दि. ३० सप्टेंबर १९३० रोजी भगतसिंगांचे वडील किशनसिंह यांनी विशेष न्यायालयाला (ट्रिब्युनलला) अर्ज करून बचाव करण्याची संधी देण्याची मागणी केली होती.सरदार किशनसिंह स्वतः एक देशभक्त होते आणि स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी तुरुंगवास भोगला होता,बचाव करण्यासाठी आपली बाजू मांडून भगतसिंगला फाशीपासून वाचविणे शक्य आहे,असे वाटल्यामुळे त्यांनी अर्ज केला होता.भगतसिंग यामुळे प्रचंड नाराज झाले,
कारण भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांचे विचार याबाबत वेगळे होते.ब्रिटीश सरकारने सूड उगविण्याचे धोरण ठेवले आहे आणि न्याय हे निव्वळ थोतांड आहे.शिक्षा देण्यापासून ब्रिटीश सरकारला कोणत्याही प्रकारे थांबवले जाऊ शकत नाही.
याबाबत जर दुबळेपणा दाखवला,तर जनतेत अंकुरणारे क्रांतीचे बीज रुजू शकणार नाही असे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना वाटत होते. इतर तुरुंगात असलेल्या साथीदारांना मी त्यांच्यासोबत विश्वासघात करतोय असे वाटू नये,म्हणून वडिलांनी केलेल्या अर्जामुळे भगतसिंग दुखावले गेले होते;पण आपल्या भावनांना यावर घालत आपली तत्त्वे त्यांच्या
पर्यंत पोहोचावीत याकरिता त्यांनी दि.४ ऑक्टोबर १९३० रोजी पुढील पत्र लिहिले.ते पत्र त्यांच्या वडिलांना उशिरा मिळाले. दि.७ ऑक्टोबर १९३० ला खटल्याचा निकाल जाहीर झाला.ते पत्र सोबत देत आहे.या पत्रावरून भगतसिंगांची आपल्याला झालेल्या फाशीच्या शिक्षेबद्दल काय भूमिका होती हे अधिक स्पष्टपणे आपल्याला कळू शकेल. मजबुती का नाम महात्मा गांधी-चंद्रकांत झटाले,न्यू इरा पब्लिशिंग हाऊस पुणे
दि. ४ ऑक्टोबर १९३०
पूज्य पिताजी,
माझा बचाव करण्यासाठी विशेष न्यायालयाच्या (स्पेशल ट्रिब्युनल) सदस्यांकडे आपण अर्ज पाठवला आहे,हे ऐकून मी उद्विग्न झालो आहे.ही बातमी इतकी यातनादायी होती की,मी ते शांतपणे सहन करू शकलो नाही.या बातमीने माझ्या मनाची शांतता भंग करून मनात खळबळ निर्माण केली आहे.आजच्या अवस्थेत आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये अशा प्रकारचा अर्ज करणे हे तुम्हाला कसे काय योग्य वाटते,हे काही मला समजू शकत नाही.एक पिता म्हणून आपली भावना आणि आपली कळकळ लक्षात घेतली,तरी माझ्याशी सल्लामसलत न करता माझ्यावतीने असे पाऊल टाकायचा आपल्याला कोणताही हक्क नाही असे मला वाटते.राजकीय क्षेत्राबाबत हे आपल्यापेक्षा नेहमीच वेगळे राहिले आहेत हे आपणास ठाऊक आहे.मी आपल्या मान्यतेचा किंवा अमान्यतेचा विचार न करता नेहमीच स्वतंत्रपणे कार्य करत आलो आहे.
मी आपला खटला गांभीर्याने लढवावा आणि आपला बचाव योग्य प्रकारे करावा ही गोष्ट माझ्या मनावर बिंबवण्याचा आपण सुरुवातीपासून प्रयत्न करत आला आहात,हे तुम्हाला आठवत असेल असे मला वाटते;पण मी नेहमीच या गोष्टीला विरोध करत आलो आहे,हेदेखील आपल्याला ठाऊक आहे.
माझा बचाव करण्याची मला कधीही इच्छा नव्हती आणि त्याकडे गंभीरतेने मी कधीच लक्षही दिलेले नाही.हे केवळ मी कोणत्या धूसर विचारसरणीपोटी केले की,त्यासंदर्भात माझ्या भूमिकेचे समर्थन करणारे नेमके असे माझे काही म्हणणे होते,हा प्रश्न वेगळा आहे आणि त्याची या ठिकाणी चर्चा करता येणार नाही.आम्ही हा खटला लढवताना एका निश्चित धोरणाचा पाठपुरावा करत आहोत हे आपल्याला ठाऊक आहे.हे धोरण,माझी तात्त्विक विचारसरणी आणि आमचा कार्यक्रम यानुसारच माझे प्रत्येक पाऊल पडले पाहिजे.
आज परिस्थिती फारच वेगळी आहे;पण ती याहीपेक्षा वेगळी असती तरीही बचाव करू पाहणारा मी शेवटचा ठरलो असतो.आमच्याविरुद्ध मोठे गंभीर आरोप केलेले असले तरीही त्या खटल्याबाबत पूर्ण अनास्था दाखविणे हीच माझी भूमिका संपूर्ण खटल्यामध्ये राहिली आहे.अशा परिस्थितीत सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी अनास्था दाखविली पाहिजे.त्यांनी न्यायालयातील कायदेशीर लढायांची पर्वा करता कामा नये. त्यांना ठोठावलेल्या कठोरात कठोर शिक्षा त्यांनी धैर्याने भोगल्या पाहिजेत असे माझे मत नेहमीच राहिले आहे.त्यांनी स्वतःचा बचाव करायलाही हरकत नाही;पण तो निखळ राजकीय विचाराने केला पाहिजे,कधीही वैयक्तिक विचारापोटी नव्हे. खटल्याच्या संपूर्ण काळात आमची योजना या तात्विक विचारसरणीला अनुरूप अशीच होती. असे करण्यात आम्ही यशस्वी झालो की नाही याचा निर्णय करणे हे माझे काम नाही.आम्ही आमचे कार्य नेहमीच निरपेक्षपणे करत आलो आहोणे. 'लाहोर कटा' च्या खटल्याचा वटहुकूम जारी करताना व्हॉइसरॉयने त्यासोबत जे वक्तव्य केले होते त्यात त्यांनी म्हटले होते की,'कटातील आरोपी कायदा आणि मानखंडणा करण्याचा प्रयत्न करत आहेत.' या परिस्थितीने जनतेसमोर ही वस्तुस्थिती ठेवण्याची संधी आम्हाला दिली की,कायदा उधळून लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत की,तो दुसऱ्या बाजूने केला जात आहे हे जनतेने ठरवावे.बाबाबतीत लोकांचे मत वेगळे असू शकते.मतभेद असणाऱ्यांपैकी कदाचित आपणही एक असाल;पण त्याचा अर्थ असा नव्हे की माझ्याशी विचारविनिमय न करता,मला कल्पनाही न देता माझ्यावतीने आपण पावले टाकावीत.
आपल्याला वाटते तसे माझे आयुष्य काही इतके मौल्यवान नाही. निदान मला तरी तसे वाटत नाही.
माझ्या तात्त्विक विचारसरणीची आहुती देऊन बचाव करावा इतके माझे आयुष्य मौल्यवान नाही. माझ्या
शिवाय माझे जे इतर साथीदार आहेत, त्यांचेही खटले माझ्या खटल्याप्रमाणेच गंभीर स्वरूपाचे आहेत.
आम्ही सर्वांनी मिळून एक सामाजिक धोरण ठरवले आहे आणि शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही त्याला चिकटून राहू.त्यासाठी आम्हाला व्यक्तिशःकितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी त्याची आम्हाला मुळीच पर्वा नाही.
पिताजी,मी फार गोंधळलोय.आपण उचललेल्या या पावलाबद्दल आपल्यावर दोषारोप करताना किंवा टीका करताना मी सभ्यतेच्या सीमा तर ओलांडत नाही ना,
आणि माझी भाषा अधिक बोचरी तर होणार नाही ना अशी धास्ती मला वाटते;पण माझे म्हणणे मी स्पष्टपणे अवश्य सांगेन.जर दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने माझ्याशी असा व्यवहार केला असता,तर त्याला मी विश्वासघातापेक्षा कमी लेखले नसते;पण याबाबत मी एवढेच म्हणेन की,हा एक दुबळेपणा आहे.अतिशय शोचनीय असा दुबळेपणा.
ही वेळ आपल्या सर्वांच्या परीक्षेची होती. पिताजी,आपण त्यात अयशस्वी झालात,एवढेच मला सांगायचे आहे.मला जाणीव आहे की, दुसऱ्या कोणत्याही अव्वल देशभक्ताएवढेच आपणही देशभक्त आहात.आपण आपले संपूर्ण आयुष्य भारताच्या स्वातंत्र्यासाठी अर्पण केलेले आहे हे मला माहीत आहे;पण या कसोटीच्या वळणावर आपण असा दुबळेपणा कसा काय दाखवलात,हे मात्र मला समजूच शकत नाही.शेवटी आपण टाकलेले हे पाऊल मला मान्य नाही;हे मला आपल्याला,माझ्या इतर मित्रांना, तसेच माझ्या खटल्यात स्वारस्य असणाऱ्या सर्वांना सांगायचे आहे.न्यायालयात कोणत्याही प्रकारे बचाव करावा अशी माझी आजही भूमिका नाही.माझ्या काही साथीदारांकडून बचावासंदर्भात केला गेलेला विनंती अर्ज न्यायालयाने जरी मंजूर केला असता,तरीही मी माझा बचाव केला नसता.
उपोषणाच्या काळात विशेष न्यायालयाला (ट्रिब्युनलला) माझ्या मुलाखतीसंदर्भात मी जो अर्ज दिला होता,त्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि मी माझा बचाव देऊ इच्छितो, असेही वृत्तपत्रात प्रसिद्ध झाले आहे.प्रत्यक्षात खरेतर कसलाही बचाव देण्याची माझी इच्छा नव्हती.
आजही माझे तेच मत आहे.
'बॉर्स्टल' तुरुंगात कैदी असलेल्या माझ्या साथीदारांना मी दगा दिला आणि विश्वासघात केला असेच वाटत असेल.
माझी वस्तुस्थिती त्यांच्यासमोर स्पष्ट करायला मला संधीदेखील मिळणार नाही.या विषयासंबंधीच्या गुंतागुंतीचे सर्व सत्य जनतेला समजले पाहिजे अशी माझी इच्छा आहे म्हणून हे पत्र प्रसिद्ध करावे अशी मी आपणास विनंती करतो.
आपलाच प्रिय पुत्र,
भगतसिंग
भगतसिंगांची फाशी माफ व्हावी म्हणून गांधींनी व्हॉइसरॉय आयर्विनला लिहिलेलं एक पत्र
Letter to Viceroy
1,Daryaganj Delhi
March 23,1931
Dear Friend,
It seems cruel to inflict this letter on you; but the interest of peace demands a final appeal.Though you were frank enough to tell me that there was little hope of your commuting the sentence of death on Bhagat Singh and two others,you said you would consider my submission of Saturday.
Dr.Sapru met me yesterday and said that you were troubled over the matter and taxing your brain as to the proper course to adopt.If there is any room left for reconsideration,I invite you attention to the following.
Popular opinion rightly or wrongly demands commutation.When there is no principle at stake,it is often a duty to respect it.
In the present case the chances are that,if commutation is granted, internal peace is most likely to be promoted.In the event of execution, peace is undoubtedly in danger.
Seeing that I am able to inform you that the revolutionary party has assured me that,in the event of these lives being spared,that party will stay its hands suspension of sentence pending cessation of revolutionary murders becomes in my opinion a peremptory duty.Political murders have been condoned before now.It is worth while saving these lives,if thereby many other innocent lives are likely to be saved and maybe even revolutionary crime almost stamped out.
Since you seem to value my influence such as it is in favour of peace,do not please unnecessarily make my position,difficult as it is, almost too difficult for future work.
Execution is an irretrievable act.If you think there is the slightest chance of error of judgment,I would urge you to suspend for VOL.51
: 6 JANUARY,1931 - 28 APRIL,1931 291 further review an act that is beyond recall.If my presence is necessary,I can come.Though I may not speak.I may hear and write what I want to say.Charity never faileth.
I am,
Your sincere friend,
From a Photostat: C.W. 9343.
Courtesy: India Office Library