* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

९/७/२३

रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या

'प्रयाग' या शब्दाचा अर्थ संगम.केदारनाथवरून येणारी मंदाकिनी आणि बद्रीनाथवरून येणारी अलकनंदा या दोन नद्यांचा रुद्रप्रयाग येथे संगम होतो.यापुढे त्यांच्या एकत्रित प्रवाहालाही अलकनंदा म्हणूनच संबोधतात.पण पुढे देवप्रयागला ह्या अलकनंदाला भागीरथी येऊन मिळाल्यावर त्यांच्या एकत्रित प्रवाहाला सर्व हिंदू लोक 'गंगामय्या' म्हणून ओळखतात तर इतर सर्व जग 'गंगा' म्हणून ओळखतं.

जेव्हा एखादं जनावर - तो वाघ असो किंवा बिबळ्या - नरभक्षक बनतं तेव्हा ओळख पटण्यासाठी आणि नोंद ठेवणं सुलभ जावं यासाठी त्याला त्या भागातल्या महत्त्वाच्या ठिकाणाचं नाव दिलं जातं.त्या नावाचा अर्थ असा नव्हे की त्या नरभक्षकाने आपली कारकीर्द त्याच गावापासून सुरू केली किंवा सर्व मनुष्यबळी त्याच गावात घेतले.त्यामुळे या रुद्रप्रयागच्या बिबळ्यानेही त्याचा पहिला बळी रुद्रप्रयागपासून बारा मैलांवर केदारनाथ रस्त्यावरील एका छोट्याशा गावात घेतला असला तरी पुढे तो 'रूद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या' म्हणूनच ओळखला जाऊ लागला.ज्या कारणांमुळे वाघ नरभक्षक बनतात त्याच कारणांमुळे बिबळे नरभक्षक बनत नाहीत.

बिबळ्या हे आपल्या जंगलातलं सर्वात रुबाबदार व देखणं जनावर आहे आणि अडचणीत सापडला किंवा जखमी झाला तर धाडसात इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा कांकणभर सरसच आहे.मात्र,मला

कबूल करायला आवडत नसलं तरीही एक गोष्ट खरी आहे की जर भूक भागली नाही तर तो जंगलात सापडणारा कोणताही मृतदेह खातो.

त्या अर्थाने scavanger किंवा 'जंगलातला सफाईकामगार' 'जंगलातला सफाईकामगार' म्हणता येईल... आफ्रिकेतला सिंहही याच प्रकारातला!

गढवालचे लोक हे प्रामुख्याने हिंदू आहेत आणि त्यामुळे ते मृत व्यक्तीचं दहन करतात. सर्वसाधारणपणे हा दहनविधी जवळच्या ओढ्याच्या किंवा नदीच्या काठावरच पार पाडला जातो.कारण त्याची रक्षा पुढे कुठेतरी गंगेत व तिथून सागराला मिळेल अशी श्रद्धा असते. पहाडी मुलखातली गाव शक्यतो उंच डोंगरावर बसलेली असतात आणि ओढा,नद्या या खाली दरीतून वाहतात.साहजिकच एखाद्या दहनविधीसाठी किती ताकद खर्ची पडत असेल याचा अंदाज येऊ शकेल;कारण मृतदेह वाहून नेणारे खांदेच नव्हेत तर जाळायला लागणारं सरपण गोळा करणे व वाहून नेणे यासाठी बरंच मनुष्यबळ लागतं.

सर्वसाधारणपणे हे सर्व विधीपूर्वक पार पाडलं जातं;पण जर कधी एखादा साथीचा रोग पसरला आणि लोक जास्त संख्येने मरायला लागले तर मात्र पटापट सर्व मृतदेहांची विल्हेवाट लावणं अशक्य होऊन बसतं.अशा वेळी हा विधी अतिशय सरळसोट पद्धतीने पार पाडला जातो.

मृतदेहाच्या तोंडात जळत्या कोळशाचा तुकडा ठेवून तो देह डोंगराच्या कडेला नेला जातो आणि सरळ खालच्या दरीत लोटून दिला जातो.ज्या ठिकाणी वाघ,बिबळ्यांच्या नैसर्गिक भक्ष्याचा तुटवडा असेल त्याठिकाणी जर एखाद्या बिबळ्याला असा मृतदेह सापडला तर तो आपली भूक त्यावरच भागवतो.त्यामुळे त्याला चटक लागू शकते.नंतर ती साथ थांबली की मग अचानक हे नवं भक्ष्य दुर्मीळ झाल्याने सहज आणि विपुल मिळणाऱ्या ह्या नव्या शिकारीकडे तो वळतो. १९१८ मध्ये आलेल्या एन्फ्ल्यूएन्झाच्या साथीने भारतात लाखो बळी घेतले व त्यात गढवालच्या वाट्यालाही प्रचंड मनुष्यहानी आली. याच साथीच्या शेवटी शेवटी म्हणजे १९१८ च्या सुमारास या आपल्या 'रूद्रप्रयागच्या नरभक्षक बिबळ्या'चा उदय झाला.

या बिबळ्याने त्याचा पहिला नरबळी १ जून १९१८ला रुद्रप्रयागपासून काही मैलांवरच्या 'बैंजी' या गावात घेतला तर शेवटचा बळी १४ एप्रिल १९२६ रोजी 'भैंसवाडा' या गावात घेतला. मधल्या आठ वर्षांच्या कालावधीमध्ये त्याच्या नावावर एकशेपंचवीस नरबळींची नोंद आहे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या नोंदीप्रमाणे आलेला हा आकडा आणि वास्तव यात फरक आहे ही माझी शंकाच नव्हे तर खात्री आहे.कारण त्याच्या शिकारीसाठी मी त्या भागात जेवढे दिवस राह्यलो त्या काळातल्या काही बळींची सरकारी दफ्तरात नोंद नाही.अशा तऱ्हेने या बिबळ्याने प्रत्यक्षात घेतलेल्या बळींपेक्षा कमी बळी त्याच्या नावावर टाकून मला आठ वर्ष त्याच्या दहशतीखाली काढणाऱ्या लोकांवर अन्याय करायची इच्छा नाहीये. त्याचबरोबर त्याने निर्माण केलेल्या दहशतीकडेही मला तुमचं लक्ष वेधायचं आहे. त्याने वास्तवात घेतलेले बळी सरकारी

नोंदींपेक्षा कमी असो किंवा जास्त,गढवालचे लोक एका बाबतीत मात्र सहमत होतील की सर्वात जास्त.प्रसिद्धी याच बिबळ्याच्या (मॅनइटींग लेपर्ड ऑफ रुद्रप्रयाग मूळ लेखक - जिम कॉर्बेट,अनुवाद - विश्वास भावे) वाट्याला आली आहे.माझ्या माहितीप्रमाणे त्याचं नाव युनायटेड किंगडम,अमेरिका,कॅनडा,दक्षिणआफ्रिका,केनिया,मलाया,हाँगकाँग,ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड इथल्या जवळपास सर्व दैनिकात, मासिकांत व साप्ताहिकात झळकलंय.

या प्रसारमाध्यमांशिवाय वर्षभरात चार धाम यात्रा करणाऱ्या जवळ जवळ साठ हजार यात्रेकरूंमार्फत त्याचं नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचलं होतं.

नरभक्षकाने घेतलेल्या नरबळींची नोंद ठेवण्याची सरकारी पद्धत अशी असायची...

मयत व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांनी किंवा मित्रांनी गावच्या पटवाऱ्याकडे घडलेली घटना नोंदवायची.त्यानंतर त्या पटवाऱ्याने घटनास्थळावर जायचं व मृतदेह गायब असेल तर ताबडतोब एक शोधपथक तयार करायचं. जर मृतदेह सापडला तर पटवाऱ्याने पंचनामा करायचा.जर त्याची खात्री पटली की हा खरोखर नरभक्षकाचा बळी आहे,भलतंसलतं काही नाही, तर त्याच्या नातलगांना त्यांच्या जातीधर्माच्या रिवाजाप्रमाणे मृतदेहांचं दहन किंवा दफन करायला परवानगी द्यायची.त्यानंतर त्याने त्याच्या रजिस्टरमध्ये सर्व घटनेचा सविस्तर वृत्तांत लिहून,

नरभक्षकाच्या नावासमोर त्या नरबळींचं नाव लिहून अहवाल तयार करायचा आणि जिल्ह्याच्या प्रशासकीय प्रमुखाला म्हणजेच,डेप्युटी कमिशनरला सादर करायचा. डेप्युटी कमिशनरनेही जिल्हास्तरावरच्या नोंदवहीत त्याची नोंद ठेवायची.परंतु जर मृतदेह मिळालाच नाही (कारण आपली शिकार खूप अंतर वाहून नेण्याची वाईट खोड बिबळ्याला असते.) तर मात्र ही केस पुढील चौकशी साठी कार्यान्वित होते व अशा वेळेला त्याची 'नरभक्षकाचा बळी' म्हणून नोंद होत नाही.त्याचबरोबर जर नरभक्षकाच्या हल्ल्यात एखादी व्यक्ती जबर जखमी झाली व काही दिवसांनी तिचा मृत्यू झाला तर त्या व्यक्तीचीही नोंद 'नरभक्षकाचा बळी' म्हणून होत नाही.यावरून असं सहज लक्षात येतं की ही सर्व पद्धत कितीही चांगली असली तरी नरभक्षकाच्या सर्व बळींची नोंद ठेवणं केवळ अशक्य आहे,खास करून जेव्हा एखादा नरभक्षक एखाद्या ठिकाणी फार वर्ष कार्यरत असेल तेव्हा.!


उर्वरित भाग नंतर..