* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: मानवी शरीराचे विच्छेदन..२ Dissection of the human body

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/२/२४

मानवी शरीराचे विच्छेदन..२ Dissection of the human body


यानंतर त्यानं 'हिस्टोरिए ॲनिमेलियम' (Historiae Animalium) या आपल्या पुस्तक तसेच माहितीसंग्रहात त्या वेळी परिचित असलेल्या सगळ्याच प्राण्यांची आणि जेस्नरनं स्वतः शोधलेल्या प्राण्यांची माहिती आणि अतिशय सुबक वूड कट डिझाइन्स त्यानं मांडल्या होत्या.

गंमत म्हणजे त्यात त्यानं चक्क ड्रॅगन आणि मरमेड अशा फक्त माणसाच्या कल्पनेतल्या प्राण्यांनासुद्धा घेतलं होतं!


'हिस्टोरिया प्लँटारम' (Historia Plantarum) हे जेस्नरनं वनस्पतींच्या माहितीचं आणि चित्रांचं पुस्तक लिहिण्याचा घाट घातला होता.हेही काम अवाढव्यच होतं.दुर्दैवानं त्याच्या मृत्यूपर्यंत हे पूर्ण होऊ शकलं नाही.त्यानं 'मित्रिडेट'(Mithridates) नावाचा १३० भाषांमधलं साम्य आणि फरक सांगणारा कोशही लिहिला.त्यात एकाच अर्थाची एक प्रार्थना त्यानं चक्क २२ भाषांमध्ये लिहिली होती! त्याचं हेही काम अचाटच म्हणावं लागेल. शिवाय,त्यानं कीटकांच्या माहितीचाही असाच कोश तयार करायचा घाट घातला होता. तोही त्याच्या हयातीत पूर्ण होऊ शकला नाही. नंतर तो पेनी नावाच्या त्याच्या विद्यार्थ्यानं पूर्ण केला. जेस्नरनं इतरांनी केलेलं लिखाणही संपादन करून प्रसिद्ध केलं.

त्यानं केलेल्या लिखाणाची फक्त यादी करायची म्हटली तरी पुस्तकाची दोन-चार पानं सहज लागतील! इतकं करून तो थांबला नाही.त्यानं जगात अस्तित्वात असलेल्या सगळ्याच पुस्तकांची माहिती देणारी युनिव्हर्सल लायब्ररी तयार करायची योजना आखली होती.त्यासाठी त्यानं अतोनात कष्ट घेतले होते.त्यानं त्याच्या संपर्कात असलेल्या सगळ्या देशांतल्या आणि सगळ्या भाषांमधल्या आपल्या मित्रांना त्यांच्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या आणि प्रकाशित झालेल्या सगळ्या पुस्तकांची माहिती पाठवून द्यायला सांगितली होती.त्यानं अनेक प्रकाशकांना आणि लेखकांना हाताशी धरून त्यांच्या पुस्तकांचे आणि त्या पुस्तकांची माहिती असलेल्या मासिकांचे कॅटलॉग्ज जमा केले होते.

जगातल्या अनेक देशांतल्या लायब्ररीजमध्ये तो स्वतः जाऊन आला होता.त्यात उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी करून घेऊन आला होता.या सगळ्यांमधला नेमका आणि महत्त्वाचा मजकूर कापून व्यवस्थित संगतवार लावण्यात तो दिवसेंदिवस बुडून जायचा.हा त्यानं तयार केलेला त्या वेळचा अजस्र डेटाबेसच म्हणावा लागेल.

आणि आश्चर्य म्हणजे हे त्यानं स्वतः कोणत्याही यंत्राची मदत न घेता केलं होतं. तो खरंचच सोळाव्या शतकातला 'वन मॅन सर्च इंजिन' होता आणि तेही मानवी सारासार बुद्धीसहित!आतापर्यंत त्याची तब्बल ७२ पुस्तकं प्रकाशित झाली होती आणि तो पुढच्या १८ पुस्तकांवर काम करत होता! पण दुर्दैवानं मध्येच त्याला प्लेग झाला.आता आपण अजून जगत नाही हे लक्षात आल्यानंतर त्यानं आपल्याला आपल्या प्रिय पुस्तकांच्या लायब्ररीत घेऊन जायची विनंती केली.आणि आपल्या प्राणप्रिय पुस्तकांच्या सान्निध्यात त्यानं शेवटचा श्वास घेतला! त्याची अनेक प्रॉजेक्ट्स चालू असताना अशा प्रकारे वयाच्या फक्त ४९ वर्षांपर्यंत त्यानं इतकं अचाट काम केलं होतं,की आज माहितीचा महापूर असूनही कोणी हे करायला धजावेल की नाही शंकाच आहे! त्या काळातलं त्याचं हे काम आजच्या पिढीला नक्कीच प्रेरणादायी आहे.


जेस्नरनं केलेलं अचाट काम पाहून त्याला मानवंदना म्हणून अठराव्या शतकाला वनस्पतिशास्त्रज्ञ कार्ल लिनियस यानं ट्यूलिपच्या एका जातीला 'ट्यूलिपा जेस्नेरियाना' असं नाव दिलं.शिवाय, एका जिनसलाही त्यानं 'जेस्नेरिया' आणि वनस्पतींच्या एका फॅमिलीला 'जेस्नेरियासी' असं नाव दिलं.आज जेस्नरला आपण आधुनिक वैज्ञानिक प्राणिशास्त्र,

वनस्पतिशास्त्र आणि बिब्लिओग्राफीचा जनक मानतो.आधीची ग्रीक पुस्तकं ही तर विज्ञानाची सुरुवात आहे. शआता आपण यापुढे जायला हवं असं युरोपियनांना प्रकर्षानं लक्षात यायला लागलं. पण अजूनही प्लेटो,ॲरिस्टॉटल,थिओफ्रॉस्ट्स, गेलन,या वैज्ञानिकांचा समाजावर इतका जबरदस्त पगडा होता,की तो भेदन नवं काही करणं हे काम प्रचंड अवघड होतं.हे फक्त बायॉलॉजीतच होतं असं नाही तर जवळपास सगळ्याच विज्ञानशाखांना यातून जावं लागलं आहे.हा पडदा भेदायला आता दुसऱ्या थिओफ्रॉस्ट्सची गरज होती! पण हा थिओफ्रॉस्ट्स स्विस डॉक्टर होता. याचं मूळ नाव थिओफ्रॉस्ट्स बॉम्बास्ट्स फॉन होहेनहाइम (Theophrastus Bombastus von Hohenhiem) (१४९३-१५४१) असं होतं! 


हा मुलगा म्हणजे मुळातच पायाला भिंगरी लावून आलेला होता.त्यामुळे हुशार असूनही त्याला घरी बसून जुनी पुस्तकं वाचून त्यात काय लिहिलंय याची पारायणं करण्यात काही फारसा रस नव्हताच! तो सतत कोणत्या तरी भटकंतीच्या दौऱ्यावर जायच्या तयारीत असे किंवा भटकायला तरी गेलेला असे. वडिलांनी लहानपणीच त्याला औषधांचं ज्ञान दिलं होतंच. तो आता त्याही पलीकडे नव्या गोष्टींच्या शोधात निघाला होता.आपल्या प्रवासात त्याला अनेक नवनव्या औषधी वनस्पतींचा शोध लागला.हा थिओफ्रॉस्ट्स मुळातच विक्षिप्त,गूढवादी आणि चक्रम होता.गंमत म्हणजे त्यालाही त्याच्या आधीच्या अल्केमींप्रमाणे वेगवेगळी रसायनं तयार करण्यात भारी रस होता.पण पूर्वीच्या अल्केमींनी परीस आणि अमृत शोधण्यात आपलं आयुष्य घालवलं होतं. होहेनहाइमला हे सगळं अनावश्यक आणि त्यामुळेच अतार्किक वाटायचं.


सोनं किंवा अमृत अशा कधीही न सापडणाऱ्या गोष्टी शोधण्यापेक्षा माणसाला गरजेच्या असलेल्या औषधी वनस्पती आणि औषधी रसायनं शोधणं आणि त्याद्वारे माणसांना होणारे वेगवेगळे रोग बरे करणं हे डॉक्टरचं कर्तव्य आहे असं त्याला वाटत होतं. यातून त्यानं औषधांमध्ये खनिजांचा उपयोग करायला सुरुवात केली. 


पण गंमत म्हणजे यातूनच त्याला आपणही कधीही आजारी न पडू देणारा खडा/दगड शोधलाय असा दावा तो करत असे.नंतर तर तो चक्क आपल्याला अमृत सापडलंय आणि अनेक राक्षस आपल्या आज्ञेत आहेत असंच सगळयांना सांगत सुटायचा.अर्थात,त्यात काही तथ्य नव्हतं. पण त्यानं शोधून काढलेली इतर औषधं मात्र खरोखर गुणकारी असावीत.होहेनहाइम ब्रसेल्समध्ये डॉक्टरकी करायचा.तो फुफ्फुसांच्या रोगांवर उपचार करायचा.त्याचा ज्योतिषावरही विश्वास होता.शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवांवर वेगवेगळ्या ग्रहांचं नियंत्रण असतं असं त्याला वाटायचं.उदाहरणार्थ,सूर्य हृदयावर नियंत्रण ठेवतो,चंद्र मेंदूवर आणि गुरू यकृतावर नियंत्रण ठेवतो.

अशा प्रकारे तर आपल्या सूर्यमालेतले ग्रह कमी पडले असते आणि आपल्याला राहिलेल्या अवयवांसाठी इतर ग्रहांना पाचारण करावं लागलं असतं! एखाद्या हत्यारानं आपल्याला जखम झाली तर ते हत्यारच मोडून टाकलं तर ती जखम आपोआप बरी होईल असं त्याला वाटे.!होहेनहाइम त्याच्या पेशापेक्षा इतर उद्योग करण्यासाठीच प्रसिद्ध होता.तो प्रचंड दारू प्यायचा.तो पैसाही वेडावाकडा उधळायचा.


 तो खूप गर्विष्ठही होता. त्यात त्यानं प्रसिद्ध 'हिप्पोक्रॅट्स ओथ' ही शपथ घ्यायला नकार दिला होता! अपण कसे पुढारलेल्या मतांचे आणि विज्ञानाला जुन्या बुरसटलेल्या विचारांतून बाहेर काढणारे आहोत हे दाखवण्यासाठी त्यानं गावातल्या भर चौकात चक्क गेलन आणि अविसेना यांच्या पुस्तकांची होळी केली होती. आणि त्यावेळी लोक सेल्ससला सगळ्यात हुशार मानत होते. तर हा स्वत:ला त्याच्याही पुढचा म्हणजे चक्क पॅरासेल्सस म्हणवून घेत होता! आणि आपणही आज त्याला याच पॅरासेल्सस या नावानं ओळखतो.त्याच्या अशा प्रक्षोभक कृत्यांमुळे मात्र त्याला गावाच्या बाहेर काढलं गेलं.पॅरासेल्ससच्या स्वतःच्या थिअरीज काही फार उच्च कोटीच्या होत्या असं नव्हतं.पण युरोपियनांनी अजूनही जुन्या ग्रीक पुस्तकांना प्रमाण मानून आपण नवं काहीही न करणं यावर त्याचा आक्षेप होता. आणि त्याचा परिणामही जुन्या विचारांचा पगडा डळमळीत होण्यात झाला.यातूनच पुराण

काळातल्या गोष्टींवरची झापडं दूर होऊन माणूस नव्या स्वच्छ नजरेनं विज्ञानाकडे पाहायला लागणार होता.आता विज्ञानाला धातूतल्या सोन्याची नाही तर ज्ञानाच्या सोन्याची झळाळी प्राप्त होणार होती.!


२७.०१.२४ या लेखातील शेवटचा भाग..