एका प्रसिद्ध यात्रा कंपनीबरोबर यशा आणि सावी युरोपसफरीसाठी निघाले होते.अमेरिका दोनदा उभं-आडवं पाहून झालं होतं.त्यामुळे प्रगत देश, तिथल्या सोयी,शिस्त वगैरेंचं नावीन्य राहिलं नव्हतं.पण 
युरोपची गोष्टच वेगळी.जगाचा इतिहास आणि भारताइतकीच प्राचीन संस्कृती ह्याबद्दल बरंच वाचलं होतं.शिवाय दुसऱ्या महायुद्धामुळे छोटे-मोठे देश,
त्यांची नावं माहीत झाली होती. 
कथा-कादंबऱ्यांतून गंडोला,आयफेल टॉवर भेटत गेले आणि ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राज्यामुळे तिथले बरेचसे संदर्भ माहीत होते.शाळेतल्या 'लंडन ब्रीज इज फॉलिंग' मुळे आणि कोहिनूरमुळे लंडनचंही आकर्षण होतं.खरं सांगायचं तर,यशा अन् सावी ह्या दोघांचीही कोहिनूर पाहून निराशा झाली होती.भावनिक आकर्षण नक्कीच होतं.पण राणीच्या खजिन्यात कोहिनूरपेक्षा मोठे,तेजस्वी हिरे अन् इतर रत्नं होती.
कालच रात्री यशा अन् सावी दोघे मुक्कामाला पॅरिसला आले होते.आज सकाळपासूनचा कार्यक्रम भरगच्च होता.सकाळी नास्ता करून मुक्कामाच्या होटेलवरून निघाल्यावर पहिलंच स्थळ म्हणजे पॅरिसचं प्रसिद्ध 'लौवरे' म्युझियम.इथे लिओनार्दोचं विश्वविख्यात मोनालिसाचं पेंटिंग ठेवलं होतं.
सहलीबरोबर असलेल्या टूरगाईडने सगळ्या ग्रुपला म्युझियममध्ये शिरण्याआधी माहिती सांगितली होती की, 'माहीतगारांच्या मते हे म्युझियम वरवर बघायचं म्हटलं तरी कमीतकमी आठ दिवस लागतील.आपण ते फक्त चार तासातच पाहणार आहोत.त्यात मोनालिसाचं आणि इतर पेंटिंग्ज,आकर्षक ग्रीक-रोमन शिल्पकला हे भाग महत्त्वाचे आहेत.आपण तीन तास बरोबर असू.शेवटचा तास तुम्ही परत आपल्याला आवडलेल्या कलाकृती पाहू शकाल.दुपारी बरोबर एक वाजता प्रवेशद्वाराजवळ भेटायचं आहे.'
(गावगोत,माधव सावरगांकर,अष्टगंध प्रकाशन,)
पहिले तीन तास ते सुंदर म्युझियम पाहून सगळेच भारावून गेले.नंतर शेवटचा तास सुरू झाला.नवीन झालेल्या मैत्रिणीबरोबर सावी जाते म्हणाली.यशा एकटाच परत त्याच्या आवडलेल्या कलाकृती पाहण्यात रमला.थोड्या वेळापूर्वी एक प्राचीन कलाकृती बघताना यशाला एक वेगळीच भावना स्पर्शन गेली होती.पण ती कशासंबंधी होती ते मात्र खूप प्रयत्न करूनही लक्षात येत नव्हतं म्हणून तो शोधत शोधत पुन्हा त्या विभागात गेला.सर्वत्र स्त्री-पुरुषांचे संगमरवराचे शेकडो पुतळे होते. युरोपियन शैलीच्या मुख्यतःपुरुषांच्या ग्रीक पुतळ्यांसमोर तो रेंगाळला.त्याला काहीतरी आठवत होतं.विस्मृतीच्या धुक्याआडून बाहेर येण्याचा प्रयत्न त्याचं मन करत होतं,पण काय ते लक्षात येत नव्हतं. एका पुतळ्याकडे निरखून बघता बघता अचानक काळाची पुटं निमिषार्धात बाजूला झाली.काळ चाळीस-पंचेचाळीस वर्षं मागे गेला आणि वीज चमकावी तसा यशा उद्गारला,
"अरे, हा तर शिऊरकर !"
यशा माध्यमिक शाळेत नुकताच गेला होता.त्यावेळी शिऊरकर त्याला पहिल्यांदा दिसला.कर्पूरवर्णाचा, उंचापुरा शिऊरकर गावात मधूनच कधी तरी दिसायचा. पांढरा मळकट पायजमा अन् पांढराच सदरा घातलेला शिऊरकर विलक्षण देखणा होता.अत्यंत धारदार नाक त्याच्या चेहऱ्याची शोभा वाढवत असे.त्याचे डोळेही वेगळेच होते.तेजस्वी नव्हते पण एक विलक्षण शांतपणा त्याच्या डोळ्यांत होता.तो तुमच्याकडे पाहत असताना तुम्हाला न पाहता पलीकडे शून्यात पाहतो आहे असा भास व्हायचा.शिऊरकरची आणखी एक खासियत होती.तो कधीच आणि काहीच बोलत नसे.रस्त्यातून एकटा जात असताना तो क्वचितच हसत असे.पण तो वेडा नव्हता किंवा गावही त्याला तसं मानत नव्हतं.खरं तर शिऊरकर गावाच्या खिजगणतीतच नव्हता. शिऊरकर कुठे राहतो,त्याचं नाव काय,त्याला कुणी नातलग आहे का,हे यशाला कधीच समजलं नाही.
एकदा दसऱ्याच्या सीमोल्लंघनाच्या कार्यक्रमाला बाबूच्या टांग्यातून बापूंबरोबर यशा गावाबाहेरच्या स्टेशनरोडवरच्या भव्य पटांगणात जात असताना त्याला एका जीर्ण बखळीच्या आत एका भिंतीला टेकून बसलेला शिऊरकर दिसला.यशाच्या मित्रांनादेखील वेगवेगळ्या प्रसंगांत तो तिथेच दिसलेला.त्यावरून शिऊरकर त्या पडक्या,एकाकी बखळीतच राहत असावा असा अंदाज यशाने त्यावेळी बांधला होता,पण ते तेवढंच.शिऊरकर काही ठरावीक घरांमध्ये जात असे. तिथल्या माऊल्या शिऊरकरला भिक्षा देत असत. अर्थात तिथेही तो काही मागत नसे.खरं तर एक शब्दही तो बोलत नसे.घरातल्या कुणाचं लक्ष जाईपर्यंत एखाद्या कोपऱ्यात शांत उभा राही.कुणाचं लक्ष गेलं की, घरातली कारभारीण त्याला काही तरी खायला आणून देत असे.खिशात ठेवलेल्या मळक्या फडक्यात ती भिक्षा बांधून शिऊरकर मोन्या मुकाट्याने निघून जाई
.त्याला देण्यासारखं घरात काही नसेल आणि तसं कारभारणीने त्याला सांगितलं तरी तो तशाच कोऱ्या चेहऱ्याने तिथून निघे.होळीच्या दिवसाची पुरणपोळी आणि कधी तरी मिळालेली शिळी,कडक झालेली पोळी तो सारख्याच निर्विकारपणे घेई.कुठली विरक्ती त्याने प्राप्त केली होती,कुणास ठाऊक !
एकदा गावातले लाईट गेले होते.यशा आणि त्याच्या गँगचा चोर-शिपायाचा खेळ गल्लीत रंगला होता. सगळीकडे पसरलेल्या गर्द काळोखाचा फायदा घेऊन सगळे चोर ठिकठिकाणी आडोशाला लपत होते.
शिपाई झालेला मुलगा त्यांना शोधायची पराकाष्ठा करत होता. त्यावेळची गोष्ट.
यशाच्या मोठ्या चौसोपी वाड्यात त्याच्या धाकट्या बहिणी मंदा आणि मुक्ता ओसरीवर बापूंच्या सतरंजीवर तक्क्याला टेकून भुताच्या गोष्टी करत होत्या. आजूबाजूच्या अंधाराने त्या गोष्टींची भीतिदायकता जास्तच वाढत होती.अचानक मंदाला दरवाज्याजवळच्या कोपऱ्यात काहीतरी दिसलं.तिने ते मुक्ताला दाखवलं.त्या दोघीही जोरात किंचाळायला लागल्या.स्वैपाकघरात चुलीवर भाकऱ्या भाजत असलेल्या माई लगबगीने हातात मिणमिणती चिमणी घेऊन आल्या तर कोपऱ्यात शिऊरकर शांतपणे उभा होता.दोघींच्या किंचाळण्याचा त्याच्यावर अजिबात परिणाम झाला नव्हता.जणू काही त्याने काही ऐकलंच नव्हतं.शिऊरकरला पाहून माई मुक्तालाच म्हणाल्या,
"ओरडायला काय झालं? तुम्हाला दिसलं नाही का शिऊरकर आहे तो ? देवाघरचं अश्राप लेकरू ते.
त्याला काय घाबरायचंय ? लहान मुलासारखा निष्पाप आहे तो.थांब रे बाबा.गरम भाकरी करते आहे.ती घेऊन जा." माई आत गेल्या गरम गरम ज्वारीची भाकरी अन् त्यावर लिंबाएवढा लसणीच्या चटणीचा गोळा घेऊन आल्या. शिऊरकरने खिशातून आपलं मळकं फडकं काढलं.
त्यावर माईंनी दिलेली चटणी-भाकर त्याने ठेवली.
"इथेच चौकात बसून खातोस का? आणखी एकादी भाकर देऊ का ?"
माईंचे हे प्रश्न बहुदा त्याने मघाच्या मंदा-मुक्ताच्या किंकाळ्यांसारखे ऐकलेच नव्हते.
माईंनी दिलेली भाकर घेऊन तो मागे वळून वाड्याबाहेर पडला.शिऊरकरसंबंधी मोठ्या माणसांमध्ये चाललेली बोलणी यशाने लहानपणापासून वेगवेगळ्या वेळी तुकड्यातुकड्यांनी ऐकली होती.त्यावरून दुसऱ्या महायुद्धाच्या सुमारास गावापासून पंधरासोळा किलोमीटरवर असलेल्या अनकाई किल्ल्याजवळच्या भागात वर्षभर असलेल्या गोऱ्या शिपायांच्या कँपशी काही संबंध असावा असं त्याच्या मनाने घेतलं.कारण प्रत्येक वेळेस शिऊरकरचा विषय निघाला की,त्यावेळी गोऱ्या शिपायांच्या कँपचा उल्लेख हटकून व्हायचाच. हजारभर सैनिकांच्या गरजा भागवण्यासाठी त्या परिसरात छोटीमोठी दुकानं थाटली गेली होती.शिवाय कोल्हाट्यांची अन् डोंबाऱ्यांची पालंसुद्धा तिथे पडलेली असत.छावणी अनकाईहून उठण्याच्या सुमारास गावात स्टेशनरोडच्या एका मंदिराच्या बाहेर रात्रीच्या अंधारात कुणीतरी एक नवजात मूल आणून ठेवलं.सगळ्या गावात त्यावेळी तो चर्चेचा विषय झाला होता. गोरंगोमटं,गुटगुटीत बाळ शांतपणे एका चिरगुटावर पडलं होतं.त्याचं जावळ सोनेरी होतं.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ते अजिबात रडत नव्हतं.त्या बाळाचं काय करायचं हा प्रश्न साऱ्या गावाला पडला तसा एकेक जण काढता पाय घेऊ लागला.नंतर समजलं की,तिथल्याच एका घरात राहणाऱ्या एका मुक्या ब्राह्मणाने त्याला घरी नेलं म्हणे.तोही एकटाच होता.वेळ जावा म्हणून असेल किंवा कणव आली म्हणून असेल त्याने त्या बाळाला नेलं,हे खरं.पुढे पाचसहा वर्षांनी तो ब्राह्मण कुठल्याशा साथीत मरण पावला.पण त्याचं नाव तो ह्या मुलाला देऊन गेला होता.त्यामुळे सगळा गाव त्याला शिऊरकरचा मुलगा म्हणून 'शिऊरकर' म्हणू लागला होता.ते आडनावच त्याचं नाव झालं.
शिऊरकर यशापेक्षा सुमारे दहा वर्षांनी मोठा होता. त्यामुळे शिऊरकरचं बालपण यशाला ठाऊक असण्याचा प्रश्नच नव्हता.पण गावातले लोक सांगायचे, त्यावरून शिऊरकर लहानपणापासून अगदी तो ब्राह्मण वारल्यानंतरदेखील त्या बखळीत एकटाच असायचा. बखळ गावाबाहेर असल्याने जवळपास वस्ती नव्हती. त्यामुळे त्याच्याशी खेळायलाही कुणी नसायचं.खायला मिळावं म्हणून तो तेव्हापासूनच गावात यायचा.पण तेव्हाही कुणाशी बोलायचा नाही.आत्तासारखाच तेव्हाही येऊन नुसतं उभं राहायचा.सुरुवातीला गावातल्या लोकांनी त्याला बाळ्या,बंड्या अशा नावांनी हाका मारायचा प्रयत्न केला.पण तो अशा हाकांना प्रतिसाद द्यायचा नाही.
बहुदा 'शिऊरकर' नावच त्याला आवडत असावं.
शिऊरकरला लहानपणापासूनच कुत्र्यांची आवड असावी.गावात् फिरताना त्याच्या आजूबाजूला एकदोन कुत्री हमखास दिसत.
कुठल्याच गल्लीतली कुत्री त्याच्यावर भुंकल्याचं कुणी पाहिलं नव्हतं.बखळीत तो कुत्र्यांशी खेळताना दिसत असे.दिवसा गावात फारसा न दिसणारा शिऊरकर रात्री किंवा पहाटे अनिर्बंध भटकत असावा.
एकदा माईबरोबर नवरात्रात यशा कोटमगावच्या देवीच्या दर्शनाला पहाटेच जात होता.अजून उजाडलेलंही नव्हतं.सगळीकडे अंधारच होता.
त्यावेळेस शिऊरकर समोरून परत गावाकडे येताना दिसला. अर्थात तो नुस्ताच उन्मुक्त भटकत होता की,देवीचं दर्शन घेऊन येत होता,हे मात्र समजलं नाही.
एकदा गल्लीत मुलं गोट्या खेळत होती.खेळ रंगात आला होता.त्यावेळी शिऊरकर तिथून जात होता. मुलांना खेळताना पाहून पुढे जाता जाता तो अचानक थांबला.मागे येऊन मुलांचा खेळ पाहत उभा राहिला. शिऊरकरला असा उभा राहिलेला सगळ्यांनी पहिल्यांदाच पाहिला.सुभ्या त्याला म्हणाला,
"खेळतोस का?"
सुभ्या त्याला नुसतं विचारूनच थांबला नाही तर त्याने टम्मण त्याच्या हातात दिला अन् म्हणाला,
"हं,मार ही लाल गोटी."
शिऊरकरने पवित्रा घेतला नि गोटी अचूक मारली.मग काय,मुलांना तो खेळच झाला.प्रत्येकाने वेगवेगळ्या गोट्या दाखवाव्या अन् शिऊरकरने त्या अचूक टिपाव्या, असा खेळ रंगला.
"आयला,शिऊरकरचा नेम जाम भारी आहे.मी सांगतो, लहानपणी तो जाम गोट्या खेळत असणार!" दिल्या आत्मविश्वासाने म्हणाला."आणि आतापण बखळीत बसून तो एकटाच गोट्या खेळण्याची प्रॅक्टिस करत असणार." पक्याने पुस्ती जोडली.
पाचसहा अचूक नेम मारून टम्मण खाली टाकून शिऊरकर काही न बोलताच पुढे निघून गेला.अर्थात गोट्या खेळतानाही तो बोलला नाहीच.त्याच्या चेहऱ्यावरचे भावदेखील बदलले नाहीत.
एका उन्हाळ्यातली गोष्ट.उन्हाळ्यात सगळं गाव घराबाहेरच्या अंगणात किंवा ओट्यावर अंथरुणं टाकून झोपायचं.गल्लीत सर्वच कुटुंबं बाहेर झोपत असल्याने झोप लागेपर्यंत एकमेकांशी गप्पा मारत.
रात्री हवेत थोडा गारवा येईपर्यंत सगळे जण गडीगुप झोपलेले असत.आप्पा आणि त्यांचं कुटुंबही ओट्यावर झोपलं होतं.आप्पांचं कुटुंब म्हणजे कोण - तर आप्पा स्वतः, त्यांची बायको आणि त्यांची तरुण मुलगी राही.राही अत्यंत देखणी होती.गावातल्या एकूण एका तरुण मुलाचं हृदय राहीने चोरलं होतं.
दिवसभर आप्पांच्या घरावरून तरुण मुलांची वर्दळ चालू असायची.आप्पांना ह्याची जाणीव होती.ते राहीला डोळ्यांत तेल घालून जपत.घरावरून जाणारा एखादा पोरगा थोडा जरी रेंगाळला तरी आप्पा त्याला शिव्या देऊन हुसकत असत.राहीला तिच्या सौंदर्याची जाणीव होती.तिचा बराच वेळ नट्टापट्टा करण्यात जात असे.त्या रात्री नेहमीप्रमाणे आप्पा आणि त्यांचं कुटुंब घराच्या बाहेरच्या ओट्यावर झोपलं होतं.मध्यरात्रीच्या सुमारास कशाने कोण जाणे पण आप्पांना जाग आली.त्यांना अंधारात कुणीतरी ओट्यावर बसलेलं दिसलं.बसलेली व्यक्ती नेमकी राहीच्या पायाजवळ बसली होती. आप्पांना आधी वाटलं,आपल्याला भास होतोय.म्हणून त्यांनी निश्चल बसलेल्या त्या व्यक्तीला न्याहाळलं तर तो शिऊरकर होता! आजूबाजूच्या घरांच्या अंगणात आणि ओट्यांवर गल्लीतली इतर कुटुंबंही झोपली होती. म्हणून आप्पा दबक्या आवाजात म्हणाले,
"ए शिऊरकर,चल निघ ! उठ तिथून ! तिथे कशाला बसलास ?"
शिऊरकर नेहमीप्रमाणे त्याच्याच समाधीत होता. आजूबाजूचे लोक उठतील आणि छोट्याशा गावातल्या लोकांना चघळायला एक विषय मिळेल आणि तोही मध्यरात्री राहीच्या अंथरुणाजवळ बसलेल्या शिऊरकरचा.म्हणून आप्पा दबक्या आवाजात शिऊरकरला तिथून जायला सांगत होते.लोकभयास्तव आप्पा त्याला मोठ्याने दम भरू शकत नव्हते.पण शिऊरकरचं तिथे तसं बसणं त्यांना अस्वस्थही करत होतं.घशातल्या घशात ते शिऊरकरला 'जा, निघ' असं बराच वेळ गुरगुरत होते.आता मात्र शिऊरकरचा संयम संपला असावा.
बाजूच्या दोन गल्ल्यांत ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात तो ओरडला-
"पण मी हात तरी लावला का...?"
शिऊरकर पुन्हा पुन्हा तेच तेच बोलत राहिला. पांघरुणाच्या आतून डोकावून पाहणाऱ्यांनी त्या दिवशी शिऊरकरचा आवाज प्रथमच ऐकला ! आता आप्पांच्या संतापाचाही कडेलोट झाला.शिऊरकरवर ते सात्त्विक संतापाने ओरडत शिवी देऊन म्हणाले,
"हरामखोरा नसेल हात लावला तर लाव पण ऊठ तिथून !"
आप्पा संतापाने धुमसत असतानाच शिऊरकर शांतपणे तिथून उठला.शिऊरकरलाबहुदा तेवढ्या बोलण्यानेही श्रम झाले होते.तो हळूहळू चालत गल्लीच्या टोकाला गेला आणि मग दिसेनासा झाला.
गल्लीच्या बाहेर जाणाऱ्या शिऊरकरला पाहत,
झालेल्या गमतीशीर प्रकारामुळे पांघरुणाच्या आडून हसणाऱ्यांत यशापण सामील झाला.तेवढ्यात त्याचा खांदा कुणीतरी हलवला.यशा एकदम दचकला ! निरखून पाहिलं तर समोरच सावी उभी होती आणि म्हणत होती,
"यशा,अरे,इथे किती वेळपासून उभा आहेस ? ह्या मूर्तीत एवढं काय विशेष आहे ? आणि स्वतःशीच काय हसत होतास? बाहेर सगळा ग्रुप तुझी वाट पाहतो आहे." यशा काही न बोलता घाईघाईने सावीसोबत निघाला.आता बाहेर गेल्यावर एवढा वेळ का लागला आणि त्या मूर्तीत आपण एवढं काय बघत होतो ह्याचं काय उत्तर द्यावं ह्याचा विचार तो एकीकडे करत होता..... समाप्त 
ट्रीप खूप लहान आहे./The trip is too short.
 एक स्त्री बसमध्ये चढली आणि एका पुरुषाच्या  शेजारी बसताना त्याला तिच्या बॅगांनी मार लागला...परंतु तो पुरुष काहीही बोलला नाही.,तो माणूस गप्प बसल्यावर, त्या बाईने त्याला विचारले की तिने त्याच्यावर बॅग मारली, तेव्हा त्याने तक्रार का केली नाही ??
 त्या माणसाने हसून उत्तर दिले:
"एवढ्या क्षुल्लक गोष्टीबद्दल नाराज होण्याची गरज नाही, कारण "आपला 'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे....कारण मी पुढच्या थांब्यावर उतरत आहे"..!
या उत्तराने महिलेला खूप त्रास झाला....तिने त्या पुरुषाची माफी मागितली आणि तिला वाटले की  *ट्रिप खूप लहान आहे..!*  हे शब्द सोन्याने लिहावेत..!
आपल्यापैकी प्रत्येकाने हे समजून घेतले पाहिजे की या जगात आपला वेळ इतका कमी आहे, की निरुपयोगी युक्तिवाद, मत्सर, इतरांना क्षमा न करणे, असंतोष आणि वाईट वृत्तीने काळोख करणे हा वेळ आणि शक्तीचा हास्यास्पद अपव्यय आहे..!
तुमचे हृदय कोणीतरी तोडले आहे का ??  शांत राहणे.,.
ट्रिप खूप लहान आहे..!
 
कोणी तुमचा विश्वासघात केला, धमकावले, फसवले किंवा तुमचा अपमान केला ??
आराम करा - तणावग्रस्त होऊ नका.,
ट्रिप खूप लहान आहे..!
कोणी विनाकारण तुमचा अपमान केला का ??वाईट बोलले का? शांत राहणे... दुर्लक्ष करा…
ट्रिप खूप लहान आहे..!
तुम्हाला 'न आवडलेली' टिप्पणी कोणी केली आहे का ??  शांत राहणे...दुर्लक्ष करा...क्षमा करा, त्यांना तुमच्या प्रार्थनेत ठेवा आणि विनाकारण त्यांच्यावर प्रेम करा.,.
ट्रिप खूप लहान आहे..!
काहींनी आपल्यासमोर कितीही समस्या आणल्या, त्याचा विचार केला, लक्षात ठेवला तरच ती समस्या निर्माण होते की आमचा *'एकत्र प्रवास' खूप छोटा आहे..!
आमच्या सहलीची लांबी कोणालाच माहीत नाही... उद्या कोणी पाहिला नाही  तो कधी थांबेल हे कोणालाच माहीत नाही..!
आपली एकत्र सहल खूप लहान आहे....चला मित्र, नातेवाईक आणि कुटुंबाचे कौतुक करूया...त्यांचा आदर करा...  आपण आदरणीय, दयाळू, प्रेमळ आणि क्षमाशील होऊ या....कारण आम्ही कृतज्ञता आणि आनंदाने भरून जाऊ, आपली एकत्र सहल खूप लहान आहे..!
तुमचे हास्य सगळ्यांसोबत शेअर करा....तुमचे जीवन सुंदर व आनंदी बनण्यासाठी....... तुम्हाला हवा तसा तुमचा मार्ग निवडा....कारण…
आपली सहल खूप छोटी आहे..!!
आदरणीय सुनील घायाळ यांच्याकडून व्हॉट्सऍप द्वारे माझ्यापर्यंत आलेली....ही छोटी गोष्ट...