* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: दोन बिबळ्यांचं युद्ध / The war of two leopards

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१०/१२/२४

दोन बिबळ्यांचं युद्ध / The war of two leopards

आमचा रुद्रप्रयागपर्यंत पाठलाग केल्यानंतर तो बिबळ्या यात्रामार्गावरून गुलाबराईत व नंतर घळ ओलांडून एका ओबडधोबड पायवाटेवरून होता.ही वाट रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या गावांमध्ये राहणारे लोक हरिद्वारका जाता येताना वापरत असत.


बद्रीनाथ-केदारनाथची यात्रा हंगामी असते आणि हिमालयातली ही दोन ठिकाणं ज्या शिखरांवर आहेत तिथलं बर्फ वितळण्याची वेळ आणि परत हिमवर्षाव सुरू होण्याची वेळ यावर यात्रेचा हंगाम केव्हा सुरू होईल व केव्हा संपेल ते अवलंबून असतं.या दोन्ही मंदिरांच्या प्रमुख पुजाऱ्याने काही दिवसापूर्वीच हा रस्ता यात्रेकरूंना खुला झाल्याचा टेलिग्राम केला होता. देशभरातील लाखो भाविक या टेलिग्रामची आतुरतेने वाट पहात असतात त्यामुळे गेले काही दिवस यात्रेकरूंचे छोटे छोटे गट रुद्रप्रयागमधून जाताना दिसू लागले होते.


गेल्या काही वर्षात नरभक्षकाने बऱ्याच यात्रेकरूंचे बळी याच मार्गावर घेतले होते आणि त्याची सवयच पडून गेली होती की या यात्रा हंगामाच्या काळात यात्रामार्गावरून खालच्या रस्त्याने त्याच्या हद्दीपर्यंत जायचं,तिथून रुद्रप्रयागच्या पूर्वेकडच्या गावांना भेटी देत देत लांब वळसा घालून रुद्रप्रयागच्या वरच्या बाजूला पंधरा मैलांवर परत यात्रामार्गावर यायचं.या लांबलचक फेरीला लागणारा काळ भले थोडा बदलत असेल पण मला त्या बिबळ्याचे माग रुद्रप्रयाग ते गुलाबराईच्या पट्ट्यात सरासरी पाच दिवसांनी दिसायचे.

त्याचमुळे बंगल्यावर परत येत असताना मी रस्ता नीट नजरेखालून घालता येईल अशी जागा शोधली आणि पुढच्या दोन रात्री एका गंजीवर आरामात बसून काढल्या.


हे दोन दिवस आसपासच्या गावातून कोणतीच विशेष बातमी आली नाही.तिसऱ्या दिवशी मी यात्रामार्गावर पुढे सहा मैल जाऊन तिथल्या एखाद्या गावाला बिबळ्याने भेट दिली आहे का ते बघायला गेलो होतो.



अशी १२ मैलांची रपेट करून दुपारी बंगल्यावर आल्यावर उशीरानेच ब्रेकफास्ट करत होतो,तेवढ्यात थकली भागलेली दोन माणसं घाईघाईत तिथे आली आणि बातमी दिली की रुद्रप्रयागच्या आग्नेयेला अठरा मैलांवरच्या भैंसवाडा गावात एका पोराचा बळी गेलाय.इबॉटसनने सुरू केलेली माहिती यंत्रणा चांगलीच काम देत होती.या प्रणालीनुसार नरभक्षकाच्या इलाक्यातील सर्व बळींची बातमी देणाऱ्यांना त्या त्या बातमीनुसार रोख बक्षिसं जाहीर केली होती.बोकडासाठी दोन रूपये यापासून सुरू होत नरबळीसाठी वीस रुपये अशी ती बक्षिसं होती.त्यामुळे आम्हाला या सर्व बातम्या अत्यंत कमी वेळात मिळत.आताच आलेल्या त्या दोन माणसांच्या हातात मी दहा दहा रूपये ठेवले.त्यातल्या एकाने माझ्याबरोबर परत भैंसवाड्यापर्यंत यायचं कबूल केलं पण दुसरा मात्र नुकताच आजारातून उठल्यामुळे लगेच अठरा मैलांची चाल त्याला झेपणार नव्हती म्हणून रुद्रप्रयागमध्येच राहणार होता.त्यांची कथा ऐकत मी ब्रेकफास्ट संपवला आणि बरोबर फक्त रायफल, काही काडतुसं आणि टॉर्च घेऊन दुपारी १ वाजता मी निघालो.बंगल्यासमोरचा रस्ता ओलांडून डोंगर चढायला सुरुवात केल्या केल्याच माझ्या सोबत्याने मला सांगितलं की आपल्याला फार अवघड वाटेने दूरचा पल्ला गाठायचा आहे आणि अंधार पडायच्या आत पोचणं आवश्यक आहे.शक्यतो मी जेवणानंतर लगेच चढ चढून जायला नाखूष असतो पण आज मात्र इलाजच नव्हता.

पहिले काही मैल जवळ जवळ चार हजार फूट चढ चढताना मला त्याच्या वेगाशी जमवून घेणं फार जड गेलं.पण तीन मैलानंतरचा तुलनेनं सपाट भाग आल्यावर मला बळ आलं आणि त्यानंतर मात्र मी पुढे राहून वेग कायम ठेवला. 


रुद्रप्रयागला येता येता त्या दोघांनी वाटेवरच्या गावात ही सर्व बातमी दिली होती आणि ते मला भैसवाड्याला घेऊन जायला निघालेत असंही सांगितलं होतं.मी निश्चित येणार याबद्दल तिळमात्रही शंका गावकऱ्यांना नसावी;कारण वाटेवरच्या प्रत्येक गावात सर्वच्या सर्व गावकरी माझी वाट बघत थांबलेले असायचे.

त्यातल्या काही जणांनी मला शुभेच्छा दिल्या तर काहींनी त्या बिबळ्याला खतम केल्याशिवाय कृपा करून गढवालमधून जाऊ नका अशी विनंती केली.


माझ्या सोबत्याने तर मला सांगितलंच होतं की आपल्याला अठरा मैल चालायचंय आणि जसे आम्ही एका पाठोपाठ एक डोंगर व दऱ्या ओलांडून जात होतो तसं मला समजून चुकलं की माझ्या अपेक्षेपेक्षा ही चाल फारच दमछाक करणारी आहे व तीही मर्यादित वेळात काटायची होती.


सूर्य अस्ताला जात होता तसा अशाच अनंत टेकड्यांपैकी एकीच्या माथ्यावरून मला समोरच्या डोंगराच्या माचीवर आमच्यापासून शंभर यार्ड अंतरावर माणसांचा घोळका दिसला.आम्हाला पाहताच त्यातली काही माणसं अलग झाली आणि डोंगर उतरायला लागली तर बाकीचे आम्हाला भेटायला पुढे आले... त्यात त्या गावचा मुखिया होता.त्याने शुभवर्तमान दिलं की त्याचं भैंसवाडा गाव पलीकडच्या डोंगराच्या माथ्यावर आहे आणि त्याने त्याच्या पोराला पुढे पाठवून चहा तयार ठेवायला सांगितलं आहे.


१४ एप्रिल,१९२६ हा दिवस गढवाली लोकांच्या चांगलाच लक्षात राहील कारण त्या दिवशी 'रूद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्या'ने त्याचा शेवटचा नरबळी घेतला.त्यादिवशी संध्याकाळी भैंसवाडा गावातली एक विधवा स्त्री तिच्या मुलांना-नऊ वर्षाची मुलगी व बारा वर्षाचा मुलगा- आणि शेजारच्या आठ वर्षाच्या मुलाला घेऊन गावापासून जवळच असलेल्या एका झऱ्यावर संध्याकाळच्या जेवणासाठी पाणी भरायला गेली होती.


गढवालमध्ये सर्वत्र आढळणाऱ्या रांगेत घरं असलेल्या इमारतीमधल्या एका घरात ते कुटुंब राहत होतं.ही घरं एकमजली असतात,खालचा आखूड उंचीचा तळमजला सरपण ठेवण्यासाठी किंवा धान्य साठवण्यासाठी वापरला जातो तर वरच्या मजल्यावर बरीच राहती घरं असतात.त्यातल्या मधल्या एका घरात ते कुटुंब राहत होते.चार फूट रुंदीचा लांबलचक व्हरांडा या सर्व घरासमोरून गेला होता.पाच-सहा पायऱ्यांचे छोटे छोटे जिने अंगणातून व्हरांड्यात येत होते आणि प्रत्येक जिना दोन दोन घरं वापरायची.साठ फूट रुंद व तीनशे यार्ड लांब अशा अंगणाभोवती बुटकी भिंत बांधली होती.हे चार जण पाणी भरून येताना शेजारचा मुलगा सर्वात पुढे होता.जेव्हा ते सर्वजण जिन्यापर्यंत आले तेव्हा त्या मुलाला तळमजल्यावरच्या जिन्यामागच्या खोलीत कोणतं तरी जनावर दिसलं पण त्याला तो कुत्रा वाटल्याने,त्याबद्दल तो कुणाकडेच बोलला नाही.त्या मुलाच्या मागे विधवेची मुलगी,

नंतर ती स्वतःआणि सर्वात मागे तिचा बारा वर्षाचा मुलगा होता.

दोन तीन पायऱ्या चढल्यानंतर त्या बाईला मुलाने घेतलेली पितळी घागर पायरीवर पडल्याचा आणि गडगडत खाली गेल्याचा आवाज आला.त्याच्या निष्काळजीपणाबद्दल जरा बडबड करत तिने तिची घागर वर 'व्हरांड्यावर ठेवली आणि तिच्या मुलाने काय नुकसान करून ठेवलंय ते बघायला ती मागे वळली.पायऱ्यांच्या खाली तिला पालथी पडलेली घागर दिसली.खाली उतरून तिने ती उचलली आणि मुलाला शोधत आजूबाजूला बघू लागली.आसपास कुठेही तो न दिसल्याने तिला वाटलं की तो घाबरून कुठेतरी लपून बसलाय... तशी तिने हाका मारायला सुरूवात केली.


भांड्यांचा आवाज आणि लगोलग त्या बाईच्या हाका ऐकून शेजारपाजाऱ्यांचे दरवाजे उघडले आणि त्यांनी काय प्रकार आहे अशी चौकशी करायला सुरुवात केली. कदाचित तो मुलगा तळमजल्यावरच्या एखाद्या खोलीत लपून बसला असल्याची शंकाही बोलून दाखवली गेली. आता अंधार बराच पडल्याने शेजाऱ्याने कंदील पेटवला आणि पायऱ्या उतरून खाली येऊ लागला.एक दोन पायऱ्या उतरल्यावर त्याला ती बाई उभी होती त्या अंगणातल्या एका पांढऱ्या फरशीवर रक्ताचा थेंब दिसला.त्या माणसाचं उत्तेजित आवाजातलं बोलणं ऐकून आसपासचे लोक गोळा झाले आणि अंगणात आले.त्यातच एक म्हातारा होता आणि त्याने त्याच्या मालकाबरोबर बऱ्याच शिकार मोहिमांमध्ये भाग घेतला होता.शेजारच्याकडून कंदील घेऊन त्याने रक्ताचा माग काढत अंगण पार केलं व कंपाऊंडची भिंत ओलांडली. त्या भिंतीमागे एकदम आठ फूट खाली एक रताळ्याचं शेतं होतं... तिथल्या मऊ मातीत त्याला बिबळ्याच्या फाकलेल्या पायाचे ठसे दिसले.


गावातल्या सर्वांनी नरभक्षक बिबळ्याबद्दल ऐकलं होतं पण त्या दिवसापर्यंत हा बिबळ्या त्या गावापासून १० मैलांच्या आत फिरकला नव्हता.त्यामुळे त्या क्षणापर्यंत,त्या मुलाला नरभक्षकाने उचललं असेल अशी शंकासुद्धा कोणाला आली नव्हती.


आता मात्र काय झालंय ते कळताच त्या बाईने धाय मोकलून रडायला सुरुवात केली,तर इतर जण धावत जाऊन घरातून ढोल आणि ताशे घेऊन आले,काहींनी तर बंदूकासुद्धा आणल्या व काही मिनिटातच प्रचंड हलकल्लोळ सुरू झाला.रात्रभर ढोल बडवले जात होते आणि बंदूकांचे बार उडवले जात होते.सकाळी त्या मुलाचा मृतदेह सापडला तसं ताबडतोब दोन माणसांना माझ्याकडे पिटाळलं गेलं होतं.


मुखियाबरोबर गावात शिरत असतानाच मला शोक करणाऱ्या त्या विधवेचं रडणं ऐकू आलं आणि तीच सर्वप्रथम मला सामोरी आली.मला अशी दृश्य पाहण्याचा फारसा अनुभव नव्हता तरीही माझ्या अननुभवी नजरेला देखील समजत होतं ती बाई नुकतीच एका भावनिक वादळातून बाहेर आली आहे आणि आता लागोपाठ पुढचं वादळ येत आहे.मला अशा अवस्थेतल्या माणसांशी कसं वागावं हे कळत नाही त्यामुळे त्या बाईचं म्हणणं सर्वात शेवटी ऐकावं असं मी ठरवलं पण तिला त्या सर्व कथेतली तिची बाजू काहीही करून सांगायचीच होती तेव्हा शेवटी मी तिच्या मनासारखं होऊ दिलं.


जसजशी तिची कथा उलगडत जात होती तसं मला समजलं की तिला गावकऱ्यांबद्दलच्या तक्रारीला वाट करून द्यायची मला 'जर त्याचा बाप आज जिवंत असता तर त्याने धाडस दाखवलं असतं पण गाववाल्यांनी मात्र बिबळ्याचा पाठलाग करून पोरांचा जीव वाचवण्याचा प्रयत्नसुद्धा केला नाही'असं तिचं म्हणणं होतं.मग मात्र मी सांगितलं की तिचं चुकतंय... बिबळ्याच्या दाताची पक्कड त्या मुलाच्या गळ्याभोवती पडताक्षणीच त्याची मान धडावेगळी झाली असणार आणि कोणी कितीही प्रयत्न केला असता तरी काहीच उपयोग झाला नसता.तिथे अंगणात चहा पित उभा असताना आणि माझ्याभोवती जमलेल्या शेकडो माणसांकडे पाहत असताना माझा विश्वासच बसत नव्हता की बिबळ्याच्या आकाराचं जनावर, संध्याकाळच्या प्रकाशात,कोणाच्याही नजरेला न पडता अंगण ओलांडून तळमजल्याच्या खोलीत आलं कसं आणि गावातल्या एकाही कुत्र्याला त्याचा सुगावा कसा लागला नाही? मुलाला घेऊन त्या बिबळ्याने आठ फूट भिंतीवरून खाली ज्या शेतात उडी मारली होती तिथे मी उतरलो व ओढत नेल्याच्या खुणांवरून रताळ्याचं शेत ओलांडून पुढच्या आणखी एका बारा फूट बांधावरून पलीकडच्या शेतात गेलो. या दुसऱ्या शेताच्या कडेला रानटी गुलाब चार फूट उंचीचं झुडुपांचं कुंपण होतं.या ठिकाणी बिबळ्याने मुलाच्या गळ्याभोवतीची पक्कड सोडली होती आणि कुंपणापलीकडे जायला कुठे फट सापडते का याचा शोध घेतला होता.तशी फट न मिळाल्याने त्याने मुलाला पाठीकडच्या भागात पकडून त्याच्यासकट कुंपणापलीकडे उडी मारली होती,आणि पलीकडच्या दहा फूट बांधावरून खाली गेला होता.या तिसऱ्या बांधाच्या पायथ्याला गुरांची वाट होती.या वाटेवरून थोडं अंतर चालत गेल्यावर त्याला गावातल्या माणसांचा आरडाओरडा आणि ढोल वाजवण्याचे आवाज ऐकायला आले होते.त्यामुळे तिथेच त्या मुलाला पायवाटेवर टाकून देऊन तो डोंगर उतरून खाली गेला होता.रात्रभर चालू असलेल्या गोंगाटामुळे तो दुसऱ्यांदा मात्र त्याच्या भक्ष्याकडे पतरला नव्हता.याच ठिकाणी त्या मुलाचा मृतदेह परत आणून ठेवणे आणि जवळपास कुठेतरी लपून वाट बघणे हा एकमेव पर्याय समोर होता. पण इथे माझ्यासमोर दोन अडचणी उभ्या राहिल्या.


शिल्लक राहिलेला उर्वरित भाग पुढील लेखामध्ये…!