* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: तक्रारी दूर अशा करा.Do away with complaints

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१३/१०/२४

तक्रारी दूर अशा करा.Do away with complaints

शेवटी त्यांनी किल्ला सर केला आणि शेवटी आज ते या स्थितीला पोहोचले आहेत.वॉल स्ट्रीटचे सगळ्यात महत्त्वाचे एक्झिक्युटीव्हपण त्यांच्याकडे सल्ला आणि मार्गदर्शन घेण्यासाठी येतात.त्यांना त्यांच्या रेकॉर्डचा अभिमान होता.त्यांना असायलाच हवा होता आणि याबाबत बोलायला त्यांना आवडत होतं.आपली गोष्ट सांगितल्यावर त्यांनी शेवटी क्यूबेलिसला संक्षिप्तपणे त्याच्या अनुभवाच्या बाबतीत विचारलं आणि व्हाइस प्रेसिडेंटला बोलावून सांगितलं,"मला असं वाटतं की, आपण या माणसाच्या शोधात होतो." मिस्टर क्यूबेलिसने आपल्या संभाव्य मालकाच्या बाबतीत सगळी माहिती गोळा करण्याचे कष्ट घेतले होते.त्यानी समोरच्या व्यक्तीमध्ये आणि त्याच्या प्रश्नांमध्ये रस घेतला होता.त्याने समोरच्या व्यक्तीला बोलण्याकरता प्रोत्साहित केले होते आणि त्यामुळे त्याचा चांगला प्रभाव पडला आणि त्याचा सुखद परिणाम झाला.सॅक्रेमेंटो,कॅलिफोर्नियाच्या रॉय जी.ब्रेडले यांची बरोबर त्याच्या उलट समस्या होती.जेव्हा एक संभाव्य चांगला कर्मचारी ब्रेडलेच्या फर्ममध्ये नोकरीकरता आपली शिफारस करत होता,

तेव्हा त्यांनी त्याची गोष्ट सांगितली.रॉयने आम्हाला सांगितले की,आमच्या फर्ममध्ये एक छोटी ब्रोकरेज फर्म होती.


याकरता आमच्या इथे कोणताही जास्तीचा लाभ जसं मेडिकल इन्श्युरन्स,पेंशन किंवा दवाखान्याचा खर्च उचलायची कोणतीच व्यवस्था,सोय नव्हती.प्रत्येक प्रतिनिधी एक स्वतंत्र एजंट होता.

आम्ही संभाव्य ग्राहकांकरता लीडसुद्धा उपलब्ध करू शकत नव्हतो कारण आम्ही त्यांच्याकरिता जाहिरातपण देऊ शकत नव्हतो,जसे की आमचे मोठे प्रतिस्पर्धा करत होते.रिचर्ड प्रायरला त्या प्रकारचा अनुभव होता जो आम्हाला हवा होता.आधी माझ्या असिस्टंटने इंटरव्ह्यू घेतला आणि त्याला आमच्या कामाला गेलेल्या सगळ्या नकारात्मक गोष्टी सांगितल्या. जेव्हा तो माझा ऑफिसमध्ये आला तेव्हा तो थोडा निराश वाटत होता.मी त्याला आपल्या फर्ममध्ये काम करण्याचा एकुलता एक  फायदा सांगितले ला की,तो स्वतंत्र कॉन्ट्रॅक्टर बनू शकतो आणि एक प्रकारे तो सेल्फ-एप्लॉयड् आहे.जेव्हा तो इंटरव्यूकरता आला तेव्हा त्याच्या डोक्यातखुप साऱ्या नकारात्मक गोष्टी होत्या;पण जेव्हा त्याने या फायद्याच्या बाबतीत बोलायला सुरुवात केली,तेव्हा तो एक एक करून आपल्या नकारात्मक विचारांपासून मुक्त होऊ लागला.


अनेक वेळा असं वाटलं की,जसा तो स्वतःशीच बोलतो आहे,जसा तो आपल्या मनातच विचार करतो आहे.अनेक वेळा माझ्या मनात आलं की, मी त्याच्या विचारांना स्पष्ट करू;पण मी असं नाही केलं, जेव्हा इंटरव्यू संपला,तेव्हा मला असं वाटलं की,त्याने स्वतःच स्वतःला विश्वास दिला की,तो आमच्या फर्ममध्ये काम करेल.

कारण की मी एक चांगला श्रोता होतो आणि मी डिकलाच जास्त बोलण्याचा मोका दिला, याकरता त्याने आपल्या मनात दोन्ही बाजूंना चांगल्या प्रकारे तोललं आणि तो सकारात्मक निष्कर्षावर

पोहोचला,ज्याला त्याने स्वतः करता एका आव्हानासारखं घेतले.

आम्ही त्याला कामावर ठेवून घेतलं आणि आज तो आमच्या फर्ममध्ये सर्वश्रेष्ठ प्रतिनिधींमधून एक आहे.इथपर्यंत की आमचे मित्रपण आमच्या सोयी-सुविधांच्या बाबतीत ऐकण्याऐवजी स्वतःच्या सुविधांबाबत ऐकणं जास्त पसंत करतील.


फ्रेंच दार्शनिक रोशफूकोने म्हटलं होतं,जर तुम्हाला शत्रू बनायचं असेल,तर तुमच्या मित्रांच्या पुढे जा.जर तुम्ही मित्र होऊ इच्छित असाल तर आपल्या मित्रांना स्वतःच्या पुढे जाऊ द्या. काय हे खरे आहे? हो,कारण जर तुमचे मित्र निघून जाताहेत तर ते स्वतः ला महत्त्वपूर्ण समजत आहेत जेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे निघून जाता तर ते किंवा त्यांच्यामधले काही हीन आणि मत्सरी असू शकतात.


न्यू यॉर्क सिटीमध्ये मिडटाउन पर्सनल एजन्सीची हेनरीटा जी सगळ्यात लोकप्रिय प्लेसमेंट काउंसलर होती.सुरुवातीच्या महिन्यांमध्ये हेनरीटाचा आपल्या सहकाऱ्यांमध्ये कोणी मित्र नव्हता. का? कारण प्रत्येक दिवशी ती आपली शेखी मिरवत होती की,आज तिने किती प्लेसमेंट केले,आज तिने किती नवीन अकाउंट उघडले,आज तिने किती यश मिळवलं.


मी आपलं काम खूप चांगल्या रितीने करत होते आणि मला याचा गर्व होता,हेनरीटाने आमच्या वर्गातले माझे सहकारी माझ्या सफलतेमध्ये आनंद घ्यायच्याऐवजी चिडत होते.मला वाटायचं त्यांनी मला पसंत करावं.मी त्यांना खांच मित्र बनवायला बघत होते.या कोर्सचे काही उपाय ऐकल्या बरोबर मी आपल्या बाबतीत बोलणं कमी करून टाकलं.माझ्या सहकाऱ्यांजवळ आपली शेखी मिरवण्याकरता बरंच काही असायचं आणि माझ्या सफलतेबद्दल ऐकल्यावर ते आपल्या सफलतेबद्दत सांगायला आसुसलेले असत.आता जेव्हा आमच्याकडे गप्पा मारायला वेळ असतो तेव्हा मी त्यांना विचारते की,त्यांचा दिवस कसा गेला आणि मी आपल्या यशाचा उल्लेख तेव्हाच करते जेव्हा ते मला याबाबतीत विचारतात. - समोरच्या व्यक्तीला जास्त बोलू द्या.


११.१०.२४ या लेखातील शेवटचा भाग…


🍂 

१.

आपण जगत असतो आपलं 

एकाकी बकाकी नातं घेऊन 

प्रत्येक नातं व्यस्तच असतं

त्याचं त्याचं आयुष्य उघडून

२.

त्यानं का जगू नये,बघू नये

स्वत:चं अस्संल तस्संल खातं 

ज्यात त्यानं साठवलंय जुनं

माणसांशी जगू म्हटलेले नातं

३. 

आयुष्यं बविष्यं असतात अनेक 

जगून घेतली,तगवून ठेवली तर

सुंदर असतं,कलंदर असतं बरंच 

माणूस काणूस बिलंदर नसता तर

४.

फुलपाखरांनं हलकंच चुंबून घ्यावं

फुलाला,मुलाला,अन्य जगाला

पावन झालं असतं,गगन चुंबन 

 जर आगळं भान असतं माणसाला 

🍂

•रवींद्र श्रावस्ती