* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

११/१०/२३

सार्त्र - बोव्हा नात्याची अनेकांगी चिकित्सा - A multifaceted treatment of the Sartre-Bova relationship

'या विश्वात माणूस स्वतःच्या इच्छेविना आला आहे.स्वतंत्र असण्याची सजा त्याला मिळाली आहे.जाणीव असणारी स्व-सत्ता (बीइंग फॉर इटसेल्फ) आणि जाणीव नसणारी वस्तुरूप निर्लेप सत्ता (बीइंग इन इटसेल्फ) या दोन सत्तांमध्ये सभोवतालचा परिसर विभागलेला असतो.

माणूस म्हणजे जाणीव,स्वतःच्या पलीकडे जाता येणारे अस्तित्व;परंतु माणसाची धडपड वस्तुपदाला जाण्याची,

निर्लेप सत्ता होण्याची असते.हा अयशस्वी प्रयत्न माणसाचे जीवन असमर्थनीय करतो.स्वतःला हरवणारा माणूस ही एक व्यर्थ यातना आहे!' 


अस्तित्ववादी तत्त्वज्ञ ज्यॉ पॉल सार्त्र यांनी या मूलभूत संकल्पना मांडल्या.सिमोन द बोव्हा यांनी 'द सेकंड सेक्स'मधून स्त्रीवादाचे तत्त्वज्ञान सादर केले.पुरुषप्रधान जगात स्त्रीला दुय्यम स्थान असल्याने तिला स्वतःच्या अस्तित्वाला अर्थ देता येत नाही. मानववंशशास्त्र,

मानसशास्त्र, इतिहासाचे दाखले देत,स्त्रीवादी चळवळींचा आधार ठरलेले हे विचार त्यांनी १९४९ मध्ये मांडले,तेव्हा जगभर खळबळ उडाली होती.


विवाहसंस्था नाकारून ५१ वर्षे एकमेकांना साथ देणाऱ्या बोव्हा सात्रे यांनी - विसाव्या शतकाला मूलभूत,बंडखोर विचार दिले.त्यांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या,नाटक,निबंधांतून ते व्यक्त होतात. विचारप्रक्रिया व त्यांची घडण यासंबंधीही या दिग्गजांनी आत्मचरित्र व मुलाखतींतून भरपूर सांगितले आहे.त्यावरून कित्येक स्त्रीवाद्यांनी सार्त्रकडून बोव्हा यांच्यावर झालेल्या तथाकथित अन्यायाबद्दल लिहून ठेवले आहे.सिमोन द बोव्हा अँड ज्याँ पॉल सार्त्र द रिमेकिंग ऑफ ए ट्वेंटीएथ संच्युरी लीजंड' च्या दोन खंडांतून त्यांच्या बौद्धिक वाटचालीचा अन्वय लावला आहे.अस्तित्ववादी 'सार्त्रीय' संकल्पना मुळात बोव्हा यांनी मांडल्याचा निष्कर्ष केट व एडवर्ड फुलब्रुक यांनी काढला आहे.


पुढील आयुष्यावर परिणाम करणाऱ्या बालपणाचे वर्णन,

विश्लेषण त्यातील दोन प्रकरणांत केले आहे.दीड वर्षाचे असताना वडील वारल्यामुळे सार्त्र बारा वर्षांपर्यंत आजोळी राहिले.आई,आजी,आजोबा व पुस्तके हेच सवंगडी.मित्रांमध्ये ते मिसळत नव्हते.आजी - लुई,

आजोबा - चार्ल्स श्वाईत्झर यांच्यामुळे व्हिक्टर ह्युगो,

टॉलस्टॉय,दस्तयेव्हस्कीचे लिखाण,रशियन क्रांतीच्या चर्चा त्यांना ऐकायला मिळाल्या.चौथ्या वर्षी सार्त्र पुस्तके वाचू लागले आणि त्याच वेळी उजव्या डोळ्याची दृष्टी गेली. तरीही बागडण्याच्या वयात विश्वकोश हाताळणाऱ्या सार्त्रच्या विलक्षण बुद्धीचे कुटुंबीयांसमोरच वारेमाप कौतुक झाल्याने, स्वतःच्या वेगळेपणाची त्यांनाही जाणीव झाली. मोठ्यांच्या भाषेत बोलणारा,गंभीर साहित्य वाचणारा मुलगा पाहून चिंताग्रस्त आईने त्यावर उतारा म्हणून कॉमिक्स आणली.सातव्या वर्षी कथा,निबंध,

कविता लिहून त्यांनी सगळ्यांना चकित केले होते.आपण कुरूप आहोत,हे जाणवल्याने स्वतःचे वेगळेपण ठसवण्यासाठी कुशल वाङ्मय-चौर्य सार्त्र बालवयातच करू लागले.आईने पुनर्विवाह केल्यावर सावत्र वडिलांकडून कोडकौतुक होईना.गणित - भूमितीची सक्ती त्यांना असह्य झाली.सावत्र वडिलांविषयी तिटकारा क्रमाने वाढत गेला. वडील ही संस्था नाकारणारी बंडखोर बीजे या काळातच पडली.'आयुष्यभर मी या व्यक्तीवरचा संताप लिखाणातून काढला,'असे सार्त्र यांनी आत्मचरित्रात म्हटले आहे.

पुढे,सत्ता गाजवणाऱ्या,स्वातंत्र्यावर बंधने आणणाऱ्या

धर्म,राजसत्तेच्या विरोधात सार्त्रनी लिखाण व कृती केली.


कडक शिस्तीच्या कॅथलिक संस्कारात सिमोन द बोव्हा वाढल्या.चौथ्या वर्षापासून त्यांनाही वाचनाची आवड लागली.आई- वडिलांनी पुस्तकप्रेम जपले.बालपणापासून गोष्टी लिहिण्याच्या त्यांच्या प्रयत्नाचे खूप कौतुक झाले.

'लेखक होण्याइतके जगात दुसरे काहीही वेधक,आकर्षक नाही,हे तेव्हाच त्यांच्या मनावर पक्के ठसले.बोव्हासुद्धा समवयीन मैत्रिणींपासून वंचित होत्या.भावंडांत मोठ्या असल्याने अधिकार गाजवायला हेलेना,धाकटी बहीण होती.जॉर्ज इलियटची 'मिल ऑन द प्लॉस व लुईसा मे ऑलकॉटची कादंबरी 'लिटल वुमन' तिने बाराव्या वर्षी वाचून काढली.'मिल ऑन द फ्लॉस'मधील मॅगी तुलिव्हरचा 'स्व' आणि 'पर' या ताणात चोळामोळा होतो.

बोव्हा स्वतःला 'मॅगी'त पाहू लागल्या.पुढील आयुष्यातला हा वळणाचा टप्पा ठरला.बोव्हा यांचे वडील जॉर्जेसनी एक दिवस घोषणा केली,यापुढे आई - वडिलांचे काही चुकले आणि टीका खरी असली, तरी मुलांना तो अधिकार नाही.'मात्र,बोव्हा यांना त्यांच्या वाचनामुळे 'सत्य हे निष्ठेपेक्षा श्रेष्ठ', अशी मूल्ये प्राणापेक्षा प्रिय वाटत होती. वडिलांची पोलादी नियमावली जाचक वाटत असताना आलेले वक्तव्य,बोव्हा यांना त्यांच्या आणि कुटुंबीयांमधील दरीचे भान देणारे ठरले, बहीण आता आदर्श मानत नाही.

वडिलांना कुरुपतेबद्दल चिंता वाटतें आहे.आईने बोव्हा यांच्यामध्ये होणारे बदल टिपले आहेत.या अवस्थेत त्यांना एकाकीपण भेडसावू लागले. तेव्हापासूनच स्वातंत्र्य जपणारा,विचार समजू शकणारा साथीदार असावा,अशी आदर्श सहजीवनाची स्वप्ने त्या पाहू लागल्या.


सार्त्रप्रमाणेच बोव्हा यांचेही बालपण फार लवकर उरकून त्यांनी प्रौढत्वाकडे झेप घेतली. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील मूल्ये नाकारून विसाव्या शतकाच्या मध्य -

काळातील नवी मूल्यप्रणाली देणारी ही झेप ठरली,असा आदरपूर्वक उल्लेख लेखकांनी केला आहे.


कायद्याचे शिक्षण घेऊन निवृत्तिवेतन देणारी प्रशासन सेवा करावी,ही वडिलांची इच्छा,तर सुखाने ग्रंथपाल व्हावे,ही आईची आकांक्षा झिडकारून बोव्हा यांनी तत्त्वज्ञानात संशोधन करायचे ठरवले.एकविसाव्या वर्षी त्यांनी तत्त्वज्ञान शिकवायला सुरुवात केली,तेव्हा त्या फ्रान्स

मधील पहिल्या प्राध्यापिका ठरल्या. स्वतःची वाट शोधणाऱ्या बोव्हा यांना मार्ग सापडला.शिक्षण घेतानाच सार्त्रशी ओळख झाली.वडिलकीचा आव न आणता,

तासन् तास विद्यार्थ्यांना अवघड समस्या समजून सांगणारे सार्त्र इतरांपेक्षा वेगळे प्राध्यापक होते.दोघांनाही तत्त्वज्ञानाची,महत्त्वपूर्ण लेखनाची आस होती. परिपक्व,इतरांच्या मतांचा आदर करणारा जोडीदार बोव्हा यांनी सार्त्रमध्ये पाहिला. चमकदार बुद्धीच्या बोव्हा उत्तीर्ण झाल्याची बातमी सांगतानाच सार्त्रनी,दंतकथा ठरलेली घोषणा केली,'यापुढे मी तुला माझ्या पंखाखाली घेणार आहे.' कॉफी हाऊस,लक्झेम्बर्ग रस्त्यावर त्यांच्या प्रदीर्घ भेटी सुरू झाल्या,त्या सार्वच्या मृत्यूनंतरच (१५ एप्रिल १९८०) थांबल्या.


बोव्हा यांनी आई-वडिलांचे घर सोडून भाड्याचे घर घेतले.

आता त्यांच्यावर कुणाचेही बंधन असणार नव्हते.१९२९ च्या ऑक्टोबर महिन्यात सार्त्र बोव्हा यांनी परस्परांना साथ देण्याचा ऐतिहासिक निश्चय केला.एकमेकांपासून काहीही लपवायचे नाही,दोन वर्षे एकमेकांना तपासण्याच्या काळात परस्परांशी एकनिष्ठ राहण्याचे ठरवले.मात्र,ते दोघांनाही शक्य झाले नाही.कसलेच बंधन दोघांनी मानले नाही. एकमेकांना ते अटळ जोडीदार समजत असले तरी आकस्मिक प्रेमप्रकरणे चालूच राहिली; सार्त्रनी दोन वेळा विवाह करण्याचे प्रस्ताव ठेवले.विवाहसंस्था अटळ असल्याने तडजोड करू,ही त्यांची भूमिका बोव्हा यांनी नाकारली. सार्त्र मांडत असलेल्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या संकल्पनेशी विवाह विसंगत असल्याने हे योग्य नाही,असे बोव्हा यांचे म्हणणे होते.लष्कराच्या हवामानशास्त्र विभागात सार्त्रना जावे लागले.दीड वर्षानंतर परतल्यावर सार्त्र पुन्हा शिकवू लागले.मध्यंतरी,बोव्हा कादंबरी लिहीत होत्या.सार्त्र धारदार सुरीने व्यक्तींचे मनोविश्लेषण करत होते.बोव्हा यांच्या लिखाणात अधिभौतिक बाजूला महत्त्व असे.सार्त्र तत्त्वज्ञान व साहित्याची गल्लत करतात,असे बोव्हा यांनी अनेक वेळा सांगितले.त्यांना तत्त्वज्ञानामागे न लागता साहित्यनिर्मिती करण्याचा सल्लाही दिला.


१९३८ - ४८ हे दशक बोव्हा सार्त्र यांचे ठरले. 'शी कम्स टू स्टे','द ब्लड - ऑफ अदर्स','ऑल मेन आर मॉर्टल'या कादंबऱ्या,'द एथिक्स ऑफ अँबिग्युटी'सारखा तात्त्विक ग्रंथ ४३ - ४८ मध्ये लिहिल्याने बोव्हा यांचा दबदबा निर्माण झाला. 'नॉशिया','इंटिमसी' या कादंबऱ्यांमुळे सार्त्रकडे 'उगवता तारा म्हणून पाहिले गेले.'नो एक्झिट' हे नाटक,'बिईंग अँड नथिंगनेस' हा तात्त्विक ग्रंथ याच काळात लिहिला गेला.दोघांनी त्यांच्या लेखनातून सामाजिक,नैतिक,तत्त्वज्ञानाच्या मूलभूत समस्या ऐरणीवर आणल्या.जगभर त्यांची चर्चा सुरू झाली.अस्तित्ववादी तत्त्वज्ञानाच्या मूलभूत संकल्पनांचा विचार सुरू झाला.

साहित्य, नाटक,चित्रपटांत उलथापालथ करण्याचे श्रेय अस्तित्ववाद्यांनाच जाते.


बोव्हा यांनी 'शी कम्स टू स्टे' लिहून पूर्ण केल्यावर,सार्त्रनी 'बिईंग अँड नथिंगनेस' लिहिले. पॅरिसमधील 'कॅफे प्लोरा' मध्ये बोव्हा यांच्या समवेत बसून त्याच्या मसुद्याला अंतिम रूप दिले.याचे अनेक दाखले त्यांच्या पत्रांतून मिळतात. 'शी कम्स टू स्टे'मधील बोव्हांच्या अपश्रद्धा (बॅड फेथ) ह्या संकल्पनेचे प्रतिबिंब 'बिईंग अँड नथिंगनेस' मध्ये उमटले आहे.माणूस सदैव आपल्या अस्तित्वाचे खोटे रूप पाहू इच्छितो.आपल्या आयुष्याला अर्थ देण्यासाठीच्या धडपडीतूनच अश्रद्धा निर्माण होते.

ह्या संकल्पनेची बीजे व विस्तार बोव्हा यांनी केल्याचे लेखकांनी म्हटले आहे.


(ग्रंथाचिया द्वारी- अतुल देऊळगावकर,विश्वकर्मा पब्लिकेशन्स)


१९४०मध्ये जर्मनीने हॉलंड,बेल्जियमपाठोपाठ फ्रान्स पादाक्रांत केले.सार्त्रच्या जवळच्या मित्रांचे खून झाले.

अन्नाचा भीषण तुटवडा झाला.डाव्या विचारसरणीच्या गटात बोव्हा सार्त्र सामील झाले.जर्मन सैनिकांसमोर फ्रेंच भाषेतील निषेधपत्रके वाटण्यात,निदर्शने करण्यात दोघेही सक्रिय होते.बोव्हा रूढार्थाने राजकीय भूमिका कधीच घेत नव्हत्या.बटबटीत,बालिश कृती त्यांना अर्थशून्य वाटायच्या.राजकीय गटातल्या व्यक्ती बोव्हा यांना परिपक्व वाटत नव्हत्या. सार्त्रना उत्तरोत्तर सर्जनशील लिखाणापेक्षा कृती महत्त्वाची वाटू लागली.१९४१ मध्ये 'द प्लाईज' रंगभूमीवर आल्याने सार्त्रना ज्याँ जने,आल्बेर कामू यांच्यासारखे प्रतिभावंत मित्र मिळाले.'शी कम्स टू स्टे'ची मनापासून स्तुती व गौरव करणाऱ्यांत ज्याँ कोक्तो,गॅब्रियल मार्सेल होते. कामू व सार्त्रची वाढती मैत्री बोव्हा यांना त्रासदायक वाटू लागली.बोव्हा यांनी,

'बुद्धिमान महिलांसमोर कामू अवघडत,'असे म्हटले आहे.तरी सार्त्र यांनी 'माझा शेवटचा चांगला मित्र' असा कामूविषयी उल्लेख केला आहे.


१९५० ते ६० च्या दशकात अल्जिरियाचा मुक्तीसंघर्ष सुरू झाला.फ्रान्समध्ये द गॉल सत्तेवर आल्याने भ्रामक राष्ट्रवादाला उधाण येत होते.बोव्हा सार्त्रनी अल्जिरियात होत असलेल्या फ्रेंच अत्याचाराचा निषेध केला.संतप्त वंशवाद्यांनी त्यांना मारून टाकण्याची धमकी दिली.१९६१ मध्ये सार्त्रच्या घरावर बाँब टाकला गेला.याची कल्पना आल्याने त्यांना दुसरीकडे हलवले होते.बोव्हा यांच्या घराची नासधूस विद्यार्थ्यांनी वाचवली.स्पष्ट,प्रामाणिक भूमिका घेण्याचा हा परिणाम होता. 'द सेकंड सेक्स' प्रकाशित झाल्यानंतर कॅथलिक ख्रिश्चनांचा मस्तकशूळ उठला.बोव्हा यांची यथेच्छ बदनामी, क्रूर नालस्ती झाली.

'असमाधानी,षंढ, समसंभोगी,अविवाहित माता' म्हणून त्यांना हिणवले गेले.समाजाच्या पुढे कित्येक दशके असणाऱ्या बोव्हा यांनी धीराने हे सर्व सहन केले.


संकल्पित दोन खंडांपैकी ह्या पहिल्या खंडात लेखकांनी सार्त्र बोव्हा यांच्या समग्र साहित्याचा परिश्रमाने अभ्यास करून चिकित्सा केली आहे. विभूतिपूजेकडे चुकून जाणार नाही,याची दक्षता घेतली आहे.सहसा अनेक स्त्रीवादी केवळ एकनिष्ठ न राहण्याला जास्त महत्त्व देतात.हा उल्लेख टाळला नसला,तरी त्याला अवाजवी महत्त्वही दिले नाही.सार्त्र - बोव्हा यांच्या बौद्धिक कामगिरीत बोव्हा यांचे पारडे जड ठरवल्याने, नव्या वादाला तोंड फोडले आहे.

९/१०/२३

फुले दांपत्य आणि त्यांचा लढा.. Phule couple and their fight.. |

बंडखोर (आणि साहजिकच खडतर ) अशा सामाजिक सुधारणा करण्याच्या प्रवासावर जोतीराव फुले आपली जीवनसहचरी सावित्रीबाई फुले हिच्यासह निघाले तेव्हाच सनातनी पुण्यातल्या एका भाजीवाल्याचा 'मुलगा' आणि माळ्याचा 'नातू' म्हणून येणाऱ्या सामाजिक बेड्या त्यांनी तोडून टाकलेल्या होत्या.


या मुलाचं प्राथमिक शिक्षण मराठीत झालं होतं आणि वयाच्या तेराव्या वर्षीच त्याचं दहा वर्षांहून लहान मुलीशी लग्नही झालं होतं.त्यानंतर एका मुस्लीम शेजाऱ्याच्या आग्रहाखातर त्यानं ख्रिश्चन मिशनरी शाळेत पुढील शिक्षणास सुरुवात केली. खरंतर त्याच्यासाठी समाज

मान्य वर्तन असं होतं की,निमूटपणे रोजच्या डाळी-साळी आणि भाज्यांचा गोदामातला साठा किती आहे ते पाहायचं आणि कुटुंबाचा व्यवसाय चालवायचा. परंतु त्याऐवजी फुल्यांनी थॉमस पेने यांचं 'राइट्स ऑफ मॅन' आणि 'द एज ऑफ रिझन' ही पुस्तकं वाचली आणि त्यानंतर स्वतःचा मार्ग स्वतःच निर्माण केला.मग विवेकी लोकांच्या मनात तर्कामुळे जे प्रश्न निर्माण होतात, तेच गैरसोयीचे प्रश्न फुले समाजाला विचारू लागले.


आपण समजून घेतलेल्या संकल्पना आपल्या पत्नीला सांगणारे जोतिबा हे त्या काळातले 'असामान्य' पुरुषच म्हणावे लागतील. खरोखरच,त्यांनी आपल्या पत्नीला स्वतः शिकवलंच;पण ती घरापासून दूर अहमदनगर येथे शिक्षिकेच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाला गेली तेव्हाही तेच तिच्या पाठीशी उभे राहिले.१८४८ साली स्त्रीशिक्षणाकडे वळले,तेव्हा ते दोघेही विशीच्या आतबाहेर होते.

'मूर्खपणाच्या समजुती' म्हणून सनातनी लोकांनी केलेली आदळआपट त्यांनी कानाआड केली होती.ज्योतिबांनी नंतर एका सरकारी आयोगाला सांगितलं,"देशी म्हणता येईल अशी मुलींची शाळाच नव्हती, तेव्हा इथं.त्यामुळेच शाळा उभारण्याची प्रेरणा मला मिळाली, त्या शाळेत मी आणि माझी पत्नी कित्येक वर्ष  काम केलं." सुरुवातीला काही काळासाठी त्यांना सगळं काम थांबवावं लागलं असलं तरी लवकरच म्हणजे १८५१ साली त्यांनी एकच नव्हे;तर मुलींच्या तीन शाळा काढून ते पुन्हा कार्यरत झाले.त्यानंतर फुले यांनी परीक्षेसाठी चक्क २३७ मुलींना तयार केलं ही घटनाच एवढी सनसनाटी होती की,

अभ्यासक हरी नरके म्हणतात,"परीक्षेला जाणाऱ्या मुली पाहायला ३००० हून अधिक लोक जमले होते." 


१८५२ सालच्या उन्हाळ्यात एका वृत्तपत्र वार्ताहराने अहवाल दिला की,सरकारी शाळांत शिकणाऱ्या मुलग्यांपेक्षा जोतीरावांच्या शाळेत शिकणाऱ्या मुलींची संख्या दहा पट अधिक आहे.जर सरकारी शिक्षण मंडळाने आपल्या शाळांच्या निकृष्ट दर्जाविषयी काही केलं नाही तर लवकरच या मुली मुलांना शिक्षणात मागे टाकतील आणि त्यामुळे आपल्याला लाजेने माना खाली घालाव्या लागतील."


हे सगळंच क्रांतिकारकच होतं,परंतु जॉर्ज वॉशिंग्टन यांचेकडून प्रेरणा घेतलेल्या जोतीबांनी पुढे 'गुलामगिरी' हे महत्त्वाचं पुस्तक १८७३ साली लिहिलं आणि अमेरिकेतील गुलामगिरीची प्रथा नष्ट करणाऱ्या सज्जन अमेरिकनांना अर्पण केलं.त्यानंतर ते सावित्रीबाईंसह अस्पृश्यांसाठी शाळा काढण्याच्या कामी लागले.तेही अशा शहरात जिथं अगदी आत्ताआत्तापर्यंत ब्राह्मण पेशवे सरकारने फतवा काढला होता की अस्पृश्यांनी कमरेला झाडू बांधून फिरावं अन्यथा शहर विटाळेल.


अशा बंडखोरीचे परिणामही तसेच गंभीर होते. १८५३ सालच्या एका मुलाखतीत जोतिबांनी सांगितलं आहे की,त्यांच्या या अशा विवादास्पद कृत्यांमुळे त्यांच्या खुद्द वडिलांनीच त्यांना आणि त्यांच्या पत्नीला घराबाहेर काढलं होतं. सनातन्यांचा राग अगदी क्षुल्लक बाबींतूनही व्यक्त होत असे : उदाहरणार्थ,जोतिबांना एका सार्वजनिक सोहळ्यात शाल देऊन गौरवण्यात आलं तेव्हा बरेच लोक हटून बसले की माळ्याच्या पोराची असला मान स्वीकारण्याची योग्यता नाही.मग त्याची वैयक्तिक किंवा व्यावसायिक कामगिरी काहीही असो.एवढं होऊनही फुले दंपतीला लोकांकडून सातत्याने मान्यता मिळत होतीच.

'पुणे ऑब्झर्व्हर' आणि 'डेक्कन वीकली' या दोन वृत्तपत्रांनी नोंद केली,की त्यांचं काम " हिंदू संस्कृतीच्या इतिहासातील एका युगाची सुरुवातच आहे."


परंतु हे जोडपं लोकांकडून प्रशंसा मिळाली म्हणून तेवढ्यावरच थांबले नाहीत.बाँबे येथील सरकारकडून मानमरातब मिळाला तेव्हा जोतीबा केवळ पंचवीस वर्षांचे होते.त्यांनी जाहीर केलं की,एतद्देशीय स्त्रियांना शिक्षणाच्या देण्याच्या कार्यासाठी मी थोडंफार जे केलं आहे ते खूपच कमी आहे आणि प्रिय मायभूमीचा सुपुत्र या नात्याने माझे कर्तव्य मी केले तेही खूप अपुरेच आहे असं म्हणावं लागेल.शाश्वत बदल घडून येण्यासाठी खूपच अधिक ऊर्जा आणि धडाडी दाखवावी लागणार होती आणि सामाजिक रचना व भारतीय कुटुंबे यांच्यात सुधारणा घडवून आणायची,तर ती मुलींना अग्रक्रम देण्यानेच होऊ शकेल अशी फुले दंपतीची ठाम धारणा बनली होती.त्यामुळे मग ज्या ज्या सार्वजनिक उपक्रमात ते हजर राहत त्या व्यासपीठाचा वापर ते आपल्या बंडखोर विचारांचा प्रसार करण्यासाठी करू लागले.अर्थात आपले विचार मोठ्या प्रमाणावर प्रत्यक्षात आणण्यासाठी साधनांचं आणि पैशांचं पाठबळ त्यांच्यापाशी नव्हत.

उदाहरणार्थ,१८५३ साली त्यांनी ब्राह्मणी कर्मठपणा स्त्रीशिक्षणाच्या आड येतो म्हणून त्याच्यावर टीका करताना म्हटलं, "सनातनी ब्राह्मणांच्या मते स्त्रियांनी कायम आज्ञेतच राहिलं पाहिजे,त्यांना काहीही ज्ञान मिळता कामा नये, त्यांनी सुशिक्षित बनता कामा नये,

त्यांना धर्माविषयी काहीही माहिती असता कामा नये, त्यांनी पुरुषांसमवेत मिसळता कामा नये असं आहे.

त्यासाठी ते आपल्या जुन्या शास्त्रांचे दाखले देतात ज्यात स्त्रियांची खूपच नालस्ती केलेली असते आणि या मूर्खपणाच्या श्रद्धांना समर्थन देत ते विचारतात की,एवढ्या महान आणि विद्वान ऋषिमुनींनी लिहिलेली कुठलीही गोष्ट असत्य कशी असू शकेल ?'


पूर्णतया विरुद्ध बाजूने बोलणारे जोतिबा मुख्यत्वेकरून उच्च जातीय विरोधकांशी बौद्धिक पातळीवरही लढायला तयार होते.तसं करताना सडेतोडपणे स्वतःचा राग जराही न दडवता बोलायलाही ते मागेपुढे पाहत नव्हते.


जिला गावंढळ समजली जात होती,त्या गरिबांच्या बोलीभाषेवरील धूळ त्यांनी झटकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याच्या कहाण्या सांगितल्या.

शिवाजी महाराज कुणब्यांचे त्राते आणि दुर्बळांच्या हक्कांचे पुरस्कर्ते होते असं त्यांच चित्र त्यांनी त्यात रंगवलं होतं.त्यावर क्रुद्ध झालेल्या सनातन्यांनी दीर्घकालीन प्रचार केला की- नाही,शिवाजी महाराज हे पवित्र गाईचं आणि संस्कृतातल्या उच्च परंपरांचं संरक्षण करणारे होते.पण जोतिबांना त्याची पर्वा नव्हती,त्यांनी टीका चालूच ठेवली.

जेव्हा ब्राह्मणांनी दावा केला की आम्ही उच्च आहोत कारण आमचा जन्म ब्रह्मदेवाच्या मुखातून झाला आहे.

त्यावर जोतिबांनी विचारलं की तुमचा जन्म तिथून झाला होता,तर मग त्या जगन्निमार्त्याच्या पाळीचा स्रावही तिथूनच बाहेर पडला होता का? हा प्रश्न विचारल्यामुळे हादरलेल्या विरोधकांना त्यांनी मग डार्विनचा सिद्धान्त सांगितला होता.


जोतिबा पुरुष होते,शिवाय ब्रिटिशांशी जवळीक असलेले वजनदार असामीही होते त्यामुळे त्यांच्याऐवजी सावित्रीबाईंनाच सनातनी मंडळी लक्ष्य करू लागली.

शाळेत शिकवायला जाताना त्यांच्या अंगावर सनातनी शेणगोळे आणि दगड फेकायचे.परंतु जराही न विचलित होता त्या आपल्या पतीला आणि असंख्य लोकांना प्रेरणा देत राहिल्या.


एकदा पुण्याबाहेरील खेड्यात एक घटना घडली. तिथं एका अस्पृश्य मुलीला उच्च जातीय प्रियकरामुळे दिवस राहिले.तेव्हा त्या मुलाने घराण्याची बेअब्रू केली म्हणून आणि मुलीवर चवचालपणा आरोप ठेवून दोघांना दगडांनी ठेचून मारायचा विचार पुढे आला.तेवढ्यात सावित्रीबाई तिथं पोहोचल्या.त्यानंतर त्यांनी जोतिबांना लिहिलेल्या पत्रात आपण तो प्रसंग कसा टाळला ते लिहिलं." मी धावत धावत तिथं पोहोचले आणि या प्रेमिकांना अशा प्रकारे ठार मारण्याचे ब्रिटिश कायद्याखाली भयंकर परिणाम होतील अशी भीती घालून त्या जमावाला पळवून लावलं." साहजिकच,बरेच लोक कुरकुरू लागले की,जोतिबा पाश्चात्त्यांपुढे लोटांगण घालतात. वसाहतवादी कायद्यात मिळालेल्या नव्या स्वातंत्र्यावर त्यांचा फारच भरवसा आहे त्यामुळे ते देशाभिमान दाखवत नाहीत,त्यांची बायकोही त्यांच्या

सारखीच आहे.परंतु प्रत्यक्षात असं घडलं होतं की,फुले तेवढ्याच ताकदीने ब्रिटिशांनाही त्रस्त करून सोडत होते.


१८८८ साली ब्रिटिश अधिकाऱ्यांनी ड्युक ऑफ कनॉट,

प्रिन्स आर्थर यांच्या सन्मानार्थ आयोजित भोजन समारंभाचं आमंत्रण जोतिबांना दिलं. ते जोतिबांनी स्वीकारलं खरं पण तिथं शेतमजुराच्या पोशाखात जाऊन त्यांनी व्हिक्टोरियन मंडळींना थक्क करून सोडलं.एक फाटकी शाल हेच त्यांचं अंगावर ओढायचं एकमेव वस्त्र होतं.(इंग्लंडच्या राजाला भेटायला गांधीजी पंचा नेसून उघडेच गेले होते त्याआधीचा हा प्रसंग आहे.) मग त्यांनी त्या राणी व्हिक्टोरियापुत्राला प्रवचन द्यायला सुरुवात केली की,आजच्या सायंभोजनासाठी बोलावलेले अभ्यागत भारताचं प्रतिनिधित्व करतात असं कृपया समजू नका.ज्यांचा आवाजच दबला गेला आहे असे गरीब हेच या भूमीचे खरे प्रतिनिधी आहेत.


आणखी एके प्रसंगी स्थानिक नगरपालिकेने ठरवलं की,बाँबेच्या गव्हर्नरना हजार रुपयांची भलीमोठी भेट देऊन आपली निष्ठा दाखवायची. तेव्हा ३२ सदस्यांपैकी फक्त एकट्या जोतिबांनी त्या संकल्पनेला विरोध केला होता.ते म्हणाले होते की आणखी एका इंग्रजाचा मुळातच गर्वाने फुगलेला तोरा आणखी का वाढवायचा? त्यापेक्षा शिक्षणासारख्या अधिक उपयुक्त कामासाठी ते पैसे खर्च करता येतील.


भारतीय समाजातील दांभिकतेवर तीक्ष्ण कोरडे ओढत असतानाच भारतीय उच्च वर्गीयांना पाश्चात्त्य संस्थांमध्ये खास सुविधा देण्याच्या ब्रिटिशांच्या प्रवृत्तीमुळेही जोतिबा तेवढेच अस्वस्थ होत होते.ते विचारायचे, "आपल्या बांधवांना दारिद्र्यातून बाहेर काढण्यासाठी या अभिजनांनी असं काय योगदान दिलं आहे? ते सामान्य जनांशी कसे वागतात? त्यांच्याहून कमी सुदैवी किंवा कमी शाहण्या देशबांधवांसाठी शिकवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरात किंवा अन्यत्र शिकवण्याचे वर्ग सुरू केले होते का? त्यांनी तर त्यांचं ज्ञान स्वतःपुरतंच ठेवलं होत. जणू ती त्यांचीच मिरासदारी होती आणि अज्ञानी,

ओवळ्या लोकांशी संपर्क येऊन ती विटाळणारच होती.

त्यांनी सर्वसामान्यांच्या मनात ज्ञानाची ओढ निर्माण होईल याची आपल्याला आच आहे असं कुठल्याही प्रकारे दाखवलं होतं का? परोपकाराची फेड देशभक्तीने केली होती का? लोकांचे नैतिक आणि बौद्धिक कल्याण व्हायचं असेल तर उच्च वर्गाच्याच शिक्षणाचा दर्जा वाढवला पाहिजे असं कुठल्या आधारावर ठरवलं गेलं ? "


याचा अर्थ,अभिजनवर्गाला पटेल असंच धोरण इंग्रजांनी राबवलं होतं आणि अभिजनांनीही वाऱ्याचा रोख ओळखून पाश्चात्त्य शिक्षणाचा मार्ग धरून स्वतःचे हक्क सांभाळून ठेवले होते. परंतु स्वतःच्याच दुय्यम बांधवांनाही सक्षम केलं पाहिजे याबद्दल मात्र त्यांच्या मनात कसलीही तळमळ नव्हती.मागील काळात मोगल अथवा अन्य राजवटीत त्यांना मिळायचे,तसेच विशेषाधिकार शाबूत कसे राहतील याचीच काळजी त्यांना जास्त पडली होती.


सगळी शक्ती हिरावून घेणारा हृदयविकाराचा मोठा झटका आल्यानंतर काही वर्षांनी जोतिबांचं निधन झालं,तेव्हा बऱ्याच लोकांना वाटलं की,हे शुक्लकाष्ठ कायमचं गेलं.त्यांचं दहन झालं, प्रत्यक्षात त्यांना पुरण्याचा विधी हवा होता.तसं घडलं नाही तरी ज्येष्ठ मंडळींचा राग झेलून आणि रूढीपरंपरेचा भंग करून सावित्रीबाई आपल्या पतीच्या दहनाच्या वेळेस उपस्थित राहिल्या आणि त्यांनी त्यांच्या चितेला अग्नीही दिला.त्यानंतर सात वर्षांनी म्हणजे १८९७ सालची प्लेगची मोठी साथ येऊन गेली त्यानंतर सावित्रीबाईचं निधन झालं.मृत्यूपूर्वी त्यांना आर्थिक संकटं,तसंच अनेक वैयक्तिक आणि व्यावसायिक अडचणींना तोंड द्यावं लागलं;पण तरीही संपूर्ण पश्चिम भारत आणि त्याही पलीकडे सावित्रीबाईंची आठवण त्यांनी मागे ठेवलेल्या या जागृतीपर गीतातून अजूनही स्मरली जाते आहे.


" राज्यात बळीच्या आम्हास विद्या घडो,यशाचि अमुच्या दुंदुभी नगारे झडो,'इडा पीडा टळो', या कार्य भट ना पडो,असे गर्जुनी विद्या शिकण्या जागे होऊन झटा,

परंपरेच्या बेड्या तोडुनी शिकण्यासाठी उठा " 


गणिका,महात्मा आणि एक इटालियन ब्राह्मण,मनू एस.पिल्लई,अनु-सविता दामले,

मधुश्री पब्लिकेशन 


आणि खरंच,त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नाही.कारण त्यानंतर पुण्याच्या फुले दांपत्यावर अक्षरश: शेकडो पुस्तकं लिहिली गेली आहेत. खरोखरच,या दांपत्याने दिलेल्या लढ्याचा भर केवळ राजकीयच नव्हता;तर पांरपरिक सामाजिक संरचनेत जे काही सडकं कुजकं होतं तेही उघड्यावर आणताना त्यांनी कसलीही क्षिती बाळगली नव्हती.खरोखरच त्यांनी भारतीय संस्कृतीच्या वर्मावरच बोट ठेवलं होतं-प्रश्न विचारण्याचं धाडस त्यांनी जे केलं,ते करण्याची त्यांच्या आधी किंवा नंतर कुणाचीही टाप नव्हती.

७/१०/२३

याला जीवन ऐसे नाव.. This is the name of life..



सॉक्रेटिसला काही तासांतच हेमलॉक विषाचा प्याला दिला जाणार होता.


शिष्यांबरोबर त्याची शेवटची भेट सुरू होती.क्रेटो

या शिष्याने त्याला विचारलं,गुरुवर्य, तुमच्यावर अंतिम संस्कार कसे करायचे? तुम्हाला पुरायचं की जाळायचं?


सॉक्रेटिस म्हणाला,अंतिम संस्कार? कसले अंतिम संस्कार? त्यात 'अंतिम' काय आहे? मला जे विष देतायत,

त्यांची अशी समजूत आहे की मी विष पिऊन मेलो की माझा अंत होईल? तुम्ही तर माझे शिष्य... तुमची अशी समजूत कशी झाली? लक्षात ठेवा,मला विष देणाऱ्यांची नावं कोणाच्या लक्षात राहणार नाहीत,पण,मी मात्र आणखी हजारो वर्षं मरणार नाही.


एका राजाच्या दरबारात एक सूफी फकीर आला.तो…

राजाला म्हणाला,तुझी काय आकांक्षा आहे?


राजा म्हणाला,सामान्य माणूस ज्याची आकांक्षा करतो,ते सगळं माझ्यापाशी आधीपासूनच आहे,भरपूर आहे.तुम्ही मला असं काहीतरी द्या,जे परम कसोटीच्या क्षणी उपयोगी पडेल.


फकिराने एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद एका अंगठीत बंद केला.ती अंगठी राजाकडे दिली आणि म्हणाला,जेव्हा कोणताही मार्ग उरणार नाही,सर्व बाजू बंद होतील,हाच परम कसोटीचा क्षण आहे,अशी खात्री होईल,त्या वेळीच ही अंगठी उघड.


आणि लवकरच राजाच्या दुर्दैवाने हा प्रसंग आला.


शेजारच्या राजाने बेसावध क्षणी आक्रमण केलं आणि त्याचं सैन्य राजधानीपर्यंत पोहोचलं.राजाला राजवाड्यातून पळ काढावा लागला.शत्रुसैन्याची एक तुकडी त्याच्या पाठलागावर होती.राजा घोडा दौडवत डोंगरदऱ्यांतून एका कड्याच्या टोकावर पोहोचला.येणारी एकच वाट. त्यावर कोणत्याही क्षणी येण्याच्या तयारीत शत्रू. दुसरीकडे एक दुर्गम कडा.


राजाने अंगठी उघडली.कागदावर लिहिलं होतं,

हेही निघून जाईल.


घोड्यांच्या टापा जवळ येतायत…थेट प्राणांवरचं संकट,

आता कसं निघून जाईल,कसं टळेल,असं कसं लिहिलंय या कागदावर,अशा विचारांत असतानाच राजाचा पाय निसटला आणि तो दरीत कोसळला.


राजाचा घोडा स्वाराविना पाहून शत्रुसैन्याला राजाचा अंत ओढवल्याचं लक्षात आलं आणि विकट हास्य करत ते निघून गेले…


… कड्याच्या टोकाला एका झुडपाच्या आधाराने लटकत असलेला राजा वर आला.त्याने लपत छपत जवळचं गाव गाठलं. राजा मरण पावला,असं समजून इतस्तत:पांगलेले त्याचे सैनिक पुन्हा एकत्र आले.त्यांनी नव्या ताकदीने शत्रूवर हल्ला चढवला आणि आक्रमण परतवून लावलं.

शत्रूला धडा शिकवला.


राजाची हत्तीवरून मिरवणूक निघाली.जल्लोष. विजयाची धुंदी,ढोलताशांचा कडकडाट,ऐश्वर्याचं,वैभवाचं प्रदर्शन,

चकचकाट,लखलखाट,जयजयकार आनंदाचे चीत्कार… 


राजाने पुन्हा अंगठी काढली.पुन्हा वाचलं,हेही निघून जाईल.


त्या क्षणी तो आतल्या आत स्थिरावला आणि हसला..आता तो राजा होताच,पण, संन्यस्त राजा.


'अनामिक' जसं माझ्यापर्यंत आलं होत तसं आपल्यापर्यंत स्वगत पोहोच केले आहे.


पुढील भागात.. फुले दांपत्य आणि त्यांचा लढा..

५/१०/२३

टायटॅनिक अपघात की आणखी ..? Titanic accident or something ..?

आता बोटीने आपला शेवटचा प्राणांतिक सूर मारला.

तडफडत ती समुद्रात काटकोनात उभी राहू लागली.अखेर तिच्यावरच्या रंगीबेरंगी प्रखर दिव्यांची एक शेवटची उघडझाप झाली. सगळीकडे डोळ्यात काजळ ओतणारा काळोख पसरला.आता सर्वत्र किंकाळ्या-आरोळ्यांनी थैमान मांडले.इतके जीवन मृत्यूचे भयाण तांडव सुरू असतानाही त्या भोवतालच्या निर्मम निसर्गावर साधा ओरखडाही उठत नव्हता.आता हळूहळू सारेच विकल,शांत होऊ लागले.


हेलकावे खात जिवंतपणाच्या साऱ्या खुणा पुसून टाकीत आता टायटॅनिक सागरतळाशी विसावली.ही बोट बुडणारी नाही,अशी उद्दाम घमेंडसुद्धा तिच्या बरोबरच तळाला गेली. तिच्यासोबत फेडरल बँकेला विरोध करणारे बेंजामिन गुग्गेनहेम,इसीडोर स्टोउस आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर हे अमेरिकन आर्थिक जगतातले अनभिषिक्त सम्राटही संपले.त्यांच्या जाण्यासाठी तर १४०० लोकांना (ज्यात बेलफास्टचे शेकडो प्रोटेस्टंट्स होतेच) मृत्यू आला नाही ना? त्यांच्या जाण्याची तर ही तयारी नव्हती?


शतकापूर्वी घडलेला हा एकमेव भयानक अपघात,पण तो अपघात नसून घातपात असण्याची दाट शंका रेंगाळावी असे काही अनुत्तरित प्रश्न आहेत..


१.जे पी मॉर्गन एकाचवेळी आंतरराष्ट्रीय मर्कंटाइल मरीन व्यवसायप्रमुख,टायटॅनिक आणि फेडरल रिझर्वचा मालक असणे हा योगायोग वेगळे संकेत देतो..


२.या लायनरचा मालक जे पी मॉर्गनने पहिला प्रवास करायचा म्हणून स्वतःसाठी या बोटीवर मुद्दाम खाजगी प्रासाद आणि स्वतंत्र डेक बांधला होता.मात्र १० एप्रिलला त्याने अचानक त्याचे प्रवासाचे तिकीट रद्द केले आणि तो बायकोबरोबर फ्रान्समधल्या एका बेटावर विश्रांतीसाठी निघून गेला.हा काय केवळ योगायोग ?


३.जे. पी. मॉर्गनने प्रवास रद्द करण्यासाठी जरी आपल्या आजाराचे कारण दिले,तरी दोन दिवसांनी तो फ्रान्समध्ये ठणठणीत असलेला लोकांनी पहिला.


४.जे पी मॉर्गनप्रमाणेच 'व्हाईट स्टारलाईनर' या शिपिंग कंपनीचा सीइओ जोसेफ ब्रूस इस्मे आणि त्याची बायको ज्युलिया आणि मुले वेल्समध्ये सुट्टीचा आनंद घेताना दिसले.


५.जे. पी. मॉर्गनने साउथहॅम्प्टनहून बोट सुटण्याआधी

,तिच्यावरील महागडे ब्राँझचे सात पुतळे उतरवून घेतल्याची नोंद आहे.


६.जे. पी. मॉर्गनचा जवळचा मित्र मिल्टन हेर्सेने पण आपले तिकीट अचानक कॅन्सल केले.अमेरिकेतील हेर्से फूड साम्राज्याचा हाच मालक.


७.धातू हा बर्फापेक्षा कठीण असतो.बर्फ कठीण असता तर त्याच्याच बोटी बनवल्या असत्या. दुसरे बर्फ ही तरंगणारी वस्तू आहे,मग ती बोटीचा तळ एखाद्या कलिंगडासारखा कसा काय कापून काढेल?


८.आईसबर्ग असण्याची माहिती नसणारा कप्तान स्मिथ तर नव्हता.त्याला अटलांटिकची खडान् खडा माहिती होती.यानंतर आईसबर्ग असण्याचे अनेक इशारे त्याच्या ऑफिसर्सकडून त्याला मिळाले होते.मग त्याने त्याकडे दुर्लक्ष का केले ?


९.प्रचंड आईसबर्ग दिसत असतानाही,व्हाईट स्टार

लाईनरचा सीइओ जोसेफ ब्रूस इस्मेने कप्तानाला बोट फुलस्पीडला (२२ नॉट) आदेश देण्याचे कारण काय? इथे नोंद घेण्याजोगे म्हणजे,हा ब्रूस इस्मे मात्र या अपघातातून बचावला.


१०.बोटीवर पुरेशा लाईफ बोटी नव्हत्या.कारण?


११.बोटीने मुळात नसलेला मार्ग का घेतला? कोणाच्या सांगण्यावरून ?


१२.बोटीवरचा एकही क्रू मेंबर का वाचला नाही?


१३.कधीही न बुडणारे असे तंत्रज्ञान असणारी बोट तिच्या पहिल्याच प्रवासात बुडणे हे जरा चमत्कारिक आहे.'न बुडणारे' अशी जाहिरात करण्यामागे असणाऱ्या तांत्रिक कारणात या बोटीला सोळा वॉटरटाईट कंपार्टमेंटस होते,

पण त्यांची उंची मात्र पुरेशी ठेवली गेली नव्हती.याचे दिलेले कारण हास्यास्पद आहे कारण व्हाईट स्टार

लाईनला आपल्या पहिल्या वर्गाच्या जागा म्हणे कमी करायच्या नव्हत्या ?


१४.या बोटीवर सगळ्या विविध भागांना जोडणारे तीस लाख रिव्हेटस् होते,यातले काही रिव्हेटस् नंतर समुद्राच्या तळातून आणून त्यांचे निरीक्षण केले गेले,तेव्हा असे नोंदले गेले आहे की,ते अत्यंत दुय्यम दर्जाचे होते.बोटीने आईसबर्गला धडक दिली तेव्हा बाहेरच्या रिव्हेटसचे डोके तुटले (हे कधीही घडत नाही) आणि टायटॅनिकचे बाह्यभाग तातडीने एकमेकांपासून विलग होऊ लागले.

अत्यंत उच्च दर्जाचे रिव्हेटस् वापरले असते तर बोट बुडाली नसती.


१५.पत्रकार सिनान मोलोनी असा संशय व्यक्त करतो की,ज्या पद्धतीने टायटॅनिक आईसबर्गवर आदळल्यावर तिच्या वक्रभागाच्या कडेवरच फाटत गेली;त्या अर्थी आधी तिच्या त्या भागात तिच्यात कुठेतरी कोळशाने पेट घेतला असावा.आणि हे तिचा प्रवास सुरू होण्याआधी घडल्याची दाट शक्यता आहे.या घातपाती आगीने तिचा सांगाडा जोड असण्याच्या ठिकाणी मुद्दाम तकलादू करण्यात आला असावा.


१६.टायटॅनिकच्या दोन बहिणी होत्या.त्यांची नावे आरएमएस ऑलिम्पिक आणि एचएमएचएस ब्रिटानिका.

यापैकी ब्रिटानिका १९९६ ला एजियन समुद्रात बुडाली.

मनुष्यहानी तीस.दुसरी आर. एम. एस. ऑलिम्पिक,जी जुनी आणि एक अपघात झालेली शिप होती.ज्या अपघाताची कोणतीही भरपाई विमा कंपनीने व्हाईटस्टार लाईन शिपिंग कंपनीला दिली नव्हती.त्यामुळे तिला बुडवून टायटॅनिक बुडाली असे जाहीर करणे,हे एक विमावसुलीचे कारस्थान होते असेही सांगितले आहे.याचा पुरावा म्हणून,पुढे १९३५ साली आर. एम. एस. ऑलिम्पिक (जी मुळात टायटॅनिक असणार होती) सेवेतून निवृत्त केली गेली आणि तिला तोडण्याच्या वेळी जे वुडपॅड 'नेलींग व्हाईट स्वान' हॉटेलला विकले गेले,त्या पॅनेलच्या फ्रेमवर सर्वत्र '४०१' असा नंबर होता.आणि हाच बेलफास्टमध्ये बोट बांधणीच्या वेळी टायटॅनिकच्या भागांना दिला होता.ऑलिम्पिकच्या सर्व भागांना ४०० हा नंबर होता.याचा अर्थ ह्या बोटींची नावे बदलली गेली कारण अदलाबदली लक्षात येऊ नये ? याला दुजोरा देणारी अजून एक गोष्ट अशी की,जेव्हा ही टायटॅनिकची जाहिरात केली जात होती, तेव्हा वापरलेली अंतर्भागाची सजावटीची सर्व छायाचित्रे ही ऑलिम्पिकची होती.

जगभरच्या लोकांनी तर टायटॅनिकच्या मेडन प्रवासाला पैसे मोजले होते,ऑलिम्पिकच्या नव्हे! यामुळे काही लोकांची अशी दृढ समजूत आहे की,जी टायटॅनिक म्हणून बुडाली ती खरंतर ऑलिम्पिकच होती.अजून एक भाग असा की, याच ऑलिम्पिकचा २० सप्टेंबर १९११रोजी वीटच्या किनाऱ्यावर (isle of Wight) जो अपघात झाला होता.त्या अपघातादरम्यान ती एचएमएस हॉक नावाच्या बोटीवर आदळली होती.. तिचे एकंदर अपघात खर्चाचे बिल आणि इतर विम्याच्या न मिळणाऱ्या कव्हरेजने मोठ्या आर्थिक संकटाना सामोरे जावे लागणार होते. यावेळी टायटॅनिकच्या बांधणीला सुरुवात होणार होती.आता मॉर्गनने नुकतीच विकत घेतलेली व्हाईट स्टार लाईन शिपिंग कंपनी,समोर उभा येऊन ठाकलेला ऑलिम्पिकचा हा खर्च,शिवाय ऑलिम्पिक बंद असल्याने होणारे उत्पन्नाचे नुकसान आणि शिवाय अवाढव्य टायटॅनिकची बांधणी हे सर्व आर्थिकदृष्ट्या झेपणारे गणित नव्हते.यावर एक नामी उपाय म्हणून एक योजना आखली गेली.योजना कुटिल असणे सुसंगत होते कारण आता 'व्हाईट स्टार लाईन'चा मालक होता जे पी मॉर्गन! त्याच्या आर्थिक नफ्याच्या गणितांनी एक मोठ्ठा डाव टाकला.

आरएमएस ऑलिम्पिकलाच नवीन टायटॅनिक म्हणून समोर आणा,तिची डोळ्यांचे पारणे फेडणारी,अशक्य अशी लालसा निर्माण करणारी जागतिक जाहिरात करा.लोकांना तिच्या मेडन प्रवासाची भुरळ पाडा.तिचा शक्य तितका मजबूत विमा करा आणि मग ती बुडवून आपला सगळा तोटा भरून काढा.


अगदी सुरुवातीला ही गुप्त खलबते झालेली चौकडी म्हणजे जे पी मॉर्गन,जे ब्रूस इस्मे,लॉर्ड पिरी आणि थॉमस अँड्र्यूज.दोन्ही बोटींच्या नेमप्लेट आणि नंबरवर लक्ष नसणाऱ्यांना हे काहीच कळले नसतेएकदा प्लान ठरला आणि मग यानंतर तातडीने हालचाली सुरू झाल्या. ऑलिम्पिकचे रूपडे पालटू लागले.तिच्यावर असणाऱ्या अनंत प्रवाशांच्या पाऊलखुणा आणि सांडलेल्या विविध द्रव्याचे डाग असणाऱ्या जुन्या लाकडी फ़्लोरिंगवर तातडीने महागडी कार्पेट्स टाकण्यात आली.

टायटॅनिकच्या बी डेकवर तोपर्यंत बांधलेल्या केबिन्स तातडीने ऑलिम्पिकच्या प्रोमोनेडवर लावण्यात आल्या. ऑलिम्पिकचे रूपडे नवे कोरे वाटावे यासाठी सगळ्या गोष्टी नीट आखल्या गेल्या.


एक फरक नंतर उघडकीस आला.तो म्हणजे ऑलिम्पिकच्या सी डेकवर असणारे पोर्ट होल्स! जेव्हा टायटॅनिकची बांधणी सुरू असताना छायाचित्रे घेतली होती,तेव्हा तिथे समान असे चौदा पोर्ट होल्स दिसले होते,पण जेव्हा तिने साउथहॅम्पटन सोडले त्यावेळेच्या छायाचित्रात मात्र सोळा असमान असे पोर्ट होल्स तिच्यावर दिसतात.


हा सगळा तपशील रॉबिन गार्डीनरच्या "The Ship Never Sink' या पुस्तकात आहे.


अजून एक न झालेली रहस्यमय उकल - जे. पी. मॉर्गन आणि टायटॅनिक आपण जे. पी. मॉर्गन आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर यांच्या संबंधांचे अजून एक परिमाण पाहू.त्याकाळी एक निकोला टेस्ला नावाचा एक कुशाग्र संशोधक होता.(अजूनही टेस्ला नावाची वीज पुरविणारी आणि इलेक्ट्रिक कार्स बनविणारीही कंपनी आहे) त्याच्याकडे मॉर्गन आणि अ‍ॅस्टर दोघांनीही आपले पैसे गुंतविले होते.मॉर्गनचा हेतू त्याच्या बुद्धिमत्तेवर पैसा मिळविणे हा होता.मात्र अ‍ॅस्टर आणि टेस्ला जानी दोस्त होते.टेस्ला करीत असलेल्या एका महत्त्वाच्या संशोधनात पैसा कमी पडला असे अ‍ॅस्टरला कळले आणि त्याने तातडीने त्याला त्याकाळी ३०,००० डॉलर्स दिले.कशासाठी? तर टेस्लाने असे तंत्रज्ञान विकसित केले,ज्यामुळे वीज उत्सर्जित होईल आणि लोक आपल्या घरापाशी रीसिविंग पोल उभारून ती फुकट घेऊ शकतील.त्याने लाँग आयलंडवर प्रायोगिक तत्त्वावर एक असा टॉवर उभारला आणि मॉर्गन आणि अ‍ॅस्टरला नव्या संशोधनाबद्दल सांगितले. मॉर्गनसारख्या अमेरिकेत वीजपुरवठ्याचे काम करणाऱ्या एका कॉर्पोरेट माफियाला हे कसे झेपणार? मग विजेतून मिळणाऱ्या अमाप नफ्याचे काय ?अ‍ॅस्टरने मात्र टेस्लाला, "गो अहेड,लागेल तितका पैसा देतो." असे सांगितले.


आता एकीकडे फेडरल रिझर्व्हला,बेंजामिन गुग्गेनहेम, इसीडोर स्ट्रोउस आणि जॉन जेकब अ‍ॅस्टर यांचा विरोध वाढत चालला होता, दुसरीकडे स्ट्रोउस टेस्लाचे हे प्रकरण आणि व्हाईट स्टार लाईनरचा मालक जे. पी. मॉर्गन असणे, हे तीन मुद्दे केवळ योगायोग आहेत की या मुद्यातून एक सूत्र सामोरे येते ? बघूया.


● हे तीन अमेरिकन आर्थिक मातब्बर आणि त्यांची लोकप्रियता ही फेडरल रिझर्व्हची निर्मिती आणि अनेक नफेखोर ऊर्जा प्रकल्पात मोठा अडसर होती.या तिघांनी अत्यंत तगडी अशी राजकीय ताकद त्या विरोधात उभी केली असती कारण यातला इसीडोर हा थेट अमेरिकन काँग्रेसचा सदस्य होता. ते एकदा गेले की मग या बँकेच्या स्थापनेला लोकविरोध नसणार आणि झालेही तसेच.२३ डिसेंबर १९१३ ला कुप्रसिद्ध फेडरल बँक अस्तित्वात आली. ● टेस्लाचा जिवलग मित्र गेला आणि मग त्याचे सारे संशोधन पैशाअभावी थांबले.


पण या तिघांना मॉर्गनने गोळ्या का घातल्या नाहीत.

एक अख्खी बोट बुडवायचे काय कारण? पण खून झाला असता तर नक्कीच त्याची सखोल चौकशी झाली असती.

टेस्ला,इतर अनेक अमेरिकन उद्योगपती आणि या तिघांवर प्रेम करणाऱ्या असंख्य अमेरिकन नागरिकांनी मोठ्ठा गोंधळ घातला असता आणि त्यामुळे,पुढे अनेक वर्षे याच विषयावर चर्चा सुरू राहिली असती. बुडालेल्या बोटी

सोबत हे सारेच शांत,नीरवपणे संपले.मॉर्गनला हे सारे बुडतील;लाईफ बोटीने वाचवले जाणार नाहीत असे कसे वाटले? कदाचित मॉर्गनला यांच्या नैतिकतेची खात्री असावी.या तिघांनाही लाईफ बोटीवर जायची विनंती करण्यात आली होती,पण बोटीवरील प्रत्येक स्त्री आणि लहान मूल गेल्याशिवाय यांनी जाण्याचे नाकारले.

अ‍ॅस्टरच्या वाचलेल्या बायकोने ह्याचे अत्यंत हळवे असे वर्णन केले आहे.


महायुद्धाशिवायचे हे या शतकातले सगळ्यात मोठे कारस्थान.या घटनेचे कारण रोमन कॅथॉलिक चर्चचे आदेश की आर्थिक सूत्रधारांचे डावपेच ? का दोन्हीही? या मागे कोणीही असो पण असल्याच कोणत्यातरी बुरख्या

आडून केलेले हे या शतकातले पहिले दहशतवादी कृत्य!


ज्याने अमेरिकन लोकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या फेडरल रिझर्व्ह सिस्टीमला प्राणपणाने विरोध केला,त्या अब्राहम लिंकनच्याच मृत्यूदिनी, (१४ एप्रिल) ज्यावेळी टायटॅनिक बोट अटलांटिक

मधील त्या अवाढव्य बर्फखंडावर आपटून फुटली आणि त्याच वेळी 'फेडरल रिझर्व्ह'ला निर्माण होऊ शकणारा तो विरोधही कायमचा संपला.


अमेरिकेच्या फेडरल बँकेचा तत्कालीन चेअरमन बर्नार्के ५ आणि ६ नोव्हेंबर २०१० रोजी,जॅकील बेटांवर जाऊन त्या फेडरल रिझर्व्हच्या स्थापनेची आठवण मनात जपून आला,त्याचवेळी टायटॅनिक सागरतळाशी विसावून शतक उलटायला आले होते,पण इतक्या कालखंडानंतरही तिची नष्ट होण्याची अज्ञात रहस्ये,तिची मती गुंगविणारी कहाणी यांचे गारूड मात्र अद्यापही कायम आहे.तिच्या अजस्त्र देहासोबतच तिचे सत्य मात्र कायमचे अटलांटिकच्या निर्मम समुद्रात १२,५०० फूट खोल तळाशी,काळाच्या कराल पाण्यात बुडून गेले आहे.


या लायनरचा मालक जे. पी. मॉर्गन ३१ मार्च १९९३ ला सेंट रेगीस,रोम या कॅथलिक परगाण्यात मरण पावला.

म्हणजे टायटॅनिक बुडाल्यानंतर जवळपास एक वर्षाने आणि फेडरल रिझर्व्ह स्थापन होण्याच्या आधी नऊ महिने.ज्याने या दोन्ही कारस्थानात महत्त्वाची भूमिका बजावली,त्याचा मृत्यू या दोन घटनांच्या आगेमागे व्हावा हा एक काव्यगत न्याय !


जाता जाता - १८८६ मध्ये ख्यातनाम ब्रिटिश लेखक विल्यम टी. स्टेडने एक कथा लिहिली, तिचे शीर्षक होते.


'How the Atlantic mail steamer went down?' यातील तपशील आणि टायटॅनिकची दुर्दैवी कहाणी यांचे अनेक धागे आश्चर्यकारकरित्या जुळतात.जणू त्या पुस्तकाला स्मरून ती बुडविली असे वाटत राहते,पण त्यावरही कडी करणारा,अजून एक थरारक भाग असा की,हाच विल्यम स्टेड टायटॅनिकवरचा एक दुर्दैवी प्रवासी होता.स्टेड या घटनेत मरण पावला,पण त्याच्या द्रष्टेपणाला मात्र टायटॅनिकने कायमचे अमर केले आहे.


दिनांक ०३.१०.२३ लेखातील शेवटचा भाग..

संपूर्ण..