* विजय गायकवाड | Vijay Gaikawad

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.- रस्किन बाँड.ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि, प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.' सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे प्रयत्न करणारे मार्गदर्शक, मित्र धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे ,विश्वास खाडे, विनायक पाटील,संजय कुंभार,सतीश खाडे,मनोहर सुर्वे,गणेश खंदारे,तात्या गाडेकर, दादासाहेब गाडेकर, दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील यांनी केलेले आहे. मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके,लेखक,प्रकाशक,मित्र ही जगावेगळी माणसं माझ्या जीवनातील महत्वाचा टप्पा आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा गायकवाड, चिरंजीव मयान,माझ्या धावण्यातील गुरुवर्य नामदेव बरुरे,लुल्ला शेख मोठी ताई ,लहान ताई जयश्री शिंदे या सर्वांचेच मनापासून आभार व धन्यवाद मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१/१२/२५

अक्षय्यतेचा नियम / Law of Inexhaustibility

फ्रेंच वैज्ञानिक अँटोनी लॉरेंट लव्हायेजे (Antoine Laurent Lavoisier) (१७४३ ते १७९४) हा अठराव्या शतकातला सगळ्यात महान केमिस्ट होता.त्यानं रसायनशास्त्रात अचूक मोजमापांचं महत्त्व लक्षात घेऊन कम्बशनची (ज्वलन) थिअरी निर्माण केली.विशेष म्हणजे ही थिअरी तेव्हापासून आजतागायत तशीच स्वीकारली गेली आहे.या थिअरीत कम्बशन हे ऑक्सिजनच्या सान्निध्यात होणारं रासायनिक ज्वलनच आहे हे त्यानं सांगितलं होतं.शिवाय त्यानं हवेत ऑक्सिजनशिवाय नायट्रोजनही असतो,तो ज्वलनाला मदत करत नाही हेही दाखवलं.लव्हायेजेची ही थिअरी सजीवांनाही लागू होत होती.जी गोष्ट ज्वलनाला लागू होते तीच गोष्ट उंदरालाही लागू पडते.बंद बरणीत एक मेणबत्ती जाळली तर त्यातला ऑक्सिजन वापरला जातो आणि कार्बन डाय ऑक्साइड तयार होते.कार्बन डाय ऑक्साइड हा त्या मेणबत्तीतल्याच पदार्थांपासून तयार होतो.


तसंच सजीवांच्या बाबतीतही हे लागू पडतं.बंद बरणीतला उंदीरही जिवंत असेपर्यंत ऑक्सिजन वापरतो आणि कार्बन डाय ऑक्साइड बाहेर टाकतो.उंदराच्या शरीराला लागणारा ऑक्सिजन संपत जातो आणि त्याच्या शरीरात तयार होणारा कार्बन डाय ऑक्साइड बरणीत जमा होतो.तर वनस्पतींच्या दृष्टीनं पाहिलं तर त्या कार्बन डाय ऑक्साइड घेतात आणि ऑक्सिजन सोडतात. म्हणजेच वनस्पती आणि प्राणी एकमेकांना पूरक आहेत.हे दोघंही मिळून वातावरणातल्या वायूंचा समतोल कायम सांभाळतात.यामुळेच वातावरणातला ऑक्सिजन कायम २१% राहतो आणि कार्बन डाय ऑक्साइड ०.०३% राहतो.


मेणबत्ती आणि उंदीर हे दोघंही ऑक्सिजन वापरतात आणि कार्बन डाय ऑक्साइड हवेत सोडतात हे बघून लव्हायेजेला माणसाच्या श्वसनाची तुलना कम्बशनशी (ज्वलन) करावीशी वाटली.सजीवाच्या शरीरात होणारं श्वसन आणि बाहेर होणारं ज्वलन यांची तुलना करावीशी वाटणं आणि त्यात साधर्म्य दिसणं ही खरंच विचारांची फार मोठी झेप होती.त्याला असं वाटलं की सजीव प्राणी ज्या प्रमाणात ऑक्सिजन वापरतो त्या प्रमाणात उष्णताही निर्माण करत असावा.हे सिद्ध करण्यासाठी त्यानं प्रयोगही सुरू केले.यातूनच पुन्हा एकदा सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींना निसर्गाचे सारखेच नियम लागू होत असावेत का हा मुद्दा ऐरणीवर आला.


एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात भौतिकशास्त्राचीही प्रगती झाली.त्यामुळेही लव्हायेजेच्या विचारांना पाठिंबा मिळाला.या दरम्यान अनेकांनी उष्णता या भौतिक परिमाणाचा अभ्यास करायला सुरुवात केली होती.त्यातून वाफेच्या इंजिनाचं महत्त्व वाढलं.त्यातून उष्णतेचा उपयोग करून गाडी चालवणं,गती,प्रकाश, इलेक्ट्रिसिटी,चुंबकत्व या भौतिकशास्त्रातल्या अनेक संकल्पना अभ्यासल्या जायला लागल्या.लव्हायेजेनं आपल्या पूर्वीची पिढी आणि समकालीन शास्त्रीय माहिती एकत्र करून बरोबर अर्थ लावला आणि नवीन पारिभाषिक शब्द तयार केले आणि वर्गीकरण करून माहितीला शास्त्रीय रूप दिलं.लव्हायेजेनं रसायनशास्त्रात खूप मोलाची भर घातली आणि म्हणूनच त्याला 'आधुनिक रसायनशास्त्राचा जनक' म्हणतात.


रासायनिक अभिक्रियांमधलं द्रव्याच्या अक्षय्यतेचं तत्त्व सूत्रबद्ध केलं,मूलद्रव्य आणि संयुगं यातला फरक स्पष्ट केला,रासायनिक संज्ञा देण्याची आधुनिक पद्धत शोधून काढली आणि रासायनिक संशोधनामध्ये परिमाणात्मक पद्धतीचा वापर करायला लव्हायेजेनं प्रथम सुरुवात केली.


अँटोनी लव्हायेजे हा २६ ऑगस्ट १७४३ ला पॅरिसमधल्या एका श्रीमंत घराण्यात जन्मला. लव्हायेजे त्याचा घराण्यातला एकुलता एक मुलगा. त्याचे वडील एक श्रीमंत जमीनदार आणि व्यापारी होते.आपल्या मुलानं कायद्याचा अभ्यास करून मोठेपणी एक निष्णात कायदेपंडित व्हावं अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती.त्यानुसार लव्हायेजेनं आपलं कायद्याचं शिक्षण पॅरिसमधील मॅझेरीन या कॉलेजातून घेऊन वकिलीची सनदही मिळवली. कायद्याची पदवी घेतल्यानंतर लव्हायेजेला त्या वेळच्या उत्तम वकिलांच्या गटात सहजच प्रवेश मिळाला.मात्र लव्हायेजेचा खरा कल कायद्यापेक्षा विज्ञानाकडेच अधिक होता.कॉलेजात असताना लव्हायेजे रसायनशाखेचे प्राध्यापक बोरादेलिया यांची व्याख्यानं ऐकण्यासाठी नियमित जायचा.या व्याख्यानांच्या वेळी जी प्रात्यक्षिकं होत व्हायची ती लव्हायेजेला भारी आवडायची.

यातूनच लव्हायेजेनं भावी आयुष्यात वैज्ञानिक होण्याचं ठरवून टाकलं. पण वकील म्हणून प्रत्यक्ष काम करण्यापेक्षा लव्हायेजेनं पॅरिसमधल्या प्रतिष्ठित विज्ञान अकादमीत विज्ञानाचा अधिक अभ्यास करण्यासाठी १६६८ साली प्रवेश घेतला.त्यानं घरीच प्रयोगशाळा स्थापन करून त्यात अनेक शास्त्रीय उपकरणं ठेवली.


या प्रयोगशाळेचा फायदा घेण्यास सर्व शास्त्रषज्ञास त्यानं मोकळीक दिल्यानं त्यालाही अनेक मोठ्या शास्त्रज्ञांच्या परिचयाचा लाभ झाला.१७६८ मध्ये 'फ्रेंच अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्सेस' या संस्थेत लव्हायेजेची 'सह'रसायनशास्त्रज्ञ म्हणून नेमणूक झाली.१७८५ मध्ये लव्हायेजे या संस्थेचा संचालक आणि १७९१ मध्ये कोषपाल झाला.लव्हायेजेला १७६८च्या सुमारास त्याच्या आईच्या इस्टेटीतून काही वाटा मिळाला.हा पैसा लव्हायेजेनं भागीदारीत व्यवसाय सुरू करण्यासाठी वापरला.त्यानं 'जनरल फार्म' नावाची आर्थिक व्यवहार बघणारी कंपनी काढली. त्याचं मुख्य काम म्हणजे शेतकऱ्याकडून मीठ आणि तंबाखू यांसारख्या पदार्थांवर कर गोळा करून तो सरकार दरबारी जमा करणे.


इ.स.१७७४ मध्ये लव्हायेजे आणि जोसेफ प्रिस्टले (१७३३-१८०४) यांची पॅरिसमध्ये भेट झाली. ऑक्टोबर १७७४ मध्ये प्रिस्टलेनं आपल्या संशोधनाबद्दल लव्हायेजेला कळवलं.त्या वेळेस प्रिस्टलेनं पाऱ्याचं लाल भस्म तापवल्यानंतर खलनक्रियेला अधिक मदत करणारी हवा तयार होते आणि ती श्वसनासाठी सामान्य हवेपेक्षा पाच ते सहापट जड असते असं सांगितलं.प्रिस्टलेनं तिला 'डिफ्लॉजिस्टिकेटेड हवा (ज्वलन तत्त्व-विरहित हवा)' असं नाव दिलं.लव्हायेजेनं ताबडतोब रेड मर्क्युरिक ऑक्साइडवर प्रयोग सुरू केले.१७७५च्या एप्रिलमध्ये 'अ‍ॅकॅडमी ऑफ सायन्स'ला लव्हायेजेनं आपले निष्कर्ष कळवले.लव्हायेजेनं काटेकोरपणे प्रयोग केल्यानंतर ज्वलनक्रियेमध्ये आणि धातूंच्या भस्मीकरणामध्ये सामान्य हवेच्या दिलेल्या घनफळामधल्या फक्त काही भागाचाच वापर झाला आणि ती प्रिस्टलेनं शोधलेली नवीन हवा असल्याचं अनुमान काढलं.'साऱ्या पदार्थांचं वजन ज्वलनाअंती वाढतं' असा निष्कर्ष त्यानं काढला. या अभिक्रियांमध्ये हवा भरपूर प्रमाणात लागते हे पाहून लव्हायेजेनं 'हवा ही वेगवेगळ्या वायूंचे मिश्रण असून हे वायू निरनिराळ्या गुणधर्माचे असतात.त्यापैकी काही भाग ज्वलनास उपयुक्त असून तो जळणाऱ्या पदार्थाशी संयोग पावतो आणि 'हवा ज्वलनाला उपयुक्त असते ती श्वसनक्रियेशी फारच अनुकूल असते' असे निष्कर्ष काढले.(सजीव,अमृता देशपांडे,अच्युत गोडबोले,मधुश्री पब्लिकेशन) १७७७ साली प्रसिद्ध केलेल्या 'मेणबत्तीचं हवेतलं ज्वलन' या आपल्या शोधनिबंधात लव्हायेजेनं चार प्रकारच्या हवेचा उल्लेख केला होता.हवेचा पहिला प्रकार म्हणजे वातावरणातली हवा ज्यात आपण राहतो आणि जी श्वासावाटे घेतो ती हवा.प्रिस्टलेनं नामकरण केलेली 'डिफ्लॉजिस्टिकेटेड हवा (ज्वलन तत्त्व-विरहित हवा)' म्हणजेच वातावरणातल्या हवेच्या एकचतुर्थांश श्वसनासाठी उपयुक्त असलेली शुद्ध हवा हा हवेचा दुसरा प्रकार.

रुदरफोर्डनं उल्लेख केलेली,पण त्यावेळी या हवेचे अन्य गुणधर्म माहीत नसलेली 'अझोट हवा' हा तिसरा प्रकार.


(उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये) 






२९/११/२५

कामशास्त्राचा अवलिया रिचर्ड बर्टन / Richard Burton,the master of sex 

माझा दृष्टिकोन नेहमीच थोडा जास्तच वेगळा राहिला आहे.मार्क फ्रॉस्ट ( आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार अज्ञाताचा शोध घेत फिरणाऱ्या अवलियांच्या कहाण्या अर्थात हटके भटके,लेखक निरंजन घाटे,प्रकाशक समकालीन प्रकाशन या पुस्तकातील १७ कहाण्या आपण वाचल्या,आजची ही शेवटची कहाणी.. तुम्ही हळूहळू अखंड पुस्तक वाचलेत.अधूनमधून तुम्ही स्वतःची पाठ थोपटायला हवी.कारण तुम्ही जे करू शकणार नाही असं काही लोकांना वाटत होतं,त्या गोष्टी तुम्ही करून दाखविले आहे.त्यामुळे स्वतःचा अभिमान बाळगा.आज तुम्ही जिथे आहात तिथे येण्यासाठी तुम्ही आजवर बराच संघर्ष केलाय. या गोष्टींची दखल घेतल्याने तुम्हाला समाधान मिळेल आणि तुमची ऊर्जा वाढेल.) मागील लेखावरून पुढे..। केलं,पण ईस्ट इंडिया कंपनीने त्याला परवानगी नाकारली.बर्टन रजेवर असला तरी ईस्ट इंडिया कंपनीचा नोकर होता.कंपनीच्या मते हा प्रकल्प फारच धोकादायक होता.मात्र,कंपनीने अरबी भाषेचा अभ्यास करण्यासाठी बर्टनला एक वर्षाची रजा देण्याचं मान्य केलं,बर्टनने ही रजा आपली योजना राबवण्यासाठीच घालवली.त्याने आता आपल्या योजनेत बदल करून जो प्रवास करायचा ठरवला तो त्याच्या पूर्वनियोजित योजनेपेक्षा अधिक धोकादायक होता.त्याने एंप्टी क्वार्टर पार करून पुढे बिगर मुस्लिमांना प्रवेशबंदी असलेल्या मक्का आणि मदिना या इस्लामी पवित्र स्थळांमध्ये जायचं मनाशी ठरवलं होतं.या वेळीही बर्टनने पुन्हा मिर्झा अब्दुल्ला हे नाव धारण केलं.या स्थळांना भेट देणाऱ्या वार्षिक तीर्थयात्रेत त्याने स्थान मिळवलं.आचार,

विचार,भाषा, उच्चार यांत थोडीशी जरी चूक झाली तरी दगडाने ठेचून मारून टाकण्याचीच शिक्षा मिळू शकते याची त्याला पूर्ण कल्पना होती.असला उद्योग यापूर्वी कुणी केला नव्हता आणि त्यानंतरही कुणी केलेला नाही. बर्टनने ही यात्रा यशस्वीरित्या पार पाडली,याचं कारण त्याचं भाषाप्रभुत्व,

इस्लामी चालीरीतींचा सूक्ष्म अभ्यास आणि त्याचा असाधारण धाडसी स्वभाव.त्याच्या या साहसाने त्याला जागतिक कीर्ती मिळवून दिली.काबाचं जवळून दर्शन घेणारा तो एकमेव बिगरइस्लामी गृहस्थ आहे.बर्टन अरबस्तानातून निघून थोड्या काळासाठी कैरोत थांबला.रजा संपताच तो मुंबईत परतला.मुंबईत त्याने 'पर्सनल नॅरेटिव्ह ऑफ अ पिलग्रिमेज टु एल-मदिना अँड मक्का' हा ग्रंथ तीन खंडांत लिहून पूर्ण केला.रजेनंतर नोकरीवर रुजू न होण्यासाठी त्याने लवकरच दुसरं कारण शोधलं.त्याने कंपनीकडे तेव्हा सोमालियात असलेल्या आणि नंतर इथिओपियात गेलेल्या प्राचीन 'हरार' या शहराचा शोध घेण्याची मोहीम काढायचा प्रस्ताव सादर केला.या शहरात तोपर्यंत कुणीही युरोपियन व्यक्ती गेलेली नव्हती.काही युरोपियन प्रवाशांनी तसा प्रयत्न जरूर केला होता,पण त्यात ते अपयशी झाले होते. त्या वेळी मुंबई इलाख्याच्या कार्यकारी सभेतले एक सदस्य जेम्स ग्रँट लुम्सडेन हे बर्टनला मित्र मानत होते.त्यांच्या प्रयत्नांमुळेच कदाचित हा प्रस्ताव विनाविलंब मान्य केला गेला.१ ऑक्टोबर १८५४ या दिवशी बर्टन मुंबईहून जहाजातून एडनला पोहोचला.इथे तो महिनाभर थांबला.हरारच्या प्रवासासाठीची माहिती मिळवणं आणि तयारी करणं यासाठी त्याने या काळात परिश्रम घेतले.मोहिमेच्या पूर्वतयारीत कुठलीही कसूर ठेवणं त्याला मान्य नसे.मोहिमेचं निम्मं यश पूर्वतयारीत असतं,असं तो म्हणत असे.त्या महिन्याभरात सोमालियाची किनारपट्टी त्याने नजरेखालून घातली.मग सोमालिया, सोमाली जमाती आणि त्यांच्या चालीरीती यांची त्याने सर्व प्रकारे माहिती मिळवली.यात दंतकथा,आधीच्या प्रवाशांच्या आठवणी यांचाही समावेश होता.एडनमध्ये व्यापाराकरता येणाऱ्या सोमालींकडून एडनच्या वेश्यावस्तीत अनेक सोमाली तरुणी वेश्याव्यवसायाकरता दरवर्षी येतात,ही माहिती मिळताच तो त्या वेश्यांना भेटला.


या सोमाली मुलींकडून त्याला 'स्त्रियांच्या सुंतां' बद्दलची (शिश्निकाछेदनाबद्दलची) माहिती मिळाली. मुस्लिमांमध्ये बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा पाळली जात होती.सुंता न केलेल्या मुलींना अशुद्ध मानलं जात असे आणि अशा स्त्रीच्या पोटी जन्माला आलेली मुलं म्हणजे तिच्यासाठी अपमानास्पद गोष्ट समजली जायची.सुंता केलेल्या मुलींच्या लग्नानंतरच्या यातना किती मरणप्राय असतात याचं वर्णन करताना बर्टन आपला नेहमीचा तटस्थपणा सोडून अतिशय तीव्र शब्दांत या प्रथेची निंदा करतो.

पाश्चात्त्य मानवशास्त्रज्ञांना बर्टनच्या नोंदी प्रसिद्ध होईपर्यंत अशा प्रथेची अत्यल्प कल्पना होती.केवळ ऐकीव माहितीच्या आधारावर त्यांनी या प्रथेबद्दल लिहायचं टाळलं होतं.बर्टनच्या नोंदी प्रसिद्ध झाल्यानंतर या प्रथेला अधिकृतरीत्या शास्त्रीय ग्रंथांतून जागा मिळू लागली. 'अरेबियन नाइट्स' या आपल्या पुस्तकाच्या पाचव्या खंडात चारशे पंचाहत्तराव्या रात्रीनंतर या प्रथेबद्दलचं विस्तृत टिपण बर्टनने लिहिलं आहे.ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस एका अरब व्यापाऱ्याच्या वेषात बर्टन एडनहून आपल्या नियोजित मोहिमेसाठी निघाला.सोमालीलँडच्या किनाऱ्यावरील प्रीला या बंदरात तो उतरला.तिथेच त्याने वाटाडे,उंट आणि पुढील प्रवासाला लागणारा शिधा गोळा करण्यासाठी महिनाभर मुक्काम ठोकला.

इथे सोमाली जनसामान्यांच्या चालीरीती आणि भाषेबरोबरच स्थानिक सोमाली महिलांचा त्याचा अभ्यास सुरूच होता.

१८५५च्या फेब्रुवारीपर्यंत ही कष्टप्रद मोहीम संपवून बर्टन एडनला परतला.एडनहून तो इंग्लंडला पोहोचला तेव्हा क्रिमियन युद्ध सुरू झालं होतं.त्याने या युद्धात आघाडीवर जाण्यासाठी अर्ज केला.त्या वेळचे ब्रिटिश सेनानी लॉर्ड रॅग्लान यांचा इंडियन आर्मीतल्या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर अजिबातच विश्वास नव्हता.तरीही ईस्ट इंडिया कंपनीने त्याला या युद्धात लढण्यासाठी रजा दिली आणि बर्टन क्रिमियाला जाणाऱ्या जहाजात बसला.तुर्की गैरसैनिकी घोडदळात तो सामील झाला.या तुर्की घोडदळाचं नेतृत्व बेंगॉल आर्मीचे एक कर्नल बीटसन करत होते.या बेशिस्त घोडदळात इतका गोंधळ होता,की त्यांच्यामुळे युद्धकार्यात अडथळेच जास्त येत होते.सहा महिन्यांमध्येच कंटाळून या घोडदळाला रामराम ठोकून बर्टन इंग्लंडला परतला. इंग्लंडला परतल्यावर त्याने 'फर्स्ट फुटस्टेप्स इन ईस्ट आफ्रिका ऑर अ‍ॅन एक्स्प्लोरेशन ऑफ हरार' हे पुस्तक लिहिलं. १८५६ साली प्रसिद्ध झालेल्या त्याच्या या ग्रंथात त्याने सोमाली स्त्रियांवर एक अख्खं प्रकरण लिहिलेलं आहे.हे पुस्तक त्याने लुम्सडेन या त्याच्या मित्राला कृतज्ञतापूर्वक अर्पण केलं आहे.काही काळानंतर बर्टन परत आफ्रिकेत जायचा विचार करू लागला.आफ्रिकेचा शोध घेणाऱ्या प्रत्येक भूसंशोधकाचं स्वप्न त्याला आता खुणावत होतं.हे स्वप्न म्हणजे नाईल नदीच्या उगमस्थानाचा शोध.याच काळात त्याच्यापेक्षा दहा वर्षांनी लहान असलेल्या इझाबेल अरुंडेलबरोबर त्याचा साखरपुडा पार पडला. इ. स. १८५६ मध्येच त्याने नव्या मोहिमेची योजना नक्की केली.या मोहिमेसाठी त्याला खूपच मदत मिळू लागली होती.ईस्ट इंडिया कंपनीने त्याला दोन वर्षांची भरपगारी रजा मंजूर केली होती.तो मुंबईला पोहोचला.

मोहिमेसाठीची शिधासामग्री आणि इतर साधनं जमवून आपल्या जॉन स्पेके नावाच्या सहकाऱ्याबरोबर त्याने मुंबई सोडली आणि तो झांजीबारला पोहोचला.झांजीबार हा त्याचा मुख्य तळ असणार होता.इथून त्याची नाईलचा उगम शोधण्याची मोहीम सुरू होणार होती.झांजीबारमधील त्या सहा महिन्यांमध्ये बर्टनने तो पुढे ज्या भागात प्रवास करणार होता त्या भागाचा इतिहास, भूगोल तिथल्या चालीरीती,बोलीभाषा,प्राणी,वनस्पती आणि हवामान यांची माहिती तर गोळा केलीच;पण त्याचबरोबर स्थानिकांच्या नैतिकतेच्या कल्पना समजावून घेतल्या.हा शेवटचा मुद्दा अनोळखी भूप्रदेशात फार महत्त्वाचा ठरतो. झांजीबार बेटाबद्दलच्या त्याच्या नोंदी त्याने ग्रेट ब्रिटनच्या 'रॉयल जिओग्राफिकल सोसायटी'ला पाठवल्या. त्या कुणाच्या चुकीने मुंबईच्या 'रॉयल एशियाटिक सोसायटी'मध्ये पोहोचल्या हे कळायला मार्ग नाही,पण त्या तिथेच बरीच वर्षं पडून होत्या.

अखेरीस इ. स. १८७२ मध्ये या नोंदींवर आधारित 'झांजीबार सिटी,आयलंड कोस्ट' हे पुस्तक प्रसिद्ध झालं.


बर्टन आणि त्याचा सहकारी स्पेके शेवटी जून १८५७ ला झांजीबारहून नाईल नदीचा उगम शोधण्याच्या मोहिमेला निघाले.बर्टन हा चांगला प्रशासक नाही हे या मोहिमेने सिद्ध केलं.स्वतःवरचा प्रचंड विश्वास आणि कर्तबगारीचा अभिमान यामुळे तो जे निर्णय घ्यायचा ते त्याच्या सहकाऱ्यांना आणि मदतनीसांना तो ऐन वेळी सांगायचा.त्या निर्णयांची कारणमीमांसाही तो कधी करत नसे.त्यामुळे संघभावना निर्माण करण्यात तो अपयशी ठरत असेच,पण त्यामुळे काही वेळा गोंधळही निर्माण व्हायचा.त्याच्या उद्धटपणामुळे त्याचे सहकारी खरं तर वैतागले होते.स्पेकेने तर बर्टनशी बोलणंच थांबवलं होतं. या मोहिमेत दोघांनी मिळून 'लेक टांगानिका'चा शोध लावला. त्यानंतर बर्टन तापाने वारंवार आजारी पडू लागला.म्हणून त्याला मोहीम अर्धवट सोडून इंग्लंडला परतावं लागलं.स्पेकेने मात्र ही मोहीम पुढे चालूच ठेवली.लेक व्हिक्टोरियातूनच नाईल नदी उगम पावते हे त्याला सिद्ध करायचंच होतं. आपल्याला सोडून स्पेके ही मोहीम पुढे नेतोय याची बोच बर्टनच्या मनात कायमची राहून गेली. इंग्लंडला परतल्यानंतर त्याने विश्रांती घेता घेता 'द लेक रिजन्स ऑफ सेंट्रल आफ्रिका' हा ग्रंथ लिहून पूर्ण केला. स्पेके नाईलचा उगम शोधायचा प्रयत्न करत असताना ब्रिटनमध्ये स्वस्थ बसून राहणं बर्टनला पटणारं नव्हतं. अस्वस्थ बर्टनने मग नवी योजना आखली.त्याने परत आजारपणाच्या रजेचा अर्ज केला.

सामान्य माणसं आजारपणाची रजा विश्रांतीसाठी आणि उपचारांसाठी घेतात.बर्टन ही रजा नवे भूप्रदेश बघणं, एखादी नवी भाषा शिकणं आणि स्वतःच्या ज्ञानात भर घालणं यासाठी वापरत असे.खरं तर बर्टनचा साखरपुडा झालेला होता; पण लग्नासाठी न थांबता तो अमेरिकेत पोहोचला.इथे प्रथम तो सॉल्ट लेक सिटीत गेला.मॉर्मन पंथीयांचं हे शहर त्या पंथाचा संस्थापक ब्रिगहॅम यंगने इ. स. १८४७ मध्ये वसवलं होतं.अमेरिकेत बर्टनने 'स्टेज कोच'मधून (बग्गी) भरपूर प्रवास केला. स्थानिक अमेरिकी आदिवासींना (रेड इंडियन) तो भेटला.त्यांच्या चालीरीती,

राहण्याच्या पद्धती वगैरेंच्या नोंदीही त्याने ठेवल्या.मॉर्मनांच्या बहुपत्नित्वाबद्दलही त्याने बरंच काही लिहून ठेवलंय.अमेरिकेतून परतल्यावर २२ जानेवारी १८६१ या दिवशी वयाच्या चाळिसाव्या वर्षी बर्टन विवाहबद्ध झाला.याच वेळी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यातून त्याचं नाव वगळण्यात आलं. कारण १८५८मध्ये ईस्ट इंडिया कंपनीचं सैन्य रॉयल आर्मीमध्ये सामावून घेतलं गेलं.त्यांच्या नियमात रिचर्डच्या रजा बसत नव्हत्या.वडिलोपार्जित घर असलं तरी वेगवेगळ्या मोहिमांचा खर्च केल्यामुळे बर्टनने काहीच रोख रक्कम शिल्लक ठेवलेली नव्हती. मग आर्थिक बाजू सावरण्यासाठी त्याने पश्चिम आफ्रिकेतील 'फर्नांडो पो' आणि 'दाहोमी' या ठिकाणी परराष्ट्रखात्यात राजदूत म्हणून नोकरी केली. ही ठिकाणं मलेरिया,पीतज्वराच्या प्रादुर्भावाने अतिशय धोकादायक समजली जातात.नोकरी करत असतानाही तो नायजेरिया, काँगो,अंगोला इ.ठिकाणी जाऊन आला. तिथल्या लोकांचं निरीक्षण करून त्यावर त्याने लिखाणही केलं.इथल्या वास्तव्यात त्याने लहान मुलांना 'हिजडा' बनवण्याच्या पारंपरिक क्रूर प्रथेचाही अभ्यास केला आणि त्यातील बारकाव्यांसहित त्याची आपल्या पुस्तकात नोंद केली.अशा प्रकारचा मुलांचा व्यापार रोखण्यासाठी त्याने आपल्यापरीने बरेच प्रयत्नदेखील केले.तेथील राजाला भेटून ही प्रथा थांबवण्याची विनंती केली;पण त्याला यश आलं नाही.पुढे तिथून त्याची बदली काही काळासाठी ब्राझीलला झाली.शेवटी इ. स. १८६४ मध्ये तो इंग्लंडला परतला.बर्टन इंग्लंडमध्ये राहायला आला त्या वेळी त्रेचाळीस वर्षांचा होता. आयुष्यभर त्याने जे कष्ट उपसले त्यामुळे त्याच्या प्रकृतीवर चांगलाच दुष्परिणाम झाला होता. ब्राझीलमध्ये कार्यरत असताना त्याला जडलेला आजार त्याची पाठ सोडायला तयार नव्हता.यानंतरच्या त्याच्या सर्व भटकंतीत त्याची पत्नी सतत सावलीसारखी त्याच्याबरोबर वावरली.दक्षिण अमेरिकी भूखंडामध्ये ब्राझीलचा अंतर्भागातील भटकंती तसंच अर्जेंटिना,

पेरूपॅराग्वेत नोकरी आणि भटकंती केल्यावर तो दमास्कसला गेला. तिथून आइसलंड,पुन्हा आफ्रिकेत गोल्डकोस्टशिवाय इतरही अनेक ठिकाणं त्याने पालथी घातली.त्यानंतर त्याने केलेल्या लिखाणात तो जोश ती खदखद नव्हती.त्याच्या पूर्वीच्या लिखाणाच्या तुलनेत हे लेखन फारच आळणी होतं.त्याचं खरं लेखन ते जेव्हा 'त्रिएस्ते'मध्ये राहायला लागले तेव्हा सुरू झालं.त्रिएस्तेमध्ये बर्टनने 'वन थाउजंड अँड वन अरेबियन नाइट्स'च्या भव्य लेखनाला सुरुवात केली. जगभरातल्या कामशास्त्रावरच्या साहित्याचा अनुवाद या पुस्तकात केला गेला आहे.हे लेखन सटीप असून दहा खंडांत आहे.या लेखनावर प्रचंड टीका झाली तरी ते अमाप खपलं.

त्यातून त्याला अकरा हजार स्टर्लिंग पौंड उत्पन्न मिळालं.

आजही या ग्रंथाच्या नवनव्या आवृत्त्या बाजारात येतात. अनेक देशांत,अनेक भाषांत त्याची भाषांतरं झाली, आजही होत आहेत.मुख्य म्हणजे यातल्या स्त्रिया जे लैंगिक स्वातंत्र्य उपभोगतात त्यामुळे व्हिक्टोरिया राणीच्या कालखंडातील सनातनी नैतिक कल्पनांना हादरा बसला आणि स्त्रीस्वातंत्र्य म्हणजे काय हे ब्रिटिश स्त्रियांना प्रथमच लक्षात आलं.


आज बर्टनने केलेल्या 'अनंगरंग रतिशास्त्र','अरेबियन नाइट्स' आणि 'दपफ्र्युम्ड गार्डन' यांच्या अनुवादांमुळेच तो लोकांच्या स्मरणात आहे.बर्टनची मक्का आणि मदिनेची वारी,टांगानिका सरोवराचा शोध आणि इतरही अनेक बाबींमुळे त्याला कीर्ती मिळाली;पण हे तीन अनुवाद म्हणजे त्याची कायमस्वरूपी स्मारकं आहेत.१९ ऑक्टोबर १८९० रोजी रिचर्ड बर्टनचं निधन झालं. त्यानंतर पुढचे सोळा दिवस नवऱ्याची बदनामी होईल या भीतीने त्याच्या खानदानी ब्रिटिश पत्नीने,इझाबेलने,त्याच्या कागदपत्रांचे गड्ढे, त्याच्या नोंदी आणि त्याने गोळा केलेली सगळी ग्रंथसंपदा नष्ट केली.आपल्या नवऱ्याची लैंगिक विकृती या लेखनाच्या स्वरूपात प्रकट होते,हे लेखन कपोलकल्पित आहे,असं समजून बर्टन यांचं जेवढं लेखन सापडलं ते तिने जाळून टाकलं.यात 'द पफ्र्युम्ड गार्डन'च्या अनुवादाचा कच्चा खर्डाही होता.मृत्यूच्या आदल्याच दिवशी रिचर्डने 'द पफ्र्युम्ड गार्डन्स'चं हस्तलिखित प्रकाशकाच्या स्वाधीन केलं होतं म्हणून ते वाचलं.पुढे या घटनेचं वर्णन 'ब्रिटिश मानवशास्त्रीय इतिहासातील सर्वांत काळा दिवस' असं केलं गेलं. इझाबेलने रिचर्डच्या स्मरणार्थ त्याच्या कबरीवर संगमरवराची एक छत्री उभारली.लंडनच्या नैऋत्य भागातल्या मॉर्टलेक कबरस्थानात ही छत्री अजूनही उभी आहे इझाबेलला मात्र तिचा नवरा त्याच्या अफाट लिखाणामुळे अमर झालाय हे कधी उमगलंच नाही. •


समाप्त.. धन्यवाद..!!


२७/११/२५

कामशास्त्राचा अवलिया रिचर्ड बर्टन / Richard Burton, the master of sex

नैतिक-अनैतिकतेच्या गुंत्यात अडकून न पडता आपल्या मर्जीनुसार जीवन जगणारे सर रिचर्ड बर्टन हे आयुष्याच्या अखेरपर्यंत जगभर भटकत राहिले. निरनिराळ्या देशांतील शारीरिक संबंधांबाबतच्या असंख्य अनिष्ट प्रथा त्यांनी पहिल्यांदा जगासमोर आणल्या.अशा या जगावेगळ्या 'इरॉटिक ट्रॅव्हलर' बद्दल…(कामशास्त्राचा अवलिया अभ्यासक रिचर्ड बर्टन,हटके - भटके,निरंजन घाटे,समकालीन प्रकाशन)


एकोणिसाव्या शतकात इंग्लडच्या समाजमनावर व्हिक्टोरियन चालीरीतींचा जबरदस्त पगडा होता. संस्कृतीच्या नावाखाली लोकांच्या वागण्याबोलण्यावर अनेक निर्बंध टाकले गेले होते.

शारीरिक संबंधांबाबत जाहीरपणे बोलणंदेखील असभ्य मानलं जात होतं, त्याविषयीची माहिती गोळा करणं तर दूरच राहिलं. अशा वातावरणात सर रिचर्ड बर्टन नावाचा एक इंग्रज अवलिया मात्र जगभर भटकंती करत याच विषयाची आश्चर्यकारक माहिती गोळा करून जगापुढे मांडत होता.त्यांनी सेक्सबाबतच्या जगभरातल्या अनेक प्रथा, चालीरीती,धारणा यांची बारकाव्यां -

सहित निरीक्षणं नोंदवली.समलिंगी संबंध,तसंच मुस्लिम समाजात असलेल्या स्त्रियांची सुंता करण्याच्या अघोरी पद्धतीसारख्या अनेक प्रथा अस्तित्वात आहेत हे जगाला प्रथमच कळलं ते सर बर्टन यांच्या निरीक्षणांवरूनच. आज या घटनेला सुमारे दीडशेहून अधिक वर्ष लोटली आहेत आणि आता कुठे जागतिक पातळीवर त्या अघोरी प्रथेविरुद्ध आवाज उठवला जात आहे.


सर रिचर्ड बर्टन यांनी निरनिराळ्या देशांतील दुर्गम भागात भटकंती केली.त्यांना या देशांमधल्या अनेक भाषा त्यातल्या बारकाव्यांसह अस्खलितपणे येत होत्याच,पण त्या भाषांतील साहित्याशीही त्यांचा परिचय होता.ते ज्या भागात जात तिथली स्थानिक भाषाही झटकन आत्मसात करत आणि स्थानिकांतलेच एक बनून राहत.

स्थानिक लोक त्यांना आपल्यातला एक मानून त्यांच्याशी निःसंकोच गप्पा मारत असत.त्यामुळे त्या भूभागातील स्त्री-पुरुष संबंधांतले बारकावे त्यांना अवगत होत.बर्टन त्या सर्व चालीरीती नोंदवून त्या जपून ठेवत असत.अफाट स्मरणशक्ती,तटस्थ दृष्टीने केलेलं निरीक्षण,बारकावे टिपण्याची वृत्ती आणि भावनात्मक वृत्तीचा अभाव यामुळे त्यांच्या नोंदी अतिशय अचूक असत.त्यांच्या अशा अनेक नोंदींचं संपादित संकलन म्हणजे एडवर्ड ली यांनी संपादित केलेलं 'द इरॉटिक ट्रॅव्हलर' हे पुस्तक. (त्यांनी जगभरातल्या कामशास्त्रावरचं साहित्य जमवून त्याचा अनुवादही पुस्तकरूपाने प्रसिद्ध केला आहे.हे प्रचंड गाजलेलं पुस्तक म्हणजे 'द अरेबियन नाइट्स' हा महाखंड.

त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना पाश्चात्त्य जगात 'कामशास्त्राचा पहिला अनुवादक' तसंच 'सेक्युअल अँथ्रॉपॉलॉजिस्ट' अशीही प्रसिद्धी मिळाली आहे.)


'द इरॉटिक ट्रॅव्हलर' या पुस्तकातून सर रिचर्ड बर्टन यांचं आयुष्य उलगडत जातं तेव्हा 'सत्य हे कल्पितापेक्षा अद्भुत असतं' याचीच प्रचिती येते.रिचर्ड फ्रान्सिस बर्टनचा जन्म १९ मार्च १८२१ या दिवशी लंडन इथे झाला.त्याचे वडील लेफ्टनंट कर्नल जोसेफ नेटरव्हिल बर्टन यांना तीन मुलं.रिचर्ड सर्वांत मोठा.कर्नल बर्टन अत्यंत निर्भीड,स्पष्टवक्ते, तत्त्वनिष्ठ आणि वृत्तीने भटके होते.एका ठिकाणी फार काळ राहणं त्यांना आवडत नसे.या सर्व गुणांची देणगी त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला वारसा म्हणून दिली होती.याच गुणांमुळे कर्नलसाहेबांना त्यांची सैन्यातली नोकरी गमवावी लागली होती.त्यांनी अपुऱ्या माहितीवर केवळ वरिष्ठ सांगतात म्हणून राणीविरुद्धच्या व्यभिचाराच्या खटल्यात साक्ष द्यायला नकार दिला होता.कर्नल बर्टननी वरिष्ठांची आज्ञा पाळली नाही म्हणून ड्यूक ऑफ वेलिंग्टननी त्यांना निम्म्या पगारावर सक्तीने निवृत्त करण्याची आज्ञा दिली.सुदैवाने कर्नल बर्टनच्या पत्नीला,मार्था बेकरला,माहेरहून खूप संपत्ती वारसाहक्काने मिळाली होती,त्यामुळे कर्नलसाहेब आरामात जगू शकले.


रिचर्डच्या भटकंतीला बालवयातच सुरुवात झाली. त्याचे आई-वडील फ्रान्समध्ये स्थायिक झाले.रिचर्ड आणि त्याच्या भावंडांचं औपचारिक शिक्षण झालंच नाही.तसंच त्यांच्या जगण्याला शिस्तही नव्हती. जसजसं वय वाढू लागलं तसतसे रिचर्ड आणि त्याचे भाऊ अधिकाधिक बेदरकार जीवन जगू लागले. समाजाला सत्याची कदर नसते,त्यांना देखावा महत्त्वाचा वाटतो,या निष्कर्षाप्रत रिचर्ड फार लहान वयातच पोहोचला होता.फ्रान्समध्ये काही वर्षं राहिल्यानंतर तिथे सुरू असलेल्या राजकीय उलाढालींमुळे बर्टन कुटुंब पुन्हा इंग्लंडमध्ये परतलं. तोपर्यंत रिचर्डने फ्रेंच भाषा आत्मसात केलेली होती.


बर्टन कुटुंब इंग्लंडमध्ये असताना रिचर्डला कांजिण्या झाल्या आणि कर्नलसाहेबांनी त्यांचा मुकाम परत फ्रान्समध्ये हलवला.तिथून एका वर्षातच ते इटलीस राहायला गेले.तिथेही ते स्थिरावले नव्हतेच.पण इटलीतल्या या मुक्कामात रिचर्ड आणि एडवर्ड या दोन्ही भावांनी इटालियन भाषेवरही प्रभुत्व मिळवलं.


इटलीतल्या वास्तव्याने रिचर्डला इतके विविध अनुभव दिले,की इतर सामान्य माणसाला त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातदेखील एवढा अनुभव मिळणं कठीणच. त्या वेळी रिचर्ड फक्त सोळा वर्षांचा होता,इटलीतल्या नेपल्समध्ये कॉलऱ्याची साथ होती,त्या वेळी या दोन भावांनी साथीत मेलेल्यांची प्रेतं हातगाड्यांवर रचून त्या गाड्या स्मशानात नेण्याचं काम केलं होतं. नेपल्समध्येच असताना दोघांनी घराजवळच असलेल्या वेश्यागृहाची माहिती काढली आणि ते तिथे नियमित भेटी देऊ लागले.भावांच्या या बेदरकारपणामुळे त्यांचा वेश्यांबरोबरचा पत्रव्यवहार कर्नल

साहेबांच्या हातात सापडला.ते खवळले आणि त्यांनी नेपल्स सोडायचा निर्णय घेतला.ते आधी प्रॉव्हेन्स इथे,नंतर पिरनीज पर्वतराजीतील पाऊ या खेड्यात राहायला गेले. पाऊ हे पर्यटनस्थळ म्हणून प्रसिद्ध असलं तरी तो स्मगलरांचा अड्डा होता.त्या स्मगलरांच्या संपर्कात यायला या बंधूंना वेळ लागला नाही.तिथे येणाऱ्या पर्यटक मुलींना पटवणं हाही उद्योग या बंधूंनी आवडीने केला.आपल्या मुलांना उच्च शिक्षण देऊन चर्चच्या सेवेत दाखल करावं,असा एक अजब निर्णय या वेळी कर्नलसाहेबांनी घेतला.वडिलांच्या या निर्णयामुळे रिचर्ड ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ट्रिनिटी महाविद्यालयात दाखल झाला.ग्रीक आणि लॅटिन शिकवणाऱ्या त्या महाविद्यालयात रिचर्डच्या पूर्वानुभवाचा उपयोग नव्हता.व्यावहारिक जगाचं ज्ञान,इंग्रजी-फ्रेंच आणि इटालियन बोलीभाषा अस्खलितपणे बोलता येणं,बुद्धिबळ आणि तलवारबाजीत प्रावीण्य यांचा नि ऑक्सफर्ड विद्यापीठाचा मेळ बसणं तसं अवघडच होतं. तोपर्यंतच्या आयुष्यात त्याचा आणि शिस्तीचाही कधी संबंध आलेला नव्हता,त्यामुळे लवकरच त्याची ऑक्सफर्ड विद्यापीठातून हकालपट्टी झाली.


विद्यापीठातून बाहेर पडल्यावर काय करायचं हा प्रश्न रिचर्डने स्वतःच सोडवला.त्या काळात रिचर्ड अरेबिक भाषेचा अभ्यासही करत होता.याच दरम्यान ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्याने अफगाणिस्तानमध्ये झालेल्या पराभवात बरेच अधिकारी गमावले असल्याने कंपनीने सैन्यभरती सुरू केली होती.हे रिचर्डला कळलं तेव्हा त्याने पाचशे पौंड एवढी रक्कम भरून बाँबे नेटिव्ह इन्फंट्रीमध्ये कमिशन्ड अधिकारी म्हणून नोकरी मिळवली.

लगेचच त्याने हिंदुस्तानी भाषा शिकण्यास सुरुवातही केली.चार महिन्यांच्या सागरी प्रवासानंतर, जून १८४२ मध्ये झुपकेदार मिश्यांचा हा रुबाबदार आणि देखणा अधिकारी मुंबई बंदरात उतरला.इथे आल्या आल्या काही दिवसांतच इथल्या इंग्रज अधिकाऱ्यांशी त्याचे खटके उडू लागले,याचं कारण रिचर्ड भारतीय वेश्यांच्या वस्तीत उघडपणे वावरायचा.

त्याने कुणाच्या लक्षात येणार नाही अशा त-हेने हे उद्योग करायला ब्रिटिश समाजाची हरकत नव्हती;पण कुठलीही गोष्ट चोरून करायची हे रिचर्डला मान्य नव्हतं.


भारतात आलेल्या सैन्याधिकाऱ्याला इथे आल्यावर सहा महिन्यांच्या आत हिंदुस्थानी भाषेची परीक्षा पास होणं आवश्यक असे.रिचर्ड त्या परीक्षेत पहिला आला.नंतर त्याने गुजराती आणि मराठी भाषेतही प्रावीण्य मिळवलं.


याच सुमारास सर चार्ल्स नेपियरनी सिंध प्रांत जिंकून घेतला होता.१८४४ च्या सुरुवातीस रिचर्डची रेजिमेंट सिंधला रवाना झाली.त्याला कराचीत मुख्य कचेरीत असलेल्या सिंधच्या सर्वेक्षण विभागात नियुक्ती मिळाली.इथे त्याने भारतीय चालीरीतींची नोंद ठेवायला सुरुवात केली.सामान्य भारतीयांचं जीवन हा त्याचा आवडीचा विषय बनला.


त्याचा रंग युरोपियन गोरा नव्हता.त्यातच त्याच्या भटकंतीमुळे तो रापला होता.त्यामुळे आणि भाषाप्रभुत्वामुळे स्थानिक बनून वावरणं त्याला सहज जमून जात होतं.त्याने कराचीमध्ये तीन विविध वस्तू भांडारं उघडली.या दुकानांमध्ये काम करत असताना तो गिऱ्हाइकांशी संवाद साधायचा.त्यामुळे त्याच्याजवळ माहितीचा खजिनाच जमा झाला.स्थानिक चालीरीती, सण-उत्सव,रस्त्यावरचे जादूगार आणि भटके यांच्याकडून धार्मिक माहितीबरोबरच लैंगिक समजुती, कामोत्तेजकं,युनानी औषधं,वैदूंची झाडपाल्याची औषधं यांची माहिती त्याने मिळवली.या नोंदींवर आधारित 


त्याचं पहिलं पुस्तक इ. स. १८५१ मध्ये प्रसिद्ध झालं. त्या पुस्तकाचं शीर्षक होतं,'सिंध अँड द रेसेस देंट इनहॅबिट द व्हॅली ऑफ इंडस, वुईथ द नोटिसेस अँड द टोपोग्राफी अँड हिस्टरी ऑफ द प्रॉव्हिन्स'. या पुस्तकात आणि नंतरही इतर पुस्तकांमध्ये बर्टनने एक नोंद वारंवार केल्याचं दिसून येतं. 


सिंध प्रांतातल्या स्त्रियांच्या निरीक्षणावरून बर्टनने म्हटलं आहे,की उष्ण आणि आर्द्र हवामानाच्या भूप्रदेशातील पर्वतराजीजवळ राहणाऱ्या स्त्रिया या त्या भागातील पुरुषांपेक्षा जास्त कामातुर आणि भावनिक असतात,तर थंड भूप्रदेशात नेमकी याउलट परिस्थिती दिसून येते.(त्यासाठी त्याने कुठलाही पुरावा दिलेला नसला तरी त्याच्या या निरीक्षणावर तो शेवटपर्यंत ठाम होता.) सिंध प्रांतातल्या समजुती, विशेषतःवशीकरणासाठी करण्यात येणाऱ्या जा‌देटोण्यावर बर्टनने या पुस्तकातील बरीच पानं खर्च केली असून त्यासाठीचे तांत्रिक विधी आणि मंत्रही दिले आहेत.

'सिंधी स्त्रिया दिसायला सुंदर असल्या तरी हिंदुस्तानात त्यांच्या चालचलणुकीबद्दल फारसं चांगलं बोललं जात नाही,' असं सांगून त्या कारणाने होणाऱ्या खूनखराब्याची काही उदाहरणंही तो देतो.सिंधसह वायव्य हिंदुस्तानातल्या पुरुषांकडून वापरल्या जाणाऱ्या सर्व प्रकारच्या कामोत्तेजकांचं बारकाव्यांसह वर्णनही त्याने केलं आहे.. स. १८४५ मध्ये सर चार्ल्स नेपियरना कराचीत पुरुष वेश्यागृहं आहेत असं कळलं.सर चार्ल्सनी 'याची सत्यता तपासून पाहावी'असं मध्यस्थामार्फत बर्टनला सुचवलं. तशी लेखी सूचना मात्र बर्टनला मिळाली नव्हती.त्याने त्याच्या नेहमीच्या पद्धतशीरपणे त्या प्रकरणाचा तपास करायला सुरुवात केली.तो 'मिर्झा अब्दुल्ला बशिरी' नावाचा एक व्यापारी बनून कराचीला पोहोचला. मिळालेल्या माहितीवर आधारित एक तपास अहवाल त्याने मुंबईस १८४७ मध्ये पाठवला.दुर्दैवाने त्या वेळी सर चार्ल्स राजीनामा देऊन मायदेशी परतले होते. त्यांची जागा घेतलेले गृहस्थ फारच सोवळे आणि सनातनी वृत्तीचे होते.हा अहवाल वाचून ते संतापले. त्यांनी रिचर्ड बर्टनच्या बडतर्फीचा हुकुमनामा जारी केला.बर्टन सैन्यात अधिकारी होता.त्यामुळे सैन्यातली त्याची हकालपट्टी जरी लगेच झाली नसली तरी त्याच्या एकूण सैनिकी कारकिर्दीवर मात्र याचा वाईट परिणाम झालाच.मात्र,बर्टनचा अहवाल म्हणजे समलिंगी संबंध आणि अल्पवयीन मुलांच्या लैंगिक वापराचा पहिला शास्त्रशुद्ध अभ्यास मानला जातो. बर्टन जगात जिथे जिथे गेला तिथे तिथे सर्व जमातींत त्याला या प्रकारचे लैंगिक संबंध आढळून आले.या निरीक्षणांवर त्याने 'टर्मिनल एसे' नावाचा एक प्रबंध लिहिला, जो पुढे त्यानेच लिहिलेल्या 'द अरेबियन नाइट्स' या प्रसिद्ध महाखंडातल्या दहाव्या भागात समाविष्ट केला गेला.सिंधमध्ये असताना वयाच्या पंचविसाव्या वर्षी बर्टनला कॉलरा झाला.त्या वेळी तो मरता मरता वाचला.


यातून सुधारण्यासाठी त्याला बराच काळ विश्रांती घेणं भाग होतं.त्यामुळे त्याला दोन वर्षांची रजा मंजूर करण्यात आली.या आजारपणाच्या रजेत विश्रांतीसाठी त्याला उटकमंड इथे सरकारी खर्चाने पाठवण्यात आलं. तेव्हा उटकमंड मद्रास इलाख्यात होतं.तिकडे त्रिवेंद्रममार्गे जायचं त्याने ठरवलं.त्याला वाटेत गोवा लागलं.गोव्याच्या सौंदर्याची भुरळ त्याला पडलीच.तो तिथे काही काळासाठी थांबला.इथे त्याला एक पोर्तुगीज मुलगी भेटली.ती 'काझा द मिसेरीकॉर्डिया' या कॉन्व्हेंटमध्ये नन होती.तिला उत्तम लॅटिन येत होतं. मुख्य म्हणजे तिला मठात जोगीण बनून राहायचा कंटाळा आला होता.लॅटिन शिकता शिकवता या दोघांनी गोव्यातून पळून जाण्याचं ठरवलं.बर्टनने स्वतः ही योजना आखून यशस्वीही केली.यानंतर चार वर्षांनी त्याने त्याच्या गोव्यातील वास्तव्यावर एक पुस्तक लिहिलं.'गोवा अँड द ब्लू माउंटन्स ऑर सिक्स मंथ्स ऑफ सिक लीव्ह' हे १८५१ मध्ये प्रसिद्ध झालेल्या त्या पुस्तकाचं नाव. या पुस्तकात बर्टनने त्या पलायनाची घटना जशीच्या तशी न लिहिता ती एका अज्ञात ब्रिटिश तरुणाचं साहस म्हणून समाविष्ट केली. 


गोव्यातून कालिकतला पोहोचल्यानंतर बर्टन उटकमंडला गेला.इथे त्याला पर्शियनचा जाणकार असलेला एक मौलवी भेटला.त्याच्याकडून तो पर्शियन शिकला.सप्टेंबर १८४७ मध्ये तो मुंबईला परतला. मुंबईत त्याने पर्शियन भाषेची सरकारी परीक्षा दिली. नेहमीप्रमाणे याही भाषेच्या परीक्षेत तो पहिला आला. वैद्यकीय अधिकाऱ्याशी थोडीशी हुज्जत घालून त्याने शारीरिक सक्षमतेचं प्रमाणपत्र मिळवलं आणि तोपर्यंत अशक्तच असलेला बर्टन वैद्यकीय रजा संपवून त्याच्या सैनिकी सेवेत रुजू झाला.


सेवेत रुजू झाल्यानंतर त्याची रवानगी परत कराचीला करण्यात आली.इथे त्याने त्याच्या सिंधविषयक पुस्तकात भर घालण्यासाठी माहिती गोळा करणं सुरू केलं. इ.स. १८४८च्या उन्हाळ्याच्या थोडं आधीच दुसरं इंग्रज-शीख युद्ध सुरू झालं.बर्टनजवळ सहा भाषांमधील प्रावीण्याची प्रशस्तिपत्रकं आणि आधीच्या अधिकाऱ्यांची 'स्थानिकांमध्ये सहजपणे मिसळतो' अशी भलावण होती.त्या जोरावर त्याने पंजाबमध्ये घुसणाऱ्या सैन्याबरोबर दुभाष्या म्हणून जाण्याची परवानगी मागितली.

मात्र,त्याच्या नेहमीच्या वाह्यातपणाने त्याला पुन्हा एकदा दगा दिला. त्याला संधी नाकारण्यात आली.


त्यामुळे निराश झालेल्या बर्टनने नंतरची चार वर्षं इंग्लंड आणि फ्रान्समध्येच व्यतीत केली.या काळात त्याने वेगवेगळ्या विषयांवर पाच पुस्तकं लिहिली.याच काळात त्याला एक कल्पना सुचली.

त्याला जागतिक प्रसिद्धी मिळवून देणाऱ्या प्रवासाची ही योजना होती. इ.स. १८५२ मध्ये या योजनेला संमती मिळावी म्हणून त्याने ती वरिष्ठांपुढे मांडली.'मध्य आणि पूर्व अरबस्तानाचं भूसंशोधन' असं त्या योजनेचं स्वरूप होतं.या मोहिमेत रुब-अल्‌खाली या 'एंप्टी कार्टर' नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रचंड वाळवंटी भूभागाचाही समावेश होता.बर्टनच्या नियोजित साहसाला रॉयल जिओग्राफिक सोसायटीने मदत द्यायचं मान्य केल.

..अपुरे राहिलेला भाग पुढील लेखामध्ये..!




२४/११/२५

चक्रवर्ती / Chakraborty


गावाबाहेरच्या तळ्याच्या बाजूला एक पाच फूट…अपुरे राहिलेला भाग पुढे सुरु…


उंच देव्हारा बांधून त्यात त्या देवाची प्रतिष्ठापना केली. गावकरी लांबूनच बघत होते.हळू आवाजात चर्चा करत होते.देवाच्यानंतर नंबर होता पिंपळाचा.त्यादिवशी मात्र गाव कर्फ्यू लागल्यासारखं घरात बसून राह्यलं. कॉन्ट्रॅक्टरच्या माणसांव्यतिरिक्त फक्त चक्रवर्ती डॉक्टरदाम्पत्य हजर होतं.डॉ.पटेलांनीही येणं टाळलं होतं.पिंपळ तोडायला बारा मजूर आणि बारा तास लागले.नवीनबाबूंच्या सल्ल्याप्रमाणे कॉन्ट्रॅक्टरने तीन मोठे ट्रक आणून ठेवले होते.

त्यातूनच त्या प्रचंड वृक्षाचे अवशेष गावातून बाहेर काढले.

नवीनबाबूंना ते तोडलेलं झाड बघून त्यावर होणारी लोकांची चर्चा टाळायची होती.एवढं करूनही पुढचे पंधरा दिवस सगळा गाव त्याबद्दल दब्या आवाजात चर्चा करतच होता.


पिंपळाजवळ मजूर नि डॉक्टर दाम्पत्याशिवाय कुणीही हजर नसतानाही एक अफवा वणव्यासारखी गावभर पसरली - पिंपळावर कुऱ्हाडीचा पहिला घाव बसताच रक्ताची चिळकांडी उडाली म्हणे ! कुणी सांगत होता - कुऱ्हाडीच्या प्रत्येक घावाबरोबर कण्हण्याचा आवाज झाडातून येत होता...!


पिंपळ तोडताना उडालेला अफवांचा धुरळा हळूहळू खाली बसू लागला.चक्रवर्तीच्या बंगल्याचं काम पूर्णत्वाकडे पोहचायला लागलं.दुर्गापूजेच्या आठवडाभर आधी नवीन बंगल्यात राहायला जायचं आहे हे नवीनबाबूंनी बजावलंच होतं.एकीकडे बंगल्यातल्या आणि दवाखान्यातल्या फर्निचरचंही काम चालू होतं. बंगल्याचं काम सुरू होताच दवाखान्यासाठी लागणारी अत्याधुनिक उपकरणं मागवली गेली.आता गावकऱ्यांच्या भीतीचं आणि काळजीचं रूपांतर औत्सुक्य आणि कौतुकात झालं होतं तरीही पारावरचा तो देव नि पुरातन पिंपळ लोकांच्या मनात मधूनच डोकावत होते.शेवटी एकदाचं बंगल्याचं काम संपलं.


दवाखान्याचं उ‌द्घाटन डॉ.पटेल ह्यांच्याच हस्ते नवीनबाबूंनी केलं आणि दवाखाना सुरू केला. दवाखान्यात पहिल्यासारखी गर्दी होऊ लागली.इतका चकाचक दवाखाना,मुंबईहून आणलेली भारी मशिनरी... त्यामुळे डॉक्टरांचे धर्मादाय दवाखान्यासारखे मोफत उपचार तर सोडाच पण फी भरपूर असणार,बहुदा ती आपल्याला परवडणारी नसेल असा बहुतेकांचा समज झाला.पण दवाखान्यात गेल्यावर त्यांना धक्काच बसला ! पेशंटना बसण्यासाठी असलेल्या जागेत एका कोपऱ्यात एक लाकडी बॉक्स ठेवलेला होता.त्यावर ना दोन्ही डॉक्टरांची नजर होती ना दवाखान्यातल्या कर्मचाऱ्यांची.त्या बॉक्सवर पाटी लावली होती -


तुम्हाला परवडत असेल तरच आणि तेवढीच फी ह्या बॉक्समध्ये टाकावी.


सगळ्यांनीच ह्या उपक्रमाचं स्वागत केलं.नवलाची गोष्ट म्हणजे वेटिंगरूममध्ये बसलेले इतर पेशंट्स बाहेर जाणारी व्यक्ती त्या पेटीत पैसे टाकते की नाही ह्यावर लक्ष ठेवायचे.

काही चिकित्सक मंडळी तर कोण किती पैसे टाकतं हयावरही लक्ष ठेवायची.


दवाखाना नवीन जागेत सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यातच एका अडलेल्या बाळंतिणीची केस आली. तोपर्यंत आजूबाजूच्या गावातही सुईणीच बाळंतपण करायच्या.त्या आपल्या कामात पारंगत असत. त्यातल्या त्यात सावित्रीबाई तर फारच हुशार होत्या. त्यांच्याविषयीची एक गोष्ट लोक आवर्जून सांगतात -


एकदा सावित्रीबाई एका प्रतिष्ठित घरातल्या सुनेच्या बाळंतपणासाठी गेल्या होत्या.बाळाची जन्मवेळ जवळ यायला लागली आणि बाळ पायाळू जन्मणार अशी चिन्हं दिसायला लागली.कुटुंबप्रमुख स्त्री काळजीत पडली.

सावित्रीबाईंनी एक उदबत्ती मागवली आणि नवजाताच्या अस्पष्ट दिसणाऱ्या पायाच्या अंगठ्याला ती जळती उदबत्ती निमिषमात्र टेकवली.गर्भाशयातल्या बाळाने पटकन् पाय आत ओढून घेतला आणि ते गर्रकन् पोटातल्या पोटात फिरलं.बाळ पायाळू न होता कुटुंबाला हवं तसं नॉर्मल जन्मलं.चिंतेचं कारण उरलं नाही !


तर अशा ह्या कुशल सावित्रीबाईंनीही त्या अडलेल्या बाळंतिणीच्या केसपुढे हात टेकले होते.अशा अवस्थेत जिल्हयाच्या दवाखान्यात नेणंही अशक्य होतं.त्या काळात तिथेही सिझेरियनच्या केसेस दुर्मिळ होत्या आणि गावात तर अशी एकही केस झाली नव्हती. अशावेळी त्या चिंताग्रस्त कुटुंबाला डॉ.शामलींची आठवण झाली.ते ताबडतोब त्या अडलेल्या बाळंतिणीला घेऊन डॉ.

शामलींच्या दवाखान्यात आले. अमेरिकेत शिकलेल्या आणि प्रॅक्टिस केलेल्या डॉ. शामलींसाठी ही केस अगदीच किरकोळ होती. बाळंतिणीची सुखरूप सुटका झाली.बाळंतिणीच्या कुटुंबाला इतका आनंद झाला आणि त्यांना इतकी कृतज्ञता वाटली की,ते अख्खं कुटुंब डॉ.शामलींच्या पाया पडायला लागलं.त्यांच्या कुटुंबप्रमुखाने फी विचारली तर डॉ.शामलींनी कोपऱ्यात ठेवलेल्या त्या बॉक्सकडे बोट दाखवलं.


ह्या केसनंतर डॉ.शामलींच्या कौतुकाच्या वर्षावात लोकांच्या मनातली पिंपळाची ती उरलीसुरली सावलीही नाहीशी झाली.खेड्यापाड्याच्या अडाणी बायका तर 'डागतरीन बाईला देवाचं वरदान आहे' असं मानायला लागल्या.

एकमेकींशी बोलताना त्या असा उल्लेख करून म्हणत,


"बय गं,आक्रीतच झालं ! बाईचं पोट फाडून पोर बाहेर काढलं अन् पोट परत शिवून बी टाकलं..."


ह्या प्रसंगानंतर गावातल्या तरुणींची तर डॉ.शामली नायिकाच झाल्या.अनेक बाबतींत त्यांचं अनुकरण होऊ लागलं.भांगात कुंकू भरण्याची फॅशन गावच्या विवाहित स्त्रियांमध्ये आली.कळस म्हणजे भडक लाल,हिरव्या, भगव्या रंगाच्या बॉर्डर असलेल्या पांढऱ्या आणि मोतीया रंगाच्या रेशमी साड्या एका हुशार दुकानदाराने 'शामली साडी' अशी जाहिरात करून विकायला सुरुवात केली !


एकंदरीत नवीनबाबू,शामली हे डॉक्टरद्वय ह्या लहानशा गावात रमले.रुळले.स्वतःकडे पाहायला आता त्यांना वेळ मिळू लागला होता.लोकांना विश्वासात घेऊन दवाखाना शनिवारी अर्धावेळच उघडा ठेवायला त्यांनी सुरुवात केली.गावाच्या बाहेर मामलेदार कचेरीनंतर आणि कोर्टाच्या आधी एक क्लब होता.नवीनबाबू आणि अर्थातच शामलीदेखील क्लबच्या सभासद होऊन दर रविवारी सकाळी क्लबमध्ये टेनिस खेळायला जाऊ लागले.एकदा शनिवारी संध्याकाळी नवीनबाबू आणि शामली एसटी स्टँडला लागून असलेल्या रस्त्यावरून पुढे गावाबाहेर पायीपायी फिरायला चालले होते. रस्त्यावरून पुढे गावाबाहेर साधारण तीनेक फर्लांग गेल्यावर एक छोटासा गाडी रस्ता पुढे गेलेला त्यांना दिसला.तो पुढे कुठे तरी धानोरे नावाच्या गावाकडे जात होता म्हणे.दोन्ही रस्त्यांच्या तिठ्यावर एक अर्धवट बांधकाम दिसलं.पूर्ण झालेला जो भाग दिसत होता तो उत्कृष्ट होता.डॉ.शामली म्हणाल्या,"आपलं आत्ताचं घर भरवस्तीत आहे.दवाखान्याच्या जागेसाठी नक्कीच सोयीचं आहे.पण राहायला अशी एखादी रमणीय जागा हवी.ह्या जागेचा आकार थोडा विचित्र आहे.एकूण जागा त्रिकोणी आहे." ह्या जागेसंबंधीही हे डॉक्टरद्वय डॉ.पटेलांशी बोललं. पुढचा भाग साठ फुटापर्यंत आणि तो निमूळता होत शेपटासारख्या टोकाला जेमतेम दोन फूट झाला होता. अशा जागेला व्याघ्रमुखी जागा म्हणतात आणि ती राहायला अशुभ मानली जाते.असं डॉ.पटेलांनी त्यांना सांगितलं.ह्यावेळीसुद्धा दोघांनाही ती जागा आवडल्यामुळे ती त्यांनी घ्यायचं ठरवलं आणि आपल्या हौसेप्रमाणे बांधकाम पूर्ण करायला सुरुवात केली. ह्यावेळी 'जागा घेऊ नका' असा सल्ला मात्र गावातल्या कुणीच दिला नाही.


आता गावात येऊन डॉ.चक्रवर्तीद्वयांना एक वर्षं झालं होतं.ते त्यांच्या स्वतःच्या घरात राहयला गेले तेव्हा दुर्गापूजा जवळ आली होती.आता पुन्हा एकदा दुर्गापूजा आली.ही पूजा दणक्यात करायची असं ठरलं.दोघेही तयारीला लागले.बंगाली मिठाया बनवण्यासाठी बाहेरून आचारी बोलावले.सगळ्या बंगल्याला दीपमाळांनी सजवलं. गावातल्या काही खास जवळच्या लोकांना त्यांनी जेवायला बोलावलं.अगदी काटूनकुटून निमंत्रणं केली तरीही दीडशे माणसं झाली होती.इतर लोक संध्याकाळी प्रसादाला आणि नास्त्याला आले होते.


कार्यक्रम खूप धूमधडाक्यात झाला.नवीनबाबू पांढरा कुर्ता आणि बंगाली पद्धतीचं धोतर नेसून सोगा खांद्यावर टाकून लोकांचं आगत-स्वागत करत होते. लांब,काळेभोर केस मोकळे सोडलेल्या,

पांढऱ्या रेशमी साडीतल्या डॉ.शामली स्वतःच दुर्गा वाटत होत्या.डॉ. शामली विजेसारखी हालचाल करत सर्वत्र वावरत होत्या.बायाबापड्यांनी मनातल्या मनात हजारवेळा त्या दोघांची दृष्टी काढली.डॉक्टर पटेलांच्या पत्नीने तर शामलींना काजळाची लहानशी तीटसुद्धा लावली आणि अशीच तीट शामलींनी नवीनबाबूंना लावावी असंही सुचवलं.नवीनबाबू जरा थकलेले पाहून शामलींनी त्यांना विचारलं तेव्हा 'काही विशेष नाही' म्हणत त्यांनी शामलींचं बोलणं उडवून लावलं.आणखी तासाभराने मात्र ते शामलींना म्हणाले,"मी जरा वरती जाऊन पडतो. थोडीशी चक्कर आल्यासारखं वाटतंय.तू पाहुण्यांकडे बघ." डॉ.शामलींनी त्यांचं ब्लडप्रेशर बघितलं.ते अगदी व्यवस्थित होतं.त्यामुळे शामली खाली आल्या आणि पाहुण्यांमध्ये मिसळून गेल्या.


सगळ्यांचं हवं-नको बघून नंतर सर्वांना निरोप देऊन डॉ. शामली वर बेडरूममध्ये गेल्या तेव्हा नवीनबाबू तापाने फणफणलेले दिसले.अर्धवट झोपेत ते अधूनमधून कण्हत होते.डॉ.शामलींनी त्यांना पॅरासिटामॉल दिली. पांघरूण घालता घालता त्या म्हणाल्या,


"नवीन,तुझी खूपच धावपळ झालीय.श्रमाने ताप आलेला दिसतोय.उद्याचा दिवस आराम कर.खाली दवाखान्यातदेखील येऊ नकोस.तुझे पेशंट मी बघेन."


डॉ.नवीन ह्यांनी मान डोलवली आणि परत त्यांना ग्लानी आली.

डॉ.शामलीही थकून गेल्या होत्या.नवीनची झोपमोड होऊ नये म्हणून त्यांनी शेजारच्या बेडरूममध्ये जाऊन अंग टाकलं पण त्यांना झोप काही येईना डॉ. नवीन ह्यांना त्या लग्नाच्या आधीपासून ओळखत होत्या. दोघेही कलकत्त्यात शेजारीच राहत होते.आजपर्यंत डॉ. शामलींनी नवीनना आजारी पडलेलं पाहिलं नव्हतं. नियमित भरपूर व्यायाम करणाऱ्या दणदणीत प्रकृतीच्या नवीनना कधी साधा तापदेखील आलेला शामलींना आठवत नव्हता.रात्री मध्येच त्या नवीनच्या बेडरूमध्ये गेल्या.त्यांच्या कपाळाला हात लावून पाहिला तर त्यांचं संपूर्ण अंग घामाने डबडबलेलं होतं.हलकेच त्यांचा घाम टिपून त्यांना थोपटून शामली झोपायला गेल्या.दुसऱ्या दिवशी सकाळी नवीनचा ताप उतरला.

त्यांना फ्रेशपण वाटत होतं.पण शामलींनी त्यांना आराम करायला लावला.दोन दिवसांनंतर डॉ.नवीन ह्यांनी परत त्यांच्या नियमित आयुष्याला सुरुवात केली.पण साधारण आठवडाभराने त्यांना गळून गेल्यासारखं वाटलं म्हणून संध्याकाळचे त्यांचे पेशंट्स डॉ.शामलींनी तपासले.ह्या वेळेला नवीनना अधूनमधून चक्करही येत होती.दोन दिवस ते अंथरुणावरच होते.आता मात्र डॉ. शामलींना काळजी वाटू लागली.त्यांनी डॉ.पटेलांशी चर्चा केली आणि नवीनच्या सगळ्या टेस्ट्स केल्या. सगळ्या नॉर्मल आल्या पण नवीनचा बारीक ताप आणि थकवा काही कमी होत नव्हता.


हळूहळू नवीनचं वजन कमी होऊ लागलं.डोळ्यांभोवती काळी वर्तुळं दिसू लागली.शामली नवीनना घेऊन डॉ. पटेल ह्यांच्या सोबतीने मुंबईच्या प्रख्यात डॉक्टरांकडे गेल्या.पुन्हा सगळ्या टेस्ट्स झाल्या पण निदान काही झालं नाही.बारीक ताप असे पण थोडासाच.थकवा येतच होता.गावाबाहेरचा बंगला तयार झाला होता पण तो बघायला जायचा उत्साह शामलींना नव्हता.थोडा बदल व्हावा म्हणून त्यांनी नवीनबाबूंना आग्रह करून क्लबमध्ये नेलं.पण नवीनबाबूंना चक्कर येऊ लागली म्हणून पाच मिनिटांतच ते तिथून निघाले.आता गावकऱ्यांमध्येही डॉक्टरसाहेबांच्या प्रकृतीच्या चिंतेचं सावट पसरलं.ह्या देखण्या जोडप्याला कुणाची तरी दृष्ट लागली असंही त्यांना वाटू लागलं.


एक दिवस अचानक नवीनबाबू शामलीला म्हणाले,"आपण नवीन बंगल्यात राहायला जाऊ.गावाबाहेरच्या मोकळ्या हवेत कदाचित मला लवकर बरं वाटेल."


डॉ.पटेल ह्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने शामलींनी आवश्यक सामानासह नवीन बंगल्यात बस्तान हलवलं. दोन दिवस बरे गेले.पण नंतर परत पहिले पाढे पंचावन्न. सुरुवातीचे काही दिवस शामली तिथूनच दवाखान्यात येत-जात होत्या.पण त्यांची फारच धावपळ होऊ लागली होती.त्यामुळे डॉ.पटेलांना त्यांनी दवाखाना सांभाळण्याची विनंती केली आणि स्वतः नवीनबाबूंची सेवा करायला त्यांच्याबरोबर जास्तीत जास्त वेळ राहू लागल्या.

नवीनबाबू आता फारच खंगले होते.त्यांचे कपडे त्यांना ढगळ होऊ लागले होते.एक एक पाऊल टाकणं जड जात होतं.घरातल्या घरात ते व्हील चेअरवर फिरत.डॉ.शामली त्यांना सकाळी -संध्याकाळी बंगल्याच्या बागेत फिरवत असत.आपल्या डॉक्टरांना असं व्हील चेअरवर बघून बंगल्याजवळच्या रस्त्यावरून फिरायला जाणाऱ्या लोकांना फार वाईट वाटे.


एक दिवस डॉ.पटेलांना 'ताबडतोब या' असा डॉ. शामलींचा निरोप गेला.नवीनबाबूंना रक्ताची मोठी उलटी झाली होती आणि ते कोमात गेले होते.आठ दिवस ते कोमातच होते.गावातल्या प्रत्येकाने त्यांच्यासाठी देवाकडे प्रार्थना केली.काहींनी मृत्युंजयाचे पाठ सुरू केले.शंकराला अभिषेक तर सतत चालूच होता.पण अखेर नवव्या दिवशी नवीनबाबूंची जीवनयात्रा संपली. गावातल्या एकाही घरात त्या दिवशी चूल पेटली नाही. गावाने एवढी मोठी अंत्ययात्रा पहिल्यांदाच पाहिली.हे सगळं होत असताना डॉ.शामली दगडी चेहऱ्याने शांत होत्या.त्यांच्या डोळ्यांतून एकही टिपूस निघाला नव्हता. त्यांच्या सगळ्या संवेदना जणू गोठून गेल्या होत्या.


आठ दिवस झाले.गाव अजून त्या धक्क्यातून सावरलं नव्हतं तोच त्याला आणखी एक धक्का बसला.डॉ. शामलींनी परत अमेरिकेला जाण्याचा निर्णय घेतला होता.डॉ.पटेलांना आणि त्यांच्या पत्नीला त्यांनी मुंबईपर्यंत येण्याची विनंती केली होती.गावातल्या प्रतिष्ठित मंडळींनी एक सभा घेतली.त्या सभेत ठरल्याप्रमाणे चारपाच पुरुष त्यांच्या कुटुंबीयांसह गावाबाहेरच्या बंगल्यात डॉ.शामलींना भेटायला गेले. त्यांनी डॉ.शामलींनी अमेरिकेला परत जाऊ नये म्हणून गावाच्या वतीने विनंती केली.त्यातल्या एका पोक्त स्त्रीने डॉ.शामलींना आपल्या कुशीत घेतलं.त्यांच्या तोंडावरून हात फिरवत ती म्हणाली,


"बयो,तू गावातच राहा गं.माहेरवाशिणीसारखी आम्ही तुझ्यावर माया करू. तझी काळजी घेऊ..."


आता मात्र शामलींच्या भावनांचा बांध फुटला.उर फुटल्यागत त्या रडू लागल्या.त्यांचं आतापर्यंत बाहेर न फुटलेलं रडू बाहेर येणं आवश्यक होतं,हे सगळ्यांना समजत होतं.त्यामुळे कुणीही त्यांची समजूत न घालता त्यांना मनसोक्त रडू दिलं.रडण्याचा भर ओसरल्यावर स्वतःला सावरत पण शून्यात बघत डॉ.शामली म्हणाल्या, "आता माझा इथला शेअर संपला.इथल्या प्रत्येक गोष्टीत माझी आणि नवीनची स्वप्नं गोठलेली आहेत. मी आता इथे राहणं अशक्य आहे.आमचा प्रांत वेगळा,देश वेगळा.भाषाही वेगळी.तरीही तुम्ही सगळ्यांनी आम्हाला जे प्रेम दिलं त्याची आठवण बरोबर घेऊन मी जात आहे."


शामलींना मुंबईपर्यंत सोडून डॉ.पटेल परत आले. शामलींच्या दोन्ही घरांच्या आणि दवाखान्याच्या चाव्या आता त्यांच्याकडे होत्या.त्याचं त्यांनी काय करायचं ह्याचा निर्णयही शामलींनी त्यांच्यावरच सोपवला होता.डॉ.पटेलांनी गावाबाहेरचा बंगला आवरला. बाजारपेठेतलं घर आवरलं.ते बंद करण्यापूर्वी सगळीकडे एकदा त्यांनी फेरी मारून बघावं म्हणून दवाखान्याच्या मागच्या दरवाजातून ते परसात आले तर काय आश्चर्य !


मध्यभागी पिंपळाचं एक छोटंसं रोप तरारून वर आलं होतं.त्याची दोन छोटी पानं विजयी मल्लाने फड जिंकल्यानंतर हवेत बाहू पसरून आनंद व्यक्त करावा तशी दिमाखाने हवेत डुलत होती.