* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१४/११/२५

पैल तो गे काऊ / Pail to gay cow

्तरीचा दिवा


हिवाळ्यातील अशीच एक सायंकाळ.मावळत्या सूर्याच्या सोनेरी किरणांनी साऱ्या पर्वताच्या रांगा देदीप्यमान दिसू लागतात.हळूहळू तो सोन्याचा गोळा पर्वताआड दिसेनासा होतो.कावळे चार, तीन, दोनच्या थव्यांनी दशदिशांतून परतू लागतात. गावच्या मध्यावर मारुतीचं देऊळ आहे.देवळापुढे पिंपळाचा मोठा पार.मोठा पार.हा पिंपळ फार जुना आहे.

काकागार ते हेच.इथं रोज सायंकाळी हजारो कावळे जमतात.सारा गाव त्या कावळ्यांच्या कॉव कॉवने दुमदुमतो.काही वेळातच हा हलकल्लोळ एका विलक्षण गतीनं अंधारात विरून जातो.कसं शांत,अद्भुत वाटतं.दुरून घरादारातील दिव्यांची उघडझाप दिसते.लामण दिवा विझू नये म्हणून हाताचा आसरा करून एखादी सुतनू लगबगीने एका दारातून दुसऱ्या दाराकडे जाताना दिसते. माझ्या बालमनावर कोरलेले हे ध्वनिचित्र कधीही पुसट होत नाही.अंतरीचा हा दिवा कधीही मालवला नाही.


हिरव्या दुलईत


बागेत हिरव्या दुलईत कावळे झोपी गेले आहेत. मध्यरात्र झाली असेल.एका वृक्षावरील कावळ्यांचा थवा अचानक जागा झाला.त्यांच्या पंखांच्या फडफडीने वातावरणात विलक्षण अस्वस्थता पसरली.त्यांच्या कॉव-कॉव या आवाजाने सारे वातावरण निनादित झाले.इतर वृक्षांवरील कावळ्यांना देखील जाग येते आणि एकच कोल्हाळ माजतो.रात्रीच्या गर्भातील हा त्यांचा आवाज दिवसा ऐकू येणाऱ्या स्वरापेक्षा कितीतरी भिन्न आहे. 


लाडीगोडी


प्रेमिकांच्या गाठीभेटीसाठी वसंत ऋतूसारखा काळ नाही.रात्री लहान असल्या तरी असा कुठं डोळा लागतो तोच पहाटेचे आगमन होते.अंथरुणावर पडल्या पडल्या उघड्या खिडक्यांच्या जाळीतून बागेत पाहता येते.पहाटेचा गार वारा वाहू लागतो. प्रेमी युगुलांची ती गोड सलज्ज कुजबूज विरहापूर्वीची ती लाडीगोडी आणि अचानक कसला तरी मोठा आवाज कानी पडतो.वाटते की, आपणास अशा अवस्थेत कुणी पाहिलं तर नसेल ! हत् तिच्या ! हा तर बागेत उडणाऱ्या कावळ्याचा आवाज.


परभृत


कावळ्यांचा आवाज एरवी मोठा कर्कश.परंतु अंड्यावर बसलेल्या कावळीचा खोल आवाज पर्वतमालांतून ज्यानं ऐकला असेल,तो त्या गूढ निळाईनं झाकलेल्या पर्वतमालांच्या गर्भागारातून येणाऱ्या आवाजानं रोमांचित होईल.त्याच वेळी कोकिळ गाऊ लागतात.मध्येच त्या कावळींच्या घरट्यावरून ससाण्यासारखी झेप घेत कुहुकुहू करीत उडू लागतात.कावळे त्यांचा पाठलाग करीत असतात.

कोकिळेला गाता येत नाही.कंठातून घळघळणाऱ्या आवाजानं त्या नरांना साद घालू लागल्या.कावळ्याचे घरटे हेरताच त्यांनी कोल्हाळ माजविला.


शांत काकागार


बाहेर रिमझिम वर्षत आहे.पर्वतमालावर हळूवार जाणाऱ्या मेघात सारी जनश्री लपली आहे. खिडकीजवळ वेताच्या खुर्चीवर बसून या दृश्याकडे पाहात बसलो आहे.खिडकीतून येणाऱ्या वाऱ्याची गार झुळूक शरीरावर रोमांच उभे करीत आहे. कुंपणाच्या झाडावर बसलेल्या कावळ्यांनी चोची वर करून माना आखडून धरल्या आहेत व पंख पसरले आहेत.जणू त्यांना सुळावर चढविलं आहे असं वाटतं.

काकागारदेखील आता काही काळ शांत राहील.


आनंददायी कावळे


वैशाख महिना.नदीकाठचे कळंब,जांभळी, रस्त्याच्या दुतर्फा असलेले लिंब,नांदुरकी,शेतावरची आंब्याची झाडं यांवर कावळ्यांनी घरटी बांधावयास सुरुवात केली आहे.एकेका झाडावर ३-४ खोपी दिसतात.कावळी आनंदानं कोटरात बसून नादमधुर कुर्रर्रर्र असा आवाज करीत आहे.त्यांचा अनुनय-प्रियाराधन-चौर्यरत चालला आहे. कावळ्यांचं पोषण करणाऱ्या अशा निष्कंटक वृक्षांवर त्यांनी खोपी केली की त्या वर्षी चांगला पाऊस पडायचा.जिकडे तिकडे आबादी आबाद असे.परंतु एखाद्या वर्षी सावर-पांगारा-बाभूळ अशा काटेरी झाडांवर किंवा सुकलेल्या वृक्षांवर त्यांची कोटरे दिसू लागायची.रात्री-अपरात्री ती झोपेत बरळायची.त्यांना दुःस्वप्नं तर दिसत नसतील ना? कारण असे आवाज दिवसा कधीही ऐकू यायचे नाहीत आणि पुढे अवर्षण पडायचे.


पिलावरील पाखर ( जंगलाचं देणं,मारुती चितमपल्ली,साहित्य प्रसार केंद्र सीताबर्डी,

नागपूर….)


नदीचं पात्र खोल होतं.त्या काठाला लागून अर्जुनसादड्याचं वेडं वाकडं वाढलेलं झाड वर्षानुवर्षे नदीच्या पुराला तोंड देत उभं होतं. एखाद्या वर्षी सारा वृक्षच नदीच्या पाण्याखाली बुडून जाई.त्या विक्राळ प्रवाहात त्याचा शेंडा तेवढा वर दिसावयाचा.त्या वर्षी कावळ्यानं त्यावर घरटं केलं.खूप पाऊस पडला. पूर आलेल्या नदीच्या तीरावरील झाडावरच्या घरट्यात आपल्या पिलाचं रक्षण कसे होईल या विचारानं वृती एकाग्र झाल्यामुळे स्व-नासाची पर्वा न करणारी एकाकी कावळी पुराबरोबर वाहून गेली.


गॅलिलीच्या जीझस् ने आपल्या शिष्याला उद्देशून काढलेले अंतिम निरोपाचे शब्द

" I am with you always
even unto the end of the world " 

"मी नेहमी तुझ्याबरोबर आहे
अगदी जगाच्या शेवटी "

"Jagācyā śēvaṭāparyanta mī nēhamīca āpalyābarōbara āhē."

" जगाच्या शेवटापर्यंत मी नेहमीच आपल्याबरोबर आहे."


मला भेटलेली एक सुंदर स्त्री!


एका संध्याकाळी सगळी कामं  आटोपुन मंदिराबाहेरील एका आडबाजुच्या बाकड्यावर बसलो होतो, अंधार पडत चालला होता, वर्दळही फारशी नव्हती.  घरी जायच्या आधी कोणाचे काही कॉल्स, व्हॉट्स अप बघावं म्हणुन मोबाईल काढला.... बघतो तो हँग झालेला... बापरे बरेच महत्त्वाचे कॉल्स आता कसे  करायचे? मोबाईल चालु करण्याचा खटाटोप चालु झाला... वैताग आला... मोबाईल काही सुरु होईना .... 


काय करावं या विचारांच्या  तंद्रीत असतांनाच खांद्यावर कुणीतरी हात ठेवला आणि घोगर्या आवाजात कुणीतरी विचारलं, कोण हाय ...? मी तंद्रीतुन जागा होत एकदम दचकलो आणि वर पाहिलं तर बघुन भिती वाटावी अशा विचित्र चेहऱ्याची एक बाई शेजारी उभी.... 


आधी घाबरलो पण नंतर चिडुन विचारलं , काय बाई हि काय पद्धत आहे का ? दिसतंय का नाही तुला ? फटकन येवुन अशी अंगावर हात ठेवतेस ... घाबरलो ना मी...! 


तशी म्हणाली, आवो मला दिसत नाय, हितंच मी भायेर भीक मागती, या टायमाला मी हितंच बसुन भाकर खाती... मापी करा, मी जाती दुसरीकडं ... मी ओशाळलो, म्हटलं, नाही बाई बसा इथंच , मी चाललोच आहे... 


तिला बघुन अंगातला डॉक्टर जागा झाला, म्हणालो डोळे कशानं गेले? म्हणाली, लहानपणी डोळ्यातनं पाणी येत व्हतं लइ दुकायचे डोळे, आयबापानं गावातल्या भगताला दाखवलं, त्यांनं कायतरी औशद सोडलं डोळ्यात , मरणाची आग झाली, नंतर डाक्टर म्हणला कसलंतरी अॕशीड व्हतं ते, डोळं आतुन जळल्यात , तवापासुन दिसणंच बंद झालं, 17 वर्साची व्हते मी तवा.... 


अरेरे ! तुमच्या आईबापाच्या  आणि भगताच्या चुकीमुळं डोळे गेले तुमचे , आधीच ते डॉक्टरांकडे गेले असते तर हि वेळ नसती आली... बेअक्कल असतात लोकं... मी सहज बोलुन गेलो. यावर मला वाटलं माझ्याच सुरात सुर मिसळुन ती आता त्यांना शिव्या शाप देईल, पण नाही, ती म्हणाली, नाय वो कुनाच्या आयबापाला वाटंल आपल्या तरण्या पोरीचं डोळं जावं म्हणुन ? बिचाऱ्यानी त्यांना जे जमलं ते केलं... खेड्यात कुटनं आनायचा डाक्टर ? आणी आला तरी त्याला पैसं कुटनं दिलं आस्त ? माजं डोळं गेल्यावर डोकं आपटुन आपटुन माजा बाप गेला ...त्या बिचाऱ्याची काय चुक व्हती? माज्या आईनं, एकाद्या लहान बाळावानी माजं सगळं केलं... डोळं आसताना जेवडी माया नाय केली त्याच्या पेक्षा जास्त माया तीनं डोळं गेल्यावर केली.. मी चांगली आसते तर येवडी फुलावानी जपली आसती का मला ? डोळं गेल्याचा आसाबी फायदा आसतुया ... हसत म्हणाली...


वाईटातुन सुद्धा किती चांगलं शोधण्याचा प्रयत्न करत होती हि बाई ?


तरी मी म्हणालो, मग भगताचं काय ... ? त्यांनं तर चुकीचं औषध सोडलं ना ? 


म्हणाली, आसं कसं म्हणता सायेब, माजं डोळं काय मुद्दाम घालवलं का त्यानं ? आवो मला ते औशद लागु न्हाई झालं  त्याला त्यो तरी काय करणार ? आवो माजं डोळं जाणारंच होतं, त्याला त्यो निमित्त झाला फक्त ... माज्या नशीबाचे भोग हुते ते ... त्या बिचाऱ्याचा दोष न्हाई... कुणी काही चांगलं करायला गेलं आन चुकुन वाईट झालं तर त्याला दोष देवु नाई... ! डाक्टर सुई टोचतो, पण बरं वाटावं म्हणुनच ना? त्याचा दुखवायचा इचार नसतो त्यात... आपुन आसं समजुन घेतलं तर कुणाचा राग कशाला येईल...?

Intention is important behind every action या वाक्याचा सार या बाईने किती सहज सांगीतला ...!!!


पण आज्जी इतकी वर्षे तुम्ही काहिही न बघता कशा राहु शकला? 


म्हणाली, न बघता? काय बघायचं राहिलंय ... आवो सगळं बगुन मनात साटवलंय .... वासराला दुध पाजताना गाईचं डोळं म्या पाहिलेत, सगळा भात माज्या ताटात टाकुन उपाशी हासत झोपणारी आई म्या पाह्यलीय,  पिल्लाच्या चोचीत घास भरवणारी चिमणी म्या बगीतली, कुत्र्याच्या पिल्लाला दुध पाजणारी शेळी म्या बगीतली, फुटलेल्या छपरातनं आत येणारं चांदणं म्या बगीतलंय, मातीतनं उगवणारा कोंब म्या पाह्यलाय .... तुमी काय बगीतलं ह्यातलं ...? आवो ह्ये सगळं बगुन झाल्यावर राह्यलंच काय बगायला ? 


तीच्या प्रश्नाला उत्तर नव्हतं माझ्याकडे ! 


आज्जी तुमचं लग्न ....? चाचरत मी विचारलं... आज्जी म्हणाली, झालं हुतं की,  त्यो बी आंदळा हुता, त्यानंच आणलं पुण्याला मला .... पदरात एक पोरगी टाकली, त्याच्या पुण्याईनं पोरगी आंदळी नव्हती ... म्हणलं चला चांगलं दिवस आलं ... पन त्योबी दोन वर्षातच गेला...... बरं झालं बिचारा त्यो तरी सुटला.... ! 


आणि आज्जी तुमची पोरगी ? ती कुठाय ? आज्जी भकास हसली,म्हणाली, तीच्या विसाव्या वर्षी ती गेली तीच्या बापामागं त्याला शोधायला ... आता दोगं वरनं माजी मजा बगत आसतील .... स्वर्गात म्हणं नाचगाणी चालत्यात रोज, पन आमच्या आंदळ्याच्या नशीबात ते बी न्हाई मेल्यावर सुदा..... असं म्हणुन आज्जी हसायला लागली... 


पण मी सुन्न झालो, काय बोलावं हेच कळेना.... इतकं सगळं भोगुनही हि इतकी निर्विकार ! 


आज्जी, या सगळ्यात दोष कुणाचा ? 


कुणाचाच न्हाई, परत्येकानं आपापलं काम केलं, ज्याचा त्याचा मोबदला ज्याला त्याला मिळाला... आपल्या वाट्याला आलं ते घ्यायचं, का आन कसं ते इचारायचं न्हाइ... भाकर मिळाली तर म्हणायचं आज आपली दिवाळी, ज्या दिवशी मिळणार न्हाई म्हणायचं, चला आज उपास करु....दोष कुनाला द्यायचा न्हाई... वाईटात बी चांगलं शोधलं तर माणसाला वाईट वाटायचं काहि कारणच नाही... 


ते कसं आज्जी मला नाही समजलं ...


ह्ये बगा सायेब, एकाद्याचा हात जरी तुटला तरी त्यानं म्हणावं, एकच हात तुटलाय , दुसरा तरी हाय चांगला, दोनी हात गेलं तरी म्हणावं पाय तरी हायेत माजे आजुन... आता माजं बगा, दोनी डोळं गेलं तरी  बोलता येतंय ना मला ??? 


काय बोलावं मलाच कळेना, या विद्रुप चेहऱ्यामागे किती विद्वत्ता दडली होती ? वयामुळं हा पोक्तपणा आला असेल कि, भोगलेल्या सर्व यातनांमुळे मनाला आलेला हा बधीरपणा असेल ? 


काहिही असो एव्हढ्या सुंदर विचाराची, वाईटातुन चांगलंच शोधण्याचा प्रयत्न करणारी, वरवर विचित्र दिसणारी आजी तेव्हा मला जगातली सर्वात सुंदर स्त्री भासली !!! 


डाॕ.अभिजीत सोनवणे,डाॕक्टर फाॕर बेगर्स






१२/११/२५

सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !

होतं:आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्रही कमी होत होतं. २५.१०.२५ ,या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


नुसती माघार घेणं हा पराभव नव्हता.एखादे वेळी माघार घेऊन पराभव टाळणं,विजय मिळवणं,हेही जमलं असतं.आपली कुमक कमी अंतरावरून आणि लवकर येणार;शत्रूला मात्र दुरून येणारी कुमक उशिरानं मिळणार:हे चांगलंच होतं.पण अन्न मिळायचं क्षेत्र कमी होण,हे मात्र मोठं नुकसान होतं.मुळात पायवाट वारुळाची लोकसंख्या घटत असल्यानं त्यातल्या मुंग्यांना हा त्रासही फार वाटला नाही.वारुळाजवळच्या कमी क्षेत्रातच अन्न शोधूनही वारूळ जगू शकत होतं.आता सामने बंद करून शांततेचा काळ भोगणं पायवाट-वारुळाला मोहवू लागलं.पण मुंग्यांची वारुळं अशी स्थिरावलेली शांतता कायम राखू शकत नाहीत.एक वारूळ जिंकत जातं,दुसरं हरत जातं.तीन आठवडे पायवाट-वारूळ मागे सरकत होतं. शेवटी स्पर्धेचं मैदान अगदी वारुळाच्या पायथ्याशी आलं.

आता ओढा-मुंग्या शड्डू ठोकत नव्हत्या,की ताकद दाखवत नव्हत्या.त्या थेट पायवाट-वारुळावर तुटून पडत होत्या.हेही पायवाट-वारुळातल्या मुंग्यांना सुचायला हवं होतं.दर स्पर्धेत,दर सामन्यात ओढा-मुंग्या जास्तजास्त आक्रमक होत होत्या.धक्के देणं वाढलं होतं.पायवाट-मुंग्यांभोवती रिंगणं आवळली जात होती. कधीतरी ही आक्रमकता स्पर्धा-सामन्यावर न थांबता युद्धात बदलणार होती.शांततेचा उंबरठा ओलांडून ओढा-मुंग्या रणभूमीत उतरणार होत्या.एकदा पायवाट-मुंग्या मीटरभर सज्ज उभ्या असताना ओढा-अभिजन मुंगीनं उंबरठा ओलांडला.भेटलेल्या पहिल्याच पायवाट-मुंगीवर तिनं विषारी द्रव्य फवारलं.


सोबत भीती दाखवणाऱ्या फेरोमोन्सचाही मारा केला. आता तिच्या शेजारच्या ओढा-मुंग्या चेकाळल्या,आणि त्यांनीही पायवाट-मुंग्यांवर हल्ला चढवला.एका द्वंद्वयुद्धाची दोन,दोनाची चार,अशी झपाट्यानं मारामारी पसरत गेली.काही पायवाट-मुंग्या हल्ल्याला तोंड देऊ लागल्या,तर काही मागे जाऊन आणखी मुंग्यांना रणमैदानाकडे बोलावू लागल्या.आता दिखाऊ वागणूक संपली.

कोणतीच मुंगी ताठ उभी राहून उंची वाढवेना, की पोट फुगवून आकार वाढवेना.आता एकमेकींवर चढून आपल्या करवतीसारख्या जबड्यांनी शत्रूचे पाय, शत्रूची शिंगं तोडायचा प्रयत्न होऊ लागला.कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला.जखमी आणि मेलेल्या शत्रूची खांडोळी उडवली जाऊ लागली.लवकरच सगळं क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुंग्यांनी भरून गेलं.बहुतेक मेलेल्या मुंग्या पायवाट-वारुळाच्या होत्या.त्यांच्यात राणीची सेवा करणारी,नंतर वारूळ सावरायला मदत करणारी अभिजन मुंगीही होती.तिला ओढा-मुंग्यांनी मारून तिचे तुकडे केले होते.


आता बहुतेक पायवाट-मुंग्या पळून वारुळात जाऊन बसल्या.बाहेर राहिलेल्या सगळ्या मारल्या गेल्या.त्या ओढा-मुंग्यांचं अन्न झाल्या.

एखादा नाकतोडा किंवा सुरवंट खाल्ला जावा,तशाच मेलेल्या शत्रु-मुंग्याही खाल्ल्या गेल्या.युद्धाची मोहीमच अन्न कमावण्याची मोहीमही झाली.केवळ युद्धातल्या विजयामुळे नव्हे,तर एरवीही असे स्वजातिभक्षण झालंच असतं.


पराभूत पायवाट-मुंग्यांना आपण आपल्या माय-वारुळाच्या जास्तजास्त जवळ ढकलले जातो आहोत,हे समजत होते.त्यातून पराभव किती भीषण आहे,हेही समजत होते.अखेर वारुळाच्या तोंडाजवळचे काही इंच सांभाळणंही अशक्य झालं,तेव्हा आसपासची माती,काडीकचरा गोळा करून पायवाट-मुंग्यांनी आपल्या वारुळाचं दार बंद केलं.आता पायवाट वारूळ पूर्ण वेढ्यात वारुळाच्या बाहेरचा सारा भाग तपासत, नोंदत फिरत होत्या.काही जास्त होतं,आणि तेही भूमिगत तळघरासारखं किंवा बंकरसारखं.ओढा-मुंग्या शूर,जास्त चौकस मुंग्या तर वारुळापलीकडचा भागही तपासायला गेल्या.आता वेढ्यातल्या पायवाट मुग्या अधूनमधून बाहेर पडून अन्न शोधायला धडपडायच्या.पण जवळच्या क्षेत्रात ओढा-मुंग्यांनी काही अन्न शिल्लक ठेवलंच नव्हतं.आणि पायवाट मृग्यानी दूर जायचा प्रयत्न केला, की त्यांना पकडून,मारून,खाऊन टाकायला ओढा मुग्या सज्जच होत्या.आता पायवाट मुग्यांची उपासमार व्हायला लागली. आधी त्यांनी राखीव अन्नसाठे संपवले.मग संगोपन दालनातील अळ्या आणि कोष खाल्ले गेले.स्वतःच्या धाकट्या बहिणींना मारून प्रौढ बहिणींची पोटं भरली. अखेर तर अंगातली चरबी सोडून काहीच पोषक द्रव्यं उरली नाहीत.


बाहेर ओढा-मुंग्यांनी पायवाट-मुंग्यांचं जुनं सर्व क्षेत्र तपासलं.जुन्या राजवटीचे सर्व अवशेष,जुन्या सर्व खुणा संपवल्या गेल्या.जुन्या पायवाट क्षेत्रभर शेवटच्या लढाईच्या फेरोमोन-खुणा होत्या.कुठे धोक्याची सूचना देणारी रसायनं होती,तर कुठे लढाईला चलायचा आग्रह करणारी.ही सगळी रसायनं आपोआपच नष्ट होत होती, आणि ओढा-मुंग्याही शत्रूच्या या खुणा पुसून टाकत होत्या.पायवाट वारुळात मुंग्या इकडून तिकडे,तिकडून इकडे धावत होत्या.त्यानं काहीच साधलं जात नव्हतं. पण ही सगळी धावपळ मूलप्रवृत्तीतून केली जात होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून सर्वांनी बाहेर पडायचं.काही थोड्या मुंग्या जिवंतपणी वेढा फोडून निघाल्या,


एकत्र झाल्या.तर कुठेतरी नव्या जागी वारूळ घडवता येईल, अशी शक्यता मुंग्यांना त्यांचे जीन्स सुचवत होते.पण हे जमायला वेढा फोडणाऱ्यांमध्ये,वाचणाऱ्यांमध्ये खरीखुरी राणी असणं आवश्यक होतं.सैनिक-राणी पुरी पडणार नव्हती.या कडोनिकडीच्या काळात काही वयस्क मुंग्यांना एक वेगळी ऐतिहासिक घटना आठवत होती.ती घडली तेव्हा सध्या वारुळात असणाऱ्या बहुसंख्य मुंग्यांचे जन्मही झाले नव्हते.त्या वेळी सूर्य जोमानं तळपत होता. पायवाट-राणी सातत्यानं अंडी देत होती.संगोपन-दालनं खात्यापित्या अंड्यांनी भरलेली होती.

कामकरी मुंग्या तरुण वयातच दूरदूर जाऊन अन्न गोळा करत असायच्या.आणि अशा काळात,आकाशात ढगही नसताना माथ्यावर सूर्य क्षणभर दिसेनासा झाला जसा झटक्यानं दिसेनासा झाला,तसाच झटक्यात परत दिसायला लागला.आणि हा लपंडाव बराच वेळ होत राहिला.मुंग्यांच्या अंधूक दृष्टीला लांबोळक्या,उंच वस्तू दिसत होत्या.त्यांच्या सावल्या दिसत होत्या.या वस्तू होत्या झाडांसारख्याच;पण त्या हलत होत्या!


त्यांचे आवाजही वेगळेच होते.किडे-मकोडे,खारी आणि सरडे,पक्षी, या सगळ्यांच्या आवाजांपेक्षा वेगळे आवाज ही हलती झाडं काढत होती.आवाज लहानमोठे होत होते.वेगवेगळ्या झाडांजवळून आवाज निघत होते.


आवाज जसे वेगळे होते.तसेच वासही वेगळे होते. उंचावरून येणारे हे विचित्र अशा घटनांचा अनुभव नव्हता.वादळ,पावसाची थैमानं त्यांना आठवत होती.हे मात्र फार वेगळं होतं.काही मुंग्या घाबरून वारुळात पळून गेल्या काहींनी मात्र शौर्यानं या हलत्या झाडांवर हल्ला केला.झालं होतं असं.माणसांचं एक कुटुंब पिकनिकसाठी जंगलात आलं होतं,आणि निष्काळजीपणानं त्यांनी पायवाट वारुळाजवळ जेवायचं ठरवलं होतं! उन्हं कलायला लागली.आणि मुंग्यांना हलती झाडं गेल्याचं जाणवलं.ते विचित्र आवाजही बंद झाले,आणि ते अनोळखी वासही मंदावत गेले.जरा वेळानं वारुळातल्या मुंग्या परत बाहेर पडू लागल्या.त्यांना त्या प्रचंड हलत्या झाडांना साजेसंच विचित्र दृश्य दिसलं.अनेक मुंग्या जमिनीवर चेंगरलेल्या, सपाट अवस्थेत मरून पडल्या होत्या.पण यापेक्षा विचित्र म्हणजे,सगळीकडे अन्नाचे कण पडले होते. काही साध्या मुंग्यांच्या आकाराचे होते,तर काही लाखो पटीनं मोठे होते.वेगळंच अन्न होतं,ना बियांसारखं,ना कीटकांच्या शरीरांसारखं.पण जे काही होतं,ते शुद्ध आणि सघन होतं.

त्यात प्रथिनंही होती,स्निग्ध पदार्थही होते,आणि साखरेचे प्रकारही होते.एरवी मुंग्यांना 'मावा' किड्यांची विष्ठा अन्न म्हणून फार चवदार वाटत असे. कीटकांची शरीरं अत्यंत पौष्टिक वाटत असत.हे स्वर्गीय अन्न त्या दोन्हींपेक्षा चविष्ट आणि पौष्टिक होतं. माणसांनी त्यांच्या पिकनिकचा सर्व कचरा पायवाट-वारुळा शेजारीच टाकला होता.तरुण मुंग्यांना ही घटना आठवत नव्हती.त्यांनी ती भोगली नव्हती.वयस्क मुंग्यांना मात्र गेल्या वर्षीची ती विचित्र आणि अन्न देणारी घटना आठवत होती. पूर्ण वारुळाच्या स्मरणसाठ्याचा विचार केला,तर ती घटना पुसट,

स्वप्नासारखी आणि चमत्कारिक रूपात आठवत होती.


वारूळ-महाप्राण्याच्या वयस्क भागाला ती हलती झाडं नेहमीच्या त्यांच्या विश्वाबाहेरची वाटत होती.माणसांना देवांचे व्यवहार जसे भासतात तसा हा प्रकार.माणसांना जसे देव हे काहीतरी एकाएकी मारणारे,अन्न देणारे जीव वाटतात,तसे वारुळाला हे जीव वाटत होते.कोणास ठाऊक,ते जीव काही दृष्टीनं मुंग्यांचे उपकारी दोस्त असतील.आणि या संकटाच्या काळात ते पुन्हा वारुळाच्या मदतीला धावून येतील.


सगळ्याच मुंग्यांचा या दैवी मदतीवर विश्वास नव्हता. काही मुंग्यांना वाटायचं,की वाऱ्यावादळानं जसे अन्नकण येतात,मुंग्या मरतात,

तशीच ती घटना होती. पण ती फारदा न घडल्यानं दैवी वाटत होती.आणि त्या हलत्या झाडांना मुंग्यांशी घेणंदेणं नव्हतं;ना मारक,ना तारक.आणखी काही मुंग्यांचा तर,असं काही घडलं होतं,यावरच विश्वास नव्हता.थोड्याशा मुंग्यांना तो सगळा काही म्हाताऱ्या मुंग्यांमुळे उपजलेला भ्रम वाटत होता;प्राचीन काळाबद्दलचं स्वप्नरंजन !


पायवाट-वारुळातला भाव असा दुःखानं,भीतीनं रडारड करण्याचा तरी होता;नाहीतर देव मदतीला येतील,अशा आशेचा तरी.वेढ्यात अडकलेली,मरू घातलेली प्रजा होती,ती.तिला एकत्र बांधून ठेवणारी,हेतू पुरवणारी व्यवस्था नव्हती.सुट्या मुंग्यांपासून समाज घडवणारी यंत्रणा नव्हती.अन्न गोळा करा.अंड्यांची आणि अळ्यांची काळजी घ्या,राणीभोवती राखणदारांची फळी उभारा;असे कोणतेच फेरोमोन-संदेश नव्हते. सैनिक-राणीचे फेरोमोन-संदेश वारुळाला सांधून ठेवण्याइतके सबळ नव्हते.

वारुळाला जोडणाऱ्या कड्या विरघळल्या होत्या.आणि बाहेर ओढा-शत्रू उभा होता.


शेवटी उरली भीती आणि फक्त भीती.आता मारू किंवा मरू करत बाहेर पडायचं,किंवा वारुळात कुढत मरायचं.शत्रूला फसवणं,घाबरवणं, धमकावणं,मारणं,वारूळ मजबूत करणं,नवं वारूळ उभारणं,सगळ्या शक्यता संपल्या होत्या.

१०/११/२५

कुटुंब एक देणगी / Family is a gift

काहीजण मस्त कुटुंबामध्ये जन्मतात.इतरांना असं कुटुंब तयार करावं लागतं.नाहीतर सापडावं लागतं.कुटुंबाचं सभासदत्व असेल तर ते अनमोल असतं फक्त प्रेम,एवढीच ताची मागणी असते.


दुसऱ्या दिवशी जेसन,मिस् हेस्टिंग्ज आणि मी कॉन्फरन्स रूममध्ये मासिक सभेसाठी जमलो. अशी सभा आता आनंददायी परिपाठ बनला होता.आमच्या ठरलेल्या जागी आम्ही बसलो.येत्या महिन्यात कश्याबद्दल बरं बोललं जाईल,याचा विचार करण्यात मी गढ़लो असतांनाच मिस् हेस्टिंग्जने व्हिडिओ टेप सुरू केली.


रेड स्टीव्हन्सनं प्रसन्नपणे शुभेच्छा दिल्या."हॅलो, अडचणी -एक देणगी हा धडा शिकल्याबद्दल अभिनंदन.हा धडा तुला आयुष्यभर उपयोगी पडेल. आपल्या वर्षभर चालणाऱ्या उपक्रमाचा हा सहावा महिना.या महिन्यात कुटुंब म्हणजे काय असतं ते तू समजून घ्यायचं आहेस आणि त्याची कदर राखायला सुरूवात करायची.


"जेसन,मला माहित आहे,सध्या आपलं कुटुंब अगदी विस्कळीत झालं आहे.अगदी जेवढं होता येईल तेवढं जास्तीतजास्त ते विस्कळीत झालंय. तसं व्हायला मीच पूर्णतःजबाबदार असल्याची मी कबुली देतो.पण कुटुंबाची सुस्थिती किंवा अधोगती दोन्ही आपल्याला धडा देऊ शकतात.आपल्या कुटुंबाकडून आपल्याला जे शिकायचं,ते शिकता येतं किंवा दुर्दैवाने नको ते शिकलं जातं.जगातल्या सगळ्या तरूणांमधून मी तुला निवडलंय.हे जबाबदारीचं काम तुझ्यासाठी माझ्यातर्फे मिस्टर हॅमिल्टननं करावं अशी मी योजना केली. तुझ्यासाठी का,तर तू माझा पुतण नातू म्हणून.हे कसं ते सांगण कठीण आहे पण तुला समजलं पाहिजे,असं मला वाटतं.


"कुटुंबाकडून आपल्याला आपली पाळेमुळे,आपला वारसा,आपला भूतकाळ मिळत असतो. आपल्याला भविष्याकडे,एखादा डाइव्हर जशी घेईल,तशी झेप घ्यायला लागणारा स्प्रिंगबोर्ड कुटुंबाकडूनच मिळत असतो.कुटुंबाच्या बंधा इतका सबळ बंध या जगात दुसरा नाही.हा बंध केवळ प्रेमामुळे असतो.आणि जोवर या प्रेमाला आपण अग्रक्रम देतो तोवर कुठल्याही दबावापुढे आपण नत होत नाही.


"कुटूंब सर्व प्रकारच्या आकारात आणि आकारमानात असतात.हे तू लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.काही नशीबवान लोक ते ज्या कुटुंबात जन्मले,त्याचा एक हिस्सा म्हणून जन्मभर राहतात.जेसन तुझ्यासारखे काही जण मात्र एका विशिष्ट परिस्थितीमुळे नावापुरतेच एका कुटुंबाचे असतात.

अशा लोकांना मात्र एक कुटुंब पुढाकार घेऊन तयार करावं लागतं."हे तुला विचित्र वाटेल, पण मी तुला जे सांगण्याचा प्रयत्न करतोय ते या महिन्याअखेरपर्यंत तुला समजायला लागेल.या महिन्यात तू,मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज आणखी एका सहलीला जाल.ज्या लोकांना कोणी नातेवाइक नाहीत अशांना तू भेटशील आणि अशाप्रकारे कुटुंब आपल्याला काय देतं याचं महत्त्व तू शिकशील.

"महिन्याच्या शेवटी तू मिस्टर हॅमिल्टनना,कुटुंब एक देणगी असते.याबद्दल तुला काय कळलंय ते सांगायचे आहे."


"या सहलीबद्दल मिस्टर हॅमिल्टन तुला सविस्तरपणे सांगेलच आणि हा उद्देश जर सफल झाला तर पुढच्या महिन्यात आपण भेटूच."


जेसन माझ्याकडे वळून म्हणाला,"मला वाटतंय, आपण कुठं जाणार,काय करणार,कुणाला भेटणार याबद्दल तुम्ही मला काहीच सांगणार नाही,बरोबर ?" मी हसून म्हटलं,"वेळच्या वेळी सगळं कळेल रे बेटा.तुला गरज असेल तेवढंच आणि गरज असेल तेव्हांच सांगायचं अशा मला सूचना आहेत."


मध्येच मिस् हेस्टिंग्ज म्हणाली,"उद्या सकाळी साडेसात वाजता तुझ्या घरून गाडीतून आम्ही तुला घेऊन जाऊ.

सगळी व्यवस्था झालेली आहे तासन् तास आपल्याला गाडीतून प्रवास करायचाय.इथं बोस्टनमध्ये जशी आहे तसल्याच हवेत तुला महिनाभर राहायचंय.त्याची तयारी ठेव."


दुसऱ्या दिवशी सकाळी मिस् हेस्टिंग्ज आणि मी एका मोठ्या आरामदायी गाडीत मागच्या सीटस्वर स्थानापन्न झालो.या कामगिरीसाठी खास एक धट्टाकट्टा माणूस निवडला होत.

जेसनच्या प्रासादतुल्य घरासमोर आम्ही थांबलो.ते त्याच्या चुलत आजोबांनी एका ट्रस्टमार्फत त्याच्यासाठी विकत घेतलं होतं.आमचा ड्रायव्हर,जेसन आणि त्याच सामान घ्यायला पुढच्या दाराशी गेला. थोड्याच वेळात तो ड्रायव्हर हातात सहजपणे दोन सुटकेसेस घेऊन येतांना मी पाहिला.

त्याच्यामागून जेसन येत होता,जेसन त्या धिप्पाड माणसासमोर बुजलेला दिसला.त्यानं जेसनसाठी मागचं दार उघडलं.तेव्हा मला आणि मिस हेस्टिंग्जला बघून त्याला जरा हायसं वाटलं,


जेसननं विचारलं,या भूतलावरचा हा कोण धिप्पाड माणूस ?


खुशीत मिस हेस्टिंग्जनं उत्तर दिलं,"तो ना! तू नेथन बद्दल बोलतोयस ना ? या सहलीसाठी मुद्दाम निवडलेला तो एक छान तरूण आहे."


जेसननं विचारलं,"याचा अर्थ काय ?"


मिस हेस्टिंग्ज नुसतंच हसली आणि तिनं कॉफीचा एक घोट घेतला.मी वळून जेसनशी हस्तांदोलन केलं,त्याला अभिवादन केलं,"सुप्रभात जेसन ! बरोबर वेळच्यावेळी सगळं तुला नीटपणे कळेल.तू आता मागे टेकून आरामात बस आणि मुक्कामाचं ठिकाण जसजसं जवळ येईल तसतसं मी तुला सगळं सविस्तर सांगेन."


बोस्टनच्या बाहेर पडल्यावर पूर्व मॅसेच्युसेट्स आणि न्यू हॅम्पशायर राज्यांमधून गाडी जातांना आम्हाला खूप मौज वाटत होती.आम्ही उत्तरेकडे वळून सागर किनाऱ्याने जाऊ लागलो,तेव्हा मी जेसनला या सहलीबद्दल उलगडून सांगायला सुरूवात केली.


"लवकरच आपण मेन राज्यात प्रवेश करूएका खाजगी जंगलातून आपण काही तास,प्रवास करू. मग आपण 'रेड स्टीव्हन्स मुलांचे वसतीगृहात' पोहोचू.पुढच्या महिनाभर त्यांचा बदलीवर आलेला पालक म्हणून तू काम करशील.

त्यामुळे तिथल्या नेहमी काम करणाऱ्या पालक माणसाला अगदी वाजवी असलेली सु‌ट्टी मिळेल.आणि सहा ते सोळा वयोगटातल्या छत्तीस मुलांशी ओळख करून घेण्याची संधी तुला मिळेल."


बुचकळ्यात पडलेल्या नजरेनं माझ्याकडे बघून जेसन म्हणाला,"मला वाटलं मला कुटुंबाबद्दल शिकायचंय.अनाथ मुलांच्या एका घोळक्यात राहून मी कुटुंबाबद्दल शिकावं असं त्या म्हाताऱ्याला वाटलं तरी कसं ?"


मी उत्तरलो,"तो म्हातारा माणूस,आत्ता सहज नेमकेपणाने तू जसा त्याचा उल्लेख केलास,त्यानं तीस वर्षांपूर्वी हे वसतीगृह सुरू केलं आणि तेव्हापासून त्यानंच त्याला पैसा पुरवला.त्याला त्याची खडान्खडा माहिती होती.आणि तुला जो धडा देण्याचं त्यानं ठरवलंय तो तुला इथं नक्कीच मिळेल.तू खुल्या मनानं रहावं,म्हणजे तू बरोबर कुटुंबाबद्दलचा धडा शिकशील,अशी मी उमेद करतो." जेसन तोंडातल्या तोंडात पुटपुटला, "अर्थहीन वाटतंय मला हे सगळं."


मी म्हटलं,"मी तुला एवढंच सांगतो की तू एका विलक्षण महिन्यात आहेस.तुझा चुलत आजोबा मरण पावल्यावर मी या संस्थेच्या बोर्डाचा चेअरमन झालो.मी आणि मिस हेस्टिंग्ज महिनाभर इथल्या ऑफिसमध्ये असू.काही देणगीदारांचे बघायचंय आणि पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकाचाही विचार करायला हवाय."


थोड्या वेळानं आम्ही मुख्य रस्ता सोडून एका खडबडीत रस्त्याला लागलो.एक साधीशी पाटी दिसली.त्यावर लिहिलं होतं,'रेड स्टीव्हन्सचं मुलांसाठी घर'.थोड्या वेळानं आमच्या वाकबगार ड्राइव्हरनं ती प्रशस्त गाडी एका आवारात थांबवली. जेवणघर,झोपायची जागा,शिकण्याची जागा, व्यायामशाळा आणि कार्यालय अशा विविध इमारतींनी ते आवार वेढलेलं होतं.


नेथन त्या आलिशान गाडीच्या बाहेर आला आणि आम्हां तिघांना बाहेर येण्यासाठी त्यानं मागचं दार उघडलं.तो डिकीतून सामान उतरवत होता तेव्हा रहायच्या जागेचा दरवाजा सताड उघडला आणि एक मुलांचा मोठा घोळका नेथनकडे येऊन त्याच्याभोवती गलका करायला लागला.

काहींना धरून त्यानं हवेत उडवलं,कहींना थोपटलं,तर काहींना उरापोटाशी धरलं.ती मुलं सारखी त्याला हाक मारत होती आणि त्याला पाहून त्यांना फारच आनंद झाला होता.


शेवटी एकदाचा तो अतिउत्साही स्वागतसोहळा पार पडला आणि नेथन अशा सुरात बोलला की ज्याकडे दुर्लक्ष होणं शक्यच नव्हतं."मंडळी आता आपल्या रहायच्या जागेकडे जाऊ या आपण. सगळं काही ठिकठाक आहे ना ते पाहूया,कारण हा महिनाभर नवीन पालक आहेत."


मुलांनी ताबडतोब प्रतिसाद दिला आणि ती त्यांच्या झोपायच्या जागेकडे पळून गेली.सहजपणे नेथननं सगळं सामान उचललं आणि आम्हांला तो रहायच्या जागेकडे घेऊन गेला.दोन्ही भिंतीत बसवलेल्या खाटांच्या रांगा आणि दर दोन खाटांमध्ये एकेक छोटं कपाट होतं.


नेथननं पहिल्या खाटेवर जेसनचं सामान ठेवलं आणि म्हणाला,"या घरी तुमचं स्वागत असो. पुढच्या तीस दिवसांसाठी हा तुमचा राजवाडा असेल.मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्ज


कार्यालयाच्या इमारतीला लागून असलेल्या सदनिकेत राहतील." जेसनकडे वळून नेथन म्हणाला,"सामान काढून तुम्ही लावून घ्यावं असं मला वाटते.नंतर मग इथल्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला लागतील "


वीसेक मिनिटांमध्ये जेवणघरात भेटायचं आम्ही सर्वांनी ठरवलं,ऑफिस जवळच्या सर्व सोयी असलेल्या दोन सदनिका नेथननं आम्हांला दाखवल्या.ठरलेल्या वेळी आम्ही जेवायच्या खोलीत एका लांब टेबलाच्या टोकाशी जमून बसलो.काही डझनभर मूल रांगेनं आत आली आणि त्यांच्या नेहमीच्या ठरलेल्या जागांवर बसली. उत्साहान ती मुल बोलत होती आणि टेबलाशी बसलेल्या आम्हां नवख्या माणसांबद्दल त्यांना उत्सुकता वाटत होती.


थोड्या वेळातच,डोळ्यात भरेल अशी छाप पाडणारी उंची असणारा नेथन उठून उभा राहिला. कमीतकमी सहा फूट आठ इंचापर्यंत उंची असणार असा मी अंदाज केला.मुलं गप्प झाली आणि नेथन बोलायला लागला.


"मुलांनो तुम्हांला माहित आहेच की तुमच्या वसतीगृहाचा पालक - ब्रेड - एक-महिन्याच्या रजेवर जात आहे.

त्याच्याजागी जेसन स्टीव्हन्स काम बघतील.नेथन जेसनकडे वळून म्हणाला, "जेसन,कृपया उभे रहा,"


जेसन उभा राहिला आणि एका सुरात सगळी मुलं म्हणाली,"हाय जेसन."


जेसन घसा साफ करून चाचरत बोलला."हाय" आणि पट्‌कन तो परत खाली बसला.


मुलांना उद्देशून नेथन बोलला:मिस्टर हॅमिल्टन आणि मिस् हेस्टिंग्जसुद्धा आपल्याबरोबर पुढील महिनाभर असतील.

मिस्टर स्टीव्हन्स सोबत जेव्हा बोर्ड ऑफ डायरेक्टरांची मीटिंग झाली,तेव्हा हे दोघे आल्याचं तुम्हाला आठवत असेल.ही भली माणसं इथं आपल्यात आहेत,हे आपलं भाग्य आहे.नंतर नेथन नतमस्तक झाला आणि त्यानं समोर आलेल्या अन्नाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.सगळ्या मुलांनी त्याचे अनुकरण केले आणि जेवण संपेपर्यंत सर्व आदबशीर आणि नम्रतेने वागले.आमचं जेवण झालं.जेसननं नेथनला विचारल "तू या आधी इथं आला होतात?"


नेथन हसून बोलला,तुला खर मानायलाच हवं,मी इथं पहिल्यांदा आलो,तेव्हा ह्या टेबलापासच्या सर्वात लहान मुलापेक्षाही लहान होतो.मी अनेक अनाथालयातून बाहेर काढलेला मुलगा होतो.पण माझ्या लहानपणाच्या रम्य आठवणी सगळ्या इथल्याच आहेत."


"तू इथं काम करतोस,किंवा कसं?" जेसननं विचारलं.दूरून ऐकू येणाऱ्या ढगांच्या मंद गडगडाटासारखं नेथनचं हसणं होतं,तसं हसून तो म्हणाला, "हो आणि नाही.म्हणजे काय आहे की लोकांच्या दृष्टने न्यू इंग्लड पेटिअट्स या फुटबॉल संघासाठी खिंड लढवणं हे माझं मुख्य काम आहे. पण सीझन संपला रे संपला की मी इथे येतो आणि जे जे जरूर पडेल ते ते काम करतो."


जेसनला धक्का बसल्याबारखं वाटलं,तो म्हणाला, "सॉरी हं.मला वाटलं तू फक्त त्या अलिशान गाडीचा ड्रायव्हर आहेस."


नेथन म्हणाला,"आज तरी मी तोच आहे.आणि ते काम करण्यात मला अभिमान आहे.उद्या मी कदाचित मुख्य राखणदार असेन किंवा इथला शिस्त राखणारा होईन.


आम्ही मोठे होत असतांना रेड स्टीव्हन्सकडनं एक गोष्ट शिकलो.ती म्हणजे जे जे करण्याची जरूरी असते ते ते करणे शहाणपणाचे असते."


जेसननं विचारलं, "ठीक आहे.पण मी इथे काय करायचंय ?"


नेथननं उत्तर दिलं,मिस्टर स्टीव्हन्सनं मिस्टर हॅमिल्टनमार्फत ज्या सूचना दिल्या आहेत त्यांच्यावरून असं दिसतं की मुलांच्या मदतीनं तुझं काय कार्य आहे ते आपोआप उमगत जाईल.बरं, आता जेवण आटपलंय तर मी मिस्टर हॅमिल्टन आणि मिस हेस्टिंग्जना घेऊन कार्यालयाकडे जातो. पुढच्या वर्षीच्या अंदाजपत्रकाची चर्चा करायची आहे.तू तुझं स्वतःचं प्रशिक्षण चालू कर."


आपल्या भल्या थोरल्या पंजानं नेथननं जेसनच्या पाठीवर थाप मारली आणि मिस हेस्टिंग्जला आणि मला घेऊन तो जेवणाच्या खोलीतून बाहेर पडला. आम्ही दरवाज्यातून बाहेर पडत असतांना,जेसन आम्हाला उद्देशून बोलतांना ऐकलं "जरा पहा ना, मला काहीच अंदाज येत नाहीये.मी कधीच असा मुलांच्या संपर्कात आलेलो नाही."


अंगणातून कार्यालयाच्या इमारतीकडे जात असतांना टेबलाभोवतीची ती छोटी मुलं हसताना आम्हालां ऐकू आलं.


पुढच्या वर्षासाठी लागणारं अंदाजपत्रकाचं आणि कायदेशीर बाबींचे काम मी आणि मिस हेस्टिंग्जन पुढील महिनाभरात उरकलं.प्रत्येक दिवशी जेसनचं कसं चाललंय ते बघण्याची संधी खूपदा मिळायची, नेथनही आम्हाला सांगत होताच.


सुरूवातीचे काही दिवस जेसनला अगदी परक्यासारखं वाटलं.पण लवकरच तीन डझन मुलाचा बाप,भाऊ,शिक्षक आणि मित्र या भूमिकांमध्ये तो शिरू आणि वावरू लागला. शेवटच्या दिवशी नेथन आमचं सामान त्या आलिशान गाडीत रचत होता.तेव्हा जेसनचा निरोप घ्यायला एकेक मुलगा येत होता.उरापोटाशी घेणं चाललं होतं,डोळ्यात पाणी येत होतं आणि जेसनला कितीतरी आहेर मिळाले.त्या वस्तू मुलांच्या दृष्टिने फार मौल्यवान होत्या.निरनिराळ्या आकाराचे दगड,

चार पानांचं क्लोव्हर (वाटाण्याच्या जातीची एक प्रकारची रानवेल),ॲरोहेड,असं बरंच काही.अंगणातून नेथननं गाडी बाहेर काढून खडबडीत रस्त्यावर नेली,तेव्हा जेसन मुलं दृष्टीआड होईपर्यंत वळून वळून हात हलवत होता.परत बोस्टनकडे जाणारी पक्की सडक लागेपर्यंत आम्ही गप्प बसून होतो." ( सर्वोत्तम देणगी,जिम स्टोव्हॅल )


शेवटी जेसन बोलला,"काय आश्चर्य आहे बघा.या कोणाही मुलाला कुटुंब नाहीये.पण प्रत्येकाला माझ्यापेक्षा जास्तच कुटुंबाबद्दलची माहिती होती. मला वाटतं,प्रेमभावनेतून परस्परांशी संबंधित रहाणं म्हणजे कुटुंब रक्ताच्या नात्यानं जोडलेलं असणं हा त्या मानानं गौण मुद्दा आहे."


आलिशान गाडीचा भोंगा वाजला.नेथननं आनंदानं मोठी आरोळी ठोकली.(अशी आरोळी फुटबॉल मैदानावरच ऐकण्यात येते) तो मोठ्यानं बोलला, "शेवटी जमलं तुला.तू इथं आलास तेव्हा मला अगदी निरूपयोगी वाटलास.पण तू रेड स्टीव्हन्सचा नातेवाईक म्हणून आम्हाला मनातून आशा वाटत होती.त्याचं काय आहे ? तू एका मोठ्या कुटुंबातलाच आहेस जसा मी आहे."



८/११/२५

दीनजन  / Dinjan

' भिकारी' हा शब्द अनेकदा आपल्या वाचनात येतो, अनेकदा आपल्या बोलण्यात येतो आणि अनेकदा ऐकण्यात ही येतो. एखाद्यासाठी "भिकारी" हा शब्द वापरणे म्हणजे त्याला अत्यंत तुच्छ लेखणं, असं मला वाटतं. आपण जरा सुस्थितीत आहोत म्हणून लगेच दुसऱ्याला "भिकारी"असं लेबल लावणे कितपत योग्य आहे ? 


आपल्यापैकी प्रत्येकावर या आधीच्या आयुष्यामध्ये,कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर, कोणत्या ना कोणत्या कारणास्तव,

कोणाकडून काहीतरी "मागावं" लागलं आहे,"याचना" करावी लागली आहे,"अजीजी" करावी लागली आहे.... याचा आपल्याला विसर पडतो. 


"याचना" करण्याचा काळ कुणाचा अगदी कमी असतो तर कोणाचा लांबतो... ! 


अशी याचना करण्याचा काळ लांबलेल्यांना लगेच "भिकारी" असं लेबल लावणं योग्य नव्हे.  


जे खरच नाईलाजास्तव,केवळ जीव जगवण्यासाठी याचना करत आहेत त्यांच्या बाबतीतच मी हे लिहित आहे. बाकी ज्यांनी भीक मागण्याचा धंदा केला आहे त्यांच्यावर काय बोलणार ?


असो,अशा नाईलाजाने याचना करावी लागणाऱ्या या समाजाला "भिकारी" न म्हणता आणखी कोणता शब्द वापरता येईल ?याच्या मी सतत विचारात असायचो. 


असा शब्द की जो टोचणार नाही... बोचणार नाही, पण अर्थही सांगेल...! 


मी काम करायला सुरुवात केल्यापासून "भिक्षेकरी" आणि "याचक" हा शब्द प्रयोग सुरू केला.बऱ्यापैकी प्रमाणात याला यश मिळालं,खूप ठिकाणी आता "भिक्षेकरी" आणि "याचक" या शब्दांचा उपयोग होतो परंतु अजूनही म्हणावे तितके हे शब्द रुळले नाहीत. 


"भिक्षेकरी" आणि "याचक" या व्यतिरीक्त आणखी कोणता शब्द यांच्यासाठी वापरला जाईल,जो मराठीत आणि हिंदीतही अर्थ तर सांगेल, परंतु जास्त टोचणार नाही, ₹बोचणार नाही हा विचार करत असताना मला "दीनजन" असा शब्द सुचला. 


मराठी किंवा हिंदीत लिहिताना, बोलताना "दीनजन" हा शब्द "भिकारी" या शब्दास नक्कीच पर्याय ठरेल. 


इथून पुढे शक्यतोवर "भिकारी" हा शब्द न वापरता त्याऐवजी *"दीनजन"* हा शब्द सर्वांनी वापरावा असं मी या समाजाचा प्रतिनिधी म्हणून नम्र आवाहन करतो. 


नाईलाजाने भीक मागणारा हा गट म्हणजे समाजाच्या हाताला असणारं,करंगळीला चिकटुन लोंबकळणार सहावं बोट ! तसं पाहिलं तर हे बोट कुणाच्या विशेष उपयोगाचं नसतं,तरीही त्याची आपल्यालाच काळजी घ्यावी लागते. कारण कसं ही असलं तरी ते आपल्या शरीराचाच एक भाग असतं... ! तसंच, समाजाच्या हाताला असणाऱ्या या सहाव्या बोटाची म्हणजेच या "दीनजनांची" काळजी घेणं,आधार देणं हे समाजाचंच कर्तव्य आहे.परंतु काळजी घेणं,आधार देणं म्हणजे 2 - 5 रुपये भीक म्हणून देणं किंवा एखादा बिस्कीटचा पुडा देणं,आणि एखाद वेळेस जेवण देणं नव्हे.... 


यामुळे फुकट मागण्याची वृत्ती आणखी वाढते.... 


नवनवीन भिक्षेकरी यामुळे आणखी तयार होतात. ज्यांना मुळीच काम करायचं नाही,सोप्या मार्गानं सर्व हवंय ते लोक मग आवर्जुन अशा फुकट गोष्टी घ्यायला निर्लज्जपणे पुढं येतात... 


आणि आपणच मग कांगावा करतो,'श्शी... "भिकारी" किती वाढले आहेत ना... ?' 


आपल्या अशा "भीक" देण्यामुळे आपण त्यांच्यातल्या काम करण्याच्या वृत्तीचा, स्वाभिमानाचा नकळतपणे खुन करतो,कायमचं त्यांना अपंग बनवतो,परावलंबी बनवतो....


यांना स्वावलंबी केलं तरच ते भीक मागणं सोडतील,समाजात येतील. 


भीक देण्याऐवजी "दीनजन" स्वावलंबी होतील अशा प्रकारची मदत करणे त्यांना आवश्यक आहे. 


वजनकाटा घेवून देणे,चहा विकण्यासाठी Thermos देणे किंवा कमी भांडवलात एखादा व्यवसाय सुरू करून देणे अशा अनेक बाबी आहेत.असो,सर्वांनाच हे करण्यास वेळ मिळणार नाही याची मला जाण आहे.  


शिवाय समाजाबरोबरच शासनाचाही यात सहभाग लागणार आहे. 


तुर्तास हातात असलेल्या दोनच गोष्टी करूया... 


१. कोणत्याही स्वरूपात भीक देणं थांबवूया. 


२. "भिकारी" हा शब्द हद्दपार करून त्याऐवजी "भिक्षेकरी" किंवा "याचक" किंवा *"दीनजन"* असा शब्दप्रयोग करण्यास सुरुवात करू या... !


आपल्या माहितीसाठी सविनय सादर... !!!


नेहमीप्रमाणे रस्त्यावर फिरत असताना काल फुटपाथवर मला एक तरुण जोडपं दिसलं.येता जाता लोक त्यांना 2- 5 रुपये देत होते. एकूण अवतारावरून भिक्षेकरी या गटातील ते वाटत नव्हते. मांडीवर सात-आठ वर्षांचा एक मुलगा.जवळ जाऊन पाहिलं तर जोडप्याच्या डोळ्यातील ज्योती हरवल्या होत्या. ₹दोघांनाही दिसत नव्हतं.शेजारी बसून सर्व चौकशी केली. यांना आणखी एक बारा वर्षाची मुलगी आहे. मुलगा आणि मुलगी दोघेही पाहू शकतात आणि दोघेही होस्टेल मध्ये राहतात.सध्याच्या साथ रोगात मुलं घरी आहेत. हे चौकोनी कुटुंब पुण्यातल्या एका झोपडपट्टीमध्ये खोली घेऊन राहतं. 


पुर्वी हे जोडपं काही बाही विकून आपलं पोट भरत होते,परंतु साथ रोगाच्या या काळामध्ये सर्वस्व बुडालं आहे.खोली भाडे,अन्नधान्य व इतर बाबी धरून कुटुंबाचा खर्च महिना पाच हजार रुपये इतका आहे.(काही लोकांच्या एका वेळच्या पार्टीचा खर्च !) कोणतेही उपजीविकेचे साधन नसल्यामुळे, पोरांचे जीव जगवण्यासाठी रस्त्यात बसून "मागण्याशिवाय" आता काहीही पर्याय उरला नाही. लहान लेकरांसाठी हे आईबाप "याचक" झाले आहेत... ! याचना करण्यापलीकडे सध्या तरी काही मार्ग यांच्या पुढे नाही...


ज्यांना दिसतच नाही अशांना नोकरी कोण देणार ? 


व्यवसाय पुन्हा चालू करण्यासाठी भांडवल कोण देणार ? 


ज्यांची वाटच हरवली आहे त्यांना कोण मार्ग दाखवणार ?


यांची कथा आणि व्यथा मांडेनच पुन्हा कधीतरी स्वतंत्रपणे... !!! 


सध्या त्वरित उपाय म्हणून,जोपर्यंत हे कुटुंब स्वावलंबी होत नाही तोपर्यंत या कुटुंबाला दत्तक घेत आहोत


यात खालील बाबी करण्याचे योजले आहे. 


१. सध्या त्यांना एक नवीन वजनकाटा दिला आहे. भीक देण्यापेक्षा लोक येऊन वजन करतील आणि यांना सन्मानाने पैसे मिळतील. 


२. रस्त्यावर विक्री होतील अशा वस्तू त्यांना देऊन कायमस्वरूपी व्यवसाय टाकून देणार आहोत. 


३. व्यवसायाची घडी बसेपर्यंत संपूर्ण कुटुंबाचा तीन महिन्यांचा खर्च उचलणार आहोत. 


४. मुलगा आणि मुलीला शिक्षणाची फी आणि हॉस्टेलचा खर्च काहीही नसला तरीसुद्धा शैक्षणिक दृष्ट्या इतर अनेक बाबी मुलांना लागतच असतात. या इतर बाबींची जबाबदारी घेणार आहोत. 


होळीमध्ये यांची सर्व दुःख जळून जावोत... 


आणि येत्या रंगपंचमीला यांच्या आयुष्यात अनेक उत्तम उत्तम रंगांची उधळण होवो अशी प्रार्थना करतो ! 


यानिमित्ताने आपणाही सर्वांना पुनश्च प्रणाम ! कारण,ही जबाबदारी घेण्याची हिंमत आणि ताकद केवळ आपल्यामुळेच मला मिळाली आहे..मी ऋणी आहे आपला ! केवळ आपला एक प्रतिनिधी म्हणून मी रस्त्यावर हे काम करत आहे, याचं खरं श्रेय आपणास आहे.!!! 


गप्पा मारताना त्या लहान मुलाला मी मांडीवर घेऊन बसलो होतो. उठताना त्याला खाऊ दिला आणि निघालो तेव्हा जाताना म्हणाला 'टाटा मामा'...! 


त्याच्या या दोनच शब्दांनी त्याने मला वेग-वेगळ्या नात्यांमध्ये अडकवलं. 


हि नाती सांभाळण्याचा जरूर प्रयत्न करेन !!!


डाॕ.अभिजीत सोनवणे,भिक्षेकऱ्यांचे डॉक्टर

२८ मार्च 2021…

६/११/२५

प्राणवायूचा शोध / The discovery of oxygen

प्रिस्टले लहानपणी बाटलीत कोळी टाकून बाटलीचं बूच घट्ट बंद करीत असे करायचा.बाटलीत कोळ्याऐवजी वनस्पती टाकली तर? प्रिस्टलेला एक नवा विचार सुचला.प्रिस्टलेनं बंद तोंडाच्या भांड्यात सुरुवातीला असणारा वायू काढून टाकून त्यात पुदिन्याची वनस्पती ठेवून भांड्याचे तोंड पूर्णपणं बंद केलं.प्रिस्टलेची अपेक्षा कोल्ळ्याप्रमाणेच वनस्पती मरून जाईल.पण दहा दिवसांनंतरही पुदिन्याची वनस्पती चक टवटवीत होती आणि त्या भांड्यात पेटती मेणबत्तीही अधिक तेजाने प्रज्वलित होत होती.प्रिस्टलेनं मेणबत्ती विझल्यावर त्या भांड्यात ५-६ दिवसांनी पुन्हा पेटती मेणबत्ती टाकल्यावर ती अधिक तेजानं प्रज्वलित होत असल्याचं त्याच्या लक्षात आलं.१७७२ च्या उन्हाळ्यापर्यंत प्रिस्टलेला निरनिराळ्या वनस्पतीमध्ये पेटती मेणबत्ती अधिक प्रज्वलित होत असल्याचं लक्षात आलं.मग पालक ही वनस्पती दोन दिवसांत हा वायू तयार करत असल्याचं प्रिस्टलेनं या प्रयोगानं सिद्ध केलं.

प्रिस्टलेनं मग अजून एक प्रयोग केला.पेटती मेणबत्ती हवाबंद डब्यात ठेवली.पण ही मेणबत्ती मात्र लगेच विझली.हवाबंद डब्यात पेटती मेणबत्ती ठेवल्यावर ती चटकन विझते,असा प्रिस्टलेनं निष्कर्ष काढला.त्याच हवाबंद डब्यात जिवंत उंदीर ठेवला असता तोही ५ सेकंदात मेल्याचं त्यानं पाहिलं. त्यानं पुन्हा एक जिवंत उंदीर हवाबंद डब्यात ठेवला आणि त्याच्या बरोबर एक छोटं रोपही प्रिस्टलेनं त्याच हवाबंद डब्यात ठेवलं.पण या वेळी उंदीर मेला नाही. उंदराला जिवंत ठेवणारा कुठलासा पदार्थ वनस्पतींमध्ये असला पाहिजे असा तर्क प्रिस्टलेनं केला.हे लगेच प्रिस्टलेनं आपला मित्र बेंजामिन फ्रैंकलिनला कळवलं आणि आपल्या या शोधामुळे लोक झाडं तोडायची थांबतील असंही बेंजामिन फ्रैंकलिनला प्रिस्टलेनं लिहिलं.यावरून सर्वच वनस्पती हा वायू तयार करत असल्याचा पुरावा त्याला मिळाला. त्यामुळे सर्व प्राणी श्वास घेऊनसुद्धा त्यांना जिवंत ठेवणारा हवेतला घटक का संपत नव्हता या प्रश्नाचं उत्तर प्रिस्टलेला सापडलं.


या महत्त्वाच्या शोधाबद्दल रॉयल सोसायटीनं प्रिस्टलेला 'कॉपले' पदक देऊन सन्मानित केलं.हे पदक म्हणजे त्या काळातले नोबेल पारितोषिकच होतं.प्रिस्टलेनं आपल्या या प्रयोगाची हकिकत पॅरिसला जाऊन लव्हायेजेला कळवली.लव्हायेजेला या प्रयोगाचं महत्त्व ताबडतोब पटलं.पण प्रिस्टले मात्र दिशाभूल अवस्थेत होता.तो लव्हायेजेला पुनःपुन्हा फ्लॉजिस्टॉनविरहित हवा असंच सांगत राहिला.त्याला आपल्या शोधाचं महत्त्वच जणू कळलं नाही.१७८०मध्ये लॉर्ड शेलबर्नशी न पटल्यामुळे प्रिस्टले आपल्या कुटुंबाबरोबर बर्मिंगहॅममध्ये स्थायिक झाला.काही विज्ञानप्रेमी मंडळींनी ७८० साली बर्मिंगहॅममध्ये एक चर्चामंडळ चालू केलं.या मंडळाचं नाव 'ल्युनार सायटी' असं होतं. मंडळाच्या खास विनंतीवरून प्रिस्टले ल्युनार सोसायटीचा सभासद झाला. दर महिन्याच्या सोमवारी बर्मिंगहॅममध्ये रात्रीच्या जेवणाच्या निमित्तानं मंडळाचे सभासद एकत्र जमत जमायचे.या सभासदांमध्ये जेम्स वॉट,इरॅस्मस डार्विन अशी त्या काळची नामांकित संशोधक मंडळी होती.मंडळाचं काम सहा तास चालायचं त्यात जेवणाखेरीज नानाविध विषयांवर चर्चा चालायची.सभासद मंडळी आपले नवे विचार,कल्पना दिलखुलासपणे मांडायचे.या सभासदांमध्ये जे श्रीमंत सभासद होते ते प्रिस्टलेला त्याच्या प्रयोगासाठी आर्थिक मदत करायचे.प्रिस्टले प्रयोगापुरता लागणाराच पैसा सभासदांकडून घ्यायचे.त्याचे सर्व शोध मुक्त असायचे. प्रिस्टलेनं आपल्या शोधापासून आर्थिक फायदा घेण्याचा विचारसुद्धा केला नाही.याच काळात त्यानं प्रसिद्ध केलेले शोधनिबंध हे सर्व फ्लॉजिस्टॉन सिद्धान्ताच्या बाजूने होते.


पण लवकरच प्रिस्टलेच्या शांत आयुष्यात अचानक वादळी घडामोडीला सुरुवात झाली.प्रिस्टले फ्रेंच राज्यक्रांतीपासून दूर असूनही त्यात ओढला गेला. प्रिस्टलेनं आपल्या लेखनाद्वारे फ्रेंच राज्यक्रांतीच्या स्वातंत्र्य,समता आणि बंधुभाव या तीनही तत्त्वांचा हिरिरीनं प्रचार केला.धर्मसत्ता आणि राजा आणि त्याचा कारभार यांचे एकमेकांपासून फारकत करण्याची कल्पना प्रिस्टलेनं उचलून धरली.पण त्यामुळे इंग्लंडमधल्या पुढाऱ्यांशी त्याचे खटके उडायला लागले. इंग्लिश पार्लमेंटचा एक सभासद एडमंड बर्कनं प्रिस्टलेवर ब्रिटिश पार्लमेंटमध्ये तो देत असलेल्या फ्रेंच राज्यक्रांतीच्या पाठिंब्याबद्दल धिक्कार केला.फ्रेंच राज्यक्रांतीची चळवळ जसजशी आगेकूच करायला लागली तसं तिनं हिंसक वळण घेतलं.त्यामुळे अधिकाधिक ब्रिटिश नागरिक फ्रेंच चळवळीला दिलेला आपला पाठिंबा काढून घ्यायला लागले.अखेर फ्रेंच राज्यक्रांतीच्या दुसऱ्या स्मृतिदिनी १४ जुलै १७९१ इंग्लंडमधल्या जनतेनं चिडून मोठ्या जमावानं प्रिस्टलेच्या राहत्या घरावर हल्ला केला. 


या हल्ल्यात जमावानं प्रिस्टलेच्या घराची पूर्ण नासधूस केली.

घरातल्या खुर्चा,टेबल,कपाट,इतर लाकडी सामान यांची मोडतोड केली.घराचं तळघर पूर्ण रिकामं केलं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रिस्टलेच्या ग्रंथालयातली पुस्तकं फाडून चोळामोळा करून टाकली.प्रिस्टलेच्या प्रयोगशाळेतल्या उपकरणांचा नाश केला आणि त्याचं संपूर्ण घरच पेटवून दिलं.प्रिस्टलेच्या संशोधनाच्या नोंदी असणारी टिपणवही जमावानं फाडून टाकली.या अपरिमित नुकसानीची जाणीव प्रिस्टलेला अखेरपर्यंत होत राहिली.सुदैवानं यातून प्रिस्टले आणि त्याचं कुटुंब मात्र वाचलं.हा गोंधळ चालू असतानाच प्रिस्टले आणि त्याचं कुटुंब गाव सोडून गेल्यामुळे ते जिवंत राहू शकले. बर्मिंगहॅम सोडून ते सर्व जण प्रथम इंग्लंडला आले. इंग्लंडमधले लोक प्रिस्टलेला देशद्रोही आणि ख्रिस्ती धर्माचा विरोधक समजायला लागले.त्याच्याविरुद्ध व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आली.त्याचा पुतळा जाळण्यात आला.रॉयल सोसायटीतले लोकसुद्धा प्रिस्टलेला टाळायला लागले.


त्याच्याकडून रॉयल सोसायटीचा राजीनामा घेण्यात आला.त्याच्या मुलांना नोकऱ्या मिळेनाशा झाल्या.अखेर १७९४ मध्ये प्रिस्टलेनं 'सॅम्पसन' नावाच्या जहाजातून मायभूमी सोडून अमेरिकेला कूच केलं.तो जेव्हा न्यूयॉर्कमध्ये पोचला तेव्हा तिथल्या राजकारणी,शास्त्रज्ञ आणि धर्मोपदेशकांनी त्याचे भव्य स्वागत केलं.प्रिस्टलेची तीनही मुलं अगोदरच पेनसिल्व्हेनिया संस्थानातल्या नॉर्दबरलँडमध्ये स्थायिक झाली होती. प्रिस्टलेला नॉर्दबरलँडचा चर्चचा प्रमुख आणि पेनसिल्व्हेनिया विद्यापीठात रसायनशास्त्राचा प्राध्यापक अशी दहेरी नेमणूक देण्यात आली.

प्रिस्टलेचा स्नेही बेंजामिन फ्रैंकलिन यानं फिलाडेल्फिया शहराची कवाडं त्याच्यासाठी कायमची उघडी करून दिली.प्रिस्टलेची अमेरिकन स्वातंत्र्यवीर थॉमस जेफरसन यांच्याशीही चांगली ओळख झाली.एकदा अमेरिकेचा अध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यानंही प्रिस्टलेला चहापानासाठी आमंत्रण दिलं होतं.प्रिस्टलेनं आपल्या अंतापर्यंत (१८०४) नॉर्दबरलँडमध्येच कायमचं वास्तव्य केलं.तिथं त्यानं आपली प्रयोगशाळाही उभारली.तो निरनिराळ्या ठिकाणी व्याख्यानासाठी जायला लागला.सध्या प्रिस्टलेचं राहतं घर हे संग्रहालय म्हणून जतन करून ठेवण्यात आलं आहे.१९५२ सालापासून पेनसिल्व्हेनियामधल्या डिक्सन कॉलेजनं मानवजातीला उपकारक ठरणाऱ्या शोधांना वार्षिक प्रिस्टले पदक देणं सुरू केलं.


या ऑक्सिजन शोधनाट्यात आणखी एका व्यक्तीचं योगदान दुर्लक्षून चालणार नाही तो म्हणजे कार्ल विल्हेम शील !! निसर्गात आढळणारी जास्तीत जास्त मूलद्रव्यं शोधण्याचा मान त्याच्याकडे जातो. त्यानं एकूण सहा मूलद्रव्यं- फ्लोरीन (१७७१), क्लोरीन (१७७४), मँगेनीज (१७७४), बेरियम (१७७४), मॉलिब्डेनम (१७७८) आणि टंगस्टन (१७८१) यांचा शोध लावला. शिवाय, स्वतंत्रपणे संशोधन करून ऑक्सिजनचाही शोध लावला. 


त्यानं अनेक रासायनिक संयुगांचा शोध लावला. त्याची यादी बरीच मोठी आहे.त्यात हायड्रोजन फ्लोराइड, सिलिकॉन फ्लोराइड,

टार्टरिक आम्ल,सायट्रिक आम्ल,युरिकआम्ल,लॅक्टिक आम्ल,

ग्लिसेरॉल,अशा अनेक संयुगांचा समवेश होतो. एकाच माणसानं हे सर्व शोधून काढलं हे पाहून थक्क व्हायला होतं. 'हवा आणि अग्नी यावरचा रासायनिक प्रबंध' हा आपला ग्रंथ शीलनं १७७५ मध्येच लिहिला. पण प्रसिद्ध झाला तब्बल दोन वर्षांनी ! पण यापैकी अनेक शोध लागल्यानंतर त्यानं ते प्रसिद्धच केले नाहीत आणि मग इतरांनीच त्याच्यानंतर शोध लावून ते प्रसिद्ध केले आणि त्या त्या शोधांवर आपल्या नावाचं शिक्कामोर्तब केलं. आणि शील मात्र तसाच राहिला.

यामुळे प्रसिद्ध वैज्ञानिक आणि विज्ञान लेखक आयझेंक असिमॉव्ह त्याला 'हार्डलक शील' असंच म्हणत असे !


शील हा एका व्यापाऱ्याचा मुलगा होता. ९ डिसेंबर १७४२ साली स्वीडनमध्ये जन्मला. तब्बल अकरा भावंडांमध्ये हा सातवा ! शाळेत लक्ष लागेना म्हणून त्याला एका औषधविक्रीच्या दुकानात शिकाऊ म्हणून ठेवण्यात आलं.फावल्या वेळात तो रसायनशास्त्रावरची पुस्तकं वाचायचा आणि प्रयोगसुद्धा करून पाहायचा. त्या औषधविक्रीच्या दुकानात त्यानं शिकाऊ म्हणून १७६५ पर्यंत काम केलं.नोकर म्हणून पुढे दुसऱ्या एका औषधविक्रीच्या दुकानात १७६५ ते १७६८ पर्यंत त्यानं चांगल्या पदावर काम केलं.१७७५ साली लवकरच त्यानं आपल्या पहिल्या शोधाची हकिकत स्वीडनमधल्या उप्साला विद्यापीठातला रसायनशास्त्रज्ञ बर्गमन याला कळवली.याच उप्साला विद्यापीठात कार्लोस लिनियस वनस्पती विभागात कार्यरत होता. कार्लोस लिनियस वनस्पतीच्या वर्गीकरणाच्या कामासाठी खूपच प्रसिद्ध होता. शीलनं बर्गमनला कळवलेला शोध म्हणजे दारूच्या पिंपातल्या बुरशीपासून वेगळे केलेलं टार्टरिक आम्ल ! या शोधापासून त्याच्या संशोधनकार्यास सुरुवात झाली आणि तेव्हापासून मरेपर्यंत सारखा तो नवनवे शोध लावून प्रसिद्ध करत होता.त्याच्या अतिकाम करण्याच्या आणि प्रत्येक रासायनिक संयुगाची चव घेऊन बघण्याच्या सवयीनं तब्येत ढासळली.

त्यामुळेच १७८६ साली अवघ्या ४४ व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला.विविध कार्बनी संयुगांचं विघटन करून शीलनं ऑक्सिजन उर्फ ज्वालाग्राही हवा मिळवली होती.शीलची खात्री होती ही ज्वालाग्राही हवा नेहमीच्या हवेचा घटक आहे.शीलनं आपला ज्वालाग्राही हवेचा शोध लावला,त्या वेळी प्रिस्टलेच्या प्रयोगाबद्दल त्याला काहीच कल्पना नव्हती.खेदाची गोष्ट ही की शीलचे निष्कर्ष फार उशिरा प्रसिद्ध झाले!!


पण फ्लॉजिस्टॉन संकल्पनेला आणि त्यामुळे निर्माण झालेल्या वायूंच्या गोंधळाला कायमची मूठमाती देण्याचं काम केलं ते अँटोनी लव्हायेजे यानं! 


समाप्त..।