* विजय गायकवाड | Vijay Gaikawad: खारट पोहे / Salty swim २

live

नमस्कार आपले स्वागत आहे. 'सगळे जण तुम्हाला शोधत येतील.आनंदाने तुडुंब भरलेली माणसे सर्वांनाच आवडतात! पण ते तुम्हाला दुःखी,उदास अशा अवस्थेत पाहू शकत नाहीत! तेव्हा आनंदी-हसतमुख रहा आणि मित्रांचा सहवास वाढवा! जर तुम्ही दुःखी राहिलात तर मात्र सगळे जण तुम्हाला सोडून जातील. जीवनातील आनंद-प्रसन्नता भरभरून वाटा! पण एकटे दुःखी रहाल, तर त्या दुःखातच बुडून जाल !' सॉलिट्यूड, ईला व्हीलर विलकॉक्स जगण्याच्या तयारीसाठी नव्हे तर,जगण्यासाठी माणूस जन्माला आला आहे,असं 'बोरिक पास्तरनाक' यांनी म्हटलेलं आहे.प्रत्येक व्यक्तींवर कुणाचा तरी,कशाचा तरी प्रभाव हा असतोच.माझ्यावरती सर्वात जास्त प्रभाव आहे माझ्या जीवनातील मार्गदर्शक पुस्तकांचा ! वाचन हे आहाराहून जास्त महत्त्वाचे असते.जिम र्‍होम यांनी अँथोनी रॉबीन्स यांना शिकवले होते की 'एक वेळ रोजचे जेवण चुकव,पण वाचन अजिबात चुकवू नको.' याप्रमाणे मी अखंडपणे वाचत आहे. माणसांपासून माणसांपर्यंत जाण्याचा,प्रकाशाकडून प्रकाशाकडे जाण्याचा जीवनाचा राजमार्ग पुस्तकातून जातो. कधी कधी पुस्तके घेण्यासाठी माझ्याकडे पैसे नसतात. पण या ठिकाणी माझे वाचन थांबू नये. म्हणून अविरतपणे मनस्वी प्रयत्न करणारे प्रिय मित्र माधव गव्हाने,गुरूवर्य सुनिल घायाळ,कवी सचिन शिंदे,संतोष शेळके,अनिल फारणे,सहित प्रकाशन,डॉ.रवींद्र श्रावस्ती,डॉ.सरवदे साहेब,विश्वास खाडे,शितल खाडे,सतीश खाडे,संजय बापट,मनोहर सुर्वे,विनायक पाटील,संतोष पाटील,तात्या गाडेकर,दादासाहेब ताजणे, मेनन पिस्टन रिंग मधील सहकारी मित्र शेखर सुर्यवंशी..। पुस्तकातील घटना प्रसंग हे मी लिखित स्वरूपात सध्या व्हाट्सअप वरती टाकत असतो.हे सर्व लेखन एकाच ठिकाणी एकत्रित करण्याचे काम आमचे तरुण प्रेमळ 'शास्त्रज्ञ विष्णू गाडेकर पाटील' यांनी केलेले आहे. त्यांचेही मनापासून आभार मला लिहिण्याची प्रेरणा देणारी,पुस्तके देणारी लेखक,सहकारी,व मित्र ही जगावेगळी माणसं माझ्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आहेत. ... आणि हे सर्व करण्यासाठी मला संपूर्ण मोकळं स्वातंत्र्य देणारी संसाराची आठवणही करुन न देणारी माझी पत्नी सौ. मेघा विजय गायकवाड,मोठी ताई (माधुरी आडके),(लहान ताई जयश्री शिंदे) व आदरणीय वहिनीसाहेब यांचाही मी नम्रपणे आभारी आहे. विजय कृष्णात गायकवाड

२/३/२५

खारट पोहे / Salty swim २

"हो रे, लंचसाठी डबापण देणार होती;पण मीच म्हटलं,

सकाळी पाच वाजता उठून बनवणार त्यापेक्षा आज दुपारी बाहेर जातो जेवायला."


"आज बाहेरच जावं लागणार आहे.मीपण आणला नाही डबा.चल बॉस यायच्या आधी उरकून घेऊ." असं म्हणत अनिरुद्ध उठला.


आज अनिरुद्धला डबा द्यायचाच आहे,तर फक्त चपाती-भाजी न देता आमटी-भात आणि सॅलडपण करू म्हणून राधिकानं सगळा स्वयंपाक आवरला. जायच्या आधी फोन करून सांगूया,नाही तर तो बाहेर जाईल म्हणून राधिकानं फोन केला.पूर्ण रिंग वाजली;पण अनिरुद्धनं फोन काही उचलला नाही. मीटिंग सुरू असेल म्हणून डबा भरून पार्किंगमध्ये आल्यावर परत फोन केला.त्यावेळीपण त्यानं फोन उचलला नाही.अजून राग कमी झाला नसणार. म्हणजे डबा घेऊन गेलं तर तिथंच ओरडणार तर नाही ना? राधिकानं दोन मिनिटं विचार केला आणि जायचं ठरवलं.ओरडला तर ओरडला.पुढचं पुढं बघू, म्हणत तिनं स्कुटी बाहेर काढली.

बरेच दिवस न वापरल्यानं गाडी चालूच होत नव्हती.किका मारून मारून पाय भरून आलं;पण गाडी काही चालू झाली नाही.जरा गुड गुड केली की बंद व्हायची. तेलाची टाकी उघडून बघितली तर त्यात खडखडाट. मग तिनं गाडी साईड स्टँडला लावली आणि कॉर्नरवरच्या पेट्रोल पंपावर जाऊन बाटलीतून पेट्रोल आणलं.इतक्या मेहनतीनं चाललीय खरी; पण हा बाबा बाहेर गेला नसला म्हणजे बरं. सकाळी सासूबाईंनी मुलगी झाली म्हणून बोललेलं शब्द कानात घुमत होतं.पोह्यात मीठ नीट मिक्स झालं नाही म्हणून पोहे अंगावर फेकून दिलं.इतका पुरुषी अहंकार.नोकरी करणारी बायको पाहिजे आणि लग्न झालं की मुलं सांभाळून,घर, स्वयंपाक, सासू-सासरे, पैपाहुणे यांची सरबराई करून नोकरी सांभाळा म्हणे; बाई आहे की मशीन ? स्वतःच स्वतःशी पुटपुटत तिनं गाडीच्या टाकीमध्ये पेट्रोल घातलं आणि गाडी सुरू केली.

दोन-तीन किका मारताच गाडी चालू झाली आणि तिनं समाधानाचा सुस्कार सोडला.इतक्या दिवसांनी गाडीवरून जाताना लागणारा वारा राधिकाच्या गालाला गुदगुल्या करू लागला.हेल्मेटची काच वर करून ती वाऱ्याचा आनंद घेत निघाली.


दुपारी लंचला बाहेर जायचा अनिरुद्धचा बेत आधीच ठरला होता.हॉटेलला जाऊन ऑर्डर करून जेवण मिळायला उशीर होईल म्हणून फोन करून टेबल बुक केलं आणि ऑर्डर दिली होती.संदेशच्या कारमधून दोघं ऑफिसमधून बाहेर पडले.


चौकात सिग्नलला चांगलीच गर्दी होती. हळूहळू वाट काढत संदेश पुढं सरकला.उजवीकड वळण बंद केलं होत.परत पुढच्या चौकातून यू टर्न घ्यावा लागणार म्हणून अनिरुद्ध वैतागला."अरे ट्रॅफिक म्हणजे ना डोक्याला ताप आहे.अस अचानक डायव्हर्ट करतात.आधी माहिती असतं तर पढ आलोच नसतो." "चिल यार.. काहीतरी कारण असणार नाही तर उगाच कशाला डायव्हर करतील;पण तू सकाळपासून इतका चिडचिड का करत आहेस?"


"अरे,काल एकतर बॉसनं उशिरापर्यंत डोकं फिरवलं.त्यात रात्री आमटीत मीठ कमी,तर सकाळी राधानं पोहे खारट केलेलं.डबापण तयार नव्हता."


"तू रात्री वहिनींना सांगितलं नव्हतंस का लवकर डबा बनव म्हणून?"


"नाही ना यार.बॉसच्या टेन्शनमध्ये विसरलो सांगायला."


"मग तू ऑफिसचा राग बायकोवर का काढतोस?"


"अरे पण स्वयंपाक नीट नको का बनवायला?"


"तू जसं सांगायला विसरलास तसं ती मीठ टाकायला विसरली असेल.त्यात इतकं काय चिडण्यासारखं आहे? घ्यायचं आमटीत थोडं मीठ वरून..."


"घरात बसून तिला तेवढंच काम आहे; तेपण नीट करता येत नाही. नोकरी सोडून घरी बसलीय, तर घर तरी सांभाळता आलं पाहिजे."


"त्यांनी का नोकरी सोडली?"


"बाळाला कोण सांभाळणार?"


"तुझी आई असते ना घरी ?"


"ती थकलीय आता.तिच्यानं नाही होत पळापळ."


"ऑफिसचं टेन्शन आणि बायकोची नोकरी याचा राग राधिका वहिनींवर काढून कशाला त्रास करून घ्यायचा?"


"आता तू तिची वकिली करू नकोस.बघ लवकर मरणार नाही ती.विषय काढला आणि तिचा फोन आला.आता पकवणार.आईबरोबर वाद झाला असणार,नाही तर घरी काहीतरी संपलं असणार?"


"तुला सगळं माहीत आहे रे?"


"म्हणूनच फोन कट केला;पण तिचा आत्मा शांत होतोय का बघ,दोन वेळा कट केला तरी तिसऱ्यांदा लावला. आता पूर्ण रिंग होऊदे.बसूदे कानाला फोन लावून."


बघ तर काय म्हणायचं आहे ते.दोन मिनिटंच लागतील,किती वेळा अस टाळणार?"


"बघ ना. कळत कसं नाही या लोकांना समोरचा माणूस फोन उचलत नाही णजे काहीतरी कामात असेल,बीझी असेल.

यांना मॅनर्सच नाहीत..." असं म्हणत अनिरुद्धनं रागानं फोन कट केला.


" तुझ्या बाजून तू बरोबर आहेस रे,पण असंही असेल की,

समोरची व्यक्ती काहीतरी अडचणीत असेल.इमर्जन्सी असेल.बघ तरी काय म्हणायचं आहे त्यांना..." संदेश हसत हसत बोलला.


"ठिक आहे,तू म्हणतोस म्हणून उचलतो." येऊदे परत म्हणत अनिरुद्धनं फोन हातातच धरला;पण फोन आला नाही.थोडा वेळ वाट बघून फोन खिशात ठेवला.रिलॅक्स होत केसातून हात फिरविला.दोन मिनिटांनी परत फोन वाजला."बघ इतका वेळ फोन हातात होता तोवर वाजला नाही.जरा डोळा लागला तर फोन आला.ही बया पाठ सोडणार नाही आणि सुखात जगू देणार नाही." असं म्हणत अनिरुद्ध मिश्कीलपणं हसला.


"उचल फोन आणि विषय संपव.बघ काय काम आहे."


रागानं फोन उचलून अनिरुद्ध खेकसला,"इतक्या वेळा फोन करायला काय झालंय.घरी येईपर्यंत वाट बघता येत नाही का? जीव जातोय का?"


समोरून आवाज आला, "जीव जात नाही.जीव गेलाय..!"


"काय..?" राधिकाच्या फोनवर अनोळखी आवाज ऐकून अनिरुद्ध घाबरला.


✓ "ज्या नंबरवरून तुम्हाला फोन आलाय त्या व्यक्तीचा आताच अपघात झालाय.त्यांच्या फोनवर तुमचा नंबर लास्ट डाईलमध्ये आहे आणि हब्बी नावानं सेव्ह आहे म्हणून तुम्हाला फोन केला. समोरून निर्विकार आवाज आला.

बोलणं ऐकून संदेशनं गाडी बाजूला थांबवली.


घाबरलेल्या अनिरुद्धनं विचारलं,"कधी? कुठे? कसा? ती तर घरीच असते!"


"पंधरा मिनिटे झाली.चौकात सिटी बसला स्कुटी धडकली.

सोबत जेवणाचा डबा आहे.चौकात या.ओळख पटवून बघा.बराच वेळ अनि,अनि म्हणून तळमळत होती;पण तुम्ही फोन उचलला नाही. तोवर जीव सोडला."


२८.०२.२५ या लेखातील शेवटचा भाग…