* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: कृत्रिम बुद्धिमत्ता : काल,आज आणि उद्या

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

१६/५/२३

कृत्रिम बुद्धिमत्ता : काल,आज आणि उद्या

माहिती मिळवण्यासाठी फोन करून चौकशी करण्याऐवजी आता संकेतस्थळांवर चॅटबॉटशी संवाद साधला जातो.यंत्रे स्वतः कॉल करून आपल्याशी बोलतात. मानवी संभाषणाचे सरूपीकरण (सिम्युलेट) करत.ठरावीक वाक्याशांना प्रत्युत्तर देण्यासाठी अशी यंत्रे समर्थ असतात.तज्ज्ञ प्रणालीच्या साहाय्याने दोन भिन्न भाषक समोरासमोर संवाद साधू शकतात. अर्थात,
त्यासाठी पूर्वनियोजित उत्तरांचा संचय त्यात केलेला असतो.

आंतरजालग्राही साधनांनी आखून दिलेला नकाशा आणि मार्ग अनुसरून आपण रस्ते शोधू शकतो आणि योग्य ठिकाणी पोहोचतो. आपल्याला माहीत आहे,की हवाई वाहतुकीचे नियंत्रण अत्यंत गुंतागुंतीचे असते.विमानांचा प्रवासमार्ग आखणे,आगमन आणि प्रस्थानाचे (लॅण्डिंग,टेक-ऑफ) नियोजन करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे साहाय्य घेतले जाते.


ज्ञानप्राप्ती,तर्क करणे आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवणे,ह्या मानवाच्या अंगी असलेल्या तीन विशेष कौशल्यांवर कृत्रिम बुद्धिमत्ता भर देते.


परंतु संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेची उदिष्टे ह्यापेक्षा अधिक विस्तृत केली आहेत.त्यासाठी तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर कंपन्या परिवर्तन घडवून आणत आहेत.

उदाहरणार्थ,मोठ्या संचयामधून दृश्यस्वरूपातील माहिती आणि वस्तूंचा शोध घेणारे 'इमेजनेट,भाषानुवादाकरिता प्रामुख्याने वापरले जाणारे 'गूगल ट्रान्स्लेट' बुद्धिबळ 'गो', 'शिगो' सारख्या पटांवरील खेळासाठी तयार केलेली 'अल्फा झीरो' प्रणाली.


डीप माइण्ड तंत्रज्ञानाने न्यूरल ट्यूरिंग मशीन तयार केले,ज्यामुळे संगणकात मानवी मेंदूच्या अल्पकालीन स्मृती सह क्षमता येऊ शकते.बोर्ड गेम 'गो' ह्या अत्यंत कठीण आणि अवघड प्राचीन खेळाच्या 'गो'पटूला हरवणारी गूगल निर्मित 'अल्फागो' संगणकीय प्रणालीसुद्धा डीप माइण्ड तंत्रज्ञानावर आधारित आहे.


'गुगल'ची चालकरहित गाडी आणि 'टेस्ला' कंपनीची स्वचालित गाडी,वाहन क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेची विशेष ओळख देते.दूरनियंत्रित यान (ड्रोन) निर्मिती आणि त्याच्या प्रयोगात परिस्थितीअनुसार योग्य निर्णय घेण्याची क्षमता यंत्रात असते.


"आयबीएम' निर्मित 'वॉटसन'चे वैशिष्ट्य असे आहे की ठरावीक एका कामासाठी हा संगणक तयार केला नसून विभिन्न प्रकारचे कार्य तो तितक्याच समर्थपणे करू शकतो.तो रोगचिकित्सा करू शकतो.सगळ्यांत जास्त वेळा अमेरिकन गेम शो जेपार्डीमध्ये सलग जिंकणाऱ्या जेत्या जेन केर्निम्सला हरवू शकतो. किंवा शास्त्रीय संगीतातील नादमधुर आविष्कार घडवू शकतो.

छायाचित्र,चित्रफीत,ध्वनिफीत, कोणत्याही स्वरूपातल्या माहितीचा अभ्यास वॉटसन करू शकतो.सातत्याने स्वयंअध्ययन करत असल्याने,वॉटसनने घेतलेले निर्णय योग्य आहेत की नाही,ह्याची खात्रीसुद्धा तो स्वतःच करू शकतो; कारण कृत्रिम बुद्धिमत्तेने दिलेले सल्ले विश्वासार्ह असल्याची त्याला खात्री असते.


जगात अग्रक्रमांकावर असलेल्या 'वॉस्टन डायनॅमिक्स' कंपनीने रोबोटिक्समधील आव्हानात्मक प्रश्न सोडवण्यासाठी,अनेक भ्रमण- यंत्रमानव (मोबाइल रोबोट) निर्माण केले आहेत.'स्पॉट' नावाच्या त्यांच्या चार पायांच्या यंत्रमानवाचे कार्य कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने चालते,

म्हणजे त्याच्यात कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण केली आहे. तो चपळाईने पायऱ्यांची चढ-उतार करू शकतो.वाटेतला भाग खडबडीत किंवा गवताळ असला तरी ओलांडून पार करू शकतो. त्यासाठी त्याच्या पायांची रचना निमुळती केली आहे.त्याबरोबरच तो चलाख आणि चाणाक्षही आहे.


सर्वसाधारण यंत्रमानवांना अरुंद,दाटीवाटीच्या ठिकाणी हालचालीसाठी मर्यादा येतात आणि चिंचोळ्या भागात फिरणे अडचणीचे होऊ शकते.परंतु,स्पॉटच्या पायांना चाके लावल्यामुळे तो कानाकोपऱ्यात सहजतेने पोहोचू शकतो.तो वळूसुद्धा शकतो.


स्पॉटची दिव्यदृष्टी ३६० अंशांपर्यंत बघू शकते,त्यामुळे मार्गातले अडथळे तो सहजपणे चुकवू शकतो.पूर्व

नियोजित लक्ष्य साध्य करण्यासाठी,स्पॉटला दुरून नियंत्रित करता येते.


तसेच,कोणत्या दिशेने आणि कसा प्रवास करायचा आहे;त्याचा मार्गक्रमही आधीच निश्चित करता येतो.

त्याच्यात अनेक प्रकारचे संवेदक बसवलेले असल्यामुळे धोकादायक प्रदेशात जाण्यासाठी किंवा जोखमीची कामे करण्यासाठी,तसेच बांधकाम,संशोधन,हवामानखाते,

खाणकाम इत्यादी क्षेत्रांत स्पॉट बहुउपयोगी आहे.


उद्योग-व्यवसायात काम करण्याच्या पद्धतीत बदल करण्याची,उत्पादनाच्या वाढीचा दर वाढविण्याची क्षमता कृत्रिम बुद्धिमत्तेमध्ये असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

व्यवसायांचा उत्कर्ष जागतिक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण असल्याने,कृत्रिम बुद्धिमत्ता हा उत्पादनाचा एक घटक मानला जातो.तंत्रज्ञानाच्या दृष्टिकोनातून जगाची उन्नती करण्याचे साधन म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्र विचाराधीन आहे.


'यंत्रांमध्ये विचार करण्याची क्षमता निर्माण करता येईल का?" ह्या प्रश्नाचे स्वीकारात्मक आणि होकारार्थी उत्तर शोधणे हे कृत्रिम बुद्धिमत्तेचे मूलभूत उद्दिष्ट असल्यामुळे मानवी बुद्धिमत्तेच्या क्षमतेची प्रतिकृती,यंत्रांमध्ये निर्माण करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रयत्नशील आहे.

आत्मसात करण्याचा यंत्रांचा वेग लक्षात घेता,

मानवाला त्यांच्या गतीने बुद्धीला चालना देऊन धावावे लागेल.

कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्यावरील संशोधन प्रगतिपथावर असल्यामुळे बुद्धिजीवी मनुष्य सर्जनशीलतेचा उपयोग नावीन्यपूर्ण निर्मितीसाठी करत आहे.


इतक्या सहजपणे,आपल्या नकळत,आपण कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या आयुष्यात स्थान दिले आहे,की भविष्यात यंत्रे दैनंदिन पठडीतली कामे मनुष्यापेक्षा बिनचूक आणि सफाईदारपणे करतील.पण,

ह्याच्यापलीकडे कल्पनाही करू शकणार नाही असे करण्याचे सामर्थ्य कृत्रिम बुद्धिमत्तेत आहे.


कृत्रिम बुद्धिमत्ता भविष्यात कुठपर्यंत मजल मारू शकेल?अनेक तत्त्वज्ञानी,संज्ञानात्मक शास्त्रज्ञांनी,संगणक

शास्त्रज्ञांनी कृत्रिम बुद्धिमत्ता कुठे असफल होऊ शकेल,

भवितव्य काय असेल,भविष्यात कशी असेल,याची अनुमाने लावली आहेत.काहींचा असा विश्वास आहे,की परिणामी तांत्रिक एकलता,दारिद्र्य आणि रोग दूर करील,तर इतर चेतावणी देतात,की


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी अस्तित्व धोक्यात येऊ शकते.


असा अंदाज आहे की, २०३०पर्यंत ७०% व्यवसाय कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा किमान एक प्रकार उपयोगात आणतील.कर्मचाऱ्यांना तत्काळ सानुकूलित उपाय आणि सूचना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने मिळू शकतील.

त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता संबंधित तंत्रज्ञानात कौशल्य असणाऱ्या व्यावसायिकांची मागणी वाढतच राहील.

संगणकाद्वारे संवाद साधताना दृष्टी, श्रवण,स्पर्श आणि गंधाची अनुभूती देण्याचे तंत्रज्ञान उदयोन्मुख आहे.

प्रशिक्षण देऊन कुशल कर्मचारीवर्ग तयार केला जात आहे.


कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कर्मचारी आणि व्यावसायिकांना नवीन कौशल्य आत्मसात करणे आवश्यक होईल.कामाचे स्वरूप बदलेल, त्याबरोबरच नवीन संधी आणि रोजगार उपलब्ध होतील.उदाहरणार्थ : यंत्र स्वयं अध्ययन तर्कात सुधारणा करण्यासाठी संशोधक,मुबलक अपक्क माहितीस्रोताचा तपास करणे,नमुना ओळखण्यासाठी प्रणाली तयार करणे,प्रशिक्षण देणे.


भारत सरकारच्या 'स्किल इंडिया' उपक्रमाअंतर्गत 'प्रधानमंत्री कौशल विकास योजना राबवली जात आहे,ज्यात तंत्रज्ञान, संगणकीय कौशल्य आत्मसात करण्यावर भर दिला जातो.


कृत्रिम बुद्धिमत्तेचे दीर्घकालीन ध्येय,सर्व कार्यामध्ये मानवी संज्ञानात्मक क्षमतांना मागे टाकण्यात यंत्रांना यशस्वी करणे,म्हणजे 'अनन्यसाधारण' बुद्धिमत्ता निर्माण करण्याचे आहे.मनुष्याची विचार करायची पद्धत खूप गुंतागुंतीची असते.आपण कसा अर्थ लावतो, एखाद्या गोष्टीचा आपल्याला काय बोध होतो; आपल्या भावना,

श्रद्धा,विश्वास,समज,समजूत, अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात..


त्याशिवाय सामान्यबोध किंवा व्यावहारिक ज्ञान, म्हणजे दैनंदिन जीवनात काही गोष्टी मनुष्याला माहीत असतील असे गृहीत धरलेले असते.


तो कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत अजूनही न सुटलेला प्रश्न आहे.


१९५० - बहुज्ञ अॅलन ट्युरिंगनी 'कम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स' ह्या शोधपत्रात सुप्रसिद्ध 'ट्युरिंग टेस्ट' प्रस्तुत केली.


१९५६ - संगणकशास्त्रज्ञ जॉन मॅक्कार्थी यांनी डार्टमाउथ परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेची संकल्पना सर्वप्रथम मांडली.


१९६९- केवळ सूचनांचे क्रमवार पालन करण्याशिवाय,हेतू सफल करण्याचे उद्दिष्ट ठेवून कार्य करण्यासाठी सक्षम असा पहिला व्यापकउद्देशीय चलित यंत्रमानव 'शँकी' तयार झाला.


१९९७ - महासंगणक 'डीप ब्लू'ने विश्वविजेत्या बुद्धिबळपटूला खेळात हरवले. 'डीप ब्लु' निर्माण करणाऱ्या 'आयबीएम'च्या दृष्टीने मोठा टप्पा समजला जातो. 


२००२ - व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी असा पहिला 'रोबोटिक व्हॅक्यूम क्लिनर' तयार करण्यात आला.


२००५ - 'स्टॅनली' ह्या यंत्रमानवाने 'डीएआरपीए ग्रॅण्ड चॅलेंज' मनुष्याच्या साहाय्याशिवाय वाहन चालवून जिंकले.


२००५ - शोधक आणि भविष्यवादी रे कुर्झवील यांनी 'एकलता' ह्या घटनेचे भाकीत केले,जी २०४५ च्या सुमारास घडेल,जेव्हा कृत्रिम मनाची बुद्धिमत्ता मानवी मेंदूपेक्षा जास्त असेल.


२०११ - अमेरिकन गेम शो 'जेपार्डी'मध्ये सगळ्यांत जास्त वेळा जेत्या ठरलेल्या जेन केनिंग्सला 'आयबीएम' निर्मित वॉटसनने हरवल


२०११ - 'अॅपल'च्या 'आयफोन'मध्ये बुद्धिमान साहाय्यक 'सिरी' समाविष्ट झाला. 


२०१७ - देशाचे नागरिकत्व मिळवणारी मानव सदृश 'सोफिया' पहिली रोबोट ठरली.


जॉन मॅककार्थी यांनी १९५९ साली 'अॅडव्हाइस टेकर' हा काल्पनिक प्रोग्रॅम त्यांच्या 'प्रोग्रॅम्स विथ कॉमन सेन्स' ह्या शोधपत्रामध्ये प्रस्तावित केला होता.त्यात त्यांनी असे सांगितले,की तर्काच्या साहाय्याने माहितीचा बोध संगणक लावतील आणि लगेच निष्कर्ष काढून 'सुसंगत' निर्णय घेऊ शकतील.

त्यामुळे निर्णयाचा परिणाम काय होईल हे जर संगणक ठरवू आणि सांगू शकला,तर त्याच्यात 'कॉमनसेन्स' आहे असे म्हणता येईल.


चित्रपटात किंवा काल्पनिक कथांमध्ये रंगवलेले संवेदनशील यंत्रमानव प्रत्यक्षात निर्माण करणे नजीकच्या काळात शक्य होणे कठिण आहे. जरी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्र विकसित होऊन मानवसदृश यंत्रमानव तयार करण्याची क्षमता आली,तरी नैतिकतेचे प्रश्न अडथळा ठरू शकतील.


 विचार आणि भावना समजून संवाद साधणारे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तयार करण्याचे प्रयत्न सातत्याने होत आहे


भविष्यातील तंत्रज्ञान स्वयं अभिज्ञ (सेल्फअवेअर),

त्याबरोबरच अधिक चतुर,संवेदनशील आणि जागरूक असेल.मानवाचे भविष्यातील जीवन कृत्रिम बुद्धिमत्ता संचालित असेल ह्याची मानसिक तयारी करणे अपरिहार्य आहे.


विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात, विज्ञानकल्पनांमधून बुद्धिमान यंत्रमानवाच्या संकल्पनेचा कृत्रिमरीत्या परिचय जगाला झाला. त्या सुरुवात 


'विझार्ड ऑफ ओझ'च्या हृदयहीन 'टिन मॅन' पासून झाला.त्यानंतर 'मेट्रोपोलिस' चित्रपटात मानवसदृश यंत्रमानव 'मारिया'.बुद्धी आणि कार्य ह्या दोघांमध्ये हृदयाची मध्यस्थी आवश्यक आहे,असा संदेश ह्यातून दिला आहे. त्यामुळे मनुष्य आणि यंत्रांनी एकत्रितपणे समस्यांची उकल केली,तर कृत्रिम बुद्धिमत्तेची वाटचाल भविष्यातही यशस्वी होईल.


- वैशाली फाटक-काटकर,माहिती - तंत्रज्ञान तज्ञ

मासिक मराठी विज्ञान परिषद पत्रिका,

२०२२ नोव्हेंबर भाग - २ ( सदरचा हा लेख संपला.)