झाडं अतिशय प्रतिकूल परिस्थितीत वाढू शकतात. खरच वाढू शकतात का?त्यांना वाढावेच लागते! एखादी बी जेव्हा जमिनीवर पडते तेव्हा तिची जागा फक्त वाऱ्याने किंवा एखाद्या जनावरामुळे बदलू शकते.आणि एकदा का ती तिथे रुजली की मग आयुष्यभर तिथेच जखडली जाते.आता तिला तिथे जे काय मिळेल त्यावरच समाधान मानायचे असते. बहुतांश रोपट्यांना पुढील काळात मोठी आव्हाने पेलावी लागतात कारण अनेक वेळा बी रुजण्याची जागा फार अनुकूल नसते.
उदाहरणार्थ,एखादी जागा फार सावलीत असेल, जसे भल्यामोठ्या बीच वृक्षाखाली,तर लख्ख सूर्यप्रकाशात वाढणाऱ्या बर्डचेरीच्या रोपट्याला ते प्रतिकूल ठरते.किंवा एखादी जागा प्रखर प्रकाशात असते त्या वेळेस बीचच्या रोपट्यांची पालवी जळून जाते.दलदलीच्या जागेत मुळं कुजून जातात आणि कोरडी वाळू असलेल्या जमिनीत तहानेने मरून जातात.काही जागा उदाहरणार्थ,निकृष्ट जमीन,दगड किंवा मोठ्या झाडांच्या फांद्यांतील बेचकी या बी रुजण्यासाठी अंत्यत दुर्देवी जागा म्हणता येतील.आणि अनेकदा नशीब साथ देत नाही. समजा तुटून जमिनीवर पडलेल्या झाडाच्या लाकडात एखादी बी पडली तर काही दिवसांनी त्याचे रोपटे होईल आणि मूळ कुजणाऱ्या लाकडात शिरतील.पण जेव्हा कोरडा उन्हाळा येतो तेव्हा ते लाकूड सुके पडते आणि रोपट्याचे आयुष्य संपते.
अनेक मध्य युरोपीय झाडांच्या प्रजातींच्या बिया रुजण्याचे अनुकूल ठिकाण साधारण एकसारखेच असते.त्यांना पोषणयुक्त,मोकळी,हवेशीर आणि आर्द्रता टिकविणारी माती आवडते.जमीन कोरड्या हवेतही ओलसर राहिली पाहिजे.
उन्हाळ्यात फार तापू नये किंवा थंडीत गारठू नये.बेताचा हिमवर्षाव चालेल कारण त्यातून बर्फ वितळल्यावर जमिनीला पाणी मिळते.तिथे डोंगरामुळे वादळी वारे अडवले गेले पाहिजेत आणि बुरशी किंवा कीटकांचा प्रादुर्भाव कमी असावा.(द हिडन लाईफ ऑफ ट्रीज,पी ट र वो ह्ल ले बे न अनुवाद - गुरुदास नूलकर,अरविंद घनश्याम पाटकर मनोविकास प्रकाशन)
झाडांच्या स्वप्नातले 'स्वर्ग' हे असेच असेल.पण काही तुरळक ठिकाणे सोडली तर अशी परिस्थिती फार क्वचित मिळते.पण हे जैवविविधतेसाठी असंच असणं चांगलं आहे.कारण जर मध्य युरोप हा सगळ्या प्रकारच्या झाडांसाठी असा स्वर्गीय प्रदेश असता तर बीच वृक्षांनी एकट्याने जगण्याची स्पर्धा एकहाती जिंकली असती आणि हा सगळ्या प्रकारच्या झाडांमध्ये फक्त बीचचे वृक्षच दिसले असते.स्पर्धकांना मागे टाकून आपल्याला हवे ते भरपूर ओरबाडून घेऊन अनुकूल परिस्थितीचा फायदा कसा घ्यायचा हे बीच वृक्षांना बरोबर कळते. झपाट्याने वाढून आपल्या पालवीचे आच्छादन केले की खालच्या स्पर्धकांना सूर्यप्रकाश कमी मिळतो.अशा परिस्थितीत जर त्या स्पर्धकाला जीव वाचवायचा असेल तर काहीतरी वेगळी युक्ती लढवायला लागते.पण हे सहज शक्य नसते म्हणून जर बीच वृक्षाशेजारी स्वतःसाठी पर्यावरणीय कोनाडा (इकॉलॉजिकल निश),जागा तयार करायची असेल.
आणि आपली वाढ करून घ्यायची असेल तर त्या झाडाला स्वतःच्या गरजा कमी कराव्या लागतात.काही सोडून द्याव्या लागतात, जगण्यासाठी पर्यायी धोरण आखावे लागते.
एकूणच बीच वृक्षाखाली अशी स्वतःची जागा तयार करण्याच्या प्रयत्नात झाडाचे जीवन दुष्कर होऊन जाते.पण कोणत्याही अधिवासात असा अनुकूल इकॉलॉजिकल निश मिळत नसल्यामुळे खरंतर आपण झाडांना हव्या असलेल्या अनुकूल परिस्थितीबद्दल बोलणं,आग्रही असणं बरोबर होईल का? आहोत अशा प्रकारच्या प्रतिकूल जागा तर सर्वत्र सापडतात.ज्या झाडांना यात तग धरता येतो ती प्रजाती आपला भौगोलिक विस्तार करू शकते.म्हणजेच आपण झाडांच्या जुळवून घेण्याच्या,प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग काढून तग धरून राहण्याच्या विजीगीषू वृत्तीबद्दल बोलतोय, नाही का? आणि स्प्रूसच्या झाडाने नेमके हेच केले आहे.कमी उन्हाळा आणि बोचऱ्या थंडीत,उत्तरे पासून ते मध्य युरोपपर्यंत असा या स्प्रूसचा प्रसार आहे.सायबेरिया कॅनडा आणि स्कँडिनेव्हियामध्ये स्प्रूस वाढण्याचा मौसम फक्त काही आठवड्यांचा असतो.अशा परिस्थितीत बीचची पालवीसुद्धा उमलत नाही.आणि त्या कडक थंडीमुळे बीचला हिमबाधा होऊन त्याची वाढ खुंटेल.या प्रतिकूल परिस्थितीत फक्त स्प्रूस तग धरतो.
स्प्रूसच्या सूचीपर्णी पानांमध्ये आणि खोडांमध्ये काही विशिष्ट तेलं असतात ज्यामुळे त्यांच्या शरीरातली द्रव्ये गोठून जात नाहीत.म्हणूनच त्यांची पानं झडत नाहीत आणि ते फांद्यांना ऊब देऊ शकतात.वसंतातल्या सूर्यप्रकाशाचे किरण अंगावर पडताक्षणी ते प्रकाश संश्लेषण सुरू करतात. एकही दिवस वाया घालवला जात नाही आणि साखर आणि लाकडाच्या उत्पादनासाठी काही आठवड्यांचा थोडासा कालावधी जरी मिळाला तरी यामुळे झाड वर्षाला इंच दोन इंच वाढत राहते.
पण अशाप्रकारे पान झडू न देणे हेसुद्धा झाडाला धोकादायक आहे.कारण फांद्यांवर बर्फ साठतो आणि वजनदार झाल्यावर झाडाची फांदी मोडू शकते.असे होऊ नये यासाठी स्प्रूस कडे दोन उपाय असतात.पहिलं म्हणजे स्त्री-पुरुष आपलं खोड सरळ सोट वाढविते.उभ्या अवस्थेत वजन समतोल राहते आणि संतुलन सहसा बिघडू शकत नाही. दुसरं म्हणजे उन्हाळ्यात फांद्या आडव्या वाढतात, आडव्या फांद्यांवर बर्फाचे वजन जमले की त्या खाली झुकू लागतात आणि खालच्या फांदीचा त्यांना आधार मिळतो.फांद्यांची रचना घराच्या कौलांसारखी होते आणि त्या एकमेकांच्या मदतीने स्वतःला सांभाळतात.या रचनेमुळे वरून पाहिल्यास हे झाड एकदम लुकडे दिसते.यामुळे बर्फ झाडाभोवती पडतो,
त्याच्यावर नाही.उंचीवर किंवा उत्तरेकडे अतिशय बर्फाळ प्रदेशात वाढणारे स्प्रूस आपल्या शिरेच्या फांद्या छोट्या ठेवत डोक्याचा मुकुट लांब निमुळता ठेवतात आणि स्वतःचा अधिक बचाव करू शकतात.
पानझड न करण्याचा अजून एक धोका असतो. सुयांसारख्या पालवीमुळे पृष्ठभाग वाढतो आणि वादळी वाऱ्याला अडथळा होतो आणि त्यामुळे हिवाळी वादळात झाड पडू शकते.एकच गोष्ट त्यांचा यापासून बचाव करते,ती म्हणजे त्यांची संथपणे होणारी वाढ.शेकडो वर्षं वयाचे झाडही जेमतेम तीस फुटापर्यंत वाढते,ज्यामुळे वादळी वाऱ्यामध्ये ते मोडण्याची शक्यता कमी राहते.तो धोका झाड साधारण ऐंशी फुटाच्या वर गेल्यावर वाढतो.
मध्य युरोपीय जंगलात बीच वृक्षांची सर्वाधिक संख्या असते.यांच्या घनदाट पालवीमुळे फार थोडा सूर्यप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचतो.यू हा वृक्ष अत्यंत चिकाटीने आणि काटकसरीने वाढतो अशी त्याची ख्याती आहे.आपण बीच वृक्षाशी वाढीमध्ये स्पर्धा करू शकत नाही हे यू (भारतीय बारमी किंवा मंदुपर्णीची प्रजात) वृक्षाला चांगलेच माहिती असते.म्हणून त्याने जंगलाचा दुय्यम स्तर पकडलेला असतो.केवळ ३ टक्के सूर्यप्रकाश पोचणाऱ्या या स्तरांमध्ये 'यू'ची वाढ होते.पण या परिस्थितीत वीस ते तीस फूट उंची गाठून प्रौढ अवस्थेत पोचण्यासाठी त्याला कमीत कमी एक शतक लागते.या कालावधीत त्यावर अनेक संकटे येतात.
शाकाहारी जनावरे त्याची पालवी कुरतडून वाढ एखाद दोन दशके मागे टाकू शकतात किंवा एखादा मरणपंथाला लागलेला बीच वृक्ष त्याच्या अंगावर पडू शकतो.पण हे कणखर झाड आधीपासूनच पुरेशी सावधगिरी बाळगून तयारी सुरू करत असतो.इतर झाडांच्या मानाने अगदी सुरुवातीपासून आपली मुळे सक्षम करण्यात यू बरीच ऊर्जा खर्च करतो.मुळातून ते पोषणद्रव्यांचा साठा करून ठेवतो म्हणजे आपत्ती आलीच तर यातून परत पोषण मिळू शकते.
पण यामुळे झाडाला एकापेक्षा जास्त खोडं येऊ शकतात.प्रौढ अवस्थेत ही खोर्ड जुळून येऊ शकतात ज्यामुळे झाड थोडं विचित्र अस्ताव्यस्त दिसतं.यू चे वृक्ष इतर कोणत्याही झाडापेक्षा जास्त म्हणजे हजार वर्षापर्यंतही जगू शकतात.त्यामुळे आसपासची झाडं तुलनेने लवकर वठून पडून जातात.मग मिळणाऱ्या सूर्यप्रकाशाचा पुरेपूर वापर ते करून घेतं.असे असूनही त्यांची उंची पासष्ट फुटांपेक्षा जास्त नसते.त्यांना यापेक्षा जास्त उंच होण्यात काहीच रस नसतो.
हॉर्नबीम नावाचा वृक्ष या यू वृक्षाचे अनुसरण करायचा प्रयत्न करतो.नावात साम्य नसले तरी हे झाड बर्च वृक्षाचे नातेवाईक आहे.पण याच्या सवयी यू इतक्या काटकसरीच्या नसतात आणि त्याला जास्त सूर्यप्रकाश लागतो.तरीही ते बीच वृक्षाखाली जगू शकते पण त्याचा मोठा वृक्ष होऊ शकत नाही.
हॉर्नबीम पासष्ट फुटांपेक्षा जास्त वाढत नाही आणि ही उंची ओकच्या जंगलात होऊ शकते कारण तिथे बीच जंगलापेक्षा जास्त सूर्यप्रकाश मिळतो.या जंगलात त्याची मोकळेपणाने वाढ होते कारण दोन्ही प्रजातींना भरपूर जागा असते.पण या जंगलातही एखादा बीच वृक्ष उगवतो आणि हॉर्नबीमना मागे टाकायला लागतो.सावली,कोरडी हवा आणि उष्णता असली तरीही हॉर्नबीम बीच झाडाशी स्पर्धा करू शकतो.अशा परिस्थितीत बीच तग धरू शकत नाहीत.ही परिस्थिती पश्चिमेकडे तोंड केलेल्या उतारावर असते आणि इथे हॉर्नबीम वृक्ष राज्य करू शकतात.दलदलीच्या प्रदेशात प्राणवायू कमी असतो आणि बहुतांश झाडांची मुळं तिथे तग धरू शकत नाहीत. अशी परिस्थिती झरे किंवा ओढे यांच्याकडेला आणि पूर पठारांवर तयार होते.समजा एखाद्या बीच वृक्षाचे बीज तिथे पडले आणि रुजले तर ते काही प्रमाणात वाढू शकते पण कुजलेल्या मुळामुळे उन्हाळी वादळात ते पडू शकते.
मुळांना भक्कम जमिनीचा आधार मिळाला नाही तर स्प्रूस,
पाईन, हॉर्नबीम आणि बर्च वृक्षांची अशीच परिस्थिती होते. पण अल्डर वृक्षांचे मात्र याच्या उलट असते.
आपल्या स्पर्धकांपेक्षा जास्त उंच होऊ शकले नसले तरी त्यांना दलदलीच्या प्रदेशात भक्कमपणे उभं राहता येतं.
त्यांच्या मुळांमध्ये हवेच्या नलिका असतात ज्यामुळे प्राणवायू खालपर्यंत पोचू शकतो. समुद्रात पोहणाऱ्या डायव्हर्स जसे समुद्रात श्वास घेण्यासाठी 'श्वासोच्छवासाची नळी' घेऊन समुद्रात खोलवर जातात,ही नळी पाण्याच्या पृष्ठभागाबाहेर राहून त्यांना 'प्राणवायूचा पुरवठा करत राहते, त्याचप्रमाणे या हवेच्या नलिकांचे काम असते. या व्यतिरिक्त अल्डर झाडाच्या बुंदियाच्या खालच्या भागात कॉर्क पेशी (या सच्छिद्र असतात,ज्यातून हवा आत शोषली जाते) असतात. जर पाण्याची पातळी या पेशींच्या वर फार दिवस राहिली तर अल्डर वृक्षाची मुळं कुजायला लागतात.