* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: एका बोकडाचा बळी Victim of a buck

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/५/२४

एका बोकडाचा बळी Victim of a buck

मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी इबॉटसन पौरीवरून परत आला व दुसऱ्याच दिवशी सकाळी आम्ही ब्रेकफास्ट घेत असताना आम्हाला काही माणसं सांगत आली की रुद्रप्रयागपासून वायव्येला (जिथे आम्ही जिनट्रॅपमध्ये त्या बिबळ्याला मारलं होते.त्या ठिकाणापासून १ मैलांच्या अंतरावर) एका बिबळ्याचे कॉल्स सातत्याने ऐकायला येतायत.या गावाच्या उत्तरेला अर्धा मैल अंतरावर एका मोठ्या पहाडाच्या कडेचा बराच प्रदेश ओबडधोबड जमीनीचा होता आणि तिथे खूप गुहा आणि शिळा होत्या.

त्याचबरोबर तिथे पूर्वीच्या लोकांनी खणलेल्या तांब्याच्या खाणीमुळे तयार झालेले मोठाले खड्डे होते आणि इथे सर्वत्र झुडुपी जंगल माजलं होतं.काही ठिकाणी विरळ तर काही ठिकाणी एकदम दाट ! हे जंगल गावाच्या बाहेर डोंगर उतारावरच्या शेतीपर्यंत पसरलं होतं.


माझा फार दिवसांपासून कयास होता की जेव्हा म्हणून हा बिबळ्या रुद्रप्रयागच्या आसपास असतो तेव्हा तो या भागाचा लपण्यासाठी वापर करत असावा.त्यामुळे मी ह्या भागात जरा उंचशा जागा बघून बऱ्याच वेळा फेरफटका मारला होता की जिथून तो ऊन खात असताना मला दिसेल.ही बिबळ्यांची शिकार करण्याची नेहमीची पद्धत आहे कारण ही त्यांची आवडती सवय आहे; फक्त थोडा संयम व अचूक नेमम असला तरी पुरेसं ठरतं.जेवण लवकरच उरकून मी आणि इबॉटसन आमच्या ०.२७५ रायफली घेऊन आणि एका माणसाच्या हातात छोटासा दोर देऊन निघालो.गावातच आम्ही एक बोकड खरेदी केला (माझे आतापर्यंत खरेदी केलेले सर्व बोकड ह्या बिबळ्याने मारले होते.)


शेळ्यांची एक वाट गावापासून निघून सरळ डोंगरावरून जात त्या ओबडधोबड भागात शिरत होती.तिथून ती डावीकडे वळत होती व डोंगराच्या कडेकडेने १०० यार्ड जात नंतर डोंगराच्याच अंगाने वळत पलीकडे जात होती. इथे ह्या पायवाटेच्या वरच्या बाजूला झुडपी जंगल तर खालच्या बाजूला गवताळ भाग होता. पायवाटेवरच्या वळणावरच पण पायवाटेपासून दहा वार्ड खाली आम्ही एक मजबूत खुंट ठोकून बोकड बांधून टाकला. ह्यानंतर आम्ही शंभर-दीडशे यार्ड खाली उतरलो व तिथे असलेल्या मोठमोठ्या खडकांमागे आमची जागा घेतली.कॉल देण्याच्या दृष्टीने हा बोकड आतापर्यंतच्या सर्व बोकडांमध्ये सर्वात चांगला होता,जोपर्यंत तो कॉल देत होता तोपर्यंत आम्हाला डोळ्यात तेल घालून झुडुपांच्या दिशेला बघण्याची गरजच नव्हती.कारण आम्ही त्याला नीट बांधल्यामुळे त्या बिबळ्याने त्याला उचलून लांब घेऊन जाण्याची शक्यताच नव्हती.


आम्ही आमच्या जागा त्या खडकांमागे घेतल्या तेव्हा सूर्याचा लालभडक गोळा केदारनाथच्या वरच्या हिमाच्छादित शिखरांपासून हातभर वर होता.साधारण अर्ध्या तासानंतर,आम्ही काही काळ सावलीत आलो असताना तो बोकड अचानक ओरडायचा थांबला.थोडं बाजूला सरकून गवताच्या आडून मी बघितलं तेव्हा मला दिसलं की कान ताठ करून तो एका झुडुपाच्या दिशेने बघतोय.त्याने जोरजोरात डोकं हलवलं आणि त्याला बांधलेला दोर पूर्ण ताणला जाईपर्यंत मागे सरकला.


बोकडाच्या ओरडण्यामुळे आकर्षित होऊन बिबळ्या तिथे आला होता हे निश्चित आणि ज्याअर्थी बोकडाला कळण्याच्या आत त्याने झडप मारली नव्हती,त्या अर्थी त्याला काहीतरी संशय आला होता.टेलिस्कोपिक साईट्स मुळे इबॉटसनचा नेम माझ्यापेक्षा अचूक असणार होता.त्यामुळे मी त्याला जागा करून दिली.रायफल खांद्याला लावून तो जेव्हा पालथा पडला तेव्हा मी त्याला हळू आवाजात सांगितलं की तो बोकड ज्या झुडुपाकडे बघतोय त्या झुडुपाचं नीट निरीक्षण कर. बोकडाला बिबळ्या दिसत होता त्या अर्थी इवॉटसनलाही तो दिसायला हवा होता.


मिनिटभर टेलिस्कोपला डोळे लावून बघितल्यानंतर त्याने नकारार्थी डोकं हलवून रायफल खाली ठेवली आणि मला जागा करून दिली.मघाशी ज्या स्थितीत तो बोकड होता तसाच अजूनही होता.त्याच्याकडून झुडपाच्या दिशेचा अंदाज घेऊन मीही काही मिनिटं तिथे नजर केंद्रित केली पण मलाही काहीच दिसू शकलं नाही.दुर्बीण बाजूला केल्यानंतर मला जाणवलं की अंधार जलद पडतोय आणि बोकडही आता पुसटसा दिसायला लागलाय. आम्हाला तर बरंच दूर जायचं होतं.आता आणखी काही वेळ थांबणं उपयोगाचं तर नव्हतंच पण धोकादायकही होतं.त्यामुळे चटकन उठून मी इबॉटसनला सांगितलं की आता निघायला हवं.ओरडण्याचं थांबल्यावर त्या बोकडाने या क्षणापर्यंत तोंडातून एकही आवाज काढला नव्हता.आता आम्ही त्याचा दोर सोडला आणि तो एका माणसाकडे देऊन व त्याला पुढे ठेवून आम्ही गावाच्या दिशेला लागलो.त्या बोकडाच्या गळ्याभोवती याआधी कधी दोर बांधला गेला नसावा.आता त्याने हिसडे द्यायला सुरुवात केली.माझा आतापर्यंतचा अनुभव असा होता की एखाद्या बोकडाला अशा प्रकारे जंगलात बांधल्यावर जेव्हा सोडलं जातं तेव्हा तो भीतीमुळे म्हणा किंवा सोबतीची गरज असल्यामुळे म्हणा गळ्यात दोरी नसताना सुद्धा तो एखाद्या इमानी कुत्र्याप्रमाणे आपल्या मागे येतो,त्यामुळे मी त्या माणसाला बोकडाला मोकळं सोडायला सांगितलं.

पण या बोकडाच्या काही निराळ्याच कल्पना असाव्यात कारण दोरी काढली गेल्याबरोबर तो वळला व पायवाटेवरून पळायला लागला.हा बोकड कॉल देण्याच्या बाबतीत खूपच चांगला होता आणि त्याला जपणं महत्त्वाचं होतं.त्याने एकदा बिबळ्याला आकर्षित केलं होतं व पुन्हा करण्याची शक्यता होती.त्यात परत आम्ही आताच त्याच्यासाठी चांगले पैसेही मोजले होते त्यामुळे आम्हीही त्याचा पाठलाग सुरू केला.वळणावर तो डावीकडे पळत गेला आणि दिसेनासा झाला. त्याच्याच मार्गाने आम्ही डोंगराच्या कडेकडेने जात पाठलाग चालू ठेवला.तरीही बोकड न दिसल्याने आम्हाला वाटलं की त्याने गावात जायला जवळचा रस्ता पकडला असेल.

त्यामुळे आम्ही माघार घेतली.मी सर्वात पुढे होतो. आम्ही त्या वाटेवरून शंभर यार्ड गेलो असू तेवढ्यात वाटेवर काहीतरी पांढुरकी आकृती दिसली. 


उजेड अगदी कमी होता.त्यामुळे आम्ही सावधपणे जवळ गेलो तेव्हा आम्हाला दिसलं की तोच बोकड आहे.त्याचे पाय आणि डोकं वाटेवरच राहील अशा स्थितीत तो पडला होता आणि फक्त याच अवस्थेत तो खाली गडगडत जाऊ शकत नव्हता.त्याच्या गळ्यातून रक्त ठिबकत होतं आणि जेव्हा मी त्याच्या शरीरावर हात ठेवला तेव्हा त्याचे स्नायू अजूनही आचके देत होते.दुसऱ्या कोणत्याही बिबळ्याने बोकड मारून अशा पद्धतीने पायवाटेवर टाकून दिला नसता.जणू काही हा बिबळ्या आम्हाला चिडवत होता,

'बघा तुम्हाला तुमचा बोकड पाहिजे ना? घ्या..... आणि आता अंधार पडलाय,तुम्हाला खूप अंतर कापायचंय,तेव्हा तुमच्यापैकी कोण गावापर्यंत जिवंत जातोय तेच बघू!'


सुदैवाने माझ्याकडे आगपेटी होती,जर ती नसती तर मला नाही वाटत की आम्ही तिघेच्या तिघे गावापर्यंत सुखरूप पोचलो असतो.एक काडी ओढायची,

आजूबाजूला घाबरी नजर टाकायची आणि पटापट चारपाच पावलं टाकायची अशा प्रकारे ठेचकाळत,

धडपडत आम्ही शेवटी गावापासून हाकेच्या अंतरावर पोचलो.आमच्या हाकेसरशी हातात कंदील व पाईनच्या मशाली घेऊन माणसं आम्हाला घ्यायला आली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला तो तसाच आढळला पण आमचा पाठलाग करतानाचे नरभक्षकाचे माग मात्र मला मिळाले!


१४.०४.२४ या लेखमालेतील पुढील भाग…


वाचन नसलेली पिढी म्हणजे आशा नसलेली पिढी


(भारतीय अभियंत्याच्या पत्राचा उतारा)


"शांघायला जाणाऱ्या फ्लाइटवर,झोपेच्या वेळी, केबिनचे दिवे बंद होते;मी लोकांना iPads वापरून जागे करताना पाहिले,मुख्यतः आशियाई;ते सर्व गेम खेळत होते किंवा चित्रपट पहात होते.खरंतर मी तो पॅटर्न पहिल्यापासून पाहिला.जेव्हा मी फ्रँकफर्ट आंतरराष्ट्रीय विमानतळावर होतो तेव्हा माझ्या लक्षात आले की बहुतेक जर्मन प्रवासी शांतपणे वाचत होते किंवा काम करत होते,तर बहुतेक आशियाई प्रवासी खरेदी करत होते आणि किंमतींची तुलना करत हसत होते.आजकाल अनेक आशियाई लोकांना बसून पुस्तके वाचण्याचा धीर नाही. 

एकदा,एक फ्रेंच मित्र आणि मी एका रेल्वे स्टेशनवर ट्रेनची वाट पाहत होतो आणि या मित्राने मला विचारले: "सर्व आशियाई चॅट किंवा इंटरनेट का सर्फ करतात,परंतु कोणीही पुस्तके का वाचत नाही?".


मी आजूबाजूला पाहिले,आणि खरंच ते होते. 

लोक फोनवर बोलतात,मजकूर संदेश वाचतात, सोशल मीडियावर सर्फ करतात किंवा गेम खेळतात.

ते मोठ्याने बोलण्यात किंवा सक्रिय असल्याचे ढोंग करण्यात व्यस्त आहेत;गहाळ असलेली एकमेव गोष्ट म्हणजे शांतता आणि विश्रांतीची भावना. ते नेहमी अधीर आणि चिडखोर, रागावलेले आणि तक्रार करणारे असतात...


प्रसारमाध्यमांच्या मते,चीनमध्ये सरासरी व्यक्ती प्रतिवर्षी केवळ ०.७ पुस्तके,व्हिएतनाममध्ये ०.८ पुस्तके,भारतात १.२ पुस्तके आणि कोरियामध्ये प्रतिवर्षी पुस्तके वाचतात. केवळ जपान पाश्चात्य देशांशी तुलना करू शकतो ज्यात प्रति व्यक्ती प्रति वर्ष ४० पुस्तके आहेत; एकट्या रशियामध्ये प्रति व्यक्ती प्रति वर्ष ५५ पुस्तके आहेत.२०१५ मध्ये,४४.६% जर्मन लोक आठवड्यातून किमान एक पुस्तक वाचतात – नॉर्डिक देशांसाठी समान संख्या.आकडेवारी दर्शवते की वाचन नापसंत होण्याची तीन मुख्य कारणे आहेत.


-एक म्हणजे लोकांची खालची संस्कृती (शिक्षण नव्हे).त्यामुळे लोक नेहमी भेटल्यावर खूप बोलतात आणि कंटाळा न येता दिवसभर गप्पा मारतात.ते नेहमी इतर लोकांच्या कथांबद्दल उत्सुक असतात,सतत सामाजिक नेटवर्क अद्यतनित करतात आणि संप्रेषणाच्या महत्त्वपूर्ण गरजा असतात.


दुसरे म्हणजे,त्यांना लहानपणापासून वाचनाची चांगली सवय लावली जात नाही.त्यांच्या पालकांना पुस्तके वाचण्याची सवय नसल्याने तरुणांना त्यांच्या जीवनाच्या सुरुवातीपासूनच त्यांच्या संगोपनात तसे वातावरण मिळत नाही. लक्षात ठेवा, मुलाचे व्यक्तिमत्त्व प्रामुख्याने कुटुंबाद्वारे घडवले जाते.


तिसरे म्हणजे 'परीक्षाभिमुख शिक्षण',त्यामुळे लहान मुलांना बाहेरची पुस्तके वाचायला वेळ आणि ऊर्जा मिळत नाही.बहुतेक ते पुस्तके देखील वाचतात,म्हणून ते परीक्षांसाठी असतात.जुन्या अभ्यासपद्धतीच्या वातावरणामुळे अभ्यासाची सवय लागणे,पदवी मिळवणे आणि नंतर वाचन करणे बंद झाले.


इस्त्राईल आणि हंगेरी हे जगातील सर्वाधिक वाचले जाणारे दोन देश आहेत.इस्रायलमधील सरासरी व्यक्ती वर्षाला ६४ पुस्तके वाचते. मुलांना समजायला लागल्यापासून,जवळजवळ प्रत्येक आई आपल्या मुलांना शिकवते:"पुस्तके हे शहाणपणाचे भांडार आहेत,जे पैसे,खजिना आणि शहाणपणापेक्षा अधिक मौल्यवान आहेत जे कोणीही तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही.


हंगेरीमध्ये सुमारे २०,००० लायब्ररी आहेत.आणि ५००​​ लोकांमागे सरासरी एक लायब्ररी आहे; लायब्ररीत जाणे हे कॉफी शॉप किंवा सुपरमार्केटमध्ये जाण्याइतकेच चांगले आहे.हंगेरी हा जगातील सर्वात लक्षणीय पुस्तके वाचणारा देश आहे,ज्यात दरवर्षी दशलक्ष लोक नियमितपणे वाचतात,देशाच्या लोकसंख्येच्या एक चतुर्थांशपेक्षा जास्त.ज्यू हे एकमेव लोक आहेत जे निरक्षर नाहीत; 

भिकाऱ्यांकडेही नेहमी पुस्तक असते. त्यांच्या दृष्टीने पुस्तके वाचणे हा लोकांचा न्यायनिवाडा करण्याचा उत्कृष्ट गुण आहे.जे लोक वाचतात त्यांची विचार करण्याची पद्धत खूप वेगळी असते आणि त्यांच्याकडे चमकदार कामगिरी नसली तरी त्यांची मानसिकता खूप चांगली असते.पुस्तकांचा केवळ व्यक्तीवर परिणाम होत नाही;त्याचा समाजावर परिणाम होतो.ज्ञान ही शक्ती आहे आणि ज्ञान ही संपत्ती आहे. जो देश किंवा व्यक्ती पुस्तके वाचणे आणि ज्ञान संपादन करणे याला महत्त्व देतो तो नेता असेल.


एक महान विद्वान एकदा म्हणाले: "एखाद्या व्यक्तीच्या विचारांच्या विकासाचा इतिहास हा त्याचा वाचन इतिहास आहे.किती लोक पुस्तके वाचतात आणि कोणत्या प्रकारची पुस्तके निवडतात हे ठरवते की समाजाचा विकास होईल की मागे राहील."


लक्षात ठेवा: वाचनाशिवाय शर्यत ही आशा नसलेली शर्यत आहे.