* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१२/११/२५

सामने,युद्ध,देव ! / Front,war,God !

होतं:आणि यानं त्यांचं अन्न शोधायचं क्षेत्रही कमी होत होतं. २५.१०.२५ ,या लेखातील शेवटचा दुसरा भाग..


नुसती माघार घेणं हा पराभव नव्हता.एखादे वेळी माघार घेऊन पराभव टाळणं,विजय मिळवणं,हेही जमलं असतं.आपली कुमक कमी अंतरावरून आणि लवकर येणार;शत्रूला मात्र दुरून येणारी कुमक उशिरानं मिळणार:हे चांगलंच होतं.पण अन्न मिळायचं क्षेत्र कमी होण,हे मात्र मोठं नुकसान होतं.मुळात पायवाट वारुळाची लोकसंख्या घटत असल्यानं त्यातल्या मुंग्यांना हा त्रासही फार वाटला नाही.वारुळाजवळच्या कमी क्षेत्रातच अन्न शोधूनही वारूळ जगू शकत होतं.आता सामने बंद करून शांततेचा काळ भोगणं पायवाट-वारुळाला मोहवू लागलं.पण मुंग्यांची वारुळं अशी स्थिरावलेली शांतता कायम राखू शकत नाहीत.एक वारूळ जिंकत जातं,दुसरं हरत जातं.तीन आठवडे पायवाट-वारूळ मागे सरकत होतं. शेवटी स्पर्धेचं मैदान अगदी वारुळाच्या पायथ्याशी आलं.

आता ओढा-मुंग्या शड्डू ठोकत नव्हत्या,की ताकद दाखवत नव्हत्या.त्या थेट पायवाट-वारुळावर तुटून पडत होत्या.हेही पायवाट-वारुळातल्या मुंग्यांना सुचायला हवं होतं.दर स्पर्धेत,दर सामन्यात ओढा-मुंग्या जास्तजास्त आक्रमक होत होत्या.धक्के देणं वाढलं होतं.पायवाट-मुंग्यांभोवती रिंगणं आवळली जात होती. कधीतरी ही आक्रमकता स्पर्धा-सामन्यावर न थांबता युद्धात बदलणार होती.शांततेचा उंबरठा ओलांडून ओढा-मुंग्या रणभूमीत उतरणार होत्या.एकदा पायवाट-मुंग्या मीटरभर सज्ज उभ्या असताना ओढा-अभिजन मुंगीनं उंबरठा ओलांडला.भेटलेल्या पहिल्याच पायवाट-मुंगीवर तिनं विषारी द्रव्य फवारलं.


सोबत भीती दाखवणाऱ्या फेरोमोन्सचाही मारा केला. आता तिच्या शेजारच्या ओढा-मुंग्या चेकाळल्या,आणि त्यांनीही पायवाट-मुंग्यांवर हल्ला चढवला.एका द्वंद्वयुद्धाची दोन,दोनाची चार,अशी झपाट्यानं मारामारी पसरत गेली.काही पायवाट-मुंग्या हल्ल्याला तोंड देऊ लागल्या,तर काही मागे जाऊन आणखी मुंग्यांना रणमैदानाकडे बोलावू लागल्या.आता दिखाऊ वागणूक संपली.

कोणतीच मुंगी ताठ उभी राहून उंची वाढवेना, की पोट फुगवून आकार वाढवेना.आता एकमेकींवर चढून आपल्या करवतीसारख्या जबड्यांनी शत्रूचे पाय, शत्रूची शिंगं तोडायचा प्रयत्न होऊ लागला.कवच नसलेल्या भागांना दंश करून विषाचा मारा होऊ लागला.जखमी आणि मेलेल्या शत्रूची खांडोळी उडवली जाऊ लागली.लवकरच सगळं क्षेत्र मेलेल्या आणि जायबंदी मुंग्यांनी भरून गेलं.बहुतेक मेलेल्या मुंग्या पायवाट-वारुळाच्या होत्या.त्यांच्यात राणीची सेवा करणारी,नंतर वारूळ सावरायला मदत करणारी अभिजन मुंगीही होती.तिला ओढा-मुंग्यांनी मारून तिचे तुकडे केले होते.


आता बहुतेक पायवाट-मुंग्या पळून वारुळात जाऊन बसल्या.बाहेर राहिलेल्या सगळ्या मारल्या गेल्या.त्या ओढा-मुंग्यांचं अन्न झाल्या.

एखादा नाकतोडा किंवा सुरवंट खाल्ला जावा,तशाच मेलेल्या शत्रु-मुंग्याही खाल्ल्या गेल्या.युद्धाची मोहीमच अन्न कमावण्याची मोहीमही झाली.केवळ युद्धातल्या विजयामुळे नव्हे,तर एरवीही असे स्वजातिभक्षण झालंच असतं.


पराभूत पायवाट-मुंग्यांना आपण आपल्या माय-वारुळाच्या जास्तजास्त जवळ ढकलले जातो आहोत,हे समजत होते.त्यातून पराभव किती भीषण आहे,हेही समजत होते.अखेर वारुळाच्या तोंडाजवळचे काही इंच सांभाळणंही अशक्य झालं,तेव्हा आसपासची माती,काडीकचरा गोळा करून पायवाट-मुंग्यांनी आपल्या वारुळाचं दार बंद केलं.आता पायवाट वारूळ पूर्ण वेढ्यात वारुळाच्या बाहेरचा सारा भाग तपासत, नोंदत फिरत होत्या.काही जास्त होतं,आणि तेही भूमिगत तळघरासारखं किंवा बंकरसारखं.ओढा-मुंग्या शूर,जास्त चौकस मुंग्या तर वारुळापलीकडचा भागही तपासायला गेल्या.आता वेढ्यातल्या पायवाट मुग्या अधूनमधून बाहेर पडून अन्न शोधायला धडपडायच्या.पण जवळच्या क्षेत्रात ओढा-मुंग्यांनी काही अन्न शिल्लक ठेवलंच नव्हतं.आणि पायवाट मृग्यानी दूर जायचा प्रयत्न केला, की त्यांना पकडून,मारून,खाऊन टाकायला ओढा मुग्या सज्जच होत्या.आता पायवाट मुग्यांची उपासमार व्हायला लागली. आधी त्यांनी राखीव अन्नसाठे संपवले.मग संगोपन दालनातील अळ्या आणि कोष खाल्ले गेले.स्वतःच्या धाकट्या बहिणींना मारून प्रौढ बहिणींची पोटं भरली. अखेर तर अंगातली चरबी सोडून काहीच पोषक द्रव्यं उरली नाहीत.


बाहेर ओढा-मुंग्यांनी पायवाट-मुंग्यांचं जुनं सर्व क्षेत्र तपासलं.जुन्या राजवटीचे सर्व अवशेष,जुन्या सर्व खुणा संपवल्या गेल्या.जुन्या पायवाट क्षेत्रभर शेवटच्या लढाईच्या फेरोमोन-खुणा होत्या.कुठे धोक्याची सूचना देणारी रसायनं होती,तर कुठे लढाईला चलायचा आग्रह करणारी.ही सगळी रसायनं आपोआपच नष्ट होत होती, आणि ओढा-मुंग्याही शत्रूच्या या खुणा पुसून टाकत होत्या.पायवाट वारुळात मुंग्या इकडून तिकडे,तिकडून इकडे धावत होत्या.त्यानं काहीच साधलं जात नव्हतं. पण ही सगळी धावपळ मूलप्रवृत्तीतून केली जात होती. एक शेवटचा प्रयत्न म्हणून सर्वांनी बाहेर पडायचं.काही थोड्या मुंग्या जिवंतपणी वेढा फोडून निघाल्या,


एकत्र झाल्या.तर कुठेतरी नव्या जागी वारूळ घडवता येईल, अशी शक्यता मुंग्यांना त्यांचे जीन्स सुचवत होते.पण हे जमायला वेढा फोडणाऱ्यांमध्ये,वाचणाऱ्यांमध्ये खरीखुरी राणी असणं आवश्यक होतं.सैनिक-राणी पुरी पडणार नव्हती.या कडोनिकडीच्या काळात काही वयस्क मुंग्यांना एक वेगळी ऐतिहासिक घटना आठवत होती.ती घडली तेव्हा सध्या वारुळात असणाऱ्या बहुसंख्य मुंग्यांचे जन्मही झाले नव्हते.त्या वेळी सूर्य जोमानं तळपत होता. पायवाट-राणी सातत्यानं अंडी देत होती.संगोपन-दालनं खात्यापित्या अंड्यांनी भरलेली होती.

कामकरी मुंग्या तरुण वयातच दूरदूर जाऊन अन्न गोळा करत असायच्या.आणि अशा काळात,आकाशात ढगही नसताना माथ्यावर सूर्य क्षणभर दिसेनासा झाला जसा झटक्यानं दिसेनासा झाला,तसाच झटक्यात परत दिसायला लागला.आणि हा लपंडाव बराच वेळ होत राहिला.मुंग्यांच्या अंधूक दृष्टीला लांबोळक्या,उंच वस्तू दिसत होत्या.त्यांच्या सावल्या दिसत होत्या.या वस्तू होत्या झाडांसारख्याच;पण त्या हलत होत्या!


त्यांचे आवाजही वेगळेच होते.किडे-मकोडे,खारी आणि सरडे,पक्षी, या सगळ्यांच्या आवाजांपेक्षा वेगळे आवाज ही हलती झाडं काढत होती.आवाज लहानमोठे होत होते.वेगवेगळ्या झाडांजवळून आवाज निघत होते.


आवाज जसे वेगळे होते.तसेच वासही वेगळे होते. उंचावरून येणारे हे विचित्र अशा घटनांचा अनुभव नव्हता.वादळ,पावसाची थैमानं त्यांना आठवत होती.हे मात्र फार वेगळं होतं.काही मुंग्या घाबरून वारुळात पळून गेल्या काहींनी मात्र शौर्यानं या हलत्या झाडांवर हल्ला केला.झालं होतं असं.माणसांचं एक कुटुंब पिकनिकसाठी जंगलात आलं होतं,आणि निष्काळजीपणानं त्यांनी पायवाट वारुळाजवळ जेवायचं ठरवलं होतं! उन्हं कलायला लागली.आणि मुंग्यांना हलती झाडं गेल्याचं जाणवलं.ते विचित्र आवाजही बंद झाले,आणि ते अनोळखी वासही मंदावत गेले.जरा वेळानं वारुळातल्या मुंग्या परत बाहेर पडू लागल्या.त्यांना त्या प्रचंड हलत्या झाडांना साजेसंच विचित्र दृश्य दिसलं.अनेक मुंग्या जमिनीवर चेंगरलेल्या, सपाट अवस्थेत मरून पडल्या होत्या.पण यापेक्षा विचित्र म्हणजे,सगळीकडे अन्नाचे कण पडले होते. काही साध्या मुंग्यांच्या आकाराचे होते,तर काही लाखो पटीनं मोठे होते.वेगळंच अन्न होतं,ना बियांसारखं,ना कीटकांच्या शरीरांसारखं.पण जे काही होतं,ते शुद्ध आणि सघन होतं.

त्यात प्रथिनंही होती,स्निग्ध पदार्थही होते,आणि साखरेचे प्रकारही होते.एरवी मुंग्यांना 'मावा' किड्यांची विष्ठा अन्न म्हणून फार चवदार वाटत असे. कीटकांची शरीरं अत्यंत पौष्टिक वाटत असत.हे स्वर्गीय अन्न त्या दोन्हींपेक्षा चविष्ट आणि पौष्टिक होतं. माणसांनी त्यांच्या पिकनिकचा सर्व कचरा पायवाट-वारुळा शेजारीच टाकला होता.तरुण मुंग्यांना ही घटना आठवत नव्हती.त्यांनी ती भोगली नव्हती.वयस्क मुंग्यांना मात्र गेल्या वर्षीची ती विचित्र आणि अन्न देणारी घटना आठवत होती. पूर्ण वारुळाच्या स्मरणसाठ्याचा विचार केला,तर ती घटना पुसट,

स्वप्नासारखी आणि चमत्कारिक रूपात आठवत होती.


वारूळ-महाप्राण्याच्या वयस्क भागाला ती हलती झाडं नेहमीच्या त्यांच्या विश्वाबाहेरची वाटत होती.माणसांना देवांचे व्यवहार जसे भासतात तसा हा प्रकार.माणसांना जसे देव हे काहीतरी एकाएकी मारणारे,अन्न देणारे जीव वाटतात,तसे वारुळाला हे जीव वाटत होते.कोणास ठाऊक,ते जीव काही दृष्टीनं मुंग्यांचे उपकारी दोस्त असतील.आणि या संकटाच्या काळात ते पुन्हा वारुळाच्या मदतीला धावून येतील.


सगळ्याच मुंग्यांचा या दैवी मदतीवर विश्वास नव्हता. काही मुंग्यांना वाटायचं,की वाऱ्यावादळानं जसे अन्नकण येतात,मुंग्या मरतात,

तशीच ती घटना होती. पण ती फारदा न घडल्यानं दैवी वाटत होती.आणि त्या हलत्या झाडांना मुंग्यांशी घेणंदेणं नव्हतं;ना मारक,ना तारक.आणखी काही मुंग्यांचा तर,असं काही घडलं होतं,यावरच विश्वास नव्हता.थोड्याशा मुंग्यांना तो सगळा काही म्हाताऱ्या मुंग्यांमुळे उपजलेला भ्रम वाटत होता;प्राचीन काळाबद्दलचं स्वप्नरंजन !


पायवाट-वारुळातला भाव असा दुःखानं,भीतीनं रडारड करण्याचा तरी होता;नाहीतर देव मदतीला येतील,अशा आशेचा तरी.वेढ्यात अडकलेली,मरू घातलेली प्रजा होती,ती.तिला एकत्र बांधून ठेवणारी,हेतू पुरवणारी व्यवस्था नव्हती.सुट्या मुंग्यांपासून समाज घडवणारी यंत्रणा नव्हती.अन्न गोळा करा.अंड्यांची आणि अळ्यांची काळजी घ्या,राणीभोवती राखणदारांची फळी उभारा;असे कोणतेच फेरोमोन-संदेश नव्हते. सैनिक-राणीचे फेरोमोन-संदेश वारुळाला सांधून ठेवण्याइतके सबळ नव्हते.

वारुळाला जोडणाऱ्या कड्या विरघळल्या होत्या.आणि बाहेर ओढा-शत्रू उभा होता.


शेवटी उरली भीती आणि फक्त भीती.आता मारू किंवा मरू करत बाहेर पडायचं,किंवा वारुळात कुढत मरायचं.शत्रूला फसवणं,घाबरवणं, धमकावणं,मारणं,वारूळ मजबूत करणं,नवं वारूळ उभारणं,सगळ्या शक्यता संपल्या होत्या.