* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एकीमध्ये शक्ती/Power in one

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१९/१०/२४

एकीमध्ये शक्ती/Power in one

झाडे समाजशील असतात.एकमेकांना मदत करून त्यांचं जीवन सुरळीत चालू असतं.पण जंगल परिसंस्थेमध्ये फक्त एवढ्या गोष्टीने त्यांचा टिकाव लागणार नसतो.झाडाची प्रत्येक प्रजाती स्वतःला अधिक सूर्यप्रकाश मिळवण्याच्या प्रयत्नात असते. या स्पर्धेमुळे इतर प्रजातींना दाटीवाटीमध्ये राहावे लागणार असते.अधिक सूर्यप्रकाश मिळवण्याच्या, पाणी मिळवण्याच्या स्पर्धेनंतरच अतिंम जेता ठरणार असतो.

जमिनीतील आर्द्रता शोधून तिथंपर्यंत पोचण्याची क्षमता मुळांमध्ये असते. मुळांवर सूक्ष्म केस असतात ज्यामुळे त्यांचा पृष्ठभाग वाढतो आणि जास्त पाणी शोषण करता येते.

सर्वसाधारण परिस्थितीत या पद्धतीने त्यांना पुरेसं पाणी मिळतं पण जास्त पाणी कोणाला नको असतं? आणि याच कारणासाठी कोट्यवधी वर्षांपासून झाडांनी फंगस म्हणजे बुरशी बरोबर मैत्री केलेली आहे.


बुरशी हा एक अद्भुत प्रकार आहे.त्यांचं वर्गीकरण वनस्पती आणि प्राणी या मानवाने केलेल्या दोन गटांपैकी कुठेच चपखलपणे करता येत नाही.वनस्पतीच्या व्याख्येप्रमाणे झाडांना निर्जीव गोष्टीतून आपलं अन्न तयार करता येतं,त्यामुळे त्यांना स्वतंत्रपणे जगता येऊ शकतं. 


एखाद्या उजाड भूरूपात सुरुवात होते ती हिरव्या वनस्पतीने आणि मगच त्याच्यामागून जनावरं येऊ शकतात.खरंतर गवत आणि रोपट्यांना गुरांनी किंवा हरणांनी चरलेलं अजिबात आवडत नाही. एखाद्या कोल्ह्याने डुकराला खाल्लं काय किंवा हरणाने रोपट्याला खाल्लं काय,दोन्ही गोष्टीत यातना आणि मृत्यू आहेच. बुरशी प्राणी आणि वनस्पतींच्यामध्ये गणली जाते. त्यांच्या पेशींचे आवरण कायटिन नावाच्या पदार्थाने बनलेलं असतं,जे कधीही वनस्पतीत सापडत नाही. शरीरात कायटिन असल्यामुळे बुरशी वनस्पतींपेक्षा कीटक वर्गाच्या जवळ जाते.त्याचबरोबर त्यांना प्रकाश संश्लेषण करून आपलं अन्न बनवता येत नाही त्यामुळे ते इतर सजीवांबरोबर संधान बांधून जिवंत राहतात.


बुरशी पेशीतून असंख्य तंतू बाहेर निघतात,त्यांना पुढे आणखी फाटे फुटून या तंतूंचं एक सूक्ष्म जाळं तयार होतं.बुरशीचं हे जमिनीखालचं कापसासारखं जाळं अनेक दशकं वाढत असतं.या जाळ्याला 'मायसेलियम' म्हणतात.हे मायसेलियम झाडांच्या मुळांना चिकटून एक सहजीवी संबंध झाडांशी जोडतं.बुरशीचं मायसेलियम जाळं आणि झाडाच्या मुळांच्या तंतूचं मिळून जे जाळं तयार होतं त्याला 'मायकोरायझी' म्हणतात.स्वित्झरर्लंडमध्ये एका ठिकाणी 'मधाची बुरशी' नावाची बुरशी सापडते. एकशेवीस एकरात वाढलेली ही बुरशी सुमारे हजार एक वर्षं तरी जिवंत आहे.२३ ओरेगोनमध्ये अशीच एक बुरशी चोवीसशे वर्षं जुनी आहे आणि दोन हजार एकरावर पसरली आहे.तिचे वजन सुमारे ६६० टन असावे.म्हणजे बुरशी हा जीवसृष्टीतला सर्वांत मोठा सजीव मानला पाहिजे. 


स्वित्झर्लंड आणि ओरेगनमध्ये सापडलेली बुरशी ही झाडाशी अजिबात मैत्री करत नाही. किंबहुना जमिनीखाली हिंडताना ते खाण्यायोग्य ऊती शोधत असतात आणि झाडांना मारायचा प्रयत्न करतात. पण ते जाऊ दे! आपण बुरशी आणि झाडांमधल्या सलोख्याच्या जाळ्याबद्दल बोलू.

झाडाच्या प्रत्येक प्रजातीला बुरशीची एक मित्र प्रजाती असते. उदाहरणार्थ,ओकच्या झाडाला मिल्क कॅप नावाची बुरशी मदत करते.यामुळे झाडांच्या मुळाचा पृष्ठभाग वाढतो आणि त्याला जास्त पाणी व पोषणद्रव्यं शोषून घेता येतात.जी झाडं बुरशीशी मैत्री करतात त्यांना नायट्रोजन आणि फॉस्फरस दुपटीने मिळू लागतो.झाडाला जर बुरशीबरोबर भागीदारी करायची असेल तर त्याला अक्षरशः खुलं व्हावं लागतं.कारण बुरशीचे कापसासारखे धागे मायसेलियम झाडाच्या मुळाच्या केसांपाशी पोचायला हवेत.हे झाडाला त्रासदायक असतं का यावर संशोधन नाही,पण झाडाला मात्र हे हवं असतं.मला वाटतं की यामुळे झाडांमध्ये सकारात्मक भावना तयार होत असतील.पण झाडांना काहीही वाटलं तरी यानंतर ती बुरशीबरोबर भागीदारीतच काम करणार असतात. 


बुरशी आता झाडाच्या मुळांत शिरते आणि मुळांभोवती स्वतःला गुंडाळून घेते.अशा प्रकारे हे जाळं जंगलाच्या जमिनीतून मुक्तपणे दूरदूरवर पसरतं.बुरशीच्या भल्यामोठ्या जाळ्याच्या मदतीने झाडाची मुळे दूरपर्यंत पोहोचतात.आता ते झाड जमिनीखालून इतर झाडांच्या बुरशीबरोबर जोडलं जातं.यामुळे आता झाडांना पोषणद्रव्यांची देवाण-घेवाण करणं सोपं जातं.त्याचबरोबर कीटकांच्या आक्रमणाची बातमी एकमेकांपर्यंत पोचवली जाते.बुरशीचं जाळं म्हणजे जंगलातील इंटरनेट म्हणता येईल.पण हे जाळं बनवण्याची किंमत मात्र झाडाला चुकती करावी लागते.ही किंमत म्हणजे त्या बुरशीला अन्नपुरवठा करणं.इतर जनावरांसारखंच बुरशीला आपल्या अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर अवलंबून राहावं लागतं.त्यामुळे झाडाकडून बुरशीला साखर आणि कर्बोदके पुरवली जातात.ही बुरशी पण काही अल्पसंतुष्टी नसते.ती झाडांकडून त्यांनी बनवलेल्या अन्नाच्या एक तृतीयांश भागाची मागणी करते,त्यांच्या सेवेचा मोबदला म्हणून !पण जेव्हा आपण दुसऱ्या जीवावर अवलंबून असतो तेव्हा अशी गोष्ट केवळ नशिबावर टाकून चालत नाही.मुळाला जडलेली बुरशी झाडाला संदेश पाठवू लागते आणि त्यावर झाडाची प्रतिक्रिया काय आहे याचा अंदाज घेते. जर प्रतिक्रिया अनुकूल असेल तर बुरशी झाडाला उपयुक्त हॉर्मोन म्हणजे ग्रंथीरस पुरवते.यामुळे बुरशी हवी तशी झाडाची वाढ होऊ देते.आपलं पक्वान्न मिळालं की बुरशी झाडांसाठी अजूनही काही पूरक सेवा देते.त्यांच्याकडून मातीतले जड धातू काढून दिले जातात.झाडांच्या मानाने बुरशीला त्याचा कमी त्रास होतो.जे प्रदूषण झाडांपासून दूर ठेवलं जातं ते बुरशीच्या फळांना म्हणजे मशरूम्सना उपयुक्त असतं.१९८६ सालच्या चर्नोबिलच्या न्युक्लिअर रिॲक्टरच्या अपघातानंतर तिथल्या मशरूममध्ये सीझियम नावाचा किरणोत्सर्गी 

धातू सापडत होता.बुरशीकडून झाडाला काही आरोग्यसेवाही पुरवल्या जातात.त्यांचे नाजूक तंतू झाडांना त्रासदायक असलेल्या जंतूंना मुळांपासून दूर ठेवतात.झाडांशी भागीदारी करून बुरशीसुद्धा झाडांबरोबरच शेकडो वर्ष जगू शकतात.पण जर का तिकडे प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली,जसं की हवेतील प्रदूषण असह्य झालं,तर मात्र ते श्वास टाकतात.बुरशी मेल्यावर त्याला अनेक वर्षं साथ देणारे झाड फार काळ दुःख करत बसत नाही.आपल्या मुळाशी आलेल्या दुसऱ्या बुरशीबरोबर ते भागीदारी सुरू करतं.झाडाला बुरशीचे अनेक पर्याय उपलब्ध काईफ असतात.


सर्व पर्याय जेव्हा संपतात तेव्हा मात्र झाड धोक्यात येतं.झाडांपेक्षा बुरशी अधिक संवेदनशील असतात.ते आधी आपल्या साथीदाराची निवड करतात आणि एकदा का साथीदार झाडाला पसंत केलं की आयुष्यभर त्याची साथ देतात.ज्या बुरशींना फक्त बर्च किंवा लार्च अशा विशिष्ट झाडांच्या प्रजातीच लागतात,त्यांना 'यजमाननिष्ठ' असं संबोधलं जातं.चॅनतेरेल्स सारख्या काही बुरशीला ओक,बर्च किंवा स्प्रूस पैकी कोणीही चालतं.जमिनीत त्यांच्या वाढीसाठी जागा आहे की नाही,फक्त इतकंच ते बघतात.याचं कारण जमिनीखाली जागेसाठी स्पर्धा असते.उदाहरणार्थ, ओकच्या जंगलात जमिनीखाली एकाच झाडाच्या मुळापाशी बुरशींच्या शेकडो प्रजातींची स्पर्धा चालू असते.ओक वृक्षांना ही योजना अनुकूल असते. एक बुरशी काही कारणास्तव मेली तर दुसरी त्यांना साथ द्यायला उभीच असते.


संशोधकांना असं दिसून आलंय की,बुरशीसुद्धा आपल्या उपजीविकेचे दुसरे पर्याय बघून ठेवतात. सुझान सिमार्ड या संशोधकाने असा शोध लावला की,एका बुरशीच्या जाळ्याने झाडांच्या विविध प्रजातींना जोडून घेतलेले आहे.सिमार्डने इंजेक्शनचा वापर करून एका बर्च झाडात किरणोत्सर्गी कार्बन सोडला.त्यांना तो कार्बन जवळच्या 'डग्लस फर' मध्ये सापडला.जमिनीवरती जरी विविध प्रजातींची झाडं एकमेकांशी स्पर्धा करीत असली तरी त्यांच्या मुळांशी असलेल्या बुरशीचं जाळं मात्र त्यांच्यात तडजोड करण्यासाठी समन्वय घडवून आणण्यासाठी उत्सुक असतं. यातून त्यांना इतर झाडांना मदत करायची असते की आपल्यासारख्या दुसऱ्या बुरशीला हे अजून नक्की माहीत नाही.


मला वाटतं की बुरशी झाडांपेक्षा थोडे पुरोगामी असतात.

झाडांच्या प्रजातींमध्ये सतत स्पर्धा चालू असते.समजा,मध्य युरोपचे स्थानिक बीच वृक्ष तिथल्या बहुतेक जंगलात जास्त संख्येने आहेत तर हे फायद्याचे आहे का? जर एखादा विषाणू आला तर सर्वच बीच वृक्ष मरून जातील नाही का? अशा वेळेस तिथे ओक,मेपल,अश,फर अशा विविध प्रजाती असणं नक्कीच फायद्याचं ठरेल.कारण जरी त्या विषाणूंनी मारलं तरी इतर प्रजाती जिवंत राहतील आणि तिथल्या तरुण पिढीला (द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न,अनुवाद

गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर,मनोविकास प्रकाशन)

जगण्यासाठी आणि वाढण्यासाठी मदत करतील. वैविध्यामुळे जंगलाला सुरक्षा येते.बुरशीला परिस्थिती अनुकूल आणि स्थिर हवी असते त्यामुळे ते जमिनीखालील इतर प्रजातींना संरक्षण देत असतात.असे केल्याने कुठल्या एका प्रजातीचे वर्चस्व जंगलावर राहात नाही.


जंगलातली परिस्थिती जर बुरशी आणि झाडांना बिकट झाली तर बुरशी निर्णायक भूमिका घेऊ शकतात.

उदाहरणार्थ,जर पाईनच्या जंगलात नायट्रोजनचा तुटवडा झाला तर पाईनची जोडीदार बुरशी,'लाकारिया बायकलर,' किंवा 'दुरंगीफसवे' ही मातीमध्ये एक विषारी द्रव्य सोडते ज्यामुळे स्प्रिंगटेल नावाचे कीटक मरून पडतात आणि त्यांच्यामध्ये असलेला नत्र मातीत मिसळतो. झाड आणि बुरशीला यातून खत मिळते.


मी तुम्हाला झाडांच्या सर्वांत महत्त्वाच्या मदतनिसांची ओळख करून दिली,पण यात अजूनही काही प्राणी गणले जातात.वूडपेकर नावाचा पक्षी झाडाला थेट उपयुक्त नसला तरी त्याच्यापासून फायदा नक्कीच होतो.स्प्रूसच्या खोडाला बार्क बीटल नावाचा कीटक जडला की स्प्रूस धोक्यात येतो.या कीटकांची संख्या झपाट्याने वाढते आणि झाडाच्या जीवनदायी 'कॅम्बियम' थराला खाऊन टाकून झाडाला मारून टाकू शकते. ग्रेट स्पॉटेड वूडपेकरला या कीटकाची चाहूल लागली की तो तिथे तातडीने येतो.बुंध्यावर अनेक वेळा वर खाली फेऱ्या मारून तो कीटकांच्या अळींचा शोध घेतो,त्यांचा शोध घेताना तो खोडाला टोचत राहतो आणि त्यांच्या पांढऱ्या अळ्या सापडल्या की खाऊन टाकतो.पण त्या खाताना वूडपेकर झाडाचा जरासुद्धा विचार करत नाही. त्याच्या जेवणाबरोबर झाडाच्या बुंध्याची सालंसुद्धा टोकरली जातात,कपचे खाली पडतात.तरीसुद्धा कधीकधी या प्रकाराने झाड कीटकांनी केलेल्या नुकसानीतून वाचूही शकतं.जरी ते झाड मेलं तरी इतर झाडांना या कीटकांपासून संरक्षण मिळतं, कारण आता या कीटकांचं प्रजनन बंद झालेलं असतं.कोरड्या ऋतूत झाडांवर वूड बोरिंग बीटलकडून आक्रमण होतं.पाणी नसलं की झाडांना या कीटकापासून स्वसंरक्षण करता येत नाही.अशा वेळेस काळ्या डोक्याचा कार्डिनल बीटल झाडाच्या मदतीला येतो.प्रौढ अवस्थेत हा बीटल झाडांना उपद्रवी नसतो पण बाल अवस्थेत तो वूड बोरिंग बीटलला शोधून शोधून खातो.काही ओक वृक्ष तर केवळ कार्डिनल बीटल मुळे जिवंत आहेत.पण जेव्हा वूड बोरिंग बीटल फस्त होतात,तेव्हा मात्र कार्डिनल बीटल स्वतःच्याच बच्च्यांना खायला सुरुवात करतो.