शंका येणं शक्यच नव्हतं.बरं यातली कोणतीही बेटं फार प्राचीन अशी नव्हतीच. त्यातल्या त्यात इतर बेटांपेक्षा गैलापागास बेटांवर तर त्याला अनेक विविध प्रकारचे पक्षी आणि प्राणी आढळले होते.एकाच पक्ष्याचे इतके विविध प्रकार का असावेत ? जर धर्मानुसार देवानं प्रत्येकाला निर्माण केलं असेल तर देवाने त्यांच्यात इतक्या जाती कशासाठी निर्माण केल्या असाव्यात ? असे प्रश्न त्याला आता भंडावून सोडत होते.या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी डार्विनन या विषयाच्या आणखीन खोलात जायचं ठरवलं.त्यानं उत्क्रांतीविषयी अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली;पण अजून अनेक प्रश्नांची उत्तरं त्याला शोधायची होती. उदाहरणार्थ,दोन रंगांचं गुलाब तयार करायचं असेल तेव्हा दोन रंगांच्या गुलाबाच्या झाडांना कलम करून दोन रंगांचे गुलाबाचं फूल मिळवणे शक्य आहे.हाच प्रयोग पाळीव प्राणी,पक्षी किंवा वनस्पती यांच्यावरही करता येतो.एकदा हा प्रयोग यशस्वी झाला की,याच प्रकारे या नवीन जातींची संख्याही वाढवता येते.अगदी पिकांमध्येही हे शक्य होतं.यालाच 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग' असं म्हणतात.हे डार्विनला माहीत होतं. याचाच अर्थ गुणधर्म हे एका पिढीकडून पुढच्या पिढीकडे जातात,ही लॅमार्कनं सांगितलेली थिअरी बरोबर आहे,असं डार्विनच्या लक्षात आलं;पण हे मानवी कृतीमुळे झालेले बदल होते. हीच थिअरी जर नैसर्गिकरीत्या बदलांना लागू होत असेल तर मुळात प्राण्यांना किंवा पक्ष्यांना हे बदल करावेच का लागत असतील ? अनैसर्गिक पद्धतीनं होणाऱ्या या 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग'ला माणूस जबाबदार असतो,मग निसर्गात होणाऱ्या 'सिलेक्टिव्ह ब्रीडिंग'ला निसर्ग जबाबदार असेल का? जसं माणूस आपल्याला हवी ती जात तयार करून घेतो तसंच काहीसं निसर्ग आपल्याला हवे तसे प्राणी,पक्षी किंवा वनस्पती निर्माण करत असेल का? असे अनेक प्रश्न त्याला पडले.या प्रश्नांची उत्तरं डार्विनला १८३८ साली थॉमस माल्थस यानं १७९८ साली लिहिलेल्या 'अँन एसे ऑन द प्रिन्सिपल ऑफ पॉप्युलेशन' या निबंधातून मिळाली.माल्थसनं लोकसंख्या आणि अन्नपुरवठा यांच्यातला संबंध कसा असतो हे सांगितलं होतं.'माणसं सतत लैंगिक सुखाच्या मागे वेड्यासारखी धावत असल्यामुळे लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणं जवळपास अशक्यच आहे,'असं माल्थसनं मांडलं.त्याच्या मते लोकसंख्या जिओमेट्रिक प्रपोर्शननं वाढते. म्हणजे ती दर ठरावीक काही वर्षांनी दुप्पट होते आणि ती मग १, २, ४, ८, १६... अशा पटीनं वाढते; पण त्याच काळात वाढत्या लोकसंख्येला अन्न पुरवण्यासाठी नवनवीन जमीन लागवडीखाली येते;पण नवीन जमीन जुन्या सुपीक जमिनीपेक्षा कमी सुपीक असल्यामुळे तिची उत्पादकता कमी कमी होत जाते आणि त्यामुळे धान्योत्पादन हे आरिथमेटिक प्रपोर्शननं वाढतं.

म्हणजे ते १, २, ३, ४, ५... अशाच तऱ्हेनं वाढतं.(अमेरिकन वसाहतीत त्या वेळी असंच घडत होतं.) त्यामुळे काही काळानं लोकसंख्येला पुरेसं अन्न न मिळाल्यानं उपासमार सुरू होते, असं त्यानं मांडलं.मग सुरू होतो, 'जगण्याचा संघर्ष'आपल्याला अन्न मिळावं यासाठी मग प्रत्येक जण दुसऱ्यावर मात करायचा प्रयत्न करायला लागतो.जे लोक या सगळ्या संकटांवर मात करून जगतात तेच अस्तित्वात राहू शकतात; पण जे या संकटांवर मात करू शकत नाहीत,त्यांचं अस्तित्वच नष्ट होतं.

माल्थसचे मुद्दे प्राणी आणि वनस्पतींच्या बाबतीतही खरे ठरतात,असं डार्विनला लक्षात आलं.यालाच 'स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स' किंवा 'नॅचरल सिलेक्शन' असं म्हणतात.माल्थसचं मत वाचल्यावर डार्विनला अनेक गोष्टी चांगल्याच लक्षात यायला लागल्या.

वातावरणात आपला लढा देण्याच्या दृष्टीनंच त्या त्या बेटावरच्या नैसर्गिक परिस्थितीनुसार आपल्याला सापडलेल्या फ्लिंच जातीच्या पक्ष्यांच्या आपल्या चोचींमध्ये बदल झाले असावेत असं डार्विनच्या लक्षात आल.एखाद्या बेटावर जर दुष्काळी परिस्थिती असेल तर पक्ष्यांना त्यांच अन्न शोधण्यासाठी आखूड आणि जाड चोचींचा काहीच उपयोग होत नाही. अशा ठिकाणी बारीक आणि लांब असलेली चोच कामाला येईल.यामुळे जरी दोन्ही प्रकारचे पक्षी त्या ठिकाणी असले तरीही ज्या पक्ष्यांची चोच बारीक आणि लांब असेल,तेच पक्षी या जीवनाच्या संघर्षात तग धरतील आणि आपला वंश वाढवतील;पण ज्या पक्ष्यांच्या चोची आखूड आणि जड़ असतील ते पक्षी जीवनसंघर्षात अन्न न मिळाल्यामुळे तग धरू शकणार नाहीत आणि हळूहळू त्यांचा वंशच नष्ट होईल.याउलट एखाद्या बेटावर जर कठीण कवचाची फळं हेच अन्न असेल तर तिथे बारीक आणि लांब चोचीचा काहीच उपयोग होणार नाही.तिथं आखूड आणि दणकट चोचीचीच गरज भासणार.अशा परिस्थितीत बरोबर वरच्या उलटआखूड,जाड आणि दणकट चोचींचेच पक्षी तग धरतील आणि बारीक आणि लांब चोच असणारे पक्षी कालांतरानं हळूहळू नष्ट होतील. थोडक्यात,एका बेटावरचे पक्षी त्या बेटाच्या विरुद्ध वातावरण असलेल्या दुसऱ्या बेटावर तग धरतीलच असं नाही.असं होत होतंच.

नैसर्गिक परिस्थितीप्रमाणे त्यात तग धरू शकणारे आणि वाढणारेच जीव टिकले आणि वाढले असणार.शिवाय या नैसर्गिक परिस्थितीत टिकण्यासाठी त्या सजीवांमध्ये योग्य ते बदल घडत गेले असणार.असं डार्विनला वाटलं मात्र हे बदल नक्कीच एका दिवसात झाले नसतील हे बदल होण्यासाठी अनेक शतक /सहस्त्रकं लागली असतील असं डार्विनला वाटलं.

अपुर्ण..

जग बदलणारे ग्रंथ-दीपा देशमुख

मनोविकास प्रकाशन