जेव्हा मी लहान होतो,त्यावेळेस मी खूप स्वार्थी होतो.
आणि स्वतःसाठी उत्तमोत्तम गोष्टी हिसकावून घेत होतो.
हळू हळू सर्वजण माझ्यापासून दूर होत गेले आणि मला एकही मित्र राहिला नाही.माझ्या वडिलांनी माझ्या जीवनात मदत व्हावी म्हणून मला तीन गोष्टींची शिकवणूक दिली.एके दिवशी माझ्या वडीलांनी दोन वाट्या नूडल्स केले आणि नूडल्सच्या दोन्ही वाट्या टेबलावर ठेवल्या.एका वाटी मधील नूडल्स वर एक अंडे ठेवले होते व दुसर्या वाटीवर एकही अंडे नव्हते. त्यांनी मला सांगितले, "बेटा,तुला कोणती वाटी हवी आहे ती तू घेऊ शकतो."
त्यावेळी अंडे मिळणे कठीण होते.!आम्हाला केवळ सणासुदीच्या दिवशी किंवा नवीन वर्षाच्या दिवशीच फक्त अंडे खायला मिळत असे.
म्हणूनच मी ज्या वाटीत अंडे होते ती वाटी निवडली.!आम्ही जेवण करायला सुरुवात केली,तेव्हा मी स्वतःला खूप बुद्धिमान समजून स्वतःला शाबासकी देत अंडे खाण्यास सुरुवात केली.
जेव्हा माझ्या वडिलांनी नूडल्स खाणे सुरू केले तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला कारण त्यांच्या वाटीत नूडल्सच्या खाली दोन अंडी होती.! तेव्हा मला खूपच पश्चात्ताप झाला.मी निर्णय घेण्यास खूप घाई केली म्हणून मी स्वतःला दोषी मानू लागलो.माझे वडील हसले आणि त्यांनी मला सांगितले,"बाळा,नेहमी लक्षात ठेव जसे दिसते तसे खरेच असते असे नाही.जर तुमची वृत्ती लोकांचा फायदा घेण्याची असेल तर नुकसान तुमचेच आहे.शेवटी तुमची हारच होईल."
दुसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले.एका वाटीत वर एक अंडे होते आणि दुसर्या वाटीवर एकही अंडे नव्हते.पुन्हा त्यांनी त्या दोन वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या व मला सांगितले,"बाळा,तुला जी वाटी हवी असेल ती घे."
ह्यावेळी मी जरा हुशारी दाखवली!मी अंड नसलेली वाटी निवडली.मला फार आश्चर्य वाटले जेव्हा मी नूडल्सला वर खाली हलवले तेंव्हा त्यात एकही अंडे नव्हते.
पुन्हा माझे वडील हसले आणि मला म्हणाले, "बाळा,तू नेहमी आपल्या आधीच्या अनुभवावर विश्वास ठेवता कामा नये.कारण जीवनात खूप अनिश्चितता असते.कधी कधी,जीवन तुम्हाला धोका देऊ शकते किंवा तुमच्याशी कुणी कपट करू शकतो.अशा अनुभवाने तुम्ही नाराज किंवा दुःखी होता कामा नये,फक्त तो अनुभव एक शिकवणूक म्हणून स्वीकारला गेला पाहिजे आणि पुढे गेले पाहिजे.या गोष्टी तुम्ही पुस्तके वाचून शिकू शकणार नाही."
तिसऱ्या दिवशी,माझ्या वडिलांनी परत दोन वाट्या नूडल्स बनवले,एका वाटीच्या वर एक अंडे होते आणि दुसऱ्या वाटी वर एकही अंडे नव्हते.त्यांनी दोन्ही वाट्या जेवणाच्या टेबलावर ठेवल्या आणि मला सांगितले,"बाळा,तू निवड आता तुला कुठली वाटी हवी आहे?"
या वेळी मी माझ्या वडिलांना सांगितले की,"आधी तुम्ही घ्या कारण तुम्ही घरातील प्रमुख व्यक्ती आहात आणि कुटुंबासाठी तुम्ही खूप योगदान दिले आहे."
माझ्या वडिलांनी नाही म्हटले नाही व ज्या वाटीवर एक अंडे ठेवले होते ती वाटी निवडली.जेव्हा मी माझ्या वाटीतील नूडल्स खाण्यास सुरुवात केली तेव्हा मला खात्री होती की माझ्या वाटीत अंडे निघणार नाही.परंतु जेव्हा माझ्या वाटीत दोन अंडी निघाली,तेव्हा मी खूपच आश्चर्यचकित झालो.!
माझ्या वडिलांनी प्रेमपूर्वक माझ्याकडे पाहून हसून मला सांगितले,"माझ्या बाळा,हे कधीही विसरु नकोस की तू जेव्हा दुसऱ्या व्यक्तीच्या भल्याचा विचार करतोस,तेव्हा तुमच्याबाबतीत ही नेहमी चांगलेच होते!"
मला माझ्या वडिलांची ही तीन वाक्ये नेहमी आठवतात आणि मी त्यानुसार माझा व्यवहार आणि उद्योग करतो.हे खरेच आहे,की मला माझ्या उद्योगात त्यामुळेच सफलता मिळाली आहे.
एक यशस्वी उद्योजक नारायण मुर्ती..