* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: फेब्रुवारी 2025

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२८/२/२५

खारट पोहे / Salty swim

अंघोळ आटोपून अनिरुद्ध घाईघाईतच बाहेर आला.

गुंडाळलेला टॉवेल बेडवर फेकत बायकोला आवाज दिला, "राधा,माझा टिफीन लवकर भर. मला आज लवकर जायचं आहे ऑफिसला."


"अरे,तू लवकर जाणार आहेस, शहे आधी का सांगितलं नाहीस?" भांबावलेल्या राधिकानं विचारलं.


"सगळ्या गोष्टी मी तुला विचारूनच केल्या पाहिजेत का?" असं तावातावानं म्हणतच त्यानं कपडे घातले.


"अरे, म्हणजे मी स्वयंपाकाला लवकर सुरुवात केली असती ना. तू हा नाष्टा घे,तोवर मी लगेच दोन चपाती लाटते.भाजी फोडणी टाकलीच आहे.तुझा चहा पिऊन होईपर्यंत टिफीन तयार करते," असं म्हणत राधिकानं हातातली पोह्याची प्लेट टेबलवर ठेवली आणि एक प्लेट सासूबाईंच्या हातात दिली. आपली प्लेट मात्र झाकून ठेवली.


शेगडीवर एका बाजूला चपातीसाठी तवा ठेवला. दुसऱ्या बर्नरवर अगोदरच भाजीची कढई होती. कणकीला हात लावण्यापूर्वी मीठ टाकायला भाजीवरचं झाकण काढलं,तर तिच्या दोन्ही बोटांना चटका बसला. तोवर अनिरुद्धची हाक आली, "माझा रुमाल कुठं आहे?"


"कपाटात आहे ब्ल्यू पँटच्या शेजारी..." राधिकानं किचनमधूनच सांगितलं.टाय सावरत अनिरुद्ध टेबलजवळ आला.खांद्याला अडकविलेली लॅपटॉपची बॅग शेजारच्या खुर्चीवर ठेवली.हातातला सॉक्स पायात चढवत पुटपुटला "काल रात्री उशिरापर्यंत मीटिंग घेऊनपण आज लवकर बोलवलंय.ह्या सायबालापण ना.मुद्दाम मलाच असं करतो..."


"काय झालंय इतकी चिडचिड करायला?" समोर बसलेल्या आईनं पोहे खात खात विचारलं.


"काही नाही गं.एका प्रोजेक्टची डेडलाईन संपत आलीय;पण काम खूप शिल्लक आहे.काल बॉस इतका वेळ बडबडत होता ना,वाटलं त्याच्या तोंडावर राजीनामा फेकून मारावा;पण घराचा आणि गाडीचा हप्ता चालू आहे तोपर्यंत नो रिस्क ! हा प्रोजेक्ट जर वेळेवर पूर्ण झाला तर प्रमोशन होईल. जरा पगार वाढला की कार बदलावी म्हणतोय."


"होईल रे बाबा प्रमोशन.मी देवाला साकडं घातलंय, तू बघच..." आईनं आश्वस्त केलं.


"अगं आई,पण तो रोहन टपलाय ना माझ्या वाईटावर.सारखा बॉसकडं कागाळ्या करत असतो." असं म्हणत अनिरुद्धनं पोह्याची प्लेट उचलली.पहिला घास तोंडात घातला.दोन वेळा चघळून थू.. थू करीत राधिकाकडं बघत किचनमध्येच धुंकला. "बावळटा,पोह्यात मिठाची चिमूट घातलीय का आख्खा डबा ओतलाय.रात्री आमटीत मीठच नव्हतं,तर आता पोहे खारट करून ठेवलंस.तुझ्या आई-बापानं कधी तुला स्वयंपाक करायला शिकवला नाही का..?"


अनिरुद्धच्या संतापानं अधिकच गोंधळलेली राधिका म्हणाली, "अरे पण मी थोडंसंच घातलेलं."


"मग तूच खा ते..." असे म्हणून अनिरुद्धनं उरलेलं पोहे राधिकाच्या अंगावर फेकून दिलं आणि बॅग घेऊन पाय आपटतंच बाहेर निघाला.


"अरे आणि,डबा तर घेऊन जा..." एका हातात डबा आणि दुसऱ्या हातानं डोळ्यांवर आलेलं केस नीट करीत ती अनिरुद्धच्या मागून पळतच आली.


"तूच खा तुझं बेचव जेवण..." असं म्हणत अनिरुद्धनं दरवाजा खाडकन् ओढून घेतला.


आई शांतपणे बसून सगळा तमाशा बघत होत्या.


"आई,खरंच पोहे खारट झालेत का हो? तुम्ही खाल्ले ना..." रडवेल्या सुरातच राधिकानं विचारलं.


"पोहे नीट भिजवायला येत नाहीत का तुला? एखाद्या घासात मिठाचा खडा तसाच राहिला असणार.एवढ शिकून काय उपयोग.साधे पोहे करता येत नाहीत.गेलं ना माझं लेकरू उपाशी...' आईनं टोमणा मारला.


एवढ्या आपुलकीनं आणि कष्टानं हे सारं करूनही दोघांनीही तिला फटकारून बोललेलं सहन न झालेली अनिता संतापली आणि म्हणाली,"माझ्या आई-वडिलांनी मला इंजिनिअर केलं होतं.पोहे करायच्या कोर्सला पाठवलं नव्हतं.तुमची लेक तर किचनमध्ये पायच ठेवत नाही.तिला स्वयंपाक शिकवायला काय झालं होतं?"


"तिच्या घरी स्वयंपाकाला बाई आहे आणि माझी लेक नोकरी करते."


वाघीण-प्रतिक पाटील-स्वच्छंद प्रकाशन कोल्हापूर


"मीपण नोकरी करीत होते.तुम्ही बाळाला सांभाळत नाही म्हणून मला घरी बसावं लागलं."


"पोरं संभाळायला होत नाहीत,तर जन्माला कशाला घालायची..?"


"तुम्हालाच हवा होता ना वंशाला दिवा !"


"मग झाला का? मुलगा हवा होता आम्हाला."


"अच्छा म्हणजे मुलगी झाली म्हणून तुम्ही असं वागताय;पण यात माझी काय चूक आहे?"


"जी चूक झाली आहे ती आधी निस्तर.माझा मुलगा उपाशीपोटी गेलाय,त्याला आधी डबा देऊन ये." सासूनं ठेक्यात सांगून नाक मुरडलं आणि पदर खांद्यावर सावरत निवांत बसून उरलेलं पोहे खायला सुरुवात केली.


सासूकडं रागानं बघत कोपरापासून हात जोडलं आणि ती ताडकन् किचनमध्ये गेली.


करपलेली चपाती तव्यातून बाहेर काढून गॅस बंद केला.किचनभर पडलेले पोहे तिनं गोळा केलं आणि ती अंघोळीला गेली.अंघोळ झाल्या झाल्या लगेच स्वयंपाकाला सुरुवात केली.


अनिरुद्धनं वाटेत टपरीवरच इडली सांबार खाल्लं आणि ऑफिस गाठलं.तरीही त्याला पोहोचायला दहा मिनिटे उशीर झाला.बॉस अजून यायचा होता.


अनिरुद्धचा खास दोस्त आणि कलिग संदेश पाठीमागून आला आणि,"अन्या चल नाष्टा करूया. सकाळी लवकर येण्याच्या नादात घरी काही खाल्लं नाही.मग सोबत बायकोनं डबा दिलाय.चल खाऊया थोडं थोडं."


"नशीबवान आहेस रे तू.. किती काळजी घेतात वहिनी!" 


घरोघरी मातीच्या चुली ही म्हण शाळेमध्ये असताना तोंडपाठ केलेली असायची,कारण म्हणी व त्याचा अर्थ सांगा असा प्रश्न असायचा.पेपरमध्ये उत्तर दिले.त्याचा गुण मिळाला..पण आज ही गोष्ट वाचल्यानंतर त्याचा खरा अर्थ कळाला.आपण ही गोष्ट आवर्जून वाचावी…विजय गायकवाड


उर्वरित शिल्लक भाग पुढील लेखामध्ये..।



२६/२/२५

हसरा,एपिक्यूरस / Smile,Epicurus

…..असले तरी त्यांना या सृष्टीशी काही एक कर्तव्य नाही.त्यांना या आपल्या मर्त्य जगातील घडामोडींचे सोहेर,सुतक,काहीही नाही! हे जीवन म्हणजे एक मूर्खाचा बाजार आहे.दैवी मेंदूतून असल्या जगाची कल्पना निघणे शक्य नाही.कोणताही देव स्वतःच्या पूजेसाठी मंदिर बांधावयाला सांगून ते आपल्याच विजेच्या लोळाने भस्म करणार नाही.देव असा कसा असू शकेल? दयाळू देव एखाद्या मुलाला आजारातून बरा करून पुन्हा लढाईत मरावयाला पाठवील,हे कसे शक्य आहे? एपिक्यूरसच्या मते या अकस्मात उत्पन्न झालेल्या जगात देव व मानव दोघेही भयभीतपणे वावरत असतात.हे जग देवांनी निर्मिले नाही, मानवांनीही निर्मिले नाही,दोघेही या जगात अपरिचित पाहुणे आहेत.त्यांना सदैव धास्ती वाटते.देवांना स्वतःचीच काळजी वाहावी लागते,चिंता लागलेली असते.माणसांनी देवांच्या नावाने हाका मारण्यात काय अर्थ ? जगात चालेल्या झगड्यांमध्ये देवही माणसा प्रमाणेच निराधार आहेत.हे जग दुसऱ्या कोणी निर्मिलेले नसून अणूंच्या आकस्मिक संघांतातून आपोआप बनलेले आहे.ते स्वयंभू आहे.पण मग अणूंच्या संघांतातून बनलेल्या या जगात फुले-फळे,

पशु-पक्षी, देव-मानव, इत्यादी विविध प्रकार कसे झाले? या अणूंतून कोणत्या प्रक्रियेने व बनावाने डॅमॉक्रिटससारखे शास्त्रज्ञ व एपिक्यूरससारखे तत्त्वज्ञ जन्मले ? एपिक्यूरस म्हणतो, " प्रसंगाने,नाना चुका होत होत,नाना प्रक्रिया होत होत,हे सर्व झाले." हे अणू उत्तरोत्तर अधिकाधिक शुद्धतेकडे जात असतात त्यांचा उत्तरोत्तर विकास होत असतो.ओबडधोबड आकारांतून सुंदर आकारांकडे वस्तू जात असून जे अयोग्य आहे ते दूर,नष्ट होत असते,गळून जात असते व योग्य असेल ते कायम होत असते,थोडक्यात सांगावयाचे म्हणजे,या निरनिराळ्या वस्तू उत्क्रांतीच्या योगाने बनत आल्या आहेत.


डार्विनपूर्वी बावीसशे वर्षे इतक्या प्राचीन काळी एपिक्यूरसने उत्क्रांतीचे तत्त्व मांडले आहे.


एपिक्यूरियन मीमांसेनुसार;मनुष्य कसा जन्मला, निरनिराळ्या प्रजाती कशा जन्मल्या,याचे मोठे सुंदर वर्णन ल्युक्रेशियसने दिले आहे.अनंत काळापासून फिरणाऱ्या अणुपरमाणूंतून पुष्कळशा घटना व विघटना होत होत शेवटी त्यांतून एके दिवशी हे आपले जग निर्माण झाले.आरंभी या पृथ्वीवर जीव नव्हते.ती म्हणजे एक नुसता मातीच्या गोळा होती.पण हळूहळू त्या गोळ्यातून हिरवे गवत वर आले व त्याचा विकास होत होत त्यांतूनच एक दिवस झुडपे व फुले दिसू लागली. पशुंच्या अंगावर केस येतात किंवा पक्ष्यांना पिसे फुटतात,त्याप्रमाणे वृक्षांना व वनस्पतींना फुले आली.नंतर जीव उत्पन्न झाले,पक्षी उडू लागले,आकाशात गाऊ लागलेपशू जमिनीवर हिंडू-फिरू लागले.


जंगलांतून गर्जना करू लागले, पशुपक्ष्यांच्या काही विशिष्ट जाती त्या त्या वातावरणास अनूकूल होत्या; म्हणून त्या तिथे तिथे जगल्या व वाढल्या.या जातींच्या ठायी धैर्य व धूर्तताही असल्यामुळे त्या वाचल्या.काही जाती दुबळ्या होत्या,काहींना कमी दिसे,

काहींना ऐकू येत नसे,काहींना हलण्या-चालण्याची साधने नव्हती, त्या नष्ट झाल्या.निसर्गाच्या लहरींतून हे दुबळे प्रकार जन्मास आले व नष्ट झाले.हेतुहीन,योजनाहीन अशा या जगातील आंधळ्या प्रयोगाचे ते बळी होते व नष्ट होणे हेच त्यांचे भवितव्य होते.

विनाशच त्यांच्या नशिबी होता. मानवप्राणी हा या मनोरंजक नाटकातला बलवान् प्राणी होय.तो या योजनाहीन नाटकांत शेवटी येऊन उभा राहिला.तो काटक होता.रानटी होता.उघडा - बोडका होता,इतर प्राण्यांप्रमाणेच तोही या भूतलावर भटकत होता.

पाला,कंदमुळे,कवचीची फळे यांवरच जगत होता व रात्री उघड्यावरच निजत होता.


पण अधिक भयंकर हिंस्त्र श्वापदांनी मानवांवर हल्ले चढविले,तेव्हा त्यांना गुहांमध्ये आश्रय शोधणे भाग पडले.हे पशुसम मानवी जीव एकेका गुहेत समुदायाने राहू लागले.त्यांच्यांत भाषा प्रकट झाली.

त्यांना एकमेकांबद्दल आपलेपणा,करुणा,मैत्री वाटू लागली. त्यांना स्वप्नात जे विचित्र आकार दिसत,त्यांना देव मानून आणि अमर जीवन व अपरंपार शक्ती त्यांच्या ठायी कल्पून,त्या काल्पनिक देवदेवतांची ते पूजा करू लागले. पुढे त्यांना धातूंचा शोध लागल्यावर ते अधिक चांगली हत्यारे तयार करू लागले;व स्वतःचा बचाव आणि दुसऱ्याचा संसार करण्याच्या क्रियेत अधिक तरबेज झाले.निरनिराळे मानवसमुदाय परस्परांशी विचारविनिमय व वस्तुविनिमय करू लागले;मालाची अदलाबदल व ठोशांची देवाणघेवाण करू लागले, आणि अशा रीतीने ते नाना कला व उद्योग शिकले. देवघेव,व्यापार,नौकानयन,शेती,काव्य,संगीत,शिल्प, राजकारण,मुत्सद्देगिरी,भांडणतंटे,फिर्यादी,मारामाऱ्या, लढाया,सारे काही ते शिकले.थोडक्यात म्हणजे ही संस्कृती,ही सुधारणा हळूहळू उत्क्रांतीने होत आली आहे.आपत्तींनी भरलेल्या या जगात स्वतःचे सारे कसे जुळवून घ्यावयाचे,हे मानव हळूहळू ठरवीत होता.तो बदल करीत,फरक करीत चालला होता,जीवनार्थ चाललेल्या या अखंड झगड्यात थोडा वेळ जगता यावे म्हणून मनुष्य प्रयत्न करीत आहे.हे सारे जीवन म्हणजे एक अखंड,

अविरत झगडा आहे.या जगात मरणाशिवाय शांती नाही.आणि अशा रीतीने आपण एपिक्यूरसच्या विज्ञानातूनच त्याच्या तत्त्वज्ञानाकडे येतो. 


ज्या पृथ्वीवर आपण जगत असतो,ती जणू आपणास थोडा वेळ भाड्यानेच मिळाली आहे.येथून निघून जाण्याची वेळ आली की आपले सारे लुबाडले जाते;व अकिंचन होऊनच आपणास येथून जावे लागते.पण आपणास मरणावर जय मिळविता आला नाही,तरी मरणाच्या भयावर आपण जय मिळवू या. 


मानवी जीवन अल्प आहे,म्हणून दुःख करीत बसण्याचे कारण नाही.उलट ते अल्प आहे,म्हणून आनंदच मानू या.मरणानंतर जाणीव नाही;मरणानंतर ना दुःख ना वेदना,ना शिक्षा ना बक्षीस,ना स्वर्ग ना नरक! या पृथ्वीवर केलेल्या चुकांबद्दल आपणास मरणोत्तर कोणी सजा देणार आहे असे नाही.मृत्यूदेवाचा तो कारुण्यपूर्ण शुभ्र हात आपणास थोपटतो व स्वप्नहीन,चिरमधुर निद्रेत नेऊन सोडतो.जगद्रुपी वेड्यांच्या घरांतून होणाऱ्या आपल्या सुटकेच्या कागदावर सही करणारा प्रेमळ रक्षक म्हणजे मृत्यू.सर्व रोगांहून भयंकर रोग म्हणजे हे जीवन.जीवनाच्या दुर्धर व भीषण रोगापासून आपणास मुक्त करणारा सौम्य व शांत वैद्यराज म्हणजे मृत्यू. पण तुम्हांपैकी काहींना जरी हे जीवन सुखाचे,चिरसुखोप -

भोगांची जणू मेजवानीच अशा स्वरूपाचे लाभले असले,तरी तुम्ही नेहमीच चैन करीत व अधाशासारखे खातपीत राहावे हे बरे का?ओ येईपर्यंत खात बसणे बरे नव्हे.पोटाला तडस लागण्यापूर्वीच उठावे.दोन घास कमीच खाल्लेले बरे.एखाद्या दमलेल्या; पण सुखी अशा मेजवानी झोडलेल्या माणसाप्रमाणे प्रसन्नपणे व हसतमुखाने सुखाची झोप घ्यावयाला जाणे बरे नव्हे का? एक दुर्दिन येईल व तुमच्या जीवनातील सारे नष्ट होईल याचे तुम्हाला वाईट वाटते.पण हा जो अखेरचा दिवस येणार आहे,तो या नानाविध हव्यासांतून,

वासनांतून व इच्छांतून सोडविणारा आणि हे हवे ते हवे अशा धावपळीपासून मुक्त करणारा असेल, ही गोष्ट तुम्ही विसरता.

मरणाची भीती झुगारून द्या व या जीवनात जे जे मंगल आनंद मिळतील,त्यांकडेच लक्ष द्या.एपिक्यूरस व 'सर्वसह'वादी स्टोइक लोक यांचे येथपर्यंत एकमत आहे.दैव बलवत्तर असल्यामुळे जे जे होईल ते ते सहन करणे हे ध्येय सामान्य;पण यापुढे मात्र दोघांत तीव्र मतभेद आहेत.स्टोइक म्हणत की,ज्या सुखांमुळे आपली प्रवृत्ती सद्‌गुणांकडे होत नाही,जी सुखे सत्कर्मांस प्रेरक होत नाहीत,ती त्याज्य होत.सुखांनी आपली समुन्नती व्हावी. याच्या उलट एपिक्यूरस म्हणे,"जी सत्कर्मे सुखावह होत नाहीत,ती कुचकामी होत" प्रथम केवळ सुखदवादी लोकांप्रमाणे तोही क्षुद्र शारीरिक सुखे वानी,वाखाणी व आपल्या विद्यार्थ्यांना सदैव शिकवी की,"जे जे सुख मिळेल ते ते भोगा,जी जी सोन्याची संधी सापडेल,ती ती पकडा." पण केवळ शारीरिक सुखांनी कायमचे समाधान थोडेच लाभणार? क्षणभर जिभेचे सुख मिळवाल,

शारीरिक सुख मिळवाल पण कदाचित् एखादे वेळ जीवनात कायमचे रोगी अगर दुःखीकष्टी होऊन जाल.क्षणिक सुखाचे पर्यवसान कायमच्या दुःखात होणे शक्य असते.


क्षणिक आनंदाच्या जीवनात असणाऱ्या प्रक्षुब्धतेपेक्षा वाटणाऱ्या जोमापेक्षा,सतत टिकणाऱ्या सुखाची शांत स्थिती अधिक चांगली.म्हणून स्थूल व क्षुद्र शारीरिक आनंदापेक्षा वेगळा असा एक नवीन शांत मनाचा आनंद तो शिकवू लागला; या जीवनातील गोंधळ च सुख-दुःखे यांकडे अनासक्त व अत्रस्त दृष्टीने पाहणे, पाण्यातील कमळाप्रमाणे अलिप्त राहणे.


एपिक्यूरस म्हणे,हे जीवन म्हणजे एक कटू देणगी आहे.ती इतकी कटू आहे की,जीवनात आपण रडत ओरडत येतो व रडत ओरडतच जीवन सोडतो. 'आदि-अंती दुःखप्रद' असे हे जीवन आहे.पण आपल्या या दुःखातूनही सुख निर्मिता येईल.म्हणून आपण दुःखाला सुखाची जननी करू या.गत दुःखाच्या आठवणी आपणाला मागाहून सुखप्रद वाटत नाहीत का?


"म्हणून थोडा विनोद शिका;विनोदी,मोकळी वृत्ती ठेवण्याचा यत्न करा.जरा प्रमाणबद्धता शिकलात म्हणजे हे साधेल.दुःख आले तर त्या दुःखाचेच अती करीत नका बसू. 'यायचेच की जरा दुःख ! बदल नको का काही!' असे गमतीने म्हणा.आपणांसभोवतालचे हे अनंत विश्व बघा,म्हणजे आपल्या चिंता व आपली दुःखे ही इतकी क्षुद्र वाटतील की,तुम्हाला हसूच येईल. 


स्वतःला जीवनाच्या विराट नाटकातील एक पात्र समजून सुखदुःखे भोगावयाला,एवढेच नव्हे,तर एखाद्या प्रेक्षकाप्रमाणे आपल्या दुःखांकडे बघून जरा हसावयाला शिका."


"वासना, इच्छा कमी करा. त्यांना मर्यादा घाला.गरजा कमी करा.जे मिळाले आहे.त्यात समाधान माना. 


महत्त्वाकांक्षा पूर्ण करणे शक्य नसेल,तर जेवढे मिळणे शक्य असेल तेवढ्याचीच महत्त्वाकांक्षा धरा. फार उच्च महत्त्वाकांक्षा बाळगून त्या फलद्रूप होणार नसतील तर त्या जरा कमी उंच करा." 


एपिक्यूरस स्वतः साधा मनुष्य होता.तो आपल्या कोणीही अनुयायांपेक्षा कमी एपिक्यूरियन होता. त्याला लालसा नव्हती,

सुखाची ओढ नव्हती.साधी ज्वारी-बाजरीची भाकरी त्याला पुरे होत असे; पण ती कोणा मित्राबरोबर खावी असे त्याला वाटे.

खाताना एखादा मित्र बरोबर असला म्हणजे झाले; मग त्याला आणखी काही लागत नसे. आपण काय खाणार, यापेक्षा कोणाबरोबर खाणार हीच गोष्ट अधिक महत्त्वाची आहे.असे तो म्हणे.एपिक्यूरस सर्वांचा मित्र होई.मैत्री जोडण्यात तो अद्वितीय पुरुष होता.मैत्री कशी जोडावी हे तोच जाणे. आपल्या सुखात सर्वांना सहभागी करणे हाच सुखी होण्याचा खरा मार्ग होय.आपले सुख सर्वांना द्या.असे करणे मोठे उदारपणाचे अगर उदात्तपणाचे आहे म्हणून मात्र नव्हे; तर जरुरीचे आहे म्हणून आपल्या जगण्यात शहाणपणा नसेल,न्यायीपणा नसेल,गोडपणा नसेल, तर आपणास आनंदाने जगता येणार नाही,सुखासमाधानाने नांदता येणार नाही.प्राचीन काळातील कन्फ्यूशियस प्रमाणे व आपल्या काळातील बर्ट्रेंड रसेलप्रमाणे एपिक्यूरस शहाणा व अविरोधी स्वार्थ शिकवित असे. 


तो म्हणे, "जर दुसऱ्यांनी आपल्या सुखाआड येऊ नये असे तुम्ही इच्छित असाल तर तुम्हीही दुसऱ्यांच्या सुखाआड येऊ नये.

स्वतःला अपाय होऊ नये म्हणून तरी दुसऱ्यास अपाय करू नका.तुम्हाला त्रास नको असेल, तर दुसऱ्यांसही त्रास देऊ नका.

स्वतः जगा आणि दुसऱ्यासही जगू द्या.प्रक्षुब्धता टाळा.उगाच धोके पत्करू नका.युद्धाच्या रानवटपणापासून दूर राहा. राजकारणाच्या घाणीत नका शिरू.प्रेमाचा अतिरेक नको,तसा अती द्वेषही नको.मैत्रीचा गोड गुण जोडा.मैत्री जोडणे हा धर्म माना.मैत्रीची पूजा करा.कारण मैत्री ही अत्यंत मधुर,अती पवित्र व सुंदर वस्तू आहे.या जगात निश्चितपणे सुखाची गोष्ट जर कोणती असेल तर ती म्हणजे खऱ्या मैत्रीने मिळणारी सहानुभूती.बाकी सारे कितपत किमतीचे आहे.याविषयी शंकाच आहे; पण मैत्रीचा आनंद ही मात्र निःशंक गोष्ट आहे. जीवनातील दुःख क्लेशांमुळे आपण मरणालाही मिठी मारतो,त्याप्रमाणे मैत्रीच्या आनंदासाठी हे जीवन कितीही कटू वाटले, तरी आपण त्याला कवटाळू या."


एपिक्यूरसला मित्रांचे सुख होते म्हणूनच त्याला साऱ्या आपत्ती सुखाने सहन करता आल्या.दारिद्र्य, प्रियजनांचा वियोग,

दुखणी,यामुळे त्याचे जीवन खरोखरच निःसार झाले होते.पण मृत्यूशय्येवरूनही तो आपल्या एका मित्राला पुढील पत्र लिहिताना दिसतो; "माझ्या आयुष्यातला हा शेवटचाच सुखाचा दिवस आहे.आणि मी तुला लिहीत आहे.मला मूत्राशयाचा रोग झाला आहे.वेदना इतक्या होत आहेत की,याहून आणखी काही दुःखदायक असू शकेल,असे मला तरी वाटत नाही.पण या अपरंपार दुःखाच्या विरुद्धबाजूच्या पारड्यात आपण कितीदा प्रेमाने बोललो व एकत्र अनेक गोष्टी केल्या त्यांच्या प्रेमळ स्मृतींचा आनंद घेतला की हे असीम दुःखही मला नसल्यासारखेच वाटते.दुःखाचे पारडे हलके होते."


आयुष्याच्या त्या शेवटच्या दिवशी त्याने या ओळी लिहिल्या व एकाहत्तर वर्षांपर्यंत रोज रात्री तो ज्याप्रमाणे डोळे मिटीत असे,त्याचप्रमाणे त्याने त्या रात्रीही शांतपणे,समाधानाने व सहजतेने डोळे मिटले, ते कायमचे.दुसऱ्या दिवशी सकाळी आपण उठू की न उठू; जागे होऊ की कायमचेच झोपी जाऊ,याचे त्याला काय होय ? तो जागा झाला असता वा कायमचा झोपी गेला असता,तरी त्याला असा काय मोठासा फरक वाटणार होता? जीवन-मरण, दोन्ही त्याला जणू सारखीच सुखप्रद होते !


२४.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…!

२४/२/२५

हसरा,दुःखवादी एपिक्यूरस / Smile,sadist Epicurus

कसे मारावे हे माणसांना अलेक्झांडरने शिकविले,कसे जगावे हे त्यांना तत्त्वज्ञान्यांनी शिकविले.१९१४ सालच्या महायुद्धामुळे ज्याप्रमाणे तरुण पिढीच्या डोळ्यांसमोर भ्रमपटले दूर झाली,

त्याचप्रमाणे प्राचीन काळी अलेक्झांडरच्या जागतिक युद्धांमुळे नवीन पिढी निर्भान्त झाली.जे संशयात्मे होते,ते जीवनाच्या मूल्यांविषयी व देवाच्या विचित्र लहरींविषयी प्रश्न करू लागले.जे निरर्थकवादी होते,कशातच काही अर्थ नाही असे म्हणणारे होते,ते सर्व मानवी आशा-आकांक्षांची टर उडवू लागले.विरून जाणाऱ्या चंचल ढगांच्या पाठोपाठ पळत जाण्याप्रमाणे,मावळणाऱ्या इंद्रधनुष्याच्या पाठीमागे लागण्याप्रमाणे,या आपल्या आशा-आकांक्षा निष्फळ ठरणार आहेत;म्हणून त्यांच्यासाठी धडपडण्यात काही अर्थ नाही,असे ते म्हणत निराशावादी व दुःखवादी तत्त्वज्ञानी तर याच्याही पलीकडे जाऊन म्हणत,


"हे जीवन जरी कितीही सुखमय व आनंदपूर्ण दिसले तरी तिथे दुःखाची नांगी आहेच;अत्यंत आनंदाच्या क्षणातही दुःख लपलेले असते;प्रत्येक फुलात डंख मारणारी गांधीलमाशी असते; प्रत्येक सुखाभोवती दुःखाचा विळखा असतो! दोन झोपांमधे एक अत्यंत कटुस्वप्न म्हणजे जीवन ! जीवनाआधी शून्य;जीवनानंतरही शून्य ! दोन शून्यावस्थांमधला क्षणिक बुडबुडा म्हणजे जीवन ! हा बुडबुडा जितक्या लवकर फुटेल,हे स्वप्न जितक्या लवकर विराम पावेल,भंगेल, तितके चांगलेच." 


हेगेसियस नावाचा एक अत्यंत निराशावादी व दुःखवादी तत्त्वज्ञ होता.तरुणांनी करण्यासारखी सर्वोत्कृष्ट गोष्ट म्हणजे आत्महत्या,हे आपल्या विद्यार्थ्यांस पटवून देण्यासाठी तो सारखी खटपट करी.ही गोष्ट प्रतिपादण्यात त्याने सारे आयुष्य वेचले,पण तो स्वतः मात्र ऐंशी वर्षांचा होऊन अगदी स्वाभाविकपणे हे जग सोडून जाण्याची पाळी येईपर्यंत जगला! आत्महत्या करा असे तो लोकांना सांगे,पण त्याने स्वतः मात्र कधीही आत्महत्येचा प्रयत्नही केला नाही.त्याला जेव्हा कोणीतरी असा प्रश्न केला की,'जे तुम्ही लोकांना उपदेशिता ते स्वतःच कृतीत का आणीत नाही?' तेव्हा त्याने उत्तर दिले,"मला माझ्या इच्छेविरुद्ध मोठ्या कष्टाने व दुःखाने जगावे लागते आहे.मरणे किती चांगले हे लोकांना पटवून देण्यासाठी तरी जगणे मला भाग आहे! काय करावयाचे ?"


या तत्त्वज्ञान्यांच्याविरुद्ध दुसरा एक अशा तत्त्वज्ञान्यांचा वर्ग होता की,त्यांना निरर्थक दिसणाऱ्या या जीवनातही आशा-तंतू दिसल्यासारखा वाटे.जीवनाच्या या अर्थहीन दिसणाऱ्या विणावटीतही बुद्धिमान अशा विणकराचा हात दिसतो,असे ते म्हणत. या जीवनात काहीतरी हेतुमयता,योजकता आहे,हे अगदीच निःसार व पोकळ नाही.यात थोडाफार अर्थ आहे,असे त्यांना वाटे.ते 'सर्वसह'वादी स्टोइक म्हणत की,"हे जीवन आशीर्वादरूप आहे.आपणास जी संकटे वाटतात ती वस्तुतःती दुःखरूप नसून आपले मन अधिक खंबीर व गंभीर व्हावे,अधिक सामर्थ्यसंपन्न व काटक व्हावे म्हणून आपल्या मार्गात मुद्दाम टाकलेले अडथळे असतात;त्या संकटातही आईची मंगल कृपाच असते.


जे पापाची शक्ती मान्य करतात,त्यांच्यावरच जगातल्या दुःखांची व जगात जे जे असत् आहे,त्याची सत्ता चालू शकते; पापाची शक्ती मान्य करणारांनाच पाप अपाय करू शकते;

भुताला भिणाऱ्यांच्याच छातीवर भूत बसते. दुःखाला स्वतःची अंगभूत शक्ती नाही.दुःखाने रडणारा कोणीच न भेटला तर दुःख काय करील?तुमच्या दुबळेपणामुळेच दुःख प्रबळ आहे.त्या दुःखाचा इन्कार करा म्हणजे ते तुमच्यापुरते तरी नष्ट झाल्यासारखेच आहे."हे स्टोइक म्हणजे ख्रिस्तपूर्व जगातील आशावादी शास्त्रज्ञ.


यांच्या उलट दुसरे सुखवादी तत्त्वज्ञानीही होते. ते दुःख आहे असे मानीत.पण सुखोपभोगात रंगून माणसाने स्वतःला दुःखाचा विसर पाडावा असे शिकवीत,त्यांना 'उदरंभर तत्त्वज्ञ', 'शिश्नोदरपरायण तत्त्वज्ञानी'अशी नावे ठेवण्यात येत.त्यांना शांत व सौम्य अशा मानसिक व बौद्धिक आनंदापेक्षा प्रक्षुब्ध व मत्त करणारे शारीरिक आनंद आवडत.'खा, प्या, मजा करा,' हे त्यांचे ब्रीदवाक्य होते, 'उद्या एखादा अलेक्झांडर येईल व तुम्हाला मरावयास सांगेल, म्हणून मिळेल तेवढा क्षण सुखात घालावा.'असे ते सांगत. या न समजणाऱ्या जगात,या अनाकलनीय संसारात कसे वागावे हे न समजल्यामुळे हे सारे तत्त्वज्ञानी जणू प्रयोगच करू पाहत होते.या जगाशी कसे जमवून घ्यावे हेच जणू ते पाहत होते.कोणी दुःखावर भर देई;कोणी सुखावर कोणी दुःखेही आशीर्वादरूप असे सांगत,कोणी सुख मिळेल तेवढे भोगून पदरात पाडून घ्या असे सांगत.अलेक्झांडरने जी सारखी युद्धे पेटविली त्यांमुळे मानवी मन अस्वस्थ झाले होते.रबरी चेंडूप्रमाणे मानवी मन केव्हा या बाजूला तर केव्हा त्या बाजूला,केव्हा वर तर केव्हा खाली फेकले जात होते,केव्हा इकडे तर केव्हा तिकडे ओढले जात होते.कोणी त्याला आशेकडे ओढी तर कोणी निराशेकडे; कोणी त्याला भोगाकडे ओढी तर कोणी त्यागाकडे. कोणी म्हणे, 'दुःखे भोगा',तर कोणी सांगे, 'सुखे भोगा.' कोणी विषयलंपटतेचे तत्त्वज्ञान पसरवीत तर कोणी 'जे जे होईल ते ते पाहावे' असे सांगत.जगात धर्म राहिला नव्हता.जुन्या ईश्वराने मानवी व मनोरथांची वंचना केली होती व मानवजात ज्याच्यावर विश्वास टाकू शकेल असा नवीन ईश्वर अद्यापि लाभला नव्हता.'जुना ईश्वर गेला, नवीन ईश्वराचा पत्ता नाही,'अशी स्थिती होती.


परंतु या सुमारास सॅमॉस बेटात एक तरुण वाढत होता. त्याचे नाव एपिक्यूरस धर्म नसतानाही सुखी कसे व्हावे हे तो शिकविणार होता,देवदेवतांच्या मदतीशिवाय हे जीवन नीट कसे जगता येईल,हे शिकविणार होता.


एपिक्यूरस अलेक्झांडरच्या जन्मानंतर पंधरा वर्षांनी, म्हणजे ख्रि.पू.इ.स. ३४१ मध्ये जन्मला.त्याचा बाप अथीनियन होता.तो शिक्षकाचा धंदा करी.परंतु त्याला पगार फारच थोडा होता.त्यामुळे त्याच्या पत्नीला धार्मिक गंडे,मंतरलेले ताईत वगैरे विकून महिन्याची दोन्ही टोके पुरी करावी लागत.ती अंगारे- धुपारे,

जपजाप्य करून संसार चालवी.ती मनुष्यांना भुताखेतांपासून,

प्रेतांपिशाच्चापासून मुक्त करणारी बिनपदवीची वैदू होती.

लहानग्या एपिक्यूरसला आईच्या या फसव्या धार्मिक जादूटोण्यांत मदत करावी लागे.या गोष्टी पाहून त्याला बालपणीच धर्माविषयी मनापासून तिटकारा वाटू लागला.


अगदी तरुणपणीच आध्यात्माविषयी त्याची आवड व तीव्र बुद्धिमत्ता या दिसून आल्या.


एके दिवशी गुरुजी शिकविताना म्हणाले,"हे जग मूळच्या अव्याकृत प्रकृतीतून जन्माला आले." एपिक्यूरसने विचारले, " पण ती अव्याकृत प्रकृती कोणी उत्पन्न केली?"पंतोजी म्हणाले,"मला ठाऊक नाही.त्याचे उत्तर एखादा खरा तत्त्वज्ञानीच तुला केव्हातरी देईल."


त्याच क्षणी त्याच वेळी एपिक्यूरसने तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्याचे नक्की केले.ज्या अव्याकृत प्रकृतीतून हे प्रत्यक्ष जगत निर्माण झाले,ती मूळची अव्याकृत प्रकृती कोणी निर्मिली या प्रश्राचे उत्तर शोधून काढावयाचे,असे त्याने ठरविले.


वयाच्या अठराव्या वर्षी तो अथेन्सला गेला.ती त्याच्या पित्याची जन्मभूमी होती.तिथे तत्त्वज्ञानातील नाना पंथांशी व संप्रदायांशी त्याचा परिचय झाला,पण कोणत्याच विचारसणीकडे त्याचे मन आकृष्ट झाले नाही.नंतर तो पूर्वे कडे गेला.तो कित्येक वर्षे ज्ञानशोध करीत हिंडत होता.तो ज्ञानाचा यात्रेकरू झाला.पौर्वात्त्य देशांतील ज्ञानाच्या सोन्याच्या लगडी आणण्यासाठी तो मोठ्या उत्सुकतेने गेला व खरोखर ज्ञानसंपन्न होऊन वयाच्या पस्तिसाव्या वर्षी अथेन्सला परत आला. अथेन्सजवळच्या एका खेडेगावातील एक घर त्याने विकत घेतले.त्या घराभोवती बाग होती.


त्याने तिथे तत्त्वज्ञान शिकविणारी 'आकाशाखालची शाळा' उघडली.मोकळी,उघडी शाळा.


तत्त्वज्ञानाचे हे उघडे मंदिर स्त्री-पुरुष दोघांसाठीही होते. कोणीही यावे व शिकावे.ही संस्था फारच लवकर लोकप्रिय झाली.

एपिक्यूरसचे श्रोते त्याचे ईश्वरविषयक नवीन नवीन व आधुनिक पद्धतीचे विचार ऐकून डोलत, तन्मय होत.ते विचार ऐकून कधी त्याच्या मनाला धक्का बसे,तर कधी अपार आनंद होई.या विश्वाचे स्वरूप काय,मानवी भवितव्य काय,इत्यादी गहन गंभीर प्रश्नांवर तो बोले.भविष्यकालीन म्हणजेच मरणोत्तर जीवन अशक्य आहे हे तो अथेन्समधील तरुण-तरुणींना पटवून देई.भविष्यजीवन नसल्यामुळे शक्य तितके आनंद व रस या जीवनातूनच मिळविले पाहिजेत,हा विचार तो त्या तरुण श्रोत्यांच्या मनावर बिंबवी.या मिळालेल्या जीवनाचाच जास्तीतजास्त उपयोग करून घेतला पाहिजे.असे तो शिकवी व पटवून देई.आपल्या काळी तो अत्यंत लोकप्रिय तत्त्वज्ञानी झाला,त्याची लहानमोठी तीनशे पुस्तके त्या वेळेस प्रसिद्ध झाली होती.जे त्याच्या प्रवचनांना उपस्थित राहू शकत नसत,ते त्याची पुस्तके विकत घेत.एपिक्यूरसची बहुतेक पुस्तके नष्ट झाली आहेत,परंतु ल्युक्रेशियस नामक प्रतिभावान कवीने 'वस्तूंचे स्वरूप' या आपल्या महाकाव्यात एपिक्यूरसच्या तत्त्वज्ञानाची संपूर्ण रूपरेषा दिली आहे.

एपिक्यूरसनंतर दोनशे वर्षांनी ल्युक्रेशियस कवी झाला.तो रोममध्ये राही.तो एपिक्यूरियन पंथाचा होता. 'वस्तूंचे स्वरूप' हे ल्युक्रेशियसचे महाकाव्य साहित्याच्या इतिहासातील एक अती अपूर्व व आश्चर्यकारक अशी वस्तू आहे. 


वास्तविक,हे महाकाव्य अती निष्ठुर तर्कपद्धती शिकविण्यासाठी लिहिले आहे;पण त्यात ती अत्यंत उत्कट भावनांनी शिकविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.भावनोत्कट भाषेने निष्ठुर तर्क शिकविणारे हे अपूर्व महाकाव्य 'मनुष्याच्या सुखाव्यतिरिक्त जगात दुसरी दैवी व उदात्त गोष्ट नाही,'असे मानणाऱ्या एका नास्तिकाने लिहिले आहे.ते म्हणजे अधार्मिकांचे-कशावरच विश्वास न ठेवणाऱ्यांचे बायबल होय.


थोडा वेळ आपण ल्युक्रेशियसला भेटीला बोलावू या व एपिक्यूरसच्या तत्त्वज्ञानाची रूपरेषा थोडक्यात सांगण्याची विनंती त्याला करू या.एपिक्यूरसच्या मते जीवनाचा हेतू जीवनातला आनंद अनुभवणे हा होय.या जगात आपणाला दुसरे कर्तव्य नाही,आणखी कसलेही काम नाही.आपण दयाघन परमेश्वराची लेकरे नसून बेफिकीर निसर्गाची सावत्र मुले आहोत.हे जीवन म्हणजे या यंत्रमय श्वातील एक अकल्पित व आकस्मिक घटना होय.पण आपली इच्छा असेल,तर आपणास हे जीवन सुखमय व रसमय करता येईल,कंटाळवाणे वाटणार नाही,असे करता येईल.

आपणास आपल्या सुखासाठी दुसऱ्यावर विसंबून राहून चालणार नाही,स्वतःवरच विसंबून राहिले पाहिजे,हे विश्व विश्वंभाराने निर्मिलेले नसून अनंत अशा अवकाशातल्या अणुपरमाणूंच्या गतीतून ते कसेतरी सहजगत्या बनले आहे एपिक्यूरस हा परमाणुवादी होता.ही मीमांसा त्याने


मानव जातीची कथा,हेन्री थॉमस,अनु-साने गुरुजी मधुशी पब्लिकेशन


 डेमॉक्रिटस नामक पूर्वीच्या ग्रीक तत्त्वज्ञापासून घेतली.

डेमॉक्रिटस ही फारशी कधी न आढळणारी प्राचीन काळातील अपूर्व व्यक्ती होती.एखादे शास्त्रीय सत्य शोधणे हे त्याला एखादे साम्राज्य मिळविण्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे वाटे.अशी माणसे प्राचीन काळात फारशी नव्हती.हे जग कसेतरी यांत्रिक रीतीने अणुपरमाणूतून बनले आहे.या जगाच्या उपपत्तीतच पुष्कळशा महत्त्वाच्या अर्वाचीन शोधांचे बीज आहे.डेमॉक्रिटसने जणू आजच्या पदार्थविज्ञान शास्त्रातील बऱ्याचशा शोधांची पूर्वकल्पनाच केली होती.


डेमॉक्रिटसच्या या अणुमीमांसेच्या पायावर एपिक्यूरसने आपल्या तत्त्वज्ञानाची इमारत उभारली. तो म्हणे- 


आपण सारे अणूंचे संघात आहो,कोठूनतरी शून्यातून आपण येथे फेकलो गेलो असून पुन्हा त्या शून्यातच परत फेकले जाणार आहोत. हे अणू सदैव खाली असे अनंत शून्यात (पोकळीत) फिरत राहतात.कधीकधी हे अणुसंघात या किंवा त्या बाजूला कलल्यामुळे संघर्ष होतात.


 सूर्यकिरणांतील त्रसरेणू एकमेकांवर आदळतात तद्वतच हे घडते.हे अणू नाना रूपांचे व आकारांचे असतात.हे अखंड भ्रमंतीमुळे व परस्परांच्या संघर्षामुळे हळूहळू संघटित होतात.त्यांपासून नाना पदार्थ बनतात.चंद्र, पृथ्वी,तारे हे विश्व अशा रीतीने या अणूंच्या संघातांतून जन्मले,आणि आपले विश्व हे एकच अशा प्रकारचे आहे असेही नव्हे.असली अनंत आश्चर्यकारक व अवाढव्य जगे,

विश्वे,ब्रह्मांडे आहेत.त्या दुसऱ्या विश्वातही आपल्या पृथ्वीसारखीच पृथ्वी असेल व तीवर पर्वत,समुद्र,मानव, पशु,पक्षी असतील.

आपणच तेवढे या अनंत समुद्राच्या अनंत किनाऱ्यावरील वाळूचे कण आहोत,असे नव्हे. कारण हे अणू पुन्हापुन्हा त्याच त्याच प्रकारच्या समवायांत व संघांत एकत्र येतात व तशाच वस्तू पुन्हापुन्हा सर्वत्र घडतात.जेथे जेथे तशी परिस्थिती असेल,तिथे तिथे वस्तुजात.या भ्रमणशील व संघर्षशील अणूंची ही सारी हालचाल स्वंयस्फूर्त असते.तीत कोणा विश्वसूत्रचालकाचा हात नाही;तिला कोणी योजक वा मार्गदर्शक लागत नाही.देवदेवताही अणूंपासूनच बनवतात..फरक इतकाच की,माणसे ज्या अणूंपासून बनतात त्यापेक्षा हे अणू अधिक शुद्ध व निर्दोष असतात.पण या देव नाही माणसांप्रमाणेच नाशवंत असतात.निरनिराळ्या विश्वांमधल्या अनंत अवकाशांत या देवदेवता राहतात,मानवी अस्तित्वाविषयी त्यांना फिकीर नसते,मानवी जीवनाविषयी त्यांना फारसे काही वाटत नाही.शेवटच्या विनाशकालाची प्रलयाची वाट पाहत आपण पृथ्वीवर वावरतो,ते स्वर्गात इतकाच फरक देव व मानव ज्या अणूंतून जन्माला येतात;त्याच अणूंत त्यांचे पुन्हा पर्यवसान होते.


ज्याअर्थी हे अणूसारखे भ्रमणशील आहेत,एका वस्तूंतून फुटून दुसऱ्या वस्तूंत मिळतात,त्याअर्थी एक गोष्ट सिद्ध आहे की,हे जग झिजत आहे व एक दिवस ही पृथ्वीही कोळशाच्या राखेप्रमाणे,

विझलेल्या निखाऱ्याप्रमाणे शून्य होणार आहे.विझलेल्या,थंडगार होऊन गेलेल्या अनंत विश्वाच्या उकिरड्यावर ही पृथ्वीही एके दिवशी गार होऊन पडेल.एपिक्यूरसच्या योजनेत देवांचे स्थान काय हे मात्र नीट समजत नाही.त्यांना मानवाचे महत्त्व वाटत नाही, मानवांना त्यांचे वाटत नाही.एपिक्यूरसला धर्म म्हणजे एक क्षुद्र,नजीवी,अर्थहीन वस्तू वाटत असे.तरीही तो अनेक देवदेवतांवरचा विश्वास सोडावयास तयार नव्हता.अर्थातच,हे देवही नाशवंत अणू आहेत व त्याने देवनाही शून्यांच्या किनाऱ्यावरील सुखी लोकांच्या बेटावर हद्दपार करून टाकलेले आहे हे खरे,पण त्यांना बेटाच्या कडेला ओढून विस्मृतीच्या समुद्रात कायमचे लोटून देण्याचे धैर्य मात्र त्याला झाले नाही.


एपिक्यूरसच्या विश्वात या देवदेवतांचे अस्तित्व असले तरी त्यांना या सृष्टीची काही एक कर्तव्य नाही.


शिल्लक भाग पुढील लेखामध्ये…

२२/२/२५

३.९ मज्जासंस्था-२ /3.9 Nervous system-2

सुरुवातीला माणसाला शरीराचं विच्छेदन करताना कोणत्याही प्राण्याच्या शरीरातल्या नर्व्हज ओळखणं अवघड होतं.कारण सुरुवातीला अनेकदा नर्व्हज आणि स्नायू यामध्ये गफलत व्हायची.

शिवाय,कोणत्याही प्राण्याच्या शरीरात अनेक प्रकारच्या नर्व्हज असतात. त्यांचंही वर्गीकरण करणं अवघडच होतं.गंमत म्हणजे नर्व्हज या मूळ ग्रीक शब्दाचा अर्थच मुळी टेंडॉन (एक प्रकारचे स्नायू) असा आहे! त्यामुळे गोंधळाला सुरुवात तिथून आहे! बाराव्या शतकातला ज्यूइश (यहुदी) तत्त्ववेत्ता मोसेझ मैमोनीदेस यानं म्हटलं आहे,"ज्याला ॲनॅटॉमीचं ज्ञान नाही तो नर्व्हज, लिगामेंट्स आणि टेंडॉन यांच्यात सहज गल्लत करू शकतो." याशिवाय गंमत म्हणजे त्या काळी शरीराची हालचाल करणं आणि संवेदना वाहून नेणं ही दोन्ही कामं नर्व्हज करतात असं मानलं जात होतं.अर्थात, फक्त संवेदना वाहणं हे नर्व्हजचं काम असतं आणि हालचाल करणं हे स्नायूंचं काम असतं.पण त्या काळी संवेदना वाहणं काय किंवा हालचाल करणं काय हे नेमकं कसं होतं हेच माहीत नव्हतं.


फार काय, पण रिस्टॉटललाही कोणत्याही प्राण्याच्या शरीरातल्या नर्व्हज या हृदयातच उगम पावतात आणि हृदयाकडूनच नियंत्रित होतात असं वाटत होतं.याचाच अर्थ,नर्व्हज आणि स्नायू यांच्यामध्ये त्याचाही गोंधळ झालेला होता असं आता काही लोकांना वाटतंय. त्यानंतर गेलननं मात्र रिस्टॉटलची चूक सुधारली. त्याच्या मते सगळ्या नर्व्हज मेंदूतूनच निघतात,त्यामुळे मेंदू हा सगळ्यात महत्त्वाचा अवयवच असला पाहिजे.


मेंदूतून स्पायनल कॉर्ड निघतो आणि तोच हाता-पायांच्या संवेदना मेंदूपर्यंत पोहोचवतो हे गेलननं अनेक प्राण्यांची विच्छेदनं करून आणि प्राण्यांवर प्रयोग करून पाहिलं होतं.याही पुढे जाऊन गेलननं हातापायांमधल्या स्नायूंच्या हालचालींवर नियंत्रणही याच नर्व्हजमुळे होतं हे त्यानं पाहिलं होतं.त्यामुळे संवेदना वाहून नेणं आणि हालचाली घडवून आणणं ही दोन नर्व्हजची कामं आहेत असं तो मानायचा आणि त्यासाठी चक्क सॉफ्ट आणि हार्ड अशा दोन प्रकारच्या नर्व्हज असतात असंही तो मानायचा! त्यातूनही स्पायनल कॉर्ड हा आतून पोकळ असतो,हे गेलननं पाहिलं होतं.त्यामुळे त्यातून 'निमल स्पिरिट' म्हणजे आत्मा हा या पोकळ स्पायनल कॉर्डमध्येच असला पाहिजे,त्यामुळेच सगळ्या प्राण्यांच्या शरीरात चैतन्य असलं पाहिजे असंही गेलनला वाटत होतं !


मध्ययुगातही नर्व्हज या मेंदूशी निगडित असतात अशीच धारणा होती.अकराव्या शतकाच्या सुरुवातीला इस्लामिक डॉक्टर अविसेना यानंही नर्व्हज या पांढऱ्या,लवचिक,पण तुटायला अवघड अशा असतात. त्या मेंदूला जोडलेल्या असतात आणि त्या भावनांशी निगडित असतात असंही अविसेनानं आपल्या 'कॅनन ऑफ मेडिसीन'मध्ये म्हटलं होतं.नर्व्हजमध्ये कोरडेपणा वाढला तर माणूस रागीट होतो असंही त्यानं लिहून ठेवलं होतं. त्यानंतर जवळपास एका शतकानंतर आलेल्या मास्य निकोलसनं शरीरातल्या वेगवेगळ्या भागातल्या नर्व्हज मेंदूच्या वेगवेगळ्या भागातूर उगम पावतात हे शोधून काढलं होतं. त्याप्रमाणेच आपल्या दृष्टी,आवाज,वास,स्पर्श आणि चव या पाच संवेदनांसाठी शरीरात पाच वेगवेगळ्या प्रकारच्या नर्व्हज असतात असंही त्याला वाटायचं.गंमत म्हणजे त्या काळी कोणत्या नर्व्हज वेगवेगळ्या प्रकारच्या संवेदना आणि भावना कशा वाहून नेतात याबद्दल लिओनार्डो दा विंचीसहित अनेकांनी अनेक थिअरीज काढल्या होत्या !


त्यानंतर रेनायसान्स आणि मध्ययुगात अनेक थिअरीज येत राहिल्या.पण त्यापैकी खरं तर कोणीच सजीवांच्या मज्जासंस्थेचं स्वरूप आणि कार्य पूर्णपणे व्यवस्थित सांगू शकलं नव्हतं.

जवळपास सोळाव्या शतकाच्या शेवटपर्यंत आणि सतराव्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत काही नवे शोध आणि काही जुन्या समजुती अशा दोन्ही गोष्टी सोबतच अस्तित्वात होत्या.

त्यानंतरच्या काळात व्हेसायलियस आणि रेने देकार्त यांनीही माणसाचं आणि प्राण्यांचं डिसेक्शन केलं होतं.तरी त्यांनीही नर्व्हज म्हणजे त्या प्राण्याच्या आत्म्याला शरीरभर फिरायचे रस्ते असंच सांगितलं होतं.पण सतराव्या शतकानंतर जसजसा माणसाची प्राण्यांच्या फिजिओलॉजीचा आणि नॅटॉमीचा अभ्यासात प्रगती होत गेली,तसतशी आत्मा आणि त्याला वाहून नेणारे रस्ते ही समजूत मागे पडत गेली.


त्यात भर म्हणून १६५३ मध्ये विल्यम हार्वेनं मेंदू हा स्वतः पाहू शकत नाही किंवा ऐकू शकत नाही पण तरीही मेंदूला सगळं समजतं,हे सांगितलं.


 हार्वेनं ऑप्टिक नर्व्हज,ऑलफॅक्टरी नर्व्हज आणि ऑडिटरी नर्व्हज या नर्व्हज शोधल्या होत्या.शिवाय, या नर्व्हजच स्वतःजागेवरून न हलता शरीरातल्या संवेदना वाहून नेतात असंही आपल्या 'लेक्चर्स ऑन द होल नॅटॉमी' या पुस्तकात लिहून ठेवलं आहे.याशिवाय, देकार्तनं या नर्व्हजमधून कणरूपानं स्टिम्युलाय वाहतात असंही सांगितलं होतं.पण या स्टिम्युलाय म्हणजेच संवेदना कणरूपानं न वाहता विद्युतप्रवाहाच्या रूपात वाहतात हे आता आपल्याला माहीत आहे. शिवाय,संवेदना एका नर्व्हजमधून दुसऱ्या नर्व्हज मध्ये जाऊ शकतात हेही देकार्तला समजलं होतं.


१६८१ मध्ये थॉमस विलिस यानं मज्जासंस्थेच्या अभ्यासाला न्यूरॉलॉजी हा शब्द पहिल्यांदाच वापरला. 


अशाप्रकारे माणसाला प्राण्यांमधल्या न्यूरॉलॉजीबद्दल कळत गेलं.तसंच माणसाला प्राण्यांची नर्व्हज सिस्टिम कशी उत्क्रांत होत गेली तेही हळूहळू समजत गेलं.


मज्जासंस्थेच्या विकासाची सुरुवात ही अनेकपेशीय प्राण्यांमध्ये झाली असावी असं मानलं जातं. 


सुरुवातीला युकॅरिऑटिक प्राण्यांच्या शरीरात संवेदनशील पेशींचे काही समूह तयार झाले असं मानलं जातं.तर जेलीफिशसारख्या प्राण्यांमध्ये नर्व्हच्या जाळीसारख्या साध्या रचना सुरुवातीला निर्माण झाल्या असाव्यात.त्याच्यापेक्षा थोडी प्रगत मज्जासंस्था थोड्या वेगळ्या पाहायला मिळते.जेलीफिश हा टेनोफोरा फायलममध्ये प्राण्यांमध्ये येतो. हा फायलम उत्क्रांतीमधला सगळ्यात प्राचीन फायलम (गट) मानला जातो.त्यापेक्षा कमी उत्क्रांत प्राणी पोरीफेरा या फायलममध्ये पाहायला मिळतात.यात स्पाँज या प्रकारातले पाण्यातले प्राणी येतात.त्यांच्यात तर मज्जासंस्थाच नसते.


पण उत्क्रांतीमध्ये मज्जासंस्था कशी तयार झाली याबद्दल दोन सिद्धान्त (थिअरीज) मांडल्या गेल्या आहेत.एका थिअरीनुसार मज्जासंस्था ही सर्व फायलममध्ये स्वतंत्रपणे विकसित झाली,पण पोरीफेरा या फायलममध्ये ती तयारच झाली नाही.


तर दुसऱ्या सिद्धान्तानुसार उत्क्रांतीमध्ये मज्जासंस्था दोनदा स्वतंत्रपणे तयार झाली, असं मानतात.पाठीचा कणा नसलेल्या प्राण्यांमध्ये व्हेंट्रल नर्व्ह कॉर्डस् तयार झाले; तर पाठीचा कणा असलेल्या प्राण्यांमध्ये पाठीच्या कण्याभोवती (पेरिफेरल नर्व्हज) मज्जातंतू तयार झाले.


मज्जातंतू आणि मज्जासंस्थेची सुरुवात..


मज्जातंतूंनी काम करण्यासाठी 'ॲक्शन पोटेन्शियल' आवश्यक असतात.ते एकपेशीय युकेरियोट्समध्ये विकसित झाले. पण त्यांच्या क्शन पोटेन्शियलमध्ये सोडियमऐवजी कॅल्शियम वापरलं जातं.गटागटानं राहणाऱ्या काही ओबेलियासारख्या - युकॅरियोट्समध्ये दोन पेशींमध्ये संदेशवहन करायचं असेल तेव्हाही वापरलं जातं असं काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

उत्क्रांतीमध्ये न्यूरॉन्स आणि पहिल्या नर्व्ह सिस्टिम्स कशा निर्माण झाल्या यावर अजूनही संशोधन चालू आहे.

(सजीव,अच्युत गोडबोले,अमृता देशपांडे,मधुश्री पब्लिकेशन)


स्पॉजेस…


स्पाँजेसमध्ये सिनॅप्टिक जंक्शनद्वारे एकमेकांशी जोडलेल्या पेशी नसतात,म्हणजेच न्यूरॉन्स नसतात आणि म्हणूनच मज्जासंस्थाही नसते.पण त्यांच्याकडे सिनेंप्टिक फंक्शनमध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या अनेक जनुकं असतात.गंमत म्हणजे आताच्या अभ्यासानुसार स्पंज सेल्स 'पोस्टसायनॅप्टिक डेन्सिटी प्रोटीन' या नावाचा प्रथिनांचा एक समूह तयार करतात आणि हे प्रोटीन्स संवेदना मिळवणाऱ्या सिनॅप्ससारखंच काम करतात असं दिसून आलंय.पण अजूनही अशा रचनेचं नेमकं आणखी काय काम असावं याबद्दल संशोधन चालू आहे.स्पंज पेशी 'सिनॅप्टिक ट्रान्समिशन'नं संवाद करत नाहीत हे जरी खरं असलं तरी ते कॅल्शियमच्या लाटा आणि इतर आवेगांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात असं दिसून आलंय.स्पाँजेस खरं तर आपलं संपूर्ण शरीर आखडून घेणं आणि प्रसरण पावणं अशा सोप्या कृतींमधूनही संवादच साधत असतात.


नर्व्ह नेट्स…


जेलीफिश,कोंब जेलीज आणि त्यासारख्या इतर प्राण्यांमध्ये मध्यवर्ती मज्जासंस्थेऐवजी सगळीकडे पसरलेलं मज्जातंतूंचं जाळं असतं.बऱ्याचशा जेलीफिशमध्ये मज्जातंतूंचं जाळं कमी-अधिक प्रमाणात सगळीकडे पसरलेलं असतं.कोंब जेलीमध्ये ते तोंडाजवळ केंद्रित असतं.


नर्व्ह नेट्समध्ये सेन्सरी न्यूरॉन्स असतात.ते रसायनं, स्पर्श आणि दृश्य या संवेदना ओळखतात.यात मोटर न्यूरॉन्सही असतात.ते एखाद्या स्पर्शाला प्रतिक्रिया म्हणून शरीर आकुंचित करू शकतात.

याशिवाय,नर्व्ह नेटमध्ये इंटरमिडिएट न्यूरॉन्स हाही एक प्रकार असतो. या प्रकारचे न्यूरॉन्स सेन्सरी न्यूरॉन्स आणि मोटर न्यूरॉन्स यांच्यात संवाद साधतात.त्यामुळे काही प्रकारांमध्ये इंटरमीडिएट न्यूरॉन्सचे गट तयार होऊन त्यांचे गँगलिया झालेले दिसतात.

उत्क्रांतीमध्ये हीच मेंदूसारखा अवयव तयार होण्याची सुरुवात होती.तर रेडियाटा गटामधल्या प्राण्यांच्या मज्जासंस्थेला त्यामानानं काही विशिष्ट रचना नसते.


नर्व्ह कॉर्ड्स…


उत्क्रांतीच्या यापुढच्या टप्प्यात नर्व्ह कॉर्ड्स तयार झाल्या.आता अस्तित्वात असलेल्या माणसासहित बहुतेक प्राणी हे बायलॅटरल म्हणजे सममितीय आहेत. या प्राण्यांच्या शरीराची डावी आणि उजवी बाजू ही एकमेकींची मिर इमेज असते.आताचे सगळे बायलॅटरल प्राणी हे ५५० ते ६०० मिलियन वर्षांपूर्वीच्या कृमीसारख्या एकाच प्राण्यापासून उत्क्रांत झाले आहेत असं मानलं जातं.


या प्राण्याच्या शरीराची मूळ रचना ही तोंडापासून ते गुदद्वारापर्यंत एकच पोकळ नळीसारखी होती.या प्राण्याच्या तोंडाकडच्या बाजूला अनेक नर्व्हज एकत्र येऊन त्यांचा गँगलिया तयार झालेला असतो.हाच सुरुवातीचा प्राथमिक मेंदू होता.!


माणसासहित इतर सस्तन प्राण्यांमध्ये विभाजित मज्जासंस्था दिसते.म्हणजेच अशा प्राण्यांच्या पाठीच्या कण्यामध्ये ठरावीक अंतरावर न्यूरॉन्स एकत्र येऊन त्यांचे गँगलिया तयार होतात.आणि अशा गँगलियांची एक साखळी तयार होते.प्रत्येक गँगलियामधून अनेक मोटर आणि सेन्सरी नर्व्ह उगम पावतात.ज्यामुळे शरीराच्या पृष्ठभागाचा आणि आतल्या स्नायूंचा असे दोन वेगळे भाग तयार होतात.त्यातून शरीराच्या वरच्या भागात मेंदू तयार होतो.त्यातूनच मेंदूही फोरब्रेन,मिडब्रेन आणि हाइंडब्रेन या तीन भागांत विभागला जातो.


नेलिडा…


गांडुळांसारख्या प्राण्यांमध्ये तोंडापासून ते शेपटीपर्यंत शरीराच्या लांबीच्या दुप्पट मज्जातंतूचे धागे असतात.या मज्जातंतूंचे धागे वर्म्सच्या शरीरात शिडीच्या पायऱ्यांसारख्या दिसणाऱ्या ट्रान्सव्हर्स (आडव्या) नर्व्हजनं जोडले गेलेले असतात.या आडव्या नर्व्हज त्या प्राण्याच्या शरीराच्या दोन्ही बाजूंना समन्वय साधण्यास मदत करतात.सगळ्या नर्व्हज शेवटी डोक्यासारख्या भागात येऊन पोहोचतात.तर गंमत म्हणजे राऊंडवर्क्समध्ये नर आणि उभयलिंगी प्राण्यांमध्ये अनुक्रमे ३८३ आणि ३०२ न्यूरॉन्स असतात.


आर्थोपॉड्स…


इन्सेक्ट (किडे) आणि क्रस्टेशियन्स (खेकडे) यांसारख्या आर्थोपॉड्समधली मज्जासंस्था गँगलियाच्या साखळीसारख्या रचनेची बनलेली असते.या प्राण्यांमध्ये थोडा विकसित झालेला मेंदूही असतो.तो तोंड, लाळग्रंथी आणि काही स्नायू नियंत्रित करतो.बऱ्याच आर्थोपॉड्समध्ये दृष्टीसाठी कंपाऊंड डोळे असतात. वास समजण्यासाठी आणि फेरोमोन संवेदनांसाठी अँटेनासह इतरही संवेदी अवयव असतात. या अवयवांमधून आलेली माहितीवर पुढे मेंदूमध्ये प्रक्रिया केली जाते.बहुतेक कीटकांमध्ये मेंदूच्याभोवती इतर काही पेशींचं आवरण तयार झालेलं असतं.त्या पेशी कोणत्याही संवेदना वाहून नेत नाहीत,पण त्या चक्क संवेदना वाहून नेणाऱ्या नर्व्ह पेशींना पोषण पुरवतात ! अर्थात,मानवी मेंदूतल्या काही पेशीही हेच काम करतात.


मानवी मेंदूची उत्क्रांती..


आधुनिक मानवांच्या पूर्वज असलेल्या होमो हॅबिलिसचा मेंदू सुमारे ६०० घन सेमी घनतेचा होता. तेव्हापासून मानवी मेंदूची घनता आणि आकार वाढत गेला आहे.होमो नेन्डरर्थेलेन्सिसच्या मेंदूची घनता १७३६ घन सेमी झाली होती.त्यातून मेंदूचा आकार आणि बुद्धिमत्ता यांचा संबंध असतो का याबाबत संशोधन व्हायला लागलं.पण गंमत म्हणजे आताच्या होमोसेपियन्समध्ये मेंदूचा आकार निअँडरथल मेंदूपेक्षा लहान आहे! आताच्या मानवी मेंदूचा आकार १२५० घन सेमी इतकाच असतो. शिवाय, स्त्रियांमध्ये मेंदूचा आकार पुरुषांपेक्षा किंचित लहान असतो.


गंमत म्हणजे होमो इरेक्ट्सपासून उत्क्रांत झालेला फ्लोरेस होमिनिड्स याची क्रेनियल क्षमता सुमारे ३८० घन सेमी इतकी कमी असते.हा मेंदू तर चिम्पांझीपेक्षाही लहान होता.तरीही या मानवानं होमो इरेक्ट्ससारखा अग्नीचा उपयोग केला आणि दगडाची साधने बनवली याचा पुरावा आहे.


या आणि अशाच गोष्टींतून आजच्यासारखा सेंट्रल नर्व्हज सिस्टिम आणि पेरिफेरल नर्व्हज सिस्टिम असलेली प्रगत मज्जासंस्था निर्माण झाली.