* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: व्यक्ती आणि आग्रह / Person and Urge

live

नमस्कार आपले स्वागत आहे. मी पुस्तके आणि मित्रांवर पैसे खर्च करतो,माझ्याकडे दगड आणि विटांवर खर्च करण्यासाठी पैसे नाहीत.-रस्किन बाँड. ही थोर माणसं व त्यांचे विचार मला पुस्तकात भेटलीत.ती भेटली आणि त्यांनी सांगितले कि,प्रत्येक दिवशी असं काही तरी करा की,ते तुम्हाला अधिक सुंदर उद्याच्या दिशेने खूप लांबवर घेऊन जाईल."- डोग फायरबाऊ.'तुम्हाला जर संधी मिळाली तर तुम्ही तुमची मुलं जाळून टाकाल,की तुमची पुस्तकं ?' असा विचित्र प्रश्न स्किनरनं त्याच्या पहिल्याच टेलिव्हिजनच्या कार्यक्रमात प्रेक्षकांना थेटपणे विचारला होता आणि इतकंच नाही,तर 'मी तर मुलांनाच जाळेन,कारण मानवी प्रगतीमध्ये माझ्या पुस्तकांमुळे माझ्या जीन्सपेक्षा जास्त योगदान मिळेल,'असंही त्या प्रश्नांचं स्वत:च सरळपणे उत्तरही दिलं होतं! सर्वियन कादंबरीकार मिलोराद पावीच यांचे एक वाक्य आहे ते म्हणतात - जोवर जगात पुस्तक वाचणाऱ्या वाचकांची संख्या बंदूकधारी सैनिका पेक्षा अधिक आहे तोवर काळजीच काहीच कारण नाही.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात.पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये.म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे मार्गदर्शक, सहकारी धावून येतात.प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,डॉ.दीपक शेटे,आ.भरत बुटाले,प्रा.सर्जेराव राऊत,सुभाष ढगे,अनिल फारणे,डॉ.सुधीर सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,जज्ज,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, पुस्तकातील घटना प्रसंग सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर' पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी पुस्तके, लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत.... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ.मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. - मॅट्रिक फेल विजय गायकवाड

१८/२/२५

व्यक्ती आणि आग्रह / Person and Urge

मी मिसुरीच्या जेसी जेम्सच्या भागात मोठा झालो होतो.मी मिसुरीच्या कियर्नेमध्ये जेम्स फार्ममध्ये गेलो,जिथे जेसी जेम्सचा मुलगा अजूनही राहत होता.त्याच्या पत्नीने मला किस्से ऐकवले की, कोणत्या प्रकारे जेसी ट्रेन्स आणि बँकांना लुटायचा आणि लुटलेल्या पैशांना गरिबांमध्ये वाटून टाकत होता म्हणजे ते त्यांची गहाण ठेवलेली जमीन सोडवू शकतील.जेसी जेम्स स्वतःला त्याच प्रकारे आदर्शवादी आणि परोपकारी समजत होता,जसा की डच शुल्ट्ज,क्राउले किंवा अल केपोन किंवो 'गॉड फादर' समजतात.


खरं तर असं आहे की,तुम्ही ज्या लोकांना भेटता त्यातले जास्त करून स्वतःला चांगले आणि निःस्वार्थ समजतात.


जे.पियरपोंट मॉरगनने एकदा सांगितलं होतं की, कोणतेही काम करण्याच्या मागे माणसाकडे साधारणतः दोन कारणं असतात.पहिलं कारण वास्तविक असतं आणि दुसरं ऐका-बोलायला बरं वाटतं.हे सांगायची जरूरत नाहीये की,प्रत्येक माणूस वास्तविक कारण जाणतो;परंतु आम्ही सगळे लोक आतून आदर्शवादीअसतो म्हणून आम्ही त्या कारणांच्या बाबतीत विचार करणं पसंत करतो जी ऐका-बोलायला चांगली वाटतात.  यामुळे जर तुम्ही लोकांना बदलू इच्छिता,तर आदर्शवादी कारणांचा सहारा घ्या.


काय हा आदर्शवादी उपाय बिझनेसमध्ये कामी येतो?


या बघू या...


ग्लेनोल्डन,पेनसिल्व्हेनियामध्ये फॅरेल-मिशेल कंपनीच्या हॅमिल्टन जे.फॅरेलचंच उदाहरण घ्या. फॅरेलला एका चिडक्या भाडेकरूने घर सोडून जायची धमकी दिली होती.खरं तर करारानुसार त्याला चार महिने तिथेच राहायचं होतं,तरीपण त्याने ही नोटीस दिली होती की,तिथून तत्काळ घर सोडून जातो आहे.करार काहीही झाला तरी.


फॅरलने सांगितलं की,ह्या लोकांनी माझ्या घरात थंडीचा ऋतू घालवलेला होता,जेव्हा घरं पूर्ण वर्षात सगळ्यात महाग असतात.मला माहीत होतं की, शरद ऋतूच्या आधी नवीन भाडेकरू मिळणं कठीण आहे.मी स्वच्छ बघू शकत होतो की,भाड्याची कमाई माझी पूर्ण बुडणार आहे आणि विश्वास ठेवा मी पूर्णपणे वेडा झालो होतो.


खरं तर मी असं केलं असतं की,मी त्यांच्याकडे जाऊन त्याला लीजचा करार परत वाचायचा सल्ला दिला असता.मी सांगितलं असतं की,जर त्याने घर रिकामं केलं तर त्याला पूर्णच्या पूर्ण भाडे एक रकमेत चुकवावं लागेल आणि मी न्यायाचा उपाय करून त्याच्याकडून पैसे वसूल करू शकलो असतो आणि मी तेच केलं असतं.पण मी रागानी वाद वाढवण्याऐवजी दुसऱ्या टेक्निकचा उपयोग करण्याचा निश्चय केला.मी म्हणालो की,मिस्टर डो, मी तुमची गोष्ट ऐकली आहे आणि मला अजून पण विश्वास बसत नाही की तुम्ही घर रिकामं करताय. अनेक वर्षांपासून भाड्यानी घर देण्यामुळे मला मानवी स्वभावाचं बरंच ज्ञान झालं आहे आणि तुम्ही जेव्हा हे घर घ्यायला आले होते तेव्हाच मी पाहिलं होतं की,तुम्ही वचनाचे पक्के आहात.मला आताही असंच वाटतं म्हणून मी तुमच्या समोर हा जोखमीचा प्रस्ताव ठेवतो आहे.


हा राहिला माझा प्रस्ताव,यावर काही दिवस विचार करा आणि मगच मला उत्तर द्या.जर तुम्ही पहिल्या तारखेपर्यंत येऊन मला हे सांगाल की,तुम्ही अजूनही घर सोडू इच्छिता तर मग मी तुम्हाला वचन देतो की,मी तुमच्या निर्णयाला शेवटचा निर्णय मानेन.मी तुम्हाला जाऊ देईन आणि हे मानेन की, तुमच्याबद्दलची माझी समजूत खोटी होती;परंतु माझा अजूनही विश्वास आहे की,तुम्ही आपल्या वचनाचे पक्के आहात.तुम्ही कराराचे पालन कराल. आपण तर माणूस आहोत किंवा बंदर आणि पर्याय निवडणं बहुतेक आपल्या हातात असतं.पुढच्या महिन्यात तो भाडेकरू आला आणि त्याने मला आपणहून भाडं दिलं.त्यांनी सांगितलं की,त्याने आणि त्याच्या पत्नीने यावर चर्चा केली आणि थांबण्याचा निर्णय घेतला.ते या निष्कर्षावर आले की,त्यांच्या सन्मानाला वाचवण्याचा त्याच्याजवळ हाच एकुलता एक उपाय होता की,ते लीजच्या करारानुसार चालतील.


जेव्हा लॉर्ड नॉर्थक्लिफला नको होतं की,पेपरवाले त्याचा एक खास फोटो प्रकाशित करतील,तर त्यांनी संपादकाला एक पत्र लिहिलं.पत्रात काय त्यांनी लिहिलं होतं 'कृपया माझा तो फोटो छापू नका, कारण मी त्या फोटोला पसंत करत नाही?

'नाही, त्यांनी एक आदर्शवादी गोष्ट सांगितली.त्यांनी प्रत्येक माणसाच्या मनात असलेल्या आईच्या प्रती प्रेम आणि सन्मानाच्या भावनेचा सहारा घेतला. त्यांनी लिहिलं,'कृपा करून माझा तो फोटो छापू नका.तो फोटो माझ्या आईला पसंत नाही आहे.' जॉन डी.रॉकफेलर ज्यूनियरला आवडत नव्हतं की, पेपरवाले कॅमेरामन त्यांच्या मुलांचे फोटो घेतील. त्यांनी हे नाही सांगितले की,मला माझ्या मुलांचे फोटो घेतलेले आवडत नाहीत.नाही त्यांनी आपल्या आतल्या आवाजाचा सहारा घेतला जो मुलांच्या नुकसानापासून वाचवतो.त्यांनी हे सांगितले की, तुमच्यापैकी अनेक लोकांची मुले असतील आणि तुम्हाला तर माहीतच आहे की,मुलांचा इतका प्रचार होणं त्यांच्या दृष्टीनं चांगलं नसतं.


प्रत्येक व्यक्ती ही आग्रह पसंत करते.मित्र जोडा आणि प्रभावशाली बना,डेल कार्नेगी,अनुवाद- कृपा कुलकर्णी,मंजुल प्रकाशन.


मॅनचा गरीब मुलगा रायरस एच के. कर्टिस जेव्हा आपलं करियर सुरू करत होते ज्यात त्यांना द सॅटरडे इव्हनिंग पोस्ट आणि लेडिज होम जनरलचा मालक करून करोडोंची कमाई करून दिली.ते आपल्या लेखकांना तितके पैसे देऊ शकत नव्हते, जितके त्यांचे प्रतिस्पर्धा देऊ शकत होते.ते फक्त पैशांकरता प्रसिद्ध लेखकांकडून लेख लिहून घेऊ शकत नव्हते.याकरता त्यांनी आदर्शवादाचा सहारा घेतला.

उदाहणार्थ,त्यांनी लिटील विमेनची अमर लेखिका लुईसा मे अल्कॉटलापण आपल्या समाचार पत्रात लिहिण्याकरता राजी केलं आणि त्यांनी हे तेव्हा केलं जेव्हा ती आपल्या प्रसिद्धीच्या शिखरावर होती.त्यांनी हे कसं केलं? शंभर डॉलरचे चेक देऊन जो त्यांचा नाही;पण त्यांच्या फेव्हरेट चॅरिटीच्या नावावर होता.


संदेहवादी व्यक्ती इथे हे सांगू शकते की,हे सगळं नॉर्थकिफ आणि रॉकफेलर किंवा कुण्या भावूक कादंबरीकाराकरता योग्य असू शकेल; पण मी हे बघणं पसंत करेन की,हे त्या कठोर लोकांच्या बरोबर कसं सफल होईल,ज्यांच्याकडून मला वसुली करावी लागते.


तुमचं बरोबर असू शकतं.कुठलाही सिद्धान्त सगळ्या बाबतीत सफल होत नाही.प्रत्येक व्यक्तीला लागू पडत नाही.जर तुम्ही त्या परिणामांपासून संतुष्ट आहात जे तुम्हाला आज मिळत आहे,ते तुम्हाला बदलायची काय गरज आहे? परंतु जर तुम्ही असंतुष्ट आहात तर हा प्रयोग करून बघायला काय हरकत आहे?


राहिलेला शिल्लक भाग पुढील लेखांमध्ये…!